bindas news

Latest Post

श्रीरामपूर (विशेष प्रतिनिधी):नेवासा रोड, वॉर्ड नं. ०६ या शाळा आणि महाविद्यालयांच्या शैक्षणिक परिसरात सुरू असलेल्या 'क्रिस्टल कॅफे', 'एम.एच. १७ कॅफे' आणि 'स्पार्कल कॅफे' या तीन कॅफेंवर श्रीरामपूर शहर पोलिसांनी विशेष मोहिमेअंतर्गत धडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी संबंधित कॅफेंमधून काही तरुण मुला-मुलींना ताब्यात घेतले असून, त्यांच्या वयाचे पुरावे तपासल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे.

मुले सज्ञान असली तरी कॅफे चालकांचा गुन्हा माफ होतो का?

इथे सर्वात मोठा आणि कायदेशीर प्रश्न उपस्थित होतो—ताब्यात घेतलेली मुले जर वयाने सज्ञान (१८ वर्षांवरील) असली, तरी त्यामुळे या कॅफे चालकांवर व मालकांवर होणारी कायदेशीर कारवाई शिथिल होते का?

कायद्याची पायमल्ली: व्यावसायिक परवान्याच्या (Trade License) शर्तींचा भंग करून, कॅफेच्या नावाखाली पडदे, केबिन किंवा गुप्त खोल्या तयार करून अश्लील प्रकारांना प्रोत्साहन देणे हा स्वतंत्र गुन्हा आहे.

पब्लिक न्यूसन्स व अनधिकृत वापर: महाराष्ट्र पोलीस कायदा आणि महापालिका/नगरपरिषद नियमांनुसार, सार्वजनिक ठिकाणी किंवा व्यावसायिक जागेत सामाजिक नैतिकतेला बाधा आणणारे 'पब्लिक न्यूसन्स' निर्माण करणे हा थेट कायद्याचा भंग ठरतो. त्यामुळे तरुण सज्ञान असले तरी अवैध सोयी-सुविधा पुरवणाऱ्या चालकांचे गुन्हे ठरलेलेच आहेत.

लॉजिंगवर सील आणि गुन्हे, मग कॅफेंना वेगळा न्याय का?

काही दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये अशाच प्रकारे अश्लील व बेकायदेशीर प्रकार चालणाऱ्या लॉजिंगवर प्रशासनाने थेट 'सील' ठोकून मालक व चालकांवर गंभीर गुन्हे दाखल केले होते. मग श्रीरामपुरातील या कॅफे मालक आणि चालकांबाबत पोलीस प्रशासन मवाळ भूमिका का घेत आहे? त्यांना केवळ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०, ११७ अन्वये क्षुल्लक नोटीस देऊन सोडून देणे म्हणजेच कारवाईचा केवळ 'दिखावा' तर नाही ना?

तरुणाई आणि संस्कृती धोक्यात!

शालेय व महाविद्यालयीन वयातील तरुण पिढी या कॅफेंच्या जाळ्यात सहज बळी पडत आहे. अशा प्रकारांमुळे भारतीय संस्कृती, कौटुंबिक मूल्ये आणि शैक्षणिक वातावरण पार विस्कळीत होत चालले आहे.

पोलीस प्रशासनाला कडक इशारा:

केवळ नोटीसांचा कागदी सोपस्कार न उरकता, या कॅफेंचे परवाने रद्द करून त्यांना थेट 'सील' ठोकण्याची कठोर कारवाई पोलीस प्रशासन कधी करणार? अश्लीलतेला खतपाणी घालणाऱ्या मालक व चालकांवर कडक कायदेशीर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत. प्रशासन यावर खरोखरच ठोस पाऊल उचलणार की पुन्हा थातूरमातूर कारवाईवर बोळवण करणार, याकडे संपूर्ण श्रीरामपूरकरांचे लक्ष लागले आहे.


बेलापूर (प्रतिनिधी)-एस के सोमय्या प्राथमिक विद्या मंदिर या शाळेत इयत्ता चौथी मधील विद्यार्थी चिरंजीव साईश रामेश्वर ढोकणे राज्यस्तरीय शिष्यवृसाईशत्ती परीक्षेत विशेष नैपुण्य मिळविले आहे. श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार रामेश्वर ढोकणे यांचे चिरंजीव साईश याने राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत ३००पैकी २५६ गुण मिळवून जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत २७ वा क्रमांक मिळविला आहे. त्याचबरोबर राज्य राज्यस्तरीय ऑलिम्पियाड स्पर्धेत 200 पैकी 188 गुण मिळवून राज्यात सहावा व जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळवला. तसेच लक्षवेध राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये 300 पैकी 278 गुण मिळवून राज्यात सातवा व जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळविला. तसेच नॅशनल स्कॉलरशिप एक्झाम या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 200 पैकी 188 गुण मिळवून राज्यात नववा व जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळविला भारत टॅलेंट सर्च बी टी एस या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये 150 पैकी 130 गुण मिळवून राज्यात बारावा व जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळविला तसेच राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये 300 पैकी 264 गुण मिळवून राज्यात एकोणीस व जिल्ह्यात चौदावा क्रमांक मिळविला त्याला रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलिंग सदस्या मीनाताई जगधने, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सोनाली पैठणी, वर्ग शिक्षिका श्रीमती मेघा पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. साईश रामेश्वर ढोकणे यांच्या यशाबद्दल अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे , उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनवडे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, देविदास देसाई,दिलीप दायमा,ज्ञानेश्वर गवले , नवनाथ कुताळ सुहास शेलार आदि अभिनंदन केले आहे.
हेडलाईन करा पेपर साठी

श्रीरामपूर | प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून भारतीय पोलीस सेवेतील (IPS) २०१६ तुकडीचे कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज अधिकारी मुम्मका सुदर्शन यांनी पदभार स्वीकारताच जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेबाबत नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. परभणी, नागपूर आणि चंद्रपूर येथे त्यांनी केलेल्या कडक कारवाईमुळे अवैध धंद्यांवर लगाम बसल्याची उदाहरणे आहेत. मात्र, श्रीरामपूर शहरातील सध्याची परिस्थिती पाहता, येथील अवैध साम्राज्याला वेसण घालणे हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान आणि कसोटी ठरणार असल्याचे चित्र आहे.

​श्रीरामपूर शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर भंगार व्यवसायाच्या आडून वाहनांची बेकायदेशीर कत्तल (स्क्रॅपिंग) केली जात आहे. परिवहन विभागाची (RTO) कोणतीही अधिकृत परवानगी नसताना हा काळा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. केंद्र शासनाने जुनी आणि भंगार वाहने मोडीत काढण्यासाठी अधिकृत स्क्रॅप केंद्रे सुरू केली असताना, श्रीरामपुरातील हे अवैध व्यावसायिक सुट्या भागांच्या (Spare Parts) विक्रीसाठी आरटीओ कार्यालयाबद्दल चुकीची माहिती देऊन नागरिकांची उघड फसवणूक करत आहेत.

​त्याहून गंभीर बाब म्हणजे, या गाड्यांच्या पार्टसचा वापर करून दुसरीच बेकायदेशीर गाडी तयार केली जाते आणि ती विकली जाते. यामुळे गुन्हेगारांना पोलिसांपासून वाचणे सोपे जाते आणि गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांसमोर प्रचंड अडचणी निर्माण होतात.

​या अवैध स्क्रॅपिंग मार्केटमध्ये रात्रीच्या अंधारात कोट्यवधींची उलाढाल होत आहे. चांगल्या दर्जाची वाहने रात्रीतून भंगार करून, त्यांचे तुकडे करून गाड्या भरून रवाना केल्या जातात. यामध्ये अनेक गाड्या चोरीच्या, बँकांचे कर्ज बुडवून आणलेल्या किंवा गंभीर गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या असण्याची दाट शक्यता सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या प्रक्रियेतून थेट गुन्ह्यांचे पुरावेच नष्ट केले जात असल्याचा संशय नाकारता येत नाही.

​सर्वसामान्य नागरिकांना आणि डोळस जनतेला उघड्या डोळ्यांनी दिसणारा हा ‘गुन्हेगारीचा कारखाना’ प्रशिक्षण घेऊन आलेल्या आणि कायदा शिकलेल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना का दिसत नाही? हा आता संशोधनाचा विषय बनला आहे.

"स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (LCB) पथक शहरात नेमके काय करायला येते?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

​हा व्यवसाय काही प्रभावशाली घटकांच्या छत्रछायेखाली आणि प्रशासनाच्या आर्थिक फायद्यापोटी वतत असलेल्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे सुरू असल्याची चर्चा सध्या शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे. पोलीसच गुन्हेगारांना 'माल पसार' करण्यास मदत करतात की काय, अशी शंका घेण्यास वाव निर्माण झाला आहे.

नव्या सिंघम’कडून कारवाईची अपेक्षा!

​नवे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचा भूतकाळातील धडाका पाहता, ते श्रीरामपूरमधील या आंतरजिल्हा संघटित गुन्हेगारीचे नेटवर्क मोडून काढणार का? स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शहर-तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी त्यांच्या धाकाने तात्काळ ऍक्शन मोडमध्ये येणार की नेहमीप्रमाणे अर्थपूर्ण तडजोडी करून हे अवैध व्यवसाय असेच सर्रास सुरू राहणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

​धडाकेबाज एसपी मुम्मका सुदर्शन या 'भंगार माफियांच्या' मुसक्या आवळून श्रीरामपूरला गुन्हेगारीमुक्त करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



 

बेलापूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कर सहाय्यक पदाच्या संयुक्त मुख्य परीक्षेत बेलापूर येथील अक्षय सुरेश घाणे याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेत अक्षय घाणे याची कर सहाय्यक म्हणून निवड झाली आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेलापूर बुद्रुक येथे झाले. पुढे पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण जे. टी. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, बेलापूर येथे पूर्ण केले.

यानंतर त्याने विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे येथून बीटेक (इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग) पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवत मेहनतीच्या जोरावर हे यश मिळविले.

त्याच्या या यशाबद्दल जिल्हा नियोजन समितीचे माजी सभापती शरद नवले, बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, तसेच पत्रकार देविदास देसाई, गीरीश परांजपे, भास्करराव खंडागळे, मारुतराव राशिनकर, दिलीप दायमा, सुहास शेलार आदींनी अभिनंदन केले आहे.

अक्षय घाणेच्या या यशामुळे बेलापूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बेलापूर( प्रतिनिधी) -श्री साईबाबा  मंदिराच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त श्री साई पावन प्रतिष्ठान व साई सेवा समिती बेलापूर तसेच प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी ग्रामीण महाविद्यालय पी एम टी लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दंतचिकित्सा शिबिराचे तसेच सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष कैलास चायल यांनी दिली आहे. याबाबत माहिती देताना चायल यांनी सांगितले की श्रीरामपूर बेलापूर रोडवर असलेल्या श्री साईबाबा मंदिर  स्थापनेस दहा वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असून मंदिराच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे दहाव्या वर्धापन दिनानिमित्त मोफत दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले असून बुधवार दिनांक 15 एप्रिल रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत दंत तपासणी, एक्स-रे, दात साफ करणे, दाताची कवळी बसवणे, दात काढणे, रूट कॅनल करणे, दातामध्ये सिमेंट व चांदी भरणे आदी कामे विनामूल्य केली जाणार आहे . सकाळी दहा वाजता सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी आपली नावे नोंदवावी व साई सेवा कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले असून दुपारी बारा ते तीन महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आलेले आहे तरी नागरिकांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष कैलास चायल, सचिव राजेंद्र लखोटिया, सहसचिव राम बिलास झंवर, उपाध्यक्ष दीपक सिकची, संजय लड्डा, प्रशांत बिहानी, एडवोकेट व्ही एम  मालपाणी, प्रमोद कर्डिले, रमेश पवार, शशिकांत कापसे, गंगाधर पवार, सयाजी कान्हे आदींनी केले आहे

बेलापूरः(प्रतिनिधी)-बेलापूर बुll ग्रामपंचायत,संत सावता महाराज मंदिर,एम.पी. सोसायटी, झेंडा चौक आदिं ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.                                                     बेलापूर ग्रामपंचायतीच्या वतीने  म.फुले यांच्या प्रतिमेस माजी पंचायत समिती सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अरुण पाटील नाईक ,शिवाजी पाटील वाबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. संत सावता महाराज मंदिर येथे नियोजन समितीचे माजी सभापती शरद नवले व बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.बेलापुर विविध कार्यकारी संस्थेतही महात्मा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.म.फुले जयंतीचा मुख्य सोहळा छ.शिवाजी महाराज चौकात संपन्न झाला.येथे म.फुले यांचेसह डाॕ.बाबासाहेब आंबेडकर ,छञपती शाहू महाराज यांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले.
       याप्रसंगी क्रांतीसूर्य म.ज्योतिबा फुले जयंती निमित्त समता परिषद बेलापूर व क्रांती सुर्य महात्मा ज्योतिराव फुले उत्सव समीती व तरुण मंडळाच्या वतीने धार्मिक कार्यातील योगदानाबद्दल कै. गणपत (मामा) टेकाडे मंडळ , सामाजिक कार्याबद्दल माऊली वृद्धाश्रमाच्या सौ. कल्पना सुभाष वाघुंडे, 
, व्यसनमुक्ती व जनजागृती अभियानाबद्दल  नवनाथ कुताळ , सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल श्री. अशोक राशिनकर , पत्रकारिता व अंधश्रद्धा निर्मूलन कार्याबद्दल देविदास देसाई , शेतीविषयक उत्कृष्ट मार्गदर्शनाबद्दल .किशोर राऊत  , गोरक्षक समितीच्या उत्कृष्ट कार्याबद्दल श्री.ऋषिकेश भागवत
सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दलश्री.बागवान रफिक अध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल श्री.एकनाथ रोकडे 
,व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल श्री.कचरू तुकाराम शिंदे
    आदींना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या जयंती सोहळ्यास माजी जि. प. सदस्य शरद नवले, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अरुण पाटील नाईक, पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे, जेष्ठ पत्रकार मारुतराव राशिनकर,समता परिषदेचे सरचिटणीस प्रकाश कुर्हे, सावता महाराज मित्र मंडळाचे अध्यक्ष जालिंदर कुऱ्हे, माजी सरपंच भरत साळुंके, राजेंद्र सातभाई, बेलापूर सोसायटीचे चेअरमन अशोक कुऱ्हे, चंद्रकांत नाईक , पुरुषोत्तम भराटे, राजेंद्र टेकाडे , सोमनाथ शिरसाठ, संदीप कुऱ्हे, चेतन कुऱ्हे, सचिन मेहेत्रे, दत्ता कुऱ्हे, अमोल अनाप, बाळासाहेब लगे, एकनाथ नागले, विशाल मेहत्रे, विशाल लोंढे, सुरेश जाधव, सचिन नगरकर, वैभव कुऱ्हे, तुषार कुऱ्हे, कुणाल कुऱ्हे ,शरद पुजारी, शरद कुऱ्हे, शरद गायकवाड, अच्युत कुऱ्हे, बाळासाहेब लगे,सोमनाथ लगे, अरुण कुऱ्हे, देविदास घाणे, भाऊसाहेब तेलोरे, मधुकर अनाप ,मारुती राशिनकर, सुहास शेलार ,दिलीप दायमा आदीसह
विविध  संस्थाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य  सोसायटीचे पदाधिकारी, सावता मंडळाचे  व क्रांतीज्योती म.फुले जयंती उत्सव समितीचे सदस्य समता परिषदेचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण कु्र्हे यांनी केले

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहरातील एका मोबाईल दुकानात फोड करून चोरी करणाऱ्या दोन आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांनी अटक करत त्यांच्या ताब्यातून सुमारे २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १३ मार्च २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक ७ परिसरातील रहिवासी व मोबाईल दुकान व्यावसायिक राकेश काटारिया (वय ३२) यांच्या मोबाईल दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून विविध मोबाईल अ‍ॅक्सेसरीज चोरी केल्या होत्या. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १८९/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ व ३३१ (३)(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना तपास पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार १) बलदेव सिंग मंचर सिंग टाक (वय २०) व २) विशाल भरत बोरुडे (वय २५) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या मोबाईल अ‍ॅक्सेसरीज जप्त केल्या.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये विविध कंपनीचे मोबाईल चार्जर, इअरबड्स, हेडफोन, डेटा केबल, कार चार्जर, स्पीकर व इतर साहित्याचा समावेश असून एकूण २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे साहेब तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, जयदत्त भवर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोहेका / जयवंत तोडमल, पोहेकों/भागवत शिंदे, पोकों/संपत बडे, पोकॉ/अमोल पडोळे, पोकॉ/संभाजी खरात, पोकों/सागर बनसोडे, पोकों/मच्छिंद्र कातखडे, पोकों/अजित पटारे, पोकों/सचिन दुकळे, पोकॉ रामेश्वर तारडे, पोकों/अमोल गायकवाड, पोकों/पांडुरंग चौधरी, पोकों/गणेश तुपे यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साो. यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकों/जयवंत तोडमल हे करीत आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget