शिर्डी (जय शर्मा )राज्य सरकार कोरोणाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात रोखण्यासाठी कमी पडले असून त्यासाठी अयशस्वी ठरलेल्या राज्य सरकारचा निषेध करत राज्य सरकारने राज्यातील जनतेला कोरोणामुळे उद्भवलेल्या संकटकाळात विविध क्षेत्रात, विविध प्रकाराने मदत करण्याची मागणी करत राहता तालुक्यातील विविध गावात भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यकर्त्यांनी मेरा अंगण, मेरा रणांगण महाराष्ट्र बचाओ आंदोलन आज केले,
राज्यात कोरोणामुळे जनता मोठ्या संकटात सापडली आहे आर्थिक टंचाई भासू लागली आहे, राज्य सरकार या काळात अयशस्वी ठरले आहे, याचा निषेध करण्यासाठी राज्यभर आज भा,ज,प च्या वतीने महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले, भाजपच्यावतीने गावागावात मेरा अंगण, मेरा रणांगण ,महाराष्ट्र बचाओ आंदोलन केले गेले, याच धर्तीवर राहता तालुक्यातही असे आंदोलन झाले, राहता तालुक्यातील शिर्डी व परिसरातही ही गावागावात भाजपतर्फे असे आंदोलन करण्यात आले, निमगाव निघोज येथील भाजपाचे स्थानिक नेते बाळासाहेब गाडेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत गावात राज्य सरकारचा निषेध करत मेरा अंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव आंदोलन केले,व विविध मागण्यांचे निवेदन घेवुन त्यांनी हे आंदोलन केले ,तोंडाला मास्क लावून व सोशल डिस्टंन्स पाळत महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले, यावेळी शासनाने विद्यार्थ्यांची शालेय फी माफ करण्यात यावी, शेतमजूर, कामगार ,बारा बलुतेदार आदी रोजीरोटी वर जगणाऱ्या गोरगरिबांना आर्थिक अनुदान द्यावे ,राज्यातील सर्व भाडेकरूंचे तीन महिन्यांचे घर भाडे माफ करावे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी ,शिधापत्रिका नसलेल्यानाही रेशन मधून धान्य मिळावे, आदी विविध मागण्या करत हे महाराष्ट्र बचाव आंदोलन येथे करण्यात आले, त्याच प्रमाणे तालुक्यातील गावातही असेच वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन झाले.

Post a Comment