April 2024

बेलापूरः(प्रतिनिधी  )- येथील खटकाळी गावठाण येथे आपापसातील वादातुन झालेल्या भांडणातुन दहशत माजविण्याचा प्रकार समोर आलाअसुन यात एका  विधवेचे घर पेट्रोल टाकुन जाळण्यात आले तसेच  जाळपोळ,व वाहनांची मोडतोड असा प्रकार घडला.तथापि या घटनेचा बोभाटा झाला असला तरी त्या व्यक्तीच्या आसलेल्या दहशतीमुळे फिर्याद देण्यास कोणीच पुढे धजावत नसले तरी पोलीसांनी  या प्रकरणी फिर्यादी होवुन गावात दहशत माजविणार्याला धडा शिकवावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे                                              याबाबतचा समजलेली हकीकत अशी की ,खटकाळी गावठाण येथे एक विधवा आपल्या तीन मुलासह रहाते तिचे शेजारी आसणाऱ्या सराईत गुन्हेगाराने गोंधळ घालुन तिला शिवीगाळ केली .त्याच्या धाकाने ती श्रीरामपुर येथील नातेवाईकाकडे राहण्यास गेली असता त्या व्यक्तीने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला पेट्रोल टाकुन घरातील सर्व संसारपयोगी सामान पेटवुन दिले तसेच त्या परिसरात दहशत निर्माण  केली त्याच्या दहशतीमुळे अनेक जण घाबरले आहेत. काही दिवसापुर्वी अशाच प्रकारे दहशत करुन काही मोटारसायकली तसेच घरातील सामान पेट्रोल टाकुन जाळले होते त्या बाबत बेलापुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल  आहे . येथे कायम गुन्हेगारांचा वावर असल्यामुळे  लहानमोठ्या तक्रारी होत आहेत .तसेच काही तडीपार गुंडही येथे राजरोसपणे आश्रय घेतात.याचाच परिणाम म्हणून  काल सोमवारी संध्याकाळी पुन्हा एकदा परिसरात दहशत बसविण्यासाठी पेट्रोल टाकुन त्या गरीब विधवेचे संसारपयोगी सामान जाळण्यात आले आहे.                         आज दिवसभर या घटनेची चर्चा होत होती. पोलिसांनी देखील घटनास्थळी भेट दिली परंतु ती विधवा प्रचंड दहशतीखाली आसल्यामुळे तक्रार देण्यास पुढे आली नाही .असे प्रकार पुन्हा पुन्हा होत राहीले तर भविष्यात एखादी गंभीर घटना घडू शकते तरी पोलीसांनी वेळीच दखल घेवुन संबधीतावर कठोर कारवाई करावी अशी परिसरातील नागरीकांची मागणी आहे.

पृथ्वी तलावर आलेल्या प्रत्येकाला या पृथ्वीतलावरून अखेरचा निरोप घ्यायचा असतो. असे असले तरीही या पृथ्वीतलावरील प्रत्येक जण जसा प्रकृतीने भिन्न असतो तसाच तो स्वभावाने देखील भिन्न असतो.प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा असू शकत नाही. हा एक निसर्ग नियम आहे.

आयुष्यात आलेला प्रत्येक जन आपल्या संपूर्ण जीवनात वैविध्यपूर्ण काम करण्याचा प्रयत्न करत असतो.काही व्यक्ती आपल्याला मिळालेल्या सुंदर जीवनाचा सदुपयोग करत जास्तीत जास्त लोकांना कसा उपयोग होईल असा प्रयत्न करतात आणि त्यातूनच सत्कार्य अशा काही मिळालेल्या संधीतून जनसेवा करतात. हीच जनसेवा लोकांच्या हृदयात जागा निर्माण करून जाते. लोकांच्या हृदयात जागा निर्माण केल्यानंतर तीच व्यक्ती जेव्हा निसर्गचक्रानुसार पृथ्वीतलावरून निघून जाते, त्यावेळी हृदय तुटलेल्या व्यक्तींची काय अवस्था असते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तथा श्रीरामपूर नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी रमजानखान चांदखान पठाण होय.

सर्वसाधारणपणे अधिकारी म्हटलं कि त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीसा वेगळा असतो.अगदी अधिकाऱ्यांना हृदय नसते यापासून तर अधिकारी फार करारी असतात इथपर्यंतचे विचार समाजामधून आपल्याला ऐकायला मिळतात. रमजानखान पठाण हे या वाक्यास अपवाद ठरले.त्यांनी त्यांच्या संपूर्ण अधिकारी पदाच्या काळामध्ये किती लोकांना जोडले हे त्यांच्या जाण्याने लोकांनी केलेल्या भावनांतून व्यक्त होते.

रमजान पठाण यांनी कधीही केलेल्या कार्याचे आईने दिलेल्या शिकवणी प्रमाणे एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू दिले नाही. कळू द्यायचे नाही याप्रमाणेच अनेकांना त्यांच्या सेवेमध्ये अडचणींना साथ देत त्यावर आपल्या ज्ञानाने माफ करत अनेकांना अडचणीतून सोडवलेच तर अनेकांना मदतीचा सहकार्याचा हातही दिला.

फक्त एखाद्याची अडचण त्यांच्या कानावर पडण्याचा उशीर कि त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग करत संबंधितास कशाप्रकारे मदत करता येईल याचाच ते सदैव प्रयत्न करत असत.प्रसंगी या जनसेवेच्या काळामध्ये कुटुंबाकडे दुर्लक्ष झाले. मात्र तरीही लोकांना आपल्या मदतीची आवश्यकता आहे आणि आपण ती केलीच पाहिजे याच हेतूने ते सतत कार्यरत असायचे. त्यातूनच त्यांनी आपल्या मूळ श्रीरामपूर गावापुरतेच काम न करता,फक्त जिल्हया पुरते काम न करता राज्यभरामध्ये काम केले.ते कार्यरत असलेले शिक्षण विस्तार अधिकारी हे पद,या पदास एक उंची गाठून देण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला.एकेकाळी शिक्षण विस्तार अधिकारी हे पद फक्त बाहुले म्हणूनच होते अशी सर्वांचे भावना होती. मात्र रमजान पठाण यांनी राज्यात शिक्षण विस्तार अधिकारी संघटना स्थापन केली आणि त्या माध्यमातून मंत्रालय स्तरावरती लढा उभारून एक वेगळ्या प्रकारचे स्थान शिक्षण विस्तार अधिकारी पदाला मिळवून दिले. त्याचमुळे राज्यभर असलेले त्यांचे शिक्षण विस्तार अधिकारी सहकारी मित्र आपल्या मित्राला नेतृत्वाला अलविदा करताना भावना विवश झाल्याचे पाहायला मिळाले.त्यांनी व्यक्त केलेल्या भावना या हृदय पिळवटून टाकणाऱ्या होत्या आणि रमजान पठाण नेमके कसे होते हे या व्यक्त झालेल्या भावनांतून दिसून आले.

नव्याने हजर झालेल्या शिक्षकास आधार देत भविष्यात चांगले काम करण्याची संधी निर्माण असल्याचे सांगत उत्तम दर्जाचे शिक्षण घेऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्या कामी सतत प्रेरणादायी काम पठाण साहेबांनी केले.

संपूर्ण राज्यात प्राथमिक शिक्षकांची संच मान्यता हा कळीचा मुद्दा ठरत असतो.या मुद्द्याला स्पर्श करण्यास बरेचसे अधिकारी टाळाटाळ करतात.मात्र रमजान पठाण यांनी अत्यंत बारकाईने राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करून राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल अशा प्रकारचे काम करून राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले. रमजानभाई यांनी केलेल्या संच मान्यतेस राज्यातील कोणत्याही व्यक्तीने दिलेले आव्हान कोलमडून पडल्याशिवाय राहायचे नाही. म्हणूनच अत्यंत जवळच्या मित्राने याबाबत त्यांचा उल्लेख संच मान्यतेचा बादशहा असा केला.

आपण नगर जिल्हा परिषदेमध्ये उर्दू माध्यमाचे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून काम करत असताना मराठी माध्यमासोबतच उर्दू भाषिक शाळांचा देखील नावलौकिक कसा वाढेल याचा सातत्याने मागील काही वर्षे त्यांनी उत्तम असा प्रयत्न केला.

रमजान पठाण यांनी शैक्षणिक सेवा देत असतानाच समाजासाठीही ते वेळोवेळी पुढे आल्याचे त्यांच्या सामाजिक कार्यातून देखील दिसून येते. त्यात प्रामुख्याने श्रीरामपूर शहरात उभारली गेलेली मिल्लत नगर या भागातील मिल्लत मस्जिद या प्रार्थनास्थळाचा समावेश होतो.

 उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची परीक्षेची आवड निर्माण व्हावी याकरिता पठाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मिशन स्कॉलरशिप योजना राबवता आली याचा आनंद काही औरच होता.पठाण साहेब आपल्यात नाहीत या गोष्टीवर कुणाचाही विश्वास बसत नाही आणि प्रत्येकाला ते आपल्या अवतीभोवतीच आहेत असा सातत्याने भास होतो आहे. मात्र तरी देखील ते आपल्यातून निघून गेलेले आहेत हे वास्तव आहे.तरीही ते विचार रूपात आपल्या सोबत कायम आहेत असे समजून त्यांनी दिलेला विचाराचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे मित्र म्हणून आमचे कर्तव्य असेल आणि हिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांच्याबद्दल खूप काही देण्यासारखे आहे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते कि -

 *बिछडा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गयी*

*एक शख्स सारे शहर को विरान कर गया*


*शकील बागवान*

केंद्रप्रमुख,खडकी केंद्र,

तालुका - अकोले

बेलापुर (प्रतिनिधी  )-बेलापुरात ज्ञानेश्वर ओहोळ यांच्या ऊसाच्या शेतात सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला असुन मयताचे नाव चंदु वायदंडे आहे बेलापुरातील आयोध्या काँलनीच्या पाठीमागे असणाऱ्या ज्ञानेश्वर ओहोळ यांच्या गट नंबर ४६ मधील ऊसाच्या शेतातुन दुर्गंधी येत असल्याचे ओहोळ लक्षात आले .सडलेला उग्र वास कशाचा येतो म्हणून सेवानिवृत्त मंडलाधिकारी जनार्धन ओहोळ हे पहाण्यासाठी गेले असता तेथे सडलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह असल्याचे लक्षात आले त्यांनी तातडीने बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुधीर हापसे यांना कळवीले हापसे आपले सहकारी भारत तमनर तसेच पोलीस पाटील अशोक प्रधान यांना घेवुन घटनास्थळी पोहोचले  ही वार्ता बेलापुरात पसरताच घटनास्थळी नागरीकांनी मोठी गर्दी केली पोलीसांनी पंचनामा करुन प्रेत शवविच्छेदनासाठी रवाना केले पुढील तपास सहाय्यक फौजदार सुधीर हापसे हे करत आहेत या बाबत नागरीकात उलट सुलट चर्चा सुरु असुन चंदु वायदंडे हा आचारी काम करत होता ,त्यामुळे त्याने आत्महत्या केली की या मागे काही वेगळे कारण आहे ? अशी चर्चा सुरु आहे

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर तालुक्याचे आमदार लहु कानडे यांच्या विशेष प्रयत्नातुन श्रीरामपुर बेलापुर  रस्त्याचे चौपदरीकरण झाले असले तरी ठेकेदाराच्या चुकीमुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत तसेच रस्त्याची स्ट्रीट लाईट बंद पडली असल्याने या बाबत चिंता व्यक्त होत आहे.              विकास काय असतो हे आमदार लाहु कानडे यांच्या रुपाने श्रीरामपुर तालुक्याला समजले आमदार कानडे यांच्या विशेष प्रयत्नातुन  श्रीरामपुर बेलापुर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पुर्ण झाले रस्त्यावर लाईट देखील लावण्यात आले परंतु सध्या रसवंती ते गायकवाड वस्तीपर्यतचे लाईट तर कायमच बंद असतात.विजेच्या पोलवर बसविलेल्या निम्म्यापेक्षा जास्त लाईट माळा  बंद अवस्थेत आहेत तसेच रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी गतीरोधक बसविलेले आहे त्यावर रिफ्लेक्टर बसविणे गरजेचे होते रिफ्लेक्टर न बसविल्यामुळे रात्रीच्या वेळेस लवकर गती रोधक लक्षात येत नाही त्यामुळे अपघातचे प्रमाण वाढत आहे.स्ट्रीट लाईट चे काम निकृष्ट झाले असून स्ट्रीट लाईट बंद आहेत.ज्या ज्या ठिकाणी गतीरोधक बसविलेले आहे. तेथे तात्काळ रिफ्लेक्टर बसविण्यात यावेत श्रीरामपुर ते मोसंबी बागेपर्यत रस्त्याचे काम पुर्ण झालेले आहे परंतु मोसंबी बाग ते बेलापुर पर्यंतचे डांबरीकरणाचे काम अद्यापही अपूर्ण आहे ते काम त्वरीत पुर्ण करण्यात यावे तसेच नादुरुस्त विज जोड दुरुस्त करुन रस्त्यावरील सर्व बंद लाईट पूर्ववत सुरु करण्यात यावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )- संपुर्ण विश्वाला त्याग संयम शिल सदाचार सत्य अहींसा प्रेमाची शिकवण देणारे जैन धर्माचे २४ वे तीर्थकर वर्धमान महावीर यांची जयंती बेलापुरात मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली .          या वेळी भगवान वर्धमान महावीर यांच्या प्रतिमेची  सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणूक झेंडा चौकात आल्यानंतर जि प सदस्य शरद नवले बाजार समीतीचे उपसभापती पत्रकार देविदास देसाई उपसरपंच मुस्ताक शेख एकनाथ उर्फ लहानु नागले आदिंनी भगवान महावीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला बेलापुर ग्रामपंचायत कार्यलयातही भगवान महावीर यांची जयंती साजरी करण्यात आली मिरवणूक जैन स्थानकात आल्यानंतर तेथे भगवान महावीरांच्या जिवनावर नाटीका सादर करण्यात आली या वेळी धार्मिक परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या रश्मी लुंक्कड ,द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंता बाठीया ,व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या सौ कविता सुनिल मुथा यांना सन्मानित करण्यात आले सायंकाळी प्रश्न मंजुषा व भक्ती संध्या कार्यक्रम संपन्न झाला . या वेळी किराणा मर्चंड असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल हिरण, सुवालाल लुंक्कड, संजय बाठीया ,विजय कटारीया,सचिन कोठारी, संदीप देसर्डा, सचिन कोठारी ,अमीत लुंक्कड ,आनंद लुंक्कड ,पारस लुंक्कड ,अजय डाकले, शितल गंगवाल विकी मुथा, रत्नेष बोरा ,योगेश कोठारी ,स्वप्नेश बोरा, शांतीलाल संचेती ,कांतीलाल मुथा तसेच सौ अर्चना कोठारी ,संगीता मुथा मंगलताई चेंगेडीया पदमा ताथेड ज्योती लुंक्कड ,चंद्रकला लुंक्कड ,मंगल लुंक्कड ,कविता मुथा ,पुजा गांधी ,सरला देसर्डा ,हर्षीता कोठारी, मोनाली लुंक्कड ,सोनाली लुंक्कड ,दिपाली कोठारी ,निलम देसर्डा ,राखी संचेती ,निकीता लुंक्कड ,सुवर्णा लुंक्कड ,राखी लुंक्कड आदिसह महीला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

बेलापुर(प्रतिनिधी  ) - एका मेडिकल दुकानात स्टिरॉइड्स,झोपेचे उत्तेजक द्रव्ये असणारी औषधे,गर्भपात कीट, सेक्सुअल आदी औषधांची डाँक्टरांच्या सल्ल्याशिवाय खुलेआम विक्री केली जात असुन डाँक्टर सल्ल्याशिवाय दिल्या जाणाऱ्या औषधामुळे रुग्णाच्या जिवाशी खेळ खेळला जात असल्याचा आरोप बेलापूर डाँक्टर असोसीएशन व मेडिकल असोसएशनच्या वतीने आयोजित पत्रकार परीषदेत करण्यात आला आहे .    

            यावेळी  मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दिपक अनभुले,उपाध्यक्ष डॉ.शैलेश पवार,सचिव डॉ.अनिल भगत,डॉ.रविंद्र गंगवाल,डॉ. भारत काळे,डॉ.मच्छिंद्र निर्मळ,डॉ.आशुतोष जोशी,डॉ.संदीप काळे,डॉ.सुधीर काळे,डॉ.मिलिंद बडधे आदींसह केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारीही उपस्थित होते. सदर मेडिकल मधून कोरोना काळातही डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय बिनधास्त औषध विक्री केली जात असल्याचा आरोपही डाँक्टरांनी केला आहे.त्यावेळीही अन्न औषध विभागाकडे तक्रार केली होती. मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.२०२० पासून आजतागायत जिल्हाधिकारी,अन्न औषध प्रशासन विभाग आयुक्त मुंबई,आरोग्य मंत्रालय यांचेकडे अनेक तक्रारी केल्या. परंतू ठोस कारवाई होत नसल्याचे गौडबंगाल नेमके काय आहे? अशीही शंका मेडिकल असोसिएशन कडून व्यक्त करण्यात आली आहे.सदर मेडिकल मधून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व चिठ्ठीशिवाय तसेच रुग्णांना कोणतेही बिल न देता दिली जाणारी औषधे आज जरी स्वस्त वाटत असली तरी भविष्यात रुग्णासाठी ते घातक ठरू शकतात. घातक स्टिरॉइड मुळे रुग्णांचे रक्त जळते,प्रतिकार शक्ती कमी होते,शरीर फुगते या औषधांची सवय झाल्याने काही दिवसानंतर इतर कोणतेही औषध लागू होत नाही.एवढेच नाही तर मासिक पाळी येऊ नये म्हणून गोळ्या देणे,सेक्स वाढवणारी घातक औषधे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय राजरोसपणे विकली जात आहेत.याबाबत सदर मेडिकल दुकानावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

            दरम्यान मेडिकल असोसिएशनने तक्रार केल्यावर अहमदनगर अन्न औषध विभागाचे सहायक आयुक्तांनी २५ नोव्हेंबर २०२० रोजी सबंधित मेडीकलची तपासणी करून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.त्यानंतर २३ मे २०२२ ते ६ जून २०२२ या १५ दिवसांसाठी परवाना रद्द करण्यात आला होता.मात्र त्या नंतरही असाच प्रकार सुरू राहिल्याने अन्न औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मेतकर यांनी ६ मे २०२४ पासून सदर मेडिकलचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याचे आदेश ३० जानेवारी २०२४ रोजी दिल्याचे सांगितले आहे.या बाबत मेडिकल असोसिएशनने तक्रार केली म्हणून संबधीतांनी काही डॉक्टरांना दमबाजी करणे, भिती दाखवण्याचे प्रकारही केल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला आहे.डाँक्टरांच्या सल्ल्याशिवाय चुकीची तसेच जास्त पाँवरची औषधे दिल्यामुळे रुग्णांना तात्पुरता दिलासा मिळतो परंतु काही दिवसानंतर त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.त्यामुळे अशी आरोग्यावर परिणाम करणारी औषधे डाँक्टरांच्या सल्ल्याशिवाय विकणाऱ्या मेडीकल दुकानावर कारवाई करण्याची मागणी असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे .तसेच डाँक्टर व मेडीकल असोसिएशनच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजीत दादा पवार तसेच आरोग्यमंत्री, महसुल मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हापोलीस प्रमुख, प्रांताधिकारी श्रीरामपुर, तहसीलदार श्रीरामपुर, श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन आदिंनाही निवेदन पाठविण्यात आल्याचे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-अहमदनगर जिल्हा परिषदेचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तसेच शिक्षक बँकेचे मांजी चेअरमन, पत्रकार सलीमखान पठाण   तसेच अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा सचिव रज्जाक पठाण यांचे जेष्ठ बंधु रमजान खान चाँदखान पठाण यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांचा अंत्यविधी रविवार दिनांक  २१ एप्रिल रोजी सकाळी दहा होणार असुन अंत्ययात्रा गार्डन रेसिडेंसी फातीमा हौसींग सोसायटी येथुन निघणार आहे*

बेलापूर :(प्रतिनिधी  )- तालुक्यातील बेलापूर येथून लोणीकडे जाणारा भरगच्च भरलेल्या उसाचा ट्रॅक्टरचे जुगाड ऐन कोल्हार चौकात पलटी झाल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.या दुर्घटनेत रस्त्याच्या कडेला मांसाहारी विक्री करणारा विक्रेता बालबाल बचावला                       शनिवारी दुपारी ( दि.२०) साडेचार वाजेच्या सुमाराला हि घटना घडली.उसाचा ट्रॅक्टर ऐन चढावर आल्याने पलटी झाला.लोणीच्या दिशेने निघालेल्या ट्रॅक्टर जुगाड ओव्हरलोड असल्याने कोल्हार रस्त्याच्या कडेला बसलेल्या 

मासांहारी विक्री करणाऱ्या दुकानावरच कोसळले.नशीब बलवत्तर

म्हणून तो विक्रेता थोड्क्यात बचावला आहे.ऊसाचा ट्रक्टर पलटी होताच दुकानदार दबला गेला असेल अशा शंकेने अनेकांनी त्याला वाचविण्यासाठी धाव घेतली.परतु त्याला काही दुखापत झाली नाही. सामानाचे व मांसाहारी विक्री करणाऱ्या दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले होते. त्या वेळी नागरिकांनी  मोठी गर्दी

केली होती. एकाच ट्रँक्टरला दोन ऊसाच्या भरलेल्या ट्राँल्या जोडल्या जातात त्याही अवस्थेत चालक भरधाव वेगाने ट्रँक्टर चालवत असतात शिवाय ट्रँक्टरवर मोठ्या आवाजात गाणे लावलेले असते .त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे शिवाय शेतकऱ्याचेही नुकसान होत आहे शिवाय चालकही १८ वर्षाच्या आतीलच असतो या सर्व बाबींची प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दखल घ्यावी आशी नागरीकांची मागणी आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीती बरखास्तीला मा. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे स्थगीती मिळाली असुन मा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती घुगे व न्यायमूर्ती जोशी यांनी जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेल्या ४५ (१ )च्या नोटीशीच्या कारवाई विरोधात संरक्षण दिले आहे .         जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना ४५ ( १)ची नोटीस बजावली होती या नोटीस विरोधात बाजार समीतीचे सभापती सुधीर नवलेसह १२ संचालकांनी मा. उच्च न्यायालयात पिटीशन क्रमांक २९५० /२०२४ दाखल केले होते या दाव्याची सुनावणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर व्ही घुगे व न्यायमूर्ती आर एम जोशी यांच्यासमोर झाली,दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकुन घेतल्यानंतर न्यायमूर्ती घुगे व न्यायमूर्ती जोशी यांनी ४५ ( १ )ची कारवाई झाल्यास १५ दिवसाचे संरक्षण दिले असुन ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे मान्या केले दुसरे अपील बाजार समितीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी दाखल केले होते त्यात त्यांनी म्हटले होते की समीतीला ४० अ  ब खाली बेकायदेशिर नोटीसा दिलेल्या आहेत .बाजार समितीचे आर्थिक वर्ष संपलेले नाही .समीतीचे नफा तोटा पत्रक तयार नाही बाजार समीतीची दोन वेळेस चौकशी झाली परंतु कुठलाच गंभीर दोष आढळून आलेला नाही त्यामुळे दिलेली नोटीस ही बेकायदेशीर आसल्याचे अँड महेश देशमुख व अँड राहुल कर्पे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकुन घेतल्यानंतर न्यायमूर्ती एस जी मेहेरे यांनी जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले.वादीचे वकील आँड राहुल कर्पे यांनी सांगितले की न्यायमूर्ती  मेहेरे यांनी संचालक मंडळ हे लोकनियुक्त संचालक मंडळ असुन त्यांना संरक्षण मागण्याचा पुर्ण अधीकार असल्याचे म्हटले असल्याचे सांगितले न्यायालयाच्या या आदेशामुळे श्रीरामपुर कृषी बाजार समीती जैसे थे राहणार आहे    (बाजार समीतीला एक वर्ष पुर्ण झाले नाही तरी सात महीन्यात दोनदा चौकशी केली कुठल्याही विकास कामांना परवानगी न देता विरोधकांनी अडथळे आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु संचालक मंडळाच्या चोख कामामुळै बाजार समीतीला ५०लाख रुपये वाढीव उत्पन्न मिळाले चार कोटी पन्नास लाखाच्या पावत्या झाल्या हे संस्थेच्या इतिहासात प्रथमच घडले आहे न्यायालयाचा निकाल हा विरोधकांनी केलेल्या खोट्या तक्रारीला चपराक आहे .. सुधीर नवले सभापती कृषी उत्पन्न बाजार समीती श्रीरामपुर

श्रीरामपूर प्रतिनिधी-चादर मिरवणूक ही हजरत सैलानी बाबा दरबार वॉर्ड नंबर 3 श्रीरामपूर या ठिकाणाहून ढोल ताशे नगारे तसेच सटाणा येथील म्युझिकल बँड वाद्यासह दरवर्षाप्रमाणे याही वर्षी भगतसिंग चौक मेन रोड मार्गे जात असताना श्रीराम मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी तसेच श्रीराम मंदिर उत्सव कमिटी यांनी देखील हजरत सैलानी बाबा यांच्या संदल चादर मिरवणूकीला भेट देऊन हिंदू मुस्लिम राम रहीम या सर्व गोष्टींचा शहरातील लोकांना श्रीरामपुराची जुनी परंपरा देखील दाखवून दिली


हजरत सैलानी बाबा दरबार  उर्स कमिटी यांच्या वतीने श्रीरामपुरातील श्री राम मंदिर चौक या ठिकाणी श्रीरामांचा रामनवमीनिमित्त हरिपाठ चालू असल्याने उर्स कमिटीचे अध्यक्ष कृष्णा धुवावीया व ट्रस्टचे अध्यक्ष असलम बिनसाद तसेच कायदेशीर सल्लागार अजित डोखे यांनी मंदिराचे पावित्र्य राखत सदर श्रीराम मंदिर परिसरामध्ये ढोल ताशे नगारे तसेच म्युझिकल बँड बंद करून मिरवणूक शांतपणे गांधी चौकापर्यंत घेऊन गेलेत गांधी पुतळा पोलीस स्टेशन समोरून छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवाजी रोड मार्गे गिरमे चौक व हजरत सैलानी बाबा दरबार या ठिकाणी चादर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला

संदल शरीफ हजरत सैलानी बाबा दरबार या ठिकाणी दहा वाजता सर्व विधिवत सलाम दुवा पूजा करून बाबांच्या दर्गा मजांवर चढविण्यात आला

मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून सुव्यवस्थितपणे तसेच शिस्तबद्ध होण्यासाठी हजरत सैलानी बाबा उर्स कमिटीचे सर्व सदस्य सभासद तसेच भाविक भक्तगण शहरातील सुजाण नागरिक शहराची शान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणारे पोलीस प्रशासन अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लू बरमे पोलीस उप विभागीय अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे व श्रीरामपूर शहराचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-महामानव डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांनांं वह्या वाटप करुन साजरी केली जयंती.बेलापुर झेंडा चौकात दोन ठिकाणी, बेलापुर ग्रामपंचायत, नगररोड मित्र मंडळ ,बेलापुर विविध कार्यकारी संस्था, खटकाळी गावठाण आदि ठिकाणी डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले .  बेलापुरातील राजवाडा येथुन डाँक्टर बाबासाहेब आंबेकरांच्या पुतळ्याची  वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक झेंडा चौकात आल्यानंतर तहसीलदार मिलींद वाघ यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले या वेळी जि प शाळेतील विद्यार्थ्यांना २००० वह्याचे वाटप करण्यात आले या वेळी तहासीलदार वाघ यांनी रमेश अमोलीक मित्र मंडळाच्या वतीने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले .या वेळी बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले मा.सरपंच भरत साळूंके रविंद्र खटोड डाँक्टर चेतन लोखंडे देविदास देसाई  अल्ताफ शेख मयुर खरात सागर साळवे सनी खरात प्रतिक आमोलीक रोनल अमोलीक अलिशा अमोलीक विजु भिंगारदिवे विजय अमोलीक किरण गायकवाड हरिष दाणी अनिता खरात प्रभावती अमोलीक सिमा तेलोरे आदिसह महिला पुरुष सहभागी झाले होते ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक यांनी आभार मानले झेंडा चौकात तसेच बेलापुर ग्रामपंचायत कार्यालयात जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे सरपंच स्वाती अमोलीक उपसरपंच  मुस्ताक शेख हाजी इस्माईल शेख,जालिंदर कुऱ्हे, भाऊसाहेब कुताळ, सुधाकर खंडागळे एकनाथ नागले देविदास देसाई, प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे,सुहास शेलार बंटी शेलार भरत साळूंके, सुभाष अमोलिक,भाऊसाहेब तेलोरे, सागर खरात,सचिन अमोलिक, रावसाहेब अमोलिक, विनायक जगताप, महेश कुऱ्हे, विशाल आंबेकर,प्रल्हाद अमोलिक, शशिकांत तेलोरे, बाळासाहेब शेलार,आजीज शेख जाकीर शेख  संजय भोंडगे,सोमनाथ जावरे, ज्ञानेश्वर जाधव, राजेंद्र तेलोरे,मुस्ताक आतार,बाबुराव पवार, सुधीर तेलोरे,आदिंनी डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेत बाजार समितीचे सभापती सुधीर नवले पोलीस पाटील अशोक प्रधान व्हा चेअरमन विश्वनाथ गवते अनिल नाईक गोरक्षनाथ कुर्हे भाऊसाहेब वाबळे अरुण अमोलीक प्रकाश कुर्हे विजय खंडागळे अयाजअली सय्यद चंद्रकांत नाईक उपस्थित  होते नगर रोड मित्र मंडळाच्या वतीने शरद नवले अभिषेक खंडागळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हवालदार बाळासाहेब कोळपे काँन्स्टेबल संपत बडे नंदकिशोर लोखंडे  भारत तमनर ज्ञानेश्वर वाघमोडे सुनिल मुथा देविदास देसाई पुरुषोत्तम भराटे राहुल माळवदे सावकार अमोलीक  शुभम पारखे दिनेश सकट सनी बनसोडे शुभम दांडगे आदिच्या उपस्थितीत माहामानव डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली

महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा सचिव व राजनीती समाचार न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले समाजसेवक देवळाली प्रवरा येथील श्री इब्राहिम फत्तुभाई शेख यांची राष्ट्रीय अध्यक्ष शेख बरकत अली,एडवोकेट विलासराव पठारे प्रदेशाध्यक्ष, मधुकरराव थोरात राष्ट्रीय सचिव पत्रकार,उस्मान भाई शेख प्रदेश उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन बहुजन फोर्स या संघटनेच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या निवडीचे नियुक्तीपत्र राष्ट्रीय अध्यक्ष शेख बरकत अली यांच्या हस्ते इब्राहिम शेख यांना प्रदान करण्यात आले

इब्राहिम शेख यांच्या या निवडीबद्दल संघटनेच्या वतीने एडवोकेट विलासराव पठारे, मधुकरराव थोरात, अरुण त्रिभुवन, सलीम पठाण, रोहिदास थोरात, उस्मान भाई शेख, सुखदेव केदारे, अमीर भाई जहागीरदार, अकील हाजी सुन्ना भाई, राजू भाई आर शेख, राजू भाई के शेख, असलम बिनसाद, अकबर भाई शेख, रवींद्र जगताप, राहुल कोळगे,  अमीर बेग, कचरू लोहकरे, मन्सूर भाई शेख, विजय खरात, सज्जाद अन्सारी, प्रकाश मालोकर, माधव सोळशे, एजाज भाई सय्यद, मुसा भाई सय्यद, अस्लम भाई सय्यद, राजेंद्र सूर्यवंशी, हमद भाई शेख, रसूल सय्यद, सखाराम पगार, सूर्यकांत गोसावी, शब्बीर भाई कुरेशी, लालू भाई सय्यद, अशोक भिंगारे, सौ बानोबी शेख रेशमा शेख, सौ सविता भालेराव, सौ रुबीना रफिक शेख, आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - श्रीरामपूरच्या हजरत सय्यद बाबा उरूस व रामनवमी यात्रोत्सवाची या वर्षाची सुरुवात करणारा शुभारंभाचा कार्यक्रम बहारदार असा अखिल भारतीय कौमी एकता मुशायरा (कवि संमेलन) उद्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी 14 एप्रिल रोजी रात्री आठ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती मुशायरा कमेटीचे संस्थापक व संयोजक सलीमखान पठाण यांनी दिली.मुशायऱ्याचे उद्घाटन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

 तेवीस वर्षांपूर्वी शहराच्या यात्रोत्सवाला जोडून मुशायरा कार्यक्रम सुरू करण्यात आला असून कोरोना काळ वगळता उद्या होणारा हा अठरावा कार्यक्रम आहे असे ही त्यांनी सांगितले.

उद्या होणाऱ्या अखिल भारतीय मुशायरा व कवी संमेलनामध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उर्दू शायर अबरार काशीफ तसेच मराठीचे जांगडगुत्ता फेम सुप्रसिद्ध कवी मिर्झा एक्सप्रेस यांचे सह आंतरराष्ट्रीय हास्य कवी राहत हरारत (तामिळनाडू),सुप्रसिद्ध उर्दू शायर कमर एजाज (औरंगाबाद),झहीर अख्तर (बहाणपूर),

इर्शाद अंजूम (अनाऊन्सर),हिंदी कवी

कपिल जैन (यवतमाळ),

हास्य कवी इब्राहीम सागर (धुलिया),

रोबोट मालेगावी तसेच

इर्शाद वसीम (नासिक) व शाकिर अहमद शाकिर (जामखेड) हे नामवंत कवी व शायर उपस्थित राहणार असल्याची माहिती मुशायरा कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद रफीक शेख यांनी दिली.

गेली अनेक वर्षे हा कार्यक्रम सय्यद बाबा दर्गा समोरील मैदानावर घेतला जात होता.परंतु तेथे रेल्वे खात्याचे बांधकाम झाल्याने जागा नसल्याने यावर्षी हा कार्यक्रम रेल्वे स्टेशन समोरील बॅरिस्टर रामराव आदिक पुतळा समोर असलेल्या मैदानात घेण्यात येणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष व सय्यद बाबा उरूस कमिटीचे अध्यक्ष मुन्ना पठाण यांनी दिली.

सय्यद बाबा उरूस व रामनवमी यात्रेनिमित्त होणारा हा मुशायरा कार्यक्रम खूपच लोकप्रिय असून या कार्यक्रमासाठी आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अनेक शायर व कवी यांनी श्रीरामपूरात उपस्थिती लावली आहे. अबरार काशिफ यांच्या रूपाने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध उर्दू शायर यांना ऐकण्याची संधी श्रीरामपूरकरांना प्राप्त झाली असून काव्य रसिक व मुशायरा प्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुशायरा कमिटीचे कार्याध्यक्ष संजय जोशी यांनी केले आहे.

श्रीरामपूर शहराचा जातीय सलोखा व शहरवासीयांचे एकमेकांशी असलेले स्नेहबंध दृढ करण्यासाठी कौमी एकता मुशायरा हा कार्यक्रम महत्त्वाची भूमिका पार पाडीत असतो. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सर्वपक्षीय व सर्व धर्मीय नेते,कार्यकर्ते,नागरिक यांचा सहभाग हा उल्लेखनीय आहे.

श्रीरामपूरची शान वाढविणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी एक पर्वणी आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुशायरा कमेटीचे संघटक मुनीर शेख यांनी केले आहे.


उद्या होणाऱ्या या मुशायरा व कवी संमेलनास सर्व काव्य व शायरी प्रेमी रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुशायरा कमेटीचे संस्थापक व संयोजक सलीमखान पठाण,अध्यक्ष मोहम्मद रफिक शेख,

स्वागताध्यक्ष मुन्नाभाई पठाण,कार्याध्यक्ष संजय जोशी,संघटक मुनीर भाई शेख,उपाध्यक्ष - डॉ. रविंद्र कुटे,रियाज पठाण,जावेद काझी, शांतीलाल पोरवाल,

मुख्तार मनियार,गणेश मगर,एजाज शेख,

मोहम्मद रफिक (बाबा),

सचिव आसिफ शेख,

सहसचिव सलीम जहागिरदार,खजिनदार

साजीद मिर्झा, सह खजिनदार फिरोज पोपटीया,दर्गाह विश्वस्त

दिलावर पेंटर,सदस्य - सौ.रंजनाताई पाटील, रविंद्र गुलाटी,राजेश अलघ,श्रीनिवास बिहाणी,हरीश ओबेराय,

अनिल पांडे,ॲड.बाबा शेख,गफ्फार पोपटीया,

इरफान जिवाणी,ॲड. बाबा औताडे,

रज्जाकभाई फिटर,ॲड. कलिम शेख,महाराज कंत्रोड,गुलशन कंत्रोड,

नरेंद्र पाटणी,सुनिल गुप्ता,मंजीत चुग,अशोक गाडेकर,लालमहंमद जहागिरदार, रवि भागवत,मनोज आगे, महेश माळवे,

अशोक उपाध्ये, संजय छत्ल्लारे,भगवान उपाध्ये, सुनिलराव बोलके,अशोक सातुरे,

शाहिद कुरेशी, साजिद खान,पुरुषोत्तम झंवर,

राजेंद्र सोनवणे, प्रताप देवरे,डॉ. निशिकांत चव्हाण,डॉ. ज्ञानेश्वर राहिंज,डॉ. सुनील उंडे,संजय माखीजा,

रज्जाक पठाण,सय्यद फारुक सर,जाकीर सय्यद (सर), अल्ताफ शेख,नजिरभाई शेख,

सत्यनाथ शेळके, राजु दारुवाला,अरुण मंडलिक,मो.बदर शेख, फिरोज शेख,साबिर शेख, बाळासाहेब सरोदे, प्रदिप दळवी,जितू विळस्कर,अभिजीत मुथा,सागर वर्मा,सादिक शिलेदार,फिरोज हमिद खान,जावेद हमीद शेख,लकी सेठी,इज्जू इनामदार,शकील खान, अमरप्रीत सेठी,अण्णा इंगळे,युसुफ शहा,

असलम बिनसाद,जयेश सावंत,मयूर पांडे,

भाऊसाहेब भोसले, शरीफ मेमन,युसूफ लाखाणी आदींनी केले आहे.

कार्यक्रम रात्री बारा वाजेपर्यंत चालणार आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )-एस के सोमय्या प्राथमिक विद्या मंदिर शाळेत ईयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणारा चिरंजीव साईश रामेश्वर ढोकणे याने ध्येय प्रकाशन संचलित आय एम विनर या परीक्षेत २०० पैकी १९८ गुण मिळवुन राज्यात दुसरा क्रमांक मिळवीला.या बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.              तसेच मंथन स्पर्धा परीक्षेत १५० पैकी १३६ गुण मिळवुन राज्यात आठवा तर जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळविला महात्मा फुले प्रज्ञा शोध जिल्हा स्तरीय स्पर्धेत १५० पैकी १३० गुण मिळवुन द्वितीय क्रमांक मिळविला .तर कँमेरेज हाय इंटरनँशनल स्कूल अँण्ड ज्युनिअर काँलेज संचलित कौन बनेगा लिटल इन्स्टेंन या तालुका स्तरीय स्पर्धेत १०० पैकी १०० गुण मिळवुन तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला . साईश ढोकणे हा श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे हवालदार रामेश्वर ढोकणे यांचे चिरंजीव आहेत.त्यास एस के सोमय्या प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका पैठणी मँडम तसेच वर्गशिक्षिका श्रीमती मेघा पवार ,यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले .या वेळी आपले आयडाँल विश्वास नांगरे पाटील असल्याचे चिरंजीव साईश याने बोलुन दाखविले.

श्रीरामपूर प्रतिनिधी:- येसगाव तालुका खुलताबाद तेथील  सामाजिक कार्यकर्ते व विहीर ठेकेदार अली मुंशी शेख यांची महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या सदस्य पदावर निवड करण्यात आली असून राजनीति समाचार वेब चॅनलच्या खुलताबाद प्रतिनिधी पदावर त्यांना नियुक्त करण्यात आले आहे

पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात अली मुंशी शेख यांना पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी नियुक्तीपत्र व ओळखपत्र प्रदान करून निवड केली अली शेख यांच्या या निवडीबद्दल पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बी. के. सौदागर, प्रदेश कार्याध्यक्ष अमीर भाई जहागीरदार, युवक प्रदेशाध्यक्ष संदीप पवार, उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राज महंमद के. शेख, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष एडवोकेट विलासराव पठाडे, मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष अरुण त्रिभुवन, मराठवाडा प्रदेश महासचिव मीर अली सय्यद, महाराष्ट्र प्रदेश महासचिव उस्मान शेख, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विजय खरात, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राज महंमद आर. शेख, इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद शेंडगे, पुणे जिल्हा सचिव अफजलखान, पुणे शहर अध्यक्ष हनीफ भाई तांबोळी, धुळे जिल्हाध्यक्ष रईस हिंदुस्तानी, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रियाज खान पठाण, महाड जिल्हाध्यक्ष मुदस्सीर पटेल, नासिक जिल्हाध्यक्ष सुखदेव केदारे, यांच्यासह पत्रकार संघाच्या सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर - मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण असलेली ईद-उल-फितर अर्थात रमजान ईद मोठ्या उत्साहात शहर व परिसरात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरातील ईदगा व जामा मशीद सह शहरातील सर्वच मशीदींमध्ये ईद निमित्त नमाज पठण करण्यात आले .

बुधवारी सायंकाळी चंद्र दर्शन झाल्यानंतर ईदच्या तयारीला वेग आला. रात्री उशिरापर्यंत चौका चौकात व शहरातील दुकानांमध्ये खरेदीसाठी मुस्लिम बंधू-भगिनींची झुंबड उडाली होती. सर्वच मशिदीमधून रात्री लैलतुल जायजा ची विशेष प्रार्थना करण्यात आली.


काल सकाळी नऊ वाजता जामा मशीद मध्ये ईद ची नमाज अदा करण्यात आली. प्रमुख धर्मगुरू मौलाना मोहम्मद इमदाद अली यांचे धार्मिक प्रवचन झाले. मुफ्ती मोहम्मद अतहर हसन यांनी ईदच्या नमाज ची इमामत केली.

ईदगामध्ये दहा वाजता ईद ची नमाज संपन्न झाली.मुफ्ती मोहम्मद रिजवानुल हसन यांचे धार्मिक प्रवचन झाले. शहर काजी मौलाना सय्यद अकबर अली यांनी नमाजची इमामत केली.

याशिवाय शहरातील मक्का मस्जिद, मदिना मस्जिद,गौसिया मस्जीद, मदरसा रहमते आलम, मुसा मस्जिद, गरीब नवाज मस्जिद, जैनब मस्जिद सह अनेक मशीदींमधून ईद ची नमाज अदा करण्यात आली .

जामा मस्जिद व ईदगामध्ये मुस्लिम बांधवांना ईद मुबारक च्या शुभेच्छा देण्यासाठी तालुक्याचे आमदार लहुजी कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, माजी नगराध्यक्ष संजय फंड,माजी उपनगराध्यक्ष करण ससाने, शिवसेना नेते संजय छल्लारे,अशोक थोरे मामा,काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, हेमंत ओगले, अशोक उपाध्ये, जयंत चौधरी,माऊली मुरकुटे, अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अशोक नाना कानडे, महेंद्र त्रिभुवन, अशोक बागुल, डॉक्टर रवींद्र कुटे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लकी सेठी, दिलीप नागरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजीत लिपटे, डॉक्टर दिलीप शिरसाट,नितीन गवारे, रवी भांबरे, कैलास बोर्डे, प्रसन्ना शेटे, अविनाश पोहेकर, संजय फरगडे, संदीप चोरगे, तेजस बोरावके,विजय खाजेकर, सुभाष त्रिभुवन, मिलिंदकुमार साळवे,अशोक भोसले, डॉक्टर संजय साळवे, सत्यनाथ शेळके,नितीन गवारे,अरुण मंडलिक, गोरख कंदलकर, दीपक कदम, प्रवीण जमदाडे,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अर्चना पानसरे,सोनल मुथा आदिसह विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

ईदगामध्ये आमदार लहुजी कानडे यांनी आपल्या आमदारकीच्या काळात मुस्लिम समाजासाठी केलेल्या कामाची यादी वाचून दाखवली तर एडवोकेट जयंत चौधरी यांनी ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक अविनाश आदिक व अनुराधा आदिक यांनी मुस्लिम समाजासाठी केलेले काम मुस्लिम समाजाला ज्ञात आहे असे सांगितले.

जामा मशीद मध्ये नगरसेवक मुख्तार शहा, डॉक्टर राज शेख, रज्जाक पठाण, जावेद शेख, मोहसीन बागवान, तनवीर रजा यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर इदगाह मध्ये कमिटीचे अध्यक्ष मुजफ्फर शेख,जिकर मेमन, गफार पोपटिया, याकुब बागवान, अश्फाक शेख व इतर मान्यवरांनी स्वागत केले.

येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने देशाचे भले करणाऱ्या पक्षाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन नगरसेवक मुजफ्फर शेख यांनी याप्रसंगी केले.ईदच्या नमाज नंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.तहसीलदार वाघ तसेच पोलीस उपअधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक मिलिंद देशमुख यांच्यासह पोलिस विभागाने यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.शांततेत ईद संपन्न झाली.

राज्यातील विविध वर्तमानपत्रातून रमजान लेखमालेचे लेखन करून समाज जागृती केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण यांचा जामा मस्जिद मध्ये आमदार लहुजी कानडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बेलापुर (प्रतिनिधी  )-बेलापुरात ईदगाह मैदानावर नमाज पठण करुन मुस्लीम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत रमजान ईद साजरी केली या वेळी हिंदु बांधवांनी देखील रमजान ईदच्या  शुभेच्छा दिल्या . महीनाभर उपवास (रोजा) केल्यानंतर काल चंद्रदर्शन झाले अन मुस्लीम बांधवांनी मोठ्या उत्सहात ईद साजरी केली .ईदगाह मैदानावर सकाळी सर्व मुस्लीम बांधव ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यासाठी  जमा झाले होते. या वेळी मौलाना  मुफ्ती मुर्शिदा रजा यांनी नमाज पठण करुन सर्वांना सुख शांती लाभू दे ,पाऊस वेळेवर व भरपुर पडू दे, रोगराई कमी येवु दे अशी प्रार्थना अल्लातालाकडे केली. या वेळी जि प सदस्य शरद नवले बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले उपसभापती अभिषेक खंडागळे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड,उपसरपंच मुस्ताक शेख,माजी सरपंच भरत साळूंके , प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले, पत्रकार देविदास देसाई ,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,प्रभात कुऱ्हे,गावकरी पटसंस्थेचे संचालक महेश कुऱ्हे,यांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या या वेळी मोहसीन सय्यद यांनी मस्जिद बांधकामासाठी मदतीने अवाहन केले त्यास मुस्लीम बांधवांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या वेळी ग्रामपंचायत सदस्य प्रभात कुर्हे  पत्रकार हाजी शफीक बागवान आदिसह जवळपास दोन ते आडीच हजार मुस्लीम बांधवा उपस्थित होते. कार्यक्रमाचे सर्व नियोजन जामा मस्जिद ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते.बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुधीर हापसे हवालदार बाळासाहेब कोळपे काँन्स्टेबल संपत बडे भारत तमनर नंदकिशोर लोखंडे ज्ञानेश्वर वाघमोडे आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याचे सलग पाचव्या वर्षी पूर्ण महिन्याचे रोजे उपवास करून येथील लताबाई पोपटराव वाघचौरे(औटी मॅडम) यांनी धार्मिक सलोख्याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे त्यांच्या या उपक्रमाचे समाजातील सर्व थरातून स्वागत होत असून त्यांचे अभिनंदन होत आहे.सौ.लताबाई वाघचौरे या नगरपालिका शाळेच्या सेवानिवृत्त पदवीधर शिक्षिका आहेत.आज त्यांचे वय 60 वर्षे आहे. कोरोना काळात 2020 पासून दरवर्षी त्यांनी पवित्र रमजान महिन्याचे महिनाभराचे पूर्ण रोजे करण्यास सुरुवात केली आणि यावर्षी सलग पाचव्या वर्षी हे रोजे पूर्ण केले आहेत.याबाबत बोलताना सौ. वाघचौरे यांनी सांगितले कि रमजान महिन्यात रोजी धरण्याची परंपरा आमच्या कुटुंबात फार पूर्वीपासून आहे.माझी आजी सासू तसेच सासूबाई या सुद्धा रमजानचे रोजे घरीच होत्या सोनगाव येथील जी मशिद आहे तेथे माझे सासरे व सासू यांनी नवस केला होता त्यानंतर त्यांना पाच मुले झाली.त्यानंतर माझ्या सासूबाईंनी हे व्रत चालू ठेवले.त्यांना पाहून मी सुद्धा मला मुलगा झाला तर मी रोजे ठेवीन असा नवस केला.1992 साली मला पुत्रप्राप्ती झाली त्यानंतर मी 1994 पासून रोजी धरण्यास सुरुवात केली. सुरुवातीची 28 वर्षे मी दोन ते दहा पर्यंत रोजी दरवर्षी करीत होते परंतु कोरोना काळात सन 2020 पासून मी पूर्ण महिन्याचे रोजे करण्यास सुरुवात केली आणि आता यावर्षी सलग पाचव्या वर्षी मी रमजान चे पूर्ण महिन्याभराचे रोजे पूर्ण केले आहेत.रोजे पूर्ण केल्याने शरीर शुद्ध होते तसेच वर्षभर प्रसन्न वाटते.मला अस्थम्याचा त्रास होता परंतु रोजचे धरणामुळे तो त्रास सुद्धा गेला.मला चैतन्य वाटते शिवाय देवावर असलेल्या आढळ श्रद्धेमुळे आज वयाच्या साठाव्या वर्षी सुद्धा कडक उन्हाळ्यातही मला कसलाही त्रास झाला नाही.अल्लाह च्या कृपेने दरवर्षी माझी मनोकामना पूर्ण होते. यावर्षी माझ्या सुनबाई डॉक्टर झाल्या तसेच माझ्या मुलाला व मुलीलाही मुलगा झाला.मी खूप आनंदी आहे अल्लाहने सर्वांना आनंदी ठेवावे हीच माझी प्रार्थना आहे.माझ्या या संकल्पपूर्तीमध्ये माझे पती पोपटराव वाकचौरे मुलगा डॉक्टर गणेश सून डॉक्टर रचना यांचे खूप सहकार्य लाभले त्यांनी रोजी धरण्यासाठी मला प्रोत्साहन दिले.या कामे माझे बंधू सलीमखान पठाण यांचे सुद्धा मला मोलाचे मार्गदर्शन मिळाले असेही त्यांनी सांगितले.सौ लताबाई वाघचौरे यांनी रमजानचे रोजे पूर्ण करून हिंदू मुस्लिम तालुक्याचे उत्तम उदाहरण समाजासमोर घालून दिले आहे त्याबद्दल त्यांचे समाजातील सर्व थरातून अभिनंदन होत आहे.

दिनांक ०६/०४/२०२४ रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हा अन्वेषण मोहीम राबवून नांदूर शिवार ता. राहाता येथे हातभट्टी गावठी दारू निर्मिती करणाऱ्या केंद्रावर छापे टाकून अवैध हातभट्टी निर्मिती ठिकाणे नष्ट केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र. २ श्रीरामपूर चे निरीक्षक श्री अनुपकुमार देशमाने यांनी दिली.

सदर कारवाई मध्ये एकूण ०१ गुन्हा नोंद करण्यात आला असून ४१८० ली.कच्चे रसायन व ३०० ली . हातभट्टी गावठी दारू व हातभट्टी गावठी दारू निर्मितीचे लोखंडी व प्लॅस्टिक बॅरल व इतर साहीत्य नष्ट करण्यात आले आहे. सदर मुद्देमालाची एकूण किंमत रु.२,०४,८००/- इतकी आहे सदर कारवाईत एकूण ०१ आरोपी वर मुंबई दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा नोंद कारण्यात आला आहे.

सदरील कारवाई श्री. प्रमोद सोनोने, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर श्री. प्रवीण कुमार तेली उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली श्री अनुपकुमार देशमाने निरीक्षक भरारी पथक क्र. २ श्रीरामपूर, श्री जी. एन. नायकोडी दुय्यम निरीक्षक, श्री एस. एस. पवार दुय्यम निरीक्षक, श्री के. के. शेख सहा. दुय्यम निरीक्षक, श्री एस.डी.साठे सहा. दुय्यम निरीक्षक, श्री. तौसीफ शेख जवान, व महिला जवान श्रीमती एस. आर. फटांगरे, श्री एन.एम. शेख जवान नि वाहन चालक यांनी सहभाग घेतला आहे. अवैध हातभट्टी गावठी दारू निर्मिती व विक्री ठिकाणी व अवैध ढाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती श्री अनुपकुमार देशमाने निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र २ श्रीरामपूर यांनी दिली.

asten

 रमजानुल मुबारक मालिका २०२४ 

इस्लाम समजून घेताना 

रोजा नंबर:-  ३० 

बुधवार दिनांक १०-०४-२०२४ 



!!  रोजा ३० : आत्मचिंतन - अवलोकनातुन ;-   सकारात्मक भविष्यासाठी स्वयंप्रेरणा ..!!


आज लैलतुल जायजा .. अर्थात" जायजा " म्हणजे अवलोकन " आज महीनाभर ठेवलेल्या रोजे( उपवास) चं आपण केलेल्या खडतर प्रवासाचं (अवलोकन) जायजा करणं . खरोखरच इमानेइतबारे केले असेल तर अल्लाह जवळ त्याचं बक्षीसाची मागणी करणं .अपण केलेल्या महिन्याभराच्या कष्टाचं परिक्षण करुन फळ देणं हे त्यांच्या हातात.

       कुठल्याही गोष्टीचे प्रशिक्षण घेणे यासाठी आवश्यक आहे की, त्यात पारंगत व्हावे आणि त्याअनुषंगाने कामे सोपे व्हावीत. आपण मुख्यत्वेकरून पाहतो, शिक्षण, आरोग्य, पोलिस प्रशासन, मिलिट्री, खाजगी संस्थांमध्ये आपल्या कर्मचार्‍यांच्या व्यक्तीमत्वात, कार्यपद्धतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रशिक्षण दिले जाते. यामाध्यमातून सदरच्या उमेदवाराची कार्यक्षमता तपासली जाते, त्याच्यात प्रशिक्षणातून होणार्‍या बदलाचे मूल्यमापन केले जाते आणि त्याची कार्यक्षमता वाढेल या दृष्टीने प्रयत्न केले जाता आणि त्यावरून त्याच्या प्रगतीचे मुल्यमापन केले जाते. 

असेच सर्वांगीण प्रशिक्षण वर्षाकाठी एक महिना ईश्‍वराने श्रद्धावंतांंसाठी रमजानुल मुबारक मध्ये ठेवले आहे. मित्रानों! रमजानमध्ये महिनाभर आम्ही रोजे ठेवले, कुरआन पठण केले, सर्व वाईट गोष्टीं- सवयी- व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवले.  शक्य तितक्या उच्चकोटीच्या नैतिकतेला प्राधान्य दिले.  मित्रानों,हे काम अजून संपलेले नाही व नसतात देखील व हेच कार्य आम्हाला पुढील 11 अकरा महिने अमंलात आणायचे आहे.  इमान, नमाज, रोजा, जकात आणि हज या इस्लामच्या मुलभूत पाच तत्वांपैकी आम्ही चार तत्वांना रमजामध्ये मजबूत करण्याचा प्रयत्न करण्याचा कसोशीने प्रयत्न केला . आपल्याला सत्यावर चालणारे आणि वाईटांपासून इतरांनाही दूर करणारे शिलेदार बनायचे आहे.   कुरआनमध्ये ईमानधारकांबद्दल असे सांगितले आहे की, “आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजाती(च्या कल्याणा)साठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता.”  (सुरह नंबर ३ आ.नं. ११०)

मित्रानों, या आयातीवरून समजते की, श्रद्धावंतांना संपूर्ण मानवकल्यासाठी अस्तित्वात आणले गेले आहेत , 

 रमजानच्या काळातील प्रखर प्रशिक्षणानंतर समजून येते की, आम्हाला ज्या अर्थी उन्हाचे चटके सहन करीत, वाईट गोष्टींपासून दूर राहण्याची कडक तंबी दिली गेली. काही काळापुरते वैध गोष्टींपासून दूर राहण्यास सांगितले गेले. उच्चकोटीचा संयम, धैर्य अंगी बाळगण्याचे मनोबल रमजानमध्ये मिळाले. मित्रानों, हे कठीण प्रशिक्षण ठराविक कालावधीत अर्थात संपूर्ण रमजान महिनाभर संपूर्ण जगात दिले गेले. यानंतर या खडतर प्रशिक्षणाचा उपयोग करून आपल्याला सर्व मानवकल्याणाच्या हिताचे कार्य करायचे आहे. 

                दिव्य कुरआनच्या पुढे काय सांगते  ”हे पैगंबर (स.), आपल्या पालनकर्त्याच्या मार्गाकडे  आमंत्रित करा  मुत्सद्देगिरीने व  उत्तम उपदेशासहित ,  आणि लोकांशी विवाद करा अशा पद्धतीने जी उत्तम असेल. तुमचा पालनकर्ता अधिक उत्तम जाणतो की कोण त्याच्या मार्गापासून भ्रष्ट झाला आहे आणि कोण सरळ मार्गावर आहे.”  ( सुरह नं १६ अल - नहल आ.न. १२५ ).

तुम्ही जर तुमच्या अल्लाहाने सांगितले प्रमाणे या पृथ्वीतलावर मनापासून फक्त अल्लाहच्या इच्छेसाठीच काम करीत राहिले तर नक्कीच त्यांचे चांगले बळ मिळते..पुढे दिव्य कुर आन म्हणते की , ” आणि हे पैगंबर (स.), भलाई आणि दुष्टता एकसमान नाहीत. तुम्ही दुष्टतेचे त्या भलाईद्वारे निरसन करा जी अत्युत्तम असेल. तुम्ही पाहाल की तुमच्याशी ज्याचे शत्रुत्व होते, तो जिवलग मित्र बनला आहे.  (सुरह नंबर ४१ अल - सजजदाह आ.नं.३४ ). 

तुम्ही केलेल्या महीनाभरातील खडतर प्रशिक्षणाचा उपयोग तुम्हाला सर्व समाजातील लोकांना फायदा करण्यासाठी प्रयत्न करीत राहायचे आहे.. त्यांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी, त्यांना वाईट सवयी पासून दुर करण्यासाठी  ,  त्यांना आपल्या प्रपंच चागले चालावा व आपल्या आईवडिलांच्या सेवेसाठी तत्पर राहावेत यासाठी, तुम्हाला तुमच्या सभोवताली असलेल्या सामाजिक समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांच्या हक्कासाठी, प्रत्येक लहानसहान गोष्टींवरून भांडणे होतात ते होणार नाही म्हणून प्रयत्न करण्यासाठी , समता बंधुता अखंडता सुनिश्चित करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणे गरजेचे आहे.

     "बदलते वातावरण आणि आपली भूमिका "

मित्रानों! देशाचे वातावरण दिवसेंदिवस गढूळ केले जात आहे. धर्माच्या नावावर आपआपसांत लोकांना भडकाविले जात आहे. भारतीय संविधानात प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची मुभा आहे. धर्माबाबात कोणावरही जबरदस्ती करता येत नाही. 

    दिव्य कुरआन ही हेच फरमावितो, ”तुमच्यासाठी तुमचा धर्म आहे आणि माझ्यासाठी माझा धर्म.” ( पारा नं ३० सुरह नं. १०९ ,अल- काफीरून आ.नं.१०९)  

   पुन्हा दिव्य कुर आन सांगते की, ”धर्माच्या बाबतीत कोणतीही जोरजबरदस्ती नाही. सत्य असत्यापासून वेगळे केले गेले आहे.”  ( सुरह नं. २ अल - बकराहा आ.नं. २२३ )

 सदरील कुरआनच्या आयातीवरून आम्हाला बोध मिळतो की, धर्मासंबंधी कुठलाही अतिरेक करू नये, कोणावर जबरदस्ती करू नये, संवादाने एकमेकांची भूमिका समजून घ्यावी. शक्य तेवढे एकमेकांना समजून घेणे गरजेचे असते,  वाद विकोपाला जाणार नाहीत याची सतत काळजी घ्यावी. आप आपसात विसंवाद निर्माण होता कामा नयेत , आपल्या बुद्धीच्या क्षमतेने विचार करून मार्गस्थ व्हावे. समेट घडवून आणला पाहिजे.

                        राजकारण करायचेच असेल तर खरोखरच समाज कारण व लोककल्याणासाठी केेले पाहिजे. परंतु, त्या ऐवजी समाजात विषाची बिजे पेरली जात आहेत. अत्यंत घाणेरड्या अवस्थेत आजचे समाजकारण राजकारण गेलेले आहेत,तर त्याला चांगल्या स्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करीत राहिले पाहिजे  व जे चुकीचे चालले आहे ते रोखायची जबाबदारी सर्व समाजातील श्रद्धावंत आणि समाजधुरीणांकडे आहे.  त्यांनी खरोखरच यासाठी कसोशीने प्रयत्न करीत राहिले पाहिजे.. अल्लाहा म्हणतात प्रयत्न करणं तुमचे काम नंतर त्याचं फळ देणं हे माझं काम मी सर्वांचं मन परिवर्तन करणारा जरूर आहे.. प्रयत्न तर करून तर बघा, आजचं राजकीय पक्ष फक्त आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी समाजात विष पसरविण्याचे काम करीत असतात,

विष हे कोणासाठीच अमृत ठरत नाही. मग ते स्लो पॉईजन असो की कडक. आज नाही तर उद्या ते आपला गुण दाखविण्यास सुरूवात करते. 

                   दिव्य कुरआनमध्ये सांगितले आहे की,  

”आता हे अत्याचारी लोक जे काही करीत आहेत अल्लाहला त्यापासून तुम्ही बेसावध समजू नका. अल्लाह तर त्यांना टाळीत आहे, त्या दिवसासाठी जेव्हा अवस्था अशी असेल की डोळे विस्फारले ते विस्फारलेलेच राहतील.  (पारा नं. १३ ,सुरह नं. १४ अल - इब्राहीम  आ.नं. ४२ ). 

             पृथ्वीतलावर सुधारणा करण्यासाठी कुर आन म्हणते‌ की,   ”जेव्हा त्यांना सांगितले जाते की, पृथ्वीवर उपद्रव माजवू नका तेव्हा ते म्हणतात की, ”आम्ही तर सुधारणा करणारे आहोत!” ( सुरह नं. २ अल- बकराह आ.नं.११. ) व हो  ”सावधान! हेच लोक उपद्रवी आहेत, परंतु त्यांना ते कळत नाही. ( सुरह नं.२ अल- बकराह आ. नं. १२ )."

मित्रानों, या कुरआनच्या आयाती ज्या उपद्रव माजविणार्‍यांविरूद्ध आहेत. कोणीही कुठल्याही समाजघटकाचे का असेनात दंगे, उपद्रव माजवू नका आणि जे माजवित आहेत त्यांना रोखा,  आशा उपद्रवी संघटनेत सामील होवू नका.  ईश्‍वराने प्रत्येकाला काही ठराविक वेळ दिली आहे, त्याचा उत्तम फायदा जनकल्याणासाठी करावा.

पुन्हा दिव्य कुर आन सांगते की, “  ज्याने कोणा एकाला ही जीवनदान दिले त्याने जणू काही सर्व मानवजातीला जीवन प्रदान केले.”  (सुरह नं. ५ अल- माईदा आ.नं.32).

या आयातीवरून बोध मिळतो की आपल्या हातून कधीच नाहक व्यक्तीचा खूनच काय, त्याचा हक्क ही मारला जावू नये याची खबरदारी घेतली पाहिजे. 

            कुरआनमध्ये फरमाविले, “काळाची शपथ आहे, मानव वस्तुतः तोट्यात आहे, त्या लोकांखेरीज ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि सत्कर्मे करीत राहिले. आणि एकमेकांना सत्याचा उपदेश आणि संयमाचा आदेश देत राहिले.  ( सुरह १०३ सुरह अल - हश्र आ.नं.१ते ३ ) " .

सर्व श्रध्दावान बंधुंना  विनंती आहे की, त्यांनी दैनंदिन जीवनात दिव्य कुरआन व प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांचं मार्गदर्शन आत्मसात करून समाजात नैतिक बदलासाठी पुढाकार घेऊन सत्कर्माचे काम हाती घ्यावे. लोकांना वाईटापासून रोखावे, जे समाजात उपद्रव माजवत आहेत,  विनाकारण सामान्य माणसांना त्रास देत आहेत, मानवकल्याणाच्या विरूद्ध जाऊन वागत आहेत अशांचा शोध घेऊन संवैधानिक मार्गाने त्याविरूद्ध लढा देण्यासाठी प्रयत्न करावा आणि लोकांमध्ये ईश्‍वरीय मार्गदर्शन पोहोचवावे. हाच रमजाननंतरच्या प्रशिक्षणाचा संदेश.

मित्रानों, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत माणसाने जीवन कसे जगावे, जगण्याची नियमावली कशी असावी,  त्याची आचार-विचार करण्याची पद्धती कशी असावी? कोणाशी कसा संवाद साधावा, त्याचे अध्यात्मिक जीवन कसे असावे, त्याने पारलौकिक जीवनाची तयारी कशी करावी, ऐहिक जीवनात प्रगती करताना कोणती नैतिक मुल्य अंगी बाळगावीत अशा एक ना अनेक मनुष्याच्या जीवनासंबंधी  मार्गदर्शन आपल्या परीने प्रयत्न करीत राहिले पाहिजे...

तरच या संपूर्ण रमजानुल मुबारक खडतर प्रवासाचा व प्रशिक्षणाचं फलीत राहीलं...

अल्लाह सर्वांना सद्बुद्धी देवो हिच अल्लाहच्या जवळ दुआ याचना करतो 

  "  उद्या ईद उल फिजत्र चा दिवस सर्वांना सुखरूप जावो हिच अल्लाह जवळ दुआ याचना करतो "

    ईद मुबारक २०२४ ..



( .मित्रांनो आपल्याला लेख आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर कळवा व आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. प्रतिक्षेत )

 रमजान मुबारक मालिका २०२४ 

इस्लाम समजून घेताना 

रोजा नंबर २९ वा .

मंगळवार दिनांक ०९-०४-२०२४ 



लेखन,:-  डॉ सलीम सिकंदर शेख ,

 बैतुशशिफा हॉस्पिटल ,मिल्लतनगर ,

     श्रीरामपूर 

९२७१६४००१४ 


इस्लाम:-!!  बुरखा - पडदा - हिजाब - समजून घेत -  काळा प्रमाणे वापरणं गरजेचं....!!


                 #  दिव्य कुर आन सांगितले की, " पैगंबर ! आपल्या पत्नींनां , व मुलींना आणि श्रध्दावंत स्त्रियांनाही सांगां , ( सार्वजनिक ठिकाणी वावरताना) की, त्यांनी बाह्य वस्राचा ( Outer Garments,चादर ) भाग आपल्या अंगाभोवती ( अगांवर ) स्वतः वर ( म्हणजे डोक्यावर , अंगावर) टाकून घ्यावा . आशा पेहरावामुळे त्या ( शालीन स्त्रियां म्हणून )ओळखल्या  जातील ,  आणि ( सार्वजनिक ठिकाणी वावरताना) त्यांना काही त्रास होणार नाही.. आणि अल्लाह फार क्षमाशील व दयाळू आहे . ( पारा नंबर २२ वा सुरह  नं . ३३ अल-अहजाब आ.नं. ५९ वी ).


 # तसा महिलांबाबत, निकाह ( विवाह) , तलाक ( घटस्फोट), विधवा, खुला , बुरखा- पडदा - हिजाब  व लग्नानंतर वारसा हक्क व सार्वजनिक ठिकाणी वापर असे बरेच विषय कायमस्वरूपी चर्चेत असतात परंतु इस्लामी मुस्लिम समाजातील काही विषय हे शोशल मेडीयावर  जास्तच चर्चेचे असतात. सर्व विषयांवर खूप काही लिखाण करण्याची गरज असताना परंतु  एका लेखात पुर्ण होवू शकत नाहीत... सविस्तर लिखाण करणे गरजेचे आहे..असो.

       कोणत्या महीलेने काय वस्र परिधान करायचं हे प्रत्येक बघिनींना स्वातंत्र्य दिले आहे व तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.. परंतु इस्लाम मधे प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांच्या काळापासून महीलांनी आपल्या कपड्यांच्या वर एक वस्त्र परिधान करावयास सांगितले आहे त्याला बुरखा - हिजाब - चादर- पडदा -  म्हणतात, असे चादर ओढण्याची सांगितले आहे..त्यात डोक्यावर दुपट्टा ओढनी व संपूर्ण अंगाला चादर ओढणी किंवा शिवन घेतलेल्या बुरखा हिजाब पांघरूण घेणे ...हे दिव्य कुर आन मधील पारा नं. २२ मधील अल - अजहाब सुराह मधे स्पष्ट शब्दांत आलेलं आहे.

महिलांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना वावरताना घालण्याचं सांगितले आहे..१५०० वर्षापुर्वी चा काळ अज्ञानाचा काळ होता त्यावेळी स्त्रिया फक्त भोग विलासी साठी व च अश्लिल कृत्यं व नाच गाणं मनोरंजनाचं साधनं येवढ्या पुरत्याच  मर्यादित जीवन स्त्रियांचं होते.. स्त्रियांकडे वाईट नजरेतुनच बघितले जायचं, आजची परिस्थिती ही शोशल मेडीया व नेटवर्किंग च्या जमाण्यातील आहे .. परिस्थिती खूप गंभीर होत चालली आहे..शोशल मेडीयामुळे लहान लहान मुलांना ही अश्लिल चाळे करताना दिसत आहेत.. बाकीचे सांगणं कठीण आहे.

हे सर्व टाळण्यासाठी  त्या काळातच प्रेषितांच्या मार्फतच अल्लाहा( ईश्वर) नेच बघिंनी महीलांसाठी संरक्षण कवच म्हणून चादर -ओढनी- बुरखा- हिजाब चं संकल्पना सक्तीची सांगितली ..

प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांच्या विविध पत्नी होत्या .. विशेष म्हणजे प्रेषितांनी  बेसहारा -विधवा -पिडीत असलेल्या महीलांबरोबरच लग्न केलीत , ( हा  स्वतंत्र लेखाचा विषय आहे) त्यांना हजरत जैनब , हजरत रूककयया ,हजरत उम्मे कुलसूम , हजरत फातिमा रजी या चार मुली ही होत्यां .तर त्यांनी आपल्या परीवारांसह सर्व सहकारी मित्रांना ही सक्तीचं केले .

            ##   विशेष गोष्ट म्हणजे पुरुषां साठी ही आचारसंहिता लागू  केली होती , अल्लाह दिव्य कुर'आन मधे सांगतात व सक्तीची मनाई केलेली आहे , ते बघू या, प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांच्या द्वारे सांगतात की, " हे  पैगंबर (स्व.) श्रद्धावान ( बंधुंना) पुरुषांना सांगा ,की त्यांनी आपली दृष्टीं ( नजरां) ची जपनूक करावी   ( नजरा खाली ठेवाव्यात ), आणि आपल्या लज्जा स्थांनांचे रक्षण करावेत . असे करणे त्यांच्या साठी शुध्द चारीत्र्याचे  द्योतक ठरेल  , ते ( पुरुष)जे  काही करतात अल्लाहाला त्यांचीं  पुर्ण जाणीव(खबर)आहे." 

 खरं तर या आदेशाचा अर्थ सदैव खाली पाहणं न होता पुरुषांनी स्त्रियां कडे चुकीच्या दृष्टीकोनातून न पाहणे . स्त्रियांच्या गुप्त अंगावर दृष्टी न टाकणं..

म्हणूनच प्रेषित मुहम्मद स्व सल्लम. सांगतात की # चालता फिरताना आपली दृष्टी खाली ठेवून व आपल्या शरिराचे अंग प्रदर्शन पर स्त्रियांना ही होणार नाही याची काळजी पुरुषांना ही घेण्याची सक्ती करण्यात आली आहे.  फक्त स्त्रियांसाठी सक्ती केली नव्हती तर तोच कायदा रुल हा पुरुषांना ही सक्ती चा केला होता.

                  #  प्रेषित मुहम्मद स्व सल्लम. " महिलांनी आपल्या घरात मोकळेपणाने व थाटात वावरावे , नटून थटून सजून आपल्या सौंदर्याचे सर्वत्र प्रदर्शन करून फिरू नयेत , घराबाहेर जाताना डोक्याव चादर घेउन , जो दागिने घातलेली आहे त्या दागिन्यांचां मधुर नाद( खुळ खुळ) आवाज होत असेल तर तो काढुन ठेवावेत .".

         # "घरातील पती, वडील ,भाउ, मुलगा, भाचा , पुतण्या ( यांच्या शी विवाह होत नाही)सोडून ;   ईतर सदस्यांसमोर वावरताना विशेष खबरदारी बाळगावी . साज शृंगार नटने सजने फक्त पतींसाठीच ..घरातील अपत्यजनांसमोर समोर जाताना वावरताना सुध्दा आपल्या वक्षस्थांवर ओढनी-  दुपट्टा पांघरूण अपले संपूर्ण शरीर आच्छादित होईल असे वस्र धारण करावेत " 

# पुरुषांना खास आदेश देण्यात आले आहेत की , " त्यांनी आपल्या आया बहीणींच्यां खोलींत जाताना परवानगी घ्यावी जेणेकरून अचानक तुमच्या घरात प्रवेशाने बेसावध बसलेल्या महीला,बहीणींवर खजिल होण्याची पाळी येणार नाहीत."

 # या सर्वाला परदा बुरखा पध्दत म्हणतात यावर अधिक खुलासा करताना प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांनीं सांगितले की, " स्त्रियांनों ,( महिलांनों ) आपल्या सख्ख्या भावा व वडीलांसमोर जाताना सुध्दा चेहरा हाताचा पंजा ,व घोट्याच्या पर्यंत पाया व्यतिरिक्त संपूर्ण शरीर वस्राने अच्छादित करूनच जावे , पारदर्शक, शरिर प्रदर्शन घडेल  असे कपडे टाळावेत .., तसेच आपल्या घरातील आप्त जनां ( मेहरम) सोडून इतर कोणत्याही नात्याच्या पुरुषासमोर एकांतात बसू नये ' .#

# पैगंबरांनी स्त्रियांना सुगंध अत्तर वगैरे लावून घराबाहेर जाण्याबाबत मनाई केली आहेत , मस्जिदीत महीलांना नमाज अदा करण्यासाठी वेगळ्या जागेची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. एकाच रांगेत स्त्रियांना व पुरुषांना नमाज अदा करण्यास नाकारण्यात आले होते  . त्याकाळात सुध्दा महिलांची संपुर्ण नमाज अदा झाल्यानंतर सर्व महीला मस्जिदी मधून निघून जाई पर्यंत स्वतः प्रेषित मुहम्मद स्व.व त्यांचे पुरुष मित्र आपल्या बसल्या जागेवरून हालत नव्हते.

इस्लाम ने महीलांना संपूर्ण सवलत व सुट देण्यात आल्या आहेत... प्रत्येक गोष्ट ही महीलांसाठी सोयीची व कामाचीच करून ठेवली आहे... महीलांना प्रत्येक क्षेत्रात वाव देण्यासाठी प्रयत्न केले आहे परंतु त्यांच्या चौकटीत राहून.. याला बंदिस्त नाही म्हणू शकत.. (हा मोठा विषय आहे) मतमत्तांततरे कैक पटीने असू शकतात . अगोदर इस्लाम समजून घेत ,त्याचा अभ्यास केला पाहिजे.. असो.

सध्या शोशल मेडीयाच्या जमाण्यात यू ट्यूब व असंख्य बेब सिनेमा व असंख्य सिरीयलस चालू आहेत त्या प्रत्यक्षात त्यामध्ये अजनाते पणे किंवा जाणते पणे अपण नक्कीच काही सांगू शकत नाहीत परंतु एख तरी दृश्य हे अश्लिल असतेच आशा फार थोड्या सिरीयल असू शकतात की त्यामधे अश्लील दृश्य नाहीत.. परंतु बहुतेक सिनेमा मधे , सिरीयलस मधे जाहीराती मधे महिलांचां वापर करून कमी कपड्यात  अंग  प्रदर्शन  केले जात  आहे.. कमी व फिट्ट व पारदर्शक कपड्यात स्त्रियांना दाखवले जातात त्यामुळे लहान लहान मुलां वर परीणाम होउन लहान मुले ही अश्लील दृश्यांची बळी पडून नको ते कृत्य करुन राहीलेत . त्यांच्या बालमनावर  मानसिक परिणाम होउन चुकीचे कृत्य करू राहिले त त्यामुळे  नकळत पणे नराधमांच्या संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत. यासाठी ओढणी पडदा- बुरखा -हिजाब ही काळाची गरज बनत चालली आहेत.

       .हा प्रश्न फक्त एका  समाजापुरताच मर्यादित  राहिला नाही, तर हा प्रश्न सर्वसामान्य समाजातील लोकांना भेडसावत आहेत..मुली  सर्वांना असतात , सर्वांच्या मुली  लाडक्याच असतात..आपल्या मुलीं या सुरक्षित राहावेत असे प्रत्येक पालकांची मनोमन इच्छा असते ,   यासाठी सुरक्षित पध्दत  हिजाब -बुरखा - पडदा  किंवा दुसऱ्या भाषेत त्याला काही ही नावे द्यावीत हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे...शोशल मेडीयाच्या जमाण्यात मुलींच्या शिक्षण व संरक्षण होणं गरजेचं आहे..ती स्वतःच्या पायावर उभी राहणं गरजेचं आहे.

प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांचे कथन आहे की ,' अगर घरातील एक महीला शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षीत होतं "  


( मित्रांनो आपल्याला लेख आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा, आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा)

लेखन:- डॉ सलीम सिकंदर शेख ,

बैतुशशिफा हॉस्पिटल मिल्लतनगर 

श्रीरामपूर 🎉 🎉 

🎉  9271640014🎉

बेलापुर (प्रतिनिधी  )-  देशात होणाऱ्या निवडणूका या पारदर्शीपणे व्हाव्यात या उदात्त हेतूने बारा ओळखपत्रांची यादी जाहीर केली.मात्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र मतदाराकडे असल्यास तो मतदान करू शकेल.असे असले तरी बारा पैकी अकरा ओळखपत्र हे बनावट असु शकते असा दावा येथील भाजपाचे जेष्ठ नेते व  सामाजिक कार्यकर्ते सुनिल मुथा यांनी केला आहे.

या बाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात सुनिल मुथा यांनी म्हटले आहे की आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बोगस ओळखपत्रे तयार करण्याचा गोरख धंदा जोरात सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पारदर्शी मतदानाच्या मूळ हेतुलाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे..

या प्रकाराची खातर जमा करण्यासाठी बेलापूर येथील भाजपचे ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते सुनील मुथा यांनी काही प्रतिष्ठित व्यक्तींचे बोगस आधार कार्ड बनवून घेऊन या कृत्याचा पर्दाफाश केला आहे.त्यांनी समाजातील काही जबाबदार व्यक्तींचे बनावट ओळखपत्र कसे तयार होते याचा अनुभव स्वतः घेतला.काही लोक कागदपत्राची पडताळणी न करता बनावट आय डी प्रुप तयार करुन देत असल्याचा आरोप मुथा यांनी केला आहे .

यामुळे मतदान केंद्राच्या ठिकाणी ओळखपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी मजबुत  यंत्रणा असणे अत्यावश्यक बनले आहे. याखेरीज बोगस मतदान टाळणे केवळ अशक्य असल्याची चिंता सुनील मुथा यांनी व्यक्त केली आहे.

या बोगस ओळखपत्रांचा वापर करून एसटी महामंडळालाही दरवर्षी लाखो रुपयांचा चुना लावला जात असल्याचेही बऱ्याच प्रकरणांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे असे बोगस ओळखपत्र वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या मार्फत हे ओळखपत्र बनवणाऱ्यांपर्यंत पोहोचणे सहज शक्य आहे.

तरी निवडणूक आयोगाने सदर बाब गांभीर्याने घेऊन त्याकरीता आवश्यक असलेल्या उपाययोजना तातडीने अंमलात आणाव्यात अशी मागणी सुनील मुथा यांनी प्रसिद्ध दिलेल्या निवेदनात केली आहे.

लोकांनों ! आम्ही तुम्हाला ( सर्वांना) एकच पुरुष व एकाच स्त्री पासून निर्माण केले आहे  ;  मग तुमची राष्ट्रे व वंश ( कबीले,व वंश ) बनविले ,.  जेणेकरून तुम्हाला एकमेकांना ओळखता यावे ( ओळखावे) ;    परंतु अल्लाह जवळ तुमच्या पैकी सर्वात जास्त श्रेष्ठ ( प्रतिष्ठित) तोच असणारं आहे, जो चारित्र्याने श्रेष्ठ असणारा..". ( पवित्र कुरआन पारा नं. २६ , सुराह अल - हुजूरात नं. ४९ ,आ .न. १३ वी. )   

            जागतिक पातळीवरील   "फिफा विश्वचषक स्पर्धा २०२२  " चे आयोजन ,  रविवार  दिनांक २०  नोव्हेंबर २०२२  रोजी  " दोहा- कतार "  येथील  अल- खोर च्या  अल - बायन स्टेडियमवर   उद्घाटन समारंभ संपन्न झाला . यामध्ये अमेरिकेचा  प्रसिद्ध  हॉलिवूड  अभिनेता  मॉर्गन फ्रिमॅन  व फिफा फुटबॉल  विश्वकप चा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर केलेल्या(Ghanim Al miftahi ) घानिम - अल - मुफ्ताह हा कॉउडल - रिग्रेशन सिंद्रोम (Caudal Regression Syndrome)  ज्यांचे स्पायनल कॉर्ड ( मेंदुरजजा)  चा दुर्धर दुर्मिळ आजार झालेला,   अपंगत्वावर मात करून  कुरआन हाफीज व कारी  झालेला  , उद्घाटनप्रसंगी मंचावर येऊन  पवित्र कुरआन मधील वरील आयात (श्लोकाचा ध्वनी)  म्हणून सुरुवात केली गेलीत .

 ते सुद्धा असंख्य देशातील फुटबॉल  खेळणाऱ्या सदस्यांचा  विरोध डावलून,   जगातील सर्वात बडे  ५०० पेक्षा ही जास्त  टी. व्हि. चॅनेलनी २०० देशात लयीव्हि Live telecast) प्रक्षेपण केले. कित्येक कोटी लोकांनी याच देह याचं डोळ्यांनी लाईव्ह शो बघितले.

    

 एवढ्या मोठ्या आतंरराष्ट्रीय प्रक्षेपणात  विरोध डावलून मंचावर पवित्र कुरआण सुराह अल - हुजूरात ची १३ वीच आयात   का ??? म्हणून  सुरुवात केली असेल.??? .

  म्हणुनच या श्लोकाचा अर्थ  समजून घेताना:- 

या आयातीत अखिल मानवजातीला उद्देशून सर्वोच्च अल्लाहने तीन महत्त्वाचे तात्विक विवेचन केले आहेत.  ते सांगतात की, " तुम्हा सर्वांचे मुळ एकच आहेत. एकाच पुरुष व एकाच स्त्री पासून तुमचा वंश  अस्तित्वात आला( निर्माण केले) आहे .  आज जगाच्या पाठीवर जे जे वंश आढळतात ते वास्तविकपणे एकाच आई व वडीलांपासून  त्यांचा प्रारंभ झाला आहेत .त्याच्याच वंशाच्या अनेक शाखा आहेत.(२) परंतु आपल्या मुळ स्वरुपाच्या एकच असताना देखील त्यामधे तुमचे विविध राष्ट्र ( देश ) , विविध जाती , विविध कुळात , विविध कबील्यांत, विविध भावक्यात,  तुम्हाला विभागले जाणे स्वाभाविकच होते . परंतु या स्वाभाविकच विभागात विभागलेल्या कुळं या आधारावर बिलकुलच नव्हते केली की ती  उच्च- निचच, श्रेष्ठ- कनिष्ठ, स्पृश्य- अस्पृश्य , असले भेदभाव मतभेद व्हावेत असे , बिलकुल नव्हतेच केले होते .किंवा एका वंशाने दुसऱ्या वंशावर आपले श्रेष्ठत्व सिद्ध करावे अथवा सत्ता -हुकूमत गाजवावे,  किंवा एका वर्णाच्या लोकांनी दुसऱ्या वर्णाच्या लोकांना तुच्छ,क्षुद्र मानावे  किंवा एका मोठ्या राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर जम, हुकूमत प्रस्थापित करावी ,..

हो , निर्माण करत्याने या एकाच कारणास्तव मानवी समुहानां  राष्ट्र व वंशांच्या स्वरूपात उभारले होते ते फक्त त्याच्या दरम्यान परस्परांत सहकार्य सहकार व ओळखण्याची एक स्वाभाविक रित - खून ( सिंबोल, चिन्ह  )  होती ..(३)  त्यात , माणसं माणसांच्या दरम्यान श्रेष्ठत्व व उच्चतम तेचा आधार जर कोणता असेल तर तो फक्त केवळ उच्च नितीमत्ता व उच्चतम नैतिकतेचा.  ;  जर अल्लाहला जर सर्वात श्रेष्ठ तो असेल ,ज्यांची नैतिक नितीमत्ता उच्च दर्जाची असेल ..तेच अल्लाह ( ईश्वर) ला आवडते...!.

त्या दोहा कतार येथील आंतरराष्ट्रीय फिफा फुटबॉल  विश्वकप २०२२. च्या उद्घाटनप्रसंगी मंचावरून सांगितलेल्या पवित्र कुरआन मधील सुराह अल - हुजूरात च्या १३ व्या आयाती(श्लोका) चा अर्थ सर्व धर्मांच्या लोकांना सर्व जगाला हेच संबोधित करायचे होते की आपण सर्व एकच आहोत ..एकच आहोत ...

परंतु त्यांनी त्या अपंगत्व आलेल्या घानिम अल - मुफ्ताहीचीच निवड केली की अल्लाह ( ईश्वरा) ला  अपंग - धडधाकट - काळे- गोरे सर्व सारखेच  आहेत...

     अर्थात:-" वसुधैव कुटुंबकम "

" The world 🌎🌍 is one family "

हे संस्कृत शब्द आहे ज्यांचां अर्थ संपूर्ण जग एकच कुटुंब आहे.. हिंदी मधे " धरती ही परीवार है '

 " उद्देश हेच होता  -- विश्व व्यापक बंधुत्वाचा  संदेश."

त्या कतार मधील जागतिक फुटबॉल संघटनेचा जगातील सर्वांना एकतेचा अखंड तेचा च संदेश अभिप्रेत असावा...या साठी जगातील सर्वांनी आपापल्या परीने योगदान दिले तर खरोखरच हा विचार मानव कल्याणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक ठरेल ... अल्लाहाला मानवता धर्म कायम राखण्यासाठी उपयुक्त ठरेल असे काम करणाऱ्या लोकांना जरूर पसंत करतात...जो अल्लाह ( परमेश्वर) ला आवडतो तो सर्वांना आवडतो ...

सर्वांनी आपल्या नितीमत्ता व उच्चतम नैतिकतेचा आदर्श निर्माण करून अल्लाह ( ईश्वरा) चे आवडते  , श्रेष्ठ ..व्हावे...


( मित्रांनो लेख काळजीपुर्वक वाचुन आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा , आपल्या मित्रांना नातेवाईकांना पाठवा..)



लेखन:- डॉ सलीम सिकंदर शेख,

बैतुशशिफा हॉस्पिटल -मिल्लतनगर ,

श्रीरामपूर 

 ९२७१६४००१४

बेलापुर  (प्रतिनिधी  )-सर्व सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या बेलापुर खुर्द येथील प्रा. बाबासाहेब शेलार यानी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याची दखल शासनाने घेवुन त्यांना डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार  दिला ही बेलापुरकराच्या नव्हे श्रीरामपुर तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे गौरोद़्गार अरुण पा नाईक यांनी काढले                    सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा  डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रा. बाबासाहेब शेलार  यांना नुकताच प्रदान करण्यात आला. त्याबद्दल प्रा. शेलार  यांचा ग्रामपंचायत बेलापूर विविध सामाजिक संघटना बेलापुर ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला होता .त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन नाईक बोलत होते या वेळी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच  अँड दीपक बारहाते ,  करण दादा ससाने द्वारकनाथ बडधे बापुसाहेब पुजारी प्राचार्य काळूराम बोर्डे विजय शेलार सुभाष त्रीभुवन उपस्थित होते,या वेळी मनोगत व्यक्त करताना प्रा. बाबासाहेब शेलार म्हणाले की मला आतिशय गरीब परिस्थीतून शिक्षण घ्यावे लागले गरीबीचे चटके सहन करतानाच गावातील काही समाज कार्य करणाऱ्या समाजसेवकाशी संपर्क आला अन समाजसेवेचे खुळ डोक्यात शिरले समाजसेवेतुन मिळणाऱ्या  आनंदाचे मोलच होवु शकत नाही .मी कधीच अपेक्षा ठेवुन कुठलेही सामाजिक काम केले नाही आपल्या सर्वाच्या आशिर्वादामुळे मला महामानव डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला हा माझ्या आयुष्यातील सर्वात अनमोल दागीना असुन या पुढेही माझे कार्य असेच सुरु ठेवणार असल्याचे शेलार म्हणाले या वेळी श्री हरिहर केशव गोविंद बन येथील विश्वस्त बापुसाहेब पुजारी पत्रकार देविदास देसाई आलम शेख कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले बाबासाहेब दिघे काँग्रेसचे हेमंत ओगले  द्वारकनाथ बडधे दिपक बारहाते प्राचार्य काळूराम बोर्डे प्रा.सोळसे मुख्याध्यापक ना म साठे संजय शिंदे विजय शेलार सुभाष त्रिभुवन आदिनी मनोगत व्यक्त केले  या वेळी प्रशांत होन  गोरख भगत प्रा. तुकाराम सोळसे  प्राचार्य काळूराम बोरुडे, विश्वनाथ आल्हाट  उत्तमराव शेलार रवि शेलार, विजय शेलार  माजी उपसरपंच शरद पुजारी संदेश विसपुते विलास  भालेराव , मधुकर पुजारी  ना. म. साठे, कार्याध्यक्ष,  बहुजन रयत परिषद  प्रभाकर क्षीरसागर भगवानराव जगताप दादू नेटके  संजय शेलार,दिलीप दायमा आदिसह विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अरुण बोरुडे व संजयकुमार शिंदे यांनी केले.प्रास्ताविक जागृती प्रतिष्ठाणचे सचिव रविंद्र शेलार यांनी केले तर आभार .प्रभाकर क्षिरसागर यांनी मानले

बेलापुर (प्रतिनिधी  )- :बेलापुर व परिसरात शेतकऱ्यांच्या शेतातील विज मोटारीच्या केबल चोरुन त्यातील तांब्याची तार विकणारे दोन व तार विकत घेणारा असे  तीन आरोपी पोलीसांनी ताब्यात घेतले असुन त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे . श्रीरामपुर तालुक्यातील एकलहरे शिवारातील एकलहरे- टिळकनगर रस्त्यांच्या कडेला शेती महामंडळाच्या शेतात भल्या सकाळी केबल चोरट्यांना येथील शेतकऱ्यानी केबल जाळतांना रंगेहाथ पकडले मात्र चोरट्यांनी सदर शेतकऱ्याला दमदाटी देत घटनास्थळावरून पोबारा केला या बाबतची माहीती बेलापुर पोलिसांना समजताच त्यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवीली पोलीसांनी गणेश संतोष आल्हाट यास ताब्यात घेतले पोलीसी खाक्या दाखवताच त्याने आदित्य नामदेव आहेर रा वडजळी भोकर याचे नाव सांगितले पोलीसांनी तातडीने आरोपी आहेर याची माहीती घेवुन त्यास शिताफीने अटक केली.तसेच आणखी काही जण पोलीसांच्या रडारवर असुन एक इसम संशयीत म्हणून ताब्यात घेतला आसल्याची माहीती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.तसेच चोरीची तांब्याची तार विकत घेणारा मुस्ताक याकुब शेख यास देखील ताब्यात घेतले असुन न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी दिली आहे   याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी भल्या सकाळी टिळकनगर-एकलहरे रस्त्याच्या महामंडळाच्या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात काळकुट धुर निघत होता, एकलहरे येथील शेतकरी सदर रस्त्याने आपल्या शेतांत मोटार चालू करण्यासाठी जात असतांना सदर बाब शेतकऱ्याच्या निदर्शनास आली शेतकऱ्याने घटनास्थळी जाऊन बघितले असता,सदर चोरटे लंपास केलेल्या केबली जाळून नष्ट करत त्यामधून कॉपर तार काढून विक्री करण्यासाठी तयार करत होते. सदर शेतकऱ्यानी चोरट्यांना याबाबत हटकले असता, चोरट्यांनी सदर शेतकऱ्याला दमदाटी करत घटनास्थळावरून धूम ठोकली सदर शेतकऱ्यानी लगेचच बेलापूर पोलिसांना याबाबद माहिती देताच बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड सहाय्यक फौजदार सुधीर हापसे हवालदार बाळासाहेब कोळपे पोलीस काँन्स्टेबल संपत बडे भारत तमनर नंदकिशोर लोखंडे ज्ञानेश्वर वाघमोडे यांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी करून आरोपी बाबत माहीती घेतली  पोलीसांनी संशयावरुनआगोदर अल्हाट यास ताब्यात घेतले नंतर आहेर यास ताब्यात घेतले असुन पोलिसांना सदर जागेवरून वीस ते तीस किलो कॉपर तारेचा साठा जाळलेल्या अवस्थेत मिळून आला आहे. एकलहरे ,उक्कलगाव, बेलापूर शिवारातील सातत्याने शेतकऱ्यांचे वीजपंप व केबल चोरीचे प्रकार समोर आले. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे., सदर आरोपीकडून सखोल तपास केल्यास या ताब्याच्या तारा स्वस्तात विकत घेणारा मोठा मासा गळाला लागु शकतो काल सदर घटनेने एकलहरे, बेलापूर, उक्कलगाव येथील शेकडो शेतकऱ्यांनी बेलापूर पोलीस ठाण्यात धाव घेत आपापल्या चोरीला गेलेल्या मोटारी, केबल सह अन्य वस्तु बाबत तक्रार दिल्या आहेत. 


[ एकलहरे, बेलापूर, उक्कलगाव क्षेत्राच्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी रात्र वैऱ्याची ठरत आहे.येथील शेतकऱ्यांचे विद्युत पंप, केबल, स्टार्टरवर चोरटे डल्ला मारीत आहेत. यामुळे रात्री सुरू असलेला पंप सकाळी शाबूत असण्याची खात्री नाही. आमचा हजारोंचा वीजपंप व केबल चोरट्यांनी चोरून नेला आहे. उन्हाची वाढती तीव्रता, पिकांची पाण्याची गरज भागविताना होणारी दमछाक व चोरीची घटना यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोर चोरी करीत आहेत.पोलिसांनी गस्त वाढविण्याबरोबर चोरांच्या मुसक्या आवळणे गरजेचे बनले आहे. - सचिन थोरात, शेतकरी, उक्कलगाव ]

आज २० विसावा रोजा  चालला आहे अर्थात पहिला अशहरा ( विभाग) " रहमत,( 'दये)चे संपलेंत ,  आज  २० रोजा पुर्ण  " मगफीरत '( माफी दैवून कृपादृष्टी )चे (१०- ते २० ) संपूं  राहिलेत , आज संध्याकाळी तिसऱ्या विभाग ( अशहारा ) हा " नरकाग्नितल्या ( जहान्नुम) च्या आगीच्या होणाऱ्या इंधनापसून संरक्षण " वाचण्यासाठी  पुढील दहा दिवस आहे , वेळ दिवस खुप लवकर संपत चाललेली ..आज संध्याकाळीच "लैलतुल -कद्र "  च्या पवित्र रात्रीं ( ज्यांचे पुण्य हे एका रात्रीचं एक हाजार महीन्यांच्यां रात्रीं पेक्षाही अधिक असतं) बरोबरच" एहतेकाफ "संध्याकाळ पासूनच सुरू होणार ,   आज ही अल्लाहच्या कृपेपासून विमुक्त आहोत . याचं महत्त्व आपल्या लक्षात घेतलं पाहिजे .   दुआ याचना करण्याच्या पर्वाचा प्रवास सुरू झाला आहे. 

                 एक ते वीस दिवसांत तुम्हाला तुमच्या व्यस्तते  ,हालगर्जीपणामुळे ,  त्याचं महत्त्व न समजल्यामुळे  अल्लाहा ( ईश्वरा) च्या एवढ्या मोठ्या पर्वाच्या संधीचा फायदा उचलला नाहीत  ,तर तुम्ही दरीद्रीच समजा. " मगफिरत "या पर्वात वर्षांनु वर्षे क्षणा क्षणाला ,कळत नकळत केलेल्या पापांची , चुकांची दुरुस्ती  , चुकांची माफी मागणं व अल्लाह ला पुन्हा पुन्हा या चुकीचं होणार नाहीत यासाठी कृपादृष्टी व्हावीत . याला म्हणतात "मगफिरत ' होणं. संपूर्ण आयुष्यभर श्रद्धांवान बांधव याच आशेवर जगत असतात की परमेश्वर( अल्लाह) ने आमची मगफीरत करावी..हे फक्त परमेश्वराच्याच हातात आहे.

आपण कळत नकळत चुका होतच असतात . एखाद्या शुल्लक चुका ; त्याला साधी लहान चुक समजतो , परंतु ती कोणां दुसऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात नुकसानिची ठरु शकते  हे कधीच आपल्या लक्षात येत नसते , आशा चुक ही आपल्यासाठी नरकातील इंधनासाठी  पुरेशी ठरु शकते.  

पवित्र कुरआन  सांगितले की, " त्या ( कयामत)  दिवशी तुम्हाला वाचवणारा कोणी नसेल , त्या दिवशी स्वतः चे आई-बाबा मुलांना ओळख देणार नाही , बहीण- भावाला , पती -पत्नी ला ,मुलं- आई-बाबांना  ओळख देणार नाहीत . ज्याला त्याला स्वतःचं पडेल. " 

आयुष्यभर केलेल्या  चांगल्या -वाईट कर्मांचां हिशोब द्यावाच लागणार आहे . मग  त्यासाठी आजच तय्यारीला लागा .

तिसऱ्या टप्प्या ( अशराह )ला  २१ ते ३० ला सुरूवाती बरोबरच रमजानुल मुबारक मधील   पवित्र लैलतुल -कद्र च्यां   रात्रीं रोजा२१ , रोजा २३ ,रोजा २५ , रोजा २७- रोजा २९- रोजा ३० वी, या विषम संख्यात्मक " लैलतुल-कद्र " च्या  रात्रीं  असतात ,   या एक रात्र ही एक हजार महीण्यांच्या रात्रींच्यां  पेक्षा ही जास्त पुण्यंचीं फक्त एक  लैलतुल कद्रची  रात्रींचं पुण्यं - सबाब भेटतं.

दिव्य कुरआन मधे सांगितले ,  " आम्ही या( कुरआन ) ला कद्र च्या रात्रीत अवतरले आहे .(१), आणि , तुम्हाला काय माहित ,की, " कद्र " ची रात्र काय आहेत ? म्हणून, (२), कद्र ची रात्र ही हजार महीण्यांपेक्षा ही अधिक  उत्तम आहेत (३),ईशदूत ( फरिशते) आणि रुह (जिब्राईल अलै.) त्यारात्री आपल्या पालनकर्तांच्या आज्ञेनुसार प्रत्येक आदेश घेऊन उतरतात (४),  ती रात्र म्हणजे पुर्णतः " शांती" आहेत व  उष: काळा पर्यंत...(५) ..( दिव्य कुराण ,सुरहा नं. ९७ .अल- कद्र आ.नं. १ ते ५).


त्याच बरोबरच आज २० व्या रोजा च्यां दिवसांपासून ते थेट ३० व्या रोजा पर्यंत १० दिवस सलग अल्लाहच्या याचने नतमस्तक होउन याचना करण्यासाठी बांधंव २४ तास १० दिवस बसतात त्यालाच " एहतेकाफ " ला बसणं.

जगात प्रत्येक मस्जिद मधे या शेवटच्या दहा दिवसांत एक तरी रोजेदार बांधंव बसणं गरजेचे आहे.दहा दिवस अल्लाह च्या भक्तीत बाहेरील जगाशी संपर्क तोडून - जग विसरून,  स्वतःच्या प्रंपाचाला बाजूला ठेवून , फक्त अल्लाहाला संपूर्णतः समर्पण करून- देह भान विसरून अल्लाहचच नामस्मरणात तल्लीन होऊन जाणं ..बस..

     या रात्रीच्या आलेल्या सुवर्ण संधीचा पुरेपूर फायदा उचलून अल्लाहा जवळ सर्वस्वी अर्पण- लिन - तल्लीन होऊन छाती बदडून , रडून -डोळ्यात पाणी आणून , आयुष्य भर केलेल्या चुकांची जाणीव करून उदा. जाणते व  अजाणतेपणी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता व खात्री देउन गरीबांचे ,मजुरांचे , भिकारी, बहीण,भाउ , आई-बाबा , आजी-आजोबा, मित्र मंडळ , गिऱ्हाईक या सर्वांबरोबर कधीतरी  उच्च निच झाले असतील , एखाद्याला  वेडेवाकडे  अपशब्द वापरले गेले असतील , अपमानास्पद भाषेचा वापर झाला असेल, संशयास्पद वागणूक दिली गेली असेल,  कधी घमेंडी आली असेल , " मी " ही जागा झाला असेल, कधी" अहंकार" आला असेल , 

"अहंकार""रावर :- प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम . म्हणतात की, " ज्या व्यक्तींच्या मनात तिळमात्र देखील अहंकार असेल ,तो स्वर्गात जाणार नाहीत, " 

त्यावर त्यांच्या एका मित्र( सहाबी) ने विचारले की चांगले कपडे परिधान करणे, नव्या पादत्राणांचां वापर करणं, हे देखील अहंकारासारखंच आहे का? 

त्यावर प्रेषित मुहम्मद स्व. सल्लमांनी उत्तर दिले," अल्लाह सुंदर आहे आणि त्याला सौंदर्य आवडते, अहंकार हा आहे की तो सत्याला नाकारतो आणि दुसऱ्या लोकांना तुच्छ समजणे " ( हादिस ईब्न मस- उद , मुस्लिम.). कोणत्याही गोष्टीचा अहंकार बाळगू नयेत. आपल्यातल्या " मी "पणा , अहंकार माणसाच्या आयुष्यात खूप गडबड करत असतो तर त्या मी व अहंकाराला बाजूला काढून टाकण्यासाठी अल्लाहच्या दरबारात येउन बाजूला काढण्याचं प्रयत्न करा .

         " , आपल्या व्यस्त जीवनाचा काही वेळ , जितकं वेळ मिळाला तेवढं का होईना वेळ काढून , एकांतात ,एका शांत जागी , निवांत बसून, अल्लाहा जवळ पुर्ण पणे लीन -शरण - समर्पित होउन - अगदी तल्लीन होऊन , निर्विकार पणे , अंतर्मनात दडलेल्या प्रत्येक  प्रत्यक्ष गुन्हेची , दुष्कृत्ये ची , काही घटना  फक्त आपल्यालाच माहीत असतात , आशा केलेल्या  गुन्हे ची माफी मागणं ,   आगदी मनापासून- मनमोकळेपणाने अल्लाहा (परमेश्वरा) बरोबर संवाद साधणं ..जसं  एका  खास मित्राला  मनमोकळेपणाने गप्पा मारतो तशा पध्दतीने अल्लाहा (परमेश्वरा) समोर मनापासून मनमोकळे करणं .याला रिते होणं , फक्त रिते होणे ‌, आत्मक्लेश करणे , आत्मचिंतन करणं ,  पुन्हा पुन्हा अल्लाहा( परमेश्वर )ला सांगणं पुढे कधीच  कोणत्याही परिस्थितीत अशा चुकीचं होणार नाही याची ग्वाही - खात्री देणं . म्हणजेचं मोकळे ,रिते होउन  अल्लाहा ( ईश्वराला) ला   राजी करणं .

आशा गोष्टींमुळे   जेव्हा आपण केलेल्या पापांची - गुन्ह्याची कबुली कुठे  तरी देत असतो  ;  निश्चितपणे माणुष्यात  सकारात्मक बदल घडत असतात . निगेटिव्ह विचार -आचार हळूहळू जावून सकारात्मक पॉझिटिव्ह विचार येतात . प्रत्येक गोष्ट ही सकारात्मक च होत जाते .  हे फक्त  स्वतः  ठरवलं  तर अशक्य काहीच नसतं .   " मी "फार धोकादायक ठरतो ,तो मी च आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरतो . तो " मी' मनापासून गायब झाला तर अहंकार ही नष्ट होऊन मनाची अंतर्मुख होऊन आत्मशुद्धी होते व आत्मविश्वास वाढला जातो .मणुष्य  स्वतः च स्वतः ला कित्येक वर्षे ओळखत नसलेला  या दहा दिवसात ओळखू लागतो याच साठी अंतरात्माला आत्मक्लेश आत्मसमर्पण आत्मसमर्पित करणं गरजेचे असते.

नंतर  निर्विकार -शांत - नितळ  अंतरमन होउन आत्मिक शुध्दी होउन व्यक्तीचा उत्सव वाढतो , चेहऱ्यावर  तेज , आनंद  ,झळकतो .  आपल्या जीवनात एक अल्हाददायक , आनंदी पहाटचं ..

 अल्लाह राजी हुआ समझो...


( मित्रांनो आपल्याला लेख आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा, आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.)


लेखक डॉ सलीम सिकंदर शेख ,

 बैतुशशिफा हॉस्पिटल ,

श्रीरामपूर ९२७१६४००१४.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget