Articles by "news"

श्रीरामपूर: येथील डी. डी. कचोळे विद्यालयाची इयत्ता 10 वी ची विद्यार्थिनी सायली अंबादास निकाळजे हिने नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात तब्बल 85.7 टक्के गुण मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले आहे. विशेष बाब म्हणजे सायलीने हे यश कोणत्याही खासगी शिकवणी (क्लास) किंवा अतिरिक्त मार्गदर्शन न घेता मिळवले आहे.

सायलीचे वडील रिक्षा चालक असून आई ग्रहणी आहे. घरात आईला तिच्या कामात मदत करत आणि शाळेतील अभ्यासावर लक्ष केंद्रित करत सायलीने हे यश मिळवले आहे. तिच्या या जिद्दी आणि मेहनतीच्या वृत्तीमुळे परिसरात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

डी. डी. कचोळे विद्यालयाचे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी सायलीच्या या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही सायलीने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले

श्रीरामपूर: तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे लवकरच ‘गोल्डन पाम’ या भव्य वॉटर पार्कचा शुभारंभ होणार आहे. या वॉटर पार्कचे उद्घाटन गुरुवार, १५ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महंत उद्धवजी महाराज मंडलिक (नेवासेकर) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच, आमदार हेमंतजी ओगले, चेअरमन अशोक सहकारी साखर कारखाना भानुदाची मुरकुटे, माजी उपनगराध्यक्ष करण दादा ससाणे, सत्यशील दादा शेरकर, सचिन दादा गुजर मा. विश्वस्त साईबाबा संस्थान शिर्डी, बाबासाहेब दिघे, ह भ प डॉक्टर सुभाष महाराज कांडेकर, सौ वंदनाताई मुरकुटे, सुधीर पा. नवले, अनिल पा. नवले सुभाष पाटील नवले महेश पाटील नवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गोल्डन पाम’ वॉटर पार्क आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असून, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजनाची पर्वणी असणार आहे. विविध वॉटर राईड्स आणि आकर्षक जलक्रीडांचा अनुभव घेण्यासाठी हा वॉटर पार्क निश्चितच एक उत्तम ठिकाण ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.या उद्घाटन सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक सुधीर पा. नवले आणि सुभाष पा. नवले यांनी केले आहे.

संपर्क:

गोल्डन पाम वॉटर पार्क & रिसॉर्ट पाण्याचा टाकीजवळ, बेलापूर बु., ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर

मोबाईल: ७६२०५५८५५५, ९९२२१५५५५०, ८३७८००७९००

बेलापूर ( प्रतिनिधी)-श्रीरामपुर तालुक्यातील कडीत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या सहा गाव पाणीपुरवठा योजनेच्या सुरू असलेल्या जलजीवन कामावरील पाईपला भीषण आग लागून  लाखो रुपयांचे  ठेकेदाराचे नुकसान झाले.अग्नीशामक बंड वेळेवर दाखल झाल्याने मोठी हानी टळली.                      सहा गावाला पाणी पुरवठा करणार्या खंडीत पाणी पुरवठा योजनेच्या पाईप लाईनला अचानक आग लागली .सदरील आगेची भीषणता मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवरा कारखान्याच्या अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यास वेळ लागला शेजारी च शंभर दीडशे फूट अंतरावर असलेले नारळाचे झाडे देखील पेटले. उष्ण वातावरण असल्याने धुराचा लोळ एवढा मोठ्या प्रमाणात होता की दोन अग्निशमन दल येऊन देखील आग आटोक्यात येत नव्हती. सदर कामावरील सुपरवायझर यांच्या हलगर्जीपणामुळे ही आग लागली असल्याचे नागरिक बोलत होते. सहा गावातील व कोलारसह नागरिक आगार आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र वातावरणातील उष्णता व आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने आग आटोक्यात आणण्यास विलंब झाला सदर ठेकेदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. तालुक्यात व जिल्ह्यात जलजीवांचा कामाचा खेळ खंडोबा आणि ठिकाणी पहावयास मिळाला यामध्ये ही घटना घडल्याने अनेक ठिकाणी आपापसात नागरिक बोलताना सांगत होते की जलजीवन म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा अतिशय दिन मे गतीने या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होते त्यातच ही आग लागल्याने अजून एक दीड वर्ष पुढे लुटल्याने नागरिक बोलत होते. याआधी देखील ट्रांसफार्मर शिफ्टिंग करताना सदरील पाईप ने पेट घेतला होता तरीही सुपरवायझरने दक्षता घेतली नसल्याचे नागरिक बोलत होते

बेलापूर (प्रतिनिधी)-सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने बेलापूर गावातील शासकीय कार्यालय तसेच मंदिर, मज्जिद, चर्च या ठिकाणी नागरिकांना व भाविकांना बसण्यासाठी म्हणून 20 बाकडे भेट देण्यात आले आहे.बाकडे लोकार्पणाची सुरुवात स्वामी समर्थ केंद्रा पासून करण्यात आली.सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने बेलापूर बुद्रुक बेलापूर खुर्द तलाठी कार्यालय येथे येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था व्हावी याकरिता बाकडे भेट देण्यात आले. त्याचबरोबर बेलापूर गावातील मंदिर ,मज्जिद व चर्च याही ठिकाणी बाकडे भेट देण्यात आले. या वीस बाकड्यांची अंदाजीत किंमत 50 हजाराच्या आसपास असून या बाकड्यांचा लोकार्पण सोहळा काल श्री स्वामी समर्थ मंदिर कुर्हे वस्ती बेलापूर येथे संपन्न झाला. यावेळी श्री स्वामी समर्थ केंद्राचे सेवेकरी विठ्ठल गाडे मामा व अन्य सेवकर्यांच्या  तसेच सत्यमेव जयते ग्रुपच्या सर्व सदस्यांचे उपस्थितीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांना चार बाकडे भेट देण्यात आले. यावेळी बोलताना सेवेकरी विठ्ठल गाडे मामा म्हणाले की सत्यमेव जयते ग्रुपने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात येणाऱ्या वयोवृद्ध भाविकांसाठी बाकड्यांची व्यवस्था केली त्यांनी सर्व धर्म समभाव लक्षात घेऊन मज्जिद असेल चर्च असेल त्याचबरोबर तलाठी कार्यालय याही ठिकाणी बाकड्यांची व्यवस्था केलेली आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे तितके थोडे आहे. यावेळी सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने विष्णुपंत डावरे अभिषेक खंडागळे देविदास देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले.या वेळी सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपचे राधेश्याम अंबिलवादे,सचिन वाघ, बाबासाहेब काळे,दिलीप अमोलीक,दिपकसा क्षत्रिय सचिन कणसे,विलास नागले, विशाल आंबेकर,भगीरथ मुंडलिक, नंदकिशोर दायमा,बाबुलाल पठाण, जाकीर शेख,औदुंबर राऊत,गोपी दाणी, महेश कुऱ्हे, संजय भोंडगे,महेश ओहोळ आदिंसह नागरिक उपस्थित होते.

श्रीरामपूर - येथील ह्जरत सैलानी बाबा दरबार यांचा ६६ व्या उर्स शरीफ निमित्त संदल मिरवणूक काढण्यात आली. 15 एप्रिल रोजी संपन्न झालेल्या या संदल निमित्त चादरीची मिरवणूक सैलानी बाबा दर्गाह पासून सायंकाळी निघाली. गिरमे चौक, शहीद भगतसिंग चौक, मेन रोड, महात्मा गांधी पुतळा, शिवाजी चौक, शिवाजी रोड मार्गे पुन्हा सैलानी बाबा दर्गा येथे येऊन फातेहा ख्वानी नंतर सुंदरची चादर बाबांच्या मजारीवर अर्पण करण्यात आली.
 १६ तारखेला सकाळी 11 ते पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला हजारो हिंदू मुस्लिम भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
याचवेळी यावर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते.

हजरत सैलानी बाबा बहुद्देशीय संस्था व नित्यसेवा ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर पार पडले. या शिबीराचे उद्घाटन आमदार हेमंत तात्या ओगले तसेच माजी उपनगराध्यक्ष करण दादा ससाणे यांच्या हस्ते करण्यात आले.या रक्तदान शिबिरात हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी कलीम बिनसाद व अबूबकर बिनसाद यांच्यापासून सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अस्लम दिनसाद यांचेसह सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी रक्तदान करून जनतेत सामाजिक कार्याचा एक अनोखा उपक्रम आपल्यापासूनच सुरू करायला हवा असा संदेश दिला. राज्यात अनेक ठिकाणी हिंदू मुस्लिम वाद पाहायला मिळत असतांना या ठिकाणी मात्र हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक हजरत सैलानी बाबा दरबार बहुउद्देशीय संस्था पदाधिकारी सदस्य यांच्या माध्यमातून सर्व धर्मीय लोकांनी रक्तदान करून 
हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून एकतेचा  संदेश दिला.यावेळी सर्व पदाधिकारी,सदस्य व येणाऱ्या भाविक भक्तांनी रक्तदान करून कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): 3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन कप साठी महाराष्ट्र संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली होती. दिनांक ११ एप्रिल ते १३ एप्रिल दरम्यान हैदराबाद,तेलंगणा येथे होत असलेल्या फेडरेशन कप स्पर्धेसाठी कोपरगाव येथील श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी कुमारी अनुष्का बनकर हिची महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली आहे तसेच संघाच्या प्रशिक्षकपदी श्रीरामपूरचे नितीन बलराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुरुष संघाचा कर्णधार म्हणून विनित शेट्टी व महिला संघाची कर्णधार म्हणून श्रीया गोठोस्कर यांची निवड करण्यात आली आहे.फेडरेशन कप स्पर्धेसाठी तेलंगणा,महाराष्ट्र,दिव दमन,गुजरात,छत्तीसगड हरियाणा,पंजाब व मध्य प्रदेश या आठ  राज्यांचे संघ सहभागी होणार असल्याची माहिती 3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व्ही एस ए राजू व सचिव श्री मारुती हजारे यांनी दिली.स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी म्हणून क्रीडा प्रशिक्षक श्री गौरव डेंगळे काम बघतील. निवड झालेल्या संघाचे गोदावरी बायोरिफायनरीचे (साखरवाडी)अध्यक्ष श्री सुहास गाडगे, प्राचार्य श्री के एल वाकचौरे,उपप्राचार्या शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे,नेथलीन फर्नांडिस,क्रीडा विभाग प्रमुख डॉ धनंजय देवकर तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या..


निवड झालेल्या संघ पुढीलप्रमाणे!

महाराष्ट्र पुरुष संघ : विनित शेट्टी (कर्णधार),मोहम्मद सय्यद,सागर पूजारी,प्रीथमा,रंजित पुजारी,प्रीतम व विशाल यादव 

प्रशिक्षक : योगेश तडवी


महिला महाराष्ट्र संघ:श्रीया गोठोस्कर (कर्णधार),संजना गोठोस्कर,उमा सायगावकर,उपतज्ञ कार्ले,अरमान भावे व अनुष्का बनकर.

मुख्य प्रशिक्षक : नितीन बलराज 

संघ व्यवस्थापक: गीतांजली भावे

बेलापूर (प्रतिनिधी )- बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे कडक उन्हापासून संरक्षण व्हावे या करिता बेलापूर बु ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने नगर बायपास रोडला मंडप (शेड )टाकून निवाऱ्याची सोय केल्याबद्दल बेलापूर ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपच्या सर्व सदस्यांना प्रवाशांनी मनापासून धन्यवाद दिले आहे.                .  बेलापूर बायपासला ओढ्यावर फुलाचे काम चालू आहे. हे काम गेल्या दीड दोन महिन्यापासून सुरू आहे त्यामुळे श्रीरामपूर हुन नगर कडे जाणाऱ्या व नगरहून श्रीरामपूर कडे येणाऱ्या बसेस या बेलापूर बस स्टॅन्डवर न येता बाहेरुन जातात.  बसने प्रवास करणारे सर्व प्रवासी हे बायपासलाच जाऊन थांबतात. ज्या ठिकाणी प्रवासी उभे राहतात तिथे कुठलीही सावली नव्हती. प्रवाशांना बसची वाट पाहत उन्हातच उभे रहावे लागत होते ही बाब जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व सत्यमेव जयते ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य देविदास देसाई यांच्या लक्षात आली व सामाजिक दायित्व म्हणून या ठिकाणी तात्पुरते शेड किंवा मंडप उभा करून देण्याची अत्यंत आवश्यकता असल्याची बाब  ग्रामपंचायत पदाधिकारी व सत्यमेव जयते ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या लक्षात आणून दिली. ग्रुपचे सदस्य व बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी तातडीने या ठिकाणी प्रवासांच्या सोयीकरिता शेडचा मंडप टाकून दिला .त्यामुळे आता प्रवाशांना बसची वाट पाहत सावलीत थाबंता येते.ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने बायपासला तात्पुरता बस स्टॅन्ड  निवारा म्हणून शेड उभे करण्यात आले आणि त्या शेडचा लाभ खरोखर आता अनेक प्रवासी घेत आहेत.ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने उभारलेल्या या तात्पुरत्या बस थांबा निवाऱ्यामुळे प्रवाशांना उन्हापासून थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे.

बेलापूर /(प्रतिनिधी)-  येथील दुकानासमोर पडलेली एक तोळ्याची अंगठी बेलापूर येथील मिठाई व्यापारी एकनाथ नागले यांनी प्रामाणिकपणे ग्राहकास परत केली असून नागले यांच्या प्रामाणिकपणाबद्दल  सर्वत्र कौतुक होत आहे.                    याबाबत माहिती अशी की बेलापूर खुर्द येथील अमोल रामनाथ पुजारी यांचे नातेवाईक संतोष दामू शिंदे व सुनील नामदेव शिंदे राहणार संगमनेर हे काही कामानिमित्त बेलापूर येथे आले होते आपले काम आटोपल्यानंतर ते बेलापूर येथील एकनाथ नागले यांच्या श्री बालाजी स्विट गोडीशेव रेवडी या दुकानात गेले त्यावेळी त्यांच्या पत्नी सौ शैलाबाई नागले या दुकानात होत्या संतोष व सुनील शिंदे यांनी नागले यांच्या दुकानात गोडीशेव व रेवडी फरसाण विकत घेतली. घेतलेल्या मालाचे पैसे देण्याकरता त्यांनी खिशातून पैसे काढले त्याच वेळेस त्यांच्या खिशात असलेले अंगठी देखील खाली पडली ही बाब त्यांच्या लक्षात आली नाही. पैसे देऊन ते निघून गेले. त्यानंतर  सौ शैलाबाई नागले यांना त्यांच्या दुकानासमोर एक अंगठी पडलेली दिसली त्यांनी ती उचलून पती एकनाथ नागले यांच्याकडे दिली. ती अंगठी सोन्याची असल्याचे नागले यांच्या लक्षात आले व आपल्या दुकानावर नुकतेच आलेले ग्राहक यांचीच ती पडली असावी अशी शंका त्यांना आली व काही तासाने शिंदे बंधु देखील या ठिकाणी येऊन अंगठीची विचारपूस करू लागले. ते प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होते. त्यावेळी नागले यांनी त्यांना सांगितले की काळजी करू नका तुमची अंगठी येथेच पडली होती आणि ती व्यवस्थित आहे त्यानंतर त्यांनी याबाबत बेलापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे यांना कल्पना दिली त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे यांच्या हस्ते ती एक तोळ्याची सोन्याची अंगठी मूळ मालक संतोष दामू शिंदे  यांना देण्यात आली. बेलापूर येथील प्रसिद्ध हलवाई श्री एकनाथ नागले व त्यांच्या पत्नी सौ शैलाबाई नागले यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

श्रीरामपूरच्या विकासासाठी अनेक प्रकल्पांची केली मागणी


मतदारसंघासह राज्याच्या प्रश्नांचा घेतला आढावा

सलीमखान पठाण (प्रतिनिधी)श्रीरामपूर - सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाचे अधिवेशनामध्ये काल रात्री श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणाद्वारे राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेत भाग घेतला आणि श्रीरामपूर सह राज्यातील अतिक्रमणाच्या प्रश्नावर सरकारने घेतलेल्या भूमिकेचा जाहीर धिक्कार केला.

काल दिवसभर राज्यपालांचे अभिभाषणावर चर्चा सुरू होती.मात्र सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षांना फारशी बोलायची संधी दिली नाही.काँग्रेसच्या आमदारांना तर पार शेवटी संधी मिळाली.रात्री साडेसात वाजता आमदार ओगले बोलण्यास उभे राहिले. आपल्या सुमारे बारा मिनिटाच्या घणाघाती भाषणात त्यांनी सरकारचे वाभाडे काढले.

श्रीरामपूर सह राज्यामध्ये सध्या अतिक्रमणाचा प्रश्न गाजत आहे.सरकारने अतिक्रमण काढताना 08 मार्च 2019 चा जो जी आर आहे.त्यानुसार सर्वांना घरे देण्याचे जाहीर केलेले आहे. 2011 पूर्वीच्या लोकांना ते जिथे राहतात तिथेच घरे देण्याचा शासनादेश आहे.मात्र या आदेशाची पायमल्ली करत अत्यंत निर्दयीपणाने श्रीरामपूरात अतिक्रमणे काढण्यात आली. बाराशे दुकाने आणि 130 घरे जमीन दोस्त करण्यात आली.अनेक प्रपंच रस्त्यावर आले. त्यांना दोन वेळच्या जेवणाची सुद्धा आता चिंता लागली आहे असे सांगून अतिक्रमण काढताना कोणतीही दयामया दाखवण्यात आली नाही.दोन महिन्यांची बाळंतीण आपल्या बाळाला घेऊन या अतिक्रमण काढणाऱ्या लोकांना आडवी आली तरी तिचे घर जमीन दोस्त करण्यात आले.सध्या हे कुटुंब रेल्वे स्टेशनवर राहत असल्याचे सांगून मानवता धर्म हा काही प्रकार आहे याची सरकारला जाणीव आहे का असा प्रश्न विचारून त्यांनी सरकारचा धिक्कार केला.


इतर मुद्द्याचा परामर्ष घेताना आमदार ओगले यांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तसेच मुंबईतील हिंदू मिल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाचे काम का रखडले आहे ? ते कधी पूर्ण होणार असा प्रश्न विचारला. 

एकात्मिक औद्योगिक केंद्र व माल वाहतूक केंद्र राज्यामध्ये निर्माण करण्याचे सरकारचे धोरण आहे. यामध्ये अनेक ठिकाणी औद्योगिक भूखंड पडीक आहेत.सदरचे केंद्र श्रीरामपूर येथे व्हावे.या ठिकाणी विमानतळ,चांगले रस्ते, रेल्वे सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे एकात्मिक औद्योगिक केंद्र श्रीरामपूरला देण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान राबवताना शेतकऱ्यांच्या कापसाला आठ हजार रुपये क्विंटल भाव द्यावा तसेच शेतकऱ्यांच्या उसाला चार हजार रुपये टन भाव द्यावा अशी मागणी केली. 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील निवड झालेल्या एक लाख युवकांना गेल्या सहा महिन्यापासून पगार मिळालेला नाही. तो त्यांना त्वरित मिळावा तसेच सदरचा प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा करण्यात यावा अशी ही मागणी त्यांनी केली.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिर्डी - शिंगणापूर हे आंतरराष्ट्रीय तीर्थस्थान असून दोन्ही तीर्थस्थानांना जोडणारा  नगर मनमाड रस्ता हा गेली अनेक वर्ष खराब झालेला आहे.हजारो माणसे त्या ठिकाणी मेलेली आहेत.तरी हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याबाबत संबंधितांना योग्य आदेश द्यावेत असे ते म्हणाले. सोयाबीन खरेदीमध्ये होणारा भ्रष्टाचार शोधून काढण्याची मागणी देखील त्यांनी केली. अंगणवाडी सेविका निवड समितीचे अध्यक्ष पद आमदारांकडे होते. त्यात आता बदल करण्यात आला आहे. तसेच एस सी व ओबीसी चे गुण कमी केले आहे.त्यामुळे एससी आणि ओबीसी चे आरक्षण कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे का ? असा प्रश्न विचारून सदरचे प्रवर्ग आरक्षण नियमित करावे व तोपर्यंत ही भरती स्थगित करावी अशी मागणी त्यांनी केली. 

2011 पूर्वीच्या कॉलेजेसना शंभर टक्के अनुदान द्यावे असेही ते म्हणाले. 

मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये क्रीडा संकुले उभारण्यात यावी, त्यामध्ये श्रीरामपूरचा अग्रक्रमाने विचार करावा अशी जोरदार मागणी त्यांनी केली. 

घर घर संविधान कार्यक्रमांतर्गत सरकार काही उपक्रम राबवीत आहे. परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मोडतोड करण्यात आली तसेच संविधानाचा अपमान करण्यात आला.या घटना करणाऱ्यांना कडक शिक्षा करावी अशी मागणी त्यांनी केली. 

श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील राहणारा मी असून त्या ठिकाणी बहादूरगड किल्ला आहे. या किल्ल्याशी छत्रपती संभाजी महाराजांच्या आठवणी निगडित आहेत.तरी सदरच्या किल्ल्या चा राष्ट्रीय स्मारकात समावेश करावा अशी ही मागणी त्यांनी केली. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती.मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ती सुद्धा त्वरित करावी असेही ते म्हणाले.


चौकट

सरकारच्या एकूणच कामकाज करण्याच्या पद्धतीवर आसूड ओढतांना आमदार हेमंत ओगले यांनी आपल्या भाषणात -


*बडी सफाई से झूट बोलते है कुछ लोग,उन्हे खबर भी नही हमे सब कुछ बखुबी मालूम है* 


असा शेर सादर करून आपल्या भाषणाला सुरुवात केली.


*आमदारांचे अभिनंदन*

आमदारकीला निवडून आल्यानंतर हेमंत ओगले यांचे हे दुसरे अधिवेशन होते यापूर्वी नागपूर येथे अल्पकालीन अधिवेशन झाले होते.दोन्ही अधिवेशनात त्यांनी श्रीरामपूर मतदारसंघाच्या विकासाचे प्रश्न आवर्जून मांडले.यापूर्वी कधीही असं झालं नव्हतं.तालुक्याच्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करून विधानमंडळात त्यावर आवाज उठविल्याबद्दल आमदार हेमंत ओगले यांचे श्रीरामपूर शहर व तालुक्यातील जनतेने अभिनंदन केले आहे .


चौकट

*पुन्हा ती गांधी टोपी*

काल विधानसभेत आपल्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी आमदार ओगले यांनी श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे असे वाक्य लिहिलेली गांधी टोपी पुन्हा एकदा प्रधान केली होती. विधानसभेत प्रत्येक वेळी बोलताना ते या टोपीचा वापर करतात त्यामुळे श्रीरामपूर जिल्ह्याच्या प्रश्नाला विधानसभेत चालना मिळते कालही आपले भाषण करताना त्यांनी ही टोपी परिधान केली होती. विधानसभेत तो एक चर्चेचा विषय होता.

बेलापूर

( प्रतिनिधीश्री )--दधिमथी वैदिक गुरुकुलच्या वतीने घेण्यात आलेल्या तृतीय वर्षाच्या वार्षिक परिक्षेत बेलापुरातील महेश दायमा याने प्रथम क्रमांक मिळवला असुन पुढील धार्मिक विधी परीक्षेसाठी त्याची निवड झाली आहे त्याकरिता लवकरच तो( काशी) वाराणसी येथे जाणार आहे त्याबद्दल श्रीराम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष परमपूज्य गोविंद देवगिरी जी महाराज यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला हिन्दुस्तानातील प्रसिद्ध अशा धार्मिक वैदिक संस्कृतीचे शिक्षण देणारा श्री दधिमथी वैदिक गुरुकुल हे  देशात सर्व परिचित आहे हे गुरुकुल गोठमांगलोद जि . नागौर राजस्थान येथे आहे. या शिक्षण संस्थेत सर्व धार्मिक ,वैदिक,सांस्कृतिक विधीचे शिक्षण दिले जाते या गुरुकुलामध्ये सण 2021 मध्ये पत्रकार दिलीप दायमा यांनी आपले चिरंजीव महेश दायमा यास धार्मिक व विधियुक्त पौराहित्य शिकविण्यासाठी पाठविले होते महेश दायमा याने तीनही वर्षात सलग प्रथम येण्याचा बहुमान मिळविला तृतीय वार्षिक परिक्षेत  सर्वोच्च गुण मिळवून त्याने पहिला क्रमांक पटकवीला. काल श्रीदधिमथी वैदिक गुरुकुल राजस्थान येथे श्रीरामंदिर आयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष परम पुज्य श्रद्धेय स्वामी गोंविंददेव गिरीजी महाराज याच्या शुभहस्ते महेश दायमा याचा सत्कार करण्यात आला. गुरुकुल संस्थेने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता . त्यावेळी आपल्याच मातृभूमीत जन्मलेल्या महेश दायमायाने प्रथम प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांना विशेष आनंद झाला महेश दायमा याने ॐ चैरिटेबल ट्रस्ट तर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेतही सर्वोत्कृष्ट गुण मिळवून आपले कौशल्य दाखवून दिले होते त्याच्या या चमकदार कामगीरी मुळे महेश दायमा याची आता पुढील वैदिक व सांस्कृतिक परिक्षेसाठी श्रीक्षेत्र वाराणसी ( काशी ) उत्तर प्रदेश येथे निवड करण्यात आली आहे आहे . वैदीक गुरुकुल शिक्षणात महेश दायमा याला श्री. दधिमथी वैदिक गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल दायमा, सचिव हरिणारायण व्यास, कोषाध्यक्ष जयकिशन, संचालक समिती अध्यक्ष भालचंद्र व्यास, सहसचिव रूपनारायण असोपा, अध्यापक कमल किशोर जोशी, निदेशक सुभाष मिश्रा यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. महेश दायमा याच्या या यशाबद्दल आमदार हेमंत ओगले जेष्ठ पत्रकार मनोज आगे, अरुण पा . नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले , श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे,  बाळासाहेब आगे, भास्करराव खंडागळे अभिनंद केले.  .

श्रीरामपूर- (प्रतिनिधी)के.जे.सोमैंया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव. संजय जोशी  व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन मा.विजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूरचे आमदार  हेमंत ओगले  हे होते. अध्यक्षीय भाषणात आमदार हेमंत ओगले यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात तुम्ही स्वप्न पहा,डॉक्टर, इंजिनीयर, व राजकारणात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपली स्वप्ने पूर्ण करा. असा बहुमोल सल्ला दिला या कार्यक्रमात त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तसेच स्कूल कमिटीचे सदस्य  नितीन गगे  यांनी विद्यार्थ्यांना एच.एस.सी.बोर्ड परीक्षेस शुभेच्छा देऊन सर्वांना सुरुची भोजनाचा आस्वादाचा लाभ करून दिला. शालेय समिती सदस्य मा.महेश  टांकसाळ ् यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना आई-वडील व शिक्षक यांचे आपल्यावर कसे संस्कार होतात याबद्दल माहिती सांगून विद्यार्थ्यांना परीक्षेस शुभेच्छा दिल्या व कॉलेजला भेट म्हणून रोख रक्कम दिली . त्याचबरोबर शालेय समिती सदस्य माणिक जाधव, नवनाथ कर्डिले .अनिल औताडे श्री.उमेश तांबडे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून परीक्षेस शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमास आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील माजी विद्यार्थी चि.यश मनोज नवले याची अशियाई पावर लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 साठी निवड झाली आहे व त्याचबरोबर चि. धीरज सोनवणे याला 21 जानेवारीला पार पडलेल्या श्रीरामपूर श्री ह्या स्पर्धेत पहिला क्रमांक, व श्रीरामपूर श्री champion of champion हे टायटल मिळालं आणि
11 डिसेंबरला झालेल्या सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ ह्या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळालं व  All India Inter University नॅशनल साठी सिलेक्शन झाल्याबद्दल  दोघांनाही शुभेच्छा देण्यात आल्या व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला . डॉ.बा.ग.कल्याणकर रात्र प्रशालेचे चेअरमन मा.श्री. चंद्रकांत सगम व मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय कांबळे, शा.ज.पाटणी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भांगरे विठ्ठल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जाधव चंद्रकला यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शेटे योगेश यांनी केले, 
स्वागत गीत श्री. बाबा वाघ व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी यांनी केले. मान्यवरांचा परिचय व स्वागत प्रा.जाधव दिपाली यांनी केले. अध्यक्ष सूचनेस अनुमोदन प्रा. कुमावत सुवर्णा यांनी दिले. बक्षीस वितरण प्रा. ताजने मंजुषा यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. कल्याण लकडे सर व प्रा. शेरअली सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.राऊत अविनाश यांनी केले या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे श्री. चरणदास सुरवडे , सानप, जपकर , शेजुळ , भगत, भालेराव याचे मोलाचे सहकार्य मिळाले.


श्रीरामपूर (प्रतिनिधी ) माजी आ. भानुदास मुरकुटे व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या अधीपत्याखालील श्रीरामपूर तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीने पुढील आर्थिक वर्ष 2025- 26 या आर्थिक वर्षासाठी 16 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे, अशी माहिती सभापती सुधिर नवले पा. यांनी दिली आहे.


यंदाच्या अर्थसंकल्पाप्रमाणे 5 कोटींचे एकुण उत्पन्न अपेक्षित आहे. त्यानुसार 1 कोटी 38 लाखांचा वाढावा होणार आहे.यंदाच्या अर्थसंकल्पात 8 कोटी 70 लाख रुपयांची विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत.त्यात श्रीरामपूर नगर परिषद रोडलगत 5 कोटी खर्चाच्या भव्य शेतकरी मॉलमध्ये शॉपिंग सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे.शेती महामंडळाची जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे.


श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालय समोरील मुख्य रस्ता तसेच बेलापूर व टाकळीभान येथील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, टाकळीभान येथे नवीन पेट्रोल पंपाची उभारणी, श्रीरामपूर येथील मुख्य बाजाराच्या आवारात साठवण टाकी अंतर्गत पाईपलाईन करणे व नियोजित डाळिंब मार्केट आदी कामे हाती घेतली आहेत, असेही नवले यांनी सांगितले.


त्यांनी पुढे सांगितले की, सध्या श्रीरामपूर येथील मुख्यालयाच्या आवारात कांदा मार्केटमध्ये 2 कोटी खर्चाच्या रस्त्याचे काँक्रिटिकरण,दिड कोटी रुपये खर्चाच्या 15 गाळ्यांचे पूर्णत्वाकडे आहेत.बेलापूर उपबाजारात 60 लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे काँक्रिटिकरण व 12 लाख खर्चाच्या दुकान गाळ्यांची दुरुस्ती तसेच टाकळीभान येथील उपबाजारात साडेनऊ लाख खर्चाच्या दुकान गाळयांच्या दुरुस्तीचे काम सुरु सुरु आहे.


बाजार समितीची सर्व विकास कामे शेतकरी केंद्रास्थानी ठेऊन सुरु आहेत.प्रस्तावित कामांमबरोबरच श्रीरामपूर येथील पेट्रोल पंप आवारात सीएनजी गॅस केंद्र सुरु करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे.संस्थेची 30 एप्रिल 2023 रोजी निवडणूक होऊन आपण 13 मे 2023 पासुन कारभार हाती घेतला असुन संस्थेचा कारभार काटकसरीने आणि पारदर्शी पद्धतीने सुरु असल्याचे सभापती सुधिर नवले आणि सचिव साहेबराव वाबळे यांनी सांगितले.


श्रीरामपूर - नगरपालिकेने सात दिवसापूर्वी दिलेल्या नोटिसीची मुदत संपल्यानंतर आज सकाळी साडेदहा वाजता नगरपालिकेचे अतिक्रमणविरोधी विभागाने मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, अतिक्रमण अधिकारी संजय शेळके, नगर अभियंता सूर्यकांत गवळी आदींच्या फौज फाट्यासह बेलापूर रोड पासून रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली.मोठ्या प्रमाणात लोकांच्या मालमत्तेची नासधूस झाल्याचे दिसून आले.

सदर मोहीम राबविताना पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपुजे व शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विशेष कृती दलाच्या तुकडीसह महिला पोलीसही यामध्ये सहभागी झाले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने कोणीही फारसा प्रतिकार केला नाही. दोन जेसीबी, फायर फायटरची गाडी आणि इतर नगरपालिकेचा स्टाफ यांच्या सहकार्याने सदरची अतिक्रमण मोहीम राबविली जात आहे. यावेळी रस्त्यावर बघ्यांची खूप मोठी गर्दी झालेली आहे .

बेलापूर रोडला पश्चिम बाजूने ही मोहीम सुरू झाल्यानंतर पूर्वेकडील लोकांनी स्वयंस्फूर्तीने आपली अतिक्रमणे काढायला सुरुवात केली आहे. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पत्र्याचे शेड, दुकाने पुढे आल्याचे दिसून आले. अनेकांनी आपले सामान हलवण्यासाठी पूर्ण कुटुंब रस्त्यावर उतरवल्याचे ही दिसत आहे.

सदरची अतिक्रमण मोहीम थांबवावी किंवा दुकानदारांचा सहानुभूतीने विचार करावा याबाबत शहरातील राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन साकडे घातले.आमदार हेमंत ओगले, माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाने आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून याबाबत विनंती केली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी शासन नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिल्याने पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ही मोहीम राबविली जात आहे.

सदरची मोहीम सुरू राहणार असून नागरिकांनी आपापली अतिक्रमणे काढून घेऊन आपले नुकसान टाळावे व नगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केली आहे.

बेलापूर (प्रतिनिधी)-बेलापूर खुर्द येथील सहयोग सामाजिक मंचच्या वतीने मारुती मंदिर बेलापूर खुर्द येथे भाविकांना बसण्यासाठी दोन बाक त्याचबरोबर बेलापूर खुर्द येथील स्मशानभूमीकरिता दोन बाक व  एक तिरडी तसेच शिकळी प्रदान करण्यात आली.               बेलापूर खुर्द येथील सहयोग सामाजिक  मंच नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते गावात होणारे निधन व त्यानंतर नातेवाईकांची होणारे धावपळ हे लक्षात घेऊन सहयोग सामाजिक मंचने बेलापूर खुर्द येथील ग्रामपंचायतीला एक तिरडी व शीकळी प्रदान केली तसेच बेलापूर खुर्द येथील मारूती  मंदिरात दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांसाठी बसण्याकरता दोन बाक व बेलापूर खुर्द येथील स्मशानभूमीसाठी दोन बाक भेट देण्यात आले. यावेळी सहयोग सामाजिक मंचचे ज्येष्ठ सदस्य पंढरीनाथ बोर्डे ज्ञानदेव महाडिक बाबुराव फुंदे भाऊसाहेब म्हसे जगन्नाथ महाडिक पुंजाहरी सुपेकर गुरुजी नंदकुमार कुर्हे अशोक सुळ अशोक क्षीरसागर सहयोग पुरुष बचत गटाचे अध्यक्ष प्रशांत बडदे उपसरपंच दीपक बारहाते ग्रामपंचायत सदस्य नयनाताई बडदे राणीताई पुजारी ग्राम विकास अधिकारी तुकाराम जाधव निलेश बडदे जगन्नाथ बडदे विलास भालेराव अर्जुन गोरे सुनील बाराते जगन्नाथ बडदे आधीच ग्रामस्थ उपस्थित होते. सहाय्यक सामाजिक सहयोग मंचावतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले

बेलापूर (वार्ताहर)श्रीरामपूर तालुका सहकारी फेडरेशनच्या वतीने  पहिल्या गटात गावकरी सहकारी पतसंस्थेला श्रीरामपूर  तालुक्यातील सर्वोत्तम कार्यक्षम पतसंस्था म्हणून प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.यावेळी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक व तालुका फेडरेशनचे अध्यक्ष वासुदेव काळे , अनिरुद्ध महाले, याकुबभाई बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथील गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्षा सौ.राजश्री पाटील आणि श्रीमंत थोरले बाजीराव पतसंस्थेचे चेअरमन नारायण वाझे यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक चेअरमन साहेबराव वाबळे यांच्यासह संचालक मंडळाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.कार्यक्रमास सर्वश्री संचालक व्हा.चेअरमन रामेश्वर सोमाणी,जालिंदर पा. कु-हे, शशिकांत उंडे, जनार्दन ओहोळ, रावसाहेब अमोलीक,अजीज शेख, कुलकर्णी यांच्यासह व्यवस्थापक व सेवकवृंद उपस्थीत होते. या सुयशाबद्दल सभासद, खातेदार आणि ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळीभान या ठिकाणी भेट दिली आसता त्या ठिकाणी वृत्तपत्रात प्रसिध्द झालेली  प्रसूती महिलेची झालेले हेडसांड या आशयाच्या बातमीच्या अनुषंगाने भेट दिली असता दोन्ही वैद्यकीय अधिकारी आपल्या कर्तव्यावर  हजर नसल्याचे आढळून आले प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केवळ तीनच कर्मचारी हजर होते परंतु बातमीदार आल्याचे समजतात हळूहळू एक एक जण गोळा होऊ लागले मागील महिन्यात परिसरातील रात्री प्रसुती रुग्ण महिला बेलपिंपळगाव तालुका नेवासा येथून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसूतीसाठी रात्री साडेनऊ वाजता आल्याचे समजले त्यावेळी त्यांना निवासी सिस्टर यांनी तपासले होते त्यानंतर तिला प्रसूतीला वेळ लागेल व पोटात दुखत असल्यामुळे तिला ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर या ठिकाणी संदर्भित केले सदर रुग्णाला घेऊन जाण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ॲम्बुलन्स त्यांनी मागणी केली त्यावेळी त्या ठिकाणी ड्रायव्हर उपस्थित होते त्यांनी गाडीची चावी यापूर्वी त्या ठिकाणी काम करत असणाऱ्या स्थानिकप्राथमिक आरोग्य केंद्रात राहणाऱ्या सिस्टर यांच्याकडे स्थानिक वैद्यकीय अधिकारी यांच्या आदेशाने जमा केली असल्याची माहिती मिळाली 


या संदर्भात महिला पेशंटच्या नातेवाईकांनी त्यांना विनंती करून देखील त्यांनी अंबुलन्स दिली नसल्याची माहिती वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती त्या ठिकाणी कंत्राटी बेसवरील कर्मचारी ड्रायव्हर यांची ऑर्डर संपलेली होती त्यामुळे त्यांनी रुग्णास ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन जाण्यास नकार दिला त्यामुळे रुग्ण हे गावातील एका व्यक्तीच्या वाहनाने ग्रामीण रुग्णालय पोहोचले त्या ठिकाणी सदर रुग्नेची लगेच प्रसूती झाली नाही तिची प्रसूती ही चवथ्या पाचव्या दिवशी संध्याकाळी झाली असल्याची माहिती पंचायत समिती तालुका आरोग्य अधिकारी डॉकटर मोहन शिंदे यांच्याकडे संपर्क साधला असता मिळाली या वेळी बातमीत सत्यता नसून बातम्या कुठल्याही प्रकारची शहानिशा झाली नाही

असे डॉक्टर शिंदे यांनी सांगितले तसेच या टाकळीभान प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर अनेक वेळा गैर हजर राहतात याविषयी माहिती विचारली आसता या संदर्भात आपण वरिष्ठांना पत्रव्यवहार पूर्वीही वेळोवेळी केल्याचे त्यांनी सांगितले


बेलापूरःआज माणूस भौतिक  सुखाच्या मोहजालात अडकल्याने त्याचे जिवन कष्टमय बनले आहे.यातून बाहेर पडून जगणे सकारात्मक करणे हाच जिवन आनंदी  करण्याचा मंञ असल्याचे प्रतिपादन बेलापूर पञकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे यांनी केले.                               साविञीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आर.बी.एन.बी काॕलेज व स्वामी सहजानंद भारती काॕलेज आॕफ एज्युकेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित शिबिरात "जिवन जगण्याची कला"या विषयावर श्री.खंडागळे प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.यावेळी प्रा.डाॕबाबासाहेब तोंडे,प्रा.डाॕ.भागवत शिंदे,प्रा.डाॕ जलाल पटेल,प्रा.डाॕ.किरण थोरात,प्र.किर्ती अमोलिक ,प्रा.वैशाली वाघ,प्रा.डाॕ.मेघराज औटी उपस्थित होते.                                                                  श्री.खंडागळे म्हणाले की,आधुनिक भौतिक साधनांनी मानवी जिवन बदलून टाकले आहे.या साधनांनी मानवी भौतिक सुखी झाला असला तरी तो मानसिक सुखाला पारखा झाला आहे.माणसातील संवाद हरपला असून जगण्यात कृञिमपणा आला आहे.आज पैशाला नको इतके महत्त्व प्राप्त झाल्याने पैशासाठी जिवघेणी स्पर्धा सुरु झाली आहे.या स्पर्धेत ख-या जगण्याची घुसमट होत आहे.                                                                                      जिवन हे अतिशय सुंदर आहे आणि ते आनंदाने कसे जगावे हे आपल्या हाती आहे.आजकाल माणसे चिंता विकत घेतात घेतात.यामुळे तो दुःखी होतो.जगण्यातला विनोदही हरवत चालला आहे.खरे तर विनोद हे अत्यंत चांगले औषध असून विनोदामुळे जगणे सुसह्य होते.विनादामुळे व हसत खेळत राहिल्याने नकारात्मक विचारांना तिलांजली मिळते.कोणतीही हाव न धरता आणि भौतिक साधनांच्या मागे न पळता सकारात्मकतेने जगणे हा आनंदी जीवनाचा मंञ आहे असे श्री.खंडागळे यांनी अनेक मजेदार किस्से सांगून विशद केले त्यास विद्यार्थ्यांनी मनमुराद दाद दिली.                                                                                       प्रा.डाॕ.भागवत शिंदे यांनी अतिथी परिचय करुन दिला , देविदास गावित याने सूञसंचलन केले तर प्रा.डाॕ.किरण थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी अध्यापकांसह विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी आदी उपस्थित होते.आज गुरुवार (ता.९)रोजी सकाळी १० वा.शिबिराचा मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.

बेलापूर (प्रतिनिधी)-शासनाने हॉटेलमधून प्लॅस्टिकच्या कपामध्ये चहा देण्यावर बंदी घातलेली असताना बेलापूर गाव व परिसरात सर्व हॉटेलमध्ये सर्रासपणे नियमाचे उल्लंघन करून प्लास्टिक कप मध्ये चहा दिला असून हा प्रकार म्हणजे ग्राहकांच्या आरोग्याची खेळण्याचाच प्रकार असून बेलापूर ग्रामपंचायत ने याबाबत तातडीने दखल घ्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे    बेलापूर गाव व परिसरात अनेक हॉटेल्स असून या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या नावाने दर्जेदार चहाची विक्री केली जात आहे बेलापूर गावात चहा पिणारे अनेक शौकीन देखील आहेत या चहा शौकिनांची हाऊस पुरवण्याकरता चहा विक्रेत्यांनी वेगवेगळ्या नावाने इतरांपेक्षा आपण कसा दर्जेदार चहा ग्राहकांना देऊ या करता प्रत्येक जण प्रयत्नशील आहे परंतु ही विक्री करताना चहा पिण्यासाठी वापरण्यात येणारे कपबशी, काचेचे ग्लास हे धुण्याचा त्रास होऊ नये म्हणून वापरा आणि फेका अशा प्रकारचे प्लास्टिकचे कप वापरले जात होते परंतु हे कप चहा पिणाराच्या आरोग्यास घातक असल्यामुळे शासनाने या प्लास्टिक कप वर बंदी आणलेली आहे असे असतानाही बेलापुरातील सर्व हॉटेल्स वर ग्राहकांना या प्लॅस्टिकच्या कप मधूनच चहा दिला जात असून प्रशासनाने याबाबत दखल घ्यावी व हॉटेल व्यवसायिकांना प्लॅस्टिकचे कप वापरण्यावर बंदी घालावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे

बेलापूर प्रतिनिधी: अंधश्रद्धेमुळे समाजाचे शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान होत असल्यामुळे सर्वांनी अंधश्रद्धेपासून दूर राहावे, श्रद्धा ठेवा, परंतु अंधश्रद्धा, अंधविश्वास ठेवू नका असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते देविदास देसाई यांनी केले.              

बेलापूर खुर्द येथील श्री हरिहर केशव गोविंद भगवान बन येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व रयत शिक्षण संस्थेचे रावबहादूर नारायणराव बोरावके कॉलेज ,श्रीरामपूर आणि स्वामी सहजानंद भारती कॉलेज ऑफ एज्युकेशन श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष संस्कार शिबिर सन 2024- 25 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबिरार्थी समोर मार्गदर्शन करताना ते  प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 

शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना देविदास देसाई पुढे म्हणाले की श्रद्धा असावी‌. पण ती डोळस असावी. आज समाजात देवाधर्माच्या नावाखाली खुलेआम फसवणूक केली जात आहे. अंगात येणे हा एक मानसिक आजार असून अशा आजारी व्यक्तींना त्वरित मानसोपचार तज्ञाकडे नेणे आवश्यक आहे. भूत, भानामती, करणी करण्याच्या नावाखाली आज मोठ्या प्रमाणात आर्थिक  फसवणूक केली जात आहे. यातून समाजाची फार मोठी हानी होते. कुणालाही जादूटोणा तंत्र मंत्र करता येत नाही. असे जर  असते तर आपण आपल्या देशाच्या सीमेवरील सैन्य हटवून हे तंत्र मंत्र करणारे बुवा बाबा यांनाच सीमेवर बसवून मंत्र मारून समोरील शत्रूसैनिक मारण्यास सांगितले असते. परंतु तसे काही होत नाही. त्यामुळे कुणीही तंत्र मंत्र विद्या वशीकरण यास घाबरून जाऊ नये. आपल्या साधूसंतांनी देखील अंधश्रद्धेवर कडाडून टीका केलेली आहे. सोळाव्या शतकात संत तुकाराम महाराजांनी नवसे करणे कन्यारत्न होती, तरी का करणे लागे पती असे सांगितलेले असतानाही आजही मुलं होण्याकरता नवस केले जातात हे दुर्दैव आहे. आज गुप्तधनाच्या लालसेपोटी नरबळी दिल्याच्याही घटना घडत आहेत. माणूस  मंगळ ग्रहावर वस्ती करण्याच्या प्रयत्नात असतानाच गुप्तधनाच्या लालसे पोटी लहान बालकांचे बळी दिले जात आहेत हे दुर्दैवच म्हणावे लागेल. माता पित्याची जिवंतपणीच सेवा करा. भविष्य हे थोतांड असून त्यावर विश्वास ठेवू नका. आपल्या मनगटावर विश्वास ठेवून काम करा यश आपोआपच मिळेल. भविष्य म्हणजे ठराविक ठोकताळे  असतात असे ते म्हणाले. त्यावेळी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत असताना पकडलेल्या भोंदू बाबाचे अनेक किस्से विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांनीही त्यास टाळ्याच्या गजरात भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. जलाल पटेल  यांनी करून दिला. अध्यक्षिय मनोगत डॉ. योगिता रांधवणे यांनी व्यक्त केले. त्यातून त्यांनी अंधश्रद्धेच्या विचारापासून सर्वांना दूर राहण्याचे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाधिकारी डॉ. बाबासाहेब तोंडे, प्रा. डॉ. किरण थोरात, प्रा. कीर्ती अमोलिक, डॉ. चेतना जाधव, प्रा. वैशाली वाघ, प्रा. समीना शेख, प्रा. प्रतिभा गाडे आदीसह विद्यार्थी विद्यार्थिनी व नागरिक उपस्थित होते. शेवटी प्राध्यापक डॉक्टर भागवत शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले

खंडाळा (गौरव डेंगळे) : खंडाळा येथील चित्तरंजन येथे गट नंबर ५३,५४,५५  शॉर्टसर्किटमुळे रविवार (दि.५ जानेवारी) लागलेल्या आगीत ८ ते १० एकर ऊस खाक झाल्याने शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.या शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.

खंडाळा येथे रविवारी दुपारी १:०० वाजेच्या सुमारास विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे ऊस पिकाला आग लागली. यामध्ये शेतकरी नवनाथ गंगाधर ढोकचौळे, रावसाहेब रंगनाथ ढोकचौळे, बबन किसन ढोकचौळे, सागर शंकर सदाफळ या शेतकर्‍यांच्या शेतातील ऊस व ठिबक सिंचन जळून गेला.या सर्वांची शेती एकमेकाला लागून असून,या सर्वच ८ ते १० एकरामधील क्षेत्रावर उसाचे पीक होते. या ठिकाणी अचानक वीजवाहक तारांमध्ये घर्षण होत उसाला आग लागली. यावेळी प्रवारा कारखान्याचा अग्निशमन बंब बोलावला गेला होता. पण आटोक्यात काय आग आली नाही.गावातील १०० ते २०० युवकांनी देखील आज आग विजवायचा प्रयत्न केला. यावेळी कामगार तलाठी पवार भाऊसाहेब व त्यांचे सहकारी दिलीप रंधे यांनी घटनास्थळी येऊन जळीताचा पंचनामा केला.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget