Articles by "विधानसभा"

मुंबई : देशभक्ती कोणत्या एका जातीची किंवा एका पक्षाची नाही. आम्ही सर्व देशभक्त आहोत, आमची देशभक्ती तुमच्यापेक्षा अधिक आहे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला. सीएए, एनआरसी, एनपीआरविरोधात जमात ए इस्लामीच्या वतीने चर्चासत्र मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, पीयूसीएलचे अध्यक्ष मिहीर देसाई, एपीसीआरचे अध्यक्ष युसूफ मुछला आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी राऊत म्हणाले की, देशात भीती पसरवली जात आहे, परंतु कोणालाही घाबरून जाण्याची गरज नाही. घाबरविणारे येतात आणि जातात. हा देशाचा इतिहास आहे. महाराष्ट्राने भीती संपविण्याचे काम केले आहे, देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. ते पुढे म्हणाले की, देशातील विद्यार्थ्यांवर बंदूक रोखली जात आहे, हल्ले होत आहेत, असे असताना पंतप्रधान विद्यार्थ्यांनी केवळ शिकण्याचे काम करावे, असे सांगत आहेत. परंतु विद्यार्थ्यांवर हल्ला म्हणजे देशावर हल्ला असून याचा अर्थ लोकशाही धोक्यात आहे. तसेच स्वातंत्र्य लढ्यात विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे योगदान होते, त्याच्यामुळे परिवर्तन घडले, असेही ते म्हणाले. आपल्याला सर्वांना मिळून देश वाचवायचा आहे, सर्वांनी याविरोधात एकत्र उभे राहिले पाहिजे, असे सांगितले.या वेळी कोळसे पाटील म्हणाले की, कोणताही कायदा आणताना सहजतेने त्याची अंमलबजावणी होईल असा कायदा असायला हवा. ज्या कायद्याची अंमलबजावणी शक्य नाही ते आपल्यावर लादले जात आहेत. हे २०२४ निवडणुकीसाठी सरकारचे षड्यंत्र आहे. हिंदू आणि मुस्लीम या दोघांचेही रक्त एकच असून सर्वांनी याविरोधात रस्त्यावर उतरा, असे आवाहन त्यांनी केले. तर सीएए, एनआरसी, एनपीआर हे कायदे गरिबांच्या विरोधात आहेत. धर्मावर आधारित नागरिकत्व देऊन सरकार मतपेटीचे राजकारण करत आहे, असे मिहीर देसाई म्हणाले.>तीस टक्के हिंदूंना फटकासीएए, एनआरसी, एनपीआरमुळे केवळ मुस्लिमांना नाही, तर सर्वांना फटका बसणार आहे. कित्येक लोकांकडे जुने पुरावे नाहीत. देशातील ३० टक्के हिंदूंचे यामुळे नुकसान होईल, असे संजय राऊत यांनी सांगितले.

अहमदनगर प्रतिनिधी :- मुंबई - 2014 विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि त्यानंतर दिग्गज 
नेत्यांचे पक्षांतर  यामुळे काँग्रेस पक्ष कमकुवत झाला होता. त्यातच लोकसभा निवडणुकीत राज्यात केवळ एक खासदार निवडून आल्यानंतर काँग्रेसची अवस्था आणखीच बिकट झाली होती. या संकटातून बाहेर पडत, काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात सत्तेत सामील होण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे नवीन प्रदेशाध्यक्ष राज्य काँग्रेससाठी लक्की ठरल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्य काँग्रेसची जबाबदारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे होती. या निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात दारुण पराभव पत्करावा लागला. तर खुद्द अशोक चव्हाण आपली जागा वाचवू शकले नव्हतं. त्यानंतर चव्हाण यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला .लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील देखील भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे एकाचवेळी विरोधीपक्षनेता आणि प्रदेशाध्यक्षपद रिक्त झाले होते. विरोधीपक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार तर प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर मतचाचण्यांमध्येही काँग्रेसला 20 पेक्षा कमी जागा दाखवण्यात आल्या होत्या. अशा बिकट स्थितीत थोरात यांनी काँग्रेसला 2014 एवढ्याच जागा जिंकून दिल्या. यामध्ये शरद पवारांचा झंझावात महत्त्वाचा ठरला. तर यश हे थोरातांच्या पारड्यात पडले हे देखील तेवढंच खर आहे. दरम्यान शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेल्या दुराव्यामुळे विरोधात बसण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेची लॉटरी लागली. त्यामुळे काँग्रेससाठी प्रदेशाध्यक्ष थोरात लक्की ठरले असंच म्हणाव लागत आहे.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नाही. भाजपाने चर्चेची दारं खुली असल्याचं सांगितलं असलं तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, कोणताही प्रस्ताव आला नाही अन् पाठवणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा -शिवसेनेत तणाव वाढल्याचं दिसून येत आहे. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, काहीही झालं तरी मुख्यमंत्री शिवसेनेचा बनवा ही जनतेची मागणी आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जिथे जातील तिथे लोकं शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवा हेच मागणी करत आहे. शेतकरी आशेने बघत आहे. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदावर सहमती झाली होती त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचा या मागणीवर ठाम असल्याचं त्यांनी सांगितले. तसेच कोणताही प्रस्ताव आला नाही किंवा जाणार नाही. जे ठरलं आहे ते करा. राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं षडयंत्र कोणी रचत असेल तर जनादेशाचा अनादर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यावर अन्याय असेल असंही शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे. दरम्यान, भाजपाने मंगळवारी कोअर कमिटीची बैठक घेतली या बैठकीनंतर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, आमच्यासाठी चर्चेचे दरवाजे खुले आहेत. आम्ही कधीही चर्चेसाठी नकार दिला नाही. शिवसेनेकडूनच चर्चा बंद करण्यात आली आहे. सत्तास्थापनेच्या तिढ्यात दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदावर ठाम आहेत. भाजपाच्या एका मंत्र्याने सांगितले की, मुख्यमंत्रीपदावर कोणतीही चर्चा होणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच राज्यात सरकार स्थापन होईल. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील असं सांगितले आहे. तसेच भाजपाकडून प्लॅन बीदेखील तयार करण्यात येत आहे. विधानसभेत भाजपाचे १०५ आमदार निवडून आले आहेत तर काही अपक्षांनी भाजपाला पाठिंबा दिल्याने ही संख्या ११८ पर्यंत पोहचली आहे. जर शिवसेनासोबत आली नाही तरी भाजपा बहुमत सिद्ध करु शकते असा दावा भाजपाच्या एका मंत्र्याने केला आहे. तसेच शिवसेना आघाडीच्या पाठिंब्याने सरकार बनवेल हा अंदाज या ज्येष्ठ मंत्र्याने फेटाळून लावला आहे.

बुलडाणा - 22 ऑक्टोबर
मतदान करतांनाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले हे कृत्य आपल्या गोपनीय मतदानाचा भंग आहे व हे गैर कृत्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल कण्यात यावा अश्या आशयची बातमी 21 ऑक्टोबर रोजी "बिनदास न्यूज़" कडून येताच प्रशासन सतर्क झाला व या प्रकारणी अज्ञात व्यक्तिवर बुलडाणा शहर ठाण्यात गुन्हा दाखल कण्यात आला आहे.
       21 ऑक्टोबर रोजी राज्यभरातील 288 विधानसभा मतदार संघात सकाळी 7 वाजे पासून मतदान प्रक्रिया सुरु झाली.दरम्यान बुलडाणा- 22 मतदार संघात मतदानाच्या दिवशी बुलडाणा विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावरील मतदान करतांनाचे काही व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल झाले व यात काही व्हिडीओत काँग्रेस उमेदवाराला, बसपा उमेदवाराला तर शिवसेना उमेदवाराला मत दिल्याचं दिसते.
       निवडणुकीत मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास निवडणूक आयोगाकडून बंदी असतांना ही काही मतदारांनी आदेशाला खो दिला आहे.अशे व्हिडीओ समोर आल्याने खरंच मतदान केंद्रावर मतदारांची मोबाईल तपासणी झाली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.या प्रकरणी "बिनदास न्यूज़" ने बातमीच्या माध्यमाने या गंभीर मुद्द्यावर प्रशानाचे लक्ष वेधले असता प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.बुलढाणा-22 निवडणूक निर्णय अधिकारी राजेश्वर हांडे यांच्या निर्देशावर नायब तहसीलदार अमरसिंह वामन पवार यांनी आज बुलडाणा शहर ठाण्यात जावून तक्रार दिली त्यात नमूद केले की अज्ञात मतदारने मतदानाचा हक्क गोपनिय पध्दतीने बजावण्या ऐवजी जाहिर मतदान करण्याचा प्रकार उघड करुण आदर्श आचार सहितेचा भंग केल्यामुळे अज्ञात आरोपी विरुद्ध लोकप्रतिनिधि कायदा 1951 आणि 1988 चे कलम 128 व भादवी चे कलम 188 अन्वय गुन्हा दाखल कण्यात आला आहे.पुढील तपास शहर ठानेदार शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनात पीएसआई करुनाशिल तायडे करीत आहे.

बुलडाणा - 21 ऑक्टोबर
महाराष्ट्रात विधानसभा साठी होत असलेल्या निवडणुकीत मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास निवडणूक आयोगाकडून बंदी असतांना ही मतदान करतांनाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.या वरुण सिद्ध होते की मतदान केंद्रवार कार्यरत पुलिंग पार्टी किती सतर्क होते.
      आज 21 ऑक्टोबर रोजी राज्यभरातील 288 विधानसभा मतदार संघासाठी सकाळी 7 वाजे पासून मतदान प्रक्रिया सुरु झाली.बुलडाणा- 22 मतदार संघात एकूण 7 उमेदवार मैदानात आहे त्यापैकी कांग्रेसचे विद्यमान आमदार हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना कडून संजय गायकवाड तर वंचित बहुजन आघाडीचे विजयराज शिंदे यांच्यात खरी लडत मानल्या जात आहे.आज दुपार नंतर बुलडाणा विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावरील मतदान करतांनाचे काही व्हिडीओ सोशल मीडिया वर समोर आले व यातील 5 व्हिडीओत काँग्रेस उमेदवाराला मत दिल्याचं स्पष्ट दिसून येताय तर एका व्हिडिओत बसपा उमेदवाराला मत दिल्याचं दिसते. अशे व्हिडीओ समोर आल्याने खरंच मतदान केंद्रावर मतदारांची मोबाईल तपासणी झाली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे आणि असे गैरकृत्य करणाऱ्यावर आता निवडणूक विभाग काय कार्यवाही करणार? हे बघावे लागेल.

मुंबई : मराठी लोकवस्ती असल्याने माहीम मतदारसंघात शिवसेना आणि मनसेत रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे टक्कर देणार आहेत. इंजीन धडधडत राहण्यासाठी येथे संधी असल्याने मनसेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर बालेकिल्ल्यात भगवा फडकत ठेवण्यासाठी शिवसेनेची कसोटी लागणार आहे.२००९ विधानसभा निवडणुकीत मनसेचे नितीन सरदेसाई येथे आमदारपदी निवडून आले. त्या वेळेस शिवसेनेचे उमेदवार आदेश बांदेकर तिसऱ्या क्रमांकावर होते. २०१४ मध्ये काँग्रेसवारी करून पक्षात परतलेले सदा सरवणकर येथे आमदारपदी निवडून आले. मनसेला दुसºया क्रमांकाची मते मिळाली होती. या मतदारसंघात अवघे चार उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसचे उमेदवार प्रवीण नाईक आणि अपक्ष उमेदवार मोहनीश राऊळ मैदानात असले तरी खरी लढत सरवणकर आणि देशपांडे यांच्यात रंगणार आहे.जमेच्या बाजूविद्यमान आमदार असून मतदारसंघात भक्कम बांधणी. २००९ मध्ये काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवूनही शिवसेनेपेक्षा अधिक मते मिळवली.लोकसभेत शिवसेनेच्या उमेदवाराला सर्वाधिक म्हणजे ९१ हजार ६३५ मते माहीम मतदारसंघातून मिळाली.मनसेच्या खळ्ळ्खट्याक आंदोलनामुळे चर्चेतला चेहरा. तरुण मतांसाठी सेलीब्रिटींची फौज प्रचारासाठी मैदानात. सोशल मीडियाचा प्रभावी वापर, दांडगा जनसंपर्क. २०१४ विधानसभा निवडणुकीत मनसेची हवा सरल्यानंतरही नितीन सरदेसाई यांना दुसºया क्रमांकाची मते होती.उणे बाजूमनसे स्पर्धेत असल्याने मराठी मतांची विभागणी होणार आहे़ अन्य ठिकाणी मनसेची पिछेहाट झाली तरी येथे समर्थकांची संख्या मोठी आहे. मराठी अस्मिता हा मुद्दा चर्चेत राहण्याची शक्यता. पार्किंगची समस्या आणि जुन्या इमारतींचा प्रश्न रखडल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.शिवसेना -भाजप कार्यकर्त्यांची तुलनेने मोठी फौज, महापालिका निवडणुकीत माहीम मदारसंघात पूर्ण सफाया, लोकसभा निवडणुकीत हवा निर्माण करूनही मनसेचा प्रभाव दिसून आला नाही. युतीचा प्रभाव लोकसभा निवडणुकीत दिसून आला, तीच हवा कायम राहिल्यास मनसेला मते फिरवणे अवघड जाईल.

अहमदनगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त जिल्ह्यातील कर्मचार्‍यांचे 13 ऑक्टोबरला दुसरे प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणास 16 हजार 485 कर्मचार्‍यांपैकी 253 गैरहजर कर्मचार्‍यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रशिक्षणात 16 हजार 171 कर्मचारी सहभागी झाले होते.जिल्ह्यातील 12 मतदारसंघनिहाय निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचारी, प्रशिक्षणाला उपस्थित कर्मचारी व अनुपस्थित कर्मचार्‍यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. अकोले मतदारसंघातील दुसर्‍या प्रशिक्षणासाठी 1 हजार 402 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 375 कर्मचारी सहभागी झाले तर 27 कर्मचारी गैरहजर होते. संगमनेरमध्ये 1 हजार 224 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 216 कर्मचारी सहभागी झाले होते. 8 कर्मचारी गैरहजर होते. शिर्डी मतदारसंघात 1 हजार 200 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1176 कर्मचारी सहभागी झाले होते. 19 कर्मचारी गैरहजर होते.कोपरगाव मतदारसंघात 1 हजार 194 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते पैकी 1 हजार 183 कर्मचारी सहभागी झाले तर 11 कर्मचारी गैरहजर होते. श्रीरामपूरमध्ये 1364 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 343 कर्मचारी सहभागी झाले होते. 21 कर्मचारी गैरहजर होते. नेवासा मतदारसंघात 1 हजार 184 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 172 कर्मचारी सहभागी झाले तर 12 कर्मचारी गैरहजर होते. पाथर्डी-शेवगावमध्ये 1592 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1555 कर्मचारी सहभागी झाले होते. 37 कर्मचारी गैरहजर होते. राहूरीमध्ये 943 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 905 कर्मचारी सहभागी झाले, तर प्रशिक्षणाला 38 कर्मचारी गैरहजर होते.पारनेर मतदारसंघात 2 हजार 38 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1994 कर्मचारी सहभागी झाले होते. 22 कर्मचारी गैरहजर होते. नगर शहर मतदारसंघात 1 हजार 272 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1254 कर्मचारी सहभागी झाले होते. 18 कर्मचारी गैरहजर होते. श्रीगोंदा मतदारसंघात 1 हजार 516 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. पैकी 1 हजार 485 कर्मचारी सहभागी झाले होते. 28 कर्मचारी गैरहजर होते. कर्जत-जामखेडमध्ये 1 हजार 556 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 513 सहभागी झाले होते. प्रशिक्षणाला 12 कर्मचारी गैरहजर होते.

नेवासा (प्रतिनिधी)-  नगर- औरंगाबाद महामार्गावर पांढरीपूल येथे स्थिर सर्वेक्षण पथक व नाकाबंदी पथकाने ब्रिझा या वाहनातून 42 लाख 20 हजार रुपये जप्त केले.ही रक्कम बँक ऑफ बडोदाची असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर रक्कम बँकेच्या अधिकार्‍यांकडे सुपूर्त करण्यात आली.सोमवारी दुपारी स्थिर सर्वेक्षण पथक व नाकाबंदी (एसएसटी) चे एस. एल. खेले या पथक प्रमुखांसह पोलीस कर्मचारी जी. के. अढागळे, वाय. एम. झिने, बी. एन. गडाख हे पथक पांढरीपूल येथून ये-जा करणार्‍या वाहनांची तपासणी करण्यासाठी कार्यरत असताना दुपारी नगरहून नेवासा फाट्याकडे जात असलेली ब्रिझा गाडी (क्र. एमएच 17 बीएक्स 1117) हे वाहन पथकाने थांबविले. या वाहनाची तपासणी करण्यात आल्यानंतर बॅगमध्ये तसेच पोत्यामध्ये एकूण शंभर, पन्नास, पाचशे, दोन हजार अशा विविध मूल्यांच्या नोटा आढळल्या. वाहनातील संजय बबन डोंगरे यांच्याकडून ही रोकड जप्त केल्यानंतर पैसे जास्त असल्यामुळे सर्व पैसे नेवासा तहसीलमधील आचारसंहिता कक्षात आणण्यात आले. नेवासा येथील स्टेट बँकेतील पैसे मोजण्याचे मशीन आणि कर्मचारी तहसीलमध्ये आल्यावर जप्त केलेली रक्कम सर्वांसमक्ष मोजण्यात आली. ब्रिझामध्ये असलेले संजय बबन डोंगरे हे बँक बडोदाचे शाखाधिकारी आहेत. ही रक्कम नगर येथील बँक ऑफ बडोदा सावेडी शाखेतून भेंडा शाखेत नेली जात होती. रक्कमेमध्ये पाचशे, शंभर, पन्नास व दोन हजाराच्या नोटा होत्या. नगर तसेच भेंडा येथील अधिकारी आल्यानंतर रकमेची शहानिशा केल्यावर ही रक्कम बँकेच्या अधिकार्‍यांकडे सुपूर्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी शाहूराज मोरे व सहायक निवडणूक अधिकारी समीर शेख यांनी दिली.

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील यांच्याकडे 31 कोटी एवढी संपत्ती असून ते या मतदारसंघातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत. त्यानंतर सुरेश थोरात यांच्या नावावर एक कोटी आठ लाख 51 हजार 500 एवढी संपत्ती आहे तर शेखर बोर्‍हाडे यांच्या नावावर एक कोटी 65 लाख 62 हजार रुपये एवढी संपत्ती आहे.भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील जंगम संपत्ती चार कोटी 69 लाख 762 रुपये, स्थावर संपत्ती 51 लाख 13 हजार 200 रुपये एवढी आहे. त्यांच्याकडे रोख रक्कम एक लाख 49 हजार 789 रुपये, बँक खाती दोन कोटी 37 लाख 27 हजार 856 रुपये, शेअर्स बंदपत्रे यात एक कोटी 74 लाख 954 रुपये, पोस्ट खात्यात 26 लाख 65 हजार 731 रुपये. त्यांच्याकडे 550 ग्रॅम सोने चांदी असून त्याची किंमत 20 लाख 13 हजार रुपये, अन्य मालमत्ता 6 लाख 24 हजार 362 रुपये आहे. त्यांच्या नावावर कोणत्याही प्रकारचे वाहन नसून त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. त्यांच्या पत्नी शालिनीताई विखे यांच्या नावे पाच कोटी 14 लाख 98 हजार 969 रुपये आहे. त्यांच्याकडे 1150 ग्रॅम सोने-चांदी असून त्याची रक्कम 42 लाख 57 हजार 400 रुपये आहे. त्यांच्याकडे दोन कोटी 42 लाख 79 हजार 107 रुपये बँक खाती असून रोख रक्कम 67 हजार 91 रुपये आहे. शेअर्स एक कोटी 10 लाख 52 हजार 31 रुपये एवढी संपत्ती आहे.
काँग्रेसचे उमेदवार सुरेश जगन्नाथ थोरात यांच्या नावे एक कोटी आठ लाख 51 हजार 500 रुपये एवढी संपत्ती आहे. त्यात रोख रक्कम 25 हजार रुपये असून बँकेत 44 हजार 58 रुपये आहेत. सोसायटी ठेवी तीन लाख 27 हजार 576 रुपये व त्यांच्याकडे सोने-चांदी तीन लाख 12 हजार रुपये आहे. त्यांच्याकडे मोटारसायकल, टाटा सफारी कार, टाटा एलपी कार अशी एकूण 13 लाख 37 हजार रुपयाची वाहने आहेत. त्यांच्या नावे 65 लाख 15 हजार 91 रुपये कर्ज आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे 10 हजार रुपये रोख, 14 हजार 482 बँक खाती, सोने-चांदी 6 लाख 24 हजार असे एकूण त्यांच्याकडे 7 लाख 60 हजार 547 रुपये एवढी संपत्ती असून त्यांच्या नावे 10 लाख 48 हजार 909 रुपये एवढे कर्ज आहे.काँग्रेसचे दुसरे उमेदवार शेखर बोर्‍हाडे यांच्याकडे एक कोटी 65 लाख 62 हजार रुपये एवढी संपत्ती असून त्यांच्याकडे रोख चार लाख 90 हजार, ठेवी दोन लाख रुपये, एकूण शेअर्स तीन लाख 76 हजार 541 रुपये, स्थावर जमिनी सात लाख 50 हजार, सोने 30 हजार रुपये, दोन गाड्या 11 लाख 40 हजार रुपये एवढी संपत्ती आहे. त्यांच्या नावे 41 लाख 75 हजार एवढे कर्ज आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे रोख एक लाख 50 हजार, सेव्हींग 4 हजार, ठेवी दो लाख, सोने 4 लाख, शेअर्स 74 हजार 240 अशी एकूण 1 कोटी 97 लाख 37 हजार 500 रुपये एवढी संपत्ती आहे तर त्यांच्या नावे 42 लाख 73 हजार रुपये कर्ज आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात 31 उमेदवारांनी 44 अर्ज दाखल केले होते. काल अर्ज छाननीत चार जणांचे अर्ज एबी फॉर्म नसल्याने अवैध ठरविण्यात आले. दरम्यान अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या डॉ. चेतन सदाशिव लोखंडे यांनी आपला अर्ज मागे घेण्यासाठी तो दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिली.विधानसभा निवडणुकीसाठी भाऊसाहेब पगारे यांचा (एमआयएम), अशोक बागुल (काँग्रेस), चरण दादा चव्हाण (वंचीत बहुजन आघाडी), रवी डोळस (काँग्रेस) पक्षाकडून अर्ज भरले होते. मात्र एबी फॉर्म नसल्याने नामंजूर झाले. तर डॉ. सुधीर क्षीरसागर यांचाही अर्ज वंचित बहुजन आघाडी कडून एबी फॉर्म न आल्याने अवैध ठरवून अपक्ष म्हणून अर्ज मंजूर झाला आहे. सना मोहंमद अली सय्यद या अपक्ष उमेदवाराच्या अर्जालाही त्या अनुसूचित जाती प्रवर्गात कशा? अशी हरकत घेण्यात आली, मात्र त्यांनी माहेरच्या नावाची अनुसूचित जातीत असल्याचे पुरावे सादर केल्याने हा अर्ज मंजूर करण्यात आला.भाऊसाहेब कांबळे (शिवसेना), लहू कानडे (काँग्रेस), भाऊसाहेब पगारे (मनसे व अपक्ष), सुधाकर भोसले (बहुजन मुक्ती पार्टी), सुरेश जगधने (एमआयएम), गोविंद अमोलिक (बहुजन समाज पक्ष व अपक्ष), अशोकराव आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी) तर इतर अपक्ष म्हणून अशोक बागुल, डॉ. सुधीर क्षीरसागर, चरण दादा त्रिभुवन, अशोक जगधने, रामचंद्र जाधव, सुधाकर सहाणे, भागचंद नवगिरे, दीपक चरण चव्हाण, प्रणिती चव्हाण, कडू शेलार, मिस्टर शेलार, मंदाबाई भाऊसाहेब कांबळे, योगेश जाधव, भारत तुपे, प्रतापसिंग देवरे, भिकाजी रणदिवे, रवी डोळस, सना मोहंमद अली सय्यद, युवराज बागुल, सुरेंद्र थोरात, अ‍ॅड. स्वप्नील जाधव, भाऊसाहेब डोळस, सुभाष तोरणे, विजय खाजेकर या उमेदवारांचे अपक्ष अर्ज मंजूर झाले आहेत.दरम्यान, अपक्ष अर्ज दाखल केलेले शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव डॉ. चेतन लोखंडे यांनी आपला अर्ज मागे घेण्यासाठीच तो निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दाखल केला आहे. शिवसेनेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बंडखोरांना दोन दिवसांत अर्ज माघारी घेतले नाही तर कठोर कारवाईचा इशारा दिला होता

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- 221 नेवासा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अर्जाच्या छाननीत काल तीन अर्ज बाद झाल्याने निवडणूक रिंगणात 20 उमेदवारांचे अर्ज उरले आहेत. विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह एका अपक्ष उमेदवाराच्या अर्जावर क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांनी घेतलेल्या हरकती निवडणूक अधिकार्‍यांनी फेटाळून लावल्या.याबाबत माहिती अशी की, नेवासा विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्जांची छाननी काल झाली. त्यात अपक्ष बबन बाळाजी कनगरे, सौ. आशाताई बाळासाहेब मुरकुटे व बाबासाहेब सोना खरात या तिघांचे अर्ज अवैध ठरले. आशाताई मुरकुटे व बाबासाहेब थोरात यांनी शपथपत्र जोडले नव्हते. त्यामुळे अर्ज बाद ठरले. बबन कनगरे यांच्या अर्जावर आवश्यक संख्येने सूचकांच्या सह्या नव्हत्या. भाजपचे उमेदवार आमदार बाळासाहेब मुरकुटे व अपक्ष कारभारी विष्णू उदागे या दोघांच्या अर्जावर उमेदवार सुनीता शंकरराव गडाख व शंकरराव गडाख यांच्यातर्फे हरकत घेण्यात आली.बाळासाहेब मुरकुटे यांच्या अर्जावर घेतलेल्या हरकतीत त्यांनी त्यांच्या अर्जात शपथपत्रातील परिच्छेद 5(1) मध्ये आवश्यक ती खूण केलेली नाही. परिच्छेद 6(अ) येथे आवश्यक ती माहिती दिलेली नाही. परिच्छेद 11 मधील परिच्छेद 8 ब (1) मध्ये स्वसंपादित मालमत्तेची खरेदी किंमत नमूद करणे आवश्यक होते मात्र ते ‘निरंक’ नमूद केलेले आहे. 8ब (3) मध्ये चालू बाजारभाव नमूद न करता ‘निरंक’ म्हटले असल्याने सदर रकान्यांमध्ये दिलेली माहिती चुकीची आहे. शपथपत्रात त्रुटी असल्याने अर्ज रद्द करावा असे म्हटले होते. या आक्षेपांवर म्हणणे मांडण्याची संधी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिल्यावर म्हणणे सादर करण्यात आले.त्यावर शपथपत्रातील परिच्छेद 5, 6, 6अ मध्ये निरंक किंवा लागू नाही असा उल्लेख आवश्यकतेनुसार केलेला आहे. परिच्छेद क्र. 11 व त्यातील 8 ब नुसार स्वसंपादित स्थावर मालमत्तेची खरेदी किंमत नमूद करणे आवश्यक आहे. तथापि उमेदवाराने स्वसंपादित कोणतीही स्थावर मालमत्ता खरेदी केलेली नसल्याने त्यापुढे ‘निरंक’ लिहिलेले आहे. सदर मालमत्ता आज रोज उमेदवाराच्या मालकीची नसून अद्याप ती त्यांच्या मालकीची झालेली नाही. त्याबाबत कायदेशीर अडचण असल्यामुळे अद्याप मालकी अद्याप मिळालेली नाही. आवश्यकतेनुसार ‘निरंक’ नमूद केले असल्यामुळे सदर हरकती फेटाळ्यावर असे म्हणणे मांडण्यात आले. त्यावर मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी शाहुराज मोरे यांनी निर्णय दिला की, शपथपत्रामध्ये रकाने रिक्त न सोडता तिथे ‘लागू नाही’, ‘निरंक’, ‘माहिती नाही’ असे शब्द लिहिणे अपेक्षित आहे.त्यानुसार उमेदवाराने सादर केलेल्या शपथपत्रांमध्ये कोणताही रकाना रिक्त न सोडता निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शब्द नमूद केल्याचे दिसून येते. अधिनियमाच्या कलम 36 नुसार छाननी करताना शपथपत्रांमधील माहितीच्या सत्यतेबाबत तपासणी करणे अपेक्षित नसून केवळ नमुना 26 मधील शपथपत्रात कोणतेही रकाने रिक्त न ठेवल्याची खात्री करणे आवश्यक आहे. सदरच्या शपथपत्रामध्ये कोणाही रकाना रिकामा सोडलेला नसल्याने शपथपत्र अधिनियमाच्या कलम 33 ए व निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार परिपूर्ण दिसून येत असल्याने अधिनियमाच्या कलम 36(4) नुसार हरकती फेटाळण्यात येत असून नामनिर्देशनपत्र वैध ठरण्यित येत असल्याचे आदेशात म्हटले.आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अर्ज सादर केलेले उमेदवार कारभारी विष्णू उदागे यांच्या अर्जावर त्यांनी नामनिर्देशनपत्रात शपथपत्रातील 6(एक) येथील भाग कोरा ठेवला तसेच निवडणुकीचे वर्ष नमूद केले नाही या त्रुटीमुळे अर्ज फेटाळावा अशी हरकत घेण्यात आली होती. त्यावर निकाल देताना निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले की, कोणातही रकाना रिक्त सोडलेला नाही तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या निर्देश पुस्तिकेमध्ये परिच्छेद 6.9.4 व 6.9.5 मध्ये नामनिर्देशनपत्रामध्ये निवडणुकीचे वर्ष चुकीचे नमूद केले किंवा नमूद केले नाही या कारणास्तव नामनिर्देशनपत्र फेटाळणे असयुक्तिक ठरेल असे नमूद केले आहे. त्यामुळे अधिनियमाच्या कलम 36(4) नुसार हरकती फेटाळण्यात येत असून नामनिर्देशनपत्र वैध ठरविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. निवडणूक अर्जावरील हरकती व त्यावर उत्तर यासाठी बराच कालावधी लागल्याने सायंकाळी उशिरा संपूर्ण अर्जांची छाननी पूर्ण झाली. अर्जावरील हरकतींमुळे तहसील कार्यालय परिसरात उमेदवारांच्या समर्थकांची गर्दी झाली होती.
अर्ज वैध ठरलेले उमेदवार
राजकीय पक्षांचे उमेदवार (7)-बाळासाहेब ऊर्फ दादासाहेब दामोदर मुरकुटे (भाजप), शंकरराव यशवंतराव गडाख (क्रांतिकारी शेतकरी पक्ष), शशिकांत भागवत मतकर (वंचित बहुजन आघाडी), सचिन रामदास गव्हाणे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), विश्वास पौलस वैरागर (बहुजन समाज पार्टी) कारभारी रामचंद्र धाडगे (राष्ट्रीय संत संदेश पार्टी), कारभारी विष्णू उदागे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया).अपक्ष (13)- सुनीता शंकरराव गडाख, रामनाथ गहिनीनाथ गोल्हार, अशोकराव नामदेव कोळेकर, अजय अशोकराव कोळेकर, विठ्ठल विष्णू देशमुख, भाऊसाहेब शिवराम जगदाळे, मच्छिंद्र देवराव मुंगसे, राजूबाई कल्याण भोसले, राजेंद्र एकनाथ निंबाळकर, रामदास मारुती नजन, सौ. लक्ष्मी तुकाराम गडाख, विशाल वसंतराव गडाख, ज्ञानदेव कारभारी पाडळे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget