Articles by "news"

श्रीरामपूरःई.पी.एस ९५ योजनेतील सारूवजनिक व खाजगी क्षेञातील निवृत्तीधारकांच्या मगणीनुसार अर्थसंकल्पात निवृत्तीवेतन वाढिसाठी काहिच तरतूद केली नाही.याचे निषेधार्थ व निवृत्तीवेतन वाढिची मागणीकडे सरकारचे रक्ष वेधण्यासाठी आता ९ ते ११ मार्च दरम्यन दिल्ली येथील जंतरमंतर येथे आंदोलन करण्यात येणार असून निवृत्तीधारकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रिय संघर्ष समितीचे पश्चिम भारत प्रमुख सुभाष पोखरकर यांनी केले.          

          बाभळेश्वर येथील  यशवंतराव चव्हाण सभागृहात ईपीएस ९५ पेन्शन धारकांच्या मेळाव्यास संबोधित करताना श्री.पोखारकर बोलत होते.मेळाव्यास जिल्हाध्यक्ष श्री.संपत समिंदर, महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती आशाताई शिंदे,नगर शहर कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब देशमुख, शिर्डी अध्यक्ष श्री दशरथ पवार सर, संगमनेर अध्यक्ष श्री अशोक देशमुख यांनी संबोधित केले.चर्चेत श्री शिवाजी शितोळे, श्री राठोड श्री इनामदार श्री कडू यांनी सहभाग घेतला.

           पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर यांनी कमांडर  राऊत यांचे नेतृत्वाखाली चालू असलेल्या आंदोलनाबाबत सविस्तर माहिती दिली.तसेच अर्थसंकल्पात  तरतूद न झाल्याने दि.९ ते ११ मार्च २०२६ ला दिल्लीमध्ये जंतरमंतर वर होणा-या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.     

        यावेळी श्री. लक्ष्मण हासे, श्री. अरसुळे, श्री. अर्जुन जाधव, श्री. सुरेश कटारिया, श्री. रायभान तुपे , श्री. चेडे, श्री. खंडीझोड श्री. केशव वर्पे यांची विशेष उपस्थिती होती.प्रास्ताविक श्री चिंतामणी यांनी केले तर आभार श्री गोविंद जगताप यांनी मानले.

बेबेलापूर (प्रतिनिधी)- कसलीही माहिती उपलब्ध नसताना मनोरुग्ण असलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेवुन बेलापूर पोलीसांनी त्या व्यक्तीस नातेवाईकांच्या ताब्यात दिले मनोरुग्ण मुलाला पहाताच आई व भावाला गहीवरुन आले . पोलीसातील माणूस आजही जिवंत असल्याची भावना आई अलका ससाणे यांनी व्यक्त केली.                             वाहेगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर येथील सोमनाथ नंदकुमार ससाणे हा मनोरुग्ण आहे .त्या अवस्थेत त्याने घर सोडले व भटकत भटकत तो उक्कलगाव येथे पोहोचला. येथील शिंदे वस्तीत गेल्यावर त्याने आरडाओरड सुरु केली अशोक शिंदे ,शुभम शिंदे,वैभव शिंदे, प्रमोद शिंदे यांनी तातडीने युवा नेतृत्व युवराज थोरात यांना माहिती दिली. युवराज थोरात पोलीस पाटील हिराबाई मोरे , इंद्रजित मुसमाडे ,मुकेश जगधने, दिपक पवार ,सोन्या खेमनर यांच्या सह शिंदे वस्तीवर पोहोचले त्यांना वाटले चोर असावा परंतु तो निरर्थक बडबड करीत होता. तो काहीही बोलू लागला. कुणाच्याही घरात जावु लागला रस्त्यावर बसुन लोळू लागला .युवराज थोरात व पोलीस पाटील हिराबाई मोरे यांनी तातडीने बेलापुर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल संपत बडे यांना या बाबत माहिती दिली संपत बडे तातडीने तेथे आले त्यावेळेस योगेश ससाने याच्या खिशात काहीही आढळून आले नाही. त्याला माहिती विचारली असता तो केवळ ससाने इतकेच सांगत होता त्यामुळे काय करावे हा प्रश्न बडे यांना पडला त्यांनी त्याला खोदून खोदून विचारले परंतु त्याला काही नाव गाव पत्ता काहीच सांगता येत नव्हते व तो वेगळीच काहीतरी बडबड करीत होता. बडे यांनी गृहरक्षक दलाचे महेश थोरात, रणजीत थोरात,  व हर्षल इंगळे यांच्या सहकार्याने त्यास बेलापूर पोलीस स्टेशन येथे आणले. तेथे त्याला नाश्ता दिला. त्यानंतर त्यांनी पुन्हा एक वार तपासणी केली असता त्याच्या खिशात एक बारीक कागद सापडला त्यावर कुणाचा तरी नंबर होता पोलीस कॉन्स्टेबल बडे यांनी त्या नंबर वर संपर्क साधला असता त्यांनी देखील मी संबंधितास  ओळखत नाही माझ्या परिचयाचा नाही असे सांगितले परंतु बडे यांनी त्याच्याकडे पाठपुरावा केला असता त्याने त्या गावातील एका व्यक्तीचा नंबर दिला. बडे यांनी संबंधित व्यक्तीच्या फोनवर फोन केला असता त्याने सदर इसम आमच्या गावातीलच असून तो मनोरुग्ण असल्याचे सांगितले व त्याच्या भावाचा व आईचा नंबर दिला पोलिसांनी तातडीने त्याचा भाऊ योगेश याचेशी संपर्क साधला भाऊ मिळाल्याचे समजताच दोघांनाही अतिशय आनंद झाला ते तातडीने बेलापूर येथे येण्यास रवांना झाले तोपर्यंत त्याची काळजी घेण्याची विनंती देखील आईने पोलिसांना केली  पहाटे दोन वाजता त्याची आई अलका नंदकुमार ससाने व  भाऊ योगेश बेलापूर पोलीस स्टेशनला आले व भावाला ताब्यात घेतले त्यावेळी आईचा व भावाचा आनंद गगनात मावेना त्यांनी मुलाला शोधून दिल्याबद्दल पोलिसांना धन्यवाद दिले. पोलीस आपले कर्तव्य चूक बजावत असून आपल्या मनोरुग्ण मुलाला सुखरूप कुटुंबाच्या ताब्यात दिल्याबद्दल आई अलका नंदकुमार ससाने हिने बेलापूर पोलिसांना धन्यवाद दिले ससाने कुटुंबीयाचे आनंदाश्रू पाहून पोलीस कॉन्स्टेबल बडे व होमगार्ड रणजीत थोरात महेश थोरात हर्षल इंगळे यांनाही गहिवरून आले

श्रीरामपूर (प्रतिनिधी):सेवा हीच खरी इबादत या विचाराने प्रेरित होऊन स्वर्गीय गुरुवर्य, वडीलधारी ‘मोठे बाबा’ आणि स्वर्गीय जुबेर भाई बिनसाद बाबा यांच्या पवित्र मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ‘दवा आणि दुवा’ ही समाजसेवेची चळवळ आजही तितक्याच निष्ठेने सुरू आहे. दोन्ही मार्गदर्शक आज हयात नसतानाही, त्यांच्या विचारांचा आणि सेवावृत्तीचा वारसा जपत हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्था आजही गोरगरिबांच्या आरोग्यासाठी भक्कमपणे उभी आहे.

याच परंपरेचा भाग म्हणून श्रीरामपूर शहरातील आझाद मैदान येथे हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्था आणि राहता येथील डॉ. मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला गरजू, कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला.

या आरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार हेमंत ओगले व नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी संस्थेच्या सेवाभावी परंपरेचे विशेष कौतुक करत, “अशा उपक्रमांमुळे समाजात माणुसकी जिवंत राहते,” अशी भावना व्यक्त केली.


गोरगरिबांसाठी आरोग्यसेवेचा आधार

या शिबिरामागील प्रमुख उद्देश म्हणजे गरिब, वंचित आणि उपचारांपासून वंचित राहणाऱ्या रुग्णांपर्यंत आरोग्यसेवेचा लाभ पोहोचवणे हा आहे. याच भावनेतून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात येत असून, दरवर्षी ही सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यात येते, अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.

तज्ञ डॉक्टरांकडून मोफत उपचार

या शिबिरात स्त्रीरोग, बालरोग, हृदयरोग, नेत्ररोग, अस्थिरोग, कर्करोग, त्वचारोग, मूत्ररोग, किडनी, मेंदू, मणक्याचे विकार, कान-नाक-घसा (ENT), दंतशस्त्रक्रिया व मधुमेह अशा विविध आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, उपचार व मार्गदर्शन करण्यात आले.


डॉ. रहमत दारूवाले आणि डॉ. मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संपूर्ण वैद्यकीय टीमने सेवाभावाने या शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले. अनेक रुग्णांच्या चेहऱ्यावर उपचारानंतर समाधान आणि आशेचे भाव दिसून आले.

सेवेची परंपरा पुढे नेणारे हात

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत होते. स्वर्गीय मार्गदर्शकांनी दिलेला सेवा, समर्पण आणि माणुसकीचा संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यामागे स्पष्टपणे जाणवत होता.

‘दवा आणि दुवा’ म्हणजे केवळ उपचार नाही, तर आधार

आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे उपचार खर्च परवडत नाही, तिथे हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थेचा हा उपक्रम अनेक गरजूंसाठी आशेचा किरण ठरत आहे.

या स्तुत्य कार्याबद्दल सर्व स्तरांतून समाधान आणि आशीर्वाद व्यक्त होत असून, “ही परंपरा अशीच अखंड सुरू राहो,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी 'वृत्तपत्र' हा चौथा स्तंभ मानला जातो.  अनेकदा काहिजण कोणत्याही घटनेसाठी पत्रकाराला जबाबदार धरतात. त्यांच्यावर दबाव आणतात किंवा त्यांना अपमानास्पद वागणूक देतात. आजही श्री.विक्रम नाईक यांनी पञकारावर अप्रस्तुत टिका केली आहे.पञकारांवर आरोप केले आहेत.याचा प्रथमतः बेलापूर प्रेस क्लब निषेध करीत आसून श्री.नाईक यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगीरी व्यक्त करावी अशी मागणी करीत आहे.                     

आम्ही पत्रकार कुणाचे 'पगारी' नोकर नाही किंवा कोणाचे बाःधिल नाही. पञकाराने काय करावे हे शहाणपण कोणी शिकवायची गरज नाही.बेलापूर प्रेस क्लबचे  पत्रकार सदस्य समाजाप्रती असलेल्या बांधिलकीतून काम करत असतात.

बातमीची निवड हा पत्रकाराचा विशेष अधिकार आहे. कोणती बातमी प्रसिद्ध करावी आणि कोणती करू नये, हा सर्वस्वी त्या पत्रकारांचा आणि त्यांच्या संपादकांचा निर्णय असतो. बातमीचे महत्त्व, तिची सत्यता आणि समाजावर होणारा परिणाम तपासूनच बातमी लावली जाते. पत्रकारावर कोणत्याही बाह्य व्यक्तीने किंवा शक्तीने बातमीसाठी दबाव आणणे हे बेकायदेशीर आणि नैतिकतेच्या विरोधात आहे.

पत्रकार संरक्षण कायद्या सारखे पत्रकारांचे कायदेशीर कवच तरी काही अतिउत्साही व्यक्ती पत्रकारांना उद्देशून अपशब्द वापरतात किंवा टिकाटिपणी करतात.  महाराष्ट्र सरकारने 'पत्रकार संरक्षण कायदा' (२०१७) लागू केला असून त्यातील प्रमुख तरतुदीनुसार कलम ३ व ४: पत्रकारावर हिंसाचार करणे किंवा त्याच्या कामात अडथळा आणणे हा गंभीर गुन्हा आहे. कलम ५ नुसार सदर गुन्हे हे 'दखलपात्र  आहेत.                            तुमच्या राजकारणात पञकारांना आणू नका.पञकारांना राजकारणाशी काहिही घेणेदेणे नाही.दुसरे व्यक्ती वा नागरिक म्हणून पञकार स्वतंञ आहे.त्याची व्यक्ती म्हणून राजकीय विचारधारा असणे हा त्याचा नागरी अधिकार आहे.तेव्हा नागरीक म्हणून पञकाराने कोणी कोणाची  बाजू घ्यवी वा कोणाचे समर्थन करावे हा व्यक्तीगत प्रश्न आहे.त्याबाबत आक्षेप घेण्याचा कोणालाही अधिकार नाही.यापुढे अशाप्रकारची टिका प्रेस क्लबचे पञकार  सहन करणार नाहित,याची दखल घ्यावी.   याविषयी अनेक पत्रकार संघटनांनी  जाहीर निषेध करत वरिष्ठ अधिकारी यांना भेट घेणार असल्याची माहिती देखील दिली आहे कोणीही पत्रकारावर राजकीय ताबा आणू नये पत्रकारांना त्यांचे काम करून द्यावे या पद्धतीचे लवकरच निवेदन संबंधित प्रशासनाकडे माहिती मिळत आहे यावेळी            भास्कर खंडागळे(अध्यक्ष), सुहास शेलार(उपाध्यक्ष),रणजित श्रीरामपूर (सचिव),सुनिल मुथा(कोषाध्यक्ष ),विष्णुपंत डावरे(सहसचिव),सदस्यःअशोक गाडेकर,ज्ञानेश्वर गव्हले,देवीदास देसाई,नवनाथ कुताळ,सुनिल नवले,दिपक क्षञिय,दिलिप दायमा,गणेश साळुंके,शरद पुजारी,आतिष देसर्डा


कोपरगाव : समता पतसंस्थेची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने काही विरोधकांनी थकबाकीदारांच्या माध्यमातून दाखल केलेल्या समता पतसंस्थेची चौकशी सहकार मंत्रालयाने अखेर थांबविली आहे. संबंधित प्रकरणाची सखोल माहिती व कायदेशीर बाबींचा अभ्यास केल्यानंतर सहकार मंत्रालयाकडून ही चौकशी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सत्याचाच विजय झाला असून समता पतसंस्थेला अडचणीत आणण्याचा डाव उधळला असल्याचे मत समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी व्यक्त केले.ते पुढे म्हणाले की, विरोधकांच्या पाठबळावर थकबाकीदारांनी संस्थेविरोधात चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या तक्रारी दाखल केल्याचा आरोप केला आहे. या अगोदर देखील याच थकबाकीदारांनी संस्थे विरोधात सहकार खात्याकडे अर्ज दाखल करून ही संस्थेला क्लीन चीट दिलेले आहे. त्या चौकशीत संस्थेविरोधात काहीही निष्पन्न झालेले नव्हते. तसेच याच थकबाकीदारांनी हायकोर्ट, जिल्हा कोर्टात देखील संस्थेविरोधात याचिका दाखल केल्या होत्या. परंतु चुकीच्या याचिका दाखल केल्या असता हायकोर्टानेच त्या याचिका फेटाळून त्या थकबाकीदारांना ५० हजारापर्यंत दंड ठोठावलेला आहे.समता पतसंस्थेच्या वतीने ॲड.विजय गवांदे यांनी बाजू मांडली. ते म्हणाले की, समता पतसंस्थेची वसुली कठोर व कायदेशीर करण्यात येत असते. सहकार मंत्रालयात याचिका दाखल केलेल्या थकबाकीदारांची वसुली देखील कायदेशीर करण्यात आली आहे. सहकार मंत्रालयात याचिका दाखल केलेल्या थकबाकीदारांच्या मालमत्तेची किंमत ठरवून त्यांच्या समक्ष विक्री करण्यात आली होती. ठरलेल्या किमतीपेक्षा अधिक किमतीने त्यांच्या जप्त केलेली मालमत्ता विकण्यात आली नसून थकबाकीदारांची कोणतीही फसवणूक झाली नाही. याउलट काका कोयटे कोपरगाव नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी कोपरगाव सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी निवडणूक रिंगणात असल्यामुळे त्यांची बदनामी विरोधकांनी त्या थकबाकीदारांना एकत्र आणून चालू केली आहे. विरोधकांकडून सहकार आयुक्त कार्यालयावर दबाव आणून ही चौकशी लावण्यात आली आणि संस्थेच्या चौकशीचे आदेश दिले होते. परंतु विरोधकांनी काका कोयटे यांना विरोध करण्यासाठी थकबाकीदारांच्या माध्यमातून संस्थेची चौकशी लावली असून त्या थकबाकीदारांची देखील चौकशी करण्यात यावी.तसेच समता पतसंस्था ही गेल्या अनेक वर्षांपासून सहकार खात्याने घालून दिलेल्या निकषाप्रमाणे सभासद व ग्राहकांच्या विश्वासावर पारदर्शक, शिस्तबद्ध आणि नियमबद्ध पद्धतीने कार्यरत असून संस्थेच्या आर्थिक व्यवहारात कोणतीही अनियमितता नसल्याचे यापूर्वीही प्रत्येक वर्षी होणाऱ्या ऑडिटमध्ये अ दर्जा मिळून स्पष्ट झाले आहे. मात्र, कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये संस्थेचे चेअरमन काका कोयटे कोपरगाव नगरपालिका नगराध्यक्षपदाची उमेदवारी करत असल्यामुळे विरोधकांचा थकबाकीदारांच्या माध्यमातून संस्थेचा अपप्रचार व अफवा, सोशल मीडियावर बदनामी करण्याचा डाव चालु असल्याची माहिती संस्थेचे व्हा.चेअरमन अरविंद पटेल यांनी दिली.याबाबत जेष्ठ संचालक जितूभाई शहा म्हणाले की, विरोधकांनी संजय चंद्रकांत मोरे, वसंत मधुकर घोडके, ओमप्रकाश बाबूआप्पा खके या थकबाकीदारांना एकत्र करून सहकार मंत्रालयात चौकशीची याचिका दाखल केली होती. सहकार मंत्रालयात थकबाकीदारांनी केलेल्या चौकशी अर्जाची प्रत संस्थेला ८ डिसेंबर २०२५ रोजी संस्थेला प्राप्त झाली. त्याच दिवशी समता पतसंस्थेचे म्हणणे ऐकून न घेता विरोधकांच्या दडपणाखाली हा आदेश सहकार मंत्रालयाने दिला.त्यानंतर संस्थेच्या वतीने १० डिसेंबर २०२५ रोजी थकबाकीदारांच्या विरोधात सहकार मंत्रालयात याचिका दाखल केली. प्रसंगी ज्यांनी सहकार मंत्रालयाकडे चौकशीची याचिका दाखल केली होती ते थकबाकीदार संजय चंद्रकांत मोरे, वसंत मधुकर घोडके, ओमप्रकाश बाबूआप्पा खके सुनावणी दरम्यान सहकार मंत्रालयात उपस्थित होते. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या समक्ष सहकार मंत्रालयात झालेल्या सुनावणीत समता पतसंस्थेची चौकशी थांबविली आहे.निवडणूक काळात थकबाकीदारांच्या तक्रारीवरून सहकार खात्याकडून लावण्यात आलेल्या चौकशीमागे तथ्य नसल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याने सदर चौकशी थांबविण्यात आली आहे.आम्ही देखील थकीत कर्जदारांनी संस्थेची केलेल्या बदनामी विरोधात न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे संस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी सांगितले. या निर्णयामुळे समता पतसंस्थेच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त झाल्याची भावना सभासद व ग्राहकांमध्ये व्यक्त होत आहे.समता पतसंस्थेने भविष्यातही कायदेशीर चौकटीत राहूनच कार्य सुरू ठेवणार असून कोणत्याही प्रकारच्या दबावाला किंवा अफवांना बळी न पडता सभासदांच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार संस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी व्यक्त केला आहे.



श्रीरामपूर प्रतिनिधी - अहिल्या नगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष,माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व डॉ. सुधीर तांबे यांचे विश्वासू सहकारी ॲङ समिन बागवान यांनी काल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अविनाश आदिक यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या सहकाऱ्यांसह जाहीर प्रवेश केला.


गेल्या अनेक वर्षापासून कॉंग्रेस पक्षात् सक्रिय, एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ते कार्यरत होते.

2019 व 2024 च्या विधानसभा निवड नुकित सक्रिय सहभागी,जाहीर सभामधून उत्कृष्ट मुद्देसूद मांडनी करुन काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यातत्यांचा सिंहाचा वाटा होता.

 नगरपालिका निवडणुकीत पक्षश्रेष्टी कडून दखल न घेता अन्याय झाल्याने नाराज नाराज होते.पालकमंत्री विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर सुजय दादा विखे यांनी भारतीय जनता पक्षाची दीन दलित,मुस्लिम-अल्पसंख्याक,शेतकरी यांच्या बाबतीत असणारी सर्व समावेशक भूमिका पसंत पड़ल्याने व भविष्यात अल्पसंख्याक समाजाचा असणारा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी एक उत्तम समन्वयकाची भूमिका घेऊन वाटचाल करण्यासाठी तसेच आपल्या उच्च शिक्षणाचा फायदा कायदेशीर, सामाजिक,राजकीय व वैद्यकीय सेवा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मिळवुन देण्याचा मानस ठेऊन जाहीर प्रवेश केला. 

या प्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री पालक मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ॲडवोकेट बागवान यांच्या प्रवेशाबद्द्ल आंनद व्यक्त करुन निश्चित न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष नितिन दिनकर, दिपक पटारे, इंद्रनाथ पाटील थोरात,संजय फंड, श्रीनिवास बिहानी,रवि पाटील,केतन खोरे,आशिष धनवटे,नारायण डावखर, मुख़्तार शाह,नजीर मुलानी,महेबुब कुरैशी,हाजी इस्माइल,मोहसिन शेख,मेहबूब प्यारे,मुदस्सर शेख,तौफीक शेख,शरद नवले,अभिषेक खंडागळे,नाना शिंदे,नीतिन भागडे,दिपक चव्हाण,विराज भोसले,बंडु शिंदे,राहुल आठवाल आदि उपस्थित होते. या प्रसंगी समिन बागवान यांचे समवेत अनेक सहकाऱ्यानी जाहीर प्रवेश केला.

सदर प्रवेश हा कॉंग्रेस पक्षासाठी धक्का समजला जात असून बागवान हे एक उत्कृष्ट वक्ते असून उत्तम संघटन कौशल्य व सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर पक्षा सोबत जोड़ला जाईल यात शंका नाही असे या प्रसंगी अनेक उपस्थितांनी बोलून दाखवले.

एडवोकेट बागवान यांच्या प्रवेशाने वार्ड नंबर दोन तसेच संजय नगर भागातील गणिते बदलणार असल्याचे सांगितले जात आहे.

बेलापूरःयेथील महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या (महावितरणच्)विद्युत  सबस्टेशनला पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांच्या प्रयत्नातून दर्जावाढ होवून स्वतंञ उपविभाग म्हणून मान्यता मिळाल्याची माहिती तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी दिली.                      याबाबत श्री.नवले व श्री .खंडागळे यांनी सांगीतले की,बेलापूर येथील सबस्टेशन हे श्रीरामपूर वीज विभागास जोडलेले होते.यामुळे वीज वितरणात सातत्याने अडथळा येत असे.यामुळे महावितरणच्या श्रीरामपूर विभागाचे विभाजन करुन  बेलापूर सबस्टेशनचे स्वतंञ उपविभागात रुपांतर करावे यासाठी पालकमंञी नाम.विखे पा.,माजी खा.डाॕ.सुजय विखे पा. व महावितरणचे अधिकारी यांचेकडे बेलापूर,ऐनतपूर,उक्कलगाव,एकलहरे,वळदगाव,उंबरगाव,पढेगाव,कान्हेगाव येथील प्रमुख कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळळाने सातत्याने पाठपुरावा केला होता.                            या शिष्टमंडळात  शरद नवले अभिषेक खंडागळे यांच्यासह बेलापूरच्या सरपंच सौ.मीना साळवी, उपसरपंच चंद्रकांत नवले, रणजीत श्रीगोड,जालिंदर कु-हे ,भाऊसाहेब कुताळ, रामराव शेटे, विराज भोसले,किशोर बनकर, विष्णुपंत डावरे,प्रफुल्ल डावरे,पुरुषोत्तम भराटे,अनिल गाडे, बंडू तोरणे, प्रशान्त लिप्टे, मुकुंद लबडे ,महेश खरात, हाजी इस्माईलभाई शेख,मोहसीन सय्यद, शफिक बागवान, मुश्ताक शेख,लाल महम्मद जाहगीरदार, गणेश उमाप,रावसाहेब अमोलिक ,सुभाष अमोलिक ,दिलिप अमोलिक ,भाऊसाहेब तेलोरे, अनिल थोरात, प्रकाश राजुळे, प्रभात कु-हे , महेश कु-हे,अजीजभैया शेख  आदिंचा  समावेश होता. शिष्टमडळ नेवून पाठपुरावा केला होता.                         सदर प्रयत्नास अखेरीस यश येवून बेलापूर उपविभागास मान्यता मिळाल्याचे महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक भूषण कुलकर्णी यांनी कळविले आहे.सदरचा प्रस्ताव मंजूर केल्याबद्दल नाम.राधाकृष्ण विखे पा.,माजी खा.डाॕ.सुजयदादा विखे पा.,महाविरणचे उपअभियंता श्री.वाणी,श्री.भोगले,श्री.अवचिते यांना धन्यवाद दिले आहेत.

श्रीरामपूर (प्रतिनिधी):श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. हा दिवस भारतरत्न, महान अभियंता, दूरदृष्टी असलेले अर्थतज्ज्ञ तसेच आधुनिक भारताच्या विकासात मोलाचा वाटा उचलणारे मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा केला जातो. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभियंता दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात उप प्रादेशिक सहाय्यक परिवहन अधिकारी संदीप निमसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अभियंत्यांचे समाजातील व राष्ट्राच्या विकासातील योगदान अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “अभियंते केवळ इमारती, रस्ते वा प्रकल्प उभारणारे नसून ते समाजाच्या गरजा ओळखून विकासाचे दिशा-दर्शक ठरतात. विश्वेश्वरय्या यांचे कर्तृत्व व कार्यपद्धती हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.”

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानही संदीप निमसे यांनी भूषविले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या प्रसंगी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी अभियंता दिनानिमित्त अभियंता समाजाला हार्दिक शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-स्वस्त धान्य दुकानाच्या इ पॉज मशिनवर   मराठीमध्ये फीडिंग झालेल्या शिधापत्रिका धारकांचे बिलच होत नसल्यामुळे गोरगरिबांना धान्यापासून वंचित राहण्याची वेळ आली असून  या बाबत तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे .                      माहे सप्टेंबर महिन्यात स्वस्त धान्य दुकानातून उशिरा धान्य वाटप सुरू झालेले आहे त्यातच इ- पॉज मशीन वर मराठी भाषेत फीडिंग केलेल्या ऑनलाईन रेशन कार्डचे धान्याचे बिलच निघत नसल्यामुळे अनेक ठिकाणी वितरणव्यवस्थेचा गोंधळ उडालेला पहावयास मिळत आहे . कार्डधारक आणि दुकानदार यांच्यामध्ये विनाकारण वादावादी होत आहेत इंग्रजी डाटा फीडींग असलेल्या  कार्डधारकाचे  बिल निघत आहे. त्यामुळे दुकानदार त्यांना धान्य देतात. परंतु मराठी भाषेत कार्डधारकांंची नावे भरलेली असलेल्या लाभधारकांचे बिलच निघत नसल्यामुळे त्यांना धान्य देता येत नाही त्यामुळे अनेक कार्डधारक धान्यापासून वंचित राहू शकतात . पॉज मशीन मध्ये झालेल्या या बदलामुळे कार्डधारकही वैतागले आहेत मागील महिन्यात धान्य मिळाले मग आत्ताच का देत नाही असाही सवाल लाभधारकांकडून विचारला जात आहे.त्यामुळे शासनाने तातडीने  पाज मशीन मध्ये दुरुस्ती करावी जेणेकरून सर्वांना सुरळीत धान्य मिळेल. याबाबत विशेष माहिती घेतली असता असे समजले की महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यात ओयासिस कंपनीचे ई पॉज मशीन आहे त्याच मशीनला ही समस्या निर्माण झालेली आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने त्यात दुरुस्ती करावी अशी कार्डधारकांची मागणी आहे याबाबत ऑल महाराष्ट्र फेर प्राईस शॉप किपर फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे यांचे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की याबाबत मंत्रालयातील संगणक कक्ष अधिकारी प्रज्ञा पटेल यांच्याशी संपर्क केला असून दोन दिवसात ही समस्या सुटेल असे वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात आल्याचे डोळसे पाटील यांनी सांगितले. अहिल्या नगर जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातील धान्य वाटपात आलेले अडचण तातडीने दूर करावे अशी मागणी दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष सतीश हिरडे व उत्तर नगर जिल्हाध्यक्ष काशिनाथ आरगडे यांनी केली आहे

श्रीरामपूर( प्रतिनिधी)- तालुक्यातील प्रवरा नदीवर शेतकऱ्यांनी टाकलेल्या वीज मोटार व केबलची मोठ्या प्रमाणात चोरी होत असून या चोरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशा मागणीचे निवेदन मांडवे फत्याबाद कुरणपूर कडीत येथील ग्रामस्थांनी कोल्हार पोलीस स्टेशनला दिलेले आहे पोलिसांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की आम्ही प्रवरा नदीवर वीज मोटर टाकून शेती करता पाणीपुरवठा करत असतो गेल्या चार महिन्यापूर्वी प्रवरां नदीवरील वीज मोटार त्याचबरोबर वीज मोटारीच्या केबल चोरी गेलेल्या होत्या त्यावेळी आम्ही तक्रार दाखल केली नाही त्याचाच परिणाम पुन्हा एकदा प्रवरा नदीवर बसविलेल्या विज मोटारी त्याचबरोबर मोटारीच्या केबल चोरट्यांनी चोरुन नेल्या असून या चोरांचा तातडीने बंदोबस्त करावा काही महिन्यापूर्वी कुरणपूर परिसरातील शेतकऱ्यांच्या देखील अशाच पद्धतीने केबल चोरून नेण्यात आलेल्या होत्या हे चोरटे चार चाकी वाहनातून येऊन केबल चोरी करतात त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते अगोदरच पावसाने व्यत्यय आणल्यामुळे शेतकरी अडचणी सापडलेला आहे त्यातच मोटारीच्या केबल व विज मोटारी चोरी गेल्यामुळे परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे त्यामुळे या चोरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .पोलिसांना दिलेल्या या निवेदनावर सर्वश्री भाऊसाहेब वडीतके , जगन्नाथ चितळकर, शहाजी वडीतके, नंदकुमार चितळकर, उद्धव जोशी, अण्णासाहेब गेठे, बाबासाहेब चितळकर, मुनीर पिंजारी, बबनराव वडीतके, नरेंद्र जोशी, मच्छिंद्र तांबे, संदीप चितळकर, संपत चितळकर, सुधाकर जोशी, सोन्याबापू वडीतके आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत

बेलापूर(प्रतिनिधी)-श्रीरामपुर तालुक्यातील बेलापुर खूर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.सविता प्रकाश राजुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.त्यांच्या निवडी बद्दल पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय दादा विखे पाटील तसेच अशोक उद्योग समुहाचे सर्वेसर्वा भानुदास मुरकुटे , शरद नवले यांनी अभिनंदन केले आहे  .                         बेलापूर खुर्द ग्रामपंचायत च्या सरपंच प्रणालीताई भगत यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाकरता नुकतीच निवडणूक घेण्यात आली. त्या निवडणुकीत सविता राजुळे यांचा एकमेव अर्ज आला होता त्यामुळे सरपंच पदी सौ.राजुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .या वेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल गाडे, वसंत पुजारी, दिलीप भगत ,राजेंद्र बारहाते, माजी सरपंच सौ प्रणाली भगत, कल्पना ताई भगत ,राणी पुजारी, नयनाताई बडधे, प्रियंकाताई थोरात आदि सदस्य हजर होते. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून नितीन मुळे यांनी काम पाहिले त्यांना ग्रामविकास अधिकारी राजेंद्र मेहत्रे ,कामगार तलाठी शिंदे मॅडम यांनी सहकार्य केले. या वेळी तनपुरे कारखान्याचे माजी संचालक द्वारकनाथ बडदे, ज्ञानदेव वाकडे ,विनय भगत, राजेंद्र कुंकूलोळ, सुनील क्षिरसागर, शशिकांत पुजारी ,रामदास थोरात ,राकेश बडदे ,बी. एम. पुजारी, गोरख भगत, पंकज खर्डे ,

 जितेश महाडिक, विक्रांत पाटील, पंकज पाटील, पोलीस पाटील उमेश बारहाते, युवराज जोशी, ऋषिकेश बारहाते, चंद्रकांत गाढे, ऋषिकेश महाडिक, रणजीत काळे, सतीश बारहाते, अशोक महाडिक, राजेंद्र गागरे, शंकर बारहाते, अनिल बारहाते ,प्रशांत बडदे, नंदू कुऱ्हे, समीर सय्यद, अर्जुन गोरे, कैलास थोरात, गणेश महाडिक, अमोल जोशी, किशोर कांबळे ,राहुल शेलार, सुनील बडधे, संतोष बडधे, महेश बडधे, सागर तागड आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते

बेलापूर -(प्रतिनिधी)गावात खाजगी सावकारांचा सुळसुळाट झालेला असुन हेच खाजगी सावकार 50%पासुन 120% टक्क्यापर्यंत व्याज वसूल करीत आहेत मात्र या विषयावर ग्रामपंचायत गप्प का आहे, असा  सवाल सामाजिक कार्यकर्ते विक्रम नाईक यांनी केला आहे.

याबाबत नाईक यांनी ग्रामविकास अधिकारी व सरपंचांना निवेदन  पाठविले असुन त्यात पुढे म्हटले आहे की खाजगी सावकाराचा गावाला वेढा  पडला असून काही ठराविक लोक गोरगरीब तसेच अडलेल्या नडलेल्या कडून मन मानेल त्या पद्धतीने व्याजाची आकारणी करून जनतेला लुबाडत आहेत याबाबत अनेक तक्रारी दाखल झालेल्या होत्या परंतु त्या सावकाराच्या दडपशाहीमुळे दडपल्या गेल्या. कुणाच्या जमिनी, कुणाच्या चार चाकी, कुणाच्या दोन चाकी, कुणाची मालमत्ता घर गहाण ठेवून हे सावकार खुलेआम 50 टक्के पासून ते 120% पर्यंत व्याजाची आकारणी करून लबाडणूक करत आहेत यांचा व्याजाचा दर हा दर महा असून महिना संपला की हे लोक संबंधित व्यक्तीकडे तगादा लावतात अर्वाचे भाषा वापरून दादागिरी करतात व त्याने गहाण टाकलेल्या मालमत्ता विकण्याचा दम देतात त्यामुळे अनेक गोरगरिबांना आपल्या मालमत्ता सोडून देण्याची वेळ येत आहे तरी बेलापुराला पडलेला हा  खाजगी सावकारकीचा विळखा सुटणार कधी याबाबत विक्रम नाईक यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना सवाल विचारला आहे. तसेच बेलापूर गाव मध्ये किती अधिकृत व किती अनाधिकृत सावकार आहेत याची यादी माननीय जिल्हाधिकारी यांना पाठवली आहे काय याचीही माहिती  त्यांनी ग्रामपंचायतकडे मागवली आहे तसेच संबंधित सावकाराची कर्ज वसुली कशी असते तसेच किती टक्के व्याज घेतली जाते याबाबतही ग्रामपंचायत प्रशासनाकडून माहिती मागविण्यात आलेली आहे ग्रामपंचायतीचे प्रशासन अधिकारी  ही माहिती देत नसेल तर बेकायदेशीरपणे चाललेल्या या सावकारकीला  ग्रामपंचायतचा छुपा पाठिंबा तर नाही ना असा सवाल नाईक यांनी विचारला असून याबाबत लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विक्रम नाईक यांनी दिलेला आह 

 जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशानंतरही ग्रामपंचायतने खाजगी सावकारकीकडे कठोर पावले का उचललेली नाहीत, याकडे नाईक यांनी लक्ष वेधले आहे. “गाव बुडतंय आणि ग्रामपंचायत बघ्याची भूमिका घेत आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.

बेकायदेशीर सावकारी थांबवण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेवुन गोरगरीबांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नाईक यांनी केली आहे.

बेलापूर (प्रतिनिधी)-एका दिव्यांगाला प्रवाहात आणण्याची टाकलेली जबाबदारी एका कर्मचाऱ्याला चांगलीच महागात पडली .50 हजार रुपये रोख भूर्दंड भरुन इज्जतीचा पंचनामा करण्याची वेळ त्या कर्मचाऱ्यांवर आली पण दिवसांचा गोंधळ रात्री च मिटला अन् त्याने सुटकेचा निश्वास टाकला.                      त्याचे झाले असे की परिसरातील एका परिवारात एक मुलगा दिव्यांग होता. त्याची माहिती पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी मिळाली. त्यांनी एका कर्मचाऱ्याला आदेश दिला की त्या दिव्यांग मुलाच्या घरी जाऊन त्याला प्रवाहात आणा. वरिष्ठाच्या आदेशानुसार तो कर्मचारी त्या दिव्यांग मुलाच्या घरी गेला त्याने दिव्यांग व्यक्तीला मिळणारे लाभ, शासकीय योजनांची माहिती दिव्यांग व्यक्तीच्या आईला दिली . त्याचबरोबर त्या मुलाचे अहिल्यानगर येथे जाऊन दिव्यांगाचे प्रमाणपत्र काढून आणा ते कसे करायचे याविषयी देखील सविस्तर मार्गदर्शन केले. काही अडचण आल्यास माझ्या फोन नंबर वर संपर्क साधा असे सांगून त्या कर्मचार्‍याने आपला फोन नंबर त्या महिलेला दिला .त्यानंतर दिवसभर त्या महिलेने वेगवेगळ्या कारणाने संबंधित कर्मचाऱ्याला फोन केले. तो कर्मचारी प्रामाणिकपणे दिव्यांगाची माहिती व येणाऱ्या अडचणी विषयी सांगत होता. हे सर्व झाल्यानंतर सायंकाळी ती महिला विचारपूस करत राहुरी येथील कर्मचाऱ्यांच्या घरी गेली व तेथे आरडा ओरडा करून हा मला दिवसभर घेऊन फिरला याने नको ते केले असे सांगून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. झालेला प्रकार पाहून तो कर्मचारीही गडबडून गेला. आजूबाजूचे नागरिक जमा होऊ लागले .तसे ती महिला आणखीनच जोर जोरात ओरडू लागले त्यामुळे त्या कर्मचाऱ्याने आपल्या मित्रांचा सल्ला घेऊन त्या महिलेसह बेलापूर गाठले. बेलापूरला आल्यानंतर ते सरळ पोलीस स्टेशनला गेले तेथे आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा त्या कर्मचाऱ्याला होती.परंतु तिथेही संबंधित महिलेने एकच रट लावून धरली. त्यामुळे कर्मचारी आणखीनच गडबडून गेला त्याने गावातील काही व्यक्तींना बोलावले. परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. ती महिला एका विषयावर ठाम राहिले. रात्री अकरा वाजता सुरू झालेले नाट्य दीड दोन वाजेपर्यंत सुरू होते. अखेर शेवटी त्या महिलेने आपला प्रस्ताव ठेवला. मनात नसतानाही सर्वांच्या आग्रहा खातर त्या कर्मचाऱ्याला पन्नास हजार रुपयांचा भूर्दंड बसला.वास्तविक तो कर्मचारी दिवसभर पंचायत समितीत आपल्या सहकाऱ्यां बरोबर काम करत होता.पण एका महीलेपुढे त्याला हतबल व्हावे लागले. यापूर्वीही अशाच घटना घडलेल्या असून हनी ट्रॅप सारखे प्रकार आता ग्रामीण भागातही सुरू झाले आहेत.या याबाबत काही कर्मचारी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना समक्ष भेटून निवेदन देणार असल्याचे समजले

बेलापूर( प्रतिनिधी )-आंबी येथून पुण्याला जाण्याकरता पहाटे निघालेल्या मायलेकाच्या मोटरसायकलला बिबट्याची धडक बसल्यामुळे दोघेही  जखमी झाले असुन त्यांचेवर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल उपचार सुरू आहेत केवळ दैव बलवत्तर म्हणून दोघेही वाचले.                याबाबत समजलेली हकीगत अशी की आंबी येथील अलका भगवान वायदंडे वय वर्ष 45 व त्यांचा मुलगा विशाल भगवान वायदंडे वय 28 हे पुणे येथे जाण्याकरिता सकाळी साडेपाच वाजता आंबी येथून निघाले श्री हरिहर केशव गोविंद बन या ठिकाणी रस्त्याच्या वळणावर गाडी असतानाच अचानक बिबट्याने गाडीला धडक दिली. या धडकी मुळे बिबट्या देखील एका बाजूला पडला तर विशाल वायदंडे व त्याच्या आई अलका वायदंडे या एका बाजूला पडल्या बिबट्या लगेच शेजारील झुडपात निघून गेला. गाडीवरून पडल्यामुळे विशाल व अलका यांना मार लागल्यामुळे ते साखर कामगार रुग्णालयात दाखल झाले तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत बिबट्याची धडक बसून देखील दोघे सुखरूप आहेत याबद्दल दोघाही मायलेकांनी देवाचे आभार मानले.

बेलापूर (प्रतिनिधी)-संत सावता महाराज म्हणजे प्रेमाचे प्रतीक असून त्यांचे प्रेरणादायी चरित्र तरुण पिढीने अभ्यासणे आवश्यक आहे असे संमत हरिभक्त परायण अनिल महाराज महांकाळे यांनी व्यक्त केले .              संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त बेलापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी काल्याच्या कीर्तनात ह.भ . प. अनिल महाराज महांकाळे बोलत होते   श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात ह भ प अनिल महाराज महांकाळे म्हणाले  की प्रत्येकाने आपले कर्म करताना आपल्या कर्माशी प्रामाणिक असले पाहिजे. आज समाजात वाढत असलेली अराजकता ही चिंतेची बाब आहे समाजाला योग्य दिशा देण्याकरता संत सावता महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करण्याची गरज आहे. संकटाला घाबरून आत्महत्या करू नका नैराश आले तरी चुकीचा मार्ग निवडू नका आपल्या कामाला भक्तिमार्गाची जोड द्या जिवन अधिक सुखकर होईल असेही ते म्हणाले . प्रारंभी गावातून संत सावता महाराज यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी अनेकांनी आपल्या घरापुढे सडा रांगोळी काढली होती मिरवणूक झेंडा चौकात आल्यानंतर अनेक मान्यवरांनी श्री संत सावता महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त विविध स्पर्धांचे ही आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ही महाराजांच्या हस्ते संपन्न झाला त्यानंतर महाप्रसाद वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रम यशस्वीते साठी हे भ प मयुर महाराज बाजारे, ह भ प कृष्णा महाराज शिरसाठ, संजय महाराज शिरसाठ,जालिंदर कुर्हे, विलास मेहत्रे, प्रकाश कुऱ्हे ,राजेंद्र टेकाडे ,राजेंद्र सातभाई ,अशोक महाराज शिरसाठ, बबन महाराज अनाप, साईनाथ महाराज शिरसाठ, चांगदेव मेहेत्रे, अर्जुन कुर्हे, मधुकर अनाप , तुकाराम मेहेत्रे, गोरक्षनाथ कुर्हे ,सोमनाथ शिरसाठ सचिन नगरकर संदीप कुर्हे, महेश कुऱ्हे केशव कुर्ते, रमेश लगे, चंद्रकांत रासकर, संदीप कुऱ्हे ,वैभव कुरे ,अमोल मेहेत्रे ,रवी मेहेत्रे, भैय्या शिरसाठ, कान्हा लगे ,बाळासाहेब टेकाडे ,ज्ञानेश्वर शिरसाठ, दादा कुऱ्हे, तुकाराम मेहेत्रे,शरद गायकवाड ,अशोक कुर्हे, विशाल मेहत्रे बबलू कुर्हे भाऊसाहेब लगे तुषार जेजुरकर कार्तिक मेहत्रे किरण कुर्हे सागर कुर्हे चेतन कुर्हे सौरभ लगे अशोक दुधाळ अमोल आनाप अच्युत कुर्हे प्रफुल्ल कुर्हे योगेश कुर्हे बाळासाहेब टेकाळे सागर कुर्हे प्रकाश दुधाळ अनिल कुर्हे गौरव कुर्हे आदींनी विशेष प्रयत्न केले

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): शब्दांची ताकद काय असते, हे दाखवून देणारी एक संस्मरणीय आणि प्रेरणादायी राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धा कोपरगाव येथे पार पडली. सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे हे पाचवे पर्व होते.या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध भागांतील – नाशिक, श्रीरामपूर, येवला, निफाड, संभाजीनगर, प्रवरानगर, शिर्डी आदी परिसरातील ३५ शाळांमधील ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मंचावर उभा राहून विचार व्यक्त करताना प्रत्येक वक्त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि राष्ट्रभक्तीची झळाळी दिसून येत होती. भाषणात त्यांनी समाज, शिक्षण, संविधान, स्त्री सक्षमीकरण, शिवरायांचे राष्ट्रनिर्माण, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातील माणुसकी आणि नवभारताचे स्वप्न अशा अनेक विषयांवर प्रभावी मांडणी केली.छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानिक वारसा, शिवरायांची आदर्श नेतृत्वशैली, स्त्री शक्तीचा जागर – या सर्व विषयांवर भाष्य करताना विद्यार्थ्यांनी केवळ स्पर्धा जिंकण्याचे नाही, तर विचार प्रबळ करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. त्यांच्या वक्तृत्वशैलीत ओघवती भाषा, भावनिक आविष्कार आणि समाजप्रबोधनाचा प्रगल्भ दृष्टीकोन स्पष्टपणे दिसून येत होता.स्पर्धेचे उद्घाटन प्रा. अमोल चिने यांच्या हस्ते झाले. त्यांच्यासोबत शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे,पालक संघाचे उपाध्यक्ष रामदास खरात आणि काशिनाथ दामोदर लव्हावाटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. परीक्षक म्हणून सुमित डेंगळे (इतिहास अभ्यासक),ॲड. प्रवीण जमदाडे आणि प्राचार्या सुनीता हिंगडे यांनी अतिशय पारदर्शक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मूल्यांकन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्या शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे, नथलीन फर्नांडिस, तसेच मराठी विभागप्रमुख बी. के. तुरकणे आणि शिक्षकांनी अतुलनीय परिश्रम घेतले.

या स्पर्धेत श्रीराम अकॅडमी, श्रीरामपूरने प्रथम क्रमांक पटकावला. श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगावने द्वितीय क्रमांक तर संत विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल, अहिल्यानगरने तृतीय क्रमांक पटकावला. त्याशिवाय सेंट मोनिका स्कूल, बी. आर. खटोड कन्या विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, आत्मा मलिक स्कूल, श्री साईबाबा कन्या विद्यालय यांसह इतर शाळांनाही उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.हा कार्यक्रम केवळ एक स्पर्धा नव्हता, तर नव्या पिढीच्या मनात विचारांची मशाल पेटवणारा एक संस्कार सोहळा ठरला. वक्त्यांच्या ओघवत्या भाषणांनी उपस्थित शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांची मने जिंकली. विचारशक्ती, आत्मविश्वास, आणि नेतृत्वगुण यांचे अद्वितीय दर्शन घडवणाऱ्या या मंचाने विद्यार्थ्यांच्या मनात भाषेचे, विचारांचे आणि संस्कृतीचे बीज रुजवले. कोपरगावने पुन्हा एकदा राज्य पातळीवर शिक्षण आणि साहित्य यांचे तेज झळकावले,हे निश्चित.

बेलापूर, प्रतिनिधी – "श्रीरामपूर व बेलापूर परिसरात पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष आणि अकार्यक्षमतेमुळे गुन्हेगारांचा सुळसुळाट झाला आहे. पोलिसिंग हा प्रकार औषधालाही उरलेला नाही," असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते सुनील मुथा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.

श्रीरामपूर व बेलापूर परिसरात बाहेरगावचे गुन्हेगार खुलेआम अवैध धंदे चालवत असून, गुटखाबंदी असताना गुटख्याची सर्रास विक्री, अमली पदार्थांची निर्मिती, गोवंश कत्तली यावर पोलिसांचा कोणताही अंकुश राहिलेला नाही, असे मुथा म्हणाले.

"बिंगो" नावाने सुरू असलेला जुगार

जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिलेले असतानाही, कोपरगाव, शिर्डी, संगमनेर व सोनई परिसरातील गुन्हेगार श्रीरामपूरात "बिंगो" नावाने जुगाराचे अड्डे चालवत असल्याचे मुथा यांनी निदर्शनास आणले.

गुन्हेगारांचा मुक्तसंचार गावठी कट्यांचा वापर, अल्पवयीन मुलींचे दिवसाढवळ्या अपहरण, अल्प्राझोलमसारख्या अमली पदार्थांचे तेलंगणाशी असलेले संबंध, यामुळे श्रीरामपूर परिसर गुन्हेगारांचे आश्रयस्थान झाल्याची टीका त्यांनी केली.

बेलापूर पोलिसांची स्थिती आणखी बिकट

बेलापूर पोलिस औटपोस्टसमोर टोळीयुद्ध होणे, कोल्हार रोडवरील एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न, झेंडा चौकातील वाहतुकीचा बट्याबोळ, टायर दुकान व व्यापाऱ्याचे अपहरण या सर्व घटनांकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले.

गुटखा व गोवंश प्रकरणात पोलिसांची संशयास्पद भूमिका

गुटखा ट्रक प्रकरणात केवळ पंटरांना अटक होऊन प्रमुख आरोपी सुरक्षित राहणे, बेकरीत सापडलेले गोमांस व कोल्हार चौकाजवळ सुरू असलेली गोवंश कत्तल याकडे पोलिसांचे डोळेझाक असल्याचा आरोपही त्यांनी केला.

डीजे बंदीचा ठरावही धाब्यावर

ग्रामसभेने डीजे बंदीचा ठराव करून पोलिसांना लेखी कळवले असतानाही गावात खुलेआम डीजे वाजवले जातात. काही लोक माफक शुल्क घेऊन नवीन मिरवणुकांना परवानग्या मिळवत असून, या मिरवणुकांत तरुणांचा उन्माद दिसून येतो, असेही ते म्हणाले.

तक्रारी दडपल्या जातात

"गुन्ह्यांची नोंद न करता तक्रारदारांची बोळवण केली जाते, केवळ तक्रार अर्ज घेऊन प्रकरण झाकले जाते," अशी गंभीर टीकाही मुथा यांनी केली.

नवीन पोलिस अधीक्षकांकडून अपेक्षा

नवीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना जिल्ह्याचा अनुभव असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा बेजबाबदारपणा थांबवतील अशी अपेक्षा मुथा यांनी व्यक्त केली. "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" हे ब्रीदवाक्य कृतीत उतरावे, हीच अपेक्षा आहे, असेही त्यांनी नमूद केले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याचा निर्णय घेतल्यानंतर, या निर्णयाविरोधात राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय असल्याच्या आरोपाने वाद पेटला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत थेट पत्रक प्रसिद्ध करत सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना उद्देशून कडव्या शब्दांत इशारा दिला आहे. या पत्रकाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुका व शहर मनसेच्या वतीने स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांना औपचारिक निवेदन सादर करण्यात आले.


एप्रिल २०२५ पासून महाराष्ट्र शिक्षण विभागाकडून प्राथमिक शिक्षणात बदल करत, पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा समावेश करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या निर्णयानुसार मराठी, इंग्रजीसोबत हिंदी भाषा सक्तीची असेल, असे संकेत देण्यात आले होते. सुरुवातीला आलेल्या निर्देशांनुसार तीनही भाषांचे पाठ्यपुस्तक छपाईला गती देण्यात आली होती. मात्र, या प्रस्तावाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला आणि त्यानंतर अनेक शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि भाषाप्रेमींनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकात स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, “हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, ती फक्त उत्तरेतील काही राज्यांमध्ये बोलली जाते. महाराष्ट्रात तिची सक्ती करण्याचा कुठलाही नैतिक किंवा शैक्षणिक आधार नाही.” त्यांनी शिक्षण विभागावर निशाणा साधत सांगितले की, “सरकारने आधी हिंदी सक्ती करणार असल्याचा अप्रत्यक्ष निर्णय घेतला, नंतर जनमत पाहून गुपचूप मागे फिरलं, मात्र अद्याप त्याचा कोणताही स्पष्ट लेखी आदेश सादर केलेला नाही.” राज ठाकरे यांनी मुख्याध्यापकांना उद्देशून आवाहन केले की, “तिसऱ्या भाषेचा शिकवण्याचा निर्णय तुम्ही अंमलात आणू नका. सरकारने अजून स्पष्ट आदेश दिलेले नाहीत आणि तरीही पुस्तक छपाई सुरु आहे. याचा अर्थ सरकार गुप्तपणे ही भाषा लादण्याच्या प्रयत्नात आहे. याला शाळांनी सहकार्य करू नये.”


 जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी आपल्या भाषणातून सांगितले , इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांवर तीन भाषा शिकवण्याचा ताण टाकणे हे शैक्षणिक दृष्टिकोनातून अयोग्य आहे. शिवाय मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा पुरेशा असून, राज्यभाषा म्हणून मराठीचे स्थान अबाधित ठेवणे हीच प्रत्येक शाळेची प्राथमिक जबाबदारी आहे. “हिंदी शिकवली काय, नाही काय, त्याचा उपयोग काहीच नाही. पुढे मुलांना आवश्यक वाटल्यास कोणतीही भाषा ते शिकू शकतात. पण लहान वयात ओझं टाकून सरकार नेमकं कोणतं राजकारण करतंय हे समजायला हवं,” असे ते आपल्या भाषणातून बोलले या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुका व शहर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं. यामध्ये हिंदी सक्तीविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून शाळांनी सरकारच्या गुप्त हेतूंना पाठबळ देऊ नये, अशी मागणी केली आहे.


मनसे शहराध्यक्ष स्वप्निल सोनार यांनी सांगितले आहे की, “जर सरकारने तिसरी भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला नसेल तर त्याचा स्पष्ट लेखी आदेश प्रसिद्ध करावा. अन्यथा आम्ही हे सरकारचा डाव समजून विरोध करत राहू.” तसेच, जर शाळांनी सरकारच्या दबावाखाली काम केलं, तर त्याला “महाराष्ट्र द्रोह” समजले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. मनसेने या आंदोलनातून स्पष्ट केले आहे की, ही केवळ भाषा शिकवण्याची चर्चा नसून, त्यामागे असलेला ‘सांस्कृतिक कब्जा’ रोखणे ही आपली जबाबदारी आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या लोकसंख्येच्या वाढीमुळे मराठी भाषेचा सायास होत आहे, आणि त्यातच शैक्षणिक पातळीवर हिंदी लादली गेल्यास मराठीचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशी भीती मनसेने व्यक्त केली आहे.


या निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर, उपजिल्हाध्यक्ष सतीश कुदळे, तालुकाध्यक्ष अमोल साबणे, शहराध्यक्ष स्वप्निल सोनार, तालुका संघटक विलास पाटणी,तालुका सचिव भास्कर सरोदे,शहर संघटक निलेश सोनवणे, शहर सचिव अभिजीत, शहर सरचिटणीस सचिन कदम, गायकवाड, विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष संकेत शेलार,विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अतुल खरात, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष कुणाल सूर्यवंशी, शहर सरचिटणीस नितीन जाधव, शहर उपाध्यक्ष संदीप विश्वंभर, संदीप पिंटो, लखन कुरे, डॉक्टर प्रसाद पऱ्हे, शहर विभागाध्यक्ष चेतन दिवटे, विनोद शिरसाठ, विद्यार्थी सेना शहर संघटक राहुल शिंदे,

यांच्यासह अनेक मान्यवरांच्या सह्या आहेत.

खंडाळा (गौरव डेंगळे) : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडीचे आज खंडाळा गावात उत्साहात व पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.फुलांनी सजवलेल्या रांगोळ्यांमधून, तसेच भजन-कीर्तनाच्या मंगलध्वनीत संपूर्ण गावाने एकत्र येत दिंडीचे स्वागत केले.

या प्रसंगी त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प. नवनाथ महाराज गांगुर्डे यांचा राष्ट्रीय श्रीराम संघ खंडाळा व गावकऱ्यांच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. त्यांच्या धार्मिक व सामाजिक कार्याची उपस्थितांनी प्रशंसा केली.यावेळी खंडाळा ग्रामस्थांच्या वतीने दिंडीसाठी दुपारच्या जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामध्ये आमटी,चपाती आणि भाकरीचा समावेश होता.भाविकांसाठी ही भोजन व्यवस्था अत्यंत प्रेमपूर्वक आणि सुयोग्य पद्धतीने पार पडली.

राष्ट्रीय श्रीराम संघ खंडाळा यांच्या वतीने राजगिरी लाडूंच्या पॅकेटचे वाटप करण्यात आले, जेणेकरून वारकऱ्यांना पोषणमूल्ययुक्त प्रसाद मिळावा.

दिंडीमध्ये सहभागी वारकरी, महिला भक्त मंडळ,तसेच लहान मुलांचे टाळ-मृदंग व भजन पथक यांनी वातावरण भक्तिमय करून टाकले.गावातील युवकांनी वाहतूक व नियोजनामध्ये मोलाची जबाबदारी पार पाडली.कार्यक्रमाच्या शेवटी ह.भ.प. नवनाथ महाराज यांनी संपूर्ण वारकरी संप्रदायाला मार्गदर्शन करत संत निवृत्तीनाथांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला आणि वारकरी संप्रदायाच्या एकतेचे महत्त्व अधोरेखित केले.खंडाळा गावातील या स्वागताने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले असून,परंपरेला साजेसा उत्सव मोठ्या श्रध्देने व प्रेमाने साजरा करण्यात आला.

बेलापूरःजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचे समवेत उपमुख्यकारी अधिकारी  दादाभाऊ गुंजाळ यांनी बेलापूर गावाला भेट देवून मानाच्या निवृत्तीनाथ महाराज यांचे  दिंडीचे नियोजना संदर्भात जि.परिषद सदस्य शरद नवले,बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे तसेच ग्रामस्थांशी चर्चा केली.                                                       निवृत्तीनाथ महाराज यांची ञंबकेश्वर येथून पंढरपूरला जाणारी दिंडी बेलापूरच्या भानुदास महाराज हिरवे यांनी ३५० वर्षांपूर्वी  सुरु केली.त्यामुळे सदरची दिंडी हि बेलापूर येथे मुक्कामी असते. ज्यांनी दिंडी परंपरा सुरु केली त्या भानुदास महाराज हिरवे  यांच्या विठ्ठल मंदिरात मुक्कामाला राहून दुसऱ्या दिवशी पंढरपूरकडे मार्गस्थ होते.                                                                                             निवृत्तीनाथांची दिंंडी आणि बेलापूरचे दृढ संबंध लक्षात घेवून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ,गटविकास अधिकारी प्रविण सिनारे,सहाय्यक गटविकास अधिकारी सुभाष म्हस्के,विस्तार अधिकारी विजय चराटे,दिनकर ठाकरे यांनी जि.परिषद सदस्य शरद नवले,बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे,ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे यांचेशी दिंडीचे नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली.यावेळी विष्णुपंत डावरे,दिलिप काळे,राजेंद्र लखोटिया,राजेंद्र कर्पे,किरण गंगवाल,संदीप देसर्डा ,जितेन्द्र संचेती,राज गुडे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget