Articles by "क्रीडा"

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): स्व. माधवरावजी दगडूजी मुळे प्रतिष्ठान, अहमदनगर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय भव्य निबंध स्पर्धेत जिल्ह्यातील १५० शाळांमधील सुमारे ६,००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रेरणादायी विषयांवर विद्यार्थ्यांनी आपली लेखनकौशल्ये प्रभावीपणे सादर केली.सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव येथून इयत्ता ८ वी ते १० वी गटातील ९३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये इयत्ता ८ वीचा गुणी विद्यार्थी कुमार आराध्य संतोष मलिक याने उत्कृष्ट लेखनशैली, विषयाची सखोल मांडणी आणि भाषेवरील प्रभुत्व यांच्या जोरावर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला.आराध्यचा हा विजय संपूर्ण शाळेसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.प्राचार्य के. एल. वाकचौरे,उपप्राचार्य शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे,पल्लवी ससाणे,नाथलीन फर्नांडिस तसेच शिक्षक व पालकवर्ग यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचे यश मेहनत,सातत्यपूर्ण सराव आणि मार्गदर्शकांच्या योग्य दिशादर्शनाचे फलित असल्याचे गौरवण्यात आले.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे) –अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ,मुंबई यांच्या वतीने आयोजित शास्त्रीय संगीत गायन आणि तबला वादन परीक्षा सन २०२४-२५ मध्ये श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगावच्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश संपादन केले आहे. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी आपली कला, मेहनत आणि संगीताची समज दाखवत उत्कृष्ट गुणांनी यश प्राप्त केले.

गायन परीक्षेत एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यामध्ये २० विद्यार्थी विशेष श्रेणीसह उत्तीर्ण होत शाळेचा मान उंचावला.तबला वादन परीक्षेत ६० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता त्यापैकी २५ विद्यार्थी विशेष गुण श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले तर बाकीचे विद्यार्थी प्रथम व द्वितीय श्रेणीत उल्लेखनीय कामगिरी करत कौतुकास पात्र ठरले.विद्यार्थ्यांना संगीताचे प्रशिक्षण देताना रेखा गायकवाड (गायन) आणि उस्ताद श्री. दिग्विजय भोरे (तबला) यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे दर्जेदार यश प्राप्त केले, हे विशेष उल्लेखनीय आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे, उपप्राचार्य शुभांगी अमृतकर, पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे, नैथालिन फर्नांडिस यांच्यासह सर्व शिक्षकवृंद आणि इतर कर्मचाऱ्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शास्त्रीय संगीत आणि वादन या भारतीय संस्कृतीतील मौल्यवान कला शालेय पातळीवरच जोपासत विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे काम श्री शारदा स्कूल सातत्याने करत आहे. विद्यार्थ्यांमधील कलागुणांचा विकास,आत्मविश्वासाची वाढ आणि सांस्कृतिक भान या उद्देशाने घेतले जाणारे हे प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी असून, शाळेचा सांस्कृतिक पाया अधिक भक्कम करणारे ठरत आहेत.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे) – सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव येथील विद्यार्थ्यांनी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवत शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीच्या जोरावर हे यश संपादन केले असून, शाळेच्या इतिहासात प्रेरणादायी अशी कामगिरी नोंदवली आहे. यामुळे संपूर्ण शाळेत आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे.या परीक्षेमध्ये इयत्ता पाचवीतील आदर्श आढळ, अवधूत अंभोरे, आयुष निर्मल, शर्वरी बोरसे, श्रीरंग मालपुरे आणि श्रेया वर्गुडे तर इयत्ता आठवीतील सृष्टी वावधणे आणि नचिकेत काठमोरे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. ही कामगिरी म्हणजे विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, पालकांचा पाठिंबा आणि शिक्षकांचे प्रामाणिक मार्गदर्शन यांचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे.या यशामध्ये शिक्षिका शिल्पा खांडेकर, सोनल निकम, माधुरी भस्मे,सुनंदा कदम, स्वरूपा वडांगळे, सीमा शिंदे, गणेश मलिक आणि अर्चना बाजारे यांनी विद्यार्थ्यांसोबत विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या अथक प्रयत्नांचे हे फळ आहे. शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे, उपप्राचार्य शुभांगी अमृतकर, पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे व नथलीन फर्नांडिस यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेसारख्या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश केवळ शाळेसाठीच नव्हे तर संपूर्ण परिसरासाठी अभिमानास्पद असून भावी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

कोपरगाव (गौरव डेंगळे): श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव यांच्या वतीने आयोजित ‘शारदा एक्सप्रेस खो खो संमिश्र लीग २०२५’ ही राज्यस्तरीय स्पर्धा शनिवार, २६ जुलै रोजी मोठ्या उत्साहात आणि पावसाच्या सरींसह संपन्न झाली. कोपरगाव, संगमनेर, येवला, अहिल्यानगर येथून आलेल्या एकूण १३ संघांनी सहभाग घेतलेला असून १८ सामन्यांमध्ये दमदार खेळाचा थरार अनुभवायला मिळाला.

स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे,युवराज नगरकर,संकेत पारखे, पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे, नथलीन फर्नांडिस, कोपरगाव क्रीडा समिती अध्यक्ष धनंजय देवकर,रामदास खरात, अजित पवार,रवी नेद्रे, भरत थोरात आणि दिगंबर गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

चार गटांमध्ये विभागलेली ही स्पर्धा गटसाखळी,उपांत्य आणि अंतिम फेरी अशा तीन टप्प्यांमध्ये झाली. अ गटातून नूतन विद्यालय संगमनेर, ब गटातून आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल संगमनेर, क गटातून दिग्विजय क्रीडा मंडळ अहिल्यानगर आणि ड गटातून आत्मा मालिक कोकणठाण यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या उपांत्य सामन्यात दिग्विजय क्रीडा मंडळने नूतन विद्यालयाचा पराभव केला, तर दुसऱ्या लढतीत आत्मा मालिक संघाने आदर्श स्कूलवर मात केली.

अंतिम सामन्यात आत्मा मालिक कोकणठाण संघाने जबरदस्त खेळ करत दिग्विजय क्रीडा मंडळ अहिल्यानगरचा पराभव केला आणि शर्यतीचे विजेतेपद पटकावले. यावेळी खेळाडूंनी पावसाचे आव्हान अंगिकारत मैदानावर चिवट झुंज दिली आणि उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून राधिका भोसले आणि जयदत्त गाडेकर यांना गौरविण्यात आले. अंतिम सामन्याचा मानकरी तनिष मानकर ठरला. स्पर्धेत विविध सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित हसे, साईराज पाटील, साहिल नेहे, तेजल रोकडे, साई सरोदे, साई भराडे, अनामिका आहेर, कार्तिक कराळे, रिंकू वळवी, मनीषा वळवी, अर्णव थोरात, अमित वासवे आणि तनवी देवकर यांचा समावेश होता.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामध्ये पंच म्हणून अण्णासाहेब गोपाल, बाळासाहेब शेळके, गणेश वाघ, गणेश मोरे, रितेश माळवदे, ओम जगताप, यश जाधव, साई जाधव, प्रसाद मावळ यांचे मोलाचे योगदान लाभले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मैदानी खेळात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यांच्यात नेतृत्वगुण, संघभावना, स्पर्धात्मकता आणि आत्मविश्वास यांचे उत्तम संकलन घडल्याचे दृश्य मैदानात दिसून आले.पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. विजेता आत्मा मालिक कोकणठाण संघाला ₹२१०० रोख रक्कम व चषक देण्यात आला, तर उपविजेता दिग्विजय मंडळ अहिल्यानगर संघाला कोपरगाव क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री. धनंजय देवकर यांच्या हस्ते ₹१००० रोख रक्कम व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यासोबतच सर्वोत्तम खेळाडू, अंतिम सामन्याचा मानकरी व इतर उल्लेखनीय खेळाडूंनाही स्मृतिचिन्हे देण्यात आली.

‘शारदा एक्सप्रेस खो खो लीग’ ही स्पर्धा केवळ एक खेळ नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रेरणादायी मंच ठरली आहे.



*कोट*


"कालपर्यंत संपूर्ण जिल्ह्याला पावसाने वेढलं होतं... प्रश्न होता, 'स्पर्धा होणार तरी कशा?' पण मनामध्ये एक आशा होती, की देव जिथं खेळाचं मंदिर असतं, तिथं पावसालाही थांबावं लागतं. आज सकाळी मैदानावर आलो, ओलसर माती, पाण्याच्या साऱ्या, पण मनात एकच विनंती – ‘देवा, चार तास विश्रांती दे… खेळू दे आमचं स्वप्न.’ आणि खरंच... पावसाने थोडं बाजूला सरून मैदान खुलं केलं आणि शारदा खो खो लीगचा थरार साऱ्या सीमारेषा तोडून मैदानावर अवतरला!"


गौरव अरविंद डेंगळे (क्रीडा मार्गदर्शक)

कोपरगाव ( गौरव डेंगळे):सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल,कोपरगाव यांच्या वतीने आयोजित शारदा Xpress खो-खो संमिश्र लीग २०२५ स्पर्धेला शनिवार, दिनांक २६ जुलै २०२५ रोजी सुरुवात होणार आहे. कोपरगाव, संगमनेर, येवला आणि अहिल्यानगर येथून आलेल्या १३ संघांचा या स्पर्धेत सहभाग असून एकूण १८ सामने रंगणार आहेत.

शारदा स्पार्टनचे कर्णधार फरहान शेख आणि उपकर्णधार तन्वी देवकर, शारदा Xpress संघाचे जय शिंदे आणि श्रेया वाघ, शारदा महारथीचे सरस ठोळे आणि अनुष्का देवकर, शारदा शूरवीरचे अमित बोरनारे आणि श्रद्धा ठेके, शारदा बाजीराव संघाचे श्रेयस अनाड आणि श्रद्धा कालेकर अशी शारदा परिवारातील पाच संघांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.

शहराबाहेरील सहभागी संघांमध्ये आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल संगमनेरचे तेजस रोकडे आणि किरण पथवे, राधिका इंग्लिश मीडियम स्कूल येवल्याचे ओम भंडारी आणि स्वरा पानमळे, नूतन माध्यमिक विद्यालय राजापूर संगमनेरचे राजवीर पवार आणि कावेरी मोरे, दिग्विजय क्रीडा सामाजिक व सांस्कृतिक मंडळ अहिल्यानगरचे जयदत्त गाडेकर आणि श्रावणी थोरात, आत्मा मालिक कोकणठाणचे निलेश तडवी आणि मनीषा वाळवी, सोमैया विद्यामंदिर लक्ष्मीवाडीचे अभिजीत पवार आणि प्रीती अहिरे, संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल कोपरगावचे सार्थक कुलकर्णी आणि अन्वी परजणे तसेच सोमैया विद्यामंदिर साखरवाडीचे ओम शिंदे आणि अनुष्का भाकरे यांचा सहभाग आहे.स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे, युवा उद्योजक मनोज नगरकर, संकेत पारखे, उपप्राचार्य शुभांगी अमृतकर, पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे व नथलीन फर्नांडिस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.कोपरगाव क्रीडा समिती अध्यक्ष धनंजय देवकर, सचिव अनुप गिरमे, पंच समिती प्रमुख अण्णासाहेब रतन गोपाल,अजित कदम, गणेश वाघ,बाळासाहेब शेळके, अनिल तेलगट,भीमाशंकर औताडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.स्पर्धेच्या तांत्रिक बाबतीत दिग्विजय भोरे,जयदीप दरंगे व जिशान इनामदार कार्यरत राहणार आहेत.या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मैदानी खेळात सहभागाची संधी मिळणार असून नेतृत्व, संघभावना आणि स्पर्धेची चुणूक यांचे उत्तम दर्शन घडणार आहे.

कोपरगाव(गौरव डेंगळे): तालुक्यातील शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात आपल्या कार्यकुशलतेने विशेष ठसा उमटवलेले सोमय्या विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक डॉ. धनंजय देवकर यांची कोपरगाव तालुका क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी एकमुखाने निवड करण्यात आली. आज संजीवनी येथे पार पडलेल्या बैठकीत तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही निवड पार पडली.

डॉ. देवकर यांनी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ विविध शाळांमध्ये क्रीडा प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि संयोजक म्हणून कार्य केले आहे. त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर मार्गदर्शन करताना उत्कृष्ट यश मिळवून दिले आहे. केवळ क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेणेच नव्हे, तर खेळाडूंच्या मानसिक आणि चारित्र्य विकासालाही त्यांनी प्राधान्य दिले आहे.कोपरगावसारख्या ग्रामीण भागात खेळांची गती वाढवण्यासाठी आणि नवोदित विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. देवकर यांनी अनेक उपक्रम राबवले. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांनी एकमताने त्यांची निवड केली.अध्यक्षपदाच्या निवडीनंतर शारदा स्कूलचे प्राचार्य के. एल. वाकचौरे, उपप्राचार्य शुभांगी अमृतकर, पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाने, नथलीन फर्नांडिस आणि इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डॉ. देवकर यांचे विशेष सत्कार करून त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. अनेक विद्यार्थ्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला.या निवडीमुळे कोपरगाव तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होणार असून जिल्हा व राज्य पातळीवरील विविध स्पर्धांसाठी अधिक योजनाबद्ध तयारी होणार आहे. डॉ. देवकर यांच्या दूरदृष्टीचा आणि अनुभवाचा लाभ घेऊन तालुक्यातील क्रीडा संस्कृती अधिक भक्कम होईल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

त्यांच्या नेतृत्वात कोपरगाव तालुका हे नाव भविष्यात केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर ओळखले जाईल आणि नव्या पिढीतील खेळाडूंना अधिकाधिक संधी व मार्गदर्शन मिळेल,हीच सर्वांची अपेक्षा आहे.

चेक रिपब्लिक/२० जुलै/गौरव डेंगळे:भारतीय टेनिसपटू रुतुजा भोसले हिने चीनची झेंग वुशुआंग हिच्यासोबत भागीदारी करत ITS Cup 2025 या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिलांच्या दुहेरी गटाचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत त्यांनी जबरदस्त खेळ करत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवत ऐतिहासिक विजय नोंदवला.

हा सामना तितकाच उत्कंठावर्धक ठरला. दोघींनी अप्रतिम समन्वय आणि आक्रमक खेळ दाखवत प्रेक्षकांची मनं जिंकली. रुतुजाची शांत आणि आत्मविश्वासपूर्ण शैली झेंगच्या जलद आणि अचूक खेळीला उत्तम साथ देत होती. त्यांच्या रॅलीज आणि विनर्सनी सामना रंगतदार केला.

या विजयानंतर रुतुजा भोसलेने आपल्या कारकिर्दीत आणखी एक आंतरराष्ट्रीय यशाची भर घातली आहे. ITF स्तरावरील तिचे हे आणखी एक विजेतेपद असून जागतिक स्तरावर तिच्या नावाचा झंकार अधिकच वाढला आहे.रुतुजाच्या या विजयामुळे भारताच्या टेनिस विश्वात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत असून देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नाखोन पथोम (थायलंड) | गौरव डेंगळे भारताने एशियन अंडर-१६ पुरुष व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पदार्पणातच इतिहास रचला आहे. शनिवारी झालेल्या थरारक सामन्यात भारताने जपानचा ३-२ असा पराभव करत कांस्यपदक पटकावले. या विजयानंतर भारतासह पाकिस्तान, जपान आणि इराण हे चारही उपांत्य फेरी गाठलेले संघ २०२६ मध्ये कतारमध्ये होणाऱ्या एफआयव्हीबी बॉईज अंडर-१७ वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरले आहेत.कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने २५-२१, १२-२५, २५-२३, १८-२५, १५-१० अशा सेट्समध्ये विजय मिळवला. या सामन्यात अब्दुल्ला (१६ गुण), अप्रतीम (१५), रफिक (१२) आणि चरन (४) यांनी भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.याआधी उपांत्य फेरीत भारताचा पाकिस्तानकडून सरळ सेट्समध्ये पराभव झाला होता. मात्र, जपानविरुद्धच्या विजयाने भारताने तिसऱ्या क्रमांकाचे स्थान निश्चित केले.

स्पर्धेतील आपल्या गटात भारताने थायलंड, ऑस्ट्रेलिया आणि चीन या तिन्ही संघांवर सरळ सेट्समध्ये विजय मिळवून ९ गुणांची कमाई केली होती. त्यानंतर क्रॉसओव्हर फेरीत उझबेकिस्तानवर मात करत भारताने उपांत्य फेरी गाठली. गटपातळीवर जपानकडून झालेल्या पराभवाचा बदलाही भारताने कांस्यपदक सामन्यात घेतला.२०२६ मध्ये कतारमध्ये होणाऱ्या FIVB अंडर-१७ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताची उपस्थिती निश्चित झाली असून, ही कामगिरी भविष्यातील जागतिक स्तरावरच्या संधींसाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

पणजी ( गौरव डेंगळे) – गोवा राज्य क्रीडा आणि युवक व्यवहार संचालनालयाचे (DSYA) नवे संचालक डॉ. अजय गावडे यांनी १७ जुलै २०२५ रोजी पदभार स्वीकारताच तात्काळ कृतीला सुरुवात केली. पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी गोव्यातील सर्व १२ तालुक्यांतील तालुका क्रीडा अधिकारी (TSO) व सहायक क्रीडा शिक्षण अधिकारी (APEO) यांच्यासोबत बैठक घेऊन, त्यांच्या समोरील अडचणी आणि स्थानिक पातळीवरील क्रीडा उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला.राज्यातील क्रीडा व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि स्थानिक खेळाडूंना सक्षम करण्यासाठी एक व्यापक योजना आखण्याच्या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली. खेळांना गावपातळीपासून गती मिळावी, ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळावी आणि गोव्यातील सुप्त क्रीडा प्रतिभेला योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हे या चर्चेचे मुख्य सूत्र

राहिले.या दिवसातच डॉ. गावडे यांनी खेळो इंडिया अधिकारी, क्रीडा प्राधिकरण गोवा (SAG) व विविध क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींशीही बैठक घेतली. त्यांनी क्रीडा क्षेत्रात सुसंगत समन्वय ठेवत नव्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे संकेत दिले. DSYA, SAG आणि गोवा फुटबॉल डेव्हलपमेंट कौन्सिल (GFDC) यांच्यात समन्वय साधत गोव्यातील क्रीडा संस्कृती अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.“गोव्यातील खेळाडूंमध्ये अफाट कौशल्य आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण आणि आधार दिल्यास ते राज्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवतील. गोवा हा देशातील महत्त्वाचा क्रीडा केंद्र बनावा, हीच आमची दिशा व ध्येय आहे,” असे डॉ. गावडे यांनी पदभार स्वीकारताना सांगितले.त्यांच्या या सकारात्मक आणि कृतीशील सुरुवातीमुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व स्तरावर नव्या आशा निर्माण झाल्या असून,गोव्यातील क्रीडा व्यवस्थापनात ठोस बदल होण्याची अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.

कोपरगाव (गौरव डेंगळे):सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव यांच्या वतीने २६ जुलै २०२५ रोजी पहिली ‘शारदा एक्सप्रेस खो-खो लीग’ स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खेळाची गोडी लावण्यासाठी व कौशल्य वाढवण्यासाठी ही स्पर्धा एक आगळीवेगळी संधी ठरणार आहे.या विशेष लीगमध्ये जिल्ह्यातील १२ संघांना सहभाग घेता येणार आहे. प्रत्येक संघात ६ मुले व ३ मुली असा समावेश असणार असून, ही स्पर्धा इयत्ता ६ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांसाठी आहे. लिंगसमता आणि सांघिक एकता यावर आधारित ही अभिनव संकल्पना शारदा स्कूलने राबवली आहे.स्पर्धा साखळी पद्धतीने (League Format) खेळवण्यात येईल.

प्रत्येक सामन्यानंतर एक उत्कृष्ट खेळाडू ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात येईल.

हा पुरस्कार कै. महेंद्र अशोकराव नगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणार आहे.या लीगमध्ये अंतिम विजेत्या संघाला ₹२१००/- रोख रक्कम आणि भव्य चषक देण्यात येणार असून,हा पुरस्कार श्री संकेत दिलीपराव पारखे यांच्याकडून दिला जाणार आहे.संघ नोंदणीसाठी इच्छुकांनी खो-खो प्रशिक्षक श्री गणेश वाघ व श्री गणेश मोरे यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.या संपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शन प्राचार्य के. एल. वाकचौरे करत असून, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक डॉ. धनंजय देवकर यांच्या अधिपत्याखाली या भव्य लीगचे आयोजन करण्यात येत आहे.ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाबरोबरच सामूहिकतेचे मूल्य, स्पर्धात्मकता,आणि स्वतंत्रता यांचा अनुभव देणारी ठरणार आहे.

गौरव डेंगळे श्रीरामपूर :–सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल,कोपरगाव येथे पारंपरिक भारतीय कुस्ती या विषयावर एक प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले.मल्ल महाविद्या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. गणेश महागुडे यांनी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.त्यांच्या अभ्यासपूर्ण व प्रभावी शैलीतील मार्गदर्शनामुळे उपस्थितांमध्ये कुस्ती या खेळाबाबत नवीन जाणीव निर्माण झाली.

गणेश महागुडे यांनी कुस्तीचा इतिहास मांडताना सांगितले की, हा खेळ केवळ स्पर्धा नसून भारतीय परंपरेचा अभिन्न भाग आहे. रामायण आणि महाभारतातून कुस्तीची सुरुवात झाल्याचे दाखले देत त्यांनी हा खेळ किती पुरातन आणि समृद्ध आहे, हे पटवून दिले. कुस्ती ही फक्त ताकदीची लढाई नसून ती संयम, शिस्त आणि मनोबल यांची परीक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी आपल्या व्याख्यानात १९५२ मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून घडलेल्या खाशाबा जाधव यांचे उदाहरण देत, विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. भारताचे पहिले ऑलिम्पिक वैयक्तिक पदक मिळवणारे खाशाबा जाधव यांना त्यावेळी आर्थिक अडचणींवर मात करून ऑलिम्पिकमध्ये भाग घेता यावा म्हणून त्यांच्याच कॉलेजमधील प्राचार्यांनी स्वतःचा बंगला गहाण ठेवून मदत केली होती,ही हृदयस्पर्शी गोष्ट त्यांनी सांगितली.

गणेश महागुडे यांनी आधुनिक कुस्तीचे प्रकार समजावून सांगत कुस्तीमुळे होणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासावर भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की, कुस्तीमुळे अनेक युवकांना पोलीस, रेल्वे, सैन्य आणि विविध शासकीय सेवांमध्ये संधी मिळाल्या आहेत. या खेळातून केवळ यश नाही तर एक सुसंस्कृत आणि शिस्तबद्ध जीवनशैली मिळते.

आज जरी हरियाणाचे मल्ल आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीमध्ये आघाडीवर असले, तरी भारतासाठी पहिले पदक महाराष्ट्रातील मातीतूनच आले, याची आठवण करून देत त्यांनी महाराष्ट्रातील युवकांनीही या खेळाकडे पुन्हा गंभीरतेने पाहावे असे आवाहन केले.

श्री शारदा स्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे,शिक्षक, क्रीडा शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.उपस्थित विद्यार्थ्यांनी महागुडे सरांच्या व्याख्यानात रस घेतला आणि विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरं दिली.कार्यक्रमाच्या शेवटी सरांनी सांगितले की, कुस्ती म्हणजे केवळ मैदानात लढायचे कौशल्य नव्हे, ती संपूर्ण जीवनात संघर्षातून विजय मिळवण्याची शिकवण आहे. "कुस्ती ही एक संस्कारक्षम जीवनशैली आहे" या शब्दांत त्यांनी आपले व्याख्यान संपवले आणि विद्यार्थ्यांमध्ये नवा जोश निर्माण केला.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे):सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज कबड्डी दिनाच्या निमित्ताने एक आगळा-वेगळा आणि प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला. कबड्डी क्षेत्रातील महान कार्यासाठी ओळखले जाणारे स्वर्गीय शंकरराव साळवी यांच्या जन्मदिवशी महाराष्ट्रभर कबड्डी दिन साजरा केला जातो. त्यांच्या स्मृतीला वंदन करत शाळेने विद्यार्थ्यांच्या मनात जिद्द, प्रयत्नशीलता आणि स्वप्नांवर विश्वास निर्माण करणारा उपक्रम आयोजित केला होता.

या विशेष दिवशी विद्यार्थ्यांना एका थेट हिरोची भेट मिळाली –


भारताचा आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू असलम इनामदार. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि अनुभवाची ठाम बाजू घेऊन ते विद्यार्थ्यांसमोर उभे राहिले, आणि सुरू झाला त्यांचा प्रवास उलगडण्याचा प्रवास. त्यांनी आपल्या लहानपणीच्या अडचणी, घरची हलाखीची परिस्थिती, कबड्डीची पहिली ओळख, मोठ्या भावाची साथ, स्थानिक मैदानांवरचा संघर्ष, आणि अखेर भारतीय संघात स्थान मिळवण्यापर्यंतचा प्रवास ओघवत्या शब्दांत मांडला.

सभागृहात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी त्या प्रत्येक आठवणीला मनापासून प्रतिसाद दिला. त्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल, प्रेरणा आणि आत्मविश्वास यांचा मिलाफ स्पष्ट दिसत होता. असलम इनामदार केवळ यशाची गोष्ट सांगून थांबले नाहीत, तर त्यांनी अपयश, अपमान, दुखापती आणि मानसिक तणाव या सगळ्यांनाही समोर ठेवत यशामागील वास्तव स्पष्ट केलं. त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट ठळकपणे समोर आली – परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी आत्मविश्वास, कुटुंबाची साथ आणि जिद्द असल्यास यश नक्की मिळते.

या कार्यक्रमाच्या विशेषतेपैकी एक म्हणजे शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे यांची समुपदेशनपर उपस्थिती. विद्यार्थ्यांच्या प्रेरणेसाठी असलम इनामदार यांना आमंत्रित करण्यामागील उद्देश त्यांनी आपल्या छोट्याशा भाषणात सांगितला. त्यांनी हे ही सांगितले की,अशा कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाबाहेरचं जीवन शिकता येतं – असं जीवन जे खऱ्या अनुभवांवर उभं आहे. त्यांनी असलम यांचे मनःपूर्वक कौतुक करत विद्यार्थ्यांना त्यांच्यासारखं कष्ट घेऊन जीवनात पुढे जाण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमाचे संयोजन अतिशय उत्तमरीत्या पार पडले. पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, महेश मोरे,सुहास गगे, साईनाथ चाबुकस्वार,गणेश मलिक, दिग्विजय भोरे,क्रीडा शिक्षक,व्यवस्थापन समिती,इतर शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक आयोजन करत विद्यार्थ्यांना एक अविस्मरणीय अनुभव दिला.संवादानंतर विद्यार्थ्यांनी असलम इनामदार यांच्यासोबत फोटो काढत, त्यांच्या सहवासात काही क्षण घालवत प्रेरणेचा एक थेट स्पर्श अनुभवला.

 

१२ जुलैला रंगणार अंतिम स्पर्धा; विजेत्या संघाला ट्रॉफी व प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार..


कोपरगाव(गौरव डेंगळे): सोमैया विद्या विहारच्या श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव यांच्या वतीने आयोजित शारदा थ्रो बॉल लीग २०२५ साठी विद्यार्थ्यांची निवड चाचणी शनिवार, ५ जुलै रोजी शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.


या लीगमध्ये प्रत्येक संघात

✅ इयत्ता ९ वी व १० वी मधील ४ मुले,

✅ इयत्ता ७ वी व ८ वी मधील ४ मुले,

✅ इयत्ता ८ वी ते १० वी मधील ४ मुलींचा समावेश असणार आहे.


स्पर्धेचे अंतिम सामने शनिवार, १२ जुलै रोजी रंगणार असून, विजेत्या संघाला आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात येईल. याच दिवशी सर्व संघांचे कर्णधार आणि अधिकृत संघांची घोषणा करण्यात येणार आहे.

या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन शाळेचे प्राचार्य श्री. के. एल. वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्ह्यात थ्रो बॉल खेळाचा प्रचार-प्रसार करणारे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री. धनंजय देवकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.

नाव नोंदणीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी श्री. गणेश वाघ व श्री. गणेश मोरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या लीगमुळे विद्यार्थ्यांमध्ये थ्रो बॉल खेळाविषयी आवड निर्माण होऊन त्यांच्या अंगभूत कौशल्यांना व्यासपीठ मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली ( गौरव डेंगळे): पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज राष्ट्रीय क्रीडा धोरण २०२५ (National Sports Policy 2025) ला मंजुरी दिली आहे. हे धोरण देशाच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणारे ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. नव्या धोरणाद्वारे भारताला जागतिक क्रीडा महासत्ता बनवण्याचा आणि २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी भारताला सक्षम स्पर्धक म्हणून घडवण्याचा दृष्टीकोन ठेवण्यात आला आहे.

हे धोरण पूर्वीच्या २००१ मधील क्रीडा धोरणाला बदलून नव्या पिढीसाठी तयार करण्यात आले आहे. धोरण तयार करताना केंद्र सरकार,नीती आयोग,राज्य सरकारे,राष्ट्रीय क्रीडा महासंघ, खेळाडू,तज्ज्ञ,तसेच जनतेचा सहभाग घेण्यात आला.


राष्ट्रीय क्रीडा धोरण २०२५ चे पाच प्रमुख स्तंभ:


१ . जागतिक पातळीवरील उत्कृष्टता..


® गवतापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडू घडवण्याच्या योजना.


® ग्रामीण व शहरी भागात स्पर्धात्मक लीग व स्पर्धांचे आयोजन.


® जागतिक दर्जाचे प्रशिक्षण व प्रशिक्षक विकास.


® राष्ट्रीय क्रीडा महासंघांचे व्यवस्थापन व क्षमतेत सुधारणा.


® क्रीडा विज्ञान, औषधोपचार व तंत्रज्ञानाचा उपयोग.


® प्रशिक्षक,अधिकारी,सहाय्यक कर्मचारी यांचे प्रशिक्षण.



२ . आर्थिक विकासासाठी क्रीडा.


® क्रीडा पर्यटनाला प्रोत्साहन व भारतात आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन.


® क्रीडा क्षेत्रातील उत्पादन व स्टार्टअप्सना चालना.


® खासगी क्षेत्र, CSR, PPP मॉडेलद्वारे गुंतवणूक आकर्षित करणे.


३ . सामाजिक विकासासाठी क्रीडा.


® महिलांसाठी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, आदिवासी व दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष योजना.


® पारंपरिक व स्थानिक खेळांना पुनरुज्जीवन.


® क्रीडा क्षेत्रात करिअरला प्रोत्साहन.


® भारतीय प्रवासी व परदेशस्थित भारतीयांना क्रीडा क्षेत्रात सहभागी करणे.


४ . क्रीडा जनआंदोलन म्हणून.


® देशभर क्रीडा व फिटनेस संस्कृती रुजवण्यासाठी अभियान.


® शाळा,महाविद्यालये, कार्यालयांसाठी फिटनेस इंडेक्स.


® सर्वांसाठी क्रीडा सुविधा उपलब्ध करणे.


५ . शिक्षणाशी एकात्मता (NEP 2020 अनुकूल).


® शालेय अभ्यासक्रमात क्रीडांचा समावेश.


® शिक्षक व क्रीडा शिक्षकांना विशेष प्रशिक्षण.


® विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा जागृती वाढवणे.


६ . रणनीतिक आराखडा.


® क्रीडा क्षेत्रातील मजबूत कायदे व नियमन.


® तंत्रज्ञानाचा वापर – AI, डेटा विश्लेषणाद्वारे प्रगती मापन.


® ठोस उद्दिष्टे, KPI आणि टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी.


® प्रत्येक राज्याने आपले धोरण या राष्ट्रीय धोरणाशी सुसंगत करणे.


® सर्व मंत्रालये व विभागांचा एकत्रित सहभाग.

येवला (प्रतिनिधी ): येथील एसएनडी सीबीएसई संघाविरुद्ध पार पडलेल्या दोन मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यांमध्ये क्रिकेट क्लब ऑफ शारदा कोपरगांव (CCS) च्या U-14 आणि U-17 संघांनी प्रभावी खेळ करत दुहेरी विजय मिळवला.दोन्ही संघांनी अनुक्रमे २८ धावांनी आणि ९ गडी राखून विजय मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली.

U-14 क्रिकेट सामना : शारदा संघाचा २८ धावांनी विजय..


U-14 गटातील सामन्यात एसएनडी सीबीएसई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. शारदा संघाचे नेतृत्व जयदीप दरांगे यांनी केले.

प्रथम फलंदाजी करताना क्रिकेट क्लब ऑफ शारदा संघाने २० षटकांत ९५ धावा केल्या.

फलंदाजीत विहान कसलीवालने १९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.सार्थक जाधवने १४ धावा फटकावल्या. हर्षद फुकटेने १० धावांचे योगदान दिले.

गोलंदाजीत एसएनडी सीबीएसई संघाकडून पार्थ सोनवणे आणि ज्ञानेश्वर पवार यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात एसएनडी सीबीएसई संघ १५.३ षटकांत केवळ ६७ धावांवर गारद झाला.यश पवारने १८ धावा केल्या,तर पार्थ सोनवणेने ११ धावांचे योगदान दिले.शारदा संघाच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत सामना आपल्या बाजूने झुकवला. देवासिस मार्कड, हर्षद फुकटे,सार्थक जाधव यांनी प्रत्येकी २- २ गडी बाद केले.

सामना २८ धावांनी जिंकत शारदा संघाने जल्लोष केला.

सामनावीर म्हणून सार्थक जाधव याची निवड झाली,त्याने १४ धावा आणि २ गडी घेत सर्वांचे लक्ष वेधले.


U-17 क्रिकेट सामना : दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीचा दबदबा..


U-17 गटातील सामन्यात एसएनडी सीबीएसई येवला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सामना एसएनडी सीबीएसई क्रिकेट ग्राउंड,येवला येथे खेळवण्यात आला.

शारदा संघाचे नेतृत्व जय ढाकणे याने केले.एसएनडी सीबीएसई 

 संघाने २० षटकांत १०४/८ अशी धावसंख्या उभारली.शुभम सातारकरने ३६ धावा फटकावल्या तर विजय चव्हाणने १५ धावांचे योगदान दिले.

शारदा संघाच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली.विराट घेगडमल व साईराम शेळके यांनी प्रत्येकी २- २ गडी बाद केले तर अर्णव थोरात १ गडी बाद केला.

प्रत्युत्तरात, क्रिकेट क्लब ऑफ शारदा संघाने केवळ १३.२ षटकांत १०५/१ धावा करत सामना ९ गडी राखून सहज जिंकला.प्रेम कसलीवालने ३८* नाबाद धावा करत संघाचा कणा मजबूत केला.ऋतेश सोनपसारेने ३८ धावांची धमाकेदार खेळी केली.साईराम शेळकेनेही १३* नाबाद धावा करत विजयात मोलाची भूमिका बजावली.

सामनावीर म्हणून ऋतेश सोनपसारे याची निवड झाली. त्याच्या प्रभावी खेळीमुळे शारदा संघाने हा विजय खेचून आणला.

नवी मुंबई ( गौरव डेंगळे): २७ वी राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा भाटपारा, छत्तीसगड येथे २६ ते ३० जून २०२५ या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड प्रक्रिया टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशनच्या मान्यतेने व नवी मुंबई टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या संयोजनातून, कोपरखैरणे येथील क्राईस्ट अकॅडमी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे यशस्वीरित्या पार पडली.

या निवड चाचणीला नवी मुंबई, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, परभणी, हिंगोली, पुणे, नाशिक, अमरावती आदी जिल्ह्यांमधून आलेल्या ज्युनिअर व सब-ज्युनिअर गटातील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक व्यंकटेश वांगवाड यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले, तर क्राईस्ट अकॅडमी स्कूलचे संचालक फादर जेसन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे मनोबल उंचावले.

या निवड प्रक्रियेला महाराष्ट्र टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनचे राज्य सचिव गणेश माळवे, राज्य उपाध्यक्ष कोरडे, राज्य कोषाध्यक्ष डॉ. दिनेश शिगारम, बालभारती तज्ञ प्रगती भावसार मॅडम, नवी मुंबई सचिव वैभव शिंदे, तसेच अशोक शिंदे, आशिष ओबेरॉय, सचिन भोसले आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.


राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडलेला महाराष्ट्र संघ पुढीलप्रमाणे :


➡️ ज्युनिअर मुले :

कृष्णा अहिरे, विवेक साळुंखे, प्रसाद महाले, मयूर बोरसे, प्रताप पौळ, अनंत धापसे


➡️ सब-ज्युनिअर मुले :

ईश्वर मोरे, दिव्यांशु चांद, वेदांत महामाने, गौरव चौधरी, मयूर निकम, विर पाटील


➡️ ज्युनिअर मुली :

वेदिका बेंद्रे, मृणाली सरवदे, श्रेया सिंग, सृष्टी शिंदे, मान्यता जैन, अंकिता सरगर


➡️ सब-ज्युनिअर मिश्र दुहेरी :

राजवीर भोसले, सोनाक्षी कदम


➡️ ज्युनिअर मिश्र दुहेरी :

शिवम कदम, श्रेया धावन


प्रशिक्षक : उज्वला शिंदे, शिवदास खुपसे, गणेश आम्ले

संघ व्यवस्थापक : निलेश माळवे

कोपरगांव (गौरव डेंगळे):दरवर्षी २१ जून रोजी संपूर्ण जग एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतात. ही जागतिक घटना योगाच्या प्राचीन भारतीय पद्धतीला आणि त्याचा शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक कल्याणावर खोल परिणाम करतात.

योग हा शब्द संस्कृत शब्द "युज" वरून आला आहे, ज्याचा अर्थ "सामील होणे" किंवा "एकत्रित होणे" आहे आणि मन, शरीर आणि आत्मा यांच्यात सुसंवाद साधण्याच्या तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे.


त्याचेच औचित्य साधत सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव येथे पतंजली योग पिठाचे योगाचार्य उदय वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ४५० विध्यार्थी आणि शिक्षकांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी एकत्रित योग साधना केली.

२०२५ सालच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम होती – “Yoga for Self and Society” (स्वतःसाठी आणि समाजासाठी योग).

ही संकल्पना फक्त स्वतःच्या आरोग्यापुरती मर्यादित न राहता, संपूर्ण समाजाच्या स्वास्थ्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करते.


योग ही आपल्या देशाची प्राचीन परंपरा असून, ती नव्या पिढीला निरोगी आणि सशक्त ठेवण्यास उपयुक्त ठरणारी आहे. त्यामुळेच संपूर्ण जग या दिवशी योग साधनेसाठी एकत्र येते.

कार्यक्रम प्रसंगी शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे, उपप्राचार्या सौ. शुभांगी अमृतकर, हायस्कूल पर्यवेक्षिका सौ. प्रज्ञा पहाडे, प्राथमिक पर्यवेक्षिका सौ. पल्लवी ससाणे, प्री-प्रायमरी पर्यवेक्षिका सौ. नाथलीन फर्नांडिस तसेच शाळेतील संपूर्ण शिक्षकवृंद उपस्थित होते व त्यांनी विद्यार्थ्यांसोबत योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

खंडाळा(गौरव डेंगळे):श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात आज एक ऐतिहासिक व प्रेरणादायी क्षण अनुभवायला मिळाला, जेव्हा समाजसेवेत अग्रणी आणि युवकांसाठी प्रेरणास्थान असलेले वसंत हंकारे सर यांनी गावाला भेट दिली.

या भेटीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रीय श्रीराम संघ,खंडाळा आणि शिवमुद्रा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हंकारे सर यांचा भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी गावातील नागरिक,ज्येष्ठ मंडळी आणि युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

या वेळी हंकारे सर यांनी खंडाळ्यातील युवकांच्या उत्साहाचे आणि सामाजिक भानाचे कौतुक करत सांगितले की,

"प्रत्येक गावात भगवा ध्वज फडकायला हवा.भगवा हा केवळ ध्वज नाही,तो जनतेच्या रक्षणाचा प्रतीक आहे."

त्यांच्या या प्रेरणादायी उद्गारांनी उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्तीची आणि समाजसेवेची भावना अधिक तीव्र झाली.हंकारे सर यांनी गावात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व ५१ फूट उंच भगव्या ध्वजाचे दर्शन घेऊन त्याच्या निर्मितीमागील संघटित प्रयत्नांचे विशेष कौतुक केले.या ध्वजस्थळाने गावातील युवकांमध्ये अभिमान व नवचेतना निर्माण केली आहे.

सरांनी युवकांशी संवाद साधत संघटन,शिस्त,शिक्षण आणि स्वाभिमान या मूल्यांवर भर देत त्यांना समाजासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन केले.खंडाळा गावातील युवकांच्या राष्ट्रनिष्ठ वृत्तीमुळे महाराष्ट्राच्या मातीत नवसंस्कार निर्माण होत आहेत," असे गौरवोद्गार हंकारे सरांनी काढले.कार्यक्रमाची सांगता सर्वांच्या मनात प्रेरणादायी ठसा उमटवत झाली.गावासाठी ही भेट एक अभिमानाचा क्षण ठरली असून, युवकांच्या कार्याला यातून नवी दिशा मिळाली आहे.


पुणे/१७ जून/ गौरव डेंगळे:आलोक तोडकरने महाराष्ट्राचा आणि भारताचा मान अभिमानाने उंचावला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धेत कांस्य पदक जिंकून महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. हे करताना तो महाराष्ट्रातून ही कामगिरी करणारा पहिलाच व्हॉलीबॉलपटू ठरला आहे.

भारताचे प्रतिनिधित्व करताना आलोकने अपार कौशल्य, प्रबळ निर्धार आणि उत्कृष्ट संघभावना यांचे उत्तम उदाहरण घालून दिले. त्याच्या असामान्य योगदानामुळे भारताला या स्पर्धेत मानाचे तिसरे स्थान मिळविता आले आणि यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला आहे.


आलोकची ही कर्तृत्वगाथा महाराष्ट्रातील असंख्य युवकांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहे. त्याच्या या यशामुळे तरुण खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती साकार करण्यासाठी जिद्द व चिकाटीने प्रयत्न करण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय व्हॉलीबॉलची उभरती ताकद आणि क्षमता आलोकच्या या विजयामुळे अधोरेखित झाली आहे. या ऐतिहासिक यशामुळे अधिकाधिक भारतीय खेळाडूंना जागतिक स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करण्याचा मार्ग खुला होतो आहे आणि योग्य प्रशिक्षण, समर्थन आणि जिद्द यांच्या जोरावर भारतीय खेळाडू जागतिक स्तरावर उत्तुंग भरारी घेऊ शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

ही कामगिरी महाराष्ट्रातील वाढत्या क्रीडा संस्कृतीचा आणि भारतातील दर्जेदार खेळाडू घडविण्याच्या बांधिलकीचा उत्तम प्रत्यय आहे. आलोक तोडकरचे नाव महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे आणि त्याने भावी पिढ्यांसाठी नवे मार्ग खुले केले आहेत.

अलोकचे स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सीईओ मा.पार्थ दोशी, महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री.प्रतीक पाटील,सचिव श्री.विरल शहा,प्राचार्य डॉ. स्वप्नील विधाते,श्री.शिवाजी कोळी, उपाध्यक्ष भास्कर बुचडे,रेल्वे संघाचे प्रशिक्षक अमेय कुलकर्णी आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.अलोकच्या यशामागे फाउंडेशनचे प्रशिक्षक डॉ. संतोष पवार, रोहित मालेगावकर,संदीप भोसले,तसेच संस्थेचे आधारस्तंभ मा.अप्पासाहेब रेणुसे व अमोल बुचडे यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मोलाचे ठरले.

नवी दिल्ली(गौरव डेंगळे): भारतीय शालेय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल अशी ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच नवी दिल्लीत पार पडली. School Games Federation of India (SGFI) च्या या ऐतिहासिक सभेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे श्रीरामपूर (महाराष्ट्र) येथील सुपुत्र पार्थ दोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली ही सभा यशस्वी झाली. आपल्या कार्यकुशलतेने व दूरदृष्टीने पार्थ दोशी यांनी महाराष्ट्राचा व देशाचा गौरव उंचावला आहे.


महाराष्ट्राचा सुपुत्र राष्ट्रीय पातळीवर चमकला!!!



सुमारे आठ महिन्यांपूर्वी पार्थ दोशी यांची SGFI च्या कार्यकारी अधिकारी (Executive Officer) पदावर निवड झाली. केवळ अल्पावधीतच त्यांनी महासंघाच्या कार्यप्रणालीत आमूलाग्र बदल घडवत महासंघाला नव्या यशशिखरावर नेऊन ठेवले आहे. त्यांच्या नेतृत्वात SGFI ने शालेय क्रीडा क्षेत्रात पारदर्शकता, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आणि खेळाडू केंद्रित धोरणे राबवली आहेत.


ऐतिहासिक सामंजस्य करार — निधी संकलनास नवे वळण!!!


SGFI च्या अध्यक्ष श्री. दीपक कुमार (IAS) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पार्थ दोशी यांच्या सक्रिय सहभागातून महासंघाने निधी संकलनासाठी शशक्त डेव्हलपमेंट अँड एम्पावरमेंट फाउंडेशन बरोबर ऐतिहासिक MoU केला आहे. या करारामुळे देशातील नामांकित कंपन्यांच्या CSR प्रकल्पांमधून आणि विविध प्रायोजकांकडून महासंघाला आर्थिक पाठबळ मिळणार आहे. या करारानंतर प्रतिकात्मक स्वरूपात ₹१० लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला, जो महासंघाच्या शाश्वत विकासाचा नवा अध्याय ठरला आहे.


डिजिटायझेशनद्वारे कार्यपद्धतीत क्रांती!!!


पार्थ दोशी यांच्या नेतृत्वाखाली महासंघाने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नोंदणी व पात्रता तपासणी प्रक्रियेत पारदर्शकता व कार्यक्षमता आणली आहे. आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक ओळख प्रणालीमुळे खेळाडूंची खरी पात्रता सहज निश्चित होणार असून अपात्रतेला पूर्णविराम मिळणार आहे. यामुळे महासंघाच्या कामकाजात विश्वासार्हता, गती आणि सुरक्षितता यामध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे.


राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूंना अधिक सुविधा!!!


राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये खेळाडूंना दर्जेदार सुविधा व उत्तम वातावरण मिळावे यासाठी महासंघाने आयोजकांना वित्तीय सहाय्य देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. चांगली निवास व्यवस्था, दर्जेदार आहार, उत्तम मैदान व अन्य सुविधा या सहाय्यामुळे उपलब्ध होतील. यामुळे स्पर्धकांच्या कामगिरीत निश्चितच सकारात्मक बदल दिसून येतील.


पार्थ दोशी यांची दूरदृष्टी आणि कार्यतत्परता कौतुकास्पद!!!


पार्थ दोशी यांनी केवळ महासंघाच्या यशासाठीच नव्हे तर देशातील लाखो शालेय खेळाडूंना दर्जेदार संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध प्रयत्न सुरू ठेवले आहेत. देशाच्या क्रीडा क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करणाऱ्या या तरुण नेतृत्वाने महाराष्ट्राचा अभिमान उंचावला आहे.


"शालेय पातळीवरूनच खेळाडूंना योग्य दिशा, सुविधा व प्रोत्साहन मिळाले पाहिजे, यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. शाळा हीच भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणारी पहिली प्रयोगशाळा आहे," असे पार्थ दोशी यांनी आपल्या भाषणात नमूद केले.


महाराष्ट्राचा अभिमान — श्रीरामपूरचे भूषण!!!


पार्थ दोशी यांच्या या यशामुळे संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः श्रीरामपूरमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. त्यांच्या यशाची दखल विविध क्रीडा संघटना, प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते व नागरिकांकडून घेतली जात आहे. युवकांनी पार्थ दोशी यांच्याकडून प्रेरणा घ्यावी असे आवाहन अनेकांनी केले आहे.


🌟 "पार्थ दोशी यांच्यासारख्या तळमळीच्या नेतृत्वामुळेच भारत शालेय क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास घडवू शकतो."

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget