June 2022

बेलापुर  (प्रतिनिधी  )-विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना ज्या शाळा महाविद्यालय अडवणूक करेल अशा  शाळा/ महाविद्यालयीन विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे विद्यार्थी सेना च्या वतीने करण्यात आली आहे ,

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या , वतीने गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या शाळा व कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया चालू आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना विविध स्वरुपांचे कागदपत्रे काढण्यासाठी सेतू कार्यालय, तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय या ठिकाणी काही वेळा अडवणूक होण्याची शक्यता  आहे. वेळेत कागदपत्र मिळत नाही उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर दाखला, जात पडताळणीचा दाखला, बोनाफाईड अशा विविध कागदपत्रांसाठी या कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांची पिळवणूक होत असल्याच्या अनेक  तक्रारी येत  आहे. तसेच शाळा व कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतेवेळेस डोनेशनची मागणी केली जात आहे. अनेकांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे जास्त फी भरु शकत नाही. नियम बाह्य फी मिळत असल्याने शाळा व कॉलेजमध्ये , गर्भश्रीमंत मुलांना ऍडमिशनला, प्रथम प्राधान्य देत आहेत. यामुळे अनेक गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे. अशा शासकीय नियमांचे उल्लंघन करणार्या शाळा व कॉलेज व्यवस्थापकांवर कारवाई करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आत्ताच कुठे कारोनाची तिव्रता कमी असून शाळा व कॉलेजेस सुरु होताच मनमानी फी व डोनेशची आकारणी  सुरु केल्याच्या तक्रारी येत आहे. त्यामुळे पालक वर्ग हवालदिल झालेला आहे. काही सेतु चालकही दाखले देण्यिकरीता  अव्वाच्या सव्वा पैसे उकळत आहेत .तरी अशा सर्वावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे काहींना नोकरी नाही, व्यवसाय नाही त्यातच फी व डोनेशनची मागणी वाढत आहे. तसेच जे सेतु कार्यालय, शासकीय फी पेक्षा जास्त अतिरिक्त पैसे घेणार्या सेतू कार्यालयावर देखील कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर मनसे जिल्हाध्क्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली  तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल.आसा ईशारा मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आलेला आहे या निवेदनावर मनसे विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष  गणेश दिवसे,तालुकाध्यक्ष  गणेश रोकडे, शहराध्यक्ष विशाल लोंढे, जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर जिल्हा सरचिटणीस सुरेश जगताप, उपजिल्हाध्यक्ष संतोष डहाळे, तालुकाध्यक्ष प्रविण(आबा) रोकडे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, कामगार सेना तालुका अध्यक्ष सचिन पाळंदे, निलेश सोनवणे, संदीप विश्वंबर, अमोल साबणे, अक्षय सूर्यवंशी, विकी परदेशी, मंगेश जाधव, संकेत शेलार, रोहन गायकवाड, श्रीराम थोरात, जगन सुपेकर, अमोल ढाकणे, सागर भोंडगे, अक्षय अभंग, राहुल शिंदे, श्याम लांडे, प्रमोद शिंदे, किशोर बनसोडे, आधी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत

अहमदनगर प्रतिनिधी -जिल्ह्यात १० जूलै २०२२ रोजी 'बकरी ईद' व‌ 'देवयानी आषाढी एकादशी' हे सण साजरा करण्यात येणार आहेत.त्यादृष्टीने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने २८ जूनच्या रात्री १२ वाजल्यापासून ते ११ जूलैच्या रात्री १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३६ लागू करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.सध्या राज्याच्या राजकीय परिस्थितीमुळे निषेध मोर्चा, प्रती निषेधाच्या घटना चालू असून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, जोडे मारो आंदोलन तसेच

राजकीय पक्षांच्या नेत्यांचे कार्यालय तोडफोडीच्या घटना घडत आहेत. तसेच केंद्र सरकारच्या अग्निपथ सैन्य भरती योजना अनुषंगाने संपूर्ण देशभरात विविध संघटनांचा विरोध चालू आहे.त्यामुळे विविध राजकीय पक्ष मोर्च, निषेध आंदोलने, धरणे आंदोलने, रास्ता‌रोको, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, कार्यालय तोडफोडीच्या घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे सध्या जिल्ह्यात विविध दिंड्या, पालख्या आगमन व प्रस्थान तसेच इतर धार्मिक कार्यक्रम साजरे होत आहेत. त्यावेळी मोठया प्रमाणात गर्दी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ व त्यात समाविष्ट असलेल्या कलमांचा नियमन आदेश वरील कालावधीसाठी जारी करण्याचे अधिकार अहमदनगर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहेत.असे ही पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी-दि. 27.06.2022 रोजी 15.35 वा पोलीस निरक्षक श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन याना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इसम नामे. प्रशांत ऊर्फ पांडु साईनाथ लेकुरवाळे रा. खैरी निमगाव ता. श्रीरामपुर हा गावटी कटटा बाळगतो, तसेच तो खेरी निमगाव ते चितळी जाणारे रोडवर साई समर्थ मंगल कार्यालयाजवळ आहे अशी माहिती मिळालीतेव्हा श्री. मच्छिद्र खाडे, पोलीस निरीक्षक, श्री., अतुल बोरसे, पोसई पोना/1251। शेंगाळे, पोकां/ 173 सुनिल दिघे व चापोको.चैंदभाई पठाण अशानी दि. 27.06, 2022 रोजी 15.50 वा निमगाव खेरी ता श्रीरामपुर येथील शिवारातील खेरी निमगाव ते चितळी जाणारे रोडवर साई

समर्थ मंगल कार्यालया जवळ एक इसम आम्हाला उभा दिसला व तो आम्हा पोलीमांना पाहन 'पना लागला त्यावेळी त्याचेवर झडप घालुन पकडले. त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रशांत ऊर्फ पांड साइनाथ लेकुरवाळे रा खैरी निमगाव ता. श्रीरामपुर असे सांगितले आहे. त्याची अंगझडती घेतली असता तव्हा त्याचकड एक गावठी कटटा सुमारे 20,000/- रु किंमतीचा व 2 जिवंत काडतुस 1000/- रु किंमतीचे असा मुह्वमाल मिढुन आला आहे.सदरचा मुद्येमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. सदर घटनेवरुन प्रशांत ऊर्फ पांडु साईनाथ लेकुरवाळे रा. खरी निमगाव ता. श्रीरामपुर यांचे विरुध्द श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नंबर 2102022 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई. अतुल बोरसे हे करत आहेत.सदर आरोपी प्रशांत ऊर्फ पांडु साईनाथ लेकुरवाळे रा. खैरी निमगाव ता. श्रीरामपुर यांचेवर खालील प्रमाणे गुन्हें दाखल आहेत,1) श्रीरामपुर ता पो स्टे I 83/ 2014 IPC 380,457 प्रमाणे 2) श्रीरामपुर ता पो स्टे 1 92/ 2014 1PC 399,402 प्रमाणे) नारायणगाव पो स्टे पुणे जिल्हा 1 52/ 2016 1PC 395,392 प्रमाणे महाराष्ट्र सघटीत गुन्हेगारी कायदा कलम 3(1),3(4) प्रमाणे 4) श्रीरामपुर ता पो स्टे I39/2018 IPC 399,402 प्रमाणे 5) श्रीरामपुर ता पो स्टे I113/2018 IPC 353,399,402 प्रमाणे 6) श्रीरामपुर ता पो स्टे 1 145/ 2018 IPC '399,402 प्रमाणे 7) श्रीरामपूर शहर पो स्टे 1922/ 2019 1PC 399,402 ऑर्म अँक्ट 4/25 प्रमाणे नमुद दाखल गुन्हयामध्ये मा. श्री. मनोज पपाटील साहेव, पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. स्वाती भोर मेंडम,अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर आणि मा. श्री. संदिप मिटके साहेव, उपविभागिय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभागयांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनचे श्री. मच्छिद्र खाडे, पोलीस निरीक्षक, पोसई अतुल बोरसे, पोना 1251 अनिल शेंगाळे, पोकों। 73 सुनिल दिये चापोकों चाँदभाई पठाण यांनी सदरची कारवाई केलेली आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )-कोरोनाचे संकट टळू दे भरपूर पाऊस पडून बळीराजा सुखी होवो असे मनोभावे साकडे पाडूरंगाला घालणार असल्याचे  अडबंगनाथ देवस्थानचे मठाधिपती अरुणगिरीजी महाराज यांनी सांगितले अडबंगनाथ देवस्थानचे मठाधिपती महंत अरुणगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या पालखी व दिंडीचे यश ट्रेलर व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले होते त्या वेळी बोलताना अरुणगिरीजी महाराज म्हणाले की या दिंडीचे हे बारावे वर्ष असुन अतिशय शिस्तप्रिय दिंडी म्हणून या दिंडीची ओळख आहे .सर्व वारकऱ्यांना पांढरा पोषाख डोक्यावर टोपी असा गणवेश असुन पुरुष व महीला वारकरी स्वतंत्र वारीत चालत असतात कोरोनामुळे दोन वर्ष पायी दिंडी काढता आली नाही त्यामुळे आता वारकरी विठ्ठल पांडूरंगाच्या भेटीला आसुसलेला आहे .पांडूरंग सर्व भक्तांच्या ईच्छा पूर्ण करतील असा विश्वासही त्यांनी बोलुन दाखविला या वेळी मा ,जि प सदस्य शरद नवले यांनी देवस्थानला दिलेल्या निधीचा आवर्जुन उल्लेख करुन संस्थानला आणखी निधीची गरज असल्याचेही

अरुणगिरीजी महाराज म्हणाले या वेळी मा.जि प सदस्य शरद नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले माजी सरपंच भरत साळूंके खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड प्रकाश कुऱ्हे  पत्रकार' देविदास देसाई नवनाथ कुताळ यश ट्रेलरचे मालक उल्हास कुताळ कुंदन कुताळ वसंतराव कुताळ रविंद्र कुताळ दादासाहेब कुताळ विलास मेहेत्रे कन्हैय्या कुताळ यश कुताळ प्रकाश कुऱ्हे भाऊसाहेब वाबळे शशिकांत नवले चंद्रकांत नवले रफीक बागवान  आदिंनी पालखीचे स्वागत केले. बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने पालखीचे स्वागत करून ह.भ.प.अरूणगिरीजी महाराजांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,रमेश अमोलिक,दिलीप दायमा,शिवदास दायमा, प्रकाश कु-हे,सचिन वाघ,समीर जहागिरदार,राजेंद्र कुताळ,नितीन नवले, सुभाष राशिनकर,कुंदन कुताळ, आदी उपस्थित होते

श्रीरामपूर प्रतिनिधी-बाभळेश्वर येथील विवाहितेचा रांजणखोल-खंडाळा शिवारात प्रवरा कॅनॉलमध्ये काल रविवारी मृतदेह आढळून आला. सासरच्या लोकांकडून तिचा घातपात झाल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेतले असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.वैशाली उर्फ कल्याणी धीरज पाटोळकर (वय 34) असे या विवाहितेचे नाव आहे. काल रविवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास खंडाळा- रांजणखोल रोड येथील अचानकनगर भागात प्रवरा कॅनॉल मधील पुलाला अडकलेल्या अवस्थेत हिचा मृतदेह ग्रामस्थांना आढळून आला. यावेळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.खंडाळा-रांजणखोल शिवारात पाटाच्या पुलाला महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती ग्रामस्थांनी रांजणखोलचे पोलीस पाटील कृष्णा अभंग यांना दिली. त्यांनी ही माहिती श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे हवालदार श्री. शेलार, रघुवीर कारखिले, श्री. बोरसे फौजफाट्यासह हजर झाले. यावेळी महिलेच्या पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल कारवाई करावी, अशी मागणी तिचेे वडील व भाऊ यांनी केली.श्रीरामपूर शहरातील मोरगेवस्ती येथील तिचे माहेर असून सासर बाभळेश्वर येथील आहे. कल्याणी उर्फ वैशाली हिचा पती धीरज पाटोळकर याचे तिच्यासोबत अनेकदा वाद होत होते. या वादातून पती धीरज पाटोळकर हा वैशाली हिला मारहाण करून तिचा राग करत होता. त्यामुळेच वैशाली हिचा पतीकडून घातपात झाला असावा, असा आरोप वैशाली हिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. दुपारी या विवाहितेवर श्रीरामपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अहमदनगर प्रतिनिधी-जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश देताच अहमदनगर शहराचे पोलीस उपअधीक्षक यांचे पथक, एलसीबी आणि तोफखाना पोलिसांनी शुक्रवार, शनिवार हातभट्टी आणि जुगार अड्ड्यांवर कारवाई केली.उपअधीक्षक अनिल कातकाडे यांच्या पथकाने माळीवाडा वेस ते इम्पिरिअल चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर कारवाई केली. रोख रकमेसह 32 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार चालविणारे रोहित रवींद्र कदम आणि आकाश प्रकाश कदम (दोघे रा. माळीवाडा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.बागडपट्टी येथे तोफखाना पोलिसांनी कारवाई केली. 18 हजार 360 रुपयांची रोकड हस्तगत केली. दिलीप एकनाथ जाधव, गणेश प्रल्हाद चोभे, संजीव रामचंद्र राऊत, अमित अनिल कुमार, बिलाल मन्सुर शेख आणि मंगेश बाळासाहेब फुलसौंदर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एलसीबीच्या पथकाने 16 तोटी कारंजा येथे अड्ड्यांवर कारवाई केली. आकाश बाबासाहेब ठोंबरे (वय 30 रा. वारूळाचा मारूती) आणि रितेश दिलीप लसगरे (वय 30 रा. मोची गल्ली) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. नेप्ती नाका परिसरातील गणपती कारखान्याच्या मागे सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यावर कारवाई करत चार हजार रुपयांची दारू नष्ट केली. याप्रकरणी कैलास संजय निकम (वय 28 रा. नेप्ती नाका) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अचानक चाळ, रेल्वेस्टेशन येथील हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर एलसीबी पथकाने कारवाई केली. या कारवाईत साडेतीन हजारांची दारू नष्ट करण्यात आली. राजू खंडू आठवले (वय 45, रा. सारसनगर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामवाडी, बोल्हेगावातील संभाजीनगर आणि कोंड्यामामा चौकात सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यांवर तोफखाना पोलिसांनी कारवाई केली. या तीन अड्ड्यांमधील चार हजारांची दारू नष्ट करण्यात आली. हाशिर शहीद शेख (वय 65 रा. रामवाडी झोपडपट्टी), संजय नामदेव कांबळे (वय 44 रा. बोल्हेगाव) आणि करण अर्जुन साळुंके (वय 24 रा. मंगलगेट) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बेलापूरः(प्रतिनिधी  )-येथील कु-हे वस्ती भागामध्ये कमी दाबाने तसेच खंडीत वीज पुरवठा होत असल्याने नविन रोहिञ(डी.पी)बसवावेत अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी महावितरणचे सहाय्यक अभियंता मिलिंद दुधे यांचेकडे निवेदनाव्दारे केली. आहे                                  महावितरणला दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी पुढे म्हटले आहे की बेलापूर गावातील कु-हे वस्ती परिसरात असलेले रोहिञ ओव्हरलोड होते.यामुळे दाबनियमनात सातत्य राहात नाही.अनेकदा कमी दाबाने वीज पुरवठा होतो.यामुळे अनेकदा कृषीपंप जळतात.नियमीत दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने पीकांना विहिरीस पाणी असून पाणी देता येत नाही.यामुळे पिकांचे नुकसान होते ,तसेच  वीज  नसल्याने वस्त्यांवरील लोकांना अंधारात राहावे लागते.यामुळे या परिसरात राञीच्यावेळी भितीचे वातावरण असते याकडे लक्ष वेधण्यात आले.त्यामुळे ह्या परिसरासठी नविन रोहिञ बसविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.                                याप्रसंगी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणला निवेदन देण्यात आले होते या वेळी,गोरक्षनाथ कु-हे,केदारनाथ कु-हे ,मधुकर अनाप,तान्हाजी कु-हे ,कारभारी भगत,केशव कु-हे ,विशाल आंबेकर,अशोक कु-हे ,बापुसहेब कु-हे ,विजय कु-हे ,सुनिल जाधव,महेश कु-हे ,अमोल कु-हे ,महेश भगवान कु-हे ,प्रकाश साळुंके ,आदित्य बिगरे,सागर धनसिंग ,अक्षय पवार आदि उपस्थित होते.


श्रीरामपूर : दिनांक २४ जून २०२२ रोजी, राज्य उत्पादन शुल्क  विभागाच्या भरारी पथकाने, नेवासा तालुक्यातील मुळा साखर कारखाना, सोनई,खडका,घोडेगाव व चांदा परिसरात, सुरू असलेल्या अवैध हातभट्टी व्यवसायावर  छापे टाकून कारवाई केली आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क भरारी पत्रक क्रमांक २ चे निरीक्षक, गोपाळ चांदेकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील, प्रभारी

उपअधीक्षक राज्य  उत्पादन शुल्क बी. बी. घोरतळ यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ज्यात मुळा कारखाना, सोनई परिसर, खडका शिवार, घोडेगाव शिवार चांदा शिवार येथे छापेमारी करून. अवैध हातभट्टी अड्डे उधास्त करून. ५५० लिटर हातभट्टी दारू तैयार करण्याचे तयार रसायन, नष्ट करण्यात आले असून. खडका शिवारात अवैध रित्या दारूची वाहतूक करणाऱ्या दुचाकीसह, देशी विदेशी दारूचा ८३ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला असून. बाप्पु कोंडीराम गि-र्हे व विजय वसंत चावरे यांच्या विरुद्ध , मुंबई दारूबंदी कायदा १९४९ गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती, राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक गोपाळ चांदेकर, दुय्यम निरीक्षक व्ही. एम. आभाळे, दुय्यम निरीक्षक जी. एन. जायकोडी ,सहाय्यक दुय्यम निरीक्षक, के. के. शेख, राज्य उत्पादन शुल्क विभागचे जवान प्रविण साळवे व महिला जवान सौ. स्वाती फटांगरे आदींनी यशस्वी रित्या पार पाडली.

अहमदनगर प्रतिनिधी - जानेवारी २०२० पासून तपासात बेवारस दुचाकी पोलीसांना मिळून आल्या. त्या १३ दुचाकी मूळ मालकांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या हस्ते देण्यात आल्या.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना तपासा दरम्यान मिळून आलेल्या बेवारस वाहनांचे मुळमालकांचा शोध घेऊन वाहने मूळ मालकांना परत करण्याबाबत आदेश दिले होते. या आदेशान्वये अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा पोनि अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या विशेष पथकाची नेमणूक करुन स्थानिक गुन्हे शाखे कडील ३८ बेवारस दुचाकी मुळ मालकांचा शोध घेऊन व दुचाकी चोरीबाबत दाखल गुन्ह्यांची माहिती संकलीत करण्याबाबत तपास पथकास सूचना दिल्या होत्या.सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथकातील पोसई सोपान गोरे, पोहेकॉ संदीप पवार, विश्वास बेरड, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना शंकर चौधरी, विजय ठोंबरे, सचिन आडबल आदिंच्या पथकाने बेवारस दुचाकी मूळ मालकांचा शोध घेत असतांना पोनि श्री. कटके यांना बेवारस वाहनांची माहिती संकलीत केली. मुळ मालकापर्यंत पोहचविण्यासाठी मदत करणारे विजय डिटेक्टीव्ह, (जि. कोल्हापुर) यांची माहिती मिळाल्याने पोनि श्री कटके यांनी त्यांच्याशी संपर्क करुन तपास पथकाने स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे असलेल्या ३८ बेवारस दुचाकी मुळ मालकांपर्यंत पोहचण्यासाठी मदत घेतली.तपास पथकाने विशेष मेहनत घेऊन बेवारस दुचाकीचे अस्पष्ट झालेले चेसीज व इंजिन नंबर घेऊन कंपनीचे मुख्य कार्यालयाशी संपर्क करुन मूळ मालकांची नावे व पत्ते प्राप्त करुन त्यांच्याशी संपर्क केला. बेवारस दुचाकी मालक तेच आहेत, अशी खात्री झाल्यानंतर त्यांच्याकडे उपलब्ध कागदपत्रे स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे सादर करुन दुचाकी घेऊन जाण्याबाबत कळविले. दि. २१ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील ३८ बेवारस दुचाकी मालकां पैकी १३ मुळ मालकांनी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे त्यांच्याकडील मुळ कागदपत्र हजर केले. विशेष पथकाने कागदपत्रांची शहनिशा व खात्री करुन एक दुचाकी आडगांव पोलीस ठाणे ( जि. नाशिक) येथील तपास अंमलदाराचे ताब्यात देऊन इतर १२ मुळ मालकांना स्थानिक गुन्हे शाखा पो.नि अनिल कटके यांच्या हस्ते बेवारस दुचाकी मुळमालकांचे ताब्यात देण्यात आल्या आहेत.


अहमदनगर प्रतिनिधी - अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत तायक्वांदो संघटना तायक्वांदो स्पोर्टस असोसिएशन यांच्या वतीने १९ जून २०२२ रोजी जिल्हास्तरीय सभा संपन्न झाली.या सभेसाठी अहमदनगर शहर व ग्रामीण तालुक्यातून मुख्य प्रशिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळेस जिल्हा संघटना पुनर्बांधणी तसेच आगामी सातारा येथे होणाऱ्या राष्ट्रीय पंच परीक्षेसाठी ची तयारी याचा आढावा घेण्यात आला.आगामी काळात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धा तसेच मिनी ओलंपिक स्पर्धा व राज्य राष्ट्रीय संघटनेच्या स्पर्धां बाबत चर्चा करण्यात आली. तायक्वांदो स्पोर्टस असोसिएशन ऑफ अहमदनगर चे जिल्हा सचिव तसेच ज्येष्ठ तायक्वांदो मार्गदर्शक श्री. घनश्याम सानप सर यांनी खेळात झालेल्या नवीन बदलांविषयी माहिती दिली. संघटनेत खजिनदार पदासाठी सर्वानुमते एन.आय.एस. कोच श्री. नारायण कराळे सर यांची निवड करण्यात आली. .यावेळी तायक्वांदो प्रशिक्षक गणेश वंजारी, अल्ताफ सर, सचिन कोतकर, राहुरीचे डॉ. नारायण माळी,श्रीरामपूर तालुक्याचे कलीम बिनसाद सर, राहता तालुक्याचे अशोक शिंदे सर,  नगर तालुक्याचे मच्छिंद्र साळुंखे , जाधव तुषार, तृप्ती चेमटे, मंदा खंदारे, धर्मनाथ घोरपडे, दीपक धनवटे, राष्ट्रीय खेळाडू योगेश बिचितकर , अजय पटेकर ,आदी हजर होते.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-संत निवृत्तीनाथ महाराजाच्या पालखीचे  श्रीरामपुर तालुक्यात आगमन होत असुन बेलापुर येथे मुक्कामी असणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होवू नये या करीता प्रथमच श्रीरामपुरचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत पाटील गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस श्रीरामपुर नगरपालीकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी बेलापूरात येवुन प्रत्यक्ष पहाणी केली व समाधान व्यक्त केले               सर्व अधिकारी अचानक बेलापूरात दाखल झाले त्यांनी बाजार समितीच्या आवारात जावुन माहीती घेतली  दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी पाच हजार वारकऱ्यांच्या भोजनाची निवासाची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे बाजार समितीचे पदाधिकारी व व्यापाऱ्यांनी सांगितले त्यांनंतर सर्व अधिकारी विठ्ठल मंदिरात गेले तेथे निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचा मान बेलापूरकरांना असल्याचे ग्रामस्थांनी अभिमानाने सांगितले तसेच मा जि प सदस्य शरद नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी गावात सर्वत्र फवारणी करण्यात आली असुन पिण्याचे पाणी भोजन अंघोळ व राहण्याची करण्यात आलेली व्यवस्था पाहुन अधिकाऱ्यांनी समाधन व्यक्त केले या वेळी सर्व सोयी सुविधा बरोबरच आरोग्य तसेच शौचालयाची काय व्यवस्था आहे याचीही अधिकाऱ्यांनी माहीती घेतली जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीसा प्रमुख मनोज पाटील यांनी सोलापुर येथे पदाभार स्विकारलेला असल्यामुळे त्यांनी पालखीतील वारकऱ्यांची कुठलीही गैरसोय होवु नये अशा स्पष्ट सूचना दिलेल्या असल्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी बेलापूरात येवुन पहाणी केली या वेळी  साहेबराव वाबळे राजेंद्र लखोटीया नंदु लढ्ढा जितेंद्र संचेती माऊली आंबेकर अनिल पुंड शोभासेठ लखोटीया रत्नेश कटारीया किरण गंगवाल दत्तात्रय जाधव सुनिल कोळसे डाँक्टर अविनाश गायकवाड विशाल आंबेकर विजू सोनवाणे निलेश नाईक अमोल गाढे सोपान महाराज हिरवे मा जि प सदस्य  शरद नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे रणजीत श्रीगोड पत्रकार देविदास देसाई प्रफुल्ल डावरे ऋतुराज वाघ हितेश बोरुडे मुकुंद चिंतामणी प्रमोद पोपळघट कामगार तलाठी ज्ञानेश्वर हाडोळे मयुर भगत मिलींद दुधाळ अरुण अमोलीक उपेंद्य कुलकर्णी हवालदार अतुल लोटके गणेश भिंगारदे निखील तमनर हरिष पानसंबळ रामेश्वर ढोकणे आकाश शिवदे गोलु राकेचा मंगेश भगत गणेश कोळपकर उपस्थित होते विठ्ठल मंदिरात सर्व अधिकाऱ्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.


अहमदनगर : जिल्ह्यातील राहुरी तालुका, ५ वर्षीय निरागस बालिकेवर  झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे हदरला आहे. राहुरी तालुक्यातील आरडगांव परिसरात ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली असून. घरात खेळत असलेल्या ५ वर्षीय बालिकेस, संधीचा फायदा घेऊन. याचा परिसरत राहत असलेल्या. २५ वर्षीय किशोर ऊर्फ केश्या विजय पवार या नराधमाने, १८ जूनच्या दुपारी साडेबारा वाजे सुमारास, खुर्द यांचे शेताचे बांधा जवळ असलेल्या. नारळाच्या झाडाच्या येथे ५ वर्षीय निरागस बालिकेला विवस्त्र करून, अमानुषपणे अत्याचार केला. एवढेच नाही तर नाराधमाने केलेले काळ कृत्याचे बिंग फुटू नये याकरिता. आरोपीने कापडाच्या सहाय्याने, पीडित बालिकेचा गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु घरातून बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेत असलेल्या, मुलीच्या आईने सदर घटना पाहिली. आणि त्या नराधमाला जागेवरच पकडून आरडा ओरड केली. हा आरडाओरड ऐकून पिडित बालिकेचे वडिल येत असल्याचे पाहून, त्या नराधमाने पिडित बालिकेच्या आईला धकलून घटनास्थळावरून पसार झाला. नशीब बलवत्तर होतं म्हणून,५ वर्षीय पीडीत बालीकेचा जिव वाचला. नाहीतर मोठा अनर्थ देखील घडला असता. सदरच्या घटनेनंतर पीडित बालीकेला अहमदनगर जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उप विभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके,  पोलीस फौज फाट्यासोबत घटनास्थळी दाखल झाले. व त्यांनी तात्काळ आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करून. अत्याचार करणाऱ्या नाराधमास गजाआड केले. माणुसकीला काळिमा फासणा-या घटने संदर्भात, पिडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून,आरोपी किशोर ऊर्फ केश्या विजय पवार अपहरण व अत्याचार प्रकरणी. राहुरी पोलिस ठाण्यात भदवी कलम ३०७,३७६ अ,३७६ अ, ब, ३६३, बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक  कायदा २०१२ चे कलम ८, ५ आय,एम, एन, पी, आर, ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा हे करीत आहेत.


अहमदनगर प्रतिनिधी:-जिल्हयात श्रीरामपुर मध्ये  तब्बल ८ गावठी कट्टे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून पकडले.८ गावठी कटयांबरोबर १० जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.येत्या दोन-तीन महिन्या नगरपालिकेची निवडणुक होणार आहे.निवडणुकीच्या तोंडावर तब्बल ८ गावठी कट्टे सापडल्याने शहरातील नागरीकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रस्तुत बातमीतील माहिती अशी की,श्रीरामपुरात काही जणांकडे गावठी कट्टे आल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके यांना मिळाली.सदर माहितीची खात्री करत जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील व पोनि.अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक श्रीरामपूर मध्ये गेले  असता पथकात सपोनि/सोमनाथ दिवटे यांच्यासह सफौ/राजेंद्र वाघ,संजय खंडागळे, बापू फौलाणे, देवेंद्र शेलार,भिमराज खरसे, पोना/शंकर चौधरी,सुरेश माळी,रवी सोनटक्के,मयुर गायकवाड,सागर ससाने, चंद्रकांत कुसळकर,आदींचे पथक श्रीरामपुरात आले असताना शहरातील एसटी स्टॅन्ड जवळ असणाऱ्या हॉटेल राधिकाच्या पार्कींगच्या परिसरात आरोपी असल्याची पक्की माहिती समजल्यानंतर याठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  सापळा लावला असता त्यानंतर आरोपी त्या ठिकाणी आल्यानंतर हेच ते आरोपी असल्याची खात्री पटल्यानंतर झडप घालून तिघा जणांना पोलिसांनी पकडले.त्यांच्याकडे झडती घेतली असता ८ गावठी कट्टे सापडून आले आणि त्याचबरोबर १० जिवंत काडतुसही मिळाले.या आरोपींना तातडीने पोलिसांनी गावठी कट्टयांसह ताब्यात घेतले.सदरची कारवाई श्री.मनोज पाटील पोलिस अधीक्षक अहमदनगर,श्रीमती.स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, श्री. संदीप मिटके उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर विभाग,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. याबाबत सफौ/ राजेंद्र वाघ नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून आर्म अॅक्ट कलम ३/२५,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील कार्यवाही श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.


अहमदनगर प्रतिनिधी-देश व राज्य पातळीवर विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर समाजात तेड निर्माण होईल अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा पोलीस दल सर्तक झाले आहे. यासाठी सायबर पोलीस काम करत आहे. त्यांचे सोशल मीडियावर विशेष लक्ष असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.मागील काळात मंदिर व मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आता नुपुर शर्मा प्रकरणामुळे सोशल मीडियात पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हायरल होण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात याप्रकरणी एका तरूणावर पोलिसांनी कारवाई केली आहे. मंगळवारी नगर शहरात एका युवकाने लाल किल्ला व तिरंगा ध्वजाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. बजरंग दलाने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटकही करण्यात आली आहे. मात्र, सोशल मीडियात अशा तणाव निर्माण करणार्‍या प्रक्षोभक पोस्ट व्हायरल होण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने आता यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सायबर सेलसह पोलीस ठाण्यामधील गोपनीय शाखांमार्फत त्यांच्या हद्दीतील हालचाली, सोशल मीडियातील पोस्ट आदींवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. असे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करून तात्काळ कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी कोणतीही पोस्ट फॉरवर्ड करताना, सोशल मीडिया पोस्ट करताना खबरदारी घ्यावी. चुकीच्या पोस्ट फॉरवर्ड करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

अहमदनगर प्रतिनिधी-गोवा राज्यात विक्रीस असलेल्या विदेशी मद्याची कंटेनरमधून वाहतूक केली जात होती. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने कारवाई करत कंटेनरसह मद्याचा मोठा साठा जप्त केला आहे. गुरूवारी नगर-पुणे रोडवरील पळवे (ता. पारनेर) शिवारात ही कारवाई करण्यात आली.या कंटेनरमध्ये 750 मिलीचे विदेशी मद्याचे एकूण 600 बॉक्स, तसेच 180 मिलीचे 950 बॉक्स होते. विदेशी मद्यासह कंटेनर (एमएच 04 इएल 6050) असा अंदाजे एक कोटी 21 लाख 50 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कंटेनरमधून विदेशी मद्याची वाहतूक केली जाणार असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार कंटेनरमधून वाहतूक करत असताना वाहन चालक प्रदीप परमेश्वर पवार (रा. तांबोळी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याच्या ताब्यातून मद्यसाठा जप्त केला आहे. सदर विदेशी मद्यसाठा गोवा राज्यातील महाराष्ट्र सीमेजवळ ताब्यात घेऊन नाशिक येथील टोलनाक्यावर घेऊन जात असल्याचे चौकशीत समोर आले आहे.बेकायदेशीरपणे परराज्यातील मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापू भोसले (खवनी, ता. मोहोळ जि. सोलापूर), निखील कोकाटे (रा. तांबोळी ता. मोहोळ जि. सोलापूर) यांचा गुन्ह्यात सहभाग आहे. पुढील तपास निरीक्षक ओ.बी. बनकर करत आहेत. सदरची कामगिरी राज्य उत्पादन शुल्कचे पुणे विभागीय उप आयुक्त अनिल चासकर, अहमदनगरचे अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्र.उपअधीक्षक बी. टी. घोरतळे, निरीक्षक बनकर, दुय्यम निरीक्षक आर. पी. दांगट, दुय्यम निरीक्षक ढोले, सहा. दुय्यम निरीक्षक संजय विधाते, तुळशीराम करंजुले, जवान निहाल उके, सुरज पवार, एन. आर. ठोकळ, शुभांगी आठरे यांच्या पथकाने ही करवाई केली.


बेलापुर (प्रतिनिधी  )-रायझींग इलेव्हन क्रिकेट अकँडमीने आयोजित केलेल्या कर्मयोगी मुरलीधर खटोड चषकाचा बहुमान व रुपये २१ हजार रुपयाचे पारितोषिक   कोपरगावच्या येसगाव संघाने मिळवीले            रायझींग इलेव्हन क्रिकेट अकँडमीच्या वतीने बेलापूरात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेकरीता प्रथम क्रमांकाचे (रुपये२१००० )एकवीस हजार रुपयाचे पारितोषिक कै .मुरलीधर खटोड पतसंस्थेच्या वतीने ठेवण्यात आले होते. तर योगेश पाटील नाईक मित्रमंडळाच्या वतीने द्वितीय क्रमांकाचे (रुपये ११०००)अकरा हजार रुपयाचे तसेच तृतीय क्रमांकाचे (रुपये ७०००)सात हजार रुपयाचे पारितोषिक किरण औटी मित्र मंडळाच्या वतीने ठेवण्यात आले होते. उत्तेजनार्थ (रुपये ५००० )पाच हजार रुपयाचे पारितोषिक किरण गंगवाल व आनंद दायमा यांच्या वतीने ठेवण्यात आले होते. या स्पर्धेत एकुण सोळा संघांनी सहभाग नोंदवीला. बेलापूरचा डीटीडीसी व कोपरगावचा येसगाव संघ यांच्यात अतिम लढत झाली. येसगाव संघाने प्रथम फलंदाजी करत सहा षटकात ६४ धावा केल्या. परंतु डीटीडीसी संघाला ही धावसंख्या गाठता आली नाही. प्रथम क्रमांकाचे रुपये एकवीस हजाराचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक येसगाव संघाने मिळवीले तर बेलापूरच्या डीटीडीसी संघाने दुसऱ्या क्रमांकाचे रुपये अकरा हजार रुपयाचे पारितोषिक मिळवीले. पढेगाव संघाने तिसरा तर एसडी लाईव्ह बेलापुर या संघाला चौथे बक्षिस देण्यात आले. या वेळी अशा मैदानी खेळांच्या स्पर्धा वेळोवेळी भरविल्या जाव्यात जेणे करुन मोबाईल तसेच व्यसनाच्या अहारी गेलेली तरुण पिढी खेळाकडे तसेच व्यायामाकडे वळेल असे मत जेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांनी व्यक्त केले. या वेळी खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड ,माजी सरपंच भरत साळूंके ,अजय डाकले, शिवसेना शहर प्रमुख अशोक पवार, अभिजित राका ,योगेश नाईक ,प्रसाद खरात, मुन्ना खरात ,गणेश मगर,जयेश अमोलीक , रफीक शेख , किरण भांड ,भूषण चंगेडीया, अँड.  यशवंत नाईक आदिच्या उपस्थितीत बक्षिस वितरण संपन्न झाले या सर्व सामन्याचे फेसबुकवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते त्या करीता निखिल ढमाले व विनोद शिंदे यांनी विशेष परिश्रम  घेतले. स्पर्धा यशस्वी करणेसाठी  रामभाऊ मगर ,सुनिल ढमाळे, फिरोज पठाण, किरण साळूंके, संकेत कुमावत, साई पवार, शकील शेख, सनी जगताप,  प्रतिक कर्पे, जितेश साळूंके, ब्रिजेश कर्पे, अजय धनवटे आदिंनी विशेष प्रयत्न केले शाहरुख पठाण यांनी सर्व सामन्याचे सुंदर असे  समालोचन केले होते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - सध्या महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे संयुक्त सरकार असुन समाजवादी पक्षाचे देखील महाविकास आघाडीस खुले समर्थन आहे,याकरीता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आमदार आबु आझमी यांना राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाची संधी द्यावी अशी मागणी समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार आणि कार्यकर्त्यांनी तिन्ही पक्ष प्रदेशाध्यक्षांसह पक्ष प्रमुखांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,सध्या महाराष्ट्र राज्यात शिवसेना,राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणी आ.भा.राष्ट्रीय कॉंग्रेस प्रणित महाविकास आघाडीचे संयुक्त सरकार असल्याने सर्वत्र खुपच चांगले आणि प्रशंसनीय विकासकामे होत आहे,तथा या आघाडीस पाठिंबा म्हणून समाजवादी पक्षाने देखील खुले सर्मथन दिलेले आहे,सोबतच समाजवादी पार्टी नेहमी आपल्या बरोबरीने कामे करण्यात सदैव तत्पर आणि अग्रेसर असतेच याकरीता आमच्या समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननिय आमदार आबु असिम आजमी यांना आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात समावून घेत त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी देण्यात यावी अशी आम्हा सर्व समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांची मागणी असल्याचेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शेवटी नमूद करण्यात आले आहे.या निवेदनाच्या प्रति

ना.उद्धव ठाकरे,मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) शिवसेना पक्ष प्रमुख मुंबई,ना.जयंत पाटील,मंत्री.जलसंपदा व लाभक्षेत्र प्राधिकरण, प्रदेशाध्यक्ष : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, मुंबई,आ.नानासाहेब पटोले,

प्रदेशाध्यक्ष : अ.भा.राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष, मुंबई,मा.खा.शरद पवार,

पक्ष प्रमुख: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तथा सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रसार माध्यमांना पाठविण्यात आल्या असल्याचेही जोएफ जमादार म्हणाले.


श्रीरामपूर प्रतिनिधी- उपप्रादेशिक परिवहन कार्यालया अंतर्गत येणाऱ्या, कोपरगाव हद्दीतील रेल्वे मालधक्क्यावर जेव्हा जेव्हा रॅक येतो, त्यावेळी काही हुंडेकरी जाणीवपूर्वक, स्थानिक कोपरगांव तालुका ट्रक मालक चालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या गाड्यांना डावलून. साईराजा रोडवेज व  साईचैतन्य रोड लाईन्सच्या .७० ते ८० गाडया क्षमतेपेक्षा जास्त माल घेवून वाहतुक करीत आहे. या ओव्हरलोड वाहतुक करून, स्थानिक युनियनवर अन्याय करीत असल्याने. अशा प्रकारच्या ओव्हरलोड वाहतूकीवर, श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार, संबंधितांवर व  त्यांचे गाडयांवर कडक कारवाई करून. शासकीय नियमानुसार दंडासह, जप्तीची कारवाई करावी. अशी मागणी कोपरगांव तालुका ट्रक मालक चालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच संबंधितांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई न झाल्यास ,श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी जे डी डगळे यांना, निवेदनाद्वारे युनियनने दिला आहे. सदरचे निवेदन देण्या वेळी, कोपरगांव तालुका ट्रक मालक चालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष आयुब कच्ची,अनिल हरकल,किरण वैद्य,वसीम सय्यद,प्रशांत पानकडे,संदीप कु-र्हे आदींसह कोपरगांव तालुका ट्रक मालक चालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.


श्रीरामपूर(प्रतिनिधी) :अहमदनगर पोखर्डी येथे छत्रपती स्पोर्ट्स क्लब आयोजित जिल्हास्तरीय तायकांडो स्पर्धेमध्ये संस्कार स्पोर्ट्स क्लब,श्रीरामपूरच्या खेळाडूंनी यश संपादन केले.या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत राज बारहाते (सुवर्ण),अनन्या शिंदे (रोप्य),अर्णव पगारे  (कास्य),सम्राट फंड(कास्य),प्रेमकुमार आठरे (कास्य) यांनी पदक प्राप्त केले . सर्व सहभागी व विजयी खेळाडूंनी   अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून श्रीरामपूर शहराचे व परिसराचे नाव खऱ्या अर्थाने उंचावले. या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून ३०० ते ३५० विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धा आयोजकांनी विशेष करून संस्कार स्पोर्ट्स क्लबचे अभिनंदन केले.यशस्वी खेळाडूंचे ह.भ. प.आचार्य शुभम महाराज कांडेकर,श्री करणदादा ससाणे, दैनिक राष्ट्र सह्याद्री संपादक श्री करण नवले,ॲड.गावडे ,श्री विजय खरात, श्री सचिन बडदे,श्री गणेश शिंदे इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. योग्य मार्गदर्शन व कठोर परिश्रमाच्या जोरावर खेळाडू आपले करिअर घडू शकतो,असे मोलाचे मार्गदर्शन महाराजांनी खेळाडूंना केले.शिवकालीन खेळ व शिवकालीन बालसंस्कार खऱ्या अर्थाने संस्कार स्पोर्ट्स क्लब मध्ये दिले जाते,असे प्रतिपादन श्री करणदादा ससाणे यांनी केले. संस्कार स्पोर्ट्स क्लब गेल्या ७ वर्षापासून शिवकालीन खेळ संस्कृती व बाल संस्कार याची खऱ्या अर्थाने जोपासना करीत आहे.श्रीरामपूरातील व परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थी,विद्यार्थिनींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आव्हान प्रशिक्षक श्री प्रवीण कुदळे यांनी केले.सर्व यशस्वी खेळाडूंना गणेश कुदळे व मुख्य प्रशिक्षक शिवभक्त श्री प्रवीण कुदळे यांचे मार्गदर्शन लाभले.

अहमदनगर प्रतिनिधी - पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण करुन खंडणीची मागणी करणा-यापैकी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचा-यांनी वेशांतर करून किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग याला राहुरीत पकडले आणि सुधीर मोकळ याला गणेशनगर (ता. संगमनेर) येथून तर संदीप कोरडे यास घोगरगांव (ता. श्रीगोंदा) येथून ताब्यात घेतले. तिघा आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्यात वापरलेल्या कार ही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतली. सर्व आरोपींना संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मुद्देमालासह हजर केले आहे  दि. २७ एप्रिल २०२२ रोजी किरण दुशिंग व इतर अज्ञात तीनजणांनी पिस्तुलाचा धाक दाखवून पांढरे रंगाचे कारमध्ये बसविले. दोन्ही हात उपरण्याने बांधून जीवे ठार मारण्याचे उद्देशाने अपहरण करुन खिशातील ११ हजार ५०० रु. रोख, विवो कंपनीचा मोबाईल व ताब्यातील पल्सर दुचाकी असा एकूण ४८ हजार ५०० रु.किंचा मुद्देमाल काढून घेतला. मारहाण करुन ३ लाख ५० हजार  रु.ची खंडणीची मागणी केली. लोहारे गांवातील मंदीरासमोर लोकांची गर्दी पाहून जीव वाचवण्यासाठी गाडीचा दरवाजा उघडून मोठमोठ्याने आरडाओरडा केली. तेथे जमलेल्या लोकांनी कार आडवताच आरोपी गाडी सोडून पळून गेले व सुटका झाली, या भाऊसाहेब धोंडीराम देव्हारे (वय ४८, रा. मुसळेवस्ती, लोणी, ता. राहाता) यांच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६५ / २०२२ भादविक ३६४ (अ), ३९७,३८४, ३४ सह आर्म ॲक्ट३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांना गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते. आदेशान्वये पोनि श्री कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथके नेमून तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक आरोपीची माहिती प्राप्त करुन शोध घेत असतांना पोनि श्री कटके यांना माहिती मिळाली, गुन्ह्यातील मुख्य आरोपी किरण दुशिंग हा राहुरी एसटीस्टॅण्डजवळ येणार आहे. आता गेल्यास मिळून येईल. ही माहिती पोनि श्री कटके यांनी पथकास देऊन रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचा-यांनी राहुरी येथे जाऊन वेशांतर करुन सापळा लावला.आरोपी किरण दुशिंग हा एक पांढरे रंगाचे कारमधून खाली उतरताना दिसला, त्याक्षणी त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. पथकाने त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग (वय २७, रा. उंबरे, ता. राहुरी) असे असल्याचे सांगितले. त्याला पोलिस खाक्या दाखविताच गुन्हा हा त्याचा साथीदार सुधीर मोकळ (रा. पारेगांव, ता. कोपरगांव) व संदीप कोरडे (रा. घोगरगांव, ता. श्रीगोंदा) अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. माहितीच्या आधारे आरोपी सुधीर मोकळ याच्या राहत्या पारेगांव खा (ता. राहाता) येथे जाऊन शोध घेतला असता आरोपी हा गणेशनगर, (ता. संगमनेर) येथे आहे, अशी माहिती समजल्याने स्थागुशा पथक तात्काळ गणेशनगर (ता. संगमनेर) येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन त्यास शिताफीने ताब्यात घेतले त्यास त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव सुधीर संपत मोकळ, (वय २३, रा. पारेगांव खा, ता. कोपरगांव) असे असल्याचे सांगितले. तसेच आरोपी संदीप कोरडे याच्या राहत्या घरी घोगरगांव, (ता. श्रीगोंदा) येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता तो त्याचे राहत्या घरी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.तसेच आरोपी किरण दुशिंग याच्याकडे स्विफ्टगाडीबाबत विचारपुस केली असता त्याने सुरुवातीस समाधानकारक माहिती दिली नाही. त्याचेकडे सखोल व बारकाईने चौकशी केली असता त्याने गाडी ही मध्यप्रदेश राज्यातून चोरी केल्याबाबत सांगितले. ती १० लाख रु. किचे स्विफ्टकारसह ताब्यात घेऊ तीनही आरोपींना संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मुद्देमालासह हजर केले. पुढील कारवाई संगमनेर तालुका पोलीस करीत आहे.यापूवी आरोपी किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुध्द पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात खून करणे, अपहरणासह खून करणे, अपहरण करणे, जबरी चोरी, घरफोडी असे एकूण ९९ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल व संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोनि अनिल कटक यांनी दिलेल्या सूचनेनुसार पथकातील पोसई  सोपान गोरे, सफौ राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोना भिमराज खर्से, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोकॉ रणजीत जाधव व चापोहेकॉ बबन बेरड आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


श्रीरामपूर प्रतिनिधी-मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा वर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून कारवाई करावी या साठी मुस्लिम समाजाच्या वतीने श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके साहेब यांना निवेदन देण्यात आले या वेळी मुस्लिम धर्मगुरुन सह मुस्लिम समाजाचे जबाबदार मंडळीन सह समाजाचे नागरिक आपली सर्व कामकाज पूर्ण पणे बंद करून सहभागी होते मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा  विरोधात देशभर तीव्र निदर्शने केली जात आहे. याचे पडसाद श्रीरामपूर तालुक्यातही आज उमटले.मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त

वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या बडतर्फ प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. याचे पडसाद जगभरात उमटले. जगभरातील मुस्लिम देशांनी नुपूर शर्माच्या वक्तव्याचा निषेध नोंदवून भारत सरकारकडे नाराजी व्यक्त केली. या प्रकरणामुळे भारताची नाचक्की झाली.दरम्यान मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी भारत बंदचे अवाहन केले होते. या बंदला देशभरात मोठा प्रतिसाद मिळाला. शुक्रवारच्या नमाजनंतर देशभरातील मुस्लिम बांधवांनी मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन दिले. भाजपच्या बडतर्फ प्रवक्त्या नुपूर शर्मा व नविन जिंदाल यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली. श्रीरामपूर मध्येही आज कडकडीत बंद पाळण्यात आला. दिवसभरात कुठेही अनुचित घटना घडली नाही. शांततेत दिवसभर बंद सुरू होता.व्यापारी बांधवांनी आजच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शुक्रवारच्या नमाज नंतर श्रीरामपूर शहरातील मुस्लिम बांधवांनी प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. नुपूर शर्मा यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यावेळी मुस्लिम बांधवांनी केली.

अहमदनगर प्रतिनिधी-भिंगार कॅम्प पोलिसांच्या आशीर्वादाने येथील बाजारतळावर खुलेआम सुरू असणार्‍या बिंगो जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापेमारी केली. यावेळी तिघांना पकडण्यात आले.भिंगार शहरातील चेतना वाईन शॉपच्या पाठीमागे बाजारतळावर पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पोलीस नाईक संदीप जाधव यांच्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अजय रामपाल बोत (वय 40), भुषण नंदकुमार खळे (वय 23), बंदी राजु मोरे (वय 21, तिघे रा. भिंगार) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एलसीडी, सीपीयु, किबोर्ड, रोख रक्कम असा 18 हजार 550 रूपयांचा ऐजव जप्त केला आहे. ऐतिहासिक भिंगार शहरात सध्या अवैध धंद्ये खुलेआम सुरू आहे. येथील बाजारतळावर या धंद्यानां उत आला आहे. गुटखा, मावा, दारू विक्रीपासून मटका, जुगार, बिंगो या अवैध धंद्याकडे भिंगार कॅम्प पोलिसांचे अर्थपुर्ण दुर्लक्ष झाले आहे.दरम्यान भिंगार शहरात बिंगो जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशाने पोलीस अंमलदार फकीर शेख, लक्ष्मण खोकले, संदीप जाधव यांच्या पथकाने नमुद ठिकाणी छापा टाकला असता बोत, खळे व मोरे बिंगो नावाचा हार जितीचा जुगार लोकांना खेळताना व खेळविताना मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.ऐकिकडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना बिंगो जुगार सुरू असल्याची माहिती मिळते, त्यांच्याकडून कारवाई होत असतानाही भिंगार कॅम्प पोलीस अर्थपुर्ण दुर्लक्षामुळे कारवाई करून शकत नसल्याने त्यांच्याविषयी पोलीस दलात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

अहमदनगर प्रतिनिधी-जिल्हा पोलीस दलात कार्यरत असणार्‍या 32 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहेत. पोलीस हवालदारपदी पदोन्नती मिळाल्याने पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे. यात सर्वाधिक पोलीस मुख्यालयातील आहे.हवालदारपदी पदोन्नती मिळाल्यामध्ये दिलीप पोटे (मोपवि), नामदेव शेळके (पोलीस मुख्यालय), कल्पना आरवडे (कोतवाली), प्रविण जगताप (पोलीस मुख्यालय), शितल लावरे (श्रीरामपूर तालुका), शरद गायकवाड (कोतवाली), वसिमखान रशिदखान पठाण (तोफखाना), दीपक घाटकर (पोलीस मुख्यालय), गणेश धोत्रे (कोतवाली), देविदास खेडकर (मसुप तिसगाव), शेख जहिर निजाम (शवाश, नगर), अमोल भोईटे (संगमनेर शहर), पठाण साजिद अल्लाउद्दीन (श्रीरामपूर तालुका), सचिन कुडके (साई मंदिर सुरक्षा, शिर्डी), पिनु ढाकणे (कोपरगाव शहर), जानकीराम खेमनर (राहुरी), विजय गंगुल (एसीबी प्रतिनियुक्ती), विजय खाडे (संगमनेर शहर), खंडू शिंदे (सुपा), गणेश चव्हाण (एसडीपीओ कार्यालय, नगर शहर), भारत भडकवाड (पोलीस मुख्यालय), कृष्णा वैरागर (पोलीस मुख्यालय), रंगनाथ नरसाळे (मसुप तिसगाव), शांताराम झोडगे (आश्वी), कैलास भिंगारदिवे (लोणी), संतोष फड (घारगाव), मनिषा चव्हाण (पारनेर), सविता खताळ (सायबर), रिना म्हस्के (नियंत्रण कक्ष), सुवर्णा गुंजाळ (नियंत्रण कक्ष), जयश्री ढोरजकर (सुपा), स्मिता भागवत (सायबर) यांचा समावेश आहे.


अहमदनगर प्रतिनिधी- दिवसा घरफोडी करणा-या टोळीचा म्होरक्या पकडण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. आरोपीकडून सुमारे ६ तोळे सोने व ९२० ग्रॅम वजनाची चांदी असे एकूण २ लाख ४२ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अविनाश दिलीप क्षेत्रे (रा भुषणनगर केडगाव अ.नगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, दि २० मे २०२२ रोजी सकाळी पहाटे ४.३० वा सुमारास मी आई वडिलांसह देवदर्शनकरीता राहते घरास कुलूप लावून जेजुरी येथे गेलो. या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून उचकापाचक करून गोदरेज कपाटातील सोन्या-चांदीचे ३ लाख ३ हजार १०० रुपये किंमतीचे दागीने स्वताःच्या आर्थिक फायद्याकरीता चोरुन नेले आहेत. या पुजा मनोज बडे (रा भुषननगर केडगाव अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुरनं । ३९४/२०२२ भादवि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करत असतांना पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे यांना माहिती मिळाली की, गुन्हा हा पाळत ठेवून झालेला असून घराची माहीती देणारे आरोपी हे अहमदनगर येथील आहे. घरफोडी करणारे आरोपी हे पुणे येथून आलेले होते, अशी प्राथमिक माहीती मिळाल्यावरुन आरोपींचा शोध घेणे कामी गुन्हे शोध पथकाचे एक पथक पुणे येथे व दुसरे पथक कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत रवाना करुन आरोपींचा शोध घेत असतांना एकजण गुन्ह्यातील चोरीस गेलेला सोने चांदीचा मुद्देमाल विक्री करणे करीता एकजण गंजबाजार येथे येणार असल्याबाबत माहीती मिळाली. त्या ठिकाणी सापळा लावून एकजण संशयीतरित्या सोने व चांदी विक्री करणे कामी सराफ बाजारात फिरताना मिळून आला. त्यास कोतवाली पोलीस पथकाच्या मदतीने ताब्यात घेऊन त्याला विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव अविनाश दिलीप क्षेत्रे (रा भूषणनगर केडगाव अ.नगर) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सोन्या-चांदीचे दागिणे मिळून आले. दागिण्याबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने व त्याचे साथीदार यांनी मिळून केडगाव भूषणनगर येथे घरफोडी केल्याचे कबुल केले. त्याला गुन्हा करते वेळी पुणे येथील आरोपी साथीदार होते असे त्याने सांगितले आहे. तसेच त्याच्या साथीदाराबाबत माहीती घेतली असून त्याचा कोतवाली पोलिस शोध घेत आहोत.

शिर्डी प्रतिनिधी-अश्लील व्हीडीओ तयार करून एका व्यक्तीकडून एक महिला व तिच्या साथीदाराने वेळोवेळी सुमारे 40 लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलेच्या त्रासाला कंटाळून पीडित व्यक्तीने पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी या महिलेला अटक करण्यात आली असून तिचा साथीदार पसार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पीडित व्यक्ती व आरोपी संगमनेर तालुक्यातील आहेत. या प्रकरणामुळे संपूर्ण शिर्डीसह जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील महिलेने तिच्या साथीदारासह फिर्यादीची राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील एका हॉटेलात अश्लील व्हीडीओ क्लीप बनवली. या महिलेची व फिर्यादीची ओळख होती. त्या ओळखीने ही महिला आर्थिक परिस्थिती गरीबीची आहे, असे सांगत वेगवेगळ्या कारणांसाठी वेळोवेळी हात उसने म्हणून पैसे मागायची. असे तिने लाखो रुपये घेतले. हे पैसे परत मागूनही ते दिले नाही. अचानक 7 मार्च 2022 रोजी या महिलेने फिर्यादीला फोन करून बाभळेश्वर येथील एका हॉटेलवर बोलावले.दुसर्‍या दिवशी 8 मार्च रोजी फिर्यादी हॉटेलवर गेला. रुममध्ये गेल्यावर या महिलेने पैसे मोजून घ्या, असे म्हणत दरवाजा लावून त्यानंतर काही वेळातच एक पुरूष रुममध्ये आला. त्याने या महिलेचे कपडे काढले व व्हीडीओ रेकॉर्डिंग करून माझे व या महिलेचे संबंध आहेत, असे वदवून घेतले व त्याचीही रेकॉर्डिंग केली. कुणाला काही सांगितले, तर जीवे ठार मारण्याची व व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर एमएच 17 बीव्ही 8886 या ब्रेझा गाडीत येऊन व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत 9 लाख रुपये उकळले.संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील व्यक्तीने शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिला व तिचा साथीदार राजेंद्र गिरी यांच्या विरोधात शिर्डी पोलिसांनी भा.दं.वि. कलम 384 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगिता कोकाटे करत आहेत.

नेवासा प्रतिनिधी-नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे दोन जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या वैजापूरच्या तरुणास नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 4 जून रोजी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना प्रवरासंगम बसस्टॅण्ड येथे एक मध्यम बांध्याचा तरुण देशी बनावटीचा कट्टा व काडतुसे विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.पोलीस निरीक्षक कटके यांनी विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, हवालदार दत्तात्रय गव्हाणे ,मनोज गोसावी, पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, दिपक शिंदे कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे व चालक हवालदार संभाजी कोतकर यांना सदर इसमावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे प्रवरासंमम येथे सापळा लावून सोन्या उर्फ संतोष पांडुरंग वंगाळ (वय 29) रा. रोटेगाव ता. वैजापूर जि. औरंगाबाद यास पकडले. त्याच्या ताब्यातून 30 हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल व 400 रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्याच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर फर्स्ट 459/2022 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे करत आहेत.


औरंगाबाद प्रतिनिधी - शिवप्रहार प्रतिष्ठान व शिव-शंभू भक्त परिवार, महाराष्ट्र यांच्या वतीने औरंगाबाद जिल्हयाचे नामकरण छ.संभाजीनगर व्हावे याकरिता बिगरराजकीय लोकचळवळ / मोहिम गेल्या सहा महिन्यापासून चालू आहे. या मोहिमेत वेगवेगळ्या पक्षाचे व संघटनांचे अठरापगड जातीचे शिव-शंभू भक्त सामील झालेले आहे. ही मोहिम लोकशाही मार्गाने, कुठलीही हिंसा न करता, कुठलाही कायदा हातात न घेता, कुठल्याही राजकीय पक्षाला विरोध वा समर्थन न करता सुरू आहे. 

        काल दि.०५/०६/२०२२ रोजी या मोहिमेच्या माध्यमातून “शंभू मेळावा - ०२” हा कार्यक्रम दहा ते पंधरा हजार मावळ्यांच्या उपस्थितीत संभाजीनगर शहरातील वीर सावरकर मैदान येथे अतिशय भव्य-दिव्य स्वरूपात पार पडला. यावेळी उपस्थिती मावळ्यांना महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज व शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख माजी पोलीस अधिकारी सुरजभाई आगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी पोलीस अधिकारी सुरजभाई आगे म्हणाले की, शंभूराजांना मारणाऱ्या मारेकऱ्याचे नाव हटवावे आणि शंभू राजांचे नाव कायदेशीररित्या जिल्हयाला लागावे तसेच जोपर्यंत कायदेशीररित्या संभाजीनगर होत नाही तोपर्यंत हि संभाजीनगर नामकरण मोहिम वेगवेगळ्या लोकशाही मार्गांचा अवलंब करून चालू राहणार आहे. आमची मागणी आहे की, औरंगजेबासारखा कुर शासक ज्याने स्वतःच्या बापची, भावाची, मुलाची, पुतण्याची हत्या केली, तसेच देशाचे आराध्य दैवत शिवछत्रपतींचा आग्रा येथील दरबारात अपमान केला आणि शिवछत्रपतींचा छावा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ४० दिवस प्रचंड हालहाल करून हत्या केली. त्या औरंगजेबचे नाव हटणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या औरंगजेबला अन्याय, अत्याचार, अनैतिकता, कुरता, विश्वासघात, गुलामगिरी यांचे प्रतिक मानले गेले त्या औरंगजेबचे नाव हटवून तेथे न्याय, नैतिकता, स्वराज्य, स्वातंत्र, शौर्य, धैर्य, पराक्रम यांचा संगम असलेल्या आपल्या शंभूराजांचे नाव लावावे याकरिता आम्ही लोकशाही मार्गाने लोकचळवळ उभारून ही मोहिम राबवत आहोत. आम्ही राष्ट्रभक्त डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव हटवण्यासाठी मोहिम काढलेली नसून शंभूराजांचा मारेकरी असलेला औरंगजेबचे नाव हटवण्यासाठी हि मोहिम आहे. 

      या शंभू मेळावा - ०२ कार्यक्रमाला सर्व अठरापगड जातीचे तळमळीचे मावळे स्वतःच्या खर्चाने वाहने करून आले व उपस्थित राहीले. संभाजीनगर, नगर, जालना, जळगाव, सांगली, नाशिक भागातून हजारो मावळे येथे आले होते. भर पावसात हा कार्यक्रम पार पडला. परंतु एकही मावळा जागेवरून हटला नाही आणि उठला पण नाही.

       याच मोहिमेच्या माध्यमातून दि. ०९/०४/२०२२ रोजी आम्ही शंभू मेळावा - ०१ हा कार्यक्रम वैजापूर शहरात घेतला. तसेच नंतरच्या काळात या मोहिमेत जय बाबाजी भक्त परिवार, शांतीगिरीजी महाराज धर्मयोदधा संघ-प्रमुख नागेश्वरजी महाराज ,समस्त शिवभक्त मित्र परिवार या संघटना देखील सामील झाल्या असुन महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी ज्यामध्ये राष्ट्रीय वारकरी परिषद, हिंदू राष्ट्र सेना, हिंदवी जनक्रांती सेना, हिंदूत्व सिंहनाद, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,हिंदू साम्राज्य महासंघ, छावा ,रोड मराठा उत्थान संघटना पानिपत-हरयाणा, धर्माचार्य मेटे महाराज इत्यादी संघटनांनी या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.

        तरी शंभूराजांच्या मारेकऱ्याचे "औरंगाबाद" हे नाव काढून शंभूराजांचे छत्रपती संभाजी महाराजनगर असे जिल्हयाचे नाव कायदेशीररित्या करावे व येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात संभाजीनगर नामकरण चा ठराव मंजूर करावा अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. जर मागणी पूर्ण झाली नाही तर धरणे आंदोलन करून मागणी पूर्ण करण्यासाठी लढा चालू राहील.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget