March 2020

कोरोना विषाणु (कोव्हीड १९) हा संसर्गजन्य आजार नियंत्रीत ठेवण्याकरीता मा.पंतप्रधान भारत सरकार,
मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा.जिल्हाधिकारी अहमदनगर, मा.पोलीस अधीक्षक, अहमदनगर तसेच भारत सरकार प्रशासन " कोरोना विषाणु " या संसर्गजन्य आजाराचा समाजात प्रसार होणार नाही व कोरेना बाधीत रुग्णांची संख्येत बाढ होवु नये याकरीता उच्चस्तराच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना या विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक आहे. कोरोना विषाणुचे प्रसाराचे माध्यम पाहता सदर विषाणुची लागण एका संक्रमीत रुग्णाकडुन अन्य व्यक्तीस / इसमास त्याचे संपर्कात आल्याने होण्याची शक्यता असते.
महराष्ट्र राज्य शासनाने कोरोना विषाणुचा ( कोव्हीड - १९ ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथराग
प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासुन लागु करुन खंड २,३,४ मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमीत केलेली आहे. याच अनुशंगाने मा.जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी आदेश क्रमाक आव्यमपु/कार्या १९/२०८/२०२० आदेश अहमदनगर दि. १६/०३/२०२० अन्वये कोरोना विषाणुचा प्रादुभाव रोखण्यासाठी
प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन अहमदनगर जिल्हयातील कोणत्याही व्यक्तीस/संस्था/संघटना
कोव्हीड - १९ बाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा, अनाधिकृत माहिती इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल मिडीयाच्या
माध्यमातुन पसरविणेस साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसुचना व
नियमावलीमधील तरतुदीनुसार आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ३० (१) अन्वये प्रतिबंध केलेबाबत आदेश जारी केलेले आहेत. आरोपी इसम नामे ताहिर शेख रा.मुकुंदनगर ता.जि.अहमदनगर याने त्याचे मोबाईल नंबर ९२७०८४७५७५ वरुन कोरोना आजारा संदर्भात सुफीयाना शेख युवा मंच या व इतर ग्रुपवर ' दि. २९/०३/२०२० रोजी आज रात १० बजे से मुकुंदनगर फकिरवाडा भाग मिलीट्रीच्या हातात देणार असुन मुकुंदनगर फकिरवाडा भागातील सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी. तसेच दि. ३०/०३/२०२० रोजी विविध ग्रुपवर " आज मिलीटी मस्जीद के सामने कुछ सरकारी अधिकारी के साथ घुम रही है और घरके लोगोंके बारेमे पुछे तो नाम और मोबाईल नंबर नही देना " असे खोटा मेसेज पाठवुन जनतेत खोटी माहिती व अफवा पसरवुन मा.जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेशाचे उल्लंघन केले म्हणुन आरोपी ताहिर शेख रा.मुकुंदनगर मोबाईल नंबर ९२७०८४७५७५ याचेवर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला गु.र.नं. 1 ३६९/२०२० भारतीय दंड संहिता कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात तरी अहमदनगर पोलीस दलातर्फे सर्वाना आवाहन करण्यात येते की, कोरोना संसर्गजन्य आजारा संदर्भात व्हॉटसअप किंवा इतर प्रसार माध्यमांमध्ये निराधार, अफवा असलेली माहिती प्रसारीत करु नये. तसेच भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत विश्वसनीय प्रशासकीय वृताव्दारे प्रसारीत केलेल्या माहिती व्यतीरिक्त इतर खोटया आशयाचे वृत्तांवर विश्वास ठेवु नये. मा.जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर प्रचलीत कायदयान्वये सक्त व कठोर कारवाई करण्यात येईल.

निवासी संपादक जितेश लोकचंदानी     सोलापूर : संचारबंदीच्या काळात कारवाई न करण्यासाठी पैशाची मागणी केल्याप्रकरणी सोलापुरातील एका पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सोलापुरातील औद्योगिक पोलीस चौकीत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित दिवसे याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे सोलापूरतल्या अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने देखील बंद करून घरात बसावे, असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यानुसार संपूर्ण सोलापूरमध्ये बंद पाळण्यात आला. परंतु विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई न करण्यासाठी संबंधीत पोलीस अधिकाऱ्याने पैशाची मागणी केली होती. ही घटना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यापर्यत पोहोचली. त्यावरून पोलीस आयुक्तांनी त्याबाबत चौकशी केली आणि तातडीने सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित दिवसे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. आता सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित दिवसे यांना नियंत्रण कक्षात बसवल्याची माहिती मिळते आहे

बेलापूर  (प्रतिनिधी  )-शासनाच्या सुचने नुसार   जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानातुन तीन महीन्याचे धान्य उपलब्ध करुन देण्यात येणार वाटपात कसुर करणार्यावर कायदेशीर कारवाई  केली जाईल असा ईशारा जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिला आहे                      या बाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात जिल्हा पुरवठा अधिकारी माळी यांनी पुढे म्हटले आहे की जिल्ह्यातील सर्व धान्य दुकानदारांना एप्रिल  मे जुन असे  तीन महीन्याचे धान्य  वाटप करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत सर्व प्रथम अत्यंत गरजु मोल मजुरी करणारे हातावर पोट भरणारे या सर्वांना पहील्या टप्प्यात प्राधान्याने धान्य द्यावयाचे असुन दुसर्या टप्प्यात गरजु उत्पन्नाचे मर्यादित साधने असणारे कार्डधारक यांना वाटप करावयाचे आहे त्या नंतर राहीलेल्या कार्डधारकांना वाटप करावयाचे असुन कुणीही धान्यापासुन वंचित राहु नये याची काळजी दुकानदाराने घ्यावयाची आहे काम चुकारपणा करणार्या तसेच धान्य वाटपात कसुर करणार्या  दुकानदारावर कठोर कारवाई केली जाईल कार्डधारकांनी एकाच वेळेस दुकानावर गर्दी करु नये कुणाच्या वाटपा बाबत तक्रारी असल्यास पुरवठा निरीक्षक  तहसीलदार यांच्याशी संपर्क  साधावा असेही अवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी माळी यांनी केले आहे.

कोरोना विषाणूंचा प्रसार होऊ नये यासाठी बाहेरून आलेल्या नागरिकास घरातच बंदिस्त ठेवण्यासाठी आवश्यक असलेला “होम कोरोंटाईनचा” शिक्का मारणे व मास्क लावण्यास सांगण्यास गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना कल्याण येथे नोकरीस असलेले मात्र कोपरगाव तालुक्यातील देर्डे-कोऱ्हाळे ग्रामपंचायत हद्दीतील कायम निवासी असलेले आरोपी लक्ष्मीकांत कारभारी विघे व त्यांचे दोन मुले सौमित्र लक्ष्मीकांत विघे,सौरभ लक्ष्मीकांत विघे यांनी धक्काबुक्की केल्याचा गुन्हा कोपरगाव महसूल विभागाचे कर्मचारी रवींद्र नारायण देशमुख यांनी दाखल केल्याने तालुक्यात खळबळ उडाली होति ह्या आरोपींना कोपरगाव येथे हजर कोर्टात समोर हजर केले असता 1दिवसाची पोलिस कोठडी सुणवण्यात आली.

शिर्डी,प्रतिनिधि  राजकुमार गडकरी दि.30- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष या नात्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 अन्वये आदेश पारित केले असून त्याची जिल्हात अंमलबजावणी करण्यात येत आहे. शिर्डी नगर पंचायत हद्दीतील स्थलांतरीत कामगार व बेघर व्यक्ती यांना अन्नदान व अन्न पाकिटांचे वाटप करण्यात येत आहे. अशाप्रकारच्या सार्वजनिक उपक्रमांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर, लॉकडाऊन उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे आवश्यक आहे.
            यासाठी उपविभागीय दंडाधिकारी, शिर्डी भाग ,शिर्डी श्री.गोविंद शिंदे यांनी, साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीतील तरतूदीनुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार  व आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 चे कलम 30 अन्वये लॉकडाऊन या उपाययोजनेमुळे शिर्डी शहर आणि पंचक्रोषी परिसरात अडकलेल्या, स्थलांतरीत कामगार व बेघर व्यक्ती यांना अन्न, वस्त्र, निवारा व वैद्यकीय देखभाल पुरविणे आवश्यक असल्यामुळे निघोज ता.राहाता येथील साई पालखी निवारा या संस्थेचे दोन हॉल 30 मार्च,2020 पासून पुढील आदेशापर्यत अधिग्रहीत केले आहेत. सर्व संबधितांनी याची नोंद घ्यावी असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी व सर्व प्रशासकीय यंत्रणा जनतेच्या भल्यासाठी नागरिकांनी घरातच रहावे कोणीही बाहेर विनाकारण येऊ नये प्रशासनास सहकार्य करा आपली सुरक्षा परिवाराची सुरक्षा -श्रीहरी बहिरट पो . निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन 


बुलढाणा - 29 मार्च
देश ही नही पूरे विश्व मे कोरोना वायरस की दहशत फैली हुई है.इस वायरस का संसर्ग ना हो इस लिए देशभर को लॉकडाउन कर दिया गया है ऐसे में जीवनावश्यक वस्तु छोड़कर सभी दुकाने एंव कारोबार बंद रखने के कडे निर्देश होने के बाद भी टायर पंक्चर की 2 दुकाने खुली रखनेवाले 2 लोगों पर रापयुर थाने में आज 29 मार्च को अपराध दर्ज कर दोनों को गिरफ्तार किया गया है.
    बुलढाणा तहसिल अंतर्गत के ग्राम पिंपलगांव सराय में आज दोपहर के समय रायपुर पुलिस थाने की टीम पीएसआई योगेंद्र मोरे,पुलिस कर्मी विजय हुडेकर, सुरेश मोरे,अमोल गवई आदि गश्त पर थे कि उन्हें ग्राम पिंपलगांव सराय में दोपहर 4 बजे के समय शासन के आदेश का उल्लंघन कर 2 टायर पंक्चर की दुकानें खुली नज़र दोनों दुकान चालकों को पकड़कर रायपुर थाने में लाया गया जहां पीएसआई योगेंद्र मोरे की शिकायत पर आरोपी दुकान चालक संजय भीमराव चौहान (45) व रमेश भीमराव चौहान (40) के खिलाफ धारा 188,269 के तहत अपराध दर्ज कर लिया गया है.आगे की जांच बिटजमादार यशवंत तायडे कर रहे है.

अहमदनगर, दि. २९ - जिल्ह्यात आज आणखी दोन व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे पुण्याच्या एनआयव्हीने दिलेल्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. या व्यक्ती परदेशी नागरिक असून त्यातील एक फ्रान्स तर दुसरी व्यक्ती आयव्हरी कोस्ट येथील आहे. या व्यक्तीसोबत असणार्‍या इतर व्यक्तींनाही ताब्यात घेतले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा शोध आता पोलीस आणि आरोग्य यंत्रणेने सुरु केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांनी स्वताहून जिल्हा रुग्णालयात येऊन त्यांची तपासणी करुन घ्यावी, तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दीत जाणे टाळावे.स्वताच्या आणि समाजाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, या व्यक्ती थांबलेल्या परिसराला सील करण्याचे आणि हा परिसर औषध फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
या दोन व्यक्तीसह १४ जणांचा ग्रुप मॉरिशस येथून दिल्ली येथे आला होता. त्यानंतर हा ग्रुप २ आठवडे दिल्ली येथे थांबला. या कालावधीत त्यांनी दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि पुन्हा दिल्ली असा प्रवासही केला. विविध ठिकाणांना भेटी दिल्या. दिनांक १४ मार्च रोजी रेल्वेने हे सर्वजण नगर येथे आले. ते शहरातील मुकुंदनगर भागात राहिले. दुसर्‍या दिवशी ते जामखेडला रवाना झाले. तेथे ते २६ मार्चपर्यंत होते. मात्र या व्यक्ती तेथे राहत असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलीस, महसूल प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने कार्यवाही करुन या १४ जणांना ताब्यात घेत थेट जिल्हा रुग्णालयात पाठवले. काल या १४ जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाकडून एनआयव्हीकडे पाठविण्यात आले. त्यापैकी ५ स्त्राव नमुन्यांचा अहवाल आज प्राप्त झाला. त्यातील या दोन व्यक्ती बाधित असल्याचे स्पष्ट झाले. इतर तीन जणांचा अहवाल निगेटीव आला असून उर्वरित ०९ अहवाल अद्याप येणे बाकी आहे. या सर्वांना जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून बाधित दोन रुग्णांना बूथ ह़ॉस्पिटलमधील आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात पाठवले जाणार आहे.
यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या पाच झाली असली तरी एका रुग्णाचा १४ दिवसांनंतरचा अहवाल निगेटीव आल्याने त्याला घरी सोडण्यात आले होते. त्यामुळे आयसोलेशनमध्ये सध्या ०४ जणांना ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, आता आज कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची माहिती जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणेकडून काढली जात आहे. मुकुंदनगर आणि जामखेड या भागात ज्याठिकाणी या व्यक्ती राहिल्या, तेथे त्यांना अनेकजण भेटल्याची शक्यता गृहित धरुन प्रशासनाने माहिती घेणे सुरु केले आहे. मुकुंदनगर परिसर आता सील करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरु केली आहे. तसेच, मुकुंदनगर आणि जामखेड येथील ज्या व्यक्ती या बाधित नागरिकांच्या संपर्कात आल्या, त्यांनी स्वताहून पुढे येऊन त्यांची आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, सार्वजनिक ठिकाणचा संपर्क टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी केले आहे. प्रशासनातील सर्व यंत्रणा या जिल्ह्याचे आरोग्य व्यवस्थित राहावे, यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना नागरिकांनी साथ दिली पाहिजे. जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, ते नागरिकांच्या हितासाठीच आहेत, त्यामुळे त्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

 शिर्डी -नेहमी रात्रंदिवस देश-विदेशातील साई भक्तांनी गजबजलेली श्री साईंची शिर्डी सध्या लॉक डाउनमुळे ठप्प असून सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने,  ट्रॅव्हल्स, बसेस बंद असून देशातील मंदिराप्रमाणे श्री साईबाबा समाधी मंदिरही सन 1940 नंतर या परिस्थितीत 17 मार्चपासून दु,३ नंतर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे, शिर्डीत प्रथम च इतका सन्नाटा दिसत असून रस्ते ओस पडले आहेत, शिर्डीत राज्यव परराज्यातून येणाऱ्या एसटी बसेस ,
राज्यातून, देशातून येणाऱ्या रेल्वे,  तसेच विमाने ही बंद आहेत, त्यामुळे शिर्डी बस स्टँड, साईनगर शिर्डी रेल्वे स्थानक व श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळही सुने सुने दिसत आहे शिर्डी शहरातून जाणारा  नगर मनमाड महामार्ग  सुद्धा ओस पडला आहे, श्री साईबाबा संस्थानने आपले प्रसादालय व भक्त निवासे  ही बंद केले आहेत ,परंतु येथील आरोग्य पोलीस कर्मचारी व रुग्णालयातील नातेवाईक , गरजूंना नाश्ता भोजन देण्याची व्यवस्था साई संस्थांनी केली आहे,  सर्वत्र लॉक डाऊन मुळे  शुकशुकाट असताना शिर्डी बस स्थानकावर मात्र  येणारे जाणारे लोक  दिसत आहे,  शिर्डी परिसरातील गावे व वाड्या-वस्त्यांवर सकाळ, संध्याकाळ दुध डेअरी यांवर शेतकऱ्यांची, दूध उत्पादकांची थोडीफार गर्दी दिसून येत आहे,
किराणा दुकानात काहीतरी खरेदीसाठी बहाना करत लोकबाहेर येत असून अनेक ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मास्क किंवा सोशल डिस्टंस, दक्षता घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे, शहरात लॉक डाउन पाळला जात असला तरी शिर्डी परिसरातील काही गावे खेडे वाड्या वस्त्या यावर या लॉक डाऊन चा म्हणावा तसा परिणाम दिसून येत नाही, लोक दिवसभर घरात असले तरी सायंकाळी काही लोक दूध घालण्याच्या किराणा घेण्याच्या बहाण्याने  बाहेर दिसतात, पोलिसही सकाळी आपल्या पोलिस वाहनांमधून मधून स्पीकर लावून गर्दी करू नका, मास्क लावा म्हणून सांगतात, सकाळी एकदा फेरी मारल्यानंतर  परत त्यांचाही चक्कर होत नाही, ग्रामीण भागात सर्वत्र हीच परिस्थिती सध्या दिसून येते आहे, ग्रामीण भागात सध्या गहू ,मका ज्वारी काढण्यासाठी आल्याने व मजूर मिळत नसल्याने ग्रामीण भागातले शेतकरी हार्वेस्टर, मशीनद्वारे किंवा घरातील कुटुंबातील सदस्यांना घेऊन शेतात जाऊन काम करत आहे, पिके सोंगत आहेत, काही शेतकरी शेतातून काढलेले कांदे गोण्यांमध्ये भरण्याचे काम करत आहे, तर कोणी द्राक्षे काढण्याचे काम करताना दिसून येत आहे, अशी परिस्थिती ग्रामीण भागात दिसत असून लॉक डाऊन शहरात आहे तसाच तो ग्रामीण भागातही असला तरी शेतीत काम करणारे हे आपल्या कामात मग्न आहेत, वाड्या-वस्त्यांवर शेतीत दुर दुर असणारे मळ्यामध्ये लॉक डॉऊनचा प्रभाव फारसा दिसून येत नाही, दूध धंदा व दूध डेअरी सध्या जरी चालू असल्या तरी भविष्यात ग्रामीण भागातले दूध शहरांमध्ये जाणे खूपच कमी झाले असल्याने ग्रामीण भागातील दूध डेअरी ह्या लवकरच बंद करण्याची वेळ येणार असल्याचे दूध डेअरी चे मालक बोलत आहेत, दूध वाहतूक करणारे ट्रक चालक व इतर कर्मचारी ही शहरात जाण्यात उत्सुक नसल्याने  दूध आता ग्रामीण भागातून शहरापर्यंत पोहोचले जाणे मुश्कील होत आहे ,त्यामुळे भविष्यात काही दिवसातच ग्रामीण भागातील दूध गावातच राहण्याची शक्यता आहे ,त्यामुळे शासनाने दूध उत्पादक का नाही ही यापुढे मदत करावी अशी मागणी होत आहे.

कोल्हार (साईप्रसाद कुंभकर्ण ) :- कोरोना या भयंकर आजाराच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र कासारे  येथे रविवार दिनांक 29 मार्च रोजी संपन्न होणारा श्री कालिका मातेचा यात्रोत्सव रद्द करण्यात आला असल्याची माहिती कासारे येथील कालिका देवी मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने देण्यात आली.

कालिका देवी मंदिराच्या सर्व विश्वस्त मंडळाची बैठक संपन्न झाली माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेशास बांधील राहून हा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे दरवर्षी या यात्रोत्सवास महाराष्ट्रभरातून कासार समाज बांधव मोठ्या संख्येने कासारे  येथे येऊन कालिका मातेच्या यात्रा उत्सवात सहभागी होतात व श्री कालिका मातेच्या दर्शनाचा लाभ घेतात परंतु ह्या वर्षी कोरोना या भयंकर आजाराच्या पार्श्वभूमीवर हा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला.

तसेच राहता तालुका कासार समाज संघटनेच्या वतीने घेण्यात येणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आले आहे हा निर्णय बैठकीत घेण्यात आला या बैठकीस सुधीर डंबीर,नंदकुमार कोळपकर, नरेंद्र डंबीर ,संजय डंबीर, आबासाहेब आंभोरे ,संतोष कोळपकर, प्राध्यापक चंद्रकांत खांड्गौरे ,शशिकांत कडुसकर, दत्तात्रय कोळपकर ,रामभाऊ रासने ,अशोक कोळपकर ,दास कुंभकर्ण, कालिदास डंबाळे आदी उपस्थित होते.

शिर्डी ।।राजकुमार गडकरी ।।शिर्डीतील सांडपाणी हे सर्रासपणे शेतीसाठी वापरले जात असून अनेकजन हे पाणी ड्रेनेज मधून थेट पाइपलाइन करून मोटर पंपाच्या साह्याने आपल्या शेतातील पिकांना देत असल्यामुळे या शेतीच्या आसपास व रस्त्याने जाणाऱ्यां येणारांना मोठ्या दुर्गंधी ला तोंड द्यावे लागत असून आरोग्यास ते धोकादायक ठरत आहे, त्याचप्रमाणे शेतीतील पिकेही या खराब पाण्यामुळे खाण्यास हानिकारक ठरत असल्याने याचा विचार करून तसेच या उघड्या ड्रेनेजमध्ये आत्तापर्यंत चार ते पाच लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, हे लक्षात घेऊन शिर्डी नगरपंचायतीने हे उघडे ड्रेनेज बंद करावेत तसेच हे सांडपाणी
 उघड्यावर पिकांना देऊन दुर्गंधी करणाऱ्यांना प्रतिबंध करावा अशी मागणी शिर्डी करांनी केली आहे,
          शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असून शिर्डीला देशातील स्वच्छ सुंदर शिर्डीचा विशेष पुरस्कारही यापूर्वी मिळालेला आहे ,शिर्डीत श्री साई संस्थान व शिर्डी नगरपंचायत स्वच्छतेबाबत अतिशय जागरूक आहे, असे असतानाही शिर्डीत मात्र जे शहराचे सांडपाणी अंडरग्राउंड नाल्यांमधून शहराबाहेर सोडले जाते मात्र या अंडरग्राउंड नाल्या अनेक ठिकाणी  उघड्या असल्याने आसपासचे शेतकरी पाइपलाइन करून मोटार पंपाच्या साह्याने हे सांडपाणी उपसून आपल्या शेतीसाठी वापरतात, हे सांडपाणी दुर्गंधीयुक्त असते ,ते शेतीत वापरल्यानंतर आसपास रहिवाशांना व या शेतीच्या आसपास असणाऱ्या रस्त्यांवरून जाणाऱ्या येणाऱ्यांना दुर्गंधीचा मोठा त्रास होतो, सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनाही  या दुर्गंधीचा मोठा त्रास होतो,  हे आरोग्यास अपायकारक आहे ,हे सांडपाणी दूषित असते, ते शेतातील पिकांना दिल्यामुळे ही पिकेही खराब होतात, ते खाण्यास हानिकारक असतात, परंतु याचा कोणी विचार करत नाही ,शिवाय ज्या उघड्या ड्रेनेज मधून  हे सांडपाणी पाईप लाईनने मोटरपंप च्या साह्याने घेतले जाते, अशा उघड्या ड्रेनेज मध्ये आत्तापर्यंत शिर्डीतील चार ते पाच लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, हे सर्व माहीत असतानाही अजूनही अशा उघड्या ड्रेनेज मधून मोटार पंप च्या साह्याने थेट पाइपलाइन करून आपल्या शेतात हे सांडपाणी घेतले जाते, मात्र याचा भविष्यात मोठा आरोग्यास धोका आहे, हे जाणून आपापल्यापरीने शेतकऱ्यांनी हे सांडपाणी घेणे बंद करावे, तसेच शिर्डी नगर पंचायतीने तरी त्याची दखल घेऊन उघडे ड्रेनेज बंद करावेत व सांडपाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांना मनाई करावी आणि या सांडपाण्यामुळे परिसरात होणारी   रोगराई, डासांचा प्रादुर्भाव व दुर्गंधी टाळावी, अशी मागणी शिर्डी करानी केली आहे.

। प्रतिनिधी ।। सावळीविहीर ग्रामपंचायतीच्या  वतीने कोरोना व्हायरसचा व इतर साथींचे रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथे  औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे,
   । सध्या सर्वत्र कोरोना या विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वत्र लॉकडाऊनआहे, सर्व दुकाने ,कामकाज ठप्प आहे, लोक घरात आहेत, मात्र घरात डासांच्या प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिक त्रस्त होत आहेत, त्यामुळे येथील ग्रामपंचायती तर्फे गाव स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे,  सावळीविहीर बुद्रुक येथे  सध्याचे ढगाळ वातावरण, कधी अवकाळी पाऊस यामुळे  डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होऊन 
साथींच्या रोगांचा प्रादुर्भाव  वाढला आहे , डासांमुळे मलेरिया थंडी ताप अशा रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली , साथींचे आजारांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे येथे जंतनाशक फवारणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली होती  सावळीविहीर ग्रामपंचायतने  ताबडतोब या मागणीची दखल घेऊन सावळीविहीर गावात जंतनाशक फवारणी सुरू केली,  गावातील गल्ली ,रस्त्यावर  ट्रॅक्‍टरच्या साह्याने फवारणी करण्यात येत होती, हि जंतुनाशक फवारणी गावात सर्वत्र व गल्या मध्ये करावी, वाड्या-वस्त्यांवर ही करावी ,असे नागरिक बोलत होते, यावेळी सावळीविहीर बुद्रुकचे सरपंच  रूपालीआगलावे, उपसरपंच वृषाली  जपे, तसेच बाळासाहेब जपे ,संतोष आगलावे, चंद्रकांत जपे, विनोद भोसले, ग्रामसेवक खर्डे सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गागरे,सागर पगारे, पारडे, बाप्पु जपे, गणेश कापसे, अनिल वाघमारे  राहुल गोपीनाथ आगलावे व सर्व सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी बबन आरणे, नाना पवार,अनिल त्रिभुवन यांनी स्वतः उभे राहून गावात ही फवारणी केली, जंतनाशक फवारणीमुळे येथील साथीच्या रोगाला आळा बसेल, त्यामुळे येथे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी येथील आरोग्य केंद्रानेही नियोजन व उपाययोजना केल्या पाहिजेत, असेही मत येथे नागरिक व्यक्त करत आहेत, 

निवासी संपादक जीतेश लोकचंदानी  मुंबई प्रमाण शिर्डीत नगर पंचायतने हि केली फवारणी सुरू  शिर्डी नगर पंचायतच्या वतिने प्रमुख रस्त्यावर काल पासूण फवारणी सुरू केली आहे नगर पंचायत च्या अग्निशामक प्रमुख विलास लासूरे यांनि आमच्या प्रतिनिधि ला दिलेल्या माहिति नुसार शिर्डीत मुख्य  रस्त्यावर रिंग रोड,नाण्दुर्खी रोड,कणकुरी रोड,झूलेलाल मंदिर रोड, पालखी रोड,पिंपलवाडी रोड, मनोज कुमार रोड,भाग्यलक्ष्मी रोड, रूई रोड,गोराडिया रोड,गणपति प्यालेस रोड,सन अण्ड सन रोड, झुना पिंपलवाडी रोड,एच पी गैैैस एजंसि ,
कालिका नगर रोड, छ संभाजी नगर रोड,लूटे वस्ति रोड,एस डी पी रोड, पानमडा रोड,पासुण शिर्डीच्या शिवा पर्यंत फवारणी करण्याचे नगर पंचायतचे विलास लासूरे यांनि सागीतले हि मोहीम काल पासुन चालू केली आहे व येत्या दोन ते तीन दीवसात सर्वत्र फवारणी करनार असुन् शिर्डीच्या उपनगरा  मध्ये हि अश्याच प्रकारे फवारणी करनार असल्याचे विलास लासूरे यांनि सांगीतले ह्या फवारणी मोहीमेत नगर पंचायतचे कर्मचारी शौकत शेख,अशोक गांगुर्डे,दगु खरात व राजू थोराट हे परिश्रम घेत आहेत

बेलापूर  (देविदास  देसाई  )-हिंगोलीहुन रोजी- रोटीच्या शोधार्थ निघालेल्या तीन कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असुन माणुसकीच्या भावनेतुन बेलापूरकरांनी या कुटुंबाना आधार दिला आहे  त्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांच्या मुक्कामाची व जेवाणाची व्यवस्था करण्यात आली  आहे               हिंगोली जिल्ह्यातुन पोट भरण्यासाठी तीन कुटुंब दर वर्षी  प्रमाणे याही वर्षी अहमदनगर येथे आली होती केवळ एकच दिवस शेतकर्याकडे रोंजंदारीवर काम मिळाले त्यांनंतर कोरोनाचे थैमान सुरु झाले अन यांच्या पोटापाण्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला काम असुनही बाहेर जिल्ह्यातील म्हणून शेतकरी काम देईना   रोजगाराच्या शोधार्थ  मारुती झाडबा ईंगळे पत्नी दिक्षा मारुती ईंगळे  , कळनु नारायण झरे पत्नी निर्मला झरे , विलास शालीग्राम कोसेकर त्याची साठ वर्षाची आई शिवकन्या कोसेकर रविंद्र सखाराम चौगुले पत्नी  सुनिता तीन लहान मुली एक लहान मुलगा हे दहा जण   अहमदनगर  ते बेलापूर  असा साठ पासष्ठ किलोमीटर पायी चालुन बेलापूरला पोहोचले गावात ही वार्ता समजताच आपत्ती व्यवस्थापन समीतीने त्यांची आस्थेने चौकशी करुन त्यांना नविन मराठी शाळेत राहण्याची व्यवस्था केली बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले यांनी देखभाल करण्याची तसेच रोजगार उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी घेतली  गौरव सिकची दिपक खंडागळे  लक्ष्मीकांत लखोटीया यशवंत नाईक  यांनी किराणा सामान आणुन दिले जनसेवा झुणका भाकर केंद्राच्या वतीने सुवालाल लुक्कड अमीत लुक्कड प्रविण लुक्कड यांनी भोजनाची व्यवस्था करुन दिली प्राथमिक आरोग्याधिकारी देविदास चोखर यांनी त्यांची आरोग्य तपासणी केली वातावरण ठिक होईपर्यंत  याच ठिकाणी  रहाण्याचा सल्ला बेलापूर ग्रामस्थांनी दिला असुन ग्रामस्थ या कुटुंबाच्या भोजनाची व्यवस्था करणार आहे बेलापूरचे ग्रामविकास अधिकारी संग्राम चांडे पोलीस पाटील अशोक प्रधान प्रकाश जाजु किरण भांड महावितरणचे चेतन जाधव आदिनी त्या सर्व कुटुंबाला धीर देवुन सर्वतोपरी मदत करण्याचे अश्वासन दिले.

शिर्डी  श्री साईबाबा संस्थाने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मोठ्या संकटात सापडलेल्या या राष्ट्रीय आपत्तीत मदत म्हणून ५१ कोटी रुपये  देण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे शिर्डीकर व साईभक्तांना मधून स्वागत होत आहे,
     सध्या जगाला, भारत देशालाही कोरोनाच्या संकटामुळे हैराण करून सोडले आहे, दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण झपाट्याने देशात वाढत असून राज्यात ही संख्या सर्वात मोठी आहे, केंद्र सरकारा प्रमाणेच राज्य सरकारही कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मोठा प्रयत्न करीत असून शासनाने अनेक प्रतिबंधात्मक योजनाही आखून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे,
  देशात कोरोनाच संसर्ग वाढू नये म्हणून देशभर लॉक डाऊन करण्यात आला आहे, त्यामुळे देशात, राज्यात सर्वत्र अत्यावश्यक सेवा सोडून सर्वकाही बंद आहे, देशात, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले आहेत , त्यामुळे राज्यात सरकारने अनेक धाडसी पावले उचलली आहेत, अशा परिस्थितीत राज्यात आर्थिक संकट निर्माण होत आहे अशा राष्ट्रीय किंवा नैसर्गिक आपत्तीत श्री साईबाबा संस्थान नेहमीच मदतीसाठी पुढे आले आहे ,,सध्या देशात ,राज्यात  कोरोना विषाणूमुळे संकट उभे राहिले आहे, या संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासनाला मदत म्हणून श्री साईबाबा संस्थानने ५१ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे ,शिर्डीला श्री साई भक्त देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात येत असतात व साईबाबा संस्थानला देणगी देत असतात, या देणगीतूनच साई संस्थानने 51 कोटी रुपये कोरोना मुकाबल्यासाठी देण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे, तसेच या विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी अहोरात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रयत्न करणारे डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, तसे पोलीस ,अत्यावश्यक सेवा वाहतूक करणारे ट्रक चालक, गरजू अशा विविध लोकांसाठी साईबाबा संस्थान नाश्ता ,भोजन सुद्धा पुरवणार आहे ,असा हा निर्णय साई संस्थान ने घेतल्यामुळे या  निर्णयाचे साईभक्त व शिर्डी करांमधून मोठे कौतुक होत आहे ,
   सध्या शिर्डीच्या श्री साई संस्थान वर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर, सहाय्यक धर्मादाय आयुक्त गीता बनकर, अतिरिक्त विभागीय महसूल आयुक्त दिलीप स्वामी,  व श्री साई संस्थान चे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांची एक कमिटी आहे ,या कमिटीने हा निर्णय घेतला असल्याचे साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले, यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे व मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे हे उपस्थित होते, श्री साईबाबा संस्थान नेहमी राष्ट्रीय आपत्ती च्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारे मदत करत असते ,यावेळी पुढे येऊन साई संस्थानने या कोरोना मुकाबल्यासाठी 51 कोटी रुपये दिल्याबद्दल  श्री साईबाबा संस्थान चे व  संस्थांच्या या कमिटीचे शिर्डीकर व साई भक्तां तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे,
          ।।चौकट।।
    कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान प्रमाणेच श्री तिरुपती देवस्थानं 200 कोटी रुपये ,माता वैष्णोदेवी मंदिर ट्रस्टने 7 कोटी रूपये, श्री महावीर हनुमान मंदिर पटना तर्फे एक कोटी रुपये, तसेच देशातील विविध देवस्थानच्या वतीने ही  मोठी मदत जाहीर करण्यात आली आहे ,त्याच प्रमाणे अभिनेते अक्षय कुमार यांनी अठरा कोटी ,अजय देवगन यांनी 15 कोटी ,त्याच प्रमाणे उद्योगपती अनिल अग्रवाल यांनी 200 कोटी ,आनंद महिंद्रा यांनी तीनशे कोटी, मुकेश अंबानी यांनी 1000 कोटी रुपये मदत म्हणून या राष्ट्रीय आपत्तीत देण्याचे जाहीर केले आहे ,विविध संस्था,नेते, अभिनेते, उद्योगपती हे आर्थिक व इतर वेगवेगळ्या प्रकारांनी मदतीसाठी आता पुढे येत आहे, अशा बिकट समयी अहमदनगर जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी, विविध खाजगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी, शिक्षकांनी, आपला एक दिवसाचा पगार कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मदत म्हणून देण्याची गरज असल्याचे व प्रत्येक नागरिकांनी आपणास याप्रसंगी काय मदत करता येईल त्याप्रमाणे ती करावी ,गर्दी टाळावी ,असही मत साई भक्त व जिल्हा वासिया मधून व्यक्त होत आहे,

श्रीरामपूर (प्रतिनिधी) कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाची दखल घेत नगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचार्‍यांनी शहरात घरोघर जाऊन पाहणी करायला सुरुवात केली आहे . यामध्ये बाहेरगावाहून आलेल्या पाहुण्यांचा शोध घेतला जात आहे . विशेषतः पुणे, मुंबई येथून आलेल्या लोकांची नोंद घेऊन त्यांच्या हातावर शिक्के मारले जात असून त्यांना 14 दिवस घरांमध्येच थांबण्याचा सल्ला दिला जात आहे.
नगरपालिकेच्या सिस्टर सुनिता त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली पालिका दवाखान्यातील नर्सेसची टीम शहराच्या विविध भागात जाऊन घराघरातून ही पाहणी करीत आहे .आज त्यांनी वार्ड नंबर दोन मध्ये घरोघरी भेटी देऊन बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची माहिती घेतली.आलेल्या लोकांची नावे व संपर्क क्रमांकाची नोंद घेण्यात आली .याशिवाय घरांमध्ये कोणाला ताप, कोरडा खोकला, सर्दी झाली आहे काय याचीही विचारणा करण्यात आली.
आरोग्य विभागाच्या या पथकासोबत पोलीस बंदोबस्त ही देण्यात आला आहे.हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवे व त्यांचे सहकारी याकामी सहकार्य करीत आहेत .सदरची पाहणी आणखी काही दिवस चालणार असून नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या घरात आलेल्या नवीन पाहुण्यांची माहिती आरोग्य विभागाला द्यावी . कोरोना पासून सर्व शहरवासीयांचे रक्षण करण्यासाठी ही पाहणी केली जात आहे त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नगरसेवक हाजी अंजुमभाई शेख, हाजी मुजफ्फरभाई शेख, ताराचंद रणदिवे, मुक्तार शाह, समीना अंजुम शेख, जायदाबी कुरेशी,तरन्नुम रईस जहागीरदार,कलीम कुरेशी, रज्जाक पठाण,निसारभाई कुरेशी, रईस जहागिरदार,अस्लमभाई सय्यद आदींनी केले आहे .

बेलापूर  (प्रतिनिधी  )- कोरोनाच्या  धास्तीमुळे घरातच बसलेल्या गरीब कुटूंबाला आधार देण्याकरीता काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला असुन त्यांच्या योगदानातुन गरीबांना जिवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले       कोरोनाचा फैलाव होवु नये म्हणून प्रत्येक जण घरात बसुन असुन जे लोक मोलमजुरी करुन आपली गुजराण करत होते त्यांच्यावर उपासमारीची वेळ येवु नये म्हणून गावातील हाजी ईस्माईल शेख हाजी शोएब शेख अमीरसाहेब शेख कुरेशी फकीर आतार यांनी वैयक्तिक खर्चातुन किराणा सामान खरेदी करुन त्याचे गरजवंताना मोफत वाटप केले यात शेंगदाणे तेल तुप मीठ बेसन पीठ साबण निरमा
तांदूळ अशा वीस वस्तुचा समावेश होता  या वेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे पंचायत समीती सदस्य अरुण पा नाईक पत्रकार देविदास देसाई अजय डाकले सुभाष राजुळे चंद्रकांत नाईक शकील कुरेशी अमीरसाहेब आतार फकीर शेख अल्ताफ शेख सुभान शेख मुस्ताक शेख ईम्रान शेख बिलाल शेख सुभाष मोहीते संजय शेलार  अमोलीक रफीक शेख ईलीयास शेख अल्लाऊद्दीन शेख रविंद्र करपे शरद देशपांडे  पत्रकार गोविंद साळुंके उपस्थित  होते

-राजेंद्र गड़करी अंतरराष्ट्रीय तीर्थ क्षेत्र असणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डी या पावन भूमीत दररोज श्री साई दर्शनासाठी देश-विदेशातून हजारो साईभक्त येत असतात मात्र सध्या कोरोना विषाणूंचा संसर्ग एकमेकांना होऊ नये किंवा वाढू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार सर्व देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे, शिर्डीत त्यामुळे लॉक डाऊन असून श्री साई  समाधि मंदिर सह सर्वच बंद आहे, अशा प्रसंगी अत्यावश्यक सेवा पुरवणारे वाहनधारक तसेच येथे असणारे भिकारी साधू यांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे श्री साईबाबा संस्थाने अशा गरजवंतांना नाष्टा पाकिटे देऊन या संकट समयी मदत करणे गरजेचे असल्याचे नागरिक बोलत आहे,
     सध्या जगात, देशात, राज्यात सर्वत्र कोरोना ची चर्चा सुरू आहे, देशात सर्वत्र लॉक डाऊन असल्याने सर्व ठप्प आहे, शिर्डीत अाधी दररोज हजारो साईभक्त येत होते ,परंतु लाक डाऊन मुळे सर्व दुकाने, विमानसेवा, रेल्वे वाहतूक तसेच एसटी महामंडळाच्या बसेस, सर्व काही बंद आहे ,एवढेच नव्हे तर श्री साई समाधी मंदिर सुद्धा बंद असल्याने साई भक्त एकही येत नाही श्री साईबाबा संस्थाने मंदिराबरोबरच आपली सर्व भक्त निवासस्थाने व प्रसादालही बंद केले आहे, त्यामुळे शिर्डीत असणारे भिकारी साधू यांचा या काळात उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे ,अशासाधू संतांसाठी  तसेच येथे  प्रसादालय वर अवलंबून असणारे  भिकारी यांना श्री साईबाबा संस्थाने मोफत नाश्ता पाकिटे पुरवावीत, त्याच प्रमाणे राज्यात देशात अत्यावश्यक सेवा पुरवणारे मग ते दूध टँकर असो, भाजीपाला किंवा किराणामाल ट्रक असो अश्या ट्रक चालकांना रस्त्यात सर्वकाही बंद असल्यामुळे जेवण तर दूरच पण चहा सुद्धा मिळणे मुश्कील होत आहे, तरी श्री साईबाबा संस्थान नगर मनमाड या महामार्गावर येणाऱ्या-जाणाऱ्या अशा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या ट्रक चालकांना नाष्टा पाकिटे दिली तर त्यांचा अशा समयी चांगला उपयोग होईल अशी मागणी शिर्डी मधून होत आहे
    शिवाय श्री साईबाबा संस्थान कडे नाष्टा पाकिटे बनवण्याची यंत्रणा सज्ज असते ,भविष्यात जर बाका प्रसंग याविषाणू मुळे निर्माण झाला तर शिर्डी परिसरात किंवा जिल्ह्यात किंवा आणीबाणी प्रसंगी महत्त्वाच्या ठिकाणी असे अन्न किंवा नाष्टा पाकीट कसे पोहोचवता येतील याची नियोजन किंवा तयारी ही श्री साई संस्थान करण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी व्यक्त केले.


-निवासी संपादक जीतेश लोकचंदानी शिर्डी  हे श्री साईबाबा मुळे अंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून येथे सध्या कोरोना व्हायरस चा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वत्र मोठी काळजी घेण्यात येत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे 14 एप्रिल पर्यंत येते लॉक डाऊन आहे,     मात्र अत्यावश्यक सेवा पुरवणारे, किंवा अत्यावश्यक गरजेसाठी बाहेर पडणाऱ्यांना शिर्डीत आता मास्क हे अव्वाच्या सव्वा किमतीला मिळत आहे, काही डुप्लिकेट मास्क बाजारात आल्याचे समजते ,तरी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी किंवा सामाजिक संस्था यांनी पुढे येऊन येथील नागरिकांना मास्कचे मोफत वाटप करावे, अशी मागणी शिर्डी करांनी केली आहे
     सध्या देशात, राज्यात सर्वत्र कोरोनाचीच चर्चा सुरू आहे, संसर्गजन्य हा आजार असल्याने शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या अहवालानुसार लॉक डाऊन करण्यात आले आहे, नेहमी गजबजलेली शिर्डी सध्या शांत शांत आहे, शिर्डीत येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेस खाजगी बसेस, रेल्वे वाहतूक विमान वाहतूक सर्व बंद आहे साईभक्त ही  येणे बंद असून दुकाने ,लॉजेस बंद आहे ,एवढेच नव्हे तर श्री साई समाधी मंदिर मंदिरही बंद ठेवण्यात आले आहे त्यामुळे शिर्डी सध्या शांत शांत आहे, मात्र शिर्डीत गोरगरीब व मोलमजुरी करणारेही ही अनेक आहेत ,शिवाय लॉक डाऊन मुळे त्यांना बाहेर पडणे मुश्कील होत आहे ,अशांना संध्याकाळी खाण्यापिण्याची सुद्धा मोठी पंचाईत होत आहे दिवसभर काम करून संध्याकाळी रोजीरोटी मिळवणारे शिर्डीत अनेक आहेत मात्र लोक डाउन  मुळे काम ठप्प झाले आहे, त्यामुळे अशांना बाजारात मास्क घेणेही परवडत नाही, शिर्डीत दूध ,मेडिकल भाजीपाला, किराणा अशा अत्यावश्यक सेवा पुरवणारे तसेच त्या घेण्यासाठी दुकानात येणारे यांना मास्क ची मोठी गरज आहे, स्वच्छ  शिर्डी ,सुंदर शिर्डीचे देशाचे तीसरे बक्षीस शिर्डीला  मिळाले आहे, अशा स्वच्छ सुंदर शिर्डीत आज पर्यंत सर्व  नियम पाळत आहेत, लॉक डाऊन मुळे नागरिक बाहेर पडण्याचे टाळत आहेत, अशा शिर्डीत अत्यावश्यक सेवा पुरवणारे तसेच अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणारे यांना स्थानिक लोकप्रतिनिधींनी किंवा सामाजिक संघटनांनी पुढे येऊन मास्क पुरवण्याची गरज आहे कारण सध्या बाजारात मास्क मिळेनासे होत आहे किंवा त्याच्या किमंती अवाच्या सव्वा लावल्या जात आहे ,त्याचप्रमाणे बाजारात डुबलीकेट मास्क आल्याचेही समजते, त्यामुळे येथील नगरसेवक किंवा सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन आपापल्या वार्ड मध्ये  योग्य असे मास्क मोफत वाटप केले तर त्याचा फायदा नागरिकांना चांगला होईल, इतर वेळी किंवा निवडणुकीच्यावेळी नागरिकांना विविध गोष्टींचे वाटप केले जाते परंतु अशा प्रसंगी हे मास्क चे वाटप केले तर ते सर्व दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे, असेही मत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले असून तशी मागणी शिर्डी करांनी केली आहे.


श्रीरामपूर- कोरोना विषाणू संसर्गामुळे उदभलेल्या आपत्तकालीन परिस्थितीत वाहतुक परवाने देण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, श्रीरामपूर येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी खान यांनी दिली आहे.
या संदर्भात जारी करण्यात आलेल्या एका शासकीय प्रसिद्धी पत्रकात खान यांनी नमूद केले आहे की, राज्याचे परिवहन आयुक्त यांनी आज (26 मार्च) रोजी दिलेल्या निर्देशानुसार पोलीस व परिवहन विभागाकडून अत्यावश्यक सेवा व वस्तु यांची वाहतुक करणाऱ्या मालवाहु वाहनांना प्रमाणपत्र जारी करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार पोलीस विभागाने आवश्यक ते सहकार्य करावे, व कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी सदरचे प्रमाणपत्र हे केवळ लॉकडाऊनच्या कालावधीपुरते वैध राहील. 
सध्या लागु असलेल्या संचारबंदीमुळे अत्यावश्यक मालवाहु वाहनधारकांना कार्यालयात येणे अडचणीचे होत असल्याने तसेच परिवहन कार्यालयातील गर्दी  टाळण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष  कार्यालयात मध्ये स्थापित केला असुन मालवाहु मालकांनी प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत येऊन अर्ज केल्यास त्यांना त्वरित प्रमाणपत्र देण्यात येईल किंवा ज्या वाहन मालकांना कार्यालयात येणे शक्य नाही त्यांना ईमेलद्वारे प्रमाणपत्र जारी करण्याची व्यवस्था जारी करण्यात आली आहे. त्यासाठी mh17@mahatranscom.in या ईमेलवर अर्ज सादर करावेत.
आर्ज  करतांना लागणारे फॉर्म  
वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (आर.सी.बुक)
वाहना संदर्भातील सर्व प्रकारच्या कर पुस्तिका
वाहनाचे विमा प्रमाणपत्र (इन्शुरन्स)
वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टीफिकेट)
वाहनाचा परवाना (परमिट)
वाहन चालकाची अनुज्ञप्ती (लायसन्स)
वाहन चालकाचे व सहाय्यकाचे ओळखपत्र 
या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ज्या ईमेलवरुन अर्ज केला आहे त्या ईमेल पत्त्यावर परवानगी प्रमाणपत्र अग्रेषित केले जाईल. त्याची प्रिंट काढून सादर पास वापरता येईल असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


♦महानगरातून आलेले आहे 200 पेक्षा जास्त लोक
🟢येथे "लॉकडाउन" ठेंग्यावर
बुलडाणा - 26 मार्च
जवळ असलेल्या देऊळघाट येथे आज 26 मार्चला जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाने महानगरातून आलेल्या 99 लोकांच्या हातावर शिक्का मारून त्यांना पुढील 14 दिवससाठी होम कोरोनटाइन करण्यात आले आहे.हे लोक आजारी नसून फक्त खबरदारी म्हणून ही उपाययोजना करण्यात आली असली तरीही येथील जनता कलम 144 चा सर्रास उल्लंघन करीत आहे.
      बुलडाणा जिल्ह्यातील मोठ्या गावा पैकी देऊळघाट एक आहे जे बुलडाणा पासून अवघ्या 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे.येथील अनेक लोक रोजगारसाठी मुंबई,भिवंडी,पुणे,सूरत अश्या महानगरात गेलेले आहे.मागील काही दिवसापासुन कोरोना वायरसने देश भरात थैमान घातले असून संपूर्ण देशा लॉकडाउन ची घोषणा करण्यात आली.अनेक महानगरात गेलेले लोक आपल्या मुळ गावी परतले.देऊळघाट येथे आरोग्य सेविका,आशा वर्कर यांच्या माध्यमाने बाहेर गावातून आलेल्या लोकांचा सर्वे करण्यात आला.मुंबई,पुणे या शहरात कोविड-19 चे रुग्ण मोठ्या प्रमाणात मिळून आले म्हणू ग्राम पंचायत व जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाने खबरदारी घेत देऊळघाट या गावात बाहेरुन आलेल्या लोकांना घरीच थांबवन्याचे सांगितले तरीही बरेच लोक बाहेर फिरत होते म्हणून आज आरोग्य अधिकारी डॉ. अरुण जवंजाळ यांनी सरपंच गज़नफर खान,तंटामुक्त समिति अध्यक्ष जुनैद खान,बिट जमादार चोपडे यांना सोबत घेऊन आपली आरोग्य टीम घेऊन बाहेरुन आलेल्या लोकांच्या घरी पोचले व 99 लोकांच्या हाती होम कोरोनटाइनचा शिक्का लावून त्यांना पुढील 14 दिवस घरी राहण्याचे निर्देश दिले.हे सर्व 99 लोकांची तब्यत बरी असून फक्त खबरदारी म्हणून हे पाऊल उचलल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. अरुण जवंजाळ यांनी दिली आहे.लोकांनी आपल्या घरीच रहावे,कोणीही बेकाम घरा बाहेर येऊ नये अशी विनंती सरपंच गज़नफर खान यांनी केली आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी व सर्व प्रशासकीय यंत्रणा जनतेच्या भल्यासाठी रात्रंदिवस जीव तोडून राबत असताना शासनाच्या आदेशांना हरताळ फासण्याचे काम वार्ड नंबर दोन मध्ये केले जात आहे .विशेष म्हणजे पोलिसांनी या परिस्थितीकडे सपशेल दुर्लक्ष करीत मौलाना आझाद चौकात पाण्याच्या टाकीजवळ खुच्र्या टाकून बसणे पसंत केल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे .देशासह राज्यात सर्वत्र लॉक डाऊन करून कोरोनाच्या भयानक रोगावर नियंत्रण मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे . त्याचाच एक भाग म्हणून श्रीरामपूर शहरात ठिकठिकाणी अडथळे निर्माण करून रस्ते बंद करण्यात आले आहेत .सय्यद बाबा चौक, मौलाना आझाद चौक, गोंधवणी रोड, काजीबाबा रोडही बंद करण्यात आला आहे . मात्र सुभेदार वस्तीतील आतील भागात सर्वत्र नागरिक रस्त्यावर दिसत आहेत . सुलतान नगर , कुरेशी जमात खाना, चौधरी बिल्डिंग कॉर्नर, बीफ मार्केट चौक, घरकुल परिसर, गुलशन चौक, सोमेश्वर पथ, बजरंग चौक, मिल्लत नगर पूल, संजयनगर रोड, फातेमा कॉलनी, गोंधवणी पूल, दशमेश नगर चौक या परिसरात सर्वत्र लोकांचे टोळके ठिकठिकाणी इमारतींच्या ओटयांवर बसून गप्पा मारतांना दिसत आहेत . कुठलेही अंतर न राखता शेजारी बसून चर्चा झडत आहेत .
भाजीपाला व फळविक्रेते बिनदिक्कतपणे गल्लीबोळातील रस्त्यांवर फिरत आहेत . घरकुलातील इमारतींच्या जिन्यावर बसून महिलांच्या गप्पा चालू आहेत .
रस्ते बंद असल्याने पोलिसांची चारचाकी किंवा दुचाकी वाहने या भागात दोन् दिवसापासून फिरकलेली नाहीत . कायदयाचा कोणताही धाक नसल्याने नागरिक बिनदिक्कत फिरत आहेत . पुढारी छाप कार्यकर्तच लोकांना घेऊन बसलेले दिसून येत आहेत . हीच परिस्थिती कायम राहिल्यास श्रीरामपुरात कोरोनाची साखळी खंडित होण्याऐवजी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे . या सर्व परिस्थिची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांनी तातडीने दखल घेऊन या भागात बाहेर फिरणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी सुजाण नागरिकांनी केली आहे .
पोलीसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष
शहर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी सर्व प्रमुख मशिदींच्या ध्वनिक्षेपकांवरुन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले होते . मात्र उनाड व टारगट प्रवृत्तींच्या लोकांवर त्याचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे वर्तमान परिस्थितीवरून दिसून येत आहे .

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget