श्रीरामपूर (प्रतिनिधी) श्रीरामपूर नगरपालिकेच्या भुयारी गटारच्या 14 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणाचा तपास शहर पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखा, अहमदनगरकडे वर्ग करण्यात आला आहे.मोरया फाउंडेशनचे केतन खोरे यांनी गेल्या अडीच वर्षांपासून भुयारी गटार प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने सात जणांविरुद्ध तब्बल 14 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यांनतर जिल्हा सत्र न्यायालय, श्रीरामपूरला सहा जणांनी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून याचिका दाखल केली, मात्र न्यायालयाने सर्वांच्या याचिका फेटाळल्या.दरम्यान, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, आर्थिक अपहराची उकल करणे महत्त्वाचे असल्याने सदर तपास श्रीरामपूर शहर पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास होण्यासाठी फिर्यादी केतन खोरे यांना संबंधित कागदपत्रांसह पोलीस अधीक्षक कार्यालय, अहमदनगर येथे बोलाविण्यात आले होते. खोरे यांनी भुयारीचा तपास करणार्या पोलीस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांची भेट घेत सविस्तर माहिती दिल्याचे समजते
Post a Comment