October 2019

अकोले (प्रतिनिधी) मित्रा कडून घेतलेले पैसे परत देण्या घेण्याच्या वादातून मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना अकोले तालुक्यातील गर्दनी शिवारात पाडव्याच्या दिवशी घडली .या संदर्भात दोन संशयित आरोपींना अकोले पोलिसांनी अटक केली असून, त्यांना उशिरा न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.अकोले शहरापासून जवळच असलेल्या नवलेवाडी येथील प्रथमेश एकनाथ भोसले( राहणार- पिंपळगाव निपाणी, तालुका अकोले ,हल्ली मुक्काम -नवलेवाडी) यास गर्दणीच्या डोगरातील चिमणदरा येथे त्याच्या डोक्यावरती जबर मारहाण करुन त्याचा खुन करण्यात आला आहे. अकोले पोलिसांनी 24 तासाच्या आत आरोपीचा शोध लावून अटक केली .पिंपळगाव निपाणी येथील व सध्या नवलेवाडी येथे राहत असलेले मान्हेरे आश्रमशाळेतील अधिक्षक एकनाथ भोसले यांचा मुलगा प्रथमेश हा 12 वीत शिकत होता. तो सी ई टी च्या अभ्यासक्रमासाठी नांदेड येथे शिकवणी वर्गात शिकत होता. दिपावली सुटटीसाठी तो आपल्या आई-वडिल राहत असलेल्या नवलेवाडी, अकोले येथे आलेला होता.सगळीकडे दिपावली साजरी होत असताना.सोमवार दि 28 आक्टोबर 2019 रोजी दुपारी प्रथमेश भोसले हा आपल्या मित्रांना भेटण्यासाठी घरून बाहेर पडला. तो सायंकाळी गर्दणी शिवारात डोक्याला जबर मारहाण करुन खून केलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. गर्दनी चे पोलीस पाटील संतोष अभंग यांच्या माहिती वरून पोलिसांनी शोध घेतला .अकोले पोलिसांनी सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे प्रचंड गतीने फिरून या खुनाचा तपास अवघ्या 24 तासात करून आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.पोलिस उपविभागीय अधिकारी रोशन पंडित यानी भेट दिली .यावेळी पोलिसांनी सुजान महेश देशमुख रा. माळीझाप ता. अकोले व उदय विजय गोर्डे रा.धामणगाव रोड ता.अकोले या आरोपीना बेड्या ठोकल्या .एकनाथ खडू भोसले यांच्या फिर्यादीवरुन भा द.वि 302,34 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी व मयत हे मिञ असुन मयत प्रथमेश याने आरोपीना पैसे उसने दिलेले होते. ते पैसे परत मागण्याचा तगादा प्रथमेशने लावल्याने सुजान महेश देशमुख व उदय विजय गोर्डे यानी त्याला गर्दणीच्या डोगराकडे नेऊन डोक्यात जबर मारहाण करुन खून केला . त्यात प्रथमेश त्याचा मृत्यू झाला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक अरविंद जोधळे व उपनिरीक्षक दिपक ढोमणे करत आहे. शहराजवळील गर्दनी परिसरात दिवसा खुनाची घटना घडल्याने तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे.  अवघ्या साडेसात हजार रुपयाच्या उसनवारी वरून हा खून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे .सतरा अठरा वर्षाची ही मुले एकमेकाचा घातकरीत खुना पर्यंत पोचले आहे. या डोंगरावरती खून करण्यात आला तेथे काही गुरे चारणार्‍या लोकांनी या मारामार्‍या पाहिल्या असल्याचे समजते. तथापि या परिसरात मुलांमध्ये मस्करी सुरू आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तथापि काही काळानंतर खून झाल्याची बाब उघड झाली. त्यानंतर पोलिस पाटलांना ही बातमी सांगण्यात आली. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यानंतर या घटनेचा उलगडा होण्यास मदत झाली. तथापि ऐन तारुण्यात या मुलांनी खुनासारखे प्रकार केल्याने तरुण पिढीच्या संदर्भाने आता अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे. अशा स्वरूपाचा खून करण्याचा अकोल्यातील हा पहिलाच प्रकार मानला जात आहे. अढळा परिसरातील पिंपळगाव निपाणी येथील मूळचे रहिवासी असलेले एकनाथ भोसले यांचा चिरंजीव प्रथमेश याचे शवविच्छेदन अकोले येथे झाल्यानंतर पिंपळगाव येथे उशिरा त्याच्यावरती अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रथमेश हा राजूर येथील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले श्री बाबासाहेब गोडगे यांचा भाचा आहे. प्रथमेश हा भोसले कुटुंबाचा एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या निधनाबद्दल परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

गंगापूर तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
बि ए एम एस डाॅक्टरने घेतला गरोदर मातेचा बळी,
गंगापुर शहरात पुन्हा एकदा बि ए एम एस डाॅक्टरने घेतला गरोदर मातेचा बळी गंगापूर तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. वरिष्ठ अधिका-यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
शहरातील ओमसाई हाँस्पीटल मधे 28 वर्षीय महीलेची प्रसुती झाल्यानंतर जास्त रक्त स्त्राव झाल्याने तीचा मृत्यू झाल्याची घटना पहाटे पाच वाजता घडली आशमा हमीद शेख असे महीलेने नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गंगापुर शहरातील नवीन बस स्टँड जवळ असलेल्या डॉ अमीत गुंजाळ यांची पत्नी
डॉ. सौ. अर्जना गुंजाळ यांचे ओमसाई हाँस्पीटल मधे मन्सूरी काँलनी येथील आशमा हमीद शेख वय 28 वर्ष हीला प्रसुती करिता दाखल करण्यात आले होते डॉ अमीत गुंजाळ व डॉ. सौ. अर्जना गुंजाळ यांनी या महीलेची प्रसुती केली प्रसुती नंतर आशमास जास्त रक्त स्त्राव होत असल्याने डॉ गुंजाळ यांनी महीलेच्या नातेवाईकांना सागींतले आशमा हीला रक्तदाब वाढला आसुन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला यावर नातेवाईकांनी तत्काळ घाटी रुग्णालयात घेऊन गेले असता रात्री अडीच वाजता दाखल केले परंतु उपचार चालू असतांना आशमा हीचा मृत्यू झाला या घटनेची माहिती गंगापुर पोलीसांना दिल्यावरुण पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चौधर व कर्मचाऱ्यांनी घाटी रुग्णालयात जाऊन पंचनामा केला यामध्ये आशमाच्या प्रसुतीनंतर अती रक्त स्त्राव झाल्याचा पंचनामा  पोलिसांनी केल्याचे सांगितले
आशमा हीच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात श्ववविच्छेदन करून मृतदेहास घेऊन नातेवाईक थेट गंगापुर पोलीस ठाणे गाठत जो पर्यंत डॉ. अमीत गुंजाळ व त्यांची पत्नी डॉ. सौ. अर्जना गुंजाळ यांच्याविरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह हलवणार असा पवित्रा घेत मोठा जमाव पोलीस ठाण्यात जमा झाला होता मात्र पोलिसांनी आश्वासन दिल्याने नातेवाईकांनी मृत आशमावर अंत्यसंस्कार करण्यासाठी घेऊन गेले.

श्रीरामपुर (प्रतिनिधी)  तालुक्यातील भोकर येथील युवा शेतकरी प्रदीप बाबासाहेब नवले (वय-37) यांचा त्यांचे सख्खे भाऊ रविंद्र नवले याने मागील भांडणाच्या रागातून जड वस्तूने डोक्यात मारून खून करून मृतदेह गवतात लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,मुळ सुभाषवाडी, बेलापूर येथील रहिवाशी असलेले मात्र सध्या भोकर येथे राहत असलेले युवा शेतकरी प्रदीप बाबासाहेब नवले यांचा मृतदेह त्यांच्याच शेतात कांग्रेस गवतात आढळून आल्याची माहिती पोलीस पाटील बाबासाहेब साळवे यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली होती.माहिती मिळताच शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे,श्रीरामपुरचे पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहायक पोलिस निरीक्षक एन जे शिंदे,पो का .पवार,बर्डे,लोंढे, दिघे आदींनी घटनास्थळी भेट दिली दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा खून झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.प्रदीप नवले याचा खून त्याचा सख्खा भाऊ रविंद्र याने केल्याचा संशय पोलिसांना आला.पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता पोलिसांचा संशय खरा ठरला. दरम्यान मयत प्रदीप याची पत्नी भाऊबीजेला माहेरी गेली होती. याबाबत प्रदीप याची पत्नी स्वाती प्रदीप नवले यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, आपण मंगळवारी सायंकाळी भाऊबीजेला माहेरी आलो होतो.रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दीर रविंद्र याने आपले पती प्रदीप यांचेशी जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद घातले.वादातून काही तरी जड वस्तू डोक्यात मारून गंभीर जखमी केले.त्यात पती प्रदीप यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी रवींद्र बाबासाहेब नवले यास ताब्यात घेतले असून पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एन जे शिंदे करीत आहेत.


अहमदनगर (प्रतिनिधी) सततच्या पावसामुळे पोलीस मुख्यालयातील मैलामिश्रीत पाणी घरामध्ये घुसले आहे. त्यामुळे वसाहतीत राहणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत महिलांनी पोलीस अधिकार्‍यांकडे तक्रारीचा पाढा वाचला. मात्र, पोलीस प्रशासनानेही दुर्लक्ष केले असल्याचे दिसत आहे.पोलीस मुख्यालयातील वसाहतीमध्ये सलगच्या झालेल्या पावसाने गटारी तुंबल्या आहेत. त्यामुळे ते मैलामिश्रीत पाणी वसाहतीमध्ये घुसले असून नागरिकांना तेथे राहणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे वसाहतीमध्ये साथीचे आजार पसरत असून, आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत संबंधित प्रशासनाकडे तक्रार केली असता त्यांनीही दुर्लक्ष केले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे वसाहतीमधील काही महिलांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यलय गाठले.मात्र, पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांची भेट होऊ शकली नाही.गेल्या काही दिवसांपूर्वी पोलीस मुख्यालयातील कर्मचारी सुनील कुर्हे यांची मुलगी पूजा हिचा मृत्यू झाला होता. याबाबत पोलीस अधीक्षक सिंधू यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस मुख्यालयातील नागरी सुविधांची संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. यामध्ये महापालिका, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसील कार्यालयाचे अधिकारी सहभागी झाले होते. व नागरी सुविधांवर तातडीने काम करण्याच्या सुचनाही सिंधू यांनी दिल्या होत्या. त्यासाठी प्रत्येक विभागाच्या अधिकार्‍यांना टाईम लिमिट दिले होते. मात्र, आता पुन्हा नागरी सुविधाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गुहा - दि. २७ ऑक्टोबर २०१९
गुहा येथील गंगाधर बाबा छात्रलयातील अनाथ मुलांच्या सोबत दिवाळी साजरी करून देवळाली प्रवरा येथील आप्पासाहेब ढुस मित्र मंडळाच्या  सदस्यांनी परिसरातील तरुणांसमोर नवीन आदर्श ठेवला आहे.
देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच बैठक पार पडली, त्यामध्ये सण २०१९ ची दिवाळी फटाके व प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी साजरी करण्यावर सर्व सदस्यांचे एकमत झाले, त्यामुळे फटाक्यांच्या शिल्लक रक्कमे मध्ये गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालयातील अनाथ मुलांसाठी फळे देऊन त्यांचे सोबत दिवाळी साजरी करण्यात यावी यावर सर्वांचे एकमत झाले. व  आज रविवारी दि. २७ ऑक्टोबर २०१९ राजी रात्री ०८.३० वाजता एकीकडे फटाके फोडून सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना आप्पासाहेब ढुस मित्रमंडळाचे प्रसाद ढुस,  सुशांत वारुळे, राहुल पाटोळे, अरबाज शेख, साहिल शेख, तुषार उर्हे, अक्षय पाटील, प्रदीप भांड, ऋषिकेश शिरसाठ, अजित गवळी आदी कार्यकर्त्यांनी अनाथ मुलांच्या सोबत दिवाळी साजरी करून तरुण पिढीसमोर आदर्श निर्माण केला.
     या स्तुत्य उपक्रमा बद्दल गंगाधर बाबा छात्रलयाच्या वतीने पप्पू सपकाळ यांनी अनाथ मुलांच्या सोबत दिवाळी साजरी करून आप्पासाहेब ढुस मित्र मंडळाने तरुणांच्या समोर आदर्श निर्माण केला असे मांडून सर्व सदस्यांचे आभार मानले ..

बुलडाणा - 22 ऑक्टोबर
मतदान करतांनाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले हे कृत्य आपल्या गोपनीय मतदानाचा भंग आहे व हे गैर कृत्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल कण्यात यावा अश्या आशयची बातमी 21 ऑक्टोबर रोजी "बिनदास न्यूज़" कडून येताच प्रशासन सतर्क झाला व या प्रकारणी अज्ञात व्यक्तिवर बुलडाणा शहर ठाण्यात गुन्हा दाखल कण्यात आला आहे.
       21 ऑक्टोबर रोजी राज्यभरातील 288 विधानसभा मतदार संघात सकाळी 7 वाजे पासून मतदान प्रक्रिया सुरु झाली.दरम्यान बुलडाणा- 22 मतदार संघात मतदानाच्या दिवशी बुलडाणा विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावरील मतदान करतांनाचे काही व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल झाले व यात काही व्हिडीओत काँग्रेस उमेदवाराला, बसपा उमेदवाराला तर शिवसेना उमेदवाराला मत दिल्याचं दिसते.
       निवडणुकीत मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास निवडणूक आयोगाकडून बंदी असतांना ही काही मतदारांनी आदेशाला खो दिला आहे.अशे व्हिडीओ समोर आल्याने खरंच मतदान केंद्रावर मतदारांची मोबाईल तपासणी झाली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.या प्रकरणी "बिनदास न्यूज़" ने बातमीच्या माध्यमाने या गंभीर मुद्द्यावर प्रशानाचे लक्ष वेधले असता प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.बुलढाणा-22 निवडणूक निर्णय अधिकारी राजेश्वर हांडे यांच्या निर्देशावर नायब तहसीलदार अमरसिंह वामन पवार यांनी आज बुलडाणा शहर ठाण्यात जावून तक्रार दिली त्यात नमूद केले की अज्ञात मतदारने मतदानाचा हक्क गोपनिय पध्दतीने बजावण्या ऐवजी जाहिर मतदान करण्याचा प्रकार उघड करुण आदर्श आचार सहितेचा भंग केल्यामुळे अज्ञात आरोपी विरुद्ध लोकप्रतिनिधि कायदा 1951 आणि 1988 चे कलम 128 व भादवी चे कलम 188 अन्वय गुन्हा दाखल कण्यात आला आहे.पुढील तपास शहर ठानेदार शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनात पीएसआई करुनाशिल तायडे करीत आहे.

बुलडाणा - 21 ऑक्टोबर
महाराष्ट्रात विधानसभा साठी होत असलेल्या निवडणुकीत मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास निवडणूक आयोगाकडून बंदी असतांना ही मतदान करतांनाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.या वरुण सिद्ध होते की मतदान केंद्रवार कार्यरत पुलिंग पार्टी किती सतर्क होते.
      आज 21 ऑक्टोबर रोजी राज्यभरातील 288 विधानसभा मतदार संघासाठी सकाळी 7 वाजे पासून मतदान प्रक्रिया सुरु झाली.बुलडाणा- 22 मतदार संघात एकूण 7 उमेदवार मैदानात आहे त्यापैकी कांग्रेसचे विद्यमान आमदार हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना कडून संजय गायकवाड तर वंचित बहुजन आघाडीचे विजयराज शिंदे यांच्यात खरी लडत मानल्या जात आहे.आज दुपार नंतर बुलडाणा विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावरील मतदान करतांनाचे काही व्हिडीओ सोशल मीडिया वर समोर आले व यातील 5 व्हिडीओत काँग्रेस उमेदवाराला मत दिल्याचं स्पष्ट दिसून येताय तर एका व्हिडिओत बसपा उमेदवाराला मत दिल्याचं दिसते. अशे व्हिडीओ समोर आल्याने खरंच मतदान केंद्रावर मतदारांची मोबाईल तपासणी झाली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे आणि असे गैरकृत्य करणाऱ्यावर आता निवडणूक विभाग काय कार्यवाही करणार? हे बघावे लागेल.

महात्मा गांधींच्या च्या 150 व्या जयंती निमित्त नयी तालीम या विषयाअंतर्गत सर्वत्र विविध उपक्रम राबविले जात असताना,राष्ट्रीय सेवा योजने(NSS)  च्या माध्यमातून महाविद्यालयात विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले त्यात श्रीरामपूर शहरातील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित खासदार गोविंदराव आदिक विधी महाविद्यालयात NSS च्या विद्यार्थ्यांनि देखील शिरसगाव या दत्तक गावी जाऊन वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम गावात विविध ठिकाणी राबवली,त्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय,तसेच ग्रामीण रुग्णालय शिरसगाव अश्या ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविले.
या सर्व उपक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालया च्या प्राचार्य सौ.संघमित्रा राजभोज,उप प्राचार्या सौ.कवडे मॅडम,प्रा.ज्योती शिंदे,आणि विद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजने चे कार्यक्रम अधिकारी अ‍ॅड.प्रा.उज्वल मानकर यांनी विशेष प्रयत्न केले,त्याच बरोबर अ‍ॅड.प्रा.मुंगसे मॅडम,प्रा.गायकवाड सर मानद विश्वस्त सौ.मानसी करंदीकर मॅडमअ‍ॅड.प्रा.बिंगी मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रम यशस्वी झाल्या नंतर कार्यक्रम अधिकारी प्रा.उज्वल मानकर सर यांनी ग्रामपंचायत शिरसगाव, ग्रामीम रुग्णालया शिरसगाव यांचे आभार मानले.
या सदर च्या कार्यक्रमात रुग्णालयाचे  महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांचे समन्वयक प्रसन्न धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना एच आय व्ही बद्दल माहिती दिली व मार्गदर्शन केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजने मधील विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबई : मराठी लोकवस्ती असल्याने माहीम मतदारसंघात शिवसेना आणि मनसेत रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे टक्कर देणार आहेत. इंजीन धडधडत राहण्यासाठी येथे संधी असल्याने मनसेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर बालेकिल्ल्यात भगवा फडकत ठेवण्यासाठी शिवसेनेची कसोटी लागणार आहे.२००९ विधानसभा निवडणुकीत मनसेचे नितीन सरदेसाई येथे आमदारपदी निवडून आले. त्या वेळेस शिवसेनेचे उमेदवार आदेश बांदेकर तिसऱ्या क्रमांकावर होते. २०१४ मध्ये काँग्रेसवारी करून पक्षात परतलेले सदा सरवणकर येथे आमदारपदी निवडून आले. मनसेला दुसºया क्रमांकाची मते मिळाली होती. या मतदारसंघात अवघे चार उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसचे उमेदवार प्रवीण नाईक आणि अपक्ष उमेदवार मोहनीश राऊळ मैदानात असले तरी खरी लढत सरवणकर आणि देशपांडे यांच्यात रंगणार आहे.जमेच्या बाजूविद्यमान आमदार असून मतदारसंघात भक्कम बांधणी. २००९ मध्ये काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवूनही शिवसेनेपेक्षा अधिक मते मिळवली.लोकसभेत शिवसेनेच्या उमेदवाराला सर्वाधिक म्हणजे ९१ हजार ६३५ मते माहीम मतदारसंघातून मिळाली.मनसेच्या खळ्ळ्खट्याक आंदोलनामुळे चर्चेतला चेहरा. तरुण मतांसाठी सेलीब्रिटींची फौज प्रचारासाठी मैदानात. सोशल मीडियाचा प्रभावी वापर, दांडगा जनसंपर्क. २०१४ विधानसभा निवडणुकीत मनसेची हवा सरल्यानंतरही नितीन सरदेसाई यांना दुसºया क्रमांकाची मते होती.उणे बाजूमनसे स्पर्धेत असल्याने मराठी मतांची विभागणी होणार आहे़ अन्य ठिकाणी मनसेची पिछेहाट झाली तरी येथे समर्थकांची संख्या मोठी आहे. मराठी अस्मिता हा मुद्दा चर्चेत राहण्याची शक्यता. पार्किंगची समस्या आणि जुन्या इमारतींचा प्रश्न रखडल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.शिवसेना -भाजप कार्यकर्त्यांची तुलनेने मोठी फौज, महापालिका निवडणुकीत माहीम मदारसंघात पूर्ण सफाया, लोकसभा निवडणुकीत हवा निर्माण करूनही मनसेचा प्रभाव दिसून आला नाही. युतीचा प्रभाव लोकसभा निवडणुकीत दिसून आला, तीच हवा कायम राहिल्यास मनसेला मते फिरवणे अवघड जाईल.

अहमदनगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त जिल्ह्यातील कर्मचार्‍यांचे 13 ऑक्टोबरला दुसरे प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणास 16 हजार 485 कर्मचार्‍यांपैकी 253 गैरहजर कर्मचार्‍यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रशिक्षणात 16 हजार 171 कर्मचारी सहभागी झाले होते.जिल्ह्यातील 12 मतदारसंघनिहाय निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचारी, प्रशिक्षणाला उपस्थित कर्मचारी व अनुपस्थित कर्मचार्‍यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. अकोले मतदारसंघातील दुसर्‍या प्रशिक्षणासाठी 1 हजार 402 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 375 कर्मचारी सहभागी झाले तर 27 कर्मचारी गैरहजर होते. संगमनेरमध्ये 1 हजार 224 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 216 कर्मचारी सहभागी झाले होते. 8 कर्मचारी गैरहजर होते. शिर्डी मतदारसंघात 1 हजार 200 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1176 कर्मचारी सहभागी झाले होते. 19 कर्मचारी गैरहजर होते.कोपरगाव मतदारसंघात 1 हजार 194 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते पैकी 1 हजार 183 कर्मचारी सहभागी झाले तर 11 कर्मचारी गैरहजर होते. श्रीरामपूरमध्ये 1364 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 343 कर्मचारी सहभागी झाले होते. 21 कर्मचारी गैरहजर होते. नेवासा मतदारसंघात 1 हजार 184 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 172 कर्मचारी सहभागी झाले तर 12 कर्मचारी गैरहजर होते. पाथर्डी-शेवगावमध्ये 1592 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1555 कर्मचारी सहभागी झाले होते. 37 कर्मचारी गैरहजर होते. राहूरीमध्ये 943 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 905 कर्मचारी सहभागी झाले, तर प्रशिक्षणाला 38 कर्मचारी गैरहजर होते.पारनेर मतदारसंघात 2 हजार 38 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1994 कर्मचारी सहभागी झाले होते. 22 कर्मचारी गैरहजर होते. नगर शहर मतदारसंघात 1 हजार 272 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1254 कर्मचारी सहभागी झाले होते. 18 कर्मचारी गैरहजर होते. श्रीगोंदा मतदारसंघात 1 हजार 516 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. पैकी 1 हजार 485 कर्मचारी सहभागी झाले होते. 28 कर्मचारी गैरहजर होते. कर्जत-जामखेडमध्ये 1 हजार 556 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 513 सहभागी झाले होते. प्रशिक्षणाला 12 कर्मचारी गैरहजर होते.

श्रीरामपूर : सत्ता आणि हक्काच्या पाण्यापासून दुरावल्याने राहुरी कारखाना आणि तालुक्याची पीछेहाट झाली. बागायतदार शेतक-यांवर जिरायतदार होण्याची वेळ आली. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी मी व मंत्री राधाकृष्ण विखे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केली. शिवसेना उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ राहुरी तालुक्यातील मांजरी, टाकळीमियॉ, देवळालीप्रवरा व राहुरी फॅक्टरी येथे आयोजित जाहीर सभांमध्ये मुरकुटे बोलत होते. यावेळी लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मत धुमाळ, माजी सभापती सुनीता गायकवाड, अशोकचे संचालक अभिषेक खंडागळे, जि.प.सदस्य शरद नवले, उपसभापती बाळासाहेब तोरणे, गणेश भाकरे उपस्थित होते. मुरकुटे म्हणाले, राहुरी तालुक्यातील ३२ गावांमधील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. त्यासाठी आपल्या हक्काचा आणि सर्वसामान्य उमेदवार म्हणून कांबळे यांची निवड करण्यात आली. समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे या भागाचे वाटोळे झाले. उसाची शेती उदध्वस्त होऊन राहुरी कारखाना बंद पडला. त्याचा परिणाम देवळालीप्रवरा, राहुरी फॅक्टरी येथील बाजारपेठ ओस पडण्यात व कामगारांचे प्रपंचाची धूळधाण होण्यात झाला. विखे यांच्या प्रयत्नाने कारखाना सुरु झाला तरी पाटपाण्याच्या अशाश्वतेमुळे भवितव्य टांगणीवरच आहे. भाऊसाहेब कांबळे यांनी काँग्रेस उमेदवार लहू कानडेंवर टीका केली. विखे व मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली काम करू. आपल्यावर विरोधक टीका करत आहेत. मात्र आमदारकीच्या काळात आपण भरीव विकास कामे केली. विकासासाठीच आपण सेनेसोबत आलो असून, येथील नेत्यांची भक्कम साथ आहे, असे ते म्हणाले. यावेळी किसनराव बडाख, अच्युतराव बडाख, निवृत्ती बडाख, गणपतराव कोल्हे, नामदेव बडाख, लक्ष्मण बडाख, ज्ञानेश्वर बडाख, दीपक बडाख, जालिंदर बडाख, हरिभाऊ बडाख उपस्थित होते

बुलढाणा - 17 अक्तुबर, कासिम शेख
बुलढाणा जिला अंतर्गत के ग्राम धाड के एक 20 वर्षीय युवक कांग्रेस पार्टी की टी-शर्ट पहनकर एक पेड़ से फांसी लगाकर झूलता हुआ आज 17 अक्तुबर को नजर आने के बाद इलाके में खलबली मची हुई है बता दें कि 13 अक्टूबर को भी बुलढाणा जिले के ग्राम खातखेड़ में भी एक युवक ने भाजपा की टीशर्ट पहन कर आत्महत्या कर ली थी  मृतक युवक का नाम सतीश मोरे है जिसने चिखली विधानसभा निर्वाचन क्षेत्र से कांग्रेस प्रत्याशी राहुल बोंद्रे के समर्थन में तैयार की गई टी-शर्ट पहन रखी है जिस पर कांग्रेस का चुनावी निशान "पंजा" और "मी राहुल भाऊ समर्थक" (मैं राहुल भाऊ का समर्थक) ऐसा लिखा हुआ है. यह मामला प्रकाश में आने के बाद तत्काल पुलिस ने घटनास्थल पर पहुंचकर पंचनामा किया और शव को पोस्टमार्टम के लिए धाड़ के ग्रामीण अस्पताल में भेज दिया है. बता दे कि विगत 13 अक्तुबर को बुलढाणा जिले के जलगांव जामोद विधानसभा निर्वाचन क्षेत्र के ग्राम खातखेड़ निवासी राजू तलवारे ने भी एक पेड़ से फांसी लगाकर आत्महत्या कर ली थी और खास बात तो यह है कि इसी दिन राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इस घटनास्थल से कुछ किलोमीटर दूरी पर भाजपा प्रत्याशी डॉ. संजय कुटे कर प्रचार के लिए जनसभा को संबोधित करने के लिए आने वाले थे. प्राथमिक रूप से ये जानकारी सामने आई है कि,मृतक सतीश मोरे निजी कर्ज़ के बोझ तले दबे हुआ था जिस से वे काफी परेशान था.जो कल से घर निकला था पर रात भी घर नही लौटा और आज सुबह उसका शव पेड़ से लटका हुआ नजर आया.बुलढाणा जिले में पहेले भाजपा और अब कांग्रेस की टीशर्ट पहनकर आत्महत्या की इन दोनों घटनाओं से जिले भर के राजकीय माहौल में उबाल देखने को मिल रहा है.

बुलढाणा - 17 अक्तुबर, कासिम शेख
बुलढाणा जिला अंतर्गत के ग्राम धाड के एक 20 वर्षीय युवक कांग्रेस पार्टी की टी-शर्ट पहनकर एक पेड़ से फांसी लगाकर झूलता हुआ आज 17 अक्तुबर को नजर आने के बाद इलाके में खलबली मची हुई है बता दें कि 13 अक्टूबर को भी बुलढाणा जिले के ग्राम खातखेड़ में भी एक युवक ने भाजपा की टीशर्ट पहन कर आत्महत्या कर ली थी  मृतक युवक का नाम सतीश मोरे है जिसने चिखली विधानसभा निर्वाचन क्षेत्र से कांग्रेस प्रत्याशी राहुल बोंद्रे के समर्थन में तैयार की गई टी-शर्ट पहन रखी है जिस पर कांग्रेस का चुनावी निशान "पंजा" और "मी राहुल भाऊ समर्थक" (मैं राहुल भाऊ का समर्थक) ऐसा लिखा हुआ है. यह मामला प्रकाश में आने के बाद तत्काल पुलिस ने घटनास्थल पर पहुंचकर पंचनामा किया और शव को पोस्टमार्टम के लिए धाड़ के ग्रामीण अस्पताल में भेज दिया है. बता दे कि विगत 13 अक्तुबर को बुलढाणा जिले के जलगांव जामोद विधानसभा निर्वाचन क्षेत्र के ग्राम खातखेड़ निवासी राजू तलवारे ने भी एक पेड़ से फांसी लगाकर आत्महत्या कर ली थी और खास बात तो यह है कि इसी दिन राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इस घटनास्थल से कुछ किलोमीटर दूरी पर भाजपा प्रत्याशी डॉ. संजय कुटे कर प्रचार के लिए जनसभा को संबोधित करने के लिए आने वाले थे. प्राथमिक रूप से ये जानकारी सामने आई है कि,मृतक सतीश मोरे निजी कर्ज़ के बोझ तले दबे हुआ था जिस से वे काफी परेशान था.जो कल से घर निकला था पर रात भी घर नही लौटा और आज सुबह उसका शव पेड़ से लटका हुआ नजर आया.बुलढाणा जिले में पहेले भाजपा और अब कांग्रेस की टीशर्ट पहनकर आत्महत्या की इन दोनों घटनाओं से जिले भर के राजकीय माहौल में उबाल देखने को मिल रहा है.

अहमदनगर (प्रतिनिधी) कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला आरोपी शशिकांत उर्फ दादा भाऊराव गरड याला जिल्हा व सत्र न्यायालय, कोपरगाव यांच्या न्यायालयाने भादंवि कलम 376, अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक कायदा, पोक्सो कायद्यान्वये दोषी धरले असून त्याला भादंवि 376 नुसार 10 वर्षे शिक्षा व 5 हजार रुपये दंड, भादंवि कलम 506 नुसार 2 वर्षे शिक्षा व 2 हजार रुपये दंड, पोक्सो अन्वये 7 वर्षे शिक्षा व 2 हजार रुपये दंड तसेच अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक कायदा अन्वये जन्मठेप व 5 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.खडकी (ता. कोपरगाव) शिवरात 18 फेब्रुवारी 2018 रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शशिकांत उर्फ दादा भाऊराव गरड यांच्या विरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा सत्र न्यायालय क्रमांक 1 कोपरगाव यांच्या न्यायालयात सुनावणी पूर्ण होऊन आरोपीला वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील यांनी केला.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील वडाळा महादेव परिसरात दोन गटांत झालेल्या हाणामारीत व हवेत झालेल्या गोळीबार प्रकरणी दोन फिर्यादी दाखल झाल्या आहेत. यात एका गटातील आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर इतर आरोपी पसार झाले आहेत.मंगळवारी वडाळा महादेव परिसरात दोन गटांत हाणामारी होऊन हवेत गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पो.ना. सचिन कुमार रामदास बैसाणे यांनी दहा ते बारा अज्ञात आरोपींविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, 10 ते 12 अज्ञात आरोपी यांनी हातात दांडके, तलवार, गावठी कट्टा घेऊन बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करत होते. आम्ही त्यांना थांबा म्हणूनही जमावातील इसम दुसर्‍या जमावातील इसमावर गावठी कट्ट्याने ठार मारण्याच्या उद्देशाने राउंड फायर केला. त्यानुसार पोलिसांनी बाबासाहेब छेदीदास जाधव (वय 26), प्रकाश बाळासाहेब रणवरे (वय 24), विजय किशोर मैड (वय-28), सोमनाथ बापू चितळे (वय-24), मनोज यशवंत पवार (वय-24), रितेश खंडू जाधव (वय-21) (सर्व रा. टाकळीभान) तर तन्वीर सलीम शेख (वय-23, मिरावली पहाड रोड नगर), प्रशांत रंगनाथ नागले (वय-27, रा. घोगरगाव) या आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे.आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर (एम. एच. 17 बी. क्यू. 972), विनानंबरची बुलेट, बजाज प्लॅटिना एम. एच. 17 बी. आर. 7641), हिरो एच. एफ. डिलक्स (एम. एच. 17 सिडी 3337), विना नंबरची यामाहा यासह गुन्ह्यात वापरलेली हत्यारे ताब्यात घेतली आहेत. याबाबत पुढील तपास सपोनि पाटील करीत आहेत. दुसरी फिर्याद सोमनाथ बापू चितळे (वय 24, रा.इंदिरानगर टाकळीभान ता.श्रीरामपूर) यांनी तुषार पवार, प्रकाश माळी, सागर पठाडे (रा.टाकळीभान) व इतर 6 जणांविरुद्ध दिली आहे. त्यात म्हटले आहे अक्षता मंगल कार्यालय वडाळा महादेव येथे आपल्या गावातील प्रशांत नागले, प्रकाश रन्नवरे, मनोज पवार, बाळासाहेब जाधव, रितेश जाधव, विजय मैड व तनवीर शेख यांच्या सोबत थांबलेलो होतो. कबड्डी ग्रुपचा कुणाल पवार याचे काही मुलांसोबत भांडणे झाली होती.त्या भांडणाच्या कारणावरून तुषार पवार, प्रकाश माळी, सागर पठाडे व त्यांच्या सोबत इतर 6 मुलांनी मोटारसायकलवरून पिस्तुल व तलवारीसह ट्रिपलसीट येऊन आमच्या दिशेने गोळीबार करून तलवारी दाखवून दहशत निर्माण केली. तसेच एका घराच्या दरवाजावर वार केले. त्यानुसार पोलिसांनी फिर्याद दाखल केली असून हे सर्व आरोपी पसार झाले आहेत. या गुन्ह्याचा तपास सपोनि पाटील करीत आहेत.


श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहर पोलीस स्टेशन विधानसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यामध्ये असून निवडणूक प्रक्रीया शांततेत व सुरळीतपणे पार पडावी म्हणून ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, अशा सुमारे 45 जणांवर सीआरपीसी 144 प्रमाणे हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.जिल्हा पोलीस प्रमुख ईशू सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी तालुका बंदी हद्दपारीची कारवाई केली आहे. यामध्ये अर्जुन खुशाल दाभाडे (रा. गोंधवणी, वॉर्ड नं. 1) सागर श्रावण भोसले (रा.दत्तनगर, ता.श्रीरामपूर), नाना बाळू गुंजाळ (रा.उक्कलगाव), विजय उर्फ दुर्गेश कचरुलाल जैस्वाल (रा. वॉर्ड नं.6, सुभाष कॉलनी), सचिन उर्फ गुड्डु रामअकबल यादव (रा. वॉर्ड नं. 6, डावखऱ रोड), सचिन सुभाष बाकलीवाल (रा. वॉर्ड नं.1, आदर्शनगर), जिशान फारुक शेख (रा. वॉर्ड नं.7, बेलापूररोड), शोएब सत्तार शेख (रा. वॉर्ड नं.1, फातेमा हौ.सोसायटी), प्रकाश शिवाजी रन्नवरे (रा.वॉर्ड नं.1), फैय्याज नासीर कुरेशी उर्फ नल्ला (रा. वॉर्ड नं.1, मिल्लतनगर), मोहसीन रफिक शेख (रा. वॉर्ड नं. 4, नॉर्दनब्रँच चुना भट्टी), अमोल गोपाळ नानुस्कर (रा. वॉर्ड नं. 6, डावखऱरोड), प्रकाश अरुण चित्ते (रा. वॉर्ड नं.1, गोपाळनगर), शाहरुख अफसर शेख (रा. सुभाष कॉलनी, वॉर्ड नं.6), सचिन लक्ष्मण सोनवणे (रा.गोंधवणी रोड, वॉर्ड नं.1), शुभम बबन शेळके (रा.गोंधवणी, वॉर्ड नं.1), करण मिथुन शेळके (रा.गोंधवणी), दीपक अशोक परदेशी (रा.वॉर्ड नं.5), गणपत कुंडलिक गांगुर्डे (रा.वडाळा महादेव), अजय पांडुरंग शिंदे (रा.दत्तनगर), दत्तात्रय जगन्नाथ जाधव (रा.शिरसगाव), दीपक बाळासाहेब चव्हाण (रा. वॉर्ड नं. 3), कुणाल विजय कारंडे (रा. वॉर्ड नं.5, गिरमे बिल्डींग मेनरोड), संदीप विजय वाघमारे (रा.खंडाळा), योगेश कारभारी त्रिभुवन (रा.टिळकनगर), मोहन भगवान आव्हाड (रा.सूतगिरणी रोड), राजेंद्र पुंडलिक भालेराव (रा.निपाणी वडगाव,), आसिफ दाऊद तांबोळी उर्फ आसिफ रिक्षावाला (रा- वॉर्ड नं.2, बाबरपुराचौक), आदिल मकदुम हुसैन शेख (रा. वॉर्ड नं. 2, वेस्टर्न रेसिडन्सी), शेख सलिम मोहम्मद अब्दुल सत्तार जहागिरदार उर्फ सलिम जहागिरदार (रा. वॉर्ड नं.2, गुलशन चौक), फिरोज हबीब पोपटीया (रा. वॉर्ड नं.2), अमजद हबीब पोपटीया (रा. वॉर्ड नं.2), शरीफ लतिफ शेख (रा. वॉर्ड नं.2, बजरंगचौक), अमन आयुब शेख (रा. वॉर्ड नं.2), जुनेद बाबा शेख (रा. वॉर्ड नं. 2), अल्तमश युनूस शेख (रा. वॉर्ड नं.2, सुभेदारवस्ती), संजय दानबहादूर यादव (रा.अहिल्यादेवीनगर वॉर्ड नं.2), रईस अब्दुलगणी शेख जहागिरदार (रा. वॉर्ड नं.2, जहागिरदार बिल्डींग), मुजम्मिल हारुण बागवान (रा. वॉर्ड नं.2, सुभेदारवस्ती), आशु ऊर्फ आसिफ लियाकत पठाण (रा. वॉर्ड नं.2, पाण्याचे टाकीजवळ), हुजैफ युनुस शेख जमादार (रा. वॉर्ड नं.2, काझीबाबारोड), गुलाब नबाबगणी कुरेशी (रा. वार्ड नं.2, सुभेदारवस्ती), अकिल शरीफ कुरेशी (वॉर्ड नं.2), आसिफ मुश्ताक शेख (वॉर्ड नं.2), बबलु दिलीप शेळके (रा. गोंधवणी) आदींचा समावेश आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी) आधी मटण खाऊ घातले. मटण खाल्ले नाही याचाच राग आल्याने दोघांनी गुंडेगावातील एकाला पेट्रोल टाकून जाळले. यामध्ये ती व्यक्ती जखमी झाली असून त्याला नगरच्या सिव्हिल रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संजय पोपट जाधव (वय- 48 रा. गुंडेगाव ता. नगर) असे जखमीचे नाव आहे. त्याने दिलेल्या जबाबावरुन बापू एकनाथ हराळ व ज्ञानदेव उत्तम कुसळकर या दोघांवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोमवारी (दि. 14) सकाळी संजय जाधवला आरोपीने घरी मटण खाण्यासाठी बोलावून घेतले. जाधव याची इच्छा नसतानाही मटण खाण्यास भाग पाडले. नंतर नकार दिल्याने गावातील रामेश्वर मंगल कार्यालयात आणून दोघांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली. बापू हराळ याने धारदार शस्त्राने वार केले व पेट्रोल टाकून पेटवून दिले. यामध्ये संजय जाधव हे भाजलेले असल्याने त्यांना उपचारासाठी नगरच्या सिव्हिल रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यांनी दिलेल्या जबाबावरुन नगर तालुका पोलीसांनी बापू एकनाथ हराळ व ज्ञानदेव उत्तम कुसळकर यांच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राऊत करत आहेत.

अहमदनगर (प्रतिनिधी)-बनावट चलन आणि दस्तावेज तयार करून जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्या कामासाठी डांबराचे एकच चलन अनेक कामांना दाखवून लाखो रुपयांची आर्थिक लूट केल्याचे प्रकरण जिल्हा परिषदेत उजेडात आले आहे. हा प्रकार एकाच कंत्राटदाराने केला असून अन्य कंत्राटदार आणि कामांमध्येही असा प्रकार झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने अन्य सर्वच कंत्राटदार आणि कामे तपासण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्हा परिषदेतील डांबर घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त आहे.जिल्हा परिषदेत श्रीरामपूर येथील ठेकेदार जुनेद शेख याने बनावट दस्तावेज आणि चलनाच्या आधारे सरकारची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार अशोक मुंडे यांनी केली होती. या तक्रारीच्या आधारे जिल्हा परिषद प्रशासनाने तपासणी केल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. यात संबंधित ठेकदाराने केलेल्या संगमनेरच्या कामात 229.65 आणि जिल्हा परिषदेकडील कामात 44.64 मेट्रिक टन अशी 274.29 मेट्रिक टनाची तफावत दिसत आहे.
शेख यांनी वेगवेगळ्या रस्त्यांच्या कामात एकाच डांबर खरेदीच्या चलनाचा वापर करून 60 ते 65 लाख रुपयांची शासनाची फसवणूक केली असल्याचा ठपका जिल्हा परिषदेच्या प्राथमिक चौकशी समितीने ठेवला आहे. शेख याने संगमनेर बांधकाम विभागांतर्गत हरेगाव-उंदिरगाव-नाऊर रस्ता, खंडाळा-श्रीरामपूर-नेवासा रस्ता, भामाठाण ते माळवडगाव रस्ता, टाकळीभान ते मुठेवडगाव रस्ता, वळदगाव-निपाणी-वडगाव-टाकळीभान-घोगरगाव रस्ता, खंडाळा-श्रीरामपूर -नेवासा रस्ता हे बिल पाच वेळा, तर जिल्हा परिषदेच्या बांधकाम उत्तर विभागातील गोंडेगाव-उंदिरगाव-खानापूर रस्ता, मालुंजा मातापूर रस्ता, उंबरगाव-मातापूर-कारेगाव-भोकर-मुठेवडगाव- ब्राम्हणगाव- खैरीनिमगाव ते जाफ्राबाद रस्ता, माळेगाव-सराला ते जिल्हा परिषद हद्द रस्ता, गोंडेगाव-उंदीरगाव ते खानापूर रस्ता, टाकळीभान-गुजरवाडी-वांगी रस्ता, मालुंजा-मातापूर ते राष्ट्रीय मार्ग रस्ता, उंबरगाव-मातापूर-कारेगाव-भोकर-मुठेवडगाव-ब्राम्हणगाव-खैरी निमगाव ते जाफ्रारबाद रस्ता, माळेवाडी-सराला ते जिल्हा परिषद हद्द रस्ता, मालुंजा-मातापूर ते राष्ट्रीय मार्ग रस्ता, उंबरगाव-मातापूर-कारेगाव-भोकर-मुठेवडगाव-ब्राम्हणगाव खैरीनिमगाव ते जाफ्राबाद रस्ता, निमगाव खैरी ते दिघी मार्ग, खंडाळा-उक्कलगाव रस्ता, गोगलगाव ते पिंप्री निर्मळ-वाकडी ते चितळी रस्ता, उंदीरगाव ते भालदंड रस्ता, ब्राम्हणगाव वेताळ ते शिरसगाव रस्ता, पुणतांबा ते पुरणगाव रस्ता, खंडाळा येथील मंदिर रस्ता, गोंधवणी-रांजणी शिवरस्ता, उंबरगाव-अशोकनगर कारखान्याकडील भोसले वस्ती रस्ता, गोगलगाव ते पिंप्री निर्मळ-वाकडी रस्ता, शिरसगाव ते ब्राम्हणगाव रस्ता आदी रस्त्यांची कामे केली असून या कामांमध्ये डांबराच्या बनावट चलनाचा वापर केला असल्याचा ठपका ठेवला आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने निविदा समितीला विश्वासात न घेता परस्पर 8 कोटी 18 लाखांच्या बंधार्‍यांच्या कामाला मान्यता दिली आहे. हा प्रकार गेल्या महिन्यांत दै. सार्वमतने ‘जिल्हा परिषदेत ई-टेंडर घोटाळा’ या आशयाचे वृत्त छापल्यानंतर समोर आला. जिल्हा परिषद प्रशासनाने त्यावेळी बांधकाम विभाग आणि लघु पाटबंधारे विभागातील 10 लाखांच्या आतील कामे तपासण्याचा निर्णय घेतल्यानंतर 140 बंधार्‍यांच्या कामांना परस्पर मान्यता दिल्याचे समोर आले आहे.जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात उत्तर आणि दक्षिण असे स्वतंत्र विभाग आहेत. यासह लघु पाटबंधारे हा देखील स्वतंत्र विभाग आहे. या विभागाला रस्त्यांची अथवा बंधार्‍यांची कामे करताना 19 ऑक्टोबर 2011 च्या शासन निर्णयानुसार कामे मंजूर करण्यापूर्वी निविदा समितीची (टेंडर कमिटी) मान्यता घेणे आवश्यक असते. या समितीमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचा मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांचा समावेश असतो. संबंधित विभागाचा कार्यालयीन प्रमुख हा समितीचा सचिव असतो. या समितीची बैठक होऊन त्यात कामांना मंजुरी देण्यात येतात आणि त्यानंतर संबंधित कामे करण्यात येतात.लघू पाटबंधारे विभागाने शासनाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब न करता परस्पर दहा लाख रुपयांच्या आतील कामे मंजूर केली आहेत. हा प्रकार अनेक दिवसांपासून लपून होता. मात्र, गत महिन्यांत 20 सप्टेंबरला सार्वमतने जिल्हा परिषदेतील ई-निविदा प्रक्रियेत घोटाळा असल्याचे वृत्त दिले. त्यानंतर प्रशासनाने तातडीने बांधकाम आणि लघु पाटबंधारे विभागाच्या ई-निविदा तपासल्या असता 140 कामांच्या निविदा परस्पर मंजूर केल्याचे उघड झाले. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाने लघू पाटबंधारे विभागाला मंगळवारी नोटीस दिली असून दोन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी त्यावेळी लघु पाटबंधारे विभागाला नोटीस देण्यात आली होती. त्या नोटीसला उत्तर देतांना संबंधित विभागाने जलयुक्त शिवार योजना ही मुख्यमंत्री यांची महत्वकांक्षी योजना असून कामे जलद पद्धतीने व्हावीत, तसेच तोंडी सूचना आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी खातेप्रमुखांना निविदा नस्ती मार्किंग केल्यामुळे या 140 कामांना कार्यारंभ आदेश दिला असल्याचे मान्य केले आहे.

गावठी कट्टा, तलवार व लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आल्याने या भागात काहीकाळ तणावाची परिस्थिती 
वडाळा महादेव (वार्ताहार)-श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव परिसरात कबड्डी खेळात झालेल्या किरकोळ वादावरून टाकळीभान, पाचेगाव व श्रीरामपूरमधील तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. यामध्ये गावठी कट्टा, तलवार व लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आल्याने या भागात काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. रात्री उशिरापर्यंत या तरुणांचा शोध पोलीस घेत होते. नेवासा रोडवरील कॉलेज परिसरामध्ये काल दुपारी साडेतीनच्या दरम्यान दोन गटांमध्ये किरकोळ वादातून दगडफेक झाली.त्यानंतर काही तरुण श्रीरामपूरच्या दिशेने मोटारसायकलवरून निघाले व त्यांचा पाठलाग करत वडाळा महादेव येथील नेवासा रोडवरील मंगल कार्यालय परिसरात आले. यावेळी पुन्हा तरुणांमध्ये दगडफेक सुरू झाली. याचवेळी श्रीरामपूरच्या दिशेने मोटारसायकलवर काही तरुण हत्यारासह आल्याने त्यांनी गावठी कट्ट्यामधून दोन ते तीन फैरी झाडल्या तसेच तलवारीचा धाक दाखवत परिसरात दहशत निर्माण करत तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.या घटने दरम्यान परिसरामध्ये असलेल्या व्यावसायिकांना काय चाललय काहीच कळेना त्यामुळे येथील एक तरूण घराबाहेर येऊन उभा राहिला. त्यावेळी त्याच्या दिशेने दोन तरुण तलवारी व गावठी कट्टा घेऊन मागे लागल्याने त्याने घरी जाऊन दरवाजा बंद करून घेतला. यावेळी त्याच्या दरवाजावर तलवारीने वार केले व पळताना त्याच्या दिशेने फायर केला. सुदैवाने हा तरुण घरात असल्याने तो बचावला.यावेळी काही तरुण रोडवरील हार्डवेअर दुकानांमधून विक्रीस ठेवलेले दांडके घेऊन पळाले. घटनेच्या दरम्यान अग्रवाल मंगल कार्यालयासमोर निवडणूक बंदोबस्तासाठी शासकीय अधिकारी तसेच पोलीस अधिकारी नेमणुकीस असल्याने गावठी पिस्तुलामधून निघालेला आवाज ऐकल्याने त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. दंगा करणार्‍या तरुणांनी पोलिसांना पाहताच मिळेल तिकडे रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला. काही तरुण मोटारसायकली सोडून अशोकनगरच्या दिशेने पळाले व बाकीचे कार्यालयाच्या बाजूने पळाले.घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट हे पथकासह तात्काळ दाखल होत घटनेतील तरुणांची शोधमोहीम करण्यासाठी पथक नेमून टाकळीभान तसेच अशोकनगर परिसर येथे रवाना केले. या तरुणांच्या मोटारसायकली रोडवर उभ्या असल्याने त्यावरून तरुणांची माहिती घेण्यात आली.वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, सुनील दिघे, पंकज गोसावी, पानसंबळ, लोंढे, अमोल गायकवाड, जोसेफ साळवी, शैलेंद्र सगळगिळे, पो.ना. रवींद्र उघडे, गृहरक्षक दलाचे देसाई, आर. बी. कदम आदी पोलीस कर्मचारी तरुणांचा शोध घेत आहेत.याबाबत काही तरुणांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) श्रीरामपूर नगरपालिकेच्या भुयारी गटारच्या 14 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणाचा तपास शहर पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखा, अहमदनगरकडे वर्ग करण्यात आला आहे.मोरया फाउंडेशनचे केतन खोरे यांनी गेल्या अडीच वर्षांपासून भुयारी गटार प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने सात जणांविरुद्ध तब्बल 14 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यांनतर जिल्हा सत्र न्यायालय, श्रीरामपूरला सहा जणांनी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून याचिका दाखल केली, मात्र न्यायालयाने सर्वांच्या याचिका फेटाळल्या.दरम्यान, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, आर्थिक अपहराची उकल करणे महत्त्वाचे असल्याने सदर तपास श्रीरामपूर शहर पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास होण्यासाठी फिर्यादी केतन खोरे यांना संबंधित कागदपत्रांसह पोलीस अधीक्षक कार्यालय, अहमदनगर येथे बोलाविण्यात आले होते. खोरे यांनी भुयारीचा तपास करणार्‍या पोलीस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांची भेट घेत सविस्तर माहिती दिल्याचे समजते


बुलडाणा - 15 ऑक्टोबर
विदर्भची पंढरी म्हणून ओळखल्या जाणारे बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील गजानन महाराज संस्थानचे पर्यटनस्थळ "आनंदसागर" बंद पाडण्यात भाजपा सरकार कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप गजानन महाराज संस्थान विश्वास्थांच्या कुटुंबातील सदस्य व खामगांव मतदार संघातुन काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांनी केला आहे.
     
शेगावात देश भरातून हजारो-लाखो भाविक येतात.गजानन महाराज यांच्या मंदिरावर नतमस्तक होवून भक्तगण शहरा नजीक संस्थान कडून बाँधण्यात आलेले पर्यटन स्थळ "आनंदसागर" ला आवर्जून भेट देतात.मागील काही माहिन्यापासून संस्थान कडून "आनंदसागर" बंद कण्यात आले आहे.हे पर्यटनस्थळ का बंद कण्यात आले? या विषयावर संस्थान किंवा विश्वस्त मंडळ किंवा त्यांच्या परिवाराकडून कधीच भाष्य कण्यात आले नाही,मात्र ऐका सभेत याचे कारण समोर आले आहे.ते असे की,
गजानन महाराज संस्थान परिवारातील सदस्य ज्ञानेश्वर पाटील हे खामगाव विधानसभा मतदार संघातुन काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत.ते आपल्या मतदार संघातील माटरगाव येथे प्रचार सभेत बोलत होते, संत गजानन महाराज संस्थान कडून साकारलेले "आनंदसागर" हे देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी आकर्षक पर्यटन स्थळ बनले होते, मात्र हे पर्यटन स्थळ आता बंद पडले आहे याला कारणीभूत भाजपा सरकार असल्याचा खळबळजनक आरोप ज्ञानेश्वर पाटील यांनी भरसभेत केला आहे व या भाषणाचा वीडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. शेगांवचे पर्यटन स्थळ "आनंदसागर" बंद पडल्याने वेगवेगळ्या व्यावसायिकांवर याचा परिणाम झालाय पर्यटकांचा,भाविकांचा हिरमोड झालाय.खामगांव मतदार संघातील माटरगांवला लागून जळगाव जामोद मतदार संघातील काही गावे आहेत व भाजपाला मतदान करू नये यासाठी हा गौप्यस्फोट कण्यात आला. गेल्या पंधरा वर्षांपासून जळगाव जामोद मतदार संघात डॉ.संजय कुटे आमदार आहेत व नव्याने विस्तारित राज्याचे मंत्री मंडळात डॉ. कुटे यांना कामगार मंत्री पद देण्यात आले आहे.

बुलढाणा - 14 अक्तुबर
बुलढाणा जिले के धार्मिक स्थल सैलानी में वन ज़मीन पर कई लोग अतिक्रमण कर अवैध रूप से झुग्गी-झोपड़ी बनाकर रहनेवाले लोगो का अतिक्रमण जेसीबी की मदद से वनविभाग ने हटाया हटाना शुरू कर दिया है.
       बुलडाणा तहसील के ग्राम पिंपलगांव सराय से करीब में हाजी हज़रत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा की दरगाह है जहां पर देश भर से लाखों भाविक सैलानी बाबा के मज़ार पर अकीदत की चादर चढाने के लिए आते है.दरगाह के अतराफ़ में पहाड़ियां है और ये वनज़मीन है.लोगो की श्रद्धा है कि सैलानी बाबा की दरगाह पर हाजिरी देने से करनी- कौटाल,जादू-टोना,भुत-प्रेत व अन्य प्रकार के रोगों से मुक्ति मिलती है. अधिकांश लोग इसी उपचार के लिए यहां आने के बाद अपने रुकने के लिए वनज़मीन पर झोपड़ी बनाकर रहते और फिर ज़मीन पर कब्ज़ा कर लेते.उपचार के नाम पर सैलानी में रहनेवाले कई बाहरी लोग राज्य में आपराधिक घटनाओं को अंजाम देकर सैलानी में आ कर इन्ही झोपड़ियों में रहेकर पुलिस की नज़र से बचते है.यही आपराधिक
गतिविधियों में लिप्त लोग जिले भर में मोबाइल व अन्य चोरियों की घटनाओं को अंजाम देते जिसके कारण सैलानी के मूल निवासियों को भी दिक्कत उठानी पड़ती है.इतना ही नही वनजमीन पर अतिक्रमण कर कुछ लोग यहां अवैध शराब भी बेचते है.इन सभी बातों को ध्यान में रखते हुए डीएफओ संजय माली ने सैलानी के 500 से अधिक अतिक्रमण धारकों को वनभूमि से अतिक्रमण हटाने का नोटिस जारी किया और फिर 11 अक्तुबर से जेसीबी की सहायता से अतिक्रमण हटाने का काम प्रत्यक्ष रूप से शुरू कर दिया है.बुलढाणा डीएफओ संजय माली,एसीएफ गायकवाड़,बुलढाणा आरएफओ गणेश टेकाले खुद अपनी उपस्तिथि में अतिक्रमण हटाने के लिए दिशा निर्देश दे रहे है.इस काम मे कोई बाधा ना आये इसके लिए पुलिस व एसआरपी भी तैनात है जबकि जिले भर के वनकर्मी सैलानी में अतिक्रमण हटाने में जुटे हुए है.वनविभाग के इस कड़े कदम से सैलानी भक्त और स्थानिक अनेक नागरिकों ने वनविभाग के इस अच्छे काम का समर्थन किया है जबकि निजी ज़मीन धारकों को किसी प्रकार की परेशानी ना हो इसका भी वनविभाग ध्यान दे,ऐसी अपेक्षा भी व्यक्त की है.

भारतीय जनता पार्टी  शिवसेना व मित्र पक्षाचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांचा आज शिर्डी परिसरात मोठया उत्साहाने प्रचाराचा शुभारंभ करण्यात आले विविध ठिकानि विविध नगरात प्रचार फेरी निघाली बिरोबा बनात   रतिलाल लोढ़ा यांचा मार्गदर्शना ख़ाली प्रचाराचे शुभारंभ झाले बिरोबा मंदिरात छोटे खानी सभा झाली त्यात अनेक मान्यवरान्नी आपापले मनोगत व्यक्त केले प्रचार शुभारंग प्रसंगी मार्गदर्शन रतिलाल लोढ़ा तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्वोसर्व राजेंद्र गोंदकर न्यानेश्वर गोंदकर दिगंबर क़ोते हरिभाऊ गोंदकर अभय शेडके नगराद्यक्षा अर्चनाताई क़ोते प्रतापराव जगताप शिवाजी गोंदकर मधुकरराव क़ोते मनोज लोढ़ा सर्जेराव काटकर विलास वाघ कविताताइ निकम बाबासाहेब गोंदकर साहेबराव काटकर साहेबराव काटकर नानासाहेब काटकर बालासाहेब काटकर ठकाजी काटकर वसंतराव शेडके विजय कोते भास्कर क़ोते विलास गोंदकर अशोक वाघ दिनुमामा क़ोते अरविंद क़ोते यादव क़ोते आबासाहेब क़ोते चांगदेव बनकर नामदेव बनकर राजेंद्र वाघ अदि मान्यवर उपस्तिथ होते

शिर्डी ः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थात आबाधीत राहण्यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असता, या दरम्यान, शोध मोहिम सुरु असताना गावठी पिस्तुलसह दोघांना पकडण्यात शिर्डी पोलिसांना यश आले आहे. अक्षय सुधाकर थोरात (वय22 रा. जवळके, ता.कोपरगाव ह.रा. वाघवस्तीरोड, शिर्डी ता.राहाता), पवन सुभाष भोत (वय 22 रा. क्रांतीचौक, निमगाव ता.राहाता) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
 याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे  यांना शिर्डी परिसरात अक्षय सुधाकर थोरात याचेकडे गावठी पिस्टल आहे, अशी गोपनिय पक्की माहिती मिळाली होती. त्यानुसार थोरात याच्या राहत्या घराचे जवळ सापळा लावून अक्षय थोरात व पवन भोत याच्यासह एक अल्पवयीन सहकार्यास 1000 रुम परिसराच्यामागे संशयरित्या फिरताना पकडले. यावेळी त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचेकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. अधिक चौकशी केली असता, अक्षय थोरात याने गावठी पिस्टल शिरपूर जि.धुळे येथून खरेदी केल्याचे सांगितले. याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात गु.रं.न. 947/2019 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला. आरोपींना अटक करून पुढील तपासासाठी स.पो.नि.मिथुन घुगे यांच्या पथकाच्या ताब्यात दिले आहे.
 जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधु, श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक डॉ.दिपाली काळे, शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. दीपक गांधले, गुन्हे शोध पथकाचे स.पो.नि. मिथुन घुगे, पोह. प्रसाद साळवे, पोना बाबा सातपुते, पोना किरण कुर्‍हे, पोशि अजय अंधारे, नितीन सानप आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.   

धोत्रा येथे प्रचाराचा शुभारंभ करताना अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांचे प्रतिपादन
सिल्लोडदि.८ (प्रतिनिधी) ज्या लोकांना आतापर्यंत साथ दिलीत त्यांनी धोका देण्याचे काम करून राजकारणाचा धंदा केला दडपशाहीच्या पैशाच्या जोरावर सामान्य लोकांना त्रास देण्याचे काम केले, अशा लोकांना जनताच यावेळी घरी बसवणार आणि सिल्लोड तालुक्यात परिवर्तन घडणवणार असे प्रतिपादन अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांनी केले यावेळी त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ हभप कापरसिंग दादा वांजोळा ह भ प भगवान महाराज जंजाळ ह भ प ज्ञानेश्वर महाराज शेलुदकर ह भ प संतोष महाराज आढावणे ह भ प भगवान महाराज ह भ प पंढरीनाथ महाराज दळवी दिगंबर महाराज, कमलाकर बाबा सुभानपुरकर रघुनाथ महाराज भुतेकर, यांच्या हस्ते श्री क्षेत्र धोत्रा येथे करण्यात आला यावेळी सुरेश बनकर रंगनाथ काळे माजी आमदार सांडू पाटील लोखंडे ज्ञानेश्वर मोठे श्रीराम महाजन सुनील मिरकर इद्रीस मुलतानी दिलीप दानेकर राजेंद्र जैस्वाल, श्रीरंग साळवे अशोक गरुड ठगन भागवत ओबीसी नेते दादाराव आळणे विजय दौड सुभाष मानकर पुष्पाताई काळे अरुण काळे ज्ञानेश्वर तायडे जयप्रकाश चव्हाण राहुल ताठे मारोती वराडे यांची प्रमुख उपस्थिती होती
[ ] यावेळी बोलताना पालोदकर म्हणाले की सर्वांनी या अन्यायाविरुद्ध एकत्र येण्याचा निर्णय घेतला प्रत्येकाने स्वतः उमेदवार समजून या निवडणुकीला समोरे जाऊया झुंडशाहीचा नाश करण्यासाठी मी राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी नाकारली, आपल्या सर्वांच्या पाठबळाने अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेतला गेल्या दहा वर्षांमध्ये केवळ उद्घाटन केली आहे मात्र कामे झाले नाही माणिकदादा पालोदकर यांनी उभे केलेले सहकारी संस्थाने बंद पडण्याचे काम केले, एकही संस्था दहा वर्षात त्यांना उभी करता आली नाही सतत खोटे बोलून खोटी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करून मते घेतली यावेळेस जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नसून आपण सर्वांनी सिल्लोडमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज राहावे , केवळ मतासाठी हिंदुत्ववादी पक्षात प्रवेश करणे पसंत केले परंतु जनता वेडी नाही हा माणूस कसा आहे हे सगळ्यांना माहीत आहे, त्यांचे सगळे गैरव्यवहार बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही मर्दाची अवलाद असेल तर तालुक्यात एकदा फिरून दाखवा वाघाचे कातडे पांघरलेला हा नौटंकी वाघ आहे, मुस्लिम समाजाच्या मालमत्ता हडपण्याचे काम केले त्यांनाही आता बदल हवा आहे त्याच्या उमेदवारीमुळे जिल्ह्यातील सर्वच शिवसेना उमेदवार धोक्यात आले आहेत दिवस संपत आले आहेत या परिवर्तनासाठी आमच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन पालोदकर यांनी केले

• तालुक्याचा विकास झाला नाही मात्र आमदाराचा कसा विकास झाला लोकांच्या मालमत्ता परत करण्याचे काम केले वेगवेगळ्या अफवा पसरवण्यात येतील त्याला बळी पडू नका :- ज्ञानेश्वर मोठे
• बदल अटळ आहे अंमलबजावणीसाठी सर्वांनी झटावे दोन्ही तालुके दहशत मुक्त करायचे आहेत :- माजी आमदार सांडू पाटील लोखंडे
• गेली दहा वर्ष आमदारकी भोगली मात्र विकास झाला नाही फक्त घोषणा केल्या राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही नेत्यांना त्याचे श्रेय घेण्यासाठी त्याची धडपड सुरू आहेत आम्ही सर्व त्याग करायला तयार आहे तुम्ही तयारी ठेवली पाहिजे :-सुरेश बनकर
यावेळी गजानन राऊत सुनील काकडे, गणेश बनकर विनोद मंडलेचा अशोक तायडे,संजय डमाळे, नारायण बडक, भीमराव काळे सुनील काळे सुभाष गव्हाणे बंडू काळे रमेश चिंचपुरे, कैलास काळे शिवाजी बुधाळ, गणेश लोखंडे, पुंडलिक लोखंडे, मेघराज चोडिये, श्रीरंग लोखंडे, कैलास जंजाळ, प्रभाकर सुरडकर, कृशीवर्ता बडक, किरण पवार, गोविंदराव भोजने, विजय मंडलेच्या, लुकमान सेठ विष्णू काटकर, गंगाबाई ताठे, वृषाली मिरकर, कौतिक बडक सुनील काकडे, पुडलिक मोरे, काशिनाथ जंजाळ, नारायण जाधव, संजय जामकर, काशिनाथ पांडव,चरणसिंग नाईक, राजेंद्र आहिरे, लेखराज उपाध्याय पुंजाराम गरुड देविदास आमटे पोपटराव कुंटे अनिस सय्यद शेख अमन महेश शंकरपल्ली यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते हजारो संख्येने उपस्थित होते

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget