April 2022

अहमदनगर प्रतिनिधी- चेक बाऊन्स प्रकरणात चार गुन्ह्यात शिक्षा झाल्यानंतर फरार झालेला आरोपी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले अटक अटक केलेला इसम नामे विजय मुरली नरवाल , रा . सदर बाजार , पेन्शन लाईन , कंजारवाडा , भिंगार अहमदनगर याने उसनवार घेतलेल्या ३,४८,००० / - रु.या रकमेसाठी दिलेले चेक बाऊन्स झाल्याने सदर इसमा विरुध्द Negotiable Instruments Act १३८ प्रमाणे मा . अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी , अहमदनगर याचे न्यायालयात संक्षिप्त फौजदारी खटला क्र . १ ) ६८८/२०११ , २ ) १५८३/२०११ , ३ ) ३३८२/२०११ , ४ ) ६३७/२०१२ असे चार खटले मा . न्यायालयात चालवुन सदर इसमास खटला क्रमांक १ ) ६८८/२०११ , २ ) १५८३/२०११ , ३ ) ३३८२/२०११ यामध्ये एकत्रितरित्या फिर्यादीस ३,४८,००० / - रु . नुकसान भरपाई देण्याचा आणि नुकसान भरपाई न दिल्यास सहा महिने सक्षम कारावास भोगण्याचा आदेश करण्यात आलेले आहे . इसम नामे विजय मुरली नरवाला याने मा . न्यायालयाचे आदेशाचे पालन न केल्याने न्यायालयाने त्याचे विरुध्द Conviction Warrant काढुन विशेष पथकामार्फत बजावणी करणे बाबतचे आदेश दिले होते . नमुद आदेश प्राप्त होताच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे विशेष पथकाची नेमणुक करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते . नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे मार्गदर्शनाखाली कन्व्हेशन वॉरंट मधील इसमाचा शोध घेत असतांना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली की , इसम नामे विजय मुरली नरवाल हा जामखेड रोड येथे असुन आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे , पोलीस हेडकॉन्स्टेबल फकिर शेख , संदीप घोडके , विश्वास बेरड , दत्तात्रय हिंगडे , संदीप पवार , देवेंद्र शेलार , दिनेश मोरे , पोलीस नाईक शंकर चौधरी पोलीस नाईक दिपक शिंदे अशांनी मिळुन जामखेड रोड , मुठ्ठी चौक येथे जावुन मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत असतांना एक इसम संशयीत रित्या फिरतांना दिसला त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता सुरुवातीस तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यास अधिक विश्वासात घेता त्याने त्याचे नाव विजय मुरली नरवाल , वय ३ ९ , रा . सदर बाजार पेन्शन लाईन , कंजारवाडा , भिंगार कॅम्प असे असल्याचे सांगितले . नमुद कन्व्हेशन वॉरंटमधील आरोपी हाच असलेबाबत खात्री झ आल्याने त्यास ताब्यात घेवुन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे . पुढील कारवाई भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे . सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील  पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . सौरभ कुमार अग्रवाल  अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर व  अनिल कातकाडे  , उपविभागीय पोलीस अधिकारी , नगर शहर विभाग , अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.



अहमदनगर प्रतिनिधी - सोनई येथे राहुल राजळे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील तिसरा आरोपी पकडण्यात आला आहे. ही कारवाई अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. ऋषीकेश शेटे असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक श्रीमती. स्वाती भोर मॅडम व शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, सपोनि गणेश इंगळे, पोसई सोपान गोरे, सफौ भाऊसाहेब काळे, पोहेकॉ दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, दिपक शिंदे, पोकों सागर ससाणे, रोहित येमुल, रणजीत जाधव व चापाहेकॉ उमाकांत गावडे व अर्जुन बडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. २३ एप्रिल २०२२ रोजी आरोपी नितीन शिरसाठ (रा. वांजोळी, ता. नेवासा) व संतोष भिंगारदिवे (रा. घोडेगांव, ता. नेवासा) यांनी आरोपी ऋषीकेश वसंत शेटे

(रा. सोनई, ता. नेवासा) याचे सांगणेवरुन, मागील जुने भांडणाचे कारणावरुन, गैरकायद्याची मंडळी जमवुन भाऊ राहुल जनार्धन राजळे (वय २९, रा. लोहगांव, ता. नेवासा) यास शिवीगाळ, दमदाटी करुन जीवे ठार मारण्याचे उद्देशाने फायरींग व जबर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, या विकास जनार्धन राजळे (वय २७, रा. लोहगांव, ता. नेवासा) यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलिस ठाण्यात गु.र.नं. १२३ / २२ भादविक ३०७, ३२३, ५०४, ५०६, १४७, १४८, ९४९ सह आर्म अॅक्ट ३/२५ व मपोकाक ३७ (१) (३)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्ह्यातील फायरींग करणारा आरोपी नितीन विलास शिरसाठ व त्याचा साथीदार संतोष उत्तम भिंगारदिवे अशा दोघांना ताब्यात घेऊन सोनई पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले होते.या गुन्ह्यातील आरोपी ऋषीकेश शेटे हा गुन्हा केल्यापासून फरार झालेला होता. पण आरोपी ऋषीकेश शेटे हा त्याचे राहते घरी हनुमानवाडी (ता. नेवासा) येथे येणार आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हनुमानवाडी (ता. नेवासा) येथे जाऊन आजुबाजूस सापळा लावून आरोपी शेटे यास शिताफीने ताब्यात घेतले. गुन्ह्याबाबत चौकशी करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कारवाई करीता सोनई पोलीस ठाण्यात हजर केले.गुन्ह्याचा तपास शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्याकडे आहे. त्यांचे कार्यालयातील पोनि विजय क-हे यांनी गुन्ह्याचे तपासात व आरोपी अटकेमध्ये सहकार्य केले आहे. आरोपी ऋषीकेश वसंत शेटे वर या गुन्ह्या व्यतीरिक्त सोनई पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करून जातीवाचक शिवीगाळ, जबरी चोरी करुन जातीवाचक शिवीगाळ व दंगा असे एकूण ४ गुन्हे दाखल असुन दोन गुन्ह्यात तो फरार आहे.



श्रीरामपूर-लेखक डॉ सलीम सिकंदर शेख-पवित्र कुराण सांगितले की , (१)" पृथ्वीवर सुधारणा घडवून आणा , सुधारणा केल्या नंतर कलह , उपद्रव माजवू नका , अल्लाहा चे भय बाळगुन सत्कर्मे करीत राहा , अल्लाहा सत्कर्म करणाऱ्यां बरोबर आहे "( अल-आराफ -५६).

(२) अगर तुमच्या वर कोणी आक्रमक केले ,तर तुम्ही सुद्धात्यांच्यावर अक्रमण करा , परंतु  त्यांनी केले तितकेच , पण मर्यादित , मर्यादांचे उल्लंघन करू नयेत ,  अल्लाहला मर्यादांचे उल्लंघन करणारे पसंद नाहीत .( अल -बकरा अ.नं. ९४,१९०,).

(३) त्यांच्याशी युद्ध करा ,जिथे  कुठे तुमचा त्यांच्याशी सामना होईल.आणि ,त्या ठिकाणांहून त्यांना हाकलून लावा ,जिथून त्यांनी तुम्हाला हाकलून लावले आहेत.(अल- बकराह आ.नं.१९१).

(४) "परवानगी दिली गेली युद्ध करण्याची ,ज्या लोकांवर वर अत्याचार केले गेले आहेत ,कारण ते अत्याचार पीडित आहेत " (सुरह नं.२२ अल- हशर -आ.नं.३९).

     आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ ला रात्री स्वातंत्र्य मिळवून ,देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजींनी लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज उंचावून मानवंदना दिली  , ती रात्र  ,हो ती रात्र  रमजान मुबारक ची लैलतुल -कद्र ची २७ वी रात्र व दिवस शुक्रवार च  व तराविह मधील खत्मुल कुराण ( समाप्ती) ही होती ..

 दिव्य कुरआन च्या संदेशानुसार एक गोष्ट लक्षात घेतली तर स्पष्ट होते की ,

   आम्ही ज्या मातृभुमी मधे ( वतन ) देशात  राहतात,त्या( भुमीशी ) , देशाशी ,वतनाशी , प्रामाणिक एकनिष्ठ , वचनबद्ध राहावे ..व त्या देशाशी वतनाशी प्राणपणाने लढावे व त्याचा लढता - लढता वीर मरण ( शहीद ) जरी आले तर वीरश्री( शहीदी ) पत्करावे .शहीद जरी झाले तर शहीद व्हावे ....हे पवित्र दिव्य कुरआन व प्रेषित मुहम्मद स्व सांगितले आहे ..

" वतनाशी , देशांशी , मातृभूमी साठी मरण आले तर शहीद म्हणून मरताल , संबोधले जातिल.".

प्रेषित मुहम्मद स्व , सांगितले की , " शहीद " हा तात्काळ स्वर्गात ( जन्नतुल फिरदौस) मधे मोठं जागा भेटते , " शहीदां" चा रक्ताचा फक्त एक थेंब जमिनीवर पडण्या आगोदर अल्लाहा ( ईश्वर)  त्या व्यक्तीस स्वर्गाचे दरवाजे ताबडतोब उघडताच." . शहीदांना पवित्र दिव्य कुरआन मधे खुप मोठा गौरव पुरस्कार असतो ..असे दिव्य कुरआन व हादिस मधे पुष्कळ ठिकाणी नमुद केलेले आहे.

पवित्र कुराण व प्रेषित मुहम्मद स्व यांच्या मातृभुमी (आम्ही त्याला वतनपरस्ती  म्हणतात.) च्या शिकवणीनुसार , भारतीय स्वातंत्र्य चळवळीत , लढ्यात , लाखों मुस्लिमांनी भाग घेतला .भारत मातेच्या रक्षणासाठी लाखों मुस्लिमांनी (बलिदान)शहीद झाले आहेत .

अल्लाह (ईश्वरा)च्या आदेशानुसार मातृभुमी (वतन ) ना जो कोणी अत्याचार करेल , गिळंकृत करेल , लोकांना नाहक बळी,त्रास देतील , नाहक अत्याचार करतील त्यांच्या विरोधात लढुन ,  इंग्रजांच्या अत्याचार , आतोनात त्रासातून मुक्तता करण्यासाठी , 

 अल्लाहा च्या आदेशानुसार बलिदान शहीद झाले तर बक्षीस म्हणून मुस्लिम लोकांनी स्वीकार केला. 

१८५७ च्या पहील्या लढ्याचे नेतृत्व शेवटचे मुघल सम्राट बहादुरशहा जफर यांच्या कडे ,विरगंणा राणी लक्ष्मीबाई , तात्या टोपे , शिंदे , ई. भारतातील बहुतेक राजांनी त्यांच्या कडे नेतृत्व बहाल केले असताना , त्यांना रगुन जेल मधे काळया पाण्याची सजा सुनावली गेली, त्यावेळेस इंग्रजांनी त्यांच्या दोन मुलांची मुंडके  कलम करुन त्यांच्या समोर आणुन  बहादुरशहा जफर यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न वारंवार केली परंतु त्या ब्लॅकमेल चा काहीच परिणाम आपल्या वतनपरस्ती ,मातृभुमीसाठी न होता त्यांनी सजा चा स्विकार केला परंतु देशाशी गद्दारी केली नाही .ऱगून मधील जेल मध्येच मृत्यू पत्करला.

.त्यांची इच्छा होती की , मातृभुमीच्या मातीतच  माझा देह  दफन करण्यात यावे ..

 परंतु इंग्रजांनी ही अट मान्य केली नाही ... बहादूरशहा जफर आजही रंगुनच्या मातीत दफन आहेत .मा.राजीवजी गांधी पंतप्रधान असताना त्यांनी त्या दफनभूमीतील माती आणुन भारतीय मातीत दफन करून त्यांची इच्छापूर्ती करण्याचा प्रयत्न केला आहे... 

अल्लाहा च्या शिकवणीचे महत्व बहादुरशहा जफर यांनी मातृभुमीसाठी " शहीद" होवून जन्नतुल फिरदौस चे हकदार झालेच असतील.

  जालियनवाला बाग च्या  जनरल डायर ने केलेल्या हत्याकांडात , मृत्यू मुखी झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात  मुस्लिमांची संख्या जास्त प्रमाणात होती .ं

            छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात, साठ टक्के मुस्लिम मोठ मोठ्या पदावर कार्यरत होते त्या सर्व मुस्लिम सरदारांनी आपल्या राजा बरोबरील वतन परस्ती ईमानदारी ने निभावून शहीद झाले ..

               म्हैसूर येथील टिपु सुलतान हे कट्टर देशभक्ती निभावताना इंग्रजांनीं त्यांना शहीद केले .

           नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौज मधे ही प्रमुख पदाधिकारी बहुतेक मुस्लिम सैनिक होते .

  राजस्थान मधे महाराजा महाराणा प्रताप  , महाराजा पृथ्वीराज चौहान व विविध राजांच्या सैन्यात प्रमुख सरदार हे मुस्लिम होते .

      #हा इतिहास आहे , परंतु मुस्लिम विरोधी इतिहास लेखकांनी मुस्लिम द्वेष फैलावण्यासाठी इतिहास ची मांडणी त्यांच्या पध्दतीने केली असो.

जगातील प्रत्येक देशात जिथे  मुस्लिम स्थानिक आहे त्या प्रत्येक देशात मुस्लिमांनी आपल्या देशाशी वतन परस्ती  प्रमाणिक निभावली आहे .

     भारतीय मुस्लिमांनी  पारतंत्र्यातील इंग्रजांच्या अत्याचाराला ,त्रास ,छळाचा , कडाडून विरोध करून मुह तोड जबाब उत्तर वेळोवेळी देउन इंग्रजांच्या जोखडातून भारत देशाला मुक्त करण्यासाठी लोखों ,कोटीं मुस्लिमांनी बलिदान देऊन भारतीय मातीतच दफन झाले. आहेत .

    आज  लैलतुल कद्र  २७  रात्र ,व शुक्रवार च्या योगा योगाने , भारतीय स्वातंत्र्यच्या आठवणी जाग्या होऊन .. भारतीय शहीदांना सलाम करावासा वाटतो.

लेखक डॉ सलीम सिकंदर शेख,बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर 9271640014

श्रीरामपूर प्रतिनिधी-सध्या संपूर्ण राज्यभरात भोंगे, झेंडा वाद यासह विविध मुद्द्यांवरून तणाव निर्माण झालेला आहे. यादरम्यान रमजान, अक्षय तृतीया यासारखे सण येत्या काही दिवसांत साजरे होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी श्रीरामपूर शहरातील विविध समाजांचे प्रतिनिधी, विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी डी वाय एसपी संदीप मिटके,तालुका पोलीस निरीक्षक मछिंद्र खाडे,पोलीस निरीक्षक संजय सानप आदींसह विविध पक्षांचे, संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. सध्या तरुणांची माथी भडकावण्याचे काम सुरू आहे. यातून सामाजिक अशांतता निर्माण होत आहे. तरुणांची माथी भडकवली जात असल्याने अनुचित घटना घडत आहे. या घटनांमधून तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. मात्र असे तरुण रेकॉर्डवर आल्यानंतर त्यांची माथी भडकावणारे कोणीही मदतीला येत नाहीत. वर्षानुवर्षे याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. त्याचा विचार सर्वांनी करावा, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी केले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर म्हणाले, ध्वनिक्षेपकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्याचे पालन सर्वांनी करणे बंधनकारक आहे. कायदा तोडण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर निश्चित कारवाई होईल. सामाजिक अशांतता निर्माण करणार्‍यांवर पोलीस प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. मागील दोन महिन्यांपासून सायबर सेल, गोपनीय शाखांची पथके सतर्क आहेत. शहर शांत ठेवणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी जातीय सलोखा राखण्यासाठी इतरांना समजावून सांगणे आवश्यक आहे. तरुणांना अनुचित घटनांपासून परावृत्त करणे आवश्यक आहे. पालकांचीही यात मोठी जबाबदारी आहे. यासंदर्भात पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. वॉर्डांमध्ये, मोहल्ल्यामध्ये ग्रुप, कमिट्या तयार करून पोलिसिंगवर भर देण्याबाबतही सूचना देण्यात आलेल्या आहेत. सोशल मीडियावर अत्यंत चुकीचे व विचित्र प्रकार सुरू आहेत. चुकीच्या बनावट क्लिप पसरविल्या जात आहेत. यातील काही लोकांपर्यंत पोलीस प्रशासन पोहचले आहे. यासंदर्भात योग्य ती कारवाई पोलीस प्रशासन करत आहे. कोणावरही चुकीची कारवाई होणार नाही, याची दक्षता आम्ही निश्चितपणे घेऊ आपल्या श्रीरामपूर शहराचे नाव, जिल्ह्याचे नाव खराब होऊ नये, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.मात्र, हेतूपुरस्सर कोणी चूक करत असेल, तर त्याला माफी नाही. बेकायदेशीर कृत्य कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी डी वाय एसपी संदीप मिटके म्हणाले गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आमची नजर आहे.काहींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.सोशल मीडियांवर काही आक्षेपार्ह पोस्ट जर आढळल्यास पोलिसांशी सम्पर्क करावा कोणीही कायदा हातात घेऊनये या साठी पोलीस तयार आहे अन्यथा याचे परिणाम वाईट होतील याचा नागरिकांनी भान ठेवावा युवकांमध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी बैठकीतील सूचनांचा विचार सर्वांनी करावा आमच्या कडून निश्चितपणे उपक्रम भविष्यात राबवले जातील.येणारे सण उत्सव या साठी सांततां कमिटीची मिटिंग लवकरच घेणारच आहोत सर्वांना यात सहभागी करून घेतले जाईल. सण उत्सव पार पडल्यानंतर इतर वादांबाबत पुन्हा बैठक घेतली जाईल.

शिर्डी शहर प्रतिनिधी-शिर्डी शहरातील कनकुरी रोडरील हॉटेल साईकृष्णा या हॉटेलसमोर एका गाडीची चौकशी करत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकास एकाने गोंधळ घालत अरेरावी करत धक्काबुक्की केली व सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिर्डी शहरात वाढत्या धूमस्टाईल चोरीच्या घटना रोखण्यासाठी शिर्डी पोलीस स्टेशनकडून विविध उपाययोजना व विनानंबर वाहनांची तपासणी केली जात आहे. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर काल 28 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कनकुरी रोडवरील हॉटेल साईकृष्णा समोर एक पांढरा रंग असलेली विनानंबरची दुचाकी उभी असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पेश आसाराम दाभाडे व सरकारी वाहन चालक चौकशी करत असताना खंडु मारुती गोर्डे राहणार श्रीराम नगर शिर्डी याने गोंधळ घालून अरेरावी करत तुम्हाला कोणी अधिकार दिला? मी कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही. माझी मोठी ओळख आहे. तुम्ही कोण लागून गेले, कागदपत्रे नाही असे सांगत धावुन आला सरकारी गणवेशावर असताना धक्काबुक्की केली. आरडाओरड करुन गोंधळ घातला. शासकीय कामात अडथळा निर्माण केला.याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी खंडु गोर्डे यांच्याविरुध्द भादंवि कलम 353,34अन्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. या घटनेची गंभीर दखल शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय सातव यांनी घेतली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील करीत आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील गोदावरी नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करत असलेले ठिकाणी छापा टाकून 3.40 ब्रास वाळूसह दोन टेम्पो असा एकूण 10 लाख 14 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नायगाव येथील गोदावरी नदीपात्रातून चोरून वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी आपल्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सूचना देऊन नायगाव येथील नदीपात्रात छाप टाकण्यास सांगितले. त्यानुसार पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, यांचे मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके, पो. नि. मच्छिंद्र खाडे, हेड कॉन्स्टेबल भारत जाधव, पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ, चांद पठाण, सुनील दिघे या पथकाने छापा घालून चोरटी वाळू वाहतूक करताना अनिल सोपान शेलार याचे ताब्यातून एक विटकरी रंगाचा टेम्पो. व 1.70 ब्रास वाळू असा एकूण 5,07000 रुपयांचा मुद्देमाल आणि फारुख ख्वाजा शेख याचे ताब्यातून एक विटकरी रंगाचा टेम्पो. व 1.70 ब्रास वाळू असा एकूण 507000 रुपयांचा मुद्देमाल असा एकूण 10,14000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर प्रतिनिधी-बनावट मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणारा स्पिरीटचा (मद्यार्क) चा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर भरारी पथकाच्या हाती लागला आहे. संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे शिवारात ही कारवाई करण्यात आली. यात तब्बल 1 कोटी 43 लाख 83 हजार रुपये किमतीचे अंदाजे 1 लाख 5 हजार लिटर स्पिरीट जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यात 2 जणांना अटक करण्यात आली आहे. 2 जण पसार आहेत. दरम्यान हे स्पिरीट श्रीरामपूरात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर विभागाच्या निरीक्षक, भरारी पथक क्रमांक 2 यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, 26 एप्रिल रोजी वेल्हाळे शिवारातील हॉटेल हरीबाबा जम्मू-पंजाब चौधरी ढाब्याच्या मोकळ्या जागेत वाहतूक टँकरमधून स्पिरीट (मद्यार्क) तस्करी केली जाणार आहे. याबाबत पथकाने प्रत्यक्ष सापळा रचून तपासणी केली असता 4 व्यक्ती बेकायदेशीररित्या स्पिरीट काढतांना आढळून आले. याठिकाणी छापा टाकण्यात आला असता शहाजहान अफसर खान (वय-38, रा.उत्तरप्रदेश) व जुगल कुमार मंगुराम (वय-23, रा.जम्मू काश्मीर) यांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायद्या 1949चे कलम 65 (अ) (ई), 80 (1), 81,83,90,98 (22) अन्वये 2 जणांना अटक करून व 2 जणांना फरार घोषित करून त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईत प्रत्येक टँकरमध्ये अंदाजे 34 हजार 600 लिटर स्पिरीट (मद्यार्क) असलेले 3 टँकर, 200 लिटरचे 5 बॅरल व सामग्री असे एकूण 1 कोटी 43 लाख 83 हजार 600 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, अंमलबजावणी व दक्षता विभागाचे संचालक उषा वर्मा, पुणे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अहमदनगरचे अधीक्षक गणेश पाटील, उपअधीक्षक नितेश शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गोपाल चांदेकर, अनिल पाटील, दुय्यम निरीक्षक पी.बी.आहिरराव, के.यु.छत्रे, व्ही.जी.सुर्यवंशी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक के.यु.छत्रे, व्ही.जी.सुर्यवंशी, के.के.शेख, एस.आर.वाघ तसेच प्रवीण साळवे, दीपक बर्डे, व्ही.आर.करपे, टी.आर.शेख,सचिन गुंजाळ, एस.एम.कासुळे, स्वाती फटांगरे यांनी सदर कारवाई केली. पसार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास निरीक्षक गोपाल चांदेकर करत आहेत.

बेलापूर(वार्ताहर)राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सरकारची पत ढासळली.त्यामुळे कोणी गुंतवणूकदार राज्यात यायला तयार नाहीत.राज्याला कोणीही लस द्यायला तयार नव्हते. महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे  टेंडर काढले जातात .तसेच दरपत्रकच तयार केले आहेत. राज्याची एव्हढी बिकट अवस्था कधीच झाली नव्हती. कोरोनाच्या महाभयंकर संकटात राज्य सरकारचे योगदान काय? असा सवाल  भाजपचे नेते माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

जि. प.आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद नवले यांच्या निधीतून बेलापूर येथे पावणेतीन कोटी खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण आ. विखे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शरद नवले होते.


आ. विखे पुढे म्हणाले की,महाविकास आघाडीचे एक एक मंत्री घोटाळ्यांमध्ये अडकले. वाळु माफियांनी उत्च्छाद मांडलाय. आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचा  दुर्दैवी प्रयत्न होतोय. आत्महत्याग्रस्त एस. टी. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सरकार न्याय देऊ शकले नाही. अपयश झाकण्यासाठी राज्यातील वसुली सरकारचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. त्यात सामान्य माणूस भरडला जात आहे. दारूमुक्तीचा निर्णय घेतला.मंत्र्यांनाच पैसे पुरेनात ते जनतेला काय देणार? असा सवाल करुन त्यांनी  राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टिका केली.

याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नैतृत्वाखाली १२० कोटी जनतेचे निशुल्क लसीकरण करण्यात आले. कोरोनाच्या काळात १ लाख ६० हजार कोटी खर्च करुन गोरगरिबांना मोफत धान्य देऊन त्यांची भुक भागविली.काश्मीरसह  देशभर पंचायत राजच्या माध्यमातून गावागावांत विकास करण्यासाठी तसेच वंचित भागांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धाडसी पाऊले टाकली जात आहेत.

शरद नवले यांनी  मिळालेल्या संधीचे सोने करीत चांगले काम करुन एक नवा अध्याय रचला असे सांगत  आ. विखे यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.बेलापूरला एक मोठा सांस्कृतिक ठेवा लाभला असुन  या गावाचा नेहमी अभिमान वाटतो. त्यामुळे गावाच्या प्रस्तावित विकास कामांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही आ. विखे यांनी दिली. केंद्रीय ग्रामविकास मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत येत्या ५ मे रोजी बेलापूरला कार्यक्रम घेण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.


अध्यक्षीय भाषणात शरद नवले म्हणाले की,पक्षभेद विसरून समविचारी लोकांना बरोबर घेऊन जनतेच्या विश्वासाला पात्र राहुन निवडणूक जाहीरनाम्यानुसार विविध विकासकामे पुर्ण करीत आहोत.गावात जॉगिंग ट्रॅक, अंतर्गत रस्ते, झेंडा चौक सुशोभीकरण,उर्दु शाळा खोल्यांचे बांधकाम  आदींद्वारे कोट्यवधी रुपयांची कामे केली. त्यासाठी  आजी-माजी जि. प.अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले व सौ. शालिनीताई विखे यांनी मोठी मदत केली.पुढील काळात १२ कोटींची पाणी योजना,५० लाखांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,२५ लाखांची अद्यावत जिम आणि कम्युनिटी हॉल, प्रवराकाठी पर्यटन विकास आदी प्रस्तावित कामांसाठी सहकार्य करण्याची विनंती आ. विखेंना केली.


गावातील विविध क्षेत्रातील शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सहकार क्षेत्रातील सुयश आणि कार्याबद्दल मान्यवरांचा विखेंच्या हस्ते गौरव करण्यात आला.


 यावेळी माजी सभापती दिपक पटारे यांनी विखेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. तसेच आमदारांना जमणार नाही असे काम नवलेंनी केल्याचा उल्लेख केला.सुनील मुथा यांनी दिवंगत खा. पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्याप्रमाणेच आपण बेलापूरकडे लक्ष देण्याची विखेंना विनंती केली. सरपंच महेंद्र साळवी यांनी स्वागत केले तर उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी प्रास्ताविक केले.गावकरी मंडळाचे नेते सुनील मुथ्था यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी प्रफुल्ल डावरे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन देविदास देसाई यांनी केले.


या प्रसंगी सर्वश्री नानासाहेब शिंदे, बाळासाहेब तोरणे,जि. प. सदस्या सौ. संगीताताई गांगुर्डे, गिरीधर आसने, गणेश मुदगुले, भीमभाऊ बांद्रे,अनिल थोरात,जालिंदर कु-हे,सुधाकर खंडागळे,भाऊसाहेब कुताळ, प्रकाश नवले,प्रभाकर कु-हे,रणजित श्रीगोड,सुवालाल लुंकड, कनजीशेठ टाक,पुरुषोत्तम भराटे, साहेबराव वाबळे,पोलीस पाटील अशोक प्रधान लहानुभाऊ नागले,गटविकास अधिकारी मच्छीन्द्र धस, उपअभियंता आर. एस. पिसे, शाखा अभियंता गोराडे, बेलापूर खुर्दच्या सरपंच सौ. वर्षा महाडीक, उपसरपंच अँड. दीपक बारहाते,ग्रामविकास अधिकारी राजेंद्र तगरे, ग्रा. पं. सदस्य रमेश अमोलिक, चंद्रकांत नवले, मुश्ताक शेख, वैभव कु-हे,सौ. प्रियंका कु-हे,स्वाती अमोलिक, तबसुम बागवान, उज्वला कुताळ, मिना साळवी आदींसह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.


श्रीरामपुरात (प्रतिनिधी) येथील भारतीय लहुजी सेना च्या वतीने श्रीरामपुरात मा गांधी पुतळ्यासमोर उपोषण सुरू करण्यात आले होते. सदर उपोषणास श्रीरामपुरात एज्युकेशन सोसायटी हायस्कूल व  प्राथमिक शाळा आहे त्या शाळेत मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तर शाळा ची वालकॅमपाऊड भिंत खचली व तुटली आहे, मुतारी व शौचालय नाही इत्यादी अनेक मागणी साठी आज आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. मा संजीवनदिवे गटशिक्षणाधिकारी व शाळा चे संस्थांचे प्रतिनिधी म्हणून आलेले मा गोरे सर मुख्याध्यापक यांच्या हस्ते मा हानिफ भाई पठान राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय अध्यक्ष मा बाळासाहेब बागुल,रज्जाक भाई शेख  जिल्हा अध्यक्ष ,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रईस शेख, यांना लेखी आश्वासन  दिल्यानंतर व सर्व मागण्या त्वरीत पुर्ण करू आसे बोलल्या नंतर  उपोषण सोडण्यात आले.  सदर उपोषणास रिपई चे जिल्हा अध्यक्ष सुभाष ञिभोवन,आरपीआय जिल्हा अध्यक्ष संदीप मगर, सपा चे जिल्हा अध्यक्ष जोयब जमादार,सलमान पठान शिव स्वराज्य मंच  आदी पाठींबा दिला. उपोषण यशस्वी करण्यासाठी युसूफ शेख, सुभाष कुलकर्णी,  आमजत कुरेशी, सिकंदर भाई ताबोली, रमेश खामकर, चंदू पवार, मेहमूद पठान,  आदी कार्यकरते व पालक वर्ग उपस्थित होते.

श्रीरामपूर- लेखक डॉ सलीम सिकंदर शेख-दिव्य कुरआन मधे , "  आम्ही (अल - कुरआन ) ला कद्र च्या रात्रीत अवतरीत केले आहे (१)आणि , तुम्हाला काय माहीत की, " कद्र " ची रात्र काय आहे ???(२), कद्र ची रात्र हजार महीण्यांपेक्षा ही अधिक उत्तम आहे .(३), दुत ( ईशदुत) आणि रुह(जिब्राईल अलै.)त्यात आपल्या पालनकर्यांच्या आज्ञेने प्रत्येक आदेश घेऊन उतरतात (४), लैलतुल कद्र ची रात्र पुर्णतः " शांती  "आहे.. उषःकाला पर्यंत..(५)(  दिव्य कुरआन पारा ३० सुरह नं.९७ आ.नं.१ ते ५). 

# हजरत  ईबने अब्बास  म्हणतात , प्रेषित मुहम्मद सल्ल.  सांगितले  ," लैलातुल कद्र ची रात्र रमजान महीन्याच्या अंतिम चरणात येते ,अंतिम दहाची ,नऊ ,सात किंवा पाच रात्री राहिल्या तर  या रात्री येतात.(सहीह बुखारी २०२२).

हज.आयेशा रजि. प्रेषित मुहम्मद स्व.च्या पत्नी , सांगितले की," रमजानच्या अंतिम दहा रात्री जेंव्हा येत असत  , त्यावेळेस आम्हाला प्रेषित  स्व. स्वतः ड्रेस  परिधान करून, बरोबर घरातील सर्व मंडळींना  तीलावत , प्रार्थना  करण्यासाठी संपूर्ण रात्रभर जागवीत असत." ( सहीह  बुखारी २०२४).,

   रमजान महिन्यातील पुष्कळ  अद्भूत घटना घडलेल्या आहेत, पुराणां ,   इस्लामी इतिहासामधे बर्‍याच नोंदी आढळतात .

रमजान मुबारक मधील  २१ ,२३ ,२५ ,२७ , २९   ,३० ची "लैलतुल जायजा " या पवित्र कद्र च्या  रात्री येतात . यांचं महत्त्व  शब्दातीत आहेत , ते व्यक्त करता येत नाहीत.

## या प्रत्येक  कद्र च्या रात्र  रोजच्या  दैनंदिन  रात्री (पेक्षा १०००) एक हजार महीण्यांपेक्षा ही अधिक महिन्यांच्या  रात्रीपेक्षा  जास्त  सबाब ( पुण्यं) असते . 

फक्त याच रात्रींना " लैलातुल  -कद्र '" च्या पवित्र रात्रीं संबोधतात .

दिव्य कुरआन म्हणते की, " आम्ही या रात्र मध्ये  दिव्य कुराण ग्रंथ  पृथ्वीवर  तुमच्या मार्गदर्शनासाठी अवतरीत केला आहे ," "' आणि तुम्हाला काय माहीत की ही रात्र काय असते  ",  "  तुम्हाला कधी या रात्रीचे महत्त्व जाणाले.", "तर तुम्ही स्तब्द व्हाल ,व तुम्हाला भान राहणार नाही ," (सुरह नं.९७ आ.नं.१-ते - ५)

या कद्र च्या रात्रींच  महत्त्व आहे . 

अशाच प्रकारे संपूर्ण वर्षभर ,,(१)  ईदु आजहा( बकरी ईद) रात्र(२) ईदु ल फितत्र ( रमजान ईद) रात्र ,.(३)मोहरमची आशुरा १० वी रात्रीं चे महत्वही  काही औरच सांगितले आहे. 

  # यांमध्ये कोणती रात्र  महत्त्वाची आहे , हे तज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत . कारण अल्लाह (ईश्वरा)ने या दिव्य  कद्र च्या रात्रींचं  गुपित ठेवलं .

      कुरआन म्हणते की ," जे समोर आहे आणि जे काही गुपित आहे या सर्वांचे ज्ञान फक्त(ईश्वर),अल्लाहाकडेच आहेत ,  व आपल्या ज्ञानाच्या मर्यादा ,फक्त तो पर्यंत मर्यादित आहे , जे (ईश्वराने) अल्लाहाने माणसाला प्रदान केलेले आहेत किंवा देवु  इच्छितो , या रात्रीचे  ज्ञान फक्त आल्लाहाने (ईश्वराने )आपल्या जवळ ठेवले आहेत  ".

                      मानवाला , दुआ ,नमाज , कुराण पढण करून ,नामस्मरण करून,  दया ,याचना करून .  कद्र ची रात्र  तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे शोधण्याचा प्रयत्न करा.

      (# @  काही तज्ञांनी ,एक हजार (१०००) महीन्यांच्या दिवसानुसार फक्त एका रात्रीत ,# किती -सेकंद ‌,#किती - मिनिटे, # किती -तास , # किती -दिवस, # किती- वर्षांची ईबादत ,बंदगी,होते त्यांची गोळा बेरीज केली .# एक १ सेकंद = २३ तास ईबादत , # १ एक मिनिट = ५८ दिवसांची ईबादत , # एक तास = ९ -८ वर्षे  ईबादत ,#  शेवटी एक रात्र = ८३ वर्षे (त्रेयांशी वर्षे) इयर्स , ईबादत ,बंदगी ( पुजा ) होते ..एवढी मोठी महत्वाची लैलतुल -कद्र च्या फक्त एका रात्रींचं  ##).

            # प्रेषित मुहम्मद स्व. सांगितले की, '' लैलतुल-कद्र 'च्या रात्री आल्लाह  शेवटच्या सातव्या आकाशावर  येऊन पृथ्वी तलावरील प्राणीमात्रांना व माणसांना आव्हान करतात की ,,

"" कोण आहे जे माझ्याकडे दयेची याचना करतोय की मी त्याला दया ,देईल , दाखवील '" 

 "  कोण आहे , जो करूणेची भिख मागेल ,मी त्याला करूणेची भिक देईल ", 

 " कोण आहे ,जो आपल्या केलेल्या लहान-मोठ्या पापांची क्षमा याचना मागतोय , की मी त्याला क्षमा देईल " ,

  "  कोण आहे ,जो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या म्हणून माझ्याकडे मागणं मागतो मी , त्या सर्व मनोकामना पूर्ण करील ". "  सर्वांना मनोभावे माफी देईल."...

#  पुन्हा प्रेषित मुहम्मद स्व म्हणतात की,"  या लैलतुल-कद्र च्या रात्री आल्लाहा  दोन्ही हात मोकळे करून मानव जातीस अव्हान करतात  की  , "   कोण आहेत जो एक आशा आल्लाहाला कर्ज दिईल की ,जो दरिद्री नाही व अत्याचारी  तर नाहींच ,''

                 आल्लाहाचे ( ईश्वरा)हे सकाळी भोर पहाटेपर्यंत आव्हान हे , क्षमा, दया, करुणा,बक्षिसे, देण्याचे काम चालूच असते, 

पण आपणाला त्या आव्हानांची फिकीर नसते ,आपण मस्तावलेले ,सुस्तावलेले झालेलो असतो ,  विचार करण्याची मानसिकताच नसते ,

# आल्लाहाला  काय गरज कर्जाची. जशी आपली आई जेव्हा आपल्याकडून काही अपेक्षा करते व आपल्याला याचना करते की मला काहीतरी दे अगदी त्याचप्रमाणे आल्लाहा ही आपल्याला आपल्या आईप्रमाणे जाणून-बुजून आपल्याला कर्ज मागतात ( गरीब ,अनाथ ,विधवा , भुकेल्या यासाठी) आपली परीक्षा घेत असतात .त्यांना काय घेणं परंतु आल्लाह कृपावंत ,दया , देणारे . कायम आपल्याला काहीतरी देतच असतात , आपल्या इच्छांची पूर्तता करत असतात. 

संपूर्ण मानवजातीने , प्राणिमात्र व जीवजंतू हे अल्लाहाचे‌ ,त्यानेच‌ निर्माण केलेले .सर्व जगात जगाने  कितीही मागितले तरी ,  अथांग महासागरात समजा ऐक सुईच्या टोकाला जेवढे थैंब येतील तेवढे व कणभरही कमी होणार नाहीत येवढी लिला एकठ्या अल्लाहा ( ईश्वराची )आहेत.

 कृपावंत ,दयावंत सृष्टीचा  स्वामी देणाराआहेत .

परमेश्वर आपल्याला  जेवढे योग्य  व कुवती, सहनशक्ती प्रमाणेच देतात . 

अल्लाह  परमदयाळू  ,कृपावंत आहे ,ते अत्याचारी तर ते नाहीत .

 ‌‌   # हजरत आयेशा रजि.म्हणतात की ," आपण केलेल्या सर्वप्रथम पापाची क्षमा मागा कारण आपल्यासाठी तेच महत्त्वाचे आहेत ".

आज संधी आहे  , सेकंदा -  ला २३ तास , मिनिटाला ५८ दिवस ,व १ तासाला ९ वर्षे , विचार करा किती ईबादत बंदगी करुन  फायदा उचलण्याचा ,, अजुनही वेळ गेलेली नाही...उचला फायदा......

लेखक डॉ सलीम सिकंदर शेख

 

श्रीरामपूर-लेखक डॉ.सलीम सिकंदर शेख -साठी जकात अनिवार्य (कंपल्सरी) केलेली  आहेत. ज्यांच्याकडे  वर्षभर साडे बावन ५२.५ तोळे चांदी (सिल्व्हर) व साडेसात ७.५ तोळे सोने (गोल्ड) किंवा त्यांच्या किंमती एवढी रक्कम घरामध्ये वर्षभर वर्षातील सर्व गरजा भागून राहिलेली शिल्लक रक्कम वर २.५% (अडीच टक्के रक्कम) म्हणून ' जकात अनिवार्य (कंपल्सरी) केले आहेत.

जकात,घामाच्या, मेहनतीच्या,

कष्टाच्या किंवा चांगल्या कर्माच्या पैशातूनच दिली जाते,घेतली जाते.

 एक विशेष गोष्ट म्हणजे मस्जिद बांधण्यासाठी जकातीचा पैसा चालत नाही. मस्जिद बांधकाम हे लोकांच्या कष्टाच्या मेहनतीच्या, घामाच्या स्वखुशीने दिलेल्या पैशातूनच पवित्र मस्जिद चे काम (करतात) चाललेले असते व मजुरीचा खर्चही त्याच पैशातून भागवला जातो,कारण जकातीचा पैसा समाजातील पीडीत,गरीब, गरजुंसाठी आल्लाहाने वेगळाच ठेवला आहे.परंतु आजकल काही मुस्लिमद्वषी मिडियाने इस्लाम धर्माला काही खोट्या-नाट्या कुभांडांद्वारे इस्लामवर अनेक चुकीचे  दोष लावत या चांगल्या धर्मासही चुकीची वेगळीच ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे,मुस्लिमाबद्दल खोटं दाखवुन द्वेष पसरविण्याचे काम काही प्रसार माध्यमांतून चालू आहेत.

पवित्र कुरआन मध्ये सांगितले की ,"१) लाच घेतलेला व अवैध  मार्गाने केलेल्या कोणत्याही कब्जाचा पैसा ,(सु.नं.२ अल- बकराह अ.नं१८८) 

२) बेईमानीने ,बेकायदेशीररित्या कमावलेला पैसा (अल-ईमरान)

३) मूर्ती बनवणारा व मूर्तीचा धंदा करणारा,मूर्ती विकणारा याचा पैसा.(अल-मायदा.अ.नं.९०)

४) चोरी करणारा,चोरी करून त्याचा माल विकणारा,चोरीला सहकार्य करणारे,चोरीचा पैसा गडप करणाऱ्या (अल-मायदा अ.नं.३८)

५) दुकान व व्यावसायिक मापात मध्ये कमी जास्त प्रमाणात  घोटाळा केलेला पैसा चालत नाही.(अल-ततफीक नं.१३)

६) अनाथांचा मालामधुन पैसा कमावणारे व अनाथांचा माल गडफ करणाऱ्या लोकांचा.(अल-निसा अ.नं१)

७) अचानकपणे कमावलेला पैसा,धन लाभ,उदाहरणार्थ जुगार,सट्टा,मटका,लॉटरी, कमाईतून आलेला पैसा.(अल-मायदा अ.नं.९०)

८) दारूचा पैसा,दारु दुकानदार, दारु बनवणारा,दारु विकणारा, दारुचा धंदा करणारा,दारुच्या धंद्याला मदत करणारा यांचा पैसा .(अल-मायदा.नं.९०)

९) अश्लीलता आणि वेश्या व्यवसाय किंवा वेश्या व्यवसायाला प्रोत्साहन देणारा किंवा नाच-गाणे तमाशा डान्स बार इत्यादींचा पैसा चालत नाही .(अल-नूर.अ.नं.१९, ३३)

१०)ज्योतिष व्यवसाय,भविष्य वर्तवणारे,गैरकारभार करणाऱ्यांचा पैसा चालत नाही (अल-मायदाअ.नं. ९०)

(११) यांच्या व्यतिरिक्त पैशासाठी गडगंज संपत्ती गोळा करून घरातच साठवून ठेवणारे याला कंजूस म्हणतात आशांसाठी सक्त मना (मनाई)  केलेली आहेत,(सुरह अल-फुरकान अ.नं.६७),

(१२) भरपूर गडगंज पैसा कमावून घरी साठवून ठेवण्याला इस्लामने हराम ठरवलेले आहे. (अत-तौबा अ.नं.३४).

(१३) फिल्मवाले,चुकीचे कृत्य करणाऱ्या पासून जकात बिलकुल घेतली जात नाही.अशा लोकांनी स्वतःहून जकात म्हणून देवु नये कारण काही लोकांना याचे ज्ञान, माहीती नसते.#इत्यादींकडुन जकात चालत नाही व घेतलीही जात नाही,विशेष म्हणजे आशा लोकांनी जकात देऊ देखील नयेत.

## जकात कोणकोणासाठी चालते आणि कोणासाठी खर्च करावा :- --

१) आई वडील, नातेवाईक, अनाथ,पीडित शेजाऱ्यावर खर्च करावा.(अन-निसा अ.नं.३६)

२)  निराधार , अपंग लोकांवर खर्च करावा (अल-जारियात अ.नं.१०)

३) कर्ज देणे. बिगर इंटरेस्ट (बिन व्याजी) कर्ज  देणे.(कर्ज.हसना (विना व्याजदर) म्हणून देऊ शकतात),

(इस्लाममध्ये कर्ज देणे व घेणे दोन्ही निषेध आहेत, (अल-बकराहा अ.नं.२८).

 ४) जकात आदा करणे (अल -तौबा १०८)५) सदकात.आदा करणे अल-तौबा अ.नं १०८) 

जे लोक पीडित आहेत,एखाद्या नैसर्गिक आपत्तीने,भूकंपग्रस्त, धरणग्रस्त,त्सुनामी,एखादे जीवघेणे साथीचे आजार, दुष्काळी परिस्थिती,संकट परिस्थिती,इत्यादी संकटाने पीडितांसाठी,अनाथांच्या भल्यासाठी,विधवांच्या उद्धारासाठी व विधवांच्या मुलाबाळांच्या सांभाळ करण्यासाठी,.गरीब लोकांच्या उद्धारासाठी जे गरीब आजारी आहेत व ज्यांच्यामध्ये आजारपणाचा उपचारासाठी पैशाच नाहीत,ज्याच्याकडे हॉस्पिटल बिल भरण्याची ऐपत नाही अशांसाठी,ज्याचे कर्जदारांचे कर्ज आहे,.कर्ज भरण्याची ऐपत नाही अशांसाठी व गरीब घरातील मुलां-मुलींचे लग्न करण्यासाठी व त्यांच्या संभाळ करण्यासाठी , # विशेष ,माणूस कितीही मोठा असला तरी तो एखाद्या वेळी संकटात सापडलेल्या असतो व आशा वेळी कोणाकडूनतरी कर्ज घेतलेले असते,म्हणून ते कर्ज  फेडण्यासाठी जकातीचा चांगला उपयोग होतो.

भारतामधे इस्लामी शिक्षणासह विविध प्रकारच्या शाळा चालवली जातात .

            # त्या शाळांना मदरसा म्हणतात # 

आपल्या काही मुस्लिम विरोधी भारतीय सोशल मिडिया आणि काही ठराविक प्रसार माध्यमांमध्ये मुस्लिम समाजासह त्यांच्या मदरशांबददल गैरसमज पसरवून सामाजाची दिशाभुल केली जाते,मात्र सत्य वास्तविकता ही वेगळीच आहे, मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना अरबी,उर्दू भाषेत,शिक्षण दिले जातात,त्यांना देशभक्ती व  इस्लामी शिक्षण व ज्या राज्यांंच्या कायद्यानुसार स्थानिक पातळीवरील शिक्षण दिले जातात,.आशा मदरशांची व्यवस्था व बांधकाम करण्यासाठी विनीयोग करण्यात येतो.सोबतच जागोजागी शाळा-कॉलेज चालवली जातात त्यासाठी, त्यांच्या वसतिगृहातील गरीब विद्यार्थ्यांना जेवण वगैरेसाठी.

गरीब मुलींच्या विवाहासाठी. पीडित व अनाथ मुलांच्या सर्व गरजेसाठी जकातीचा वापर करतात.

# जगातल्या बहुतेक  राष्ट्रांमध्ये व भारतामध्ये सुध्दा आरबी मदरशांना कुठलेही सरकारी अनुदान देत नाही.दिलेही जात नाही. सरकारने कोणत्याही मदरशांना अजून अनुदान दिलेले नाहीत.हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे ,असो.

परंतु काही ठराविक प्रसार माध्यमांमध्ये मुस्लिम विरोधी  गैरसमज पसरवले जातात की सरकारकडून मुस्लिम मदरशांना मुबलक प्रमाणात सरकारी अनुदान दिले जाते. हे चुकीचे आहे.

 आज लाखो अरबी मदरशांमध्ये शिक्षणाबरोबरच गरीब,अनाथ, विधवा,तथा मुलांसाठी वस्तीगृह व जेवणा - खाण्याची सोय करून त्या बरोबरच अनाथ, गरीब, विधवा,मुलां- मुलींच्या विवाहसाठी मदरशांमधे सोय केली जाते,अशामध्ये जकातीचा वापर केला जातो.भारतात देवबंद सारखा एक लाख मुलं (विद्यार्थी)  असलेला मदरसा सहारनपुर मध्ये आहे,व  भारतात असे खुप गरीब मदरसे आहेत ज्यांचा खर्च , होस्टेल , जेवणाची व्यवस्था सह लाखोंनी-कोटींनी असतो,  सर्व जकातीच्या माध्यमातून  चालवला जातो . त्यामध्ये अलिगड मुस्लिम  युनिव्हर्सिटी, दिल्लीतील हमदर्द युनिव्हर्सिटी,मौलाना आझाद युनिव्हर्सिटी असे जगात नावाजलेले  शिक्षण संस्था, युनिव्हर्सिटी व मदरसे‌ भारतात  चालू आहेत ‌.परंतु त्या नावाजलेले मोठमोठाल्या विद्यापीठांचा खर्च स्वतःच्या व्यवस्थापकीय पध्दतीने ,व काही जकातीच्या माध्यमातूनच चालतो,त्यामध्ये गरीब अनाथ विधवांचे मुलं वस्तीगगृहामध्ये  असतात व त्यांच्या पुस्तकांचा, कपड्यांचा खर्च मोफत ,मोफत हे  कॉलेज,विद्यापीठे ,मदरसे करतात त्यासाठी जकातीचा सुयोग्य वापर केलेला असतो.

 ## मदशांमधुन  :- समाजामध्ये कसे वागावे हे वास्तविक पाहता शिकलेली गरीबांची गरीब मुलं भारताच्या  व जगातील विविध ठिकाणी नोकरी करुन आनंदाने आपले जीवन व्यतीत करतात.याच जकातीच्या पैशांद्वारे दुष्काळी परिस्थितीत, नद्याच्या पुरग्रस्त परिस्थितीत, समाजोपयोगी उपक्रमाला हसत हसत मदत होईल म्हणून बरीच लोकं तिथे जाऊन जकात देत असतात..पाणी,अन्नधान्य पुरवणं. आपात्कालीन पुर परस्थितीत नद्या-नाल्यांच्या पुरामधे कोणी वाहून जात असेल तर मदशातील मुलं त्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उडी मारून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केवळ सबाब,(पुण्यंच) काम म्हणून समोरच्या पीडीत व्यक्तीला वाचवतात हे अनेक ठिकाणच्या पुरग्रस्त ,करोना मधे ,व विविध ठिकाणच्या आपत्ती निवारण करण्याच्या ठिकाणी बघायला मिळालं ..

आशा जकातीच्या पैशांच्या माध्यमातून विविध गरजूंना मदत व  समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.

औरंगाबाद : मुस्लिमधर्मियांना इतर धर्मियांपासून धोका असल्याने भविष्यात हिंसक कृती करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या घरगुती वस्तूंचा साठा करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन व्हिडीओच्या माध्यमातून करणाऱ्या ‘ तहफुझ ए दीन इंडिया’ या यु ट्यूब चॅनलचा निवेदक (अँकर) आणि यु ट्यूब मालकाविरोधात शुक्रवारी पोलिसांनी सायंकाळी गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.अँकर सय्यद फारुक अहमद आणि यु ट्यूब मालक कारी झियाउर रहमान फारुकी, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोन समाजात जात, धर्मावरून तेढ, वाद निर्माण होईल, अशा प्रकारची पोस्ट, व्हिडीओ क्लीप समाजमाध्यमावर टाकणे कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारच्या पाेस्ट समाजमाध्यमावर टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शहर पोलिसांचे पथक सोशल मीडियावर नजर ठेवून आहे. ‘ तहफुझ ए दीन इंडिया’ या यु ट्यूब चॅनलच्या व्हॉटस् ॲपवर आलेल्या व्हिडीओमध्ये निवेदक सय्यद फारूक अहमद याने शस्त्रासारखा वापर करता येऊ शकतो, अशा घरगुती वस्तूंचा साठा करण्याचे अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिले. दोन समाजात, धर्मात जातीय तेढ निर्माण होईल, यादृष्टीने हा व्हिडीओ तयार करण्याचा इशारा देण्यात आला होता. या व्हिडीओचा उद्देश पोलिसांच्या लक्षात येताच पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त अपर्णा गिते, सहायक आयुक्त विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौतम पातारे, सहायक निरीक्षक काशिनाथ महांडुळे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, उपनिरीक्षक राहुल चव्हाण आणि सोशल मीडिया टीमने या ट्युब चॅनलचे कार्यालय, निवेदक आणि मालकाला शोधून काढून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात उपनिरीक्षक चव्हाण यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात सरकारतर्फे गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.

अहमदनगर प्रतिनिधी-प्रार्थना सुरू असताना मोठ्या आवाजात गाणे लावू नका, असे म्हटल्याचा राग आल्याने दोघांनी तलवार दाखवून धमकावत शिवीगाळ केल्याची घटना शहरातील लालटाकी परिसरात घडली. या प्रकरणी दोघांविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.उबेद सलीम सय्यद (रा. मिसगर कॉलनी, लालटाकी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शग्या ऊर्फ विशाल खंडागळे याच्यासह एका अल्पवयीन मुलाविरूध्द आर्म अ‍ॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडागळे याला अटक केली आहे. फिर्यादी सय्यद हे त्यांच्या सहकार्‍यांसोबत धार्मिकस्थळी प्रार्थना करत असताना आरोपी बाजूला असलेल्या मिसगर कब्रस्तानमध्ये मोबाईलद्वारे ब्लू टूथ स्पिकरवर मोठ्या आवाजात गाणे वाजवत होते. यावेळी सय्यद व त्यांच्या सहकार्‍यांनी तुम्ही मोठ्याने गाणे वाजवू नका, प्रार्थना चालू आहे, असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी तलवार दाखवून शिवीगाळ केली. दमदाटी करत धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ आरोपींचा शोध सुरू केला. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, उपनिरीक्षक समाधान सोळंके, अंमलदार दत्तात्रय जपे, शकील सय्यद, भास्कर गायकवाड, अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, शिरीष तरटे, गौतम सातपुते आदींच्या पथकाने लालटाकी, सिद्धार्थनगर परिसरात रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवून आरोपींना ताब्यात घेतले. गुन्ह्यातील हत्यारही जप्त करण्यात आले आहे.



मक्का मधे प्रेषित , पैगंबर , झाल्यानंतर ११ वर्ष असताना , ईस्लाम विरोधी लोकांनी प्रेषित मुहम्मद स्व. व त्यांच्या सहकारी मित्रगण (सहाबा रजि.). ईस्लामच्या अनुयायींना साथ देईल,सहकार्य करील आशा लोकांचा छळ करुन त्रास दिला जात असे,तरीही त्रास सहन करूनही  पैगंबर मुहम्मद स्व. संयमाने,विवेकाने,शांतपणे अल्लाहाच्या एकेश्वरवादाचा ,सत्य धर्माचा प्रचार व प्रसार शांततेने करीत असत,त्यांच्या व जे एकेश्वरवादाचा प्रसार करीत होते ‌त्यासर्वांवर तीन वर्षापर्यंत सामाजिक व आर्थिक  बहिष्कार टाकला गेला. त्यांचं जीणं, खाणं - पिणं मोठं मुश्किल (अवघड) होतं. तीन - तीन दिवस फक्त खजुरांवर त्यांचं जींणं चालू असत, कित्येक लहान मुलं,महीला, किती दिवस अक्षरशः उपाशीच झोपलीत,माणुसकीची परीसीमाच राहीली नव्हती, छळाची परमोच्च बिंदू गाठलं, शेवटी प्रेषीतांची हत्या करण्याचे कट कारस्थान रचुन , प्रत्येक कबील्यांतुन एक तरुणांची निवड करुन घेरावही करण्यात आला. मात्र ते या कटातून सही सलामत बाहेर आलेत,ही अल्लाहा (ईश्वरा) कडून त्यांची परीक्षाच होती.

शेवटी अल्लाहाच्या ईशवानीच्या आज्ञेनुसार प्रेषित स्व.यांनी सर्वांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून मदीनेला " हिजरत " करण्याचा निर्णय घेतला ,१६ जुलै ६२२ रोजी मध्यरात्री हज. अबु- बकर रजी., हज.उमर रजी.बरोबर घेत हिजरत केली.

"'हिजरी - साल वर्षे " याच घटनेमुळे इस्लामी (हिजरी सन) वर्षाची सुरुवात झाली,हिजरत नंतर मदीना व आसपासच्या परिसरात अनेक ठिकाणी इस्लामच्या सत्यधर्माचा प्रचार - प्रसार झाला व होत होता. लाखोंच्या संख्येने लोकं इस्लामच्या सत्य धर्म  स्विकारीत होते,मदीनामधेही मक्का येथील अरबी लोकांचं प्रेषितांना व त्यांच्या अनुयायांना (सहाबा) त्रास देणं चालूच होतं. मधल्या काळात मक्का येथील अरब लोकं व प्रेषित मुहम्मद स्व. यांच्या अनुयायांमधे  वारंवार रक्तरंजित संघर्ष घडत होतं,बरेच मोठ - मोठी युद्ध झाले होते .

हे वारंवार होऊ नयेत म्हणून  प्रेषितांनी जगप्रसिद्ध तह केला. यास इस्लामी इतिहासात खुप महत्वाचे स्थान आहे,यालाच " सुलह हुदैबीया" असे म्हणतात .

तहाची मर्यादा दहा १० वर्षांची होती, दोन्ही बाजूंनी बऱ्याच अटी ठरलेल्या होत्या,परंतु जास्त अटी या विरोधी मक्कावासींया कडून‌ लादलेल्या होत्या,एवढे असूनही प्रेषित मुहम्मद स्व. विरोधकांच्या प्रत्येक अटीला मान्यता देत होते व देण्यात आल्या देखील. (घटना मोठी आहे,  असो .) थोड्याच दिवसांत  प्रसिद्ध हुदैबिया कराराच्या उल्लंघनाची सुरुवात विरोधी मक्कावासी आरबां कडुन झाली व  वारंवार होत होतं. त्रासाला कंटाळून शेवटी हजरत  प्रेषीतांनी इस्लामी योध्दयांना घेऊन मक्का कुच करण्याचा निर्णय घेऊन दहा हजार योध्दांबरोबर कुच केली.            मक्का पोहचल्यावर तेथील प्रत्येक माणूस घाबरून जाऊन ज्याला जेथे जागा मिळेल , तिथे तो लपून बसतं,तर कोणी पळून जात होता.जिवाच्या भितीने सर्वच सैरभैर झाले होते,   कारणही तसे महत्वाचे होते,त्यांनी प्रेषित मुहम्मद स्व.व त्यांचे मित्रगण (सहाबा रजि),अनुयायांना दिलेल्या त्रास,आतोनात छळ, वेदनाला,खुनी संघर्ष,या छळाचा बदला घेण्यासाठी आलेत असे वाटत होते, कदाचित फाशी देतील,आज बदल्याचा दिवस असणार ई. प्रत्येक लहान - मोठे अक्षरशः ‌धास्तावले होते ,हा विचार विरोधी लोकांना येणं साहाजिकच होते कारणंही तसेच होते,प्रेषित आणि त्यांचे अनुयायी (सहाबा रजि.) कितीही शांत, न्याय करणारे ‌असले तरी विरोधकांच्या मनात असा विचार येणे तसे स्वभाविकच होते,कारण विरोधकांकडून त्यांना तेवढा आतोनात त्रासच ‌दिला गेला होता, कोणत्याही सद्गृहस्थाने त्याना कधीच केव्हाही कोणत्याही परिस्थितीत माफ केलेच नसते व ते माफीचे लायकही नव्हतेच.


असं म्हणतात की "ज्यांच्या जवळ शक्ति,ताकत,सैनिक असूनही जो समोरच्या कट्टर शत्रुंना शरण देतो,माफी देतो,क्षमा करतो तो मनुष्य सर्वाधिक श्रेष्ठ असतो"

                    एका घटनेचा प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो,उहुदच्या प्रसिद्ध लढाईमधे प्रेषित मुहम्मद स्व. यांच्यावर अत्यंत ह्रदयाने प्रेम करणारे त्यांचे चुलते हजरत हमजा रजि.हे लढाईत शहीद (हुतात्म्या) झाले,विरोधी  प्रमुख सरदार अबु सुफीयान याची पत्नी 'हिंदा"ही पैगंबरांबद्दल वैरभाव बाळगत होती,याच वैरभावापोटी "हिंदा" हिने हजरत हमजा रजि. यांचे काळीज फाडून बाहेर काढुन चावुन खाल्ले,  नाका-कानांचा हार करुन गळ्यात घालण्याचे क्रौर्य केले,  पैगंबरांच्या मक्का विजय प्राप्त केल्यावर "हिंदा" हिने आपली ओळख  न पटावी यासाठी आपल्या चेहऱ्यावर पडदा टाकला होता,  तरी ती सार्वजनिक क्षमादानात  जीव वाचवण्यासाठी  सामील झाली. परंतु पैगंबरांनी तिला ओळखळे  , काका हज. हमजा रजि. यांच्या हत्यासंदर्भाचा मुळीच उल्लेख न करता , मोठ्या मनाने क्रुर हिंदा ,ही क्षमा दिली ,. 

" हिंदा, जा ,  आज,  तुला सुध्दा माफी" 


त्यांचे रक्ताचे वैरी आशा सर्व दुश्मनांना  प्रेषित मुहम्मद स्व. यांच्याजवळ आज सर्व लष्करी ताकत,सत्ता असताना,  ते काहीही करू शकले असते,  परंतु त्यांनी एका झटक्यात उदारमनाने,उदराता दाखवून त्या अल्लाहा  (ईश्वरा) च्या शांतीदुताने  कधीच घडले नव्हते असं , न्यायदानाचे,क्षमाशीलतेचे जगात एकमेव उदाहरण  क्षमा,माफी. अमन,(शांती) दिली,

मक्केच्या पवित्र खाना -ए- काबागृहाच्या जवळच घोषणा दिली गेली की , ""  कोणावरही सुड उगविण्यात येणार नाही . ,

 जुलम करण्यात येणार नाहीत . ,

       कोणाचाही कत्ल (हत्या - खुन) करण्यात येणार नाही,

               कोणाचाही बदला घेण्यात येणार नाही .,

          जे आपआपल्या घरात आहेत,    त्या सर्वांना माफी, अमन देण्यात आले आहेत .,

            जे तलवार उचलणार नाही,त्या सर्वांना माफी अमन,सर्व लोकांना, नागरिकांना माफी देण्यात येत आहे. ,

                मात्र विरोधकांना वाटले की असे कसे घडत आहे ???   आपण केलेल्या कृत्याची शिक्षा ही तर फक्त फाशीच होती .,

मग हे ..फक्त माफी ? ..हे शब्द ऐकून कसं वाटलं असेलं त्यांना.

परंतु प्रेषित मुहम्मद स्व . यांनी हे करून दाखवले..


तो दिवस ‌२१ रमजानुल मुबारक.०८  हिजरी. .

आज  २१ रमजान .१४४३ हिजरी आहेत..

  प्रेषित मुहम्मद स्व.म्हणतात की,"'  ज्यांच्या जवळ शक्ति असूनही , जो बदल्याची भावना जोपासत नाही, सर्वांना माफ करतो,क्षमाशील असतो तोच माझ्या जवळ आणि मला प्रिय असतो तथा तोच सर्वात मोठाही असतो,कारण तो मोठ्या मनाचा असतो, अल्लाहाला (ईश्वराला) माफ (क्षमा) करणारे लोकं पसंद ((प्रिय) आहेत."लेखक - डॉ.सलीम सिकंदर शेख बैतुशशिफा हॉस्पिटल,श्रीरामपूर.९२७१६४००१४ 


#@#स @ @ ली@म@

अहमदनगर- दर्शनाला जाणारे भाविकांना आडवून जबरी चोरी करणारे दोन आरोपींना मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. सचिन गोपिनाथ चव्हाण ( वय २३, रा. चोभा निमगांव, ता. आष्टी, जि. बीड), रघुनाथ बर्डे ( रा. चोभानिमगांव) असे पकडण्यात आलेल्याची नावे आहेत.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सपोनि दिनकर मुंडे, पोसई सोपान गोरे, पोहेकॉ फकिर शेख, देवेंद्र शेलार, पोना विशाल दळवी, विजय ठोंबरे, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकाॅ आकाश काळे व चापोहेकॉ चंद्रकांत कुसळकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. २८ जानेवारी २०२२ रोजी देवदर्शनासाठी जात असतांना अज्ञात दोघे दुचाकीवर येऊन वाहन आडवून, शिवीगाळ व मारहाण करुन खिशातील विवो कंपनीचा मोबाईल व रोख असा एकूण १७ हजार ४०० रु.किं. चा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला आहे. या आदित्य अविनाश आळेकर (रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, बु-हानगर, ता. नगर) यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६२/२०२२ भावविक ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाक गुन्ह्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांना दुचाकी आडवून जबरी चोरी करणारे गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमून तपासबाबत आदेश दिले. या आदेशान्वये पोनि श्री. कटके यांनी विशेष पथकाची नेमणूक करुन रवाना केले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि शिशीरकुमार देशमुख व पोलीस स्टाफ यांचेसह पेट्रोलिंग फिरुन दुचाकी आडवून जबरी चोरी करणारे आरोपींची माहिती घेत असतांना पोनि श्री.कटके यांना माहिती मिळाली की, गुन्हा हा आरोपी सचिन चव्हाण ( रा. चोभानिमगांव, ता. आष्टी, जि.बीड ) याने त्याचे साथीदारासह केला असून तो निंबोडी, ता. आष्टी,( जि.बीड) येथे मिळून येईल अशी माहिती मिळाली. पोनि श्री. कटके यांनी मिळालेली माहिती पथकाला दिली. पथकाने निंबोडी (ता. आष्टी, जि. बीड) येथे जाऊन आरोपीचे ठावठिकाणा बाबत माहिती घेऊन आरोपी सचिन चव्हाण यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सचिन गोपिनाथ चव्हाण, (वय २३ रा. चोभा निमगांव, ता. आष्टी, जि. बीड) असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे गुन्ह्याबाबत चौकशी करता सुरुवातीस तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्याला पोलिस खाक्या दाखविताच त्याने गुन्हा हा त्याचा गांवातील साथीदार रघुनाथ बर्डे ( रा. चोभानिमगांव) अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. या माहितीनुसार आरोपी रघुनाथ बर्डे याचा राहते घरी जाऊन शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास भिंगार कॅम्प ठाण्यात स्टेशन गु.र.नं. ९६२/२०२२ भादविक ३९२, ३४ या गुन्ह्यात वापरलेली आरोपींनी वापरलेली दुचाकी, चोरीस गेलेला विवो कंपनीचा मोबाईल व रोख असा एकुण ३७ हजार ५०० रु. किचे मुडेमालासह ताब्यात घेऊनन भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात येथे हजर केले आहे. पुढील कारवाई भिंगार कॅम्प पोलीस करीत आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी )-मागील कोरोनाचा कार्यकाळ आपण सर्व जण लवकरच विसरलो अन धर्म भोंगा मंदिर मस्जिद या विषयावर भांडू लागलो आपला मनुष्य जातीचा मूळ गुणधर्म मानवता आहे हे आपण विसरत चाललो असल्याची खंत उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी शांतता समीतीच्या बैठकीत व्यक्त केली.बेलापुर येथे शांतता समीतीची बैठक बोलविण्यात आली होती त्या वेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके म्हणाले की समाजात सोळा सतरा धर्म आहे हे सर्व धर्म मानवतेचीच शिकवण देतात कुठलाही धर्म दुसऱ्या धर्मासाठी मारक नाही हे सत्य असताना काही असामाजिक तत्व अफवा पसरवुन शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात त्याकरीता आपण जागृक राहीले पाहीजे असे काही आढळल्यास आमच्या निदर्शनास आणून द्या त्यांचा तात्काळ बंदोबस्त करु बेलापुर गावाची लोकसंख्या मोठी असली तरी सर्व नागरीक जागृक असल्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमीच आहे बेलापुर गावाचे नाव कुठेही संवेदनशील म्हणून नोंदले गेलेले नाही काही स्वार्थी लोक आपली पोळी भाजुन घेण्यासाठी एखादा विषय सतत पेटता ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांचा बंदोबस्त केला जाईल व्हाटस्अप वर चुकीची पोस्ट टाकणारावर कठोर कारवाई केली जाईल विना पोलीस बंदोबस्तात मिरवणूक काढण्याची परंपरा गावाने चालू ठेवुन एक नवा पायंडा सुरु करावा असे अवाहनही मिटके यांनी केले पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी गावातील प्रमुखांची कमीटी स्थापन करण्याची सूचना केली  या वेळी सर्व ग्रामस्थांनी गावाचा विषय गाव पातळीवरच मिटविण्याचा निर्णय घेतला,कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल मुथा यांनी  केले. या वेळी जि. प. सदस्य शरद नवले पंचायत समीती सदस्य अरुण पा नाईक,पञकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे ,सचिव देविदास देसाई, उपसरपंच अभिषेक खंडागळे बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, भाजपाचे प्रफुल्ल डावरे,माजी सरपंच भरत साळुंके, अकबर टीन मेकरवाले, हाजी ईस्माईल शेख,मोहसीन सय्यद आदिंनी मनोगत व्यक्त केले.पोलिस काँन्स्टेबल रामेश्वर ढोकणे यांनी आभार मानले.                        सदरप्रसंगी तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे,अशोक पवार,अशोक गवते,अजयभाऊ डाकले,बाळासाहेब दाणी,आलम शेख,व्यापारी असोसिएशनचे प्रशांत लढ्ढा,पञकार दिलिप दायमा,किशोर कदम,शफीक आतार तसेच हेड काँन्स्टेबल अतुल लोटके,काँन्स्टेबल भिंगारदिवे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

क्रीडा प्रतिनिधी गौरव डेंगळे-भुवनेश्वर (ओडिशा) : व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया (VFI) ने आगामी १४ व्या  यू १८ मुलीच्या आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी  २० जणांचा संभाव्य संघ जाहीर केला आहे.या संघामध्ये नेवासा येथील त्रिमूर्ती महाविद्यालयाची कु रक्षा खेनवार व पुण्याच्या डेक्कन जिमखानाची कु वेदिका शिंदे यांची संभाव्य भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.कु वेदिका हि भारतीय महिला व्हॉलीबॉलचे नामांकित प्रशिक्षक श्री देविदास

जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन जिमखाना,पुणे येथे प्रशिक्षण घेते तर रक्षा ही ज्ञानेश्वर महाविद्यालय संचालित श्री यशवंत स्पोर्ट्स क्लब,नेवासा येथे राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक श्री पापा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.कु रक्षाचे शालेय शिक्षण वर्धा जिल्ह्यातील कारंजा या गावी झाले व पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी नेवासा येथे प्रवेश घेतला.

६ ते १३ जुन या कालावधीत थायलंड मध्ये स्पर्धा होणार आहे. दि २१ व २२ एप्रिल रोजी भुवनेश्वर,ओडिशातील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी (KIIT) विद्यापीठात निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. या निवड चाचणीतून संभाव्य २० सदस्य भारतीय संघाची निवड करण्यात आली. निवड झालेले

खेळाडू दि २३ एप्रिल ते ४ जुन दरम्यान संघाचे सराव शिबिरामध्ये सहभागी होईल. निवड झालेल्या कु रक्षाचे महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री प्रतीक जयंत पाटील, सचिव श्री विरल शहा तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

अहमदनगर प्रतिनिधी - वाढत्या उन्हाची तीव्रता व कोरोना काळानंतर उद्योग जगताकडून वाढलेली वीजमागणी यामुळे महावितरणची सध्याची उच्चतम मागणी नोंदवली गेली आहे. मात्र कोळशाची कमतरता यामुळे वीज निर्मितीत घट झालेली असून आपत्कालीन भारनियमन करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर अतिभारीत वीज वाहिन्यांवरील रोहित्रांकडे विशेष लक्ष देऊन त्या रोहीत्राची क्षमता व त्याच्यावरील वीजभार तपासण्याची मोहीम राज्यभर राबविण्यात येत आहे. यानुसार आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांविरुद्ध अहमदनगर मंडलात धडक मोहीम हाती घेतली असून, २१ व २२ एप्रिल या दोन दिवसांत २ हजार ४०५ आकडे काढून त्यांच्या केबल जप्त करण्याचे काम केले आहे. तसेच २३९ वीज चोराविरुद्ध कारवाई केली आहे. या प्रयत्नांमुळे दोन दिवसात सदर वीज वाहिन्यांवरील ताण कमी होऊन वीजभार हलका होण्यास मदत झाली आहे. या मोहीमेमध्ये कारवाई करताना ज्या ११ केव्ही वाहिन्यांचा करंट १०० एम्पिअरच्या पुढे असलेल्या विद्युत वाहिन्या अहमदनगर मंडळात आहेत त्यांना लक्ष्य करुन गुरुवारी व शुक्रवारी सकाळपासूनच धडक मोहीम हाती घेतली होती. यामध्ये अनाधिकृतपणे कृषीपंपाला जोडलेले केबल आदी जप्त केले आहेत . घरगुती व इतर ग्राहकांचे आकडे सुद्धा यावेळी काढण्यात आले आहेत. नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर मंडळाचे अधिक्षक अभियंता सुनील काकडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकारी अभियंते यांचेसह विविध पथकामध्ये अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्र यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.ही कारवाई अशीच सुरु राहणार आहे. यामध्ये अहमदनगर मंडळातील अनधिकृतपणे वीज तारांवर आकडे अथवा हुक टाकणाऱ्या विरुद्ध कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये संगमनेर विभागात हुक टाकणाऱ्या ८९८ कृषी तर १२९ इतर वर्गवारीचे ग्राहक असून वीजचोरी करणारे ५ कृषी व ५१ इतर ग्राहकांचा समावेश आहे. श्रीरामपूर विभागात हुक टाकणाऱ्या ३५३ कृषी तर ३७ इतर ग्राहक असून वीजचोरी करणारे ४ इतर ग्राहकांचा समावेश आहे. अहमदनगर शहर विभागात हुक टाकणाऱ्या ३१४कृषी तर १२२ इतर ग्राहक असून वीजचोरी करणारे ४० कृषी व५२इतर ग्राहकांचा समावेश आहे. अहमदनगर ग्रामीण विभागात हुक टाकणाऱ्या १७१ कृषी तर १०५ इतर ग्राहक असून वीजचोरी करणारे ८२इतर ग्राहकांचा समावेश आहे. कर्जत विभागात हुक टाकणाऱ्या२२२ कृषी तर ५४इतर ग्राहक असून वीजचोरी करणारे ५ इतर ग्राहकांचा समावेश आहे. असे एकूण अहमदनगर मंडळात हुक टाकणाऱ्या कृषी ग्राहकांमध्ये १९५८ तर ४४७ इतर ग्राहक असून वीजचोरी करणारे ५२ कृषी व १८७ इतर असून अशाप्रकारे यामोहिमेत एकूण २ हजार ६४४ अनधिकृत जोडण्या काढण्यात आलेल्या आहेत.तापमानात जशी वाढ होईल तशी राज्याची विजेची मागणी वाढत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यापासून मागणीमध्ये वाढच होत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही महावितरण कसोशीने प्रयत्न करत आहे. खुल्या बाजारात विजेचे दर प्रचंड महागडे आहेत. ही महागडी वीज घ्यायची तर त्याचा बोजा पुन्हा ग्राहकांवर येणार. ती कमीत कमी घेता यावी याकरिता यंत्रणेवरील अनाधिकृत भार कमी करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.मुख्यालय पातळीवरून सर्व वीजवाहिन्याचा आढावा घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने अतिभारीत असलेल्या वीज वाहिन्यांची माहिती क्षेत्रीय स्तरावरील संबंधित अधीकाऱ्यांकडे पाठवली आहे. रोहीत्रांवरील अतिरिक्त भार कमी न झाल्यास सबंधितांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या मोहीमेमुळे वीज यंत्रणेवरील ताण कमी होणार आहे. तसेच या मोहीमेमुळे अनावश्यकपणे वाढणारी विजेची मागणी देखील कमी होण्यास मदत होणार आहे . तरी ग्राहकांनी वीजचोरी, अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

नेवासा (प्रतिनिधी)राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे पी.ए.  राहुल राजळे यांच्यावर काही अज्ञात गुंडांनी लोहगाव येथे जीवघेणा हल्ला केला. यावेळी ३ ते ४ अज्ञातांनी गोळीबार केला.राजळे यांच्यावर ५ गोळ्या झाडण्यात आल्याचे समजते. घटना काल शुक्रवारी रात्री सव्वा नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.राजळे एका यात्रेतून आपल्या घरी परतत असताना आधीच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी डाव साधला. त्यांच्यावर ५ फायर झाले, त्यापैकी २ गोळ्या त्यांना लागल्या.घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.राहुल राजळे यांना तातडीने उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले. रात्री १२ च्या सुमारास त्यांच्यावर तातडीने शत्रक्रिया करण्यात आली.हल्ल्याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी रात्री परिसराची नाकाबंदी केली होती. हल्लेखोरांचा कसून शोध सुरू होता. हल्लेखोर सराईत आणि परिसरातील असावेत असा कयास आहे.दरम्यान मंत्र्यांच्या स्वीय सहायकावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. राहुल राजळे यांचा काही वर्षांपासून गडाख परिवारासोबत आहेत. सध्या ते मंत्री शंकरराव गडाख यांचे पीए म्हणून काम पाहत आहेत.

श्रीरामपूर प्रतिनिधी- श्रीरामपूर शहरातील नॉर्दन ब्रांच पुनम हॉटेल महादेवाच्या मंदिराजवळ राहत असणारी 70 ते 80 वयाची वयोवृद्ध महिला ज्यांना डोळ्याने दिसण्यास कमी असल्याकारणाने रात्री पाटाच्या कडेने जात असताना पाय सटकून पाण्यात पडल्याने पाण्याच्या प्रवाहने वाहून जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी च्या पाण्याच्या पाईप लाईन ला धरून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करून टाकल्यानंतर जिवंत राहण्याची आशा सोडली होती अशातच श्रीरामपूर शहरातील कर्तव्यदक्ष पोलीस आपली ड्युटी बजावत असताना श्रीरामपूर कडून टिळक नगर कडे रात्री 02:30 ते 02:45 या सुमारास जात असताना गाडीचा पोलीस सायरन

वाजवला आणि त्या ठिकाणी सायरन चा आवाज ऐकून या वृद्ध महिलेने जीव वाचवण्याकरता मदत करा म्हणून आवाज लावला थोडावेळ काहीतरी आवाज आला म्हणून पोलिस सायरन बंद करून या कर्तव्यदक्ष पोलीस दादा यांनी सायरन बंद करून पुन्हा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला आणि तो आवाज पाटावरील पुलाच्या बाजून येत असल्याचा अंदाज घेत त्यांनी रात्रीच्या वेळी अंधारात मोबाइल टॉर्च मारून पाहिलं तर एक वयोवृद्ध महिला आपला जीव वाचण्याकरिता आवाज देत आहे आणि पाण्याचा प्रवाह त्या आजीला आत मध्ये वढण्याचा प्रयत्न करत आहे हे दृश्य पाहून कुठल्याही क्षणाच विलंब न करता या  पो. कॉ.सातकर, पो.कॉ.गावडे ,पो.कॉ.राशीनकर, पो.कॉ.पानसंबळ कर्तव्यदक्ष पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून त्वरित आजीला वाचण्याचा प्रयत्न सुरू केला यामध्ये वीस पंचवीस मिनिटे प्रयत्न करून या आजिला वाचवण्यात आमच्या कर्तव्यदक्ष श्रीरामपूर पोलीस यांना यश आले आणि त्यांनी आजीची चौकशी करत त्यांना अगदी सुखरूप त्यांच्या घरी पोचवले अशा कर्तव्यदक्ष अधिकारी आणि पोलिसांचा नागरिकातून कौतुक होत आहे आणि या आजीने तर जिवंत राहण्याची आस सोडली होती पण ज्याला देव तारी त्याला कोण मारी आणि या म्हणीप्रमाणे या पोलिसांनी या आजीला जीवदान दिले बिनदास न्यूज टीमचा सलाम या  कर्तव्यदक्ष पोलिसांना. 

श्रीरामपूर प्रतिनिधी -दिनांक 17 एप्रिल 2022 रोजी मुंबई येथे झालेल्या 10 th invitational national level martial arts championship स्पर्धेत श्रीरामपूर शहरातील ग्लोबल मार्शल आर्ट असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष मास्टर कलीम बिनसाद यांच्या मार्गदर्शनाखाली 42 विद्यार्थी या नॅशनल लेवल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी मुंबई या ठिकाणी रवाना झाले होते या स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांनी हजेरी लावली यामध्ये कलिम बिनसाद यांना 5 th dan black belt डिग्री सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आलं त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी शुभम राऊत 2nd dan black belt डिग्री सर्टिफिकेट व किरण वाघ 2nd dan black belt डिग्री सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे ग्लोबल मार्शल आर्ट चे विद्यार्थ्यांनी हजारो मुलांमधून सुवर्णपदके व रौप्य पदके बाजी मारून ग्लोबल मार्शल आर्ट श्रीरामपूर चे नाव उंचावत नॅशनल लेव्हल चे सेकंड प्राईस ट्रॉफी मिळविली सर्वच मुलांनी

सुवर्ण व रौप्य पदक मिळवलेली आहे तसेच सप्टेंबर 2022 मध्ये थायलंडला होणाऱ्या international level world martial arts championship मध्ये या सर्व टिम ची निवड झाली आहे सप्टेंबर 2022 ला ही टिम थायलंड ला स्पर्धे साठी रवाना होईल या कार्यक्रमाचं आपल्या श्रीरामपूर शहरातील मिनी स्टेडियम याठिकाणी मुलांना मोटीवेट करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक मा.स्वाती भोर मँडम , तलाठी भाऊसाहेब राजेश घोरपडे ,अर्थो स्पेशलिस्ट डॉ.मयूर कापसे,महाराष्ट्र लघु वृत्त पत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली, इलेक्ट्रोनिक मिडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित माननीय अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम यांच्या हस्ते मुलांना मेडल सर्टिफिकेट तसेच थायलँड याठिकाणी जाण्यासाठी मुलांची नियुक्तीचे लेटर या ठिकाणी देण्यात आले याप्रसंगी अप्पर पोलीस

अधीक्षक स्वाती भोर मॅडम यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या तसेच आजच्या या जगात सध्याच्या वातावरणात गरजेच महाराष्ट्र पोलीस महिलांच्या स्वरक्षणावर जास्तीत जास्त लक्ष देऊन आहे याकरिता महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने आम्ही मार्गदर्शन व प्रशिक्षण हे मोफत कॉलेजमध्ये शाळांमध्ये महिला गटांमध्ये कायम करत असतो मात्र आज या ठिकाणी मुलींची संख्या पाहता त्यातच अगदी सात ते आठ वर्षांच्या मुली देखील या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत त्यांच्या या स्ट्रेचिंग योगा फाईट आणि स्वसंरक्षणाची कला पाहून मी दंग झाले इतक्‍या कमी वयात आपण इतके काही केले हे सोपे नाही आणि मी त्या पालकांचे कौतुक करेल ज्यांनी आपल्या मुलांना व मुलींना या खेळासाठी अकॅडमीत पाठवले तसेच मास्टर कलीम बिनसाद त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले प्रशिक्षक या मुलांना मिळाले आणि खूप कमी वेळात ज्या मुलाने तिथे गोल्ड मेडल व थायलँड ला जाण्याची संधी मिळवली त्याबद्दल मास्टर कलीम बिनसाद यांचे कौतुक करत मुलांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे तलाठी भाऊसाहेब यांनी यापूर्वी देखील मुलांनी राज्यस्तरीय स्पर्धेत देखील चांगल्या प्रमाणात गोल्ड मेडल आणले होते असे हे ग्लोबल मार्शल आर्ट चे विद्यार्थी कायमच अशी मेडल मिळवतात आपल्या कार्यालयाच्या शेजारी या मुलांचे प्रशिक्षण पाहून मला खूप आनंद होतो आणि मी मनापासून या मुलांना शुभेच्छा देतो मास्टर कलीम बिनसाद हे अगदी चिकाटीने या मुलांना प्रशिक्षण देतात हे मी कायम पाहत असतो असे बोलून या ठिकाणी मुलांना पाठवणाऱ्या पालकांचे देखील त्यांनी कौतुकच केले

त्याचप्रमाणे शेख बरकत आली यांनी ज्या मुलांनी मुंबई या ठिकाणी जाऊन गोल्ड मेडल तसेच थायलंड याठिकाणी होणाऱ्या इंटरनॅशनल स्पर्धेत खेळण्यासाठी मुलांना पाठवावे व ते मुलं आपल्या शहराचे व आपल्या देशाचे नाव देश-विदेशात मोठे करतील यासाठी आपण देखील प्रयत्न करणार असल्याचे व काही अडचण आल्यास आम्ही खंबीर उभे राहू असे त्यांनी यावेळेस मुलांचे कौतुक करतानी व शुभेच्छा देताना बोलले या वेळी विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडव्होकेट अजित डोखे यांनी केले तर आलेल्या पाहुण्यांचे आभार ललित ताथेड यांनी मानले. 

 

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget