Articles by "latestnews"

बेलापूरः श्रीक्षेत्र बेलापूर नगरीमध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्री महाराज यांचा ७५०वा जन्मोत्सव सोहळा उद्या शुक्रवार(दि.१५)रोजी संपन्न होणार आहे.                                   यानिमित्त ज्ञानेश्वर महाराजांची भव्य शोभायात्रा  तसेच भव्य दीपोत्सव कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी मिरवणूक मार्गावर  महिला भगिनींनी  सडा रांगोळी काढणे व प्रत्येकी पाच पणत्या  तेल आणि वातीसह  दिपोत्सवासाठी आणाव्यात .शोभायाञा मिरवणुकीमध्ये कलश घेऊन सहभागी व्हावे सोबत थोडासा प्रसाद आणावा असे आवाहन करण्यात आले आहे.                               या भव्य कार्यक्रमाचे   महिला भगिनींनी व ग्रामस्थांनी उपस्थित राहुन या सुवर्ण क्षणाचे साक्षिदार व्हावे.शुक्रवारी १५आॕगष्ट रोजी  सायंकाळी ४ ते ६ वा. या वेळेत श्री केशव गोविंद मंदिर येथुन संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक व ६.३० वाजता भव्य दीपोत्सव होईल.तरी भाविकांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समस्त वारकरी संप्रदाय व ग्रामस्थांनी  केले आहे.

बेलापूरःबेलापूर बुll ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर  रविवार(दि.१७)रोजी स.९ वा. रयत शिक्षण संस्था,सातारा येथील ख्यातनाम कलाशिक्षक  राजेन्द्र घोडके यांचे मार्गदर्शनाखाली पहिले ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'शाडु मातीच्या गणपती मुर्ती बनविण्याची कार्यशाळा'आयोजित करण्यात आली आहे.                                        शाडु मातीच्या गणपती मुर्ती पर्यारणपुरक मानल्या जातात.याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती होणेच्या हेतूने सदरच्या कार्यशाळेचे आयोजन रविवार १७ आॕगष्ट रोजी सकाळी ९ वा. श्री.संत सावता महाराज मंदिर(अरुणकुमार वैद्य पथ)येथे आयोजित करण्यात आले आहे.                                                           या शिबिरात फक्त बेलापूर-ऐनतपूर येथील विद्यार्थी सहभागी होवू शकतील.प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या १००विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळेल.शाडू माती  आयोजक देतील तर पाण्यासाठी आवश्यक भांडे विद्यार्थ्याने सोबत आणावे. नाव नोंदणीसाठी ग्रामपंचायत बेलापूर कार्यालयात  सचिन साळुंके(९६५७७११००१),प्रमोद जनरल स्टोअर्सचे हेमंत मुथा(८३०८४८०९,व सुदर्शन सुपर शाॕपीचे सुधीर करवा (९०११७९४४९८)यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन ग्रामपंचायत बेलापूर बुll व सत्यमेव ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे.

बेलापूरःराज्याचे जलसंपदा मंञी तथा जिल्ह्याचे पालकमंञी  नाम.राधाकृष्ण विखे पा.च्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या बेलापूर बुll ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली 'प्रारंभ कचरा संकलन प्रकल्पा'च्या सहकार्याने  गावातील ओल्या व सुक्या कच-याचे स्वतंञपणे संकलन करण्याच्या कामास सुरुवात केली आहे.नजिकच्या काळात कच-यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असल्याची माहिती सरपंच मिनाताई साळवी व उपसरपंच चंद्रकांत नवले यांनी दिली.                                                 बेलापूर ग्रामपंचायतीने कच-याचे वर्गिकरण करुन संकलन करण्याचा उपक्रम श्री.शरद नवले व श्री.अभिषेक खंडागळे यांचे संकल्पनेतून हाती घेण्याचे जाहिर केले होते.याबाबत स्वच्छता कर्माचा-यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले.तसेच ओला व सुका कचरा स्वतंञपणे जमा करावा याबाबत ग्रामस्थांनाही आवाहन करण्यात आले होते.प्रारंभ प्रकल्पाचे शशिकांत दुशिंग व अनिता पाचपिंड या घरोघरी जाऊन कचरा संकलना बाबत नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांना बेलापूर ग्रामपंचायत यांच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी सहकार्य करीत आहेत.                ग्रामपंचायतीच्या आवाहनास ग्रामस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.ग्रामस्थ ओला कचरा(फळे.भाजीपालाभाज्यांच्या,साली व देठे,पालापाचोळा,खरकटे,खराब अन्न इत्यादी )तर सुका कचरा(प्लॕस्टिक बाॕटल्स,खाद्यपदार्थ पाकिटे,कागद व पुठ्ठे,प्लास्टिक वस्तु,कापडाच्या चिंध्या,औषधांची पाकीटे,प्लास्टिकचे अवशेष इत्यादी)स्वतंञपणे संकलित करुन कचरागाडीतील ओल्या व सुक्या कच-यासाठीच्या स्वतंञ कप्यांत टाकून गोळा करण्यात येत आहे.                                         नजिकच्या काळात हा कचरा नाम.राधाकृष्ण विखे पा.यांनी मोफत उपलब्ध करुन दिलेल्या जमिनीवर डंम्पिंग यार्ड करुन तेथे टाकण्यात येणार आहे.तसेच या डम्पिंग यार्डवर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारुन सेंद्रिय खतनिर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सौ.साळवी व उपसरपंच श्री.नवले यांनी  दिली.

बेलापूर: श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या बेलापूर पोलीस दूरक्षेत्रात कर्तव्यास असलेले पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांनी पोलीस सेवेत १५ वर्षांचा टप्पा पार केला, त्यानिमित्त बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला.


पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांनी पोलीस सेवेत अकरा वर्षे मुंबईमध्ये सेवा केली. या कार्यकाळात त्यांनी अनेक गुन्ह्यांचा पर्दाफास केरुन गुन्हेगारांना जेरबंद केले. त्यानंतर त्यांची बदली श्रीरामपूर येथे झाली, येथेही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. वरिष्ठांच्या हस्ते अनेकदा त्यांचा सन्मान झाला आहे. श्री.बडे यांना उत्तर महाराष्ट्रातील "बेस्ट कॉप ऑफ द मंथ" अर्थात 'महिन्यातील सर्वोत्तम पोलीस अधिकारी' हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या या खडतर आणि यशस्वी सेवेबद्दल बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.


या प्रसंगी कॉन्स्टेबल बडे यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सत्कार स्वीकारताना, बडे यांनी आपल्या पूर्वीच्या नियुक्तीच्या ठिकाणांचे अनेक धाडसी आणि प्रेरणादायी अनुभव सांगितले. त्यांच्या या अनुभवांबद्दल उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.


या छोट्याशा सत्कार सोहळ्याला पत्रकार देवदास देसाई, सुहास शेलार, दिलीप दायमा, पोलीस कॉन्स्टेबल भारत तमनर, सामाजिक  कार्यकर्ते दादासाहेब कुताळ, तिळवण तेली महासंघाचे एकनाथ उर्फ लहानुभाऊ नागले यांसह मान्यवर उपस्थित होते.

बेलापूरः(प्रतिनिधी )- जलसंपदा तथा पालकमंञी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली बेलापूर बु ग्रामपंचायतीने  सातत्याने विविध उपक्रम राबविले असुन या उपक्रमामुळे गावातील विकासाला चालना मिळाली असल्याचे प्रतिपादन मा. जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी केले.                                बेलापूर बुll ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या महिला मेळाव्यास संबोधित करताना नवले बोलत होते.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.मिनाताई साळवी या होत्या.तर मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून बाजार समितीचे मा. उपसभापती अभिषेक खंडागळे,उपसरपंच चंद्रकांत नवले,ग्रामपंचायत सदस्य मुश्ताक शेख,तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,उज्वला कुताळ,सुशिलाबाई पवार,रंजना बोरुडे,प्रतिभा नवले, मानवी खंडागळे,पंचायत समितीच्या प्रकल्प अधिकारी  शोभा शिंदे,बँक आॕफ महाराष्ट्र चे शाखा व्यवस्थापक राजेश परदेशी, डॉ. अश्विनी लिपटे, शशिकांत दुशिंग आदि उपस्थित होते.                         आपल्या भाषणात नवले पुढे म्हणाले की गावात महिलांची संख्या पन्नास टक्के असुन या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी नाम.राधाकृष्ण विखे पा, माजी खा.डाॕ.सुजय विखे पा.,जि.परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.शालिनीताई विखे पा.यांचे सहकार्याने व मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले  आहेत. गावकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता आल्यापासून गावात विविध विकास कामे वेगाने होत असून बेलापूर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच स्वाती अमोलिक,मिनाताई  साळवी,माजी उपसरपंच तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,सदस्य उज्वला कुताळ,सुशिलाबाई पवार,शिलाताई पोळ,छायाताई निंबाळकर आदिंचा यात  मोठा सहभाग आहे.गावकरी मंडळाने  समाजांतील सर्व घटकांना समान न्याय देण्याचे धोरण अवलंबिले असुन लवकरच १००० घरकुलांचे बांधकाम सुरू होणार आहे.महिलांकरीता शासनाच्या अनेक  योजनां असुन योजनांची माहिती न झाल्यामुळे अनेक महिला लाभापासून वंचित राहतात.महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर कुटुंबाचेही आरोग्य चांगले राहू शकते.त्यामुळे महीलांनी आरोग्याबाबात सजग व्हावे यासाठी आरोग्य प्रबोधन व तपासणी स्वच्छता महिलांना मिळणारे लाभ गावाच्या विकासात महीलांचे योगदान या सर्व बाबींची माहिती व्हावी या हेतुने मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे नवले यांनी सांगीतले .                                          प्रास्तविक भाषणात बाजार समितीचे माजी उपसभापती म्हणाले की,आजवर बेलापूर ग्रामपंचातीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी नामदार.राधाकृष्ण विखे पा.यांचे  भक्कम सहाय्य व पाठबळ मिळाले आहे.नाम.विखे यांच्या सहकार्याने १२६ कोटीची पाणी पुरवठा योजना तसेच या योजनेच्या साठवण तलावासाठी आठ एकर जमिन ग्रामपंचायतीला मोफत मिळाली.या योजनेचे काम प्रगतीपथावर असून येत्या सहा महिन्यात योजना पूर्ण होणार असुन तिनं म्हशीने पुरेल इतका पाणीसाठा त त्यात असणार आहे.गावातील गरजूंसाठी तब्बल ११०० घरकुले मंजूर झाली आहेत.  या घरकुलासह,सेंद्रिय खत प्रकल्प,क्रिडा संकुल तसेच सर्वधर्मियांच्या स्मशानभुमिसाठी ३४ एकर जागा नाम.विखे पा. यांच्या प्रयत्नातून मिळाली आहे.ग्रामपंचायतीने भुयारी गटारीचे काम मोठ्या प्रमाणावर केले आहे.तसेच ओला व सुका कचरा स्वतंञपणे संकलित करण्याचे कामही सुरु केले आहे.भविष्यात कच-यावर प्रक्रिया करुन खतप्रकल्प उभारणी केली जाणार आहे.सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे कामही प्रगतीपथावर आहे.पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनसाठी रस्ते खोदाई झाल्याने रस्त्यांची कामे करता आली नाहीत.माञ पावसाळ्यानंतर लगेचच रस्त्यांची कामे केली जातील. त्यासाठी निधी उपलब्धतेसाठी नाम.विखे पा.यांचे माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. लवकरच पाणीपुरवठा योजना कामाचा पाहणी दौरा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती खंडागळे यांनी दिली.                                                यावेळी सरपंच मिनाताई साळवी यांनी उपस्थितांचे स्वागत करुन मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला तर सौ.आशाताई गायकवाड ,ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प.समितीच्या प्रकल्प आधिकारी शोभा शिंदे यांनी बचतगटा संदर्भातील योजना,त्या माध्यमातून करता येणारे व्यवसाय याची माहिती दिली. महाराष्ट्र बँकेचे बेलापूर शाखेचे व्यवस्थापक  राजेश परदेशी यांनी महिलांसाठी बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देवून त्याबाबात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रारंभ प्रकल्पचे शशिकांत दुशिंग यांनी घनकचरा व ओलाकचरा संकलन व प्रक्रियाबाबत सविस्तर माहिती दिली.प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या आरोग्य अधिकारी डाॕ.अश्विनी लिप्टे यांनी महिलांच्या आरोग्याबाबत प्रबोधन केले.पञकार देविदास देसाई यांनी अंधश्रध्देबाबत प्रबोधन केले.मेळाव्याचे दरम्यान महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.अध्यक्षीय सूचना सौ. मनिषा दळे यांनी मांडली त्यास सौ. संध्या तेलोरे यांनी अनुमोदन दिले.कार्यक्रमाचे सूञसंचलन सौ.योगिताताई अमोलिक यांनी केले तर सौ. वैशालीताई शेळके यांनी आभार मानले.मेळाव्यास उपसरपंच चंद्रकांत नवले सदस्य मुस्ताक शेख तबसूम बागवान प्रियंका खुरे उज्वला कुताळ जया भराटे आशा गायकवाड ज्योती जगताप मंगल जावरे सरिता मोकाशी वैशाली शेळके मनीषा दळे संगीता देसाई प्रतिभा देसाई संगीता शिंदे तेलोरे नीलिमा कुमावत सुजाता गुंजाळ वैशाली शिरसाठ सुवर्णा खंडागळे आदिसह मोठ्या संख्येने परिसरातील बचत गटाच्या महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

श्रीरामपूरःपुणतांबा येथील रहिवासी असलेले धीरज व सूरज संपतराव बोर्डे या बंधुची अनुक्रमे  जलसंपदा व नगरपालिका विभागात अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.                                                     महाराष्ट्र शासनाच्या 'जलसंपदा विभाग' तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत  धीरज बोर्डे याची सहाय्यक अभियंता (ज्यु. इंजिनियर ) पदी निवड झाली आहे . तर सूरज बोर्डे यांची सन २००० मध्ये नगरपालिका विभागात लेखाधिकारी म्हणून निवड झाली असून ते बुलढाणा नगरपालिकेत रुजू झाले आहेत. धीरज व सूरज हे दोघे अशोक सहकारी कारखान्याचे माजी कर्मचारी संपतराव बोर्डे यांचे चिरंजीव आहेत.विशेष म्हणजे सुरज व धीरज हे जुळेबंधू असून दोघांचीही शासकीय अधिकारी म्हणून निवड होणे  दुर्मिळ ठरते.धीरज व सुरज बोर्डे यांच्या या नियुक्तीबद्दल भास्कर खंडागळे ,नानासाहेब जोंधळे,अॕड.एन.जी.खंडागळे ,बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी लाखो वारकरी दिंडीद्वारे पंढरपूरला पायी चालत जातात. पालखीच्या मुक्कामी वारकऱ्यांना सुविधा नसल्याने उघड्यावर शौचाला जावे लागत होते. ज्यामुळे अस्वच्छता व्हायची. यावर उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सेवा सहयोग संस्थेने पुढाकार घेत निर्मल वारीला सुरवात केली. महाराष्ट्राची सांस्कृतीक परंपरा असलेली ही वारी सुखरूप पार पडावी, पर्यावरणाचे रक्षण व्हावे आणि ज्या गावातून वारी जाते तिथे अनारोग्य होऊ नये. यासाठी २०१५ पासून निर्मल वारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेकडो वर्षे हिंदुत्वाची अनेक स्थित्यंतरे पाहत वारकरी पंढरीची वारी नित्यनेमाने करतो आहे. आधुनिक काळात आता वारी खऱ्या अर्थाने भौतिकदृष्ट्या निर्मल झाली आहे..!


विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीसोबत राज्य शासनाने २६५ फिरते शौचालय उपलब्ध करून दिले आहेत. त्याच्या व्यवस्थापनाचे, स्वच्छतेचे, वापराचे नियोजन, तसेच वारकऱ्यांच्या प्रबोधनाचे नियोजन सेवा सहयोग आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक गेली १० वर्षे अव्याहतपणे करत आहे. वारीचा प्रवास स्वच्छ व निर्मल करण्यासाठी स्वयंसेवकांनी पुढे येत हा उपक्रम सुरू केला. ज्याला आता राज्य शासनाची आणि समाजातील विविध संस्थांची मोठी साथ मिळत आहे. दरवर्षी वारी अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी होत चालली आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पसरणारे अनारोग्य जवळपास नष्टच झाले आहे.” मागील १० वर्षात वारीमध्ये उघड्यावर शौचाला जाण्याचे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत घटल्याचे जाधव यांनी सांगितले. नियमित वारी करणारे वारकरी शौचालयाचा वापर करत असून, दींडी चालक आणि स्थानिक नागरिकांकडूनही शौचालयाचा आग्रह होत आहे. ज्याला वारकऱ्यांचाही सकात्मक प्रतिसाद लाभत असून विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी पालखी सोहळ्यामध्ये आदित्य एंटरप्राइजेस या कंपनीकडून तसेच या कंपनीचे संचालक विक्रम मोरे यांच्या माध्यमातून शौचालयाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले यामुळे या पालखी सोहळ्यामध्ये कुठल्याही वारकऱ्याला गैरसोईचा सामना करावा लागला नाही..!

बेलापूर( प्रतिनिधी )-श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता बुधवार दिनांक 23 जुलै रोजी ह. भ. प. अनिल महाराज महांकाळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेलापूर येथील संत सावता महाराज मंदिर बेलापूर बुद्रुक येथे बुधवार दिनांक 16 जुलैपासून अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात झाली.  सात दिवस चाललेल्या पारायण सोहळ्यात ह. भ. प. मयूर महाराज बाजारे, ह. भ. प. डॉक्टर शुभम महाराज कांडेकर, ह. भ. प. विजय महाराज कोहिले, ह. भ. प. कृष्णा महाराज शिरसाठ, ह. भ. प. जीवराम महाराज कापंडेकर, ह. भ. प. मोहन महाराज बेलापूरकर तसेच ह भ प वीर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. या पारायण सोहळ्यास राजेंद्र टेकाळे कुर्हे वस्ती, गोखलेवाडी, दुधाळ वस्ती, मेहेत्र परिवार ,बेलापूर ,श्री रघुनाथ एकनाथ जाधव श्री गजानन दगडू जाधव व बाळासाहेब जाधव, माळी परिवार व दादासाहेब कुर्हे यांनी पंगतीचे यजमान पद स्वीकारले सात दिवस चालणारे या सोहळ्यात पहाटे काकड आरती, त्यानंतर श्री संत ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ तसेच रात्री कीर्तन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .सायंकाळी होणाऱ्या हरिपाठाचे नेतृत्व हरिहर महिला भजनी मंडळ, सावता महाराज भजनी मंडळ, गोखलेवाडी कुर्हे वस्ती परिसर भजनी मंडळ, बबन महाराज अनाप यांनी केले तर गायनाचार्य म्हणून संजय महाराज शिरसाठ, रामचंद्र सोनवणे, मधुकर पुजारी, मयूर महाराज कुऱ्हे, बळी तात्या वाकडे ,कृष्णा महाराज शिंदे तर हार्मोनियम वादक अरुण कुर्हे, बन्सी महाराज मुंगसे, दत्तू जाधव, बापू अनाप, जिजाबाई शिंदे, शाम मेहेत्रे तर मृदंगाचार्य म्हणून ह. भ. प. विजय महाराज चौधरी ,सुधीर महाराज कुर्हे, मयूर महाराज बाजारे,  भास्कर महाराज कुर्हे, कैलास खर्डे, साठे मामा, शिवा मिसाळ, आदित्य सूर्यवंशी आदींनी सहभाग घेतला होता .या कार्यक्रमाकरिता बेलापूर बुद्रुक, बेलापूर खुर्द , नरसाळी , आंबी , केसापूर, चांदेगाव, उक्कलगाव फत्याबाद , उंबरगाव , वळदगाव,  कोर्हे वस्ती, पटेल वाडी, रामगड, लाडगाव, ऐनतपुर , सुभाष वाडी मातापूर  कान्हेगाव, ब्राह्मणगाव ,करजगाव,कनगर  या पंचक्रोशीतील भजनी मंडळाने साथ दिली.

बेलापूर (वार्ताहर)  चेन्नई येथील ओम् चारीटेबल ट्रस्टच्या वतीने आंतरराष्ट्रीय वैदिक टॅलेंट स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला असून श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील वेदमूर्ती महेश दिलीप दायमा यांना हा सन्मान मिळाला आहे.      चेन्नई येथील ओम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने सन 2024 मध्ये देशभरातील वैदिक महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बौद्धिक    परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेत बेलापूर तालुका श्रीरामपूर येथील विद्यार्थी वेदमूर्ती महेश दायमा याने परीक्षेत 99 टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा बहुमान मिळवीला. वेदमूर्ती दायमा हा राजस्थान येथील गोठ मांगलोद मधील दधीमती गुरुकुल मधून शिक्षण घेत होता या गुरुकुलमधून शिक्षण घेत असताना वेदमूर्ती महेश दायमा याने या परीक्षेत भाग घेतला होता आंतरराष्ट्रीय दर्जाचे बटू या परीक्षेमध्ये सहभागी झाले होते या परीक्षेत महेश दायमा यांना 99 टक्के मार्क मिळाले होते त्यामुळे त्याचा सन्मान नुकताच चेन्नई येथे आयोजित करण्यात आला होता      रोख रक्कम व सन्मानपत्र शाल श्रीफळ देवुन त्यांचा सन्मान करण्यात आला. चिरंजीव वेदमूर्ती महेश दिलीप दायमा यांचा सन्मान कमल किशोर जी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली व जगदीश जी गुरुजी यांच्या व ओम चॅरिटेबल ट्रस्ट नॅशनल वैदिक येथील मान्यवरांच्या उपस्थितीत  करण्यात आला.  चिरंजीव महेश हा पत्रकार दिलीप दायमा यांचा चिरंजीव असुन त्याने महाराष्ट्र पुणे आळंदी या ठिकाणी घेण्यात आलेल्या वेदोस्तव परीक्षेतही प्रथम क्रमांक मिळविला होता. भारतातील 40 गुरुकुल मधून प्रथम येण्याचा बहुमान दायमा याने मिळविला होता.आळंदी येथील कार्यक्रमात बेलापूरचे भूमिपुत्र व  श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष श्री. स्वामी गोविंद देवगिरी जी महाराज यांच्या हस्ते सुवर्णमुद्रिका व चांदीचे पंचपात्र देऊन सन्मानित करण्यात आले‌‌ होते. महेश दायमा यांचे शिक्षण राजस्थान गोठ मांगलोद जिल्हा नागोर या ठिकाणी  झाले आहे‌.  पुढील शिक्षणासाठी महेश हा काशी या ठिकाणी जाणार असून महेश याला कमल किशोर जोशी गुरुजी तसेच दधिमती गुरुकुल चे अध्यक्ष सोहनलाल दायमा, सचिव हरिनारायण व्यास, कोषाध्यक्ष जय किशन संचालक, भालचंद्र व्यास संयुक्त, सचिव रूप, नारायण आसोपा तसेच सुभाष मिश्रा व सर्व संचालक सर्व शिक्षक व आई वडीलाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले‌.वेदमूर्ती महेश दायमा यांच्या सुयशा बद्दल मा .जि प. सदस्य शरद नवले , बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, बाजार समितीचे मा. उपसभापती अभिषेक खंडागळे, पत्रकार देविदास देसाई तिरंगा न्यूजचे संपादक असलम बिनसाद, भास्करराव खंडागळे, प्राध्यापक ज्ञानेश्वर गवले नवनाथ कुताळ सर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्डा, किराणा मर्चंट चे अध्यक्ष शांतीलाल हिरण पत्रकार मनोज आगे, जय बाबाचे संपादक बाळासाहेब आगे, कै. मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र खटोड, बेलापूर एज्युकेशन संस्थेचे राजेश खटोड मा. सरपंच भरत साळुंके, राज्य राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अरुण पा नाईक ऐनतपुर सेवा संस्थेचे चेअरमन चंद्रकांत नाईक पं स. मा सभापती दत्ता कुर्हे आदिंची अभिनंदन केले आहे.

बेलापूरमध्ये एका अनैतिक संबंधांच्या कथित प्रकरणामुळे निर्माण झालेला तणाव स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थीने शांत झाल्याचे वृत्त आहे. मात्र, हे प्रकरण मिटवण्यासाठी पत्रकार आणि गावातील लोकांना पैसे देण्यात आल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्याने परिसरात नवे कुजबुज सुरू झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बेलापूरमध्ये एका अनैतिक संबंधाच्या प्रकरणामुळे समाजात अशांतता निर्माण झाली होती. परिस्थिती चिघळण्यापूर्वीच, बेलापूरमधील काही प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेऊन दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थी केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे हे प्रकरण शांततेत मिटल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे परिसरातील तणाव काही प्रमाणात निवळला आहे.

परंतु, या शांततेमागे आर्थिक व्यवहार झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. परिसरातील काही नागरिकांच्या मते, हे प्रकरण दडपण्यासाठी आणि कोणतीही बातमी प्रसिद्ध होऊ नये यासाठी, पत्रकार आणि गावातील काही प्रमुख व्यक्तींना पैसे देण्यात आले आहेत. "प्रकरण मिटवण्यासाठी पैसे दिले गेल्याची चर्चा आहे," असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका स्थानिक नागरिकाने सांगितले. ही चर्चा आता बेलापूरमधील अनेकांच्या तोंडी आहे.

या कथित आर्थिक देवाणघेवाणीमुळे या प्रकरणाच्या शांततापूर्ण निराकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी केली जात आहे. बेलापूरमधील शांतता खरंच स्थापित झाली आहे की, पैशांच्या जोरावर ती केवळ विकत घेतली गेली आहे, हा प्रश्न आता अनेकांच्या मनात घर करून आहे.

या प्रकरणावर अजूनतरी कोणत्याही अधिकृत व्यक्तीने किंवा संबंधित पक्षांनी सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया दिलेली नाही. स्थानिक प्रशासनाने या आरोपांची दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे):सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, शारदानगर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले. सर्वधर्म प्रेम,सहिष्णुता आणि शांततेचा संदेश देणाऱ्या या दिंडीने परिसर भक्तीरसात न्हाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.


"देव एकच आहे,त्याची नावे अनेक असू शकतात,पण मानवतेचा हात हाच श्रेष्ठ धर्म आहे,"असा संदेश या दिंडीच्या माध्यमातून देण्यात आला. शाळेच्या बालगोपालांनी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सजून टाळ,मृदंग, पखवाजाच्या गजरात विठ्ठलनामाचा जयघोष करत परिसर पंढरपूरमय केला.

या वेळी शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे,उपप्राचार्या शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका सौ. प्रज्ञा पहाडे,शिक्षिका पल्लवी ससाणे, नैथलीन फर्नांडिस,तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदाय,संत परंपरा व विठ्ठलभक्ती याविषयी माहिती दिली.


शाळेच्या लहानग्या विद्यार्थ्यांनी "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदा हरि विठ्ठल", "माऊली माऊली" अशा भक्तीगीतांच्या जयघोषात परिसरात भव्य दिंडी काढली.विद्यार्थ्यांच्या निरागस चेहऱ्यावर झळकणारा भक्तीभाव,टाळ-मृदंगाच्या गजरात त्यांनी सादर केलेला उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात आनंद आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले.

दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेची ओळख, सामाजिक ऐक्य, प्रेम, सहिष्णुता आणि एकोप्याचा संदेश देण्यात आला.

बेलापूरःदर वर्षी प्रमाणे ह. भ. प. सोपान महाराज हिरवे यांच्या मार्गदर्शना खाली तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या नियोजनातून गावकरी मंडळ व समस्त ग्रामस्थ बेलापूर बु -ऐनतपूर यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त येथील विठ्ठल मंदिरात शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक नितीन देशमुख व सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश जाधव यांचे हस्ते महाआरती संपन्न झाली.                                         आरतीनंतर उपस्थितांना प्रसाद म्हणून खिचडी व राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले.                                     प्रारंभी दीपक क्षञिय यांनी प्रवचन केले.तर ह.भ.प.बबन महाराज अनाप,ह.भ.प. अशोक महाराज शिरसाठ, विलासनाना मेहेञे, किरण महाराज गागरे यांनी भजन गायन केले.हरिहर काळे गुरु व बापू गुरु देवकर यांनी पौरोहित्य केले. कार्यक्रम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकमान्य प्रतिष्ठान व महिला मंच,हरिहर शेजआरती  मंडळ, सत्यमेव जयते ग्रुप, साई क्लासेस यांचे सहकार्य लाभले.

यावेळी ह.भ.प सोपान महाराज हिरवे, बबन महाराज अनाप, अशोक महाराज शिरसाठ,किरण महाराज गागरे, विलास नाना मेहत्रे,सहायक पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, बेलापूर पोलीस औट पोस्ट चे संपत बडे, नंदकिशोर लोखंडे,आदिनाथ आंधळे,

बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे,सरपंच मीना साळवी, उपसरपंच चंद्रकांत नवले,जालिंदर कुऱ्हे,रणजित श्रीगोड,भाऊसाहेब कुताळ,भास्कर खंडागळे,कनजीशेठ टाक, सुधाकर तात्या खंडागळे,दिलीप काळे,पुरुषोत्तम भराटे,देविदास देसाई, विष्णुपंत डावरे, दिलीप दायमा,दिपकसा क्षत्रिय,सुहास शेलार,रमेश दायमा, सुभाष सोमाणी, सुरेश बाबुराव कुऱ्हे,महेशजी जेठवा,गोविंद श्रीगोड,डॉ. सुधीर काळे, लक्ष्मणराव मुंडलिक, बाबासाहेब काळे,सोमनाथ लगे, सोमनाथ साळुंके,राधेश्याम अंबिलवादे, दिलीप अमोलिक,साहेबराव मोकाशी,दयानंद शेंडगे सर,डॉ. रवींद्र गंगवाल,भरत सोमाणी, रावसाहेब कुऱ्हे, अशोक दुधाळ, रमेश काळे, बबन मेहत्रे, प्रभाकर ताके,राहुल लखोटीया,प्रशांत मुंडलिक, हेमंत मुंडलिक,सुभाष बोरा, बबलू बनभेरू, देविदास घाणे, जनार्दन ओहोळ, सतीश काळे, संजय भोंडगे,दिपक काळे,अरुण कुलकर्णी, अरुण काळे,ओमप्रकाश व्यास, लक्ष्मण राशिनकर, गणपत साळुंके,प्रभात कुऱ्हे,बाबुराव पवार, अँड. अरविंद साळवी, सचिन अमोलिक, प्रसाद कुलकर्णी,संजय खंडागळे, किरण बैरागी,विठ्ठल शिंदे, अनिल कुऱ्हे, राजेश सूर्यवंशी,भगीरथ मुंडलिक,, किरण खराडे,उपेंद्र कुलकर्णी, सागर ढवळे, मुकुंद चिंतामणी, प्रमोद पोपळघट, ऋतुराज वाघ, करण गोसावी, नितीन शर्मा,श्रीहरी बारहाते,तुकाराम जाधव,चंद्रकांत ताथेड,नंदकिशोर दायमा,मधुकरअनाप, विजय कोठारी,राहुल माळी, मधुकर ठोंबरे, नाना चिंतामणी, पोपट पवार, विनायक जगताप,जितेंद्र वर्मा, विजय दरक,विशाल आंबेकर,महेश कुऱ्हे, गोपी दाणी, सचिन देवरे, गणेश कोळपकर, मच्छिंद्र नागले शरद पुजारी,यश पवार, केशव शिंदे, मयुर मोरे, राज गुडे, संतोष ताथेड, प्रशांत दायमा, विकी पगारे, मारुती गायकवाड, महंत काळे, दादासाहेब कुताळ,सचिन मेहेत्रे, सोमनाथ शिरसाठ, राजेंद्र काळे,शाम मेहेत्रे, सचिन गोरख वाबळे,संजय जगताप, सूरज भुसा,हरीष बडाख,बाळासाहेब जाधव,सुजित सहानी, नारायण मुंडलिक, किशोर खरोटे,अर्जुन कुऱ्हे, राहुल माळवदे, अक्षय पवार, योगेश नागले, सचिन राकेचा आदी उपस्थित होते.

बेलापूरःबेलापूर-ऐनतपूर गावाची लोकसंख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे.भविष्यात वाढत्या नागरीकरणामुळे कच-याच्या विल्हेवाटीची समस्याही वाढणार आहे.यादृष्टिने उपाययोजना म्हणून ओल्या व सुक्या कच-याचे स्वतंञ संकलन करुन भविष्यात त्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.                                       यासंदर्भात बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे ,सरपंच मीना साळवी,उपसरपंच चंद्रकांत नवले, ग्रामपंचायत आधिकारी निलेश लहारे,कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे शशिकांत दुशिंग,प्रेरणा ठाणगे,अनिता पाचपिंड,अॕड.अविनाश साळवी आरोग्य विभागाचे दत्ताञय वक्ते,अविनाश शेलार यांची संयुक्त बैठक झाली.                           सदर बैठकीत वाढत्ती लोकसंख्या व नागरीकरण गृहित धरुन मागील काळात कचरा व्यवस्थापनाबाबत काहिच उपाययोजना करण्यात आली नाही.त्यामुळे दुर्गंधी तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.याचा सारासार विचार करुन राज्याचे जलसंपदामंञी तथा जिल्ह्याचे पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांनी ग्रामपंचायतीस शेतीमंडळाची जी जमीन दिली आहे तिथे  कचरा डंपींग यार्ड केले जाणार आहे.                                                        गावातील ओला व सुका कचरा स्वतंञपणे सकलित करुन गौळा करण्याचे नियोजन केले जाणार आहे.यासाठी नागरिकांनी ओला व सुका कचरा, पिशव्या ,पाण्याच्या बाटल्या,कॕरीबॕग्ज,भाजीपाला आवशेष स्वतंञपणे जमा करुन ठेवावेत. ओल्या कचऱ्या मध्ये प्लास्टिक मिसळले गेल्यास कचऱ्याचे विघटन होत नाही व दुर्गंधी वाढून आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.त्यामुळे नागरिकांनी याबाबत दक्षता घेवून सहकार्य करावे.ओला व सुका कचरा घंटा गाडीत स्वतंत्र पणे जमा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.हा जमा झालेला कचरा नियोजित डंपिंग यार्ड येथे टाकून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.यासाठी महिला बचत गट,अंगणवाडी कर्मचारी,आशा सेविका व ग्रामपंचायत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.यामुळे नजिकच्या काळात कचरा विल्हेवाटिची मोठी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.अशातहेने कचरा व्यवस्थापनावर बैठकीसत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बेलापूरःतालुक्यातील सर्वात मोठ्या बेलापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर जलसंपदा तथा पालकमंञी नामदार राधाकृष्ण विखे पा.यांचे नेतृत्वाखालील तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या मार्गदर्शना खालील गावकरी मंडळाचे चंद्रकांत नवले(आबा) यांची बिनविरोध निवड झाली. गावकरी मंडळाने सरपंच पद राखीव असल्याने समाजातील अन्य घटकांना प्रतिनिधित्व देण्याच्यादृष्टिने उपसरपंच पदावर सर्व समाज घटकांना संधी देण्याचे धोरण अवलंबविले.त्यानुसार श्री.चंद्रकांत नवले यांना उपसरपंच पदाची संधी देण्यात आली.सरपंच मिना साळवी यांचे अध्यक्षतेखाली व ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे यांचे उपस्थीतीत झालेल्या बैठकीस अभिषेक खंडागळे,स्वाती अमोलिक 

,मुश्ताक शेख,तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,उज्वला कुताळ,वैभव कु-हे,सुशिलाबाई पवार, रमेश अमोलिक,भरत साळुंके आदी सदस्य उपस्थित होते.उपसरपंच पदासाठी श्री. नवले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यावर सूचक म्हणून अभिषेक खंडागळे हे होते.त्यामुळे चंद्रकांत नवले यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सरपंच मीना साळवी यांच्या निवडी प्रमाणेच ही देखील निवड बिनविरोध झाल्याने शरद नवले,अभिषेक खंडागळे ,प्रफुल्ल डावरे प्रणित गावकरी मंडाळाने ग्रामपंचायतीत निर्विवाद राजकीय वर्चस्व सिध्द केल्याचे मानले जाते.                                                            निवडीनंतरच्या आभार सभेत  जि.परिषद सदस्य शरद नवले,बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, प्रफुल्ल डावरे, स्वाती अमोलिक,शांतीलाल हिरण, मोहसीन सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले. शरद नवले म्हणाले की,पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.,सौ.शालिनीताई विखे पा,माजी खा.डाॕ.सुजय विखे यांचे नेतृत्वाखाली ग्रामपंचायत माध्यमातून  गावाच्या विकास करण्याचा प्रयत्न होत आहे.गावकरी मंडळाने सर्व समाज घटकांना संधि देण्याची शब्दपूर्ती केली आहे. याप्रसंगी कनजीशेठ टाक,जि.प.सदस्य शरद नवले,जालिंदर कुऱ्हे,राष्ट्रवादीचे प्रांत सरचिटणीस अरुण पा.नाईक ,रणजीत श्रीगोड,भाऊसाहेब कुताळ,हाजी ईस्माईल शेख,विष्णुपंत डावरे,पुरुषोत्तम भराटे,सुधाकर तात्या खंडागळे,शांतीलाल हिरण, प्रशांत लड्डा, सुभाष अमोलिक,अॕड.अरविंद साळवी,रावसाहेब अमोलिक,अन्वर सय्यद, शफिक बागवान,मोहसीन सय्यद,प्रभात कुऱ्हे,अभिषेक नवले,दिलीप दायमा,श्रीहरी बारहाते,दत्तात्रय नवले,सचिन अमोलिक,भैय्या शेख,बंटी शेलार,भाऊसाहेब तेलोरे,निसार बागवान,अशोक दुधाळ,शाहरुख शेख,व्दारकनाथ नवले,गोपी दाणी,राज गुडे,अजीज शेख,महेश कु-हे,रफीक शेख,सुभाष अमोलिक ,बाबुराव पवार,शहानवाज सय्यद,विशाल आंबेकर,जाकीर शेख,शरद अंबादास नवले,रफिक शेख,अशोक वहाडणे,दादासाहेब कुताळ,गणेश राशिनकर,विनायक जगताप,गोकुळ कुताळ,शाम गायकवाड,शशिकांत नवले,दिपक गायकवाड,संजय गंगातिरवे,निसार आतार,अनिल नवले,शफिक आतार,राजेंद्र नवले,भरत नवले, दिपक प्रधान,पंढरीनाथ गाढे, शुभम नवले अशोक दुधाळ, रमेश लगे, पप्पू मांजरे, बाळासाहेब शेलार, राहुल गायकवाड आदि प्रमुखांसह गावकरी मंडळाचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीरामपूरःगेल्या पंधरा दिवसांपासून बेलापूर येथून बेपत्ता झालेले आणि पोलिसांना शोधण्यात अपयश आलेले व्यापारी रामप्रसाद चांडक यांचा अखेरीस ठावठिकाणा लगला आहे.श्री.चांडक हे धार्मिक पर्यटन करुन नाशिक येथे त्यांचे साडू श्री.करवा यांचेकडे पोहचले आहेत. चांडक कुटुंबिय त्यांना आणणेसाठी नाशिकला रवाना झाले असून चांडक कुटुंबियांनी याबाबत  पोलिसांना अवगत केले आहे.                                        याबाबतची हकीकत अशी की,रामप्रसाद चांडक हे बेलापूरला त्यांचे मुलासोबत मोटार सायकलवर आले.बेलापूरला ते मुख्य झेंडा चौकात उतरले.त्यानंतर ते बेपत्ता झाले.दोन दिवस शोध घेतल्यावरही तपास न लागल्याने चांडक कुटुंबियांनी पोलिसांत मिसिंगची तक्रार दाखल केली.त्यानंतरही शोध न लागल्याने व्यापारी तसेच ग्रामस्थांनी पोलिसांनी तपासाला गती देवून चांडक यांचा शोध घ्यावा अशा आशयाचे निवेदन दिले.त्यानंतरही आठवडाभरात पोलिसांना शोध लावण्यात अपयश आले.                             अखेरीस काल शुक्रवारी मध्यराञी श्री.चांडक हे विविध धार्मिकस्थळांना भेटी देवून अखेरीस  नाशिकस्थित त्यांचे साडू सुनील करवा यांचेकडे पोहचले.ते पोहचल्याचे श्री.करवा यांनी किशोर चांडक यांना कळविले.सदरची माहिती मिळाल्यानंतर किशोर चांडक व त्यांचे औरंगाबाद येथील मेहुणे श्री.चांडक यांना आणण्यासाठी नाशिकला गेले.जाताना त्यांनी आम्ही नाशिकला जात असल्याबाबत पोलिसांना अवगत केले.

हरेगाव (गौरव डेंगळे): हरेगाव येथील संत तेरेसा गर्ल्स हायस्कूलमध्ये जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींमध्ये आरोग्य जागृती आणि योगाचे महत्व पटवून देण्यासाठी शाळेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती यांनी विद्यार्थिनींना योग दिनाचे महत्व पटवून देत म्हटले की, “योग ही आपल्या प्राचीन संस्कृतीची देण आहे. शारीरिक, मानसिक व बौद्धिक आरोग्यासाठी योग अत्यंत उपयुक्त आहे. विद्यार्थिनींनी दररोजच्या दिनचर्येत योगाचा अविभाज्य भाग करावा.”


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुहास ब्राह्मणे यांनी अतिशय नेटकेपणे आणि उत्साही पद्धतीने केले. विद्यार्थिनींनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.कार्यक्रमामध्ये क्रीडाशिक्षक नितीन बलराज यांनी योगासने,त्यांची शास्त्रीय माहिती आणि त्याचे शारीरिक-मानसिक फायदे याबद्दल विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर वरिष्ठ शिक्षिका विजया क्षीरसागर यांनी योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींना सकारात्मक विचारसरणी,मनःशांती आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचे महत्व समजावून सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनींचे मोलाचे योगदान लाभले. संपूर्ण शाळा प्रांगणात उत्साहाचे वातावरण होते.

बेलापूर, प्रतिनिधी – "श्रीरामपूर व बेलापूर परिसरात पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष आणि अकार्यक्षमतेमुळे गुन्हेगारांचा सुळसुळाट झाला आहे. पोलिसिंग हा प्रकार औषधालाही उरलेला नाही," असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते सुनील मुथा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.

श्रीरामपूर व बेलापूर परिसरात बाहेरगावचे गुन्हेगार खुलेआम अवैध धंदे चालवत असून, गुटखाबंदी असताना गुटख्याची सर्रास विक्री, अमली पदार्थांची निर्मिती, गोवंश कत्तली यावर पोलिसांचा कोणताही अंकुश राहिलेला नाही, असे मुथा म्हणाले.

"बिंगो" नावाने सुरू असलेला जुगार

जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिलेले असतानाही, कोपरगाव, शिर्डी, संगमनेर व सोनई परिसरातील गुन्हेगार श्रीरामपूरात "बिंगो" नावाने जुगाराचे अड्डे चालवत असल्याचे मुथा यांनी निदर्शनास आणले.

गुन्हेगारांचा मुक्तसंचार गावठी कट्यांचा वापर, अल्पवयीन मुलींचे दिवसाढवळ्या अपहरण, अल्प्राझोलमसारख्या अमली पदार्थांचे तेलंगणाशी असलेले संबंध, यामुळे श्रीरामपूर परिसर गुन्हेगारांचे आश्रयस्थान झाल्याची टीका त्यांनी केली.

बेलापूर पोलिसांची स्थिती आणखी बिकट

बेलापूर पोलिस औटपोस्टसमोर टोळीयुद्ध होणे, कोल्हार रोडवरील एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न, झेंडा चौकातील वाहतुकीचा बट्याबोळ, टायर दुकान व व्यापाऱ्याचे अपहरण या सर्व घटनांकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले.

गुटखा व गोवंश प्रकरणात पोलिसांची संशयास्पद भूमिका

गुटखा ट्रक प्रकरणात केवळ पंटरांना अटक होऊन प्रमुख आरोपी सुरक्षित राहणे, बेकरीत सापडलेले गोमांस व कोल्हार चौकाजवळ सुरू असलेली गोवंश कत्तल याकडे पोलिसांचे डोळेझाक असल्याचा आरोपही त्यांनी केला.

डीजे बंदीचा ठरावही धाब्यावर

ग्रामसभेने डीजे बंदीचा ठराव करून पोलिसांना लेखी कळवले असतानाही गावात खुलेआम डीजे वाजवले जातात. काही लोक माफक शुल्क घेऊन नवीन मिरवणुकांना परवानग्या मिळवत असून, या मिरवणुकांत तरुणांचा उन्माद दिसून येतो, असेही ते म्हणाले.

तक्रारी दडपल्या जातात

"गुन्ह्यांची नोंद न करता तक्रारदारांची बोळवण केली जाते, केवळ तक्रार अर्ज घेऊन प्रकरण झाकले जाते," अशी गंभीर टीकाही मुथा यांनी केली.

नवीन पोलिस अधीक्षकांकडून अपेक्षा

नवीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना जिल्ह्याचा अनुभव असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा बेजबाबदारपणा थांबवतील अशी अपेक्षा मुथा यांनी व्यक्त केली. "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" हे ब्रीदवाक्य कृतीत उतरावे, हीच अपेक्षा आहे, असेही त्यांनी नमूद केले.


बेलापूरःनागरिकांना शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी तातडीने मिळणे आवश्यक आहे.यादृष्टिने शासकीय योजनांचा लाभ निर्धारित वेळेत मिळावा तसेच नागरिक आणि प्रशासन यांच्यात समन्वय निर्माण व्हावा या हेतूने छञपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले.आशाप्रकारच्या शिबिरांचे प्रत्येक महसूल मंडलात आयोजन करण्यात येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डाॕ.पंकज आशिया यांनी केले.                                               महसूल व वन विभाग तसेच बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने बेलापूर येथे आयोजित छ.शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी उपस्थितांना संबोधताना जिल्हाधिकारी बोलत होते.याप्रसंगी  उपविभागीय महसूल अधिकारी किरण सावंत पाटील,तहसीलदार मिलिंदकुमार वाघ,नायब तहसीलदार बी.बी.गोसावी,श्री.शेकटकर, श्रीमती निर्मला नाईक,जि.परिषद सदस्य शरद नवले,बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे,सरपंच मिना साळवी,उपसरपंच प्रियंका कु-हे,रामराव शेटे,मंडलाधिकारी सर्वश्री विठ्ठल गवारी,सुशीम ओहोळ,तलाठी सर्वश्री राजेश घोरपडे,अक्षय जोशी,श्रीमती सुवर्णा शिंदे,शिल्पा राणे,वर्षा कातोरे, हिमालय डमाळे,अशोक थोरात,ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे कोतवाल सुनिल बारहाते नंदू बोंबले अरुण अमोलीक ज्ञानेश्वर भांड संतोष पारखे दिपक बेल्हेकर  उपस्थित होते.                                  सदर शिबिरादरम्यान जिल्हाधिकारी डाॕ.आशिया यांचे हस्ते नागरिकांना सेतू कार्यालयाकडील  जातीचे दाखले,संजय गांधी निराधार योजनेचे प्रमाणपञ,पुरवठा विभागाकडील आॕन लाईन पध्दतीचे रेशन कार्ड,ग्रामपंचायत वतीने मृत्यु दाखला, कृषी विभागाकडून खत गोणी,गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान मंजुरी पञ,ग्राममहसूल अधिकारी कार्यालयाकडील हयातीचा दाखाला आदिं प्रदान करण्यात आले.देविदास देसाई,विष्णुपंत डावरे यांनी सूञसंचलन केले.                                               दिवसभर चाललेल्या महाराजस्व शिबिरात उपस्थितांना विविध शासकीय योजनांचे दाखले, ऑनलाइन रेशन कार्ड,शासकिय प्रमाणपञे,ग्रामपंचायत दाखले अपघात विमा मंजुरी पत्र वितरीत करण्यात आले.शिबिरास बेलापूर महसूल मंडलातील नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.शिबिरस्थानी विविध महिला बचत गटांनी खाद्यपदार्थ,मसाले आदि उत्पादनांचे स्टाॕल लावले होते.शिबिरास भास्कर खंडागळे,  मुश्ताक शेख,चंद्रकांत नवले,हाजी इस्माईल शेख,मारुतराव राशिनकर, अॕड.अरविंद साळवी,भैय्या शेख,जाकीर शेख,बाबालाल पठाण,महेश कु-हे,प्रभात कु-हे,बाबुराव पवार,चंद्रकांत नाईक, मिलिंद दुधाळ,प्रकाश कु-हे,गणेश बंगाळ,रावसाहेब गाढे,विशाल आंबेकर ,भाऊसाहेब तेलोरे,इस्माइल आतार आदिंसह बचत गटाच्या महिला तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीरामपूर  : महाराष्ट्र शासन व प्रशासनाने 15 डिसेंबर 2022 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार  स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग  करणारे पहिले राज्य महाराष्ट्र. राज्यातील 13 जिल्ह्यातील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय मोठा गाजावाजा करून 1 मे 2025 रोजी सुरू करण्यात आले.परंतु कुठल्याही स्वरूपाचे अधिकार प्रायोगिक तत्वावर  सुरू करण्यात आलेल्या 13 जिल्ह्यातील जिल्हा दिव्यांग सक्षमिकरण अधिकाऱ्यांना प्राप्त झाले नव्हते.त्यामुळे तातडीने मंत्रालय व आयुक्त कार्यालाकडे पाठपुरावा करून डी.डि.ओ कोड प्राप्त करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अशी माहिती संजय साळवे अध्यक्ष जिल्हा दिव्यांग शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांनी दिली.

          दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन, जीपीएफ,मेडिकल बीले,सेवानिवृत्त कर्मचारी व त्या अनुषंगाने सर्व कामे प्रलंबित होते  ती सर्व मार्गी लागेल.त्याचबरोबर दिव्यांग बांधवांच्या योजना देखील कार्यान्वित होतील.  

         संघटनेने व नासिक पदवीधर मतदार संघाचे आ. सत्यजित तांबे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री मा.अतुल सावे यांनी तातडीने दखल घेतली. त्यानुसार 4 जून 2025 रोजी दिव्यांग कल्याण विभागाचे अवर सचिव भा.रा.गायकवाड यांनी तातडीने आदेश निर्गमित केले. दिव्यांग कल्याण विभागाचे अवर सचिव मा.भा. रा.गायकवाड यांनी 4 जून 2025 रोजी आदेश निर्गमित करण्यात आले आहे.दि. 6 जून 2025 रोजी दिव्यांग  कल्याण विभागाचे आयुक्त यांनी 13 जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्वरित अहवाल  पाठविण्याचे आदेश दिले आहे.

         सदर आदेशामुळे 13 जिल्ह्यातील कर्मचारी व दिव्यांग बांधवामध्ये आनंदाचे वातावरण पसरलेआहे.दिव्यांग शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना अहिल्यानगर यांचे सर्वांनी विशेष आभार मानले. आहे.याकरिता संघटनेचे अध्यक्ष संजय साळवे,उपाध्यक्ष चांगदेव खेमनर,खजिनदार प्रदीप भोसले,श्रीरामपूर मूकबधिर  विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष जोशी,नागनाथ शेटकर,रमेश टिक्कल,ज्ञानदेव जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले.

अहिल्यानगर,(४ जून/गौरव डेंगळे):

अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने ४० वर्षांवरील वयोगटासाठी भव्य जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या स्पर्धा दिनांक ६ व ७ जून २०२५ रोजी दोन प्रमुख ठिकाणी पार पडणार आहेत — कराळे हेल्थ क्लब, सावेडी आणि वाडिया पार्क क्रीडा संकुल, अहिल्यानगर.


स्पर्धेतील खेळ प्रकार:


या उत्सवामध्ये व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन आणि पोहणे (स्विमिंग) या प्रमुख खेळांचा समावेश असून, खेळाडूंमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे.


स्पर्धेतील सहभागी संघ:


ही स्पर्धा चार संघांमध्ये खेळवली जाणार आहे. त्या संघांची नावे आणि प्रमुख खेळाडू पुढीलप्रमाणे:



🟢 रायगड किंग्स


प्रमुख खेळाडू:

सतीश गायकवाड, घनश्याम सानप, प्रमोद आठवाल, शैलेश गवळी, कृष्णा लांडे, प्रशांत गंधे, बंटी गुंजाळ, सतीश झेंडे, विजुभाऊ मिस्कीन, पुरोहित सर, अजय पवार, संतोष घोरपडे, सचिन तिवारी, वैभव पवार



🔵 राजगड कॅपिटल


प्रमुख खेळाडू:

संदेश भागवत, संतोष ठाणगे, विल्सन फिलिप्स, अनिल भापकर, सचिन पठारे, डेविड माकासरे, किशोर गांधी, गणेश तलवारे, सोमानी सर, संतोष वाबळे, शब्बीर सर, प्रशांत कोळपकर, जयंत जाधव, संतोष गाडे



🔴 प्रतापगड वॉरियर्स


प्रमुख खेळाडू:

डॉ. विजय म्हस्के, विशाल गर्जे, मोहित भगत, रामेश्वर सर, रोनक फर्नांडिस, दिनेश भालेराव, निलेश मदने, संजय साठे, विजय पवार, कुलकर्णी सर, शंतनू पांडव, महेश पटेकर, सचिन जावळे, प्रशांत निमसे, विनायक भूतकर



🟡 सिंहगड लायन्स


प्रमुख खेळाडू:

सुनील गोडळकर, विकास परदेशी, संजय पाटील, मुकुंद काशीद, योगेश चव्हाण, ज्ञानेश्वर खुरांगे, अविनाश काळे, प्रदीप पाटोळे, कल्पेश भागवत, अजय बारगळ, सचिन सप्रे, प्रवीण कोंडावळे, दिनेश मोरे, हेमंत कुलकर्णी, सचिन गायकवाड



पंचमंडळी (रेफरीज):


या स्पर्धेसाठी पंच म्हणून मनीष राठोड, अमित चव्हाण, शदाब मोमीन आणि हर्षल काशीद हे जबाबदारी पार पाडणार आहेत.



ही स्पर्धा का खास?


४० वर्षांवरील वयोगटातील खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानी स्पर्धेचा अनुभव मिळणार आहे.


फिटनेस, खेळातील शिस्त, सामाजिक स्नेह यांचा संगम असलेली ही स्पर्धा आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे.


निवृत्तीनंतरही सक्रिय राहण्यासाठी प्रेरणा देणारा एक प्रेरणादायी उपक्रम!


उद्घाटन व समारोप:


या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन व समारोप सोहळे प्रमुख क्रीडा अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहेत. सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्रे, स्मृतीचिन्हे व संघांना सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत.

ही स्पर्धा एक प्रेरणादायी आणि उत्साही वातावरण निर्माण करणार असून, वयोमानानुसारही 'खेळ भावना' अमर आहे हे दाखवून देणारी ठरेल.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget