गौतम हिरण हत्या प्रकरणी नाशिकचे पाच संशयित ताब्यात,श्रीारामपूरच्या दोघा आरोपींची पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ.

श्रीरामपूर -
बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण व हत्या प्रकरणी काल पोलिसांनी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले.असून त्यात नाशिकच्या चार जणांचा समावेश आहे. दरम्यान, या गुन्ह्यात अटक केलेल्या श्रीारामपूरच्या दोघा आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर काल त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे दि. 1 मार्च 2021 रोजी अपहरण करुन त्यांची हत्या केली होती. सात दिवसानंतर त्यांचा मृतदेह वाकडी रोडवरील यशवंतबाबा रेल्वे चौकीजवळ आढळून आला. त्याचदिवशी पोलिसांनी बिट्टु वायकर व सागर गंगावणे यांना अटक केली होती. त्यावेळी पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. काल त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासाठी वेगवेगळी चार पथके पाठविण्यात आली होती. त्यात नाशिक येथील चार व अन्य ठिकाणचा एक़ अशा पाच संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज (शनिवारी) त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget