March 2021

बेलापुर  (प्रातिनिधी  )-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी काळजी घेणे गरजेचे असुन नियम न पाळणावर कठोर कारवाई करा अशा सुचना प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिल्या                                      बेलापुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देवुन बेलापुरगाव व परिसरातील कोरोना परिस्थितीचा आढावा त्यानी  घेतला या वेळी तहसीलदार प्रशांत पाटील जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक  खंडागळे  पत्रकार देविदास देसाई  उपस्थित  होते.  या वेळी उपविभागीय अधिकारी अनिल पवार म्हणाले की सर्वांना मास्क सक्तीचे करा जे दुकानदार मास्क वापरणार नाही तसेच ग्राहाकांना मास्कची सक्ती करणार नाही अशी दुकाने सात दिवसासाठी सिल करा कोरोनाचा सामना करावयाचा असेल तर नियम पाळावेच लागतील नियम न पाळणारावर कठोर कारवाई करा अशा सुचनाही पवार यांनी ग्रामपंचायतीला दिल्या या वेळी गावात मास्क वापरण्याबाबत दवंडी दिलेली आहे तसेच मास्क न वापरणार्यावर कारवाई करण्याच्या सुचना पोलीसांना दिलेल्या असल्याचे सरपंच साळवी व उपसरपंच खंडागळे यांनी सांगितले  या वेळी प्राथमिक आरोग्य  केंद्राचे आरोग्याधिकारी देविदास चोखर प्रफुल्ल डावरे पुरुषोत्तम भराटे दिलीप दायमा किशोर कदम अकबर टिन मेकरवाले आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.


श्रीरामपुर-दि.  29/03/2021 रोजी श्रीरामपुर पोलिसांना  गुप्त बातमीदार मार्फत   मातुलठाण शिवारातील गोदावरी नदी पात्रात पोकलेनच्या सहाय्याने वाळू उपसा करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने श्रीरामपुर पोलिसांनी सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकला असता  आरोपी क्र 1)  सुनीलकुमार  चूरामन महतो वय 24 वर्ष रा धोडा वस्ती ता.बेरमो जि.बोकारो राज्य झारखण्ड  हल्ली मनजीत सिंग  धुप्पड यांचेकडे रा आनंदवली  नाशिक 2) मनजीत सिंग  धुप्पड  रा आनंदवली  नाशिक 3) अंजनी गौरीशंकर विश्वकर्मा वय 24 रा. राजोहा ता. बहरी जिल्हा सिधी. मध्य प्रदेश 4) युवराज सिंग केशर सिंग भंडारी वय 40 रा.डी जी बागेसर जि. डेहराडून 5) रवी धुप्पड रा. श्रीरामपूर यांचे कडुन 2 पोकलेन, 1 बुलडोझर ,1 ट्रक 1 मोबाईल, 4 ब्रास वाळू असा एकूण 1,83,50000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.अन्य   एक आरोपी फरार असून सर्व  आरोपी विरुध्द     श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे गु. क्र. 65/2021 व 66/2021  भा द वि कलम 379,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे, DySP राहुल मदने,Dy.s.p  संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे,  पोसई अतुल बोरसे, स फौ. राजेंद्र  आरोळे, पोहे का सुरेश  औटी, पोहे का गोरे,  पोना  लोंढे, गोरे, रणवरे,  पोलीस कॉन्स्टेबल काका मोरे, नितीन चव्हाण, रवींद्र माळी, नितीन शिरसाठ , सुनील शिंदे आदींनी केली.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली प्रत्येकाच्या जीवनातील वार्षिक अंदाजपत्रकाची रात्र म्हणून गणली जाणारी शबे बरात रविवारी रात्री सर्व मुस्लिम बांधवांनी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली. पोलीस प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करीत रात्री मशिदीतील नमाजनंतर सर्वांनी आपल्या घरात प्रार्थना केली. कबरस्तानात कोणीही गेले नाही. त्यामुळे जमा मशिद व कबरस्थान परिसरात दरवर्षी दिसणाऱ्या गर्दी ऐवजी शुकशुकाट दिसत होता.

शबे बरात ही प्रत्येक मुस्लिमांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण रात्र असून या रात्री प्रार्थने बरोबरच कबरस्तानात जाऊन आपल्या पूर्वजांसाठी  दुआ ही केली जाते. परंतु कोरोनामुळे यावर्षी पोलिसांनी अशा पद्धतीने गर्दी करू नये. त्यामुळे प्रादुर्भाव वाढू शकतो. अशा सूचना केल्या होत्या. जामा मशिद ट्रस्ट व इतर सर्व मशिदींचे मौलानांशी विचारविनिमय करून पोलीस प्रशासन व धार्मिक संघटना यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार प्रशासनाने दिलेल्या सर्व निर्देशांचे मुस्लीम समाजाने तंतोतंत पालन केले. त्यामुळे रात्री दरवर्षी दिसणारी गर्दी कुठेही दिसली नाही. रात्री नऊ नंतरच रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. सर्व मुस्लिम बांधवांनी आपल्या घरांमध्ये प्रार्थना केली .

सध्या कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार माजलेला आहे. शासन आणि प्रशासन जनतेच्या सेवेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शबे बरातच्या रात्री दरवर्षी हजारो मुस्लिम बांधव मिलाद पठण करीत कबरस्थान मध्ये जातात. तेथे मुफ्तीसाहेबांचे प्रवचन होते. त्यानंतर आपल्या पूर्वजांच्या कबरीवर जाऊन फुलांची चादर किंवा फुले  अर्पण केली जातात व दुआ केली जाते. मात्र सध्याच्या या वातावरणात अशी गर्दी केल्यास शहरातही प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सर्वांना विश्वासात घेऊन नियोजन केल्याने त्याला प्रतिसाद देत सर्वांनी आपल्या पूर्वजांसाठी घरातूनच दुआ केली. प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका मुस्लिम समाजाची नेहमीच असते.त्याचा प्रत्यय रात्री देखील आला.


अहमदनगर |प्रतिनिधी-करोना संसर्ग वाढल्याने राज्य सरकारच्या आदेशानुसार नगर जिल्ह्यात प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.जिल्हा प्रशासनाने याबाबतचे आदेश 28 मार्च रोजी जारी केले असून यात 15 एप्रिलपर्यंत रात्रीच्यावेळी गर्दी कमी करण्यासाठी पाच पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास प्रत्येकी एक हजाराचा दंड करण्यात येणार आहे. यासह नियम कडक करण्यात आलेले आहेत.जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काढलेल्या आदेशात सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई राहील. तसेच रात्री 8 ते सकाळी 7 दरम्यान 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास प्रति व्यक्ती एक हजारांचा दंड आकारण्यात येईल. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तीच्या हालचालीवर आणि फिरण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत निर्बंध टाकण्यात आलेले आहेत.कंटेन्मेंट झोनसाठी यापूर्वीच्या आदेशाव्दारे असलेले सर्व निबंध लागू राहतील. या झोनचे सिमांकन व अंतर्गत कार्यपध्दती याबाबत राज्य व केंद्र शासनाव्दारे वेळोवेळी जारी केलेले निर्देश लागू राहतील. कंटेन्मेंटमध्ये आढळलेल्या करोना बाधीत रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा यादी करुन शोध घेणे तसेच त्यांना अलग ठेवणे व 14 दिवस संपर्कात राहणे. (80 टक्के संपर्कातील व्यक्तींचा 72 तासांच्या आत शोध घेणे), सार्वजनिक ठिकाणे (उद्याने, बागा इ.) रात्री 8 ते सकाळी 7 दरम्यान बंद राहतील.उल्लंघन केल्यास प्रती व्यक्ती एक हजारांचा आकारण्यात येईल. विनामास्क आढळलेल्या व्यक्तीस 500 रुपये दंड आकारण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी थुकताना आढळलेल्या व्यक्तीस एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल. सर्व सिनेमा हॉल्स, प्रेक्षागृह, मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंटस्, हे रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीत बंद राहतील. परंतु हॉटेल्स, रेस्टॉरंटस् यांना घर पोच सेवा आणि पार्सल सुविधा देण्यास मान्यता राहील.आदेशाचे उल्लंघन झाल्यास, संबंधित सिनेमा हॉल्स, प्रेक्षागृह, मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंटस् हे केंद्र शासनाव्दारे कोविड-19 साथरोग हा आपत्ती म्हणुन जाहीर केलेल्या कालावधीपर्यत बंद करण्यात येतील. तसेच उल्लंघन केलेले ठिकाणचे मालकास आपत्ती कायद्मातंर्गत दंड देखील केला जाईल.सर्व प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय, धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्यास मनाई राहील. प्रेक्षागृह किंवा नाट्यगृहे यांचा कार्यक्रमास वापर करण्यास मनाई राहील. याबाबत उल्लंघन झाल्यास संबंधित ठिकाणचे मालकास आपत्ती कायद्यांतर्गत दंड केला जाईल. तसेच केंद्र शासनाव्दारे कोविड-19 साथरोग हा आपत्ती म्हणुन जाहीर केलेल्या कालावधी पर्यत सदर मालमत्ता बंद करण्यात येईल. फक्त विवाह समारंभास जास्तीत-जास्त 50 व्यक्तींना एकत्र येण्यास निबंध असणार नाहीत.मंगल कार्यालय, लॉन्स, मॅरेज हॉल व लग्न समारंभाचे ठिकाणी लग्न समारंभासाठी आलेले वर्‍हाडी, पाहुणे मंडळी, मंगल कार्यालयातील कर्मचारी, आचारी व इतर उपस्थित सर्व व्यक्ती मिळून जास्तीत-जास्त 50 व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल. लग्न समारंभ आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी. टेबल, खुर्च्या, पाण्याचे नळ व हाताळण्यात येणारे सर्व वस्तूंचे पृष्ठभाग इत्यादीचे निर्जतुकीकरण करण्यात यावे.मंगल कार्यालय, लॉन्स, मेरेज हॉल व लग्न समारंभाचे ठिकाणच्या आस्थापणांना लग्न समारंभासाठी येणार्‍या सर्व व्यक्तींचे थर्मल स्कॅनॅरव्दारे स्क्रिनिंग करणे तसेच सॅनिटायझर डिस्पेन्सरचा वापर करणेबंधनकारक राहील. लग्न समारंभात शारीरिक अंतराचे पालन करण्यात यावे. दोन व्यक्तींमध्ये कमीत-कमी 6 फुटांचे अंतर ठेवावे, यासह आरोग्य संस्था आणि अन्य अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय आणि खासगी कार्यालयात 50 टक्के उपस्थिती ठेवण्यात यावी. शासकीय कार्यालयात तातडीचे काम असणार्‍यांना प्रवेश देण्यात यावा, तसेच धार्मिक स्थळ या ठिकाणी गर्दी नियंत्रणाचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.


श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथील पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव यांना मातापूर शिवारात काही इसम जुगार खेळत असल्याबद्दल माहिती मिळाली. यावरून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मातापूर शिवारात बनकरवस्ती परिसरातील हाडोळ्याच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली काही इसम जुगार खेळत असल्याचे आढळून आले.यावेळी त्यांच्याकडे तपासणी केली असता रोख रक्कम, मोबाईल व पत्ते आढळून आले. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे श्रीरामपूर शहरातील मटका जुगार याचेदेखील काही ठिकाणी कारवाई करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक संजय सानप तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक परदेशी व पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, पोलीस हवालदार रघुनाथ खेडकर यांनी छापा टाकला. सदर आरोपींवर कडक कारवाई करण्यात आली असून यापुढे अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मीळत आहे.  .

बेलापूर (प्रतिनिधी) – तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी ४ कोटी १७ लाख रुपये खर्चाच्या अंदाज पत्रकात उंच पाण्याच्या टाकीचे बांधकाम धरलेच नाही तर पाण्याच्या टाकीत खोडा घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तसेच पाण्याची टाकी पाडण्याबाबतचा विषय हा कुठल्याच मिटिंग मध्ये झालेला नाही, जुन्या पाण्याच्या टाकी बांधकामाबाबत विरोधकांनी चुकीची माहिती गावापुढे मांडून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा खुलासा जि.प.सदस्य शरद नवले व सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी पत्रकार परिषदेत केला.

बेलापूर येथील पाण्याच्या टाकीबाबत विरोधाकाकडून दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध झाल्याबद्दल बेलापूर बु.ग्रामपंचायत येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करून पत्रकारांना सर्व कागदपत्रे पुराव्यासह हाती देण्यात आले.

यावेळी जि.प.सदस्य शरद नवले म्हणाले कि माझे सरपंच पदाच्या कार्यकाळात १.५ MLD क्षमतेचा फिल्टर प्लॅन्ट बांधला होता तो  फिल्टर प्लॅन्ट वेळोवेळी वॉश आउट न केल्यामुळे गावाला दुषित पाणी प्यावे लागले. तसेच वॉश आउट न केल्यामुळे व त्याची देखभाल न केल्यामुळे फिल्टर प्लॅन्ट खराब झाला तसेच फिल्टर प्लॅन्ट ग्रामपंचायतींने बांधलेला आहे, असे तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी  प्रस्त्वावित केलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकात का लिहून दिले? त्यामुळे फिल्टर प्लॅन्ट गायब झाले या आरोपात तथ्य नाही. या पाण्याच्या टाकी बाबत काही दुर्घटना घडली असती तर गावाच्या पाणी पुरवठ्याचे काय? असा सवालही नवले यांनी उपस्थित केला असून स्वतःचे  पाप झाकण्यासाठी खोटे- नाटे बिन- बुडाचे आरोप करत आहे. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी पाण्याच्या टाकीचे काम वेळीच हाती घेतले असते तर हा प्रश्नच उपस्थित झाला नसता. या परिसरात अनेक वेळा शाळा, महाविद्यालय यांच्या सहली व गोरगरीबांचेही लग्नही पार पडलेले आहे. अशा वेळी जर काही दुर्घटना घडली असती तर त्यास जबाबदार कोण राहिले असते असा प्रश्नही नवले यांनी उपस्थित केला.

यावेळी बोलताना सरपंच महेंद्र साळवी म्हणाले कि मी उपसरपंच असताना आलेले टाकीबाबतचे ते पत्र कुठल्याही बैठकीत समोर आणले नाही, तसेच कुठल्याही बैठकीच्या इतिवृत्तात याची नोंद नाही. माझी सरपंच म्हणून निवड झाल्यानंतर कागदपत्रे पाहताना टाकी बाबतचे ते पत्र वाचण्यात आले. त्या पत्राचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर पत्राबाबतची चर्चा मासिक सभेमध्ये घडवून आणून सदरचा विषय गावासमोर आणला. तत्कालीन सत्ताधारी सांगतात कि १३ कोटी रुपयाची योजना प्रस्तावित केली होती परंतु दप्तरी याबाबत कुठलाही पुरावा सापडत नाही. केवळ जनतेची दिशाभूल करण्याची कामे विरोधक करत आहे. वास्तविक पाण्याच्या टाकी संदर्भात त्या काळात जे सरपंच होते त्यांनीच खुलासा देणे आवश्यक असताना निवडणुकीत ज्यांना जनतेने नाकारले तेच खुलासा देत आहे.या सारखे दुर्दैव काय  नवीन टाकी बांधकामासाठी २ वर्षांचा कालावधी लागणार असल्याने या काळात दुर्दैवाने टाकी पडली व काही दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण व गावाला पाणी पुरवठा कसा होणार असा सवालही सरपंच साळवी यांनी उपस्थित केला. 

यावेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले कि, बेलापूर गावाचे सर्व माजी दिवंगत सरपंचाच्या बाबत आदरच असून त्या सर्वांनी गावाला दिलेले योगदान फार महत्वाचे आहे. परंतु जुन्या पाणी पुरवठा योजनेबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर  होणे आवश्यक आहे. बेलापूर बु. पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन दिवंगत सरपंच कै.घमाजी कुऱ्हे यांचे कार्यकाळात सन १९७१ साली झाले होते. परंतु पाणी पुरवठा योजनेसाठीची लोकवर्गणी भरलेली नव्हती व पाण्याच्या तळ्यासाठीची जागा


ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित झालेली नव्हती. माजी सरपंच कै.भागवतराव खंडागळे यांच्या कार्यकाळात सन १९७२ ते १९७७ या कार्यकाळात पाणीपुरवठा योजनेची लोकवर्गणी भरण्यात आली. त्याच प्रमाणे पाणीपुरवठा योजनेची सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. तसेच पाण्याच्या तळ्यासाठीची जागा शेती महामंडळाकडून हस्तांतरित करण्यात आली. पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले नंतर ग्रामदैवत श्री हरिहर केशव गोविंदास नळातून आलेल्या पाण्याचा अभिषेक करून सदर योजनेचे औपचारिक उद्घाटन सन १९७७ ला कै.भागवतराव खंडागळे यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात करण्यात आले. तसेच याच साली पाणी पुरवठ्याचे खाजगी कनेक्शन देनेबाबत नियमावली बनविण्यात आली. सदरील योजना ग्रामपंचायतीकडे तांत्रिक स्टाफ नसल्याने १ वर्षाकरिता शासनाच्या जीवन प्राधिकरणाद्वारे चालविण्यात आली. कै.खंडागळे सरपंच असताना १ वर्ष गावाला पाणीपुरवठाही झाला. पुढे सन १९७८ साली ती योजना शासनाने ग्रामपंचायतीकडे वर्ग केली. जनतेच्या पैशावर डल्ला मारणारा पुढारी होण्यापेक्षा विकास कामांची माहिती लोकांपर्यंत पोहचवणारा व्हॉट्सअॅप पुढारी होणे आम्हा सत्ताधारी ११ सदस्यांना मान्य आहे असा टोलाही श्री.खंडागळे यांनी लगावला. या सर्व विषयांच्या संदर्भात नागरिकांना माहिती हवी असल्यास त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे ग्रामपंचायतीकडून माहितीसाठी उपलब्ध करुण देण्यात येतील असे अवाहन जि.प.सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले आहे. सदरील पत्रकार परिषदेस ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले, मुस्ताक शेख, रमेश अमोलिक, सौ.प्रियांका कुऱ्हे, अशोक गवते, सचिन अमोलिक, प्रभात कुऱ्हे आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर - शहरातील मिल्लत नगर भागातील विकासाचा अनुशेष भरून काढण्याची जबाबदारी नगरपालिकेची असून आगामी काळामध्ये मिल्लत नगरचा सर्वांगीण विकास करून या उपनगराला शहरामध्ये आदर्श बनवू. येथील ओपन स्पेस मध्ये थत्ते ग्राउंड प्रमाणे जॉगिंग ट्रॅक, बसण्यासाठी बाक, वृक्षारोपण व इतर सुविधा लवकरच निर्माण करून देऊ असे प्रतिपादन लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी केले.

शहरातील मिल्लतनगर भागातील सेक्टर २ व ३ मध्ये रस्त्याच्या कामाचा शुभारंभ तसेच सेक्टर १ मध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी नगरपालिकेचे ज्येष्ठ नग


रसेवक बाळासाहेब गांगड, ताराचंद रणदिवे, मुक्तार शहा, रईस जागीरदार, प्रकाश ढोकणे, कलीमभाई कुरेशी, सय्यद असलमभाई तसेच या भागातील प्रमुख कार्यकर्ते शेख अकील सुन्नाभाई,शिक्षक बँकेचे संचालक सलीमखान पठाण, हाजी सय्यद युसूफभाई, गुलाब वायरमेन,अकबर पठाण, हाजी अमीन शेख, मुन्ना खान, असलम बिनसाद,तोफिक शेख, समीरखान पठाण, राजू जहागीरदार, अफरोज शहा,सलीम पटेल, युसुफ लाखानी, बाबुभाई वेल्डर, आरीफ दारूवाला,फारूक तांबोळी आदी उपस्थित होते.

नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक पुढे म्हणाल्या कि सुरुवातीची दोन वर्ष नगरपालिकेपुढं निधीच्या खूप अडचणी होत्या. मागील वर्ष कोरोणामुळे वाया गेले. आता पालिकेला आपले सरकार असल्याने शासनाकडून बर्‍यापैकी निधी प्राप्त होत आहे. शहरातील अनेक कामे आम्ही मंजूर करून ठेवली आहेत. आता त्या कामांना सुरुवात झाली आहे. मिल्लत नगर मधील सर्व प्रश्नांची मला जाण आहे. नजिकच्या काळामध्ये सर्व प्रश्न सोडविले जातील. मिल्लत नगर मधील ड्रेनेजचा प्रश्न खूप मोठा आहे. महिना दीड महिन्यांमध्ये तो मार्गी लागेल.ज्या रस्त्याच्या कामाचा आज शुभारंभ होत आहे त्याचे काम रमजान महिना सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावे असे आदेश त्यांनी नगरपालिकेचे नगर अभियंता यादव आणि संबंधित ठेकेदारांना दिले .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना या भागातील सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक बँकेचे संचालक सलीमखान पठाण यांनी मिल्लत नगर मध्ये विकास झालेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. परंतु मिस्टर नगरसेवक अल्तमश पटेल यांनी आता लक्ष घातल्याने अनेक कामे मार्गी लागली आहेत. दोनच महिन्यांमध्ये पाईपलाईनच्या कामाला रितसर मंजुरी घेऊन ते काम आता होत आले आहे असे सांगून मिल्लत नगर मधील प्रमुख समस्या विशद केल्या. केला जाणारा रस्ता हा छोटा असून त्यामुळे अतिक्रमण वाढण्याची भीती असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला चार चार फुटापर्यंत पेविंग ब्लॉक बसविण्याची मागणी त्यांनी केली. ती नगराध्यक्षांनी तात्काळ मंजूर केली.

यावेळी  नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, उपस्थित सर्व नगरसेवक व या भागातील प्रमुख नागरिक

शेख अकिल सुन्नाभाई,

सलीमखान पठाण,हाजी युसूफभाई सय्यद, युवानेते अल्तमश अन्सार पटेल, बाबुखान पठाण (वेल्डर),

आरीफभाई दारुवाला, हाजी अमीन शेख,युसूफ लाखाणी,

शकिल बागवान,शौकतभाई शेख,गुलाबभाई वायरमेन,

 सलीम रसूल पटेल,फिरोज पिंजारी, अकबर पठाण, रहमान शाह,अफरोज शाह, टायगर सरयांच्या हस्ते रस्त्याचे व पाईपलाईनच्या कामाचे श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.

प्रभागातील जनतेच्या वतीने नगराध्यक्षा आदिक यांचा आमेना गुलाब शेख व नूरजहान शेख यांनी तर अल्तमश पटेल यांचा अकिल सुन्नाभाई यांनी सत्कार केला .कार्यक्रमानंतर मिल्लत

नगरच्या मागील भागातील ड्रेनेज सिस्टीम ची नगराध्यक्षांनी पाहणी केली. यावेळी तेथील महिलांनी त्यांची गा-हाणी नगराध्यक्षांपुढे मांडली. त्या भागातील एकूण विदारक परिस्थिती पाहून नगराध्यक्षांनी खूपच नाराजी व्यक्त करीत नगर अभियंता यादव यांना तातडीने ड्रेनेज सिस्टिमचे काम मार्गी लावण्याचे आदेश दिले.

मिल्लत नगर मध्ये कामे होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीची भावना यापूर्वी होती. परंतु अल्तमश पटेल यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केल्यानंतर पटापट कामे मंजूर होऊन कामांना सुरुवात देखील झाली आहे. मिल्लत नगर मशिदी समोर बसवलेल्या पेव्हिंग्ज ब्लॉकची  देखील त्यांनी पाहणी केली व झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्तमश पटेल,  निरंजन भोसले, गुलाब वायरमेन, मुन्नाभाई, अन्वर भाई यांनी विशेष परिश्रम घेतले. रमजान महिना लवकरच सुरु होणार असल्याने ही कामे लवकर पूर्ण व्हावी अशी अपेक्षा या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपूर शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु असुन गुन्हेगारांचा फास आवळणारे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके आल्यानंतर अवैध धंदे बंद होतील अशी आशा नागरीकांना होती परंतु सध्याची परिस्थिती पहाता नागरीकांचा भ्रम निरास झाला असुन दारु मटका,गुटका,क्लब त्याच बरोबर अवैध मार्गाने गौण खजिन

लुटणार्याचा देखील सुळसुळाट झाला आहे.श्रीरामपुर शहर व तालुक्यात अवैध धंद्याना उत आला असून हे सर्व धंदे सर्रासपणे चालविणाऱ्या लोकांना जणू पोलिसांची भीतीच उरली नसल्याचे प्रथमतः दिसून येत आहे.मुख्यतः शहरातील बाजारपेठ परिसरातील भर रस्त्यात व लहान लहान गल्लीबोळात सर्रासपणे मटका आकड्याचे  दुकाने सुरु आहेत.याकडे मात्र पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी केलेले दुर्लक्ष बरेच काही सांगून जाते.मध्यंतरी पोलीसांनी फार मोठा गुटखा पकडला त्याचा तितकाच गवगवाही झाला अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाला अंधारात ठेवुन ही मोठी कारवाई पार पडली त्या नंतर गुटखा विक्री बंद होणे आवश्यक होते पण आज छोट्या व्यवसायीका

पासुन ते मोठ्या व्यापार्या पर्यत सर्वाकडे गुटखा मिळतो ते ही अव्वाच्या सव्वा किमतीला त्यामुळे शासनाने केलेला गुटखा बंदी दारु बंदी मटका बंदी हे सर्व कायदे कागदावरच राहातात की काय अशी शंका सुजाण निगरीकांना येत आहे. 

बेलापुर  (प्रतिनिधी  )-सन २०१५ मध्ये धोकादायक पाण्याच्या टाकी पाडण्याबाबत पत्र आले होते परंतु त्या पुर्वीच २०१४ मध्ये खास बाब म्हणून  चार कोटी सतरा लाख रुपये किमतीच्या पाणी योजनेस जि प सदस्य शरद नवले यांनीच खोडा घातला असल्याचे पत्रक पंचायत समिती सदस्य अरुण पा नाईक बाजार समितीचे संचालक सुधीर नवले व माजी उपसरपंच रविंद्र खटोड यांनी प्रसिद्धीस दिले आहे.प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात नाईक नवले व खटोड यांनी पुढे म्हटले आहे की गावाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी धोकादायक झाल्याचे लक्षात येताच सव्वा चार कोटीची पाणी पुरवठा योजना तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री रणजित कांबळे यांच्याकडून मंजुर करुन आणली होती त्याची सर्व पूर्तता पुर्ण झाली होती परंतु ग्रामपंचायत निवडणूका डोळ्यासमोर ठेवुन जि प सदस्य शरद नवले यांनी वाड्या वस्त्यावर पाणी पुरवठा करणे गरजेचे असुन फेर इस्टिमेट करावे असे लेखी पत्रच कार्यकारी अभियंता यांना दिल्यामुळे ते पाण्याच्या टाकीचे काम होवु शकले नाही हे सत्य लपवुन आपल्या बेजबाबदार पणाचे खापर दुसर्यावर फोडत आहे खरे तर गावासाठी पुर्णतः नविन योजना बनविने गरजेचे असताना पंधराव्या वित्त आयोगाचे पैसे वापरुन काय साध्य होणार आहे पाण्याच्या नविन टाकी बरोबरच नविन साठवण तलाव वाँटर फिल्टर प्लँन सप्लाय फिल्टर प्लँन वाड्यावस्त्यावरील पाईप लाईन हे सर्व  नविन योजनेत समाविष्ट होणे आवश्यक आहे हे सर्व सोडून जि प सदस्य आपली जबाबदारी झटकून आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्याच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करत आहे या गावाला जि प सदस्य नवले यांनी किती निधी दिला ते तरी जाहीर करावे  पाण्याची टाकी धोकादायक असल्याचे  पत्र जिल्हा परिषदेने दिले मग ही बाब सदस्याला समजली नाही का मग ते पाच वर्ष शांत का बसले त्या पुर्वी सन २००८ मध्ये एक कोटी ४६ लाख खर्चाची पाणी योजना शरद नवले सरपंच असताना केली त्यात २३ लाख खर्चाचा फिल्टर प्लँंट होता तो कुठे गायब झाला आज गावाला खराब पाणी पुरवठा होतोय हे पाप कुणाचे आहे लोकांना खोटी अश्वासने देवुन सत्तेत आलात आता लोकांची कामे करा आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी दुसर्याच्या खांद्यावर बंदुक ठेवुन लढणे बंद करा असेही नवले नाईक खटोड यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.


बेलापुर (प्रतिनिधी  )--श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची  टाकी धोकादायक असुन ती पाडण्याची सुचना सन २०१५ ला करुन देखील त्या काळातील पुढाऱ्यांनी तो अहवाल लपवुन ठेवला असुन दुर्दैवाने काही अघटीत घडले तर त्यास जबाबदार कोण असा सवाल सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केला आहे.          बेलापुर गावाला पाणी पुरवठा करणारी एकमेव टाकी असुन ती जवळपास १९७० काळात बांधली गेलेली आहे या उंच पाण्याच्या टाकीचे प्रवरा ग्रामिण अभियांत्रिकी महाविद्यालय लोणी यांचे मार्फत स्टूक्यरल आँडीट करण्यात आले होते त्या

वेळी ही टाकी धोकादायक असुन पाडण्यात यावी असा अहवाल देण्यात आला असताना तो त्या वेळच्या सत्ताधार्यांनी दाबुन ठेवला या बाबतची माहीती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी पत्रकारांना माहीती देताना सरपंच साळवी व उपसरपंच खंडागळे  यांनी त्या पत्राच्या प्रतिच पत्रकाराच्या हातात ठेवल्या या वेळी सदस्य चंद्रकांत नवले मुस्ताक शेख उपस्थित होते    येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ असणाऱ्या पाच लाख लिटर क्षमतेची पाणी साठवण टाकीची मुदत संपल्याने ती उंच टाकी पाडण्याची कार्यवाही करावी अन्यथा भविष्यात उदभवणाऱ्या परिस्थितीस ग्रामपंचायत जबाबदार राहील असे पत्र जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा उपविभागाने १० जुलै २0१५ रोजी दिले होते. मात्र तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही.ही टाकी अतिशय धोकादायक झाली असून ती केंव्हा कोसळेल याचा नेम नाही.तसे झाल्यास गावाला पाणी पुरवठा होणार नाही याला सर्वस्वी जबाबदार त्या काळचे पदाधिकरी राहतील असा खुलासा सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केला आहे.

          

यावेळी माहिती देताना त्यांनी सांगितले, जलशुद्धीकरण केंद्राजवळ पाच लाख लिटरची पाणी साठवण व पाणी पुरवठा टाकी असून याच टाकीतून सध्या गावाला पाणी पुरवठा होत आहे.तिची मुदत संपल्याने व तिची पडझड झाल्याने तिचे प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या मार्फत स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले होते. त्यांनी १ जुलै २०१५ रोजी आपला अहवाल जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाला सादर केला होता.त्यावर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ही टाकी तात्काळ पाडण्यात यावी असे पत्र ग्रामपंचायतीला दिले होते.मात्र तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.ही टाकी इतकी धोकादायक आहे की ती जोराच्या वाऱ्याने सुद्धा कोसळू शकते.असा काही अनर्थ झाला तर गावाला पाणी पुरवठा करता येणार नाही.नवीन टाकी उभारण्यासाठी कोरोनामुळे तात्काळ निधी उपलब्ध होणार नाही.तरीपण २०२१-२२ या आर्थिक वर्षात १५ व्या वित्तआयोगातून १० लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्यासाठी तरतूद केली जाईल.१५ व्या वित्त आयोगाच्या निधी मधून जास्तीस जास्त निधी नवीन पाण्याच्या टाकी बांधण्यासाठी द्यावा लागणार असल्याने गावातील इतर विकास कामावर त्याचा परिणाम होणार आहे गावातील रस्ते, गटारी या कामासाठी जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती यांच्या कडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. मागील काळात 4 कोटी खर्चाची पाणीपुरवठा प्रस्तावित केल्याचे तत्कालीन सत्ताधरी मंडळी सांगतात पण ह्या योजनेत वाड्या वस्त्यांचा समावेश नव्हता व नवीन पाण्याची टाकी देखील प्रस्तावित केलेली नाही.

टाकी बांधण्यासाठी 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून निधी दिला जाईल परंतु टाकी बांधण्यास दिड वर्षाचा कालावधी लागु शकतो या काळात काही घटना घडल्यास गावाच्या पाणी पुरवठ्याचे काय असा सवालही साळवी व खंडागळे  यांनी केला आहे. मागील काळात पाणी साठवण तलावात साठलेला गाळ,शेवाळ आदी काढले नसल्याने खराब पाणी येत होते.त्याची कार्यवाही पण आम्ही सुरू केले आहे.नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार शेती महामंडळाकडून जागाही प्राप्त करून घेण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे  साळवी व खंडागळे यांनी सांगितले.कै .भागवतराव खंडागळे पा सरपंच असताना ही पाण्याची टाकी  बांधलेली होती आता  त्यांचा नातु अभिषेक खंडागळे उपसरपंच असताना त्याने नविन दहा लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्याचा मनोदय व्यक्त केला आहे हा योगायोगच म्हणावा लागेल.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- राज्यभर गाजलेल्या गौतम हिरण अपहरण व खुन प्रकरणाचा तपास केवळ सी सी टी व्ही मुळे लागला असुन सी सी टी व्ही असणार्या त्या शाळेचा सन्मान जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या हस्ते करण्यात आला.बेलापुर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण  करुन खुन करण्यात आला या घटनेबाबत बेलापुर ग्रामस्थांनी एकजुट दाखवत गाव बंद ठेवण्याचा ईशारा दिला होता हा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत उचलुन धरला त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी दिवस रात्र एक करुन आरोपी शोधण्याचा प्रयत्न करत होते घटनेला आठ दिवस उलटुनही हिरण यांच्या खुन्याचा तपास लागत नव्हता सर्व पोलीस यंत्रणा ज्या ठिकाणाहून हिरण यांचे अपहरण झाले तेथुनच पुढे तपास करत होती श्रीरामपुर पोलीस गुन्हे अन्वेषणची टिम कठोर मेहनत घेवुनही  हाती काहीच लागत नव्हते त्यामुळे आरोपी येताना कोणत्या तरी रस्त्याने आले असतील हा विचार एल सी बी च्या अधिकाऱ्यांना आला अन त्या दिशेने तपास सुरु झाला बेलापुरला येणारे सर्व रस्ते रस्त्याच्या कडेला असणारे सी सी टी व्ही तपासण्याचे काम एल सी बी ने हाती घेतले हे करत असताना उक्कलगाव तालुका श्रीरामपुर येथील न्यू इंग्लिश स्कूल व रावसाहेब बाळाजी पा थोरात कला कनिष्ट महाविद्यालय येथील शाळेत सी सी टी व्ही असल्याचे एल सी बी पथकाला समजले त्यांनी तातडीने उक्कलगाव येथील सामाजिक कार्येकर्ते दिलीप थोरात यांना बोलावले व शाळेतील कँमेरे तपासावयाचे आहेत असे सांगितले दिलीप थोरात यांनी ताताडीने महाविद्यालयाचे कनिष्ठ लिपीक गुलाब गाडेकर यांना शाळेत बोलावले व पोलीसांना सहकार्य करत कँमेरे तपासण्यास परवानगी दिली अन चार वाजेच्या दरम्यान एक गाडी रस्त्याने जाताना दिसली त्या गाडीची नंबर प्लेट ओझरती दिसली एल सी बी च्या पथकाने आपले सर्वस्व पणाला लावून त्या नंबरशी मिळत्या जुळत्या ३० ते ३५ गाड्या शोधुन काढल्या अन अखेर आरोपींनी वापरलेली गाडी पोलीसांच्या ताब्यात आली अन खरे आरोपी जेरबंद झाले आरोपींच्या मुसक्या आवळताच पोलीसांनी सुटकेचा निश्वास सोडला  हे केवळ शाळेने लावलेला एक कँमेरा रस्त्याच्या दिशेन असल्यामुळे शक्य झाले   त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी उक्कलगाव येथील शाळेचे कनिष्ठ लिपीक गुलाब गाडेकर  व सामाजिक कार्येकर्ते दिलीप थोरात यांना बोलावून त्यांचा सन्मानपत्र देवुन  गौरव केला.


शिरसगाव[वार्ताहर]श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथे शुक्रवारी ऐन उन्हाळ्यात श्रीमती रतनबाई अप्पासाहेब मुद्गुले,गणेश अप्पासाहेब मुद्गुले,सुरेश अप्पासाहेब मुद्गुले यांच्या मालकीच्या  शिरसगाव हद्दीतील गट क्रमांक १३ मधील ४ एकर उसाचे ५ लाख रु.व ठिबक सिंचनचे २ लाख रु.असे एकूण रु ७ लाखाचे नुकसान सकाळी ११.३० वाजेदरम्यान विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे झाले आहे.उसाला लागलेल्या आगीला विझविण्यासाठी अशोक सहकारी साखर कारखाना व श्रीरामपूर नगरपालिकेकडून अग्निशामक गाड्या आल्या होत्या फार प्रयत्न करण्यात आले परंतु उन्हाळा व वाऱ्यामुळे लागलेली आग पसरत गेली.व शेवटी चार एकर उस जळीत झाले.घटनास्थळी शिरसगाव तलाठी यांनी पंचनामा केला.महावितरणचे अधिकारी,व वायरमन यांनी तातडीने भेट दिली.उन्हाळ्यात नेहमी विजेच्या शोर्टसर्कीटने आगी लागत असतात.त्याचे मुख्य कारण म्हणजे महावितरणचा हलगर्जीपणा नेहमी दिसतो.कारण या भागात विजेच्या तारा खाली लोंबकळत असतात,वाऱ्याने एकमेकांना घासतात.त्याच प्रमाणे विजेचे आकडे टाकण्यात येतात.या सर्व प्रकाराने कोणाचे ना कोणाचे अतोनात नुकसान होत असते.तरी महावितरणच्या अधिकारी कर्मचारी यांनी सर्व तारा ताणून घ्याव्यात म्हणजे उसाला आगी लागण्याचे प्रमाण कमी होईल.अथवा आळा बसेल एक दोन दिवसात या भागातील विजेच्या तारा सुरळीत करून द्याव्यात.अशी अपेक्षा शिरसगाव नागरिक करीत आहेत.

श्रीरामपूर /प्रतिनिधी-वॉर्ड नं-2 मधील नई दिल्ली परीसर, जैनब नगर परिसर व अत्तरी मस्जिद परिसर या भागातील नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या कॅनॉल वरील पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे, या करिता भागातील युवक कार्यकर्ते अल्प संख्याक काँग्रेसचे जिल्हा समन्वयक जफर शाह यांनी आ.लहुजी कानडे यांचे कडेस निवेदन देऊन वेळोवेळी पाठपुरावा करून सदर प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले,याकामी परीसरातील नागरीकांनी वेळोवेळी निवेदने देऊन या प्रश्नावर लक्ष वेधले होते आ.कानडे साहेबांनी आपल्या स्थानिक विकास निधी अंतर्गत तात्काळ सदर पुलास मंजुरी देऊन लवकरच काम सुरू होईल याबाबत खात्री दिल्याने भागातील सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.सदर पुलासाठी भागातील सामाजिक कार्येकर्ते जाफर शाह यांनी अनेक वेळा पाठपुरावा केल्यामुळे पुलास मंजुरी मिळाली आहे, असे अनेक कामे जे लोकप्रतिनिधी मार्फत होत नाही त्या कामास तडीस नेण्याचे कार्य जाफर शाह यांनी केले असे भागातील जनतेत बोललं जातंय. याचीच पोच पावती म्हणून पक्षाने या भागातून जाफर शाह यांना नगरसेवक पदाची उमेदवारी द्यावी असेही लोकांची मागणी आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-राज्यभर गाजलेले बेलापुरचे व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण व खुनाचा तपास लावण्यात पोलीसांना यश आले असुन केवळ सी सी टी व्ही च्या अधारे पोलीसांना आरोपी पकडण्यास मदत झाली त्यामुळे गावातील सी सी टी व्हीची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल असे अश्वासन उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिले.बेलापुर येथील व्यापारी हिरण यांचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली त्या गुन्ह्याचा तपास करुन आरोपींना अटक केल्याबद्दल बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने एल सी बी व बेलापुर पोलीसांचा सन्मान करण्यात आला त्या वेळी बोलताना उपसरपंच खंडागळे म्हणाले की   गुन्हा अन्वेषण विभागाची टिम तसेच श्रीरामपुरातील सर्व पोलीस यंत्रणा या तपास कामी दहा बारा दिवस डोळ्यात तेल घालुन तपास करत होते अखेर सी सी टी व्ही फुटेजच्या अधारे आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले त्यामुळे गावातील सर्व नादुरुस्त कँमेरे तातडीने दुरुस्त करण्यात येतील तसेच आवश्यक त्या ठिकाणी आणखी  कँमेरे बसवुन ते सुस्थितीत राहतील याची दक्षता घेतली जाईल या वेळी बोलताना पत्रकार देविदास  देसाई म्हणाले की व्यापाऱ्याच्या अपहरणा नंतर सर्व गावाने एकजुट दाखविली हा प्रश्न विधानसभेत गाजला त्यामुळे गुन्ह्याची उकल करणे पोलीसापुढे मोठे अव्हानच होते परंतु राज्यात अव्वल असणार्या एल सी बी टिमने व तालुक्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिशय कठोर मेहनत घेतल्यामुळेच खरे आरोपी जेरबंद झाले पोलीसांनी केलेल्या कामगीरीबद्दल बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे हे आपले कर्तव्य  आहे या वेळी मोहसीन सय्यद यांनीही मनोगत व्यक्त केले या वेळी एल सी बी चे मनोज गोसावी बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे रामेश्वर ढोकणे पोलीस काँन्स्टेबल निखील तमनर हरिष पानसंबळ पोपट भोईटे आदिंचा ग्रामस्थांच्या वातीने सत्कार करण्यात आला या वेळी रफीक शेख ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक  मुस्ताक शेख तहसील कार्यालयातील शिवाजी वायदंडे लहानु नागले  महेश कुर्हे  पत्रकार  दिलीप दायमा सुहास शेलार किशोर कदम  तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश कुर्हे सागर साळवे राज गुडे आदि उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी )-बाहेरगावहुन व्यवसाय करण्यासाठी आलेल्या व्यक्तीवर एका ईसमाने चाकुसारख्या धारदार हत्याराने हल्ला केला आहे तो व्यापारी जखमी झाला असुन प्रचंड दहशतीखाली वावरत आहे                 

 या बाबत समजलेली माहीती अशी की बेलापुर येथे व्यवसाय करण्यासाठी बाहेरगावहून रामेश्वर पालीवाल हे बेलापुर येथे आले भाडोत्री खोली घेवुन त्याने आपला व्यवसाय सुरु केला असताना दोन दिवसापुर्वी  बाहेरगावच्या एका व्यक्तीने पालीवाल यांना मारहाण केली त्या नंतर दुसर्या दिवशी पुन्हा त्याच व्यक्तीने पालीवाल यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला त्यात पालीवाल यांना दोन तीन ठिकाणी जखमा झालेल्या आहे या हल्ल्यामुळे पालीवाल हे प्रचंड मानसिक तणावाखाली आहे या हल्ल्यामागे नेमके कारण काय असावे या बाबत वेगवेगळी चर्चा चालू आहे.

श्रीरामपुर( प्रतिनिधी रईस शेख )श्रीरामपुरात हानिफ भाई पठान यांच्या संपर्क कार्यलवर भारतीय लहुजी सेना या संघटनेच्या श्रीरामपुर   शहर उप अध्यक्ष निवड करण्यात आली आहे.कमरान तांबोळी  गेल्याकाही वर्षा पासून संघटनात कामं करत आहे . त्यांचा कामगिरी बघुन  मा बाळासाहेब बागुल राष्ट्रीय अध्यक्ष, मा हानिफ भाई पठान राष्ट्रीय सचिव,

मा रज्जाक भाई शेख नगर जिल्हा अध्यक्ष, शेख अहमद नसीर राज्य संपर्क प्रमुख,  यांच्या  आदेशानुसार यांना भारतीय लहुजी सेना श्रीरामपुर शहर उपअध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे 

 सदर नियुक्ती पत्र द्याला बाळासाहेब बागुल राष्ट्रीय अध्यक्ष, हानिफ भाई पठान राष्ट्रीय सचिव, रज्जाक भाई शेख नगर जिल्हा अध्यक्ष, शेख अहमद नसीर राज्य संपर्क प्रमुख, रईस शेख युवा प्रसिद्धी प्रमुख,  अमीत कुकरेजा, रमेज पोपटी, आदी कार्यकरते उपस्थित होते.



बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील जे टी एस हायस्कुलचे सेवानिवृत्त शिक्षक श्री बबनराव लक्ष्मण  गाडे सर यांचे चिरंजीव   सुधीर गाडे यांनी देहदान केल्यामुळे त्यांच्या मृत्यू पश्चात त्याचा मृतदेह प्रवरा नगर येथील मेडीकल ट्रस्टला देण्यात आला.  बेलापुर  येथील सेवानिवृत्त शिक्षक बबनराव गाडे सर यांचा  मुलगा  सुधीर याचे काल अल्पशा आजाराने निधन झाले जैन संघटनेच्या वतीने राबविण्यात येणार्या देहदान संकल्पात बबनराव गाडे सर व सुधीर गाडे यांनी देहदान करण्याचा संकल्प केला होता काल  बबनराव गाडे सर यांचा मुलगा सुधीर याचे निधन झाले देहदानाचा संकल्प केल्यानंतरही जर नातेवाईकांची ईच्छा असेल तर ते मृतदेहाचा अंत्यसंस्कार करु शकतात मुलाने देह दानाचा संकल्प केल्यामुळे आपण तो देह प्रवरा नगर येथील मेडीकल ट्रस्टला देणार असल्याचे बबनराव गाडे यांनी जैन संघटनेचे गौतम साबडा व प्रविण राका यांना तसेच जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे पत्रकार देविदास देसाई  अशोक पवार पोलीस पाटील अशोक प्रधान यांना कळविले त्या प्रमाणे प्रवरा मेडीकल ट्रस्टचे डाँ .जे ऐ पटेल संदीप ठोंबरे दादासाहेब दुंशिग हे बेलापुर येथे आले व काही कागदोपत्री सोपास्कार पार पाडून सुधीर गाडे  यांच्या ईच्छेनुसार देहदानाचा संकल्प पुर्ण करण्यासाठी देह ताब्यात घेतला यांवेळी बबनराव गाडे सर यांना तुम्हाला दुंःख झाले का असे विचारले असता सुधीर याने मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय घेतला असुन ती संकल्पपूर्ती मी करत आहे सुधीर याचे देहदान मी करत आहे अन कुठलेही दान करताना शोक करायचा नसतो दान हे आनंदाने करायचे असते असेही गाडेसर म्हणाले या वेळी जि प सदस्य शरद नवले प ,स ,सदस्य अरुण पा नाईक भरत साळुंके आलम शेख उत्तमराव आमोलीक विष्णूपंत डावरे आदिंनी श्रध्दांजली पर मनोगत व्यक्त केले या आगोदर प्राध्यापक विनायकराव बंगाळ यांनी मरणोत्तर देहदान केले होते प्राध्यापक विनायकराव बंगाळ यांच्या मृत्यू नंतर बंगाळ कुटुंबीयांनी त्याचा देह प्रवरा मेडीकल ट्रस्टला दिला होता त्या प्रमाणेचा मरणोत्तर देहदान करणारे सुधीर गाडे यांचा मृतदेह आज त्यांचे वडील गाडे सर यांनी मेडीकल ट्रस्टच्या स्वाधीन केला या वेळी अजय डाकले अशोक पवार अशोक प्रधान किरण भांड आदि उपस्थित होते.

राहुरी :प्रतिनिधी मिनाष पटेकर-राहुरी फॅक्टरी येथे गुंजाळ नाक्याजवळ देशमुख-गिते वस्तीच्या रस्त्यावर नगर-मनमाड महामार्गापासून चाळीस फूट अंतरावर तरुणीचा मृतदेह पडलेला होता. काल (रविवारी) मध्यरात्री अकरा ते दोनच्या दरम्यान खूनाची घटना घडली असावी.  स्थानिक शेतकरी विशाल गिते यांचे पोल्ट्रीसाठी मध्यरात्री दोन वाजता कोंबडी खाद्याचे वाहन येणार होते. त्यासाठी गिते नगर-मनमाड रस्त्याकडे दुचाकीवर चालले होते. दुचाकीच्या उजेडात त्यांना मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांच्या गस्ती पथकाला माहिती दिली.  पहाटे चार वाजता वाजता पोलीस

उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, उपनिरीक्षक मधुकर शिंदे, उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ, कॉन्स्टेबल जालिंदर साखरे, वैभव साळवे, उत्तरेश्वर मोराळे, दिनेश आव्हाड, जानकीराम खेमनर, अण्णासाहेब चव्हाण, गृहरक्षक दलाचे सचिन पवार घटनास्थळी दाखल झाले. सकाळी सहा वाजता नगरवरुन फॉरेन्सिक पथक, ठसेतज्ञ व रक्षा नावाच्या श्वानासह पोलीस पथक दाखल झाले. श्वानाने नगर-मनमाड रस्त्यावर पर्यंत माग दाखविला. घटनास्थळी आढळलेल्या फुटलेल्या दारूच्या बाटलीवरील ठसे व मृतदेहाच्या शेजारी पडलेल्या दगडावरील रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. मृताच्या अंगावर पंजाबी ड्रेस असून, नारंगी रंगाची सलवार व गर्द आकाशी रंगाचा कुर्ता आहे. डाव्या हातावर मनगटाच्या खाली इंग्रजी अक्षरात "शितल" व डाव्या हाताच्या अंगठ्या खाली इंग्रजीत "एस.पी." असे गोंदलेले आहे. मृताच्या पायातील चप्पल घटनास्थळी आढळली नाही.  आसपासच्या परिसरातील नागरिकांना तरुणीची ओळख पटली नाही. चारचाकी वाहनातून तरुणीला घटनास्थळी आणून खून केला असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी परिसरातील सर्व लॉजींगमध्ये जाऊन मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहीत. परिसरातील नगर-मनमाड रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे काम सुरू असून, तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.  याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल वैभव साळवे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात  व्यक्तींविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.


श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील राऊत वस्ती परिसरातील पाण्याच्या टाकी जवळ दोन दिवसांपूर्वी घरात मृतदेह आढळून आला होता.त्याची हत्या करण्यात आली असून पोलिसांनी त्याच्या मारेकर्‍यांना जेरबंद केले आहे.राऊत वस्ती परिसरातील घरातून वास सुटल्याने परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती श्रीरामपूर पोलीस ठाणे याठिकाणी कळविली. यावरून पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी धाव घेत सदर व्यक्तीचा घरातील मृतदेहाबाबत माहिती घेतली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, अप्पर पोलीस उपअधीक्षक दीपाली काळे यांनी घटनास्थळी भेट देत सदर मृतदेहाची पाहणी केली.यावेळी पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय दुधाडे, पो. कॉ. किरण पवार तसेच पोलीस नाईक दत्तात्रेय दिघे यांनी सदर व्यक्ती बाबत परिसरात व नातेवाईक यांच्याशी चर्चा विनिमय करून माहिती मिळविली. यावरून अमोल कसबे यांनी श्रीरामपूर पोलीस ठाणे याठिकाणी खबर दिली वैद्यकीय तपासणी नुसार सदर व्यक्तीचा घातपात असल्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी दिली होती.यावरून पोलीस नाईक संजय दुधाडे यांनी परिसरात सापळा लावून जॅक ओहोळ यास ताब्यात घेत चौकशी केली असता जॅक ओहोळ या गुन्हेगाराने गुन्हा कबुल केला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे तात्काळ गुन्ह्याचा उलगडा झाल्याने परिसरातून प्रशासनाचे व पोलीस नाईक संजय दुधाडे यांचे कौतुक होत आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे पुढील तपास करत आहेत.

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणीवडगाव येथील गट नंबर 16 या शेतामध्ये ऊस तोड सुरू असताना ऊसतोड कामगारांना सरीत पांढरे वस्त्र आढळून आले.यावेळी जवळून पाहिले असता अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याचे दिसून आले. याबाबत ऊसतोड कामगारांनी संबंधित क्षेत्र मालक परसराम आसाराम गायधने यांना कळवले.त्यांनी गावातील कामगार पोलीस पाटील यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यास माहिती कळवली. पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय दुधाडे तसेच पोलीस नाईक दत्तात्रेय दिघे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील नागरिकांच्या मदतीने सदर व्यक्तीचा मृतदेह ओळखीचा आहे का? यासंदर्भात माहिती घेतली.यावेळी गावातील गोरक्षनाथ गंगाधर मोरे (वय 65) हे दोन ते तीन महिन्यांपासून बेपत्ता आहे. यासंदर्भात श्री. एकनाथ मोरे यांनी श्रीरामपूर पोलीस ठाणे येथे मिसिंग तक्रार दाखल केली होती. यावरून पोलीस नाईक संंजय दुधाडे यांनी नातेवाईकांना मृतदेह दाखविताच सदर मृतदेह हा आमच्या वडिलांचा असल्याबाबत एकनाथ मोरे यांनी माहिती दिली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी श्रीरामपूर येथे हलविण्यात आला आहे.यावेळी पोलीस पाटील श्री. गायधने यांनी ग्रामस्थांच्या मदतीने प्रशासनाला सहकार्य केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय दुधाडे व दत्तात्रय दिघे करत आहेत.

बेलापुर (प्रतिनिधी  )- राज्यभर गाजलेले गौतम हिरण अपहरण व हत्याकांड प्रकरणात अखेर खरे गुन्हेगार शोधण्यात पोलीसांना यश आले असुन  चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहीती जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली      बेलापुर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण व खूनाच्या गुन्ह्यात खरे मुख्य गुन्हेगारांना जेरबंद केल्यानंतर  पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी व्ही आय पी गेस्ट हाऊस येथे पत्रकार परिषद घेवुन सर्व घटनेची माहीती दिली या वेळी गुन्हे अन्वेषण विभागाचे अनिल कटके अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके पोलीस निरीक्षक संजय सानप या वेळी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत माहीती देताना पोलीस अधिक्षक पाटील म्हणाले की दिनांक १ मार्च रोजी गौतम हिरण यां व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आले तेव्हा पासुन सर्व अधिकारी पोलीस कर्मचारी गुन्हे अन्वेषण विभागातील सर्व कर्मचारी डोळ्यात तेल घालुन दिवस रात्र तपास करत होते सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वेगवेगळ्या पध्दतीने तपास करण्यात आला याच दरम्यान गौतम हिरण यांचा मृतदेह सापडला आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय हिरण परिवार व बेलापुर ग्रामस्थ व्यापारी यांनी घेतला होता त्याच दरम्यान पोलीसांनी दोन आरोपींना अटक केली या दोन आरोपींना अटक केल्यामुळे खरे गुन्हेगार मोकळे झाले या गुन्ह्याचा सर्व बाजुंनी तपास करत असताना एक गाडी उक्कलगाव मार्गे आल्याचे सी सी टी व्हीत दिसले त्यावरुन पुन्हा तपास सुरु केला असता ती गाडी सिन्नर येथील निघाली गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेवुन तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे संदीप मुरलीधर हांडे राहणार माळेगाव तालुका सिन्नर यास ताब्यात घेतले त्यास पोलीसी खाक्या दाखवताच त्याने जुनेद उर्फ जावेद बाबु शेख वय २५ वर्ष रा नायगाव रोड सिन्नर अजय राजु चव्हाण वय २६ वर्ष रा मारुती मंदिरा समोर सिन्नर नवनाथ धोंडू निकम वाय २९ वर्ष रा उक्कडगाव तालुका कोपरगाव व एक २२ वर्षीय आरोपी यात सहभागी आसल्याचे निष्पन्न झाले आहे या आरोपींना अटक करण्यात आली असुन आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती व्हँन एम एच १५ जी एल ४३८७ हिरन यांचा मोबाईल जप्त केलेला आहे सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके सपोनि मिथुन घुगे गणेश ईंगळे सोन्याबापु नानेकर मनोहर गोसावी दत्तात्रय गव्हाणे विजयकुमार वेठेकर संदिप घोडके विश्वास बेरड शंकर चौधरी विशाल दळवी रवि सोनटक्के विजाय ठोंबरे सचिन अडबल संतोष लोंढे ज्ञानेश्वर शिंदे दिपक शिंदे विशाल गवांदे योगेश सातपुते संदिप दरंदले रविंद्र घुंगासे शिवाजी ढाकणे सागर ससाणे मयुर गायकवाड मेघराज कोल्हे राहुल सोळूंके रोहीत येमुल आकाश काळे उमाकांत गावडे भरत बुधवंत अर्जुन बडे बबन बेरड चंद्रकांत कुसळकर फुरकान शेख प्रमोद जाधव यांनी केलेली आहे.

श्रीरामपूर -
बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण व हत्या प्रकरणी काल पोलिसांनी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले.असून त्यात नाशिकच्या चार जणांचा समावेश आहे. दरम्यान, या गुन्ह्यात अटक केलेल्या श्रीारामपूरच्या दोघा आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर काल त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे दि. 1 मार्च 2021 रोजी अपहरण करुन त्यांची हत्या केली होती. सात दिवसानंतर त्यांचा मृतदेह वाकडी रोडवरील यशवंतबाबा रेल्वे चौकीजवळ आढळून आला. त्याचदिवशी पोलिसांनी बिट्टु वायकर व सागर गंगावणे यांना अटक केली होती. त्यावेळी पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. काल त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासाठी वेगवेगळी चार पथके पाठविण्यात आली होती. त्यात नाशिक येथील चार व अन्य ठिकाणचा एक़ अशा पाच संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज (शनिवारी) त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget