July 2023

अहमदनगर  - (प्रतिनिधी ), लोणी येथे आढळलेल्या अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता अहमदनगर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने अवघ्या काही तासातच आरोपींचा छडा लावून दोन आरोपींना अटकही केले आहे                                         या बाबत हकीकत अशी की  दिनांक 30 जुलै रोजी लोणी ते तळेगांव जाणारे रोड, गोगलगांव शिवार, लोणी, ता. राहाता येथे कोणीतरी अनोळखी इसमाने अज्ञात कारणासाठी अंदाजे 45 ते 55 वर्षे वयाचे पुरुषाचे छातीवर कोणत्यातरी हत्याराने भोसकुन खुन केला. सदर घटने बाबत लोणी पोलीस स्टेशनचे पोना/निलेश मुक्ताजी धादवड यांचे तक्रारी वरुन लोणी पोलीस स्टेशन गु.र.नं. 445/2023 भादविक 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरची घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयारा करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते. 

त्या आदेशा प्रमाणे पोलीस निरीक्षक   दिनेश आहेर यांनी पोलीस साब इन्पेक्टर सोपान गोरे, पोलीस हेड काँन्स्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार,देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, विजय ठोंबरे, विशाल गवांदे, फुरकान शेख, पोकॉ/रणजीत जाधव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन सदर खुनाचा गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले. 

पथकाने घटना ठिकाणास भेट देवुन माहिती घेताना पथकास घटना ठिकाणी एका चारचाकी वाहनाचे टायर मार्कस् दिसुन आले त्या आधारे पथकाने आजु बाजूचे सीसीटीव्ही फुटेज व तात्रिंक विश्लेषणाचे आधारे पुढील तपास सुरु केला. पथकास सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक पांढरे रंगाची कार येताना व लागलीच जाताना दिसुन आली पथक त्या अनुषंगाने तपास करत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना दिनांक 29 जुलै  रोजी तोफखाना पोलीस स्टेशन मिसिंग रजिस्टर नंबर 135/2023 मधील मिसिंग व्यक्ती श्री. विठ्ठल नारायण भोर वय 48, रा. गणेश चौक, बोल्हेगांव, ता. नगर हे बेपत्ता असले बाबत तोफखाना पोलीस स्टेशन येथे मिसिंग दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर मिसिंगमधील व्यक्ती व अनोळखी मयत इसम यांचे वर्णन मिळते जुळते असल्याचे निदर्शनास आल्याने, पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी पथकास तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना सोबत घेवुन मिसिंग इसमाबाबत सविस्तर माहिती घेणे बाबत मार्गदर्शन केले. पथकास मिसिंग इसम नामे विठ्ठल भोर यांचे बाबत माहिती घेत असताना त्याचे मनोज मोतीयानी यांचे बरोबर प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवहार असुन त्यावरुन दोघामध्ये वाद झाले असले बाबत माहिती मिळाली. 

सदर महितीचे अनुषंगाने पथकाने मनोज मोतीयानी रा. सावेडीगांव, अहमदनगर याचा शोध घेतला परंतु तो पांढरे रंगाची हुंडाई कार मधुन त्याचा साथीदार नामे स्वामी गोसावी यास सोबत घेवुन गेल्याची माहिती प्राप्त झाली. त्या आधारे नाशिक येथे नातेवाईकांकडे चौकशी करता तो भोपाळकडे निघाल्याची माहिती घेतली. सेंधवा, मध्यप्रदेश येथे जावुन आरोपींचा शोध घेता ते मिळुन आल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) मनोज वासुमल मोतीयानी, वय 33, रा. सावेडीगांव, अहमदनगर व 2) स्वामी प्रकाश गोसावी वय 28, रा. सावेडीगांव, अहमदनगर असे असल्याचे सांगितले.

त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी मयत विठ्ठल भोर याचे व मनोज मोतीयानी यांचे प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवहार असुन त्यावरुन दिनांक 29/07/23 रोजी माझी पांढरे रंगाची हुंडाई आय-20 कार मधुन जाताना निंबळक, ता. नगर येथे मनोज मोतीयानी व मयत यांच्यात वाद झाल्याने मनोज मोतीयानी याने साथीदार नामे स्वामी गोसावी याचे मदतीने मयताचे छातीवर स्क्रुड्रायव्हरने वार करुन त्याचा खुन केला व मयताचे प्रेत लोणी परिसरातील पेट्रोलपंपा जवळ फेकुन दिले बबत माहिती दिल्याने त्यांना ताब्यात घेवुन लोणी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन करीत आहे. 


आरोपी नामे मनोज वासुमल मोतीयानी हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात विनयभंग, अल्पवयीन मुलीस पळुन नेणे, खंडणीच्या उद्देशाने जिवे मारण्याची धमकी देणे, दुखापत करणे व जिवे मारण्याची धमकी देणे असे गंभीर स्वरुपाचे एकुण -6 गुन्हे दाखल आहेत 

सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री. अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

एकाच कुटुंबातील दोन मुले शासकीय सेवेत पोहोचविण्याचा मान देसाई परिवाराने मिळवीला असुन अनिरुद्ध देसाई हा बिड येथे सहाय्यक लेखाधिकारी म्हणून सेवा देत आहे तर दुसरा अभिषेक देसाई हा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या तालुक्यात जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता म्हणून सेवा देत आहे त्या बद्दल राज्याचे महसुल, पशुसंवर्धन तथा दुग्ध विकास मंत्री तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते त्यांचे वडील जेष्ठ पत्रकार देविदास देसाई व आई सौ प्रतिभा देसाई यांचा सन्मान करण्यात आला त्या प्रसंगी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे श्रीरामपुर तालुक्याचे आमदार लहु कानडे ,जि प सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र  साळवी ,उपसरपंच अभिषेक खंडागळे आदि मान्यवर.

केंद्र सरकारच्या  जलजीवन मिशन योजनेअंतर्गत १२६ कोटींची योजना बेलापूर (वार्ताहर) केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत बेलापुर बुद्रुक - ऐनतपुर येथील १२६ कोटी रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन शुभारंभ उद्या रविवार दि.३० रोजी सकाळी ९ वाजता राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते व शिर्डीचे खा. सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती जि प सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच तसेच श्रीरामपूर बाजार समितीचे उपसभापती अभिषेक पा. खंडागळे यांनी दिली.

 या प्रसंगी खा. डॉ. सुजय विखे पा., आ. लहू कानडे, मा. आ. भाऊसाहेब कांबळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, भाजपा तालुकाध्यक्ष दिपक पटारे, प्रदेश ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, जि. प. सदस्य शरद नवले, ज्येष्ठ भाजप नेते सुनिल मुथा, पं.स. चे माजी उपसभापती बाळासाहेब तोरणे, प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, अधीक्षक अभियंता एस. एम. कदम, कार्यकारी अभियंता एस. आर. वारे, उपअभियंता भिमगिरी कांबळे, शाखा अभियंता सुनील हरदास, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 जि.प.सदस्य शरद नवले यांच्या अधिपत्याखालील श्रीरामपूर रस्त्यावर सद्गुरु मंगल कार्यालय येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन सर्वश्री सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामविकास अधिकारी एम. बी. गायकवाड, ग्रा. पं. सदस्या सौ. तबस्सुम बागवान, स्वाती अमोलीक, प्रियंका कुऱ्हे, उज्वला कुताळ, मिना साळवी, चंद्रकांत नवले, मुस्ताक शेख, वैभव कू-हे, सौ . रंजना बोरुडे, शिला पोळ, छाया निंबाळकर, रविंद्र खटोड, भरत साळुंके, रमेश अमोलिक आदींनी केले आहे.

खंडाळा (गौरव डेंगळे): श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे सद्गुरु गंगागीर महाराज भजनी मंडळ, नेहरूवाडी व चित्रंजनवाडी यांच्या पुढाकाराने अधिक-श्रावण मासानिमित्ताने दिनांक २३ जुलै ते ३० जुलै दरम्यान श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

७ दिवस चालणाऱ्या श्रीमद भागवत कथा भागवताचार्य ह भ प बाबा महाराज सासणे (श्री क्षेत्र उक्कलगाव) यांच्या संगीत सुमधुर वाणीतून संपन्न होणार आहे. तर व्यासपीठाचे नेतृत्व ह भ प श्रीधर घाडगे महाराज, हरिपाठ नेतृत्व ह भ प योगीराज गंगागीर महाराज भजनी मंडळ, नेहरूवाडी खंडाळा, समस्त ग्रामस्थ खंडाळा, जगद्गुरु तुकाराम महाराज भजनी मंडळ, राजनखोल,जय बजरंग भजनी मंडळ,नांदूर यांच्या अधिपत्याखाली संपन्न होईल.तर रविवार दिनांक ३० जुलै रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह भ प दत्तात्रय महाराज रक्टे (माऊली आश्रम, देवगाव संगमनेर) यांचे काल्याचे किर्तन संपन्न होणार आहे. रोज सकाळी ५ ते ६ काकडा, सकाळी ८ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ तर सायंकाळी ८ ते १० या वेळेत श्रीमद ् भागवत कथेचा आनंद स्रोत यांना घेता येईल. तरी जास्तीत जास्त गावकऱ्यांनी, वारकऱ्यांनी या अधिक श्रावण मासातील श्रीमद् भागवत कथेचा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवहान श्रीमद योगीराज गंगागिरी महाराज भजनी मंडळ नेहरूवाडी व चित्रंजनवाडी,खंडाळा यांनी केले आहे.

श्रीरामपूर: दिनांक २२ व २३ जुलै २०२३ रोजी सोमैय्या विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कुल,कोपरगाव येथे स्वातंत्र्यसंग्रामाचे महानायक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत जवळजवळ ४३ शाळांच्या ८६ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. 
      त्यात श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम अकॅडमी शाळेच्या इयत्ता १० वीची विद्यार्थीनी ऋत्वि शरद पाटील व इयत्ता ८ वीचा विद्यार्थी नमिश परेश अग्रवाल या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन तृतीय क्रमांक पटकावला. सहभागी विद्यार्थ्यांना शाळेच्या प्राचार्या जयश्री पोटघन व विषय शिक्षिका प्रियांका सबनीस यांचे मोलाचे मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे,पालकांचे व मार्गदर्शक शिक्षिकेचे संस्थेचे अध्यक्ष राम टेकावडे, सचिव जन्मेजय टेकावडे,गव्हर्निंग काऊन्सिल सर्व सदस्य, ऍडव्हायझरी कमिटीचे सर्व सदस्य व शिक्षकवृंदानी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

👉 राज्यभरातून ८६ स्पर्धकांचा सहभाग! कोपरगाव(गौरव डेंगळे)२३/७:

सोमैया विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये "पद्मभूषण श्री करमसीभाई सोमैया" राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेचे तिसऱ्या पर्वाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.प्रखर देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमैया विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल,कोपरगाव येथे दिनांक २२ व २३ जुलै २०२३ रोजी राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.विद्यार्थ्यांमध्ये निपून वक्तृत्वाचे गुण वाढीस लागावे त्यांच्यातील श्रवण क्षमतेचा विकास व्हावा,त्यांना आपले विचार मुद्देसूदपणे मांडण्याची कला अवगत व्हावी,त्यांच्यातील भाषण कौशल्य विकसित व्हावे व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.राज्यातील ४३ शाळेतील ८६ उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी आपले वकृत्व सादर करून स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला.सदर स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासंगी व्यक्तिमत्व असलेले प्राध्यापक संतोष पद्माकर पवार,रावबहादुर नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर यांची उपस्थिती लाभली. बक्षीस वितरण समारंभासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व गोदावरी बायोरिफाइनरीज लिमिटेड साकरवाडीचे संचालक सुहास गोडगे यांनी उपस्थिती दर्शवून सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले.तसेच पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र सांगळे ही या स्पर्धेसाठी उपस्थित होते.सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य के.एल.वाकचौरे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले होते.श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचे कुमारी ईश्वरी आव्हाड व प्रथमेश पाटील या विद्यार्थ्यांसोबतच सर्व यशस्वी स्पर्धकांचे शालेय व्यवस्थापन व सर्व कर्मचारी वृंद यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.


👉 स्पर्धेचा अंतिम निकाल!

👉 *प्रथम क्रमांक* 

श्री.शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल कोपरगाव ₹ ७,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *द्वितीय क्रमांक*

प्रवरा गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज लोणी ₹ ५,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *तृतीय क्रमांक* 

श्रीराम अकॅडमी,श्रीरामपूर

₹ ३,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र

👉 *उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक*

मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूल,अकोले ₹ १०००/-  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक*

ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल अहमदनगर ₹ १०००/-  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ तृतीय पारितोषिक*

 श्री साईबाबा कन्या विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज शिर्डी.

₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ चतुर्थ पारितोषिक*

बागलाण एज्युकेशन सोसायटी चे इंग्लिश मीडियम स्कूल सटाणा.

₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ पाचवे पारितोषिक*

श्री रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशन चे सेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूल नगर ₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

श्रीरामपुर प्रतिनिधी-संविधान बचाव समिती तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यान करीता श्री. ॳॅड, असीम सरोदे साहेब व जेष्ठ विधीतज्ञ मा. ना. सुप्रीम कोर्ट तसेच आर्किटेक्ट श्री, अर्शद  शेख थोर विचारवंत अहमदनगर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रम हे

प्रियदर्शिनी इंदिरा गांधीं मंगल कार्यालय श्रीरामपूर   येथे दिनांक २४/०७/२०२३ सोमवार रोजी दुपारी २-०० वाजता आयोजित करण्यात आले आहे

तरी शहरातील सर्व नागरिकांनी व तमाम समाज बांधवांनी विद्यार्थी तसेच पालक वर्गांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती संविधान बचाव समितीच्या वतीने करण्यात आली आहे 

कोपरगाव: २३/७ (प्रतिनिधी)के. जे. सोमैया महाविद्यालय कोपरगाव येथील खेळाडू श्री.अक्षय मधुकर आव्हाड यास सन २०२१-२२ साठी बेसबॉल खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्‍याबद्दल महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सवोच्‍च पुरस्कार ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी’ निवड झाल्याबद्दल कोपरगावच्या श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचा वतीने शाळेचे प्राचार्य श्री के एल वाकचौरे,राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक श्री राजेंद्र कोहकडे, शाळेचे क्रीडा संचालक श्री धनंजय देवकर,शाळेचे जनसंपर्क अधिकारी श्री दत्ता सांगळे,क्रीडा प्रशिक्षक श्री गौरव डेंगळे आदींच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना अक्षयने सांगितले की,बेसबॉल हा एक लोकप्रिय खेळ आहे ज्याचा इतिहास मोठा आहे.या खेळाचा उगम १९व्या शतकाच्या मध्यात युनायटेड स्टेट्समध्ये झाला,जरी त्याचे नेमके मूळ अस्पष्ट आहे.गेल्या काही वर्षांमध्ये, व्यावसायिक संघ,लीग आणि खेळाडूंनी व्यापक प्रसिद्धी आणि ओळख मिळवून,बेसबॉल हा एक प्रिय मनोरंजन आणि एक प्रमुख खेळ बनला आहे.भारतामध्ये देखील हा खेळ लोकप्रिय होत असून जास्तीत जास्त खेळाडूंनी या मनोरंजक खेळाकडे वळावे. पुढे बोलताना अक्षय म्हणाला की ग्रामीण भागातून मी या बेसबॉल खेळाची सुरुवात केली आणि ६ वेळा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या राज्याला पहिल्या तीन संघांमध्ये स्थान पटकावून दिले.तरी भविष्यात ग्रामीण भागातून जास्तीत जास्त खेळाडूंनी बेसबॉल खेळावे व राज्याचं,देशाचं प्रतिनिधित्व करावे असे तो म्हणाला.माझा सत्कार केल्याबद्दल मी सोमय्या विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो असे तो म्हणाला.

बेलापुर (प्रतिनिधी )-आपल्याला भविष्यात काय व्हायचे हे  निश्चित करुन ते मिळविण्यासाठी कठोर परिश्रम व जिद्द चिकाटी या बळावर  येथील अभिषेक दिलीप दुधाळ याने   युपीएससी परिक्षेत घवघवीत यश मिळवुन तालुक्यातील पहीला आयएएस होण्याचा बहुमान मिळवीला आहे .                  नुकत्याच जाहीर झालेल्या युपीएससीच्या निकालात २७८ क्रमांकाने अभिषेक दुधाळने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवीला होता                                  अभिषेक दिलीप दुधाळ याने यापूर्वी वयाच्या २३ व्या वर्षी युपीएससी परिक्षा उत्तीर्ण  झाला होता त्या वेळी त्याला ६३७ रँंक मिळाली होती त्याला इंडीयन रेल्वे ट्रँफीक सर्व्हीस आयआरटीएस गृप ए हे पद मिळाले होते  या ठिकाणी सेवेत हजर होवुन पुन्हा परीक्षा देण्याचा त्याने निर्णय घेतला अन  दररोज सात तास नियमित अभ्यास सुरु ठेवला .म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर त्याप्रमाणे त्याने २०२० मध्ये दिलेल्या युपीएससी परिक्षेत देशात ४६९ वा रँंक मिळवीला  इंडीयन पोलीस सर्व्हीस हे पद मिळवुन हैद्राबाद येथे प्रशिक्षण सुरु झाले यावरही समाधान मानेल तो अभिषेक कसला त्याने पुन्हा नियमित अभ्सास सुरुच ठेवला अन पुन्हा  परिक्षा दिली.कारण त्याला जिल्हाधिकारी हे मानाचे पद मिळवायचे होते  नुकताच युपीएससी परिक्षेचा निकाल जाहीर झाला असुन त्यात त्याला २७८ रँक मिळाले आता त्यांची आयएएस म्हणून निवड झाली आहे  सलग तिन वेळा परिक्षा देवुन तिनही वेळेस वरची रँक मिळवुन जिल्हाधिकारी होणारे अभिषेक दुधाळ यांचे प्राथमिक शिक्षण बेलापुर तसेच जेटीएस हायस्कूल बेलापुर  येथे झाले  त्यापुढील शिक्षण मुंबई येथील वीर जिजामाता अभियांत्रिकी शिक्षण संस्थेत पुर्ण केले  माहीती व तंत्रज्ञान विभागात पदवी प्राप्त केली आयटी क्षेत्रातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून प्रशासकीय सेवेत जाण्याचा धाडसी निर्णय घेतला याकरीता वडील दिलीप व आई संगीता दुधाळ यांची तसेच गुरुजन वर्ग तसेच मित्रांची मोलाची साथ मिळाली  दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात जेएनयू एमए अर्थशास्र विभागासाठी प्रवेश घेतला त्याकरीता खाजगी शिकवणी लावली नंतर स्वंय अध्यापन करण्याचा निर्णय घेतला व कठोर अशी मेहनत घेवुन सलग तिसऱ्यांदा युपीएससी परीक्षेत यश मिळवुन तालुक्यातील पहीले आयएएस हे पद भूषविणारे अभिषेक दुधाळ हे पहीलेच होत  याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे

बेलापूर- (प्रतिनिधी  )-मा. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून बेलापूर ग्रामपंचायती अंतर्गत बेलापूर व ऐनतपूर महसुली गावांसाठी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन योजनेंतर्गत प्रत्येकी ५९ लाख रुपये असा एकूण सुमारे १ कोटी १८ लाख रुपये खर्चाचा घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मंजूर झाला आहे. त्यामुळे प्रवरा नदी शुध्द होण्यास मदत होणार असल्याची माहिती गावकरी मंडळाचे नेते शरद नवले , सरपंच महेन्द्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंंडागळे यांनी दिली आहे. 

या बाबत बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने माहीती देताना नवले साळवी व खंडागळे यांनी सांगितले की बेलापूर येथे बाजारतळ, स्मशानभूमी, केशव गोविंद मंदिर व महादेव मंदिर परिसरातून वाहणार्‍या छोट्या ओढ्यांमधून सांडपाणी व इतर मलमुत्र प्रवरा नदीत जाते. त्यामुळे प्रवरा नदी अशुध्द व दूषित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने नद्या शुध्दीकरण महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. त्यात बेलापूरची प्रवरा नदी स्वच्छ करण्यासाठी १ कोटी १८ लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला आहे. यामध्ये ऐनतपूरसाठी सुमारे ५९ लाख रुपये, तर बेलापूरसाठी ५९ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पांतर्गत प्रत्येकी नऊ कंपोस्ट टँक, टायगर बायोफिल्टर प्लॅन्ट उभारला जाणार आहे. यामधून नदीला जाणारे अशुध्द पाणी शुध्द केले जाणार असून या पाण्याचा वापर शेती किंवा झाडांसाठी करता येणार आहे. 

दरम्यान दोन्हीही प्लान्टसाठी जागा निश्‍चित करण्याचे काम अद्याप सुरु आहे. ग्रामपंचायतीने ऐनतपूर प्लान्टसाठी स्मशानभूमिजवळ, तर बेलापूरच्या प्लान्टसाठी बाजारतळाजवळ जागा सुचविली आहे.  ऐनतपूरसाठी मंजूर झालेला प्लॅन्ट सप्टेंबर अखेर तर बेलापूरचा ऑक्टोबर अखेर पूर्ण करावयाचा आहे. 

बेलापूरच्या चार भागातून नदीपात्रात सांडपाणी जाते. या दोन्ही प्रकल्पांतर्गत स्मशानभूमी व बाजारतळ परिसरातून नदी पात्रात सोडले जाणारे पाणी अडवून शुध्द केले जाणार आहे. मात्र केशव गोविंद व महादेव मंदिराच्या भागातून जाणारे पाणी दुसर्‍या टप्प्यात एकत्रित करुन शुध्द करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. या दोन प्रकल्पांतर्गत किमान ६० टक्के पाणी शुध्द होणार असल्याचे माजी जि प सदस्य शरद नवले  सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले

श्रीरामपूर प्रतिनिधी:मोहर्रम सण उत्सव मोठ्या गुण्यागोविंदाने तथा शांततेने साजरा व्हावा या करीता श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये काल दि.१८ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ६ वा. येथील नुतन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे आणि पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहर्रम उत्सव कमेटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे व पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सर्व शान ए करबला मोहर्रम कमिटीचे पदाधिकारी सदस्य यांना मोहर्रम सण साजरा करताना घ्यावयाची काळजी व शहरात जातिय सलोखा कसा अबाधित राहील याकरीता घ्यावयाचा पुढाकार याबरोबरच शहरात भाईचारा आणी शांतता टिकून रहावी याकरीता घ्यावयाची खबरदारी याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी शहर व परिसरातील शान ए करबला मोहर्रम कमिटीचे पदाधिकारी व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.या वेळी प्रथमता श्रीरामपुरच्या परंपरे प्रमाणे आपल्या विभागाचे नुकतेच पदभार स्वीकारलेले उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांना शान ए करबला कमिटी श्रीरामपूर यांच्या वतीने पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागतपर सत्कार करून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.


या नंतर यंदा होणाऱ्या १९ जुलै ते २९ जुलै मोहरम नियोजन संदर्भात शान ए करबला कमिटी चे अध्यक्ष आसलम बिनसाद यांनी माहिती दिली,यावर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले,शहरात धार्मिक,सांस्कृतिक उत्सव अशी कार्यक्रमे ही झालीच पाहिजे ज्यामुळे सामाजात एकोपा निर्माण होतो, मात्र अशी कार्यक्रम करताना जातीय सलोखा व कायदा सुव्यवस्थाही जपली पाहिजे असे ते म्हणाले.श्रीरामपुर शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी म्हणाले की, मोहर्रम उत्सव कमेटीद्वारे होणाऱ्या कार्यक्रमांची  सर्वानी पोलिसांना आधीच सूचना द्यावी, दरवर्षी प्रमाणे परवानगी दिली जाईल, कोणीही पुर्व परवानगी न घेता कामे करू नये, जेणेकरून आपल्या कार्यक्रमात कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही अशा सूचनाही त्यांनी दिल्या.यावेळी शान ए करबला कमिटीचे अध्यक्ष आसलम बिनसाद, पदाधिकारी रहेमानअली शाह (बादशहा बाबा),तमन्ना सुरय्या नायक, अजीज अहेमद शेख (भैय्याभाई) सर्व कमिटी सदस्य तसेच शहर हद्दीतील पोलिस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांचे पो.नि.हर्षवर्धन गवळी यांनी शेवटी आभार मानले.


श्रीरामपुर प्रतिनिधी- वडाळा पाटबंधारे उपविभाग श्रीरामपूर उपअभियंता यांना आपले अंतर्गत येणारे श्रीरामपूर शहरातील कॅनॉलमध्ये गोंधवणी रोड राज पेट्रोल पंपाशेजारील कॅनॉल, मिल्लतनगर येथील लोखंडी पुल परिसर, संजयनगर मुळे बंगला कॅनॉल परिसर, खबडी पुल परिसर, नॉर्दर्न ब्रँच परिसर या परिसरातून जाणा-या कॅनॉलमध्ये मोठया प्रमाणात जिवजंतू, म्हशीचे गोठे, तसेच कॅनॉलच्या कडेलाच बनविलेल्या अनाधिकृत कचराकुंडया व या कुंडयांमध्ये म्हशीचे शेण, इतर घाण टाकत असल्याने नागरीकांच्या जिवीताचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने या परिसरामधील सर्व लोकांवर कडक कायदेशिर कारवाई करावी  व संपूर्ण परिसरातील कॅनॉलमध्ये असलेली घाण, कचरा याची साफसफाई व्हावी यासाठी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने मेनरोड महात्मा गांधी पुतळयाजवळ आमरण उपोषण सुरु केले आहे या संदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल यांनी माहीत दिली तसेच राष्ट्रीय सचिव हानिफभाई पठाण यांनी देखील आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या उपोषण कर्ते बाळासाहेब बागुल,

हनिफभाई पठाण,रईसभाई शेख,

रज्जाकभाई शेख जर मागण्या वेळीच मान्य नाही केल्यास हे आंदोलन आसेच चालु राहील याची संबंधित खात्याने नोंद घ्यावी असा इशारा दिला

पॅरिस १८/७ (गौरव डेंगळे):भारताने डंकर्क,पॅरिस येथे संपन्न झालेल्या FISEC-FICEP गेम्समध्ये मुलींच्या व्हॉलीबॉल क्रीडा प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत प्रथमच पदक जिंकून इतिहास रचला.१५ जुलै २०२३ हा दिवस भारतीय व्हॉलीबॉलसाठी सुवर्णाचा दिवस असेल.अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात,संघाने उपांत्यपूर्व फेरीत चिलीचा आणि उपांत्य फेरीत ऑस्ट्रियाचा पराभव केला.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात भारताला अव्वल क्रमांकावर असलेल्या फ्लँडर्स संघाकडून १-३ निसटता

पराभव पत्करावा लागला व भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडू नंदिनी भागवत,रिया एदलाबादकर,श्रिया गोठोस्कर,अनन्या गोसावी(कर्णधार), तन्वी जोशी, ईरा ढेकणे, समृद्धी कोंढारे, संस्कृती आपटे, अनाहिता मोकाशी,ओजस्वी बचुटे,स्वरा व्यवहारे,वरदा तिलये आदींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत भारतासाठी रौप्यपदक पटकावले.या सर्व खेळाडूंसाठी, आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती,त्यांनी पहिलाच प्रयत्न देशासाठी सर्वोत्तम कामगिरी केली. रौप्यपदक विजेत्या भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून कुलदीप कोंडे यांनी काम पाहिले तर संघ व्यवस्थापक म्हणून मुग्धा भागवत व श्वेता आपटे यांनी काम पाहिले.रौप्यपदक विजेत्या संघाचे मिलेनियम स्कूलचे संचालक श्री अन्वित फाटक,सौ अंचीता भोसले, प्राचार्या सौ राधिका वैद्य, प्रा सचिन घायवळ, क्रीडा प्रमूख श्री रामदास लेकावळे यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत गेल्या दोन वर्षापासून मोठ्या स्वरूपात रस्त्यांची व शासकीय इमारतींची कामे युद्धपातळीवर सुरू असून सर्व कामे उत्कृष्ट स्वरूपात होत असल्याने नागरिकात समाधानाचे वातावरण पसरले आहे सदरील कामे उत्कृष्ट व नियमात करून घेणे करिता येथील उप अभियंता व शाखा अभियंता यांना कामाच्या ठिकाणी जाऊन गुणवत्तेत कामे करून घेणे आवश्यक असताना दुर्दैवाने शासनाचे या उपविभागाकडे विशेषता अधिकाऱ्यांच्या सुविधेकडे दुर्लक्ष झाल्याने गेल्या चार महिन्यापासून या उपविभागाकडे कामाची तपासणी व जाणे येणे करिता शासकीय वाहन नसल्याने अधिकाऱ्यांची मोठी कोंडी झाली असून येथील अधिकारी साईडवर जाणे येणे करिता स्वतःच्या खाजगी वाहनाचा वापर करीत असून वाहन चालविणे करिता त्यांना स्वतंत्र ड्रायव्हर ठेवावा लागत आहे

वास्तविक पाहता तालुक्यातील ठिकठिकाणी चालू असलेल्या कामाचे अंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्या करिता व दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणे व येणे करिता किमान 40 किलोमीटरचे दररोजचे अंतर प्रति दिन 50 किलोमीटरचे अंतर होत असून यासाठी लागणारे पेट्रोल व ड्रायव्हर खर्च पाहता या अधिकाऱ्यांना न परवडणारे आहे कारण हा खर्च त्यांना आपल्या पगारातूनच करावा लागत असल्याने त्यांना मोठी झळ बसत आहे

साठ हजार ते एक लाखापर्यंत या अधिकाऱ्यांचा मासिक वेतन असून महिन्याला अंदाजे पंचवीस ते तीस हजार रुपये त्यांचा इंधन खर्च व ड्रायव्हर खर्च होत असून मुला मुलींचे शैक्षणिक खर्च घर खर्च व इतर खर्च दीड ते दोन लाख रुपये होत असल्याने या अधिकाऱ्यांच्या दूरदशे कडे  शासनाने लक्ष केंद्रित करून त्यांच्या गेल्या 4 महिन्यात झालेल्या वाहतूक खर्च या अभियंत्यांना परतफेड करावी व शासकीय कामाकरिता या श्रीरामपुर सार्वजनिक बांधकाम विभागास चांगल्या दर्ज्याचे वाहन लवकरात लवकर देऊन अडचणी दूर करणे करिता व त्यांना सुविधा पुरविणे करिता आपण वरिष्ठ लेव्हलवर मंत्रिमंडळात पत्रव्यवहार करून या कर्तव्य दक्ष अधिकारी यांना यांच्या हक्कांचे लढ्यात सोबत राहून अहमदनगर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने दिनांक 24/7/ 2023 रोजी श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह समोर रस्ता रोको आंदोलन करणार व वेळ प्रसंगी संगमनेर व अहमदनगरच्या कार्यालया समोरची आंदोलन करणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद यांनी दिली आहे

श्रीरामपूर--मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यावर एक सही संतपिती ही मोहीम राबविण्यात आली याच अनुषंगाने श्रीरामपूर गांधी पुतळा येथे बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली मोठे बॅनर लावून एक सही संतापाची ही मोहीम राबविण्यात आली या या मोहिमेची सुरुवात दैनिक जय बाबा चे कार्यकारी संपादक मनोज भाऊ आगे व राष्ट्रीय सह्याद्री चे संपादक करण भाऊ नवले यांच्या सहीने या मोहिमेची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी म्हणजे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही एक सही संतापची ही मोही संपूर्ण राजपूत राज्यभर राबवत आहोत सध्या राज्यात जे पक्ष सत्तेत आहेत तेच पक्ष विरोधी पक्षात देखील आहेत निवडणुकीच्या वेळेस एकमेकावर चिखल करणारे पक्षाचे नेते आमदार खासदार आज सत्तेसाठी सगळेजण शिकलात पडले आहे या लोकांना नागरिकांची मताची किंमत राहिली नाही व यांच्या पक्षाचे ध्येय धोरण विचार याचा सुद्धा विसर पडलेला आहे अशा लोकांना महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवावे व स्वाभिमानाने व विचारासी तडजोड न करणारे मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांना मतदार राजाने पाठिंबा देऊन मनसे या पक्षाला भरघोस मताने निवडून द्यावी अशी अहवाल या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे केले 

याप्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष डॉक्टर संजय नवथर, शहराध्यक्ष सतीश कुदळे, विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष गणेश दिवसे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष नंदू चाबुकस्वार,शहराध्यक्ष कुणाल सूर्यवंशी,विलास पाटणी,भासकर सरोदे,अंबादास कोकाटे ,विकी राऊत,प्रवीण कारले,सुनील करपे,रामेश्वर कोल्हे, अतुल तारडे विशाल गायकवाड,निलेश सोनवणे,दर्शन शर्मा,संदीप विशंभर,राजू शिंदे ,सचिन कदम,राजू जगताप,ज्ञानेश्वर सोनार,मनोहर बागुल,बबलू बोरकर आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

सोमैया विद्या विहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट वक्तृत्वाचे गुण वाढीस लागावे म्हणून प्रखर देशभक्त लोकमान्य टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी दिनांक २२ व २३जुलै रोजी राज्यस्तरीय भव्य मराठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते.

या ही वर्षी या स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे. 

या स्पर्धेसाठी 

प्रथम पारितोषिक रोख रक्कम ७०००/स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र,

द्वितीय पारितोषिक रोख रक्कम ५००० /स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,

  तृतीय पारितोषिक रोख रक्कम ३००० /स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र,तसेच

उत्तेजनार्थ प्रत्येकी १०००/रुपयाचे दोन पारितोषिक.

असे बक्षिसाचे स्वरूप राहील.

ही स्पर्धा फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी असून इयत्ता आठवी ते दहावीच्या दोन विद्यार्थ्यांचा गट या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेचे विषय व अधिक माहितीसाठी आपल्या शाळेमार्फत खाली दिलेल्या नंबर वर लवकरात लवकर संपर्क साधावा.

टीप -सदर स्पर्धेसाठी शाळेमार्फत केलेली नाव नोंदणीच ग्राह्य धरली जाईल.

संपर्क-श्री तुरकणे सर (९९२२३०१६६८)

श्री नन्नवरे सर (७०६६६०३३३३)

 सौ.होन मॅडम (७५५८४७९९६०)

बेलापुर (प्रतिनिधी  )-येथील जवान सुजित श्रीकांत शेलार हा मातृभूमीची सेवा करुन सेवानिवृत्त होवुन गावी परतला त्या वेळी गावाकऱ्यांनी श्रीरामपुर रेल्वे स्थानकापासून ते बेलापुर पर्यत उघड्या जीपमधुन मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला                                                  येथील सौ शकुंतला व श्रीकांत शेलार यांचे चिरंजीव सुजित हे १५ आँगस्ट २००१ साली नाशिक येथे सी आर पी एफ मध्ये भरती झाले होते श्रीनगर जम्मू येथे प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांची नियुक्ती  आसाम येथे झाली .त्यांनी शिलाँग अरुणाचल या ठिकाणी सेवा केली सन २००५ ते २००८ या कालावधीत श्रीनगर येथे ड्यूटी केली सन२००८ ते २०११ या कालावधीत नवि दिल्ली येथे विविध महत्वाच्या जागेवर गर्द ड्यूटी केली सन २०११ मध्ये त्यांची बदली ९९ बटालीयन रँपिड अँक्शन फोर्स येथे झाली त्या वेळी तेलंगाना वेगळे होण्याचा विषय सुरु होता त्या वेळी दंगल सदृश्य अनेक भागात सेवा करण्याची संधी मिळाली .सन २०१५ ते २०१८ या काळात नक्शलप्रभावी क्षेत्र छत्तीसगढ येथेही सेवा करण्याची संधी मिळाली या भागात तर जिव मुठीत धरुनच काम करावे लागत होते त्या ही परिस्थितीत मेजर सुजीत शेलार यांनी अनेक ठिकाणी फिरुन नक्शली कारवाया हाणून पाडल्या .सन २०१८ ते २०२३ या कालावधीत जम्मु येथे सेवा देवुन शिपाई पदावर भरती झालेले मेजर सुजीत शेलार हे हवालदार या पदावरुन सेवानिवृत्त झाले सन २००१ ते सन २०२३ या कालावधीत त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला.काही प्रसंग तर जिवावर बेतले होते त्या ही परिस्थितीत त्यांनी देशाची सेवा करुन नक्शलवाद्याचा बिमोड करण्याचा प्रयत्न केला या काळात अनेक सन्मानही त्यांना मिळाले असा हा जवान सीआरपीएफची सेवा पुर्ण करुन सेवानिवृत्त होवुन घरी परतला त्यावेळी त्याचे जंगी स्वागत करण्यात आले फटक्याची अतिषबाजी करुन उघड्या जीपमधुन त्यांची मिरवणूक काढली जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे बाजारा सामितीचे सभापती सुधीर नवले दत्ता कुर्हे   अरुण पा नाईक विलास मेहेत्रेशिवाजी वाबळे व्हा चेअरमन पंडीतराव बोंबले भास्कर बंगाळ वैभव कुऱ्हे सुनिल कुर्हे साहेबराव क्षिरसागर मेजर किरण शेलार प्रकाश कुमावत भगीरथ मुंडलीक पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा सुहास शेलार बंटी शेलार विजय शेलार स्वप्निल मुंडलीक संजय शेलार बाबा शेलार आंदींनी मेजर सुजित यांचे पुष्पहार घालुन स्वागत केले

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथे उर्दू माध्यमातून इयत्ता पहीली ते बारावी पर्यंत शिक्षण दिले जात असुन उर्दू माध्यमाची अंगणवाडी सुरु करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने शिक्षण विभागाकडे करण्यात आलेली आहे                    या बाबत मुस्लिम समाजाच्या वतीने माननीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की बेलापुर गावात पाच दे सात हजार मुस्लिम बांधव रहात असुन येथे मुलांना उर्दू माध्यमातून शिक्षण घेता यावे या करीता इयत्ता पहीली ते बारावी पर्यंतचे वर्ग आहे मात्र मराठी माध्यमातून अंगणवाडीत शिक्षण घेतलेल्या मुलांना इयत्ता पहीलीचे उर्दू माध्यमाचे शिक्षण अतिशय अवघड वाटते त्यामुळे मुलांना अंगणवाडीतुनच उर्दू माध्यमाचे शिक्षण मिळाल्यास त्यांची अधिक प्रगती होईल त्या करीता बेलापुर येथे जागा देखील उपलब्ध आहे तसेच मुलांना शिकविण्यासाठी उर्दू माध्यमाची शिक्षीका देखील आहे तरी शासनाने आमच्या योग्य मागणीची योग्य ती दखल घेवुन तातडीने अंगणवाडी सुरु करण्यास परवानगी द्यावी आशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे या निवेदनावर सर्वश्री आसीफ शेख ,शफिक आत्तार ,मोहसीन सय्यद ,अजिज शेख उर्फभैय्या   ,जब्बार आतार , शफीकं बागवान ,हाजी ईस्मईल शेख ,समिर जहागीरदार सर्फराज सय्यद मुश्ताक आतार ,जावेद पिंजारी ,फिरोज कुरेशी ,रियाज तांबोळी ,इरफान पठाण ,अकिल पटेल जब्बार वाघवाले ,बाबा सय्यद आदिंच्या सह्या आहेत.

हरेगाव : दि. ८ जुलै २०२३ रोजी संत तेरेजा गर्ल्स हायस्कूल येथे वृक्षदिंडी वृक्षारोपण समारंभ संपन्न झाला.

वनविभाग हरित सेना यांच्या सहकार्याने विद्यालयात गेल्या 23 वर्षापासून हा उपक्रम राबविला जातो, संत तेरेजा मुलींच्या विद्यालयाची यासाठी वनविभागाकडून निवड करण्यात आली आहे वनविभागाचे वनरक्षक श्री  के निर्वाण, श्री जाधव व श्री आहेर व श्री कानडे याप्रसंगी उपस्थित होते.जागतिक तापमान वाढ, पावसाचे घटत असलेले प्रमाण, वाढते प्रदूषण या समस्यांसाठी "झाडे लावणे" अत्यंत महत्त्वाचे असून वसुंधरा स्वच्छ, सुंदर व सुरक्षित ठेवण्यासाठी मानवाची भूमिका व जबाबदारी अत्यंत  महत्त्वाची आहे. "झाडे लावा व निसर्गाचा समतोल" सांभाळा असा संदेश श्री जाधव साहेब यांनी याप्रसंगी मुलींना दिला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय सिस्टर ज्योती सर्व शिक्षक व विद्यार्थिनी यांनी रोपे हाती घेऊन घोष फलकासह ग्रामस्थांना वृक्ष लागवडीसाठी  प्रेरणा दिली. अतिशय उत्साहात घोषणा देत वृक्ष दिंडी काढून जनजागृती केली. "पर्यावरण सांभाळा झाडे लावा" असा संदेश दिला. याप्रसंगी पालकांना रोपे वाटप करण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते मुलींना सुमारे पाचशे रोपांचे वितरण करण्यात आले. हरित सेनेचे ववनाधिकारी, माननीय मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती व विद्यार्थिनी यांच्या शुभहस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पारंपारिक वेशभूषेत मुलींनी दिंडीत सहभागी होत आपले वृक्ष प्रेम घोषणा देत व्यक्त केले व आपल्याला मिळालेले रोप वाढविण्याची जबाबदारी घेतली. या वृक्षदिंडीचे व वृक्षारोपण समारंभाचे प्रास्तविक श्री सुहास ब्राह्मणे यांनी केले, व विद्यालयाच्या वतीने माननीय वनाधिकाऱ्यांचा सत्कार श्री आदिनाथ आघाव यांनी केला. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला झाला.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -  एखाद्या खाजगी शाळेत असणाऱ्या सर्व सुविधा नगरपालिकेच्या परमवीर शहीद अब्दुलहमीद नगरपालिका डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये निर्माण करण्यात आल्या आहेत.शाळेचा शैक्षणिक दर्जा उत्तम आहे. या शाळेच्या कार्याचे इतर शाळांनी अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. विशेषतः जिल्ह्यातील सर्व उर्दू शाळांनी शाळा क्रमांक पाचचा आदर्श घेऊन काम करावे.

शाळेचे पालक म्हणून या शाळेच्या प्रगतीचा आम्हाला अभिमान आहे असे प्रतिपादन संविधान बचाव समितीचे अध्यक्ष, शेतकरी संघटनेचे नेते अहमदभाई जहागीरदार यांनी केले.

पालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक पाचचा ३७ वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून श्री जहागीरदार बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी रमजान पठाण,सामाजिक कार्यकर्ते साजिद मिर्झा, जलीलभाई काझी, हाजी युसूफभाई, विजय शेलार,आयाज तांबोळी, सरवरअली सय्यद मास्टर,सलाउद्दीन शेख, पंचायत समितीचे साधन व्यक्ती शाहीन शेख, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तरन्नुम मुनीर शेख, उपाध्यक्ष अजीम शेख, शिक्षण मंडळाचे लिपिक किशोर त्रिभुवन,शिक्षक सचिन शिंदे,शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य शबाना राजमोहम्मद शेख, नगरसेवक कलीमभाई कुरेशी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना सामाजिक कार्यकर्ते साजिद मिर्झा यांनी शाळा क्रमांक पाच ने उत्तम प्रगती केली असून या शाळेमध्ये सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा निर्माण केल्या गेल्या आहेत.ही नगरपालिका विभागातील जिल्ह्यातील एक प्रमुख आदर्श शाळा आहे. शाळेचे सर्व शिक्षक हे मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत.मुलांसाठी सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.शैक्षणिक दर्जा देखील उत्तम आहे.हीच कामगिरी पुढील काळातही कायम राहावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सेवा दलाचे मास्टर सरवरअली सय्यद यांनी माझ्या कुटुंबातील सर्व मुले या शाळेत शिकली आहेत.येथील शिक्षक अतिशय कष्टाळू आहेत याचा मला अभिमान वाटतो.पालकांना योग्य प्रकारचे मार्गदर्शन येथे केले जाते तसेच मुलांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते त्याबद्दल शाळेच्या सर्व शिक्षक वर्गाला धन्यवाद दिले.

काँग्रेस नेते विजय शेलार यांनी आपल्या भाषणातून नगरपालिकेची जिल्ह्यातील एक नावाजलेली शाळा म्हणून या शाळेचा सर्व श्रीरामपूरकरांना अभिमान आहे. समाजातील गोरगरीब मुलांचे जीवन घडविण्याचे कार्य खऱ्या अर्थाने या शाळेत सुरू आहे असे सांगून शाळेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 शिक्षण मंडळाचे लिपिक किशोर त्रिभुवन यांनी नगर जिल्ह्यातील नगरपालिका विभागातील सर्वात मोठी शाळा आणि सर्व सोयी सुविधा असणारी शाळा म्हणून शाळा क्रमांक पाचचा जिल्हाभरामध्ये उल्लेख केला जातो. यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे कार्य मोलाचे आहे असे सांगून प्रशासन अधिकारी राजेश डामसे यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त केल्या.

प्रास्ताविक भाषणात मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी १ जुलै १९८७ साली शाळा अस्तित्वात आल्यानंतर आजपर्यंत सव्वाचार हजार विद्यार्थी या शाळेत शिकून गेले आहेत.शाळेमध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा असून प्रत्येक वर्गात आता डिजिटल पॅनल बोर्ड खासदार निधीतून उपलब्ध झाले आहेत.शाळेची सुसज्ज अशी संगणक प्रयोगशाळा,विज्ञान प्रयोगशाळा,खेळाचे भरपूर साहित्य या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडविण्याचे कार्य आमचा शिक्षक वर्ग करीत आहे. या कार्याला पालकांची देखील चांगली साथ मिळते.पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे साहेब यांचे विशेष सहकार्य आम्हाला मिळत असते.या शाळेचे विद्यार्थी आज समाजामध्ये उत्तम प्रकारे आपले सेवा कार्य करीत आहेत याबद्दल समाधान व्यक्त केले.

हाजी युसुफ शेख यांनी देखील याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी मान्यवरांचा तसेच शाळेच्या सर्व शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समितीतर्फे वर्धापन दिनानिमित्त यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास पालक वर्ग व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेचे इमारतीवर तसेच प्रत्येक वर्गात आकर्षक सजावट करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या शिक्षिका वहिदा सय्यद,नसरीन इनामदार,शाहीन शेख, अल्ताफ शाह,अस्मा पटेल,निलोफर शेख, बशिरा पठाण,मिनाज शेख,एजाज चौधरी, रिजवाना कुरेशी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्ताफ शहा यांनी केले तर आभार एजाज चौधरी यांनी मानले.

                    *चौकट*

उर्दू शाळा क्रमांक पाच चे विद्यमान मुख्याध्यापक सलीमखान पठाण हे या महिना अखेर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या काळामध्ये शाळेची मोठी भरभराट झाली.भविष्य काळात त्यांच्या नंतरही शाळेच्या प्रगतीची ही वाटचाल अशीच सुरू राहावी अशी अपेक्षा सर्वच वक्त्यांनी व्यक्त केली.

दरवर्षी शाळेचा वर्धापन दिन अनोख्या पद्धतीने साजरी करणारी जिल्ह्यातील उर्दू शाळा क्रमांक पाच ही एकमेव शाळा आहे.यानिमित्ताने शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो.याबद्दल पालकांनी शाळेच्या शिक्षक वर्गाचे विशेष अभिनंदन केले.

बेलापुर (प्रतिनिधी )-श्रीरामपुर शहर व  तालुक्यासह १४ तालुके व अहमदनगर शहर असे एकुण १६४ नविन स्वस्त धान्य दुकानाचे जाहीरनामे काढण्यात आले असुन दुकान घेणाऱ्यांनी दिनांक ३१ जुलैपर्यत संबधीत तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत अर्ज करावा असे अवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी केले आहे                                 अहमदनगर जिल्ह्यातील १४ तालुक्यात नविन स्वस्त धान्य दुकाने मंजुर करण्यात येणार असुन ग्रामिण भागात १४७ तसेच अहमदनगर शहरात १७ नविन स्वस्त धान्य दुकान सुरु करण्यात येणार आहे श्रीरामपुर तालुक्यातील वांगी , रामपुर तसेच कडीत बु!! या गावाकरीता नविन स्वस्त धान्य दुकान मंजुर करण्यात येणार आहे तसेच श्रीरामपुर शहरात रद्द झालेले एस के गुप्ता ,एस एस डोळस ,सर्व्हंट को आँप सोसायटी ,प्रगत प्राथमिक  ,अहमदनगर जिल्हा सेवक युनियन ,मातापुर बिग बागायतदार सोसायटी असे सहा व ग्रामिण भागातील तीनअसे एकुण ९ नविन स्वस्त धान्य दुकान मंजुर करण्यात येणार आहे नविन स्वस्त धान्य दुकान घेवु इच्छिणाऱ्या महीला बचत गट पुरुष बचत गट विविध संस्था व्यक्ती यांनी संबधीत तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेशी संपर्क साधावा या बाबतची सविस्तर माहीती अहमदनगरच्या अधिकृत संकेत स्थळावरही( wwwahmednagar.nic.in) उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे

बेलापुर (प्रतिनिधी  )-येथील प्रतिथयश व्यापारी राजकुमार बाठीया यांनी गावातील दोन मंदिराच्या बांधकामासाठी "५२ हजार रुपयांचे देणगी दिली आहे                            येथील प्रतिथयश व्यापारी राजकुमार मिलनकुमार बाठीया यांनी बाजारवेस हनुमान मंदिर जिर्णोद्धार कामासाठी रुपये २१ हजार तसेच बेलापुरचे ग्रामदैवत भगवान श्री हरिहर केशव गोविंद मदिरांच्या कामासाठी रुपये ३१ हजार असे एकुण ५२ हजार रुपयांची देणगी राजेश खटोड यांच्याकडे सुपूर्त केली या वेळी सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुक्कड ,विजया कटारीया ,बाळासाहेब दायमा , पत्रकार दिलीप दायमा, राहुल दायमा उपस्थित होते

बेलापुर (प्रतिनिधी )-महीनाभर पांडूरंग श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालणाऱ्या वारकऱ्यासाठी जनसेवा पतसंस्थेने परतीच्या प्रवासासाठी मोफत बस सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे वारकऱ्यांना परतीचा प्रवासही सुखकर झाला आहे .                                              येथील जनसेवा पतसंस्थेचे संस्थापक सुवालाल लुक्कड नेहमीच पतसंस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात.गावातील स्मशानभूमी असो वा दशक्रियाविधीचा घाट असो किंवा गावातील मंदिरे असो या सर्व कामात सुवालाल लुक्कड हे जनसेवा पतसंस्थेच्या माध्यमातून कार्य करत असतात जेष्ठ नागरीकांच्या सहलीचेही ते आयोजन करत असतात वारकरी महीनाभर चालत पायी वारी करत असतात .विठ्ठलाचे दर्शन झाल्यानंतर वारकरी परतीच्या प्रवासाला निघतात.त्यामुळे त्यांचे होणारे हाल लक्षात घेवुन जनसेवा पतसंस्थेने या वर्षी वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवासाची मोफत व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या सत्कार्यास सर्व संचालक मंडळाने होकार दिला ,अन पंढरपुरहुन परत फिरणाऱ्या वारकऱ्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली मोफत प्रवासा बरोबरच प्रवासाच पतसंस्थेच्या वतीने जेवणही  देण्यात आले या कामी प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड पवन चौधरी गणेश अग्रवाल  नंदकुमार गोरे रविंद्र कोळपकर आदिंचे मोलाचे मार्गदर्शन लाभले जनसेवा पतसंस्थेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असुन जनसेवा पतसंस्थेचे संस्थापक सुवालाल लुक्कड चेअरमन प्रविण लुक्कड व्हा चेअरमन प्रकाश कोठारी संचालक अमीत लुक्कड दिपक वैष्णव विक्रम हरकुट योगेश कोठारी सुनिल शेजुळ सौ नंदा खंडागळे सौ सुवर्णा मुंडलीक मनोज कांबळे  सुरेश बाठीया व बँकेचे व्यवस्थापक राहुल दायमा आदिंचे वारकऱ्यांनी आभार मानले आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : श्रीरामपूर तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उन्मती फाउंडेशनच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी करणारे ज्येष्ठ शिक्षक हेमंत सोलंकी यांना शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.उन्मती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सोहेल शेख,श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव जन्मजय टेकावडे,शाहानवाज शेख,पत्रकार नितीन चित्ते,प्राचार्य डॉ योगेश पुंड यांच्या उपस्थितीत सोलंकी यांना शिक्षण रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्रीरामपूर तालुक्यातील नामवंत शाळांमध्ये ३० वर्षे  शिक्षक म्हणून सेवा केली.जिथे गेले तिथे समरस झाले.नवनवीन उपक्रम राबविले.सध्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे सुपरवायझर पदावर कार्यरत आहेत. श्रीरामपूरचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये श्री सोलंकी यांचं खूप मोठे योगदान आहे.त्यांचे अनेक विद्यार्थी डॉक्टर,इंजिनिअर,पोलिस, शासकीय अधिकारी,शिक्षक व इतर ठिकाणी देश व सामाजिक सेवेत अग्रेसर आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget