Latest Post

बेलापूर ( प्रतिनिधी)-देवा धर्माच्या नावाखाली सर्व सामान्य नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेवून दैवी शक्तीच्या आधारे विविध आजार बरे करण्याचे खोटे आश्वासन देऊन कुणी बाबा बुवा आर्थिक, शारीरिक, मानसिक फसवणूक करत असेल तर त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समीतीशी संपर्क साधवा असे आवाहन अंनिसचे देविदास देसाई यांनी केले आहे.                                     महाराष्ट्र शासनाने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा केला असला तरी श्रीरामपूर तालुक्यासह अहिल्या नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भोंदूगीरी केली जात आहे भूत ,जादूटोणा,करणी काढण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जात आहे या भोंदू बाबाकडे जाणार्ऱ्यामध्ये महीलांचे प्रमाण मोठे आहे.त्याचा गैरफायदा घेऊन सर्वच धर्मात पसरलेले हे भोंदु बाबा महीलांचे लैंगिक शोषण करत असल्याच्या तक्रारी समितीकडे आलेल्या आहेत.जिल्ह्यात पसरलेल्या या भोंदू बाबाचा अंनिसच्या वतीने भांडाफोड करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.त्यामुळे अंधश्रद्धेतून फसवणूक झालेल्यांनी ,देविदास देसाई बेलापूर तालुका श्रीरामपूर या पत्त्यावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.आपले नाव गुप्त ठेवले जाईल . श्रीरामपूर तालुक्यासह जिल्ह्यात भोंदूगिरी करणाऱ्या भोंदू बुवा बाबाचे मोठे जाळे पसरले आहे  अंनिसच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत जिल्ह्यात भोंदूगिरी करणाऱ्या बाबा बुवावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.लवकरच श्रीरामपूर तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक आयोजित करण्यात येणार असुन अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य करण्याची ज्यांना आवड असेल त्यांनी अंनिसशी संपर्क साधावा असेही आवाहनही देसाई यांनी केले आहे.

बेलापूर(प्रतिनिधी)-बेलापूर- श्रीरामपूर रस्त्याच्या दुभाजकात लावलेली झाडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे  वाळत चालली असून वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल न घेतल्यामुळे अखेर बेलापूर बु ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुप बेलापूर यांनी झाडांना पाणी देण्यास सुरुवात केली.या उपक्रमाचे  वृक्षप्रेमीकडून  कौतुक केले जात आहे.                                            माजी आमदार लहू कानडे यांच्या विशेष प्रयत्नातून  बेलापूर -श्रीरामपूर रस्त्याचे चौपदरीकरण होवून  दुभाजकामध्ये  वृक्षारोपण करण्यात आले होते.काही काळ त्याचे संगोपन ही व्यवस्थित झाले. परंतु आता कडक उन्हाळा सुरू झाला असून पाणी न मिळाल्यामुळे अपार मेहनत घेऊन जगवलेली ही झाडे शेवटच्या घटका मोजत आहेत. याप्रमाणेच बेलापूर-श्रीरामपूर रस्त्याचे दुतर्फा लावण्यात आलेल्या झाडांचीही दुरवस्था झाली आहे.याकडे बेलापूर ग्रामपंचायत सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपने  प्रशासनाचे लक्ष वेधले होते परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही.अखेर संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष  शरद नवले यांच्या पुढाकाराने बेलापूर बु ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपने झाडांना पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली.बेलापूर बु ग्रामपंचायतीच्या                                              टँकरव्दारे पाणी दिले जात असून यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी बाबासाहेब प्रधान, अविनाश शेलार,दत्तात्रय वक्ते,सुमित शेलार आदी परिश्रम घेत आहेत.                 बेलापूर-श्रीरामपूर  रस्त्याचे दुतर्फा पावसाळ्यामध्ये झाडे लावण्याचा ठेका एका ठेकेदारांनी घेतला. त्याने पावसाळ्यात ती झाडे लावली देखील परंतु त्यानंतर लावलेल्या झाडांची देखभाल न केल्याने झाडांची दूरवास्था होत आहे. त्यामुळे ज्या ठेकेदारांनी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून त्याचे संगोपन करण्याचा ठेका घेतलेला असेल त्या ठेकेदाराकडून   जळून गेलेल्या ठिकाणी पुन्हा नवीन वृक्ष लागवड करावी.तसेच लावलेल्या झाडांचे संगोपन करावे याबाबत संबंधित ठेकेदाराला सुचना देण्याची मागणी बेलापूर बु ग्रामपंचायतीसह सत्यमेव जयते ग्रुपचे सदस्य संजय भोंडगे, विष्णुपंत डावरे,देविदास देसाई,अभिषेक खंडागळे, राधेश्याम अंबिलवादे,बाबासाहेब काळे,राजेंद्र कर्पे,भगीरथ मुंडलिक, दिलीप अमोलिक,बाबुलाल पठाण,विशाल आंबेकर, सचिन कणसे,हाजी इस्माईल शेख, इरफान शेख, किरण गागरे, दिपक क्षत्रिय,विलास नागले,प्रा निजाम शेख, सचिन देवरे,पुंजाहरी सुपेकर, महेश कुऱ्हे, सोमनाथ जावरे,जाकीर शेख,महेश ओहोळ,किशोर दायमा,गोपी दाणी, दिलीप दुधाळ,अर्जुन डुकरे,राहुल माळवदे,सलीम शेख आदींनी केली आहे.

लोणी खुर्द (प्रतिनिधी):राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथे गट नंबर 60 मधील शेतकऱ्यांना शेतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला आहे. रस्ता बंद झाल्याने शेतीकाम तसेच दैनंदिन हालचालींमध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गट नंबर 60 परिसरातील ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू असताना अतिक्रमण काढण्यात आले. या कारवाईदरम्यान शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणारा जुना रस्ता काढून टाकण्यात आल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. हा रस्ता लहानपणापासून तसेच त्यांच्या आजोबांच्या काळापासून वापरात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

या प्रकरणी शेतकऱ्यांनी जनसेवा कार्यालयात तक्रार केल्यानंतर 17 जानेवारी 2026 रोजी जलसंधारण अधिकारी, सर्कल अधिकारी, तलाठी आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली होती. त्यावेळी लवकरच रस्ता उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

दरम्यान गट नंबर 61, 62, 65, 66, 67, 68, 69, 70 व 71 या शेतकऱ्यांसाठी ओढ्यातील रस्त्याचा काही भाग कायम ठेवण्यात आला असून गट नंबर 60 कडे जाणारा रस्ता मात्र अर्धवट काढून टाकण्यात आल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.

सध्या शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना शेजारील शेतातील मका पिकातून जावे लागत आहे. दूध काढण्यासाठी पहाटे व रात्रीही त्याच मार्गाचा वापर करावा लागत असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. या परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे जीवितास धोका असल्याची भीतीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर गणेश रमेश काळवाघे, शुभम दत्तात्रेय आहेर आणि निखिल अनिल आहेर यांनी 7 मार्च 2026 पासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. गट नंबर 60 कडे जाणारा रस्ता उपलब्ध करून दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


बेलापूर ( प्रतिनिधी)-देव अंगात संचारला असे भासवून काही भोंदू बाबा आलेल्या भक्तांचे आर्थिक, शारीरिक व मानसिक शोषण करत असल्याच्या बेलापूर व परिसरात चर्चा सुरू असुन अशा प्रकारे भोंदूगिरी करणाऱ्या बाबा संदर्भात काही तक्रारी असल्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा असे आवाहन अंनिसच्या  राज्य सचिव एडवोकेट रंजनाताई गवांदे, बाबा आरगडे ,देविदास देसाई यांनी केले आहे.       या बाबत अंनिसच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात गवांदे, आरगडे ,देसाई यांनी पुढे म्हटले आहे की बेलापूरातील एका भोंदूगिरी करणाऱ्या बाबाने काही महीलांचे लैंगिक शोषण केल्याची परिसरात चर्चा असुन बाबांच्या भितीपोटी व इज्जतीमुळे महीला तक्रार देण्यास पुढे येत नाही.ज्या महीलांची आर्थिक शारीरिक फसवणूक झाली असेल अशा महीलांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी अथवा पोलीस 

स्टेशनमध्ये संपर्क साधावा त्या भोंदू बाबाची भोंदूगिरी समाजासमोर उघड करुन त्याचेवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल . संबंधित भोंदू बाबा विरुद्ध कारवाई करण्याच्या दृष्टीने अंनिसने पावले उचलली असुन त्या भोंदू बाबाने आलेल्या भक्तांकडून मोठ्या रकमा वसुल केल्या असल्याची ही परिसरात चर्चा असुन या बाबाकडे येणाऱ्या मध्ये अनेक राजकीय पुढाऱ्यांचा भरणा आहे.  राजकीय पुढाऱ्यांच्या आश्रयाखाली हा बाबा महीलांचे लैंगिक शोषण करत असल्याची माहिती अंनिसच्या कार्यकर्त्यांना मिळाली असुन त्या भोंदू बाबांचे कारनामे दडपण्यासाठी मदत करणाऱ्या पुढाऱ्यांची नावे देखील उघड केली जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर अंनिसच्या राज्य सचिव अँड रंजना ताई गवांदे ,बाबा आरगडे, देविदास देसाई ,छायाताई बंगाळ आदिच्या सह्या आहेत.


शिर्डी : शिर्डीतील एका हॉटेलच्या भाडेकरार वादप्रकरणात आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. हॉटेल मालक सुनील तोलानी यांच्या मुलास नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांकडून प्राथमिक माहिती मिळाली आहे. काही दिवसापूर्वी नागपूर पोलिसांची टीम शिर्डीत दाखल होऊन संबंधित कारवाई केल्याचे समजते.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आर्थिक व्यवहार आणि दाखल गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. भाडेकरारातील अटी, आर्थिक देवाणघेवाण तसेच तृतीय पक्षाशी झालेले व्यवहार याबाबत सध्या सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, नागपूर येथील बजाज नगर परिसरातील पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. संबंधितास ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आल्याचीही माहिती पुढे आली आहे.

अधिकृत निवेदन अद्याप जाहीर झाले नसले तरी या घडामोडीमुळे संबंधित प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. पुढील कायदेशीर प्रक्रियेनुसार न्यायालयीन निर्णयानंतरच संपूर्ण प्रकरणाचे चित्र स्पष्ट होणार आहे.


बेलापूरच्या 'सत्यमेव जयते' ग्रुपची पाणी देण्याची आग्रही मागणी!

बेलापूर (प्रतिनिधी):

बेलापूर-श्रीरामपूर रस्त्याच्या दुभाजकामध्ये लावलेली तसेच दुतर्फा लावलेली झाडे वेळेवर पाणी न दिल्यामुळे  जळून चालली आहेत.त्याचबरोबर  झाडांच्या संरक्षणासाठी लावलेल्या जाळया देखील गायब झालेल्या आहेत तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने झाडांचे संगोपन होईल अशी व्यवस्था करावी, अशी आग्रही मागणी बेलापूर येथील 'सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुप' च्या वतीने पत्रकार देविदास देसाई यांनी केली आहे.

सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने प्रसिध्दीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की पर्यावरणाचे संतुलन रहावे त्याचबरोबर रात्रीच्या वेळेस समोरुन येणाऱ्या वाहनांच्या प्रखर लाईटच्या प्रभाव पडू नये या करीता कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ता दुभाथकामध्ये ही झाडे लावण्यात आली होती. सध्या कडक उन्हाळा सुरु झाला असून झाडांना वेळेवर पाणी न दिल्यामुळे झाडे वाळत चालली आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावुन त्यां झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी एका ठेकेदाराला देण्यात आली होती.पावसाळ्यात संबंधीत ठेकेदाराने झाडे लावली पण नंतर त्या झाडाकडे ढुंकूनही पाहीले नाही. लावलेल्या झाडापैकी केवळ पाच दहा टक्केच झाडे कशीबशी तग धरुन आहे. अनेक झाडे पूर्णपणे वाळली असून, काही शेवटच्या घटका मोजत आहेत. शासनाचा पैसा खर्च करून लावलेली ही झाडे जगविणे  संबधीत ठेकेदाराची जबाबदारी आहे.

या संदर्भात 'सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुप' च्या सदस्यांनी चिंता व्यक्त केली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने या झाडांना टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे आणि त्यांची योग्य निगा ठेवावी, असे आवाहन केले आहे. जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर सर्व झाडे नष्ट होतील, व केलेला खर्च वाया जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पर्यावरण रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या या ग्रुपने प्रशासनाला तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित ठेकेदाराला झाडाला पाणी देण्याबाबत आदेश करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.या निवेदनावर देविदास देसाई सह अभिषेक खंडागळे ,राधेश्याम अंबिलवादे, संजय भोंडगे, हाजी इस्माईल शेख ,इरफान शेख, किरण गागरे, दिपक क्षत्रिय,सचिन वाघ,विष्णुपंत डावरे ,किरण शेलार,दिलीप अमोलिक, भगीरथ मुंडलीक ,विलास नागले,प्रा निजाम शेख,सचिन देवरे,सचिन कणसे, पुंजाहरी सुपेकर,महेश कुऱ्हे, सोमनाथ जावरे, बाबुलाल पठाण, जाकीर शेख, रवींद्र करपे, विशाल आंबेकर, महेश ओहोळ, गोपी दाणी, दिलीप दुधाळ,बाबासाहेब काळे,अर्जुन डूकरे आदिंसह सदस्यांनी केले आहे

बेलापूर(प्रतिनिधी ): येथील छत्रपती तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा मंडळाचे १९वे वर्ष असून शिवजयंती निमित्त  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.                                                       शुक्रवार (६मार्च) रोजी स.१० वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन तसेच संध्याकाळी ६वा.महाआरती  व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे शनिवार (७मार्च) रोजी संध्याकाळी ६वा. प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.संग्रामबापू भंडारे यांचे जाहीर हरी किर्तन होणार आहे.सदरचे  कार्यक्रम वीर सावरकर चौक,नगररोड, बेलापूर बु|| याठिकाणी होणार आहेत.तरी याप्रसंगी शिवप्रेमी ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन छञपती तरुण मंडळाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी केले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget