Articles by "latestnews"

श्रीरामपूर (गौरव डेंगळे):सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, शारदानगर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले. सर्वधर्म प्रेम,सहिष्णुता आणि शांततेचा संदेश देणाऱ्या या दिंडीने परिसर भक्तीरसात न्हाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.


"देव एकच आहे,त्याची नावे अनेक असू शकतात,पण मानवतेचा हात हाच श्रेष्ठ धर्म आहे,"असा संदेश या दिंडीच्या माध्यमातून देण्यात आला. शाळेच्या बालगोपालांनी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सजून टाळ,मृदंग, पखवाजाच्या गजरात विठ्ठलनामाचा जयघोष करत परिसर पंढरपूरमय केला.

या वेळी शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे,उपप्राचार्या शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका सौ. प्रज्ञा पहाडे,शिक्षिका पल्लवी ससाणे, नैथलीन फर्नांडिस,तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदाय,संत परंपरा व विठ्ठलभक्ती याविषयी माहिती दिली.


शाळेच्या लहानग्या विद्यार्थ्यांनी "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदा हरि विठ्ठल", "माऊली माऊली" अशा भक्तीगीतांच्या जयघोषात परिसरात भव्य दिंडी काढली.विद्यार्थ्यांच्या निरागस चेहऱ्यावर झळकणारा भक्तीभाव,टाळ-मृदंगाच्या गजरात त्यांनी सादर केलेला उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात आनंद आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले.

दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेची ओळख, सामाजिक ऐक्य, प्रेम, सहिष्णुता आणि एकोप्याचा संदेश देण्यात आला.

बेलापूरःदर वर्षी प्रमाणे ह. भ. प. सोपान महाराज हिरवे यांच्या मार्गदर्शना खाली तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या नियोजनातून गावकरी मंडळ व समस्त ग्रामस्थ बेलापूर बु -ऐनतपूर यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त येथील विठ्ठल मंदिरात शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक नितीन देशमुख व सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश जाधव यांचे हस्ते महाआरती संपन्न झाली.                                         आरतीनंतर उपस्थितांना प्रसाद म्हणून खिचडी व राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले.                                     प्रारंभी दीपक क्षञिय यांनी प्रवचन केले.तर ह.भ.प.बबन महाराज अनाप,ह.भ.प. अशोक महाराज शिरसाठ, विलासनाना मेहेञे, किरण महाराज गागरे यांनी भजन गायन केले.हरिहर काळे गुरु व बापू गुरु देवकर यांनी पौरोहित्य केले. कार्यक्रम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकमान्य प्रतिष्ठान व महिला मंच,हरिहर शेजआरती  मंडळ, सत्यमेव जयते ग्रुप, साई क्लासेस यांचे सहकार्य लाभले.

यावेळी ह.भ.प सोपान महाराज हिरवे, बबन महाराज अनाप, अशोक महाराज शिरसाठ,किरण महाराज गागरे, विलास नाना मेहत्रे,सहायक पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, बेलापूर पोलीस औट पोस्ट चे संपत बडे, नंदकिशोर लोखंडे,आदिनाथ आंधळे,

बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे,सरपंच मीना साळवी, उपसरपंच चंद्रकांत नवले,जालिंदर कुऱ्हे,रणजित श्रीगोड,भाऊसाहेब कुताळ,भास्कर खंडागळे,कनजीशेठ टाक, सुधाकर तात्या खंडागळे,दिलीप काळे,पुरुषोत्तम भराटे,देविदास देसाई, विष्णुपंत डावरे, दिलीप दायमा,दिपकसा क्षत्रिय,सुहास शेलार,रमेश दायमा, सुभाष सोमाणी, सुरेश बाबुराव कुऱ्हे,महेशजी जेठवा,गोविंद श्रीगोड,डॉ. सुधीर काळे, लक्ष्मणराव मुंडलिक, बाबासाहेब काळे,सोमनाथ लगे, सोमनाथ साळुंके,राधेश्याम अंबिलवादे, दिलीप अमोलिक,साहेबराव मोकाशी,दयानंद शेंडगे सर,डॉ. रवींद्र गंगवाल,भरत सोमाणी, रावसाहेब कुऱ्हे, अशोक दुधाळ, रमेश काळे, बबन मेहत्रे, प्रभाकर ताके,राहुल लखोटीया,प्रशांत मुंडलिक, हेमंत मुंडलिक,सुभाष बोरा, बबलू बनभेरू, देविदास घाणे, जनार्दन ओहोळ, सतीश काळे, संजय भोंडगे,दिपक काळे,अरुण कुलकर्णी, अरुण काळे,ओमप्रकाश व्यास, लक्ष्मण राशिनकर, गणपत साळुंके,प्रभात कुऱ्हे,बाबुराव पवार, अँड. अरविंद साळवी, सचिन अमोलिक, प्रसाद कुलकर्णी,संजय खंडागळे, किरण बैरागी,विठ्ठल शिंदे, अनिल कुऱ्हे, राजेश सूर्यवंशी,भगीरथ मुंडलिक,, किरण खराडे,उपेंद्र कुलकर्णी, सागर ढवळे, मुकुंद चिंतामणी, प्रमोद पोपळघट, ऋतुराज वाघ, करण गोसावी, नितीन शर्मा,श्रीहरी बारहाते,तुकाराम जाधव,चंद्रकांत ताथेड,नंदकिशोर दायमा,मधुकरअनाप, विजय कोठारी,राहुल माळी, मधुकर ठोंबरे, नाना चिंतामणी, पोपट पवार, विनायक जगताप,जितेंद्र वर्मा, विजय दरक,विशाल आंबेकर,महेश कुऱ्हे, गोपी दाणी, सचिन देवरे, गणेश कोळपकर, मच्छिंद्र नागले शरद पुजारी,यश पवार, केशव शिंदे, मयुर मोरे, राज गुडे, संतोष ताथेड, प्रशांत दायमा, विकी पगारे, मारुती गायकवाड, महंत काळे, दादासाहेब कुताळ,सचिन मेहेत्रे, सोमनाथ शिरसाठ, राजेंद्र काळे,शाम मेहेत्रे, सचिन गोरख वाबळे,संजय जगताप, सूरज भुसा,हरीष बडाख,बाळासाहेब जाधव,सुजित सहानी, नारायण मुंडलिक, किशोर खरोटे,अर्जुन कुऱ्हे, राहुल माळवदे, अक्षय पवार, योगेश नागले, सचिन राकेचा आदी उपस्थित होते.

बेलापूरःबेलापूर-ऐनतपूर गावाची लोकसंख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे.भविष्यात वाढत्या नागरीकरणामुळे कच-याच्या विल्हेवाटीची समस्याही वाढणार आहे.यादृष्टिने उपाययोजना म्हणून ओल्या व सुक्या कच-याचे स्वतंञ संकलन करुन भविष्यात त्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.                                       यासंदर्भात बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे ,सरपंच मीना साळवी,उपसरपंच चंद्रकांत नवले, ग्रामपंचायत आधिकारी निलेश लहारे,कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे शशिकांत दुशिंग,प्रेरणा ठाणगे,अनिता पाचपिंड,अॕड.अविनाश साळवी आरोग्य विभागाचे दत्ताञय वक्ते,अविनाश शेलार यांची संयुक्त बैठक झाली.                           सदर बैठकीत वाढत्ती लोकसंख्या व नागरीकरण गृहित धरुन मागील काळात कचरा व्यवस्थापनाबाबत काहिच उपाययोजना करण्यात आली नाही.त्यामुळे दुर्गंधी तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.याचा सारासार विचार करुन राज्याचे जलसंपदामंञी तथा जिल्ह्याचे पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांनी ग्रामपंचायतीस शेतीमंडळाची जी जमीन दिली आहे तिथे  कचरा डंपींग यार्ड केले जाणार आहे.                                                        गावातील ओला व सुका कचरा स्वतंञपणे सकलित करुन गौळा करण्याचे नियोजन केले जाणार आहे.यासाठी नागरिकांनी ओला व सुका कचरा, पिशव्या ,पाण्याच्या बाटल्या,कॕरीबॕग्ज,भाजीपाला आवशेष स्वतंञपणे जमा करुन ठेवावेत. ओल्या कचऱ्या मध्ये प्लास्टिक मिसळले गेल्यास कचऱ्याचे विघटन होत नाही व दुर्गंधी वाढून आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.त्यामुळे नागरिकांनी याबाबत दक्षता घेवून सहकार्य करावे.ओला व सुका कचरा घंटा गाडीत स्वतंत्र पणे जमा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.हा जमा झालेला कचरा नियोजित डंपिंग यार्ड येथे टाकून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.यासाठी महिला बचत गट,अंगणवाडी कर्मचारी,आशा सेविका व ग्रामपंचायत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.यामुळे नजिकच्या काळात कचरा विल्हेवाटिची मोठी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.अशातहेने कचरा व्यवस्थापनावर बैठकीसत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बेलापूरःतालुक्यातील सर्वात मोठ्या बेलापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर जलसंपदा तथा पालकमंञी नामदार राधाकृष्ण विखे पा.यांचे नेतृत्वाखालील तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या मार्गदर्शना खालील गावकरी मंडळाचे चंद्रकांत नवले(आबा) यांची बिनविरोध निवड झाली. गावकरी मंडळाने सरपंच पद राखीव असल्याने समाजातील अन्य घटकांना प्रतिनिधित्व देण्याच्यादृष्टिने उपसरपंच पदावर सर्व समाज घटकांना संधी देण्याचे धोरण अवलंबविले.त्यानुसार श्री.चंद्रकांत नवले यांना उपसरपंच पदाची संधी देण्यात आली.सरपंच मिना साळवी यांचे अध्यक्षतेखाली व ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे यांचे उपस्थीतीत झालेल्या बैठकीस अभिषेक खंडागळे,स्वाती अमोलिक 

,मुश्ताक शेख,तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,उज्वला कुताळ,वैभव कु-हे,सुशिलाबाई पवार, रमेश अमोलिक,भरत साळुंके आदी सदस्य उपस्थित होते.उपसरपंच पदासाठी श्री. नवले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यावर सूचक म्हणून अभिषेक खंडागळे हे होते.त्यामुळे चंद्रकांत नवले यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सरपंच मीना साळवी यांच्या निवडी प्रमाणेच ही देखील निवड बिनविरोध झाल्याने शरद नवले,अभिषेक खंडागळे ,प्रफुल्ल डावरे प्रणित गावकरी मंडाळाने ग्रामपंचायतीत निर्विवाद राजकीय वर्चस्व सिध्द केल्याचे मानले जाते.                                                            निवडीनंतरच्या आभार सभेत  जि.परिषद सदस्य शरद नवले,बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, प्रफुल्ल डावरे, स्वाती अमोलिक,शांतीलाल हिरण, मोहसीन सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले. शरद नवले म्हणाले की,पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.,सौ.शालिनीताई विखे पा,माजी खा.डाॕ.सुजय विखे यांचे नेतृत्वाखाली ग्रामपंचायत माध्यमातून  गावाच्या विकास करण्याचा प्रयत्न होत आहे.गावकरी मंडळाने सर्व समाज घटकांना संधि देण्याची शब्दपूर्ती केली आहे. याप्रसंगी कनजीशेठ टाक,जि.प.सदस्य शरद नवले,जालिंदर कुऱ्हे,राष्ट्रवादीचे प्रांत सरचिटणीस अरुण पा.नाईक ,रणजीत श्रीगोड,भाऊसाहेब कुताळ,हाजी ईस्माईल शेख,विष्णुपंत डावरे,पुरुषोत्तम भराटे,सुधाकर तात्या खंडागळे,शांतीलाल हिरण, प्रशांत लड्डा, सुभाष अमोलिक,अॕड.अरविंद साळवी,रावसाहेब अमोलिक,अन्वर सय्यद, शफिक बागवान,मोहसीन सय्यद,प्रभात कुऱ्हे,अभिषेक नवले,दिलीप दायमा,श्रीहरी बारहाते,दत्तात्रय नवले,सचिन अमोलिक,भैय्या शेख,बंटी शेलार,भाऊसाहेब तेलोरे,निसार बागवान,अशोक दुधाळ,शाहरुख शेख,व्दारकनाथ नवले,गोपी दाणी,राज गुडे,अजीज शेख,महेश कु-हे,रफीक शेख,सुभाष अमोलिक ,बाबुराव पवार,शहानवाज सय्यद,विशाल आंबेकर,जाकीर शेख,शरद अंबादास नवले,रफिक शेख,अशोक वहाडणे,दादासाहेब कुताळ,गणेश राशिनकर,विनायक जगताप,गोकुळ कुताळ,शाम गायकवाड,शशिकांत नवले,दिपक गायकवाड,संजय गंगातिरवे,निसार आतार,अनिल नवले,शफिक आतार,राजेंद्र नवले,भरत नवले, दिपक प्रधान,पंढरीनाथ गाढे, शुभम नवले अशोक दुधाळ, रमेश लगे, पप्पू मांजरे, बाळासाहेब शेलार, राहुल गायकवाड आदि प्रमुखांसह गावकरी मंडळाचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीरामपूरःगेल्या पंधरा दिवसांपासून बेलापूर येथून बेपत्ता झालेले आणि पोलिसांना शोधण्यात अपयश आलेले व्यापारी रामप्रसाद चांडक यांचा अखेरीस ठावठिकाणा लगला आहे.श्री.चांडक हे धार्मिक पर्यटन करुन नाशिक येथे त्यांचे साडू श्री.करवा यांचेकडे पोहचले आहेत. चांडक कुटुंबिय त्यांना आणणेसाठी नाशिकला रवाना झाले असून चांडक कुटुंबियांनी याबाबत  पोलिसांना अवगत केले आहे.                                        याबाबतची हकीकत अशी की,रामप्रसाद चांडक हे बेलापूरला त्यांचे मुलासोबत मोटार सायकलवर आले.बेलापूरला ते मुख्य झेंडा चौकात उतरले.त्यानंतर ते बेपत्ता झाले.दोन दिवस शोध घेतल्यावरही तपास न लागल्याने चांडक कुटुंबियांनी पोलिसांत मिसिंगची तक्रार दाखल केली.त्यानंतरही शोध न लागल्याने व्यापारी तसेच ग्रामस्थांनी पोलिसांनी तपासाला गती देवून चांडक यांचा शोध घ्यावा अशा आशयाचे निवेदन दिले.त्यानंतरही आठवडाभरात पोलिसांना शोध लावण्यात अपयश आले.                             अखेरीस काल शुक्रवारी मध्यराञी श्री.चांडक हे विविध धार्मिकस्थळांना भेटी देवून अखेरीस  नाशिकस्थित त्यांचे साडू सुनील करवा यांचेकडे पोहचले.ते पोहचल्याचे श्री.करवा यांनी किशोर चांडक यांना कळविले.सदरची माहिती मिळाल्यानंतर किशोर चांडक व त्यांचे औरंगाबाद येथील मेहुणे श्री.चांडक यांना आणण्यासाठी नाशिकला गेले.जाताना त्यांनी आम्ही नाशिकला जात असल्याबाबत पोलिसांना अवगत केले.

हरेगाव (गौरव डेंगळे): हरेगाव येथील संत तेरेसा गर्ल्स हायस्कूलमध्ये जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींमध्ये आरोग्य जागृती आणि योगाचे महत्व पटवून देण्यासाठी शाळेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती यांनी विद्यार्थिनींना योग दिनाचे महत्व पटवून देत म्हटले की, “योग ही आपल्या प्राचीन संस्कृतीची देण आहे. शारीरिक, मानसिक व बौद्धिक आरोग्यासाठी योग अत्यंत उपयुक्त आहे. विद्यार्थिनींनी दररोजच्या दिनचर्येत योगाचा अविभाज्य भाग करावा.”


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुहास ब्राह्मणे यांनी अतिशय नेटकेपणे आणि उत्साही पद्धतीने केले. विद्यार्थिनींनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.कार्यक्रमामध्ये क्रीडाशिक्षक नितीन बलराज यांनी योगासने,त्यांची शास्त्रीय माहिती आणि त्याचे शारीरिक-मानसिक फायदे याबद्दल विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर वरिष्ठ शिक्षिका विजया क्षीरसागर यांनी योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींना सकारात्मक विचारसरणी,मनःशांती आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचे महत्व समजावून सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनींचे मोलाचे योगदान लाभले. संपूर्ण शाळा प्रांगणात उत्साहाचे वातावरण होते.

बेलापूर, प्रतिनिधी – "श्रीरामपूर व बेलापूर परिसरात पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष आणि अकार्यक्षमतेमुळे गुन्हेगारांचा सुळसुळाट झाला आहे. पोलिसिंग हा प्रकार औषधालाही उरलेला नाही," असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते सुनील मुथा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.

श्रीरामपूर व बेलापूर परिसरात बाहेरगावचे गुन्हेगार खुलेआम अवैध धंदे चालवत असून, गुटखाबंदी असताना गुटख्याची सर्रास विक्री, अमली पदार्थांची निर्मिती, गोवंश कत्तली यावर पोलिसांचा कोणताही अंकुश राहिलेला नाही, असे मुथा म्हणाले.

"बिंगो" नावाने सुरू असलेला जुगार

जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिलेले असतानाही, कोपरगाव, शिर्डी, संगमनेर व सोनई परिसरातील गुन्हेगार श्रीरामपूरात "बिंगो" नावाने जुगाराचे अड्डे चालवत असल्याचे मुथा यांनी निदर्शनास आणले.

गुन्हेगारांचा मुक्तसंचार गावठी कट्यांचा वापर, अल्पवयीन मुलींचे दिवसाढवळ्या अपहरण, अल्प्राझोलमसारख्या अमली पदार्थांचे तेलंगणाशी असलेले संबंध, यामुळे श्रीरामपूर परिसर गुन्हेगारांचे आश्रयस्थान झाल्याची टीका त्यांनी केली.

बेलापूर पोलिसांची स्थिती आणखी बिकट

बेलापूर पोलिस औटपोस्टसमोर टोळीयुद्ध होणे, कोल्हार रोडवरील एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न, झेंडा चौकातील वाहतुकीचा बट्याबोळ, टायर दुकान व व्यापाऱ्याचे अपहरण या सर्व घटनांकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले.

गुटखा व गोवंश प्रकरणात पोलिसांची संशयास्पद भूमिका

गुटखा ट्रक प्रकरणात केवळ पंटरांना अटक होऊन प्रमुख आरोपी सुरक्षित राहणे, बेकरीत सापडलेले गोमांस व कोल्हार चौकाजवळ सुरू असलेली गोवंश कत्तल याकडे पोलिसांचे डोळेझाक असल्याचा आरोपही त्यांनी केला.

डीजे बंदीचा ठरावही धाब्यावर

ग्रामसभेने डीजे बंदीचा ठराव करून पोलिसांना लेखी कळवले असतानाही गावात खुलेआम डीजे वाजवले जातात. काही लोक माफक शुल्क घेऊन नवीन मिरवणुकांना परवानग्या मिळवत असून, या मिरवणुकांत तरुणांचा उन्माद दिसून येतो, असेही ते म्हणाले.

तक्रारी दडपल्या जातात

"गुन्ह्यांची नोंद न करता तक्रारदारांची बोळवण केली जाते, केवळ तक्रार अर्ज घेऊन प्रकरण झाकले जाते," अशी गंभीर टीकाही मुथा यांनी केली.

नवीन पोलिस अधीक्षकांकडून अपेक्षा

नवीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना जिल्ह्याचा अनुभव असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा बेजबाबदारपणा थांबवतील अशी अपेक्षा मुथा यांनी व्यक्त केली. "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" हे ब्रीदवाक्य कृतीत उतरावे, हीच अपेक्षा आहे, असेही त्यांनी नमूद केले.


बेलापूरःनागरिकांना शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी तातडीने मिळणे आवश्यक आहे.यादृष्टिने शासकीय योजनांचा लाभ निर्धारित वेळेत मिळावा तसेच नागरिक आणि प्रशासन यांच्यात समन्वय निर्माण व्हावा या हेतूने छञपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले.आशाप्रकारच्या शिबिरांचे प्रत्येक महसूल मंडलात आयोजन करण्यात येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डाॕ.पंकज आशिया यांनी केले.                                               महसूल व वन विभाग तसेच बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने बेलापूर येथे आयोजित छ.शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी उपस्थितांना संबोधताना जिल्हाधिकारी बोलत होते.याप्रसंगी  उपविभागीय महसूल अधिकारी किरण सावंत पाटील,तहसीलदार मिलिंदकुमार वाघ,नायब तहसीलदार बी.बी.गोसावी,श्री.शेकटकर, श्रीमती निर्मला नाईक,जि.परिषद सदस्य शरद नवले,बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे,सरपंच मिना साळवी,उपसरपंच प्रियंका कु-हे,रामराव शेटे,मंडलाधिकारी सर्वश्री विठ्ठल गवारी,सुशीम ओहोळ,तलाठी सर्वश्री राजेश घोरपडे,अक्षय जोशी,श्रीमती सुवर्णा शिंदे,शिल्पा राणे,वर्षा कातोरे, हिमालय डमाळे,अशोक थोरात,ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे कोतवाल सुनिल बारहाते नंदू बोंबले अरुण अमोलीक ज्ञानेश्वर भांड संतोष पारखे दिपक बेल्हेकर  उपस्थित होते.                                  सदर शिबिरादरम्यान जिल्हाधिकारी डाॕ.आशिया यांचे हस्ते नागरिकांना सेतू कार्यालयाकडील  जातीचे दाखले,संजय गांधी निराधार योजनेचे प्रमाणपञ,पुरवठा विभागाकडील आॕन लाईन पध्दतीचे रेशन कार्ड,ग्रामपंचायत वतीने मृत्यु दाखला, कृषी विभागाकडून खत गोणी,गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान मंजुरी पञ,ग्राममहसूल अधिकारी कार्यालयाकडील हयातीचा दाखाला आदिं प्रदान करण्यात आले.देविदास देसाई,विष्णुपंत डावरे यांनी सूञसंचलन केले.                                               दिवसभर चाललेल्या महाराजस्व शिबिरात उपस्थितांना विविध शासकीय योजनांचे दाखले, ऑनलाइन रेशन कार्ड,शासकिय प्रमाणपञे,ग्रामपंचायत दाखले अपघात विमा मंजुरी पत्र वितरीत करण्यात आले.शिबिरास बेलापूर महसूल मंडलातील नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.शिबिरस्थानी विविध महिला बचत गटांनी खाद्यपदार्थ,मसाले आदि उत्पादनांचे स्टाॕल लावले होते.शिबिरास भास्कर खंडागळे,  मुश्ताक शेख,चंद्रकांत नवले,हाजी इस्माईल शेख,मारुतराव राशिनकर, अॕड.अरविंद साळवी,भैय्या शेख,जाकीर शेख,बाबालाल पठाण,महेश कु-हे,प्रभात कु-हे,बाबुराव पवार,चंद्रकांत नाईक, मिलिंद दुधाळ,प्रकाश कु-हे,गणेश बंगाळ,रावसाहेब गाढे,विशाल आंबेकर ,भाऊसाहेब तेलोरे,इस्माइल आतार आदिंसह बचत गटाच्या महिला तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीरामपूर  : महाराष्ट्र शासन व प्रशासनाने 15 डिसेंबर 2022 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार  स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग  करणारे पहिले राज्य महाराष्ट्र. राज्यातील 13 जिल्ह्यातील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय मोठा गाजावाजा करून 1 मे 2025 रोजी सुरू करण्यात आले.परंतु कुठल्याही स्वरूपाचे अधिकार प्रायोगिक तत्वावर  सुरू करण्यात आलेल्या 13 जिल्ह्यातील जिल्हा दिव्यांग सक्षमिकरण अधिकाऱ्यांना प्राप्त झाले नव्हते.त्यामुळे तातडीने मंत्रालय व आयुक्त कार्यालाकडे पाठपुरावा करून डी.डि.ओ कोड प्राप्त करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अशी माहिती संजय साळवे अध्यक्ष जिल्हा दिव्यांग शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांनी दिली.

          दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन, जीपीएफ,मेडिकल बीले,सेवानिवृत्त कर्मचारी व त्या अनुषंगाने सर्व कामे प्रलंबित होते  ती सर्व मार्गी लागेल.त्याचबरोबर दिव्यांग बांधवांच्या योजना देखील कार्यान्वित होतील.  

         संघटनेने व नासिक पदवीधर मतदार संघाचे आ. सत्यजित तांबे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री मा.अतुल सावे यांनी तातडीने दखल घेतली. त्यानुसार 4 जून 2025 रोजी दिव्यांग कल्याण विभागाचे अवर सचिव भा.रा.गायकवाड यांनी तातडीने आदेश निर्गमित केले. दिव्यांग कल्याण विभागाचे अवर सचिव मा.भा. रा.गायकवाड यांनी 4 जून 2025 रोजी आदेश निर्गमित करण्यात आले आहे.दि. 6 जून 2025 रोजी दिव्यांग  कल्याण विभागाचे आयुक्त यांनी 13 जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्वरित अहवाल  पाठविण्याचे आदेश दिले आहे.

         सदर आदेशामुळे 13 जिल्ह्यातील कर्मचारी व दिव्यांग बांधवामध्ये आनंदाचे वातावरण पसरलेआहे.दिव्यांग शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना अहिल्यानगर यांचे सर्वांनी विशेष आभार मानले. आहे.याकरिता संघटनेचे अध्यक्ष संजय साळवे,उपाध्यक्ष चांगदेव खेमनर,खजिनदार प्रदीप भोसले,श्रीरामपूर मूकबधिर  विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष जोशी,नागनाथ शेटकर,रमेश टिक्कल,ज्ञानदेव जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले.

अहिल्यानगर,(४ जून/गौरव डेंगळे):

अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने ४० वर्षांवरील वयोगटासाठी भव्य जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या स्पर्धा दिनांक ६ व ७ जून २०२५ रोजी दोन प्रमुख ठिकाणी पार पडणार आहेत — कराळे हेल्थ क्लब, सावेडी आणि वाडिया पार्क क्रीडा संकुल, अहिल्यानगर.


स्पर्धेतील खेळ प्रकार:


या उत्सवामध्ये व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन आणि पोहणे (स्विमिंग) या प्रमुख खेळांचा समावेश असून, खेळाडूंमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे.


स्पर्धेतील सहभागी संघ:


ही स्पर्धा चार संघांमध्ये खेळवली जाणार आहे. त्या संघांची नावे आणि प्रमुख खेळाडू पुढीलप्रमाणे:



🟢 रायगड किंग्स


प्रमुख खेळाडू:

सतीश गायकवाड, घनश्याम सानप, प्रमोद आठवाल, शैलेश गवळी, कृष्णा लांडे, प्रशांत गंधे, बंटी गुंजाळ, सतीश झेंडे, विजुभाऊ मिस्कीन, पुरोहित सर, अजय पवार, संतोष घोरपडे, सचिन तिवारी, वैभव पवार



🔵 राजगड कॅपिटल


प्रमुख खेळाडू:

संदेश भागवत, संतोष ठाणगे, विल्सन फिलिप्स, अनिल भापकर, सचिन पठारे, डेविड माकासरे, किशोर गांधी, गणेश तलवारे, सोमानी सर, संतोष वाबळे, शब्बीर सर, प्रशांत कोळपकर, जयंत जाधव, संतोष गाडे



🔴 प्रतापगड वॉरियर्स


प्रमुख खेळाडू:

डॉ. विजय म्हस्के, विशाल गर्जे, मोहित भगत, रामेश्वर सर, रोनक फर्नांडिस, दिनेश भालेराव, निलेश मदने, संजय साठे, विजय पवार, कुलकर्णी सर, शंतनू पांडव, महेश पटेकर, सचिन जावळे, प्रशांत निमसे, विनायक भूतकर



🟡 सिंहगड लायन्स


प्रमुख खेळाडू:

सुनील गोडळकर, विकास परदेशी, संजय पाटील, मुकुंद काशीद, योगेश चव्हाण, ज्ञानेश्वर खुरांगे, अविनाश काळे, प्रदीप पाटोळे, कल्पेश भागवत, अजय बारगळ, सचिन सप्रे, प्रवीण कोंडावळे, दिनेश मोरे, हेमंत कुलकर्णी, सचिन गायकवाड



पंचमंडळी (रेफरीज):


या स्पर्धेसाठी पंच म्हणून मनीष राठोड, अमित चव्हाण, शदाब मोमीन आणि हर्षल काशीद हे जबाबदारी पार पाडणार आहेत.



ही स्पर्धा का खास?


४० वर्षांवरील वयोगटातील खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानी स्पर्धेचा अनुभव मिळणार आहे.


फिटनेस, खेळातील शिस्त, सामाजिक स्नेह यांचा संगम असलेली ही स्पर्धा आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे.


निवृत्तीनंतरही सक्रिय राहण्यासाठी प्रेरणा देणारा एक प्रेरणादायी उपक्रम!


उद्घाटन व समारोप:


या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन व समारोप सोहळे प्रमुख क्रीडा अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहेत. सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्रे, स्मृतीचिन्हे व संघांना सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत.

ही स्पर्धा एक प्रेरणादायी आणि उत्साही वातावरण निर्माण करणार असून, वयोमानानुसारही 'खेळ भावना' अमर आहे हे दाखवून देणारी ठरेल.

श्रीरामपूर: तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे लवकरच ‘गोल्डन पाम’ या भव्य वॉटर पार्कचा शुभारंभ होणार आहे. या वॉटर पार्कचे उद्घाटन गुरुवार, १५ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महंत उद्धवजी महाराज मंडलिक (नेवासेकर) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच, आमदार हेमंतजी ओगले, चेअरमन अशोक सहकारी साखर कारखाना भानुदाची मुरकुटे, माजी उपनगराध्यक्ष करण दादा ससाणे, सत्यशील दादा शेरकर, सचिन दादा गुजर मा. विश्वस्त साईबाबा संस्थान शिर्डी, बाबासाहेब दिघे, ह भ प डॉक्टर सुभाष महाराज कांडेकर, सौ वंदनाताई मुरकुटे, सुधीर पा. नवले, अनिल पा. नवले सुभाष पाटील नवले महेश पाटील नवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गोल्डन पाम’ वॉटर पार्क आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असून, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजनाची पर्वणी असणार आहे. विविध वॉटर राईड्स आणि आकर्षक जलक्रीडांचा अनुभव घेण्यासाठी हा वॉटर पार्क निश्चितच एक उत्तम ठिकाण ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.या उद्घाटन सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक सुधीर पा. नवले आणि सुभाष पा. नवले यांनी केले आहे.

संपर्क:

गोल्डन पाम वॉटर पार्क & रिसॉर्ट पाण्याचा टाकीजवळ, बेलापूर बु., ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर

मोबाईल: ७६२०५५८५५५, ९९२२१५५५५०, ८३७८००७९००

कोपरगाव | दिनांक – १३ मे २०२५/गौरव डेंगळे:

शहरातील शैक्षणिक क्षेत्रात एक विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था म्हणून ओळखली जाणारी श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव ही शाळा यंदाही १००% निकाल लावण्यात यशस्वी ठरली आहे. मार्च २०२५ मध्ये पार पडलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत १६८ पैकी १६८ विद्यार्थ्यांनी यश मिळवले, यामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


*निकालाचे ठळक पैलू:*


१६८ विद्यार्थ्यांपैकी १५२ विद्यार्थ्यांनी 'डिस्टिंक्शन' (७५% व त्याहून अधिक गुण) मिळवले.


१३ विद्यार्थ्यांना 'फर्स्ट क्लास' (६०% ते ७४.९९%) मिळाला.


०३ विद्यार्थ्यांनी 'सेकंड क्लास' (४५% ते ५९.९९%) मिळवून उत्तीर्णता गाठली.


यावर्षी एकाही विद्यार्थ्याचा अपयश नोंदवले गेले नाही.



*गुणवंत विद्यार्थ्यांचे नाव व यश:*


1. मिस. पारिख हरिश्री किरण – ९८.८०% (शाळेतील प्रथम)



2. मिस. साळुंखे कृष्णाप्रिया वासुदेव – ९७.६०% (शाळेतील द्वितीय)



3. मिस. गाडेकर स्नेहा शैलेश – ९७.२०% (शाळेतील तृतीय)




*गुणवर्गवारी:*


९०% पेक्षा अधिक: ५१ विद्यार्थी


८०% ते ८९.९९%: ७१ विद्यार्थी


७०% ते ७९.९९%: ३६ विद्यार्थी


६०% ते ६९.९९%: ७ विद्यार्थी


४५% ते ५९.९९%: ३ विद्यार्थी



*शाळेच्या यशामागील घटक:*


या यशामागे केवळ विद्यार्थ्यांचे परिश्रमच नव्हे तर शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, शाळेतील अभ्यासकेंद्रित वातावरण, तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर आणि पालकांचा सतत पाठिंबा हे घटक कारणीभूत आहेत. शाळेच्या अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन, वेळोवेळी टेस्ट सिरीज, रेमेडियल क्लासेस आणि मानसिक आरोग्याचे प्रशिक्षणही दिले गेले.


*मुख्याध्यापकांचे मत:*


मुख्याध्यापक श्री के एल वाकचौरे यांनी सांगितले की, “आमची शाळा केवळ निकालासाठी नाही तर विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आमचे शिक्षक फक्त शिक्षण न देता प्रेरणा देतात, आणि याचाच हा निकाल पुरावा आहे.”


 *भावी वाटचालीसाठी शुभेच्छा:*


या विद्यार्थ्यांनी विविध शाखांमध्ये प्रवेश घेण्यास सुरुवात केली असून, त्यांना डॉक्टर, इंजिनिअर, वैज्ञानिक, प्रशासकीय अधिकारी अशा विविध क्षेत्रांत यशस्वी होण्यासाठी शाळेच्या वतीने शुभेच्छा दिल्या गेल्या.

श्रीरामपूर - शंभर टक्के यशाची परंपरा कायम राखत श्रीरामपूर येथील सरकार मान्य मान्यताप्राप्त अल्पसंख्याक स्वयं अर्थसहाय्यित संस्था, मोहम्मद इब्राहिम एज्युकेशन सोसायटी संचलित, अजमत फातिमा इंग्लिश स्कूल ॲड ज्युनि. काॅलेज विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. या परिक्षेत  विज्ञान शाखेत निशाद अबुबकर शाह हिने ९०.१७ टक्के गुण मिळवून श्रीरामपूर तालुक्यात तसेच काॅलेज मध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळवला . द्वितीय क्रमांक जोया जावेद अहमद शेख ७५ टक्के तर तृतीय सबिया अफजल शेख ७१.१७ टक्के गुण मिळवून यशाची नवी शिखरे गाठली आहेत. या कामी यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरनिय श्री.मोहम्मद इब्राहिम साहेब अली शेख साहेब, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मोहसीन शेख सर , उपाध्यक्ष श्री. मतीन शेख सर , सचिव श्री. मुबीन शेख सर , प्राचार्य लुकस दिवे , सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

बेलापूर (प्रतिनिधी)-महर्षी वेद व्यास प्रतिष्ठान बेलापूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या वेदोत्सव परिक्षेत दधिमती वैदिक गुरुकुल गोठमांगलोत गुरुकुलातील तसेच बेलापूर येथील पत्रकार दिलीप दायमा यांचे चिरंजीव महेश दायमा यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णमुद्रीका पटकावली होती. 


श्रीराम जन्म भूमीचे गोविंददेवगिरी महाराज तथा किशोरजी व्यास महाराज यांच्या हस्ते महेश दायमा यांना सन्मानीत करण्यात आले होते. त्या यशानंतर महेश दायमा हे उद्या मंगळवार दि. १३ मे रोजी बेलापूर येथे आपल्या मुळ गावी येत असून त्यांच्या यशाबद्दल भव्य अशी मिरवणूक काढून सत्कार समारंभ आयोजित केला आहे.


उद्या मंगळवारी दुपारी ४ वाजता होणाऱ्या मिरवणूक व सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बेलापूर ग्रमस्थ, गावकरी मंडळ, सकल राजस्थानी समाजाने केले आहे.

निधन वार्ता (नागर)-येथील सौ. हौसाबाई सोपानराव देसाई यांचे वयाच्या 70 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले .त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, दोन मुलगी,जावई सुना, नातवंडे असा परिवार आहे नाऊर येथील प्रगतशील शेतकरी सोपानराव देसाई यांच्या त्या पत्नी तर शरद, संजय व प्रदीप यांच्या त्या आई होत.बेलापुर येथील पत्रकार देविदास देसाई यांच्या त्या चुलती होत्या.त्यांच्यावर उद्या सोमवार दिनांक 12 मे रोजी सकाळी नऊ वाजता नाऊर येथील गोदावरीतीरी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


बेलापूर, प्रतिनिधी दैनिक जय बाबाचे कार्यकारी संपादक तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले श्री. मनोजजी आगे यांच्या वाढदिवसानिमित्त आज बेलापूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तसेच ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.

वाढदिवसानिमित्त सकाळी बेलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी दैनिक जय बाबाचे कार्यकारी संपादक श्री. मनोजजी आगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


यानंतर, ग्रामपंचायत बेलापूर येथे श्री. मनोजजी आगे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री. आगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.

या कार्यक्रमांना जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, बेलापूर पत्रकार संघाचे सचिव देविदास, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य पुरुषोत्तम भराटे, दैनिक जय बाबाचे प्रतिनिधी दिलीप दायमा, पत्रकार सुहास शेलार, बाबा शेख, मर्चन्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्डा, अरुणोदय पतसंस्थेचे संचालक संजय गोरे, गावकरी संस्थेचे संचालक प्रवीण बाठीया, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल पवार, विजय कटारीया, महेश कुऱ्हे यांच्यासह विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी श्री. मनोजजी आगे यांच्या सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले व त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


बेलापूर(प्रतिनिधी) गेल्या चार दिवसापासून भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान सुरू असलेले युद्ध पाकिस्तानने विनंती केल्याने अखेर शस्त्र संधी झाल्यामुळे बेलापूर येथील सत्यमेव जयते ग्रुप व बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने घोषणा देऊन फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली भारत पाकिस्तान दरम्यान गेल्या सात तारखेपासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती भारताने पहलगाम हल्याचा बदला घेण्याकरता नऊ अतिरेकी अड्डे उध्वस्त केले त्याचा परिणाम पाकिस्तानने भारताच्या नागरि वस्त्यावर हल्ले सुरू केले. त्याचबरोबर आपल्या देशातील अनेक ठिकाणाला ड्रोन च्या साह्याने लक्ष बनवण्याचा प्रयत्न केला .परंतु भारताच्या सैन्य दलाने हा हल्ला परतून लावला. पाकिस्तानने भारतावर हल्ला करून निष्पाप नागरिकांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तरी देखील भारताने संयम राखत केवळ अतिरेकी असलेल्या ठिकाणावरच हल्ले केले.आणि ही बाब जगासमोर आली त्यामुळे अखेर पाकिस्तानला नमते घेत शस्त्र संधी करणे भाग पडले. याच घटनेचा बेलापूर ग्रामस्थ सत्यमेव जयते ग्रुपचे वतीने फटाक्याची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भारत माता की जय वंदे मातरम ,जय जवान जय किसान, सैन्यदलाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी तिरंगा हातात घेऊन सत्यमेव जयते ग्रुप व ग्रामस्थ यांच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली. त्यानंतर झेंडा चौकात घोषणाबाजी करण्यात आली त्यावेळी मोठ्या प्रमाणात फटाकेची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, देविदास देसाई, विष्णुपंत डावरे संजय भोंडगे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुक्कंड,पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे, दिलीप दायमा,दिपकसा क्षत्रिय,विलास नागले,अँड. पांडुरंग कोकणे, बाबुलाल पठाण, भगीरथ मुंडलिक,जाकीर शेख,दिलीप दुधाळ,नंदकिशोर दायमा,विशाल आंबेकर, किरण गागरे,गोपी दाणी,गणेश मगर,महेश कुऱ्हे, संजय शिंदे, भाऊसाहेब तेलोरे, प्रविण बाठीया ,राधेशाम आंबिलवादे,दिलीप अमोलिक,अजीज सय्यद, महेश ओहोळ,औदुंबर राऊत, इरफान शेख,सुभाष मोहिते, राहुल माळवदे, बबन मेहेत्रे ,सचिन कणसे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

बेलापूर (प्रतिनिधी)--सनातन संस्थेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्रासाठी कार्य करत असलेले परमश्रद्धेय डॉ. जयंत आठवले यांचे कार्य अलौकिक आहे. त्यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गोवा येथे 17, 18 ,व 19 मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून भारताला पुन्हा तेजस्वी, समर्थ बनवण्याचा आणि सनातन धर्माची पुनर्स्थापना करण्याचा हा जागर आहे, असे गौरवोद्गार ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी महोत्सवासाठी पाठवलेल्या शुभसंदेशात काढले आहेत.


  सनातन संस्थेचे डॉ आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने पाठविलेल्या संदेशात स्वामी गोविंददेव गीरीजी महाराज यांनी पुढे म्हटले आहे की, ‘सनातन संस्थेच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या कार्याची फलश्रुती म्हणून आज हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते निष्काम भावनेने व स्वयंशिस्तीने सनातन धर्माचा प्रसार करत आहेत. या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जीवनाचा स्वाध्याययज्ञ, सेवायज्ञ आणि लोकजागरणयज्ञ सुरू केला आहे. हे कार्य अत्यंत विलक्षण आहे आणि त्यातूनच सनातन राष्ट्राच्या अभ्युदयाचा मार्ग उजळणार आहे.


    या महोत्सवात विविध राष्ट्रनिष्ठ नेते, धर्माचार्य, कार्यकर्ते आणि सनातनप्रेमी एकत्र येऊन विचारमंथन करणार आहेत. या मंथनातून केवळ नवनीत नव्हे, तर अमृत उदयाला येईल आणि याच अमृतकलशातून सनातन राष्ट्राला नवतेज प्राप्त होईल. आज भारताला समर्थ राष्ट्र बनवायचे असेल, तर सनातन धर्माच्या मूलभूत तत्त्वांची आवश्यकता आहे. भारताच्या सामर्थ्यावरच जगात समता, बंधुता आणि खरी स्वतंत्रता टिकू शकते. म्हणूनच हे कार्य एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या संस्थेचे नसून, धर्माचे आणि राष्ट्राचे कार्य आहे.


    त्यामुळे सर्व धर्मप्रेमी, राष्ट्रनिष्ठ कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, धर्मगुरूंनी आणि सामान्य भक्तांनी या महोत्सवात सहभागी होऊन आपल्या श्रद्धेचे आणि सेवाभावाचे योगदान द्यावे.  भारताच्या सुंदर, समृद्ध भविष्यासाठी हा महोत्सव एक सुवर्णसंधी आहे. या महामंथनातून मिळणाऱ्या तेजाने भारत गगनभरारी घेईल आणि सनातन धर्माचा दिव्य प्रकाश संपूर्ण जगात पसरेल. म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन या दिव्य कार्यात सहभागी होऊ  आणि भारताला त्याच्या सनातन तेजाने पुन्हा उभे करूया, असेही आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.

बेलापूर( प्रतिनिधी)-- देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही सैन्य दलाच्या जवानांनी ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते करून पाकिस्तानातील अतिरेक्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले या घटनेचा बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्याचबरोबर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात जे 15 निष्पाप नागरिक मारले गेले त्या नागरिकांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.                          पहेलगाम हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला शब्द दिला होता की यातील एकालाही माफ केले जाणार नाही त्या पद्धतीने तिनही सैन्य दलाच्या मदतीने अतिरेकी प्रशिक्षण देणारे 9  केंद्र उध्वस्त करण्यात आले या घटनेचा बेलापूर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याचबरोबर अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त  केल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी देशातील निष्पाप नागरिकांवर व लहान मुलावर गोळीबार केला त्यात पंधरा नागरिक मरण पावले व एक जवान शहीद झाला. त्यांनाही बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विष्णुपंत डावरे, हाजी इस्माईल शेख, प्रफुल्ल डावरे, संजय भोंडगे,विलास मेहत्रे, रवींद्र खटोड, प्रशांत लड्डा, गोपी दाणी आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुवालाल लुक्कंड,शांतीलाल हिरण ,बाळासाहेब दाणी,अशोक प्रधान, सतीश सोनवणे ,रत्नेश गुलदगड, डॉक्टर रवींद्र गंगवाल, भास्कर बंगाळ, बाबुलाल पठाण, राजेंद्र राशिनकर ,विजय कटारिया,रामनाथ शिंदे ,प्रवीण बाठीया, औदुंबर राऊत,मधुकर अवचिते,  ज्ञानेश्वर कुलथे इस्माईल आतार दिलीप दायमा संजय शिंदे सतिश सोनवणे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास देसाई यांनी केले तर विष्णुपंत डावरे यांनी आभार मानले



अहिल्यानगर ,प्रतिनिधि वजीर शेख -शिर्डी येथे दिनांक ३मे२०२५ शनिवार रोजी शिर्डीत हॉटेल शांतीकमल ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार २०२५ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन येथे करण्यात आले होते वजीर शेख यांना आभिनय पत्रकार क्षेत्रातील दिलेल्या योगदानाबद्दल व प्रेम चित्रपटासाठी क्षेत्रातील लवकरच प्रेम योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्यास प्रसिध्द हॉटेल व्यवसायिक व समाज सेवक. किशोर कालडा शेठ संगमनेर, दिग्दर्शक अल्ताफ शेख पुणे, व प्रेम मराठी चित्रपट दिग्दर्शक सुदाम संसारे वंदना गव्हाणे अभिनेत्री इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. याठिकाणी सुदाम संसारे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला हा पुरस्कार दिल्याबद्दल रोहीणी वैभव बागडे यांनी पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख सुदाम संसारे व वंदना गव्हाणे अभिनेत्री यांचे आभार मानले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget