Articles by "स्थानिक"

 

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील अल्पवयीन मुलीचा अद्यापही शोध न लागल्याच्या निषेधार्थ शिवप्रहार संघटनेने पुकारलेल्या बंदला बेलापूरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला सर्व व्यापारी बांधवांनी स्वेच्छेने आपापली दुकाने बंद ठेवली                येथील अल्पवयीन मुलीचा अजुन तरी पोलीसांना ठावठिकाणा लागलेला नाही पोलीसांना वेळोवेळी निवेदने दिली रस्ता रोको केला तरीही पोलीसांना त्या अल्पवयीन मुलीस फुस लावणाऱ्यास पकडता आलेले नाही त्यामुळे आपल्या मुलीचे काही बरे वाईट तर झाले

नसेल ना अशी शंका नातेवाईकांना येत आहे पोलीस केवळ अश्वासने देत आहे या घटनेच्या निषेधार्थ शिवप्रहार संघटनेच्या वतीने बंदचे अवाहन करण्यात आले होते याअवाहनाला सर्व व्यापारी नागरीक बंधुनी चांगला प्रतिसाद दिला सर्वांनी स्वेच्छेने आपले व्यवहार बंद ठेवले लाँक डाऊन मुळे सर्व व्यवहार बंद होते आज पासुन शासनाने वेळेची मर्यादा वाढविली असली तरी घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असल्यामुळे सर्वानी दुकाने बंद ठेवुन या घटनेचा निषेध नोंदविला पोलीस उपनिरीक्षक कृष्णा धायवट हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे गणेश भिंगारदे पोपट भोईटे निखील तमनर हरिष पानसंबळ आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला.

बेलापूर  ( प्रतिनिधी )- डाळींब उत्पादकांना शासनाने फळबाग विमा योजनेंतर्गत तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी डाळींब उत्पादक शेतकरी रविंद्र खटोड यांनी केली आहे                 प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात खटोड यांनी म्हटले आहे की शासनाने डाळींब उत्पादकांना दिलासा देण्यासाठी फळबाग पिक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई दिलेली आहे परंतु राहुरी तालुक्यातील   देवळाली प्रवरा मंडल मधील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळालेली नाही केवळ देवळाली प्रवरा मंडल मधील शेतकरी या लाभापासुन वंचित राहीलेले आहे                  तरी या मंडल मधील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा आंतर्गत नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी खटोड यांनी केली आहे

श्रीरामपुर /प्रतिनिधी :लोकडाऊन मध्ये आख्खा देश त्रस्त असताना गोदी मिडियाचे काही दलाल पत्रकार व ॲकर  आपल्या चॅनलचे टी.आर.पी वाढवण्यासाठी एखाद्या धर्माची बदनामी व्हावी म्हणून काहीही बडबड करतात यासाठी आपले चॅनल न्युज 18 इंडियाचे टी.आर.पी वाढवण्यासाठी व मुस्लिम द्वेश पसरवण्यासाठी अमिश देवगण नामक दलाल  पत्रकाराने मुस्लिमांसाठी द्वैववत असणारे ख्वाजा मोइनुद्दिन चिश्ती यांच्या बद्दल अपशब्द वापरुन आम्हा मुस्लिम बांधकांच्या भावना दुखावल्या आहे.अमिश देवगण हा ॲकर वेळोवेळी आपल्या शो मध्ये कोणालाही बोलवून फालतु डिबेट करत असतो .यात कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील याच सुद्धा भान ठेवत नाही .त्यामुळे समाजामध्ये दुही निर्माण करणारा अमिश देवगणवर गुंन्हा दाखल करावे नी न्युज 18 चॅनेलवर बंदी घालावी असे निवेदन प्रांताधिकारी अनिल पवार यांना समाजवादी पार्टीच्या वतीने देण्यात आले .निवेदनावर समाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएब जमादार , तालुकाध्यक्ष फय्याज कुरेशी , शहराध्यक्ष इमरान इरानी ,अरबाज कुरेशी ,दानिश पठाण ,आसिफ तांबुळी , जकरिया सय्यद , जाहिद कुरेशी , तनवीर शेख यांच्या सह्या आहेत .

शिर्डी (जय शर्मा )-सध्या कोरोणामुळे देशात जगात अनेक रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहेत ,अनेकांना राज्यात जिल्ह्यात रक्ताची मोठी गरज भासू लागली आहे, अशा परिस्थितीत रक्तदान करणे, सर्वात श्रेष्ठ दान समजले जात आहे ,त्यामुळेच शिर्डीतील समाजसेवेत अग्रेसर सहाणारे  समाज  बांधवांच्या वतीने सिंधी समाजातील समाजसेवकांनी शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान च्या रक्तपेढी मध्ये जाऊन रक्तदान केले ,
शिर्डीत श्री साईबाबा संस्थान ची रक्तपेढी असून येथे हे लॉक डाऊन पूर्वी साईभक्तांनी रक्तदान करावे , इतर दाना बरोबरच रक्तदान श्रेष्ठ असल्याचे विविध ठिकाणी फलक लावण्यात आलेले आहेत ,लॉकडाउन पूर्वी शिर्डीत मोठी गर्दी होती, मोठ्या संख्येनेसंख्येने साईभक्त येऊन रक्तदान करत होते, मात्र लॉक डाऊन मुळे गेल्या 17 मार्च पासून शिर्डीत साईभक्त येणे बंद झाले आहे त्यामुळे रक्तदान करण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे ,त्यामुळेच नेहमी रक्तदान करणारे शिर्डीतील सिंधी समाजातील बांधव यांनी दिनांक 23 /5/ 2020 रोजी शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान चा रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले, नित्य साई सेवा व सिंधी समाज मित्र मंडळातील सनी रोहरा, मनोज मोटवानी, सुनील तोलानी, रोहन तोलानी मनोज रामचंदानी सजंय फुदंवानी ,यांनी रक्तदान केले तसेच  राजेश टिकीयानी यांनी  मोलाचे सहकार्य केले, या सर्वांचे शिर्डी व परिसरातून अभिनंदन होत आहे.

शिर्डी (जय शर्मा )राज्य सरकार कोरोणाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात रोखण्यासाठी कमी पडले असून त्यासाठी अयशस्वी ठरलेल्या राज्य सरकारचा निषेध करत राज्य सरकारने राज्यातील जनतेला कोरोणामुळे उद्भवलेल्या संकटकाळात विविध क्षेत्रात, विविध प्रकाराने मदत करण्याची मागणी करत राहता तालुक्यातील विविध गावात भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यकर्त्यांनी मेरा अंगण, मेरा रणांगण महाराष्ट्र बचाओ आंदोलन आज केले,
राज्यात कोरोणामुळे जनता मोठ्या संकटात सापडली आहे आर्थिक टंचाई भासू लागली आहे, राज्य सरकार या काळात अयशस्वी ठरले आहे, याचा निषेध करण्यासाठी राज्यभर आज भा,ज,प च्या वतीने महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले, भाजपच्यावतीने गावागावात मेरा अंगण, मेरा रणांगण ,महाराष्ट्र बचाओ आंदोलन केले गेले, याच धर्तीवर राहता तालुक्यातही असे आंदोलन झाले, राहता तालुक्यातील शिर्डी व परिसरातही ही गावागावात भाजपतर्फे असे आंदोलन करण्यात आले, निमगाव निघोज येथील भाजपाचे स्थानिक नेते बाळासाहेब गाडेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत गावात राज्य सरकारचा निषेध करत मेरा अंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव आंदोलन केले,व विविध मागण्यांचे निवेदन घेवुन त्यांनी हे आंदोलन केले ,तोंडाला मास्क लावून व सोशल डिस्टंन्स पाळत महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले, यावेळी   शासनाने विद्यार्थ्यांची शालेय फी माफ करण्यात यावी, शेतमजूर, कामगार ,बारा बलुतेदार आदी रोजीरोटी वर जगणाऱ्या गोरगरिबांना आर्थिक अनुदान द्यावे ,राज्यातील सर्व भाडेकरूंचे तीन महिन्यांचे घर भाडे माफ करावे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी ,शिधापत्रिका नसलेल्यानाही  रेशन मधून धान्य मिळावे, आदी विविध मागण्या करत हे महाराष्ट्र बचाव आंदोलन येथे करण्यात आले, त्याच प्रमाणे तालुक्यातील गावातही असेच वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन झाले.

शिर्डी,दि.20 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लागु असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय मजुरांची कामे बंद झाली. यामुळे या बंद काळात अनेक मजुरांनी गावाकडे परत जाण्याचा निर्णय घेतला. या सर्वांना मदत व्हावी यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या जेवण व प्रवासाची व्यवस्था केली. संगमनेर येथून 1662 परप्रांतियांनी त्यांच्या गावी पोहोचल्यानंतर तेथून ‘थँक्यू थोरात साहब’ असे म्हणत नामदार बाळासाहेब थोरात, सर्व संगमनेरवासीय व महाराष्ट्रीयन जनतेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.
नामदार बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून राज्यातील सर्व  परप्रांतीय मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी प्रवास खर्चाची व्यवस्था करण्यात आली होती. याचबरोबर या सर्व परप्रांतीय मजूरांना जेवणाची,  राहण्याची व  औषधोपचाराची सुविधाही देण्यात आली होती. राज्यात हे मदत कार्य सुरू असताना संगमनेर तालुक्यातही अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या बसेस उपलब्ध करुन देऊन मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, झारखंड या ठिकाणी जाणाऱ्या विविध परप्रांतीय मजुरांच्या प्रवासाची व्यवस्था केली. अनेक गावातून पायी चालणाऱ्या या परप्रांतीय मजूरांना संगमनेर तालुक्यात मायेचा वेगळाच ओलावा अनुभवायला मिळाला. अनेक ठिकाणी अन्नछत्र सुरु करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी या मजुरांसाठी आंघोळीची व्यवस्था, औषधोपचाराची व्यवस्था व निवासाची, आरामाची व्यवस्थाही करण्यात आली होती. या मदतीमुळे संगमनेरवासीयांच्या माणुसकीचे कौतुकही झाले.

       नामदार बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून संगमनेरमध्ये आलेल्या परप्रांतीय मजुरांना बसच्या माध्यमातून अहमदनगर येथे सोडण्यात आले. अहमदनगर येथून रेल्वेने हे परप्रांतीय मजूर उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व झारखंड या ठिकाणी पोहोचल्यावर मात्र परप्रांतीय मजुरांनी भावनिक होऊन थँक्यू थोरात साहेब म्हणत त्यांच्या कार्यालयात फोन करून व एसएमएस'द्वारे आपली कृतज्ञता व भावना व्यक्त केली.

              यामध्ये रामविलास वर्मा यांनी म्हटले आहे थँक्यू थोरात साहेब महाराष्ट्राचे आम्हाला प्रेम मिळाले. आपुलकी मिळाली ती जगाच्या पाठीवर कुठेही मिळाली नाही. महाराष्ट्रामुळे आमचे कुटुंब रोजीरोटी मिळवत आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रोजगार जरी बंद झाला तरी महाराष्ट्रातील जनतेने आमची मदत केली. ती आम्ही जीवनात कधीही विसरू शकणार नाही. संगमनेरकर तर आम्हाला आमच्या कुटुंबातले आहेत. खरे तर संगमनेर गाव सोडताना खूप भावना अनावर झाल्या होत्या. आपण आम्हाला जेवणाखाण्याची, राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली त्याबद्दल संपूर्ण उत्तर प्रदेशमधील मजुरांच्यावतीने आम्ही कृतज्ञता व्यक्त करत आहोत. कोरोनाचे संकट लवकर संपवून आम्ही पुन्हा महाराष्ट्रात परतणार आहोत आणि महाराष्ट्रात व देशाच्या विकासात आमच्यापरीने योगदान देऊ असा, भावनिक संदेशही त्यांनी दिला.

            कोरोना हे मानव जातीवरील संकट आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी प्रशासन प्रभावीपणे काम करत असून या संपूर्ण लॉकडाऊन काळामध्ये संगमनेरकरांनी दाखवलेली माणुसकी ही कौतुकास्पद असून परप्रांतीय मजूर, हातावर रोजंदारी करणारे कामगार यांच्यासाठी विविध संघटनांनी सुमारे 3 हजार 500 डबे देण्याच्या उपक्रमासह लॉकडाऊन काळात सातत्यपूर्ण केलेले मदतकार्य हे राज्यासाठी मॉडेल ठरणारे असल्याचे गौरवौद्गार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वीच काढले होते. संगमनेरकरांनी दाखवलेली माणुसकी हा महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला असून ज्या ज्या सेवाभावी संघटना व पदाधिकाऱ्यांनी  मदत केली त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राहता (शाह मुस्ताक आली  )-अहमदनगर जिल्ह्यात  राहाता शहरात लॉक डाउन च्या काळात  गेल्या काही दिवसापासून  शहरातून  मुली  फरार होण्याचे  प्रमाण वाढले असून  गेल्या आठ-दहा दिवसात शहरातून तीन मुली बेपत्ता झाल्या असल्याचे  खात्रीशीर वृत्त आहे,  या घटनेमुळे राहता शहरात  उलट-सुलट चर्चा होत असून  नागरिकांमध्ये  खळबळ उडाली आहे,कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन  सुरू असून राहता शहरात  सर्व बंद आहे, मात्र अत्यावश्यक सेवा सुरू आहे, किराणा,भाजीपाला,मेडीकल, घेण्यासाठी तसा बहाणा करुन किंवा काही  मुली बाहेर येतात, खरेदीच्या निमित्ताने बाहेर फिरतात व त्याचा फायदा घेत येथून मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत आहे, राहता शहरातून गेल्या आठ दहा दिवसात तीन मुली फरार झाल्याचे समजते, याची शहरात कुजबुज सुरू आहे, लॉक डाऊन मुळे सर्व जण घरात असल्याने याचे जास्त वाच्यता होत नाही, शिवाय यासंदर्भात जाहीर बोलायला कोणी तयार नाही, याची चौकशी होणे गरजेचे आहे, या  मुली बेपत्ता होण्यामागे कोणाचा हात आहे का। किंवा स्वतःहून या मुली गायब होत आहे किंवा यामागे  नेमकी ,कोण आहे का।याचा तपास लावणे गरजेचे आहे, सध्या देश संकटातून जात असताना शहरात असे प्रकार वाढत असेल तर याला वेळीच आळा घातला जाणे गरजेचे आहे, असे राहता मधून आता बोलले जात आहे, मुली बेपत्ता होण्याचे असे शहरात प्रकार यापुढे वाढत राहिले तर शहरात मोठी समस्या निर्माण होणार आहे या दबक्या आवाजात शहरात सुरू असलेल्या चर्चेमुळे अनेक कुटुंबात मुलींचे आई-वडील मोठे चिंतेत पडले आहे ,यामागे नेमकी काय आहे हे स्पष्ट होणे गरजेचे आहे ,असे आता नागरिक बोलत आहेत.

शिर्डी (राजेंद्र गडकरी)- देशात सन2018  पासून केंद्र शासनाच्यावतीने देशातील शहरांमधील स्वच्छता ,कचरा मुक्तीअभियान,नालेसफाई,वेस्टेज व्यवस्थापन आणि इतर स्वच्छता, सुंदरता पाहून शहरांचं रेटिंग ठरविण्यात येत असतं, दरवर्षी या गोष्टीत चांगले काम करणाऱ्यांना तसे रेटिंग  शहराला दिलं जात असतं, यावर्षी शहरातील स्टार रेटिंग देशातील विविध शहरांची निरीक्षण करून जाहीर करण्यात आली आहेत , केंद्रीय नगर विकास मंत्री हारदिपसिंग पुरी यांनी नुकतीच देशातील या बाबत असणाऱ्या स्टार रेटिंग शहराची घोषणा केली आहे, या स्टार रेटिंग मध्ये महाराष्ट्रातील व देशातील आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डीला थ्री स्टार रेटिंग मिळाला आहे, यामुळे शिर्डीसह देश-विदेशातील साईभक्तामधून मोठा आनंद व्यक्त होत आहे,भारताचे नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी नुकतेच देशातील  स्टार रेटिंग शहराची घोषणा केली आहे, देशातील शहरांमधील स्वच्छता सुंदरता नाला सफाई, वेस्ट मॅनेजमेंट, प्लास्टिक वापरावर निर्बंध या सर्व गोष्टींचा विचार करून शहराची केद्रींय पथकामार्फत पाहणी करून केंद्राला अहवाल देऊन त्यावर निर्णय घेण्यात येतो, यावर्षी  देशातील अनेक शहरांचे निरीक्षण करून केंद्राला अहवाल दिल्यानंतर केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी नुकतेच हे या संदर्भातील स्टार रेटिंग घोषित केले आहे ,यावर्षी देशातील  स्टार रेटिंग शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र श्री साईबाबांच्या शिर्डीला थ्री स्टार रेटिंग मिळाला आहे, यात स्टार रेटिंग मध्ये फाइव स्टार रेटिंग अंबिकापुर ,राजकोट सुरत ,मैसूर ,इंदोर आणि महाराष्ट्रातील नवी मुंबई या शहरांनी मिळवला आहे, तर ठाणे भिवंडी अंबरनाथ आणि मीरा भाईंदर या शहरांना शिर्डी प्रमाणित थ्री स्टार रेटिंग मिळाला आहे ,त्याचप्रमाणे धुळे-जळगाव माथेरान ,रत्नागिरी ,पाचगणी, वेंगुरला ,आणि जेजुरी या शहरांनाही थ्रीस्टार देण्यात आले आहेत, शिर्डीला थ्रीस्टार रेटिंग मिळाल्यामुळे शिर्डीत मोठा आनंद व्यक्त होत आहे ,शिर्डी हे  छोटे शहर असले तरी येथे हे लॉक डाऊन पूर्वी दररोज सुमारे साठ-सत्तर हजार साईभक्त सरासरी श्रीसाई दर्शनासाठी येत असतात, सुट्ट्या व उत्सवाच्या दरम्यान  हीच संख्या लाखोंच्या पुढे दररोज जाते ,देश-विदेशातून येथे साईभक्तांचा ओघ सारखा सुरू असतो, त्यामुळे येथे स्वच्छता व शहराची सुंदरता वाढविण्याकडे अधिक जोर दिला गेलाहोता, श्री साईबाबा संस्थान ,शिर्डी नगरपंचायत, विविध सामाजिक संस्था यांनी शिर्डी स्वच्छ सुंदर असावी म्हणून आपापल्या परीने प्रयत्न केले, कारण येथे देश-विदेशातून साईभक्त येत असतात व येथिल स्वच्छतेचा मेसेज बाहेर जात असतो, म्हणून शिर्डीत अधिक लक्ष शहर स्वच्छता, सुंदर करण्याकडे दिले गेले होते व याचाच परिणाम म्हणून यापूर्वी देशात शिर्डीला स्वच्छ  व सुंदर शिर्डीचे दुसरे क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते व आता केंद्र सरकारने घोषित केलेल्या याच बाबतीत फाइव स्टार रेटिंग मध्येही शिर्डीला थ्री स्टार रेटिंग स्वच्छता, सुंदरता याबाबत मिळाले आहे ,यामुळे देशात शिर्डीचे नाव आणखीन झळकले आहे ,या थ्री स्टार रेटिंग मिळाल्याबद्दल शिर्डी व परिसरातून व साईभक्तं मधून शिर्डीतील सर्व प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते , सर्व नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे.

साकुरी/शिर्डीच्या सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तिमत्व *श्री. अमृतराव मुरलीधरराव गोंदकर पा* . यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. सध्याच्या आरोग्यविषयक राष्ट्रीय आपत्तीच्या काळात प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत त्यांचा अंत्यविधी निवडक नातेवाईक, स्नेही मंडळींच्या उपस्थितीत करण्यात आला.
             शिर्डीमध्ये भारतीय जनता पार्टी रुजविण्याचा त्यांचा मोलाचा वाटा होता. राज्यात सर्वप्रथम ज्या दोन  स्थानिक स्वराज्य संस्थांवर भारतात जनता पार्टीचा झेंडा रोवला गेला त्यात नानांच्या नेतृत्वाखाली शिर्डी ग्रामपंचायतीत भाजपने सत्ता स्थापन केली होती. नानांनी भाजपाचे तालुकाध्यक्ष, शिर्डी ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणूनही काम केले होते. उद्योजक दिलीपराव व शिवाजीराजे गोंदकर यांचें वडील होत दोन मुले चार मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे अमृतराव  गोंदकरयांच्या निधनाने शिर्डी परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शिर्डी(  जय शर्मा )-कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला असून अनेक दिवस आपल्या घरात ,शेतात राहणारे मेंढपाळ आपल्या मेंढ्या, शेळ्या  घेऊन आता नाविलाजाने गावोगाव भटकंती करत चाऱ्याच्या शोधार्थ फिरत असल्याचे दिसत आहे,तशी सुरुवात झाल्याचे दिसू लागले आहे,
गेल्या  52 दिवसापासून कोरोणाचा  प्रादुर्भाव  रोखण्यासाठी देशात लॉकडॉऊन सुरू आहे, सर्व बंद आहे, त्यामुळे सर्व जण घरात आहे, शेळ्या, मेंढ्या,घरी,शेतात होत्या,पाळीव जनावरेही आपल्या दारात प्रत्येकाने बांधून ठेवले आहेत, मात्र आता कडक उन्हाळा सुरू झाला आहे ,त्यामुळे आता तापमानही वाढले आहे, अनेक ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई हळूहळु भासायला सुरुवात झाली आहे, शेळ्या ,मेंढ्या, जनावरांना चारा, पिण्याचे पाणी मिळणे मुश्किल होत आहे, ५१,५२, दिवस आपापल्या गावात ,घरात शेतात राहणारे मेंढपाळ  आता नाविलाजाने दरवर्षाप्रमाणे मेंढ्यांच्या कळप घेऊन आपल्या गावा बाहेर पडले आहेत, दुसरे गावात जाऊन ,चाऱ्याच्या शोधार्थ भटकंती करत आहेत, मेंढ्यांना शेळ्यांना चारा ,पाणी यांची आवश्यकता असल्याने नाविलाजाने आम्ही आमच्या घरून बाहेर पडलो आहे ,मात्र आम्ही गावाएेवजी ,शेतामध्ये रानामध्ये,वनामध्ये  एकांत मुक्काम करतो ,लॉक डाऊंनच्या नेमात राहतो ,मास्क वापरतो, गावात किंवा रस्त्याने जाण्याऐवजी आड बाजूने मेंढ्यांचे कळप घेऊन, चाऱ्याच्या शोधार्थ आम्ही जात असतो, लॉक डाऊन मुळे अनेक गावात  बाहेरील व्यक्तीला परवानगी नाही त्यामुळे आम्हीही  आडबाजूच्या रस्त्याने, माळरानात ,शेतात वस्ती करून तेथेच राहतो, लहान मुले व वयस्कर, वृद्ध माणसे यावर्षी आम्ही घरीच ठेवली आहेत, आम्हालाही कोरोनाची भीती आहे, आमच्या मेंढ्या ,शेळ्या यांनाही ही  कोरोणाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण घरी आमच्या शेतात मेंढ्या ,शेळ्यांना मुबलक चारा व पिण्यास पाणी नसल्यामुळे नाविलाजाने आम्हाला घराबाहेर, गावा बाहेर पडावे लागत आहे, घरी राहून या मेंढ्यांना चारा पाणी कुठून देणार। तसेच बाजारात विक्री करण्यासाठी ही बाजार बंदआहे, मग आम्ही काय करणार। असे सांगत आम्ही जवळजवळ चाळीस पंचेचाळीस दिवस गावात, घरातच कसेबसे काढले, मात्र आता शेळ्या-मेंढ्यांच्या पोटापाण्याचा विचार करून आम्ही एक एक किंवा दोघे घरातील माणसे बाहेर पडलो आहे, मेंढ्यांच्या चारा, पाण्यासाठी ते करणे भाग पडत आहे, लॉक डाऊन च्या या तिसऱ्या टप्प्यात रानोमाळ फिरणार्‍या भटकंती करणार्‍या, पोटापाण्यासाठी चारा पाण्यासाठी फिरणाऱ्या  मेंढपाळ साठी शासनाने लॉक डाऊनच्या नियमात थोडीशी आमच्यासाठी तरी शिथीलता करावी ,कारण आम्ही घरी किंवा आमच्या शेतात चारा पाण्याअभावी राहू शकत नाही ,त्यामुळे आम्हाला गावोगाव भटकंती करणे गरजेचे आहे, परंतु असे करताना आम्ही  गावाच्या बाहेर रानात, वनात मुक्काम करत असतो, कोणालाही  गर्दी किंवा त्रास होऊ नये म्हणून याची काळजी घेत आहे ,या गोष्टीचाही शासनाने विचार करावा,, असे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मेंढपाळ बोलताहेत ,अाता।अनेक मेंढपाळ ड्राय भागातून बागायत भागात आल्याचे दिसून येत आहे.

शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र गडकरी )कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र लोकडाऊन सुरु असून या आपत्तीजनक परिस्तिथीत गोरगरीब सर्व सामान्य  कुटुंबांना कामधंदे नसल्याने पोटाचा प्रश्न पडत आहे  राज्याचे माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सिंधुताई विखे पाटील अन्नदान योजने अंतर्गत गोरगरिबांना पाच रुपयात भोजन पाकिटे देण्यात येत असून या योजनेचा सावळीविहीर  बु तालुका राहता येथे आज रविवार पासून शुभारंभ करण्यात आले                                                      सावळीविहीर येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर अंतरा अंतरावर गोलाकार निशाणी करून लाभार्थींना उभे करत शोषलं  डिस्टन्स  पाळत या भोजन पाकिटांचे वितरण करण्यात आले यावेळी राहाता कु उ बा समितीचे संचालक बाळासाहेब जपे सरपंच रुपाली आगलावे शिवाजी आगलावे गणेश आगलावे शांताराम आगलावे ग्राम पंचायत सदस्य व  कार्यकर्ते उपस्तिथ  होते यावेळी लोकडाऊनच्या नियमाचे पालन करून भोजन पाकीट वाटण्यात आले आहे  नोंदणी करण्यात आलेल्या सुमारे ७०० गरजवंतांना हि पाकिटे देण्यात आली या एका पाकिटामध्ये  लापशी व खिचडी होती यावेळी येथे चोख नियोजन  ठेवण्यात आले होते                                                                                         या योजनेमुळे गावातील गरजवंत व रस्त्या वरून येणाऱ्या जाणाऱ्या काही परप्रांतीय मजुरांनाही कार्यकर्त्यांनी हि अन्न  पाकिटे कार्यकर्त्यांनी स्वतः घेऊन मोफत वाटली हि योजना दररोज राज्यात लोवकडाऊ असे पर्यंत  सुरु राहणार आहे सर्वांनी अन्न पाकिटे  घेतांना सोशल डिस्टन्स पाळावे मास्क लावावे गर्दी करू नये असे आव्हान यावेळियावेळी करण्यात येत होते.

शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा )लॉकडाऊनमुळे सर्वजन घरात असतांना व कडक उन्हामुळे हैराण झालेले असतांना राहता तालुक्यातील काही भागात   काल सायंकाळी अचानक पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा जरी मिळाला असला तरी या अवकाळी पावसामुळे व वादळामुळे परिसरात अनेक वृक्ष पडली फांद्या पडल्या काही ठिकाणी छ परावरील पत्रे उडाली काहींचे मोठे आर्थिक नुकसानही झाले आहे मात्र सुदैवाने  कुठेही जीवित हानी झाली  नाही मात्र बराच वेळ वीज गायप झाली होती व  काही गावात अंधारात रात्रभर लोकांना  राहावे लागले काही दिवस असाच गडगडाटासह वादळी पाऊस काही ठिकाणी पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे आधीच लॉक डाऊनमुळे  मोठे आर्थिक नुकसान झालेले असतांना या वादळी पावसाने आजून त्यात भर पडू नये अशीच प्रार्थाना या परिसरातील शेतकरी व नागरिक करीत आहेत.

बेलापूर  (प्रतिनिधी  )-   कोरोनो मुळे  लांबणीवर पडलेला विवाह सोहळा काही मोजक्याच पाहुण्याच्या उपस्थितीत घरातच संपन्न झाला वधु वर यांनी सोशल डिस्टनचे नियम पाळत एकमेकाना आयुष्यभर सांथ देण्याची शपथ घेतली                  बेलापूर येथील रहीवासी रामेश प्रभाकर जगदाळे यांची मुलगी मयुरी हीचा विवाह निमगाव कोर्हाळे तालुका राहाता येथील पोपट दामोधर साळवे हाल्ली राहाणार चांदेगाव तालुका राहुरी यांचेशी ठराला होता विवाहाच्या पत्रीका देखील छापुन झाल्या होत्या पत्रीका वाटणार तोच कोरोनाचे संकट आले अन विवाह स्थगीत करावा लागला कोरोनामुळे लाँक डाऊन वाढतच चालल्यामुळे अखेर दोन्ही कुटुंबानी विवाह करण्याचे ठरविले विवाह करीता कशी  परवानगी मिळेल याची माहीती घेतली अन सोशल डिस्टनचा नियम पाळून मोजक्याच पाहुण्याच्या उपस्थितीत विवाह सोहळा उरकण्याचे दोन्ही कुटुंबांना सुचविण्यात आले त्या प्रामाणे दोन्ही कुटुंबानी एका घरातच हा विवाह सोहळा मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला .मुला मुलीचे आई वडील व इतर असे एकूण दहा जणांच्या उपस्थितीत   विवाह सोहळा संपन्न झाला  वधु वरांना  शुभाशिर्वाद देण्यासाठी मुला मुलीचे आई वडील दोन्ही मामा तसेच बाजार  समितीचे संचालक सुधीर नवले उपसरपंच रविंद्र खटोड पत्रकार देविदास देसाई विजय शेलार किरण शेलार सुहास शेलार आदि  उपस्थित होते.

शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा   -  राहाता तालुक्यातिल सावळीविहीर येथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांचा वाढदिवसा निमित् लॉक  डाऊनचे नियम पाळत वृक्ष रोपण  करण्यात आले तशेच गावातील गोर गरीब लोकांना या कोरोना मुळे  निर्माण झालेल्या  परिस्तिथीत किराणा किट वाटप करण्यात आले त्या प्रसंगी किरण जपे दिनेश आरने चंद्रकांत जपे कापसे आदींनी लोकडाऊन चे नियम पाळत गावात किराणा किट सह साबण व सॅनिटायझर वाटप केले शिवसैनिकांनी ह्या संकटकाळात गोर गरिबांना मदत केल्याने गोर गरिबांनी समाधान व्यक्त केले.

शिर्डी (राजेंद्र गडकरी)- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे ,चार मे पासून सुरू झालेल्या या लॉकडाऊन च्या तिसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा व काही  दुकाने उघडण्यास जरी परवानगी मिळाली आहे ,तरी स्थानिक प्रशासनाने दुकानांच्या वेळा ठरवून त्या वेळतच दुकाने उघडी ठेवावीत मात्र कोठेही गर्दी  करू नये ,अशी माहिती राहता तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे, लॉकडाऊन चा तिसरा टप्पा सुरू झाला असून ग्रीन, ऑरेंज व रेड झोन करण्यात आले आहेत, अहमदनगर जिल्हा ऑरेंज झोनमध्ये येतो अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुका कोरोना मुक्त आहे ,मात्र  यापुढेही  कोरोणाचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी  मोठी दक्षता घेण्यात येत आहे, शाळा महाविद्यालय मॉल्स बंदच राहणार आहेत, राहाता तालुक्यात ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा सहित काही दुकाने उघडण्यास परवानगी दिली असली तरी शासनाच्या आदेशान्वये  स्थानिक प्रशासन, कामगार तलाठी, ग्रामसेवक, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, यांनी आपल्या गावातील, शहरातील इतर दुकानांच्या वेळा ठरवून या वेळेतच दुकाने उघडी ठेवावीत दुकानात किंवा इतर ठिकाणी गर्दी करू नये , या काळात 144 कलम लागू राहणार आहे ,त्यामुळे कुणी रस्त्यावर ,गल्लीत ,सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरू नये, गर्दी करू नये ,कोणताही कार्यक्रम, समारंभ करू नये, लॉकडाउनचे पाळावेत, लॉक डाऊनचे नियम मोडले तर अशांवर कडक कारवाई करण्यात येईल ,असा इशाराही तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिला आहे, सर्व नागरिकांनी लॉक डाउन च्या आतापर्यंतच्या 40 दिवसात प्रशासनाला चांगले सहकार्य केले, असे सहकार्य 17 मे 20 20  पर्यंत  असणाऱ्या  लॉक डाऊन या काळात प्रशासनाला करावे, विनाकारण फिरू नये घरातच राहावे आपल्या आरोग्य आपल्या कुटुंबाचे आरोग्य आपल्या गावाचे आपल्या तालुक्याचे आरोग्य सांभाळावे राहता तालुका कोरणा मुक्त आहे व यापुढेही राहील यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे ,प्रशासनाला सहकार्य करावे लॉक डाऊन चे नियम पाळावेत ,असे आवाहनही तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.

शिर्डी (राजेंद्र गडकरी)-शासनाच्या परिपत्रकानुसार व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार एक मे पासुन सावळीविहीर बुद्रुक गावात कोरोना ग्रामसुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे, या समितीच्या अध्यक्षपदी सरपंच सौ.रूपाली संतोष  आगलावे(९९२२३६३७८३),तर सदस्य म्हणून कामगार तलाठी श्री सतीश भाऊसाहेब गायके,(९८६०८६८५२४) ग्राम विकास अधिकारी श्री रावसाहेब दगडू पा. खर्डे ,(९६३७९६३४९६), व सदस्य सचिव म्हणून पोलीस पाटील सौ.संगिता सुरेश वाघमारे,(७२७६६२६१८९) यांची नियुक्ती करण्यात आली असून या समितीमार्फत
कोरोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गावात येणाऱ्या व गावातून बाहेर जाणाऱ्या व्यक्तींची चौकशी व नोंद ठेवण्यात येणार आहे ,या कोरोना ग्रामसुरक्षा समितीमार्फत
 बाहेरून येणाऱ्या व्यक्तीस तहसीलदार यांची परवानगी असल्यासच गावात राहण्यास परवानगी मिळणार आहे,
विनापरवाना बाहेरून येणाऱ्या नागरिकांना येऊ न  देणे , परवानगी असणाऱ्या बाहेरून आलेल्या व्यक्तीसाठी आजपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावळविहीर बु!! येथील वर्ग खोल्या ताब्यात घेण्यात आल्या असून पुरुष-स्त्री स्वतंत्र्य विलगीकरण कक्ष तयार करण्यात आलेले आहेत.याबाहेरून आलेल्या व्यक्तीना विलगीकरण कक्षात१४दिवस राहणे बंधनकारक राहणारआहे,तसेच  कोरोना(कोविड 19) सदृश लक्षणे आढळल्यास तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रास कळवणे गरजेचे आहे.कोणीही परस्पर गावात आल्यास किंवा माहिती लपवून ठेवल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.येथून पुढे कोणीही गावात येणार असल्यास प्रथमतः समितीला संपर्क करावा, गावातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरांमध्ये बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तीला थेट प्रवेश देऊ नये, येणांऱ्या व्यक्ती संदर्भात ग्राम सुरक्षा समितीला त्वरित कळवावे, कोरोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वजण कसोशीने प्रयत्न करीत आहेत, कोरोणाचा संसर्ग टाळण्यासाठी ही कोरोणा ग्राम सुरक्षा समिती गावागावात नेमण्यात आली आहे, या समितीला प्रत्येक नागरिकांनी आपल्या आरोग्य व सुरक्षेसाठी सहकार्य करण्याचे आवाहान या सावळीविहीर बुद्रुक ग्रामसुरक्षा समितीचे अध्यक्ष सरपंच सौ, रूपाली संतोष आगलावे यांनी एका पत्रकान्वये केले आहे.

शिर्डी  (जय शर्मा )
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रयत संकुलातील एस.के. सोमैय्या प्राथमिक विद्या मंदिर या विद्यालयातील कु ,स्वानंदी सिद्धार्थ कोबरणे हिने जानेवारी २०२०मध्ये झालेल्या राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे.तिने एकूण २६६ गुण मिळवून श्रीरामपूर तालुक्यात ७वी, जिल्ह्यात 16 वी, तर राज्यात 18 वी  आलेली आहे. या परीक्षेला राज्यातून हजारोच्या संख्येने विद्यार्थी बसतात अश्या विद्यार्थ्यांमधून कुमारी स्वानंदी येणे राज्यात18वा क्रमांक मिळवला असून तिच्या या यशाबद्दल रयतच्या मॅनेजिंग कौसिल सदस्या श्रीमती मीनाताई जगधने, मुख्याध्यापक  श्री.दवंडे सर, मार्गदर्शक शिक्षिका  , श्रीमती चेडे मॅडम व शिक्षण प्रेमींनी, कौतुक केले आहे.

शिर्डी( राजेंद्र गडकरी)
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चांगली कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदके जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अकरा पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे,
  दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पोलिस महासंचालक पदक देऊन महाराष्ट्र दिनी एक मेला गौरविण्यात येत असते, यावर्षी सुद्धा राज्यातील चांगली कामगिरी करणाऱ्या व उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या आठशे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदके जाहीर झाली आहेत, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक एस ,के ,जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सर्व जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी, अधिकारी यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जातो ,त्यावरून राज्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी, सर्वजण आपापल्या परीने उत्कृष्ट काम करत असतातच, मात्र यामध्येही अधिक चांगले काम व उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी ,कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात येते व राज्यातील पोलिस अधिकारी ,कर्मचाऱ्यांचा उत्साह, जोश त्यामुळे वाढवण्याचा प्रयत्न होत असतो, सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत, अहोरात्र परिश्रम घेत आहेत ,अशा सर्व पोलिसांचे सर्वत्र राज्यभरातून ,देशातून अभिनंदन होत आहे ,अशा परिस्थितीत महाराष्ट्र दिन आला आहे, एक मे या महाराष्ट्र दिनी दरवर्षी राज्यात पोलिस महासंचालक पदके जाहीर होत असतात, त्याप्रमाणे ती नुकतीच जाहीर झाली आहे, राज्यातील एकूण 800 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदे जाहीर करण्यात आली आहेत, त्यापैकी अहमदनगर जिल्ह्यातील अकरा पोलीस कर्मचारी आहेत, पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सहाय्यक फौजदार काशीनाथ तुकाराम खराडे ,सहाय्यक फौजदार राजेंद्र सुपेकर, सहाय्यक फौजदार मधुकर शिंदे, सहाय्यक फौजदार अनिल गाडेकर, सहाय्यक फौजदार रवींद्र कुलकर्णी, पोलीस हेडकॉन्स्टेबल शैलेश उपासनी, पोलीस हेडकॉन्स्टेबल मन्सूर सय्यद ,पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास सोनार, सहाय्यक फौजदार अर्जुन बडे, पोलीस कॉन्स्टेबल अजित पठारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल तुकाराम सोनवणे आदीना पोलीस महासंचालक पदके जाहीर झाली आहेत, या सर्वांचे राज्याचे पोलिस महासंचालक एस,के जयस्वाल, तसेच नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अखीलेशकुमार सिंह व सर्व जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.

शिर्डी,प्रतिनिधि जय शर्मा )कोपरगाव तालुक्‍यात नोव्‍हेल कोरोना विषाणू प्रार्दूर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवीर राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्‍ट होऊ न शकलेल्‍या एपीएल (केशरी शिधापत्रिकाधारक) धारकांना मे,2020 व जून,2020 या दोन महिन्‍यांच्‍या कालावधीत सवलतीच्‍या दराने अन्‍नधान्‍याचा लाभ देण्‍यात येणार आहे. कोपरगाव तालुक्‍यात 16 हजार 777 शिधापत्रिकाधारक असून एकूण  65 हजार 146 लाभार्थी  आहेत. त्‍यांना 3 हजार 6 क्विंटल गहू व 2 हजार 3 क्विंटल तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. गहू 8 रुपये प्रतिकिलो या दराने प्रतिमाह प्रतिव्यक्ती 3 किलो व तांदूळ 12 रुपये प्रतिकिलो  या दराने प्रतिमाह 2 किलो असे  एकूण पाच किलो अन्नधान्य वितरीत करण्‍यात येणार आहे.
           शिधापत्रिकाधारकांच्‍या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्‍या नसतील अथवा शिधापत्रिकांचे आधार सिडींग झाले नसेल, तरी त्‍या शिधापत्रिकाधारकांना विहीत केलेल्‍या दराने व परिमाणात धान्‍य देण्‍यात येणार आहे. तसेच ज्‍या शिधापत्रिकाधारकांच्‍या शिधापत्रिकेवर बारा अंकी नोंदणी क्रमांक नाही त्‍या शिधापत्रिकाधारकांनाही  या योजनेचा लाभ घेता येईल. अन्‍नधान्‍य वितरणाची प्रक्रिया सुरु  करण्‍यात आली असून लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. कोणताही लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही, तसेच लाभार्थ्यांच्या तक्रारींचे तेथेच निराकरण होईल याची दक्षता सर्व संबधितांनी घ्यावी. असे आवाहन तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार, कोपरगांव योगेश चंद्रे यांनी केले आहे.

शिर्डी राजेंद्र गडकरी - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन सुरू  असून सर्व बंद आहे ,तरीही काही व्यक्ती विनाकारण व परवानगी न घेता या गावातून दुसऱ्या गावात जात असतात ,अशाच संगमनेर येथुन  ५ व्यक्तींना विनापरवाना,विनाकारण व मास्क न लावता। सावळीविहीरवाडीला आल्यानंतर व त्यांची माहिती पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी या व्यक्तींचा शोध लावून त्यांच्यावर  शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सावळीविहीर वाडी येथे ५व्यक्ती संगमनेर येथुनआल्यामुळे व त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे शिर्डी व सावळीविहिर परिसरात नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे,
  । कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे , राज्यात साथ निवारण कायदा लागू करण्यात आलेला आहे, शासकीय कर्मचारी, डॉक्टर पोलीस सर्वजण अहोरात्र प्रयत्न करीत आहेत ,मात्र या काळात घरात राहणे उचित असताना काही व्यक्ती विनाकारण व विनापरवाना या गावातून दुसऱ्या गावात फिरत असतात, त्यामुळे कोरोना चा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असते, हा धोका असूनही दिनांक 27 रोजी संगमनेर येथील मदिनानगर येथून ५ व्यक्ती  विनाकारण व विनापरवाना, गुपचुपपणे राहता तालुक्यातील सावळीविहीर वाडी येथे आल्या होत्या , शिर्डी पोलीसांनि  त्वरित सावळीविहीरवाडी गाठली व येथे येऊन अधिक तपास केल्यानंतर येथे मदिनानगर संगमनेर येथुन आलेल्या जब्बार अब्दुल पठाण वय 37 , सादीका जब्बार पठाण वय 31, निसार नूरमंहम्मद अन्सारी वय55, शबाना निसार अन्सारी वय 50, सुफिया निसार अन्सारी 24 अशा एकूण पाच व्यक्तीच्या तोंडाला मास्क न लावता, विनाकारण, विनापरवाना सावळीविहीरवाडी येथे आल्याचे स्पष्ट झाले ,त्यामुळे या  व्यक्तींची पोलिसांनी चौकशी केली असता ते कोणाला न सांगता संगमनेरहून सावळीविहीरवाडी येथे आले होते, त्यांच्या तोंडाला मास्क नसल्यामुळे,व लॉकडाऊन चे नियम तोडल्यामुळे,, संचारबंदी जारी असतानाही विनाकारण फिरणे, या सर्व आरोपांमुळे शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये या ५ व्यक्तींवरभा,द,वि,कलम१८८(२),२६९,२७१व सात रोग निवारण कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामध्ये तीन महिला आहेत, यामुळे मात्र शिर्डी सावळीवीहिर परिसरात नागरिकांमध्ये विविध चर्चा होत होत्या,
राहाता तालुक्यात असा प्रथमच गुन्हा दाखल होत असल्याची माहिती समजते, सध्या कोरोणामुळे लॉकडाऊन सुरू असताना, सर्व घरा-घरात असताना काही लोक जाणीवपूर्वक आपल्या गावातून दुसऱ्या गावाला जात असतात, असे कोणी नवीन लोक आपल्या गावात आल्याचे समजताच किंवा अनोळखी नवीन लोक येऊन राहत असेल तर त्यांची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनला द्यावी ,असे आवाहनही  शिर्डी पोलिसांनी केले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget