May 2021

 

*कुप्रसिद्ध नयन तांदळे टोळीला Dysp संदीप मिटकेंचा झटका,*

*चोरी आणि बनावट पोलिस ओळखपत्र तयार केल्याचा गुन्हा दाखल*

सुपा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्काच्या गुन्ह्यातील कुख्यात नयन तांदळे टोळी यांनी आणखी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले  आहे. मोक्काच्या  गुन्ह्याचा तपास करीत असताना Dysp संदीप मिटके यांच्या निदर्शनास आले की, नयन तांदळे व त्याचे साथीदार यांनी चोरी आणि बनावट पोलीस ओळखपत्र बनवण्याचा गुन्हा केलाआहे त्यावरून तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून नयन तांदळे टोळीस मोठा झटका दिला आहे.

     फिर्यादी महेश  साहेबराव ससे वय 29 वर्ष धंदा व्यवसाय रा.झोपडी कॅन्टीन अहमदनगर यांचे दि 21/12/2020 रोजी नगर मनमाड रोड वरील झोपडी कॅन्टीन जवळील येवले चहाचे दुकाना समोरून  नयन तांदळे व त्याचे साथीदारांनी फिर्यादी हे चहा पिण्याकरिता गेले असता त्यांचे खिशातील पाकीट चोरून त्यामध्ये असणारे फोटोचा गैरवापर करून बनावट पोलीस ओळखपत्र तयार करून फिर्यादीची तसेच  पोलिस विभागाची फसवणूक केली आहे त्यानुसार नयन तांदळे टोळी विरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन येथे.वरील दिलेल्या मजकूरचे फिर्यादी वरून अजून एक गुन्हा रजि. नंबर I 419/2021 भा.द.वि. कलम. 379,467,468,471,419,420,34 प्रमाणे दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास A.P.I.मुंडे हे करत आहेत.


*श्रीरामपुरातील सुरक्षा रामभरोसे!*

♦️श्रीरामपूर शहरात विविध भागात बसवलेले काही सीसीटीव्ही बंद असल्याचे समोर आले आहे. तसे लेखी पत्रच

श्रीरामपूर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी माहिती अधिकारात माहिती मागविलेल्या कार्यकर्त्याला दिले असल्याने श्रीरामपूर शहराची सुरक्षा रामभरोसे आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

*सीसीटीव्ही फुटेजची केली होती मागणी*

♦️श्रीरामपूर शहरातील असलम बिनसाद यांनी २६ एप्रिल रोजी शहर पोलिस स्टेशनला माहिती अधिकारात माहिती मागितली होती. त्यामध्ये २३ एप्रिल रोजीची पोलिसांकडून झालेल्या या अमानुष मारहाणी मुळे युवकाचे हात फँक्चर तर अनेकांना झाली अमानुष मारहाण प्रकरणाचे एका चौकातील सायंकाळच्या दरम्यानची सीसीटीव्ही फुटेज मिळण्यास विनंती केली होती.


*पोलिसांनी दिले हे उत्तर*

♦️पोलिसांनी असलम बिनसाद यांना पोलिस स्टेशनच्या लेटर पॅडवर २१ मे रोजी लिखित दिले की, 'आमच्या पोलिस स्टेशनच्या डीव्हीआरमध्ये वरील तारखेस तांत्रिक अडचण आल्याने सीसीटीव्ही फुटेजची रेकॉर्डिंग उपलब्ध होऊ शकली नाही, म्हणून आपणास सीसीटीव्हीची रेकॉर्डिंग देण्यात आली नाही.'

*शहरातील सुरक्षा विषयी  केला सवाल*

♦️शासकीय व प्रशासकीय अधिकारी यावर घेणार का अँक्शन.

♦️शहरातील सुरक्षा व्यवस्था बंद पडल्याची केली होती का नोंद.

♦️ श्रीरामपूरातील वरिष्ठ अधिकारी यांची चुप्पी का?

♦️  जिल्हा पोलीस प्रमुख करणार का कारवाई.

बेलापूर(प्रतिनिधी  )- कोरोना काळात अडचणीत सापडलेले मागास वर्गीय अंपग महीलांना आधार देण्यासाठी  महीला व बाल कल्याण निधीतुन १०% रक्कम खर्च करावी अशी मागणी सरपंच  महेंद्र साळवी यांच्याकडे चंद्रकांत नाईक व इतरांनी केली आहे                                बेलापुर  ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र साळवी व ग्राम विकास अधिकारी राजेश तगरे  यांना दिलेल्या  निवेदनात पुढे म्हटले आहे की बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत फंडातील सन 2020-21 व सन 2021 -22 या दोन वर्षांचा मागासवर्गीय 15 टक्के, अपंग 5 टक्के, महिला व बालकल्याण 10 टक्के ग्रा. प. फंडातून खर्च करावयाच्या निधीचे  वाटप तातडीने करावे व  कोरोना सारख्या आजारामुळे लॉक डाऊन असल्याने मोल मजुरी चे काम बंद आहे  या काळात आर्थिक संकटात सापडलेल्या मागासवर्गीय अपंग महिलांना जीवनावश्यक वस्तू औषधे आदी कामा साठी रोख स्वरूपात ग्रा. पंचायतने निधिच्या रकमेतून आर्थिक सहाय्य करावे तसेच गावामधे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे डेंगू मलेरिया टायफॉईड सारखे साथी च्या आजार चा फैलाव होऊ शकतो यासाठी गावा मध्ये व वाड्या वस्त्यावर डास निर्मूलन औषधा ची फवारणी करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत सरपंच श्री महिंद्र साळवी ग्राम विकास अधिकारी श्री तगरे  यांना निवेदन देण्यात आले या वेळी  सर्वश्री चंद्रकांत पाटील नाईक, अय्याज  सय्यद, विजय शेलार, भाऊसाहेब तेलोरे, सुरेश अमोलिक, अनिल पवार, प्रकाश जाजू, अक्षय नाईक, वैभव कुर्ह्र त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य भरत साळुंके व रविंद्र  खटोड, मुश्ताक शेख, रमेश अमोलिक आदी उपस्थित होते

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपूर शहरातील  अजब प्रकार माहिती अधिकारात उघडकीस आला असुन श्रीरामपूर शहरात अनेक ठिकाणी  चक्क सी सी टी व्ही कँमेरे  बंद असल्याचे पत्र श्रीरामपूर पोलीस स्टेशनच्या अधिकार्यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या कार्यकर्त्याला लेखी दिले असल्याने श्रीरामपूर शहराची सुरक्षा राम भरोसे असल्याचे दिसून येत आहे       या बाबत मिळालेली माहीती  अशी कि श्रीरामपूर शहरातील तिरंगा न्युज चे संपादक असलम बिनसाद यांनी दिनांक २६ एप्रिल २०२१ रोजी शहर पोलीस स्टेशनला माहिती अधिकारात माहिती मागितली होती कि दिनांक २३ एप्रिल २०२१ रोजीची छ.शिवाजी चौकातील सायंकाळच्या दरम्यानची सी सी टी वि फुटेज मीळण्यास विनंती केली होती त्यावर शहर पोलीस स्टेशनने असलम बिनसाद यांना पोलीस स्टेशनच्या लेटर पॅडवर दिनांक २१ मे २०२१ रोजी लिखित पत्र  दिले कि आमच्या पोलीस स्टेशनचे  डी व्ही आर यात वरील तारखेस तांत्रिक अडचण  आल्याने  सी सी टी वि फुटेज ची रेकॉर्डिंग उपलब्ध होऊ शकली नाही म्हणून आपणास सी सी टी वि ची रेकॉर्डिंग देण्यात आली नाही असा उल्लेख शहर पोलीस स्टेशने केला आहे यावरून स्पष्ट होते कि हे सी सी टी वि कॅमेरे हे फक्त शोभेचे बाहुले आहे की काय ? पोलिसांनी जनतेची दिशाभूल करण्यासाठी लावले असल्याने शहराची सुरक्षा राम भरोसे आहे असे म्हणण्याची पाळी आली आहे दिलेल्या माहिती अधिकारात असे उत्तर शहर पोलीस स्टेशन कडून अपेक्षित नव्हते कारण कि शहरात गजबजल्या ठिकाणीच जर सी सी टी वि बंद आहेत तर  पोलिसांना हे माहित  बंद असलेले सी सी टि व्ही सुरु करण्याची तसदी का घेतली नाही  आहेत कदाचित कँमेरे चालूही असतील परतु काही माहीती उघड होवु नये  म्हणून तर अश्या प्रकारचे पत्र देऊन माहिती अधिकारी कार्यकर्त्यांची दिशाभूल केली की काय अशी शंका येत आहे   ह्या माहिती आधीकारात पाठविलेल्या  प्रथम अपीलीय अधिकारी पोलीस उप विभागीय अधिकारी यांच्या कडे अपील दाखल करणार असल्याचे  असलम बिनसाद यांनी प्रसार माध्यम यांना सांगितले .

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- सध्या सर्वत्रच कोरोनाने हाहाकार माजवला आहे, सुरक्षितेचा उपाय म्हणून जिल्हाभरात लॉकडाऊन लावण्यात आले आहे, शासनाच्या आदेशान्वये दुचाकीवर एकाच प्रवाशात अत्यावश्यक कामांसाठी परवानगी देण्यात आलेली आहे,अशा प्रकारे शासनस्तरावरून कोरोनास प्रतिबंध घालण्याच्या विविध उपाययोजना चालु आहे,हे खरोखरच स्तूतीजन्य व रास्त असलेतरी,आता प्रत्येकाच्या घरी काही चारचाकी वाहन नक्कीच नाही,किंबाहूना दुचाकीही नाही,मात्र परीवारातील कोणी सदस्य आजारी असल्यास अक्षरशः शेजाऱ्यांकडून तात्पुर्ती दुचाकी घेऊन का होईना जर संबंधित रुग्णांस रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केल्यास अथवा घेऊन गेल्यास आपल्या प्राणांची पर्वा न करता केवळ जनमानसासाठी भररस्त्यावर उभा पोलिस दादा आपल्या काठीने दुचाकीची खोपडी फोडतो,

इंडिगेटर तोडतो त्यावर दोनशे रुपयांचा दंड फाडतो,मात्र काहीही बोलायास गेलो की चक्क दुचाकी पोलिस स्टेशनला ओढतो, स्वतः:च दुखत असल्याने रुग्णांना दुचाकीवर बसवून रुग्णालयात जाता येईना, आणि दुसऱ्यांना देखील त्यांना दुचाकीवर बसवून रुग्णालयात नेता येईना,अशा पद्धतीने जनसामान्यांना मोठ्या संतापाचा सामना करावा लागत आहे,काही ठिकाणी तर एकट्या दुचाकी चालकास कुठलीही विचारपूस न करता दुचाकी दिसताच लांबुनच काही पोलिस दादा काठी फेकुन मारण्याचे यशस्वी प्रयोग करत आहेत,यामध्ये रुग्णांसह दुचाकीस्वारास खाली कोसळून गंभीर दुखापतीस सामोरे जावे लागत आहे,नुकतेच एक प्रकरण  मागेही असेच घडले आहे, ज्यात एका धार्मिक स्थळाचा सेवेकरी धार्मिक स्थळाचा अश्व (घोडा) घेऊन चालला होता,त्यास पोलिसदादांकरवी इतकी अमानूष मारहाण करण्यात आली की हात फॅक्चर होऊन थेड रुग्णालयात दाखल व्हावे लागले,अशाप्रकारे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या नावाखाली श्रीरामपूर शहरात पोलिसदादांकरवी लोकांना मारहाण आणि जबरदस्तीने दंड पावती फाडण्याचे कामे सध्या मोठ्या प्रमाणात होत आहेत, यावर ज्यांचे नियंत्रण असावे असे वरीष्ठ पोलिस अधिकारी देखील यावर काहीच बोलण्यास तयार नाही, यामुळे सदरील प्रकरणी त्यांचाही अशा गैरप्रकारांना छुपा पाठिंबाच असल्याचे दिसून येत आहे.

पोलिस प्रशासन'आरोग्य सेवा ही आजच्या काळात साक्षात देवदुतच आहेत याबाबत दुमत नाहीच,मात्र यातील काही असंमंजस प्रवृती या पवित्र खात्याला आणि नात्याला बदनाम करु पाहत आहेत,यावर  जिल्हाधिकारी/जिल्हा पोलिस प्रमुख,जनतेला दिलासा दायक काही निर्णय घेतील का ? अन्यथा जनतेवर होत असलेला अन्याय आणि त्यांच्या गळचेपीवर सामाजिक कार्यकर्ताआता गप्प बसणार नाहीत तर याविरुद्ध आवाज उठविणार असल्याचे समाजवादी पार्टी चे उत्तर जिल्हाध्यक्ष तथा जे.जे.फाऊंडेशनचे अध्यक्ष जोएफ जमादार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी )-लोक सहभागातुन सुरु केलेल्या कोवीड केअर सेंटरला एक महीन्याचा कालावधी पुर्ण झाला असुन या कालावधीत दोनशे रुग्ण बरे होवुन सुखरुप घरी गेले असल्याची माहीती जि. प .सदस्य शरद नवले यांनी दिली .  बेलापुर येथील मराठी शाळेत सुरु असलेल्या मोफत कोवीड केअर सेंटरला एक महीना पुर्ण झाल्याचे औचित्य साधुन तसेच १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजातुन खरेदी केलेल्या अँम्बुलन्सचा लोकार्पण सोहळा जि .प. सदस्य शरद नवले यांच्या हस्ते डाँक्टर देविदास चोखर ,सरपंच महेंद्र साळवी यां मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला  .   या वेळी बोलताना जि. प. सदस्य शरद नवले म्हणाले की जिल्हा परिषदेच्या १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजातुन  अँम्बुलन्स खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यातील एक अँम्बुलन्स बेलापुर प्राथमिक आरोग्य केद्रास देण्यात आलेली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बारा गावे येत असुन नविन अँम्बुलन्समुळे वैद्यकीय अधिकार्यांना काम करणे सोपे होईल . लोक सहभागातुन सुरु करण्यात आलेल्या कोवीड केअर सेटर मधुन रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा दिल्यामुळे सर्व रुग्ण ठणठणीत बरे झाले . हे सर्व कार्य पार पाडण्यासाठी गाव व परिसरातील अनेक दाते, देणगीदार धावुन आले .सर्वांनी केलेल्या योगदानामुळेच हे अवघड काम शक्य झाले असुन गावाचे गावपण टिकविण्यासाठी सर्वांनी अशीच एकजुट दाखवावी असे अवाहनही नवले यांनी केले आहे. या वेळी डाँक्टर सुधीर काळे ,डाँक्टर रविंद्र गंगवाल, डाँक्टर मच्छिंद्र निर्मळ ,डाँक्टर अविनाश  गायकवाड ,डाँक्टर अनिल भगत, रणजीत श्रीगोड ,अजय डाकले, पुरुषोत्तम भराटे, पोलीस पाटील अशोक प्रधान, भाजपाचे प्रफुल्ल डावरे, बाळासाहेब दाणी, साहेबराव वाबळे, अकबर टिन मेकरवाले, मुस्ताक शेख, रमेश अमोलीक, अशोक राशिनकर, संतोष डाकले, मिनु अंबिलवादे ,दिलीप अमोलीक, नाना चव्हाण ,सोमनाथ जवरे, किरण गागरे ,अमोल गाढे, सतीश शेलार ,विशाल आंबेकर, महेश कुर्हे ,संतोष शेलार उपस्थित होते .

अहमदनगर-अश्लील फोटो (सोशल मीडिया) इंस्टाग्रामवर प्रसारीत करुन  मुलीला आणि कुटुंबास जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपीस अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून अटक केली आहे.  पोनि .अनिल कटके यांना गुप्त खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून  रोहीत जालिंदर पाटोळे( रा.फर्याबाग) यास अटक केली आहे. भादविक ३५४(ड), ५०६ (२), ५०७ सह माहीती तंत्रज्ञान कायदा २०२० चे कलम ६६ (अ), ६६ होता. (ई) व ६७ प्रमाणे आरोपी रोहीत पाटोळे यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहित अशी की  १७ मे २०२१ रोजी  एका  मुलीने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की, रोहीत जालिंदर पाटोळे रा.फर्याबाग, अहमदनगर याचे व माझे एकमेकावर प्रेम होते. दरम्यानच्या काळात आम्ही दोघे बाहेर फिरायला गेल्यानंतर रोहीत पाटोळे याने त्याचे मोबाईल मध्ये आमचे दोघांचे काही खाजगी फोटो काढलेले होते. त्यानंतर आरोपी रोहीत पाटोळे हा फिर्यादी मुलीस लग्नाची मागणी घालु लागला. त्यास फिर्यादी मुलीने नकार दिला असता आरोपीने यांने फिर्यादी मुलीस व तिच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी देवू लागला. तसेच फिर्यादी मुलीचे नावाने इंस्टाग्रामवर बनावट अंकाऊट तयार करुन त्यावर त्यांचे मोबाईलमध्ये काढलेले खाजगी फोटो व व्हीडीओ प्रसारीत करु लागल्याने फिर्यादी मुलीने भिंगार पोलीस स्टेशनला गु.रजि.नं. १७८/२०२१ भादविक ३५४(ड), ५०६ (२), ५०७ सह माहीती तंत्रज्ञान कायदा २०२० चे कलम ६६ (अ), ६६ होता. (ई) व ६७ प्रमाणे आरोपी रोहीत पाटोळे यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी रोहीत पाटोळे हा फरार झालेला होता. पोनि .अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्त खबऱ्याकडून खात्रीशीर बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी नाम रोहीत पाटोळे हा येरवडा, पुणे येथे राहत आहे. सदर बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहेकॉ/ फकीर शेख, पोहेकॉ/संदीप घोडके, पोना/ रविकिरण सोनट्टके पो कॉ/ सागर सुलाने पोकां/ रोहीत येमुल, पोकॉ/ मयुर गायकवाड पोकॉ/ मच्छिंद्र बर्ड व चालक पोहेकॉ/ संभाजी कोतकर अशांनी मिळुन येरवडा पुणे परीसरात आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे रोहित जालींदर पाटोळे वय २४ रा.फर्याबाग सोलापुर रोड, अहमदनगर यास गुन्हयात वापरलेल्या मोबाईलसह ताब्यात घेवून त्यास पुढील कारवाई कामी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलेले आहे. पुढील कार्यवाही भिंगार कॅम्प पोस्टे करीत आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी- गेल्या दीड वर्षांपासून 'उम्मती फाउंडेशन' कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी आणि कोरोनामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आरोग्य विभाग व प्रशासन यांबरोबर खांद्याला खांदा लावून सातत्याने प्रयत्न करीत आहे. भविष्यात येणाऱ्या कोविडच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव रोखण्यासाठी श्रीरामपूर शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिकांचे लसीकरण हाेणे अतिशय आवश्यक आहे. सरकारी लसीकरण केंद्रात तुफान गर्दी होत असल्याने 'उम्मती फाउंडेशन' तर्फे श्रीरामपूर शहरात नवीन व सर्व सुविधांनी परिपूर्ण असे खासगी कोव्हीड लसीकरण केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे, यावेळी उम्मतीचे अध्यक्ष श्री.सोहेल बारूदवाला यांनी ग्रामीण रुग्णालय,श्रीरामपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश बंड यांना भेटून लसीकरण केंद्र सुरू करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली, त्यावेळी डॉ.बंड यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद देत पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव जिल्हा रुग्णालय, अहमदनगर येथे पाठविला, त्यावेळी 'उम्मती' चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

श्रीरामपुर-दि.२१/०५/२०२१ रोजी रात्री ०३/३० या चे दरम्यान बीफ मार्केट समोर नुरेइल्लाही चौक वार्ड नं.२ येथील राहते घराचे जिन्याचे बंद घराचे दरवाज्याचे आतील कडी काढून ओप्पो कंपनीचे २ मोबाईल फोन घरफोडी चोरी करुन नेले बाबत जमील इब्राहिम शहा वय-४१ वर्षे,धंदा- व्यापार रा.बीफ मार्केट समोर नुरेइल्लाही चौक वार्ड नं.२ श्रीरामपुर ता.श्रीरामपुर जि.अहमदनगर यांचे फिर्याद वरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल. झालेला होता. तसेच दिनांक २१/०५/२०२१ रोजी रात्री १०/०० ते दिनांक २२/०५/२०२१ रोजी सकाळी ०६/०० वा.चे दरम्यान संजयनगर वार्ड नं.२ श्रीरामपूर येथील गोडावून मधील खोलीची खिडकी कशाने तरी उघडून खिडकीतून टेबलावर ओप्पो कंपनीचा मोबाईल चोरुन नेले बाबत शकील शहा यांचे फिर्यादीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता. तसेच दिनांक २१/०५/२०२१ रोजी रात्री बाबरपूरा चौक, काझीबाबा रोड वार्ड नं.२ श्रीरामपूर येथे घराचे दरवाज्याचे कुलुप तोडून सोन्याचे मंगळसुत्र चोरुन नेले बाबत फिर्यादी नामे इसाक शहा यांचे फिर्यादीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता.त्यानंतर पोलीस निरीक्षक श्री संजय सानप यांना मिळालेला गुप्त माहिती प्रमाणे आरोपीनामे शहबाज सलिम शहा वय-२२ वर्ष रा.काझीबाबारोड वार्ड नं.२ श्रीरामपूर यास वार्ड नं.२ श्रीरामपूर यास ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्ह्या संदर्भात सखोल तपास करता त्याने उपरोक्त तिनही घरफोड्या केल्याचे कबुल केल्याने त्याचेकडून तीन मोबाईल व एक मंगळसुत्र असे एकूण ७५,०००/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. नमूद तिन्ही घरफोड्याचे गुन्हे घडल्यानंतर अवघ्या २४ तासाचे आत आरोपीला पकडून त्याचकडून उपरोक्त मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.सदर आरोपीविरुध्द खालील प्रमाणे दरोडा तयारीचे दोन गुने, दुखापतीचा एक गुन्हा, तसेच चोरीचा एक गुन्हा दाखल आहेत.

१) श्रीरामपूर शहर पोस्टे गुर.नं. १ २३०/२०१९ भादवि कलम ३८०,३४ 

२) श्रीरामपूर शहर पोस्टे गुरनं. १ २७२/२०१४ भादवि कलम ३२५,३२३,५०४,५०६

३) श्रीरामपूर शहर पोस्टे गुरनं. । २७७/२०१८ भादवि कलम ३९९,४०२

४) श्रीरामपूर शहर पोस्टे गुरनं ।। ११५/२०२१ म.पो.का.क १२४

५) राहुरी पोस्टे गुरनं. १२३५/२०१९ भादवि कलम ३९९,४०२ आर्म अॅक्ट ४/२५ सदरची कारवाई मा.श्री मनोज पाटील पोलीस अधीक्षक सो. अहमदनगर व श्रीमती दिपाली काळे मंडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांचे मार्गदर्शनाखाली तसेच श्री संदीप मिटके साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग, यांचे सुचना प्रमाणे पोलीस निरीक्षक श्री संजय सानप, पोहेको जोसेफ साळवी,पोना बिरप्पा करमल पोकॉ/ किशोर जाधव पोकों/ राहुल नरवडे पोकों/ सुनिल दिघे पोका महेंद्र पवार यांनी केली आहे.


आज रोजी Dy.s.p.संदीप मिटके ,  PI सानप, श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार  व नगरपालिका आरोग्य कर्मचारी यांचे सह छत्रपती शिवाजी चौक येथे अचानक नाकाबंदी लावून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्याचे  वाहनावर कारवाई करून जप्त केले  तसेच 85 इसमांची रॅपिड टेस्ट केली .त्यापैकी 2 पॉझिटिव्ह आढळून  आले आहे.पॉझिटिव्ह आढळलेल्या   इसमांची रवानगी  थेट कोविड केअर सेंटर येथे करण्यात आली आहे.अचानक झालेल्या या कारवाईमुळे काही वेळातच श्रीरामपूर शहरातील रस्त्यावरील वर्दळ कमी झाल्याचे पहायला मिळाले.

अहमदनगर  जिल्ह्यात मालमत्ता विषयक   गुन्ह्याकरिता कुप्रसिद्ध    असलेल्या नयन तांदळे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. सुपा पोलीस स्टेशन येथे फिर्यादी अक्षय चखाले रा. निगडी , पुणे यांनी Cr. No. 504/ 2020 IPC 395, 341 नुसार गुन्हा दाखल केला होता, सदर गुन्हा कुप्रसिद्ध नयन तांदळे टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नयन तांदळे सह टोळीतील अन्य 4 सदस्यांना अटक करण्यात आली होती. नयन तांदळे टोळी ही कोणताही कामधंदा न करता संघटीत पणे बेकायदेशररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता हिंसाचाराचा वापर करून , हिंसाचार करण्याची धमकी देऊन तसेच धाक दपटशहा  दाखवून जबरदस्तीने जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती. सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन मा. श्री मनोज पाटील( पोलीस अधिक्षक), मा. श्री. सौरभ अग्रवाल मा. श्री. अजित पाटील यांनी  सदर गुन्ह्यास मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव मा. विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना सादर केला होता. सदर प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली असून तपास Dysp संदीप मिटके यांच्या कडे वर्ग करण्यात आला आहे. 

सदर टोळीवर या पूर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

1)नयन राजेंद्र तांदळे 

1) सूपा 504/20 IPC 399, 402

 2) सुपा 111/ 17 IPC 379, 34, 411

 3)  तोफखाना 6663/20 IPC 394, 365, 34... 

4) तोफखाना 1756/19 ipc 393, 34.

 5) तोफखाना 1715/19 ipc 392, 34 

 6) तोफखाना 1607/19 ipc 392 , 323, 34                                         7) तोफखाना 1546/19 ipc 394, 323, 34                                8) तोफखाना 1765/19 ipc 392 ,34.   

     2) विठ्ठल साळवे 

1) सुपा 505/ 20 IPC 399, 402 

2) सुपा 111/17 IPC 379, 34.  3)तोफखाना 6663/20 IPC 394, 365 34

  3) अक्षय ठोंबरे 

1) सुपा ipc 399, 402 

  4) शाहुल पवार 

1) सुपा 505/20 IPC 399, 402. 

2) सुपा 153/ 17 ipc 341, 394,396, 34

 3) 87/ 17 IPC 394,397, 34 4) 23/15 ipc 379, 354, 323.... 

5) अमोल पोटे 

1) सुपा 505/ 20 IPC 399, 34 

2) 86/17 ipc 394, 397, 34

 3) 118/ 15 सुपा ipc 379, 34

पुढील तपास मा. मनोज पाटील पोलिस अधीक्षक, मा. सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शन खाली Dysp संदीप मिटके हे करीत असून त्यांना PI नितीन गोकावे, PN अमोल धामणे, PN साहेबराव ओव्हाळ, PC यशवंत ठोंबरे यांचे पथक सहाय्य करीत आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- कृषि उत्पन्न बाजार समीती बंद राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता पिकविलेला भाजीपाला कुठे विकावा तो जास्त काळ ठेवावा तर खराब होणार त्यामुळे या भाजीपाल्याचे काय करावे अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे                                               कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता बाजार समीतीतील व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कर्ज काढुन भेंडी गवार टोमँटो गोबी फ्लाँबर पिकवीले आता बाजारच बंद असल्यामुळे हा माल कुठे विकावा की फेकावा या विवंचनेत शेतकरी वर्ग सापडला आहे सध्या भेंडी तोडणीचे काम जोरात सुरु असुन एक दिवस जरी भेंडी तोडण्यास उशीर झाला तरी ती भेंडी पक्व होते त्यामुळे ती फेकुनच द्यावी लागते शिवाय भाजीपाला पिकवीताना शेतकऱ्यानी महागडी खते उधार आणुन ती पिकाला टाकली आहे भाजीपाला विकुन शेतकरी खताने पैसे भरणार होते आता भाजीपाला तोडणीचा वेळ आला तर बाजार समीत्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे कारण हा भाजीपाला जास्त दिवस ठेवु  शकत नाही तो लवकर खराब होतो त्यामुळे भाजीपाला विक्री साठी बाजार समीती सुरु ठेवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बेलापूरः (प्रतिनिधी  )-।गावातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत बेलापुर  बु!! प्रशासन व कोरोना समितीने बुधवारदिनांक १९ मे ते रविवार दिनांक २३ मे या कालावधीत कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला असुन या नियमाचे उल्लंघन करणारावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे     सध्या बेलापूर आणि परिसरात दिवसागणिक कोरोनाचा प्रसार वाढत आहे.विविध उपाययोजना करुनही परिस्थितीत सुधारणा होत नाही.या पार्श्वभूमीवर सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक,सर्व राजकीय पक्षांचे नेते व प्रमुख,पत्रकार,पोलिस पाटिल,व्यापारी असोसिएशन,किराणा मर्चट असोसिएशन,महसूल व पोलिस प्रशासनाचे प्रतिनिधी आदिंनी विचार विनिमय करुन गावाच्या सुरक्षिततेसाठी  बुधवार १९ मे ते रविवार २३ मे पर्यंत पाच दिवसांचा कडक लाँकडाऊन करण्याचा निर्णय घेतलेला आहे या कालावधित नियमबाह्य वर्तन करणारावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे .या कालावधित वैद्यकीय सुविधा वगळता अन्य सर्व दुकाने भाजीपाला,फळे,किराणा,मांस,मासे,पीठ गिरणी,शेती विषयक दुकाने,बेकरी आदि सर्व व्यवहार बंद राहणार आहेत याची सर्व व्यापारी व्यवसायीक नागरीक यांनी नोंद घ्यावी .त्याचप्रमाणे नागरिकांना विनाकारण फिरण्यावर प्रतिबंध असेल.या नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.तरी नागरिक,व्यापारी,भाजीपाला व फळ विक्रेते आदिंनी ग्रामपंचायत,महसूल,पोलिस प्रशासन तसेच कोरोना समितीस सहकार्य करावे असे आवाहन सरपंच महेन्द्र साळवी,उपसरपंच अभिषेक खंडागळे,सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख,व्यापारी व किराणा मर्चण्ट असोसिएशनचे पदाधिकारी,पत्रकार,ग्रामसेवक राजेश तगरे,का.तलाठी श्री.कैलास खाडे,पोलिस पाटिल अशोक प्रधान,बेलापूर पोलिस स्टेशनचे हवालदार अतुल .लोटके  तसेच कोरोना समितीने केले आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी )- येथील निराधार दिव्यांगाला वेळेवर औषधोपचार मिळाल्यामुळे तसेच   सकारात्मक मानसिकता व प्रबळ ईच्छा शक्तीच्या जोरावर त्यांनी कोरोनावर मात केली असुन आता त्या पुर्णपणे बर्या झालेल्या आहे. बेलापुर येथील नंदाताई क्षिरसागर या दोन्ही पायाने विकलांग आहे तसेच त्यांना कुणाचाही आधार नाही तरीही गावातील घरोघरी जावुन मिळेल ती कामे करुन त्या आपला उदार निर्वाह करतात त्यांना थोडा त्रास झाल्यावर त्यांनी माजी सरपंच भरत साळुंके यांना सांगितले त्यांनी तातडीने त्यांची आरोग्य तपासणी करुन घेतली त्यात त्याचा अहवाल पाँजिटीव्ह आला  नंदाताई क्षिरसागर दिव्यांग असल्यामुळे त्यांना घरीच क्वारंटाईन करुन त्यांचेवर उपचार करण्याचा निर्णय वरद विनायक कोवीड केअर सेंटरचे डाँक्टर शैलेश पवार व डाँक्टर राशिनकर डाँक्टर  देविदास चोखर यांनी घेतला त्यांनी क्षिरसागर यांचेवर घरीच उपचार सुरु केले शिवसेनेचे अशोक पवार सचिन कडेकर किशोर राऊत ज्ञानेश्वर कुलथे यांनी  जेवाणाची व्यवस्था केली चौदा दिवसानंतर त्या ठणठणीत बर्या झाल्या.

बेलापुर  (प्रतिनिधी )-शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झालेल्या तरुणांना पढेगाव ग्रामस्थांनी निषेधाच्या घोषणा देत पोलीसांच्या स्वाधीन केले असुन खोटा गुन्हा मागे घेत नाही तो पर्यत जामीन घेणार नाही अशी भूमीका उदय लिप्टे या शिवसैनिकाने घेतली आहे.पढेगाव येथील उदय लिप्टे भूषण राऊत सौरभ बनकर वृषभ काळे पुष्पराज खैरनार या युवकावर खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अंगरक्षकाने  शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला होता खोटा गुन्हा दाखल झाल्यामुळे तरुणाचे आयुष्य उध्वस्त होवु नये म्हणून गावातील नागरीकांनी खासदार सदाशिव लोखंडे यांची भेट घेवुन दिलगीरी व्यक्त केली व गुन्हा मागे घेण्याची विनंती केली पंरतु अँम्बुलन्सची मागणीच केली नाही केवळ गोधंळ घालण्याच्या उद्देशाने ते कार्यकर्ते येथे आले असल्याचे खासदार लोखंडे यांनी ग्रामस्थांना सांगितले त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा गावात जाऊन गावकर्यांची बैठक घेतली या बैठकीत गावातील युवकावर खोटा गुन्हा दाखल केल्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला तसेच गुन्हा दाखल असल्यामुळे पोलीसांना सहकार्य करुन सर्वांना पोलीसांच्या ताब्यात देण्याचे ठरले त्या वेळी उदय लिप्टे म्हणाले की मी दिवंगत बाळासाहेब ठाकरे साहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे मित्राच्या वडीलांना दवाखान्यात जाण्यासाठी  वेळेवर साधन न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून आपण शिवसैनिक या नात्याने खासदार लोखंडे यांच्याकडे अँम्बुलन्सची मागणी करण्यासाठी गेलो होतो त्या वेळी तेथे फक्त रखवालदारच होता त्या ठिकाणी दोन गाड्या झाकुन ठेवलेल्या होत्या मला वाटले त्या गाड्याचा उपयोग होवू शकतो म्हणून त्या वरील कापड काढून फोटो काढले त्याचा राग मनात धरुन लोकप्रतिनिधीनी त्यांच्या अंगरक्षकाला पढेगाव येथे पाठविले तेथेच मेजर उंडे यानी आपल्याला दमदाटी केली व जिवे मारण्याची धमकी दिली त्या नंतर खासदार लोखंडे यांच्या दबावाखाली मी व माझ्या सहकारी मित्रावर खोटा गुन्हा दाखल केला मी लोकप्रतिनिधीचा आदर करतो परंतु काम घेवुन येणार्या कार्यकर्त्यावरच असे खोटे गुन्हे दाखल होत असतील तर सामान्य नागरीकांनी यांच्या दारात जायचेच नाही का असा सवालही लिप्टे यांने केला असुन खोटा गुन्हा मागे घेत नाही तो पर्यत जामीन घेणार नाही अशी प्रतिज्ञाच उदय लिप्टे यांने ग्रामस्थासमोर केली आहे त्यांनतर पोलीसांनी सर्वांना ताब्यात घेतले एकंदरच हा विषय जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला या पूर्वीही अनेक लोकप्रतिनीधींशी नागरीकांचे वाद विवाद झालेले आहेत हमरा तुमरी देखील झालेली आहे परंतु ते विषय तेथेच संपले होते परंतु हा विषय पोलीस ठाण्यापर्यत गेल्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- लिप्टे नावाच्या व्यक्तीने अँम्बुलन्स बाबत माझ्याकडे मागणीच केलेली नाही केवळ राजकीय हेतुने कुणाच्या तरी सांगण्यावरुन त्रास देणे हाच हेतु असल्याचे मत  खासदार सदाशिव लोखंडे यांनी पढेगाव येथील ग्रामस्थासमोर व्यक्त केले  पढेगाव येथील उदय लिप्टे याचेवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पढेगावचे  ग्रामस्थानी खासदार सदाशिव लोखंडे यांची भेट घेतली त्या वेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले की मी या मतदार संघाचा लोकप्रतिनीधी आहे त्यामुळे माझ्याकडे कामे घेवुन येणे हा लोकांचा हक्क आहे जनतेच्या कामासाठीच आपण मला निवडून दिलेले आहे परंतु संबधीत लिप्टे नावाच्या व्यक्तीने माझ्याकडे किंवा माझ्या कार्यालयाकडे अँम्बुलन्स बाबत मागणीच केलेली नाही केवळ राजकीय हेतुने त्रास देणे हाच उद्देश  असुन यांचा बोलविता धनी वेगळाच असण्याची शक्यता आहे ती व्यक्ती एकदा नव्हे तर दोन वेळा या ठिकाणी आली होती दोन्ही वेळेस त्यांनी रखवालदाराशी हुज्जत घातली तसेच ज्या गाड्यांची मागणी केली त्या गाड्या अँम्बुलन्स नाहीत हे सांगुन  देखील त्याने गाडीवरील पान कापड फाडून गोंधळ घातला हे कृत्य संबंधीतांनी कुणाच्या तरी सांगण्यावरुन केलेले आहे खरे कारण हे जनतेसमोर आले पाहीजे ग्रामस्थांनी देखील घडलेल्या घटनेची खरी माहीती घेवुनच बातम्या दिल्या पाहीजे असेही खासदार लोखंडे म्हणाले या वेळी पढेगावचे सरपंच किशोर बनकर रणजीत बनकर अँड .प्रविण लिप्टे दत्तात्रय लिप्टे गौरव कांदळकर विकास झगडे सचिन भूजबळ राजेंद्र बनकर चांगदेव येसेकर विठ्ठल बनकर सतीश काळे शशिकांत शिंदे संदीप मते भगवान तेलोरे उपस्थित  होते.

श्रीरामपुरात दोन हातात दोन तलवारी घेवुन दहशत माजवणाऱ्या शाहरुख शेखला पोलिसांनी पकडले...

 श्रीरामपूर- या घटनेची हकीकत अशी की,श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री .संजय सानप यांना गोपनीय माहिती मिळाली की,साई नगर ,वॉर्ड नंबर 2 ,श्रीरामपूर येथे कच्चारोडने एक इसम दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन फिरत आहे.त्यावरून पोलीस साई नगर, वार्ड नंबर 2 ,श्रीरामपूर येथे गेले असता समोरून एक इसम दोन हातात दोन तलवारी घेऊन येताना दिसला म्हणून पोलिस त्याच्या दिशेने गेले आसता तो पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला. त्यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले.त्याला पंचांसमक्ष त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव शाहरुख अन्वर शेख ,वय-21 राहणार -शनी चौक ,वॉर्ड नंबर 2 ,श्रीरामपूर असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पंचांच्या समोर त्यांची अंगझडती घेतली त्यामध्ये त्याच्या ताब्यात असलेल्या दोन लोखंडी तलवारी किंमत एकूण ११००₹ असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलीस कॉन्स्टेबल मोहन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहरुख विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 04/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

              ही कामगिरी श्री.पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीमती डॉक्टर दिपाली काळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर , श्री.संदीप मिटके ,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग ,श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.संजय सानप, पोलीस हेडकॉन्स्टेबल जोसेफ साळवी ,पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे ,पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र पवार ,पोलीस कॉन्स्टेबल पंकज गोसावी ,पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे यांनी केली.

दिनांक 13 श्रीरामपूर प्रतिनिधी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरामध्ये आज पोलिसांनी शहरातील तसेच मुख्य मार्गावर पोलीस संचलन केले.

उद्या सर्वत्र रमजान ईद साजरी केली जाणार आहे, त्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यामध्ये बंदोबस्त ठेवण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहे. प्रत्येक ठिकाणी चोख असा पोलिस बंदोबस्त सुद्धा करण्यात आला असून महत्त्वाच्या ठिकाणी राज्य राखीव दलाच्या तुकड्या सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे.आज श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक संजय सावंत यांच्या नेतृत्व खाली   श्रीरामपूर शहरामध्ये    पोलिसांच्या पथकाने व त्यांच्या समवेत राज्य राखीव दलाच्या पोलिसांनी श्रीरामपूर शहरातून संचलन केले श्रीरामपूर शहरातील मुख्य अशा साई बाबा चौक मौलाना आझाद चौक वाड नंबर 2 मिल्लात नगर या परिसरातून पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत शहरातील मुख्य मार्गावर सुद्धा हे संचलन करण्यात आले.


मी जितेश लोकचंदानी गेली १५ (पुर्वी माहिती अधिकार अध्यादेश २००२ आणि नंतर माहिती अधिकार कायदा २००५ ) ते १८ वर्षांपासून माहिती अधिकार व पत्रकारिता क्षेत्रात कामे करत आहे, मी अनेक प्रकरण माहिती अधिकारात माहिती काढून त्याचा पाठपुरावा करून यातील एकाचे भ्रष्टाचार प्रकरण आज रोजी हायकोर्टात प्रलंबित तथा न्याय प्रविष्ट आहे, मी दैनिक साईदर्शनमध्ये निर्भिड लेखणीद्वारे अनेक प्रकरण गाजवले आहेत, त्यातील शिर्डीतील कुप्रसिद्ध गुंड तथा सराईत गुन्हेगार पाप्या शेख पासून ते शिर्डीच्या गुन्हेगारी जगतापर्यंत आपल्या प्राणांची पर्वा न करता सामाजातील निच प्रवृतीचा नायनाट करण्याकामी अनेक अव्हाने पत्करली आहेत, मात्र आजवर माझ्यावर अशा प्रकारे गुन्हा दाखल झाल नाही आणि होणारही नव्हता,कारण माझी पत्रकारीता ही स्वफायदाची नव्हेतर समाजहिताची आहे हे सर्वश्रृत आहे,सर्वांना चांगले ठाऊक आहे, त्यामुळे कोणी तक्रारच काय साधा संशय देखील घेऊ शकत नाही ही प्रामाणिकता मी जपलेली आहे आणि जपतच राहणार आहे, मात्र सदरील प्रकरणी या तक्रारी् मागील खरे आणि सत्य कारण असे वाटते की, श्रीसाईबाबांच्या पुन्य

पावनभूमी असलेल्या शिर्डी शहरात राजरोसपणे सुरु असलेल्या आडमाप अवैद्य व्यवसायांविरोधात मी अनेकदा तक्रार अर्ज दिले तथा उपोषणे केली आहेत या वर्षीच २६ जानेवारीला मी शिर्डीतील अवैध व्यवसाय बंद व्हावेत याकरीता शिर्डी पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणास छेडले होते, त्यावेळी शिर्डीचे पोलीस उप विभागीय अधिकारी श्री. संजय सातव यांनी माझ्या मागणीची दखल घेऊन शिर्डीत चालत असलेले अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी एक विशेष पथक नेमले होते, त्या पथकाने सुरुवातीला अनेक हातभट्टी दारु आणि मटकावाल्यांवर कारवाया केल्या, मात्र नंतर ही मोहीम थंडावली, त्याची मी पोलीसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना दिल्याने शिर्डीचे पी आय यांची बहुतेक याच प्रकरणी बदली झाली असावी,आणि याचाच राग मनात धरुन त्यांनी रुई येथील सरपंचाच्या आरोपांची कुठल्याही प्रकारची शाहानिशा न करता अक्षरश: खोटी तक्रार दाखल करुन घेतली, कारण की या सरपंचाला दैनिक साईदर्शन विशेषांकात प्रकाशित जाहिरातीचे पेमेंट द्यावयाचे नव्हते, आणि शिर्डीचे पी.आय. प्रवीण लोखंडे यांना माहीत झाले असावे की शिर्डीतील अवैध व्यावसायांना पाठिशी घातल्या प्रकरणी आपली बदली होणार आहे, म्हणून  शिर्डीतील अवैध व्यवसाय बंद केल्याचा राग मनात धरुन माझ्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल करुन घेतली असावी ?, अशी शंका मनात निर्माण झालेली आहे, या प्रकरणाची देखील सखोल चौकशी होण्याकामी मी वरिष्ठांकडे तक्रार करणार आहे, यात जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यासाठी मी शेवट पर्यंत लढा देणार असून कोणी कितीही मोठा असो कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, म्हणून कोणी स्वत:ला मोठा समजू नये, असे कितीही खोटे गुन्हे दाखल झाले तरी मी माझे कार्य सुरूच ठेवणार आहे,

मात्र शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करतेवेळी कुठले पुरावे सदरील सरपंचाकडून घेतले ?, कुठले कॉल रेकॉर्ड्स, घेतले ?, सरपंचाकडे असे कोणतेच ठोस पुरावे नसताना, पोलिसांनी हा जो गुन्हा दाखल केला आहे त्याचे खरे कारण मी पहीलेच वर नमूद केले आहे, आणि माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्याचा तपास जे अवैध व्यवसाय बंद करण्याकामी पोलिस पथक नेमले होते, त्याच पथकप्रमुखाकडे सदरील प्रकरणी तपास दिला गेला असल्याने स्पष्ट होते की हे सर्व जाणून बुजून हेतुपुरस्सर मला बदनाम करण्याच्या मोठे षडयंत्र रचले गेले आहे, मात्र मी देखील दूध का दूध आणि पाणी का पाणी केल्याशिवाय स्तब्ध बसणार नाही,हे ही तीतकचं सत्य आहे...................................लोकचंदाणीवर खोटी फिर्याद दाखल केल्याप्रकरणी रुईचे सरपंच संदीप वाबळे विरोधात आब्रू नुकसान भरपाई दावा दाखल !                                                  शिर्डी येथून गेल्या दहा - आकरा वर्षांपासून दैनिक साईदर्शन हे वृत्तपत्र सातत्याने प्रकाशित होत आहे, या वृत्तपत्राने आजवर अनेक गैरकारभार/भ्रष्टाचार  उघडकीस आणले आहेत,अनेक गुन्ह्यातील आरोपींना गजाआड करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, आणि शिर्डीतील गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करणेकामी या वृत्तपत्राने आजवर मोठी भुमिका पार पाडली आहे,तथा यापुढे देखील हा लढा सुरूच राहणार आहे, 

दैनिक साईदर्शन या दैनिकाचे २६ जानेवारी २०२१ रोजी वर्धापनदिन होते, त्या वर्धापनदिनानिमित्त शिर्डी व परिसरातील अनेक मान्यवरांनी दैनिकास शुभेच्छा रुपी जाहिराती दिल्या, त्यात रुई ग्रामपंचायतीने देखील शुभेच्छा जाहिरात दिली,  त्याच शुभेच्छा जाहिरातीचे रुपये ६०००/- सहा हजाराचे बिल रुई ग्रामपंचायतीला आमचे प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल यांनी रुई येथे जाऊन दिले होते, आणि जाहिरात पेमेंटबाबत सरपंच  संदीप वाबळे याच्याकडे मागणी केली असता,वाबळे म्हणाला की, मी स्वतः शिर्डीला आलो की आपले जाहिरातीचे पेमेंट देतो, त्यास अनेक दिवस उलटून गेले तरी वाबळे याने जाहिरातीचे पेमेंट दिले नाही, त्यावर मी  वाबळे याला फोन करून जाहिरातीचे पेमेंट मागितले, त्यावर वाबळे हा  जाहिरात पेमेंट देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास येऊ लागले म्हणून मी रुई येथे ग्रामपंचायत कार्यालयात मध्ये गेलो असता तेथे सरपंच वाबळे हा बसलेले होता त्याने आम्हास चहा,पाणी करत पाहुणचारही केला, व आपले जाहिरातीचे पेमेंट एक दोन दिवसांत शिर्डीत पोहोच करतो असे म्हणाला, त्यानंतरही श्री. वाबळे यांनी अद्यापही जाहिरातीचे पेमेंट दिले नाही, मात्र जाहिरातीचे पेमेंट मागितल्याचा राग आल्याने तथा रुई ग्रामपंचायतीस माहिती मागणीचा अर्ज दिल्याने याचा त्याला राग धरुन दिनांक 12/05/2021 रोजी शिर्डी पोलीस स्टेशनला माझ्याविरोधात तब्बल पंधरा दिवसानंतर खोटी फिर्याद दाखल केली, त्यात त्याने म्हटले आहे की, जितेश लोकचंदानी म्हणजे मी त्यांच्याकडून खंडणी मागितली आहे, मात्र सदरील प्रकरणी रुई ग्रामपंचायतीने दिलेल्या जाहिरातीचे कात्रण आणि त्या जाहिरातीचे रितसर बिल दिले असताना माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे,वाबळे याला जाहिरातीचे पेमेंट देण्याचे जीवावर आल्याने शुध्डबुध्दीने हा गुन्हा दाखल केला असल्याने मी त्याच दिवशी शिर्डी पोलीस स्टेशनलावाबळे यांच्या विरोधात भादंवि कलम ४९९,५००,१८२,२११ प्रमाणे अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे, माझे काम प्रामाणिक असून गेल्या दहा,अकरा वर्षांत कोणीही असा आरोप केला नाही की कोणी तक्रार दिली नाही, आणि माझे लिखाण गुन्हेगारी व जेथे काही गैरकारभार झाला व चालु आहे तर याविरुद्ध मी निर्पेक्षतेने लिखाण करीत असतो तथा करीत राहाणारच असे कितीही खोटे गुन्हे दाखल करुन पत्रकारीतेचा खरा आवाज दाबणे कोणासही शक्य नाही, त्यामुळे काहीही झाले तरी माझे या गैरकारभाऱ्या आणि  भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध लिखाण हे सुरु राहणारच आहे,.........................माहिती अधिकारात माहिती मागीतल्याचा राग आल्याने, सरपंचाकरवी खंडणीची खोटी फिर्याद 


जितेश लोकचंदानी हे नेहमी

आमचे गांवाच्या ग्रामपंचयात कार्यालयात येवून विनाकारण कोणतीही उलटसुलट माहीती विचारत असतात.त्यांचे दैनिक साईदर्शन हे सांयदैनिक म्हणुन

प्रसिद्ध केले जाते तसेच saidarshan.com.in या संकेत स्थळावर देखील प्रसिद्ध केले जाते, दिनांक  09/04/2021 रोजी 12/00 वाजेच्या सुमारास रुई ग्रामपंचायतीमध्ये आले असता ग्रामपंचायतीमध्ये मी सरपंच,,,,, तसेच उपसरपंच सिताराम चंद्रसेन कडू, सदस्य ज्ञाननेश्वर वाबळे, ग्रामविकास अधिकारी सांगळे, गावकरी बाळकृष्ण सुराळे,अनिल कोळपे असे उपस्थित होतो . त्यावेळी तेथे जितेश मनोहरलाल लोकचंदानी हे आले व माझे सोबत चर्चा करु लागले, तेव्हा चर्चा करताना ते म्हणाले की माझे दैनिक साईदर्शन या वृत्तपत्राचा वर्धापनदिन आहे, आणि मी तुमच्या ग्रामपंचयात कार्यालयाच्या बातम्या वेळोवेळी प्रसिद्ध केल्या आहे. त्यासाठी

तुम्ही मला तुमच्या ग्रामपंचयात कार्यालयातर्फे 10,000/- (रुपये दहा हजार) द्या असे म्हणाले, तेव्हा मी त्यांना सांगितले की तुमचे आणि आमचे ग्रामपंचयात

कार्यालयाचा काही एक संबंध नाही, आम्ही तुम्हाला बातम्या देण्याचे कधी सांगितले नाही, त्यामुळे आमचे ग्रामपंचयात कार्यालयाकडून तुम्हाला पैसे

मिळणार नाही असे सांगितले, तेव्हा तो मला जोराच्या आवाजात म्हणाला सरपंच हे तुम्हाला खुप महाग पडेल, मी तुमचे ग्रामपंचयात कार्यालयाचे

मागे लागेल, माहीती अधिकारात माहीती विचारुन त्रास देईल, तुमचा सर्व भ्रष्टाचार बाहेर काढील अशी धमकी देवुन तो निघुन गेला, त्यानंतर जितेश

मनोहरलाल लोकचंदानी यांनी त्यांचे मो नं 8329480310 वरुन माझे मो. नं 8888000800 वर दिनांक 08/04/2021 रोजी पासुन दिनांक 25/04/2021 रोजी

पावेतो, वेळोवेळी मला नेहमी फोन करुन त्यांचे दैनिक साईदर्शन या वृत्तपत्राचे वर्धापन दिनानिमीत्त 10,000/- दहा हजार रुपयाची खंडणीसाठी त्रास दिला आहे, त्यानंतर दिनांक 27/04/2021 रोजी मी सरपंच,,,, तसेच उपसरपंच , सदस्य, गावकरी व ग्रामविकास अधिकारी सांगळे , लिपीक स्वप्निल दुर्शीग असे रुई

ग्रामपंचयात कार्यालयात असताना त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन सर्वासमक्ष मला 10,000/- दहा हजार रुपयांची खंडणी मागितली तेव्हा मी त्यांना पैसे देण्यास

नकार दिला, त्यांना त्याचा राग आल्याने तो मला म्हणाला तुम्ही मला पैसे द्या नाहीतर मी तुमच्या ग्रामपंचयात कार्यालयाच्या खोट्या बातम्या छापुन बदनामी करील अशी धमकी देवुन माहीती अधिकारात अर्ज देवुन रागाने तेथुन निघुन गेला, त्यानंतर त्याने दि 06/05/2021 रोजी त्यांच्या

दैनिक साईदर्शन या वृत्तपत्रामध्ये भरपेट गैरकारभार करुन पाउला शासनाच्या तिजोरीला खड्डा, रुई ग्रामपंचयात झाला की काय गैरकारभा-यांचा अड्डा ?

अशी मोठ्या अक्षरात बातमी देवुन रुई ग्रामपंचयात कार्यालयाअंतर्गत मागील काही वर्षापासुन करण्यात आलेल्या रस्त्यांची कामे निकृष्ठ दर्जाचे झाले असुन या कामांचा सर्व निधी ठेकेदारांशी संगनमत करुन ग्रामपंचयात कार्यालयाचे कारभारी यांनी त्यांचे खिशात भरला जात असले बाबत बातमी करुन आमचे कई ग्रामपंचयात कार्यालयाची बदनामी केली आहे.असे आपल्या फिर्यादीत म्हटले आहे,

माहिती अधिकारात माहिती मागीतल्याचा राग येवून तथा माहिती दिल्याने आपल्या ग्रामपंचाय कार्यालयातील गैरकारभार उघड होऊन भ्रष्टाचार चव्हाट्यावर येईल ?, म्हणून संबंधित सरपंच यांच्याकरवी लोकचंदानी यांनी खंडणी मागीतल्याचा खोटा गुन्हा दाखल करणेकामी कुठलीही शाहनिशा न करता शिर्डी पोलिसांत खोटी फिर्याद दाखल केली आहे.


ब्रेक दि चेन’ साठी लागू केलेले निर्बंध एक जून 2021 पर्यंत अमलात राहणार.मुंबई, दि. 13 : राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. 1 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.  याव्यतिरिक्त अजून काही निर्बंध लावण्यात आले आहेत. ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत यासंदर्भातील शासन आदेश आज निर्गमीत करण्यात आला आहे.29 एप्रिल रोजी कोरोना विषाणूच्या प्रसारावर अंकुश लावण्यासाठी हे निर्बंध दि.15 मे पर्यंत लागू करण्यात आले होते, तसेच नवीन मार्गदर्शक तत्वेही जाहीर करण्यात आले होते. आता हे निर्बंध 1 जून रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत कायम असतील. साथरोग अधिनियम-1897,  तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतुदी अनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या पत्रकात म्हटले आहे की, ‘ब्रेक दि चेन’ संबंधी 13 एप्रिल 2021, 21 एप्रिल 2021 व तद्‌नंतर 29 एप्रिल 2021 रोजी घोषित केलेले सर्व निर्बंध 1 जून 2021 पर्यंत लागू राहतील. त्या व्यतिरिक्त पुढील निर्बंधही लागू करण्यात आले आहे.

* कोणत्याही वाहनातून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त 48 तास अगोदर केलेल्या चाचणीचा असावा.

*   यापूर्वी 18 एप्रिल आणि 1 मे 2021 रोजी जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या संवेदशील भागातील व्यक्तींसाठी असलेले नियम आता देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींसाठी लागू राहतील.

* मालवाहतूक करणाऱ्यांकरिता एका वाहनांमध्ये फक्त दोन व्यक्ती (चालक आणि क्लिनर/हेल्पर) यांना प्रवास करण्याची मुभा असेल. जर हे मालवाहक महाराष्ट्रच्या बाहेरून येत असतील तर त्यातील दोघांना RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल द्यावा लागेल आणि हा अहवाल राज्यात दाखल होण्याच्या जास्तीत जास्त 48 तासापूर्वीचा असावा. हा अहवाल सात दिवसांकरिता वैध राहील.
* स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डीएमए) हे ग्रामीण बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामावर सनियंत्रण ठेवतील आणि कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवतील. जर ‘डीएमए’ला असे आढळले की, अशा काही ठिकाणी व्यवस्था करणे व शिस्तीचे पालन होत नाहीये, तर त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण बाजारपेठा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज  बंद करण्याच्या निर्णय किंवा अधिक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.
*  दुध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू ठेवता येईल, परंतु लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक वस्तू विक्रीसाठीची परवानगी असलेल्या दुकानांसाठी किरकोळ दुध विक्रीला मुभा असेल किंवा ते ‘होम डिलिव्हरी’ करू शकतील.
*  कोविड-19 व्यवस्थापनाच्या कामासाठी औषधी आणि इतर साहित्यांची मालवाहतूक करण्याच्या कामात सहभागी असलेले विमानतळ आणि बंदर सेवेतील लोकांना लोकल, मोनो आणि मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याची मुभा असेल.
*  स्थानिक डीएमए आपल्या अखत्यारीतील विशेष भागांमध्ये अधिक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. परंतु याची कल्पना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (‘एसडीएमए’) द्यावी लागेल आणि हे निर्बंध लागू करण्याच्या 48  तास अगोदर त्याची जाहीर घोषणा करावी लागेल.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )- खा सदाशिव लोखंडे याच्याकडे अम्बुलन्स मागणे गैर नाही पण ती मागणी करताना चुकीची पद्धत वापरल्याने गुन्हा दाखल करावा लागला असल्याचे मत शिवसेनेचे मा .उपजिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील देवकर यांनी आमच्या प्रतिनीधीशी बोलताना व्यक्त केले 

काल सायंकाळी काही तरूणांनी  खासदार लोखंडे  साहेब बंगल्यात असताना अनाधिकृत पणे गेटला लाथा मारून आत प्रवेश केला तसेच वॉचमनला दमदाटी केली त्यांच्या अंगरक्षकाला शिवीगाळ करून अंगावर धाऊन गेले हे सर्व कशासाठी केले कुणाच्या सांगण्यावरून केले याची चौकशी झाली पाहिजे

त्यानी खा सदाशिव लोखंडे यांच्या कडे रितसर अम्बुलन्स ची मागणी करणे अपेक्षित होते परंतु दादागिरी करून अम्बुलन्सची मागणी गावकऱ्यांना देखील उचित  वाटते का ?  आणि अशी  मागणी करणाऱ्यानी  आधी गावासाठी काय केले ते सांगा असा सवाल देवकर केला आहे.

 खा सदाशिव लोखंडे  यांनी जीवाची पर्वा न करत मतदारसंघात कोव्हीड साठी फिरत आहेत पढेगाव येथील नुकत्याच चालू झालेल्या कोविड सेंटर ला खासदार लोखंडे यांनी बेड पीपीई किट आणि औषधांचा  साठा देऊन पढेगाव वाशीयांना मदत केलेली आहे, त्यावेळी हे बोंबा मारणारे कोठे होते  संबधीताने  कुठल्याही प्रकारे अम्ब्युलन्स ची मागणी केलेली नव्हती यामागे राजकीय हात गुंतलेले आहेत या पूर्वी  कधी अम्बुलन्स साठी या तरूणानी निवेदन दिले होते का ? अचानक प्रसिद्धीसाठी त्याच्या बंगल्यात अनाधिकृत पणे घुसून दादागिरी करून अम्बुलन्स मागणे यामध्ये केवळ राजकारण आहे त्यामुळे अशा प्रवृत्तीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजेंद्र देवकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक याच्याकडे केली असुन

 खा सदाशिव लोखंडे याचे ऑफिस व घर 24 तास मतदारसंघातील जनतेसाठी खूले असल्याचेही देवकर यांनी म्हटले आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-सर्व मंत्री खासदार आमदार हे कोरोना महामारीत लोकांना आधार देत असतानाच शिर्डी मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अँम्बुलन्स मागण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्यावर खोटा गुन्हा दाखल करुन काय साध्य केले असा सवाल पढेगाव भेर्डापुर उंबरगाव बेलापुर व परिसरातील नागरीकांनी विचारला आहे                                      पढेगाव येथील सामाजिक कार्यक्रम उदय लिप्टे हे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे रुग्णाना ने आण करण्याकरीता अँम्बुलन्सची मागणी करण्यासाठी गेले गेले त्या वेळी तेथे दोन गाड्या उभ्या असल्याचे लीप्टे यांच्या लक्षात आले त्यांनी त्या गाड्याजवळ उभे राहुन फोटो काढले त्याचा राग आल्यामुळे लिप्टे यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन आपल्या कामा बाबतच्या अडचणी आमदार खासदार यांच्याकडे नाही मांडायच्या तर कुणाकडे असा संतप्त सवाल प्रवरा परिसरातील नागरीकांनी केला असुन खासदारांच्या दबावाला बळी पडून पोलीसांनी खोटा गुन्हा दाखल करुन काही नागरीकांना विनाकारण पोलीस स्टेशनला बसवुन ठेवण्यात आले होते रात्री बेलापुर पोलीस स्टेशनला मोठा जमाव जमला होता आम्हा सर्वांना अटक करा अशी मागणी पढेगाव ग्रामस्थांनी घेताच पोलीसांनी इतर कार्यकर्त्यांना सोडून दिले या पुर्वीही मी काही सरपंच नाही मी खासदार आहे आशी मुक्ताफळे खासदार लोखंडे यांनी उधळली होती जिल्ह्यात आमदार लंके खासदार सुजय विखे सारखी नेते मंडळी दिवस रांत्र समाजाची सेवा करत असताना दुसरीकडे केवळ अँम्बुलन्सची मागणी करणार्या सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटा गुन्हा दाखल केला असुन या पुढील काळात जनतेने यांच्याकडे कामे घेवुन जायचे की नाही असा सवालही  प्रवरा परिसरातील नागरीकांनी केला आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-खासदार सदाशिव लोखंडे यांच्या बंगल्यात अनाधिकृतपणे प्रवेश करुन वाँचमन व खासदार लोखंडे यांच्या अंगरक्षकास शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरुन उदय लिप्टेसह चार अनोळखी व्यक्तीवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे                                        या बाबतची फिर्याद खासदार सदाशिव लोखंडे यांचे अंगरक्षक पोलीस काँन्स्टेबल विनोद वसंतराव उंडे यांनी बेलापुर पोलीस स्टेशनला दिली असुन उंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत पुढे म्हटले आहे की खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उंबरगाव येथील साई खेमानंद फौंडेशन ट्रस्ट या ठिकाणी उदय शिवाजी लिप्टे व इतर चार इसम दोन मोटार सायकलवर  आले त्यांनी लाथा मारुन बंगल्याचे गेट उघडले या बाबत तेथील वाँचमन निलेश शिंदे यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यास शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली नंतर अनाधिकाराने आत प्रवेश करुन आतमध्ये असलेल्या गाड्याचे पान कापड फाडुन गाड्याचे व्ही डी ओ शुटींग केले नंतर खासदार लोखंडे याच्या निवासस्थानाकडे प्रवेश करत असताना खासदार लोखंडे यांचे अंगरक्षक पोलीस काँन्स्टेबल उंडे यांनी  त्यांना मज्जाव केला असता त्यांनाही लिप्टे व त्यांच्या साथीदारांनी धक्काबुक्की  केली पोलीस काँन्स्टेबल विनोद उंडे यांच्या तक्रारी वरुन पढेगाव येथील उदय शिवाजी लिप्टे व चार अनोळखी व्यक्ती विरुध्द भा .द .वि .कलम १४३,१४७,४५२,३५३,३३२, ५०४ ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक  संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा धायवट हे करत आहे

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील कोवीड केअर सेंटर मध्ये १०स्कोअर असलेला रुग्ण ठणठणीत बरा होवुन घरी गेला असुन त्या रुग्णाने डाँक्टर  व कोवीड सेंटरच्या स्वंयसेवकाचे आभार मानले आहे                                               बेलापुर येथील संस्कृती मंगल कार्यालय येथे कै मुरलीधर खटोड पतसंस्थेच्या व साई खेमानंद ट्रस्ट यांच्या विशेष सहकार्यातुन वरद विनायक कोवीड सेंटर सुरु करण्यात आले होते ५० बेड असलेल्या या कोवीड केअर सेंटरमध्ये असलम शेख हे ५ मे रोजी दाखल झाले होते हा रुग्ण दाखल झाला त्या वेळेस त्याचा एच आर सी टी स्कोअर १० होता तसेच त्याचा कोरोना रिपोर्टही पाँजिटीव्ह आला होता अशा रुग्णास डाँक्टर  रामेश्वर राशिनकर व डाँक्टर  शैलेश पवार यांनी कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल करुन त्याचेवर उपचार सुरु केले केवळ औषधा व गोळ्यावर असा रुग्ण बरा करणे हे दोन्ही डाँक्टरापुढे एक अव्हानच होते परंतु  डाँक्टर पवार व डाँक्टर  राशिनकर यांनी ते अव्हान लिलया पेलले रुग्णाचा आत्मविश्वास व डाँक्टरांचे प्रयत्न यामुळे हा रुग्ण ठणठणीत बरा होवुन घरी गेला आहे या कोवीड केअर सेंटरमधील डाँक्टर याच्या आयुर्वेदीक व अँलोपँथीक औषधाने तसेच स्वयंसेवकांच्या उत्सहामुळे मला पुढील उपचारासाठी कुठेही जाण्याची गरजच भासली नाही   त्यांच्या अनमोल सहाकार्यामुळे  मी  फार मोठ्या मानसिक व आर्थिक संकटातुन वाचलो हे वरद विनायक कोवीड सेंटर माझ्यासाठी वरदानच ठरले असल्याची प्रतिक्रिया असलम शेख यांनी दिली आहे या कोवीड केअर सेंटरमध्ये आत्तापर्यत १२५ ते १५० रुग्ण दाखल होवुन बरेच रुग्ण बरे होवुन सुखरुप घरी गेले असल्याचेही डाँक्टर राशिनकर व डाँक्टर  पवार यांनी सांगितले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget