bindas news

Latest Post

बेलापूर:-(प्रतिनिधी )-येथील बेलापूर नाभिक संघटनेच्या बैठकीत अध्यक्ष पदी सुनिल सोनवणे यांची तर उपाध्यक्षपदी सचिन कणसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.समाजातील अडचणी सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहू.अशी ग्वाही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी दिली.बेलापुर  नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी सुनिल सोनवणे यांच्या नावाची सुचेना मावळते अध्यक्ष गोरख कणसे यांनी  मांडली त्यास समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब कुटे यांनी अनुमोदन दिले तर उपाध्यक्ष पदासाठी सचिन कणसे या़च्या नावाची सुचेना प्रतापराव मुंडे यांनी मांडली त्यास कैलास घायल यांनी अनुमोदन दिले नवीन निवडीबद्दल त्यांचे मावळते अध्यक्ष गोरक्षनाथ कणसे, भाऊसाहेब कुटे, प्रतापराव हुडे , कनजीशेठ टाक , कैलास चायल,भिमराज हुडे,रमेश कुटे ,रविंद्र हुडे, नंदु भागवत, बबनराव रावताळे,बाबू वैद्य , सतीश सोनवणे,हरि वैद्य, विजय हुडे, विजय शेजूळ, अनिल शेजुळ, राजेंद्र बोरसे, महेश जायभार, गणेश शेजूळ, नवीन भागवत, कृष्णा भागवत, शेखर कुटे, गणेश कणसे, सागर हुडे, निलेश हुडे, अशोक आहेर, प्रशांत बिडवे, दत्तात्रय जाधव,रमेश टाक, सुधीर सोनवणे,राजन सोनवणे, आदींनी अभिनंदन केले आहे

बेलापूर ( प्रतिनिधी)-श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बु. येथील ज्येष्ठ पत्रकार ,भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते, समाजसेवक, दानशुर व्यक्तीमत्त्व कै. विष्णुपंत गोविंदराव डावरे यांच्या दुःखद निधनाने बेलापूर परिसरासह पत्रकारिता तसेच सामाजिक , राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली असुन त्यांच्या जाण्याने बेलापूर भाजपामध्ये एक पोकळी निर्माण झाली असल्याचे मत जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.


कै. डावरे यांची गावातुन  वाबळे गल्ली ,झेंडा चौक ते स्मशानभूमी अशी अंत्ययात्रा काढण्यात आली होती. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या निधनाची वार्ता राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना समजताच त्यांनी डावरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन विष्णुपंत डावरे यांची पत्नी रत्नमाला डावरे पुतणे प्रफुल्ल डावरे बंधू हरिहर डावरे व डावरे कुटुंबीयांचे सांत्वन केले.कै. डावरे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांबरोबरच सामाजिक, राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे मत नामदार विखे पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष शरद नवले, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, हाजी इस्माईल शेख, रणजित श्रीगोड, पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे, देविदास देसाई, पुरुषोत्तम भराटे, कणजीशेठ टाक, रवींद्र खटोड,राजेश खटोड,भरत साळुंके सुभाष बोरा,रावसाहेब अमोलिक, राकेश कुंभकर्ण, निलेश हरदास, मुस्ताक शेख,रखमाजी गाढे,रमेश काळे, विशाल आंबेकर, अजिज शेख, सचिन वाघ, शफिक बागवान, सचिन अमोलिक, किशोर बोरुडे, करण गोसावी, अनिल थोरात,सुमित बोरुडे, आदित्य कर्डिले, सुरज  बडे,मोहसीन सय्यद, प्रभात कुऱ्हे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बेलापूर (प्रतिनिधी देविदास देसाई)-बेलापुरात एकच दिवशी दोन वेगवेगळ्या गंठण चोरीच्या घटना घडल्या असून एक सकाळी सात वाजता तर दुसरी  रात्री साडेअकराच्या दरम्यान घटना घडली आहे .साखळी चोरांनी एक प्रकारे पोलिसांना आव्हानच दिले आहे      बेलापुरात सकाळी भगवान श्री हरिहर केशव गोविंद बन येथून दर्शन करून परतत असताना प्रवरा नदीच्या पुलावर  सकाळी सात वाजेच्या सुमारास एका महिलेचे दोन तोळ्याचे गंठण तोडून चोरटे पसार झाले या घटनेचा तपास पोलीस करत असतानाच काल रात्री बेलापूर खुर्द येथील एका महिलेच्या गळ्यातील अर्धा तोळ्याचे गंठण रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान तोडून नेण्यात आले श्रावण महिना असल्यामुळे श्री हरी केशव गोविंदाच्या पादुकांची सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली होती रात्री साडेअकराच्या सुमारास ही मिरवणूक बेलापूर खुर्द इथून जात असताना अनेक महिला भगिनी पादुकांच्या दर्शनाकरता थांबल्या होत्या त्यात एक वयोवृद्ध महिला आपल्या घरासमोर ओट्यावर बसलेली होती त्याचवेळी गर्दीचा फायदा घेत मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी काही समजण्याच्या आतच त्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील अर्धा तोळ्याची पोत तोडून पोबारा केला या घटनेनंतर सदर कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनला खबर दिली पोलीसही घटनास्थळी आले सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.सकाळची घटना घडल्यानंतर पोलीस तपास सुरू असतानाच रात्री साडेअकराच्या सुमारास पुन्हा एका वयोवृद्ध महीलेच्या गळ्यातील अर्धा तोळ्याची पोत तोडून नेण्यात आली .सध्या रस्त्यावर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असतानाही शिवाय बेलापूर पोलीस स्टेशनला जादा कर्मचारी देण्यात आलेले असतानाही साखळी चोर इतके धाडस करतातच कसे? असा सवाल नागरिकाकडून विचारला जात आहे.बऱ्याच दिवसानंतर बेलापूर मध्ये  झाडीने चोरीच्या सकाळी व संध्याकाळी अशा दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत या घटनेचा पोलिसांनी तातडीने छडा लावावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे

बेलापूर (प्रतिनिधी) -देव दर्शन करुन पायी परत येत असताना प्रवरा नदीवरील पुलावर एका महीलेचे दोन गोळ्यांचे गंठण चोरीला गेले असुन या बाबत बेलापूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.श्रावणी सोमवार निमित्त बेलापूर गावातील अनेक भक्तगण श्री हरिहर केशव गोविंद बन व उक्कलगाव येथे दर्शनासाठी जात असतात .आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार असल्यामुळे गावातील अनेक भक्तगण श्री हरिहर केशव गोविंद बन येथे सकाळीच दर्शनासाठी गेले होते.गावातीलच दोन महीला दशर्न करुन घरी परतत असताना प्रवरा नदीवरील पुलावर पल्सर मोटारसायकलवर आलेल्या दोन जणांनी महीलेलच्या गळ्यातील दोन तोळयाचे गंठण तोडून श्रीरामपूरच्या दिशेने धूम ठोकली.बेलापूरचे माजी सरपंच भरत साळूंके हे ही सपत्नीक देव दर्शन करुन परत येत असताना त्यांना ही घटना समजली त्यांनी लगेच चोरांचा पाठलाग केला परंतु चोरटे पसार झाले.त्यांनी तातडीने बेलापूर पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली बेलापूरचे पोलीस हवालदार गणेश भिंगारदे संपत बडे यांनी सी सी टी व्ही फुटेज तपासले त्यांमध्ये पल्सर मोटारसायकलवर दोन इसम चेहरा झाकलेल्या अवस्थेत जाताना दिसत आहे बेलापूर पोलीस स्टेशनचे हवलदार गणेश भिंगारदे यांनी तातडीने पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांना सूचना दिली संपत बडे हे तात्काळ श्रीरामपूरच्या दिशेने मोटारसायकल वर येणाऱ्याचा शोध घेत होते त्यांना एक तोंड बांधलेले दोन इसम मोटरसायकलवर जोरात जाताना दिसले त्यांनी त्यांना सरळ मोटरसायकल आडवी घातली मोटारसायकल आडवी घातल्यामुळे संपत बडे मोटरसायकलसह खाली पडले त्यांना किरकोळ दुखापत झाली.चौकशी केल्यानंतर ते प्रवासी असल्याचे लक्षात आले.या घटनेबाबत बेलापूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तपास करत आहेत. सध्या श्रावण महिना चालू असून अनेक महिला सोन्याचे मौल्यवान दागिने घालून देवदर्शनाकरता जात असतात त्यामुळे महिलांनी आपल्या दागिन्याची व्यवस्थित काळजी घ्यावी असेही आवाहन बेलापूर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आलेले आहे

श्रीरामपूर (विशेष प्रतिनिधी):नेवासा रोड, वॉर्ड नं. ०६ या शाळा आणि महाविद्यालयांच्या शैक्षणिक परिसरात सुरू असलेल्या 'क्रिस्टल कॅफे', 'एम.एच. १७ कॅफे' आणि 'स्पार्कल कॅफे' या तीन कॅफेंवर श्रीरामपूर शहर पोलिसांनी विशेष मोहिमेअंतर्गत धडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी संबंधित कॅफेंमधून काही तरुण मुला-मुलींना ताब्यात घेतले असून, त्यांच्या वयाचे पुरावे तपासल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे.

मुले सज्ञान असली तरी कॅफे चालकांचा गुन्हा माफ होतो का?

इथे सर्वात मोठा आणि कायदेशीर प्रश्न उपस्थित होतो—ताब्यात घेतलेली मुले जर वयाने सज्ञान (१८ वर्षांवरील) असली, तरी त्यामुळे या कॅफे चालकांवर व मालकांवर होणारी कायदेशीर कारवाई शिथिल होते का?

कायद्याची पायमल्ली: व्यावसायिक परवान्याच्या (Trade License) शर्तींचा भंग करून, कॅफेच्या नावाखाली पडदे, केबिन किंवा गुप्त खोल्या तयार करून अश्लील प्रकारांना प्रोत्साहन देणे हा स्वतंत्र गुन्हा आहे.

पब्लिक न्यूसन्स व अनधिकृत वापर: महाराष्ट्र पोलीस कायदा आणि महापालिका/नगरपरिषद नियमांनुसार, सार्वजनिक ठिकाणी किंवा व्यावसायिक जागेत सामाजिक नैतिकतेला बाधा आणणारे 'पब्लिक न्यूसन्स' निर्माण करणे हा थेट कायद्याचा भंग ठरतो. त्यामुळे तरुण सज्ञान असले तरी अवैध सोयी-सुविधा पुरवणाऱ्या चालकांचे गुन्हे ठरलेलेच आहेत.

लॉजिंगवर सील आणि गुन्हे, मग कॅफेंना वेगळा न्याय का?

काही दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये अशाच प्रकारे अश्लील व बेकायदेशीर प्रकार चालणाऱ्या लॉजिंगवर प्रशासनाने थेट 'सील' ठोकून मालक व चालकांवर गंभीर गुन्हे दाखल केले होते. मग श्रीरामपुरातील या कॅफे मालक आणि चालकांबाबत पोलीस प्रशासन मवाळ भूमिका का घेत आहे? त्यांना केवळ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०, ११७ अन्वये क्षुल्लक नोटीस देऊन सोडून देणे म्हणजेच कारवाईचा केवळ 'दिखावा' तर नाही ना?

तरुणाई आणि संस्कृती धोक्यात!

शालेय व महाविद्यालयीन वयातील तरुण पिढी या कॅफेंच्या जाळ्यात सहज बळी पडत आहे. अशा प्रकारांमुळे भारतीय संस्कृती, कौटुंबिक मूल्ये आणि शैक्षणिक वातावरण पार विस्कळीत होत चालले आहे.

पोलीस प्रशासनाला कडक इशारा:

केवळ नोटीसांचा कागदी सोपस्कार न उरकता, या कॅफेंचे परवाने रद्द करून त्यांना थेट 'सील' ठोकण्याची कठोर कारवाई पोलीस प्रशासन कधी करणार? अश्लीलतेला खतपाणी घालणाऱ्या मालक व चालकांवर कडक कायदेशीर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत. प्रशासन यावर खरोखरच ठोस पाऊल उचलणार की पुन्हा थातूरमातूर कारवाईवर बोळवण करणार, याकडे संपूर्ण श्रीरामपूरकरांचे लक्ष लागले आहे.


बेलापूर (प्रतिनिधी)-एस के सोमय्या प्राथमिक विद्या मंदिर या शाळेत इयत्ता चौथी मधील विद्यार्थी चिरंजीव साईश रामेश्वर ढोकणे राज्यस्तरीय शिष्यवृसाईशत्ती परीक्षेत विशेष नैपुण्य मिळविले आहे. श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार रामेश्वर ढोकणे यांचे चिरंजीव साईश याने राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत ३००पैकी २५६ गुण मिळवून जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत २७ वा क्रमांक मिळविला आहे. त्याचबरोबर राज्य राज्यस्तरीय ऑलिम्पियाड स्पर्धेत 200 पैकी 188 गुण मिळवून राज्यात सहावा व जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळवला. तसेच लक्षवेध राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये 300 पैकी 278 गुण मिळवून राज्यात सातवा व जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळविला. तसेच नॅशनल स्कॉलरशिप एक्झाम या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 200 पैकी 188 गुण मिळवून राज्यात नववा व जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळविला भारत टॅलेंट सर्च बी टी एस या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये 150 पैकी 130 गुण मिळवून राज्यात बारावा व जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळविला तसेच राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये 300 पैकी 264 गुण मिळवून राज्यात एकोणीस व जिल्ह्यात चौदावा क्रमांक मिळविला त्याला रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलिंग सदस्या मीनाताई जगधने, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सोनाली पैठणी, वर्ग शिक्षिका श्रीमती मेघा पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. साईश रामेश्वर ढोकणे यांच्या यशाबद्दल अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे , उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनवडे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, देविदास देसाई,दिलीप दायमा,ज्ञानेश्वर गवले , नवनाथ कुताळ सुहास शेलार आदि अभिनंदन केले आहे.
हेडलाईन करा पेपर साठी

श्रीरामपूर | प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून भारतीय पोलीस सेवेतील (IPS) २०१६ तुकडीचे कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज अधिकारी मुम्मका सुदर्शन यांनी पदभार स्वीकारताच जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेबाबत नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. परभणी, नागपूर आणि चंद्रपूर येथे त्यांनी केलेल्या कडक कारवाईमुळे अवैध धंद्यांवर लगाम बसल्याची उदाहरणे आहेत. मात्र, श्रीरामपूर शहरातील सध्याची परिस्थिती पाहता, येथील अवैध साम्राज्याला वेसण घालणे हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान आणि कसोटी ठरणार असल्याचे चित्र आहे.

​श्रीरामपूर शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर भंगार व्यवसायाच्या आडून वाहनांची बेकायदेशीर कत्तल (स्क्रॅपिंग) केली जात आहे. परिवहन विभागाची (RTO) कोणतीही अधिकृत परवानगी नसताना हा काळा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. केंद्र शासनाने जुनी आणि भंगार वाहने मोडीत काढण्यासाठी अधिकृत स्क्रॅप केंद्रे सुरू केली असताना, श्रीरामपुरातील हे अवैध व्यावसायिक सुट्या भागांच्या (Spare Parts) विक्रीसाठी आरटीओ कार्यालयाबद्दल चुकीची माहिती देऊन नागरिकांची उघड फसवणूक करत आहेत.

​त्याहून गंभीर बाब म्हणजे, या गाड्यांच्या पार्टसचा वापर करून दुसरीच बेकायदेशीर गाडी तयार केली जाते आणि ती विकली जाते. यामुळे गुन्हेगारांना पोलिसांपासून वाचणे सोपे जाते आणि गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांसमोर प्रचंड अडचणी निर्माण होतात.

​या अवैध स्क्रॅपिंग मार्केटमध्ये रात्रीच्या अंधारात कोट्यवधींची उलाढाल होत आहे. चांगल्या दर्जाची वाहने रात्रीतून भंगार करून, त्यांचे तुकडे करून गाड्या भरून रवाना केल्या जातात. यामध्ये अनेक गाड्या चोरीच्या, बँकांचे कर्ज बुडवून आणलेल्या किंवा गंभीर गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या असण्याची दाट शक्यता सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या प्रक्रियेतून थेट गुन्ह्यांचे पुरावेच नष्ट केले जात असल्याचा संशय नाकारता येत नाही.

​सर्वसामान्य नागरिकांना आणि डोळस जनतेला उघड्या डोळ्यांनी दिसणारा हा ‘गुन्हेगारीचा कारखाना’ प्रशिक्षण घेऊन आलेल्या आणि कायदा शिकलेल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना का दिसत नाही? हा आता संशोधनाचा विषय बनला आहे.

"स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (LCB) पथक शहरात नेमके काय करायला येते?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

​हा व्यवसाय काही प्रभावशाली घटकांच्या छत्रछायेखाली आणि प्रशासनाच्या आर्थिक फायद्यापोटी वतत असलेल्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे सुरू असल्याची चर्चा सध्या शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे. पोलीसच गुन्हेगारांना 'माल पसार' करण्यास मदत करतात की काय, अशी शंका घेण्यास वाव निर्माण झाला आहे.

नव्या सिंघम’कडून कारवाईची अपेक्षा!

​नवे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचा भूतकाळातील धडाका पाहता, ते श्रीरामपूरमधील या आंतरजिल्हा संघटित गुन्हेगारीचे नेटवर्क मोडून काढणार का? स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शहर-तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी त्यांच्या धाकाने तात्काळ ऍक्शन मोडमध्ये येणार की नेहमीप्रमाणे अर्थपूर्ण तडजोडी करून हे अवैध व्यवसाय असेच सर्रास सुरू राहणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

​धडाकेबाज एसपी मुम्मका सुदर्शन या 'भंगार माफियांच्या' मुसक्या आवळून श्रीरामपूरला गुन्हेगारीमुक्त करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget