December 2022

अहमदनगर प्रतिनिधी-नुकत्याच औरंगाबाद येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद मास्टर स्पर्धेत अहमदनगर पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी अतुलनीय कामगिरी करून नगर पोलिसांचा झेंडा उंच फडकविला. या क्रीडा पोलिसांचे अहमदनगर पोलीस दलातून मोठे कौतुक होत आहे.

औरंगाबाद येथे राज्य अजिंक्य पद मास्टर स्पर्धा आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेत पोलीस दलातील अनेक संघ व पोलीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता अहमदनगर पोलीस दलातील महिला पोलीस हवालदार अर्चना काळे आणि पोलीस हवलदार अनवर अली सय्यद यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेच्या पूर्वतयारीत अनवर अली सय्यद आणि अर्चना काळे यांनी अहमदनगर पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानात मोठे परिश्रम करून सराव केला होता. या स्पर्धेत जाताना त्यांचे क्रीडाशिक्षक यांनी मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या तसेच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शुभेच्छा देऊन या दोन्ही खेळाडूंना दिले होते.

 पोलीस हवालदार अन्वरअली सय्यदअली सय्यद यांनी 900 मीटर शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. तसेच लांब उडी स्पर्धेत सहभाग घेऊन प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळवले. आणि शंभर मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांकावर येऊन सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला.  तसेच महिला पोलीस हवालदार अर्चना काळे यांनी 100 मीटर स्पर्धेत प्रथम क्रमांकावर येऊन सुवर्णपदक मिळविले. त्याचबरोबर 200 मीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. आणि 400 मीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक वर येऊन सुवर्णपदकावर हक्क प्रस्थापित केला. या दोन्ही क्रीडा पोलिसांनी औरंगाबाद येथील  क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाचा वर्षाव करून अहमदनगर पोलिस दलाची मान उंचावली. या स्पर्धेमध्ये दोन्ही खेळाडूंनी एकूण सहा सुवर्णपदक मिळवल्याने पोलीस दलातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. पोलीस अधीक्षक राकेश यांनी खेळाडूंचे कौतुक करून त्यांचा सन्मान केला व आगामी स्पर्धेतही अशीच सुवर्ण कामगिरी करून पोलीस दलाचे नाव उंच करून पोलीस दलाची शान राखावी अशी सदिच्छा व्यक्त केली.

बेलापुरातील गावकरी पतसंस्थेचे संचालक सामाजिक कार्यकर्ते महेश कुऱ्हे  यांचा वाढदिवस बेलापुरातील पत्रकार देविदास देसाई यांच्या हस्ते बिनधास्त न्यूज व तिरंगा न्यूजचे संपादक असलम बिनसाद गांवकरी पतसंस्थेचे संचालक अजीज शेख भाऊसाहेब वाघमारे उपस्थित होते राज्याचे महसुल व दुग्ध विकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही कुऱ्हे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

बेलापुर  (प्रतिनिधी  )-रासायनिक खताच्या अती वापरामुळे आपले पोषण करणाऱ्या मातीतील जिवाणू लोप पावत चालले असुन माती जिवंत, सजिव ठेवावयाची असेल तर सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय असुन माता गोमाता व माती यांची काळजी घेण्याची गरज असल्याचे मत साँईल चार्जर टेक्नाँलाँजीचे जनक राम मुखेकर यांनी व्यक्त केले                   श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगाव येथील पुरुषोत्तम आण्णासाहेब थोरात यांच्या गाय गोठ्यास त्यांनी भेट दिली त्या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना राम मुखेकर पुढे म्हणाले की  माता-पिता ,गोमाता , व माती या सर्वांचे रक्षण करण्याची, काळजी घेण्याची वेळ आलेली आहे माता-पित्यांची काळजी न घेतल्यामुळे समाजात वृद्धाश्रमांची सख्या वाढत आहे हे आपले दुर्दैव आहे गोमातेची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे शेतकरी बंधुंचा दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडला आहे लंपीसारख्या आजाराने पशुधन धोक्यात आलेले आहे रासायनिक खते वापरुन पिकवीलेले अन्न आपण खात असल्यामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे आपल्याला सकस आहार न मिळणे हेच आजाराचे मुख्य कारण आहे तेच पिकांच्याही बाबतीत होत आहे पिकात असलेल्या कमजोरीमुळे पिकावर रोग येतो त्यामुळे कमजोरीवर उपाय करण्या ऐवजी आपण रोगावरच मोठ्या प्रमाणात खर्च करतो परिणामी खर्च अधिक व उत्पन्न कमी अशी अवस्था होते त्यामुळे पिकाला, झाडाला सशक्त मजबुत बनवायचे असेल तर भरपुर पोषण द्या पिकाला भरपुर पोषण दिले तर रोगच येणार नाही रासायनिक खताचा वापर टाळा सेंद्रिय शेती करा उत्पन्नही जोमदार निघेल पिकविणारा अन खाणारा दोघेही समाधानी राहील असेही ते म्हणाले या वेळी ब्राम्हणगाव भांड येथील शेतकरी सुरेश वारुळे यांनी सेंद्रिय शेतीचे काय फायदे होतात याचे अनुभव सांगितले  या वेळी शेखर वाकचौरे वरुण तुवर विशाल कोकणे आण्णासाहेब जाधव देवराम वाबळे  सौरभ उगले अमित घोडके उमेश मुखेकर प्रविण आहेर सदाशिव कोळसे अक्षय खरात इश्वर दरंदले प्रतापराव पटारे ज्ञानदेव थोरात नवनाथ गडाख विठ्ठल बोठे शंकर थोरात आदिसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर शेतकरी संघटनेचे प्रकाश आण्णासाहेब थोरात यांनी आभार मानले

नागपुर ,श्रीरामपुर (प्रतिनिधी  )-स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्या संदर्भात विचार विनिमय करुन योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे अश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनच्या शिष्टमंडळाला दिले                                        स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी तातडीने 4 जी मशिन देण्यात यावी एनआयसीच्या कामकाजात सुधारणा करण्यात यावी आदीसह विविध मागण्या संदर्भात आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवुन निवेदन दिले                   महाराष्ट्र  एकुण ५५ हजार स्वस्त धान्य दुकाने असुन दुकानदारांना कमी प्रमाणात कमीशन मिळत असल्यामुळे  दुकानदारांच्या कमीशनमध्ये वाढ करण्यात यावी अनेक वेळा नेट अभावी दुकाने बंद ठेवण्याची वेळ येते त्यामुळे कार्डधारकांची गैरसोय होते म्हणून दुकानदारांना 4 जी मशिन देण्यात यावे पाँज मशिनला सुविधा पुरविणाऱ्या एनआयसीच्या कामकाजात सुधारणा व्हावी कुठलेच धान्य वेळेवर मिळत नाही त्यामुळे त्या महिन्याचे धान्य त्याच महिन्याला मिळावे मोफत धान्य वाटपाचे कमीशन तातडीने वर्ग करण्यात यावे आवश्यक त्या ठिकाणी केरोसीन वितरण सुरु करण्यात यावे आयएसओ मानांकनाची सक्ती करण्यात येवु नये अशा मागण्याचे निवेदन आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनच्या वतीने राज्याचे अध्यक्ष गणपतराव डोळसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले या वेळी विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ इगतपुरी तालुक्याचे आमदार हिरामन खोसकर  आमदार सरोज अहीरे आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे जनरल सेक्रेटरी बाबुराव ममाणे नागपुर विभागीय अध्यक्ष संजय पाटील नांदेंड जिल्हाध्यक्ष अशोकराव ऐडके नागपुर शहराध्यक्ष सुभाष मुसळे वर्धा जिल्हाध्यक्ष संजय देशमुख हिंगोली जिल्हाध्यक्ष भिकुबाई मोहीते नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे शाहु गायकवाड धर्मराज चौधरी अरुण बागडे इगतपुरी गोपी मोरे दिंडोरी सुदाम पवार देविदास पगारे दशरथ मेधने कैलास मोखनळ राहुल गायकवाड अमोल धात्रक केशव भुसारे नितीन शार्दुल प्रकाश पगार रवी माळगावे भास्कर पताडे आदि पदाधिकारी उपस्थित होते

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर नगरपरिषद यांच्या अधिपत्याखाली  बांधकाम अभियंता व मर्जीतील ठेकेदार यांना कामे वाटप केले व अर्थिक संगणमत करून सन २०२१-२०२२  मध्ये पूर्ण केलेल्या व चालू असलेल्या  ,व गेली आठ दिवसात पूर्ण झालेल्या विविध रस्त्यांच्या विकास कामामध्ये केलेली कार्यालय अनियमितता गैरप्रकार व झालेले चालू असलेले रस्ते निकृष्ट थातूरमातूर कामे करून टक्केवारी घेऊन बिले  काढले व झालेल्या सर्व कामे थातूर-मातूर  निकृष्ट  खडी व अल्प प्रमाणात डांबर  वापरून शहरातील अनेक रस्त्यांची कामे केली  सदरील उपोषण अर्जात नमूद कामाची सखोल चौकशी होऊन संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर दंडात्मक कार्यवाही  करण्याच्या  मागणीसाठी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने  नगरपरिषद श्रीरामपूर येथील कार्यालयासमोर आमरण उपोषणास दि.२७/१२/०२२ रोजी सुरुवात झाली आहे.

      वरील अर्जात नमूद कालावधीमधील झालेल्या व चालू असलेल्या व दहा बारा दिवसांमध्ये गेल्या  नामदार विखेंच्या हातसे उद्घाटन झालेल्या व केलेल्या कामांची सखोल चौकशी होऊन संबंधित  व कामावर वापरलेल्या मटेरियल ची उच्चस्तरीय सूक्ष्म चौकशी करून  कार्यवाही साठी व संबंधित अधिकारी ठेकेदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावी व काम करणारे निकृष्ट थातूरमातूर काम करणारे ठेकेदार  यांना  काळया यादीत टाकावे व त्यांनी केलेले काम व कामापोटी काढलेल्या व काढण्याच्या तयारीत असलेली सर्व बिले तात्काळ थांबविण्यात यावी या मागणीसाठी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने श्रीरामपूर नगरपरिषद श्रीरामपूर नगरपरिषद कार्यालयासमोर भारतीय लहुजी सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव   हनिफ भाई पठाण, जिल्हाध्यक्ष -रज्जाक भाई शेख ,जिल्हा संघटक- राजेंद्र त्रिभुवन  आदी  लहुजी सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपोषणास बसले आहे.

श्रीरामपूर : गावं तसं चांगलं पण काही लोकांमुळे भंगल,अशी परिस्थिती,तालुक्यातील एकलहारे ग्रामपंचायतीची झाली आहे. याठिकाणी असलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराने, येथील नागरिकांसाठी आलेले स्वस्त धान्य, काळ्या बाजारात विक्रीस पाठवत असतांना. गावातील काही महिलांनी, टेम्पो आडवून. रेशनचा गहू तांदूळ कुठं चालवले याची विचारपूस केली. मात्र रेशनदुकानदार एस के मस्के यांच्या नावावर असलेल्या,स्वस्त धान्य दुकान चालकाने अरेरावी करत. रेशनचे धान्याने भरलेला टेम्पो काढुन दिला. यासंदर्भात ग्रामस्थांनी  तक्रार केल्याने, ग्रामसेवक,तलाठी,सरपंच व ५ पंचांसह, सायंकाळी ५ : ३० वाजेच्या सुमारास, रेशनचे धान्य दुकान सील केले. कारवाईच्या भीतीपोटी रेशन दुकान चालकाने, काळ्या बाजारात पाठवलेले गहू तांदूळ,बारदाने बदललेल्या अवस्थेत,   अधिकाऱ्यांनी सील केलेलं कुलूप उघडून, काळ्या बाजारात नेलेले गहू तांदूळ परत आणले. मात्र ग्रामस्थानी त्यास विरोध करून. पुरवठा अधिकारी व तलाठी यांना बोलावून, रेशन दुकानाचा पंचनामा करून. संबंधित रेशन दुकानदारा विरोधात गुन्हा दाखल केला असून. गरिबांच्या तोंडचे अन्न चोरून नेणाऱ्या, स्वस्त धान्य दुकान चालक राहुल पगारे याच्या विरुद्ध,कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. स्वस्त धान्य घोटाळ्या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात, पुरवठा निरीक्षक

सुहास पुजारी यांच्या फिर्यादीवरून, जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे  कलम ३ ,७ अन्वये स्वस्त धान्य दुकान चालक शांताबाई कारभारी म्हस्के - पगारे हिच्या विरुद्ध, गुन्हा दाखल करण्यात आला असून. पोलीस कारवाईत, स्वस्त धान्याने भरलेल्या १५ पोती ताब्यात घेण्यात आली असून. या प्रकरणाचा पुढील तपास,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे,पोलीस नाईक गणेश भिंगारदे हे करीत आहेत.

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) - श्रीरामपूर तालुक्याला मराठवाड्याशी जोडणारा अत्यंत जवळचा मार्ग म्हणजे श्रीरामपूर - वैजापूर हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. सध्या ३० किलोमीटर अंतरासाठी सव्वा ते दीड तासाचा वेळ लागत आहे. 20 किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त वेगाने कोणती ही गाडी येथे चालवता येत नाही. केवळ लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत केलेल्या दुर्लक्षाचे परिणाम दोन्ही भागातील जनतेला भोगावे लागत आहेत. त्यामुळे श्रीरामपूर- वैजापूर या रस्त्याच्या कामामध्ये लक्ष घालून सदरचा रस्त्याचे मजबुतीकरण करून हा रस्ता चौपदरी करण्यात यावा यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिल्ली दरबारी आपले वजन वापरून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडून खास निधी या ३० किलोमीटरसाठी उपलब्ध करून घ्यावा आणि वर्षानुवर्ष हाल अपेक्षा भोगणाऱ्या जनतेची सुटका करावी अशी मागणी दोन्ही तालुक्यातील त्रस्त जनतेने खासदार सदाशिव लोखंडे यांना केली आहे.

श्रीरामपूर - वैजापूर रस्त्याचे एकूण अंतर ३८ किलोमीटर आहे. यापैकी श्रीरामपूर ते खैरी निमगाव पर्यंतचा आठ किमी पर्येंत चा रस्ता अत्यंत चांगला आहे. तिथून पुढे नाऊर पर्यंतचा रस्ता खूपच खराब आहे. या रस्त्यावर इच्छा असूनही वीस पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवता येत नाही. सिंगल रोड असल्याने प्रवासाला वेळ लागतो. तिथून पुढे वैजापूर तालुक्यात लाडगाव पासून पुढे रोड चांगला आहे. मधला रस्ता थोडा खराब आहे. परंतु सिंगल रोड असल्याने इथे सुद्धा तीस किलोमीटर साठी सव्वा ते दीड तास वेळ द्यावा लागतो. त्यातच सध्या उसाच्या गाड्या चालू असल्याने रस्त्याची परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. या रस्त्याबाबत दोन्ही तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी सोयीनुसार आत्तापर्यंत दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांच्या विकासाला खिळ बसली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून हा रस्ता सोयीस्कर आहे.परंतु खैरी निमगाव ते  नाऊरपर्यंत हा रस्ता अत्यंत वाईट अवस्थेत आहे.

 वैजापूर तालुक्यातील जनतेचे श्रीरामपूरशी खूप जवळचे संबंध आहेत. लाडगाव, सावखेड गंगा, वांजरगाव या गावातील जनतेचा श्रीरामपूरशी नियमित संपर्क आहे. सरांना बेट येथे जाणाऱ्या भाविकांसाठी सुद्धा हा रस्ता सोयीचा आहे. मात्र रस्त्याची दुरावस्था असल्याने त्याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागतात. नसून ताप असून संताप अशी या रस्त्याची अवस्था झालेली आहे. सध्याच्या रस्त्याचे काम गेल्यावर्षी झाले. मात्र भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या कामांमध्ये रस्त्याची आणखी दुरावस्था झाली. सध्याच्या रस्त्यावर गाड्या धावतच नाहीत. त्यामुळे लोकांचा वेळ वाया जातो तसेच गाड्या पंचर होण्याचा किंवा अपघात होण्याचा धोका देखील वाढला आहे. त्यासाठी श्रीरामपूर वैजापूर रस्त्याचे चांगल्या प्रकारे मजबुतीकरण होऊन चौपदरीकरण झाल्यास मराठवाड्यात जाण्यासाठी हा अत्यंत सोयीचा रस्ता असून पुढे समृद्धी महामार्गाला देखील त्याला जोडता येईल. तेव्हा हे काम फक्त खासदार सदाशिव लोखंडे करू शकतात कारण त्यांचे व नितीन गडकरी यांचे जुने संबंध आहेत. गडकरी साहेबांसाठी या रस्त्यास निधी देणे ही अतिशय किरकोळ बाब आहे. खासदार सुजयदादा विखे यांनी नगर दक्षिण मध्ये 25 कोटी रुपये वेगवेगळ्या रस्त्यांसाठी मंजूर करून आणले. त्याचप्रमाणे खासदार लोखंडे साहेबांनी सुद्धा आपल्या मतदारसंघांमध्ये गडकरी साहेबांकडून असेच रस्ते विकास निधी आणावा त्यात प्रामुख्याने श्रीरामपूर - वैजापूर रस्त्यासाठी भरीव निधी आणून कायमस्वरूपी या रस्त्याची कटकट काढून टाकावी आणि हा रस्ता मजबूत करावा. गोदावरी नदीवर पुल हा प्रशस्त असल्याने तेथे पुल करायची आवश्यकता नाही. फक्त नदीच्या दोन्ही बाजूकडील रस्ते चांगले मजबूत व्हावेत ही या जनतेची अपेक्षा आहे .

सदरचा रस्ता चांगला झाल्यास त्याच्या फायदा श्रीरामपूरच्या बाजारपेठेला देखील होणार आहे तसेच सराला बेट येथे येणाऱ्या भाविकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे. जिल्ह्यातील आजी माजी मंत्री सराला बेट ला नियमित येतात. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे आजपर्यंत कोणीही लक्ष दिलेले नाही. फक्त राजकारण करतात जनतेची सोय मात्र कोणी पाहत नाही. मात्र खासदार लोखंडे या सर्व बाबींना अपवाद आहेत. कमी बोलणारा परंतु काम करणारा खासदार अशी त्यांची प्रतिमा आहे. तेव्हा आता खासदार लोखंडे यांनी श्रीरामपूर - वैजापूर रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून खैरी निमगाव पासून वैजापूर पर्यंतचा रस्ता मजबुतीकरण व चौपदरी होण्यासाठी विशेष निधी आणून या  भागातील जनतेची वर्षानुवर्षाची समस्या दूर करावी आणि जनतेचे आशीर्वाद घ्यावेत अशी अपेक्षा दोन्ही तालुक्यातील या रस्त्याचा नियमित वापर करणाऱ्या जनतेने व्यक्त केली आहे .

श्रीरामपूर - वैजापूर तालुक्याला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पूल माजी मंत्री गोविंदराव आदिक यांच्या प्रयत्नाने झाला. त्यांच्यानंतर मात्र आलेल्या कोणत्याही आमदाराने या रस्त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. गोदाकाठचा परिसर खोलवर मातीचा असल्यामुळे रस्त्याचे कामांमध्ये सातत्य राहत नाही. अनेक वर्षानंतर गेल्या वर्षी हा रस्ता डांबरीकरण झाला. मात्र त्याला आता मोठमोठे खड्डे पडले आहे. सध्या तर या रस्त्यावरून जाणे मोठे दुरापास्त झाले आहे. वीस पेक्षा जास्त वेगाने गाडी कोणीही चालवू शकत नाही. एवढी बिकट अवस्था रस्त्याची झालेली आहे. खासदार लोखंडे यांच्यासाठी हे काम फार किरकोळ आहे. तेव्हा त्यांनी आपले वजन खर्च करून नामदार गडकरी यांचेकडून या रस्त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून घ्यावा आणि या रस्त्याचे काम वर्षभरामध्ये पूर्ण करावे अशी अपेक्षा दोन्ही तालुक्यातील जनतेने व्यक्त केली आहे.

श्रीरामपूर - वैजापूर दरम्यानचा विद्यमान रस्ता हा दर्जेदार होण्याऐवजी दर्जाहीन झाला आहे. वैजापूर विभाग व श्रीरामपूर विभाग बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे रस्त्याचे काम निकृष्ट झाले आहे. श्रीरामपूर ते नाऊर पर्यंत रस्ता तर खूपच खराब झाला आहे.गेल्या वर्षीच  हा रस्ता झाला. कोटयवधी रुपये त्यावर खर्च दाखवण्यात आला. मात्र त्याचा दर्जा तपासायची वेळ आता आली आहे.या रस्त्याचे दुर्भाग्य म्हणजे अनेक वर्ष न्यायालयीन प्रकारामुळे हा रस्ता दुर्लक्षित होता. कसाबसा तो प्रश्न मिटल्यानंतर रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने जनतेला तोंड झोडून घेण्याची वेळ आता आली आहे. आमदार लहू कानडे, आमदार रमेश बोरणारे यांनी फारसे लक्ष न घातल्याने या ३० किलोमीटर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मात्र आता खासदार सदाशिव लोखंडे यांनी मनावर घेतल्यास हा प्रश्न चुटकीसरशी मार्गी लागू शकतो असा विश्वास दोन्ही तालुक्यातील लोकांना आहे. लोखंडे हे कमी बोलणारे आणि जास्त काम करणारे खासदार म्हणून राज्यात परिचित आहेत. तेव्हा त्यांनी आपले वजन वापरून श्रीरामपूर- वैजापूर रस्त्याची दुरावस्था दूर करून या रस्त्याचे मजबुतीकरण, विस्तारीकरण व चौपदरीकरण करण्याच्या कामांमध्ये लक्ष घालावे व श्रीरामपूर वैजापूर मार्फत अहमदनगर जिल्हा व मराठवाडा विभाग जवळ आणण्यासाठी मोलाचे योगदान द्यावे अशी विनंती नाऊर, जाफराबाद, खैरी निमगाव, सावखेड गंगा, लाडगाव, वांजरगाव या भागातील जनतेने केली आहे.

श्रीरामपूर(गौरव डेंगळे):विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या कष्टाच्या प्रेमात पडावे.आज विद्यार्थीचे ध्येय दिवसाला दीड जीबी डाटा संपवणे बनलेले आहे.दीड जीबी डाटा रोज संपवणे आजच्या तरुण पिढीचे राष्ट्रीय कर्तव्य बनले आहे का? असा सवाल उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी श्रीरामपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या ४७ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थित केला.न्यू इंग्लिश स्कूलचे महत्व विशद करताना त्यांनी हे ही सांगितले की आई ही मुलांची पहिली शाळा आहे,तर शाळा ही मुलांची पहिली आई असते.

आजची तरुण पिढी सोशल मीडियाचा वापर चुकीच्या पद्धतीने करत असून यासाठी पालकांनी आपल्या मुला-मुलींवर विशेष लक्ष दिले पाहिजे.विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर अतिशय काळजीपूर्वक व आपल्या अभ्यासातील प्रगतीसाठी करावा.पोलीस दलातील माणसे हे परग्रहावरील नसून ती आपल्यातलीच आहे असं प्रत्येकाने समजलं पाहिजे. पोलीस दलामध्ये कार्य करत असताना त्यांनी आपले अनेक अनुभव विद्यार्थ्यां व पालकांसमोर श्री मिटके यांनी व्यक्त केले.

वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संदीप मिटके,अविनाश कुदळे, श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राम टेकावडे,अनुजा टेकावडे,प्रतीक्षित टेकावडे,बाळासाहेब ओझा,विधिज्ञ दादासाहेब औताडे,संगीता कासलीवाल, अरुण पुंड,प्राचार्या जयश्री पोडघन,प्राचार्य डॉ योगेश पुंड आदींच्या हस्ते दीप प्रज्वलाने झाली.यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक सत्र २०२१-२२ वर्षातील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून हिरण जेठवा हिचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात २०१९ ते २०२१ पर्यंत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.यानंतर ज्युनिअर के जी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्य आविष्काराने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं व वाहवा मिळवली.

 वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करताना शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

श्रीरामपूर २४ डिसें.: श्रीराम अकॅडमी सी.बी.एस.ई. शाळेचा १४ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा बुधवार, दि. २० डिसेंबर २०२२ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेच्या परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी 'पौर्वात्य-पाश्चात्य' या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम डावखर लॉन्स, गोंधवणी रोड या सभागृहात सादर करण्यात आला. 

           विविध कलागुणांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.  मोबाईलच्या अतिवापरामुळे कुटुंबाकडे होणारे दुर्लक्ष तसेच पाल्यांना जबाबदारीचे जाणीव करून देणाऱ्या नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. तसेच हिंदी अथवा मराठी भाषेतून आपण ऐकलेल्या जाहिरातीचे संस्कृत भाषेतून सादरीकरण करण्यात आले. 

               यावेळी कॅनरा बँक, श्रीरामपूर शाखेचे मुख्य व्यवस्थापक नंदराज कुमार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते; तसेच भैरवनाथ नगर ग्राम पंचायतीचे सरपंच भारत तुपे,श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी संस्थेचे चेअरमन राम टेकावडे,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य,ॲडव्हायझरी कमिटी सदस्या,न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक पुंड हे देखील कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमात दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका जयश्री पोटघन यांनी शालेय वार्षिक अहवाल सादर केला.

           वार्षिक स्नेहसंमेलनास शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . बालचमुंनी कला सादर करून पालक व ग्रामस्थांना मंत्रमुग्ध केले. ' रामायण महाभारतावरील नृत्य सादरीकरण' कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. सोहळ्याची सांगता वंदे मातरम् ने करण्यात आली. व्यवस्थापन समितीकडून कौतुकाची थाप मिळाल्यावर सोहळ्यासाठी सर्वांनी घेतलेल्या कष्टाचे सार्थक झाले.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत नेवासा येथील त्रिमूर्ती पब्लिक स्कूल येथे शालेय १९ वर्षाखालील मुला-मुलींचे जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हाभरातून १४ तालुक्यातील विजयी संघ सहभागी झाले होते. श्रीरामपूर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संघाने पहिल्या सामन्यात अकोला तालुका, दुसऱ्या सामन्यात राहुरी तालुका तर उपांत्य फेरीचा लढतीत श्रीगोंदा तालुक्याचा सरळ सेटमध्ये पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात श्रीरामपूर तालुक्याचा सामना रंगला तो बलाढ्य नेवासा संघाबरोबर.भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारी नेवासाची रक्षा खेनवार तिच्याविरुद्ध खेळताना श्रीरामपूरच्या मुलींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले. श्रीरामपूर संघाची कर्णधार खुशी यादव,वेदश्री नवले,सुहानी यादव, समृद्धी अभंग, त्रिशा वाघ, श्रावणी पवार,प्राप्ती जैत, देवांशी यादव, समीक्षा शिवरकर आधी खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. उपविजेता संघाला क्रीडाशिक्षक नितीन गायधने यांचा मार्गदर्शन लाभले. उपविजेत्या संघाचे श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री राम टेकावडे, त्रिमूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष काकासाहेब घाडागे पाटील,सचिव प्रतीक्षित टेकावडे,सदस्य विधीज्ञ दादासाहेब औताडे,बाळासाहेब ओझा, महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे माजी अध्यक्ष पार्थ दोशी,प्राचार्या जयश्री पोडघन, प्राचार्य डॉ योगेश पुंड,पुणे विभागीय व्हॉलीबॉल सचिव दादासाहेब तुपे,नितीन बलराज, नितीन तमनार तसेच शाळेचे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.


कोट: उपविजेता श्रीरामपूर संघाला त्रिमूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री साहेबराव घाडगे पाटील यांच्याकडून विशेष ₹ १५००/- रुपये पारितोषिक देण्यात आले. यावेळी घाडगे पाटलांनी व्हॉलीबॉल व इतर खेळांना लागेल ती मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय येथे जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा संपन्न झालेल्या.१४ वर्ष वयोगटातील मुलीच्या कबड्डी स्पर्धात हरेगाव येथील संत तेरेसा गर्ल्स हायस्कूल संघ विजेता ठरला आहे.

या १४ वर्ष वयोगटातील मुलीनी कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत उपांत्य फेरीचे लढतील श्रीगोंदा तालुका तर अंतिम सामन्यात नेवासा तालुका संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. शालेय विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी सदर संघ अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करेल. विजयी संघाचे संत तेरेसा गर्ल्स हायस्कूलच्या प्राचार्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती, शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वी संघाला क्रीडा शिक्षक नितीन बलराज यांचे मार्गदर्शन लाभले.

राहुरी प्रतिनिधी-प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की, राहुरी पोस्टे गु.र.नं ॥ ११५६/ २०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्ह्यतील स्टील चोरी करणारे आरोपी व मुद्देमाल तात्काळ शोध घेणेबाबत मा. श्री. राकेश ओला सो पोलीस अधिक्षक सो अनगर व श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर भाग यांनी पोनि / प्रताप दराडे यांना तात्काळ कारवाई करणेबाबत आदेश दिलेले होते. सदर आदेशाप्रमाणे राहुरी पोलीस स्टेशनकडील पोनि / प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई करणेत आली आहे.

     नमुद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांनी राहुरी पोलीस स्टेशनकडील कारवाई करणेकामी पोसई खोंडे, सफौ/चंद्रकांत ब-हाटे, पोहेकॉ/दिनकर चव्हाण, पोहेकॉ / सोमनाथ जायभाय, पोना/ अमित राठोड, पोकों / अदिनाथ पाखरे, पोकों/सचिन ताजणे, पोकों / संतोष राठोड, पोकों/गणेश लिपणे, पोकॉ/नदिम शेख .पोकॉ/ अमोल पडोळे यांचे विशेष पथक नेमण्यात आले होते.सदर बाबत पोनि प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली कि आरोपी नामे १) अभिषेक बाबासाहेब हुडे २) हर्षल दत्तात्रय ढोकणे दोघे रा. उंबरे ता. राहुरी यांनी गुन्हा केलेला आहे. गोपनीय माहीती मिळाल्याने सदर आरोपी यांना सापळा लावुन उंबरे शिवारात जेरबंद करुन त्यांना सदर गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता सदरचा गुन्हा हा आम्ही व ३)जयेश उर्फ गुलाब बाबासाहेब ढोकणे ४) छोट, उर्फ सौरभ संजय दुशिंग ५) राहुल दादु वैरागळ सर्व रा. उंबरे ता. राहुरी जि. अनगर असे आम्ही मिळुन केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी यांनी गुन्ह्यातील एकुन मुद्देमाल १२ लाख ८१ हजार रुपये किंमतीचे लोखंडी स्टील व गुन्हा करणेकामी वापरलेले महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर, TATA कंपनीची ACE मॉडेलची गाडी हे आरोपींनी दाखवल्याने वरील मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे.सदरची कारवाई मा. श्री राकेश ओला सो, पोलीस अधिक्षक, अ.नगर श्रीमती स्वाती भोर मॅडम , अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर भाग व श्री संदिप मिटके सो, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.


श्रीरामपूर : शहरा नजीक असलेल्या, जिल्हा परिषद शाळेतील एका लिंग पिसाट शिक्षकाने, शाळेतील अल्पवयीन मुलीच्या मोबाईल वर अश्लील मेसेज पाठविल्याचे,मुलीच्या  पालकांच्या लक्षात आल्याने. संताप झालेल्या पालकांनी, जिल्हा परिषद वस्ती शाळेतील लिंग पिसाट शिक्षकाला एकदा नाहीतर सलग २ दिवस चांगलाच चोप दिल्याने. गावात चर्चेला उधाण आले असून. शिक्षकी पेशास काळिमा फासणा-या, शिक्षका विरोधात तीव्र नाराजगी व्यक्त केली जात असून. या प्रकरणी पोलिसात कोणत्याही प्रकारचा तक्रार दाखल झाली नसून. या लिंग पिसाट शिक्षकला चोप दिल्याने, इतर चांगल्या शिक्षकांकडे देखील. पाहण्याचा दृष्टिकोन बदल असल्याने, अशा सडक्या कांद्यांमुळे पवित्र समजल्या जाणारा शिक्षकी पेशा बदनाम होत असून. अशा नितीहीन आणि लिंग पिसाटांचा बंदोबस्त करावा अशी मागणी, महिला वर्गातून केली जात आहे.

श्रीरामपूर : लग्नाचा बनावा करून, एका विशिष्ट समाजाच्या मुलीचा गैरफायदा घेणाऱ्या, युवराज शिंदे या जिम मालका विरोधात, पीडित मुलीच्या तक्रारीवरून १० डिसेंबर रोजी भादवी कलम ३७६, ३७६ (२), एन, ४२०,३२३, ५०४, ५०६ अन्वये, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपी फरार होता. सदर आरोपीस अटक करून, कठोर कारवाईच्या मागणी करिता. विविध संघटनांनी मोर्चा देखील काढला होता. या संदर्भात पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली,मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे. शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे,पोलीस नाईक गौतम लगड,राहुल नरवडे, रमीज अत्तार, गणेश गावडे,अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयातील पोलीस नाईक प्रमोद जाधव फुरकान शेख आदींच्या पथकाने, पुणे जिल्ह्यातील खडक वासला येथुन अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी युवराज शिंदे यास, सायंकाळी जेरबंद करून. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात हजार केले असून. मुलीवरील अत्याचार प्रकरणी १० डिसेंबर रोजी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील करीत आहेत.

श्रीरामपूर(गौरव डेंगळे): पालकांनी आपल्या पाल्याला बालपणापासून सर्व स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यास प्रवृत्त करावे असे प्रतिपादन न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्या दरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष राम टेकावडे यांनी व्यक्त केले. यावेळी पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे सदस्य प्रतीक्षित टेकावडे, बाळासाहेब ओझा, विधीज्ञ बाळासाहेब औताडे, शाळेचे प्राचार्य डॉ योगेश  पुंड तसेच शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ज्युनिअर के जी व सिनियर के जी वर्गातील विविध स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष वडीतके यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अस्मिता परदेशी, यास्मिन पटेल, वैष्णवी इंगळे व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

श्रीरामपूर(गौरव डेंगळे): येथील आझाद मैदानावर महाराष्ट्र बिल्डर असोसिएशन यांच्या मान्यतेने असोसिएयन बॉडी बिल्डिंग अँड फिजिकल फिटनेस यांच्या वतीने जिल्हास्तरीय भव्य बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये फ्रेंड्स युवा श्री या किताबाचा मानकरी आदम बागवान, बेस्ट पोझरचा मानकरी सद्दाम शेख तर बेस्ट इम्प्रूमेंटचा मानकरी सेजम मणियार हे ठरले.तर अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच वुमेन फिजिक बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सुप्रिया इल्हे हिने वुमेन फिजिकचा किताब पटकावला. या स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातून १४२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी पंच म्हणून श्री मयूर दरंदले, श्री कैलास रणसिंग, श्री सतीश रासकरसोहेल शेख प्रतीक पाटील आदीनी काम बघितले. तर स्पर्धेचं स्टेज मार्शल म्हणून राहुल पैलवान, किरण पोटे, चेतन होंडे, अमोल एखंडे, भीमा जाधव, शुभम बोर्डे आदींनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्याकरीता असोसिएयन बॉडी बिल्डिंग अँड फिजिकल फिटनेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व स्पर्धा आयोजक सागर दुपाटी यांनी अथक परिश्रम घेतले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

५५  किलो गट ललित घुले - प्रथम,

सिद्धेश गडगे - द्वितीय,

विजय घोरपडे - तृतीय

अशांत जाधव - चतुर्थ 

श्रीकांत जाधव - पाचवा


६० किलो गट


सद्दाम शेख- प्रथम

धीरज सोनावणे-द्वितीय

निलेश म्हस्के- तृतीय

राजू साबळे- चतुर्थ

शाहबाज पठाण- पाचवा


६५ किलो गट

नागेश शेवाळे - प्रथम

अजय बोर्डे- द्वितीय

तॊसिफ पठाण -तृतीत

संजय भोसले -चतुर्थ

तेजस वैध्य -पाचवा


७० किलो गट


संतोष जरे- प्रथम

ओंकार पंदीकर - द्वितीय

अस्लम सय्यद- तृतीय

प्रकाश दुधमल- चतुर्थ 

रोहित आव्हाड - पाचवा


७५ किलो गट


सैजल मणियार- प्रथम

वैभव सुरशे- द्वितीय

फिरोज पठाण -तृतीय

विवेक गुप्ता- चतुर्थ

किरण सरोदे -पाचवा


८० किलो गट 

आदम बागवान- प्रथम

इम्रान शेख- द्वितीय

सुलतान शेख -तृतीय

मनोज जाधव- चतुर्थ

पवन ललवानी -पाचवा


मेन्स फिजिक 

१) ललित घुले (शिर्डी)

२) नागेश शेवाळे (नगर)

३) अस्लम सय्यद (श्रीगोदा)

४) राजू साबळे (श्रीरामपुर) 

५) अजीम शेख (कोपरगांव)

श्रीरामपूर (प्रतिनिधी) संभाजीनगर - औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या  राज्यस्तरीय मास्टर्स वेटलिफ्टींग स्पर्धेत येथील यशवंत हार्डकोअर जिमच्या खेळाडूंनी सलग तिसऱ्यांदा यश संपादन करीत नऊ  सुवर्ण पदकांसह  करंडक मिळऊन विजयाची हॅ्ट्रिक केली आहे. तर  येत्या जानेवारीत वाराणसी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी जीमच्या नऊ खेळाडूंची निवड झाली आहे.सुवर्ण पदकांसह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे  पॉवर वेटलिफ्टर खेळाडू प्रा. सुभाष देशमुख यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. पुढील महिन्यात दि.११ रोजी वाराणसी येथे आयोजित राष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी या जिमच्या सर्वश्री. महेश निंबाळकर, विजय देशमुख, राजु सोनवणे, सतीश रासकर, गणेश कुलथे , युनुस शेख, अल्ताफ शेख,सौ. भारती रासकर व सौ. पवार यांची महाराष्ट्राच्या राज्य संघात निवड झाली आहे.या खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा चॅम्पियनशिप मिळवीत श्रीरामपूरचे नाव थेट देशपातळीवर घेऊन जात नगर जिल्हा आणि श्रीरामपूरच्या क्रीडाविश्वातील शिरोपेचात मानाचा तुरा खोवला ही कौतुकास्पद बाब आहे. या सूयशाबद्दल मार्गदर्शक प्रा. सुभाष देशमुख आणि सर्व यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

बेलापूर - (प्रतिनिधी  )-येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांना नुकताच  पारनेर साहित्य साधना मंच व आडवाटेचे पारनेर संस्थेंच्यावतीने कै.अण्णासाहेब ठुबे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा राज्यस्तरीय "साहित्यरत्न" पुरस्कार जाहिर झाला आहे.                   पारनेर तालुक्यातील पळशीसारख्या दुर्गम भागातून डॉ.कोकाटे यांनी एम.ए.एम.फिल,नेट,पीएचडी असे शिक्षण मराठी साहित्यातून पूर्ण केले आहे.त्यांनी "रानभरारी","मी सूर्याच्या कुळाची","वादळांना झेलताना", "यमुनाबाई कोकाटे यांच्या मौखिक ओवीगीतांचे स्वरुप", "सावित्रीबाई फुले यांच्या कवितेचे स्वरुप","सानिया यांच्या साहित्याचे स्त्रीवादी स्वरुप",वांझोटे वार","सावू उजेडाच्या दिशा","कविता: तुझ्या माझ्या" ,"मी जिंकत गेले आयुष्य" अशी ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे.त्यांच्या या ग्रंथसंपदेसाठी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पिंपरी आणि महाराष्ट्र कामगार परिषद पिंपरी पुणे यांचा राज्यस्तरीय"ग.दि.माडगूळकर शब्दसृष्टी पुरस्कार","संत कबीर काव्यसरिता राज्य स्तरीय पुरस्कार","शिवांजली साहित्य गौरव राज्यस्तरीय पुरस्कार",शांता शेळके राज्यस्तरीय पुरस्कार असे अनेक संस्थांचे २३ पुरस्कार मिळाले आहेत .त्या बेलापूर महाविद्यालयाच्या पहिल्या प्रोफेसर आहेत.त्यांच्या प्राचार्य पदाच्या कार्यकाळात महाविद्यालयाचे ,कायम संलग्नीकरण पूर्ण झाले असून त्यांच्या या शैक्षणिक ,संशोधन व प्रशासकीय कार्याची दखल घेऊन वर्ल्ड पार्लमेंट अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार तसेच डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श प्राचार्य राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.या पुरस्काराबाबत भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, आतापर्यंत खूप मान, सन्मान, पुरस्कार मिळाले पण पारनेरच्या मातीतला पुरस्कार घेताना एक वेगळे संवेदन जाणवते आहे कारण हा पुरस्कार म्हणजे माहेरवाशीणीला पांघरलेली मायेची शाल आहे.या पारनेरच्या मातीत मी लहानाची मोठी झाले.खूप संघर्ष वाट्याला आला पण खंबीरपणे लढले.हे लढण्याचे बळ मला पारनेरच्या मातीने दिले आहे असेही त्या म्हणाल्या  .त्यांचे मराठी साहित्यात राज्यस्तरीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर 50 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणपतलाल मुथा, उपाध्यक्ष अशोकनाना साळुंके, खजिनदार हरिनारायण खटोड, सचिव अँड.शरद सोमाणी, सहसचिव दीपक सिकची, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड, रविंद्र खटोड, भरत साळुंके,हंबीरराव नाईक, राजेंद्र सिकची,अॅड.विजय साळुंके, विश्वस्त बापूसाहेब पुजारी, राजेंद्र खटोड, हरिश्चंद्र पाटील महाडिक,  तसेच सर्व प्राध्यापक,प्राध्यापकेतर कर्मचारी , समस्त बेलापूरकरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

श्रीरामपुर प्रतिनिधी:पत्रकारिते सोबतच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना मिळालेल्या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) यासह येथील विविध संघटनांच्यावतीने पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.ज्येष्ठ साहित्यिक रज्जाकभाई शेख (सर) आणि टीम संचलित दोस्ती फाऊंडेशन अहमदनगर यांच्यावतीने दिला जाणारा लोककलावंत पै. मजनूभाई शेख राज्यस्तरीय गौरव पुरस्कार २०२२ हा राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्कार येथील ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांना तर   राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय नगरकर आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्रीमती रेहाना गणी मुजावर- शेख यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार तसेच अ.भा.लहुजी सेनेच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार असलमभाई

बिनसाद यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर समाज प्रबोधन पुरस्कार मिळाल्याबद्दल व तालुक्यातील सराला गोवर्धनपूरचे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक रुबाब पटेल यांची अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य,त्रिदल सेवा संघ,परिवर्तन फाऊंडेशन,समता फाऊंडेशन,परिवर्तन शिक्षक संघ,पेन्शन शिक्षक संघ यांच्यावतीने येथील समता कार्यालयात पुरस्कार प्राप्त मान्यवरांना शुभेच्छा देत त्यांचा  शॉल,पुस्तक आणि पुश्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.यावेळी चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली,चर्मकार संघर्ष समिती अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष संजय दळवी, महिला जिल्हाध्यक्षा सौ.सुनंदा दिलीप शेंडे, जिल्हा संघटक दिलीप शेंडे सर,तालुका खजिनदार नामदेव कानडे,ज्येष्ठ सल्लागार नामदेव नन्नवरे, संघटक अशोकराव खैरे सर, सुभाष पोटे, कार्याध्यक्ष प्रेमचंद वाघमारे, जिल्हा उपाध्यक्षा सौ.सोनल प्रेमचंद वाघमारे, जिल्हा उपसचिव सौ.आशाताई संजय दळवी, सौ.अर्चनाताई सतिशराव जाधव, परिवर्तन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष (माजी नायब तहसीलदार) उत्तमराव दाभाडे, त्रिदल सेवा संघाचे मेजर कृष्णा सरदार,परिवर्तन शिक्षक संघाचे सतिश जाधव सर,पेन्शन शिक्षक संघाचे सुरेश कांबळे सर, शाकिर शेख सर,गुलाबभाई शेख, ग्रामसेवक श्री.मनियार भाऊसाहेब,समता फाऊंडेशनचे इंजि मोहसिन शौकत शेख, सौ.सलवा मोहसीन शेख, सरताज शौकत शेख,अफजल मेमन, मतीन शेख,कु.पुजा सकट, रेहान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सत्काराला उत्तर देताना शौकतभाई शेख म्हणाले की, दोस्ती फाऊंडेशनमध्ये वकील, इंजिनिअर,डॉक्टर,शिक्षक, साहित्यिक अशी विद्वान सदस्य मंडळी आहेत,त्यांनी राज्यभरातील विविध क्षेत्रात सामाजाभिमुख आणि  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा शोध घेत त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे,इतर पुरस्कारार्थींच्या तुलनेत माझे योगदान आगदी नगण्य असे आहे,तरी देखील मला दिला गेलेला राज्यस्तरीय पत्रकार रत्न पुरस्काराबद्दल तसेच आपण सर्वांनी केलेल्या आम्हा सर्वांच्या सत्कारबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे, सदरील पुरस्कार आणि आपण केलेला सत्कार यातुन मोठे बळ प्राप्त झाले आहे, पुढे हेच पुरस्कार आणि आपले प्रेम व सदिच्छा प्रेरणास्वरुप आम्हास बळ देण्याकामी महत्वाचे ठरेल असेही ते म्हणाले.या वेळी इतर मान्यवरांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.या छोटेखानी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिलीप शेंडे (सर) यांनी केले तर ॲड.मोहसिन शेख यांनी आभार मानले.

अहमदनगर येथे १४ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या,हिंदू जन आक्रोश मोर्चा दरम्यान, सेनेच्या महिला पदाधिकारी आशा निंबाळकर यांनी,केलेल्या भाषणा दरम्यान अतिशय खालच्या पातळीवर जाऊन. मुस्लिम समाजा बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने. या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र निंबाळकर यांच्या वादग्रस्त विधानाची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने. मुस्लिम समाजाच्या भावना दुखल्याने,श्रीरामपूर येथील मुस्लिम समाजातील जेष्ठ नागरिकांसह, युवकांनी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना निवेदन देऊन. सेनेच्या महिला पदाधिकारी आशा निंबाळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्या विरोधात,व आयोजक तसेच संयोजकांवर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलीय. सदरचे निवेदन स्वीकारून, वरिष्ठांच्या आदेशानुसार , श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिल्याने.

बेलापुर (प्रतिनिधी  )दळण वळणाच्या दृष्टीने  राहुरी व श्रीरामपुर या दोन तालुक्याला जोडणारा  प्रवरा नदीवरील कान्हेगाव पुलाच्या बांधकामास राज्याचे  महसुल व दुग्ध विकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा यांनी बारा कोटी रुपये मंजुर केले असल्याची माहीती मा .जि प सदस्य शरद नवले यांनी दिली आहे               या बाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात मा जि प सदस्य शरद नवले यांनी पुढे म्हटले आहे की राहुरी तालुक्यातील केंदळ मानोरी टाकळीमीया जातप करजगाव मुसळवाडी दरडगाव खुडसरगाव पाथरे लाख त्रींबकपुर आदिसह पंधरा ते विस गावे व श्रीरामपुर  तालुक्यातील लाडगाव कान्हेगाव पढेगाव वांगी उंबरगाव वळदगाव बेलापुर कारेगाव अशी श्रीरामपुर तालुक्यातील अनेक गावे जोडणारा प्रवरा नदीवर पुल असावा अशी दोन्ही तालुक्यातील नागरीकांची अनेक वर्षापासून मागणी होती प्रवरा नदीला पाणी असल्यास  दोन्ही तालुक्यातील गावांचा संपर्क तुटत होता केवळ उन्हाळ्यात प्रवरा नदीला पाणी नसेल तरच प्रवरा काठावरील गावांचा संपर्क होत होता दोन्ही तालुक्याला जोडणारा हा अत्यंत जवळचा मार्ग म्हणजे हा पुल होता त्यामुळे नागरीक प्रवरा नदीवर पुल व्हावा अशी वारवार मागणी करत होते दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करुन माझ्यासह भाजपाचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे  उपसभापती बाळासाहेब तोरणे रामभाऊ लिप्टे गीरीधर आसने महेश खरात मुकुंद लबडे अर्जुन खरात हनुमान खरात प्रविण लिप्टे आदिंनी नामदार राधाकृष्ण विखे पा यांच्याकडे सतत पाठपुरावा केला अखेर ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करुन महसुल मंत्री  नामदार राधाकृष्ण विखे पा .यांनी प्रवरा नदीवरील दोन तालुक्याच्या दृष्टीने दळणवळणा करीता महत्वाचा ठरणारा  कान्हेगाव पुलास बारा कोटी रुपये इतका निधी मंजुर केला असुन या पुलामुळे अनेक गावे आपापसात जोडली जाणार असल्याचेही नवले यांनी सांगितले

महाराष्ट्र पोलीस मेगासिटी सहकारी गृहरचना संस्था (मर्यादित), लोहगाव पुणे ही सभासदांना किफायतशीर दरात, हक्काचे निवासस्थान मिळावे या हेतूने, पोलिसांनी पोलिसांकरिता स्थापन केलेली सहकारी गृहरचना संस्था असून लोहगाव येथे ११६ एकर जमीनीवर मोठे गृहसंकुल उभारले जात आहे. संस्थेच्या सभासदांची संख्या ७२१३ इतकी असून १२ वर्षात प्रथमच संस्थेची २०२२-२०२७ या कालावधीसाठी निवडणूक घेण्यात आली.

     दि.११/१२/२०२२ रोजी पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, नागपूर व अमरावती या १० शहरांमध्ये मतदान होऊन दि. १३/१२/२०२२ रोजी शिवाजी मराठा हायस्कूल शुक्रवार पेठ पुणे येथे मतमोजणी झाली.


     ही संपूर्ण प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती निलम पिंगळे, उपनिबंधक सहकारी संस्था पुणे (२) यांच्या अधिपत्याखाली शांततापूर्वक पार पडली. 

     यापूर्वी असलेल्या संचालक मंडळाच्या गलथान व मनमानी कारभारामुळे मेगासिटी प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नसून गेल्या १० महिन्यांपासून संस्थेचा कारभार प्रशासकाचे ताब्यात होता. या निवडणुकीत संस्थेच्या जागरूक व समविचारी सभासदांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या 'जागृती' पॅनेलचे सर्व १९ उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले असून विरोधातील क्रांती व सावधान या दोन्ही पॅनलचा दारुण पराभव होऊन सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.अनामत गमावलेल्या पराभूत उमेदवारांमध्ये पुण्यातून नुकतेच बदलून गेलेले वाहतूक पोलिस उपायुक्त श्री राहुल श्रीरामे यांचाही समावेश आहे.

जागृती पॅनेलचे विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

१) श्री प्रदीप देशपांडे, विशेष पोलिस महानिरीक्षक (नि)

२) श्री अरविंद पाटील, सहायक पोलिस आयुक्त (नि)

३) श्री राजेन्द्र मोरे, पोलिस उपअधीक्षक (नि)

४) श्री भारतकुमार राणे, पोलिस उपअधीक्षक (नि)

५) श्री सुरेश भामरे, सहायक पोलिस आयुक्त (नि) नाशिक

६) श्री बरकत मुजावर, पोलिस उपअधीक्षक (नि) पुणे

७) श्री नारायण इंगळे, पोलिस उपअधीक्षक, (नि) नाशिक 

८) श्री किशोर जगताप, सहायक पोलिस आयुक्त (नि), मुंबई 

९ ) श्री सतीश टाक पोलिस निरिक्षक ( नि) औरंगाबाद 

१०) श्री अर्जुन गायकवाड पोलिस निरिक्षक (नि) नवी मुंबई ११ ) श्री दत्तात्रय दराडे पोलिस निरिक्षक (नि) मुंबई 

१२) श्री पोपटराव आव्हाड, पोलिस निरीक्षक, मुंबई 

१३) श्री धनंजय कंधारकर, पोलिस निरीक्षक, (नि) मुंबई

१४) श्री सुभाष भालसिंग, सहायक पोलिस उपनिरीक्षक, अहमदनगर 

१५) श्री गणेश ठाकरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक (नि) पुणे 

१६) श्री प्रल्हाद भोसले, पोलिस उपनिरीक्षक (नि) पुणे 

१७) श्री शेळके मनीष बाबुराव, पुणे 

१८) सौ.निलम बो-हाडे, पोलिस हवालदार, ठाणे

१९) सौ. वैशाली जगताप, वरिष्ठ लिपीक, पोलिस आयुक्तालय, पुणे.

निवडणूक प्रक्रिया चालू असताना या संस्थेच्या माजी सेक्रेटरी मोहंमद रफी खान यांनी प्रशासकाच्या अनुपस्थितीत संस्थेच्या कार्यालयात येऊन, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून, एक पोते भरुन काही महत्त्वाचे कागदपत्रे व फायली चोरून नेल्यामुळे त्याचे विरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात नुकताच एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या कमिटीच्या सभासदांनी गठित केलेल्या संपूर्ण पॅनेलचा पराभव झाल्यामुळे व संवेदनशील प्रामाणिक सभासदांनी संस्थेच्या कारभारात लक्ष घातल्याने गैरकारभारास जबाबदार असलेल्या जुन्या संचालकांचे आता धाबे दणाणले आहे. प्रकल्पातील एकही इमारत अद्याप पूर्ण झाली नसून संस्थेच्या कारभा-यांनी बिल्डर कंपनीला २७१ कोटी रुपये दिले आहेत, तरी एकाही सदस्याला घर मिळालेले नाही याबद्दल जबाबदार असलेल्या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची भावना विजयी पॅनेलचे प्रवक्ते श्री अरविंद पाटील यांनी व्यक्त केली.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -पैसे कमवायला फक्त ५ वी पर्यंत शिक्षण गरजेचे आहे हे एका उद्योजकाचे विधान आज प्रत्यक्षात पाहण्याची संधी परमवीर शहीद अब्दुलहमीद नगरपालिका डिजीटल उर्दू शाळा क्र.५ ने आयोजित आपना बाजार मध्ये प्राप्त झाली.एखाद्या खाद्य महोत्सवाला लाजवेल एवढे खाद्य पदार्थ या बाज़ारातील खाऊ गल्लीत पाहण्यास मिळाले.मुलांनी स्वछतेबाबत घेतलेली काळजी ही पंचतारांकित हॉटेलच्या शेफ प्रमाणे होती.प्रत्येक स्टॉलवर लेबलप्रमाणे ठेवलेले खाद्यपदार्थ व एका दिवसासाठी व्यासायिक झालेली ही लहान मुले, त्यांचा उत्साह व आनंद पाहण्यासारखा होता. त्यातून पालकांनी व शिक्षकांनी घेतलेले परिश्रम दिसून येत होते. खरं तर या संपूर्ण उपक्रमाचे श्रेय हे शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक सलिमखान पठाण सर यांना जाते. त्यांनी आपल्या काळात नगरपालिका शाळेचे रूपांतर एका कॉन्वेंट शाळेत केले असे म्हणण्यास हरकत नाही.आगामी काही दिवसात ते निवृत्त होणार असले तरी उर्दू शाळा क्रमांक पाचची निर्माण झालेली प्रतिमा येथील शिक्षक पुढे कायम ठेवतील याची मला खात्री आहे. विद्यार्थी हिताचे असेच उपक्रम या शाळेने राबवावेत.आगामी काळात विविध शैक्षणिक उपक्रमाकरीता उर्दू शाळा क्र ५ ला खुप साऱ्या शुभेच्छा मी आपल्या सर्वांच्या वतीने देतो असे प्रतिपादन गरीबनवाज फाउंडेशनचे संस्थापक,माजी नगरसेवक मुख्तारभाई शाह यांनी केले.
येथील नगरपालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये मुलांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी आयोजित केलेल्या अपना बाजारच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अनोख्या अशा या अपना बाजारचे उद्घाटन नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांचे हस्ते करण्यात आले.त्याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्तार शाह बोलत होते.
यावेळी माजी नगरसेविका जायदाबी कुरेशी,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तरन्नुम मुनीर शेख,उपाध्यक्ष अजीम शेख, युवक काँग्रेसचे जाफर शहा, सरवर अली मास्टर, मुक्तार मणियार,अहमद शाह, शरीफ मेमन,आदिल मखदुमी, फिरोज पोपटिया,असलम बिनसाद,फारुख तांबोळी,मुख्याध्यापिका परविन शेख,कांचन मुसळे,नाझिया शेख,नाहीद शेख आदींसह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांनी शाळा क्रमांक पाच मध्ये विद्यार्थ्यांच्या हिताचे वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबविले जातात. दैनंदिन जीवनामध्ये मुलांना व्यवहार न्याय मिळण्यासाठी आयोजित केलेला आजचा हा आपला बाजारचा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय आहे.यातून मुलांना जीवनासाठी आवश्यक व्यवहाराचे ज्ञान प्राप्त होईल.अशा उपक्रमांची आज गरज आहे.या कार्यक्रमासाठी सर्वपक्षी लोक राजकीय अधिनिवेश बाजूला ठेवून शैक्षणिक कार्याला प्रोत्साहन देऊन देण्यासाठी एकत्र आले ही अभिनंदनीय बाब आहे असे नमूद करून शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या कामाचे कौतुक केले.
प्रास्ताविक भाषणामध्ये मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी दरवर्षी शाळेमध्ये अशा प्रकारच्या बाजाराचे आयोजन केले जाते. मागील दोन वर्षांमध्ये कोरोना काळामुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे यावर्षी पालक आणि विद्यार्थी यांच्या आग्रहास्तव हा अपना बाजार भरविण्यात आला आहे. पालक व विद्यार्थी यांच्यात खूपच उत्साह आहे. त्यातूनच मोठ्या संख्येने स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत असे सांगितले.
या अपना बाजार मध्ये स्टेशनरी,भाजीपाला, खेळणी, कटलरी, किराणा आदी सामानाची दुकाने लावण्यात आली होती. सर्वात जास्त लक्ष वेधले ते खाऊ गल्ली विभागातील खाद्यपदार्थांच्या स्टॉलनी. विद्यार्थ्यांनी स्वतः वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून आणले होते. पालक आणि परिसरातील नागरिकांनी या बाजारामध्ये मोठी गर्दी केल्याने चार तासांमध्ये अपेक्षित असणारा हा अपना बाजार दोन तासातच संपला. नगरपालिका शाळा क्रमांक चार,सहा, नऊ तसेच खासदार गोविंदराव आदिक उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थ्यांनी या बाजाराला भेट दिली.
बाजारामध्ये ३२ हजार रुपयांची उलाढाल झाली.हैदराबादी बिर्याणी या स्टॉलला तोटा सहन करावा लागला. इतर स्टॉल मात्र नफ्यात राहिले.
एक आगळावेगळा उपक्रम म्हणून या अपना बाजारची चर्चा शाळेचे विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिकांमध्ये होती. आलेल्या सर्व मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन पाहणी केली तसेच खरेदी सुद्धा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिफ मृत्यूचा यांनी केले तर आभार फारूक शाह यांनी मानले.
सदरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे व शाळेचे मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री फारूक शाह, आसिफ मुर्तुजा,एजाज चौधरी,जुनेद काकर, वहिदा सय्यद, नसरीन इनामदार, शाहीन शेख, अस्मा पटेल,बशीरा पठाण, निलोफर शेख, मिनाज शेख, यास्मिन पठाण, रिजवाना कुरेशी, रेश्मा सय्यद,हिना पठाण आदींनी विशेष परिश्रम घेतले.

अहमदनगर प्रतिनिधी- जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारा विरोधात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेने,एकाच आठवड्यात दुसरी कारवाई करत.३ गावठी कट्टे, ३ जिवंत काडतुसांसह ५ सराईत आरोपींना गजाआड केले आहे. ज्यात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे,कोल्हार बुद्रुक येथील राजवाडा गौतमनगर परिसरात सापळा रचून. बेकायदेशीर रित्या विक्रीच्या उद्देशाने आणलेल्या, दुर्गेश बापु शिंदे वय वर्ष ३५,रा. सरस्वती कॉलनी, वॉर्ड नं.७, श्रीरामपूर, हारुण ऊर्फ राजु रशिद शेख, वय वर्ष ३१, रा.अहिल्यादेवी नगर, वॉर्ड नं.२, श्रीरामपूर, अश्पाक ऊर्फ मुन्ना रफिक पटेल, वय वर्ष २१, रा. बेलापुर रोड, शहानगर, कोल्हार ब्रुद्रुक, प्रसन्न विलास लोखंडे, वय वर्ष ३२, रा. गौतमनगर, राजवाडा, कोल्हार बुा, तालुका राहाता, सदानंद राजेंद्र मनतोडे, वय वर्ष २७, राहणार शिबलापुर, तालुका संगमनेर अशा ५ जणांना ताब्यात घेतले असून. आरोपीं विरोधात लोणी पोलीस ठाण्यात,आर्म ऍ़क्ट ३/२५, ७ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून. या प्रकारणाचा पुढील तपास लोणी पोलीस करत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,  अप्पर पोलीस अधीक्षक,श्रीमती. स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिक्षक, संजय सातव, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली,सहाय्यक फौजदारी मनोहर शेजवळ, भाऊसाहेब काळे,पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक शंकर चौधरी, संदीप चव्हाण, लक्ष्मण खोकले, दिलीप शिंदे, राहुल सोळुंके, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत जाधव,संभाजी कोतकर व भरत बुधवंत आदींच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

श्रीरामपूर : शहरात लग्नाचा बनाव करून. ३ वर्षांपासून अत्याचार होत असल्या संदर्भात, एका जिमच्या मालका विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने.शहरातील महिला वर्गात खळबळ उडाली आहे. ज्यात जिम मध्ये येणाऱ्या,एका विशिष्ट समाजाच्या, पीडित मुलीला. वेळोवेळी फेसबुक,मोबाईल मेसेज करून. एका मंदिरात हार घालून, व डोक्यात कुंकू भरून. आपले लग्न झाल्याचे सांगत. लवकरच रजिस्टर मॅरेज करून सोबत राहू असे म्हणत. श्रीरामपूर, पुणे अशा विविध ठिकाणी, पिडितेवर वेळोवेळी शारिरीक अत्याचार करत. पीडितेकडून आपला स्वार्थ निघाल्यानंतर, तिला लग्नास नकार देत, तिला मारहाण करून. आपल्या संबंधा संदर्भात कोणाला सांगितल्यास, तुझ्या घरच्यांची बदनामी करून. तुझ्या भावाला जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याने सतत होत असलेल्या अत्याचारास कंटाळून. पीडित मुलीने बेलापूर येथील नदीपात्रात, आपला जीव देत असतांना. तेथील काही नागरिकांनी तिचा जीव वाचवून, उपचाराकरिता साखर कामगार रुग्णालयात दाखल केल्यानंतर. घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून,जिम ट्रेनर मालक युवराज विजय शिंदे राहणार मेनरोड श्रीरामपूर, यांच्या विरोधात भादवी कलम ३७६, ३७६ (२), एन, ४२०, ३२३, ५०४,५०६ अन्वये,श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहे. पुन्हा एका जिम चालकाकडून,मुलींवर शारिरीक अत्याचाराची घटना, समोर आल्याने.महिला मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )- समिंद्रा फौंडेशन महाराष्ट्र राज्य याच्या वतीने गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य,सायकल गरजु लाभार्थ्यांना कपडे अन्नधान्य तसेच माऊली वृद्धाश्रमाच्या वतीने उबदार कपड्याचे मोफत वितरण माऊली वृद्धाश्रम येथे संपन्न झाले  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भालचंद्र कुलकर्णी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार देविदास देसाई राष्ट्रपती  पुरस्कार विजेते बबनराव तागड भाऊसाहेब वाघमारे रज्जाक पठाण रमाताई भालेराव अशोक दिवे उपस्थित होते या वेळी बोलताना समिंद्रा फौंडेशनचे अध्यक्ष  सदाशिव थोरात म्हणाले की गेल्या दहा वर्षापासून या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असुन गोरगरीबांना मोफत कपडे वाटप तसेच जिवनावश्यक वस्तुचे वाटप केले जाते कोरोना काळात अनेकांना या फौंडेशनच्या माध्यमातून  वेगवेगळ्या प्रकारे सहाय्य करण्यात आले होते महाराष्ट्रात अनेक शेतकरी कर्जामुळे आत्महत्या करत आहेत त्या शेतकऱ्यांना आमचे जाहीर अवाहन आहे अडचण आली तरी आत्महत्येचा विचार कधीच करु नका समिंद्रा फौंडेशन तुमच्या पाठीशी आहे तुम्ही केव्हाही हाक द्या परंतु आत्महत्येचा विचार मनात आणू नका समाजात निराधार मुली असतील तर त्यांचा विवाह करण्याची जबाबदारी संमिद्रा फौंडेशन घेईल सर्व सामान्य गोरगरीबांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत  समाज सेवेची प्रेरणा मला माझी आई लक्ष्मीबाई थोरात यांच्याकडून मिळाली असल्याचेही थोरात या वेळी म्हणाले या वेळी माऊली वृद्धाश्रमाचे सुभाष वाघुंडे म्हणाले कि अनेक दात्यांनी दाखविलेल्या दातृत्वामुळे कठीण असा हा अनाथ आश्रम चालविणे शक्य होत आहे आपण समाजाकडे सतत मगत असतो परंतु आपणही काही तरी दिले पाहीजे दान केले पाहीजे याच भावनेतुन आज समिंद्रा फौंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गरीब मुलांना शालोपयोगी साहीत्य तसेच गरम उबदार कपडे ब्लँकेट भेट देण्याचा निर्णय घेतलेला आहे .या वेळी भालचंद्र कुलकर्णी  जेष्ठ पत्रकार देविदास देसाई राष्ट्रपती पुरस्कार विजेते बबनराव तागड शंभुक वसतीगृहाचे अशोक दिवे सर रमाताई भालेराव रज्जाक पठाण भाऊसाहेब वाघमारे स्वाती बागुल आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी समिंद्रा फौंडेशनच्या वतीने तीन हजार कपडे २०० साड्या ९ सायकली ६० अन्नधान्य किट या साहीत्याचे मोफत वाटप करण्यात आले तर ५० विद्यार्थ्यांना वह्या ब्लँकेटचे वाटप करण्यात आले या वेळी बागुल सर श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमाचे ह भ प कृष्णानंद महाराज फौंडेशनचे अध्यक्ष सदाशिवा थोरात यांच्या आई लक्ष्मीबाई थोरात स्वाती बागुल परवीन शहा आदिसह नागरीक उपस्थित  होते कार्याक्रमाचे सूत्रसंचलन शकील बागवान यांनी केले तर सौ कल्पना सुभाष वाघुंडे यांनी आभार मानले

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - येथील एसटी स्टँड शेजारी,नेवासा रोड वरील मुख्य पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांच्या मनमानी व गलथान कारभारामुळे शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. पोस्टातील कर्मचारी आपल्या मर्जीने वागून काम करतात. नागरिकांच्या वेळेचे त्यांना भान देखील राहत नाही.त्यामुळे पोस्टाच्या या गैरकारभाराबद्दल शहरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून या ठिकाणी सक्षम पोस्ट मास्तरची नियुक्ती करून कर्मचाऱ्यांना व्यवस्थित काम करण्याचे प्रशिक्षण द्यावे अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

 विशेषत:पोस्टाच्या मुख्य काउंटरच्या खिडकी क्रमांक दोन वरील सेवेबद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

काल गुरुवारी या खिडकीवर आपली कामे घेऊन आलेल्या नागरिकांना सुमारे तीन तास ताटकळावे लागले. साडेबारा वाजता लाईन मध्ये लागलेल्या लोकांना एक वाजता जेवणाची सुट्टी झाली म्हणून संबंधित कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सांगितले. बरेच वेळ उभे असलेल्या नागरिकांनी त्यांना विनंती केली तरी त्यांनी आता माझी जेवणाची सुट्टी झाली आहे,एक वाजून गेला आहे. तुम्ही दोन वाजता या असे सांगून काम बंद केले. शहराच्या इतर भागातून व लांबवरच्या भागातून आलेले नागरिक त्याच ठिकाणी थांबले.दोन वाजता तेथे मोठी रांग लागली.परंतु अडीच वाजेपर्यंत संबंधित कर्मचारी जागेवर आले नव्हते.याबाबत नागरिकांनी काउंटरचे फोटो सुद्धा काढले आहेत. काही नागरिकांनी शेजारील कर्मचाऱ्यांना याबाबत तक्रार कुठे करावी अशी विचारणा केली तेव्हा त्यांनी सुद्धा उत्तर देण्याचे टाळले. नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर आतून एक कर्मचारी त्या ठिकाणी आला व संबंधित कर्मचारी आजारी पडला आहे आता व्यवस्था करतो असे सांगितले. त्यानंतर नवीन कर्मचाऱ्याकडे या खिडकीचा चार्ज देण्यात आला. त्यांनी मागील चार्ज घेण्यामध्ये अर्धा तास घालवला.त्यानंतर काम सुरू झाले.

 दोन नंबरच्या खिडकीवर जनतेशी संबंधित सर्व कामांचे एकत्रीकरण करण्यात आल्याचे दिसून आले. रजिस्ट्रेशन पार्सल, मनीऑर्डर, तिकीट विक्री,पी एल आय या सर्वांशी संबंधित कामे या एकाच कर्मचाऱ्याकडे देण्यात आली आहेत. त्यामुळे या खिडकीवर मोठी गर्दी होत असते. अशावेळी दुसरी खिडकी चालू करणे आवश्यक आहे. परंतु एक नंबरची खिडकी सदैव बंद असते. लोकांनी मागणी करूनही त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली नाही. पोस्टाचे इतर खिडक्यांवरील कर्मचारी मात्र वेळेवर आपले कामकाज करताना दिसून आले.काही कर्मचारी टेबलावर कोणतेही काम नसताना मोबाईल पाण्यात दंग असल्याचे दिसले अशावेळी त्यांनी नागरिकांच्या सेवेसाठी आपले योगदान देणे अपेक्षित होते. सर्वसामान्य नागरिकांना सरकारी कामकाजासाठी, माहिती अधिकाराच्या पत्रव्यवहारासाठी किंवा वर्तमानपत्राच्या कामासाठी पोस्टानेच पत्र व्यवहार करणे भाग आहे.कुरिअर सेवा चांगली असली तरी कायदेशीर अडचणीमुळे काही पत्रव्यवहार हा  पोस्टानेच करावा लागतो.अशावेळी रजिस्टर पत्रे पाठवण्यासाठी या खिडकीवर मोठी गर्दी असते. तिकीट विक्रीची व्यवस्था सुद्धा याच ठिकाणी असल्याने एक रुपयाचे तिकीट घेण्यासाठी एक तास रांगेत उभे राहावे लागते असा अनुभव नेहमी येतो. त्यामुळे रजिस्टर पार्सल साठी स्वतंत्र खिडकी असावी तसेच तिकीट विक्री, मनीऑर्डर व इतर कामासाठी स्वतंत्र खिडकी असावी अशी नागरिकांची मागणी आहे. पोस्टाच्या अशा या जलतान कारभारामुळे लोकांनी पोस्टाच्या सेवेकडे पाठ फिरवली आहे.परंतु नाईलाजाने काही गोष्टींसाठी पोस्टातच जावे लागते. श्रीरामपूर पोस्ट ऑफिस ची एक वेगळी ओळख राज्यात नव्हे देशात आहे. परंतु सध्या येथील पोस्टमास्तरच्या गलथान कारभारामुळे पोस्टाची सेवा बदनाम झाली आहे. तेव्हा या ठिकाणी कार्यक्षम अशा पोस्टमास्तरची व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी )-गावातील सामाजिक राजकीय तसेच धार्मिक क्षेत्रात सतत अघाडीवर असणाऱ्या विलास मेहेत्रे यांनी उद्या होणाऱ्या  आपल्या मुलांच्या विवाह सामरंभास उपस्थित राहण्यासाठी एकच लग्नपत्रीका तयार करुन बेलापुर गाव व पंचक्रोशितील सर्वांनाच उपस्थित राहण्याचे अवाहन केले आहे.               पुर्वी लग्न म्हटले की लग्न पत्रीका छापुन घरोघर वाटण्याची प्रथा होती काल परत्वे मोबाईल आले मोबाईल वर निमंत्रण देण्याची प्रथा सुरु झाली मग व्हाटस्अप द्वारे निमंत्रण सुरु झाले पण आजही अनेकाकडे अँन्डाँइड मोबाईल नाही मग त्यांना निमंत्रण कसे जाईल गावातील सर्वच जण परिचीत आहे मग कसे निमंत्रण द्यावयाचे हा विचार चालु असतानाच इतर निवड वाढदिवस याचे फ्लेक्स लावतो मग आपण लग्न पत्रिकाचा फ्लेक्स करुन गाव व परिसरातील सर्वांनाच निमंत्रण देवु या उद्देशाने विलास मेहेत्रे यांनी लग्न पत्रीकेचा मोठा फ्लेक्स तयार करुन तो बेलापुरातील चौकात लावला बेलापुर गावात सावता फुल भांडारचे मालक व सर्वच क्षेत्रात कायम अघाडीवर असणारे विशेष करुन धार्मिक क्षेत्रात कायम अग्रभागी असणारे विलास मेहेत्रे याचा मुलगा विशाल याचा शुभविवाह भाऊसाहेब जेजुरकर यांची कन्या चि सौ का सीमा हीच्याशी  उद्या उत्सव मंगल कार्यालयात संपन्न होत आहे त्या निमित्त सारा गाव व परिसर सुपरिचित असल्यामुळे मेहेत्रे परीवाराने लग्न पत्रीकेचा फ्लेक्स तयार करुन तो मुख्य चौकात लावला व लग्न पत्रीकेचा फ्लेक्स लावुन जाहीर निमंत्रण देण्याचा पहीला मान मिळवीला

बेलापुर (प्रतिनिधी  )-येथील जिल्हा परीषद मराठी मुलींच्या शाळेला गँलेक्सी लँबोरेटरीज प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीच्या सहकार्याने तीन एलईडी संच व एक कलर प्रिंटर असा सुमारे एक लाख रुपये किमतीच्या वस्तू भेट स्वरुपात देण्यात आल्या         गँलेक्सी लँबोरेटरीज प्रायव्हेट लिमीटेड  नेवासा यांच्या वतीने सीएसआर फंडातुन  मिशन आपुलकी अंतर्गत बेलापुर येथील मराठी मुलींच्या शाळेला सुमारे एक लाख रुपये किमतीच्या तीन एलईडी संच व एक कलर प्रिंटर भेट देण्यात आला या वेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी गँलेक्सी लँबोरेटरी प्राईव्हेट लिमिटेड यां कंपनीचे व्यवस्थापक श्रीकांत देशमुख यांना धन्यवाद दिले असुन आपल्या व्यवसायातून मिळविलेल्या नफ्याचा काही भाग आपण समाज कार्यासाठी खर्च करता या बद्दल धन्यवाद व्यक्त केले या वेळी पत्रकार देविदास देसाई कंपनीचे मँनेंजर अनिल भोसले

यांनीही मनोगत व्यक्त केले या वेळी शाळा व्यवस्थापन समीतीचा अध्यक्ष अजीज शेख सुर्यकांत हुडे मुख्याध्यापक लता बनसोडे विजया दहीवाळ शितल गायकवाड लता परदेशी  राजेंद्र पंडीत देविदास कल्हापुरे हर्षदा पुजारी सुनिता सोर तरन्नुम खान राजाबाई कांबळे प्रदीप दळवी सौ उज्वला कुताळ शालेय व्यवस्थापन समीतीच्या उपाध्यक्षा सरीता मोकाशी आनिल मोकाशी आदीसह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेखा सोनवणे यांनी केले तर अजीज शेख यांनी आभार मानले

बेलापुर  (प्रतिनिधी  )- बेलापुर बस स्थानकाची भिंत अज्ञात इसमाने तोडली असुन संबधीतावर कारवाई करण्याची मागणी बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने एस टी महामंडळाकडे करण्यात आली असुन महामंडळाच्या अधीकाऱ्यांनी देखील या घटनेची गांभीर्याने दखल घेवुन घटनास्थळी भेट देवुन गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत      कायम गजबजलेले असलेल्या बेलापुर बस स्थानकाची मागील बाजुस भिंतीस बसवीलेली खिडकी काही दिवसापूर्वी कुणीतरी तोडली होती त्यावर काहीच कारवाई न झाल्यावर काल रात्री कुणीतरी खोडसाळपणे भिंतीलाच मोठे भगदाड पाडले आहे ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या कानावर ही बाब घातली पत्रकार देविदास देसाई यांनी तातडीने आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांच्या कानावर ही बाब घातली श्रीरामपुर बस स्थानकाचे आगार प्रमुख राकेश शिवदे हे तातडीने बेलापुर येथे आले त्यांनी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा यांच्या समवेत संबधीत ठिकाणी भेट दिली त्या वेळी अज्ञात इसमाने ही भिंत तोडली असल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याच्या सूचना दिल्या या वेळी बसं स्थानकाचे कार्यालय कित्येक दिवसापासून बंद असल्याचे पत्रकार देसाई यांनी निदर्शनास आणून दिले असता लगेच या ठिकाणी कर्मचारी नियुक्त केला जाईल असे अश्वासन त्यांनी दिले तसेच तोडलेली भिंत तातडीने पुन्हा पूर्ववत केली जाईल या करीता ग्रामपंचायतीने सहकार्य करावे असे अवाहनही शिवदे यांनी केले त्या वेळी सरपंच व उपसरपंच यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अश्वासन दिले गेल्या कित्येक वर्षापासून या परिसरात महीलाकरीता स्वच्छता गृहाची मागणी असुन निधीची देखील तरतुद केलेली असताना आपल्याकडून मंजुरी मिळाली नसल्याची बाब उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आगार प्रमुख शिवदे यांच्या निदर्शनास आणून दिली असता प्रस्ताव पाठविलेला आहे मंजुरी मिळताच आपणास कळवीण्यात येईल असेही शिवदे यांनी सांगितले या वेळी स्थानक प्रमुख वसंत लटपटे प्रवासी मित्र प्रतिक बोरावके सुरक्षा रक्षक प्रकाश मुठे प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड विलास कुऱ्हे  आदि उपस्थित होते

श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांना साहित्यिक रज्जाकभाई शेख (सर) आणि टीम संचलित दोस्ती फाऊंडेशन अहमदनगर यांच्यावतीने दिला जाणारा लोककलावंत पै. मजनूभाई शेख राज्यस्तरीय गौरव पुरस्कार २०२२ या राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.लोककलावंत पै.मजनूभाई शेख यांच्या प्रथम स्मृती गौरव पुरस्कार सोहळ्यात श्रीरामपूर येथे दोस्ती फाऊंडेशन तर्फे आयोजित कार्यक्रमात पत्रकार शौकतभाई शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांना देखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ.एस.एन.पठाण (कुलगुरू नागपूर विद्यापीठ तथा उच्च शिक्षण संचालक (म.रा.), कार्यक्रमाचे उदघाटक  मा. बाबासाहेब सौदागर (चित्रपट गीतकार,सिनेअभिनेते), मा. वसुंधरा शर्मा (सिनेअभिनेत्री, नाट्यकर्मी), मा.डॉ.वंदनाताई मुरकुटे (साहित्यिका तथा सभापती पं.स. श्रीरामपूर), रमजानखान पठाण (उपशिक्षणाधिकारी),रामदास वाघमारे (मुख्य संपादक जीवन गौरव), रज्जाकभाई शेख अध्यक्ष दोस्ती फाऊंडेशन,सुभाष सोनवणे,प्राचार्या डॉ.गुंफाताई कोकाटे,सुनील गोसावी (संस्थापक शब्दगंध) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.श्री.शेख यांना मिळालेल्या या पुरस्काराबाबत त्यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छापर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,श्री.शौकतभाई शेख यांचे सामाजिक क्षेत्रासह पत्रकारीता क्षेत्रातही निस्पृह तथा उल्लेखनीय कार्य आहेत,राजकारण विरहित सर्वधर्मिय सेवाभावी संस्था असलेल्या समता फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आजवर जनसामान्यांबरोबर उपेक्षित घटकांतील दुर्लक्षितांकरीता विविध सामाजाभिमुख उपक्रम राबवून आपल्या निर्पेक्ष समाजसेवेचा ठसा उमटविला आहे,तसेच आपल्या सामाजाभिमुख पत्रकारीतेच्या माध्यमातून सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,धार्मिक,शासकीय, प्रशासकीय, निमशासकीय, राजकिय आदि अशा विविध क्षेत्रातील बातम्या करताना त्यांनी सातत्याने नेहमी सत्य आणि पारदर्शी भुमिका मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे व करत आहे, सोबतच स्वाभिमानी संपादक सेवा संघ (महाराष्ट्र प्रदेश) या त्यांच्या पत्रकार/संपादकांच्या नोंदणीकृत सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील नवोदित पत्रकार, संपादकांना वर्तमानपत्र क्षेत्रातील शासकीय स्थरावरील येणाऱ्या विविध आडचणींना मार्ग काढत त्यावर यशस्वीरित्या मात करण्याकामी नेहमी सातत्याने मोलाचे व महत्वाचे मार्गदर्शन असते.त्यांच्या या संपादक संघात राज्यभरातील विविध जिल्ह्यात असलेल्या सदस्यांद्वारे आज विविध वर्तमानपत्र तथा इतर प्रसार माध्यमे मोठ्या दिमाखात नियमीतपणे प्रकाशित होत आहेत.सदैव मनमिळाऊपणा आणि मितभाषी असे हस्तमुख व्यक्तीमत्व असलेले शौकतभाई शेख यांना सर्वत्रच मोठ्या आदराने व सन्मानाने शौकतभाई शेख या नावानेच ओळखले तथा संबोधले जाते.अशी त्यांनी आपल्या कार्यगुणांच्या बळावर ख्याती प्राप्त केलेली आहे.कुठलाही भेद भाव,जाती -पाती,पंथ यापलिकडे जाऊन त्यांचा सर्वच जाती - धर्म, पंथात मोठा मित्र परिवार जोडला गेला असल्याने सर्वांशी त्यांचे प्रेम, स्नेह,आपुलकी आणि सलोख्याचे तथा जिव्हाळ्याचे संबध प्रास्तापित झालेले आहे,चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य,ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशन,तथा महाराष्ट्रियन मुस्लिम विकास परीषद या संस्थेचे ते अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख देखील आहेत.आपल्या पत्रकारीतासोबतच  विविध संस्था संघटनांच्या माध्यमातून त्यांचे निस्पृह सामाजाभिमुख समाजिक कार्य हे सातत्याने चालतच असतात आणि अशाच या त्यांच्या विविध कार्यांची दखल घेऊन दोस्ती फाऊंडेशनच्यावतीने त्यांना *राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्कार* देऊन जो त्यांचा सन्मान करण्यात आला ही खरोखरच शौकतभाईंना ही त्यांच्या कार्याची मिळालेली एक पावतीच असल्याचे अनेकांनी बोलून देखील दाखवले आहे.

श्रीरामपूर  प्रतिनिधी-  Dysp संदीप मिटके यांना घारगाव परिसरातील घाटात पोखरी शिवारात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने  वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत गुप्त बातमी मिळाली.  त्यावरून नाशिक ते पुणे जाणारे हायवे  परिसरातील घाटात पोखरी शिवारात  बनावट ग्राहक पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन दोन  परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे. 

          एका महिला आरोपी विरुद्ध  घारगाव पोलीस स्टेशन येथे गु. र. क्र. 406/2022 कलम महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या कारवाईमुळे  टाकसेवाडी, पोखरी बाळेश्वर परिसरात व शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. 

सदरची कारवाई मा. श्री.राकेश ओला  पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , PI अरुण आव्हाड,   𝙰𝚙𝚒 ज्ञानेश्वर  थोरात,चा. पो. ना. मनोज पाटील पो.कॉ नितीन शिरसाठ म.पो.कॉ. मंगल जाधव यांनी केली.

श्रीरामपूर : शहरातील संगमनेर रस्त्यावर मागील काही आठवड्यांपूर्वी, रस्त्यावरील अतिक्रमनामुळे झालेल्या अपघातात. एका २१ वर्षीय फोटोग्राफी करणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सदर घटनेनंतर, वाढलेल्या अतिक्रमणा विरोधात, जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असल्याने. श्रीरामपूर पालिकेच्या वतीने, श्रीरामपूर - संगमनेर रस्त्यावरील अतिक्रमणा विरोधात. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. ज्यात नॉर्दन ब्रँच पासून, पालिका हद्दीतील संगमनेर नाक्या पर्यंत, वाहतुकीस अडथळा निर्माण होणारी अतिक्रमणे जमिनध्वस्त केली. सदरची अतिक्रमणे काढत असतांना, काही व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली अतिक्रमण काढून घेत. प्रशासनास सहकार्य केले. शहरातील संगमनेर रस्त्यावरील अतिक्रमण मोहीम, पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या आदेशावरून, पालिकेचे अतिक्रमण विभागाचे संजय शेळके, इंजिनिअर अनंत शेळके, बांधकाम विभागाचे राम सरगर ,नगर पालिकेचे कर्मचारी व  शहर पोलीस ठाण्याचे, पोलीस नाईक शरद वांढेकर,सचिन बैसने, पोलीस कॉन्स्टेबल राहुल गायकवाड आदींच्या उपस्थितीत अतिक्रमणाच्या पहिल्या टप्प्यातील, अतिक्रमण काढण्यात आले.

बेलापूर वार्ताहर बेलापूरचे भूमिपुत्र अभिषेक देसाई यांची जलसंपदा विभागाचे डेप्युटी इंजिनियर पदी निवड झाल्याबद्दल यांचे विविध ठिकाणी सत्कार समारंभाचा कार्यक्रम अभिषेक यांचे पिता ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई यांच्या व हितचिंतकांच्या उपस्थितीत सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता श्रीरामपूर तालुक्याचे आमदार लहुजी कानडे यांच्या वतीने अभिषेक यांचा सत्कार करण्यात आला तर श्रीरामपूर चे तहसीलदार प्रशांत पाटील श्रीरामपूरचे नगर परिषदेचे नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते हाजी अंजुम शेख बेलापूर ग्रामपंचायत चे सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे सेवा सोसायटीचे चेअ

रमन सुधीर नवले स्वस्त धान्य दुकानदार व माऊली आश्रमाचे सुभाष वाघुंडे व त्यांच्या पत्नी वाघुंडे यांच्यासह तालुका काँग्रेस अध्यक्ष अरुण पाटील नाईक माजी सरपंच भरत साळुंके अनिल नाईक रवींद्र खटोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढा किराणा असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल हिरण पत्रकार दिलीप दायमा बेलापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी अतुल लोटके गणेश भिंगारदे लोखंडे तमनर आदींनी सत्कार करून अभिषेक यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या

नेवासा : मागील काही आठवड्यांपूर्वी नेवासा फाटा येथील हॉटेल औदुंबरवर येथे देह विक्री संदर्भात कारवाई झाल्या संदर्भात विविध प्रसार माध्यमातून,वृत्त प्रसारित करण्यात आले होते. मात्र वास्तविक पाहता सदरची कारवाई हॉटेल औदुंबर येथे नसून. हॉटेल पासून ५ हजार फुटावर नेवाश्याच्या दिशेने असलेल्या.  औदुंबर लॉज येथे झाली होती. केवळ नावातील समानतेचा गैरफायदा घेऊन. काही विघ्नसंतोषी प्रवृतीच्या लोकांनी चुकीच्या अफवा पसरून. कोणताही संबंध नसतांना, अनेक वर्षांपासून दर्जेदार आणि प्रामाणिकपणे.असंख्य ग्राहकांना सेवा देणाऱ्या हॉटेल औदुंबरची बदनामी करण्याचे षड्यंत्रामुळे, हॉटेल औदुंबर उद्योग समूहास, सामजिक प्रतिष्ठेसह, मोठ्या प्रमाणात मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. अखेर  घडलेल्या प्रकरणा यासंदर्भात, केवळ नावातील समानता आणि चुकीची माहिती देऊन.,लोकप्रियतेचे शिखर गाठणा-या हॉटेल औदुंबरला बदनाम करण्याचे काम केले जात असून. काही दिवसांपूर्वी झालेल्या कारवाईचा आणि हॉटेल औदुंबरचा कोणताही एक संबंध नसल्याची माहिती,हॉटेल औदुंबरला उद्योग समूहाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही खोट्या अफवांवर भरोसा ठेऊ नये असे आवाहन हॉटेल औदुंबरचे संचालक राजेंद्र नांगरे पाटील यांनी दिली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget