Articles by "मनोरंजन"

गौरव डेंगळे/उत्तराखंड:मेघालय फेब्रुवारी किंवा मार्च २०२७ मध्ये राष्ट्रीय खेळांच्या आगामी आवृत्तीचे आयोजन करेल,भारतीय ऑलिम्पिक संघटनेने मंगळवारी (११ फेब्रुवारी) मेघालयच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पुष्टी केली.१४ फेब्रुवारी रोजी उत्तराखंडमध्ये ३८ व्या राष्ट्रीय खेळ २०२५ च्या समारोप समारंभात भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा ध्वज मेघालयकडे सुपूर्द केला जाईल.मेघालयातील राष्ट्रीय खेळांची आगामी आवृत्ती ही स्पर्धेची ३९ वी आवृत्ती असेल.

राष्ट्रीय खेळ २०१५ मेडल टॅली: मेघालय क्रमवारीत कुठे आहे?

मेघालय २०२५ च्या राष्ट्रीय खेळांच्या पदकतालिकेत एक सुवर्ण,२ रौप्य आणि २ कांस्य पदकांसह पाच पदकांसह ३० व्या स्थानावर आहे.त्यांनी कॅनोइंग आणि कायाकिंगमध्ये चार पदके जिंकली, एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले. ईशान्येकडील राज्याने रोईंगमध्ये कांस्यपदक जिंकले.

किरण देवी आणि बी आनंदी यांनी रोईंगमधील महिलांच्या लाइटवेट डबल स्कल स्पर्धेत मेघालयसाठी कांस्यपदक जिंकले. दरम्यान,स्लॅलम पुरुषांच्या K1 स्पर्धेत पिनश्नगेन कुर्बाहने कांस्यपदक पटकावले.

स्लॅलम पुरुषांच्या C1 स्पर्धेत इंद्रा शर्माने रौप्यपदक पटकावले. विकास राणाने कयाक क्रॉस पुरुषांमध्ये सुवर्णपदक जिंकले, तर एलिझाबेथ व्हिन्सेंटने ३८ व्या राष्ट्रीय खेळ २०२५ मध्ये कयाक क्रॉस महिलांमध्ये रौप्यपदक जिंकले.

कोपरगाव (गौरव डेंगळे): येथील सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आठ दिवस रंगलेल्या क्रीडा महोत्सवाची आज उत्साहात सांगता झाली.

वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुभाष पाटणकर व श्री दिलीप चाफेकर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे तसेच शाळेचे प्राचार्य श्री के एल वाकचौरे, उपप्राचार्या सौ शुभांगी अमृतकर, पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे,सौ पल्लवी ससाणे,सौ नैतीलीन फर्नांडिस आदींच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली आणि त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वागत गीताने सर्वांनी भरभरून दाद दिली.

यावेळी प्रमुख पाहुणे श्री सुभाष पाटणकर यांनी वार्षिक क्रीडा महोत्सव 2K24 आयोजित केल्याबद्दल शाळेचे कौतुक केले आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल आनंद व्यक्त केला.विद्यार्थ्यांनी आपल्या प्राचार्य आणि शिक्षकांकडून शिकावे आणि प्रत्येक कार्य पूर्ण करण्याचे ध्येय ठेवावे,असा सल्लाही त्यांनी दिला,जे विद्यार्थी खेळात चांगले असतात ते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अधिक उंची गाठू शकतात.

यावेळी शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना,वार्षिक क्रीडा महोत्सवाचे यशस्वी आयोजन शाळेच्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना समर्पित केले आणि खेळाचे महत्त्व सांगितले, शिस्तीने कोणत्याही कठीण प्रसंगावर मात करता येते.भीती काढून टाकणे,एकत्रितपणे काम करणे,दबाव व्यवस्थापित करणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे. आपल्या ध्येयाकडे वाटचाल करून आपली स्वप्ने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या व हा वार्षिक क्रीडा महोत्सव २०२४ यशस्वी करण्यासाठी सर्वांचे आभार मानले. तसेच खेळामध्ये शिस्त ही सर्वात महत्वाची असल्याचे सांगून क्रीडा महोत्सवातील सर्व स्पर्धक विजेते असल्याचे सांगून सर्व विजेत्यांचे व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन केले.

वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांसाठी बुद्धिबळ,टेबल टेनिस,थ्रो बॉल,व्हॉलीबॉल, कबड्डी,बास्केटबॉल,खो-खो तसेच वैयक्तिक खेळामध्ये भालाफेक,गोळा फेक, थाळीफेक,१००मी धावणे, २०० मी धावणे,४०० मी धावणे व ४×१०० रिले रेस ज्यामध्ये सर्वांनी उत्साहाने भाग घेतला. क्रीडा महोत्सव मध्ये प्रायमरीच्या विद्यार्थ्यांसाठी पोटॅटो रेस,थ्री लेग ऍड्रेस रेस,ऑफट्रॅकल रेस,लेमन स्कूल आधी स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते. सांघिक व वैयक्तिक खेळामध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सन २०२४-२५ चे शारदा क्रीडा महोत्सवाचे विजेतेपद गिरलायन्स संघाने पटकावले.

तसेच हर्षद फुकटे,परी गिरमे, सार्थक सोनवणे व अनामिका आहेर यांनी सर्वोत्कृष्ट क्रीडापटू होण्याचा मान पटकावला.सर्व क्रमांक प्राप्त खेळाडूंना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. वार्षिक क्रीडा महोत्सव यशस्वी करण्याकरीता शाळेचे सर्व शिक्षक,कर्मचारी,विद्यार्थी आदींनी अथक परिश्रम घेतले.

कोपरगांव (गौरव डेंगळे): नोकरी स्वीकारली की ती तन-मन-धनाने करावी.प्रत्येक कामामध्ये जर मनुष्याने आनंद शोधला की ते काम खूप सोपे होते.असेच काम राजेंद्र आव्हाड यांनी मागील ३० वर्षात केले असून यामुळेच त्यांनी नोकरी स्वीकारताना हसत स्वीकारले व सेवापूर्ती देखील त्यांनी हसतमुखानेच स्वीकारली आहे असे प्रतिपादन प्राचार्य के एल वाकचौरे यांनी आव्हाड यांच्या सेवापुर्ती सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने केले.

सोमैया विद्या विहार संचलित 


श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचे कार्यालयीन अधीक्षक श्री राजेंद्र खंडेराव आव्हाड यांनी विद्यालयात ३० वर्ष केलेल्या अविरत सेवेचा गुणगौरव म्हणून त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आनंदमय वातावरणात संपन्न झाला.यावेळी शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे,उप प्राचार्या शुभांगी अमृतकर,पर्यवेशिका प्रज्ञा पहाडे,पल्लवी ससाणे,नंथलीन फर्नांडिस,राम थोरे,शाळेचे जनसंपर्क अधिकारी दत्तात्रय सांगळे यांनी आव्हाड यांचा श्रीफळ,शाल व कला शिक्षक मंगेश गायकवाड यांनी रेखाटली फ्रेम देऊन गौरव करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ क्रीडा शिक्षक धनंजय देवकर, ज्येष्ठ शिक्षक बी के तुरकणे,उपप्राचार्या शुभांगी अमृतकर,दत्तात्रय सांगळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली निकम व कविता चांदन यांनी केले.

रमजान ईद मुबारक २०२३ 

ईद मुबारक दिन २२-०४-२०२३ 

"  इस्लाम समजून घेताना  "

।।।   ईद - उल  -फितत्र ;- आनंद - बक्षिसे मिळण्याचा दिवस,.....!!!

लेखक डॉ. सलीम सिकंदर शेख.

बैतुशशिफा दवाखाना ,श्रीरामपूर.

९२७१६४००१४ 

इस्लाम   अरबी शब्दाचा अर्थ " शांती --अमान '" 

 शांतीच्या मार्गावर चालणारा , अर्थात अमन पसंत.

भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री स्वर्गीय सौ. सुषमा स्वराज‌जी . या युनोच्या संमेलनांमधे  सहभागासाठी गेल्या होत्या . जगातील नेत्यांसमोर भाषण करताना , इस्लाम चा  हिंदी भाषेमधील अर्थ पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना आपल्या  परखड ओघवत्या  शैलीत सुनावले की "  इस्लाम शब्द का  अर्थ शांती होता है  ; " " " शांती 'होता है "  शांती " ,  और अंग्रेजीमे  अर्थ. "पीस..पिसफुल"  है ., आपको शायद तो पता है  ; और मालुम  होना भी चाहिए ‌ ;;  याद भी होना चाहिऐ  "   जबरदस्त भाषणाची सुरुवात करून पुन्हा पुढे संपूर्ण भाषण ओघवतं झाले.असो...!!!

इस्लाम मुळात जगात आलाच  अराजक परिस्थितीत निर्माण झालेली , नितीमत्ता शिल्लक राहिलेले नव्हती , बाप जन्मालेल्या जिवंत मुली गाडुन बक्षिसे मिळवीत होता , नाद गाणं नंगानाच हैदोस घातला जात होता, प्रत्येक माणसांकडे रणडया  या प्रतिष्ठेचं चिन्हं समजलं जातं होते , प्रत्येक घराघरात दारू तर प्रतिष्ठेची बाब झाली होती . सावत्र आईशी ही लग्न करण्याला चुकीचे समज नव्हते.. नितीमत्ता शिल्लक राहिलेले नव्हती. पत्नी फक्त हौसेचे साधन म्हणून वापरली जात होती. महिलांना तर कवडीमोल किंमतीत उपलब्ध होत होती. एवढ्या मोठ्या भयानक परिस्थिती एक उगवता सूर्य चंद्र त्या अरबी भुमीत सच्चा न्यायीक व्यक्ति अल्लाह ने प्रेषित म्हणून हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या रुपाने रानटी वाळवंटात प्रेमाचा संदेश देण्यासाठी पैंगंबर म्हणून पाठवलेत. त्याचबरोबर अल्लाहने आपला संदेश घेऊन  ईशदुत हजरत जिब्राईल (जिब्राल्टर) अलै. यांच्या द्वारा वेळोवेळी मानव-कल्याणासाठी संदेश घेऊन २३ वर्ष घेऊन आलेत ,त्याच २३ वर्षाच्या अभुतपूर्व क्रांती ने आज १४४४ वर्ष जगाला दिशा देण्याचे काम केले. त्याच  दिशेने बघुया..

प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांना अभुतपूर्व क्रांती घडवून आणण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील व भिती ही दाखवावी लागेल, आळशी वाळवंटातील लोकांसाठी काही उत्साही वातावरण निर्माण करणे गरजेचे होते. पुढे बघू या.

इस्लाम लोकांना  अल्लाह (ईश्वराचे ) भय बाळगण्याचे तसेच  संपूर्ण समर्पण करण्याचा आदेश देतो .एकाच अल्लाह ( ईश्वरा) ची आराधना करावी. अर्थात एकेश्वरवादाची शिकवण देतो . या जगात आणु - रेणु - चंद्र - सुर्य - तारे - पृथ्वी - हे ब्राह्मंड ( गॅलॅक्सि , Univers) चे प्रत्येक क्षण - क्षण,कणं न कणं निर्माण करून तो आप- आपल्या काटेकोर वेळा पाळुन चालवणारा फक्त एकटाच अल्लाह ( ईश्वर) आहे. माणवजातीला जन्माला घालणारा ही तोच अल्लाह आहेत व परलोक घेऊन जाणारा ही तोच अल्लाह आहेत. मनुष्य फक्त एक नाटकातील पात्रे आहेत... म्हणुनच " अल्लाहु अकबर "  या तीनही लोकांत, सृष्टीला चालवणारा फक्त एकटाच अल्लाह (ईश्वर)आहे.म्हणुन एकाच अल्लाह( ईश्वरा)ची आराधना करावी म्हणजे एकेश्वरवादाची शिकवण. असो.

त्यासाठीच , हजरत मुहम्मद स्व सल्लम यांना मानव कल्याण - जन सुधारणा  मार्गदर्शन करण्यासाठी प्रेषित- पैंगंबर -संदेश वाहक  म्हणून अंतिम प्रेषित म्हणून घोषित केले..

  प्रेषित मुहम्मद स्व सल्लम यांना एका खेड्यूतांनी प्रश्न विचारला, " पैंगंबर मुहम्मद स्व सल्लम ," " दिईन ( धर्म) म्हणजे काय ??

लगेच उत्तरादाखल तीन वेळा एकच वाक्य उच्चारले, " अद् - दिईन - नु - नसीह‌..!  , अद् -दिईन -नु -नसीह!! , अद्-दिईन- नु- नसीह !!! 

अर्थात:- !  लोक- कल्याण -हाच- दिईन ( धर्म‌) आहे !

             !! लोक -कल्याण- हाच -दिईन (धर्म‌ )आहे !!

            !!! लोक- कल्याण -हाच- दिईन (धर्म‌ )आहे !! 

अल्लाहच्या लोक- कल्याणकारी योजना राबविण्यात आल्यात . 

ईस्लामचे  संस्कार मूल्यं:-  "  आपल्यासमोर कोणी लहान- मोठ्ठां , पुरुष -महिला - दिसताच, त्यांना आदराने :- "अस्सलामुआलैकुम- व- रहमतुल्लाह -व - बरकातहु " असा नमस्कार घालतात , अर्थात " तुमच्यावर आल्लाहाची शांती असो - कृपादृष्टी-दया- बरकत असो ". या वाणीत  जिव्हाळा - विश्वास - प्रेम भावना व अल्लाह चे आशिर्वाद सुध्दा   !! 

  = उत्तरादाखल समोरील बांधव  त्याला  , " वालेकुम-स्सलाम - व- रहमतुल्लाह -व- बरकातहु ".  अर्थ ही तसाच मार्मिक ;- " माझ्याप्रमाणे तुझ्यावरही  अल्लाहची शांती - कृपादृष्टी - बरकात असो." म्हणजेच डब्बल आशिर्वादच . 

 उत्तराने समोरच्या  मनाला   प्रेम ,वात्सल्य ,  मनाला आपुलकीने 

  चांगले चिंतित आहेत. आपुलकीच्या उत्तराने किती हायसे वाटत असणार ,. कितीही मोठा- मनुष्य-.गरीब - भिकारी- मालक  , एक गुन्हेगार  असो.  सात जन्माचा दुश्मन असला ,तरी ,  किंवा बादशहा ला एक गुलाम , किंवा ‌कैदेत असणाऱ्या गुन्हेगाराला बाहेरून येणाऱ्या बादशहा -राजा सुध्दा  अशाच प्रकारे  अदरानेच " सलाम " करणार  -व -  पुन्हा समोरच्या कडून उत्तर  ही  याच भावनेने  येणार - देणार..!!

किती आदरयुक्त -प्रेमाची भावना इस्लामने जगाला दिली आहे ..

म्हणूनच , प्रेषित हजरत मोहम्मद सल्ल. , सांगितले आहे की , " कोणी उच्च- निच नाही  , कोणी श्रेष्ठ नाही , कोणी मालक नाही , कोणी काळा व  गोरा नाही ,  सर्व समान एकाच अल्लाह ने  निर्माण केले आहे.    समता बंधुताची शिकवणी दिली .

  तुमचा मित्र , नातेवाईक  कोणी खूप दिवसांनी आला तर त्याचे स्वागत एकमेकास आलिंगन - गळे भेटून देतात यामुळें एकमेकांच्या हृदयात - मनामध्ये  तुम्ही मिसळले जाऊन , एक प्रकारे विरोध नाहीसा होतो.   कट्टर दुश्मन असेल ; तरी  समोर जेव्हा समेट घडवून आणला जातो  ,तर  ,त्यावेळेस एकमेकांची गळाभेट घेऊनच  दुश्मनी संपवतात .

प्रेषीत मुहम्मद स्व . सल्लमांनी  सांगितले  ," तुम्ही तीन दिवसांपेक्षा जास्त काळ अबोल राहता कामा नये नाहीतर तुम्ही मुसलमानच नाही ".

प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांनी. सांगितले ," तुम्ही एकमेकांत समेट घडवून आणा व अल्लाहला   समेट घडवून  आणणारे जास्त प्रिय आहे."

 प्रेषीत मुहम्मद स्व. सल्लम म्हणतात ,"  सर्व प्राणीमात्र ईश्वराची लेकरेआहेत म्हणून त्याने निर्माण केलेल्या मानवाशी प्रेम करतो , सर्व मानवजातीस सामाजिक न्याय देतो .

 पवित्र कुरआन म्हणतो की, " आम्ही तुम्हाला सर्वांना एकाच स्री व  एकाच पुरुषा पासून निर्माण केले आहे , ; मग तुमचे विविध राष्ट्र -देश - विविध ( कबील्यांत) भावक्यात व  विविध वंशात विभागले गेले ; जेणेकरून तुम्हाला एकमेकांना ओळखता यावे  ; परंतु अल्लाह जवळ श्रेष्ठ तोच असणारं आहे जो चारित्र्याने श्रेष्ठ असणारा आहे " (  पारा नं. २६ ,सुराह नं ४९ सुराह हुजूरात आ.नं.१३ वी )

         ‌‌दिव्य कुरआन म्हणतो की ," ज्याने अनुरेणू इतके सत्कर्म केले असेल त्याचे फळ त्याला   तितकेच मिळेल ;   व ;  ज्याने  जितके दुष्कर्म ,कुकर्म ,वाईट कर्म त्याचे फळ त्याला  त्याचप्रमाणे भेटतील".  

अल्लाह ने पैगंबर मार्फत दुष्कर्म करणाऱ्यांना दोजख ( नरका) ची भिंती दाखवून  त्याच कुकर्म करणाऱ्या कडून सदाचार करून घेतले. जे अरब लोक जिवंत मुली गाडुन बक्षिसे मिळवीत होते तेच अरब लोक मुलींचे उत्साहाने कन्यादान करण्यात सबाब समजू लागले. महिलांना मान सन्मान मिळू लागला. 

गरीब -गरजू - अनाथ मुलांना - पीडीतांसाठी जकातीचे पैशे वाटून खुशाली आली कालांतराने गरीबांच्या अर्थव्यवस्थे मोठी होऊन गरीब लोक जकात देण्याची पात्रता निर्माण झाली..

अल्लाह चे भय व कठोर कायदे आणुन अराजकता माजलेल्या वाळवंटात प्रेमाचा संदेश व सुव्यवस्था अबाधित झाली. 

श्रीमंत लोकांना गरीबीची जाणीव होण्यासाठी रमजान मुबारक रोजा ठेवणं अनिवार्य करण्यात आले . यामुळे प्रत्येक श्रीमंत लोकांना गरीबीची, भुकेले कसे जगत असणार याची जाणीव निर्माण होऊन त्यांच्या जकातीच्या पैशातुन गरीबांच्या अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारली गेली 

आपण  २९  दिवस  उन्हाळ्यात अल्लाहच्या मर्जी संपादन करण्यासाठी रोजे  ठेवून अल्लाहाचे आराधना- उपासना- ईबादत- नामस्मरण केले .  खुप तहान लागलेली असतानाही अल्लाहच्या मर्जी साठी भुकेची तमा न बाळगता १३-१४ तास  सहन केले,  तसेच घरातील  चार- पाच वर्षाच्या  लहान  बाळगोपालांनीही भर उन्हाळ्यात रोजे ठेवुन , तरावीह नमाज , दिवसभराचे पाच वेळी नमाज आदा केलीत ,  अजूनही कामधंदे -व्यवहार  सुरळीत झाले नसले ,  तरी , आपले अर्थीक गणिते संभाळून  प्रपंचाची अर्थव्यवस्था  व्यवस्थित करून . जकात- सदकाह - फितत्राह आजुबाजूच्या गरजू-पीडित-बेसहारा ,अनाथ ,विधवा तसेच योग्य व्यक्तीला  दानधर्म देऊन ,  सामाजिक बांधिलकी जपली. तसेच कळत- नकळत काही चूक तर झाली नाही ना हे क्षनोक्षनी याची काळजी घेऊन ,‌ २९ रोजे  सहन करुन   पुर्ण करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले . अल्लाहाशी  निरोगी आयुष्यासाठी , मुक्ततेची  क्षनोक्षनी दुआ केली. 

,जगातील  सर्व प्राणी - मानवांना  निरोगी आयुष्यासाठी रोजा ठेवून  , स्वतः उपाशी राहून  , दुसऱ्या समाजातील बांधवांना जे  बेघर आहेत ,उपाशीपोटी आहेत ,आशां गरजूंना  अन्न-पाणी , औषधे, झोपण्यासाठी निवारा व  पायी चालणाऱ्यां वाटसरूंना  चप्पल , मानसिक आधार दिला .मदत  केली‌,

     ‌तसेच  भारतीय बांधव आहोत . आपण सर्व बंधुभाऊ -भाई- भाई आहोत ,  पहाटे पासून.ते संध्याकाळ पर्यंत जेवढे काही करता आले तेवढी समाज सेवा अल्लाह (ईश्वर)  सेवा  तन-मन-धना ने   करून  आपण कोणत्याही लोभाची, कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता येवढं सगळे केलं . 

हे सर्व लोक कल्याण -हाच-दिईन धर्म‌ मध्ये च येते म्हणून ..

       प्रेषित मुहम्मद स्व यांना विचारला गेलेला प्रश्न ,"  दिईन धर्म‌ म्हणजे काय ? " 

प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांनी ,उत्तरादाखल तीन वेळा एकच वाक्य उच्चारले की " अद् -दिईन-  नु -नसीह " 

अर्थात :- " लोक कल्याण हाच (धर्म  ) दिईन  नु नसीह  "!! .

हे सर्व समजून उमजून घेऊन अल्लाह व प्रेषित मुहम्मद स्व सल्लम यांची मर्जी संपादन करण्यासाठी सहन केलत , खरोखरच सहनशीलता दाखवली याचं फळ , बक्षिसे अल्लाह ( ईश्वर) जरुर आपण केलेल्या सहनशीलतेप्रमाणेच निश्चितच मिळणार आहे, अल्लाहचा  बक्षीस-ईनाम प्राप्तीचा  दिवस आहे . निश्चितच  आपल्याला अल्लाहा बक्षीस  देणारच आहे  ,    कोणाला  किती हे आल्लाहा च ठरवणारे आहेत .जसे आपली आईवडील आपल्या मुलांची परीक्षा घेतल्यानंतर बक्षिसे देतात ,

 प्रेषीत मुहम्मद स्व. म्हणतात कि, " अल्लाहा आपल्याला ७०  आई पेक्षा ही जास्त प्रेम करतो ,'"

एक आई  लेकराला जेवढे प्रेम करीत असते ,ते अल्लाहा( ईश्वर) आहेत ,विचार न केलेला बरं." आल्लाहा जीवसृष्टीच्या प्रत्येक जीवजंतू वर आई सारखेच प्रेम करतात ,

 अल्लाह( ईश्वर) चा आजचा ईदु-ल - फितर चा  इनाम-बक्षीस- पारितोषिक वितरणाचा दिवस आहे . पारितोषिके तर मिळणारच आहे...

    आपला बंधुभाव -एकात्मता -स्नेह वृद्धिंगत व्होवो हीच अल्लाहा रबबुल आलमीन जवळ दुआ मांगतो....आमीन .... 🌹🌹🌹

(ईद - उल - फितत्र ) रमजान ईद मुबारक हो ... शुभेच्छा. 🌹🌹🌹

लेखन :- डॉ सलीम सिकंदर शेख 

बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर

    9271640014.

🌹🌹 @ डॉ @ स@ ली@ म@ शे@ ख@

श्रीरामपूर(गौरव डेंगळे):विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या कष्टाच्या प्रेमात पडावे.आज विद्यार्थीचे ध्येय दिवसाला दीड जीबी डाटा संपवणे बनलेले आहे.दीड जीबी डाटा रोज संपवणे आजच्या तरुण पिढीचे राष्ट्रीय कर्तव्य बनले आहे का? असा सवाल उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी श्रीरामपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या ४७ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थित केला.न्यू इंग्लिश स्कूलचे महत्व विशद करताना त्यांनी हे ही सांगितले की आई ही मुलांची पहिली शाळा आहे,तर शाळा ही मुलांची पहिली आई असते.

आजची तरुण पिढी सोशल मीडियाचा वापर चुकीच्या पद्धतीने करत असून यासाठी पालकांनी आपल्या मुला-मुलींवर विशेष लक्ष दिले पाहिजे.विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर अतिशय काळजीपूर्वक व आपल्या अभ्यासातील प्रगतीसाठी करावा.पोलीस दलातील माणसे हे परग्रहावरील नसून ती आपल्यातलीच आहे असं प्रत्येकाने समजलं पाहिजे. पोलीस दलामध्ये कार्य करत असताना त्यांनी आपले अनेक अनुभव विद्यार्थ्यां व पालकांसमोर श्री मिटके यांनी व्यक्त केले.

वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संदीप मिटके,अविनाश कुदळे, श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राम टेकावडे,अनुजा टेकावडे,प्रतीक्षित टेकावडे,बाळासाहेब ओझा,विधिज्ञ दादासाहेब औताडे,संगीता कासलीवाल, अरुण पुंड,प्राचार्या जयश्री पोडघन,प्राचार्य डॉ योगेश पुंड आदींच्या हस्ते दीप प्रज्वलाने झाली.यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक सत्र २०२१-२२ वर्षातील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून हिरण जेठवा हिचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात २०१९ ते २०२१ पर्यंत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.यानंतर ज्युनिअर के जी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्य आविष्काराने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं व वाहवा मिळवली.

 वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करताना शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय येथे जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा संपन्न झालेल्या.१४ वर्ष वयोगटातील मुलीच्या कबड्डी स्पर्धात हरेगाव येथील संत तेरेसा गर्ल्स हायस्कूल संघ विजेता ठरला आहे.

या १४ वर्ष वयोगटातील मुलीनी कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत उपांत्य फेरीचे लढतील श्रीगोंदा तालुका तर अंतिम सामन्यात नेवासा तालुका संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. शालेय विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी सदर संघ अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करेल. विजयी संघाचे संत तेरेसा गर्ल्स हायस्कूलच्या प्राचार्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती, शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वी संघाला क्रीडा शिक्षक नितीन बलराज यांचे मार्गदर्शन लाभले.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): येथील श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचा श्रीराम अकॅडमी सीबीएससी स्कूलचा टेबलटेनिस १४ वर्षाखालील मुलांचा संघाने शालेय जिल्हास्तरीय टेबलटेनिस स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले. सोमवार दि २८ नोव्हेंबर रोजी सोमय्या विद्यामंदिर साखरवाडी कोपरगाव येथे जिल्हास्तरीय शालेय १४,१७ व १९ मुलांच्या टेबल टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते.१४ वर्षाआतील मुलांच्या गटांमध्ये जिल्हाभरातून १५ शाळांनी सहभाग नोंदवला होता. अंतिम सामन्यात श्रीराम ॲकॅडमी संघाने दि ग सराफ संगमनेर संघाचा पराभव करून शालेय जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.या विजेत्या संघातील चिराग दुधेडिया ,सक्षम दळवी ,श्लोक ढाके,अभिज्ञान वेंकटरमन,वेदांत कोरडे आदींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तसेच १७ वर्षाआतील श्रीराम अकॅडमी मुलांच्या संघाने शालेय जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री रामशेठ टेकावडे,सचिव प्रत्यशित टेकावडे,सदस्य जन्मजय टेकावडे, प्राचार्या जयश्री पोटघन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी संघाला क्रीडाशिक्षक अल्ताफ शेख यांचे मार्गदर्शन लाभले.

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) - येथील मोरया डान्स ॲकेडमी मार्फत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. फॅशन शो स्पर्धेत कुु. अवनी सलालकर हिने लहानगटात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच ऑनलाईन डान्स स्पर्धेमध्ये देखील यश संपादन केले.

मोरया डान्स ॲकेडमीचे संचालक कासिम सय्यद यांनी श्रीरामपूरात डान्स क्लास सुरू करून मुलामुलींच्या कलागुणाला संधी निर्माण करून दिली आहे. यावेळी विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला होता.

कार्यक्रमासाठी अर्जूनभाऊ दाभाडे, मोरया डान्स ॲकेडमीचे संचालक कासिम सय्यद, बाळासाहेब गायकवाड, राहूल शिरसाठ, शिक्षक नेते नवनाथ अकोलकर, शेख, सौ. प्रतिमा साळुंके, सौ प्रियंका गंगवाल, सौ वैशाली गायकवाड, सौ. विना सुखदरे, सौ संगिता अकोलकर, श्रीमती अमृता अकोलकर आदि मान्यवरांचे हस्ते पुरस्कार देण्यात आले. सौ प्रियंका गंगवाल यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. 


दीपिका पादुकोण (Deepika Padukone) और रणवीर (Ranveer Singh) जल्द ही माता-पिता बनने वाले हैं, इस बात का खुलासा रणवीर सिंह के इंस्टाग्राम लाइव के दौरान हुआ.
रणवीर सिंह (Ranveer Singh) और एक्ट्रेस दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यूं तो अपने अतरंगे अंदाज के लिए सोशल मीडिया पर छाए रहते हैं, लेकिन हाल ही में दीपिका और रणवीर अपने चैट सेशन को लेकर चर्चा का विषय बने हुए हैं. दरअसल, हाल ही में एक्टर रणवीर कपूर इंस्टाग्राम पर लाइव आए थे, इस दौरान उनकी पत्नी और एक्ट्रेस दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ने एक शरारत भरा कमेंट किया. दीपिका ने रणवीर को लिखा, 'हाय डैडी.' इसके साथ ही उन्होंने एक वेविंग इमोजी के साथ ही, एक बेबी इमोजी और हार्ट इमोजी भी पोस्ट किया. दीपिका के इस कमेंट ने सोशल मीडिया यूजर्स को ये सोचने पर मजबूर कर दिया कि कहीं दीपिका प्रेग्नेंट तो नहीं हैं.

दीपिकान कक्करने नुकतीच एक नवी कार खरेदी केली आहे. या कारला घेऊन दोघेही खूप एक्सायडेट आहेत. या कारची भारतातील किंमत जवळपास 75 लाख रुपये आहे.  दीपिकाने शेअर केलेल्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेक फॅन्सनी तिला नव्या कारबददल शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोला दीपिकाने कॅप्शन देखील दिले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget