May 2020

बुलडाणा - 30 मे - बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहराच्या बर्डे प्लॉट येथील
एकाच कुटुंबातील 4 जणांचा  विद्युत ताराचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज शनिवार 30 मे रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे.या घटनेने संपूर्ण शहर हादरुन गेले आहे.
    मिळालेली माहिती अशी की आज सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास खामगांव येथील बर्डे प्लॉट भागातील राहणारे भुरू घासी पटेल (52),साजेदा बी भूरू पटेल (50),जावेद भूरू पटेल (25) व जाकिर भूरू पटेल (22) हे घरात असताना विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू त्यांचा मृत्यु झाला.सदर घटना आज संध्याकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली.यातील जावेद याचे 7 जून तर जाकिर याचे 8 जूनला लग्न ठरलेले होते. एकाची सासरवाडी वाशिम तर दुसऱ्याची सासरवाडी खामगांव मधील असल्याची माहिती मिळाली आहे.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील व शिवाजी नगरचे ठाणेदार सुनील हुड घटनास्थळी दाखल झाले आहेत.पंचनामा करुण चारही मृतदेह पोस्टमार्टम साठी सामान्य रुग्णालयात पाठविन्यात आले आहे.

बुलडाणा - 30 मे
बुलडाणा तालुक्यातील हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबा यांची दरगाह देशभरात प्रसिद्ध आहे.हजारो भक्त सैलानी येथे येतात.कोरोनामुळे 15 मार्च रोजीचा वार्षिक संदल उत्सव जिल्हा प्रशासनाने रद्द केला व पुढे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.सैलानी नगरीत अनेक भक्त अडकले.दरम्यान समाजिक बांधिलकी म्हणून मन्नत फाऊंडेशनने जवळपास 500 नागरीकांना प्रशासनाच्या मदतीने घरवापसीसाठी मोफत ई-पास  बनवून त्यांना घरी जाण्यासाठी मदत केली आहे.
        सैलानी येथील मन्नत फाऊंडेशनचे अध्यक्ष शेख साजेद शेख फारुक मुजावर हे लॉकडाऊनची घोषणा झाल्यापसुन सैलानी येथे अडकलेल्या भक्तांना मोफत किराणा किट,औषधी,कोरोना युद्धानना मास्क,सेनेटाइजर आदि मोफत वाटून अशा प्रकारे सामाजिक काम करत आहे.भारती गणेश भांडे रा.गंगाखेड,जिल्हा परभणी येथील एक अपंग महिला सैलानी  दर्गाह येथे दर्शनाला आली असता लॉकडाऊनमुळे सैलानी येथे काही महिन्या पासून अडकून होती.त्या महिले जवळ काहीच पैसे नव्हते ती कोणालाही मागून आपले पोट भरत होती,त्या महिलेची माहिती मिळताच बुलडाणाचे तहसीलदार संतोष शिंदे,रायपूरचे ठाणेदार सुभाष दुधाळ व बीट जमदार यशवंत तायडे,शेख कय्युम यांच्या मार्गदर्शनाखाली मन्नत  फाऊंडेशनचे अध्यक्ष शेख साजिद शेख फारुक मुजावर  यांनी त्या महिलेला घरी जाण्यासाठी मोफत ई-पास बनुवून तिला स्वतःच्या कारने घरी गंगाखेड जि.परभणी येथे सोडून दिले.तसेच खाजगी गाडी करून आपापल्या घरी जाणाऱ्या अशा 500 पेक्षा जास्त लोकांना मोफत ट्रॅव्हल्स ई-पास बनवून त्यांना घरी जाण्यासाठी मदत केली आहे.

टिळकनगर (वार्ताहर) रमजान ईदच्या दिवशी श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील नदीम अन्सार पठाण या विवाहित तरुणाने पोलीस चौकीसमोर स्वतःला पेटवून घेतले होते. त्यात तो गंभीर भाजला होता. उपचारादरम्यान गुरुवारी चारच्या दरम्यान नदीमचा दुर्दैवी मृत्यू झाला. नातेवाईकांनी नदीमच्या मृत्यूची चौकशी करून मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलिसांवर गुन्हा दाखल करावा, असा आक्रमक पवित्रा घेत मयत नदीमचा अंत्यविधी करण्यास नकार दिल्याने परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.मात्र आ. लहू कानडे यांच्या मध्यस्थीने व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या ठोस आश्वासनानंतर तब्बल 28 तासानंतर मयत नदीमचा अंत्यविधी कडेकोट पोलिस बंदोबस्तात काल रात्री नऊच्या दरम्यान करण्यात आला.आ.लहू कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, पंचायत समितीच्या सभापती संगीता शिंदे, ज्ञानेश्वर मुरकुटे, सचिन गुजर, शेतकरी संघटनेचे अहमद जहागीरदार, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे, राहुरी पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष इस्माईल सय्यद, रिपाईचे भिमराज बागुल, राजाभाऊ कापसे, सरपंच सुनील शिरसाठ, माजी उपसरपंच नानासाहेब शिंदे, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर, सागर भोसले, सरपंच चांगदेव ढोकचौळे, पोलीस पाटील सुनील गायकवाड, कृष्णा अभंग, प्रेमचंद कुंकलोळ, समाजवादी पार्टीचे जोएब जमादार, आदिल मखदुमी, बबलू शाह यांनी नदीमच्या घरी भेट देऊन चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे लावून धरली.आ. कानडे यांनी पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांना संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास सांगितले. मात्र पोलीस प्रशासनाने याबाबत असमर्थता दाखविल्याने आ. कानडे आणि पोलीस प्रशासनाच्या या अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरीत याबाबत जाब विचारला व त्यानंतर आ. कानडे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांना घटनेचे गांभीर्य समजावून सांगितले व घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच जिल्हा पोलीस प्रमुखांनी तात्काळ घटनास्थळी काही पोलीस अधिकार्‍यांचा ताफा पाठवून अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना तात्काळ घटनास्थळी पाठवून योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलीस अधिक्षक डॉ. दीपाली काळे यांनी मयत नदीमच्या घरी भेट देत प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पोलीस कर्मचार्‍यांवर लगेचच कारवाई करण्याचे ठोस आश्वासन देत मयत नदीमच्या आईचा जवाब नोंदवून पुढील कारवाईस जलदगतीने सुरुवात केली.संध्याकाळी सहाच्या सुमारास मयत नदीमचा मृतदेह लोणी रुग्णालयातून आणण्यात आला. अंत्ययात्रेला सुरुवात होताच ज्या पोलीस चौकीसमोर मयत नदीमने स्वतःला पेटवून घेतले होते. त्याच ठिकाणी नातेवाईकांनी अंत्ययात्रा थांबवत मयत नदीमचा मृतदेह चौकीसमोर ठेऊन दिल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. काहींनी मध्यस्थी करित काही मिनिटातच अंत्ययात्रा पुढे नेत रांजणखोल येथील कब्रस्थान येथे अंत्यविधी करण्यात आला. अंत्ययात्रेदरम्यान संपूर्ण परिसरात पोलीस छावणीचे रूप आले होते.
नदीमचा श्वास थांबला तपास थांबू देऊ नका..!
याप्रकरणी टिळकनगर पोलीस चौकीच्या कर्मचार्‍याच्या जाचास कंटाळून स्वतःला पेटवून घेतल्याचा आरोप मयत नदीम यांच्या नातलगांनी केला आहे. एकुलता एक असलेला मयत नदीमच्या आईनी नदीमचा श्वास थांबला तपास थांबू देऊ नका..! अशी भावुक विनवणी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्याकडे केली. याप्रकरणी सखोल चौकशी करून या पोलीस कर्मचार्‍यास तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई करण्याची मागणी नदीमच्या आईसह नातलगांनी केली.

शिर्डी : कोरोनाने शिर्डीत शिरकाव केला आहे़ निमगाव येथील कोरोनाबाधित भाजी विक्रेत्या महिलेच्या शिर्डीतील नातेवाईक महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राहाता तहसिलदार कुंदन हिरे यांनी दिली.शिर्डी व निमगावमधील कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या सातवर पोहचली आहे. या महिलेच्या संपर्कातील २९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. बुधवारी सायंकाळी निमगाव येथील एका भाजी विक्रेती महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. या महिलेने शिर्डीतील संस्थान रूग्णालयात उपचार घेतले होते. शिर्डीतील एका नातेवाईकाच्या घरीही तिचे वास्तव्य होते. या महिलेच्या निमगावातील कुटूंबासह सर्वांना तपासणीसाठी नगरला पाठवण्यात आले होते. शुक्रवारी या महिलेच्या कुटूंबातील अन्य पाचजणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. या महिलेची सून लहान मुलीसह शिर्डीतील नातेवाईकाकडे दोन ते तीन दिवसांपासून राहात होती. शुक्रवारी सुनेचा अहवाल निगेटिव्ह आला होता मात्र लहान मुलीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने चिंता वाढली होती. त्यानंतर आज शिर्डीतील महिलेचा अहवालही पॉझिटीव्ह आला.प्रांताधिकारी गोंविंद शिंदे, पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे, तहसिलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, शिर्डीचे मुख्याधिकारी सतिष दिघे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ प्रमोद म्हस्के, डॉ. संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक नितीन गोकावे, सहाय्यक निरीक्षक दिपक गंधाले यांच्यासह वैद्यकीय टिमने सायंकाळी तातडीची बैठक आयोजित केली आहे.पुढील चौदा दिवस या महिलेच्या घराचा परिसर कंटेंटमेंट झोन जाहीर करण्यात येणार आहे. याठिकाणी सर्व व्यवहार व नागरीकांचा वावर बंद राहील. या बाजुचा परिसर बफर झोन असेल. या भागात झोन जाहीर करण्यात येणार आहे. या बफर झोनमध्येही चौदा दिवस ठराविक वेळत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे असे मुख्याधिकारी सतिष दिघे यांनी सांगितले.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- बेलापूर  व परिसरात सर्वात जुनी असणाऱ्या जामा मस्जिदचे नुतनीकरण करण्याचे काम सुरु करण्यात आले  असुन मस्जिदच्या स्लँबच्या काँक्रीटीकरणाचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुक्कड उपसरपंच रविंद्र खटोड भरत साळुंके सुनील मुथा अरुण पा नाईक सुधीर नवले यांच्या हस्ते करण्यात आले          बेलापूरच्या मुख्य बाजारपेठेत असणारी जामा मस्जिद तिनशे ते साडेतिनशे वर्षापूर्वीची मस्जिद आहे  या  जामा मस्जिदचा जिर्णोध्दार करण्याचा निर्णय मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते मोहसीन सय्यद मुन्ना बागवान यांनी घेतला या निर्णयास  अनिस काझी शफीक बागवान जब्बार आतार कौसर सय्यद नासीर बागवान यांनी सहमती दाखवीली व निधी गोळा करण्यास सुरुवात केली निधी जमा होताच कामास सुरुवात करण्यात आली बांधकाम व्यवसाय करणार्या सर्व मुस्लिम बांधवांनी विना मोबदला योगदान दिले अन कामास गती आली या मस्जिदच्या स्लँबच्या कामाचा नारळ गावातील सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुक्कड उपसरपंच रविंद्र खटोड बाजार समितीचे सचालक सुधीर नवले पचायत समिती सदस्य अरुण पा नाईक अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे  टँक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल मुथा पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा जामा मस्जिदचे ट्रस्टी  बहोद्दीन सय्यद जाफरभाई आतार रणजीत श्रीगोड राम पौळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला जामा मस्जिदच्या कामाचा शुभारंभ हिंदु बांधवाच्या हस्ते करुन एक चांगला आदर्श समाजापुढे ठेवला आहे या उपक्रमामुळे दोन समाजात वाढत चाललेले अंतर कमी होवुन जातीय सलोखा निर्माण होण्यास मदत होणार आहे.

बुलढाणा - 28 मई विगत 12 मई को 'वंदे भारत" मिशन के अंतर्गत फिलीपाइन्स से 12 लोग बुलढाणा पहुंचे थे जिन्हें प्रशासन के निर्देश पर शहर एक होटल में क्वॉरेंटाइन किया गया था किंतु एक 24 वर्षीय युवक वहां से प्रशासन को बिना सूचित किए फरार हो गया जिसकी स्वेब की रिपोर्ट कोरोना पॉजिटिव प्राप्त होने के बाद प्रशासन में खलबली मच गई है. इस मामले में फरार युवक के खिलाफ बुलढाणा शहर थाने में अपराध दर्ज किया गया है.
       देशभर में कोरोना के कारण लॉकडाउन घोषित किया गया है. कई लोग देश के विभिन्न शहरों में फंस गए थे. इसी प्रकार विदेशों में भी कई भारतीय अटके हुए थे. केंद्र शासन ने विदेश में अटके लोगों को अपने वतन वापस लाने के लिए "वंदे भारत" ये विशेष मिशन चलाया जिसके तहत बुलढाणा शहर में 12 मई को फिलीपाइन्स से 12 छात्र वापस लौटे थे. इन सब को प्रशासन ने बुलढाणा की आलीशान होटल बुलढाणा क्लब रेसीडेंसी में 14 दिन के लिए क्वारंटाईन कर दिया था.इन लोगों के स्वेब के नमूने लेकर जांच के लिए भेज दिए गए थे. इधर 14 दिन पूरे होने से 1 दिन पूर्व ही अर्थात 25 मई को दोपहर में एक युवक प्रशासन को बताए बिना ही होटल से अपने घर वापस आ गया और उसने कई लोगों से मुलाकात की,शहर के एक हेयर सलून पर भी गया इसके अलावा मैदान में अपने दोस्तों के साथ फुटबॉल भी खेला था. 27-28 मई की दरमियानी रात में इस युवक की रिपोर्ट प्रशासन को कोरोना पॉजिटिव प्राप्त होते ही प्रशासन युवक को अस्पताल ले जाने के लिए जब होटल पहुंचा तो पता चला कि, युवक होटल से फरार है. प्रशासन ने पहले तो युवक और उसके परिवार और उसके संबंध में आए तकरीबन 10 लोगों को कोविड अस्पताल में दाखिल किया है. फिलीपाइन्स से लौटे इस युवक का क्वारंटाईन सेंटर से फरार होना शहर के लिए यकीनन एक बड़ी मुसीबत खड़ी कर सकता है जिस की गंभीरता को भांपते हुए जिला अस्पताल के सीएस प्रेमचंद पंडित की शिकायत पर फरार युवक के खिलाफ बुलढाणा शहर। थाने में भादवि की कलम 188,279,271 तथा राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन कानून 2005 की कलम 52,54 तथा महामारी अधिनियम 1897 की कलम 3 के तहत अपराध दर्ज किया गया है.

श्रीरामपूर  (प्रतिनिधी  )-  करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. सर्व धार्मिक उत्सव घरामध्ये साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारी रमजान ईद असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिसांनी रविवारी सायंकाळी शहरातील प्रमुख भागात संचलन करून नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या. करोना विरोधात अहोरात्र लढा देणाऱ्या पोलिसांच्या कामगिरी बद्दल नागरिकांनी रस्त्यावर उतरून पोलिसांवर फुलांचा वर्षाव करत टाळ्या वाजवून स्वागत केले.करोना संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून पोलीस मेहनत घेत आहे. धार्मिक कार्यक्रम घरातच साजरे करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुस्लिम समाजाने संयम बाळगून रमजानमध्ये पोलीस प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केले आहे. असेच सहकार्य करत रमजान ईदची नमाज घरीच अदा करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी केले आहे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर  शहर पोलिसांनी संचलन केले.
जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सींह यांनी सर्व पोलुस बांधवांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली सर्वांची आरोग्य तपासणी झाली का पोलीसांना वेळेवर औषधे सँनिटायझर व ईतर सामुग्री वेळेवर दिली जाती का याचीही बारकाईने चौकशी केली श्रीरामपूर  शहर पोलीस स्टेशन पासुन निघालेले पोलीसांचे पथ संचलन वार्ड नंबर दोन मधुन पुन्हा पोलीस स्टेशनला आले या संचलनात अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे मँडम उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी पोलीसांची आस्थेने चौकशी केल्यामुळे पोलीसांना एक वेगळीच उर्जा मिळाली.

शिर्डी (राजेंद्र गडकरी)- नगर मनमाड महामार्गावर व इतर ठिकाणी रस्यावर वाहने अडवून लूटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगारी टोळीला अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठ्या शिताफीने नुकतीच अटक केली असून  त्यांच्याकडून तीन मोटारसायकली व एअरगन हस्तगत करण्यात आली आहे,     यासंदर्भात अधिक माहिती अशी की ,नगर-मनमाड महामार्गावर तसेच पुणतांबा चौफुली व इतर ठिकाणी पहाटेच्यावेळी वाहने अडवून लूटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळी सध्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली होती, या टोळीने दिनांक 17 मे रोजी पहाटे ४,१५वा, लालजी तोमर हे मध्य प्रदेश येथून आपल्या एम, एच, 15/ ई,जी 47 17 या ट्रकमध्ये गहू घेऊन कोपरगाव औद्योगिक वसाहत येथे  येत असताना पुणतांबा चौफुलीजवळ गोदावरी शीड फॉर्म जवळ पत्ता विचारण्यासाठी थांबल्यावर अचानक मागून दोन विना नंबर मोटरसायकलीवर  सहा जणांनी येऊन या ट्रकच्या केबिनमध्ये घुसून ट्रकचालक व दोन साथीदारांना मारहाण करून त्यांच्याकडील 56000 रोख रक्कम लुटून नेली ,त्याच दिवशी दिनांक 17 मे रोजी पहाटे पाच वाजता वैभव फुला वाघ हे वर टेंबे तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथून आपल्या पिकअप गाडीत कोथिंबीर घेऊन सोलापूर येथे विकण्यासाठी गेले होते तेथून कोथंबीर विकून ते परत सोलापूरहून  आपल्या पिअकप गाडी नंबर एम, एच 41 /ए,जी 26 17 या वाहनातून परत आपल्या घरी वरचेटेंबे,ता, सटाणा येथे येत असताना पुणतांबा चौफुलीवर अचानक पाठीमागून दोन विना नंबरच्या मोटरसायकलवरून चार जण येऊन त्यांनीही पिअकप गाडी थांबून पिकअप मधील चालक व मालक यांना  मारहाण करून त्यांच्याकडील 35000 रुपये रोख काढून घेऊन पोबारा केला, या दोन्ही गुन्ह्याची नोंद कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली होती. त्यानंतर दिनांक 21 रोजी सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी असे असिफखान सरदारखान हे आपल्या साथीदारांसह आपली ट्रकMH41/AU/1301 यामध्ये कराड येथून साखर भरून मालेगाव येथे जात असताना निर्मळ पिंप्री शिवारात दोन विना नंबरच्या पल्सर गाड्यांवर चौघे जण पाठीमागावुन व गाडीअडवुन व, थांबवुन  केबिनमध्ये घुसून चालक व  ट्रकमधल्या साथीदारांना मारहाण करून ट्रक चालकाकडून एक लाख 12 हजार रोख व 5000 रुपयाचा मोबाईल चोरून नेला, या घटनेची फिर्याद लोणी पोलीस स्टेशनला देण्यात आली, या तिन्ही घटने मुळे अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडालीहोती, लॉक डाऊन काळात ज्या घटना घडल्या, या घटनेचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्याकडे सोपवल्या नंतर पोलीस निरीक्षक दिलीप पवार व त्यांच्या पोलीस कर्मचारी पथकाने विविध पथके निर्माण करून विविध ठिकाणी या सराईत वाहने लुटणाऱ्या टोळीचा तपास लावण्यासाठी विविध ठिकाणी पाठवल्या, या सराईत वाहने लुटणाऱ्या टोळीचा शोध घेण्यात पोलिसांनी अहोरात्र मोठे परिश्रम घेतले, या सराईत वाहने लुटणाऱ्या टोळीत अरिफ गफुर शेख, वय 25 रा, अवघड पिंपरी तालुका, राहता व सागर गोरख मांजरे 24 मातापुर ता, श्रीरामपूर या  आरोपींसह  त्यांचे इतर साथीदार या टोळीत सक्रिय असल्याचे पोलिसांना समजले, स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांनी  आरिफ शेख व सागर मांजरे यांना ताब्यात घेऊन त्यांचे साथीदार अविनाश श्रीधर साळवे वय 22 राहणार राहुरी ,सुखदेव गोरख मोरे ,वय २३राहणार पिंपळवाडी ,ता, राहाता,चेतन राजेंद्र सणाचे वय १९रा, पिंपळवाडी तालुका राहता, अक्षय सुदाम माळी वय22 राहणार खंडोबा गल्ली ,तालुका राहाता, अक्षय सुरेश कुलथे राहणार राहुरी, सागर पोपट  हरिचंद्रे,वय२२ राहणार राहुरी व एक अल्पवयीन मुलगा यांना विविध ठिकाणाहून पाठलागकरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे, या सर्व आरोपींकडून 120000 च्या दोन विनानंबरच्या पल्सर व तीस हजाराची एक मोटरसायकल तसेच २०००रु,ची एअरगनअसा  एकूण 1 लाख 50 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून जिल्ह्यात त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, हे सर्व आरोपी राहुरी येथे रात्रीएकत्र येत, त्यानंतर ते पिंपळवाडी तालुका राहता येथे सुखदेव गोरख मोरे यांच्या घरी किंवा शेतात थांबत असत, त्यानंतर पहाटे तीन वाजता तीन मोटरसायकलीवर तीन तीन आरोपी बसुन महामार्गावर किंवा रस्त्यावर वाहनांची रेकी करण्यासाठी येत, दोन मोटरसायकलवरील सहा आरोपी  हे वाहनांचा पाठलाग करून, अडवून त्यांना लुटत व एका मोटरसायकलवरील तीन आरोपी हे इतर वाहने व पोलिसांची वाहने येतात, जातात यावर पाहणी करत व एकमेकांना मेसेज देत असत ,अशा या सराईत वाहने लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठ्या शिताफीने अटक केली असून या कामगिरीबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे, या तपास कामी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार ,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती दिपाली काळे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शन व सूचनांवरून पोलीस निरीक्षक दिलीप पवार तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सपोनि सागर पाटील, शिशिरकुमार देशमुख नाणेकर, , मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे , रवींद्र कर्डिले संतोष लोंढे दीपक शिंदे रवी सोनटक्के ,विशाल दळवी राहुल सोळंकी रंजीत जाधव, सागर सुलाने, प्रकाश वाघ, सागर ससाणे, चालक संभाजी कोतकर सचिन कोळेकर आदींनी मोठे परिश्रम घेतले, अधिक तपास जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे करत आहेत.

शिर्डी (जय शर्मा )-सध्या कोरोणामुळे देशात जगात अनेक रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहेत ,अनेकांना राज्यात जिल्ह्यात रक्ताची मोठी गरज भासू लागली आहे, अशा परिस्थितीत रक्तदान करणे, सर्वात श्रेष्ठ दान समजले जात आहे ,त्यामुळेच शिर्डीतील समाजसेवेत अग्रेसर सहाणारे  समाज  बांधवांच्या वतीने सिंधी समाजातील समाजसेवकांनी शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान च्या रक्तपेढी मध्ये जाऊन रक्तदान केले ,
शिर्डीत श्री साईबाबा संस्थान ची रक्तपेढी असून येथे हे लॉक डाऊन पूर्वी साईभक्तांनी रक्तदान करावे , इतर दाना बरोबरच रक्तदान श्रेष्ठ असल्याचे विविध ठिकाणी फलक लावण्यात आलेले आहेत ,लॉकडाउन पूर्वी शिर्डीत मोठी गर्दी होती, मोठ्या संख्येनेसंख्येने साईभक्त येऊन रक्तदान करत होते, मात्र लॉक डाऊन मुळे गेल्या 17 मार्च पासून शिर्डीत साईभक्त येणे बंद झाले आहे त्यामुळे रक्तदान करण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे ,त्यामुळेच नेहमी रक्तदान करणारे शिर्डीतील सिंधी समाजातील बांधव यांनी दिनांक 23 /5/ 2020 रोजी शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान चा रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले, नित्य साई सेवा व सिंधी समाज मित्र मंडळातील सनी रोहरा, मनोज मोटवानी, सुनील तोलानी, रोहन तोलानी मनोज रामचंदानी सजंय फुदंवानी ,यांनी रक्तदान केले तसेच  राजेश टिकीयानी यांनी  मोलाचे सहकार्य केले, या सर्वांचे शिर्डी व परिसरातून अभिनंदन होत आहे.

(राहाता प्रतिनिधी  मसूद मुस्ताक शाह  ) -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यापासून शासनाने देशात लॉकडाऊन सुरू केला आहे, अशा लॉकडाऊनच्या  काळात सर्व काही बंद असताना रमजानचा पवित्र सण आला आहे ,आज शेवटचा पवित्र रोजा असून उद्या पवित्र रमजान ईद आहे, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने प्रत्येक मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरात राहूनच नमाज  अदा करावी व देशाला ,जगाला या कोरोणा महामारी पासून वाचवावे अशी अल्लाला प्रार्थना करावी ,असे आवाहन मुस्लिम समाजातील समाजसेवक इलियास शहा व मुस्ताक शहा यांनी केले आहे.जगात, देशात कोरोनाने हाहाकार उडाला आहे,  सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे , सर्व काम धंदे  बंद आहेत, लॉक डाऊन चा चौथा टप्पा सुरू झाला आहे,  या लॉक डाऊन च्या चौथ्या टप्प्यात  काही वेळेत  काही दुकानांना उघडण्यास  परवानगी देण्यात आली आहे  , तसेच जिल्हा अंतर्गत अटी व शर्ती ठेवून प्रवासही करता येत आहे, मात्र संचारबंदी 31 मेपर्यंत जारी आहे , तसेच  कोरोणा महामारी चा  संसर्गाचा धोका ही   अद्याप टळलेला नाही , जरी  राहाता तालुका कोरोणा मुक्त असला तरी  कोरानाचा धोका  भविष्यातही टाळणे गरजेचे आहे,  या लॉकडाउनच्या  काळातच हा पवित्र रमजान महिना  आला आहे,  त्यामुळे  महिनाभर  सर्व मुस्लिम बांधवांनी  स्वच्छेने  तसेच शासनाचे ,व लॉकडाऊन चे नियम पाळत  प्रत्येक मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरात  नमाज अदा केली , आज  रमजानचा पवित्र  शेवटचा रोजाअसुन यासंदर्भात ,समाजसेवक इलियास शहा व मुस्ताक शाह यांनीपुढे।सागितले की, रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण अाहे, पण शंभर वर्षानंतर प्रथमच सामूहिकपणे नमाज न करता या दिवशी प्रत्येकाला घरात राहून नमाजअदा करावी लागत आहे, मात्र, प्रत्येकाचे जीवन, कुटुंब राज्य, देश महत्त्वाचा असून कोरोणा यापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या घरातच नमाज अदा करावी व व फोनवरूनच एकमेकांना ईद शुभे्छा द्याव्यात ,तसेच या महामारी पासून सर्वांना वाचवण्याचे अल्लाला साकडे घालावे ,असे आवाहनही राहाता येथील समाजसेवक इलियास शहा व मे मुस्ताक शहा  यांनी यावेळी केलेआहे.

श्रीरामपूर -तालुक्यातील निपाणी वाडगाव परिसरातील लाटे वस्ती येथे रात्री गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. या घटनेत एका तरुणाचा मृत्यु झाला. गणेश गवळीराम साळवे (वय 28, रा. जोशी वस्ती, निपाणीवाडगाव) असे या घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.या बाबत पोलिस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, लोटीवस्ती येथेल वायकर व साळवे यांच्यात जागेवरू वाद होता. या कारणावरून त्यांच्यात आज सायंकाळी पुन्हा वाद झाले. राजू गांगुर्डे, डॅडी वायकर, राजू वायकर, शरद वायकर यांच्यासह दहा ते बारा जण तलवार, गावठी कट्ट्यासह साळवे यांच्या अंगावर धावून गेले. त्यावेळी गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. साळवे यांच्या छातीत गोळी घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.तेथील काही तरुणांनी त्याला तातडीने साखर कामगार रुग्णालयात आणले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. यावेळी रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती. पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तेथे तैनात करण्यात आला होता. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.

बुलढाणा - 23 मई-पिछले 2 माह से पूरे देश में कोरोना के कारण लॉकडाउन चल रहा है ऐसे में अनेक लोगों के काम धंदे हाथों ठप्प होने के कारण कई लोग बड़ी दिक्कतों से अपने दिन गुजार रहे हैं.आगामी पवित्र रमजान ईद पर होनेवाली खरीदी की रकम इन गरीब और जरूरतमंदों में बांट कर ईद सादगी से मनाने का आह्वान बुलढाणा के कुछ युवक शहर के मुस्लिम इलाकों में घूम कर माइक के जरिए कर रहे हैं.
      कोरोना महामारी ने पूरी अर्थव्यवस्था को बिगाड़ कर रख दिया है. करीब 2 माह से जारी लॉक डाउन के कारण लोग अपने घरों में ही बैठे हुए हैं जो कुछ पैसा था वह खर्च हो गया और अब भविष्य को लेकर वे चिंतित हैं.
हालांकि शासन ने आज 22 मई से रेड जोन से बाहर इलाकों में शर्तों के साथ दुकाने खोलने की इजाजत दे दी है किंतु लोग जल्द घर से बाहर निकलने को तैयार नजर नहीं आ रहे हैं.मुस्लिम समाज को पवित्र रमजान माह लॉक डाउन के चलते घर में ही बिताना पड़ा. रमजान माह की खुशियां और रमजान ईद को लेकर एक उत्साह का जो माहौल मुस्लिम समाज में दिखाई देता था वो इस साल कोरोना की वजह से कुछ नजर नहीं आ रहा है. अब मार्केट खुलने को तैयार है और ईद की शॉपिंग भी जोरों पर होने के अंदेशे को भांपते हुए बुलढाणा के समाज सेवक मोहम्मद अजहरुलहक अपने कुछ साथियों के साथ बुलढाणा की मुस्लिम बस्तियों में घूम कर माइक के जरिए ये कोरोना से बचने के उपाययोजना,जनजागृति के अलावा ये आवाहन कर रहे हैं कि ईद की खरीदी के लिए मार्केट में जाते समय सोशल डिस्टेंस का ख्याल रखें और साथ ही जहां तक हो सके ईद की खरीदी ना की जाए और इस साल ईद पर होनेवाला खर्च अपने आस-पड़ोस के उन जरूरतमंदों को बांट दे जिनके खाने की कोई व्यवस्था नहीं है तथा इस साल ईद सादगी से मनाने की अपील मोहम्मद अजहर के साथ बबलू कुरेशी, मोहम्मद दानिश,मो.अबूझर, अल्ताफ खान,समीर चौधरी व अन्य युवक करते नज़र आ रहे हैं. बुलढाणा के मो.अज़हर और उनके साथियों के इस कार्य की पूरे जिले में काफी चर्चा हो रही है.

बुलडाणा - 23 मे-मेहकर तालुक्यातील बरटाळा गावातील दोन संदिग्ध नागरिकांना 21 मे रोजी बुलडाणा येथील शासकिय रुग्णालयात आयसोलेशन क्वॉरंटाईन करण्यात आले होते. परंतू त्याच रात्री हे दोघेही रुग्णालयातून फरार झाल्याने रुग्णालयात प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. शेवटी मेहकर पोलिसांच्या मदतीने दोन्ही संशयीतांना 22 मे रोजी परत बुलडाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       बुलडाणा जिल्ह्यातील बरटाळा गावातील जवळपास 25 नागरिकांना एका शाळेत
क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी दोन जणांची अचानक प्रकृती बिघडली. त्यांना ताप व खोकल्याचा त्रास सुरु झाला. त्यामुळे दोघांची देऊळगाव माळी प्राथमिक आरोग्य केंद्रातून तपासणी करुन पुढील उपचारासाठी 21 मे रोजी बुलडाणा येथील शासकिय रुग्णालयात पाठविण्यात आले होते या दोघांना शासकिय रुग्णालयातील वार्ड क्र. 8 एमएमडब्ल्यू मध्ये भरती केले. परंतु त्याच रात्री हे दोघेजण शासकिय रुग्णालयातून फरार झाले होते. याची तक्रार बुलडाणा शहर पोलिस स्टेशनला देण्यात असून दोन्ही आरोपी विरुध्द भांदविचे कलम 188 तसेच साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3 अन्वये 22 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. बरटाळा हे गाव मेहकर पोलिस स्टेशन हद्दीत येत असल्याने या घटनेची माहिती मेहकर पोलिसांना देण्यात आली असता मेहकरचे ठाणेदार आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार संजय पवार, गोपनीय शाखेचे देवीचंद चव्हाण व काही पोलिस कर्मचारी बरटाळा गावात पोहचले व त्यांनी या दोघेही फरार संदिग्ध रुग्णांना शोधून काढले. देऊळगाव माळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.विशाल मगर व त्यांच्या स्टाफच्या मदतीने रुग्णवाहिकेत 22 मे रोजी दोघांना पुन्हा बुलडाणा येथील शासकिय रुग्णालयात सोडण्यात आले.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )-- कोरोनामुळे बेलापूर गावची शनि यात्रा स्थगीत करण्याचा निर्णय    यात्रा कमिटीने घेतला असुन काही मोजक्याच मान्यवरांच्या हस्ते शनि महाराजांचा अभिषेक करण्यात आला शनि आमावस्ये निमित्त गर्दी होवू नये म्हणून गावात जनता कर्फ्यु घोषीत करण्यात आला रद वर्षी प्रमाणे या ही वर्षी शनि यात्रा आली परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव होवु नये म्हणून बेलापूर ग्रामस्थांनी विशेष खबरदारी घेतली सर्व कार्यक्रम स्थगीत रण्यात आले सकाळी सहा वाजता मंदिराचे विश्वस्त दिपक बैरागी ऐनतपुरचे पोलीस पाटील अशोक प्रधान ग्रामविकास अधिकारी संग्राम चांडे पत्रकार देविदास देसाई  कै मुरलीधर पतसंस्थेचे व्यवस्थापन संजय नागले यांच्या हस्ते सकाळी सहा वाजता  शनि देवाला अभिषेक घालण्यात आला   या वेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले  विलास मेहेत्रे मधुकर गायकवाड साठे मामा उपस्थित होते या वेळी बाळासाहेब काळे हरिभाऊ काळे यांनी मंत्र पठण केले कोरोनाची साथ लवकर जावु दे सर्वांना सुख शांती समाधान लाभू दे अशी मागणी शनि महाराजांना करण्यात आली त्यां नंतर मदिर बंद करण्यात आले भाविकांनी बाहेरुनच शनि महाराजांचे दर्शन घेवुन ईडा पिडा टळू दे कोरोना हाटु दे अशी विनवणी शनि देवाला केली शनिदेवाची मूर्ती असलेले हे परिसरातील एकमेव मंदिर आहे या ठिकाणी  दर शनिवारी अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात.

बेलापूर (प्रतिनिधी )-   कोरोनाला आटोक्यात आणण्यास शासनाला अपयश आले असुन  या घटनेबाबत लक्षवेधण्यासाठी बेलापूर भाजपाच्या वतीने महाराष्ट्र बचाओ आंदोलन करण्यात आले         
          राज्यातील विशेषतः मुंबईतील कोरोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून राज्य सरकार निष्क्रीय झाले आहे.राज्यातील कोरोना  फायटर्स असलेल पोलिस, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी याच्या आरोग्याची काळजी घेण्यासही हे सरकार अपयशी ठरले आहे
          राज्यातील महाविकास आघाडीला जागे करून कोरोना रोखण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टी बेलापूर तालुका श्रीरामपूर,जिल्हा उत्तर नगर‘ च्या वतीने 'महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन केले*
           यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपल्या अंगणात राज्य सरकारचे फेल्युअर फलक हातात घेऊन, तोंडावर काळे मास्क लावुन, अपयशी राज्य सरकारचा निषेध नोंदवला.

शिर्डी( जय शर्मा )लॉकडाऊन च्या चौथ्या टप्प्यात आज पासून नॉन रेड झोन असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा अंतर्गत प्रवास करण्यासाठी काही अटी व शर्ती ठेवून|  जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली असल्यामुळे नगर-मनमाड महामार्गावर मोटरसायकली व वाहनांची ये-जा आज वाढल्याचे दिसून येत होते ,मात्र अशा नगर-मनमाड रस्ताने जाणाऱ्या,येणा्रया मोटरसायकली व इतर वाहनांची थांबून, त्यांना अडवून कागदपत्रांची तपासणी करून अनेकांचा वेळ वाहतूक पोलीस  घेताना दिसून येत होते, तसेच अरेरावी व उध्दट भाषांचाही वापर केला जात होता,  कागदपत्रे नसताना चिरीमिरी घेऊन यापूर्वी सोडणा्रया वाहतूक पोलीसांनाआज मात्र शिर्डीतील  काही संघटनेचे तरुण कोरोना वारियर्स हेच मदतीला तेथे समक्ष उपस्थित असल्यामुळे वाहतूक पोलिसांना चिरीमिरीसाठी या तरुणांचा मोठा अडथळा निर्माण झाल्याची कुजबुज येथे सुरू होती,
   कोरोना च्या पार्श्वभूमीवर शिर्डीत गेल्या दोन महिन्यापासून लॉक डाउन मुळे सर्व काही बंद होते येथील साईभक्त व प्रवासी येणे बंद झाले होते, शिर्डीत सर्वत्र सामसूम होती ,मात्र आजपासून अहमदनगर जिल्ह्यात ठराविक वेळेत ,अटी व शर्ती ठेवून दुकाने उघडण्यास व जिल्हाअंतर्गत प्रवास करण्यास जिल्हाधिकारी ‍यांनी परवानगी दिली आहे, त्यासाठी अटी व शर्ती ठेवण्यात आले आहेत, शिर्डीत गेल्या दोन महिन्यापासून शेकडो जीप ,खाजगी बसेस साई भक्तांना साईट सीन साठी घेऊन जात असत, अशा जिप ,खाजगीप्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून हप्ता वसुली मोठ्या प्रमाणात येथे होत होती, गेल्या दोन महिन्यापासून ती बंद आहे ,त्यामुळे आर्थिक टंचाईत आलेली यंत्रणाही येणाऱ्या-जाणाऱ्या मोटरसायकली व इतर वाहनांकडून वसुली करून ती भागवण्याचा प्रयत्न होत होता, मात्र गेल्या एक-दोन दिवसापासून शिर्डीतील काही  सामाजिक संघटनेच्या तरुण कार्यकर्त्यांनी कोरोना वारियर्स म्हणून आपली भूमिका, जबाबदारी समजून शिर्डीच्या प्रवेशद्वारावरच वाहतूक पोलिसांना मदत करीत महत्त्वाचे कार्य सुरू केले आहे, मात्र या तरुण कोरोणा वारियर्स मुळे वाहतूक पोलिसांकडुन विविध मार्गाने, रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकाना अडवुन नेहमी विविध धाक दाखवून करण्यात येणारी वसुली आता बंद झाली आहे ,या तरुण कोरोना वॉरियर्सचा  त्यांना आता मोठा अडथळा ठरू लागला आहे असे खाजगीत बोलले जात अाहे, उघडपणे कोणीही बोलायला तयार नाहीत, नियम व अटी सगळ्यांनीच पाळल्या पाहिजे, जो नियमात आहे ,त्याला विनाकारण त्रास देणे चुकीचे आहे, व जो नियमात नाही त्याला शिक्षा झाली पाहिजे पण अनेकदा नियमात असतानाही  कुठेतरी विनाकारण बोट दाखवून अडचण निर्माण केली जात आहे, मात्र आता कोरोना तरुण वारियर्स शिर्डीतील असल्यामुळे या गोष्टीला मोठा पायबंद बसणार आहे व बसत आहे ,अशीच शिर्डीत सध्या चर्चा सुरू आहे, व कायमचात शिर्डीतील विविध सामाजिक संघटनेने पुढाकार घेऊन आपले कार्यकर्ते, वेगवेगळे दिवस व वेगवेगळ्या वेळा ठरवून असेच सामाजिक कार्य करण्यासाठी उभे राहिले तर नक्कीच मोठ्या प्रमाणात सर्वच गोष्टींना आळा बसल्याशिवाय राहणार नाही ,असे शिर्डीत बोलले जात आहे.

शिर्डी (जय शर्मा )राज्य सरकार कोरोणाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात रोखण्यासाठी कमी पडले असून त्यासाठी अयशस्वी ठरलेल्या राज्य सरकारचा निषेध करत राज्य सरकारने राज्यातील जनतेला कोरोणामुळे उद्भवलेल्या संकटकाळात विविध क्षेत्रात, विविध प्रकाराने मदत करण्याची मागणी करत राहता तालुक्यातील विविध गावात भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यकर्त्यांनी मेरा अंगण, मेरा रणांगण महाराष्ट्र बचाओ आंदोलन आज केले,
राज्यात कोरोणामुळे जनता मोठ्या संकटात सापडली आहे आर्थिक टंचाई भासू लागली आहे, राज्य सरकार या काळात अयशस्वी ठरले आहे, याचा निषेध करण्यासाठी राज्यभर आज भा,ज,प च्या वतीने महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले, भाजपच्यावतीने गावागावात मेरा अंगण, मेरा रणांगण ,महाराष्ट्र बचाओ आंदोलन केले गेले, याच धर्तीवर राहता तालुक्यातही असे आंदोलन झाले, राहता तालुक्यातील शिर्डी व परिसरातही ही गावागावात भाजपतर्फे असे आंदोलन करण्यात आले, निमगाव निघोज येथील भाजपाचे स्थानिक नेते बाळासाहेब गाडेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत गावात राज्य सरकारचा निषेध करत मेरा अंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव आंदोलन केले,व विविध मागण्यांचे निवेदन घेवुन त्यांनी हे आंदोलन केले ,तोंडाला मास्क लावून व सोशल डिस्टंन्स पाळत महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले, यावेळी   शासनाने विद्यार्थ्यांची शालेय फी माफ करण्यात यावी, शेतमजूर, कामगार ,बारा बलुतेदार आदी रोजीरोटी वर जगणाऱ्या गोरगरिबांना आर्थिक अनुदान द्यावे ,राज्यातील सर्व भाडेकरूंचे तीन महिन्यांचे घर भाडे माफ करावे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी ,शिधापत्रिका नसलेल्यानाही  रेशन मधून धान्य मिळावे, आदी विविध मागण्या करत हे महाराष्ट्र बचाव आंदोलन येथे करण्यात आले, त्याच प्रमाणे तालुक्यातील गावातही असेच वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन झाले.

शिर्डी (राजेंद्र गडकरी )-राज्यात महसूल खात्याला गाव पातळीवर सर्वाधिक मदत करणारा कोतवाल असताना कोतवालांना ढोबळमानाने साडेसात हजार रुपये ते पंधरा हजार रुपये पगार दिला जातो. आजच्या महागाईच्या युगात हा तुटपुंजा पगार कोतवालांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अपुरा पडत आहे त्यामुळे कोतवालांची मोठी अडचण निर्माण होत आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमी वर लॉक डाऊन करण्यात आला होता, या लॉकं डाउन काळात प्रत्येक गावातील कामगार तलाठ्यांना मोठी मदत करण्याचे काम कोतवालांनी अहोरात्र केले होते, आपला जीव धोक्यात घालून ग्राउंड लेव्हल ला कोतवाल काम करत आहेत, त्यांचा शासनाने सध्या तरी विचार करणे गरजेचे आहे,
राज्यात, जिल्ह्यात व गावागावात महसूल खात्याकडून कामगार तलाठी यांच्यामार्फत सर्व आदेशांची अंमलबजावणी, नोटिसा देणे, गावातील व्यक्तींना बोलावून आणणे, दुर्घटना अथवा पिकांचा पंचनामा करताना मदत करणे इत्यादी अनेक प्रकारची कामे कोतवालांना करावी  लागतात.सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोतवालांना ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर इत्यादीं सोबत कार्य करावे लागत आहे. गाव पातळीवर स्थापन केलेल्या कोरोना ग्राम सुरक्षा समितीमध्ये तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच इत्यादींच्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी कोतवाल ही व्यक्ती उपयुक्त ठरते. कोरोनाच्या सर्व धोक्याविरुद्ध कोतवाल सध्या गाव पातळीवर प्रामाणिकपणे लढत आहे. कोतवाल सुद्धा इतरांप्रमाणेच कोरन वॉरियर्स आहेत, ते जनतेला कोरोना पासून वाचविण्यासाठी पराकाष्ठेचे परिश्रम निमुटपणे घेत आहे. मात्र कोतवालांना कोरोना विरुद्ध लढताना विम्याचे  संरक्षण  देण्यात आलेले नाही, त्याच प्रमाणे गाव पातळीवरील इतर कर्मचार्‍यांप्रमाणे कोतवालांना प्रोत्साहनपर भत्ता सुद्धा देण्यात आलेला नाही. ही बाब अन्यायकारक आहे. तसेच कोतवालांचे मनोधैर्य खच्ची करण्यासारखी आहे.
यासाठी कोतवालांना सुद्धा इतर कर्मचार्‍यांप्रमाणे विम्याचे संरक्षण देऊन प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, लॉकडाउनकाळातील त्यांच्या या  कामगिरीचाही शासनाने कुठेतरी विचार करावा, अशी मागणी ज्येष्ठ विधिज्ञ कारभारी गवळी, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे राज्य सचिव अशोक सब्बन, भारतीय जनसंसदचे जिल्हा सरचिटणीस कैलास पठारे, युवा आघाडी प्रमुख अशोक ढगे, विर बहादुर प्रजापती, डॉ.प्रशांत शिंदे, भगवान जगताप, बबलू खोसला, इक्बाल भाई, अशोक बापू कोकाटे, कैलास खांदवे, गणेश इंगळे व भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्याकडे केली आहे.

शिर्डी( जय शर्मा)- कोरोणा पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यातअटी  व शर्ती ठेवून नॉन रेड झोन जिल्ह्यामध्ये एसटी महामंडळाच्या बसेस काही ठिकाणाहून आजपासून धावणार होत्या ,मात्र शिर्डी या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या बसस्थानकात मात्र आज शुकशुकाट दिसत होता, येथून आज एकही बस बाहेर गेल्याचे व आल्याचे दुपार पर्यंत दिसत नव्हते, येथे फक्त एसटी महामंडळाचे कामगार व पोलीस दिसत होते, एवढ्या मोठ्या बसस्थानकात  प्रवासी मात्र एकही दिसत नव्हता , जिल्ह्यात आज बस सुरू झाल्या , शिर्डी सारख्या बसस्थानकातून ठराविक मार्गावर बसेस सोडणार होते, मात्र  या बस स्थानकात प्रवासी फिरकले नाही ,शिर्डी बस स्थानक हे नेहमी साई भक्तांनी गजबजलेले असते, मात्र श्री साईबाबांचे मंदिर बंद असल्यामुळे साईभक्त येणे ,जाणे बंद आहे प्रवासी  व साई भक्तच नाही तर बस सोडून करणार काय । प्रवासी नसल्यामुळे हे बस स्थानक शांत शांत दिसूनयेत होते, ,आज बसेस सोडण्यासाठी जिल्ह्यात काही ठिकाणी  संपूर्ण तयारी करण्यात आली होती ,कोपरगाव, संगमनेर श्रीरामपूर आगारातून बसेस सोडण्यात आल्या, शिर्डीतून ही बसेस सोडण्यासाठी तयारी झाली होती मात्र दुपारपर्यंत येथे प्रवासी फिरकले नसल्यामुळे येथून एकही बस येथून दुसरीकडे धावली नाही, राहता तालुका कोरोणा मुक्त आहे, राहता तालुक्यातील शिर्डी हे श्री साईबाबा मुळे अांतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे, लॉकडाउनच्या पूर्वी एसटी महामंडळाला, कोपरगाव आगाराला सर्वात जास्त उत्पन्न शिर्डी बसस्थानकातील प्रवाशांमुळे मिळते, कारण शिर्डीहून अनेक ठिकाणी,अनेक बसेस जातात, येतात,लॉकडाउनकाळातही शिर्डीतून परप्रांतीयांना जाण्यासाठी काही बसेस सोडण्यात आल्या होत्या, शिर्डीचे  आंतरराष्ट्रीय बस स्थानक यापूर्वी सनेंटायझर करण्यात आले आहे,  सर्व सुविधा व सुसज्ज असेहे बसस्थानक आहे ,असे असतानाही आज हे बस स्थानक सामसूम दिसत होते, नेहमी गजबजलेले हे बस स्थानक लॉकडाउन काळात शांत।तर होतेच मात्र आज बस सुरू झाल्या पण श्रीसाई मंदिर बंद असल्यामुळे व प्रवासी नसल्यामुळे आजही हे बस स्थानक नेहमीप्रमाणे गजबजले  दिसत नव्हते, शांत शांत वाटत होते, जोपर्यंत श्री साईबाबांचे मंदिर सुरू होत नाही व साईभक्त येथे येणे सुरू होत नाही तोपर्यंत शिर्डीचे बसस्थानक असेच शांत शांत दिसणार आहे ,येथे प्रवासी किरकोळ प्रवास करू शकतात मात्र नेहमीसारखे साईभक्तांनी गर्दीने गजबजलेले हे बसस्थानक सध्यातरी श्री साईं चे मंदिर उघडेपर्यंत तसे गजबजलेले दिसणार नसल्याचे शिर्डीकर बोलत आहेत.

कोपरगाव प्रतिनिधी- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन सुरू असून शिर्डीत श्री साईबाबा मंदिर साई संस्थान ने  दर्शनासाठी बंद केले आहे, तसेच काही कामगारांना सुट्ट्या देण्यात आले आहेत, या लॉकडाउनच्या दोन महिन्याच्या कालावधीत, मार्च महिन्यापासून कामगारांना पगार नव्हते .गेल्या काही दिवसातच कायम कामगारांना पगार देण्यात आले मात्र आऊटसोर्सिंग कामगारांना पगार नाहीत .असे असताना श्री साईबाबा संस्थानने मोठी रक्कम देऊन शिर्डी जवळील रुई शिवारात जमीन खरेदी केली आहे ,जर लॉकडाउनच्या दरम्यान साईबाबा संस्थानला देणगी रूपात येणारे उत्पन्न कमी झाले आहे व कामगारांचा पगार एफडी मोडून करावा लागत आहे तर मग या लॉक डाऊन च्या काळात साईबाबा संस्थानने मोठी रक्कम देऊन जमीन खरेदीचा आटापिटा का केला। असा सवाल कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केला आहे.
 संजय काळे यांनी म्हटले आहे की  श्री साईबाबा संस्थाननै 17 मार्च दुपारी तीन वाजेपासून साईभक्तांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवले आहे, त्यामुळे येथे साईभक्त येणे व रोख देणगीचे प्रमाणही ही पूर्ण बंद झाल्या असून ऑनलाईन देणगी थोड्याफार प्रमाणात मिळत आहे, याचे कारण दाखवून साई संस्थानने आपली एफडी मोडून गेल्या दोन महिन्यात चा पगार गेल्या काही दिवसात कायम कामगारांना दिला आहे, अजून आऊटसोर्सिंग कामगार बाकी आहेत ,असे असताना ,देणगी कमी असताना साई संस्थानने रुई शिवारातील दर्यानानी यांची जमीन यापूर्वी देऊ केलेली असतानाही त्यांनी खरेदी केली नाही, त्यांनी काही जमीन देणगीदाखल दिली असून काही जमीन खरेदी करण्यासाठी संस्थांनला शासनाने परवानगी दिली होती, मात्रसन 2018 पासून ही जमीन संस्थांनी खरेदी केली नाही ,मात्र लॉकडाउनच्या दरम्यान ही जमीन खरेदी करण्यात आली, जमीन खरेदी करताना किंवा कोणताही व्यवहार करताना उच्च न्यायालयाची  संस्थांनला परवानगी।घ्यावी लागते, साई संस्थानने संस्थांनच्या कामगारांचा 40% पगार कपात करण्याचे निर्णय घेतला आहे ,तसेच तिरुपतीच्या धर्तीवर कामगार कपात करण्याचे धोरण अवलंबले आहे, मात्र उच्च न्यायालयाची त्यासाठी परवानगी नाही ,उच्च न्यायालय म्हणते पगार द्या आणि संस्थान उलट पगार कपात करीत आहे ,हा उच्च न्यायालयाचा अपमान आहे, उच्च न्यायालयात त्यासंबंधी कोणताही अर्ज दाखल झालेला नाही, त्यामुळे संस्थान उच्च न्यायालयाचा अपमान करीत असल्याचे स्पष्ट होत आहे, जर या खरेदी केलेल्या जमिनीपासून एक हजार फुटावर असणाऱ्या तुरकणे यांची जमीन लोकडाउन अगोदर सहा महिने पूर्वी आता संस्थांननी घेतलेल्या खरेदी भावाच्या निम्म्या पटीने विकली जाती , मात्र संस्थानलॉकडाउन काळात गरज नसताना डबल पैसे देऊन सुमारे १४ कोटी ला ही जमीन खरेदी करते, एवढा आटापिटा कशासाठी संस्थान करत आहे ,शिवाय कामगारांना पगार देण्यासाठी एफडी मोडुन पगार।करावा लागतो, कामगारांचा 40% पगार  कपात करावा लागतो तर मग जमीन खरेदी करण्याची सध्यातरी आवश्यकता काय होती।। असा सवाल करत हा उच्च न्यायालयाचा तात्पुरते नेमलेल्या विश्वस्तांनी जणू अपमानच केला असल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याने या गोष्टीचा निषेध करत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी  या सर्व गोष्टींची उच्च न्यायालयाने चौकशी करावी तसेच विधी व न्याय खात्याने ही चौकशी  करावी अशी मागणी संजय काळे यांनी केली आहे.

शिर्डी (राजेंद्र गडकरी)-कोव्हिड१९ विरुद्ध अहोरात्र लढणाऱ्या देश विदेशातील कोरोना योध्द्यांना  आणखी  स्फूर्ती मिळण्यासाठी तसेच कोरोनाचा  लवकर नायनाट व्हावा, यासाठी श्री साईबाबांना प्रार्थना करत राहाता तालुक्यातील हजारो साई भक्तांनी आज दि,२१मेला दुसर्‍या गुरुवारीही   तालुक्यातील गावागावातील घराघरात कुटुंबासहित सामूहिक श्री साई चरित्र ग्रंथाचे पारायण करत व सामूहिक घरात आरती करत श्री साईबाबांकडे साकडे घातले,  या उपक्रमात  राहता तालुक्यातील मोठ्या संख्येने साई भक्त व हजारो कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते, त्यास साईभक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला,
जगातील सर्वच देशांमध्ये कोरोनाने हाहाकार माजला असून दररोज देशात, जगात मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत, अशा कोरोना विरोधात लढण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस, महसूल, अधिकारी-कर्मचारी ,स्वच्छता कर्मचारी,प्रत्रकार, प्रशासन व प्रत्येक जण आपापल्या परीने अहोरात्र काम करीत आहे, असे कोरोनावॉरियर्स आपला जीव धोक्यात घालून कोरोनाला हटवण्यासाठी लढा देत आहेत, रुग्णांची सेवा करीत आहेत,यालॉकडाउन काळात सर्वसामान्य गोरगरीब व सर्व नागरिक घराघरात आहेत, त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करत आहेत ,सुविधा पुरवीत आहेत, अशा सर्वाना  पूर्ती मिळावी मिळावी, त्यांचे कौतुक अभिनंदन व्हावे, म्हणून व या देशातून, जगातून कोरोनाचा लवकर नायनाट व्हावा, यासाठी श्री साईबाबांना आज गुरुवार दि,२१मे रोजी साकडे घालण्यात आलेआहे, शिर्डी येथील श्री साई निर्माण ग्रुप द्वारकामाई प्रतिष्ठान, श्री साई संदेश प्रतिष्ठान रुई यांच्यावतीने आज गुरुवार दिनांक२१ मे रोजी सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत राहाता तालुक्यातील प्रत्येक घराघरात श्री मंगलाचरण, श्री साईस्तवनमंजरी व लकी ड्रॉ द्वारे निघालेल्या अध्यायाचे वाचन आपल्या घरात राहून देवघरासमोर किंवा श्री साईंच्या प्रतिमेसमोर मनोभावे करून सामूहिक श्री साईचरित्र पारायण  घराघरात करण्यात आले, लॉकडाऊन चे नियम पाळत प्रत्येकाने आपापल्या घरात श्री साईचरित्र पारायण यांचे वाचन करून श्री साईबाबांची प्रार्थना करत कोरोनाला हटवण्या साठी साईबाबांकडे साकडे घातले, या धार्मिक उपक्रमाला मागील गुरुवारी 14 मेला शिर्डी व परिसरात मोठा प्रतिसाद मिळाला,होता, असाच मोठा प्रतिसाद आज गुरुवारी 21 मेला राहता तालुक्यातून गावागावातून मोठ्याप्रमाणात मिळाला आहे, तसेच पुढच्या गुरुवारी२८ मे रोजी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील गावागावात असे सामूहिक पारायण घराघरात राबविण्यात येणार आहे, साईचरित्र पारायणा चा तिसरा टप्पा गुरुवार दिनांक 28 मे रोजी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील ,प्रत्येक गावागावात होणारअसुन , त्यानंतर ४जूनला संपूर्ण देशात  व त्यानंतर पुढच्या गुरुवारी११जुनला संपूर्ण जगातील साईभक्त  असे घरात राहून  श्री साई चरित्र ग्रंथाचे पारायण करणार आहेत  ,हा एक  मोठा उपक्रम  राबविण्यात येत असून सर्वांनी मोठ्या संख्येने या धर्मीक उपक्रमात सहभागी होण्याचे आव्हान  साई निर्माण ग्रुप ,साई संदेश प्रतिष्ठान व द्वारकामाई प्रतिष्ठानने केले आहे .

शिर्डी (जय शर्मा)-कोरोणाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन सुरू असून शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर दर्शनासाठी बंद आहे, त्यामुळे श्री साईबाबा संस्थान मध्ये तात्पुरत्या स्वरूपातील आऊटसोर्सिंगमध्ये काम करणारे कामगार अद्यापही पगाराविना आहेत, या काळातला त्यांना पगार झालेला नाही, त्यामुळे या गरीब ,सर्वसामान्य कुटुंबातील कामगारांना आता उपासमारीची वेळ आली असून साई संस्थानने या आऊटसोर्सिंग कामगारांना त्वरित पगार करावेत अशी मागणी आता या कामगारांकडून होऊ लागली आहे,
 लॉक डाऊन मुळे श्री साईबाबा संस्थानने श्रीसाईमंदिर बंद केल्यामुळे व साईभक्त येथे येणे बंद असल्यामुळे तसेच येथे गर्दी होऊ नये म्हणून काही कामगारांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत, मात्र स्वच्छता वॉचमेन, पुजारी व काही कामगारांना  ड्युटी देण्यात आले आहेत, आऊटसोर्सिंगचे कामगार काही घरी आहेत ,तर ड्युटीवर आहेत ,याकाळात आर्थिक टंचाई सर्वांनाच बसत आहे, त्यात गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील साई संस्थांमध्ये काम करणारे आउटसोर्सिंगचे हे कामगार यांनाही या काळात पगार झालेला नाही, गेल्या दोन-अडीच महिन्यापासून पगार नसल्याने ह्या कामगारावर व,त्याच्या कुटुंबावर आता उपाशी राहण्याची वेळ  आली आहे, यापुढे साई संस्थानने जसे कायम कामगारांना पगार केलेत तसेच आउटसोर्सिंग च्या या कामगारांना पगार करावेत, अशी मागणी या कामगारांकडून होत आहे, अन्यथा या   आउटसोर्सिंग कामगारांमधील काही कामगार आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत, तरी या सर्व गोष्टींचा विचार करून साईबाबा संस्थानने या आऊटसोर्सिंग कामगारांचे पगार द्यावेत, अशी मागणी आता या कामगाराबरोबर त्यांच्या कुटुंबीय व तसेच शिर्डीकर  व साईभक्तांमधूनही होऊ लागली आहे.

शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र गडकरी )दि. २१- जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यात आपण बर्‍यापैकी यशस्वी ठरलो आहोत. जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करीत खबरदारी घेतली तर आपण या संकटावर निश्चितपणे मात करु. आगामी काळात कोरोना संसर्गाचे रुग्ण सापडले नाहीत, तर जिल्हा ०१ जून रोजी कोरोनामुक्त होईल, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
          पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाटी करावयाच्या विविध उपाययोजनांचा तसेच इतर योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत मायकलवार, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदींची यावेळी उपस्थिती होती.
          पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सध्या आपल्याकडे कोरोना वाधित ६८ रुग्ण आहेत. त्यापैकी ४९ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आगामी काळात कोरोना रुग्ण सापडले नाहीत, तर आपण ०१ जून रोजी कोरोनामुक्त होऊ. त्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करणे आणि आरोग्य यंत्रणेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करणे अपेक्षित असल्याचे सांगितले. जिल्ह्यात १२ मार्च २०२० रोजी पहिला रुग्ण सापडला होता.  मे महिन्यात बाहेरुन येणार्‍या नागरिक बाधित आढळण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. नागरिकांनी स्वताच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
          लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना परत त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चांगला पाठपुरावा केल्यामुळे आतापर्यंत ३० हजार नागरिकांपैकी २३ हजारांपेक्षा अधिक मजूर, कामगार, भाविक, विद्यार्थी त्यांच्या राज्यात परत पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत १० विशेष श्रमिक रेल्वेमार्फत त्यांना रवाना करण्यात आले आहे. आणखी ०६ रेल्वेद्वारे उर्वरित नागरिकांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्यात येणार आहे. याशिवाय, परजिल्ह्यातून तसेच परराज्यातून १६ हजार नागरिक आपल्या जिल्ह्यात परत आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
          जिल्ह्यातील नागरिक, जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांनी कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी कौतुक केले.
     यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या विविध सामाजिक योजनांच्या जिल्ह्यातील अंमलबजावणीचा आढावाही घेतला. संजय गांधी निराधार अनुदान, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन अशा विशेष साहाय्य योजनेतील १ लाख ६२ हजार १४८ लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
          जिल्ह्यातील मोठ्या धरणांत सध्या ३६ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असून मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा२४ टक्के असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्हयात सध्या २१ शासकीय आणि ६१ खाजगी टॅंकरद्वारे ७२ गावे आणि २९१ वाड्यांना पाणीपुरवठा होत असून टॅंकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकार्‍यांना दिल्याची माहितीही त्यांनी दिली. रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात सध्या २०६९ कामे सुरु असून त्यावर १० हजार ३१० मजूर कामांवर असल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
          जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी तसेच केशरी कार्डधारकांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या नियतनाप्रमाणे धान्य वाटप करण्यात आले आहे. मे महिन्यातील ८३ टक्के धान्याचे वाटप पूर्ण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत प्रतिमाह अर्धा किलो चणाडाळ आणि अर्धा किलो तूरडाळ वाटप करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा)सध्या कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू आहे, अशा लॉक डाऊन च्या काळात शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये राहता व कोपरगाव तालुक्यातील मुस्लिम बांधवांना व व दोन्ही तालुक्यातील मौलानाना पोलिसांनी बोलावून रमजान ईद निमित्त बैठक घेतली, मात्र या बैठकीला सुमारे शंभर ते दीडशे मुस्लीम बांधव उपस्थित होते पोलिसांनी लॉक डाऊन चे नियम तोडत पोलीस स्टेशन आवारात गर्दी जमवली, हे लॉक डाऊन चे नियम पायदळी तुडवल्या यासारखे असून यावेळी कोणतेही सोशल डिस्टंन्स पाळण्यात आले नाही ,शिवाय अनेकांनी मास्क वापरलेले नव्हते, विशेष म्हणजे सर्वसामान्यांना लॉक डाऊन चा नियम दाखवणारे पोलीस मात्र आपल्याच आवारात ईदनिमित्त मुस्लिम बांधवांची बैठक बोलावतात व या बैठकीला गर्दी होत असताना शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे मार्गदर्शन करतात, इतर पोलिस अधिकारीही  हे सर्व पाहतात पण कोणीही नियमाचे पालन करण्यासाठी दक्षता घेत नाही,येथे कोणताही नियम पाळला जात नव्हते, तसेच पत्रकारांनाही आत मध्ये येण्यास मज्जाव करण्यात येत होता, अहमदनगर जिल्हा नॉन रेड झोन मध्ये जरी असला व। शिर्डीजरी  कोरोणा मुक्त असली तरी कोरोणा चा प्रादुर्भाव किंवा संसर्ग अशा  गर्दीच्या बैठकांमुळे होण्याची दाट शक्यता असल्याने हे टाळणे गरजेचे होते परंतु कुंपणच शेत खात असले तरी यावर सर्वसामान्य काय करणार। पोलिसांनी यावेळी गर्दी सांगणे गरजेचे होते मात्र पोलीस यंत्रणाही यावेळी कुचकामी ठरली गेली, नियम व कायदा सर्वांना सारखाच आहे ,त्यामुळे लॉकडाउन चे नियम व कायदे मोडणाऱ्या सर्वांची जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार यांनी त्वरित चौकशी करून कारवाई करावी व ज्यांनी लॉकडाउनचे  नियम मोडले आहेत, ज्यांनी ही बैठक बोलावली व सोशल डिस्टंन्स न पाळता  नियम मोडले, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता शिर्डी मधून होत आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारने जाहीर केलेल्या चौथ्या लॉकडाऊनमध्ये नगर जिल्ह्याचा समावेश नॉन रेड झोनमध्ये झाल्याने जिल्ह्यात अनेक सुविधा, बाबींना शुक्रवार (दि.22) पासून जिल्हा प्रशासनाने नव्याने परवानगी दिली आहे. त्यात प्रामुख्याने सर्व बाजारपेठा, दुकाने उघडण्यास, तसेच रिक्षा, टॅक्सी, जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले सलूनही सुरू होणार असून विवाह, अंत्यविधीला 50 लोक उपस्थित राहू शकतात, असे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. मात्र, दररोज सायंकाळी 7 ते सकाळी सातपर्यंत सक्तीने सर्व बंद ठेवण्यात येणार असल्याचे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.राज्य शासनाने रेड झोन व नॉन रेड झोनमधील जिल्हे घोषित केले असून त्यात नगर जिल्हा नॉन रेड झोनमध्ये समाविष्ट झाला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी बुधवारी जिल्ह्यात कोणत्या बाबी सुरू राहतील व कोणत्या बाबींना प्रतिबंध असेल याबाबत आदेश काढले. त्यात प्रामुख्याने कंटेन्मेंट झोन (ज्या ठिकाणी करोनाचे रुग्ण आढळले) वगळता आतापर्यंत बंद असलेल्या बाजारपेठा सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. याशिवाय सर्व दुकानेही उघडतील. मात्र, याची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत असेल.अत्यावश्यक सेवेची दुकाने (मेडिकल, पेट्रोलपंप, एटीएम) मात्र त्यांच्या निर्धारित वेळेत सुरू राहतील. दुकानांत गर्दी झाल्याचे आढळल्यास दुकाने त्वरित बंद केली जातील. क्रीडा संकुले, तसेच इतर सार्वजनिक मोकळ्या जागा वैयक्तिक व्यायामासाठी खुल्या होतील. मात्र प्रेक्षक व सार्वजनिक जमावास बंदी असेल. सर्व खासगी व सार्वजनिक वाहतुकीस परवानगी असेल. मात्र दुचाकीवर केवळ एकचजण प्रवास करेल. तीन चाकीवर तीन, तर चार चाकीतही तिघांनाच परवानगी असेल. जिल्हांतर्गत बस सेवेला जास्तीत जास्त 50 टक्के क्षमतेसह व शारिरिक अंतर ठेवून व स्वच्छताविषयक उपाययोजनांसह परवानगी असेल.
144 कलम कायम-जिल्ह्यात अनेक व्यवहारांना परवानगी दिलेली असली तरी कलम 144 अन्वये सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई राहील. याचा भंग करणार्‍यावर कडक करवाईचा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.
सातच्या आत घरात-अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तीच्या हालचालींवर, फिरण्यास सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत निर्बंध राहतील. सर्व सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक आहे. दुकानांत ग्राहकांमध्ये 6 फुटांचे अंतर राखावे व पाच पेक्षा जास्त ग्राहक एका ठिकाणी नसावेत, असे आदेशात म्हटले आहे.
थुंकणार्‍यावर होणार दंड-सर्व सार्वजनिक ठिकाणी आणि कामाचे ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य आहे. सार्वजनिक वा कामाचे ठिकाणी थुंकणार्‍यास संबंधित प्राधिकरणाने कायदेशिर तरतुदींनुसार दंडासह शिक्षा करावी. सर्व व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी व वाहतुकी दरम्यान सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आदेश दिले आहेत.
 हे सुरू करण्यास परवानगी-सलून दुकाने, हॉस्पिटल, क्लिनिक, बाह्यरुग्ण तपासणी, टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी वाहने (चालकासह तिघे), दुचाकी (केवळ चालक), जिल्हांतर्गत बससेवा, मालवाहतूक, उद्योग, बांधकामे, शहरातील व ग्रामीणमधील सर्व दुकाने, बाजारपेठा, ई-कॉमर्सद्वारे वस्तूपुरवठा, खासगी कार्यालये, शासकीय कार्यालये (100 टक्के), कृषीविषयक कामे, बँका आणि वित्तीय सेवा, टपाल व कुरिअर सेवा, तातडीच्या वैद्यकीय कारणासाठी प्रवास, कटिंग, सलून, स्पा, ब्यूटीपार्लर, स्टेडियम (प्रेक्षकांशिवाय), रेस्टॉरंट (केवळ होम डिलीवरीकरिता), बसस्थानक, रेल्वेस्थानकवरील कॅन्टीन, दुय्यम निबंधक कार्यालये, उपप्रादेशिक परिवहन कार्यालये, विवाह समारंभ, अंत्यविधी (केवळ 50 व्यक्तींच्या मर्यादेत).
 हे मात्र बंदच-विमान, रेल्वे, मेट्रो वाहतूक, आंतरराज्य रस्ते मार्गाने प्रवास, आंतरजिल्हा बससेवा, शैक्षणिक संस्था, हॉटेल्स, मॉल्स, धार्मिक स्थळे व मोठ्या गर्दीची ठिकाणे, आठवडे बाजार बंद राहणार. 65 वर्षांवरील व्यक्ती व 10 वर्षांखालील मुले व गरोदर स्त्रिया यांना घराबाहेर पडता येणार नाही. तथापी बस स्थानक, रेल्वे स्टेशन व विमानतळ येथील कॅन्टीन सुरू ठेवता येतील. केवळ घरपोहच डिलीवरीसाठी रेस्टॉरंटचे किचन सुरू ठेवण्यास परवानगी असेल.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget