शिर्डी( राजेंद्र गडकरी)
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चांगली कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदके जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अकरा पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे,
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पोलिस महासंचालक पदक देऊन महाराष्ट्र दिनी एक मेला गौरविण्यात येत असते, यावर्षी सुद्धा राज्यातील चांगली कामगिरी करणाऱ्या व उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या आठशे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदके जाहीर झाली आहेत, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक एस ,के ,जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सर्व जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी, अधिकारी यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जातो ,त्यावरून राज्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी, सर्वजण आपापल्या परीने उत्कृष्ट काम करत असतातच, मात्र यामध्येही अधिक चांगले काम व उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी ,कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात येते व राज्यातील पोलिस अधिकारी ,कर्मचाऱ्यांचा उत्साह, जोश त्यामुळे वाढवण्याचा प्रयत्न होत असतो, सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत, अहोरात्र परिश्रम घेत आहेत ,अशा सर्व पोलिसांचे सर्वत्र राज्यभरातून ,देशातून अभिनंदन होत आहे ,अशा परिस्थितीत महाराष्ट्र दिन आला आहे, एक मे या महाराष्ट्र दिनी दरवर्षी राज्यात पोलिस महासंचालक पदके जाहीर होत असतात, त्याप्रमाणे ती नुकतीच जाहीर झाली आहे, राज्यातील एकूण 800 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदे जाहीर करण्यात आली आहेत, त्यापैकी अहमदनगर जिल्ह्यातील अकरा पोलीस कर्मचारी आहेत, पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सहाय्यक फौजदार काशीनाथ तुकाराम खराडे ,सहाय्यक फौजदार राजेंद्र सुपेकर, सहाय्यक फौजदार मधुकर शिंदे, सहाय्यक फौजदार अनिल गाडेकर, सहाय्यक फौजदार रवींद्र कुलकर्णी, पोलीस हेडकॉन्स्टेबल शैलेश उपासनी, पोलीस हेडकॉन्स्टेबल मन्सूर सय्यद ,पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास सोनार, सहाय्यक फौजदार अर्जुन बडे, पोलीस कॉन्स्टेबल अजित पठारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल तुकाराम सोनवणे आदीना पोलीस महासंचालक पदके जाहीर झाली आहेत, या सर्वांचे राज्याचे पोलिस महासंचालक एस,के जयस्वाल, तसेच नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अखीलेशकुमार सिंह व सर्व जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चांगली कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदके जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अकरा पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे,
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पोलिस महासंचालक पदक देऊन महाराष्ट्र दिनी एक मेला गौरविण्यात येत असते, यावर्षी सुद्धा राज्यातील चांगली कामगिरी करणाऱ्या व उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या आठशे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदके जाहीर झाली आहेत, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक एस ,के ,जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सर्व जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी, अधिकारी यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जातो ,त्यावरून राज्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी, सर्वजण आपापल्या परीने उत्कृष्ट काम करत असतातच, मात्र यामध्येही अधिक चांगले काम व उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी ,कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात येते व राज्यातील पोलिस अधिकारी ,कर्मचाऱ्यांचा उत्साह, जोश त्यामुळे वाढवण्याचा प्रयत्न होत असतो, सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत, अहोरात्र परिश्रम घेत आहेत ,अशा सर्व पोलिसांचे सर्वत्र राज्यभरातून ,देशातून अभिनंदन होत आहे ,अशा परिस्थितीत महाराष्ट्र दिन आला आहे, एक मे या महाराष्ट्र दिनी दरवर्षी राज्यात पोलिस महासंचालक पदके जाहीर होत असतात, त्याप्रमाणे ती नुकतीच जाहीर झाली आहे, राज्यातील एकूण 800 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदे जाहीर करण्यात आली आहेत, त्यापैकी अहमदनगर जिल्ह्यातील अकरा पोलीस कर्मचारी आहेत, पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सहाय्यक फौजदार काशीनाथ तुकाराम खराडे ,सहाय्यक फौजदार राजेंद्र सुपेकर, सहाय्यक फौजदार मधुकर शिंदे, सहाय्यक फौजदार अनिल गाडेकर, सहाय्यक फौजदार रवींद्र कुलकर्णी, पोलीस हेडकॉन्स्टेबल शैलेश उपासनी, पोलीस हेडकॉन्स्टेबल मन्सूर सय्यद ,पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास सोनार, सहाय्यक फौजदार अर्जुन बडे, पोलीस कॉन्स्टेबल अजित पठारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल तुकाराम सोनवणे आदीना पोलीस महासंचालक पदके जाहीर झाली आहेत, या सर्वांचे राज्याचे पोलिस महासंचालक एस,के जयस्वाल, तसेच नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अखीलेशकुमार सिंह व सर्व जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.
Post a Comment