गुन्हा दाखल करण्यामागचे खरे कारण म्हणजे, शिर्डीतील अवैध व्यवसाय व जाहिरातीचे बिल देण्यास जीवावर आल्यानेच.

मी जितेश लोकचंदानी गेली १५ (पुर्वी माहिती अधिकार अध्यादेश २००२ आणि नंतर माहिती अधिकार कायदा २००५ ) ते १८ वर्षांपासून माहिती अधिकार व पत्रकारिता क्षेत्रात कामे करत आहे, मी अनेक प्रकरण माहिती अधिकारात माहिती काढून त्याचा पाठपुरावा करून यातील एकाचे भ्रष्टाचार प्रकरण आज रोजी हायकोर्टात प्रलंबित तथा न्याय प्रविष्ट आहे, मी दैनिक साईदर्शनमध्ये निर्भिड लेखणीद्वारे अनेक प्रकरण गाजवले आहेत, त्यातील शिर्डीतील कुप्रसिद्ध गुंड तथा सराईत गुन्हेगार पाप्या शेख पासून ते शिर्डीच्या गुन्हेगारी जगतापर्यंत आपल्या प्राणांची पर्वा न करता सामाजातील निच प्रवृतीचा नायनाट करण्याकामी अनेक अव्हाने पत्करली आहेत, मात्र आजवर माझ्यावर अशा प्रकारे गुन्हा दाखल झाल नाही आणि होणारही नव्हता,कारण माझी पत्रकारीता ही स्वफायदाची नव्हेतर समाजहिताची आहे हे सर्वश्रृत आहे,सर्वांना चांगले ठाऊक आहे, त्यामुळे कोणी तक्रारच काय साधा संशय देखील घेऊ शकत नाही ही प्रामाणिकता मी जपलेली आहे आणि जपतच राहणार आहे, मात्र सदरील प्रकरणी या तक्रारी् मागील खरे आणि सत्य कारण असे वाटते की, श्रीसाईबाबांच्या पुन्य

पावनभूमी असलेल्या शिर्डी शहरात राजरोसपणे सुरु असलेल्या आडमाप अवैद्य व्यवसायांविरोधात मी अनेकदा तक्रार अर्ज दिले तथा उपोषणे केली आहेत या वर्षीच २६ जानेवारीला मी शिर्डीतील अवैध व्यवसाय बंद व्हावेत याकरीता शिर्डी पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणास छेडले होते, त्यावेळी शिर्डीचे पोलीस उप विभागीय अधिकारी श्री. संजय सातव यांनी माझ्या मागणीची दखल घेऊन शिर्डीत चालत असलेले अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी एक विशेष पथक नेमले होते, त्या पथकाने सुरुवातीला अनेक हातभट्टी दारु आणि मटकावाल्यांवर कारवाया केल्या, मात्र नंतर ही मोहीम थंडावली, त्याची मी पोलीसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना दिल्याने शिर्डीचे पी आय यांची बहुतेक याच प्रकरणी बदली झाली असावी,आणि याचाच राग मनात धरुन त्यांनी रुई येथील सरपंचाच्या आरोपांची कुठल्याही प्रकारची शाहानिशा न करता अक्षरश: खोटी तक्रार दाखल करुन घेतली, कारण की या सरपंचाला दैनिक साईदर्शन विशेषांकात प्रकाशित जाहिरातीचे पेमेंट द्यावयाचे नव्हते, आणि शिर्डीचे पी.आय. प्रवीण लोखंडे यांना माहीत झाले असावे की शिर्डीतील अवैध व्यावसायांना पाठिशी घातल्या प्रकरणी आपली बदली होणार आहे, म्हणून  शिर्डीतील अवैध व्यवसाय बंद केल्याचा राग मनात धरुन माझ्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल करुन घेतली असावी ?, अशी शंका मनात निर्माण झालेली आहे, या प्रकरणाची देखील सखोल चौकशी होण्याकामी मी वरिष्ठांकडे तक्रार करणार आहे, यात जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यासाठी मी शेवट पर्यंत लढा देणार असून कोणी कितीही मोठा असो कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, म्हणून कोणी स्वत:ला मोठा समजू नये, असे कितीही खोटे गुन्हे दाखल झाले तरी मी माझे कार्य सुरूच ठेवणार आहे,

मात्र शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करतेवेळी कुठले पुरावे सदरील सरपंचाकडून घेतले ?, कुठले कॉल रेकॉर्ड्स, घेतले ?, सरपंचाकडे असे कोणतेच ठोस पुरावे नसताना, पोलिसांनी हा जो गुन्हा दाखल केला आहे त्याचे खरे कारण मी पहीलेच वर नमूद केले आहे, आणि माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्याचा तपास जे अवैध व्यवसाय बंद करण्याकामी पोलिस पथक नेमले होते, त्याच पथकप्रमुखाकडे सदरील प्रकरणी तपास दिला गेला असल्याने स्पष्ट होते की हे सर्व जाणून बुजून हेतुपुरस्सर मला बदनाम करण्याच्या मोठे षडयंत्र रचले गेले आहे, मात्र मी देखील दूध का दूध आणि पाणी का पाणी केल्याशिवाय स्तब्ध बसणार नाही,हे ही तीतकचं सत्य आहे...................................लोकचंदाणीवर खोटी फिर्याद दाखल केल्याप्रकरणी रुईचे सरपंच संदीप वाबळे विरोधात आब्रू नुकसान भरपाई दावा दाखल !                                                  शिर्डी येथून गेल्या दहा - आकरा वर्षांपासून दैनिक साईदर्शन हे वृत्तपत्र सातत्याने प्रकाशित होत आहे, या वृत्तपत्राने आजवर अनेक गैरकारभार/भ्रष्टाचार  उघडकीस आणले आहेत,अनेक गुन्ह्यातील आरोपींना गजाआड करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, आणि शिर्डीतील गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करणेकामी या वृत्तपत्राने आजवर मोठी भुमिका पार पाडली आहे,तथा यापुढे देखील हा लढा सुरूच राहणार आहे, 

दैनिक साईदर्शन या दैनिकाचे २६ जानेवारी २०२१ रोजी वर्धापनदिन होते, त्या वर्धापनदिनानिमित्त शिर्डी व परिसरातील अनेक मान्यवरांनी दैनिकास शुभेच्छा रुपी जाहिराती दिल्या, त्यात रुई ग्रामपंचायतीने देखील शुभेच्छा जाहिरात दिली,  त्याच शुभेच्छा जाहिरातीचे रुपये ६०००/- सहा हजाराचे बिल रुई ग्रामपंचायतीला आमचे प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल यांनी रुई येथे जाऊन दिले होते, आणि जाहिरात पेमेंटबाबत सरपंच  संदीप वाबळे याच्याकडे मागणी केली असता,वाबळे म्हणाला की, मी स्वतः शिर्डीला आलो की आपले जाहिरातीचे पेमेंट देतो, त्यास अनेक दिवस उलटून गेले तरी वाबळे याने जाहिरातीचे पेमेंट दिले नाही, त्यावर मी  वाबळे याला फोन करून जाहिरातीचे पेमेंट मागितले, त्यावर वाबळे हा  जाहिरात पेमेंट देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास येऊ लागले म्हणून मी रुई येथे ग्रामपंचायत कार्यालयात मध्ये गेलो असता तेथे सरपंच वाबळे हा बसलेले होता त्याने आम्हास चहा,पाणी करत पाहुणचारही केला, व आपले जाहिरातीचे पेमेंट एक दोन दिवसांत शिर्डीत पोहोच करतो असे म्हणाला, त्यानंतरही श्री. वाबळे यांनी अद्यापही जाहिरातीचे पेमेंट दिले नाही, मात्र जाहिरातीचे पेमेंट मागितल्याचा राग आल्याने तथा रुई ग्रामपंचायतीस माहिती मागणीचा अर्ज दिल्याने याचा त्याला राग धरुन दिनांक 12/05/2021 रोजी शिर्डी पोलीस स्टेशनला माझ्याविरोधात तब्बल पंधरा दिवसानंतर खोटी फिर्याद दाखल केली, त्यात त्याने म्हटले आहे की, जितेश लोकचंदानी म्हणजे मी त्यांच्याकडून खंडणी मागितली आहे, मात्र सदरील प्रकरणी रुई ग्रामपंचायतीने दिलेल्या जाहिरातीचे कात्रण आणि त्या जाहिरातीचे रितसर बिल दिले असताना माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे,वाबळे याला जाहिरातीचे पेमेंट देण्याचे जीवावर आल्याने शुध्डबुध्दीने हा गुन्हा दाखल केला असल्याने मी त्याच दिवशी शिर्डी पोलीस स्टेशनलावाबळे यांच्या विरोधात भादंवि कलम ४९९,५००,१८२,२११ प्रमाणे अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे, माझे काम प्रामाणिक असून गेल्या दहा,अकरा वर्षांत कोणीही असा आरोप केला नाही की कोणी तक्रार दिली नाही, आणि माझे लिखाण गुन्हेगारी व जेथे काही गैरकारभार झाला व चालु आहे तर याविरुद्ध मी निर्पेक्षतेने लिखाण करीत असतो तथा करीत राहाणारच असे कितीही खोटे गुन्हे दाखल करुन पत्रकारीतेचा खरा आवाज दाबणे कोणासही शक्य नाही, त्यामुळे काहीही झाले तरी माझे या गैरकारभाऱ्या आणि  भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध लिखाण हे सुरु राहणारच आहे,.........................माहिती अधिकारात माहिती मागीतल्याचा राग आल्याने, सरपंचाकरवी खंडणीची खोटी फिर्याद 


जितेश लोकचंदानी हे नेहमी

आमचे गांवाच्या ग्रामपंचयात कार्यालयात येवून विनाकारण कोणतीही उलटसुलट माहीती विचारत असतात.त्यांचे दैनिक साईदर्शन हे सांयदैनिक म्हणुन

प्रसिद्ध केले जाते तसेच saidarshan.com.in या संकेत स्थळावर देखील प्रसिद्ध केले जाते, दिनांक  09/04/2021 रोजी 12/00 वाजेच्या सुमारास रुई ग्रामपंचायतीमध्ये आले असता ग्रामपंचायतीमध्ये मी सरपंच,,,,, तसेच उपसरपंच सिताराम चंद्रसेन कडू, सदस्य ज्ञाननेश्वर वाबळे, ग्रामविकास अधिकारी सांगळे, गावकरी बाळकृष्ण सुराळे,अनिल कोळपे असे उपस्थित होतो . त्यावेळी तेथे जितेश मनोहरलाल लोकचंदानी हे आले व माझे सोबत चर्चा करु लागले, तेव्हा चर्चा करताना ते म्हणाले की माझे दैनिक साईदर्शन या वृत्तपत्राचा वर्धापनदिन आहे, आणि मी तुमच्या ग्रामपंचयात कार्यालयाच्या बातम्या वेळोवेळी प्रसिद्ध केल्या आहे. त्यासाठी

तुम्ही मला तुमच्या ग्रामपंचयात कार्यालयातर्फे 10,000/- (रुपये दहा हजार) द्या असे म्हणाले, तेव्हा मी त्यांना सांगितले की तुमचे आणि आमचे ग्रामपंचयात

कार्यालयाचा काही एक संबंध नाही, आम्ही तुम्हाला बातम्या देण्याचे कधी सांगितले नाही, त्यामुळे आमचे ग्रामपंचयात कार्यालयाकडून तुम्हाला पैसे

मिळणार नाही असे सांगितले, तेव्हा तो मला जोराच्या आवाजात म्हणाला सरपंच हे तुम्हाला खुप महाग पडेल, मी तुमचे ग्रामपंचयात कार्यालयाचे

मागे लागेल, माहीती अधिकारात माहीती विचारुन त्रास देईल, तुमचा सर्व भ्रष्टाचार बाहेर काढील अशी धमकी देवुन तो निघुन गेला, त्यानंतर जितेश

मनोहरलाल लोकचंदानी यांनी त्यांचे मो नं 8329480310 वरुन माझे मो. नं 8888000800 वर दिनांक 08/04/2021 रोजी पासुन दिनांक 25/04/2021 रोजी

पावेतो, वेळोवेळी मला नेहमी फोन करुन त्यांचे दैनिक साईदर्शन या वृत्तपत्राचे वर्धापन दिनानिमीत्त 10,000/- दहा हजार रुपयाची खंडणीसाठी त्रास दिला आहे, त्यानंतर दिनांक 27/04/2021 रोजी मी सरपंच,,,, तसेच उपसरपंच , सदस्य, गावकरी व ग्रामविकास अधिकारी सांगळे , लिपीक स्वप्निल दुर्शीग असे रुई

ग्रामपंचयात कार्यालयात असताना त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन सर्वासमक्ष मला 10,000/- दहा हजार रुपयांची खंडणी मागितली तेव्हा मी त्यांना पैसे देण्यास

नकार दिला, त्यांना त्याचा राग आल्याने तो मला म्हणाला तुम्ही मला पैसे द्या नाहीतर मी तुमच्या ग्रामपंचयात कार्यालयाच्या खोट्या बातम्या छापुन बदनामी करील अशी धमकी देवुन माहीती अधिकारात अर्ज देवुन रागाने तेथुन निघुन गेला, त्यानंतर त्याने दि 06/05/2021 रोजी त्यांच्या

दैनिक साईदर्शन या वृत्तपत्रामध्ये भरपेट गैरकारभार करुन पाउला शासनाच्या तिजोरीला खड्डा, रुई ग्रामपंचयात झाला की काय गैरकारभा-यांचा अड्डा ?

अशी मोठ्या अक्षरात बातमी देवुन रुई ग्रामपंचयात कार्यालयाअंतर्गत मागील काही वर्षापासुन करण्यात आलेल्या रस्त्यांची कामे निकृष्ठ दर्जाचे झाले असुन या कामांचा सर्व निधी ठेकेदारांशी संगनमत करुन ग्रामपंचयात कार्यालयाचे कारभारी यांनी त्यांचे खिशात भरला जात असले बाबत बातमी करुन आमचे कई ग्रामपंचयात कार्यालयाची बदनामी केली आहे.असे आपल्या फिर्यादीत म्हटले आहे,

माहिती अधिकारात माहिती मागीतल्याचा राग येवून तथा माहिती दिल्याने आपल्या ग्रामपंचाय कार्यालयातील गैरकारभार उघड होऊन भ्रष्टाचार चव्हाट्यावर येईल ?, म्हणून संबंधित सरपंच यांच्याकरवी लोकचंदानी यांनी खंडणी मागीतल्याचा खोटा गुन्हा दाखल करणेकामी कुठलीही शाहनिशा न करता शिर्डी पोलिसांत खोटी फिर्याद दाखल केली आहे.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget