या स्पर्धेत श्रीराम अकॅडमी, श्रीरामपूरने प्रथम क्रमांक पटकावला. श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगावने द्वितीय क्रमांक तर संत विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल, अहिल्यानगरने तृतीय क्रमांक पटकावला. त्याशिवाय सेंट मोनिका स्कूल, बी. आर. खटोड कन्या विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, आत्मा मलिक स्कूल, श्री साईबाबा कन्या विद्यालय यांसह इतर शाळांनाही उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.हा कार्यक्रम केवळ एक स्पर्धा नव्हता, तर नव्या पिढीच्या मनात विचारांची मशाल पेटवणारा एक संस्कार सोहळा ठरला. वक्त्यांच्या ओघवत्या भाषणांनी उपस्थित शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांची मने जिंकली. विचारशक्ती, आत्मविश्वास, आणि नेतृत्वगुण यांचे अद्वितीय दर्शन घडवणाऱ्या या मंचाने विद्यार्थ्यांच्या मनात भाषेचे, विचारांचे आणि संस्कृतीचे बीज रुजवले. कोपरगावने पुन्हा एकदा राज्य पातळीवर शिक्षण आणि साहित्य यांचे तेज झळकावले,हे निश्चित.
टिळकांच्या जयंतीनिमित्त विचारांचं पर्व फुललं; शारदा शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवला राज्यस्तरीय द्वितीय मान!
श्रीरामपूर (गौरव डेंगळे): शब्दांची ताकद काय असते, हे दाखवून देणारी एक संस्मरणीय आणि प्रेरणादायी राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धा कोपरगाव येथे पार पडली. सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे हे पाचवे पर्व होते.या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध भागांतील – नाशिक, श्रीरामपूर, येवला, निफाड, संभाजीनगर, प्रवरानगर, शिर्डी आदी परिसरातील ३५ शाळांमधील ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मंचावर उभा राहून विचार व्यक्त करताना प्रत्येक वक्त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि राष्ट्रभक्तीची झळाळी दिसून येत होती. भाषणात त्यांनी समाज, शिक्षण, संविधान, स्त्री सक्षमीकरण, शिवरायांचे राष्ट्रनिर्माण, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातील माणुसकी आणि नवभारताचे स्वप्न अशा अनेक विषयांवर प्रभावी मांडणी केली.छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानिक वारसा, शिवरायांची आदर्श नेतृत्वशैली, स्त्री शक्तीचा जागर – या सर्व विषयांवर भाष्य करताना विद्यार्थ्यांनी केवळ स्पर्धा जिंकण्याचे नाही, तर विचार प्रबळ करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. त्यांच्या वक्तृत्वशैलीत ओघवती भाषा, भावनिक आविष्कार आणि समाजप्रबोधनाचा प्रगल्भ दृष्टीकोन स्पष्टपणे दिसून येत होता.स्पर्धेचे उद्घाटन प्रा. अमोल चिने यांच्या हस्ते झाले. त्यांच्यासोबत शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे,पालक संघाचे उपाध्यक्ष रामदास खरात आणि काशिनाथ दामोदर लव्हावाटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. परीक्षक म्हणून सुमित डेंगळे (इतिहास अभ्यासक),ॲड. प्रवीण जमदाडे आणि प्राचार्या सुनीता हिंगडे यांनी अतिशय पारदर्शक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मूल्यांकन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्या शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे, नथलीन फर्नांडिस, तसेच मराठी विभागप्रमुख बी. के. तुरकणे आणि शिक्षकांनी अतुलनीय परिश्रम घेतले.
Post a Comment