November 2022

श्रीरामपूर प्रतिनिधी : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या. श्रीरामपूर कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणुकी संदर्भात,औरंगाबाद खंडपीठाने महत्वाचा निर्णय दिला असून. यासंदर्भात माजी सभापती दिपक पटारे यांनी, कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत,तालुक्यातील शेतकऱ्यांना सहभाग घेता यावा. याकरिता काही आठवड्यांपूर्वी औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिका दाखल केली होती. सदरच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान,  न्यायालयाने पटारे यांच्या बाजूने निकाल देत. शासनाच्या नवीन अद्यादेशानुसार कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक घ्यावी असे आदेश दिले असून. श्रीरामपूर कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणुक १५ मार्च २०२३ नंतर होणार असल्याची माहिती, याचिका कर्त्यांचे वकिल ॲड. विनायक होन व ॲड. सिध्देश्वर ठोंबरे यांनी दिली आहे.

श्रीरामपूर : शहरातील रेव्हीन्यू कॉलनी येथील समाज मंदिरा समोरील ओपन स्पेस मध्ये ,एका अनोळखी इसमाने आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास, बंद अवस्थेतील ट्रक बॉडीला ,फेट्याच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची समोर आल्याने, खळबळ उडाली आहे. सदरची बाब लक्षात येताच, माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे, सामाजिक कार्यकर्ते रितेश एडके व स्थानिक नागरिकांनी, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यास माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच सहाय्यक फौजदार श्रीधर हापसे पोलीस नाईक संजय पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन. घटनेचा पंचनामा करून अज्ञात इसमाचा मृतदेह,उत्तरीय तपासणी करिता पाठवला असून. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून. मयत इसम कोण, कुठूला व त्याने आत्महत्या का केली। याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस तपास करीत आहेत.

श्रीरामपूर (प्रतिनिधी): येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे ७ विद्यार्थी पूर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती पूर्व परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तनिष खैरनार, ऋग्वेद गांगुली,मोहित माळवे अनुष्का राठी,सावरी खटाणे तर उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अस्मिता रासकर,मोहीन पाटील यांनी चांगले गुण मिळवून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री रामशेठ टेकावडे,सचिव प्रतिक्षित टेकावडे, सदस्य जन्मजय टेकावडे, प्राचार्य डॉ योगेश अरुण पुंड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर प्रतिनिधी- कुटुंबाच्या उपजीविकेसाठी सर्वच जण काही ना काही खटाटोप करता. ज्यात शासनाच्या परवानगी घेऊन, संगमनेर नगरपालिके समोरील ८० परवाना धारक रिक्षा चालक, इमाने इतबारे, राजहंस रिक्षा स्टॉप रिक्षा चालवून आपले पोट भरत असतांना. जाणीवपूर्वक ८० रिक्षा धारकांच्या अन्नात माती काळविण्यासाठी.खोट्या तक्रारी केल्याने, कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता. ४५ वर्षांपासून इमानदारीत कष्ट करणाऱ्या रिक्षा चालकांवर, श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवाहन विभागाने, दडपशाहीचा वापर करून. सदर परमिटधारक रिक्षा चालकांना हुसकून लावल्याने. ४५ वर्षात कोणत्याही प्रकारची तक्रार नसतांना. आमच्यावर हा अन्याय का असा सवाल करत.वाहन चालक मालक सामजिक संघाच्या वतीने. श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवाहन विभागास निवेदन देण्यात आले. यावेळी खोट्या तक्रारींची शहानिशा न करता. जर आमच्या अन्नात माती काळवणार असाल तर, ८ दिवसात शासनाच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरून असा इशारा. चालक मालक सामजिक संघाने दिला आहे. यावेळी कुमार  परदेशी, पप्पू गोरे, मोरेश्वर परदेशी, विकास ढमाले , शाम आव्हाड ,आसिर मन्यार, सोपान चोळके, आनंदा पानसरे, मोईन शेख,विक्रांत जाधव, सचिन चौधरी, अन्वर शेख,रिपाई वाहतूक आघाडीचे सलीम शेख आदींसह, चालक मालक सामजिक संघाचे पदाधिकारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): येथील श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचा श्रीराम अकॅडमी सीबीएससी स्कूलचा टेबलटेनिस १४ वर्षाखालील मुलांचा संघाने शालेय जिल्हास्तरीय टेबलटेनिस स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले. सोमवार दि २८ नोव्हेंबर रोजी सोमय्या विद्यामंदिर साखरवाडी कोपरगाव येथे जिल्हास्तरीय शालेय १४,१७ व १९ मुलांच्या टेबल टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते.१४ वर्षाआतील मुलांच्या गटांमध्ये जिल्हाभरातून १५ शाळांनी सहभाग नोंदवला होता. अंतिम सामन्यात श्रीराम ॲकॅडमी संघाने दि ग सराफ संगमनेर संघाचा पराभव करून शालेय जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.या विजेत्या संघातील चिराग दुधेडिया ,सक्षम दळवी ,श्लोक ढाके,अभिज्ञान वेंकटरमन,वेदांत कोरडे आदींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तसेच १७ वर्षाआतील श्रीराम अकॅडमी मुलांच्या संघाने शालेय जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री रामशेठ टेकावडे,सचिव प्रत्यशित टेकावडे,सदस्य जन्मजय टेकावडे, प्राचार्या जयश्री पोटघन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी संघाला क्रीडाशिक्षक अल्ताफ शेख यांचे मार्गदर्शन लाभले.

श्रीरामपूर प्रतिनिधी-गौरव डेंगळे ऑकलॅण्ड (न्युझीलँड): राष्ट्रकुल पावर लिफ्टिंग फेडरेशनच्या वतीने ऑकलँड न्यूझीलंड येथे राष्ट्रकुल पावरलिफ्टिंग स्पर्धा दिनांक २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान सुरू आहे.या स्पर्धेत ९३ किलो वजन गटात श्रीरामपूरचे प्रा सुभाष देशमुख यांनी ऐतिहासिक कामगिरी करत १६७.५ किलो वजन उचलून देशासाठी सुवर्णपदक पटकावले आहे.९३ किलो वजन गटात इंग्लंड,कॅनडा,पाकिस्तान,श्रीलंका दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड,बांगलादेश,आयर्लंड,ऑस्ट्रेलिया या देशातून ११ स्पर्धक सहभागी झाले होते.या स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करताना प्रा देशमुख यांनी सुवर्णपदक पटकावले. न्यूझीलंडच्या खेळाडूला रोप्यपदक तर कॅनडाच्या खेळाडूला कांस्यपदक मिळाले. देशासाठी सुवर्णपदक मिळवायचे ही माझ्या वडिलांची इच्छा होती.आज मी वयाच्या ५७ व्या वर्षीशी मी ती पूर्ण केली असे प्रा देशमुख यांनी राष्ट्रकुल पावरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

अहमदनगर प्रतिनिधी-  पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एक मोठी कारवाई केली असून. ज्यात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे. नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई फाटा येथे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून. कमानी जवळ उभा असलेल्या, शुभम सुभाष सरोदे या २२ वर्षीय राहुरी येथील इसमास ताब्यात घेऊन झडती घेतली असता. त्याच्या जवळून, २ गावठी कट्टे, १ सिंगल बोर गावठी रिव्हॉल्वर व ५ जिवंत काडतुसे, असा ८६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीची विचारपूस केली असता. आरोपीने जप्त करण्यात आलेले घातक शस्त्र, बेकायदशिररित्या स्वत: तयार करुन विक्रीच्या उद्देशाने आल्याची माहिती समोर आल्याने. आरोपी विरोधात सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या सुचणा व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब काळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, फकिर शेख, पोलीस नाईक शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले व भरत बुधवंत आदींच्या पथकाने यशस्वी रित्या पारपडली.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -  नगरपालिका शिक्षण मंडळामध्ये सध्या निवृत्तीचा ओघ लागला असून दर महिन्याला एक एक मोहरा निवृत्त होत आहे. एकीकडे चांगलं काम करणारे शिक्षक निवृत्त होत असतांना दुसरीकडे नवीन शिक्षक भरती होत नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.यासाठी निवृत्त होणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींनी आमच्या शाळांमध्ये येऊन बाल गोपालांना ज्ञानदान करून सहकार्य करावे व बालगोपालांचे आशीर्वाद घ्यावेत. कारण सेवानिवृत्तांची संख्या वाढत असल्याने शालेय कामकाज चालवणे अवघड झाले आहे.आपली संपूर्ण सेवा ज्या शालेय विद्यार्थ्यांमुळे या ठिकाणी पूर्ण झाली. त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी आपणही सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांनी केले.येथील महात्मा ज्योतिबा फुले नगरपालिका शाळा क्रमांक सहा मधील उपशिक्षिका सौ अरुणा प्रकाश माने(लोखंडे) या आपल्या छत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहे. त्यानिमित्ताने शाळेतर्फे त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री पटारे हे बोलत होते.व्यासपीठावर नगरसेवक संतोष कांबळे,निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी के टी निंभोरे, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन लहुजी कोल्हे, सलीमखान पठाण, विद्यमान संचालक बाळासाहेब सरोदे, पेन्शनर संघटनेचे तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार,सुभाष तोरणे, अशोक बागुल,ॲड. रमेश कोळेकर,शिक्षण मंडळाचे लिपिक किशोर त्रिभुवन आदी उपस्थित होते.

सौ अरुणा प्रकाश माने यांनी श्रीरामपुरातच शिक्षण घेऊन त्याच ठिकाणी आपली सेवा पूर्ण केली. नगरपालिकेच्या विविध शाळांमधून त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले. त्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका होत्या. त्यांनी आपल्या सेवा काळात कधीही मुलांना शिक्षा केली नाही किंवा हातात छडी घेतली नाही याचा अनेक मान्यवरांनी आवर्जून उल्लेख केला.यावेळी विद्यार्थीनी सविता मोरे, दीप लोखंडे, मृण्मयी लोखंडे, तसेच पोपटराव वाघचौरे, अजय शिंदे, लता आवटी, मंदाकिनी गायकवाड, सचिन शिंदे आदींनी त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास सर्वश्री. लतीफ शेख, शब्बीर शेख, अशोकराव कानडे, संजय तुपे, सचिन डोळस, सचिन दळवी, मुख्याध्यापिका कृष्णा थोरे, कल्पना गायकवाड, प्रतिभा जयकर, आशाबाई शिंदे, नवनाथ अकोलकर, ताराचंद पगारे,अशोक गायकवाड, हर्षल माने, कल्पेश माने, वर्षा वाकचौरे, अमोल कल्हापुरे, संतोष लोखंडे, मंगेश लोखंडे, शुभांगी माने, सुरेखा डांगे, दिपाली शेळके, दिलावर भाई शेख, गणेश कानडे, विठ्ठल तुपे, नंदू तुपे, विनोद चतुर्भुज, मुख्याध्यापक बाबासाहेब पिलगर, दिगंबर तुपे, शंकरराव डहाळे, राजेंद्र तुपे, धनंजय तुपे, प्रकाश क्षीरसागर, योगेश शिरसागर, सविता मोरे, शरद नागरगोजे, भरत गिरी, संभाजी त्रिभुवन, सुरेश दळवी, गणेश वाकचौरे, सुमित माने, श्रीमंत चव्हाण, अजय धाकतोडे, सतीश खामकर, कांबळे टेलर  आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता मदने यांनी केले तर आभार प्रकाश माने यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन मुसळे, यास्मिन शेख, मनीषा सांगळे, सुनीता हंडाळ, मंदाकिनी गायकवाड, लता आवटी, अनिता बडे, सचिन शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

अहमदनगर- एसपी राकेश ओला यांच्या निर्देशाने जिल्हाभर अवैध व्यवसायावर धडक कारवाई सुरुच असून काल महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जातीचे 8,000 (आठ हजार) किलो गोमांस, दोन आयशर टेम्पो व एक हुंडाई क्रेटा कार असा एकुण 34,00,000/- (चौस्तीस लाख रु) किंमतीचा मुद्देमाल जामखेड येथुन जप्त केले. स्थानिक गुन्हे शाखा यांनी ही कारवाई केली. धक्कादायक बाब म्हणजे या गोवंश जणावरांचे मांस तस्करीत युपी (उत्तर प्रदेश) चा एक परप्रांतीय आरोपी असून श्रीरामपुर व नगरचे आरोपी आहेत. या बाबात अधिक माहीती अशी की, कर्तव्यदक्ष एसपी राकेश ओला यांनी पोनि अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. नमुद आदेशान्वये पोनि अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ/संदीप पवार, अमोल भोईटे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोकॉ/विनोद मासाळकर, जालिंदर माने, मयुर गायकवाड व चापोहेकॉ/उमाकांत गावडे अशांना बोलावुन घेवुन कळविले की, आताच गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे तौफिक कुरेशी, अहमदनगर हा त्याचा हस्तक नामे मुक्तार शेख याचे मार्फत अहमदनगर कडुन जामखेडच्या दिशेने दोन आयशर ट्रक मधुन गोवंशीय जातीच्या जनावरांची कत्तल करुन गोमासची विक्री करण्याचे उद्देशाने दोन आयशर टेम्पोमधुन वाहतुक करत आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/ अनिल कटके यांनी लागलीच स्थागुशा पथकास बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले. स्थागुशा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी जामखेड पोलीस स्टेशनचे अंमलदार यांचे मदतीने दोन पंचाना सोबत घेवुन जामखेड येथे जावुन देशी तडका हॉटेल जवळ रोडवर सापळा लावुन थांबलेले असतांना बातमीतील नमुद दोन आयशर टेम्पो येताना दिसले. टेम्पो चालकास बॅटरीने लाईट दाखवुन थांबण्याचा इशारा करताच त्याने सदर दोन्ही टेम्पो चालकांनी टेम्पो रस्त्याचे कडेला उभे केले. लागलीच पथकातील अंमलदार यांनी टेम्पो चालकास व त्याचे शेजारी बसलेल्या इसमास ताब्यात घेवुन पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) मुक्तार अब्दुल करीम शेख वय 50, रा. वार्ड नं.2, श्रीरामपूर, 2) अल्तमश फैयाज चौधरी वय 24, रा. नालबंदखुट, अहमदनगर, 3) महेशकुमार जगदेव लोध वय 27, 4) सिराज अहमद कल्लु अन्सारी वय 28, 5) समी अहमद मुर्शरफ खान वय 28, सर्व रा. शंकरपुरमुका, ता. रिसीया, जिल्हा बहरुच, राज्य उत्तर प्रदेश हल्ली रा. अहमदनगर 6) सादीक सत्तार कुरेशी वय 38, रा. खर्डा रोड, जामखेड असे असल्याचे सांगितले. पंचासमक्ष दोन्ही आयशर टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोमध्ये महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशी जातीची जनावरांचे गोमास व अर्धवट कापलेली गोवंशीय जनावरे दिसली. त्याचेकडे गोवंश कत्तल व वाहतुकी बाबत विचारपुस करता त्याने सदर गाडीमध्ये भरलेले गोमस हे 7) तौफिक कुरेशी, अहमदनगर यांचे मालकीचे असुन गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करुन टेम्पो मधुन गोमास विक्री करीता 8) शेख अजहर आयुब वय 29, रा. खडकत, ता. आष्टी, जिल्हा बीड यांचेकडे जामखेड येथे पोहच करणेसाठी घेवुन चाललो असल्याची कबुली दिली. त्याचा शोध घेतला असता तो हुंडाई कंपनीचे क्रेटा कारसह पळुन जात असतांना त्याचा शिताफीने पाठलाग करुन त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच तौफिक कुरेशी, (फरार) अहमदनगर याचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- विजेचा शाँक लागुन पंधरा वर्ष वयाच्या मुलाचा मृत्यू झाला असुन या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे  या बाबत समजलेली माहीती अशी की विशाल भागीनाथ पिटेकर हा पंधरा वर्ष वयाचा मुलगा जे टी एस हायस्कूल येथे इयत्ता नववीत शिकत होता  त्याला अचानक विजेचा शाँक लागला तो लाबं फेकला गेला घरातील नातेवाईकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी विजेची बटन बंद केली व त्यास तातडीने दवाखान्यात हलविले परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले बेलापुर येथील अमरधाम मध्ये शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले  बेलापुर पोलीस स्टेशन समोरील संदीप ढोल पार्टीचे मालक नवनाथ धनवटे यांचा तो नातू होता आई वडीलांची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे नवनाथ धनवटे यांच्याकडे तो शिक्षण घेत होता

श्रीरामपूर - भारतीय संविधान दिन व आम आदमी पार्टी चा वर्धापन दिन च्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्याचे आम आदमी पार्टीचे अध्यक्ष तिलक डुंगरवाल यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व हनुमान मंदिर परिसर या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

श्रीरामपूर शहरामध्ये धुळीचे साम्राज्य पसरलेले असताना  नगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन आम आदमी पार्टीच्या वतीने श्रीरामपूर शहरातील मुख्य रस्त्यांवरची धुळीची विल्हेवाट लावण्याची विनंती केलेली असून सुद्धा शहरातील वाढत्या रस्त्यावरील माती धुळीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. वारंवार सांगून देखील फक्त काम केल्याचा दिखावा करत नगरपालिका प्रशासनाकडून त्यावर कार्यवाही केली जात नसल्याचे लक्षात आल्याने आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष विकास डेंगळे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर आम आम आदमी पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत श्रीरामपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळ आणि हनुमान मंदिर परिसरात समोरील रस्त्यालगत  रस्त्यालगतची स्वच्छता करून तेथील माती, डिव्हायडर मधला कचरा, उचलून त्या ठिकाणी पाणी मारून स्वच्छता केली. या पुढील काळात आम आदमी पार्टीच्या वतीने श्रीरामपुरात स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असा विश्वास यावेळी जिल्हाध्यक्ष डुंगरवाल यांनी व्यक्त केला.यापुढे नगरपालिका प्रशासनाने शहरातील धूळ व कचरा व्यवस्थापनाच्या कामाकडे बारकाईने लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन छेडून प्रशासनाला जाग आणण्याचे काम हाती घ्यावी लागेल असा इशारा यावेळी विकास डेंगळे व प्रवीण जमदाडे यांनी दिला. त्यानंतर संविधान दिनाच्या निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे पुष्पहार अर्पण करून  पूजन केले यावेळी जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, तालुका अध्यक्ष विकास डेंगळे, जिल्हा सचिव राहुल रणपिसे ,भरत डेंगळे, जिल्हा प्रवक्ते एडवोकेट प्रवीण जमधडे, मार्गदर्शक श्रीधर कराळे, युवा चे अक्षय कुमावत ,यशवंत जेठे, विकी लोंढे, प्रशांत बागुल, दीपक परदेशी, बी एम पवार, विजय बारसे , दिलीप उबाळे ,राहुल लुक्कड, डॉक्टर प्रवीण राठोड, डॉक्टर सचिन थोरात,सलीम शेख, भैरव शेठ मोरे, आदी उपस्थित होते

प्रतिनिधी-Dysp संदीप मिटके यांना नेवासा फाटा परिसरात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने  वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत गुप्त बातमी मिळाली.  त्यावरून नेवासा फाटा परिसरात हॉटेल औदुंबर व  हॉटेल नमगंगा या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन पाच  पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे.  त्यानुसार आरोपी १ )विक्रम बाळासाहेब साठे वय 20 रा. जालना २) अमोल नामदेव पैठणे वय २५ रा.मुकिंदपुर यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन येथे महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारस प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच वेळी दोन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्यात आला या कारवाईमुळे नेवासा फाटा परिसरात व शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. सदरची कारवाई मा. श्री.राकेश ओला  पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , PI प्रताप दराडे, PI करे, Api मानिक चौधरीं, API थोरात, psi मोंढे,Asi राजेंद्र आरोळे, HC औटी,पोलीस कॉन्स्टेबल इनामदार,पाखरे, विकास साळवे ,सुहास गायकवाड ,ठोंबरे, कुदळे, गुंजाळ, करंजकर, इनामदार, Lpc  उंदरे व Lpc  जाधव यांनी केली.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-कपड्याला ईस्री करताना विजेचा शाँक लागुन पंधरा वर्ष वयाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे या बाबत समजलेली माहीती अशी की विशाल भागीनाथ पिटेकर हा पंधरा वर्ष वयाचा मुलगा शाळेत जाण्याकरीता कपड्याला ईस्री करत होता कपड्याला ईस्री करताना त्याला विजेचा शाँक लागला तो लाबं फेकला गेला घरातील नातेवाईकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी विजेची बटन बंद केली व त्यास तातडीने दवाखान्यात हलविले परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले बेलापुर पोलीसा स्टेशन समोरील नवनाथ धनवटे यांचा तो नातू आहे

बेलापूर प्रतिनिधि देवीदास देसाई -क्रांति गुरू लहुजी वस्तात साळवे यांची २८८वी जयंती मोठ्या उत्साह महाराष्ट्र भर  साजरी करण्यात येत आहे . त्याच प्रमाणे श्रीरामपुर शहरा मध्ये दि . ३०नोव्हबर २०२२ रोज़ी ठीक सायंकाळी ६:००वा डॉ बाबासाहेब अंबेडकर स्मारक, रेल्वे स्टेशन जवळ भारतीय लहुजी सेना आयोजीत क्रांति गुरू लहुजी साळवे २८८वा जन्मोत्सव व पुरस्कार वितरण सोहळा व आर्केस्ट्रा (लहु गर्जना)  कार्यक्रम मोठ्या उत्साह साजरी होनार  आहे ,सदर कार्यक्रम मध्ये प्रमुख पाहुने भारतीय लहुजी सेना च्ये  मा श्री  व्ही जी रेड्डी साहबे ( सेना प्रमुख मुंबई ), मा श्री  रामचन्द्र जाधव साहबे ( मा शिक्षक  महा संचालक) , मा के के आव्हाड साहेब  ( सामाजिक कार्यकर्ते ) उपस्थित राहनार आहे.भारतीय लहुजी सेना च्या वतीनेमा श्री , व्ही जी रेड्डी साहेब यांना(समाज रत्न पुरस्कार, मुंबई  )रईस रज्जाक भाई शेख ( युवा उद्योजक, श्रीरामपुर )हाजी लतीफ भाई करीम भाई सय्यद (मौलाना आजाद समाज भुषण पुरस्कार श्रीरामपुर )अभिमान पांडुरंग कांबळे( क्रांति गुरू लहुजी वस्तात साळवे समाज भुषण पुरस्कार,पुणे )राजेद्र बाळासाहेब आल्हाट( वृक्ष मित्र , रहाता ) सोहेल कलिम भाई शेख (युवा भुषण , श्रीरामपुर) बाळासाहेब कचरू कदम (प्रगतिशील शेतकरी ,नेवासा)सुनील भीमराव संकट ( लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाज भुषण पुरस्कार अहमदनगर)भाऊसाहेब नारायणन चौधरी( आर्दश शेतकरी ,रहाता)असलम भाई बिनसाद तिरंगा न्युज व बिनदास न्यूज संपादक( बाळशास्त्री जांभेळकर समाज प्रबोधन श्रीरामपुर) राजेश संपतराव घोरपडे साहबे (तलाठी) श्रीरामपुर भुषण पुरस्कार ,श्रीरामपुर)अजहर हानिफ शेख ABS (डाॅ अब्दुल कलाम समाज भुषण पुरस्कार,श्रीरामपुर  )सुभाष दादा त्रिभोवन (डाॅ बाबासाहेब अंबेडकर समाज भुषण पुरस्कार, श्रीरामपुर )मंजूषा ताई ढोकचौळे ( आर्दश महिला समाज़ भुषण  पुरस्कार  श्रीरामपुर )अर्जुन भाऊ दाभाडे (हिंदु रक्षक, श्रीरामपुर)ह.भ. प ज्ञानेश्वर महाराज अढाव ( नाथ गौरव श्रीरामपुर )ह.भ.प प्रतीक्षा ताई जाधव( समाज जागृति, कोपरगाव)अदी सामाजिक कार्य करणारे यांना भारतीय लहुजी सेना च्ये व कार्यक्रमाचे आयोजक  बाळासाहेब बागुल राष्ट्रीय प्रमुख ,हानिफ भाई पठान राष्ट्रीय सचिव, ऑड रमेश कोळेकर राष्ट्रीय कादेशीर  सल्लागार  ,  रज्जाक भाई शेख अहमदनगर जिल्हा प्रमुख, रईस भाई शेख जिल्हा प्रसिद्धि प्रमुख, सुरेश दादा अढागळे महा प्रमुख, यांचे वतीने पुरस्कार जाहिर करण्यात आले आहे . सदर कार्यक्रमा मध्ये हजारो च्या संख्या ने महाराष्ट्र मध्युण लोक जयंती साजरी करण्यात  येणार आहे .






 

बेलापुर  (प्रतिनिधी  )-अहमदनगर येथील वाडीया पार्क मैदानावर पार पडलेल्या १५ वर्ष वयोगटातील मुलीच्या क्रिकेट चाचणीमध्ये बेलापुरची कन्या मिसबा जावेद शेख हीची जिल्हा क्रिकेट संघात निवड झाली आहे                                      पुणे येथे खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत अहमदनगर  जिल्हा क्रिकेट संघात मिसबा हीची निवड झाली आहे   श्रीरामपुर येथील साई अँकेदमीकडून खेळताना उत्कृष्ठ क्षेत्ररक्षण उत्तम फलंदाज म्हणून तीची निवड करण्यात आलेली आहे   मिसबा ही   विद्यानिकेतन इंग्लिश मेडीयम स्कूल ऐनतपुर येथे झाले आहे बेलापुरच्या माजी उपसरपंच शिरीन शेख व माजी क्रिकेट खेळाडू जावेद शेख यांच्या त्या कन्या आहेत तिला साई क्रिकेट अँकेडमीचे महेश बोरावके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तिच्या निवडी बद्दल मा जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे पत्रकार देविदास देसाई कैलास चायल कै खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड भरत साळूंके जेषौठ नेते सुनिल मुथा विष्णूपंत डावरे दिलीप दायमा किशोर कदम आदिंनी अभिनंदन केले आहे

पुणे (गौरव डेंगळे) : पुणे विभागातून निवड झाल्याबद्दल अभिनंदन करीत कुठल्याही स्पर्धेत सहभागी होताना आपला संघ विजयी होईल व आपल्या संघातील प्रत्येक खेळाडूला त्याचा खेळ कसा उंचावता येईल हेच लक्षात ठेवून आपण स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं असे प्रतिपादन मिलेनियम नॅशनल स्कूलचे संचालक अन्वित फाटक यांनी आज राज्य व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी सहभागी होणारा पुणे विभागीय मुलींच्या संघाला जर्सी  वाटप व शुभेच्छा समारंभ दरम्यान केले. दिनांक १७ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान मिलेनियम नॅशनल स्कूल येथे १५ सदस्य मुलींचा पुणे विभागीय व्हॉलीबॉल संघाचे सराव शिबिर आयोजित करण्यात आले होते. अहमदनगर जिल्ह्यातील दाढ येथे संपन्न झालेल्या विभागीय निवड चाचणी स्पर्धेतून या संभाव्य १५ खेळाडूंची निवड करण्यात आली होती. स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी संघातील खेळाडूंना मिलेनियम नॅशनल स्कूलचे संचालक अन्वित फाटक व नेहा फाटक आदींच्या हस्ते खेळाची जर्सी प्रदान करण्यात आली.

यावेळी पुढे बोलताना फाटक म्हणले की युवा मुलींनी या सर्व शिबिरासाठी आलेल्या मुलींचा खेळ बघून आपण देखील या खेळामध्ये प्राविण्य मिळवावे जेणेकरून आपल्या राज्याचा संघ बलाढ्य होईल व तो राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निश्चित पदक मिळवेल. मला आशा आहे की चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जाणारा पुणे विभागीय मुलींचा संघ निश्चित सुवर्णपदकास गवसणी घालेल यात शंकाच नाही असे ते पुढे म्हणाले.

या प्रसंगी मिलेनियम नॅशनल स्कुलचे क्रीडा अधिकारी रामदास लेकावळे यांनीही संघास शुभेच्छा दिल्या, राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक कुलदीप

कोंडे, सचिन चव्हाण, पंकज शिंदे आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन महेश गायकवाड यांनी केले व आभार प्रदर्शन राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक कुलदीप कोंडे यांनी केले.

श्रीरामपूर(प्रतिनिधी)लहानपणी मी भरपुर क्रिकेट खेळायचो व त्यातून एक गोष्ट शिकलो की कधी कधी आपल्याला माहिती असत की आपण हरणार आहोत तरी सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत खेळावं लागत आणि कधी कधी त्या प्रयत्नांमध्ये सुद्धा एखादा नो बॉल पडून दिखील यश मिळू शकत . आयुष्यातही असच असत मित्रांनो आपण हरलोय किंवा हरत आहोत असं माहिती असताना सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत खेळणे गरजेचं असत काय माहिती कधी बाजी पलटुन जाईल आणि आपले अपयश यशामध्ये बदलून जाईल असे प्रतिपादन ग्रॅज्युएट व लस्सीचे संचालक स्वप्निल लांडे यांनी श्रीरामपूर सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी केले.यावेळी सार्थक बहुउद्देश्य संस्थेचे अध्यक्ष उमेश तांबडे, साई इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या अस्मिता गायकवाड,हेमंत सोलंकी, दिगंबर पिनाटे,एस सोनवणे,शुभम पवार,तुषार पवार, अस्मिता परदेशी,अतुल जाधव,अमोल शिरोळे,दौलत पवार, वैष्णवी इंगळे स्पर्धा आयोजक गौरव डेंगळे, नितीन गायधने, नितीन बलराज तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.आज झालेल्या अंतिम सामन्यात साई इलेव्हन संघाने बेलापूर फायटर संघाचा ४ गडी राखून पराभव करून ५ व्या श्रीरामपूर सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.श्रीरामपूर फायटर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी  करण्याचा निर्णय घेतला.बेलापूर फायटर संघाने निर्धारित ६ षटकार ३६ धावा केल्या. विजयासाठी ३७ धावांचा आव्हान साई इलेव्हन संघाने पाचव्या षटकात चार गडी राखून पूर्ण केले व स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाला ₹ ५०००/- व चषक डिझायर गॅलरीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.उपांत फेरीच्या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करणारा चैतन्य शिंदे,कुणाल थोरात तसेच स्पर्धेमध्ये उत्कृष्ट यष्टीरक्षण करणारा जस्मित गुलाटी,उत्कृष्ट क्षेत्रक्षण करणारा ध्रुव मुथा, उत्कृष्ट गोलंदाजी करणारा पवन बच्छाव,उत्कृष्ट फलंदाजी करणारा युवराज पवार यांना मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

बेलापुर  ( प्रतिनिधी  )- वैद्यकिय क्षेत्रांत काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपण देव मानतो परंतु पैशाला कमिशनला जास्त महत्व प्राप्त झाल्यामुळे हेच देव दुसऱ्याकडे केलेल्या सोनोग्राफीचा अहवाल पाहुन उपचारास नकार देतात त्यांना आपण काय म्हणणार ?                          अशीच एक घटना तालुक्याच्या ठिकाणी घडली रुग्ण हा बेलापुर गावातील होता दहा दिवसाच्या बाळाला डॉक्टर सोनोग्राफी सुचवतात, आपण घाई घाईने सोनोग्राफी करून तो रिपोर्ट घेऊन डॉक्टरांकडे जातो., परंतु डॉक्टरांनी  सुचविलेल्या सोनोग्राफी सेंटर मधून सोनोग्राफी न केल्यामुळे डॉक्टर सदर बाळावर उपचार करण्यास नकार देतात त्यावेळी आपली काय अवस्था होईल.?

 श्रीरामपूर येथील एका वैद्यकिय अधिकाऱ्याने केवळ बाळाची सोनोग्राफी आपण सुचविलेल्या सोनोग्राफी सेंटर मधून केली नाही म्हणून सदर बाळा वर उपचार करण्यास नकार दिला.

वैद्यकीय क्षेत्रात चालू असलेली कट कमीशन प्रॅक्टिस या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे सदर अन्यायग्रस्ताने बेलापुर  येथील सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा यांच्या कानावर ही घटना घातली.

सुनील मुथा यांनी विश्व हिंदू परिषदेचे डॉक्टर दिलीप शिरसाठ तसेच ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर संकेत मुंदडा यांना सदर घटनेची माहिती देऊन रुग्णास न्याय न मिळाल्यास या बाबतीत आपण रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू असा इशाराही दिला. त्यानंतर वेगाने चक्रे फिरली आणि सदर रुग्णास पुन्हा उपचारासाठी बोलावून त्याच्यावर उपचार करण्यात आले.

श्रीरामपूर शहरातील वैद्यकीय क्षेत्रात काही डॉक्टर आणि सोनोग्राफी सेंटरचे चालक यांचे रॅकेट असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. गरीब लोक पैशाची जमवाजमव करून महागड्या उपचाराकरीता खर्च करतात सोनोग्राफी करतात. परंतु ती सोनोग्राफी ग्राह्य धरली नाही तर परत सोनोग्राफी करण्यासाठी पैसे आणायचे कुठून... याचाही डॉक्टरांनी विचार करायला हवा. जनसामान्यांच्या मनातल्या आपल्या या प्रतिमेला तडा जाऊ नये याची पुरेपूर काळजी डॉक्टरांनीही घ्यायला हवी. रुग्ण सेवा हीच  ईश्वर सेवा  या ब्रीदवाक्य प्रमाणे सामाजिक बांधिलकी जपून आपला व्यवसाय केल्यास भविष्यातअसे संघर्षाचे प्रसंग निर्माण होणारच नाहीत अशी आशा मुथा यांनी व्यक्त केली. तरीही भविष्यात अशा प्रकारचा अन्याय रुग्णांवर झाल्यास संबंधित डॉक्टरांविरुद्ध कर्तव्यात कसूर केला म्हणून भादवी 166 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही सुनील मुथा यांनी दिला आहे..

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुरला दुषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारीवरुन बेलापुर ग्रामपंचायतीने बैठक बोलविली अन आजी माजी सदस्य  पदाधिकारी, ग्रामस्थ ,कामगार यांच्याकडून समस्येचे निकारण करण्याबाबत चर्चा झाली.अन त्यातून जे धक्कादायक सत्य बाहेर आले ते समजल्यावर "बरे झाले बैठक बोलविली " असेच म्हणावे लागले .    गेल्या दोन तीन महीन्यापासुन बेलापुर व परिसराला दुषित पाणी पुरवठा होत होता या बाबत सदस्य भरत साळूंके, रविंद्र खटोड सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले, चंद्रकांत नाईक यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या दुषित पाण्याचे नमुनेही व्हाटस्अप गृपवर फिरले. गांवकरी मंडळाचे मार्गदर्शक शरद नवले यांनी सरपंच महेंद्र  साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना तातडीने कारण शोधण्याच्या सूचना दिल्या.यावर उपाय योजना संदर्भात चर्चा करण्यासाठी सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी ग्रामस्थांची बैठक बोलविली. या बैठकीच्या चर्चेतून असे समोर आले की अनेक वर्षापासुन टाकी स्वच्छ केलेली नाही त्यामुळे तातडीने टाकी स्वच्छ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामपंचायतीने तातडीने टाकी स्वच्छ करण्याच्या कामास सुरुवात केली असता भयानक सत्य समोर आले. त्या टाकीत चार ते पाच फुटापर्यत गाळ साचलेला होता अन हेच गाळ मिश्रीत पाणी बेलापुर व परिसरातील नागरीक गेल्या अनेक वर्षांपासून पित होते.त्या टाकीतील बऱ्याच वर्षापासून साचलेला गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात आले असता मागील काळात टाकी केव्हा साफ करण्यात आली होती याची माहीती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता टाकी स्वच्छ केल्याची तारीख महीना वर्षच सापडले नाही या वरुन अनेक वर्षापासून नागरीक गाळ मिश्रीत पाणीच पित होते हे उघड झाले. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजाराचे प्रमाण सर्वात जास्त आहे.हे माहीत आसताना देखील त्याकडे दुर्लक्ष झाले आरोग्य विभागही या बाबत अनभिज्ञ होता पाण्याच्या  टाकीत साचलेला प्रचंड गाळ हा वरुन पडलेल्या पाण्यामुळे ढवळून निघत होता व तेच ढवळलेले गाळ मिश्रीत पाणी नागरीकाना पिण्यास येत होते हे या निमित्ताने समोर आले आहे.याबाबत  सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले की बैठकीत झालेल्या चर्चे नुसार बेलापूर बु ग्रामपंचायतीच्या वतीने ५ लाख लिटर पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील गाळ काढणे व टाकी स्वच्छ करण्याच्या कामास सुरुवात केली आहे.त्या नंतर २ लाख लिटर ची टाकी देखील गाळ काढून स्वच्छ करण्यात येणार आहे.मेन टाकीवरील पाण्याचे सर्व हौद देखील गाळ काढून स्वच्छ करण्यात येणार आहेत.या आधी अमरधाम, खटकळी-गावठाण,२० घरकुल, अयोध्या कॉलनी येथील पाण्याच्या टाक्या गाळ काढून स्वच्छ करण्यात आल्या आहेत. तसेच सातभाई वस्ती, गायकवाड वस्ती, कुऱ्हे वस्ती, रामगड, सुभाषवाडी येथील टाक्या देखील लवकरच साफ करण्यात येणार आहेत.परिसरात असणाऱ्या सर्वच बारा पाणी साठवण टाक्याची स्वच्छता वेळो वेळी करण्यात यावी व टाकी केव्हा स्वच्छ केली ते टाकीवर तसेच बेलापुर ग्रामपंचायतीच्या नोंदवहीत नोंद केली जावी अशीही नागरीकांची मागणी आहे.

श्रीरामपूर : शहरातील व्यापारी कांतीलाल बोकडीया हे, मेनरोडवरील असलेल्या युनियन बँकेत पैसे काढून बाहेर जात असतांना. मोबाईल बाहेर काढतांना, बोकडीया यांच्या खिश्यातील ९० हजार रुपयांपैकी, ४० हजार रुपये खाली पडले. त्यावेळी तेथून जात असलेले गोंधवणी येथील दिलीप सांडू चव्हाण व संदीप भगवान बावसकर यांना रस्त्यावर ४० हजार रुपये सापडले असता. दोन्ही इसमांनी पैसे कोणाचे आहे याचा शोध घेत असतांना. बोकडीया यांनी पोलीस ठाणे गाठून ४० हजार रुपये गहाळ झाल्या बाबत माहिती देताच. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे व गुन्हे तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड,राहुल नरवडे, मच्छिंद्र कातखडे,गणेश गावडे यांना बोलावून,गहाळ झालेल्या पैश्याचा शोध लावण्यासाठी रवाना केले असता. तपास पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी बँकेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून. चतुराईने गहाळ झालेले पैसे सापडलेल्या इसमांचा शोध लावून. विचारपूस केली असता दोन्ही इसमांनी देखील ४० हजार रुपये सापडल्याची प्रामाणिक कबुली देत, आपण देखील पैसे कोणाचे आहेत हे शोध असल्याचे सांगून. सापडलेले पैसे पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक गवळी यांच्या समक्ष, कांतीलाल बोकडीया यांना गहाळ झालेले ४० हजार रुपये परत करून. प्रामाणिक पणा दाखविना-या दोघांचा सत्कार केला. तसेच पैसे शोधण्यास तत्परता दाखविणाऱ्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे,पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड,राहुल नरवडे, मच्छिंद्र कातखडे, गणेश गावडे यांचे कौतुक केले.

श्रीरामपूर प्रतिनिधी-अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार,जिल्ह्यात दर दिवस मोठं मोठ्या कारवाई होत आहेत. या कारवाईच्या चालता अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली,श्रीरामपूर पोलीस देखील मोठं मोठ्या कारवाई करत आहेत. या कारवाईच्या चालता २० नोव्हेंबरच्या रात्री, मानवी स्वास्थास हानिकारक असलेल्या, तसेच मस्त्यपालन, वाहतुक व विक्रीस प्रतिबंधित असलेला. मांगुर मासे घेऊन जात असल्याचीगोपनीय माहिती, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना मिळाली असता. श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावरील कमानी जवळ, एम एच ४६ बी यु ७८६६ क्रमांकाची टाटा कंपनीचा अल्ट्रा टेम्पो अडवून झडती घेतली असता. टेम्पो मधून ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे ३ टन मांगुर मासे आढळून आल्याने, तात्काळ पोलिसांनी टेम्पो सह आरोपी,असादुल मंडल मुफुजर रेहमान मंडल, अर्षद बाबुराली गाझी,दोघे राहणार वेस्ट बंगाल, सुनिल बारकु यादव, मनोज रामधन यादव दोघे हल्ली राहणार ठाणे, विवेकानंद आत्मज उमाशंकर, राहणार चंदौली उत्तर प्रदेश, प्रदिपकुमार कंन्कराज मोरी राहणार सुरेगाव तालुका नेवासा, वाहन चालक मुक्कमल विश्वास व जागा मालक मोहनेश्वर गणगे अशा ८ आरोपींना,१२ लाख ५० हजारांच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन, आरोपीं विरोधात, केंद्र व राज्य शासनाने, प्रतिबंधीत केलेल्या. मांगुर मत्स्य पालन, विक्री व वाहतुकीस प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी, भा.द.वि. कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिलीय. सदर कारवाई नंतर अहमदनगर मत्स्य विभागाच्या,सहाय्यक मत्स्य विभाग अधिकारी, पी एस पाटेकर व श्रीरामपूर शहर पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत,पालिकेच्या कचरा डेपो येथे मांगुर मासे नष्ट करण्यात आले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीसउपनिरीक्षक समाधान सुरवडे, पोलीस नाईक रघुवीर कारखीले,राहुल नरवडे, गौतम लगड,गणेश गावडे, रमीजराजा अत्तार, मच्छिंद्र कातखडे, सोमनाथ गाढेकर,भारत तमनर, गौरव दुर्गुळे, पोलीस कॉन्स्टेबल शरद वांडेकर आदींनी यशस्वी रित्या पार पाडली.


बेलापुर (प्रतिनीधी )-गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जल वाहीनीतुन गेल्या दोन महीन्यापासुन दुषित पाणी पुरवठा केला जात असुन दुषित पाणी येण्यामागील नेमके कारण काय आहे?  असा सवाल माजी सरपंच भरत साळूंके व माजी रविंद्र खटोड यांनी केला आहे.  गेल्या काही दिवसापासुन बेलापुर व परिसराला दुषित पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरीकांच्या तक्रारी होत्या तसेच याबाबत रविंद्र खटोड, भरत साळुंके, सुधीर नवले, चंद्रकांत नाईक यांनी ग्रामपंचायत कडे तोंडी तक्रार केली होती.या  सर्व तक्रारीची दखल घेत बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने पाणी पुरवठ्या बाबत तक्रारी संदर्भात ग्रामस्थांची बैठक बोलविण्यात आली होती.त्या वेळी पाण्यात टी सी एल तुरटी टाकण्यात अडचण येते काय ? नळाला क्षारयूक्त पाणी का येते? असा सवाल चंद्रकांत नाईक यांनी केला तर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले यांनी मुख्य पाणी पुरवठा करणाऱ्या जल वाहीनीला लिकेज असल्यामुळे दुषित पाणी येत असुन दोन वर्षापूर्वी खरेदी केलेल्या चांगल्या प्रतीच्या तुरटीचा वापर का केला गेला नाही तसेच फिल्टर दुरुस्ती केव्हा होणार काम पुर्ण झाले नाही तर ठेकेदाराला बिल अदा कसे केले असा सवाल  नवले यांनी केला. बेलापुर गाव व परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकुण बारा टाक्या असुन या टाकीची बऱ्याच दिवसापासुन स्वच्छता केली नसल्याची बाब या निमित्ताने समोर आली असुन टाक्या सफाईचे काम सुरु करण्यात आलेले असून तातडीनसर्व पाणी टाकी साफ केली जाईल असे अश्वासन उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिले.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वेळोवेळी पाणी तपासणी केली पाहीजे परंतु तसे होत नाही पाण्यामुळे आजार वाढत असल्याच्याही तक्रारीचा सूर या वेळी आळविण्यात आला या वेळी बोलताना सरपंच महेंद्र साळवी म्हणाले की गावाला चांगले पाणी पुरवठा कसा होईल याची दक्षता घेतली जाईल स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायत कटीबद्ध आहे.पाटा मधून तळ्यात आलेले पाणी देखील दूषित आहे त्याबाबत इरिगेशन खात्या कडे लेखी तक्रार केली आहे. पाणीपुरवठा बाबत काही सुचना आसेल तर त्याचीही दखल घेतली जाईल असेही ते म्हणाले.उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की, गावात दूषित पाणी पुरवठा व्हावा अशी कुठल्याच पदाधिकारी अथवा सदस्याची इच्छा नसते.स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक सर्व उपाय योजना त्वरित करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.पाणी पिण्यास योग्य की अयोग्य हे तपासणी करुन अहवाल देण्याची जबाबदारी  आरोग्य विभाग व जलरक्षक यांची असताना पाणी पिण्यास योग्य कि अयोग्य असा कोणताच अहवाल ग्रामपंचायत कार्यालयाकडे आला नसल्याचे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले त्या वेळी ओ टी घेण्याची जबाबदारी कुणाची असा सवाल साळूंके यांनी विचारताच ओ टी काय असते असा प्रतिप्रश्न सरपंच साळवी यांनी केला  या वेळी पिण्याच्या पाण्याचे रोटेशन मिळावे अशी मागणीही करण्यात आली.ग्रामपंचायतीने स्वतः हुन पाणीपुरवठा बाबत बैठक बोलावली या बद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

या वेळी सदस्य मुस्ताक शेख शफीक बागवान पुरुषोत्तम भराटे मोहसीन सय्यद राम पोळ प्रसाद खरात गोपी दाणी  ईस्माईल शेख समीर शेख गफुर शेख अजीज शेख सचिन अमोलीक प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाँक्टर महेंद्र मीश्राम प्रशांत गायकवाड तान्हाजी गडाख संतोष शेलार पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा किशोर कदम अजीज शेख रमेश अमोलीक रेमेश कुमावत बाबुलाल पठाण गोविंद खरमाळे सतीश मोरे तसवर बागवान आदि उपस्थित होते.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-गायरान जमीनीवरील अतिक्रमण न काढता ते कायम स्वरुपी करण्यात यावे अशी मागणी मांडवे तालुका श्रीरामपुर येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तहसीलदार श्रीरामपुर यांच्याकडे केली आहे                               न्यायालयाच्या निर्देशानुसार गायरान जमीनीवरील अतिक्रमण तातडीने काढण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असुन श्रीरामपुर तालुक्यातील मांडवे येथील एकुण ९१ कुटुंबाला या बाबत नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत मांडवे येथील गट नंबर१८० मधील गायरान जमिनीवर अतिक्रमण करुन गेल्या अनेक वर्षापासून ९० ते १०० कुटुंब वास्तव्यास आहेत  त्यांनी वेळोवेळी नियमानुसार घरपट्टी पाणी पट्टी विज बिल भरलेले आहे त्यामुळे त्यांचे अतिक्रमण कायमस्वरुपी करण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्याकरी सरपंच निखील वडीतके उपसरपंच गोवींद ताबे मंडळाचे नेते आण्णासाहेब गेठे सदस्य  शहाजी वडीतके गोकुळ पवार साहेबराव चितळकर संतोष चितळकर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांनी निवेदन स्विकारले या वेळी बोलताना आण्णासाहेब गेठे म्हणाले की मांडवे येथील गायरान जमीनीवर गेल्या अनेक वर्षापासून शंभर कुटुंब राहत असुन त्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आहेत त्यांची अतिक्रमण कायमस्वरुपी करुन देण्यात यावी या करीता शासन दरबारी अनेक वेळा निवेदने दिली ग्रामसभेचे ठरावही दिले तसेच महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा .यांच्याशी देखील चर्चा करण्यात आलेली आहे तरी देखील येथील नागरीकांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत आता लवकरच विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे सर्व नागरीकांची रास्त मागणी आहे तरी शासनाने कुणालाही बेघर करु नये असे गेठे म्हणाले आम्हाला कुणालाही बेघर न करता  आमच्या मागणीचा सहानुभूती पूर्वक विचार करावा असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनाच्या प्रति महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील मा .जिल्हाधिकारी  मा उपविभागीय अधिकारी आदिंना पाठविण्यात आलेल्या आहेत या निवेदनावर मायकल साळवी साहेबराव चितळकर गोकुळ पवार विठ्ठल अनारसे सुनिल तुपे नामदेव रजपुत बाबासाहेब अनारसे नामदेव अनारसे एकनाथ पोकळे कचरु गांगुर्डे मंदा भुजबळ बाळासाहेब पोकळे बाळू पवार भिवसेन मोरे छबु बर्डे मल्हारी माळी संतोष माळी सुरेश मोरे मंगल मोरे सुभाष गांगुर्डे सोमनाथ पवार किरण गायकवाड उषा पवार विष्णू सोनवणे बेबी संसारे माया माळी दत्तू माळी आदिसह अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत

दाढ (लोणी) : येथील महात्मा फुले विद्यालय येथे पुणे विभागीय व्हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धा श्री मनोज म्हस्के (उपाध्यक्ष नाशिक जिल्हा परिषद पशुसंवर्धन कर्मचारी सहकारी पतसंस्था) यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या संपन्न झाली.यावेळी श्री नरेंद्र मोरे,श्री खालकर,महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे मा अध्यक्ष श्री पार्थ दोशी, पुणे विभागीय व्हॉलीबॉल सचिव श्री दादासाहेब तुपे, राष्ट्रिय व्हॉलीबॉल मार्गदर्शक श्री राजेंद्र कोहकडे,व्हॉलीबॉल प्रशिक्षक श्री कुलदीप कोंडे,बारामतीचे व्हॉलीबॉल प्रशिक्षक श्री शिवाजी जाधव, आत्मा मलिकचे स्पोर्ट्स डेप्युटी डायरेक्टर श्री शलेंद्र त्रिपाठी,श्री सुनिल चोळके,गौरव डेंगळे,श्रीरामपूरचे क्रीडा रत्न श्री नितीन बलराज, राष्ट्रिय व्हॉलीबॉल प्रशिक्षक श्री पापा शेख तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या ईरा ढेकणे व ग्रिष्मा करणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.आज पुणे विभागीय निवड चाचणीसाठी अहमदनगर जिल्हा,पुणे जिल्हा व सोलापूर जिल्ह्यातून सुमारे ६५ मुल-मुली उपस्थित होते. यामधून १५ मुलं व १५ मुली यांची निवड करण्यात आली आहे.निवड झालेल्या मुलांचे शिबिर दाढ येथे पार पडणार आहे तर मुलींचं सराव शिबिर पुणे येथे आयोजित होणार आहे. या सराव शिबिरातून १२ मुले व १२ मुलींची निवड करण्यात येईल व निवड झालेले खेळाडू महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेच्यावतीने सब ज्युनियर (१६ वर्षाखालील) मुले व मुली राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा पुणे विभागाचा नेतृत्व करेल.सदर स्पर्धा दि. २३ ते २५ नोव्हेंबर २०२२ रोजी भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे संपन्न होणार आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी-देविदास देसाई)-   बेलापुरचा आठवडे बाजार वेळ सायंकाळची एक जण पुलावरुन प्रवरा पात्रात उडी घेतो त्याला वाचविण्यासाठी अनेक तरुण जिवाची पर्वा न करता नदीत उड्या मारतात त्याला सहीसलामत बाहेर काढतात अन तो निघतो बेवडा             बेलापुरला रविवारचा आठवडे बाजार असतो येथुन जवळच असलेल्या केसापुर येथील तिन जण सायंकाळच्या वेळेस पुलावरुन चालले असता पुलाच्या कोपऱ्यावरच गाडीचे पेट्रोल संपते अन मग काय करायचे अशा विचारातच आणखी थोडी टाकुन येवु असे करुन तिघेही निघाले अन मौज मस्ती करता करता एकाने अचानक पुलावरुन नदी पात्रात उडी घेतली काही क्षणात अनेक जण मदतीला धावले काही तरुणांनी मागचा पुढचा विचार न करता त्याला वाचविण्यासाठी नदी पात्रात उड्या घेतल्या पुलावर मोठी गर्दी जमली पोलीसही आले त्याला सुखरुप बाहेर काढले त्याची चौकशी केली असता तो केसापुरातील निघाला त्याचे साथीदारही आले खरी गंमत समजल्यावर बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे हरीष पानसंबळ भरत तमनर संपत बडे यांनी त्यास  पोलीस स्टेशनला नेले पोलीसी भाषेत समजावुन सांगीतले अन त्या सर्वांना त्याच्या घरच्यांच्या ताब्यात दिले गंमत करायला गेले अन अंगाशी आले अशी अवस्था त्यांची झाली

बेलापुर  (प्रतिनिधी  )- प्रदेश तेली महासंघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी भागवत लुटे तर उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी बेलापुर येथील रविंद्र कर्पे तसेच अहमदनगर  जिल्हा निरीक्षक पदी चंद्रकांत शेजुळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे                                                 प्रदेश तेली महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली तेली महासंघाची  बैठक संपन्न झाली या वेळी मार्गदर्शन करताना मांजी मंत्री तथा राज्याध्यक्ष  जयदत्त क्षिरसागर म्हणाले की प्रदेश तेली महासंघाच्या  माध्यमातून  समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे संघटनेच्या माध्यमातून तेली समाजाला संघटीत करुन त्यांच्या अडचणी सोडविल्या जातील समाजानेही संघटनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहीले पाहीजे तरुण पिढीने परंपरागत व्यवसाया व्यतिरिक्त  शैक्षणिक क्षेत्रातही प्रगती करुन समाजाचे नाव मोठे करावे असे अवाहनही क्षिरसागर यांनी केले या वेळी सागर बाळासाहेब भगत यांची नाशिक युवा आघाडी उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली .या वेळी प्रदेश तेली महासंघाचे प्रदेश सेक्रेटरी विजयराव काळे नाशिक विभागीय कार्याध्यक्ष अरविंद दारुणकर अहमदनगर जिल्हाध्यक्ष एकनाथ नरहरी नागले जिल्हा युवा अध्यक्ष सोमनाथ देवकर अहमदनगर शहर युवा अध्यक्ष नितीनराव फल्ले जेष्ठ मार्गदर्शक दिलीप साळूंके बाळकृष्ण दारुणकर संतोष मेहेत्रे आदि मान्यवरासह तेली बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी अहमदनगर जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले यांनी शेवटी आभार मानले

बेलापुर  (प्रतिनिधी  )-अपघात टाळण्यासाठी ऊस वहातुक करणाऱ्या वाहनांना तातडीने रेडीयम व रिफ्लेक्टर बसविण्यात यावेत अशी मागणी जेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे .                                प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात देविदास देसाई यांनी पुढे म्हटले आहे की ऊस वहातुक करणारी वाहने भरधाव वेगाने चाललेली असतात एका ट्रक्टरला दोन दोन ट्राँली जोडलेली असतात रात्रीच्या वेळेस अंधार असल्यामुळे ऊस वहातुक करणारे वाहन दिसत नाही त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते तसेच ऊस वहातुक करणाऱ्या वाहनावर मोठ्या आवाजात गाणे लावलेले असते पाठीमागे असणाऱ्या वाहनाने हाँर्न वाजविला तरी मोठ्या आवाजात असलेल्या गाण्यामुळे चालकाच्या ते लक्षात येत नाही तो चालक केवळ गाण्याच्या तालातच वाहन चालवत असतो त्यामुळे ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनावर मोठा स्पिकर लावण्यास परवानगी देवु नये ऊस वहातुक करणाऱ्या वाहनावर मोठाले स्पिकर असणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात यावी तसेच परिवहन कार्यालयाने तसे लेखी पत्र संबधीत साखर कारखान्यांना द्यावे  असेही देसाई यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे

श्रीरामपूर (प्रतिनिधी) :श्रीरामपूर शहर व तालुकाभर सुरु असलेले सर्वच अवैध व्यावसाय त्वरित बंद करण्यात यावेत अशा मागणीचे निवेदन देत सदरील व्यावसाय बंद न झाल्यास येत्या ५ डिसेंबर रोजी उपोषण करणार असल्याबाबत पोलिसांत निवेदन दिल्याचा राग मनात धरुन येथील समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी तसेच समाजवादी पक्ष नेत्यांविषयी व्हॅटसअप ग्रुपवर बदनामीकारक मजकूर प्रसारीत करुन बदनामी केल्याप्रकरणी तथा तक्रारदार श्री.जमादार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सदरील अवैध  व्यावसायिकास त्वरीत अटक करण्यात यावी अशा अशयाची तक्रार त्यांनी श्रीरामपूर पोलिसांत दाखल केली असून या तक्रारपत्रांच्या प्रती संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील पाठविण्यात आल्या आहे.

श्री.जमादार यांनी या तक्रार अर्जात असे म्हटले आहे की, व्हॅटसअप ग्रुपवर एका अवैध गुटखा व्यावसायिकाने आमच्या समाजवादी या राजकीय पक्षाच्या आणि पक्ष नेत्यांच्या बाबतीत नकली समाजवादी नेता अशी पोस्ट टाकून आमच्यासह सर्वच समाजवादी पक्ष नेत्यांची बदनामी केली आहे,

या लोकांचा श्रीरामपुर शहर व तालूक्यात अवैध गुटखा तसेच मावा तसेच त्याचबरोबर अंमली पदार्थाचा मोठा अवैध व्यवसाय असल्याने या व्यवसायला संरक्षण मिळावे म्हणून वेगवेगळ्या जाती आणि धर्माचे गुंड लोक त्याचबरोबर स्त्रीयांचाही मोठा सहभाग या लोकांनी घेतलेला आहे.सादर गुंड लोकांना व स्त्रियांना हाताशी धरून जातिवाचक शिवीगाळ ,विनयभंग वगैरे स्वरुपाच्या बनावट केसेस आमचे व आमच्या कुटुंबाचे तसेच आमच्या संघटने च्या पदाधिकार्या विरुद्ध हे लोक करनारे आहेत. तसेच आम्ही रहात असलेल्या ठिकानी काही अनोळखी तरुण हे घराची टेहाळनी करीत असल्याचे आम्हांला समजते आहे, तसेच हे लोकं नेहमीच म्हणत असतात की आम्ही मेमन जमातीचे लोकं असुन संपूर्ण देश मेमन लोकांना घाबरतो कारण आमचे शेजारील देशासी देखील जवळचे संबंध आहे,तथा शेजारील देशात आमचे बहुसंख्य नातेवाईकही आहेत असे म्हणत नेहमी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात,तसेच रस्त्याने जाता- येता वाहने अंगावर घालण्याचा देखील प्रकार करत जीवे मारण्याची धमकी देतात यामुळे माझ्यासह माझ्या कुटुंबायांच्या जीवीतास यामुळे धोकाही निर्माण झाला आहे, करीता सदरील व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करुन त्यास त्वरित अटक करण्यात यावी अन्यथा या आक्षेपार्ह पोस्टमुळे आमचेही कार्यकर्त्यांच्या मनात चिड निर्माण होऊन  यापासून मोठा वाद निर्माण होत परिस्थिती हाताबाहेरही जावू शकते,करीता आपण या प्रकरणी तात्काळ दखल घेऊन या महाभागावर वेळेतच उचित व योग्य कारवाई करावी असेही शेवटी या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी- श्रीरामपूर शहरात सुरू असलेल्या, दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची, गांभीर्याने दखल घेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी श्रीरामपूर शहर पोलिसांना कारवाईचे आदेश देताच.अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,डीवायएसपी संदीप मिटके व पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली, श्रीरामपूर शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून,सी.सी.टी.व्ही. फुटेज,गुप्त बातमीदार व तांत्रिक बाबींच्या आधारे, वार्ड नंबर २ बीफ मार्केट येथील, इब्राहिम गणी शहा नावाच्या आरोपीस ताब्यात घेऊन. त्याच्या ताब्यातून ९ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या, २० चोरीच्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्याने. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी, श्रीरामपूर पोलिसांचे कौतुक करत,पकडलेल्या आरोपीने अनेक गाड्या चोरून, भंगार मध्ये विकल्याची कबुली दिल्याने, पोलीस इतर आरोपीचा शोध घेत असून.आरोपीने केलेल्या आणखीन गुन्हे उघडकीस येणार असल्याची माहिती, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी  दिली आहे. सदरची कारवाई श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे, पोलीस सब इन्स्पेक्टर दादाभाई मगरे, पोलीस कॉन्स्टेबल अतुल लोटके, पोलीस नाईक प्रशांत बारसे,भैरव अडागळे,रघुवीर कारखेले,सोमनाथ गाडेकर, विरप्पा करमल, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे,मच्छिंद्र कातखडे, प्रविण क्षिरसागर,गौतम लगड,रमिझराजा अत्तार, गणेश गावडे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस नाईक फुरकान शेख व प्रमोद जाधव यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

श्रीरामपूर : पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली, श्रीरामपुर शहर पोलीसांनी सुरू केलेल्या धडक कारवाईच्या चालता. १२ नोव्हेंबरच्या श्रीरामपूर - बेलापूर रोडवर, रात्री पाऊने १२ च्या सुमारास, एकलहरे येथील खंडागळे दाम्पत्याला रस्तात आडून, त्यांच्या जवळील हिरो स्प्लेंडर व ३ ग्रॅम सोन्याचे ऐवज चोरून नेल्याची घटना घडली होती. यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयाचा तपासा दरम्यान. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके  पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली, तात्काळ शहर पोलिसांनी, राहुरी येथील अक्षय कुलथे, विशाल ऊर्फ गणेश शेटे व दिपक रामनाथ या तिघा आरोपींना,५ लाख ८५ हजारांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतल्याने.  पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी श्रीरामपूर शहर पोलीसांचे कौतुक केले आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे, पोलीस सब इन्स्पेक्टर दादाभाई मगरे,पोलीस, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर तांत्रिक विभाग फुरकान शेख हेडकॉन्स्टेबल अतुल लोटके,पोलीस नाईक गणेश भिंगारदे,पोलीस नाईक संजय पवार, रघुवीर कारखेले, विरप्पा करमल, सोमनाथ गाडेकर, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, राहुल नरवडे, रमिझराजा अत्तार,गणेश गावडे, मच्छिद्र कातखडे, हरीष पानसंबळ, संपत बडे,नंदकुमार लोखंडे, भारत तमनर आदींनी यशस्वी पार पाडली.

लोणी प्रतिनिधी- पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांना गोपानीय माहिती मिळाली होती की राहाता तालुक्यातील ममदापुर गावात कुरेशी मोहल्ला या ठिकाणी गोवंशिय जनावरांची कत्तल सुरु आहे. मिळालेल्या खात्रीशिर माहितीनुसार तसेच वरिष्ठाच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलिस पथका समवेत सदरच्या ठिकाणी छापा टाकला असता गोवंश जातीचे मांस तसेच 6 गोवंश जातीच्या गायी, 6 गोवंश जातीचे वासरे व महिंद्रा कंपनीची पिक अप क्र. MH 03 AH 2408 असा एकुण 5,68,000/-रुपये किमतीचा मुद्दमाल जप्त करण्यात आला असुन जब्बार हसन शेख वय 45 वर्ष रा.ममदापुर ता.राहाता, कैफ रउफ कुरेशी वय 22 वर्ष रा.कुरेशी मोहल्ला ममदापुर ता.राहाता, जावीद नाजुक खाटीक वय 33 वर्ष रा.कुरेशी मोहल्ला ममदापुर ता.राहाता व कृष्णा एकनाथ गोरे रा. ममदापुर ता.राहाता यांचे विरुध्द लोणी पोलीस स्टेशन गुन्हा रजी नं.558/2022 महाराष्ट्र प्राणी सरक्षण अधिनीयम 1995 चे सुधारीत कलम 5 (अ),5(क) सह 9 तसेच प्राण्याना निर्दयतेने वागविण्यास प्रतीबंध कायदा कलम 3 व 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी दिले आहे.सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली सपोनि समाधान पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुदाम फटांगरे, पो.ना. आसीर सय्यद, पो.ना. दिपक रोकडे, पो.ना.कैलास भिंगारदिवे यांच्या पथकाने केली आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी-  पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी, जिल्ह्यातील अवैद्य व्यवसायांवर कारवाईचे आदेश दिल्याने.जिल्ह्यात  दरदिवस मोठ्या कारवाई होत आहेत. या कारवाईच्या चालता, श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना गोपनीय माहिती मिळाली की. शहरातील धनगरवस्ती येथील, आहेल्यादेवी नगर परिसरात गौवंशिय जनावरांची कत्तल होत आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गवळी यांनी ,तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांना,कर्मचा-यां सोबत कारवाईसाठी रवाना केलेलं असता. शहर पोलिसांनी कत्तल केलेली तब्बल आडीज टन वजनाची ४० जनावरे व ३ जिवंत वासरांसह ,आरोपी तोहसिफ मोहंमद कुरेशी वय वर्ष २५,राहणार वार्ड नंबर २ यास ताब्यात घेतले असून. आरोपीं विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात विविध कालमांन्वये गुन्हा दाखल केला असून. यातील फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, यांच्या सूचना व मार्गदर्शना खाली, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील,पोलीस नाईक रघुवीर कारखीले,बिरप्पा करमल, सोमनाथ गाढेकर,संपत बडे, शिवाजी बडे, भारत जाधव,आजीनाथ आंधळे, दत्तात्रय सातकर, ज्ञानेश्वर गुंजाळ, आजीनाथ माळी आदींच्या पथकाने यशस्वीरित्या पारपडली.

शेवगाव प्रतीनिधी-श्रीरामपूर Dysp संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की,शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथील नानी नदीपात्रातून चोरून वाळू वाहतूक करत आहेत.त्यानुसार त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा घालण्याचे आदेश दिल्याने त्यानुसार सदर पथकाने छापा घालून  चोरटी वाळू वाहतूक करताना मिळून आल्याने आरोपी क्र.1)  अश्पाक सुलेमानं शेख याचे ताब्यातून एक पिवळ्या रंगाचा  जे.सी.बी.  एकूण 20,00,000/- रुपयांचा  आणि आरोपी क्र) 2 गणेश चंद्रकांत केदार याचे ताब्यातून एक आकाशी रंगाचा  डम्पर  व 3 ब्रास वाळू असा आकाशी 6,15,000/- रुपयांचा मुद्देमाल  असा एकूण 26,15000  रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपी विरुध्द PC सचिन काकडे यांचे फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे गु. क्र. 821/2022 , भा द वि कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई मा. श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा.  स्वाती भोर,Dysp संदीप मिटके, यांचे मार्गदर्शनाखाली 𝙿𝚜𝚒 भाटेवाल , HC सुरेश औटी, PC नितीन शिरसाठ, नितीन चव्हाण, सचिन काकडे,विलास उकीर्डे आदींनी केली.

क्रीडा शिबिराचे परितोषिक वितरण समारंभ,श्रीरामपूर : विद्यार्थी दशेत प्रत्येकानेच एक ध्येय निश्चित केल्यास त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते असे प्रतिपादन सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे यांनी केले.येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये दीपावलीच्या सुटीचा सदुपयोग म्हणून जी.एन स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित १५ दिवसीय दिवाळी क्रीडा शिबिर उत्साहात संपन्न झाले.शिबिराच्या समारोप प्रसंगी बोरसे बोलत होते.अध्यक्षस्थानी सार्थक संस्थेचे सचिव शकील बागवान होते.जीवन बोरसे पुढे म्हणाले,अगदी प्रारंभीच्या काळातच आपल्याला परिपूर्ण प्रशिक्षण मिळाले तर भविष्यात त्या त्या क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळविता

येते.पंधरा दिवसीय शिबिरामध्ये तालुक्यातील विविध शाळेतील ऐंशी खेळाडूंनी सहभाग घेतला होता.व्हॉलीबॉल, क्रिकेट,रोल बॉल,बास्केटबॉल,स्केटिंग या खेळांच्या प्रशिक्षणाचा समावेश होता.या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रत्येक खेळाशी संबधित विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळवून दिले. आज शिबिराच्या शेवटच्या दिवशी सर्व खेळाडूंना सार्थक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्यासह सार्थक बहुउद्देशीय संस्थेचे सचिव श्री शकील बागवान,जय हिंद करिअर अकॅडमी चे सुयोग सास्कर, सार्थकचे अध्यक्ष उमेश तांबडे, क्रीडा शिबिराचे आयोजक गौरव डेंगळे, नितीन गायधने, नितीन बलराज आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी शकील बागवान यांचेही भाषण झाले. पंधरा दिवसीय शिबिरामध्ये दरदिवशी विशिष्ट क्षेत्रात प्रावीण्य संपादन केलेल्या विविध क्षेत्रातील सर्वोत्तम मान्यवरांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले.यामध्ये अजय घोगरे (अभिनय व सांस्कृतिक क्षेत्र),सुजाता शेंडगे (प्राणायाम), महेश कोल्हे (कब्बडी), बॉबी बकाल (क्रिकेट), डॉ अमित मकवणा (आहार व खेळातील इजा ), प्रवीण जमदाडे ( मोटिवेशनल ), जयेश सावंत (पत्रकारिता), जतिन सोलंकी (योगा), प्रवीण कुदळे (मर्दानी खेळ), सुयोग सासकर (आर्मी भरती), अभिषेक अन्सिंगकर (अकाउंटिंग) आदींचा समावेश होता.

अहमदनगर प्रतिनिधी- शेतकरी कुटुंबाचे चोरी गेलेले सोने परत मिळून दिल्याबद्दल अनिल कटके पोलीस निरीक्षक,स्थानीक शाखा अहमदनगर यांचा सत्कार दिनांक 04/11/2022 रोजी  श्री. निखील बाळासाहेब वाघ, वय 22, रा. वाघवस्ती, चारी क्र.11, कारेगांव, ता. श्रीरामपूर हे रात्रीचे जेवण करुन दरवाजा खिडक्या बंद करुन कुटूंबियासह झोपलेले असतांना अनोळखी चार इसमांनी घराचे किचनचे दरवाजाची कडीकोंडा कटावणीच्या सहाय्याने तोडुन घरात प्रवेश करुन, चाकुचा धाक दाखवुन साक्षीदारांना कटावणी व लाथाबुक्यांनी मारहाण व जखमी करुन घरातील सामानाची उचका पाचक करुन 2,71,000/- हजार रु.किंमतीचे सोन्याचे दागिने घेवुन गेले आहे. सदर गुन्ह्याचा तपास श्री. राकेशजी ओला साहेब पोलीस अधीक्षक,अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली जलद गतीने लावून शेतकरी कुटुंबाचे चोरी गेलेले सोने परत मिळून दिल्याबद्दल कारेगाव ग्रामस्थांच्या वतीने श्री.अनिल जी कटके पोलीस निरीक्षक,स्थानीक शाखा अहमदनगर यांचा सत्कार करताना बाळासाहेब पटारे, पंढरीनाथ वाघ,आनंद वाघ, शिवाजी दौंड ,नवनाथ वाघ, शरद वाघ, शुभम वाघ, निखिल वाघ, सुनील पटारे आदी उपस्थित होते.





बेलापुर  (प्रतिनिधी  )- सालाबाद प्रमाणे या ही वर्षी  गौसे आजम सेवा भावी संस्थेच्या वतीने  गौसे आजम दरगाह उरुस मोठ्या उत्सहात संपन्न  झाला या वेळी  वाजत गाजत चादरची मिरवणुक काढण्यात आली त्या नंतर   महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी दरगाहची भव्य सजावट देखील करण्यात आली होती  या वेळी  ग्रामपंचायत  सदस्य शफीकभाई बागवान मुस्ताक शेख ,हाजी इस्माइलभाई शेख, मोहसिनभाई सय्यद,जब्बार अत्तार,वरिष्ठ पत्रकार देवीदास देसाई, हाजी मंसूरभाई सय्यद,रफीकभाई शाह, गौसेआजम सेवा भावी संस्थेचे संस्थापक मुख़्तार सय्यद,अध्यक्ष सुल्तान शेख, उपध्यक्ष असीम शेख, सचिव नौशाद शेख, मुयूर मोरे, सिराज अत्तार, इराफन अत्तार, सना काज़ी, शौकत कुरैशी,जीनाभाई शेख व इतर कार्यकर्ते  यांनी  कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

श्रीरामपूर प्रतीनिधी- राज्यातील शिंदे फडणवीस सरकार मधील कृषी मंत्री अब्दूल सत्तर यांनी, टीका करतांना दिल्या शिवी, तसेच  संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात वापलेल्या अपशब्दामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असुन. राज्यभरात अब्दूल सत्तर यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला जात आहे. सर्वांच्या चालता अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोडेमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी अब्दूल सत्तर यांच्या थोडी लाज शिल्लक असेल तर त्यांनी, आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असे आवाहन, राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी केलं आहे. सदरच्या आंदोलनास शहरातील महिला भागणींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या धाडसी कर्तबगारीमुळे त्यांचा कार्यकाळात कार्येक्षेत्रातील गुन्हेगारीवर मोठा वचक बसलेला असल्याने तथा श्रीरामपूर विभागातील त्यांचा शासकीय सेवेचा कार्यकाल पुर्ण होत असल्याने अन्य ठिकाणी त्यांच्या बदलीची चर्चा होत असुन शासनाने त्यांची अन्यत्र बदली न करता श्रीरामपूर विभागातच आणखी त्यांना शासकीय सेवेचा कार्यकाल वाढून द्यावा अशी मागणी समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना ई-मेल निवेदन पत्राद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांची कामे ही खुपच चांगली आणि पारदर्शकता ठेवणारी आहे, कार्येक्षेत्रातील गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करणारी आणि गुन्हेगारीवर वचक निर्माण करणारी आहे,करीता त्यांना श्रीरामपूर विभागातच आपल्या सेवेचा कार्यकाळ वाढवून मिळावा कारण ऐकेकाळी श्रीरामपूर शहर व परिसर हे गुन्हेगारीचे गड मानली जात असे, मात्र श्री. मिटके साहेबांनी अनेक गुन्हेगारांना योग्य धडा शिकवत त्यांना वठणीवर आणले आहे, म्हणून त्यांची अन्यत्र बदली न करता त्यांच्या शासकीय सेवा कार्याचा कार्यकाल याच ठिकाणी वाढून देत याठिकाणीच त्यांना कार्यरत ठेवण्यात यावे,अन्यत्र कोणत्याही ठिकाणी त्यांची बदली करु नये असेही शेवटी या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या निवेदनाच्या प्रति पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य, पोलिस उपमहानिरीक्षक नाशिक,जिल्हाधिकारी अहमदनगर, जिल्हा पोलिस प्रमुख अहमदनगर,अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. आबु असिम आझमी आदींना पाठविण्यात आल्या आहेत.

श्रीरामपूर प्रतिनिधी- शहरातील वार्ड नंबर ३, येथील शिवसर्कल याठिकाणी. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारीजी वाजपेयी, आयलॅंड विकसित करण्याच्या नावाखाली पालिकेतील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी.एकाच कामाचे दोन वेळा निविदा काढुन. आयलॅंडच्या कामात केलेल्या भ्रष्टाचारा संदर्भात, श्रीरामपूर नगरपालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी,याकरिता यापूर्वी पुरावे देऊन. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनी,घेराव,उपोषण,बैठा सत्याग्रह  यासारखे आंदोलन केल्यानंतर. कारवाईचे आश्वासन देऊनही, कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने. कुंभकर्णी झोपी गेलेल्या प्रशासनास जागे करण्यासाठी, श्रीरामपूर नगरपालिके समोर ढोल बजाव आंदोलन केलंय. सदरच्या आंदोलनास माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगरसेवक आशिष धनवटे,शशांक रासकर,सचिन गुजर, सुनील बोलके, आदींसह शहरातील नागरिक तसेच काँगेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेलापूर (प्रतिनिधी  )-येथील नवशा हनुमान मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अन्नकोट उत्सव मोठ्या उत्सहात संपन्न झाला बेलापुर बु!! येथील पेठेतील नवशा हनुमान हा भक्तांच्या नवसाला पावणारा हनुमान म्हणून प्रसिध्द आहे दररोज सकाळ पासुन सायंकाळ पर्यत भावीक या मंदीरात दर्शनासाठी येत असतात सालबाद प्रमाणे या ही वर्षी 56 भोग चे नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली त्या नंतर भाविकासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी पाचशे , दोनशे, शंभर व पन्नास रुपयांच्या नोटा तसेच दहा वीस रुपयांच्या  कोऱ्या करकरीत नोटांनी नवशा हनुमान मूर्तीची सुंदर पध्दतीने सजावट करण्यात आली  तसेच फुल पुष्पहार माळांनी व विद्युत रोषणाईने श्री नवशा हनुमान मूर्तीला मनमोहाक असे रुप प्राप्त झाले होते ही सजावट पाहू अनेक हनुमान भक्तांनी या सजावटी करणाऱ्यांचे मन भरुन कौतुक केले पाच  मोठ्या भाविक भक्तांच्या उपस्थितीत अन्नकोट उत्सव संपन्न झाला सायंकाळी सात वाजता आरती करण्यात आली त्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश दायमा सौ स्नेहल दायमा तसेच मुकुंद चिंतामणी यांनी विशेष परिश्रम घेतले

बेलापूर प्रतिनिधी-स्त्री - पुरुष समानता राहावी. याकरिता राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे अनेक महिला उच्च पदस्थांनी बसल्या आहेत. मात्र महिलांवर दबाव आणून, त्यांच्या कामात अडथळे ,तसेच नामधारी करून दुसरेच निर्णय घेत असल्याच्या घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार श्रीरामपूर तालुक्यात ५ हजार लोकवस्तीच्या, बेलापूर खुर्द ग्रामपंचातीत समोर आला आहे. महिला सरपंच पदाचे आरक्षण पडल्याने,सौ वर्षा महाडिक ह्या बहुमताने पदस्त झाल्या. परंतु नामधारी सरपंच करून, होत असलेल्या भ्रष्टाचार सहन न झाल्याने. जनतेला दिलेले वाचनासाठी, स्वतः महिला सरपंच सौ महाडिक यांनी,पितळ उघडे केलं आहे.  अनेक वेळा विरोध करूनही, पाऊने ५ लाख रुपये खर्च करून. ग्रामपंचायतिच्या मागील बाजूस बांधण्यात आलेले शौचालायात ना पाण्याची सोय,ना प्रशस्त टाळी, त्यामुळे बंद असवस्थेतीत शौचालयाचा, ग्रामस्थांना वापर करता येत नसल्याने. ग्रामस्थ देखील संताप व्यक्त करीत असून. शौचालय सुरू करा नाहीतर पाडून तरी टाका अशी मागणी करीत आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या,शौचालयाच्या निकृष्ठ कामाची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी. याकरिता महिला सरपंच सौ महाडिक आता, न्यायालयाचा दरवाजा ठोकणार असल्याची माहिती दिली आहे.







.

श्रीरामपूर : अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्या नंतर, जिल्ह्यातील गुन्हेगारी तसेच पोलीस कारवाईचा आढावा घेण्यासाठी. पोलीस अधीक्षक राकेश ओला विविध पोलीस ठाण्यांना भेट दिली. यावेळी श्रीरामपूर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने, पुष्पगुच्छ देऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे स्वागत करण्यात आले. सदरच्या स्वागत कार्यक्रमा प्रसंगी तिरंगा न्यूजचे संपादक अस्लम बिनसाद,एस न्यूज मराठी चॅनलचे व्यवस्थापकीय संपादक जयेश सावंत, न्यूज सुपर वन चे अभिषेक सोनवणे  उपस्थितीत होते. सदरच्या स्नेह भेटी वेळी झालेल्या चर्चे दरम्यान, श्रीरामपूर येथील जुन्या आठवणींना उजाळा देत. अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी देखील उपस्थित होते.

अहमदनगर प्रतिनिधी-अप्पर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांची पुणे मेट्रो प्रकल्पामध्ये बदली झाली. त्यांच्या जागेवर सुहास मापारी यांची नियुक्ती झाली आहे. मापारी यांनी यापूर्वी महसूल उपजिल्हाधिकारी तसेच श्रीरामपूरला प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले आहे. अप्पर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर हे गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत होते.यमगर हे पुणे जिल्ह्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यावेळेस त्यांना पुणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाली नव्हती. यमगर नगर येथे एक वर्षभर कार्यरत होते. शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची प्रतिमा होती. शेवगाव तालुक्यातील बनावट बिगरशेती प्रकरणाचा तपास केला होता. सुहास मापारी हे नगरला उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची बदली श्रीरामपूरचे प्रांताधिकारी म्हणून झाली. मापारी यांची अप्पर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget