सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील जनताच परिवर्तन घडवणार,

धोत्रा येथे प्रचाराचा शुभारंभ करताना अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांचे प्रतिपादन
सिल्लोडदि.८ (प्रतिनिधी) ज्या लोकांना आतापर्यंत साथ दिलीत त्यांनी धोका देण्याचे काम करून राजकारणाचा धंदा केला दडपशाहीच्या पैशाच्या जोरावर सामान्य लोकांना त्रास देण्याचे काम केले, अशा लोकांना जनताच यावेळी घरी बसवणार आणि सिल्लोड तालुक्यात परिवर्तन घडणवणार असे प्रतिपादन अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांनी केले यावेळी त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ हभप कापरसिंग दादा वांजोळा ह भ प भगवान महाराज जंजाळ ह भ प ज्ञानेश्वर महाराज शेलुदकर ह भ प संतोष महाराज आढावणे ह भ प भगवान महाराज ह भ प पंढरीनाथ महाराज दळवी दिगंबर महाराज, कमलाकर बाबा सुभानपुरकर रघुनाथ महाराज भुतेकर, यांच्या हस्ते श्री क्षेत्र धोत्रा येथे करण्यात आला यावेळी सुरेश बनकर रंगनाथ काळे माजी आमदार सांडू पाटील लोखंडे ज्ञानेश्वर मोठे श्रीराम महाजन सुनील मिरकर इद्रीस मुलतानी दिलीप दानेकर राजेंद्र जैस्वाल, श्रीरंग साळवे अशोक गरुड ठगन भागवत ओबीसी नेते दादाराव आळणे विजय दौड सुभाष मानकर पुष्पाताई काळे अरुण काळे ज्ञानेश्वर तायडे जयप्रकाश चव्हाण राहुल ताठे मारोती वराडे यांची प्रमुख उपस्थिती होती
[ ] यावेळी बोलताना पालोदकर म्हणाले की सर्वांनी या अन्यायाविरुद्ध एकत्र येण्याचा निर्णय घेतला प्रत्येकाने स्वतः उमेदवार समजून या निवडणुकीला समोरे जाऊया झुंडशाहीचा नाश करण्यासाठी मी राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी नाकारली, आपल्या सर्वांच्या पाठबळाने अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेतला गेल्या दहा वर्षांमध्ये केवळ उद्घाटन केली आहे मात्र कामे झाले नाही माणिकदादा पालोदकर यांनी उभे केलेले सहकारी संस्थाने बंद पडण्याचे काम केले, एकही संस्था दहा वर्षात त्यांना उभी करता आली नाही सतत खोटे बोलून खोटी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करून मते घेतली यावेळेस जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नसून आपण सर्वांनी सिल्लोडमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज राहावे , केवळ मतासाठी हिंदुत्ववादी पक्षात प्रवेश करणे पसंत केले परंतु जनता वेडी नाही हा माणूस कसा आहे हे सगळ्यांना माहीत आहे, त्यांचे सगळे गैरव्यवहार बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही मर्दाची अवलाद असेल तर तालुक्यात एकदा फिरून दाखवा वाघाचे कातडे पांघरलेला हा नौटंकी वाघ आहे, मुस्लिम समाजाच्या मालमत्ता हडपण्याचे काम केले त्यांनाही आता बदल हवा आहे त्याच्या उमेदवारीमुळे जिल्ह्यातील सर्वच शिवसेना उमेदवार धोक्यात आले आहेत दिवस संपत आले आहेत या परिवर्तनासाठी आमच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन पालोदकर यांनी केले

• तालुक्याचा विकास झाला नाही मात्र आमदाराचा कसा विकास झाला लोकांच्या मालमत्ता परत करण्याचे काम केले वेगवेगळ्या अफवा पसरवण्यात येतील त्याला बळी पडू नका :- ज्ञानेश्वर मोठे
• बदल अटळ आहे अंमलबजावणीसाठी सर्वांनी झटावे दोन्ही तालुके दहशत मुक्त करायचे आहेत :- माजी आमदार सांडू पाटील लोखंडे
• गेली दहा वर्ष आमदारकी भोगली मात्र विकास झाला नाही फक्त घोषणा केल्या राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही नेत्यांना त्याचे श्रेय घेण्यासाठी त्याची धडपड सुरू आहेत आम्ही सर्व त्याग करायला तयार आहे तुम्ही तयारी ठेवली पाहिजे :-सुरेश बनकर
यावेळी गजानन राऊत सुनील काकडे, गणेश बनकर विनोद मंडलेचा अशोक तायडे,संजय डमाळे, नारायण बडक, भीमराव काळे सुनील काळे सुभाष गव्हाणे बंडू काळे रमेश चिंचपुरे, कैलास काळे शिवाजी बुधाळ, गणेश लोखंडे, पुंडलिक लोखंडे, मेघराज चोडिये, श्रीरंग लोखंडे, कैलास जंजाळ, प्रभाकर सुरडकर, कृशीवर्ता बडक, किरण पवार, गोविंदराव भोजने, विजय मंडलेच्या, लुकमान सेठ विष्णू काटकर, गंगाबाई ताठे, वृषाली मिरकर, कौतिक बडक सुनील काकडे, पुडलिक मोरे, काशिनाथ जंजाळ, नारायण जाधव, संजय जामकर, काशिनाथ पांडव,चरणसिंग नाईक, राजेंद्र आहिरे, लेखराज उपाध्याय पुंजाराम गरुड देविदास आमटे पोपटराव कुंटे अनिस सय्यद शेख अमन महेश शंकरपल्ली यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते हजारो संख्येने उपस्थित होते
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget