July 2020

बुलडाणा - 31 जुलै
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा 85 हजार क्विंटल मका 31 जूलै पर्यंत खरेदी करण्याची परवनागी दिली होती त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने दररोज 300 शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याचे निर्देश दिल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होते.दरम्यान मका खरेदीची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने नाफेड अंतर्गत सुरु करण्यात आली त्यामुळे शेतकरी आपली मका घेवून भाडयाचे वाहनाने खरेदी केंद्रावर पोहोचले मात्र मका खरेदीसाठी 31 जुलै शेवटची तारीख दिली असताना देखील 30 जुलैच्या दुपारीच नाफेड खरेदी केंद्राची ऑनलाईन नोंदणीची साईट बंद करण्यात आल्याने शेतकरी हवालदील झाले आहे.मका खरेदीला राज्य शासनाने मुदत वाढ द्यावी व जर शासनाचा मका खरेदीचा उद्दिष्ट पूर्ण झाला असेल तर उद्दिष्ट वाढवून मका खरेदी सुरु करावी अन्यथा राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये मका टाकू असा संतप्त इशारा माजी मंत्री व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्य शासनाला दिला आहे.

बुलडाणा - 31 जुलै
जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या बोथा गावाजवळील धरणात आज 31 जुलै रोजी एक अस्वल मृतावस्थेत आढळून आल्याने वन विभागात खळबळ उडाली होती.
     फक्त ज्ञानगंगा अभयारण्यच नव्हे तर संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अस्वलांचा अधिवास आहे. जिल्ह्यातला वातावरण अस्वलांसाठी पोषक असल्याने इथे त्यांची संख्याही मोठी आहे. मागील काही वर्षात ज्ञानगंगा अभयारण्यला लागून असलेल्या बुलडाणा व चिखली तालुक्यातील काही क्षेत्रात अस्वल व मानवी संघर्षाचे अनेक घटना घडलेल्या आहेत.ज्ञानगंगा अभयारण्यातील अस्वल जंगल सोडून वस्ती वाड्याकडे येत असतात.आज शुक्रवारला सकाळी ज्ञानगंगा अभयारण्यला
लागून असलेल्या बोथा गावाजवळ  बुलढाणा-खामगाव मार्गाला लागून असलेले धरणात एक अस्वल बुडालेला दिसून आला.याची माहिती प्रादेशिक वन विभागाला देण्यात आली असता खामगाव रेंजचे आरएफओ के.डी.पडोळ,वनपाल एस.आर. गिरणारे,वनरक्षक के.एच.मोरे तथा अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व पाण्यात बुडालेल्या अस्वलाला धरणातून बाहेर काढण्यात आले. मृत मादी अस्वल 2 ते 3 दिवसापासुन पाण्यात बुडाली असेल असा अंदाज आरएफओ पडोळ यांनी व्यक्त केला आहे.पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अवताळे व डॉ.तायडे यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले व नंतर अस्वलाला जाळुन नष्ट करण्यात आले आहे.अस्वलाला चांगले पोहने येते तरीही तो पाण्यात बुड़ुन कसा मरण पावला?या प्रश्नाचा उत्तर पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर मिळेल.

बुलडाणा - 31 जुलै
स्वतंत्र अधिवास अन् वाघिनीच्या शोधासाठी टिपेश्वर अभयारण्यातून 1300 कि.मी.चा प्रवास करत बुलडाणा नजीकचे ज्ञानगंगा अभयारण्य गाठणाऱ्या C-1 वाघाचा एकांतवास संपणार असून त्याचे लवकरच एका वाघिन सोबत मनोमिलन होणार असल्याचे संकेत समितिच्या बैठकीत मिळाले असून त्यासाठी काही महत्वपूर्ण बाबीकडे लक्ष दिले जाणार आहे.
      यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात टी-1 या वाघिणीने 2016 मध्ये 3 पिल्लांना जन्म दिला होता.त्या पिल्ल्यांचे नामकरण सी-1, सी-2 आणि सी-3 करण्यात आले होते.या तीन्ही वाघांना 25 आणि 27 मार्च 2019 दरम्यान रेडीओ कॉलर लावण्यात आले होते. वाघांचे परिक्रमण तपासण्याच्या दृष्टीकोणातून हे रेडियोकॉलर महत्वपूर्ण ठरले आहे.यातील सी-1 हा सबअडल्ट वाघ महाराष्ट्र व तेलांगाना हे दोन राज्य व महाराष्ट्रातील 6 जिल्हे फिरून 5 महिन्यात 1300 कि.मी.चे अंतर पार करत बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात 1 डिसेंबर 2019 ला पोहचला होता. 13 शे किलोमीटरची मुशाफिरी करणाऱ्या C-1 वाघाने 205 चौरस किलोमीटर मध्ये विस्तारलेले ज्ञानगंगा अभयारण्य पिंजुन काढले. डिसेंबर मध्ये C-1 वाघ ज्ञानगंगा अभयारण्य सोडून अजिंठा पर्वत रांगा ओलांडत अजिंठा लेणी व औटुंबर गौताळा अभयारण्य पर्यंत जावून पोहोचला होता. मात्र जानेवारी मध्ये ज्ञानगंगा अभयारण्यात परत आल्यानंतर त्याला योग्य अधिवास मिळाल्याने तो आज पर्यंत इथेच स्थिरावलेला आहे.या वाघाला एक वाघिन मिळावी,या साठी काय काळजी घ्यावी,काय उपाययोजना करण्यात याव्या ?या अभ्यासासाठी एक समिति गठित करण्यात आली आहे. या समितिची बैठक 28 मार्चला होणार होती मात्र लॉकडाउनमुळे तब्बल 4 महिन्या नंतर 28 जुलैला अमरावती येथे बैठक संपन्न झाली.या बैठकीत समितीचे अध्यक्ष मेळघाट व्याघ्र प्रकल्पचे क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी,सदस्य बिलाल हबीब,संजय वडतकर,किशोर रीठे व मनोजकुमार खैरनार उपस्थित होते.C-1 वाघाला एक वाघिन उपलब्ध करून देण्यास समिति अनुकूल असून काही महत्वपूर्ण बाबींवर ही चर्चा झाली आहे.त्यात अभयारण्यातील देवहारी गावाचे पुनर्वसन, अवैध चराई थांबवीने तसेच अभयारण्यातून जाणारा बुलडाणा-खामगांव हा मार्ग पूर्णपणे बंद करुन पर्यायी मार्गची व्यवस्था करने हे महत्वाचे मुद्दे असून येत्या 6 महिन्यात काम करण्याचे ठरले आहे. वाघिन आल्यानंतर भविष्यात वाघांची संख्येत वाढ होणार ही गोष्ट लक्षात घेता वाघांसाठी 800 ते 1000 किलोमीटरचे क्षेत्र असणे आवश्यक असून त्या करीता काटेपुर्णा-ज्ञानगंगा-अंबाबारवा व मुक्ताई नगर असा एक सुरक्षित कॉरिडोर करण्याचे मत वाइल्ड लाइफ इंटिट्यूट ऑफ इंडियाचे बिलाल हबीब यांनी व्यक्त केले आहे.

बुलडाणा - 30 जुलै
बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात अवैधरित्य चराई करणाऱ्या मेंढपाळ यांना विरोध करणाऱ्या 2 वन कर्मचाऱ्यांवर मेंढपाळांनी जीवघेणा हल्ला करत गंभीर जख्मी केले होते या प्रकरणी हिवरखेड पोलीसाने 2 आरोपींना अटक केली आहे.
       बुलडाणा शहरापासुन अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर ज्ञानगंगा अभयारण्य आहे.हे अभयारण्य बुलडाणा, मोताळा,चिखली व खामगांव या 4 तालुक्यात 205 चौरस किलोमीटर वर विस्तारलेला आहे.शनिवारी वनरक्षक रविंद्र मोरे व बिट मदतनीस दिपक कांडलकर हे जंगलात गश्त घालत असतांना त्यांना 2 मेंढपाळ प्रतिबंधित क्षेत्रात मनाई असतांना चराई करतांना दिसून आले.दोन्ही कर्मचाऱ्यांनी चराइस मज्जाव केला असता दोघांवर जंगलात मेंढपाळांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात दोघे वनकर्मचारी गंभीररित्य जख्मी बिट मदतनीसवर कांडलकरवर बुलडाणा येथील एका खाजगी रुगनालायात उपचार सुरु असून वनरक्षक मोरेचा हात फ्रेक्चर झालेला आहे.या प्रकरणी हिवरखेड
पोलीस ठाण्यात अज्ञात 2 मेंढपाळांवर विविध कलमानवय  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसाने यात स्वप्निल विठ्ठल हटकर वय 23 वर्ष व स्वप्निल अशोक लकडे वय 22 वर्ष दोघे रा.नान्द्री ता. खामगांव या हल्लेखोरांना अटक करुण न्यायालय समोर उभे केले असता त्यांची 31 जुलै पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार प्रवीण तळी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआई दिलीप पाटील करीत आहे.

बुलडाणा - 30 जुलै
कामासाठी शेतात गेलेली एका महिलेचा विहिरीत पडून मृत्यु झाल्याची घटना आज 30 जुलाई च्या सकाळी 10 वाजेच्या सुमारास भादोला गावाजवळ घडली आहे.
   बुलढाणा तालुक्यात भादोला या गावी आपल्या माहेरी आलेली विवाहित महिला सुरेखा विलास निकम वय 31 वर्ष राहणार वाकोद तालुका जामनेर जिल्हा जळगाव ही आज सकाळी आपले वडील विठ्ठल नामदेव जाधव यांच्या शेतात कामासाठी गेली होती. पिकावर फवारणी करण्यात येत असल्याने सुरेखा पाणी आणण्यासाठी शेतातील विहिरीत गेली मात्र तोल जाऊन ती विहिरीत पडली बराच वेळ उलटल्यानंतरही सुरेखा परत आली नाही म्हणून विहिरीवर गेल्यावर लक्षात आले कि ती विहिरीत पडलेली आहे. त्याला बाहेर काढण्यात आले तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.घटनेची  माहिती बुलडाणा ग्रामीण पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी हजर झाले व पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात मर्गची नोंद करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआई रमेश बंसोड व जनार्दन इंगळे करीत आहे.

बुलडाणा - 29 जुलै
माजी राज्यमंत्री व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेत त्यांचा फेसबुक अकाउंट हैक करुण त्यांच्या नावावर पैसे मागून लुटीचा ऑनलाईन फंडा वापरला जात असून याला कुणीही बळी पडू नये असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.
    राजकारण व चळवळीत काम करताना सोशल मीडिया हा नेत्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या एका कार्यकर्त्याने काही वर्षांपूर्वी बुलडाणा येथे फेसबुक वर "रविकांत तुपकर मित्रमंडळ" नावाचे पेज सुरु केले होते, ते काही वर्ष चालू होते, मात्र गत एक ते दीड वर्षापासून त्या फेसबुक अकाऊंट वरून कोणीच कोणाशी संवाद साधत नव्हते. मात्र तरीही ते पेज सुरू होते.
काल 28 जुलैच्या रात्रीपासून त्या फेसबुक अकाउंटवरून दोन गुगल पेचे नंबर देऊन फेसबुक मित्रांना वारंवार मैसेज पाठवून पैशाची मागणी होत असल्याचे देश-विदेशातून सारखे फोन तुपकर यांना येत आहे.कोणाची फसवणूक होऊ नये म्हणून रविकांत तुपकर यांनी यासंदर्भात बुलडाणा शहर ठाण्यात जावून रितसर फिर्याद दाखल केली आहे.पोलिसाने या प्रकरणी अज्ञात हैकर विरुद्ध भादवीची कलम 415,416,417,420 तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्याची कलम 67 क अन्वय गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शहर ठाणेदार प्रदीप सालुंखे करीत आहे.कार्यकर्ते व हितचिंतकांना तुपकर यांनी आवाहन केले आहे की,या पेजवरून होणारी पैशाची मागणी हॅकर्सद्वारे होत असून कुणीही ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करू नये.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )-
 बेलापूर येथील एकाच कुटुंबातील 9 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने बेलापूरात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 21 वर पोहचली त्यांना तातडीने संत लुक हाँस्पीटल येथे दाखल केले आहे                   .श्रीरामपूर येथे एका कंपनीत काम करणार्या  बेलापुरातील एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्या व्यक्तीच्या घरातील सर्व जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल काल प्राप्त झाला असून त्यातील 9 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत. त्यामुळे बेलापुरात खळबळ उडाली असून त्या कुटुंबात काही दिवसापूर्वी दु:खद घटना घडली होती. त्यामुळे त्या  कुटुंबाच्या संपर्कात आणखी गावातील व्यक्ती आले असून त्या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:हून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉ. देविदास चोखर यांनी केली आहे.
दरम्यान गावामध्ये एका कुटुंबातील 9 जण बाधीत सापडल्याची चर्चा होताच त्यांच्या संपर्कातील अनेक जण चिंताग्रस्त झाले आहे. बेलापूर येथील एका डॉक्टरचाही अहवाल पॉझिटीव्ह आला असून त्या डॉक्टरने पॉझिटीव्ह रुग्णावर उपचार केल्याने त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केले होते. त्यांचे स्वॅबही तपासणीसाठी दिले होते. त्याचाही अहवाल प्राप्त झाला असून तोही पाँझीटीव्ह आलेला आहे. त्यानुसार त्या डॉक्टरांच्या घरांच्यांचीही  तपासणी करण्यात येणार आहे.गेल्या तीन दिवसापासून बेलापूर गावात सतत रुग्ण वाढत आहे रुग्ण आढळलेला परिसर सील करण्याचा आदेश असताना अंतर कमी जास्त करुन सोयी नुसार परिसर बंद करत असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला असुन काही व्यक्तींचे समीती बरोबर वादही झालेले आहे आता गाव बंद ठेवावे असे काहीचे मत असुन काही नागरिकांनी बंदलाच विरोध केलेला आहे तसेच परिसर  बंद करताना  २०० मिटरचा नियम असताना काही जण आपल्या मर्जीप्रमाणे अंतर कमी जास्त करुन परिसर सीलबंद करत आहेत तसेच सीलबंद परिसरातील व्यक्ती बाहेर येवु नये त्या परिसरात असणार्या व्यवसायीकांनी व्यापार व्यवहार कडेकोट बंद ठेवावे असे असतानाही सीलबंद परिसरातील नागरिक रस्त्यावर येतात दुकाने चालु असतात अशीही काहींची तक्रार आहे या संकट काळातही काही जण राजकारण करत असल्याचा आरोपही काहींनी केला आहे

बुलडाणा - 28 जुलै
संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात येत्या 21 ऑगस्ट पर्यंत कडक लॉक डाऊन असल्याने पोलीस बंदोबस्त वाढलेला आहे तरीही काही भुरटे चोर संधीचा सोना करत चोरीच्या घटना करीत असल्याची बाब बुलढाणा शहरातील चर्च समोर उघडकीस आली आहे. येथील सहा दुकाने अज्ञात चोरांनी एकाच रात्री फोडून लाखो रुपयांची चोरी केल्याचे आज 28 जुलै रोजी समोर आले आहे.
      या बाबत प्राप्त माहिती अशी की काल  27 जुलैच्या रात्री बुलडाणा शहरातील चर्च ऑफ नाझरीन समोर नगरपालिकेने बांधून दिलेल्या दुकानां पैकी 3 मोबाइल शॉपी,2 गेरेज व एक पान सेंटर अशा प्रकारे या 6 दुकानांचे छतावरील नट बोल्ट मध्ये फीट केलेले टीन पान्याने उघडून आत प्रवेश करुण अज्ञाताने चोरी केली. हा प्रकार आज सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर बुलडाणा शहर पोलीसाने घटनास्थळी जावून पंचनामा केला असून या प्रकरणी सायंकाळी 5 वाजे पर्यंत पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद नव्होती.अंदाजे 3 लाख रूपयांची चोरी झाल्याचे बोलले जात आहे.

श्रीरामपूर : संपूर्ण देशात covid-19 या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे,त्यास अनुसरून संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यामध्ये अधिकारी व वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स योग्य त्या सर्व उपाययोजना राबवत आहात म्हणूनच आज श्रीरामपूर तालुक्याची परिस्थिती जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत खूपच उत्तम व समाधानकारक आहे.मात्र शहरातील कोणत्याही रुग्णाच्या बाबतीत भेदभाव व्हायला नको,विशिष्ट भागातील रुग्णांना न तपासण्याची भूमिका मानवतेच्या दृष्टीकोनातून योग्य नसून सर्व रुग्णांसोबत सौहार्द्पणे व्यावहार करण्याची मागणी शहरातील मिल्लतनगर भागातील नागरिकांनी प्रांताधिकारी अनिल पवार यांचेकडे निवेदनाने केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे कि,मागील आठवड्यात सर्वसाधारण रुग्णांच्या बाबतीत योग्य उपचार किंवा प्राथमिक उपचार देखील न मिळाल्याने व शहरातील काही डॉक्टरांनी सपशेल नकार दिल्याने  याच भागातील दोन व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या ही वाईट घटना असून प्रत्येक रुग्णांना किमान प्राथमिक उपचार अथवा योग्य सल्ला दिला गेला पाहिजे.
विशेषतः शहरात मुस्लिम बहुल विभाग असलेला व सर्व परिचित असलेला वार्ड  नंबर २ या भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवेच्या बाबतीत अनेक समस्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोणतीही व्यक्ती रुग्ण म्हणून जेव्हा शहरातील कोणत्याही रुग्णालयात वा दवाखान्यात जात असेल तर त्या ठिकाणी संबंधित सेवा पुरवणाऱ्या संस्थांनी अथवा डॉक्टरांनी रुग्णांना दिलासा देऊन चर्चा करणे गरजेचे आहे,किमान उच्च रक्तदाब,साखरेचे कमी-जास्त प्रमाण यांसारख्या आजारांवर प्राथमिक उपचार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे मात्र अनेक ठिकाणी असे होताना दिसत नाही.
या भागातील नागरिक स्वयस्फूर्तीने आजाराबद्दलची भीती घालवण्यासाठी घरोघरी भेटी देत आहेत. स्वच्छता व आरोग्याची घेण्याचेही आवाहन करीत आहेत.
यावेळी तसेच व्हाट्सअप च्या माध्यमातून दररोज वेगवेगळे मेसेज आल्याने त्या माध्यमातून covid-19 बद्दल लोकांमध्ये भितीचे वातावरण मोठ्या प्रमाणात निर्माण होतात.वास्तविक या रोगाबद्दल अधिकची माहिती अर्थात शिक्षण लोकांमध्ये होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होणे गरजेचे आहे त्यासाठी अधिकृत अथवा वरिष्ठांच्या परवानगीशिवाय कोणताही मेसेज पाठविला जावू नये असाही आग्रह धरण्यात आला.
शिष्टमंडळात अकिल शेख,शकील बागवान,असलम बिनसाद,इमाम सय्यद,अनिस शेख,गणी पिंजारी,अमीन शेख,आदींचा समावेश होता.

बुलडाणा - 27 जुलै
पारिवारिक विवादातून बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत एका 25 वर्षीय महिला पोलीस कर्मचारी यांनी छत्तीसगढ़ येथील रांची येथे विषप्राशन करुन आत्महत्या केल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.
    याबाबत प्राप्त माहितीनुसार, बुलडाणा येथील रहिवासी महिला पोलीस कर्मचारी आरती ज्ञानेश्वर सोनुने यांचा बुलडाणा शहरातील सरस्वती नगर येथे राहणाऱ्या दीपक संजय पसरटे सोबत 2018 मध्ये विवाह झाला होता. दीपक हा आर्मीमध्ये कार्यरत आहे.आंतरजातीय विवाह असल्याने दीपकच्या परिवारातील सदस्य आरतीला मान्य करत नव्हते.त्यामुळे त्यांच्यात आपसी वाद-विवाद व्हायचे, अशातच 2019 ला आरतीने बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात पती व इतर सासरची मंडळीविरुद्ध 498 चा गुन्हा नोंदविला होता.पती दीपक कडून आरतीवर दुर्लक्ष केले जात होते.मागील दहा दिवसापूर्वी आरतीने सुट्टी घेऊन थेट रांची गाठले.तिथे आर्मी कॅम्प समोर जाऊन आरतीने आपले पति दिपकला कॉल केले.परंतु दिपकने काही प्रतिसाद दिला नाही. दीपकच्या या स्वभावामुळे आरतीने आर्मी कॅम्प समोर विष प्राशन केले. आरतीला आर्मीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु चौथ्या दिवशी म्हणजे 25 जुलै रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. आरतीच्या पर्समधील सुसाइड नोट सुद्धा रांची पोलिसांच्या हाती लागलेली आहे.आरतीच्या मृत्यूपूर्व बयान व चिठ्ठीत समानता असल्याने रांची येथील पोलिस ठाण्यात पती दीपक विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.आरती यांचे पार्थिव काल 26 जुलै च्या रात्री बुलडाणा येथे पोहोचल्या नंतर रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले असुन रांची मध्ये आरोपी पति दीपक अटक असल्याचे समजते.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याचे माहीत आसतानाही हलगर्जीपणा दाखवुन किराणा दुकान सुरु ठेवल्याच्या कारणावरुन बेलापूर पोलीसांनी एका किराणा दुकानदारासह दोन जणावर गुन्हा दाखल केला असुन या प्रकारामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.कोरोनामुळे गावातील दुकाने पाच वाजता बंद करण्याचा मा जिल्हाधिकारी यांचा आदेश असताना त्या नंतरही दुकान उघडी ठेवुन कायद्याचा भंग करणार्या व्यापार्या विरुध्द बेलापूर 
पोलीसांनी प्रथमच कारवाई केली आहे कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याचे माहीत असताना तोंडास कोणत्याही प्रकारचे मास्क न लावता कोणतीही खबरदारी न घेता सदर आजार पसरण्याचा संभव असल्याचे माहीत असुनही हरिप्रसाद सोमनाथ मंत्री यांनी  त्याच्या मालकीचे ओंकार किराणा स्टोअर्स नावाच्या दुकानात किराणा मालाचे गीराईक करुन कोरोना आजाराचा संसर्ग होवुन स्वतःचे व इतराच्या जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य केले तसेच मा जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशचा भंग केल्यावरुन हरिप्रसाद सोमनाथ मंत्री यांचेविरुध्द पोलीस काँन्स्टेबल पोपट भोईटे यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे  तसेच जाकीर असीफ शेख राहणार गोंधवणी श्रीरामपूर याने आपल्या ताब्यातील मोटार सायकल टी व्ही एस स्टार सीटी एम एच १७सी बी ५९११ ने मास्क न वापरता विनाकारण फिरत असताना आढळून आला पोलिस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशाचा भंग केल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेलापूर पोलीसांनी गेल्या काही दिवसात विनाकारण फिरणारे मास्क न वापरणारे यांच्या विरुध्द जोरदार मोहीम सुरु केली असुन ग्रामस्थांनी पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे साईनाथ राशिनकर पोपट भोईटे निखील तमनर यांचे अभिनंदन केले आहे.

डोणगांव पोलीस ठाण्यातील 1 कर्मचारी पोजिटिव्ह
बुलडाणा - 25 जुलै
बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगांव राजा येथील ठाणेदार व काही कर्मचारी यांचा कोरोना अहवाल पोजिटिव्ह आल्यानंतर तेथील ठाण्याला कंटेन्मेंट झोन घोषित करुण तिथला कामकाज शिवाजी नगर खामगांव ठाण्याला अटैच करण्यात आला असून आता मेहकर तालुक्यातील डोणगांव पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत एक पोलीस कर्मचारी आज 25 जुलै रोजी कोरोना पोजेटीव्ह निघाल्याने सुरक्षिततेची उपाय योजना म्हणून या पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी हे होम क्वान्टाईन केले व येथील पोलीस स्टेशनचे कारभार मेहकर ठाण्याला अटैच करण्यात आले आहे.
       डोणगांव पोलीस स्टेशन मध्ये एकूण 36 पोलीस अधिकारी व कर्मचारी असून त्यात 2 अधिकारी व 34 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.या ठाण्यात कार्यरत एक पोलीस कर्मचारीची तब्यत बिघडल्याने व त्याचे लक्षण कोरोना सारखे दिसल्याने त्याची कोरोना तपासणी केली असता आज 25 जुलै रोजी अहवाल कोरोना पोजेटीव्ह मिळून आल्याने येथील  पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी यांना तातडीने मेहकर येथील क्वारन्टाईन सेंटर मध्ये आनले असून त्यांची कोरोना तपासनी केली जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.डोणगांव पोलीस स्टेशनचा कारभार हा मेहकर ठाण्यातुन चालणार असल्याची माहिती मेहकर विभागीय पोलीस अधिकारी डी. बी.तडवी यांनी दिली आहे.सद्या जिल्ह्यातील 2 पोलीस स्टेशन कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे.

बेलापुर(वार्ताहर)बेलापुर खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना प्रत्येकी वह्या व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
माजी सरपंच व सेवानिवृत्त प्राध्यापक अशोक बडधे व भारतीय सेना दलातील हवालदार किशोर थोरात यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोनशे पेजेसच्या चार वह्या तसेच शालोपयोगी लेखन साहित्याचे वितरण पालकांना टप्प्याटप्प्याने बोलावून करण्यात आले.
यावेळी तोंडाला मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर आदी नियमांचे पालन करण्यात आले. तसेच कोरोनासंबंधी घ्यावयाची काळजी बाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सर्वश्री सुनील बारहाते, राजीव रणदिवे, वेणूनाथ माने, राजेंद्र कुंकुलोळ, मूलख्याध्यापिका मुख्याध्यापिका सौ. दायमा आदी प्रमुख उपस्थित होते.

बेलापूर- (प्रतिनिधी )         बेलापुरातील एक युवक कोरोना पॉझीटीव्ह निघाल्यानंतर त्याच्या संपर्कातील सुमारे 14 लोकांना स्त्राव तपासणीसाठी श्रीरामपुरला नेले.मात्र त्यांना तेथे रात्रभर ठेऊन स्त्राव न घेताच परत पाठवले.त्यांना काही दिवस होम क्वारांटीन करणे गरजेचे होते मात्र आरोग्य विभागाने तसे काहीच केले नाही.त्यामुळे हे लोक बिनधास्तपणे गावभर फिरत आहेत.अशाच प्रकारामुळे कोरोनाचा फैलाव होत असल्याचा घणागात बेलापुरात अनेक नागरीकांनी केला आहे.
            या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन बेलापुरगावातील सजग नागरीकांनी कोरोना समीतीसमवेत शुक्रवारी बैठक घेतली व अनेक गंभीर त्रुटींचा ऊहापोह केला.या बैठकीला जि.प.सदस्य शरद नवले,उपसरपंच रविंद्र खटोड,सुनिल मुथा,सुधिर नवले,मारुती राशीनकर,देविदास देसाई,नवनाथ कुताळ दिलीप दायमा  अभिषेक खंडागळे,सुधाकर खंडागळे,भरत साळुंके,अजय डाकले,विष्णूपंत डावरे,चंद्रकांत नाईक,पोलीस नाईक.रामेश्‍वर ढोकणे,साईनाथ राशीनकर,प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.मोरे,डॉ.शैलेश पवार,कामगार तलाठी कैलास  खाडे,पोलीस पाटील अशोक प्रधान,अशोक पवार,विजय शेलार,अशोक गवते,प्रफुल्ल डावरे प्रसाद खरात सुहास शेलार अशोक शेलार सचिन वाघ ,दिपक क्षत्रीय,  आदींसह अनेक मान्यवर उपस्थीत होते.
      दोन दिवसांपुर्वी बेलापुरातील एक युवक कोरोना पॉझीटीव्ह सापडला होता.त्याच्या संपर्कातील सुमारे 14 लोकांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी व कोरोना समीतीच्या सदस्यांनी तपासणीसाठी कोरोना केअर सेंटरला पाठवले होते.मात्र त्यांचे स्त्राव न घेताच परत पाठवण्यात आले.वास्तविक त्यांच्या हातावर होम क्वारांटीनचा शिक्का मारुन त्यांना क्वारांटीन करणे गरजेचे होते.तसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला व कोरोना समीतीला कळवायला पाहीजे होते.मात्र तसे न झाल्यामुळे ते लोक बिनधास्तपणे गावभर फिरत आहेत.त्यामुळे इतर ग्रामस्थ चिंता व्यक्त करीत आहेत.असाच प्रकार यापुर्वीही घडला होता.एका युवकाचा स्त्राव घेतल्यानंतर त्याचा तब्बल बारा दिवसांनी अहवाल पॉझीटीव्ह आला होता.तोपर्यंत तोही सर्वत्र फिरला.त्यालाही अहवाल येईपर्यंत क्वारांटीन करणे गरजेचे होते.अशा गंभीर त्रुटी आरोग्य विभागाकडून राहत असल्याने त्या कोरोनाला पोषक ठरु शकतात अशी चिंता नागरीक व्यक्त करीत आहेत.
     दरम्यान यापुढे रुग्ण सापडला तर त्याच्या संपर्कातील इतर लोक स्त्राव तपासणीसाठी नेले जातील.त्यांचे स्त्राव घेतले किंवा घेण्याची गरज पडली नाही तरीही त्यांना काही दिवस होम क्वारांटाईन करावे.तसा त्यांच्या हातावर शिक्का मारावा.शिवाय त्याची माहीती प्राथमिक आरोग्य केंद्र,कोरोना समीती पोलीस स्टेशन व ग्रामपंचायतीला कळवावी अशी मागणी बैठकीत  करण्यात आली आहे.तसे पत्रही तालुका आरोग्य अधिकार्‍यांना देण्याचे सर्वानुमते ठरले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) सध्या सर्वत्र कोरोनाच्या महामारी ने थैमान घातले असून प्रत्येक गावात आणि शहरात को रोना रुग्णांची संख्या वाढत आहे . त्यामुळे सर्वसामान्य लोक हवालदिल झाले आहेत . शासकीय लॅब मध्ये रिपोर्ट यायला आठ दिवस उशीर लागत असल्यामुळे खाजगी लॅबला शासनाने परवानगी दिली . मात्र गेल्या काही दिवसातील त्यांचे अहवाल हे विश्वसनीय वाटत नसल्याने लोक संभ्रमात सापडले आहेत . येवल्याचे आमदार दराडे बंधू यांच्या घरात दोन दिवसात दोन वेगवेगळे अहवाल आल्याने आमदारांची ही कथा तर सर्वसामान्यांची कोण ऐकणार व्यथा अशा प्रतिक्रिया जनतेमधून व्यक्त होत आहेत . आमदार नरेंद्र दराडे यांच्यासह कुटुंबातील लोक येवला येथे पॉझिटिव्ह दाखवण्यात आले . दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वतःची मुंबईमध्ये चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली .नंतर त्यांनी मुंबईचे लॅबवाले येवल्याला पाठवून आपल्या कुटुंबीयांची पुन्हा चाचणी केली असता ती देखिल निगेटिव्ह आली . म्हणजे दोन दिवसात दोन प्रकारचे रिपोर्ट प्राप्त झाल्याने राज्यांमध्ये तो एक चर्चेचा विषय झाला आहे . एकाच घरामध्ये दोन आमदार असल्याने त्यांचा जनसंपर्क दांडगा असून सर्व शासकीय यंत्रणा दिमतीला असताना अशा पद्धतीने संभ्रमीत करणारे रिपोर्ट येत असतील तर सामान्य लोकांची काय कथा आणि त्यांनीकुणाला सांगायचे आपल्या व्यथा अशी अवस्था लोकांची झाली आहे . खासगी रुग्णालयात  इलाज करण्यासाठी मोठा खर्च येतो . त्याचबरोबर शासकीय अहवाल उशिरा येत असल्याने लोक खाजगी लॅबमध्ये स्त्राव चाचणी करीत आहेत . परंतु तेथून मिळणारे रिपोर्ट मात्र धक्कादायक असतात . कोणताही त्रास नसताना पॉझिटिव अहवाल ही एक नित्याची बाब झाली आहे . मात्र असे अहवाल आले तरी लोकांनी घाबरून न जाता या कोरोनाचा मुकाबला करावा असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी केले आहे . बरेचसे रुग्ण हे केवळ भीतीनेच गर्भगळीत होऊन मृत्यूला सामोरे जात आहेत . तेव्हा कोरोना रोगाची विनाकारण कोणीही भीती बाळगू नये . अहवाल जरी पॉझिटिव्ह आला तरी योग्य प्रकारे उपचार करून घ्यावेत . न घाबरता धैर्याने या परिस्थितीचा सामना करावा . असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे .
                                                          *श्रीरामपुरात वैद्यकीय गोंधळ*
 शहर आणि तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये कोरोना रुग्ण सापडत असले तरी त्यांची नेमकी संख्या किती हा महत्त्वाचा प्रश्न गेले चार दिवस तालुक्यात चर्चिला जात आहे . कारण तालुका वैद्यकीय अधिकारी व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी या तिघांमध्ये कोणताही ताळमेळ नसल्याने तसेच खासगी अहवाल वेळेत तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे पोहोचत नसल्याने आकडेवारीमध्ये तफावत दिसून येत आहे . कोरोना रुग्णाच्या संख्येबाबत शहरात मोठ्या प्रमाणावर अफवांचे सुद्धा पीक आले असून या भागात दोन लोकांना कोरोना झाला, त्या भागात चार लोकांना कोरोना झाला अशा कपोलकल्पित चर्चा आहे त.
*नागरी आरोग्य केंद्र म्हणजे असून ताप नसून संताप*
नगरपालिके मार्फत चालवले जाणारे नागरी आरोग्य केंद्र म्हणजे सरकारी दवाखाना ही सध्या शोभेची वस्तू बनली आहे. एकेकाळी नगरपालिकेच्या सरकारी दवाखान्याचा मोठा नावलौकिक होता. त्या ठिकाणी महिलांचे बाळंतपण, आवश्यक तपासण्या, छोटे ऑपरेशन केले जात होते. मात्र सध्या अशा कोणत्याही सुविधा येथे उपलब्ध नाही. फक्त लहान मुलांचे लसीकरण करण्याचे काम या ठिकाणी होते. गर्भवती महिलांना बाळंतपणासाठी शिरसगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचा रस्ता धरावा लागतो. मात्र शहरापासून लांब असल्याने बरेच लोक त्या ठिकाणी जाणे टाळतात. नगरपालिकेने स्वतःचे सुसज्ज असे सरकारी रुग्णालय उभारावे. त्याचबरोबर त्याचा विस्तार शहराच्या इतर भागातही करावा अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. इतर प्रश्नांवर पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आरडाओरडा करणारे नगरसेवक सरकारी दवाखान्याच्या प्रश्नावर मात्र गप्प आहेत. याबाबतही शहरातील जनतेत नाराजीची अशी भावना दिसून येत आहे .

बेलापूर  (प्रतिनिधी )- सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता बेलापूर पोलीसांनी कडक पावले उचलली असुन विनाकारण  तसेच मास्क न लावता फिरणार्या दोन व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहीती पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे यांनी दिली आहे. बेलापूर व परीसरात कोरोनाचा हळूहळू फैलाव सुरु झाला आहे त्याचे एकमेव कारण म्हणजे लग्न अंत्यविधी व बाहेर गावहुन येणारे पाहुणे यांचा संपर्क वाढल्याने परिसरात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे  लोक विनाकारण मास्क शिवाय गावात फिरत आहेत बेलापूर पोलीसांनी विनाकारण मास्क न लावता दोन जणावर कारवाई केली आहे पोलीस काँन्स्टेबल पोपट भोईटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हाटले आहे की रमेश नामदेव होले हा बेलापूर बु!!बेलापूर बायपास येथे एम एच 17 बी एच 57 या मोटार सायकलवर मास्क न लावताच फिरत होता तसेच विशाल पांडूरंग दिवे राहणार दत्त नगर हा हीरो होंडा मोटार सायकल एम एच 17 जे 6627 वर विना मास्क विनाकारण फिरताना आढळून आला पोलीसांनी दोघावरही भारतीय दंड संहिता कलम 188 व 269 नुसार कारवाई केली आहे   बेलापूर पोलीसांनी गावात व परिसरात रात्रीच्या गस्त बरोबरच दिवसाही गस्त सुरु केली आहे काही ठिकाणी विनाकारण फिरणाराला उठबशा तर काहींना दंडूक्याचा प्रसाद मिळत असल्यामुळे सायंकाळी पाच नंतर गावात सामसुम दिसू लागली आहे ग्रामस्थांनी पोलीसांच्या कारवाईचे स्वागत केले असुन कोरोनाचा प्रसार थांबावयाचा असेल तर काही कडक नियम करावेच लागणार असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे

श्रीरामपूर   (प्रतिनिधी  )- आरोग्य सेवका प्रमाणे स्वस्त धान्य दुकानदाराचा मृत्यू कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे झाल्यास त्यांनाही विमा कवच मिळावे या बाबत आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँपकिपर्स फेडरेशनने दाखल याचीकेवर चार आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई  उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जामदार व न्यायमूर्ती अभय आहुजा यांनी  शासनाला दिले आहे .   कोरोना योध्दा म्हणून सेवा देताना वैद्यकीय अधीकारी आरोग्य सेवक पोलीस होमगार्ड अंगणवाडी सेविका कर्मचारी  लेखा व कोषागरे अन्न व नागरी पुरवठा इत्यादी विभागातील  कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यास ५० लाख रुपये विमा कवच देण्याचा निर्णय शासनाने मार्च महीन्यात घेतला होता हे विमा कवच राज्यात अन्न धान्य वितरण करणारे स्वस्त धान्य दुकानदार यांना लागू असल्याचे शासनाने अद्याप पर्यत घोषीत केलेले नाही त्यामुळे आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँपकिपर्स फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर  बाबुराव ममाणे विजय गुप्ता मुबारक मौलवी नितीन पेंटर यांनी संघटनेच्या वतीने याचीका दाखल केली होती संघटनेच्या वतीने दाखल याचिकेत असे म्हटले होते की ही संघटना राज्यातील ५५ हजार स्वस्त धान्य दुकानदारांचे प्रतिनीधीत्व करत असुन कोरोना मुळे शासनाने घोषीत केलेल्या लाँक डाऊनच्या काळात लोकांना अन्न धान्य पुरविण्याचे जबाबदारीचे  काम हे राज्यातील धान्य दुकानदार करत होते  धान्य वाटपाचे काम हे अत्यावश्यक सेवेमध्ये येते धान्य वाटप करत असताना दुकानदाराचा दिवसभरात १०० हुन अधिक कार्डधारकाशी प्रत्यक्ष संपर्क येतो  दुकानदार समुह संसर्गाच्या टप्प्यात पोहोचल्याने दुकानदारांच्या जिवीतास धोका वाढला आहे हे काम करत असताना कोरोनाची बाधा झाल्यामुळे काही दुकानदारांना आपला जिव गमवावा लागला आहे कोरोना सकट काळात सेवा देणार्या त्या दुकानदारांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे या बाबत शासनाकडे वेळोवेळी मागणी करुन निवेदन देवुनही काहीही उपयोग झाला नाही त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना विमा सुरक्षा कवच देण्याचे निर्देश देण्यात यावेत असेही याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती  नितीन जामदार व न्यायमूर्ती अभय अहुजा यांचे समोर सुनावाणी झाली त्या वेळी सरकारी वकीलांनी हा शासनाचा धोरणात्मक निर्णय असल्याने अंतिम निर्णय घेण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली त्या वेळी चार आठवड्याच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश न्यायमूर्ती नितीन जामदार व न्यायमूर्ती  अभय आहुजा यांनी देत यांचिका निकाली काढली आँल  महाराष्ट्र  फेअर प्राईज शाँपकिपर्स  फेडरेशनच्या वतीने प्रसिध्द विधीज्ञअँड सुधाकर आव्हाड व अँड चेतन नागरे यांनी काम पाहीले तर शासनाच्या वतीने अँड रुपाली शिंदे यांनी काम पाहीले.

श्रीरामपूर  (प्रतिनिधी )-शिवसेना नेते सदा कराड हे बिबट्याच्या हल्ल्यात गंभिर जखमी झाले असुन नशिबाने साथ दिल्यामुळे ते थोडक्यात बाचले          शिवसेनेचे नेते सदा कराड हे सायंकाळी मोटारसायकलवरुन अशोकनगर येथे आपल्या  घरी जाण्यासाठी  निघाले असता बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली ते स्वतः मोटारसायकल चालवत होते त्यांच्या हाताला मोठी जखम झाली आहे  नशिब बलवत्तर म्हणून ते थोडक्यात वाचले   त्यांच्या हाताला मोठी जखम झाली आहे झडप घालुन बिबट्या पसार झाला त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले

अहमदनगर  (प्रतिनिधी  )- शेवगाव तालुक्यातील दुकानदारावर द्वेषभावनेतुन केलेली कारवाई मागे घ्यावी या करीता करण्यात येणारे उपोषण तूर्त स्थगीत केले असल्याचे संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षा मिनाताई कळकुंबे यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे .या बाबत सविस्तर असे की तीन महीन्यापूर्वी लाँक डाऊन असताना  शेवगाव तालुक्यातील कुठल्याही कार्डधाराकांची तक्रार नसताना हेतूपूरस्पर काही दुकानाची तपासणी करण्यात आली दुकान तपासणीत साठा रजिस्टर प्रमाणे साठा आढळून आला असतानाही काही कारण नसताना दहा दुकानदारावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला त्यातील काही दुकानावर दंडात्मक कारवाई करण्यात आली तर पाच दुकानावर कडक कारवाई करुन दुकाने सील करण्यात आली व काहीही कारण नसताना ती दुकाने इतरत्र जोडून देण्यात आली १२ नोव्हेंबर च्या शासकीय आदेशा प्रमाणे दुकानदारांना म्हणणे मांडण्याची संधी देणे आवश्यक असताना या दुकानदारांना संधी न देता कारवाई करण्यात आली तसेच एकाच प्रकारच्या गुन्ह्याकरीता एकाच अधीकार्याकडून वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळ्या प्रकारची दंडनीय कारवाई समर्थनीय नसल्याचा शासन निर्णय असताना सर्व नियम धाब्यावर बसवुन पाच दुकानावर सुडबुध्दीने व द्वेषभावनेतुन करण्यात आलेली कारवाई मागे घेण्यात यावी अन्यथा दिनांक २३ जुलै पासुन जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास बसण्याचा ईशारा देण्यात आला होता परंतु शहर व जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज पासुन सुरु करण्यात येणारे उपोषण स्थगीत करण्यात येत असल्याचे कार्याध्यक्षा मिनाताई कळकुंबे प्रकाश गजभिय मनिषा साळवे ओमप्रकाश कवडे यांनी कळविले आहे.

श्रीरामपूर- नुकताच इयत्ता १२वी कला शाखेचा निकाल जाहीर झाला असून येथील रावबहादूर नारायणराव बोरावके (आर.बी.एन.बी.) कला महाविद्यालयात अरबाज अकबर आदमाने (खाटीक) हा ७९.००७ गुण संपादन करुन महाविद्यालयात तीसरा आला आहे,
अरबाज अकबर आदमाने (खाटीक) हा स्व. मोहम्मद अली खाजाभाई आदमाने (खाटीक) यांचा नातू असून त्यास प्राचार्य के.एच.शिंदे (सर), वर्गशिक्षक पवार (सर) यांचे मार्गदर्शन लाभले आहे,त्याने संपादन केलेल्या या यशाबद्दल खाटीक समाज सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

श्रीरामपूर   (प्रतिनिधी  )-  पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत माहे एप्रिल  मे व जुन या तीन महीन्यासाठी मोफत वितरीत करण्यात आलेल्या तांदुळाचे प्रति क्विंटल दिडशे रुपये प्रमाणे मार्जिन धान्य दुकानदारांना लवकरच मिळणार असुन जिल्ह्यातील १८८२ दुकानदारांना मार्जिन पोटी जवळपास साडेचार कोटी रुपये मिळणार असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी दिली आहे. देशात आलेल्या कोरोनाचा गोर गरीबांना  मुकाबला करता यावा या करीता पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असलेल्या कार्डधारकांना प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ  मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता जिल्ह्यातील १८८२ धान्य दुकाना मार्फत ७२५५८ अंत्योदय शिधापत्रीका धारक व ४६५९४० प्राधान्य कुटुंब शिधापत्रीका धारकांना प्रति व्यक्ती पाच किलो तांदळाचे वाटप करण्यात आले जिल्ह्यातील १८८२ धान्य दुकानदारा मार्फत अंत्योदय कार्डधारकांना ५२६५. ५१मेट्रीक टन व प्राधान्य  कुटुंब लाभार्थी कार्डधारकांना ३११९५ .४३ मेट्रीक टन असे एकुण ३६४६१.९४ मेट्रीक टन तांदळाचे वाटप करण्यात आले होते कोरोनांच्या जिवघेण्या संकट काळात जिल्ह्यातील सर्व दुकानदारांनी जिव मुठीत धरुन शासकीय नियमांचे पालन करुन कार्डधारकाना मोफत तांदळाचे वाटप केले हे करत असाताना काही दुकानदारांना कोरोनाची लागण झाली त्यात त्यांचा मृत्यू  झाला  त्यामुळे राज्य फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर  सचिव बाबुराव ममाणे गणपतराव डोळसे विजय गुप्ता मुबारक मौलवी नितीन पेंटर व नगर जिल्हा  संघटनेने मोफत तांदूळ वाटपाचे दिडशे रुपये प्रमाणे मार्जिन देण्यात यावे धान्य दुकानदारांना विमा संरक्षक मिळावे त्यांची आरोग्य तपासणी केली जावी  अशी मागणी केली होती त्या नुसार राज्यातील दुकानदारांना मार्जिन पोटी १ अब्ज,३६ कोटी ४२ लाख ५१ हजार ११०रुपये मिळणार आहे त्यात अहमदनगर जिल्ह्यातील १८८२ धान्य वितरण करणार्या धान्य दुकानदारांना ५ कोटी ४६ लाख ९२ हजार ९०९ रुपये मार्जिन पोटी मिळणार आसल्याची माहीती जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी दिली आहे दुकानदारांना मोफत तांदळाचे मार्जिन  मिळवुन दिल्याबद्दल राज्य फेडरेशनचे अध्यक्ष गजानन  बाबर बाबुराव ममाणे मुबारक मौलवी विजय गुप्ता नितीन पेंटर गणपत डोळसे निवृत्ती कापसे देविदास देसाई मिनाताई कळकुंबे रज्जाक पठाण आदिंचे सुरेश उभेदळ सुरेश कोकाटे विश्वासराव जाधव विजय दिघे गजानन खाडे गणपत भांगरे ज्ञानेश्वर वहाडणे बाबा कराड मोहीते कैलास बोरावके विजय गायकवाड रावसाहेब भगत खताळ बजरंग दरंदले चन्द्रंकात झुरंगे मणीक जाधव नरेंद्र खरात आदिंनी अभिनंदन केले आहे.

बुलडाणा - 22 जुलै
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापुर शहरा जवळ एका गोदामात खामगांव अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांच्या पथकाने धाड टाकली. मात्र गुटखा व रेशन धान्याची तस्करी करणाऱ्या आरोपीला पोलीसाने का फरार केले?या सर्वसामान्य जनतेच्या मनात पडलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या गौडबंगालची स्वतंत्र चौकशी लावली तर कोणाचे हात "ओले-ओले" झाले हे स्पष्ट होणार आहे.
        कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन सुरु असतांना केवळ राज्यातच नव्हे तर अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या बुलडाणा जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा सर्वत्र नाकेबंदी असतांना वाहना द्वारे संपूर्ण जिल्हाभरात पोहोचवले जात असल्याचा आरोप होत आहे. या लॉकडाउनचा फायदा उचलत गुटखा माफियांनी जास्त दराने विक्री करुन बेहिशोब कमाई केल्याची चर्चा आहे.मलकापुर जवळ 14 जुलैला एका गोदामावर खामगांव एएसपी यांच्या पथकाने धाड टाकल्या नंतर लाखोंचा प्रतिबंधित गुटखा व रेशनचा धान्य जप्त केला व त्या ठीकाणी तस्कर अतिकुर रहमान हजर असतांना फक्त गुटखा व रेशन धान्य जप्त करण्यात आले. य माला सोबत त्या तस्कराला ही ताब्यात का घेण्यात आले नाही?
त्याला कोणी व का सोडून दिले?काही तडजोड करुन त्याला घटनास्थळावरुन फरार करण्यात आले का?या सर्व प्रश्नांचे उत्तर सद्या अनुत्तरित आहे.रेशन धान्यची काळाबाजारी व प्रतिबंधित गुटखा विक्री अश्या दोन प्रकरणात आरोपी तस्कर "अतीक" विरुद्ध मलकापुर शहर ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्यात तर आले मात्र आरोपी आहे तरी कुठे?त्याला अटक करण्यात आली का? या बाबीवर कर्तव्यदक्ष अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी स्वता: लक्ष देऊन चौकशी करावी व आपल्या कर्तव्यता जाणूनबुजुन कसूर करून एका तस्कराला फरार करणाऱ्यांना समोर आणले पाहिजे, अशीही चर्चा उघडपणे होत आहे.


श्रीरामपूर (प्रतिनीधी) दि. ०२/०३/२०१८ रोजी १७/०० वा.सुमारास हुसैननगर फकिरवाडा श्रीरामपुर येथे जागेच्या वादातुन आम्हाला जागा घ्यायची होती ती तुम्ही का घेतली असं म्हणून व आमचे विरुद्ध पोलीस स्टेशनला फिर्याद का दिली असे म्हणुन १० लाख रुपये खंडणी मारगीतली व तलवारीने, लोखंडी गज,लाकडो दांडक्यांनी व चाकुने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करुन मयत साजीद इब्राहीम मिर्झा याचा खुन केला वगैरे फियादी वरुन श्रीरामपुर शहर पोस्टे गु.र.नं. ७३/२०१८ भादविकलम ३०२,३०७, ३८७,४५२,१४३ १४७,१४८,१४९,४२७, १२०(ब), २०१, २१२,२२५ सह आम अँक्ट ४/२५ प्रमाणे दाखल आहे.
सदरचा गुन्हा घडलेपासुन गुन्ह्यातील आरोपी नामे निलेश अशोक शिंदे वय ३५ वर्षे रा. स्वप्ननगरी,वार्ड नं. १, श्रीरामपूर हा स्वत:चे अस्तित्व लपवुन फरार झालेला होता व तो श्रीरामपुर येथे त्याचे घरी येणार असल्याची गोपनीय
माहीती मिळाल्याने स्वप्ननगरी, वॉर्ड नं. १,श्रोरामपुर भागात सापळा लावून शिताफीने ताब्यात घेतले असुन त्यास गुन्ह्यात
अटक केली असुन त्याची पोलीस कस्टडी घेवून तपास करत आहोत. सदरची कारवाई मा.श्री. अखिलेश कुमार सिंह साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. डॉ.दिपाली काळे, अपर
पोलीस अधिक्षक,श्रीरामपुर व मा.श्री.राहुल मदने, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभाग यांचे सुचना व 
मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर शहर पोस्टेचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांचेसह तपास पथकाचे पोहेकों/ जालिंदर लोंढे,
पोकॉ/ महेंद्र पवार, पोकॉ/ अर्जुन पोकळे, पोकॉ/ सुनिल दिघे, पोकॉ/ पंकज गोसावी, पोकों/ किशोर जाधव, पोकॉ/ गणेश
गावडे, पोकॉ/संतोष दरेकर यांनी केली आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget