Articles by "latestnews"

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - वृत्तपत्र क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारारा ज्यस्तरीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर 'दर्पण पुरस्कार' येथील दैनिक स्नेहप्रकाशचे मुख्य संपादक प्रकाश बापूराव कुलथे यांना जाहीर झाला आहे. ६ जानेवारी पत्रकार दिनी सदरचा पुरस्कार बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मगाव असलेल्या कोकणातील पोंभुर्ले,ता.देवगड,जि.सिंधुदुर्ग येथे स्मारक म्हणूनउभारलेल्या दर्पण सभागृहात समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या पत्रकारांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेतर्फे हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो.राज्यातील अनेक नामवंत संपादक व ज्येष्ठ पत्रकारांना आतापर्यंत हा पुरस्कार मिळाला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील महाराष्ट्रातील हा सर्वोच्च पुरस्कार आहे.

श्री.प्रकाश कुलथे हे गेली ३५ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत आहेत.स्नेहप्रकाश प्रकाशनच्या माध्यमातून त्यांनी साहित्य क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले असून आत्तापर्यंत शेकडो पुस्तके प्रकाशित करून लेखकांना प्रोत्साहित केले आहे.


श्री.प्रकाश बापुराव कुलथे यांनी आपल्या यांनी आपल्या चाळीस वर्षाच्या सामाजिक वृत्तपत्रे क्षेत्रात अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ते

 दैनिक स्नेहप्रकाश चे मुख्य संपादक असून साप्ताहिक वर्ल्ड सामना चे संस्थापक संपादक, वृत्तपत्र व प्रसार माध्यम राज्य अधीस्विकृती समिती, महाराष्ट्र शासन सदस्य,शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी चे विश्वस्त,श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर लाड सुवर्णकार संस्था, त्र्यंबकेश्वर, नाशिक चे उपाध्यक्ष,महाराष्ट्र संपादक परिषद,मुंबई चे कार्याध्यक्ष,

महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा श्रीरामपूर चे कार्याध्यक्ष, श्रीरामपूर पत्रकार संघाचे सचिव, हिंद सेवा मंडळाच्या क. जे. सोमैय्या हायस्कुल, श्रीरामपूर चे सदस्य म्हणून काम पाहत असून नुकतीच त्यांची इंडियन लँग्वेजेस न्युज पेपर असोसिएशन (इलना) या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.

यापूर्वी पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले असून बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार हा वृत्तपत्र क्षेत्रातील मानाचा पुरस्कार देखील त्यांना आता जाहीर झाला आहे.श्रीरामपूर शहर तसेच जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध असून त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने हा संपूर्ण श्रीरामपूरकरांचा सन्मान आहे असे मानले जात आहे.श्री कुलथे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील तील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –  तालुक्यातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणारी महत्त्वपूर्ण राजकीय घटना काल घडली. उबाठा गटाचे उत्तर महाराष्ट्रातील शिव आरोग्य सेना प्रमुख म्हणून ओळख असलेले आणि सामाजिक उपक्रमांमुळे तालुक्यात विशेष लोकप्रियता मिळवलेले डॉ. महेश शिरसागर यांनी काल भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाला हा प्रवेश सोहळा केवळ मोठ्या उत्साहातच नाही, तर भविष्यातील राजकीय ध्रुवीकरणाचे संकेत देणारा ठरला.


 श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नामदार विखे पाटील हे श्रीरामपूर दौऱ्यावर असताना   हा पक्ष प्रवेश करण्यात आला  डॉ. महेश शिरसागर यांनी शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून तालुक्यात रुग्णसेवा, आरोग्य शिबिरे, रक्तदान, सामाजिक उपक्रम अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय सेवा हे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य नेहमीच चर्चेत राहिले. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीतील  राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


यावेळी बोलताना पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “श्रीरामपूरचा विकास, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी या तिन्ही क्षेत्रांमध्ये हा प्रवेश निर्णायक ठरेल. युवकांना नेतृत्व मिळावे आणि सामाजिक कार्याला दिशा मिळावी, या उद्देशाने आम्ही एकत्र आलो आहोत. भाजपच्या माध्यमातून श्रीरामपूरचा विकास अधिक वेगाने होईल.”


दरम्यान डॉ. शिरसागर यांनी आपले विचार मांडताना सांगितले, “ही केवळ राजकीय पायरी नाही तर समाजसेवेच्या कार्याला नवा आयाम देण्याचे पाऊल आहे. जनतेच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूनेच मी प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे श्रीरामपूर शहरात आणि तालुक्यात विविध चर्चांना चांगलीच उधाण आले आहे. आगामी निवडणुका, नगरपालिकेतील सत्ताकारण आणि विविध गट-तटबंदीच्या पार्श्वभूमीवर शिरसागर यांचे पक्षप्रवेश हे प्रस्थापित राजकीय घटकांसाठी धक्का मानला जात आहे. या प्रवेश सोहळ्यानंतर लगेचच शहरात चर्चा वाढली असून, “श्रीरामपूर आता नव्या राजकीय पर्वाकडे वाटचाल करत आहे,” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. राजकीय वातावरणात बदलाचे संकेत देणाऱ्या या घटनाक्रमामुळे श्रीरामपूरचे राजकारण अधिक रंगतदार आणि स्पर्धात्मक होणार हे निश्चित!

सिन्नर (जि. नाशिक) येथील पोलिस ठाण्यात जी.डी. क्रमांक 041 नुसार बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप दामोदर रूपते (वय 40 वर्षे) हे दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री सुमारास 8 वाजता आपल्या घरीून – उद्योग भवन, सिन्नर, जि. नाशिक येथून कोणास काहीही न सांगता बाहेर पडले असून ते परत घरी आले नाहीत. प्रदीप रूपते यांचे वर्णन पुढीलप्रमाणे : उंची : 5 फूट 6 इंच रंग : सावळा चेहरा : उभट केस : काळे, छोटे वेषभूषा : राखाडी रंगाची नाईट पॅंट आणि पिवळ्या रंगाचा टी-शर्ट याबाबत मनोज दामोदर रूपते (वय 45 वर्षे, व्यवसाय – व्यापारी) यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद (रजी. क्र. 147/2025) करून दिली आहे. सदर व्यक्तीचा शोध सुरू असून, कोणाला प्रदीप रूपते यांची माहिती मिळाल्यास सिन्नर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असा सिन्नर पोलिस ठाण्याचा आवाहन आहे. 📞 संपर्क : 9860158354 तपास अधिकारी : पो. हवालदार हरीश रामेश आव्हाड स्रोत : सिन्नर पोलिस ठाणे, नाशिक ग्रामीण

श्रीरामपूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमास जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित राहून सर्वांना  मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. समाजातील विविध घटकांतील नागरिक, कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला.


या कार्यक्रमादरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील गायक, वादक आणि कलाकारांनी सादर केलेल्या हिंदी आणि मराठी गीतांच्या सुरेल मैफलीने वातावरण रंगले. त्यांच्या कलाकौशल्याने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.



यानिमित्ताने श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील अनेक नागरिकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून सामील झालेल्या नव्या कार्यकर्त्यांमुळे पक्ष संघटनेला निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

श्रीरामपूर (प्रतिनिधी):  तालुक्यातील हरेगाव येथे मंगळवारी जिल्ह्याच्या विकासाचा नवा टप्पा गाठणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ‘घरकुल योजना’ अंतर्गत ६०१ घरकुलांचा शुभारंभ खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहपयोगी साहित्यांचे वाटप तसेच ११ लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात घरकुलांचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.



या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक, बांधकाम कामगार, महिला बचत गटांच्या सदस्यांसह विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी श्रीरामपूर तालुक्याच्या विकासासंबंधी अनेक महत्वाच्या घोषणा करत, राजकीय कटुता बाजूला ठेवून विकासाच्या मुद्यावर एकत्र येण्याचे आवाहन केले.


डॉ. विखे पाटील म्हणाले, या तालुक्यात प्रत्येक छोट्या प्रश्नासाठी संघर्ष करावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आंदोलन करावे लागले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी उपोषणे झाली. परंतु आता ते दिवस संपले. श्रीरामपूर तालुक्याचा एकही प्रश्न पुढच्या चार वर्षात प्रलंबित ठेवणार नाही, ही माझी ग्वाही आहे. त्यांनी पुढे सांगितले की, खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला असून, आता आकारी पडीक जमिनीच्या प्रश्नावर राज्यपालांकडे प्रस्ताव प्रलंबित आहे. पुढील सात ते आठ महिन्यांत या प्रश्नावरही निर्णय लागेल, असे ते म्हणाले.


डॉ. विखे पाटील यांनी स्थानिक राजकारणावरही टीका केली. ते म्हणाले, श्रीरामपूर तालुक्यात राजकारण फक्त मोबाईलवर चालते. रात्री सातनंतर काही जण जागे होतात आणि सोशल मीडियावर आरोप करतात. परंतु विकास सोशल मीडियावरून होत नाही. गेल्या २५ वर्षांत सत्तेत राहिलेल्यांनी काय केले, हे आता जनतेने विचारले पाहिजे. ते म्हणाले,  विकासाच्या मुद्यावर निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत. एमआयडीसीची अवस्था बघा  आज एकही उद्योजक इथे येण्यास तयार नाही. त्यांना सुरक्षिततेचा अभाव वाटतो. हे बदलायचे काम आपण करणार आहोत. ६ महिन्यांत शिवाजी महाराज पुतळा; पुढे आंबेडकर स्मारक

विखे पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी चाळीस वर्षे लोक आंदोलने करत होते. पण आम्ही तो प्रश्न सहा महिन्यांत मार्गी लावला. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचाही प्रश्न आम्ही सहा महिन्यांत सोडवणार आहोत. दीड कोटी रुपयांचा निधी आधीच दिला आहे. ते म्हणाले, ज्यांना ४० वर्षांत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा देता आली नाही, ते सर्वसामान्य माणसाला घरकुलासाठी जागा कधी देणार?


हरेगावच्या सर्वांगीण विकासासाठी ५० लाख रुपयांचा निधी देत आहे, असे जाहीर करताना त्यांनी दलित वस्तीसाठी नवीन घोषणा केली. ग्रामपंचायतच्या माध्यमातून या भागातील गटारी, रस्ते, वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा योजनांना वेग देणार, असे त्यांनी स्पष्ट केले.


त्यांनी टक्केवारीच्या राजकारणावर थेट निशाणा साधत म्हटले, गटारीच्या पैशात टक्केवारी करणाऱ्यांना अजून मला ओळखत नाही. ज्यांनी स्वतःचा स्वाभिमान संगमनेरकडे गहाण ठेवला, त्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारू नयेत. ज्यांनी लोकसभेत मला पाडण्याचा प्रयत्न केला, त्यांना पाडून पुन्हा उभा राहिलो, कारण मला सामान्य जनतेचा आशीर्वाद आहे,  असे त्यांनी बाळासाहेब थोरात व निलेश लंके यांचे नाव न घेता टोला लगावला 


ते म्हणाले, श्रीरामपूर तालुका माझ्या पाठीशी उभा राहिला, तर मी तात्काळ उद्योग निर्माण करतो. बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. आपल्या मुलांना नोकऱ्या पाहिजेत तर उद्योजक येणारच, आणि उद्योजकांना सुरक्षित वातावरण विखे पाटील परिवारच देऊ शकतो 


आपल्या भाषणाच्या शेवटी विखे पाटील म्हणाले, मी काही टक्केवारीसाठी राजकारण करत नाही. मला फक्त विकास करायचा आहे. या जमिनीवर तुम्ही घर बांधाल, तुमच्या मुलांचं भविष्य घडवाल  हेच माझं समाधान आहे. मला तुमच्याकडून काही नको, फक्त आशीर्वाद द्या. कारण गरिबांच्या प्रार्थनेत ती ताकद असते, जी मला पुन्हा उभं करते.


कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी विनोदाने म्हटले, आज पहिल्यांदा श्रीरामपूर तालुक्यात कार्यक्रम चाळीस मिनिटांत संपला. वेळेचं महत्त्व ठेवू या. बोलणं कमी, काम जास्त असू द्या. या कार्यक्रमास  जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर मा. तालुकाध्यक्ष दिपक पटारे  तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे मा. सभापती नानासाहेब पवार शरद नवले गिरीधर आसने नानासाहेब शिंदे अभिषेक खंडागळे नितीन भागडे, भाऊसाहेब बांद्रे किशोर बनसोडे खंडेराव सदाफळ अनिल भगडे महेंद्र पटारे, ग्रामविकास अधिकारी सुभाष मस्के, विस्ताराधिकारी दिनकर ठाकरे  शरद त्रिभुवन,  ग्रामविकास अधिकारी प्रदीप आसने, सरपंच दिलीप त्रिभुवन, सरपंच जितेंद्र गोलवड, उपसरपंच बाळासाहेब निपुंगे राजेंद्र नाईक रामेश्वर बांद्रे सचिन पवार भीमा बागुल सुभाष त्रिभुवन  व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात डॉ. विखे पाटील यांनी ‘विकासासाठी संघर्ष’, ‘सामाजिक समतेचा आदर्श’ आणि ‘राजकारणापेक्षा कार्य’ या तीन मुद्यांवर ठाम भूमिका मांडली.


बेलापूर (प्रतिनिधी)-अल्पावधीतच नावारुपाला आलेल्या गावकरी पतसंस्थेचा कारभार काटकसरीने करुन पतसंस्थेत जास्तीत जास्त ठेवी गोळा करुन कर्ज वसुली लाही प्राधान्य देणार असल्याचे मत गावकरी पतसंस्थेचे नुतन चेअरमन अभिषेक खंडागळे यांनी व्यक्त केले.                                 येथील गावकरी पतसंस्थेच्या चेअरमन पदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व बेलापूरचे माजी उपसरपंच अभिषेक पाटील खंडागळे यांची निवड झाली त्याबद्दल सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.या वेळी पत्रकार देविदास देसाई विष्णुपंत डावरे,मयूर साळूंके, प्रफुल्ल काळे आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी संजय भोंडगे,मेजर किरण शेलार,बाबुलाल पठाण,दिपक क्षत्रिय,पुंजाहरी सुपेकर, विलास नागले, भगीरथ मुंडलिक,किरण गागरे, रविंद्र कर्पे, महेश जेठवा,विशाल आंबेकर, राधेश्याम अंबिलवादे,दिलीप अमोलिक, बाबासाहेब काळे,सचिन वाघ,संदीप सोनवणे,महेश कुऱ्हे,सचिन देवरे, महेश ओहोळ,औदुंबर राऊत, मच्छिंद्र खोसे आदी उपस्थित होते.

बेलापूर (प्रतिनिधी)- येथील करून ऋषिकेश साहेबराव वाबळे याची दक्षिण आफ्रिकेतील डरबान शहराजवळ जवळील केप टाऊन येथे साखर कारखान्याच्या व्यवस्थापना संबंधित सॉफ्टवेअर तयार करण्याचे व  अंमलबजावणी करण्याचे महत्त्वाचे कार्य करण्याकरता निवड झाली असून त्याच्या या निवडीमुळे श्रीरामपूर तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा असा वर्षोव होत आहे                               बेलापूर येथील ऋषिकेश वाबळे हे श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव साहेबराव रामराव वाबळे यांचे चिरंजीव आहेत .त्यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बेलापूर येथील जेठाभाई ठाकरशी सोमय्या हायस्कूल येथे पूर्ण केले त्यानंतर त्यांनी एमआयटी कॉलेज पुणे येथून बी टेक एम बी ए ॲग्री अँड फूड मॅनेजमेंट पदव्या संपादन केल्या शिक्षणाच्या काळात त्यांनी साखर उद्योग आणि कृषी व्यवस्थापन क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविले आपल्या वडिलांच्या प्रेरणेने त्यांनी कठोर मेहनत घेऊन शिक्षण व कौशल्याच्या जोरावर थेट परदेशात आपली छाप उमठविली आहे .याप्रसंगी अशोक कारखान्याचे चेअरमन भानुदास मुरकुटे माजी उपनगराध्यक्ष करण दादा ससाणे, आमदार हेमंत ओगले, अरुण पाटील नाईक ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, माजी सरपंच भरत साळुंके ,बाळासाहेब भांड,खटोड पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र खटोड, संजय गोरे ,लहान भाऊ नागले ,अशोक राशिनकर, बाजार समितीचे सर्व संचालक सभासद व व्यापारी वर्गांनी ऋषिकेश वाबळे त्याचबरोबर सचिव साहेबराव वाबळे यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. बेलापूरच्या मातीतून घडलेल्या ऋषिकेश वाबळे यांनी आज जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करुन दिली आहे .

गेली वीस-बावीस वर्षांपासून उक्कलगाव गणातील कार्यक्षेत्रात उक्कलगाव गळनिंब एकलहरे कुरणपूर फत्याबाद मांडवे कडीत खंडाळा चांडेवाडी तांबेवाडी यादी भागात सामाजिक कामात कार्यरत असून व नात्यागोत्याचा मोठा जाळं मित्रपरिवार मोठा असून या परिसरातील सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवण्याचे काम प्रभावीपणे केले असून उक्कलगाव पंचायत समिती गणातून निवडणूक लढवावी असे सर्व सामान्यांचे आग्रही भूमिका व लागेल ती मदत करणार असल्याचे  ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणारच असल्याचे संदीप शेरमाळे यांनी सांगितले.

   कडीत बुद्रुक, कडीत खुर्द, मांडवे, तांबेवाडी,फत्याबाद, चांडेवाडी, कुरणपूर, गळनिंब, उक्कलगाव, एकलहरे, आठवाडी, जवाहरवाडी, यादी परिसरात अनेक प्रश्न त्यामध्ये 

वीज, पिण्याचे पाणी,बिबट्या कडून हल्ल्या, हॉस्पिटलचे प्रश्न, बांधकाम कामगार, रस्ते, रेशनचे, त्याचबरोबर संजय गांधी निराधार, अपंग, एकल महिला, बालसंगोपन प्रकरणही मोठ्या प्रमाणावर या परिसरात राबवले आहे.कोरोना काळातही मोठं काम असून  महिला बचत गटांच्या समस्या सोडवण्याचे काम यापूर्वी केलेले असून  मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे. आतापर्यंत विशेष कार्यकारी अधिकारी हे गावात कोणालाच माहीत नव्हते. शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दुकानात त्यांचा शिक्का व सही उपलब्ध होती त्याचा हे उल्लेखनीय काम विद्यार्थ्यांसाठी असून विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप साठी देखील प्रयत्न मोठ्या प्रमाणात केलेले आहे. या सामाजिक कामाबद्दल गळनिंब येथील व प्रभाग क्रमांक तीन मधील कार्यकर्त्यांनी एकमताने निवडणुकीत उभं करून बिगर खर्च निवडून आणले ते गळनिंब ग्रामपंचायतचे दहा वर्षे सदस्य असून श्रीरामपूर न्यायालयाच्या विधी सेवा समिती चे तीन वर्षे काम केले. याव्यतिरिक्त त्यांचं सामाजिक काम फार मोठे असून स्पंदन फाउंडेशनच्या माध्यमातून देखील अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवले असून या पाच गावे वाड्या वरती ४२ मावस भाऊ,सासरवाडी घरातील सर्वांची, भावाची  सासरवाडी याच पाच गावात  असल्याने मोठे नातेगोते  व मित्रपरिवार  मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यात या भागातून जाणारा कोल्हार बेलपिंपळगाव रस्ता याचे काम देखील त्यांच्या रेट्यामुळे झाले. फत्याबाद मधील असणारे कोल्हार बेलापूर रस्त्यावरील गटार त्यांच्या मदतीने त्या ठिकाणी काँग्रेटीकरण करून रस्ता उंचावण्यासाठीचा प्रस्ताव करण्यात आला. या ठिकाणी बोलले जाते. उक्कलगाव  प्रवरापट्ट्यातील पाच गावांच्या विकास कामासाठी त्यांचं मोठे प्रयत्न राहिले असल्याने परिसरातील नागरिकांची मनोमन इच्छा आहे त्यांनी उकलगाव गनातून पंचायत समिती निवडणूक लढवावी.

बेलापूरः (प्रतिनिधी)-येथील महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या (महावितरणच)विद्युत  सबस्टेशनला  स्वतंञ उपविभाग म्हणून मान्यता मिळाली असुन या प्रश्नाबाबत वेळोवेळी विधानसभेत प्रश्न उपस्थित करुन हे काम मार्गी लावण्यासाठी सतत पाठपुरावा केला असल्याची माहिती आमदार हेमंत ओगले यांनी दिली आहे.  या बाबत माहिती देताना आमदार हेमंत ओगले म्हणाले की तालुक्याचे विविध प्रश्न आमदार या नात्याने सतत विधानसभेत मांडत असतो . श्रीरामपूर तालुक्यात बेलापूर हे सर्वात मोठ्या लोकसंख्येचे गाव असून येथील सब स्टेशनला अनेक गावे जोडलेले असल्यामुळे या सबस्टेशनवर अतिरिक्त भार येतो. त्यामुळे नागरिकांना वेळोवेळी भार नियमनाचा त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन आपण बेलापूरकरता स्वतंत्र उपविभाग देण्याची मागणी केली होती .  व त्याबाबत सतत पाठपुरावाही केला होता.या मागणीची दखल घेवुन बेलापूर करीता स्वतंत्र विभाग व बारा कर्मचाऱ्यांना नियुक्ती करण्याचे आदेश नुकतेच करण्यात आलेले आहे याबाबत राज्यमंत्री मेघना दीपक साकोरी बोर्डीकर यांनी आपणास  पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार व आपण केलेल्या प्रयत्नामुळे महावितरण मार्फत नवीन उपविभाग व शाखा कार्यालय निर्माण करण्यास अंतरी मंजुरी मिळाली असून याबाबत महावितरण स्वतंत्र परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे आपण केलेल्यां पाठपुराव्यामुळेच या कार्यालयामार्फत सदर जनहिताचे काम मार्गी लागले असल्याचे पत्र राज्यमंत्री मेघना दीपक साकोरे यांनी दिले असल्याचेही आमदार ओगले यांनीसांगितले ,बेलापूर येथील सबस्टेशन हे श्रीरामपूर वीज विभागास जोडलेले होते.यामुळे वीज वितरणात सातत्याने अडथळा येत असे.यामुळे महावितरणच्या श्रीरामपूर विभागाचे विभाजन करुन  बेलापूर सबस्टेशनचे स्वतंञ उपविभागात रुपांतर करावे यासाठी विशेष प्रयत्न केले असल्याचेही आमदार ओगले यांनी सांगितले .

श्रीरामपूर : जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या व्यवस्थापन व कामकाजाच्या दृष्टीने नव्याने जिल्हा व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली आहे. जिल्हा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष- जिल्हाधिकारी अहिल्यानगर,उपाध्यक्ष- मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर,सदस्य- जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर,सदस्य- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अहिल्यानगर. सदस्य- डॉ.अभिजीत दिवटे प्रकल्प संचालक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अहिल्यानगर,श्री. संजय साळवे वैद्यकीय सामाजिक अधिकारी रोटरी मूकबधिर विद्यालय श्रीरामपूर अशासकीय सदस्य,श्री.बबन मस्के अशासकीय सदस्य,श्री. रत्नाकर ठाणगे अशासकीय सदस्य,जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अहिल्यानगर सदस्य सचिव ही कमिटी दिव्यांगांच्या पुनर्वसनात्मक कामकाजाच्या दृष्टीने भविष्यात कामकाज पाहणार आहे.

      संजय साळवे यांनी अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर आणि आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र तसेच मूकबधिर विद्यालय संचलित दिव्यांग कल्याण मार्गदर्शन व पुनर्वसन केंद्र मार्फत दिव्यांगांच्या सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक, व सामाजिक दृष्टिकोनातून अतिशय मौल्यवान योगदान दिलेले आहे. दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत 58 दिव्यांग व्यक्तींना बीज भांडवल योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.आणि स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला आहे.     त्याचबरोबर जिल्हा परिषद 5% सेस फंडातून 38 दिव्यांग व्यक्तींना पिठाची गिरणी उपलब्ध करून दिली आहे.

       मागील पंचवीस वर्षापासून दरवर्षी राज्यस्तरीय दिव्यांग वधु वर परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून आजगायत 288 दिव्यांग व्यक्तींचे विवाह मोफत संपन्न करण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत आत्तापर्यंत 14 दिव्यांग व्यक्तींना बॅटरीवरील सायकल उपलब्ध करून दिले आहे.तसेच अनेक दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर,कुबडी व इतर कृत्रिम साहित्य उपलब्ध करून देऊन दिव्यांगांच्या जीवनात नवी पहाट निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे.

     त्याचबरोबर विविध आरोग्य शिबिराचे आयोजन करून दिव्यांग बांधवांमध्ये नवचेतना निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे

      दरवर्षी दिव्यांग महिला सन्मान सोहळा,संजय गांधी निराधार योजना,अंत्योदय  योजना,स्वतंत्र रेशन कार्ड, याचा लाभ दिव्यांगांना मिळवून दिला आहे. अलीमको नवी दिल्ली, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अहिल्यानगर मार्फत मोफत हातपाय मोजमाप व कॅलिपर्स  मोजमाप तात्काळ वितरण शिबिराचे आयोजन करून 112 दिव्यांगांना याचा लाभ मिळवून दिला आहे.

     त्यांच्या या कार्याची पावती म्हणूनच त्यांची निवड जिल्हा व्यवस्थापन समितीवर करण्यात आली आहे. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी प्रशांत गायकवाड,जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जिल्हा समन्वयक डॉ.दीपक अनाप, दिव्यांग शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

श्रीरामपूर / प्रतिनिधी :श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) गेल्या काही दिवसांपासून कामकाज ठप्प झाल्याने वाहन चालक व मालक वर्गाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.जुने अधिकारी बदलून गेल्यानंतर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती होण्यासाठी काही काळ लागला. या काळात वाहन चालविण्याचे लायसन, वाहन हस्तांतरण (टी.ओ), वाहनावरील बोजा चढवणे-कमी करणे, वाहन पासिंग आदी महत्त्वाची कामे प्रलंबित राहिली. परिणामी अनेकांना आर्थिक नुकसान सोसावे लागले.हातावर पोट असलेले वाहनचालक, काहीजण उसनवारी करून वाहने घेऊन व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहतात. मात्र कागदपत्रे वेळेत मिळाली नाहीत तर त्यांचे स्वप्न धुळीस मिळते. विशेषतः वाहन परवाना मंजुरीला सहा सहा महिने लागल्याने, नोकरीच्या संधी गमावणारे तरुण मोठ्या प्रमाणात नाराज आहेत.यावर तातडीने उपाययोजना होणे गरजेचे असून, प्रादेशिक परिवहन अधिकारी अहिल्यानगर श्री. विनोद सगरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर श्री. अनंता जोशी व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर श्री. संदीप निमसे यांनी स्वतः लक्ष घालून कामकाज सुरळीत करावे अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.


संगमनेर: ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक केवळ धार्मिक उत्साहापुरती मर्यादित न राहता, यावर्षी सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडवणारी ठरली. पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणुकीनुसार शांतता, स्वच्छता आणि मानवतेचा संदेश देत विविध गटांनी इथे मिलादुन्नबी, पैगंबर जयंतीदरम्यान महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले.

यात ​एका स्वयंसेवक गटाने मिरवणूक ज्या मार्गाने गेली, त्या मार्गाची तात्काळ स्वच्छता केली. त्यांच्या या कृतीतून 'स्वच्छता हाच धर्म' असा संदेश देण्यात आला. या तरुणांनी मिरवणुकीचा उत्साह कायम राखत सामाजिक भान जपले, ज्यामुळे नागरिकांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.तर एका गटाने महा​आरोग्य शिबिराचे आयोजन ते देखील मोफत आरोग्य तपासणी तसेच उपचार व औषधे अश्या शिबिरांचे आयोजन केले होते. या शिबिरांमध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार दिला गेला. धार्मिक उत्सवादरम्यान आरोग्यसेवेसारख्या उपक्रमामुळे लोकांमध्ये एक सकारात्मक संदेश पोहोचला.​काही गटांनी पैगंबर मोहम्मद यांच्या मानवतावादी आणि शांततेच्या शिकवणुकीचा प्रसार केला. त्यांनी त्यांच्या विचारांचे फलक तसेच ऐतिहासिक आठवणीतल्या पुरातन काळातील वस्तू आणि माहितीपत्रके घेऊन लोकांना सर्वधर्म समभाव, सलोखा आणि एकता या मूल्यांचे महत्त्व पटवून दिले.


​एकंदरीत, यावर्षीची ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक धार्मिक उत्साहासह सामाजिक कार्याचा एक आदर्श बनली आहे. या उपक्रमांनी पैगंबरांच्या शिकवणुकीला केवळ शब्दांत नव्हे, तर कृतीतूनही लोकांपर्यंत पोहोचवले. याचीच दखल घेत ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार आणि न्यूज एन एम पी परिवाराने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले असून, पुरस्कार जाहीर केलेली नावे पुढीलप्रमाणे एकता नगर सोशल ग्रुप, ह्युमन रिलीफ अल्पसंख्यांक फाउंडेशन, एन आर सी सी ग्रुप आणि मंत्री फाउंडेशन, मोगलपुरा मस्जिद ट्रस्टी, गवंडीपुरा मस्जिद ट्रस्टी अशा एकूण पाच संस्थांना पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, येत्या  शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3=00 वाजता  विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सय्यद बाबा चौक या ठिकाणी हा सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष वसीम उर्फ गुड्डूभाई सय्यद अहिल्यानगर  महिला जिल्हाध्यक्ष बानोबी शेख, महासचिव जमीर शेख, यांनी दिली आहे

पत्रकारितेचा वारसा आणि सामाजिक बांधिलकीची अनोखी गाथा - धिरज शिवपालसिंह ठाकूर

आजच्या वेगवान डिजिटल युगात, जिथे बातम्या क्षणात जन्माला येतात आणि क्षणात विरून जातात, अशा स्पर्धेच्या काळात संगमनेरसारख्या वेगाने बदलणाऱ्या शहरात 'दैनिक प्रवरातीर'सारखे वृत्तपत्र सातत्याने आपले स्थान टिकवून आहे. या यशामागे आहे. एक तरुण, ध्येयवेडा आणि सामाजिक जाणिवेची जाणीव असलेला संपादक, धिरज आणि त्याचे वडील शिवपालसिंह ठाकूर. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी, धिरजने आपल्या वडिलांकडून मिळालेला पत्रकारितेचा वारसा केवळ पुढेच नेला नाही, तर त्याला सामाजिक कार्याची आणि आधुनिकतेची जोड देऊन एक वेगळीच ओळख निर्माण केली. त्यांचे वडील, ज्येष्ठ संपादक शिवपालसिंह ठाकूर, यांनी ३० वर्षांपूर्वी संगमनेरच्या पत्रकारिता क्षेत्रात पाऊल ठेवले आणि आज धिरज त्याच पावलावर पाऊल टाकून यशस्वीपणे वाटचाल करत आहेत.

धिरजचा जन्म मूळ गावी, श्री संत नगरी शेगाव येथे झाला. मात्र, तो अवघ्या दोन वर्षाचा असतानाच शिवपालसिंह संगमनेरच्या भूमीत स्थायिक झाले, शिवपालसिंह कोणताही पूर्वानुभव पाठीशी नसताना पत्रकारितेची नवी इनिंग सुरू करण्यासाठी संगमनेर शहरात आले. लहानपणापासूनच धिरजला कुटुंबातील कष्टाचे आणि स्वाभिमानी वातावरणाचे बाळकडू मिळाले. अवघ्या आठ वर्षांच्या धीरजने संगमनेरच्या अकोले नाक्यावर पेपर स्टॉल चालवून वडिलांना मदत करायला सुरुवात केली. हे कष्ट त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनले.

पत्रकारितेचे धडे आणि 'प्रवरातीर'ची जबाबदारी- शिक्षणासोबतच, धिरजने पत्रकारितेचे धडेही गिरवायला सुरुवात केली. त्याने आपले शिक्षण पूर्ण करत असतानाच, वडिलांनी सुरू केलेल्या साप्ताहिक 'प्रवरा माई' वृत्तपत्रात सक्रिय सहभाग घेतला. या काळात त्याने पत्रकारितेच्या सर्व बाजू समजून घेतल्या. मग ती जबाबदारी जाहिरात वितरणाची असो, व्यवस्थापनाची असो, किंवा संपादकीय कामाची असो. त्याने कम्प्युटरशी संबंधित सर्व कामे स्वतः शिकून घेतली. या अनुभवामुळे, शिक्षण पूर्ण झाल्यावर 'दैनिक प्रवरातीर' सुरू करण्याची वेळ आली, तेव्हा धिरजने वडिलांसोबत ही संपूर्ण जबाबदारी समर्थपणे स्वीकारली. गेली दहा वर्षे हे दैनिक धिरजच्या मालकीचे असून, त्याने वडिलांच्या मदतीने प्रवरातीरला यशाच्या शिखरावर नेले आहे. या बाप-लेकाच्या प्रयत्नामुळे दैनिक प्रवरातीर संगमनेरच नव्हे तर जिल्ह्याच्या बहुतांशी भागातील अग्रगण्य सायं दैनिक बनले आहे.

'दैनिक प्रवरा तीर' हे केवळ बातम्यांचे माध्यम नसून, ते संगमनेर आणि परिसरातील समाजाचा आरसा बनले आहे. याचे श्रेय जाते धिरजच्या सामाजिक जाणिवेला आणि मनमिळाऊ स्वभावाला. त्याने केवळ जाहिरातदारांना ग्राहक म्हणून न पाहता, त्यांच्याशी मैत्रीचे आणि विश्वासाचे नाते जोडले. त्यामुळे, संगमनेर शहरात त्याचा मोठा मित्रपरिवार आहे, जो नेहमी त्याच्या पाठीशी उभा असतो.

या वृत्तपत्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची निष्पक्ष भूमिका. 'प्रवरा तीर'ने नेहमीच सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्य माणसांच्या समस्यांना वाचा फोडण्यापासून ते शहरातील राजकीय घडामोडींवर स्पष्ट भाष्य करण्यापर्यंत, त्यांनी कधीही कुणाची भीड ठेवली नाही. याचा परिणाम म्हणून, सर्वसामान्यांपासून ते प्रतिष्ठित व्यक्तींपर्यंत, सर्वांनाच हे वृत्तपत्र आपलेसे वाटते.

'दैनिक प्रवरा तीर'ने वाचकांच्या मनात स्थान मिळवण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यातील 'संगमनेरी ठोका' हे सदर. हे सदर केवळ बातम्या देत नाही, तर ते समाजातील चुकीच्या गोष्टींवर परखडपणे भाष्य करते. हा स्पष्टवक्तेपणा आणि पत्रकारितेतील बाणेदारपणा वाचकांना इतका भावला की, अनेकजण 'प्रवरा तीर'च्या प्रतीक्षेत असतात. यामुळेच, हे वृत्तपत्र अल्पावधीत लोकप्रिय झाले.

धिरजचे वडील, शिवपालसिंह ठाकूर, यांनी आयुष्यभर पत्रकारितेचा स्वाभिमान कधीही सोडला नाही. कुणाचे भाट बनून काम केले नाही. हीच शिकवण धिरजने आत्मसात केली आहे. आजच्या युगात, जिथे अनेकदा पत्रकारितेच्या मूल्यांवर तडजोड केली जाते, तिथे धिरजने आपल्या वडिलांचा बाणा जपला आहे. 'दैनिक प्रवरातीर'च्या यशस्वी वाटचालीमागे हेच नैतिक मूल्य आणि कठोर परिश्रम आहेत. धिरजचे वडील त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून नेहमी मार्गदर्शन करत असतात, ज्यामुळे धिरजचा आत्मविश्वास द्विगुणित होतो.

पत्रकारितेसोबतच, सामाजिक कार्याची जोड देण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे 'दैनिक प्रवरातीर' हे वृत्तपत्र केवळ एक व्यवसाय न राहता, एक सामाजिक चळवळ बनले आहे. धिरजच्या नेतृत्वाखाली, हे दैनिक भविष्यातही संगमनेरच्या समाजाचा आवाज बनून राहील, असा विश्वास त्यांच्या वाचकवर्गाला आहे. एका सामान्य कुटुंबातून येऊन, कष्टाच्या बळावर आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली, धिरजने मिळवलेले हे यश खरोखरच कौतुकास्पद आहे.

प्रवरातीरच्या माध्यमातून समाजाचा आवाज बनून काम करताना धिरज आपली सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदारी ओळखून आहे. कमी वयातच जबाबदारी पार पाडताना आपल्या दोन बहिणींच्या विवाह देखील त्याने मोठ्या धुमधडाक्यात लावून दिला. तसेच आईच्या आजारपणाला देखील तो तोंड देत आहे. अशा स्थितीत त्याने जसा शहरात मित्रपरिवार गोळा केला तसाच प्रभागांमध्ये देखील त्याचा जनसंपर्क दांडगा आहे. सामाजिक जाणीव प्रगल्भ असल्याने अनेकांचा आवाज म्हणून तो सातत्याने प्रभागातील नागरिकांच्या मदतीला धावताना दिसतो. पत्रकारितेसोबतच, सामाजिक कार्याची जोड लाभलेल्या धिरजच्या या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा! त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्याला निरोगी आणि समृद्ध आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा!!!


*📃🖋️सीए कैलासभाऊ सोमाणी.*

बेलापूरः श्रीक्षेत्र बेलापूर नगरीमध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्री महाराज यांचा ७५०वा जन्मोत्सव सोहळा उद्या शुक्रवार(दि.१५)रोजी संपन्न होणार आहे.                                   यानिमित्त ज्ञानेश्वर महाराजांची भव्य शोभायात्रा  तसेच भव्य दीपोत्सव कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी मिरवणूक मार्गावर  महिला भगिनींनी  सडा रांगोळी काढणे व प्रत्येकी पाच पणत्या  तेल आणि वातीसह  दिपोत्सवासाठी आणाव्यात .शोभायाञा मिरवणुकीमध्ये कलश घेऊन सहभागी व्हावे सोबत थोडासा प्रसाद आणावा असे आवाहन करण्यात आले आहे.                               या भव्य कार्यक्रमाचे   महिला भगिनींनी व ग्रामस्थांनी उपस्थित राहुन या सुवर्ण क्षणाचे साक्षिदार व्हावे.शुक्रवारी १५आॕगष्ट रोजी  सायंकाळी ४ ते ६ वा. या वेळेत श्री केशव गोविंद मंदिर येथुन संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक व ६.३० वाजता भव्य दीपोत्सव होईल.तरी भाविकांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समस्त वारकरी संप्रदाय व ग्रामस्थांनी  केले आहे.

बेलापूरःबेलापूर बुll ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर  रविवार(दि.१७)रोजी स.९ वा. रयत शिक्षण संस्था,सातारा येथील ख्यातनाम कलाशिक्षक  राजेन्द्र घोडके यांचे मार्गदर्शनाखाली पहिले ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'शाडु मातीच्या गणपती मुर्ती बनविण्याची कार्यशाळा'आयोजित करण्यात आली आहे.                                        शाडु मातीच्या गणपती मुर्ती पर्यारणपुरक मानल्या जातात.याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती होणेच्या हेतूने सदरच्या कार्यशाळेचे आयोजन रविवार १७ आॕगष्ट रोजी सकाळी ९ वा. श्री.संत सावता महाराज मंदिर(अरुणकुमार वैद्य पथ)येथे आयोजित करण्यात आले आहे.                                                           या शिबिरात फक्त बेलापूर-ऐनतपूर येथील विद्यार्थी सहभागी होवू शकतील.प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या १००विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळेल.शाडू माती  आयोजक देतील तर पाण्यासाठी आवश्यक भांडे विद्यार्थ्याने सोबत आणावे. नाव नोंदणीसाठी ग्रामपंचायत बेलापूर कार्यालयात  सचिन साळुंके(९६५७७११००१),प्रमोद जनरल स्टोअर्सचे हेमंत मुथा(८३०८४८०९,व सुदर्शन सुपर शाॕपीचे सुधीर करवा (९०११७९४४९८)यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन ग्रामपंचायत बेलापूर बुll व सत्यमेव ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे.

बेलापूरःराज्याचे जलसंपदा मंञी तथा जिल्ह्याचे पालकमंञी  नाम.राधाकृष्ण विखे पा.च्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या बेलापूर बुll ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली 'प्रारंभ कचरा संकलन प्रकल्पा'च्या सहकार्याने  गावातील ओल्या व सुक्या कच-याचे स्वतंञपणे संकलन करण्याच्या कामास सुरुवात केली आहे.नजिकच्या काळात कच-यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असल्याची माहिती सरपंच मिनाताई साळवी व उपसरपंच चंद्रकांत नवले यांनी दिली.                                                 बेलापूर ग्रामपंचायतीने कच-याचे वर्गिकरण करुन संकलन करण्याचा उपक्रम श्री.शरद नवले व श्री.अभिषेक खंडागळे यांचे संकल्पनेतून हाती घेण्याचे जाहिर केले होते.याबाबत स्वच्छता कर्माचा-यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले.तसेच ओला व सुका कचरा स्वतंञपणे जमा करावा याबाबत ग्रामस्थांनाही आवाहन करण्यात आले होते.प्रारंभ प्रकल्पाचे शशिकांत दुशिंग व अनिता पाचपिंड या घरोघरी जाऊन कचरा संकलना बाबत नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांना बेलापूर ग्रामपंचायत यांच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी सहकार्य करीत आहेत.                ग्रामपंचायतीच्या आवाहनास ग्रामस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.ग्रामस्थ ओला कचरा(फळे.भाजीपालाभाज्यांच्या,साली व देठे,पालापाचोळा,खरकटे,खराब अन्न इत्यादी )तर सुका कचरा(प्लॕस्टिक बाॕटल्स,खाद्यपदार्थ पाकिटे,कागद व पुठ्ठे,प्लास्टिक वस्तु,कापडाच्या चिंध्या,औषधांची पाकीटे,प्लास्टिकचे अवशेष इत्यादी)स्वतंञपणे संकलित करुन कचरागाडीतील ओल्या व सुक्या कच-यासाठीच्या स्वतंञ कप्यांत टाकून गोळा करण्यात येत आहे.                                         नजिकच्या काळात हा कचरा नाम.राधाकृष्ण विखे पा.यांनी मोफत उपलब्ध करुन दिलेल्या जमिनीवर डंम्पिंग यार्ड करुन तेथे टाकण्यात येणार आहे.तसेच या डम्पिंग यार्डवर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारुन सेंद्रिय खतनिर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सौ.साळवी व उपसरपंच श्री.नवले यांनी  दिली.

बेलापूर: श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या बेलापूर पोलीस दूरक्षेत्रात कर्तव्यास असलेले पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांनी पोलीस सेवेत १५ वर्षांचा टप्पा पार केला, त्यानिमित्त बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला.


पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांनी पोलीस सेवेत अकरा वर्षे मुंबईमध्ये सेवा केली. या कार्यकाळात त्यांनी अनेक गुन्ह्यांचा पर्दाफास केरुन गुन्हेगारांना जेरबंद केले. त्यानंतर त्यांची बदली श्रीरामपूर येथे झाली, येथेही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. वरिष्ठांच्या हस्ते अनेकदा त्यांचा सन्मान झाला आहे. श्री.बडे यांना उत्तर महाराष्ट्रातील "बेस्ट कॉप ऑफ द मंथ" अर्थात 'महिन्यातील सर्वोत्तम पोलीस अधिकारी' हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या या खडतर आणि यशस्वी सेवेबद्दल बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.


या प्रसंगी कॉन्स्टेबल बडे यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सत्कार स्वीकारताना, बडे यांनी आपल्या पूर्वीच्या नियुक्तीच्या ठिकाणांचे अनेक धाडसी आणि प्रेरणादायी अनुभव सांगितले. त्यांच्या या अनुभवांबद्दल उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.


या छोट्याशा सत्कार सोहळ्याला पत्रकार देवदास देसाई, सुहास शेलार, दिलीप दायमा, पोलीस कॉन्स्टेबल भारत तमनर, सामाजिक  कार्यकर्ते दादासाहेब कुताळ, तिळवण तेली महासंघाचे एकनाथ उर्फ लहानुभाऊ नागले यांसह मान्यवर उपस्थित होते.

बेलापूरः(प्रतिनिधी )- जलसंपदा तथा पालकमंञी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली बेलापूर बु ग्रामपंचायतीने  सातत्याने विविध उपक्रम राबविले असुन या उपक्रमामुळे गावातील विकासाला चालना मिळाली असल्याचे प्रतिपादन मा. जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी केले.                                बेलापूर बुll ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या महिला मेळाव्यास संबोधित करताना नवले बोलत होते.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.मिनाताई साळवी या होत्या.तर मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून बाजार समितीचे मा. उपसभापती अभिषेक खंडागळे,उपसरपंच चंद्रकांत नवले,ग्रामपंचायत सदस्य मुश्ताक शेख,तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,उज्वला कुताळ,सुशिलाबाई पवार,रंजना बोरुडे,प्रतिभा नवले, मानवी खंडागळे,पंचायत समितीच्या प्रकल्प अधिकारी  शोभा शिंदे,बँक आॕफ महाराष्ट्र चे शाखा व्यवस्थापक राजेश परदेशी, डॉ. अश्विनी लिपटे, शशिकांत दुशिंग आदि उपस्थित होते.                         आपल्या भाषणात नवले पुढे म्हणाले की गावात महिलांची संख्या पन्नास टक्के असुन या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी नाम.राधाकृष्ण विखे पा, माजी खा.डाॕ.सुजय विखे पा.,जि.परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.शालिनीताई विखे पा.यांचे सहकार्याने व मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले  आहेत. गावकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता आल्यापासून गावात विविध विकास कामे वेगाने होत असून बेलापूर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच स्वाती अमोलिक,मिनाताई  साळवी,माजी उपसरपंच तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,सदस्य उज्वला कुताळ,सुशिलाबाई पवार,शिलाताई पोळ,छायाताई निंबाळकर आदिंचा यात  मोठा सहभाग आहे.गावकरी मंडळाने  समाजांतील सर्व घटकांना समान न्याय देण्याचे धोरण अवलंबिले असुन लवकरच १००० घरकुलांचे बांधकाम सुरू होणार आहे.महिलांकरीता शासनाच्या अनेक  योजनां असुन योजनांची माहिती न झाल्यामुळे अनेक महिला लाभापासून वंचित राहतात.महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर कुटुंबाचेही आरोग्य चांगले राहू शकते.त्यामुळे महीलांनी आरोग्याबाबात सजग व्हावे यासाठी आरोग्य प्रबोधन व तपासणी स्वच्छता महिलांना मिळणारे लाभ गावाच्या विकासात महीलांचे योगदान या सर्व बाबींची माहिती व्हावी या हेतुने मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे नवले यांनी सांगीतले .                                          प्रास्तविक भाषणात बाजार समितीचे माजी उपसभापती म्हणाले की,आजवर बेलापूर ग्रामपंचातीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी नामदार.राधाकृष्ण विखे पा.यांचे  भक्कम सहाय्य व पाठबळ मिळाले आहे.नाम.विखे यांच्या सहकार्याने १२६ कोटीची पाणी पुरवठा योजना तसेच या योजनेच्या साठवण तलावासाठी आठ एकर जमिन ग्रामपंचायतीला मोफत मिळाली.या योजनेचे काम प्रगतीपथावर असून येत्या सहा महिन्यात योजना पूर्ण होणार असुन तिनं म्हशीने पुरेल इतका पाणीसाठा त त्यात असणार आहे.गावातील गरजूंसाठी तब्बल ११०० घरकुले मंजूर झाली आहेत.  या घरकुलासह,सेंद्रिय खत प्रकल्प,क्रिडा संकुल तसेच सर्वधर्मियांच्या स्मशानभुमिसाठी ३४ एकर जागा नाम.विखे पा. यांच्या प्रयत्नातून मिळाली आहे.ग्रामपंचायतीने भुयारी गटारीचे काम मोठ्या प्रमाणावर केले आहे.तसेच ओला व सुका कचरा स्वतंञपणे संकलित करण्याचे कामही सुरु केले आहे.भविष्यात कच-यावर प्रक्रिया करुन खतप्रकल्प उभारणी केली जाणार आहे.सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे कामही प्रगतीपथावर आहे.पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनसाठी रस्ते खोदाई झाल्याने रस्त्यांची कामे करता आली नाहीत.माञ पावसाळ्यानंतर लगेचच रस्त्यांची कामे केली जातील. त्यासाठी निधी उपलब्धतेसाठी नाम.विखे पा.यांचे माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. लवकरच पाणीपुरवठा योजना कामाचा पाहणी दौरा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती खंडागळे यांनी दिली.                                                यावेळी सरपंच मिनाताई साळवी यांनी उपस्थितांचे स्वागत करुन मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला तर सौ.आशाताई गायकवाड ,ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प.समितीच्या प्रकल्प आधिकारी शोभा शिंदे यांनी बचतगटा संदर्भातील योजना,त्या माध्यमातून करता येणारे व्यवसाय याची माहिती दिली. महाराष्ट्र बँकेचे बेलापूर शाखेचे व्यवस्थापक  राजेश परदेशी यांनी महिलांसाठी बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देवून त्याबाबात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रारंभ प्रकल्पचे शशिकांत दुशिंग यांनी घनकचरा व ओलाकचरा संकलन व प्रक्रियाबाबत सविस्तर माहिती दिली.प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या आरोग्य अधिकारी डाॕ.अश्विनी लिप्टे यांनी महिलांच्या आरोग्याबाबत प्रबोधन केले.पञकार देविदास देसाई यांनी अंधश्रध्देबाबत प्रबोधन केले.मेळाव्याचे दरम्यान महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.अध्यक्षीय सूचना सौ. मनिषा दळे यांनी मांडली त्यास सौ. संध्या तेलोरे यांनी अनुमोदन दिले.कार्यक्रमाचे सूञसंचलन सौ.योगिताताई अमोलिक यांनी केले तर सौ. वैशालीताई शेळके यांनी आभार मानले.मेळाव्यास उपसरपंच चंद्रकांत नवले सदस्य मुस्ताक शेख तबसूम बागवान प्रियंका खुरे उज्वला कुताळ जया भराटे आशा गायकवाड ज्योती जगताप मंगल जावरे सरिता मोकाशी वैशाली शेळके मनीषा दळे संगीता देसाई प्रतिभा देसाई संगीता शिंदे तेलोरे नीलिमा कुमावत सुजाता गुंजाळ वैशाली शिरसाठ सुवर्णा खंडागळे आदिसह मोठ्या संख्येने परिसरातील बचत गटाच्या महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

श्रीरामपूरःपुणतांबा येथील रहिवासी असलेले धीरज व सूरज संपतराव बोर्डे या बंधुची अनुक्रमे  जलसंपदा व नगरपालिका विभागात अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.                                                     महाराष्ट्र शासनाच्या 'जलसंपदा विभाग' तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत  धीरज बोर्डे याची सहाय्यक अभियंता (ज्यु. इंजिनियर ) पदी निवड झाली आहे . तर सूरज बोर्डे यांची सन २००० मध्ये नगरपालिका विभागात लेखाधिकारी म्हणून निवड झाली असून ते बुलढाणा नगरपालिकेत रुजू झाले आहेत. धीरज व सूरज हे दोघे अशोक सहकारी कारखान्याचे माजी कर्मचारी संपतराव बोर्डे यांचे चिरंजीव आहेत.विशेष म्हणजे सुरज व धीरज हे जुळेबंधू असून दोघांचीही शासकीय अधिकारी म्हणून निवड होणे  दुर्मिळ ठरते.धीरज व सुरज बोर्डे यांच्या या नियुक्तीबद्दल भास्कर खंडागळे ,नानासाहेब जोंधळे,अॕड.एन.जी.खंडागळे ,बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी लाखो वारकरी दिंडीद्वारे पंढरपूरला पायी चालत जातात. पालखीच्या मुक्कामी वारकऱ्यांना सुविधा नसल्याने उघड्यावर शौचाला जावे लागत होते. ज्यामुळे अस्वच्छता व्हायची. यावर उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सेवा सहयोग संस्थेने पुढाकार घेत निर्मल वारीला सुरवात केली. महाराष्ट्राची सांस्कृतीक परंपरा असलेली ही वारी सुखरूप पार पडावी, पर्यावरणाचे रक्षण व्हावे आणि ज्या गावातून वारी जाते तिथे अनारोग्य होऊ नये. यासाठी २०१५ पासून निर्मल वारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेकडो वर्षे हिंदुत्वाची अनेक स्थित्यंतरे पाहत वारकरी पंढरीची वारी नित्यनेमाने करतो आहे. आधुनिक काळात आता वारी खऱ्या अर्थाने भौतिकदृष्ट्या निर्मल झाली आहे..!


विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीसोबत राज्य शासनाने २६५ फिरते शौचालय उपलब्ध करून दिले आहेत. त्याच्या व्यवस्थापनाचे, स्वच्छतेचे, वापराचे नियोजन, तसेच वारकऱ्यांच्या प्रबोधनाचे नियोजन सेवा सहयोग आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक गेली १० वर्षे अव्याहतपणे करत आहे. वारीचा प्रवास स्वच्छ व निर्मल करण्यासाठी स्वयंसेवकांनी पुढे येत हा उपक्रम सुरू केला. ज्याला आता राज्य शासनाची आणि समाजातील विविध संस्थांची मोठी साथ मिळत आहे. दरवर्षी वारी अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी होत चालली आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पसरणारे अनारोग्य जवळपास नष्टच झाले आहे.” मागील १० वर्षात वारीमध्ये उघड्यावर शौचाला जाण्याचे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत घटल्याचे जाधव यांनी सांगितले. नियमित वारी करणारे वारकरी शौचालयाचा वापर करत असून, दींडी चालक आणि स्थानिक नागरिकांकडूनही शौचालयाचा आग्रह होत आहे. ज्याला वारकऱ्यांचाही सकात्मक प्रतिसाद लाभत असून विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी पालखी सोहळ्यामध्ये आदित्य एंटरप्राइजेस या कंपनीकडून तसेच या कंपनीचे संचालक विक्रम मोरे यांच्या माध्यमातून शौचालयाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले यामुळे या पालखी सोहळ्यामध्ये कुठल्याही वारकऱ्याला गैरसोईचा सामना करावा लागला नाही..!

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget