बिल्डर लाॕबीच्या सांगण्यावरुन घरकुल योजनेत बाधा आणल्यास लाभार्थ्यांचा आमदारांच्या कार्यालयावर मोर्चाचा सौ.साळवींचा इशारा

बेलापूरःबेलापूरची घरकुल योजना पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा. यांचे संकल्पनेनुसार सुरु आहे.सदर योजनेबाबात आमदारांना बिल्डर लाॕबीकडून चुकीची माहिती दिली जात असल्याने आमदार अधिकाऱ्यांवर दबाव आणून आडकाठी आणित आहेत.वास्तविक सदर योजनेच्या स्वरुपास व योजनेस आमदारांनी आमसभेमध्ये संमती दिली.आता तेच  गोरगरीबांच्या सदर योजनेस सहकार्य करणेऐवजी ह्या योजनेत बाधा आणित आहेत.यामुळे गोरगरीब बेघरांना योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे.त्यामुळे आमदारांनी चुकीची माहिती देणा-यांच्या सांगण्यावरुन घरकुलाचे कामात बाधा आणल्यास घरकुल योजनेच्या  लाभार्थ्यांचा आमदारांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सरपंच  मिनाताई साळवी यांनी दिला आहे.               सौ.साळवी म्हणाल्या की,बेलापूरची घरकुल योजना हि राज्यात आदर्श ठरावी यासाठी नाम.विखे पा. व नाम.गोरे यांनी काही मार्गदर्शक सुचना केल्या.सदर योजनेबाबत आमदारांनी आयोजित केलेल्या आमसभेत सविस्तर चर्चा देखिल झाली.यावेळी योजनेचे सविस्तर स्वरुप व तपशील सविस्तरपणे मांडण्यात आला.तेव्हा आमदारांनी त्यास संमती दिली. माञ या योजनेमुळे बिल्डर लाॕबीच्या हितसंबंधास  बाधा येणार असल्याने  सुधीर नवले,भरत साळुंके ,रविन्द्र खटोड आदि नेत्यांनी काही जणांना चिथावणी देवून मोर्चे,उपोषणे करायला लावले.तसेच या कानभ-या नेत्यांनी आमदारांना चुकीची माहिती देवून अधिका-यांवर दबाव आणणे भाग पाडले.अशाच त-हेने या महाभागांनी महिलांच्या सार्वजनिक शौचालयाला विरोध करुन ते काम बंद पाडले.एकीकडे हे महाभाग स्वतःला नाम.विखे पा.यांचे सरर्थक म्हणवतात तर दुसरीकडे नाम.विखे पा.यांच्या संकल्पनेतील घरकुल योजनेस विरोध करण्याचा  दुटप्पीपणा करतात असा आरोप सौ.साळवी यांनी केला.                                                             घरकुल योजनेचे काम चुकीच्या पध्दतीने होत असल्याचा आरोप तथ्यहिन असून हि निवडणुका जवळ आल्याने होणारी राजकीय स्टंटबाजी आहे.आरोप करणारांनी तक्रारीत नमुद केल्यानुसार  घरकुल योजना राबवायची तर उपलब्ध जागेत फक्त ५३७ इतकीच घरकुले बसतील.यामुळे ५०० लाभार्थ्यांना घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागेल.या वंचित ५०० लाभार्थ्यांना घरकुले देण्याची जबाबदारी आमदार व तक्रार करणारे घ्यावयास तयार आहेत काय आसा सवाल सौ.साळवींनी उपस्थित केला.                    अशी वस्तुस्थिती असल्याने आमदारांनी या योजनेच्या कामाची समक्ष  पाहणी करुन योजनेची सविस्तर माहिती घ्यावी. चुकीच्या माहितीला बळी पडून स्वतःची अडचण करुन घेवू नये.अशाचत-हेने काहिजणांच्या चुकीच्या माहितीवरुन आमदारांनी टिळकनगर इंडस्ट्रिजबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याने त्यांना कामगारांसह नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागले होते.तसेच नंतर दिलगीरी व्यक्त करावी लागली होती याची आठवण ठेवून आमदारांनी चुकीच्या माहितीच्या आधाराने घरकुल योजनेत बाधा आणून गोरगरीब लाभार्थींचा रोष पत्करु नये.अशाच पध्दतीने दत्तनगर येथे रो हऊसिंग पध्दतीचे काम केले जात आहे.तोच पॕटर्न नाम.विखे पा.यांचे सुचनेवरुन स्विकारुन घरकुलांचे काम सुरु आहे.तेव्हा आमदारांनी बिल्डर लाॕबीच्या दिशाभुलीला बळी पडून गोरगरीबांना उघड्यावर पाडू नये असे.उलट या योजनेस मार्गदर्शन  व सहकार्य करावे.तसेच ग्रामस्थांनी आमदारांना मते दिली असल्याने गावातील अरुणकुमार वैद्यपथ,मेनरोड-केशव गोविंद मंदिर रस्ता,कु-हे वस्ती, जामा मशिद - गणपती  मंदिर-ते महादेव मंदिर रस्ता आदि रस्त्यांचे कामांना आमदारनिधी द्यावा असे आवाहन सौ.साळवी यांनी केले आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget