ईद मुबारक दिन २२-०४-२०२३
" इस्लाम समजून घेताना "
।।। ईद - उल -फितत्र ;- आनंद - बक्षिसे मिळण्याचा दिवस,.....!!!
लेखक डॉ. सलीम सिकंदर शेख.
बैतुशशिफा दवाखाना ,श्रीरामपूर.
९२७१६४००१४
इस्लाम अरबी शब्दाचा अर्थ " शांती --अमान '"
शांतीच्या मार्गावर चालणारा , अर्थात अमन पसंत.
भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री स्वर्गीय सौ. सुषमा स्वराजजी . या युनोच्या संमेलनांमधे सहभागासाठी गेल्या होत्या . जगातील नेत्यांसमोर भाषण करताना , इस्लाम चा हिंदी भाषेमधील अर्थ पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना आपल्या परखड ओघवत्या शैलीत सुनावले की " इस्लाम शब्द का अर्थ शांती होता है ; " " " शांती 'होता है " शांती " , और अंग्रेजीमे अर्थ. "पीस..पिसफुल" है ., आपको शायद तो पता है ; और मालुम होना भी चाहिए ;; याद भी होना चाहिऐ " जबरदस्त भाषणाची सुरुवात करून पुन्हा पुढे संपूर्ण भाषण ओघवतं झाले.असो...!!!
इस्लाम मुळात जगात आलाच अराजक परिस्थितीत निर्माण झालेली , नितीमत्ता शिल्लक राहिलेले नव्हती , बाप जन्मालेल्या जिवंत मुली गाडुन बक्षिसे मिळवीत होता , नाद गाणं नंगानाच हैदोस घातला जात होता, प्रत्येक माणसांकडे रणडया या प्रतिष्ठेचं चिन्हं समजलं जातं होते , प्रत्येक घराघरात दारू तर प्रतिष्ठेची बाब झाली होती . सावत्र आईशी ही लग्न करण्याला चुकीचे समज नव्हते.. नितीमत्ता शिल्लक राहिलेले नव्हती. पत्नी फक्त हौसेचे साधन म्हणून वापरली जात होती. महिलांना तर कवडीमोल किंमतीत उपलब्ध होत होती. एवढ्या मोठ्या भयानक परिस्थिती एक उगवता सूर्य चंद्र त्या अरबी भुमीत सच्चा न्यायीक व्यक्ति अल्लाह ने प्रेषित म्हणून हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या रुपाने रानटी वाळवंटात प्रेमाचा संदेश देण्यासाठी पैंगंबर म्हणून पाठवलेत. त्याचबरोबर अल्लाहने आपला संदेश घेऊन ईशदुत हजरत जिब्राईल (जिब्राल्टर) अलै. यांच्या द्वारा वेळोवेळी मानव-कल्याणासाठी संदेश घेऊन २३ वर्ष घेऊन आलेत ,त्याच २३ वर्षाच्या अभुतपूर्व क्रांती ने आज १४४४ वर्ष जगाला दिशा देण्याचे काम केले. त्याच दिशेने बघुया..
प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांना अभुतपूर्व क्रांती घडवून आणण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील व भिती ही दाखवावी लागेल, आळशी वाळवंटातील लोकांसाठी काही उत्साही वातावरण निर्माण करणे गरजेचे होते. पुढे बघू या.
इस्लाम लोकांना अल्लाह (ईश्वराचे ) भय बाळगण्याचे तसेच संपूर्ण समर्पण करण्याचा आदेश देतो .एकाच अल्लाह ( ईश्वरा) ची आराधना करावी. अर्थात एकेश्वरवादाची शिकवण देतो . या जगात आणु - रेणु - चंद्र - सुर्य - तारे - पृथ्वी - हे ब्राह्मंड ( गॅलॅक्सि , Univers) चे प्रत्येक क्षण - क्षण,कणं न कणं निर्माण करून तो आप- आपल्या काटेकोर वेळा पाळुन चालवणारा फक्त एकटाच अल्लाह ( ईश्वर) आहे. माणवजातीला जन्माला घालणारा ही तोच अल्लाह आहेत व परलोक घेऊन जाणारा ही तोच अल्लाह आहेत. मनुष्य फक्त एक नाटकातील पात्रे आहेत... म्हणुनच " अल्लाहु अकबर " या तीनही लोकांत, सृष्टीला चालवणारा फक्त एकटाच अल्लाह (ईश्वर)आहे.म्हणुन एकाच अल्लाह( ईश्वरा)ची आराधना करावी म्हणजे एकेश्वरवादाची शिकवण. असो.
त्यासाठीच , हजरत मुहम्मद स्व सल्लम यांना मानव कल्याण - जन सुधारणा मार्गदर्शन करण्यासाठी प्रेषित- पैंगंबर -संदेश वाहक म्हणून अंतिम प्रेषित म्हणून घोषित केले..
प्रेषित मुहम्मद स्व सल्लम यांना एका खेड्यूतांनी प्रश्न विचारला, " पैंगंबर मुहम्मद स्व सल्लम ," " दिईन ( धर्म) म्हणजे काय ??
लगेच उत्तरादाखल तीन वेळा एकच वाक्य उच्चारले, " अद् - दिईन - नु - नसीह..! , अद् -दिईन -नु -नसीह!! , अद्-दिईन- नु- नसीह !!!
अर्थात:- ! लोक- कल्याण -हाच- दिईन ( धर्म) आहे !
!! लोक -कल्याण- हाच -दिईन (धर्म )आहे !!
!!! लोक- कल्याण -हाच- दिईन (धर्म )आहे !!
अल्लाहच्या लोक- कल्याणकारी योजना राबविण्यात आल्यात .
ईस्लामचे संस्कार मूल्यं:- " आपल्यासमोर कोणी लहान- मोठ्ठां , पुरुष -महिला - दिसताच, त्यांना आदराने :- "अस्सलामुआलैकुम- व- रहमतुल्लाह -व - बरकातहु " असा नमस्कार घालतात , अर्थात " तुमच्यावर आल्लाहाची शांती असो - कृपादृष्टी-दया- बरकत असो ". या वाणीत जिव्हाळा - विश्वास - प्रेम भावना व अल्लाह चे आशिर्वाद सुध्दा !!
= उत्तरादाखल समोरील बांधव त्याला , " वालेकुम-स्सलाम - व- रहमतुल्लाह -व- बरकातहु ". अर्थ ही तसाच मार्मिक ;- " माझ्याप्रमाणे तुझ्यावरही अल्लाहची शांती - कृपादृष्टी - बरकात असो." म्हणजेच डब्बल आशिर्वादच .
उत्तराने समोरच्या मनाला प्रेम ,वात्सल्य , मनाला आपुलकीने
चांगले चिंतित आहेत. आपुलकीच्या उत्तराने किती हायसे वाटत असणार ,. कितीही मोठा- मनुष्य-.गरीब - भिकारी- मालक , एक गुन्हेगार असो. सात जन्माचा दुश्मन असला ,तरी , किंवा बादशहा ला एक गुलाम , किंवा कैदेत असणाऱ्या गुन्हेगाराला बाहेरून येणाऱ्या बादशहा -राजा सुध्दा अशाच प्रकारे अदरानेच " सलाम " करणार -व - पुन्हा समोरच्या कडून उत्तर ही याच भावनेने येणार - देणार..!!
किती आदरयुक्त -प्रेमाची भावना इस्लामने जगाला दिली आहे ..
म्हणूनच , प्रेषित हजरत मोहम्मद सल्ल. , सांगितले आहे की , " कोणी उच्च- निच नाही , कोणी श्रेष्ठ नाही , कोणी मालक नाही , कोणी काळा व गोरा नाही , सर्व समान एकाच अल्लाह ने निर्माण केले आहे. समता बंधुताची शिकवणी दिली .
तुमचा मित्र , नातेवाईक कोणी खूप दिवसांनी आला तर त्याचे स्वागत एकमेकास आलिंगन - गळे भेटून देतात यामुळें एकमेकांच्या हृदयात - मनामध्ये तुम्ही मिसळले जाऊन , एक प्रकारे विरोध नाहीसा होतो. कट्टर दुश्मन असेल ; तरी समोर जेव्हा समेट घडवून आणला जातो ,तर ,त्यावेळेस एकमेकांची गळाभेट घेऊनच दुश्मनी संपवतात .
प्रेषीत मुहम्मद स्व . सल्लमांनी सांगितले ," तुम्ही तीन दिवसांपेक्षा जास्त काळ अबोल राहता कामा नये नाहीतर तुम्ही मुसलमानच नाही ".
प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांनी. सांगितले ," तुम्ही एकमेकांत समेट घडवून आणा व अल्लाहला समेट घडवून आणणारे जास्त प्रिय आहे."
प्रेषीत मुहम्मद स्व. सल्लम म्हणतात ," सर्व प्राणीमात्र ईश्वराची लेकरेआहेत म्हणून त्याने निर्माण केलेल्या मानवाशी प्रेम करतो , सर्व मानवजातीस सामाजिक न्याय देतो .
पवित्र कुरआन म्हणतो की, " आम्ही तुम्हाला सर्वांना एकाच स्री व एकाच पुरुषा पासून निर्माण केले आहे , ; मग तुमचे विविध राष्ट्र -देश - विविध ( कबील्यांत) भावक्यात व विविध वंशात विभागले गेले ; जेणेकरून तुम्हाला एकमेकांना ओळखता यावे ; परंतु अल्लाह जवळ श्रेष्ठ तोच असणारं आहे जो चारित्र्याने श्रेष्ठ असणारा आहे " ( पारा नं. २६ ,सुराह नं ४९ सुराह हुजूरात आ.नं.१३ वी )
दिव्य कुरआन म्हणतो की ," ज्याने अनुरेणू इतके सत्कर्म केले असेल त्याचे फळ त्याला तितकेच मिळेल ; व ; ज्याने जितके दुष्कर्म ,कुकर्म ,वाईट कर्म त्याचे फळ त्याला त्याचप्रमाणे भेटतील".
अल्लाह ने पैगंबर मार्फत दुष्कर्म करणाऱ्यांना दोजख ( नरका) ची भिंती दाखवून त्याच कुकर्म करणाऱ्या कडून सदाचार करून घेतले. जे अरब लोक जिवंत मुली गाडुन बक्षिसे मिळवीत होते तेच अरब लोक मुलींचे उत्साहाने कन्यादान करण्यात सबाब समजू लागले. महिलांना मान सन्मान मिळू लागला.
गरीब -गरजू - अनाथ मुलांना - पीडीतांसाठी जकातीचे पैशे वाटून खुशाली आली कालांतराने गरीबांच्या अर्थव्यवस्थे मोठी होऊन गरीब लोक जकात देण्याची पात्रता निर्माण झाली..
अल्लाह चे भय व कठोर कायदे आणुन अराजकता माजलेल्या वाळवंटात प्रेमाचा संदेश व सुव्यवस्था अबाधित झाली.
श्रीमंत लोकांना गरीबीची जाणीव होण्यासाठी रमजान मुबारक रोजा ठेवणं अनिवार्य करण्यात आले . यामुळे प्रत्येक श्रीमंत लोकांना गरीबीची, भुकेले कसे जगत असणार याची जाणीव निर्माण होऊन त्यांच्या जकातीच्या पैशातुन गरीबांच्या अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारली गेली
आपण २९ दिवस उन्हाळ्यात अल्लाहच्या मर्जी संपादन करण्यासाठी रोजे ठेवून अल्लाहाचे आराधना- उपासना- ईबादत- नामस्मरण केले . खुप तहान लागलेली असतानाही अल्लाहच्या मर्जी साठी भुकेची तमा न बाळगता १३-१४ तास सहन केले, तसेच घरातील चार- पाच वर्षाच्या लहान बाळगोपालांनीही भर उन्हाळ्यात रोजे ठेवुन , तरावीह नमाज , दिवसभराचे पाच वेळी नमाज आदा केलीत , अजूनही कामधंदे -व्यवहार सुरळीत झाले नसले , तरी , आपले अर्थीक गणिते संभाळून प्रपंचाची अर्थव्यवस्था व्यवस्थित करून . जकात- सदकाह - फितत्राह आजुबाजूच्या गरजू-पीडित-बेसहारा ,अनाथ ,विधवा तसेच योग्य व्यक्तीला दानधर्म देऊन , सामाजिक बांधिलकी जपली. तसेच कळत- नकळत काही चूक तर झाली नाही ना हे क्षनोक्षनी याची काळजी घेऊन , २९ रोजे सहन करुन पुर्ण करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले . अल्लाहाशी निरोगी आयुष्यासाठी , मुक्ततेची क्षनोक्षनी दुआ केली.
,जगातील सर्व प्राणी - मानवांना निरोगी आयुष्यासाठी रोजा ठेवून , स्वतः उपाशी राहून , दुसऱ्या समाजातील बांधवांना जे बेघर आहेत ,उपाशीपोटी आहेत ,आशां गरजूंना अन्न-पाणी , औषधे, झोपण्यासाठी निवारा व पायी चालणाऱ्यां वाटसरूंना चप्पल , मानसिक आधार दिला .मदत केली,
तसेच भारतीय बांधव आहोत . आपण सर्व बंधुभाऊ -भाई- भाई आहोत , पहाटे पासून.ते संध्याकाळ पर्यंत जेवढे काही करता आले तेवढी समाज सेवा अल्लाह (ईश्वर) सेवा तन-मन-धना ने करून आपण कोणत्याही लोभाची, कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता येवढं सगळे केलं .
हे सर्व लोक कल्याण -हाच-दिईन धर्म मध्ये च येते म्हणून ..
प्रेषित मुहम्मद स्व यांना विचारला गेलेला प्रश्न ," दिईन धर्म म्हणजे काय ? "
प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांनी ,उत्तरादाखल तीन वेळा एकच वाक्य उच्चारले की " अद् -दिईन- नु -नसीह "
अर्थात :- " लोक कल्याण हाच (धर्म ) दिईन नु नसीह "!! .
हे सर्व समजून उमजून घेऊन अल्लाह व प्रेषित मुहम्मद स्व सल्लम यांची मर्जी संपादन करण्यासाठी सहन केलत , खरोखरच सहनशीलता दाखवली याचं फळ , बक्षिसे अल्लाह ( ईश्वर) जरुर आपण केलेल्या सहनशीलतेप्रमाणेच निश्चितच मिळणार आहे, अल्लाहचा बक्षीस-ईनाम प्राप्तीचा दिवस आहे . निश्चितच आपल्याला अल्लाहा बक्षीस देणारच आहे , कोणाला किती हे आल्लाहा च ठरवणारे आहेत .जसे आपली आईवडील आपल्या मुलांची परीक्षा घेतल्यानंतर बक्षिसे देतात ,
प्रेषीत मुहम्मद स्व. म्हणतात कि, " अल्लाहा आपल्याला ७० आई पेक्षा ही जास्त प्रेम करतो ,'"
एक आई लेकराला जेवढे प्रेम करीत असते ,ते अल्लाहा( ईश्वर) आहेत ,विचार न केलेला बरं." आल्लाहा जीवसृष्टीच्या प्रत्येक जीवजंतू वर आई सारखेच प्रेम करतात ,
अल्लाह( ईश्वर) चा आजचा ईदु-ल - फितर चा इनाम-बक्षीस- पारितोषिक वितरणाचा दिवस आहे . पारितोषिके तर मिळणारच आहे...
आपला बंधुभाव -एकात्मता -स्नेह वृद्धिंगत व्होवो हीच अल्लाहा रबबुल आलमीन जवळ दुआ मांगतो....आमीन .... 🌹🌹🌹
(ईद - उल - फितत्र ) रमजान ईद मुबारक हो ... शुभेच्छा. 🌹🌹🌹
लेखन :- डॉ सलीम सिकंदर शेख
बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर
9271640014.
🌹🌹 @ डॉ @ स@ ली@ म@ शे@ ख@
Post a Comment