Articles by "रमजानुल मुबारक लेख"

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याचे सलग पाचव्या वर्षी पूर्ण महिन्याचे रोजे उपवास करून येथील लताबाई पोपटराव वाघचौरे(औटी मॅडम) यांनी धार्मिक सलोख्याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे त्यांच्या या उपक्रमाचे समाजातील सर्व थरातून स्वागत होत असून त्यांचे अभिनंदन होत आहे.सौ.लताबाई वाघचौरे या नगरपालिका शाळेच्या सेवानिवृत्त पदवीधर शिक्षिका आहेत.आज त्यांचे वय 60 वर्षे आहे. कोरोना काळात 2020 पासून दरवर्षी त्यांनी पवित्र रमजान महिन्याचे महिनाभराचे पूर्ण रोजे करण्यास सुरुवात केली आणि यावर्षी सलग पाचव्या वर्षी हे रोजे पूर्ण केले आहेत.याबाबत बोलताना सौ. वाघचौरे यांनी सांगितले कि रमजान महिन्यात रोजी धरण्याची परंपरा आमच्या कुटुंबात फार पूर्वीपासून आहे.माझी आजी सासू तसेच सासूबाई या सुद्धा रमजानचे रोजे घरीच होत्या सोनगाव येथील जी मशिद आहे तेथे माझे सासरे व सासू यांनी नवस केला होता त्यानंतर त्यांना पाच मुले झाली.त्यानंतर माझ्या सासूबाईंनी हे व्रत चालू ठेवले.त्यांना पाहून मी सुद्धा मला मुलगा झाला तर मी रोजे ठेवीन असा नवस केला.1992 साली मला पुत्रप्राप्ती झाली त्यानंतर मी 1994 पासून रोजी धरण्यास सुरुवात केली. सुरुवातीची 28 वर्षे मी दोन ते दहा पर्यंत रोजी दरवर्षी करीत होते परंतु कोरोना काळात सन 2020 पासून मी पूर्ण महिन्याचे रोजे करण्यास सुरुवात केली आणि आता यावर्षी सलग पाचव्या वर्षी मी रमजान चे पूर्ण महिन्याभराचे रोजे पूर्ण केले आहेत.रोजे पूर्ण केल्याने शरीर शुद्ध होते तसेच वर्षभर प्रसन्न वाटते.मला अस्थम्याचा त्रास होता परंतु रोजचे धरणामुळे तो त्रास सुद्धा गेला.मला चैतन्य वाटते शिवाय देवावर असलेल्या आढळ श्रद्धेमुळे आज वयाच्या साठाव्या वर्षी सुद्धा कडक उन्हाळ्यातही मला कसलाही त्रास झाला नाही.अल्लाह च्या कृपेने दरवर्षी माझी मनोकामना पूर्ण होते. यावर्षी माझ्या सुनबाई डॉक्टर झाल्या तसेच माझ्या मुलाला व मुलीलाही मुलगा झाला.मी खूप आनंदी आहे अल्लाहने सर्वांना आनंदी ठेवावे हीच माझी प्रार्थना आहे.माझ्या या संकल्पपूर्तीमध्ये माझे पती पोपटराव वाकचौरे मुलगा डॉक्टर गणेश सून डॉक्टर रचना यांचे खूप सहकार्य लाभले त्यांनी रोजी धरण्यासाठी मला प्रोत्साहन दिले.या कामे माझे बंधू सलीमखान पठाण यांचे सुद्धा मला मोलाचे मार्गदर्शन मिळाले असेही त्यांनी सांगितले.सौ लताबाई वाघचौरे यांनी रमजानचे रोजे पूर्ण करून हिंदू मुस्लिम तालुक्याचे उत्तम उदाहरण समाजासमोर घालून दिले आहे त्याबद्दल त्यांचे समाजातील सर्व थरातून अभिनंदन होत आहे.

 रमजानुल मुबारक मालिका २०२४ 

इस्लाम समजून घेताना 

रोजा नंबर:-  ३० 

बुधवार दिनांक १०-०४-२०२४ 



!!  रोजा ३० : आत्मचिंतन - अवलोकनातुन ;-   सकारात्मक भविष्यासाठी स्वयंप्रेरणा ..!!


आज लैलतुल जायजा .. अर्थात" जायजा " म्हणजे अवलोकन " आज महीनाभर ठेवलेल्या रोजे( उपवास) चं आपण केलेल्या खडतर प्रवासाचं (अवलोकन) जायजा करणं . खरोखरच इमानेइतबारे केले असेल तर अल्लाह जवळ त्याचं बक्षीसाची मागणी करणं .अपण केलेल्या महिन्याभराच्या कष्टाचं परिक्षण करुन फळ देणं हे त्यांच्या हातात.

       कुठल्याही गोष्टीचे प्रशिक्षण घेणे यासाठी आवश्यक आहे की, त्यात पारंगत व्हावे आणि त्याअनुषंगाने कामे सोपे व्हावीत. आपण मुख्यत्वेकरून पाहतो, शिक्षण, आरोग्य, पोलिस प्रशासन, मिलिट्री, खाजगी संस्थांमध्ये आपल्या कर्मचार्‍यांच्या व्यक्तीमत्वात, कार्यपद्धतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रशिक्षण दिले जाते. यामाध्यमातून सदरच्या उमेदवाराची कार्यक्षमता तपासली जाते, त्याच्यात प्रशिक्षणातून होणार्‍या बदलाचे मूल्यमापन केले जाते आणि त्याची कार्यक्षमता वाढेल या दृष्टीने प्रयत्न केले जाता आणि त्यावरून त्याच्या प्रगतीचे मुल्यमापन केले जाते. 

असेच सर्वांगीण प्रशिक्षण वर्षाकाठी एक महिना ईश्‍वराने श्रद्धावंतांंसाठी रमजानुल मुबारक मध्ये ठेवले आहे. मित्रानों! रमजानमध्ये महिनाभर आम्ही रोजे ठेवले, कुरआन पठण केले, सर्व वाईट गोष्टीं- सवयी- व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवले.  शक्य तितक्या उच्चकोटीच्या नैतिकतेला प्राधान्य दिले.  मित्रानों,हे काम अजून संपलेले नाही व नसतात देखील व हेच कार्य आम्हाला पुढील 11 अकरा महिने अमंलात आणायचे आहे.  इमान, नमाज, रोजा, जकात आणि हज या इस्लामच्या मुलभूत पाच तत्वांपैकी आम्ही चार तत्वांना रमजामध्ये मजबूत करण्याचा प्रयत्न करण्याचा कसोशीने प्रयत्न केला . आपल्याला सत्यावर चालणारे आणि वाईटांपासून इतरांनाही दूर करणारे शिलेदार बनायचे आहे.   कुरआनमध्ये ईमानधारकांबद्दल असे सांगितले आहे की, “आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजाती(च्या कल्याणा)साठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता.”  (सुरह नंबर ३ आ.नं. ११०)

मित्रानों, या आयातीवरून समजते की, श्रद्धावंतांना संपूर्ण मानवकल्यासाठी अस्तित्वात आणले गेले आहेत , 

 रमजानच्या काळातील प्रखर प्रशिक्षणानंतर समजून येते की, आम्हाला ज्या अर्थी उन्हाचे चटके सहन करीत, वाईट गोष्टींपासून दूर राहण्याची कडक तंबी दिली गेली. काही काळापुरते वैध गोष्टींपासून दूर राहण्यास सांगितले गेले. उच्चकोटीचा संयम, धैर्य अंगी बाळगण्याचे मनोबल रमजानमध्ये मिळाले. मित्रानों, हे कठीण प्रशिक्षण ठराविक कालावधीत अर्थात संपूर्ण रमजान महिनाभर संपूर्ण जगात दिले गेले. यानंतर या खडतर प्रशिक्षणाचा उपयोग करून आपल्याला सर्व मानवकल्याणाच्या हिताचे कार्य करायचे आहे. 

                दिव्य कुरआनच्या पुढे काय सांगते  ”हे पैगंबर (स.), आपल्या पालनकर्त्याच्या मार्गाकडे  आमंत्रित करा  मुत्सद्देगिरीने व  उत्तम उपदेशासहित ,  आणि लोकांशी विवाद करा अशा पद्धतीने जी उत्तम असेल. तुमचा पालनकर्ता अधिक उत्तम जाणतो की कोण त्याच्या मार्गापासून भ्रष्ट झाला आहे आणि कोण सरळ मार्गावर आहे.”  ( सुरह नं १६ अल - नहल आ.न. १२५ ).

तुम्ही जर तुमच्या अल्लाहाने सांगितले प्रमाणे या पृथ्वीतलावर मनापासून फक्त अल्लाहच्या इच्छेसाठीच काम करीत राहिले तर नक्कीच त्यांचे चांगले बळ मिळते..पुढे दिव्य कुर आन म्हणते की , ” आणि हे पैगंबर (स.), भलाई आणि दुष्टता एकसमान नाहीत. तुम्ही दुष्टतेचे त्या भलाईद्वारे निरसन करा जी अत्युत्तम असेल. तुम्ही पाहाल की तुमच्याशी ज्याचे शत्रुत्व होते, तो जिवलग मित्र बनला आहे.  (सुरह नंबर ४१ अल - सजजदाह आ.नं.३४ ). 

तुम्ही केलेल्या महीनाभरातील खडतर प्रशिक्षणाचा उपयोग तुम्हाला सर्व समाजातील लोकांना फायदा करण्यासाठी प्रयत्न करीत राहायचे आहे.. त्यांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी, त्यांना वाईट सवयी पासून दुर करण्यासाठी  ,  त्यांना आपल्या प्रपंच चागले चालावा व आपल्या आईवडिलांच्या सेवेसाठी तत्पर राहावेत यासाठी, तुम्हाला तुमच्या सभोवताली असलेल्या सामाजिक समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांच्या हक्कासाठी, प्रत्येक लहानसहान गोष्टींवरून भांडणे होतात ते होणार नाही म्हणून प्रयत्न करण्यासाठी , समता बंधुता अखंडता सुनिश्चित करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणे गरजेचे आहे.

     "बदलते वातावरण आणि आपली भूमिका "

मित्रानों! देशाचे वातावरण दिवसेंदिवस गढूळ केले जात आहे. धर्माच्या नावावर आपआपसांत लोकांना भडकाविले जात आहे. भारतीय संविधानात प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची मुभा आहे. धर्माबाबात कोणावरही जबरदस्ती करता येत नाही. 

    दिव्य कुरआन ही हेच फरमावितो, ”तुमच्यासाठी तुमचा धर्म आहे आणि माझ्यासाठी माझा धर्म.” ( पारा नं ३० सुरह नं. १०९ ,अल- काफीरून आ.नं.१०९)  

   पुन्हा दिव्य कुर आन सांगते की, ”धर्माच्या बाबतीत कोणतीही जोरजबरदस्ती नाही. सत्य असत्यापासून वेगळे केले गेले आहे.”  ( सुरह नं. २ अल - बकराहा आ.नं. २२३ )

 सदरील कुरआनच्या आयातीवरून आम्हाला बोध मिळतो की, धर्मासंबंधी कुठलाही अतिरेक करू नये, कोणावर जबरदस्ती करू नये, संवादाने एकमेकांची भूमिका समजून घ्यावी. शक्य तेवढे एकमेकांना समजून घेणे गरजेचे असते,  वाद विकोपाला जाणार नाहीत याची सतत काळजी घ्यावी. आप आपसात विसंवाद निर्माण होता कामा नयेत , आपल्या बुद्धीच्या क्षमतेने विचार करून मार्गस्थ व्हावे. समेट घडवून आणला पाहिजे.

                        राजकारण करायचेच असेल तर खरोखरच समाज कारण व लोककल्याणासाठी केेले पाहिजे. परंतु, त्या ऐवजी समाजात विषाची बिजे पेरली जात आहेत. अत्यंत घाणेरड्या अवस्थेत आजचे समाजकारण राजकारण गेलेले आहेत,तर त्याला चांगल्या स्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करीत राहिले पाहिजे  व जे चुकीचे चालले आहे ते रोखायची जबाबदारी सर्व समाजातील श्रद्धावंत आणि समाजधुरीणांकडे आहे.  त्यांनी खरोखरच यासाठी कसोशीने प्रयत्न करीत राहिले पाहिजे.. अल्लाहा म्हणतात प्रयत्न करणं तुमचे काम नंतर त्याचं फळ देणं हे माझं काम मी सर्वांचं मन परिवर्तन करणारा जरूर आहे.. प्रयत्न तर करून तर बघा, आजचं राजकीय पक्ष फक्त आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी समाजात विष पसरविण्याचे काम करीत असतात,

विष हे कोणासाठीच अमृत ठरत नाही. मग ते स्लो पॉईजन असो की कडक. आज नाही तर उद्या ते आपला गुण दाखविण्यास सुरूवात करते. 

                   दिव्य कुरआनमध्ये सांगितले आहे की,  

”आता हे अत्याचारी लोक जे काही करीत आहेत अल्लाहला त्यापासून तुम्ही बेसावध समजू नका. अल्लाह तर त्यांना टाळीत आहे, त्या दिवसासाठी जेव्हा अवस्था अशी असेल की डोळे विस्फारले ते विस्फारलेलेच राहतील.  (पारा नं. १३ ,सुरह नं. १४ अल - इब्राहीम  आ.नं. ४२ ). 

             पृथ्वीतलावर सुधारणा करण्यासाठी कुर आन म्हणते‌ की,   ”जेव्हा त्यांना सांगितले जाते की, पृथ्वीवर उपद्रव माजवू नका तेव्हा ते म्हणतात की, ”आम्ही तर सुधारणा करणारे आहोत!” ( सुरह नं. २ अल- बकराह आ.नं.११. ) व हो  ”सावधान! हेच लोक उपद्रवी आहेत, परंतु त्यांना ते कळत नाही. ( सुरह नं.२ अल- बकराह आ. नं. १२ )."

मित्रानों, या कुरआनच्या आयाती ज्या उपद्रव माजविणार्‍यांविरूद्ध आहेत. कोणीही कुठल्याही समाजघटकाचे का असेनात दंगे, उपद्रव माजवू नका आणि जे माजवित आहेत त्यांना रोखा,  आशा उपद्रवी संघटनेत सामील होवू नका.  ईश्‍वराने प्रत्येकाला काही ठराविक वेळ दिली आहे, त्याचा उत्तम फायदा जनकल्याणासाठी करावा.

पुन्हा दिव्य कुर आन सांगते की, “  ज्याने कोणा एकाला ही जीवनदान दिले त्याने जणू काही सर्व मानवजातीला जीवन प्रदान केले.”  (सुरह नं. ५ अल- माईदा आ.नं.32).

या आयातीवरून बोध मिळतो की आपल्या हातून कधीच नाहक व्यक्तीचा खूनच काय, त्याचा हक्क ही मारला जावू नये याची खबरदारी घेतली पाहिजे. 

            कुरआनमध्ये फरमाविले, “काळाची शपथ आहे, मानव वस्तुतः तोट्यात आहे, त्या लोकांखेरीज ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि सत्कर्मे करीत राहिले. आणि एकमेकांना सत्याचा उपदेश आणि संयमाचा आदेश देत राहिले.  ( सुरह १०३ सुरह अल - हश्र आ.नं.१ते ३ ) " .

सर्व श्रध्दावान बंधुंना  विनंती आहे की, त्यांनी दैनंदिन जीवनात दिव्य कुरआन व प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांचं मार्गदर्शन आत्मसात करून समाजात नैतिक बदलासाठी पुढाकार घेऊन सत्कर्माचे काम हाती घ्यावे. लोकांना वाईटापासून रोखावे, जे समाजात उपद्रव माजवत आहेत,  विनाकारण सामान्य माणसांना त्रास देत आहेत, मानवकल्याणाच्या विरूद्ध जाऊन वागत आहेत अशांचा शोध घेऊन संवैधानिक मार्गाने त्याविरूद्ध लढा देण्यासाठी प्रयत्न करावा आणि लोकांमध्ये ईश्‍वरीय मार्गदर्शन पोहोचवावे. हाच रमजाननंतरच्या प्रशिक्षणाचा संदेश.

मित्रानों, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत माणसाने जीवन कसे जगावे, जगण्याची नियमावली कशी असावी,  त्याची आचार-विचार करण्याची पद्धती कशी असावी? कोणाशी कसा संवाद साधावा, त्याचे अध्यात्मिक जीवन कसे असावे, त्याने पारलौकिक जीवनाची तयारी कशी करावी, ऐहिक जीवनात प्रगती करताना कोणती नैतिक मुल्य अंगी बाळगावीत अशा एक ना अनेक मनुष्याच्या जीवनासंबंधी  मार्गदर्शन आपल्या परीने प्रयत्न करीत राहिले पाहिजे...

तरच या संपूर्ण रमजानुल मुबारक खडतर प्रवासाचा व प्रशिक्षणाचं फलीत राहीलं...

अल्लाह सर्वांना सद्बुद्धी देवो हिच अल्लाहच्या जवळ दुआ याचना करतो 

  "  उद्या ईद उल फिजत्र चा दिवस सर्वांना सुखरूप जावो हिच अल्लाह जवळ दुआ याचना करतो "

    ईद मुबारक २०२४ ..



( .मित्रांनो आपल्याला लेख आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर कळवा व आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. प्रतिक्षेत )

 रमजान मुबारक मालिका २०२४ 

इस्लाम समजून घेताना 

रोजा नंबर २९ वा .

मंगळवार दिनांक ०९-०४-२०२४ 



लेखन,:-  डॉ सलीम सिकंदर शेख ,

 बैतुशशिफा हॉस्पिटल ,मिल्लतनगर ,

     श्रीरामपूर 

९२७१६४००१४ 


इस्लाम:-!!  बुरखा - पडदा - हिजाब - समजून घेत -  काळा प्रमाणे वापरणं गरजेचं....!!


                 #  दिव्य कुर आन सांगितले की, " पैगंबर ! आपल्या पत्नींनां , व मुलींना आणि श्रध्दावंत स्त्रियांनाही सांगां , ( सार्वजनिक ठिकाणी वावरताना) की, त्यांनी बाह्य वस्राचा ( Outer Garments,चादर ) भाग आपल्या अंगाभोवती ( अगांवर ) स्वतः वर ( म्हणजे डोक्यावर , अंगावर) टाकून घ्यावा . आशा पेहरावामुळे त्या ( शालीन स्त्रियां म्हणून )ओळखल्या  जातील ,  आणि ( सार्वजनिक ठिकाणी वावरताना) त्यांना काही त्रास होणार नाही.. आणि अल्लाह फार क्षमाशील व दयाळू आहे . ( पारा नंबर २२ वा सुरह  नं . ३३ अल-अहजाब आ.नं. ५९ वी ).


 # तसा महिलांबाबत, निकाह ( विवाह) , तलाक ( घटस्फोट), विधवा, खुला , बुरखा- पडदा - हिजाब  व लग्नानंतर वारसा हक्क व सार्वजनिक ठिकाणी वापर असे बरेच विषय कायमस्वरूपी चर्चेत असतात परंतु इस्लामी मुस्लिम समाजातील काही विषय हे शोशल मेडीयावर  जास्तच चर्चेचे असतात. सर्व विषयांवर खूप काही लिखाण करण्याची गरज असताना परंतु  एका लेखात पुर्ण होवू शकत नाहीत... सविस्तर लिखाण करणे गरजेचे आहे..असो.

       कोणत्या महीलेने काय वस्र परिधान करायचं हे प्रत्येक बघिनींना स्वातंत्र्य दिले आहे व तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.. परंतु इस्लाम मधे प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांच्या काळापासून महीलांनी आपल्या कपड्यांच्या वर एक वस्त्र परिधान करावयास सांगितले आहे त्याला बुरखा - हिजाब - चादर- पडदा -  म्हणतात, असे चादर ओढण्याची सांगितले आहे..त्यात डोक्यावर दुपट्टा ओढनी व संपूर्ण अंगाला चादर ओढणी किंवा शिवन घेतलेल्या बुरखा हिजाब पांघरूण घेणे ...हे दिव्य कुर आन मधील पारा नं. २२ मधील अल - अजहाब सुराह मधे स्पष्ट शब्दांत आलेलं आहे.

महिलांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना वावरताना घालण्याचं सांगितले आहे..१५०० वर्षापुर्वी चा काळ अज्ञानाचा काळ होता त्यावेळी स्त्रिया फक्त भोग विलासी साठी व च अश्लिल कृत्यं व नाच गाणं मनोरंजनाचं साधनं येवढ्या पुरत्याच  मर्यादित जीवन स्त्रियांचं होते.. स्त्रियांकडे वाईट नजरेतुनच बघितले जायचं, आजची परिस्थिती ही शोशल मेडीया व नेटवर्किंग च्या जमाण्यातील आहे .. परिस्थिती खूप गंभीर होत चालली आहे..शोशल मेडीयामुळे लहान लहान मुलांना ही अश्लिल चाळे करताना दिसत आहेत.. बाकीचे सांगणं कठीण आहे.

हे सर्व टाळण्यासाठी  त्या काळातच प्रेषितांच्या मार्फतच अल्लाहा( ईश्वर) नेच बघिंनी महीलांसाठी संरक्षण कवच म्हणून चादर -ओढनी- बुरखा- हिजाब चं संकल्पना सक्तीची सांगितली ..

प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांच्या विविध पत्नी होत्या .. विशेष म्हणजे प्रेषितांनी  बेसहारा -विधवा -पिडीत असलेल्या महीलांबरोबरच लग्न केलीत , ( हा  स्वतंत्र लेखाचा विषय आहे) त्यांना हजरत जैनब , हजरत रूककयया ,हजरत उम्मे कुलसूम , हजरत फातिमा रजी या चार मुली ही होत्यां .तर त्यांनी आपल्या परीवारांसह सर्व सहकारी मित्रांना ही सक्तीचं केले .

            ##   विशेष गोष्ट म्हणजे पुरुषां साठी ही आचारसंहिता लागू  केली होती , अल्लाह दिव्य कुर'आन मधे सांगतात व सक्तीची मनाई केलेली आहे , ते बघू या, प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांच्या द्वारे सांगतात की, " हे  पैगंबर (स्व.) श्रद्धावान ( बंधुंना) पुरुषांना सांगा ,की त्यांनी आपली दृष्टीं ( नजरां) ची जपनूक करावी   ( नजरा खाली ठेवाव्यात ), आणि आपल्या लज्जा स्थांनांचे रक्षण करावेत . असे करणे त्यांच्या साठी शुध्द चारीत्र्याचे  द्योतक ठरेल  , ते ( पुरुष)जे  काही करतात अल्लाहाला त्यांचीं  पुर्ण जाणीव(खबर)आहे." 

 खरं तर या आदेशाचा अर्थ सदैव खाली पाहणं न होता पुरुषांनी स्त्रियां कडे चुकीच्या दृष्टीकोनातून न पाहणे . स्त्रियांच्या गुप्त अंगावर दृष्टी न टाकणं..

म्हणूनच प्रेषित मुहम्मद स्व सल्लम. सांगतात की # चालता फिरताना आपली दृष्टी खाली ठेवून व आपल्या शरिराचे अंग प्रदर्शन पर स्त्रियांना ही होणार नाही याची काळजी पुरुषांना ही घेण्याची सक्ती करण्यात आली आहे.  फक्त स्त्रियांसाठी सक्ती केली नव्हती तर तोच कायदा रुल हा पुरुषांना ही सक्ती चा केला होता.

                  #  प्रेषित मुहम्मद स्व सल्लम. " महिलांनी आपल्या घरात मोकळेपणाने व थाटात वावरावे , नटून थटून सजून आपल्या सौंदर्याचे सर्वत्र प्रदर्शन करून फिरू नयेत , घराबाहेर जाताना डोक्याव चादर घेउन , जो दागिने घातलेली आहे त्या दागिन्यांचां मधुर नाद( खुळ खुळ) आवाज होत असेल तर तो काढुन ठेवावेत .".

         # "घरातील पती, वडील ,भाउ, मुलगा, भाचा , पुतण्या ( यांच्या शी विवाह होत नाही)सोडून ;   ईतर सदस्यांसमोर वावरताना विशेष खबरदारी बाळगावी . साज शृंगार नटने सजने फक्त पतींसाठीच ..घरातील अपत्यजनांसमोर समोर जाताना वावरताना सुध्दा आपल्या वक्षस्थांवर ओढनी-  दुपट्टा पांघरूण अपले संपूर्ण शरीर आच्छादित होईल असे वस्र धारण करावेत " 

# पुरुषांना खास आदेश देण्यात आले आहेत की , " त्यांनी आपल्या आया बहीणींच्यां खोलींत जाताना परवानगी घ्यावी जेणेकरून अचानक तुमच्या घरात प्रवेशाने बेसावध बसलेल्या महीला,बहीणींवर खजिल होण्याची पाळी येणार नाहीत."

 # या सर्वाला परदा बुरखा पध्दत म्हणतात यावर अधिक खुलासा करताना प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांनीं सांगितले की, " स्त्रियांनों ,( महिलांनों ) आपल्या सख्ख्या भावा व वडीलांसमोर जाताना सुध्दा चेहरा हाताचा पंजा ,व घोट्याच्या पर्यंत पाया व्यतिरिक्त संपूर्ण शरीर वस्राने अच्छादित करूनच जावे , पारदर्शक, शरिर प्रदर्शन घडेल  असे कपडे टाळावेत .., तसेच आपल्या घरातील आप्त जनां ( मेहरम) सोडून इतर कोणत्याही नात्याच्या पुरुषासमोर एकांतात बसू नये ' .#

# पैगंबरांनी स्त्रियांना सुगंध अत्तर वगैरे लावून घराबाहेर जाण्याबाबत मनाई केली आहेत , मस्जिदीत महीलांना नमाज अदा करण्यासाठी वेगळ्या जागेची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. एकाच रांगेत स्त्रियांना व पुरुषांना नमाज अदा करण्यास नाकारण्यात आले होते  . त्याकाळात सुध्दा महिलांची संपुर्ण नमाज अदा झाल्यानंतर सर्व महीला मस्जिदी मधून निघून जाई पर्यंत स्वतः प्रेषित मुहम्मद स्व.व त्यांचे पुरुष मित्र आपल्या बसल्या जागेवरून हालत नव्हते.

इस्लाम ने महीलांना संपूर्ण सवलत व सुट देण्यात आल्या आहेत... प्रत्येक गोष्ट ही महीलांसाठी सोयीची व कामाचीच करून ठेवली आहे... महीलांना प्रत्येक क्षेत्रात वाव देण्यासाठी प्रयत्न केले आहे परंतु त्यांच्या चौकटीत राहून.. याला बंदिस्त नाही म्हणू शकत.. (हा मोठा विषय आहे) मतमत्तांततरे कैक पटीने असू शकतात . अगोदर इस्लाम समजून घेत ,त्याचा अभ्यास केला पाहिजे.. असो.

सध्या शोशल मेडीयाच्या जमाण्यात यू ट्यूब व असंख्य बेब सिनेमा व असंख्य सिरीयलस चालू आहेत त्या प्रत्यक्षात त्यामध्ये अजनाते पणे किंवा जाणते पणे अपण नक्कीच काही सांगू शकत नाहीत परंतु एख तरी दृश्य हे अश्लिल असतेच आशा फार थोड्या सिरीयल असू शकतात की त्यामधे अश्लील दृश्य नाहीत.. परंतु बहुतेक सिनेमा मधे , सिरीयलस मधे जाहीराती मधे महिलांचां वापर करून कमी कपड्यात  अंग  प्रदर्शन  केले जात  आहे.. कमी व फिट्ट व पारदर्शक कपड्यात स्त्रियांना दाखवले जातात त्यामुळे लहान लहान मुलां वर परीणाम होउन लहान मुले ही अश्लील दृश्यांची बळी पडून नको ते कृत्य करुन राहीलेत . त्यांच्या बालमनावर  मानसिक परिणाम होउन चुकीचे कृत्य करू राहिले त त्यामुळे  नकळत पणे नराधमांच्या संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत. यासाठी ओढणी पडदा- बुरखा -हिजाब ही काळाची गरज बनत चालली आहेत.

       .हा प्रश्न फक्त एका  समाजापुरताच मर्यादित  राहिला नाही, तर हा प्रश्न सर्वसामान्य समाजातील लोकांना भेडसावत आहेत..मुली  सर्वांना असतात , सर्वांच्या मुली  लाडक्याच असतात..आपल्या मुलीं या सुरक्षित राहावेत असे प्रत्येक पालकांची मनोमन इच्छा असते ,   यासाठी सुरक्षित पध्दत  हिजाब -बुरखा - पडदा  किंवा दुसऱ्या भाषेत त्याला काही ही नावे द्यावीत हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे...शोशल मेडीयाच्या जमाण्यात मुलींच्या शिक्षण व संरक्षण होणं गरजेचं आहे..ती स्वतःच्या पायावर उभी राहणं गरजेचं आहे.

प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांचे कथन आहे की ,' अगर घरातील एक महीला शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षीत होतं "  


( मित्रांनो आपल्याला लेख आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा, आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा)

लेखन:- डॉ सलीम सिकंदर शेख ,

बैतुशशिफा हॉस्पिटल मिल्लतनगर 

श्रीरामपूर 🎉 🎉 

🎉  9271640014🎉

लोकांनों ! आम्ही तुम्हाला ( सर्वांना) एकच पुरुष व एकाच स्त्री पासून निर्माण केले आहे  ;  मग तुमची राष्ट्रे व वंश ( कबीले,व वंश ) बनविले ,.  जेणेकरून तुम्हाला एकमेकांना ओळखता यावे ( ओळखावे) ;    परंतु अल्लाह जवळ तुमच्या पैकी सर्वात जास्त श्रेष्ठ ( प्रतिष्ठित) तोच असणारं आहे, जो चारित्र्याने श्रेष्ठ असणारा..". ( पवित्र कुरआन पारा नं. २६ , सुराह अल - हुजूरात नं. ४९ ,आ .न. १३ वी. )   

            जागतिक पातळीवरील   "फिफा विश्वचषक स्पर्धा २०२२  " चे आयोजन ,  रविवार  दिनांक २०  नोव्हेंबर २०२२  रोजी  " दोहा- कतार "  येथील  अल- खोर च्या  अल - बायन स्टेडियमवर   उद्घाटन समारंभ संपन्न झाला . यामध्ये अमेरिकेचा  प्रसिद्ध  हॉलिवूड  अभिनेता  मॉर्गन फ्रिमॅन  व फिफा फुटबॉल  विश्वकप चा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर केलेल्या(Ghanim Al miftahi ) घानिम - अल - मुफ्ताह हा कॉउडल - रिग्रेशन सिंद्रोम (Caudal Regression Syndrome)  ज्यांचे स्पायनल कॉर्ड ( मेंदुरजजा)  चा दुर्धर दुर्मिळ आजार झालेला,   अपंगत्वावर मात करून  कुरआन हाफीज व कारी  झालेला  , उद्घाटनप्रसंगी मंचावर येऊन  पवित्र कुरआन मधील वरील आयात (श्लोकाचा ध्वनी)  म्हणून सुरुवात केली गेलीत .

 ते सुद्धा असंख्य देशातील फुटबॉल  खेळणाऱ्या सदस्यांचा  विरोध डावलून,   जगातील सर्वात बडे  ५०० पेक्षा ही जास्त  टी. व्हि. चॅनेलनी २०० देशात लयीव्हि Live telecast) प्रक्षेपण केले. कित्येक कोटी लोकांनी याच देह याचं डोळ्यांनी लाईव्ह शो बघितले.

    

 एवढ्या मोठ्या आतंरराष्ट्रीय प्रक्षेपणात  विरोध डावलून मंचावर पवित्र कुरआण सुराह अल - हुजूरात ची १३ वीच आयात   का ??? म्हणून  सुरुवात केली असेल.??? .

  म्हणुनच या श्लोकाचा अर्थ  समजून घेताना:- 

या आयातीत अखिल मानवजातीला उद्देशून सर्वोच्च अल्लाहने तीन महत्त्वाचे तात्विक विवेचन केले आहेत.  ते सांगतात की, " तुम्हा सर्वांचे मुळ एकच आहेत. एकाच पुरुष व एकाच स्त्री पासून तुमचा वंश  अस्तित्वात आला( निर्माण केले) आहे .  आज जगाच्या पाठीवर जे जे वंश आढळतात ते वास्तविकपणे एकाच आई व वडीलांपासून  त्यांचा प्रारंभ झाला आहेत .त्याच्याच वंशाच्या अनेक शाखा आहेत.(२) परंतु आपल्या मुळ स्वरुपाच्या एकच असताना देखील त्यामधे तुमचे विविध राष्ट्र ( देश ) , विविध जाती , विविध कुळात , विविध कबील्यांत, विविध भावक्यात,  तुम्हाला विभागले जाणे स्वाभाविकच होते . परंतु या स्वाभाविकच विभागात विभागलेल्या कुळं या आधारावर बिलकुलच नव्हते केली की ती  उच्च- निचच, श्रेष्ठ- कनिष्ठ, स्पृश्य- अस्पृश्य , असले भेदभाव मतभेद व्हावेत असे , बिलकुल नव्हतेच केले होते .किंवा एका वंशाने दुसऱ्या वंशावर आपले श्रेष्ठत्व सिद्ध करावे अथवा सत्ता -हुकूमत गाजवावे,  किंवा एका वर्णाच्या लोकांनी दुसऱ्या वर्णाच्या लोकांना तुच्छ,क्षुद्र मानावे  किंवा एका मोठ्या राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर जम, हुकूमत प्रस्थापित करावी ,..

हो , निर्माण करत्याने या एकाच कारणास्तव मानवी समुहानां  राष्ट्र व वंशांच्या स्वरूपात उभारले होते ते फक्त त्याच्या दरम्यान परस्परांत सहकार्य सहकार व ओळखण्याची एक स्वाभाविक रित - खून ( सिंबोल, चिन्ह  )  होती ..(३)  त्यात , माणसं माणसांच्या दरम्यान श्रेष्ठत्व व उच्चतम तेचा आधार जर कोणता असेल तर तो फक्त केवळ उच्च नितीमत्ता व उच्चतम नैतिकतेचा.  ;  जर अल्लाहला जर सर्वात श्रेष्ठ तो असेल ,ज्यांची नैतिक नितीमत्ता उच्च दर्जाची असेल ..तेच अल्लाह ( ईश्वर) ला आवडते...!.

त्या दोहा कतार येथील आंतरराष्ट्रीय फिफा फुटबॉल  विश्वकप २०२२. च्या उद्घाटनप्रसंगी मंचावरून सांगितलेल्या पवित्र कुरआन मधील सुराह अल - हुजूरात च्या १३ व्या आयाती(श्लोका) चा अर्थ सर्व धर्मांच्या लोकांना सर्व जगाला हेच संबोधित करायचे होते की आपण सर्व एकच आहोत ..एकच आहोत ...

परंतु त्यांनी त्या अपंगत्व आलेल्या घानिम अल - मुफ्ताहीचीच निवड केली की अल्लाह ( ईश्वरा) ला  अपंग - धडधाकट - काळे- गोरे सर्व सारखेच  आहेत...

     अर्थात:-" वसुधैव कुटुंबकम "

" The world 🌎🌍 is one family "

हे संस्कृत शब्द आहे ज्यांचां अर्थ संपूर्ण जग एकच कुटुंब आहे.. हिंदी मधे " धरती ही परीवार है '

 " उद्देश हेच होता  -- विश्व व्यापक बंधुत्वाचा  संदेश."

त्या कतार मधील जागतिक फुटबॉल संघटनेचा जगातील सर्वांना एकतेचा अखंड तेचा च संदेश अभिप्रेत असावा...या साठी जगातील सर्वांनी आपापल्या परीने योगदान दिले तर खरोखरच हा विचार मानव कल्याणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक ठरेल ... अल्लाहाला मानवता धर्म कायम राखण्यासाठी उपयुक्त ठरेल असे काम करणाऱ्या लोकांना जरूर पसंत करतात...जो अल्लाह ( परमेश्वर) ला आवडतो तो सर्वांना आवडतो ...

सर्वांनी आपल्या नितीमत्ता व उच्चतम नैतिकतेचा आदर्श निर्माण करून अल्लाह ( ईश्वरा) चे आवडते  , श्रेष्ठ ..व्हावे...


( मित्रांनो लेख काळजीपुर्वक वाचुन आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा , आपल्या मित्रांना नातेवाईकांना पाठवा..)



लेखन:- डॉ सलीम सिकंदर शेख,

बैतुशशिफा हॉस्पिटल -मिल्लतनगर ,

श्रीरामपूर 

 ९२७१६४००१४

आज २० विसावा रोजा  चालला आहे अर्थात पहिला अशहरा ( विभाग) " रहमत,( 'दये)चे संपलेंत ,  आज  २० रोजा पुर्ण  " मगफीरत '( माफी दैवून कृपादृष्टी )चे (१०- ते २० ) संपूं  राहिलेत , आज संध्याकाळी तिसऱ्या विभाग ( अशहारा ) हा " नरकाग्नितल्या ( जहान्नुम) च्या आगीच्या होणाऱ्या इंधनापसून संरक्षण " वाचण्यासाठी  पुढील दहा दिवस आहे , वेळ दिवस खुप लवकर संपत चाललेली ..आज संध्याकाळीच "लैलतुल -कद्र "  च्या पवित्र रात्रीं ( ज्यांचे पुण्य हे एका रात्रीचं एक हाजार महीन्यांच्यां रात्रीं पेक्षाही अधिक असतं) बरोबरच" एहतेकाफ "संध्याकाळ पासूनच सुरू होणार ,   आज ही अल्लाहच्या कृपेपासून विमुक्त आहोत . याचं महत्त्व आपल्या लक्षात घेतलं पाहिजे .   दुआ याचना करण्याच्या पर्वाचा प्रवास सुरू झाला आहे. 

                 एक ते वीस दिवसांत तुम्हाला तुमच्या व्यस्तते  ,हालगर्जीपणामुळे ,  त्याचं महत्त्व न समजल्यामुळे  अल्लाहा ( ईश्वरा) च्या एवढ्या मोठ्या पर्वाच्या संधीचा फायदा उचलला नाहीत  ,तर तुम्ही दरीद्रीच समजा. " मगफिरत "या पर्वात वर्षांनु वर्षे क्षणा क्षणाला ,कळत नकळत केलेल्या पापांची , चुकांची दुरुस्ती  , चुकांची माफी मागणं व अल्लाह ला पुन्हा पुन्हा या चुकीचं होणार नाहीत यासाठी कृपादृष्टी व्हावीत . याला म्हणतात "मगफिरत ' होणं. संपूर्ण आयुष्यभर श्रद्धांवान बांधव याच आशेवर जगत असतात की परमेश्वर( अल्लाह) ने आमची मगफीरत करावी..हे फक्त परमेश्वराच्याच हातात आहे.

आपण कळत नकळत चुका होतच असतात . एखाद्या शुल्लक चुका ; त्याला साधी लहान चुक समजतो , परंतु ती कोणां दुसऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात नुकसानिची ठरु शकते  हे कधीच आपल्या लक्षात येत नसते , आशा चुक ही आपल्यासाठी नरकातील इंधनासाठी  पुरेशी ठरु शकते.  

पवित्र कुरआन  सांगितले की, " त्या ( कयामत)  दिवशी तुम्हाला वाचवणारा कोणी नसेल , त्या दिवशी स्वतः चे आई-बाबा मुलांना ओळख देणार नाही , बहीण- भावाला , पती -पत्नी ला ,मुलं- आई-बाबांना  ओळख देणार नाहीत . ज्याला त्याला स्वतःचं पडेल. " 

आयुष्यभर केलेल्या  चांगल्या -वाईट कर्मांचां हिशोब द्यावाच लागणार आहे . मग  त्यासाठी आजच तय्यारीला लागा .

तिसऱ्या टप्प्या ( अशराह )ला  २१ ते ३० ला सुरूवाती बरोबरच रमजानुल मुबारक मधील   पवित्र लैलतुल -कद्र च्यां   रात्रीं रोजा२१ , रोजा २३ ,रोजा २५ , रोजा २७- रोजा २९- रोजा ३० वी, या विषम संख्यात्मक " लैलतुल-कद्र " च्या  रात्रीं  असतात ,   या एक रात्र ही एक हजार महीण्यांच्या रात्रींच्यां  पेक्षा ही जास्त पुण्यंचीं फक्त एक  लैलतुल कद्रची  रात्रींचं पुण्यं - सबाब भेटतं.

दिव्य कुरआन मधे सांगितले ,  " आम्ही या( कुरआन ) ला कद्र च्या रात्रीत अवतरले आहे .(१), आणि , तुम्हाला काय माहित ,की, " कद्र " ची रात्र काय आहेत ? म्हणून, (२), कद्र ची रात्र ही हजार महीण्यांपेक्षा ही अधिक  उत्तम आहेत (३),ईशदूत ( फरिशते) आणि रुह (जिब्राईल अलै.) त्यारात्री आपल्या पालनकर्तांच्या आज्ञेनुसार प्रत्येक आदेश घेऊन उतरतात (४),  ती रात्र म्हणजे पुर्णतः " शांती" आहेत व  उष: काळा पर्यंत...(५) ..( दिव्य कुराण ,सुरहा नं. ९७ .अल- कद्र आ.नं. १ ते ५).


त्याच बरोबरच आज २० व्या रोजा च्यां दिवसांपासून ते थेट ३० व्या रोजा पर्यंत १० दिवस सलग अल्लाहच्या याचने नतमस्तक होउन याचना करण्यासाठी बांधंव २४ तास १० दिवस बसतात त्यालाच " एहतेकाफ " ला बसणं.

जगात प्रत्येक मस्जिद मधे या शेवटच्या दहा दिवसांत एक तरी रोजेदार बांधंव बसणं गरजेचे आहे.दहा दिवस अल्लाह च्या भक्तीत बाहेरील जगाशी संपर्क तोडून - जग विसरून,  स्वतःच्या प्रंपाचाला बाजूला ठेवून , फक्त अल्लाहाला संपूर्णतः समर्पण करून- देह भान विसरून अल्लाहचच नामस्मरणात तल्लीन होऊन जाणं ..बस..

     या रात्रीच्या आलेल्या सुवर्ण संधीचा पुरेपूर फायदा उचलून अल्लाहा जवळ सर्वस्वी अर्पण- लिन - तल्लीन होऊन छाती बदडून , रडून -डोळ्यात पाणी आणून , आयुष्य भर केलेल्या चुकांची जाणीव करून उदा. जाणते व  अजाणतेपणी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता व खात्री देउन गरीबांचे ,मजुरांचे , भिकारी, बहीण,भाउ , आई-बाबा , आजी-आजोबा, मित्र मंडळ , गिऱ्हाईक या सर्वांबरोबर कधीतरी  उच्च निच झाले असतील , एखाद्याला  वेडेवाकडे  अपशब्द वापरले गेले असतील , अपमानास्पद भाषेचा वापर झाला असेल, संशयास्पद वागणूक दिली गेली असेल,  कधी घमेंडी आली असेल , " मी " ही जागा झाला असेल, कधी" अहंकार" आला असेल , 

"अहंकार""रावर :- प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम . म्हणतात की, " ज्या व्यक्तींच्या मनात तिळमात्र देखील अहंकार असेल ,तो स्वर्गात जाणार नाहीत, " 

त्यावर त्यांच्या एका मित्र( सहाबी) ने विचारले की चांगले कपडे परिधान करणे, नव्या पादत्राणांचां वापर करणं, हे देखील अहंकारासारखंच आहे का? 

त्यावर प्रेषित मुहम्मद स्व. सल्लमांनी उत्तर दिले," अल्लाह सुंदर आहे आणि त्याला सौंदर्य आवडते, अहंकार हा आहे की तो सत्याला नाकारतो आणि दुसऱ्या लोकांना तुच्छ समजणे " ( हादिस ईब्न मस- उद , मुस्लिम.). कोणत्याही गोष्टीचा अहंकार बाळगू नयेत. आपल्यातल्या " मी "पणा , अहंकार माणसाच्या आयुष्यात खूप गडबड करत असतो तर त्या मी व अहंकाराला बाजूला काढून टाकण्यासाठी अल्लाहच्या दरबारात येउन बाजूला काढण्याचं प्रयत्न करा .

         " , आपल्या व्यस्त जीवनाचा काही वेळ , जितकं वेळ मिळाला तेवढं का होईना वेळ काढून , एकांतात ,एका शांत जागी , निवांत बसून, अल्लाहा जवळ पुर्ण पणे लीन -शरण - समर्पित होउन - अगदी तल्लीन होऊन , निर्विकार पणे , अंतर्मनात दडलेल्या प्रत्येक  प्रत्यक्ष गुन्हेची , दुष्कृत्ये ची , काही घटना  फक्त आपल्यालाच माहीत असतात , आशा केलेल्या  गुन्हे ची माफी मागणं ,   आगदी मनापासून- मनमोकळेपणाने अल्लाहा (परमेश्वरा) बरोबर संवाद साधणं ..जसं  एका  खास मित्राला  मनमोकळेपणाने गप्पा मारतो तशा पध्दतीने अल्लाहा (परमेश्वरा) समोर मनापासून मनमोकळे करणं .याला रिते होणं , फक्त रिते होणे ‌, आत्मक्लेश करणे , आत्मचिंतन करणं ,  पुन्हा पुन्हा अल्लाहा( परमेश्वर )ला सांगणं पुढे कधीच  कोणत्याही परिस्थितीत अशा चुकीचं होणार नाही याची ग्वाही - खात्री देणं . म्हणजेचं मोकळे ,रिते होउन  अल्लाहा ( ईश्वराला) ला   राजी करणं .

आशा गोष्टींमुळे   जेव्हा आपण केलेल्या पापांची - गुन्ह्याची कबुली कुठे  तरी देत असतो  ;  निश्चितपणे माणुष्यात  सकारात्मक बदल घडत असतात . निगेटिव्ह विचार -आचार हळूहळू जावून सकारात्मक पॉझिटिव्ह विचार येतात . प्रत्येक गोष्ट ही सकारात्मक च होत जाते .  हे फक्त  स्वतः  ठरवलं  तर अशक्य काहीच नसतं .   " मी "फार धोकादायक ठरतो ,तो मी च आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरतो . तो " मी' मनापासून गायब झाला तर अहंकार ही नष्ट होऊन मनाची अंतर्मुख होऊन आत्मशुद्धी होते व आत्मविश्वास वाढला जातो .मणुष्य  स्वतः च स्वतः ला कित्येक वर्षे ओळखत नसलेला  या दहा दिवसात ओळखू लागतो याच साठी अंतरात्माला आत्मक्लेश आत्मसमर्पण आत्मसमर्पित करणं गरजेचे असते.

नंतर  निर्विकार -शांत - नितळ  अंतरमन होउन आत्मिक शुध्दी होउन व्यक्तीचा उत्सव वाढतो , चेहऱ्यावर  तेज , आनंद  ,झळकतो .  आपल्या जीवनात एक अल्हाददायक , आनंदी पहाटचं ..

 अल्लाह राजी हुआ समझो...


( मित्रांनो आपल्याला लेख आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा, आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.)


लेखक डॉ सलीम सिकंदर शेख ,

 बैतुशशिफा हॉस्पिटल ,

श्रीरामपूर ९२७१६४००१४.


 ( १)    " तेरावे सद्दीची पैगंबरी खुप ! दावीतो प्रमाण कुराणातं !!

               जगी स्री पुरुष सत्यधर्मी होती !

   आनंद वतनी ज्योती म्हणे !! ".  समतेचा पुरस्कार करणारे   "राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावजी फुले ...

        (२)"  एक ही सफमें खडे हो गयै , मेहमूद और अयाज ...!!

ना कोई बंदा रहा ,ना बंदा नवाज. ..!!! "

जगप्रसिद्ध साहित्यिक व ऊर्दू कवी डॉ.मुहम्मद इक्बाल सहाब..

      इतिहासाच्या कित्येक महान व्यक्तींनी ज्या महामानवाच्या कार्याविषयी , जीवनाविषयी , त्यांच्या  सामाजिक एकता विषयावर , क्रांतिकारक निर्णय विषयी कित्येकदा स्तुती केली ,ज्ञात -अज्ञात पणे आदर्श घेतला व आपल्या कार्यात त्यांच्या विचारांचा अंगिकार केला , 

 आशा महान महामानवाचा आज जन्मदिवस 

  मी लिहीताना  एक निरक्षर ,अनाथ , विश्व बंधुत्व ,संवेदनशील , समतेचा पुरोगामी प्रेषित मुहम्मद स्व . यांचा उल्लेख करतो.

.त्याचप्रमाणे पुरोगामी विचारांचे धगधगत्या मशाली चे महामानव च करतो .त्या पुरोगामी विचारांनी प्रभावित होऊन कित्येक संत ,पीर , बादशहा ,महान विचारवंत , विद्वान , समाजसुधारक या महात्म्यांनी आप- आपल्या देशात समाजात  ज्ञात , अज्ञात पणे क्रांती घडवून आणली .

              आगदी १५०० वर्षांपूर्वी पारंपरिक  वादातून धर्माची सुटका करून लोकांना एक ईश्वरवादाची,  अल्लाहा ची शिकवण देवून , फक्त  "  एकच  अल्लाहा  समस्त ब्रम्हांडाचा नायक  आहे "  .त्या एकाच अल्लाहा ची प्रार्थना करा . व  अल्लाहाची   प्रार्थना करताना अनुयायींना थेट संपर्क साधण्यासाठी कोणत्याही प्रकारे मधे दलाल मुक्त धर्माची संकल्पना मांडली.      सोबतच कोणत्याही प्रकारचे कर्मकांड करण्याची गरज नाही .

           इस्लामी संस्कृती नुसार कोणत्याही  प्रकारची साधी अगरबत्ती सुद्धा लावण्याची गरज ठेवली नाही .

कोणी ही व्यक्ती  ती मग शुद्र ही असेल ती सुध्दा  इस्लामी ज्ञान घेवू शकतो , अलिम मौलाना , मुफ्ती , हाफीज ,बनु शकतो ,शिक्षण घेवू शकतो .  ठराविक जातीत जन्माला आला तरच तुम्ही  शिकण घेवु शकतात आसा पारंपरिक वाद त्यांनी एकदम नाकारला.  

ज्ञानी माणसांला प्रेषित मुहम्मद स्व.यांनी मोठे स्थान दिले आहे,एक विद्वान एका शहीदांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे ,हा विचार त्यांनीच दिला आहे , ईस्लाम मधे एका शहीदांचे फार मोठं महत्त्व आहे , तरी सुद्धा त्यांनी विद्वानांना जास्त महत्त्व दिले ,मग ते कोणत्याही प्रकारचे  उदा. ज्ञान असणारा व्यक्ती म्हणजेच विद्वान फक्त धार्मिक ज्ञान असणं च हे ज्ञान ईस्लाम मानत नाही तर उदा. अर्थ शास्त्रात , रसायनशास्त्र , वैद्यकीय शास्त्रात, क्रीडा क्षेत्रात , लष्कर क्षेत्रात आशा विविध क्षेत्रातील ज्ञानाची बंद कवाडे प्रेषित मुहम्मद स्व यांनी सर्व मानवजातीला कायमची अगदी खुली केली .

त्याकाळी चीन हा जगातील आजच्या प्रमाणेच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खुप प्रगत देश होता तेथील अतिप्रगत ज्ञान मिळवण्यासाठी " तुम्ही चीनला जावुन ज्ञान मिळवा  लागलं तरी तुम्ही ज्ञान घेण्यासाठी जा " असा संदेश  त्याकाळी दिला .या पुरोगामी दुर-दृष्टीकोनाबददल प्रेषित मुहम्मद स्व यांचा नेहमीच अभिमान बाळगावा तितके थोडेच.

           श्री.  गुरु नानक देवजी , आपल्या ( जन्म साखी विलायत वाला ,पेज नंबर १६८) ) मधे म्हणतात की,  " ले पैगंबरी आया , इस दुनिया माहे ! नाऊ .

                 मोहम्मद मुस्तफा ,हो आबे परवा हे !!!!)

( अर्थात , ज्यांचं नाव मुहम्मद आहे ,ते या जगात प्रेषित बनुन आलेले आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकाच्या शैतानी शक्तींची भिती व भय नाही .ते बिलकुलच निर्भय  आहेत .)

         अल्लाह समोर सर्व मानव सम-समान, सारखेच आहेत हा पुरोगामी विचार मांडला .

              आपल्या ज्ञानाच्या जोरावर कोणी कितीही मोठा होवू , बनू शकतो , कोणीही राजा ,प्रधान बनू शकतो हा अत्यंत पुरोगामी विचार मांडला .राजा होण्यासाठी फक्त राजाच्याच पोटी जन्माला यावा लागतो हा विचारच नाहीसा करून टाकला व आपल्या कृतीतून दाखवून देत .

      याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील अहमदनगर व औरंगाबाद शहरांची ज्याने निर्मिती  केली ,शहर बसवले, चेहरा- मोहरा बदलला असे पंतप्रधान ,वजिर जो एक निग्रो गुलाम म्हणून विकत आणला होता व आपल्या कर्तृत्वाने मोठ्या पदावर गेला.  ते म्हणजेच मलिक अंबर हे होत .(उदाहरण . त्यांच्या महानिर्वाण नंतर ७००-८०० वर्षानंतर चे आहेत ).

   समतेचा संदेश देणारे पहिले क्रांतिकारक हे प्रेषित मुहम्मद स्व.हेच . आपल्या २३ वर्षांच्या कालावधीत समतेवर आधारित समाजरचना निर्माण करून , अरब देशात काळा -गोरा  हा भेदभाव खुप मोठ्या प्रमाणात होता , काळया गुलामांची खरेदी- विक्री खुप प्रमाणात  केली जात होती ,ती  गुलामगिरी नष्ट करून एका जैद नावाच्या काळया गुलामाचा आपल्या सख्ख्या आत्या बहीणाचा विवाह करून काळया -गोरयांचा भेदभावच  नष्ट केला .

तसेच ह.बिलाल नावाच्या तुच्छ समजले जाणारे गुलामगिरीतून मुक्त करून . नंतर मक्का विजयी दिवशी  पवित्र काबागृहावर चढून " अजान " देण्याचा आदेश दिला व समस्त जगाला दाखवून दिले की , कोणीही अपवित्र नसते.  समस्त मानव जात ही इस्लामच्या मुलभूत सिद्धांतानुसार एकच अल्लाहाची संतान आहेत. सर्व रंगाचे , वर्णाचे , वंशाचे ,एकच आहेत .हा भेदभाव ईस्लाम मुळापासून नष्ट करतो. सर्वांना समान न्याय , हक्क , संधी आहेत .हा क्रांतिकारी विचार पहिल्यांदा प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व. यांनीच जगाला दिला.

           स्वामी विवेकानंद म्हणतात ,""' प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व.आपल्या आदर्शवत जीवनात असं काही धडा घालून गेले की ,त्यांच्या अनुयायांनी , मुस्लिमांमध्ये संपूर्ण समता , बंधुभाव निरंतर नांदावयांस हवे , त्यांच्या मधे जातीचा , लिंगाचा , वर्णभेदाचा भेदभाव कदापी ही शिरू नये..""

                   स्त्रियांना वारसाहक्कात , मालमत्तेत वाटा आहे . तो देणारे जगभरात पहिला विद्रोही क्रांतीकारक विचार  प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनीच दिला.

      विश्वातील पहिला घटस्फोटीत , विधवा महिलांसाठी पुनर्विवाह  ही संकल्पना मांडली व जैद हारिसा नावाच्या एका गुलामाच्या घटस्फोटीत महिलाशी  स्वतः विवाह करून तुच्छ समजलं जाणार्या घटस्फोटीत महिलेला प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी पत्नी बनवून बहुमान दिला .

       स्री भ्रुण हात्या हे पाप आहे ही सांगणारं ही प्रेषित मुहम्मद पैगंबर च .

 अरब जगतात १४००-१५०० वर्षांपूर्वी समाजमनावर नसानसात भिनलेली होतं की , जन्मलेल्या मुलीला अशुभ मानले जातं असतं .  त्या जन्म झालेल्या मुलीला जिवंत पुरायच्या क्रुर प्रथा होती , तेथील स्थानिक पातळीवर ते प्रतिष्ठेचं समजलं जातं असतं.ती प्रथाच आपल्या २३ वर्षाच्या कालखंडात हद्दपार करून टाकली.

   स्त्रियांना  शिक्षणाचा अधिकार आहेत व त्या शिकल्या पाहिजेत असे ठणकावून सांगत दाखवून दिले आहे.

आपल्या वडिलांच्या संपत्ती तुन , पतीच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीतून मुलींचाही वाटा आहे हा क्रांतिकारी विचार अंमलात ही आणला.

जगप्रसिद्ध अंतिम प्रवचनातून (हॹतुल विदाह -खुतबा Farewell speech) मधे , त्यांनी महीलांच्या हक्काची काळजी घ्यावी असं तळमळीने सांगितले , " मित्रांनो ,पतीचे पत्नी वर हक्क आहे , तसेच पत्नीचे आपल्या पतीवर हक्क आहे.  पत्नीला ,बायकांना प्रेमाने व सहानुभूतीने सांभाळा ,कठोर , निष्ठुर होवू नये ,दयाळु राहा , तुम्ही आपल्या अल्लाहाच्या  साक्षीने आपल्या पत्नीला स्विकारले आहे ,तर काळजी घ्यावी . पत्नी चे जे काही आधिकर असतील  ते सर्व द्या . तुमच्या वर विश्वास टाकला आहे ,तर विश्वासघात करू नका , तुम्हाला महाप्रलयाच्या (कयामतच्या ) दिवशी अल्लाहा समोर हिशोब द्यावाच लागेल . या दिवसाची कायम आठवण ठेवा ."" 

  आपल्या महानिर्वाणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत महीलांची  तळमळ व्यक्त केली , काळजी घेतली .

      महात्मा फुले यांनी आपल्या दुर्मिळ ग्रंथात ;"सार्वजनिक सत्य धर्म "मधे लिहीतात ,की, 

 ""    तेरावे सद्दीची पैंगंबरी खुण ! दावितो प्रमाण कुरआणात !

            जगी स्री पुरुष सत्यधर्मी होती !

आनंद वतनी ज्योती म्हणे !! ""

             पुढे पुन्हा  महात्मा फुले  यांनी पैगंबरांवर पहिला पोवाडा लिहिला व त्यात ते स्तुती करताना लिहीतात की , " 

     कोणी नाही श्रेष्ठ ! कोणी नाही दास !

जात प्रमादास खोडी बुडी ! मोडीला अधर्म आणि मतभेद !

सर्वात अभेद ठाम केला !!! " 

(   अर्थात ;- " पैगंबरांनी श्रेष्ठ -कनिष्ठ हा भेद नाकारला , गुलामगिरी नाकारली , जातिभेद, जातीपाती बुडासकट नष्ट केले , अधर्म आणि भेदाभेद मोडुन काढला , सर्वात्र अभेद ,समता, बंधुभाव कायम केला !!')

      पैगंबरांनी प्रस्थापित केलेल्या समतेवर जगप्रसिद्ध साहित्यिक व शायर डॉ इक्बाल लिहीतात  की ,.   

         " एक ही सफ मे खडें हो गऐ मेहमूद और अयाज !!

         ना कोई बंदा रहा , ना बंदा नवाज ""!!!

( अर्थात :- मस्जिद मधे नमाज अदा करताना एकाच रांगेत देशाचा बादशहा , राष्ट्रपती ,च्या खांद्याला खांदा लावून एक गुलाम उभा राहिला ,कोणी गुलाम नाहीत कोणी मालक नाही ....)

पैगंबर स्व.यांनी अभुतपुर्व क्रांती घडवताना संपूर्ण अरब देशात व्यसनापासुन कित्येक संसार उध्वस्त झालेली पाहून नशा मुक्त, व्यसनमुक्त  चळवळी चालवुन संपूर्ण अरब प्रदेश व्यसन मुक्ती केला . ""  दारू बनवणारा ,त्याची विक्री करणारा ,  ने आन, व्यापार  करणारा , मदत करणारे सर्व गुन्हेगार ठरवले , ""  अरब प्रदेश व्यसन मुक्त केले .

     अर्थ व्यवस्थेत अभुतपूर्व क्रांती घडवून आणली बिना व्याजी अर्थव्यवस्था निर्माण केली , व्याज घेणं- देणं दोन्हीला हराम करून बंद केले , सावकारी पध्दतीचा नायनाट केला .

त्यासाठी श्रीमंत वर्गात जकात पध्दत चालु केली ती अनिवार्य करण्यात आली . यामुळे त्याचे चांगले परिणामही दिसू लागले , समाजातील बहुसंख्य कुटूंब जकात देण्या ईतपत सक्षम झाली व अशा कित्येक गरीबांना त्याचा लाभ झाला.

साक्षरतेची , शिक्षणाची अदुतिय क्रांती घडवून आणली . समाजातील स्री शिक्षण अनिवार्य केले , मुलं-मुली, वृध्द व्यक्तींवर शिक्षण अनिवार्य करण्यात येवून. एका शिक्षीतांने  दहा निरक्षरांना  ज्ञान देण्याचं काम करावे . जेलमधील शिक्षीत,साक्षर कैदींना निरक्षर कैद्यांना शिक्षण देणे अनिवार्य केले . शिक्षणाची अभुतपूर्व क्रांती घडवून आणली.

       आति- विशेष बाब  म्हणजे  जगातील इतिहासात तोडच नाही आशी विषेश  म्हणजे  प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व . स्वतः एक निरक्षर , अशिक्षित असून , स्वतः ला लिहीता-वाचता येत नव्हते . तरी सुद्धा , सर्व अरब प्रदेशात साक्षरतेचे महत्व देवून संपूर्ण प्रदेश साक्षर केला . याला एक अद्भुतीय  क्रांतीच घडवून आणली.

              या सर्व न भूतो न भविष्यते अशा घडवलेल्या क्रांती चे श्रेय स्वतः ला यतिकिंचतही न देता सर्व काही श्रेय जगत निर्मात्यां अल्लाहा रबबुल आलमीनला दिले !!! मी हे सर्व अल्लाहाचेच काम करत आहेत .

ते स्वतः म्हणतं ,मी तुमच्या सारखाच एक सामान्य माणूस , कार्यकर्ता आहे, हे सर्व यश अल्लाहा रबबुल आलमीन च्या कृपेने मिळालं आहे.आशी ठाम भूमिका घेउन स्वतः ची विनम्रता संपूर्ण जगासमोर मांडली ... केवढी मोठी विनम्रता ही जगाच्या इतिहासात तोडच नाही .

    प्रसिद्ध तत्वज्ञ ;- बर्नार्ड शॉ नोबेल पुरस्कार विजेते म्हणतात ,की ," मुहम्मद स्व .यांनी दिलेल्या शिकवणीबाबत माझ्या मनात आदर आहे .मी त्यांची प्रशंसा करतो कारण त्यांच्या मध्ये जबरदस्त तेज आहेत.प्रत्येक वयोगटास आवाहन करणारे आणि जीवनात होणारे परिवर्तन पोचविण्याचे सामर्थ्य असलेला हा एकमेव धर्म आहे असे मला वाटते .या व्यक्तींचा मी अभ्यास केला आहे, उद्याच्या युरोपला ईस्लामची तत्व प्रणाली मान्य होईल असे मी भाकीत केले आहे . कारण आजच्या युरोपने ते मान्य करण्यास सुरुवात केली आहे 



लेखक डॉ सलीम सिकंदर शेख बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर 

९२७१६४००१४ .....

प्रेषीत हज. इब्राहिम अलै.ना अल्लाह ने स्वप्नात  आज्ञा झाली तुझा सर्वात जास्त प्रिय असेल ते कुरबान कर. हज.इब्राहिमांच्यां   डोळ्यांसमोर विज कपकपावीगत झालं. हज. इस्माईल अलै.डोळ्यासमोर दिसत होते.  उतारवयात, म्हातारपणी ( ८०) आंनशीव्या वर्षात जन्म झालेला एकुलता  हज. ईस्माईल अलै. मुलगा , अल्लाहाला कित्येकदा दुआ मागुण झालेल्या मुलाला अल्लाहा त्याची कुरबानी  मागतात .आपल्या अंगावर काटा शहारै आणणारी गोष्टं. अल्लाहा आग्नि परीक्षाच घेऊ पाहत राहिले.क्षणाचाही विचार न येता प्रेषित इब्राहिम अलै.नीं हा संदेश  पत्नी हज.सारा अलै. व कोवळ्या मुलाला इस्माईल अलै .नां अल्लाहा (ईश्रवर)ची ईच्छा सांगतात .लागलिचच   आज्ञाधारक मुलगा हज.इस्माईल अलै. वडिलांच्या आज्ञेला  यत्किंचितही विचार न करता अल्लाहा(ईश्रवरा)चीच ईच्छाच असेल तर , तात्काळ होकार देतात. 

तारीख जिलहिजजा(अरबी) १०दहा असते . मिना(मकका  च्या ७ किलोमीटर दक्षिण- पुर्वेला ) नावाने प्रसिद्ध असलेल्या डोंगर व ओसाड भयंकर वाळवंट  मैदानात, पवित्र हाज करण्यासाठी जाणारे हाजी आपला अधिक काळ जिल-हिजजा चे ८.१०.११.१२.तारीखेचे चार दिवस याच ठिकाणी व्यतीत करतात.,( आज लाखोंच्या संख्येने वातानुकुलित टेंट ची गिनीज बुक्स मधे नोंद आढळते)वयोवृद्ध वडील उतारवयातील काठी ज्याला म्हणतात अशा आपल्या काळजाच्या तुकड्यांला घेवून कुरबानी साठी सजवून तयार करून नेतात. मन, डोकं स्तब्ध, सुन्न करणारी वेळ..काळीज लट-लट  करणारी घटना.हा विचार करून. म्हतारी आई-बाबांची कसोटी पहाणारा प्रसंग. तरीसुद्दा

अल्लाहाच्या परीक्षा साठी

प्रेषित इब्राहिम पुत्र प्रेमापोटी डोळ्याला पट्टी बांधून कुरबानी साठी  मुलांवर धारदार शस्त्र चालवतात तर त्या क्षणार्धात अल्लाहानेच  डोळ्यांची पापणीलवण्या आधीच चमत्कारिक घटना घडवून तेथे विशेष ईशदुत जिब्राईल अलै.द्वारे  दुमंबा (,मेंढा) पाठवून दुमंब्याची कुरबानी (बळी)दिली. प्रेषित इब्राहिमांना वाटले की मी अल्लाहाच्या ईच्छेखातर आपल्या सर्वांत प्रिय अशा पुत्राला कुर्बान केले.परंतु डोळ्याचीपट्टी काढून बघतात तर आश्चर्यचकीत होतात,?? हे काय आश्चर्य??? हे सर्व लिला बघून प्रेषित इब्राहिम  अल्लाहची कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतात .

अल्लाहाने प्रेषित इब्राहिम अलै.व हज. इस्माईल अलै यांची सत्व परीक्षा बघून .. समस्त मानवजातीसाठी धडाच  दिला.

परमेश्वर, ईश्वर, अल्लाहला कोणत्याही प्रकारची नरबळी ची अपेक्षित नव्हते च मुळात.. ज्या ठिकाणी " अल्लाह मानवाला सत्तर आई पेक्षा ही जास्त पट अधिक प्रेम, करुणा, ममता करतात " त्या ठिकाणी थोडे ते मुलाचा बळी घेऊ शकतील.. थोडे विचार करण्या सारखी गोष्ट आहे.

  तदनंतर हाजारोंवर्षांपासून  त्याचे प्रतिक म्हणुन जगात अनुयायीं  ऐपतीप्रमाणे कुरबानी करतात.

    धनिक वर्ग ज्यांची पवित्र- हज यात्रा करण्यासाठी ऐपत असणाऱ्या व्यक्ती पवित्र- मक्का येथे हाजला जाउन, हाजची एक महत्त्वाचे कार्य (फर्ज)कुर्बानी करण्यात येते. 

  ऊर्द महिन्याचा शेवटीचा १२वा महिना "जिल-हिजजा " ला हाजी. लोकं  ता. ८ जिलहिजला मक्का च्या काबागृहामध्ये अंगावर पांढराशुभ्र- कपडा लपेटून पुरुष अडीच- तीन मीटर लांब कपडाअंगास गुंडाळून व स्त्रिया पांढराशुभ्र ड्रेस, कपडा परिधान करतात त्यांस "ऐहराम " संबोधतात. 

      असे ऐहराम पांघरूण लाखोंच्या संख्येने हाजी लोकं मक्का येथील पवित्र  पवित्र खान -ए -काबा च्या प्रदक्षिणा करतात त्या दरम्यान व हाजमय वातावरणांत चालता- चालता

 "  आल्लाहा मी हजर आहे  ", "आल्लाहा मी हजर आहे ", "आल्लाहा  मी हजर आहे  "...आशा मंजुळ स्वरांचा गजर निनाद  दुमदुमत रात्रंदिवस  मक्केच्या हाजमय वातावरणात  व तेथुनच मीना नावाच्या दक्षिण-पुर्वेस सात किलोमीटर अंतरावर असलेल्या"  आराफात  " च्या पवित्र ऐतिहासिक मैदानात पोहोचतात .९ नऊ जिलहिज हे  हाज  चा प्रमुख मुख्य दिवस असतो .आपल्या पापांची क्षमा ,करुणा ,मागतात ,मुला-बाळांसंबंधी, जवळीलनातेवाईकासंबंधी, आपल्या देशासंबंधी त्या पवित्र ठिकाणी दुआ, याचना करतात . 

जगात एकमेव पवित्र स्थळ असेल की जगाच्या पाठीवर एकही देश असा नसेल की  त्या ठिकाणचा माणुष्य नसेल.  जगातील ३५६४ बोलीभाषा  बोलल्या जातात , जगाच्या  कित्येक ठिकाणाहून आलेले हाजी  एकाच आराफात च्या पवित्र मैदानामध्ये एकत्र जमून  कोणीही उच्च निच नाही,कोणी काळा -गोरा नाही ,सर्व लेकरे आल्लाहाची  सारखीच  ५०-६० लाखोंच्या संख्येने लोक एकाच रांगेत- छताखाली बसून अल्लाहच्या आदेशाचे पालन करतात, एकाच अरबी भाषेच्या दिव्य कुरआन मजीदने सांगितलेल्या आदेशाचे पालन करतात. रडून- व्याकुळ होऊन,ऊर बडवून अल्लाहा जवळ स्वत: केलेल्या कळत-नकळत पापांची माफी मागतात . पाप मुक्तीची प्रार्थना करतात. 

        याच पवित्र "आराफात " मैदानावर  दिनांक 3 मार्च  ६३२ या दिवशी अल्लाहचे प्रेषित मुहम्मद सल्ल.नी मक्का विजयानंतर ," जीवनाच्या अंतिम हाज "-यात्रेला लाखोंच्या अनुयायी ,लाखों लोकां समोर -" जगातील संपूर्ण सृष्टी व मानवी कल्याणासाठीच "  जगप्रसिध्द ऐतिहासिक अशी नोंद आहे असे  " अतिंम प्रबोधन, प्रवचन, भाषण, खुतबा " - दिले  होते. असो. 

येथुनच हाज यात्रेकरू जे प्रेषित इब्राहिम अलै.यांना कुरबानी पासून वारंवार मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्याऱ्या अशा तीनही सैतानाच्या प्रतिकृतीला दगडी, कंकरी फेकून मारतात. 

 परतीत पवित्र खाना -ए- काबाला परिक्रमा करुन कुर्बानी विधी ,डोक्यावरील केसांची टक्कल करुन हज चा विधीपूर्ण करण्यासाठी जातात. 

  फक्त कुरबानी करण्याचा उददे्शच  प्रत्येक धर्माच्या दारिद्र्य रेषेखालील वंचित ,गरीबांच्या घरापर्यंत मदत पोहचवली जाईल येवढी काळजी घेण्याचे . ईदच्या निमित्ताने का होईना त्यांची मुलं खातिल व ईदचा आनंद घेतील. सर्व समाजातील गोरगरीब जनतेला ईद व सण हे उत्सव असतात..

खरोखरच हेच अंतिम सत्य असतं..

यंदाच्या वर्षी पंढरपूरची आषाढी एकादशी व ईदुल अजहा हा योगायोग जुळून अल्लाह परमेश्वर ईश्वराने एकत्र आणून समभाव एकतेचा प्रतिक होउन सर्व जगाला प्रेम अर्पावे....

ईद साजरी करण्याचा उद्देश हाच असतो सर्व जग निरोगी व  शांत राहणं ..... सर्व धर्मांच्या लोकांना समजून घ्यावे...हिच माणुसकीचा धर्म....




शब्दांकन:- डॉ सलीम सिकंदर शेख

बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर

९२७१६४०००१४...

🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

रमजान ईद मुबारक २०२३ 

ईद मुबारक दिन २२-०४-२०२३ 

"  इस्लाम समजून घेताना  "

।।।   ईद - उल  -फितत्र ;- आनंद - बक्षिसे मिळण्याचा दिवस,.....!!!

लेखक डॉ. सलीम सिकंदर शेख.

बैतुशशिफा दवाखाना ,श्रीरामपूर.

९२७१६४००१४ 

इस्लाम   अरबी शब्दाचा अर्थ " शांती --अमान '" 

 शांतीच्या मार्गावर चालणारा , अर्थात अमन पसंत.

भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री स्वर्गीय सौ. सुषमा स्वराज‌जी . या युनोच्या संमेलनांमधे  सहभागासाठी गेल्या होत्या . जगातील नेत्यांसमोर भाषण करताना , इस्लाम चा  हिंदी भाषेमधील अर्थ पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना आपल्या  परखड ओघवत्या  शैलीत सुनावले की "  इस्लाम शब्द का  अर्थ शांती होता है  ; " " " शांती 'होता है "  शांती " ,  और अंग्रेजीमे  अर्थ. "पीस..पिसफुल"  है ., आपको शायद तो पता है  ; और मालुम  होना भी चाहिए ‌ ;;  याद भी होना चाहिऐ  "   जबरदस्त भाषणाची सुरुवात करून पुन्हा पुढे संपूर्ण भाषण ओघवतं झाले.असो...!!!

इस्लाम मुळात जगात आलाच  अराजक परिस्थितीत निर्माण झालेली , नितीमत्ता शिल्लक राहिलेले नव्हती , बाप जन्मालेल्या जिवंत मुली गाडुन बक्षिसे मिळवीत होता , नाद गाणं नंगानाच हैदोस घातला जात होता, प्रत्येक माणसांकडे रणडया  या प्रतिष्ठेचं चिन्हं समजलं जातं होते , प्रत्येक घराघरात दारू तर प्रतिष्ठेची बाब झाली होती . सावत्र आईशी ही लग्न करण्याला चुकीचे समज नव्हते.. नितीमत्ता शिल्लक राहिलेले नव्हती. पत्नी फक्त हौसेचे साधन म्हणून वापरली जात होती. महिलांना तर कवडीमोल किंमतीत उपलब्ध होत होती. एवढ्या मोठ्या भयानक परिस्थिती एक उगवता सूर्य चंद्र त्या अरबी भुमीत सच्चा न्यायीक व्यक्ति अल्लाह ने प्रेषित म्हणून हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या रुपाने रानटी वाळवंटात प्रेमाचा संदेश देण्यासाठी पैंगंबर म्हणून पाठवलेत. त्याचबरोबर अल्लाहने आपला संदेश घेऊन  ईशदुत हजरत जिब्राईल (जिब्राल्टर) अलै. यांच्या द्वारा वेळोवेळी मानव-कल्याणासाठी संदेश घेऊन २३ वर्ष घेऊन आलेत ,त्याच २३ वर्षाच्या अभुतपूर्व क्रांती ने आज १४४४ वर्ष जगाला दिशा देण्याचे काम केले. त्याच  दिशेने बघुया..

प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांना अभुतपूर्व क्रांती घडवून आणण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील व भिती ही दाखवावी लागेल, आळशी वाळवंटातील लोकांसाठी काही उत्साही वातावरण निर्माण करणे गरजेचे होते. पुढे बघू या.

इस्लाम लोकांना  अल्लाह (ईश्वराचे ) भय बाळगण्याचे तसेच  संपूर्ण समर्पण करण्याचा आदेश देतो .एकाच अल्लाह ( ईश्वरा) ची आराधना करावी. अर्थात एकेश्वरवादाची शिकवण देतो . या जगात आणु - रेणु - चंद्र - सुर्य - तारे - पृथ्वी - हे ब्राह्मंड ( गॅलॅक्सि , Univers) चे प्रत्येक क्षण - क्षण,कणं न कणं निर्माण करून तो आप- आपल्या काटेकोर वेळा पाळुन चालवणारा फक्त एकटाच अल्लाह ( ईश्वर) आहे. माणवजातीला जन्माला घालणारा ही तोच अल्लाह आहेत व परलोक घेऊन जाणारा ही तोच अल्लाह आहेत. मनुष्य फक्त एक नाटकातील पात्रे आहेत... म्हणुनच " अल्लाहु अकबर "  या तीनही लोकांत, सृष्टीला चालवणारा फक्त एकटाच अल्लाह (ईश्वर)आहे.म्हणुन एकाच अल्लाह( ईश्वरा)ची आराधना करावी म्हणजे एकेश्वरवादाची शिकवण. असो.

त्यासाठीच , हजरत मुहम्मद स्व सल्लम यांना मानव कल्याण - जन सुधारणा  मार्गदर्शन करण्यासाठी प्रेषित- पैंगंबर -संदेश वाहक  म्हणून अंतिम प्रेषित म्हणून घोषित केले..

  प्रेषित मुहम्मद स्व सल्लम यांना एका खेड्यूतांनी प्रश्न विचारला, " पैंगंबर मुहम्मद स्व सल्लम ," " दिईन ( धर्म) म्हणजे काय ??

लगेच उत्तरादाखल तीन वेळा एकच वाक्य उच्चारले, " अद् - दिईन - नु - नसीह‌..!  , अद् -दिईन -नु -नसीह!! , अद्-दिईन- नु- नसीह !!! 

अर्थात:- !  लोक- कल्याण -हाच- दिईन ( धर्म‌) आहे !

             !! लोक -कल्याण- हाच -दिईन (धर्म‌ )आहे !!

            !!! लोक- कल्याण -हाच- दिईन (धर्म‌ )आहे !! 

अल्लाहच्या लोक- कल्याणकारी योजना राबविण्यात आल्यात . 

ईस्लामचे  संस्कार मूल्यं:-  "  आपल्यासमोर कोणी लहान- मोठ्ठां , पुरुष -महिला - दिसताच, त्यांना आदराने :- "अस्सलामुआलैकुम- व- रहमतुल्लाह -व - बरकातहु " असा नमस्कार घालतात , अर्थात " तुमच्यावर आल्लाहाची शांती असो - कृपादृष्टी-दया- बरकत असो ". या वाणीत  जिव्हाळा - विश्वास - प्रेम भावना व अल्लाह चे आशिर्वाद सुध्दा   !! 

  = उत्तरादाखल समोरील बांधव  त्याला  , " वालेकुम-स्सलाम - व- रहमतुल्लाह -व- बरकातहु ".  अर्थ ही तसाच मार्मिक ;- " माझ्याप्रमाणे तुझ्यावरही  अल्लाहची शांती - कृपादृष्टी - बरकात असो." म्हणजेच डब्बल आशिर्वादच . 

 उत्तराने समोरच्या  मनाला   प्रेम ,वात्सल्य ,  मनाला आपुलकीने 

  चांगले चिंतित आहेत. आपुलकीच्या उत्तराने किती हायसे वाटत असणार ,. कितीही मोठा- मनुष्य-.गरीब - भिकारी- मालक  , एक गुन्हेगार  असो.  सात जन्माचा दुश्मन असला ,तरी ,  किंवा बादशहा ला एक गुलाम , किंवा ‌कैदेत असणाऱ्या गुन्हेगाराला बाहेरून येणाऱ्या बादशहा -राजा सुध्दा  अशाच प्रकारे  अदरानेच " सलाम " करणार  -व -  पुन्हा समोरच्या कडून उत्तर  ही  याच भावनेने  येणार - देणार..!!

किती आदरयुक्त -प्रेमाची भावना इस्लामने जगाला दिली आहे ..

म्हणूनच , प्रेषित हजरत मोहम्मद सल्ल. , सांगितले आहे की , " कोणी उच्च- निच नाही  , कोणी श्रेष्ठ नाही , कोणी मालक नाही , कोणी काळा व  गोरा नाही ,  सर्व समान एकाच अल्लाह ने  निर्माण केले आहे.    समता बंधुताची शिकवणी दिली .

  तुमचा मित्र , नातेवाईक  कोणी खूप दिवसांनी आला तर त्याचे स्वागत एकमेकास आलिंगन - गळे भेटून देतात यामुळें एकमेकांच्या हृदयात - मनामध्ये  तुम्ही मिसळले जाऊन , एक प्रकारे विरोध नाहीसा होतो.   कट्टर दुश्मन असेल ; तरी  समोर जेव्हा समेट घडवून आणला जातो  ,तर  ,त्यावेळेस एकमेकांची गळाभेट घेऊनच  दुश्मनी संपवतात .

प्रेषीत मुहम्मद स्व . सल्लमांनी  सांगितले  ," तुम्ही तीन दिवसांपेक्षा जास्त काळ अबोल राहता कामा नये नाहीतर तुम्ही मुसलमानच नाही ".

प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांनी. सांगितले ," तुम्ही एकमेकांत समेट घडवून आणा व अल्लाहला   समेट घडवून  आणणारे जास्त प्रिय आहे."

 प्रेषीत मुहम्मद स्व. सल्लम म्हणतात ,"  सर्व प्राणीमात्र ईश्वराची लेकरेआहेत म्हणून त्याने निर्माण केलेल्या मानवाशी प्रेम करतो , सर्व मानवजातीस सामाजिक न्याय देतो .

 पवित्र कुरआन म्हणतो की, " आम्ही तुम्हाला सर्वांना एकाच स्री व  एकाच पुरुषा पासून निर्माण केले आहे , ; मग तुमचे विविध राष्ट्र -देश - विविध ( कबील्यांत) भावक्यात व  विविध वंशात विभागले गेले ; जेणेकरून तुम्हाला एकमेकांना ओळखता यावे  ; परंतु अल्लाह जवळ श्रेष्ठ तोच असणारं आहे जो चारित्र्याने श्रेष्ठ असणारा आहे " (  पारा नं. २६ ,सुराह नं ४९ सुराह हुजूरात आ.नं.१३ वी )

         ‌‌दिव्य कुरआन म्हणतो की ," ज्याने अनुरेणू इतके सत्कर्म केले असेल त्याचे फळ त्याला   तितकेच मिळेल ;   व ;  ज्याने  जितके दुष्कर्म ,कुकर्म ,वाईट कर्म त्याचे फळ त्याला  त्याचप्रमाणे भेटतील".  

अल्लाह ने पैगंबर मार्फत दुष्कर्म करणाऱ्यांना दोजख ( नरका) ची भिंती दाखवून  त्याच कुकर्म करणाऱ्या कडून सदाचार करून घेतले. जे अरब लोक जिवंत मुली गाडुन बक्षिसे मिळवीत होते तेच अरब लोक मुलींचे उत्साहाने कन्यादान करण्यात सबाब समजू लागले. महिलांना मान सन्मान मिळू लागला. 

गरीब -गरजू - अनाथ मुलांना - पीडीतांसाठी जकातीचे पैशे वाटून खुशाली आली कालांतराने गरीबांच्या अर्थव्यवस्थे मोठी होऊन गरीब लोक जकात देण्याची पात्रता निर्माण झाली..

अल्लाह चे भय व कठोर कायदे आणुन अराजकता माजलेल्या वाळवंटात प्रेमाचा संदेश व सुव्यवस्था अबाधित झाली. 

श्रीमंत लोकांना गरीबीची जाणीव होण्यासाठी रमजान मुबारक रोजा ठेवणं अनिवार्य करण्यात आले . यामुळे प्रत्येक श्रीमंत लोकांना गरीबीची, भुकेले कसे जगत असणार याची जाणीव निर्माण होऊन त्यांच्या जकातीच्या पैशातुन गरीबांच्या अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारली गेली 

आपण  २९  दिवस  उन्हाळ्यात अल्लाहच्या मर्जी संपादन करण्यासाठी रोजे  ठेवून अल्लाहाचे आराधना- उपासना- ईबादत- नामस्मरण केले .  खुप तहान लागलेली असतानाही अल्लाहच्या मर्जी साठी भुकेची तमा न बाळगता १३-१४ तास  सहन केले,  तसेच घरातील  चार- पाच वर्षाच्या  लहान  बाळगोपालांनीही भर उन्हाळ्यात रोजे ठेवुन , तरावीह नमाज , दिवसभराचे पाच वेळी नमाज आदा केलीत ,  अजूनही कामधंदे -व्यवहार  सुरळीत झाले नसले ,  तरी , आपले अर्थीक गणिते संभाळून  प्रपंचाची अर्थव्यवस्था  व्यवस्थित करून . जकात- सदकाह - फितत्राह आजुबाजूच्या गरजू-पीडित-बेसहारा ,अनाथ ,विधवा तसेच योग्य व्यक्तीला  दानधर्म देऊन ,  सामाजिक बांधिलकी जपली. तसेच कळत- नकळत काही चूक तर झाली नाही ना हे क्षनोक्षनी याची काळजी घेऊन ,‌ २९ रोजे  सहन करुन   पुर्ण करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले . अल्लाहाशी  निरोगी आयुष्यासाठी , मुक्ततेची  क्षनोक्षनी दुआ केली. 

,जगातील  सर्व प्राणी - मानवांना  निरोगी आयुष्यासाठी रोजा ठेवून  , स्वतः उपाशी राहून  , दुसऱ्या समाजातील बांधवांना जे  बेघर आहेत ,उपाशीपोटी आहेत ,आशां गरजूंना  अन्न-पाणी , औषधे, झोपण्यासाठी निवारा व  पायी चालणाऱ्यां वाटसरूंना  चप्पल , मानसिक आधार दिला .मदत  केली‌,

     ‌तसेच  भारतीय बांधव आहोत . आपण सर्व बंधुभाऊ -भाई- भाई आहोत ,  पहाटे पासून.ते संध्याकाळ पर्यंत जेवढे काही करता आले तेवढी समाज सेवा अल्लाह (ईश्वर)  सेवा  तन-मन-धना ने   करून  आपण कोणत्याही लोभाची, कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता येवढं सगळे केलं . 

हे सर्व लोक कल्याण -हाच-दिईन धर्म‌ मध्ये च येते म्हणून ..

       प्रेषित मुहम्मद स्व यांना विचारला गेलेला प्रश्न ,"  दिईन धर्म‌ म्हणजे काय ? " 

प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांनी ,उत्तरादाखल तीन वेळा एकच वाक्य उच्चारले की " अद् -दिईन-  नु -नसीह " 

अर्थात :- " लोक कल्याण हाच (धर्म  ) दिईन  नु नसीह  "!! .

हे सर्व समजून उमजून घेऊन अल्लाह व प्रेषित मुहम्मद स्व सल्लम यांची मर्जी संपादन करण्यासाठी सहन केलत , खरोखरच सहनशीलता दाखवली याचं फळ , बक्षिसे अल्लाह ( ईश्वर) जरुर आपण केलेल्या सहनशीलतेप्रमाणेच निश्चितच मिळणार आहे, अल्लाहचा  बक्षीस-ईनाम प्राप्तीचा  दिवस आहे . निश्चितच  आपल्याला अल्लाहा बक्षीस  देणारच आहे  ,    कोणाला  किती हे आल्लाहा च ठरवणारे आहेत .जसे आपली आईवडील आपल्या मुलांची परीक्षा घेतल्यानंतर बक्षिसे देतात ,

 प्रेषीत मुहम्मद स्व. म्हणतात कि, " अल्लाहा आपल्याला ७०  आई पेक्षा ही जास्त प्रेम करतो ,'"

एक आई  लेकराला जेवढे प्रेम करीत असते ,ते अल्लाहा( ईश्वर) आहेत ,विचार न केलेला बरं." आल्लाहा जीवसृष्टीच्या प्रत्येक जीवजंतू वर आई सारखेच प्रेम करतात ,

 अल्लाह( ईश्वर) चा आजचा ईदु-ल - फितर चा  इनाम-बक्षीस- पारितोषिक वितरणाचा दिवस आहे . पारितोषिके तर मिळणारच आहे...

    आपला बंधुभाव -एकात्मता -स्नेह वृद्धिंगत व्होवो हीच अल्लाहा रबबुल आलमीन जवळ दुआ मांगतो....आमीन .... 🌹🌹🌹

(ईद - उल - फितत्र ) रमजान ईद मुबारक हो ... शुभेच्छा. 🌹🌹🌹

लेखन :- डॉ सलीम सिकंदर शेख 

बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर

    9271640014.

🌹🌹 @ डॉ @ स@ ली@ म@ शे@ ख@

रमजान मुबारक - २०२३ - रोज़ा २९ शुक्रवार दि. २१-०४ -२०२३ 

*"इस्लाम समजून घेताना"*

लेखन- डॉ. सलीम सिकंदर शेख, 
बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर

प्रेषित मुहम्मद स्व.सल्लम यांना एक प्रश्न विचारला गेला की ;  दिन-दिईन- (धर्म) म्हणजे काय ??.

यावर प्रेषित स्व.सल्लम यांनी  तीन वेळा एकच वाक्य उच्चारले की, अद दिईन नु नसीह ! , अद दिईन नु नसीह !! ,  अद दिईन नु नसीह !!!,

   अर्थात:- !! लोक कल्याण हाच दिईन (धर्म‌ ) ,  

                 !! लोक कल्याण हाच दिईन (धर्म‌ ), !!

                   !!  लोक कल्याण हाच दिईन (धर्म ) !! आहे...

 !    आज जुम्मातुल विदाह - व लैलतुल जा-य-जा ची अवलोकनाची रात्रं...!!

विदाह - या शब्दाचा अर्थ होतो अंतिम, पुन्हा परत न येण्यासाठी,आपण कालच्या लेखात उल्लेख केला होता अंतिम विदाह - म्हणजेच अखेरच्या पुन्हा परत न येण्याच्या  प्रवासाला तसेच प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम यांच्या हज्जतुल- विदाह,लग्नाच्या दिवशी मुलीला विदाह करतात त्याला ही विदाह म्हणून संबोधतात,असो.

रमजान महीन्यातील शेवटच्या जुम्माला -जुम्मातुल विदाह म्हणतात,याचं महत्त्व फार आहे, प्रत्येक जुम्माला एक क्षण महत्वपूर्ण असतो,त्यावेळी प्रत्येक दुआ याचना कबुल (पुर्ण) होतात, रमजान विदाह तर अजुनही महत्वाचे असणार त्या मंगलमय क्षणांची संधी साधण्यात मोठेपणा असून आदली रात्र लैलतुल कद्रची हजारों महीन्यांची एकच  कद्र च्या रात्रींचाही फायदा उचलला पाहिजे.

आज जुम्माची येणारी रात्र " लैलतुल जा-य-जा "-  अर्थात  उर्दू शब्द आहे, आपल्या प्रत्येक कामाचं जायजा घेणं ; मराठीत  " अवलोकन "होतो. प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्यक्तींच्या महत्वपूर्ण   गुणात एक खास गुण बघायला मिळातो,तो स्वतःच - स्वतः चे  अवलोकन करणं,  काय चुकलं ?  काय साध्य करायचे ? काय बाकी आहेत‌ ?,  छोट्या- छोट्या गोष्टींमध्ये चुकीचं झालेत का ?  , मग काय बरोबर केले पाहिजेत ?, याचं अवलोकन करणं.चुका झाल्याशिवाय सुधारणा होत नसते. मग माणुस चुकीतूनच पुढे  शिकत असतो. चुकांची गोळाबेरीज करून पुन्हा पुढे जायचं आहेत; सुधारणा करायची आहे ती आजच्या लैलतुल जा-य-जा  व  लैलतुल कद्र च्याच  रात्रीमध्ये , अल्लाह जवळ क्षमा - दया - याचना करून पुन्हा -पुन्हा  चुकीचे होणार नाहीत हे स्पष्ट शब्दात अल्लाह जवळ सांगणे,

 उदाहरणार्थ:- आपल्या खास जवळच्या मित्राला सर्व खासगी गोष्टी  सांगतो, त्या खाजगी गोष्टी मित्र सोडून कोणालाही सांगत नाहीत अशा आयुष्यातील प्रत्येक लहानाहुन -ही -लहान खाजगी गोष्टी ही अल्लाह जवळ एका मित्रांसारखंच सांगणे, तो अल्लाह आहे व्यक्तिगत म्हणणं पुर्ण (कबुल) करतात, म्हणुनच त्यांना अल्लाह म्हणतात.

 पापं - गुन्हे - चुका अल्लाहला सांगुन रिते होवून जाणे.‌ पुढे चांगले संस्कार मुल्यं शिकण्याची, जोपासण्याची तय्यारी करणे व  आयुष्यातील पुढील पडावासाठी - प्रवासासाठी तयारी सुरू केली पाहिजे  तर  मनुष्य या जगात पण प्रगती करतो व अंतिम प्रवासाचीही म्हणजे मृत्यूनंतरची यशस्वी होण्यासाठीही तय्यारी करतो " अर्थात  दुनिया भी और आखिरत भी बनानी होती है ! "   दोन्ही ठिकाणीचा फायदाच फायदा ..आज लैलतुल जा-य-जा ला फायदा उचलला गेला पाहिजे, भरपूर तिलावत करुन अल्लाह रब्बुल आलमीन ला राजी करून देशाच्या शांततेसाठीही दुआ याचना करून देशवासीयांच्या निरोगी आयुष्यासाठी दुआ याचना करणे.

                 तसेच हे फक्त रमजान स्पेशल पुरतेच न थांबता बारा ही महिने सबाब -पुण्यं कमवायला हवेत, सेवा कार्य सतत करणं याच   गोष्टींना- " सदका - ए-जारीया " म्हणतात,लोक कल्याणकारी कामे केल्याने सुद्धा सबाबच भेटतं. 

                  प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम यांना एक प्रश्न विचारला गेला की ,दिन- दिईन- (धर्म) म्हणजे काय ?,

   प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम यांनी उत्तरादाखल तीन वेळा एकच वाक्य  तोंडातून उच्चारले ," अद  दिईन नु नसीह !,"अद दिईन नु  नसीह !!, "अद दिईन नु नसीह !!!

      अर्थात :- !! लोक कल्याण हाच दिईन (धर्म‌ ) !!

                   !! लोक कल्याण हाच दिईन (धर्म‌‌ ) !!,

                    !! लोक कल्याण हाच दिईन ( धर्म )!!!उदाहरणार्थ :- (१) स्वतः साठी जी दुआ याचना मागतो, त्यामधे दुसऱ्या लोकांसाठी निरोगी आयुष्यासाठीही दुवा मागणे, आजारी रुग्णांसाठी ते निरोगी व्हावे म्हणून अल्लाह जवळ दुआ मागणे, इतर गरजेचे वेळी दुआ याचना करणे ,(२) मुलांसाठी  चांगले संस्कार मुल्यं शिक्षण द्यावीत, (३) दुसऱ्यांना चांगले उपयोगी सल्ले द्यावीत ; चुकीचे सल्ला देऊ नयेत,चुकीच्या गोष्टी पासून लोकांना सावधान करावेत,(४) दुसऱ्यासबघून चेहऱ्यावर हास्य यावेत,त्यांचे हासून स्वागत करावे ,(५) कुठल्याही अडचणींसमयी मदतीस धावून जावेत,आपल्या कुवतीप्रमाणे होईल तेवढी मदत करावी, (६) समोरच्याला वेळप्रसंगी काम यावे ,खास वेळे काढून वेळ द्यावा, (७ ) चांगल्या प्रकारे शिक्षण द्यावीत, मुलांना संस्कार -संस्कृती- रितीरिवाज -परंपरा- मुल्य शिक्षण द्यावीत, (८ ) आणिबाणीच्या परिस्थिती त्यांना धीर द्यावा, (९ ) वाईट सवयी लागल्या असतील तर त्यांना वारंवार चांगले संस्कार देऊन ,त्या  वाईट सवयींपासून परावृत (अलिप्त) व्हायला मदत करावी. मोटीवहेशनल शिबीर राबवावित, (१०) प्रत्येकाशी अदबीने व शांत धीम्या आदरयुक्त भावनेतून बोलावे ,हितगुज करावेत, (११)   भांडणे करूच नये,वाद विवाद टाळावेत, किंवा नजर अंदाज करावेत , (१२) प्रत्येकांचा आदर सन्मान करावा, (१३) शेजारी, मित्र ,आप्त परिवाराच्या सुख दुःखात सहभागी होऊन मदत करावी, (१४) ज्या परंपरा रितीरिवाज त्रासदायक आहेत त्यांना हद्दपार करावेत, (१५) शक्यतो मित्रांमध्ये,परीवारात, समाजातील लोकांमध्ये मेलमिलाफ,समेट करावं.घडवावे, (१६) कोणी आपल्या चांगल्या विचारांपासून भटकत असेल तर त्याला चांगल्याप्रकारे समुपदेशन  देऊन सरळ मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करावे.(१७) रस्त्याने चालत असताना रस्त्यावरील लोकांना त्रासदायक ठरणाऱ्या वस्तू बाजुला कराव्यात. (१८) उन्हाळ्याच्या दिवसांत पाणपोई सुरू करावीत, (१९) शाळा,मदरसा, कॉलेज, शिक्षण संस्था उभाराव्यात ,(२०) धर्मदाय दावाखाने चालू करावीत, (२१) झाडं लावावीत व निसर्गाचं संवर्धन करावेत, निसर्गाच्या कोणत्याही प्रकारच्या वस्तुची देखभाल करावीत, निसर्गाच्या कोणत्याही प्रकारची हानी होणार नाहीत याची काळजी घ्यावी. 

          .इ.अनेक गोष्टी या मानवी कल्याणासाठी अल्लाह जवळ " सबाब - ए- जारीया ' मध्ये येतात  . तुम्ही केलेल्या गोष्टी जो पर्यंत या जगात त्यांच्यांमुळे लोकांना फायदा होतो ,तो पर्यंत तुम्हाला सबाब भेटत राहील. यालाच सबाब - ए ,- जारीया म्हणतात. (कायम भेटणारे पुण्यं) अर्थात  तुम्हाला तुमच्या मृत्यूनंतर ही त्याचं पुण्यं (सबाब) भेटेल. 

अशा पुष्कळशा समाजोपयोगी गोष्टी आहेत ते बारांही महीने केल्याने तुम्हाला सबाबच भेटेल, तिचं एखादी चांगली गोष्ट तुम्हाला  तुमच्या कयामतच्या अंतिम दिवशी तुम्हाला जन्नतुल फिरदौस स्वर्गात जाण्यासाठी जरूर कामी येईल, तर शक्य असेल तेव्हा प्रत्येक समाजातील लोकांची मदत होईल तेवढी करावी...

    विशेष गोष्ट म्हणजे :- अंतिमतः  आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद आभार मानतो, जेवढं आभार मानले तेवढे थोडेच राहतील,महिनाभर ," इस्लाम समजून घेताना" लेख मालिका रोज काळजीपुर्वक वाचुन आपल्या मित्रांना नातेवाईकांना पाठवलीत.यासाठी सर्वांचे खुप खुप मनापासून धन्यवाद मानतो. त्यात प्रामुख्याने 

(१) दैनिक राष्ट्र सह्याद्री चे संपादक मा.श्री.करण नवले साहेब,आणि दैनिक राष्ट्र सह्याद्री वृत्तपत्र समुहाचे खुप मनापासून आभार मानतो ,

(२) दैनिक शौर्य स्वाभिमानचे

खंबीर मार्गदर्शक तथा स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि दैनिक साईसंध्याचे संपादक ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख, संपादक मा.श्री.उद्धव फंगाळ साहेब, व्यवस्थापकीय संपादिका सौ.किरण वाघ मॅडम आणि संपादक मंडळ तथा दैनिक शौर्य स्वाभिमान वृतपत्र समुह मेहकर जि.बुलढाणा, (३) दैनिक समतादुत चे संपादक इंजि. मोहसीन शौकत शेख आणि संपादक मंडळ,, (४) आंतरराष्ट्रीय वर्ल्ड पार्लमेंट न्यूज बुलेटीन  शाखा श्रीरामपूर चे क्रिकेट अंपायर ,समालोचक तज्ज्ञ श्री. दत्ता विघावे सरांनी २१० देशात मालिका पोहोचवण्याचं मोठं काम केलेत. 

(५) माहिती व कायदा वर्तमानपत्र व न्यूज पोर्टल बेलापूर चे अस्लमभाई सय्यद, अमन सय्यद, आणि संपादक मंडळ, (६) दैनिक बिनधास्त न्यूज चे अस्लमभाई बिनसाद, (७) दैनिक धुमाकूळचे इम्रान मुसा पटेल, (८) दैनिक मेमन रिपोर्टर चे अफजलभाई मेमन, (९) शेवगाव ताजी खबरे चे अलीमभाई शेख, (१०) दैनिक कॉमन न्युजचे अलताफभाई शेख, अहमदनगर , पुणे , मुंबई, ठाणे , सोलापूर, कोल्हापूर, सातारा, कराड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नासिक, जळगाव,धुळे,नांदुरबार, नागपूर,येथील दैनिकांनी व बहुतांश साप्ताहिक आणि न्यूज पोर्टल्स संपादकांनी आपल्या प्रसार माध्यमांतील जागेच्या हिशोबाने सदरील मालिका प्रकाशित केली, आणि वाचक वर्गाने देखील यास भरभरुन साथ दिली.या सर्वांच्या सहकार्यामुळेच लेखन मालिका लिहीण्याची मला संधी प्राप्त झाली.करीता या सर्वांचा मी मनस्वी आभारी आहे.. असेच प्रेम सदैव माझ्या व माझ्या परीवारावर राहु द्यावेत,भारतात सर्व धर्म समभाव एकता अखंडता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न व दुआ करीत रहावेत ही नम्र विनंती .

सर्व वाचकांना, हितचिंतकांना, पत्रकार,संपादक महोदयांना ईद च्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा -ईद मुबारक

आपला मित्र 

डॉ.सलीम सिकंदर शेख

 मोबा: ९२७१६४००१४ 


रमजान मुबारक २०२३*

गुरुवार दि. २०-०४-२०२३- रोजा २८

*"इस्लाम समजून घेताना"*

लेखन- डॉ. सलीम सिकंदर शेख ,

बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर


---------------------------------------------


आपण जन्म - जीवन कसे जगावे व मृत्यू बाबत बघितले होते, आज आपण मृत्यूनंतर दफन- कबर - कयामत - पुनर्जन्म वर चर्चा करू यात‌...

पवित्र कुरआन म्हणतो की,"  कुल्लू नफसून जायकतुल मौत "

 अर्थात :- हर जानदार चीज को मौत का मजा चखना है.." 

आम्ही तुम्हाला याच मातीत मिसळणार आहेत ".

जगात लाखोंच्या संख्येने मोठीं मोठें सम्राट - बादशहा -राजे दार्शनिक - खुप मोठे योद्धे होउन होउन गेलेत ज्यांनी निरंकुश सत्ता हुकूमत प्रस्थापित केले भोगल्यात -आप- आपल्या मस्तित , धुंदीत - मी पणापणे निरंकुश सत्ता हुकूमत चालविल्या परंतु त्या सर्वांना या जगातुन अलविदा होवे लागले. व आज ते कोणत्यातरी गावाच्या - शहरातील एका सामसुम जागी असलेल्या कब्रस्तानात ( स्मशानभूमीत) दफन आहेत व आपल्या अखिरतच्या जन्नतुल फिरदौस च्या यशप्राप्तीसाठी कोणीतरी प्रार्थना -दुआ- याचने ची वाट बघतायेत , मित्रांनों हे अंतिम सत्य कोणत्याही परिस्थितीत चुकलं नाहीच,असं म्हणतात की, अमेरिकनं पॉप स्टार मायकेल जॅक्सन याने १५० वर्ष जगण्यासाठी खुप काही केलं , प्रत्येक गोष्टीत वैद्यकीय दृष्टिकोनातून विचार करून आपलं खाद्यपदार्थ खान ,झोपनं, आपलं व्यक्तिगत सर्व कार्यक्रम हे वैद्यकीय दृष्टिकोनातून विचार करून चांगल्या प्रकारे राबविले जात होता परंतु त्याला मरण फक्त ४७-४८ व्या वर्षीच आले.असो.

एकदा हजरत प्रेषित मुहम्मद स्व सल्लम यांच्या जवळ एक अन्सारी व्यक्ती येवून प्रेषित मुहम्मद स्व सल्लम यांना विचारले की, " या रसुलूल्लाह स्व सल्लम. सर्वांत हुशार व समजदार व्यक्ती कोण असते? कोण असू शकतात ?,

 त्यावर हजरत मुहम्मद पैगंबर स्व सल्लमांनी उत्तर (जबाब)दिला की ," सर्वात हुशार समजूतदार व्यक्ती तो आहे ,जो दिवसांत जास्त वेळा आपल्या मृत्यूचा विचार करणारा " आपली प्रत्येक कृती मृत्यूला सामोरे ठेवून सदाचाराने करणारे व वागणारे "..

  पुन्हा प्रेषित मुहम्मद स्व सल्लम म्हणतात की," तुम्ही कायम कब्रस्तानात ( जिथे मृत्यूनंतर दफन केले जाते) -- स्मशानभूमी (= जिथे मृत्यूनंतर जाळण्याचा विधी केला जातो) जात जा !! जावे !!.

तुम्हाला तुमच्या मृत्यूची भिंती दिसून आली पाहिजे, या कब्रस्तानात- स्मशानभूमीत गेल्यानंतर तुम्हाला काही तुमचं केलेल्या चांगल्या किंवा वाईट -चुकीच्या गोष्टी आठवल्या पाहिजे ; जेणेकरून तुम्हाला मृत्यूनंतर या कब्रस्तानातल्या कोणत्या कबरीत आपण दफन केले जाऊ  याची लगेच आठवण आली पाहिजे ;  आठवणी जाग्या झाल्या सारखं होईल .. तुम्ही कोणतेही काम कार्य करताना आपल्याला या जगातुन अलविदा ( अलविदा :- या जगातुन कायमचाच निरोप) , अंतिम निरोप घेऊन जावंच लागणारं आहे म्हणून चांगले काम केले पाहिजेत..

          प्रेषित मुहम्मद स्व सल्लम म्हणतात की," प्रत्येक चांगला माणूस आपल्या मृत्यूनंतर काय होणार याची काळजी घेत असतो.".

मृत्यूनंतर कब्रस्तानातल्या एका कबरीमधे आपणास दफन केले जाईल ,त्यानंतर तेथील यमदूत कोण ? कोणते प्रश्न विचारला जाईल??  आपल्या शरीराच्या धडाला काय ? काय ? यातना भोगव्या लागतील ,हे फक्त कबरीमधील धडाला माहीत...??     तुमचे तुमच्या मागिल कर्मानुसार -कृतीनुसार, चांगल्या- वाईट कामानुसार तुमच्या शिक्षा ठरलेल्या आहेत; त्या सर्व चांगल्या- वाईट शिक्षा फक्त तुम्हाला स्वतःलाच भोगावे लागतील.. कबरीमधे दुसरा कोणीच येणार नाहीत. तुम्ही केलेल्या बऱ्यावाईट कामांचं फळ तुम्हां फक्त एकट्यालाच भोगावे लागतील...

पुन्हा प्रत्येकाला " कयामत " अर्थात:- आफत, -  तबाही- विनाशकारी दिवस --  प्रलयं- विपत्त्ति-शेवटचा न्याय निवाडयाचा दिवस -किंवा सृष्टीच्या सर्वनाशाचा दिवस , किंवा सृष्टीचा जलमय होण्याचा दिवस .

तुम्हाला जो अर्थ समजून घेण्यासाठी घ्यायचा तो घ्यावा .

मुस्लिम - ख्रिश्चन - यहुदी (ज्यू) धर्मातील ग्रंथानुसार सृष्टीच्या सर्वनाशाचा दिवस येणार आहे .

तसेच  श्रीमद्भगवद्गीता च्या अनुसार असं म्हणतात की,दोन कल्पो च्या नंतर सृष्टीचा अंत होत असतो.दोन कल्पोंचा अर्थ दोन हजार चतुर्युग यालाच दुसरा काव्य पुर्ण होणे यानंतर प्रलयंकारी (कयामत अर्थात) सृष्टीचा विनाश होत असते. असो.

           त्या दिवशी पृथ्वीवर जन्म घेतल्यापासून जेवढे मृत्यू झाले त्या सर्वांना कयामतच्या ( अंतिम न्याय निवाडयाच्या दिवशी) एकत्र करुन प्रत्येकाला आपल्या कामाचा हिशोब जाब द्यावा लागणार आहेत.. प्रत्येक मानवाला त्या दिवशी पुन्हा एकदा पुनर्जन्म मिळणार आहेत.. मग तुमची लाखों करोंडौं वर्ष जरी तुमच्या मरणाला झाली असतील तरी तुम्हाला या मातीतुन पुन्हा जन्माला घातले जाणार आहेत ,हे पवित्र कुरआन म्हणतो...

     मागील लेखात आपण पवित्र कुरआन म्हणतो बघितले होते की ," तुम्हाला याच मातीतून दुसऱ्यांदा पुनर्जन्म कयामत च्या दिवशी देणार आहेत"  तुमच्या हिशोबासाठी व त्यानंतर अनंत काळ तुम्ही तुमच्या कर्तुत्वा- कर्मानुसार नरक ( दोजख ) किंवा जन्नतुल फिरदौस ( स्वर्गात) मधे अनंत काळ ,तेथे कधीच मृत्यू नाहीत.. आशा ठिकाणी कायमच राहणार आहे.

पवित्र कुरआन म्हणतो की," जेव्हा कानांचे पडद्ये फुटतील तेवढा आवाज होईल , सर्व सृष्टीत अंधकारमय होईल,संगळ अस्त व्यस्त होईल ,त्या दिवशी माणूस सैरावैरा पळू लागतील सख्खे भाऊ - बहिण एकमेकांना ओळखणार नाही, आईवडील आपल्या मुलांना ओळखणार नाही, पती पत्नी एकमेकांना ओळखणार नाही,त्या वेळी- दिवशी अशी परिस्थिती राहील की  प्रत्येकालाच प्रत्येकाच स्वतःचच पडेल ..त्या दिवशी प्रत्येक माणसाचं असेच राहीलं ..( सुराह नं.८० ,आ.नं.३३ ते ३७),  जर स्वर्गात ( जन्नतुल फिरदौस,) की नरकात (दोजख) राहवयाचे यासाठी जीवनात कायम चांगले काम करणं फार गरजेचे आहे ... त्यासाठी मग..आपले व्यवहार-, वागणुक - आपले आचार - विचार,  चांगले संस्कार मुल्यं, शिक्षण, चारित्र्य निष्कलंक होण्यासाठी सतत कार्यरत रहा व सतत आपल्या अंतिम दिवसांची काळजी काळजीपुर्वक घेत राहणे गरजेचे आहे. हेच फक्त आपल्या हातात आहे... अंतिम सत्य कोणी ही नाकारु शकत नाहीत..हेच सत्य आहे...

(लेख वाचून आवडल्यास नक्कीच आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा व आपल्या परिवारास मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवावेत...)

आपला मित्र 

डॉ.सलीम सिकंदर शेख

 बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपुर

मोबा: 92716 40014

श्रीरामपूर-आगदी १५००ं वर्षांपूर्वी  रानटी -क्रुर-अमानवीय प्रथा- रितीरिवाजांनी व्यापलेला  वाळवंटातील व जगातील जनसमुदायाला एक अल्लाहा( ईश्वरा)ची शिकवण देत समस्त जगाने एका अल्लाहाची प्रार्थना करावी . त्यामध्ये कोणीही शुद्र-उच्च-नीच - काळा - गोरा नाही,  जगातील सर्व मानव जात ही एकच आदम ची लेकरे आहोत . 

म्हणुनच ती इस्लामी ज्ञान,शिक्षण घेवू शकते, ठराविक जाती जमातीत जन्माला तरच तुम्ही  शिकण घेऊ शकता हा चुकीचा समज  प्रेषीत मुहम्मद पैगंबर यांनी नाकारला, त्यांनी प्रत्येक 

विद्वानांना जास्त महत्त्व दिले, उदा.विद्वान-ज्ञानी  फक्त धार्मिक ज्ञान हेच फक्त महत्त्वाचे नसून  सर्व समावेशक ज्ञान  महत्वाचे आहे उदा.अर्थ,रसायन, वैद्यकीय, क्रीडा,लष्कर ई. विविध क्षेत्रातील विद्वान , तत्वज्ञ, ज्ञानी असलेल्यांना  ज्ञानाची बंद कवाडे प्रेषित मुहम्मद स्व. यांनी सर्व मानवजातीला कायमची खुली केली. चीन हा जगातील आजच्या प्रमाणेच तंत्रज्ञानाच्या,ज्ञानाच्या,  क्षेत्रात पुर्वीही खुप प्रगत  होता, तेथील अतिप्रगत ज्ञान मिळवण्यासाठी " चीनला जावुन ज्ञान घेवा लागलं तरी,  ज्ञान घेण्यासाठी चिनला जा", असा पुरोगामी दुर-दृष्टीकोनाचा  सल्ला प्रेषित मुहम्मद स्व.नी दिला.

 ज्ञानाच्या, कौशल्याच्या , तंत्रज्ञानाच्या जोरावर कोणी-कितीही मोठा होवू शकतो . पुढे जावू शकतो.

त्यामध्ये , राज्य कारभार सांभाळण्यासाठी फक्त राजाच्याच पोटी जन्माला यावं लागतं हा विचारच हजरत मुहम्मद पैगंबरांनी नाहीसा करून टाकून प्रत्येक्षात आचरणातून दाखवून दिले. 

समतेचा संदेश देणारे पहिले क्रांतिकारक प्रेषित मुहम्मद स्व.नींआपल्या २३ वर्षांच्या प्रेषित कालावधीतच समतेवर आधारित समाजरचना निर्माण करून माणसाला माणूस म्हणून माणसाप्रमाणे कसे वागवावे याचे उदाहरण समस्त जगाला दाखवून दिले . अरब देशात काळा - गोरा  भेदभाव मोठ्या प्रमाणात होता, गुलामगिरी च्या प्रथेने कळस गाठलेला .काळ्या निग्रो लोकांना माणूस म्हणून जगताना मान्यताच नव्हती , काळया गुलामांची खरेदी- विक्री खुप प्रमाणात केली जात असे,  गुलामगिरीला हद्दपार-नष्ट करून एका जैद नावाच्या काळया निग्रो  गुलामाशी आपल्या सख्ख्या आत्या बहीणी चा विवाह लावून काळ्या-गोऱ्यांचा भेदभाव नष्ट केला.

हजरत बिलाल रजि. (काळ्या  वर्णाचे) गुलाम म्हणून विकले गेलेल्यांना गुलामगिरीतून मुक्त करून  मक्का विजयी दिवशी पवित्र काबागृहावर चढून "अजान" देण्याचा आदेश देऊन  समस्त जगाला कोणीही अपवित्र नसते हे दृश्य दाखवून दिले. इस्लामच्या सिद्धांतानुसार एकाच अल्लाहा (ईश्वरा) ची , आदम ची संतान आहेत. सर्व रंगाचे-वर्णाचे- वंशाचे , सर्व एकच आहेत, हा भेदभाव इस्लाम मुळापासून नष्ट करतो. सर्वांना समान न्याय,हक्क,संधी देतो,हा पुरोगामी क्रांतिकारी समतेचा विचार प्रेषितांनी आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिला.

जगातील स्त्रियांनाही आपल्या वारसाहक्कात, मालमत्तेत वाटा आहे. तो वारसा हक्क  मिळवून देणारा जगभरात पहिला  क्रांतीकारक विचार प्रेषित मुहम्मद स्व.यांनीच दिला. त्याकाळात किरकोळ कारणावरून  वादविवाद होऊन त्याचे भयंकर रूपांतर हत्या -खुन, सतत च्या  कुठेतरी लढाई यामुळे  विधवां व अनाथांचे प्रमाण प्रचंड  प्रमाणात असल्याने विधवांना अतिशय हाल-अपेष्टां -त्रासांना- कुप्रथांना तोंड द्यावे लागत असत व अनाथ मुलांना तर  आधारच मिळत नसतं . विधवांना वेगवेगळ्या नजरेतून पाहिलं जातं होतं . विधवा -घटस्पोटींचे शब्दात वर्णन करणे अवघड होते .     हे सर्व बघुन विश्वातील पहिला घटस्फोटीत-विधवा-महिला पुनर्विवाहची संकल्पना मांडून जैद हारिसा नावाच्या एका गुलामाच्या घटस्फोटीत महिलेशी स्वतः विवाह करून तुच्छ समजल्या जाणाऱ्या घटस्फोटीत महिलेला प्रेषित मुहम्मद यांनी  स्वत:ची पत्नी बनवून बहुमान दिला. पैगंबरांनी आपले  विवाह घटस्फोटीत व विधवा  महिलांशीच करून प्रत्येकीला सम-समान पातळीवर ज्ञाय 

- हक्क स्वाधीन करून  काळाच्या प्रवाहात सामील करून मान -सन्मान - बहुमान प्राप्त करून समस्त जगाला दाखवले.

     🌺कन्यावध - स्री भ्रुणहत्या हे पाप आहे हे सांगणारे प्रेषित मुहम्मद स्व. पहीले  क्रांतिकारी पुरुष,

अरब जगात १५०० वर्षांपूर्वी स्त्री भृणहत्या मोठ्या प्रमाणात होत होत्या,समाजमनाच्या नसानसात ही कुप्रथा भिनलेली होती, जन्मलेल्या मुलीला अशुभ मानले जात असे,जन्मलेल्या मुलीला जिवंत पुरण्याची क्रुर प्रथा होती,  स्थानिक पातळीवर ते प्रतिष्ठेचं प्रतिकं समजलं जातं होते. परंतु प्रेषित मुहम्मद स्व.यांनी कन्यावधाला समुळ नष्टच करण्यासाठी अल्लाहाचे भय दाखवत पारलौकिक जीवनाचे नरक - स्वर्ग प्राप्ती बक्षीसांची सत्यता दाखवली.

पवित्र कुराणात सांगितले की,"  जिवंत पुरलेल्या मुलीला जेव्हा (कयामतच्या दिवशी) विचारलं जाईल की कोणत्या अपराधाची शिक्षा तुला दिली गेली आहे ?" तर ती सांगेल की माझा काहीही दोष,गुन्हा नसताना विनाकारण माझी हत्या करण्यात आली आहे,हे या लोकांनी मोठे पातक केले आहे, दोषींना शिक्षा देऊन मला इन्साफ (न्याय) मिळावा" 

तेव्हा अल्लाहा च्या शिक्षेपासून तुम्ही वाचू शकणार नाही,हे ऐकल्यानंतर ज्या -ज्या व्यक्तींनी आपल्या कोमल मुलींना पुरलं होते,त्या प्रत्येक व्यक्ती पश्चाताप करत धायमोकळून ढसढसा रडू लागलीत ,हे आम्ही काय मोठे पातक -पाप केलीत म्हणून,

    प्रेषित मुहम्मद स्व.सांगितले की," ज्यांना एक अथवा अधिक मुली असेल त्या पालकांनी, प्रेमाने,आपुलकीने त्या मुलींचे व्यवस्थिरित्या पालनपोषण, शिक्षण करून  उत्तम वर ( नवरा)बघून त्यांचे विवाह (लग्न) लावून दिले. तर ,त्या प्रत्येक व्यक्तीला जन्नतुल फिरदौस (स्वर्गात)मधे महाल भेटेल . तसेच ज्या व्यक्तींना दोन- तीन पेक्षाही अधिक मुली असेल, तर त्यांनी न कंटाळता त्या मुलींचे संगोपन व्यवस्थित करून उत्तम वर(नवरा) बघुन त्यांचे विवाह (लग्न) लावून दिले तर जन्नत  (स्वर्गा)त  माझ्या शेजारी त्यांचं महाल असेल व त्याचा मोबदला त्यांना अत्यंत चांगलाच असेल..

अशाप्रकारे वास्तविकतेचे धडे देत  अल्लाहा (इश्वर) चे  प्रिय  होण्यासाठी सत्कर्म अपेक्षित असल्याचे  सांगितले.

प्रेषीत मुहम्मद पैगंबर यांना १)हज.जैनब २)हज.रुकैयया,३) उममे कुलसूम ४) हज.फातिमा रजि.या चार मुलींचे संगोपन करुन त्यावेळच्या प्रतिष्ठित व्यापारी व घराण्यात लग्न करून दिलेत.त्यामध्ये " करबला युध्दातील जगाच्या कल्याणासाठी ७२ हौतात्म्य पत्करलेले हजरत इमाम हुसेन व हजरत इमाम हसन च्या आई हजरत फातिमा रजि. या सर्वांत छोट्या मुलीचा समावेश ही होतो .

हे स्वकर्तृत्वाने जगाला दाखवले.

यामुळे ज्यांच्या घरात मुली जन्माला  होत्या त्यांच्या चेहऱ्यांवर  चेहरे उजळून निघाले.

प्रेषित मुहम्मद स्व. यांनी लोकांकडून  जगप्रसिद्ध  आराफात च्या अंतिम संबोधनात  शपथेवर , "माझ्या जवळ प्रतिज्ञा (शपथ) घ्या की, अल्लाहा शिवाय इतर कोणालाही पुंजणार नाही , चोरी, व्यभिचार करणार नाही, मुलींची - कन्यावध करणार नाही.आपल्या वडिलांच्या संपत्तीतून मुलींचाही हिस्सा - वाटा आहेत. तो द्यावा.  बंधुंनो,पतीचे पत्नीवर हक्क आहे ,तसेच पत्नीचे आपल्या पतीवर हक्क आहे.  पत्नीला (बायकांना) प्रेमाने व सहानुभूतीने सांभाळा ,कठोर निष्ठुर होवू नये, त्यांच्या प्रती दयाळु रहा,  तुम्ही आपल्या अल्लाहाच्या  साक्षीने आपल्या पत्नीला स्विकारले आहे , तर तीची काळजी घ्यावी,  पत्नीचे जे काही आधिकर असतील ते सर्व तीला द्यावे,  तीने तुमच्यावर विश्वास टाकला आहे , तर तीच्या त्या विश्वासाचा विश्वासघात करू नका. तुम्हाला( महाप्रलया) कयामतच्या  दिवशी अल्लाहा समोर आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब द्यावाच लागेल,या दिवसाची कायम आठवण ठेवा,." ..🌹

असे प्रेषितांनी आपल्या महानिर्वाणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक  वर्गातील समुहाची व विशेषतः महीलांची तळमळ व्यक्त केली,काळजी घेतली.

थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या दुर्मिळ ग्रंथात ;"सार्वजनिक सत्य धर्म "मधे ,पैगंबरांवर पहिला पोवाडा लिहित स्तुती करत लिहीतात की, 

 अर्थ :- - " पैगंबरांनी श्रेष्ठ -कनिष्ठ हा भेद नाकारला,गुलामगिरी नाकारली,जातिभेद,जाती- पाती बुडासकट नष्ट केले,अधर्म आणि भेदाभेद मोडुन काढला,सर्वत्र अभेद-समता, बंधुभाव कायम केला !! 

पैगंबरांनी प्रस्थापित केलेल्या समतेवर जगप्रसिद्ध साहित्यिक व शायर डॉ.इक्बाल लिहीतात की, "एक ही सफ मे खडें हो गऐ मेहमूद और अयाज !! ना कोई बंदा रहा,ना बंदा नवाज !!"

अर्थात :- मस्जिदमधे नमाज अदा करताना एकाच रांगेत देशाचा बादशहा- राष्ट्रपतीच्या खांद्याला खांदा लावून एक गुलाम उभा राहु शकतो,यावेळी कोणं गुलाम नाहीत कोणं मालक नाही,अशी समता - समानता त्यांनी प्रस्थापीत केली.

प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व .यांना ,लिहीता-वाचता येत नव्हते,तरी सुद्धा सर्व अरब प्रदेशात साक्षरतेचे महत्व पटवून संपूर्ण प्रदेश साक्षर केला.

"न भूतो न भविष्यते" घडवलेल्या क्रांतीचे श्रेय स्वतः न घेता सर्व श्रेय हे जगत निर्मात्यां अल्लाहा ला दिलेत.असे म्हणत की, " मी हे सर्व अल्लाहाचेच काम करत आहेत"


लेखक- डॉ.सलीम सिकंदर शेख

बैतुश्शिफा हॉस्पिटल,श्रीरामपूर

९२७१६४००१४.

करबला युद्ध " जगातील गावा- गावात शहरात युद्धाच्या आठवणी आपोआपच मोहर्रम च्या दहा तारखेला " यौम- ए - आशुरा " च्या दिवशी कितीही कठोरमनाच्या माणसात जाग्या होतात.प्रेषित मुहम्मद स्व. यांनी अल्लाह च्या सत्यधर्म ईस्लामचा प्रसार- प्रचार करण्यासाठी अत्यंत हाल- अपेष्टा - छळछावणीत- उपाशीपोटी- कष्ट सहनशीलतेचे अंत बघून त्याला अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आशिया- युरोप- अफ्रीका खंडातील बहुतेक देशात सुव्यवस्थितपणे परिवर्तन घडवून आणले,जगातील प्रत्येक मानवाच्या कल्याणासाठी,जीव जंतू च्याही रक्षणासाठी, जगात ठिकठिकाणच्या राजेशाही, हुकूमशही, बादशाही,परीवार वाद, जुलमी राजव्यवस्था संपूर्ण लोकशाही पद्धतीने, (तलवारी च्या जोरावर नव्हेतर) आपल्या आचरणाने संपुष्टात आणुन " लोकशाही " व्यवस्था समस्त जगाला दाखवून देवून, अल्लाहच्या पवित्र कुरआन व हादीस नुसार स्वतः पवित्र मदीना शहरात याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जगप्रसिध्द मदीना करार करून जगाला दाखवून दिली. आपल्या अनुयायांना मित्रगण - सहाबा यांना आपल्या हयातीतच माझ्या नंतर समस्त जगात शासन व्यवस्था कशा पद्धतीने  निर्माण करावयास हवेत याचे प्रशिक्षण दिले.यासाठी आपल्या खास विश्वासू मित्र, सहाबा यांना "खलिफा " अल्लाहच्या नायब (डेप्युटी) ला म्हणतात, खलिफा ईस्लामी व्यवस्थेचा प्रशासकीय प्रमुख असतो.त्याला पवित्र कुराण,हादीस व " मजलिस - ए - शुरा" च्या अनुसरून निर्णय घेण्याचा अधिकार असतो. "मजलिस - ए - शुरा" अर्थात" तज्ञ,जाणकार सल्लागार मंडळ स्थापून " शुराई - निजाम"च्या माध्यमातून  लोकप्रशासन करणे यालाच " निजाम - ए -खिलाफत " म्हटले जाते ,याचे वारंवार उदाहरण प्रेषित मुहम्मद पैगंबर स्वतः प्रमुख असून सुध्दा आपले कोणतेही निर्णय आपल्या साथीदार मित्रांशी सल्ला मसलत करुनच घेत होते, प्रमुख गोष्ट म्हणजे त्या मध्ये किती ही छोट्या मित्राला ही सल्ला देण्याचा आधिकार होता. हे सल्ले अल्लाहा प्रत्येकाच्या मस्तिष्कात बुद्धित घालून त्या मार्फतच येत असतात. यालाच लोकशाही म्हणतात.असो.

प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी आपल्या मजलिस -ए - शुरांच्या सल्लागार नुसार असे पुण्यवान (राशिदीन) , अनुभवी (१) ह. अबु-बकर सिद्दीक रजि. (२) ह.उमर फारुख रजि. (३) ह. उस्मान गनी रजि. (४) ह. आली बिन आबु तालीब रजि. या वेगवेगळ्या घराण्यातील  कर्तव्यदक्ष साथीदारांची  क्रमाक्रमाने पुढील चार खलीफांची निवड करून त्याच्यावर सर्व जगभरातील लोकांना" एकनिष्ठता" ची शपथ (बैत) दिली गेली. प्रेषित मुहम्मद स्व. यांच्या महापरिनिर्वाणानंतर वरील चार खलिफांनी खूप चांगल्याप्रकारे ईस्लामी राज व्यवस्था आशिया, युरोप, अफ्रीका खंडातील खूप देशात आपल्या प्रतिनिधी मार्फत चालवली.. त्या चार ही खलिफांच्या राज व्यवस्थापनास " खुलफा - ए - राशिदीन " चे युग " म्हणतात, अर्थात या पुण्यंवान लोकांनी अल्लाह च्या पवित्र कुराण-हादिस च्या शिकवणुकीनुसार राज्य व्यवस्था चालवली. जगात आज ही आजरामर आहे  . 

महात्मा गांधी जी व विविध तज्ञांनी वेळोवेळी त्यांच्या कार्याची दखल घेऊन आपल्या देशात तशी राजकीय व्यवस्था करण्याची गरजही व्यक्त केली आहे ,असो.

चौथ्या खलिफा  हज. अली  रजि. यांच्या महानिर्वाणानंतर त्यावेळच्या 'सल्लागार (मजलिस ए शुरा) मंडळांने काही काळ ह. अलि. रजि.चे ज्येष्ठ पुत्र ह. हसन रजि. यांना खलिफा म्हणून घोषित करण्यात आले. मात्र तीव्र स्वरूपाच्या विरोध, मतभेदांमुळे व निष्पाप जीव धोक्यात घालून, निष्पाप नागरिकांना त्रास व रक्त सांडले जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने ह. हसन बिन अली रजि. यांनी स्वतः हुन पदत्याग केला.

या प्रसंगानंतर प्रेषित मुहम्मद पैगंबरांच्या शिकवलेल्या तत्त्वाला हारताळ फासून त्या काळातील मसजिस ए शुराला ( कायदे मंडळा) डावलून मनमानी करून प्रेषित मुहम्मद स्व यांचेच एक सहकारी ह. आमीर मुआविया रजि. यांनी स्वत:ला स्वयंघोषित खलिफा म्हणून  घोषित केले ,परंतु त्यांनी ईस्लामच्या तत्त्वज्ञान, तत्त्वप्रणाली नुसार न करता " राजेशाही बादशहा पध्दतीनुसार राजेशाही राहणे, वागणूक व एक मोठा राजप्रासाद ची बांधणी करुन राज्य कारभार करण्यात आला. हे इस्लामी संस्कृतीच्या राज्य व्यवस्थानेपला कदापीही मान्य नव्हते. त्यानंतर ह.आमीर मुआविया येथे न थांबता त्यांनी आपल्या हयातीत स्वतःचा अपात्र मुलगा यजिद यांस आपला उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करून वीस वर्षे राजेशाही सारखा राज्य कारभार करुन राजधानी मदीनावरुन कुफा (इराक) वरुन सिरिया येथे हलविण्यात आल्यानंर आपल्या मृत्यू पश्चयात आपला अपात्र मुलगा यजिद यांस राजा करण्यात आले.यजिदच्या राजेपदास व क्रुर शासनपध्दतीस  जनतेचा जागोजागी तीव्र विरोध होत होता. नागरिकांना प्रेषित मुहम्मद स्व. याचे अवडते नातू हजरत इमाम हुसैन रजि. यांची खलिफा म्हणून निवड व्हावी म्हणून संपूर्ण जनमत होते व नागरिक वारंवार पत्रव्यवहार करुन मागणी याचना करून बारा हजारांपेक्षाही जास्त पत्रे लिहीली जावून सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याची ग्वाही देत होते, सर्वांच्याच मागणीची दखल घेऊन ह. इमाम हुसैन रजि. आपल्या खानदानातील मुलांबाळांसह, वडील बंधू ह. हसन यांच्या व लहान सर्व बंधूं च्या सर्व परीवारासह मदीनावरुन कुफा येथे जाण्यासाठी निघाले. ही बातमी ऐकून राजा यजिद घाबरून सर्व कुफा वासीयांना धमकावत,जो ह. इमाम हुसैन यांना साथ,थारा देईल त्या सर्व साथ देणाऱ्यास मृत्यूदंड दिले जाईल अशी धमकी दिली. राजा यजिद कडून कुफा शहरातील त्याच्या मुख्य गव्हर्नर ईबने जियाद यांस आदेश देण्यात आले की, कोणत्याही परिस्थितीत ह. इमाम हुसैन यांना यजिदला राजा करण्यास राजी करावेत. नाहीतर सरळसरळ कैद करून दरबारात हजर करण्यात यावे. 

प्रवासा दरम्यान फुरात नदीच्या काठावर करबला येथील मैदानावर गव्हर्नर ईबने यजिद ने चार हजार सैनिकांसह ह. इमाम हुसैन यांचा घेराव करून यजिदला राजा करण्याच्या सर्व अटी व शर्ती जुलूमशाहीने मान्य करण्यास सांगितले, परंतु जालीम,अत्याचारी,कपटी यजिदला समर्थन देण्यास ह. इमाम हुसैन यांनी स्पष्ट नकार दिला. या नकारानंतर ईबने जियाद ने युद्धाचे स्पष्ट आव्हान केल्यानंतर ह. ईमान हुसैन नी रक्त,जीवितहानी टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत तीन प्रस्ताव मांडले, परंतु क्रुर गव्हर्नर जियाद याने मागेपुढे न पाहता सरळसरळ ह. हुसैन यांच्यावर क्रुरपणे अत्याचार करण्यास सुरुवात करून कुरात नदीचे पाणी ह. हुसैन यांच्या परीवारांस पाणी बंदी केली गेली, तीन दिवस म्हणजे ७२ तास रखरखत्या अरबस्थातील उन्हाळ्यात विना पाण्याची कुंटूंबावर वेळ आली, हालहाल करून, सहा महिन्याचे बाळ अली असगर यांच्यावर त्रिकोणी बान मारुन त्यांची हत्या केली, सात वर्षांच्या कासिम या ह. हसन यांच्या मुलाला घोडयाच्या टाचेखाली चिरडून ठार मारण्यात आले, त्यांच्याबरोबर जे होते त्यांचे देखील हालहाल करून बहात्तर ७२  लहान मोठ्यांना गळे चिरुन ठार करण्यात आले. युध्दात सर्व पुरुष शहीद, हौतात्म्य झाले. हा दिवस १० मुहर्रम हिजरी ६१ प्रमाणे इंग्रजी दिनांक १० ऑक्टोबर ६८० या दिवशी  ७२ हुतात्म्यांनी फक्त ईस्लामच्या पवित्र कुराण - हादीसच्या लोक कल्याणकारी राज्य व्यवस्थेसाठी  शहीद झाले, हौतात्म्य पत्कारले.

करबलाच्या या युद्धातुन जगाला संदेश मिळाला की कोणत्याही अत्याचारी व्यवस्थेपुढे गुडघे टाकायचे नसतात तर बलीदान देण्यास तयार राहिले पाहिजे... 

हजरत इमाम हुसैन यांनी जुलमी यजिदच्या क्रुर, जुलमी, अत्याचारी ,दमनकारी सत्तेपुढे गुडघे टेकले असते तर स्वतः व संपूर्ण परिवार वाचला असता, परंतु प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार अल्लाहच्या सत्यधर्म रक्षणासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबांचे बलीदान दिले,

म्हणुनच शायर म्हणतो की.. " करबला के बाद ईस्लाम जिंदा होता है.... "


लेखक - डॉ. सलीम सिकंदर शेख

बैतुशशिफा हॉस्पिटल,श्रीरामपूर

 मोबा.नं. 9271640014

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget