February 2022

बेलापुर  (प्रतिनिधी  )-शेतकऱ्याची कामधेनु असलेल्या बेलापुर सेवा संस्थेत सत्ताधाऱ्यांनी गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात ५० लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला असुन ही कामधेनु वाचविण्यासाठी गांवकरी मंडळाच्या तेरा उमेद़्वारांना विजयी करा असे अवाहन गांवकरी मंडळाचे मार्गदर्शक जि प सदस्य शरद नवले यांनी केले आहे. बेलापुर सेवा सोसायटीची निवडणूक ६ मार्च रोजी होत असुन गांवकरी मंडळाच्या प्रचाराचा शुभारंभ श्री हरिहर केशव गोविंद भगवान मंदिर येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रफीक शेख हे होते या वेळी बोलताना जि प सदस्य शरद नवले म्हणाले की सत्ताधाऱ्यांनी गेल्या दहा वर्षात मन मानेल तसा कारभार केला जे संचालक स्वतःला सूज्ञ समजुन घेत होते ते देखील चुकीच्या कामाला विरोध करु शकले नाही अनेक चुकीची बिले काढली मग या सूज्ञ म्हणविणारांनी विरोध करण्याचे सोडून मूक संमती दिली त्यामागील कारण शोधणे गरजेचे आहे या संस्थेच अनेकांचे मोलाचे योगदान असुन त्याचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला आहे कोर्ट केसच्या ,वकील फी च्या नावाखाली बोगस बीले काढली पेट्रोल पंपात वर्षाला सहा हजार लिटरची घट दाखवून पाच लाख रुपयाचे पेट्रोल डिझेल संचालकांनी उधार नेले त्याचे व्याज संस्थेला भरावे लागले अन उधारीवर नेलेले पेट्रोल डिझेल उधारीवर दाखविले हे दुर्दैव आहे पेट्रोल पंपाची केबीन बांधली त्याचे बजेट अचानक दुप्पट कसे झाले  तालुक्यात सर्वात मोठी व उत्पन्नाचे साधन असणारी एकमेव सोसायटी असताना तीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करुन घेतला ज्याचा संबध नाही अशांनी ग्रामपंचायत  अन सोसायटीही  लुटली.अशा लुटारुंना धडा शिकविण्याची वेळ आली आहे संस्थेचा लुटलेला पैसा वसुल करण्याची जबाबदारी आमची आहे त्या करीता गांवकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता द्या अन संस्थेचे वाटोळे करु पहाणारांना धडा शिकवा असे अवाहनही नवले यांनी केले या वेळी बोलताना उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की अशोक कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या सर्व बैठका याच ईमारतीत झालेल्या असुन अनेक घटनांची साक्षीदार असलेल्या या संस्थेचे अधःपतन करण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे सभासदांना रोख स्वरुपात लाभांश देण्याचे टाळून वस्तू स्वरुपात भेट दिली त्याचे कारण खरेदीत केलेला भ्रष्टाचार होय संस्थेच्या सलग्न असणारे व्यवसाय बंद पाडण्याचे महापाप या सत्ताधाऱ्यांनी केले आहे .यांच्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे आमच्या हाती असुन ते सर्व सभासदासमोर मांडणार आहोत आमच्याकडे सर्व नैतिकता असणारे उमेद़्वार आहेत आम्ही ग्रामपंचायतीमध्ये ज्या पध्दतीने कारभार केला तसाच स्वच्छ भ्रष्टाचार विरहीत काम सेवा संस्थेत करणार आहोत त्या करीता गांवकरी मंडळाच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे अवाहन खंडागळे यांनी केले या वेळी सरपंच महेंद्र साळवी रणजित श्रीगोड जालींदर कुऱ्हे सुवालाल लुक्कड,विलास कु-हे,शरद देशपांडे प्रफुल्ल डावरे बाळासाहेब वाबळे आदिंनी मनोगत व्यक्त केले.यावेळी नामदेव बोंबले,विलास कु-हे यांनी गावकरी मंडळात प्रवेश केला. यावेळी सुधाकर खंडागळे,मिस्टर शेलार,सुरेश बाबुराव कु-हे,नामदेव बोंबले,द्वारकानाथ नवले,गोविंद खरमाळे,भरतलाल सोमाणी,पुरुषोत्तम भराटे,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले,मुस्ताक शेख,प्रभात कु-हे,शफीक बागवान,शरद अंबादास नवले,अशोक शिरसाठ,राजेंद्र सोनवणे,चंद्रकांत लबडे,अमोल पांडगळे, सुभाष खंडागळे,रावसाहेब गाढे,राजेंद्र नवले,श्रीहरी बारहाते,संजय शिंदे,अनिल नवले,संजय नवले,बबन मेहेत्रे,तस्वर बागवान,अजीज शेख,रमेश नवले,चांगदेव वाबळे,दादासाहेब कुताळ, सुखदेव जेजुरकर,प्रदीप नवले,रमेश वाबळे,प्रदीप कापसे,सोपान वाबळे,बन्सी तागड,अनिल वाबळे,बापू कु-हे,भगवान तागड,लक्ष्मण वाबळे,प्रभाकर खंडागळे,राम सोनवणे,दिपक खंडागळे, शाम सोनवणे,अरविंद साळवी,महेश कु-हे,जिना शेख,सोमनाथ शिरसाठ,बाळासाहेब खंडागळे, अनिल कु-हे,भाऊराव दाभाडे,अशोक नेहे,सुधाकर रावसाहेब खंडागळे, प्रल्हाद अमोलिक, शशिकांत तेलोरे,दिलिप अमोलिक, ज्ञानेश्वर वाबळे,गोपी दाणी,बाळासाहेब शेलार,मंगेश नजन,बाबुराव पवार,सचिन मेहेत्रे, दिपक पांडागळे आदी उपस्थित होते.



बेलापुर  (प्रतिनिधी )- श्री  हरिहर भजनी मंडळ उक्कलगाव व उक्कलगाव ग्रामस्थांच्या वतीने उक्कलगाव तालुका श्रीरामपुर येथे दिनांक २१ फेब्रुवारी पासुन श्री हरिहर केशव गोविंद भगवान मंदिर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते त्या सप्ताहाची सांगता सोमवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी ह .भ .प. महंत उध्दव महाराज मंडलीक यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार असुन या कार्यक्रमास पाच हजार भाविक उपस्थित राहणार असल्याचा आयोजकांचा अंदाज आहे   

   .                                    हरिहर भजनी मंडळ श्री हरिहर केशव गोविंद भगवान श्री क्षेत्र उक्कलगाव व उक्कलगाव ग्रामस्थांच्या वतीने सोमवार दिनांक २१ फेब्रुवारी पासुन श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते दररोज पहाटे ५ ते ६.३० काकडा भजन  सकाळी ६.३० ते ७.०० वाजेपर्यंत आरती सकाळी ८ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण दुपारी १२ ते १.०० वाचकासाठी भोजन सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ सायंकाळी ७ ते ९ हरिकिर्तन अशा प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रविवारी सकाळी ११ वाजता श्री ग्रंथराज मिरवणूक संपन्न झाली या मिरवणूकीत महीला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते  सप्ताह कालावधीत ह भ प भागवताचार्य नवनाथ महाराज म्हस्के ,ह भ प संगीत विशारद अमोल महाराज बडाख ह भ प भागवताचार्य मनोहर सिनारे महाराज ह भ प सचिन पवार महाराज ह भ प किशोर जाधव महाराज ह भ प मच्छिंद्र

महाराज निकम व ह भ प बाळासाहेब रंजाळे महाराज यांनी किर्तनरुपी सेवा दिली .सोमवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी या सप्ताहची सांगता महंत उध्दव महाराज मंडलीक यांच्या काल्याच्या किर्तनाने सकाळी १० ते २ या वेळेत होणार आहे                        गेल्या सात दिवसापासून उक्कलगावातील वातावरण भक्तीमय होवुन गेले आहे दररोज होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमात उक्कलगाव व परिसरातील नागरीक विशेष करुन महीलांची उपस्थिती लक्षणीय होती .काल्याच्या किर्तनानंतर होणाऱ्या महाप्रसादाचे सप्ताह कमीटीने उत्कृष्ट असे नियोजन केले आहे  माजी सभापती इंद्रनाथ पा थोरात अशोक कारखान्याचे माजी चेअरमन रावसाहेब पा थोरात व माजी सभापती आबासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे व्यासापीठ चालक म्हणून ह.भ.प.उल्हास महाराज तांबे ,ह.भ.प.बाबासाहेब ससाणे महाराज ह.भ.प,नामदेव काका मोरे व रविंद्र मुठे यांनी सेवा दिली . सोमवारी होणाऱ्या  काल्याच्या किर्तनास पंचक्रोशितील  पाच हजार भाविक उपस्थित राहणार असल्याचा आयोजकांचा अंदाज असुन त्या दृष्टीने पाच पोत्याची बुंदी मसाला भात हरबऱ्याची घुगरी अशा प्रकारे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असुन दररोज तीन ते साडेतीन हजार भावीकांची उपस्थिती कार्यक्रमास राहत होती सन २०१३ ला अशा प्रकारे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या नंतर ९ वर्षांनी सन २०२२ मध्ये अशा प्रकारे भव्य अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन हरिहर भजनी मंडळाने केल्यामुळे उक्कलगाव व परिसरातुन भाविकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असल्याचे आयोजकाचा म्हणणे असुन आता यापुढे दर वर्षा अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित करण्याचा आयोजकांचा मानस आहे विशेष म्हणजे मंदिर परिसरात राहणारे जगदीश कुलकर्णी व त्यांच्या परिवाराने अपली जागा मंदिरास दान दिल्यामुळे श्री  हरिहर केशव गोविंद भगवान मंदिराचा परिसर मोकळा झाला असुन ग्रामस्थांनी कुलकर्णी परिवारास धन्यवाद दिले आहे

बेलापुर  (देविदास देसाई   )-तालुक्यात सर्वात मोठी सहकारी सोसायटी समजल्या जाणाऱ्या बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक ६ मार्च रोजी होत असुन १३ जागेकरीता तीन पँनल मधुन ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत                   बेलापुर सेवा संस्थेची १३ जागेकरीता  ६ मार्च रोजी निवडणूक होत असुन तीन पँनलमधुन एकुण ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत जि प सदस्य शरद नवले व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांचा गांवकरी मंडळ तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक ,बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले व जनता अघाडीचे रविंद्र खटोड यांचा शेतकरी जनता विकास अघाडी तसेच शिवसेना पुरस्कृत प्रकाश मेहेत्रे यांचा तिसरा पँनल निवडणूक लढवत असुन त्याच्या पँनलमध्ये केवळ आठच उमेदवार आहेत                                  गांवकरी मंडळाचे उमेदवार पुढील प्रमाणे नवले प्रकाश बाबुराव ,कुऱ्हे प्रभाकर गोवींद , कुताळ भाऊसाहेब हनुमंत ,कुऱ्हे गोरक्ष बाबुराव ,वाबळे रामदास किसन , कुऱ्हे मच्छिंद्र बंडेराव ,बोंबले सुरेश यशवंत , मेहेत्रे शाम रामभाऊ ,नवले शशिकांत कारभारी  ,अमोलीक रावसाहेब शंकर , राशिनकर सुभाष खंडेराव ,वाबळे कविता साहेबराव , खंडागळे भाग्यश्री भास्कर ,                   शेतकरी जनता विकास अघाडीचे उमेदवार पुढील प्रमाणे  नाईक अरुण गुलाबराव , मेहेत्रे विलास गंगाधर ,पवार शेषराव भानुदास ,नवले नंदकिशोर शंकरराव ,नवले सुधीर वेणूनाथ ,बोंबले पंडीतराव यशवंतराव कुऱ्हे अशोक भास्कर , सातभाई राजेंद्र कचरु , वाबळे शिवाजी रामनाथ ,अमोलीक अंतोन विठ्ठल ,गवते विश्वनाथ पाराजी ,मेहेत्रे सविता तुकाराम ,शेळके ईंदुमती जयराम                                       शिवसेना पुरस्कृत उमेदवार  मेहेत्रे प्रकाश चांगदेव ,खंडागळे  सारंगधर गंगाधर ,शेळके दादासाहेब रावसाहेब ,बंगाळ गणेश बाबुराव , दुधाळ संजय रामभाऊ ,गायकवाड चंद्रकांत हरीभाऊ , मेहेत्रे राणी प्रकाश ,अमोलीक शांतवन विठ्ठल  अशा प्रकारे उमेदवार निवडणूक रिंगणात असुन शिवसेना पुरस्कृत स्वतंत्र पँनल या निवडणूकीत उभा असून त्यांचे आठच उमेदवार आहेत हे आठ उमेदवार कुणाचा घाट घालतात किंवा कुणाचा घात करतात हे काळ अन वेळच ठरवेल . शेतकरी  जनता विकास अघाडीने विजयाचा दावा केला असुन मागील पाच वर्षात केलेल्या कामाची पावती घेवुन ते सभासदा समोर जाणार आहे आपल्या काळात योग्य कारभार केल्यामुळे आताही सत्ता आमच्या ताब्यात येईल असा दावा शेतकरी जनता विकास अघाडीच्या वतीने करण्यात आला आहे तर गांवकरी मंडळानेही विजयाचा दावा केलेला आहे मागील पाच वर्षात किती व कसे चुकीची कामे झाले याचे पुराव्यासह सभासदासमोर जाणार आहोत यांच्या मनमनी कारभाराला अनेक जण कंटाळले असुन मत पेटीतून सर्व चित्र स्पष्ट होणार आहे .थांबा आणी पहा असे गांवकरी मंडळाचे म्हणणे आहे तर कायम त्याच त्याच चेहऱ्यांना संधी दिल्याच्या रोषतून प्रकाश मेहेत्रे यांचा तिसरा पँनल उदयास आला असुन हा पँनल कुणाला तारक ठरतो अन कुणाला मारक हे ६ मार्चलाच समजणार आहे

श्रीरामपुर (गौरव डेंगळे)२३/२/२२ श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या महिला कर्मचारी श्रीमती मथुराबाई रामचंद्र देशमुख यांनी विद्यालयात ४५ वर्ष केलेल्या अविरत सेवेचा गुणगौरव म्हणून त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आनंदमय वातावरणात संपन्न झाला.यावेळी संस्थेचे सचिव श्री जन्मजय टेकावडे,श्री हेमंत सोलंकी,सौ अस्मिता परदेशी व श्री दिगंबर पिनाटे यांच्या हस्ते श्रीमती देशमुख यांचा मानचिन्ह,श्रीफळ,शाल व साडी देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री जन्मजय टेकावडे यांनी आपल्या मनोगत श्रीमती देशमुख मावशी यांचे कौतुक केलं व त्यांनी केलेली ४५ वर्षाची सेवा ही शाळेच्या दृष्टीने अतिशय मोलाची सेवा आहे.पुढे बोलताना ते म्हणाले की श्रीमती देशमुख मावशी यांनी आपले जीवन विद्यार्थ्यांसाठी समर्पित केले.माझे आजोबा कै मा आ ज य टेकावडे यांनी स्थापन केलेल्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेच्या उभारणीपासून त्या शाळेत कर्मचारी म्हणून आहेत ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे.त्यांचे पुढील जीवन आरोग्यदायी व आनंदी जावो हीच प्रार्थना मी करतो असे ते म्हणाले. यावेळी श्री हेमंत सोलंकी,सौ अस्मिता परदेशी,श्रीमती एस चव्हाण यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वृषाली जोंधळे यांनी केले.यावेळी श्री पंकज त्रिपाठी,श्री सतीश आजगे,श्री दौलत पवार,श्री नितीन गायधने,श्री सुभाष वडीतके,श्री प्रकाश नांदे,सौ रत्नप्रभा पाटील,सौ रीता जेठवा, सौ रीना ओबेराय,सौ सारिका भांड, कु प्रतिक्षा भांड,सौ नम्रता वर्मा,सौ पूजा डोमाले,सौ योगिता गवारे,सौ शुभदा पुंड तसेच बहुसंख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

नाशिक वार्ताहर-नाशिक महानगर पालिकेने मोठा गाजावाजा करीत सुरू केलेली पिंपळगाव बसवंत ते नाशिक शहर बस सेवा अवघ्या एका दिवसातच बंद केल्याने विद्यार्थी व प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.परिवहन महामंडळाच्या बस कर्मचारी संपामुळे गेल्या चार महिन्यांपासून बससेवा बंद असल्याने नाशिक येथे ये-जा करण्यासाठी प्रवाशांना महामार्गावर तासन्तास उभे रहावे लागत होते. तर शाळा,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील नानाविध समस्यांचा सामना करावा लागत होता. येथील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहर बससेवा सुरू करण्याबाबत नाशिक मनपा कडे पाठपुरावा केल्याने अखेरीस काल सोमवार दि.21 रोजी सकाळी 8 वाजता सी.एन.जी बससेवेचा प्रारंभ करण्यात आला.पहिल्या सी.एन.जी बसचे पूजन करून पिंपळगाव शहरातून या बसची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दर तासाला सी.एन.जी बस उपलब्ध होत असल्याने प्रवाशी व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र पी.एन.जी टोल वे चे घोडे मधेच अडले अन् ही बससेवा रात्री बंद झाल्याची घोषणा मनपाने केली. परिणामी प्रवाशांच्या आनंदावर विजरण पडले.त्याचे असे झाले मनपा सी.एन.जी बसला बससेवेचा 650 रु. टोल भरावा लागत असल्याने ‘भीक नको पण कुत्रं आवर’ याप्रमाणे ही बससेवा बंद करण्याचा निर्णय नाशिक मनपाने  घेतला. त्यामुळे मोठा गाजावाजा करून सुरू झालेली बससेवा त्याच दिवशी सायंकाळी बंद झाल्याने प्रवाशी, विद्यार्थी, चाकरमानी यांचेकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पिंपळगाव ही व्यापारी बाजारपेठ म्हणून अवघ्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. साहजिकच येथे येणारे व्यापारी, ग्राहक, व्यवसायिक यांचा या बाजारपेठेत नित्याचा राबता असतो.शेतकरी देखील आपला शेतमाल येथे मोठ्या प्रमाणात आणतात. पिंपळगाव येथे परिवहन महामंडळाचे बस आगार असून बस कर्मचार्‍यांच्या संपामुळे बसगाड्यांची संख्या कमालीची घटली आहे. त्यामुळे यावर पर्याय म्हणून नाशिक शहर बससेवेचा पर्याय समोर आला होता. त्यादृष्टीने ही बससेवा कालपासून सुरू देखील झाली.दिवसभर या बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र पी.एन.जी टोल कंपनीच्या आडमुठे धोरणामुळे या बससेवेला मोठ्या प्रमाणात टोलची रक्कम द्यावी लागत असल्याने नाशिक मनपा ने इच्छा असूनही केवळ मनपा बससेवा तोट्यात जावू नये हा हेतू डोळ्यासमोर ठेवून नव्याने सुरू झालेली पिंपळगाव बसवंत-नाशिक ही शहर बससेवा बंद करण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी लागलीच सुरू केली आहे.

कर्जत प्रतिनिधी-स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला 10 लाखांना गंडा घालणार्‍या सचिन आल्या पवार (वय 26 रा. राक्षसवाडी ता. कर्जत) यास कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.आरोपींच्या टोळीने बांधकाम व्यावसायिक संतोष रामचंद्र घुडे (वय 43 रा. आंबिवली ता. कर्जत जि. रायगड) व त्यांचा मित्र यांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखविले. टोळीतील एक साथीदार विठ्ठल जाधव (खरे नाव माहीत नाही) यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सोने घेण्याची तयारी दर्शविताच त्यांना 9 फेब्रुवारी 2022 रोजी नगर-सोलापूर रोडवर कोंभळी फाट्याजवळील शेतात पैसे घेऊन बोलाविले. तेथे 10 ते 12 जाणांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला केला. 10 लाख रुपये व तीन मोबाईल घेऊन आरोपी पळून गेले.घुडे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली होती. या गुन्ह्यातील आरोपी पवार याला पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, अमंलदार अंकुश ढवळे, सुनील चव्हाण, पांडुरंग भांडवलकर, शाम जाधव, सुनील खैरे, महादेव कोहक, गोवर्धन कदम यांनी अटक केली आहे.

अहमदनगर प्रतिनिधी-घरफोडी करून चोरून नेलेला मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करून तो फिर्यादीस मिळवून देण्याची कामगिरी कोतवाली पोलिसांनी केली आहे. चोरीला गेलेल्या साडेदहा तोळे सोन्याच्या दागिन्यांपैकी फिर्यादीला दोन लाख 73 हजार रुपये किमतीचे साडेसहा तोळे परत मिळाले आहे.याबाबत माहिती अशी की, गणेश रामदास लालबागे (वय 32 वर्षे रा. दर्शनकृपा, डी-1, रेल्वे स्टेशनरोड, आनंदनगर, अहमदनगर) यांच्या घरी घरफोडी करून चोरट्यांनी साडेदहा तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी लालबागे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज महाजन यांनी करून घरफोडी करणारे आरोपी किशोर तेजराव वायाळ (वय 45 रा. मेरा बुद्रुक, ता. चिखली, जि. बुलढाणा), गोरख रघुनाथ खळेकर (वय 34 रा. देवळाली चौक, सातारा परिसर, औरंगाबाद मूळ रा. शिरसवाडी ता. जि. जालना) यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली देताच पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेले साडेसहा तोळ्याचे सोन्याचे दागिने जप्त केले.न्यायालयाच्या परवानगीनंतर ते फिर्यादी लालबागे यांना देण्यात आले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. सदरची कामगिरी नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे, उपनिरीक्षक महाजन, पोलीस अंमलदार दीपक साबळे, बंडू भागवत, याकूब सय्यद, सुमित गवळी व दीपक कैतके यांनी केली आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- एस टी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार तरी केव्हा व नागरीकांची, प्रवाशांची  होणारी लुट थांबणार कधी ? असा सवाल सर्व सामान्य नागरीकाकडून विचारला जात आहे                                          आपल्या मागण्या बाबत एस टी महामंडळाचे कर्मचारी  ठाम आहे .शासन दखल घेत नाही कर्मचारी तुटेपर्यत ताणत आहेत त्याचा परिणाम सर्व सामान्यांच्या खिशावर होत आहे .एस टी कर्मचाऱ्यांंचा संप सुरु होवुन तीन महीन्याचा कालावधी उलटून गेला आहे.त्यांच्या मागण्यावर विचार करण्यास शासनास वेळ नाही काही बाबी न्यायालयाच्या कक्षेत गेलेल्या आहेत, तीन महीन्याच्या कालावधीत  एस टी महामंडळाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले आहे .त्यात महामंडळाचा तोटा तर झालाच शिवाय प्रवाशांना प्रवासासाठी दाम दुप्पट दर मोजावे लागले तसेच मागेल तितके पैसे देवुनही अनेक प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे तसेच गेल्या तीन महीन्यापासून हजारो बसेस डेपोत  उभ्या आहेत त्यांचाही मेंन्टेनन्स खर्च वाढणार आहे खाजगी वहातुकदारांना सोन्याचे दिवस आले आहेत प्रवाशांकडून मन मानेल तसे भाडे आकारले जात आहे .हे सर्व थांबणार कधी?  लाल परी रस्त्यावर धावणार कधी ? असा सवाल नागरीकाकडून विचारला जात आहे या सर्वापेक्षाही कर्मचाऱ्यांचीही अतिशय वाईट अवस्था आहे कुटुंबाचा दररोजचा खर्च कसा भागवायचा याची चिंता सर्वांनाच लागलेली आहे त्यातच संघटनांचे नेते गायब झालेले आहेत कर्मचाऱ्यांनीच आंदोलन हाती घेतलेले आहे .असे असले तरी हे आंदोलन कुठेतरी थांबले पाहीजे एस टी महामंडळ स्थापने पासुन सर्वात मोठा फटका महामंडळाला सध्या बसलेला आहे कोरोनामुळे ठप्प झालेले जनजिवन हळूहळू सुरळीत होत आहे आता लालपरी देखील रस्त्यावर धावणे गरजेचे आहे  .नाहीतर अनेक कुटुंबाची वाताहत होणार हे मात्र नक्कीच.

श्रीरामपूर प्रतिनिधी  - श्रीरामपूर शहर पोलिसांनी कारवाई करत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणी संचलित नांदुर ता. राहाता शाळा मधील संगणक चोरी करणारे गुन्हेगारांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी रोहन विजय बोधक (१९) आणि रोहित शांताराम जाधव (२२) या दोन आरोपींना अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार ५ किंवा ६ जानेवारी २०२२ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणी संचलित शाळा नांदुर ता राहता शाळेमधील डेल कंपनीचे ७ मॉनीटर, ७ सीपीयू व संगणक साहित्य हे शाळेच्या संगणक कक्षाची पाठीमागील खिडकीची जाळी तोडुन आत प्रवेश करुन शाळेचे मुलांना शिकवण्यासाठी लागणारे संगणक अज्ञात चोरट्याने चोरुन नेले होते. या प्रकरणात मधुकर सोपान वल्टे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास करत असताना गुप्त बातमीदार मार्फत हा गुन्हा रोहन बोधक आणि रोहित जाधव यांनी मिळून केल्याची माहिती पोनि संजय सानप यांना मिळाली. त्यावरुन श्रीरामपुर शहर पोलीस ठाणे तपास पथक यांनी नांदुर भागात सापळा रचुन रोहन बोधक याला शिताफिने पकडले. त्याचेकडे सदर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले तसेच गुन्हयातील ७ डेल कंपनीचे मॉनिटर व ७ डेल कंपनीचे सीपीयु व संगणक साहित्य हे मिळून आले तसेच त्याचा साथीदार रोहित शांताराम जाधव यास आज दिनांक २२ फेब्रुवारी रोजी पाठलाग करुन पकडले असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.सदरची कामगिरी मनोज पाटील सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, संदीप मिटके सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि संजय सानप, सपोनिरी बोरसे, पोना/राशिनकर, पोना/रघुवीर कारखेले, पोना/पंकज गोसावी, पोकॉ/राहुल नरवडे, पोकॉ/गौतम लगड, पोकों/गौरव दुर्गुळे, पोकॉ/रमीजराजा आत्तार यांचे पथकाने केलेली आहे. पुढील तपास पोना रघुवीर कारखेले हे करीत आहे.


श्रीरामपूर (गौरव डेंगळे) १८/०२: येथील न्यू इंग्लिश स्कूल क्रिकेट मैदानावर अध्यक्ष श्री राम टेकावडे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळविण्यात आलेल्या सुपर सिक्स क्रिकेट स्पर्धेच्या आज झालेल्या अंतिम सामन्यात श्रीरामपूर इन्‍द्राज संघाने श्रीरामपूर फायटर्स संघाचा २० धावांनी पराभव करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

आज रंगलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन श्री दौलत पवार, सौ अस्मिता परदेशी, सौ सारिका भांड,श्री नितीन गायधने,श्री नितीन बलराज आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.८ संघाने सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत श्रीरामपूर रायडर्स,श्रीरामपूर फायटर्स,श्रीरामपूर इंद्राज, श्रीरामपूर चॅलेंजर्स संघांनी साखळीतील प्रत्येकी २-२ सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत श्रीरामपूर रायडर्स संघाने श्रीरामपूर चॅलेंजर्स संघाचा ६ गडी राखून तर दुसरा उपांत्य फेरीच्या लढतीत श्रीरामपूर इंद्राज संघाने श्रीरामपूर फायटर्स संघाचा ८ गडी राखून पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेच्या अंतिम सामन्याची नाणेफेक इन्‍द्राज संघाने जिंकली व प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इन्‍द्राज संघाने निर्धारित ६ षटकात ६ गडी बाद ८१ धावा फटकावल्या.यामध्ये ज्वेल पटोले ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. रायडर्स संघाकडून मोहित २ गडी बाद केले. विजयासाठी ८२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला  रायडर्स संघ ६ षटकात ६१ धावाच करू शकला. व हा सामना इन्‍द्राज संघाने २० धावांनी जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.स्पर्धेचे पारितोषिक वितरण श्री लकी सेठी, तमन भाटीयानी,मातापुरचे सरपंच श्री गणपत गायके,श्री विनोद जोशी,श्री बन्सीलाल फरवानी,श्री गौरव साहनी,श्री प्रशांत माळवे, क्रीडा प्रशिक्षक श्री गौरव डेंगळे आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडले.स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अनुज पाटिल , इशन भोसले, साई सोनावणे,साई जवळे, मोहित माळवे आदी खेळाडूंचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेत उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी करणारा ज्वेल पटोलेला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.स्पर्धा यशस्वी करण्याकरिता श्री नितीन गायधने,श्री नितीन बलराज,श्री निखिल फासाटे,श्री एस हलनोर, श्री अतुल जाधव,श्री दौलत पवार,दीपक रणपिसे आदींनी अथक परिश्रम घेतले.

श्रीरामपूर : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व इतर आदिवासी भागात राहणाऱ्या आदिवासी समूदावरील होत असलेल्या अन्याय-अत्याचाराविरोधात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद ही राष्ट्रव्यापी संघटना आक्रमक झाली असून याविरोधात संघटनेच्या वतीने श्रीरामपूर तहसीलदार यांजमार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रभारी आर. एम. धनवडे, एस. के. बागुल, एम. आर. वैराळ, एस. के. मरभळ, प्रकाश पवार, एस. एल. सुर्यवंशी, संदिप पाळंदे, अनिल दुशिंग, राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा प्रभारी पास्टर कर्डक, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा जिल्हाध्यक्ष मुश्ताकभाई तांबोळी, रवी बोर्डे, एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे शिवाजी गांगुर्डे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रकारे ३६ जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय अध्यक्ष एच. एन. रेकवाल, राष्ट्रीय संयोजक प्रेमकुमार गेडाम यांच्या सूचनेनुसार निवेदन दिले जात आहेत.

      निवेदनात म्हंटले आहे की, आदीवासींना त्यांचा मूळ अधिवास असलेल्या जल, जंगल आणि जमीन यांपासून विविध प्रकल्पांच्या नावाखाली विस्थापित केले जात आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील विस्थापित झालेले बारूखेडा, सोमठाणा बु, नागरतास, अमोना, केलपानी, गुल्लरघाट, सोमठाणा खु, धारगड आदी गावांचे अद्यापही योग्य प्रकारे पुनर्वसन झालेले नाही. ३७० पेक्षा मृत आदिवासींच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. मेळघाटातील विस्थापित, जंगलात राहत असलेल्या आदिवासींवर वन विभागाने दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. मेळघाट व अन्य आदिवासींचे सामूहिक वन हक्काचे दावे मंजूर करावेत व प्रति व्यक्ती एक कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी. 

      शासनाने या बाबींचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात आंदोलनाची गती अधिक तीव्र केली जाईल.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-लहान मुलांच्या भांडणाच्या कारणातुन दोन कुटुंबात जबर हाणामारी झाली असुन दोन जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांचेवर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरु आहेत पोलीसांनी तीन जणाविरुध्द जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल केला आहे .पोलीस घटनास्थळी तातडीने पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला.                           

बेलापुरातील बोरुडगल्लीत राहणारे ,आतार व सोनवणे या दोन कुटुंबात दोन दिवसापूर्वी लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरुन वाद झाले होते परंतु  ते वाद आपापसात समझोता करुन मिटविण्यात आले तेच वाद कालही उफाळून आले सोनवणे कुटुंब व आतार कुटुंब यांच्यात तुफान हाणामारी झाली  मारामारीत लाकडी दांडके लोखंडी साखळीचा वापर करण्यात आला             दोन दिवसापुर्वी सोनवणे व आतार कुटुंबातील लहान मुलात वाद झाले होते ते वाद दोन्ही कुटुंबांनी मिटविले त्या वेळी आतार यांच्या मुलाला कचरु सोनवणे याने मारले असा आतार कुटुंबीयांचा आरोप होता त्या रोषातुनच काल दोन्ही कुटुंबात पुन्हा वाद झाले वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले त्या वेळी कचरु धोडीराम सोनवणे विकासा सोनवणे आकाश सोनवणे या तिघांनाही बेदम मारहाण करण्यात आली यात कचरु सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे त्यांना रक्तभंबाळ अवस्थेत आगोदर पोलीस स्टेशन नंतर साखर कामगार दवाखान्यात पाठविण्यात आले असुन त्यांचेवर तसेच विकास सोनवणे व आकाश सोनवणे यां तिघेवर  साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरु आहेत .मारामारीची घटना गावात पसरताच मोठा जमाव जमा झाला बेलापुर पोलीस स्टेशनला मोठी गर्दी जमा झाली घटनेची माहीती मिळताच पोलीस निरीक्षक संजय सानप मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले त्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली पोलीसांनी संपुर्ण गावातुन गस्त सुरु केली रात्री बारा वाजेपर्यंत गावात तणावाची परिस्थिती होती पतितपावनचे सुनिल मुथा यांनी तातडीने वरिष्ठांशी संपर्क साधुन घटनेचे गांभीर्य सांगितले त्यामुळे पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनीही घटनास्थळी भेट दिली कचरु धोंडीराम सोनवणे यांच्या तक्रारीवरुन बेलापुर पोलीसांनी अनिस दादासाहेब शेख अकील दादासाहेब आतार बबडी दादासाहेब आतार यांचेविरुध्द भादवि कलम ३०७ ,३२४ ,३२३ ,५०४ ,५०६ ,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पोलीस निरीक्षक संजय सानंप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अतुल लोटके पुढील तपास करत आहेत

अहमदनगर प्रतिनिधी - एका गोडाऊनमध्ये साठा करून ठेवलेला तीन ट्रक गुटखा पोलिसांनी पकडला. बोल्हेगाव परिसरात बुधवारी पोलिसांनी ही कारवाई केली. कोतवाली पोलिसांनी नगर शहरातील कायनेटीक चौकात दुचाकीवरून गुटखा वाहतूक करणार्‍या दोघांना पकडल्यानंतर गुटखा गोडाऊनविषयी माहिती मिळाली होती. यानंतर ही कारवाई करण्यारत आली. रात्री उशिरापर्यंत गुटख्याची मोजदाद सुरू होती.दरम्यान गोवा, माणिकचंद, हिरा, सितार अशा विविध कंपनीचा हा गुटखा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा पकडल्याने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. दोन तरुण दुचाकीवर गुटखा विक्री करण्यासाठी नगर-पुणे रोडवरून जात असल्याची खबर कोतवाली पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कायनेटीक चौकात सापळा लावला. तेथे पाठलाग करून दोन तरूणांना पोलिसांनी पकडले.त्यांच्याकडे पिशवीमध्ये गोवा गुटखा मिळून आला. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता बोल्हेगावातील गुटखा गोडाऊनची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी या गोडाऊनवर छापा टाकला. तेथे विविध कंपन्यांचा गुटखा साठा पोलिसांना मिळून आला. सर्व मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून ट्रकमध्ये भरण्यात आला. तीन ट्रक भरून हा गुटखा होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

अहमदनगर प्रतिनिधी-लोणी (ता. राहाता) येथील माजी सैनिकाची 18 लाख 39 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणार्‍याला येथील सायबर पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेत अटक केली. सलाहुद्दीन शहाबुद्दीन खान (वय 52 रा. गणेशनगर, वेल्फेअर सोसायटी, कांदिवली, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.त्याला नगर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लोणी येथील फिर्यादी हे सैन्यातून निवृत्त झाले आहे. ते ‘वर्क फॉर्म होम’ करता येईल अशा नोकरी, उद्योगाच्या शोधात होते. ऑनलाईन साईटवर माहिती घेत असताना त्यांची फेसबुकवर एका महिलेशी ओळख झाली. तीने फिर्यादी यांना ‘शॉपिंग डॉट कॉम’ कंपनीत अधिकारी असल्याचे सांगितले व त्यांचा विश्वास संपादन केला. कंपनीचे उत्पादने खरेदी केल्यास व विकल्यास तुम्हाला भरपूर कमिशन मिळेल, असे संबंधित महिलेने सांगितले.पैसे जमा करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवरून एक क्यूआर कोड पाठविला. त्याद्वारे फिर्यादी यांनी संबंधित कंपनीच्या साईटवरून वस्तू खरेदी करून बँक खात्यावर वेळोवेळी 13 लाख 10 हजार रुपये पाठविले. मात्र फिर्यादी यांना वस्तू मिळाल्या नाही. 10 ते 20 लाख रुपयांचा टप्पा पूर्ण होत नसल्याने त्यांनी कंपनीकडे पैसे परत मागितले. परंतु, 10 ते 20 लाखांचा टप्पा पूर्ण केल्यानंतर रक्कम काढता येईल, असे फिर्यादीला सांगितले गेले. त्यांनी नंतर सात लाख रुपये भरताच कंपनीने बँक खाते बंद केले. ही घटना 8 ते 23 नोव्हेंबर 2021 दरम्यान घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी यांची एकूण 18 लाख 39 हजार 702 रुपयांची फसणूक झाली आहे.दरम्यान फिर्यादी यांनी 10 जानेवारी 2022 रोजी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द भादंवि कलम 419, 420, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (सी) (डी) नुसार गुन्हा दाखल केला होता. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, पोलीस उपनिरीक्षक प्रतिक कोळी, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिंगबर कारखिले, मलिक्कार्जुन बनकर, राहुल हुसळे, अरूण सांगळे, वासुदेव शेलार यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून आरोपी खान याला मुंबई येथून अटक केली.सहा राज्यांत गेली रक्कम सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण करत असताना फसवणुकीची रक्कम सहा राज्यांतील विविध बँक खात्यात वर्ग झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार मुंबई येथील भारत मेटेज कार्पोरेशन, कांदिवली या खात्यावर एक लाख रूपये रक्कम वर्ग झाली होती. या बँक खातेदाराचा सायबर पोलिसांनी शोध घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर सलाहुद्दीन शहाबुद्दीन खान याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याचा शोध घेत गजाआड केले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-मनसेच्या जन रेट्यानंतर सी,डी जैन महाविद्यालयातील श्री  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या भोवती असलेली जाळीचा दरवाजा काढण्यात आला असुन अनेकांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले आहेत ,श्रीरामपूर येथील सीडी जैन कॉलेज मध्ये गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चारी बाजूने लोखंडी जाळी च्या सहाय्याने बंदिस्त पणाने करून ठेवण्यात आला होती अनेक विद्यार्थ्यांनी ही बाब मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली व ती जाळी काढुन टाकण्याची विनंती केली त्यानुसार मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांचे नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांनी  कॉलेज मध्ये जाऊन आंदोलन केले .

मनसेच्या वतीने  सी,डी जैन कॉलेजचे प्राचार्य श्री निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले

त्याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री  छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम हिंदूंची श्रद्धा स्थान आहेत त्यांचा पुतळा अशाप्रकारे कैद करून ठेवल्याने तमाम शिवप्रेमींची मने दुखावली  गेली आहेत व हा प्रकार शिवप्रेमी कदापीही सहन करणार नाही ही कॉलेज प्रशासनाने लक्षात ठेवावे महाराजांना साडेतीनशे वर्षापूर्वी मोगल साम्राज्य यांनी असेच कैद करून ठेवण्याचे प्रयत्न केले परंतु छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या तावडीतून सहीसलामत सुटले होते परंतु आज  रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर येथील सीडी जैन कॉलेजमध्ये  यांनी आज या ठिकाणी महाराजांचा पुतळ्या भोवती  लोखंडी जाळी लावण्यात आल्याचे मनसे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले त्यानंतर मनसे स्टाईलने महाविद्यालयात आंदोलन करण्यात आले मनसेच्या आंदोलनानंतर काँलेज प्रशासनाने ताताडीने ती लोखंडी जाळी हटवीली  यापुढे जर पुन्हा अशा पद्धतीने गेट लावून बंद अवस्थेत ठेवण्यात आले तर कॉलेज व्यवस्थापकाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले 

आंदोलकांच्या वतीने महाविद्यालयाच्या प्राचार्यांना निवेदन देण्यात आले 

आंदोलनात मनसे जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, विधानसभा अध्यक्ष संतोष डहाळे,तालुकाध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष विशाल शिरसाठ, तालुकाध्यक्ष अक्षय सूर्यवंशी,  दीपक सोनवणे, समर्थ सोनार,  अमोल साबणे, मनोज जाधव, लक्ष्मण लोखंडे, महेश रोकडे, किरण रणवरे, अतुल खरात, विकी शिंदे, रुपेश शिंदे, आर्यन शिंदे, कुंदन शेलार, रोहित वेताळ, विकी निकाळजे, जगन सुपेकर, किशोर बनसोडे, विकास शिंदे, विनेश शिंदे,आदीनी सहभाग घेतला होता .

कोपरगाव प्रतिनिधी-मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत जेऊर पाटोदा ते धारणगाव जिल्हा मार्ग क्रं 8 वरती शासनाने 703 लक्ष रुपये खर्च करून वर्षभरापुर्वी हा रस्ता तयार केला. मात्र या कामास वर्ष होत नाही तेच रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली असून धारणगाव पुलावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत जेऊर पाटोदा, चांदगव्हाण, मुर्शतपूर,धारणगाव,सोनारी, रवंदे या प्रा.जी.मा 8 वरच्या 10 किलोमीटर च्या रस्त्यास सातशे तिन लक्ष रुपये 2020 मध्ये खर्च करण्यात आले. एकाच वर्षात धारणगाव येथिल पुलाच्या नळ्या वरील स्लॅब फुटून रस्ता खचल्याने काम गुणवत्तेप्रमाणे झाले की नाही अशी शंका उपस्थित होत आहे.पंतप्रधान ग्राम सडक योजनेस मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असे नाव बहाल करण्यात आले. जिल्ह्यातील मोठ्या रस्त्यांचा विकास या योजने अंतर्गत करण्यात येतो. यावर कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अहमदनगर यांचे नियंत्रण असतांना एकाच वर्षांत पुलाचा स्लॅब खराब कसा होतो. हा संशोधनाचा विषय आहे. देखभाल दुरुस्ती कालावधी हा पाच वर्षे असून 21 ठिकाणी मोरीच्या कामाचा समावेश आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून वेड्या बाभळीची तात्काळ सफाई करण्याची ग्रामस्थांची मागणी.

बेलापुर  (प्रतिनिधी )-तालुका व शहरातील असणाऱ्या स्वस्त धान्य दुकानावर देखरेख करण्याकरीता शासन नियुक्त दक्षता समीती जाहीर करण्यात आली असुन या समीतीत चर्मकार समाजाचे माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब वाघमारे व पत्रकार चंद्रकांत झुरंगे यांचा समावेश करण्यात आला आहे                           पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी शहर व तालुका दक्षता समीतीत अशासकीय सदस्यांना मंजुरी दिली आहे श्रीरामपुर शहर दक्षता समीतीत चर्मकार समाजाचे मा .जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब वाघमारे, भाऊसाहेब एडके, रणजीत जामकर, श्रीमती आशा परदेशी ,श्रीमती अर्चना पानसरे ,जिवन सुरडे,नानासाहेब बडाख ,श्रीमती तरन्नुम जहागीरदार मनोज परदेशी महेबुब शेख आदिंचा समावेश आहे तर श्रीरामपुर तालुका दक्षता समीतीत पत्रकार व समता परिषदेचे चंद्रकांत झुरगे ,संतोष मोकळ ,राहुल रणधीर , सौ शिल्पा चितेवार ,श्रीमती शारदा बनकर ,श्रीमती जयश्री जगताप ,हरदिपसींग शेठी ,श्रीमती रेखा फाजने ,विष्णूपंत खंडागळे  ,सतीश बोर्डे आदिचा समावेश आहे .या सदस्यांच्या निवडीबद्दल आमदार लहु कानडे साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे ,माजी आमदार भानुदास मुरकुटे धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई  आदिंनी अभिनंदन केले आहे.

श्रीरामपूर  प्रतिनिधी -7 व्या वर्ल्ड फुनाकोशी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत मार्गदर्शक सेन्सई संजय पवार सर, मुख्य प्रशिक्षक सेन्सई अशोक शिंदे सर आणि संघर्ष स्पोर्ट्स फाउंडेशन महाराष्ट्र टीम ने मिळवला प्रथम क्रमांक, सर्व विद्यार्थी व प्रशिक्षकावर  सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या स्पर्धा काता आणि कुमीते या दोन प्रकारात घेण्यात आल्या होत्या. बाळासाहेब भागवत सर यांनी ब्राम्हणवाडा, अकोला तालुका, जि अहमदनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या, पुणतांबा आणि परिसरातून एकूण 35 खेळाडू सहभागी होऊन, उत्कृष्ट

खेळाचे प्रदर्शन करीत प्रथम क्रमांकाच्या चषकावर गावाचे नाव कोरले, सेन्सई अशोक शिंदे सर गेल्या सात वर्षापासून पुणतांबा आणि आजूबाजूच्या परिसरात कराटे प्रशिक्षण वर्ग उत्कृष्ट पणे घेत असून अनेक राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी खेळाडू घडविले आहेत. यश मिळविले आहे, त्यांच्या प्रशिक्षनातून अनेक विद्यार्थी यशस्वीहोत आहेत, अशोक शिंदे सर यांच्याकडे आजही एक हजार. विद्यार्थी कराटे प्रशिक्षण घेत आहेत, शिंदे सर स्वतः च  अंतर राष्ट्रीय खेळाडू असून (गोल्ड मेडलिस्ट )मार्शल आर्ट खेळाच्या सात प्रकारात ते नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहेत, राष्ट्रीय पंच, उत्कृष्ट जिल्हा, संघटक,महाराष्ट्र कोच, अशा अनेक जबाबदाऱ्या ते मोठ्या सीताफिने पार पाडत आहेत,काता व कुमिते(फाईट)अशा दोन खेळांच्या प्रकारा मध्ये  अहमदनगर जिल्ह्याला 50 सुवर्ण पदक 17 रौप्य 13 कांस्य आसे एकूण 80 पदकाची कमाई अहमदनगर  जिल्ह्याने केली असून.चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ची ट्रॉफी वर  अहमदनगर जिल्ह्याचे नाव कोरले आहे व महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळून यश

संपादन केले आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनी  वय वर्ष 5,6 आणि 7 मधील मुले व मुली सुरज निपटे - सुवर्ण  ,रौप्य . अस्मी शिंदे सुवर्ण, कांस्य वय वर्ष 8 आणि 9 मधील मुले व मुली कल्याणी बेंडकुळे रौप्य,कांस्य ,धनश्री वैराळ सुवर्ण ,रौप्य.रद्रा काळे  रौप्य,कांस्य . मैथिली गोडसे रौप्य,कांस्य.अबुजर शेख रौप्य,कांस्य .श्रद्धा फोपसे कांस्य,कांस्य.वय वर्ष 12आणि 13 मधील मुले व मुली रुद्रा उकांडे सुवर्ण ,सुवर्ण.तृप्ती वाघ कांस्य ,कांस्य . अंजली पवार सुवर्ण, सुवर्ण. साई गाडेकर रौप्य,सुवर्ण .शिवम घोगरे सुवर्ण ,रौप्य .कृष्णा तांबे सुवर्ण, रौप्य.निखिल दिवटे कांस्य , कांस्य. श्रेया दिवटे रौप्य ,रौप्य. साईशा दिवटे सुवर्ण ,कांस्य .साक्षी शेटे कांस्य , कांस्य.साक्षी आमले सुवर्ण , सुवर्ण वेदांत शेजूळ रौप्य ,सुवर्ण .अदिती धुळगंड सुवर्ण , रौप्य.ऋतुजा भागडे सुवर्ण,कांस्य. सायली वैराळ रौप्य , कांस्य. श्रुतिका काळे सुवर्ण ,कांस्य.अलिषा ओहोळ रौप्य ,रौप्य.आयान शेख कांस्य ,सुवर्ण.वय वर्ष 14आणि 15मधील मुले व मुली आदित्य बनकर कांस्य ,रौप्य. अदिराज फोपसे रौप्य , कांस्य.कृष्णा फोपसे रौप्य, कांस्य.प्रसन्न फोपसे रौप्य ,रौप्य.नम्रता जेजुरकर रौप्य ,कांस्य.समृध्दी जेजुरकर सुवर्ण, रौप्य.तनुजा प्रधान रौप्य,रौप्य.वय वर्ष 16आणि 17 मधील मुले व मुली साई शिंदे सुवर्ण , रौप्य. अचूत थोरात सुवर्ण, रौप्य .चेतना  गुडेकर सुवर्ण ,कांस्य .श्रावणी शेजुळ सुवर्ण ,रौप्य.अनुजा चौधरी रौप्य,रौप्य. तसेच आदित्य माळी या विद्यार्थ्याला बेस्ट फायटर प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह मिळाले. प्रशिक्षक म्हणून सार्थक शिंदे सन्मान चिन्ह मिळाले. तसेच प्रशिक्षक ओम लोकने ईशा निपटे वैष्णव सोनवणे श्रावणी शेजुळ रेश्मा शिंदे इत्यादींचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी  यश संपादन करून चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ची ट्रॉफी वर  अहमदनगर जिल्ह्याचे नाव कोरले आहे व महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे . या विद्यार्थ्यांचे आजूबाजूच्या गावांमध्ये कौतुकचा वर्षाव होत आहे. तसेच  पालकांनी ही अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. अशोक शिंदे सर यांचा गौरव करण्यात आला.

अहमदनगर प्रतिनिधी - सहा गावठी कट्टे व 12 जिवंत काडतुसेसह संगमनेरच्या दोन तरूणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोल्हार (ता. राहाता) येथे पकडले. ऋषिकेश बाळासाहेब घारे (वय 21 रा. पारेगाव बु. ता. संगमनेर), समाधान बाळासाहेब सांगळे (वय 27 रा. चिंचोली गुरव ता. संगमनेर) अशी पकडलेल्या तरूणांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक लाख 86 हजार 100 रूपयांचे सहा गावठी कट्टे, 12 काडतुसे जप्त करण्यात आली असून त्यांच्याविरूध्द लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार मनोहर गोसावी यांनी फिर्याद दिली आहे.कोल्हार येथील नगर-मनमाड रोडवर हॉटेल जनता जवळ ऋषिकेश घारे व त्याचा साथीदार गावठी कट्टे विक्रीसाठी घेवुन येणार असल्याची माहिती

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांंनी सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, भाऊसाहेब कुरुंद, संदीप घोडके, विश्वास बेरड, ज्ञानेश्वर शिंदे, विजय ठोंबरे, शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, लक्ष्मण खोकले, सागर ससाणे, रवींद्र घुंगासे, आकाश काळे, योगेश सातपुते, संभाजी कोतकर यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या.पथकाने कोल्हार येथील नगर-मनमाड रोडवर हॉटेल जनता जवळ सापळा लावला. दोन तरूण पायी येताना दिसताच त्यांना पथकाने पकडले. त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता ऋषिकेश घारेच्या कंबरेला पँटचे बेल्टमध्ये खोसलेला एक गावठी कट्टा पोलिसांना मिळून आला. समाधान सांगळे याच्या पाठीवर असलेल्या काळे रंगाच्या पिशवीची (सॅक) पोलिसांनी झडती घेतली असता त्यामध्ये पाच गावठी कट्टे व 12 जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी सर्व कट्टे, काडतुसे जप्त करत दोघांना अटक केली.अटक करण्यात आलेला आरोपी सांगळेविरूध्द संगमनेर शहर, संगमनेर तालुका, शिर्डी पोलीस ठाण्यात दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, दुखापत करणे आदी स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर अधीक्षक (श्रीरामपूर) स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संजय सातव (शिर्डी) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

श्रीरामपूर प्रतिनिधी:-दि१४/०२/२०२२ रोजी श्रीरामपूर शहर पोलिस निरीक्षक संजय सानप यांना माहिती मिळाली की शिरसगाव शिवारातील ओव्हर ब्रिज जवळ इंदिरानगर जाणारे रोडवर काही संशयित इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत.अशी खात्रीशीर माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी सपोनि जीवन बोरसे,पोलीस नाईक सचिन बैसाणे,पोलीस नाईक पंकज गोसावी,पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे,पोलीस कॉन्स्टेबल गौरव दुर्गुळे, पोलीस कॉन्स्टेबल रोंगटे यांना बातमीतील माहिती सांगून कारवाई करणे बाबत सूचना केल्या तपास पथकातील कर्मचारी व अधिकारी शिरसगाव शिवारात ओवर ब्रिज जवळ इंदिरानगर येथे गेले असता नमूद बातमीतील वर्णनाप्रमाणे पाच इसम ब्रिज जवळ इंदिरानगर जाणारे रोडवर फिरत असलेले दिसून आले.त्यावेळी तपासी अमलदार त्यांच्या दिशेने जात असताना सदर संशयित इसमांना तपास पथकाचा सुगावा लागल्याने ते पळून जाऊ लागले तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी तीन जणांना पकडले. व त्यातील दोन इसम मोटरसायकलवरून भरधाव वेगात पळून गेले त्यांचे पाठलाग करण्यात आला परंतु ते मिळून आले नाही सदर पकडलेल्या इसमांना  त्यांचे नाव गाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव १) निसार रज्जाक शेख वय 38 वर्षे राहणार हुसेन नगर वार्ड नंबर एक श्रीरामपूर२) राजू शामराव दामोदर वय 42 वर्षे राहणार हूसेन नगर वार्ड नंबर एक श्रीरामपूर ३) तौपिक आयुब पठाण वय 27 वर्षे राहणार हुसेन नगर वार्ड नंबर एक श्रीरामपूर असे सांगितले सदर माणसांची दोन पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता निसार शेख याच्या अंगझडतीत एक चाकू नायलॉन दोरी मिळून आली, राजू शामराव दामोदर याच्या अंगझडतीत पॅन्टच्या खिशात मिरचीपूड मिळून आली, तोपिक आयुब पठाण यांचे अंगझडतीत  लोखंडी कटावणी मिळून आली. वरील प्रमाणे हत्यारे व मुद्देमाल मिळून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल गौरव राजेंद्र दुर्गुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर८८/२०२२ भादविक ३९९,४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर आरोपी हे सराईत असून त्यांच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई  श्री .मनोज पाटील पोलीस अधीक्षक,श्रीमती.स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,श्री.संदीप मिटके उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री.संजय सानप, सपोनि.जिवन बोरसे, पोलीस नाईक.पंकज गोसावी, पोलीस नाईक. बिरप्पा करमल, पोलीस नाईक.सचिन बैसाने, पोलीस नाईक.रघुवीर कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस कॉन्स्टेबल रमिज आत्तार ,पोलीस कॉन्स्टेबल गौरव दुर्गुळे ,पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार, यांनी केली आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी- सातवी राज्यस्तरीय वर्ड फुनाकोशी शाँतोकोन कराटे चॅम्पियन शिप ब्राह्मणवाडा तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये श्रीरामपूर मार्शल आर्टचे प्रशिक्षक कलीम बिनसाद यांच्या मार्गदर्शनाखाली 25 विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते या राज्यस्तरीय चॅम्पियनशिपमध्ये जिल्हाभरातून 600 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते त्यापैकी श्रीरामपूर मार्शल आर्ट च्या पंचवीस विद्यार्थ्यांनी 50 मेडल मिळून श्रीरामपूर मार्शल आर्ट ची शान वाढविली  श्रीरामपूर मार्शल आर्ट च्या पंचवीस विद्यार्थ्यांनी 18 गोल्ड मेडल 25 सिल्वर

मेडल तर 7 ब्राउन मेडल असे पंचवीस विद्यार्थ्यांमध्ये पन्नास मेडल मिळवले तर पहिले पारितोषिक हे श्रीरामपूरच्या मार्शल आर्ट ने पटकावले. यामध्ये विजय झालेल्या मुलांची नावे याप्रमाणे मुबारक बिनसाद, इब्राहिम बिनसाद,अबरार पटेल, बुशरा पटेल,जोया पटेल,अंकिता गौड, समृद्धी वाव्हळ,किर्तिका जगदाळे,सोहम जगदाळे,विर वाव्हळ,ऋषिकेश बैरागी,सायली सोर्णे,श्रद्धा सोर्णे,सोहम थोरात,समर्थ थोरात,प्रथमेश वालतुरे , रेहान आतार,सक्षम मानधने,कार्तिक शेलार,चिदंबर ठोंबरे,सार्थक वाव्हळ,वेदीका वाव्हळ,धनेश ताथेड ,हुसैन शेख,सोहम गतीर,व्यंकटेश शिंपी,

या मुलांना श्रीरामपूर येथील मिनी स्टेडियम या ठिकाणी मेडल व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. संदीप मिटके

साहेब, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. संजय सानप साहेब, श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे साहेब, पी.एस.आय. बोरसे साहेब, शहराच्या प्रथम नागरिक अनुराधाताई आदिक,नगरसेवक राजेंद्र पवार, महाराष्ट्र लघु व्रत्त पत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली, डॉक्टर मयूर कापसे समाजसेविका आपसरा भाबी शेख या प्रमुखांनी या मुलांचा गुणगौरव करून त्यांना सन्मानित केले यावेळी श्रीरामपूर मार्शल आर्ट चे संस्थापक प्रशिक्षक श्री कलीम बिनसाद सर यांनी मुलांनी केलेली पराक्रमी कामगिरी बद्द्ल पाहुण्यांना माहिती दिली यानंतर पाहुण्यांनी या चिमुकल्यांचे खूप कौतुक केले. पाहुण्यांसमोर मुलांनी प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी अनुराधाताई अधिक यांनी या सात ते पंधरा वयोगटातील मुलांनी व मुलींनी खूप मोठे काम केले आपल्या श्रीरामपूर शहराचे नाव पुढे नेले आणि अशीच कामगिरी या मार्शल आर्ट च्या वतीने घडेल अशी मला खात्री आहे असे ते बोलले व यासाठी वाटेल ती मदत मी करेल व मुलांसाठी रबर मॅट ची व्यवस्था आपण लवकरात लवकर करून देऊ असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमामध्ये आपल्या परिसरातील अकॅडमीचे प्रशिक्षण वैभव शिरसागर, सोपान लाटे, प्रभाकर शेळके, अशोक शिंदे, एस न्युज चे जयेश सावंत  हे देखील उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकील बागवान सर यांनी केले तर आलेल्या पाहुण्यांचे तसेच पालकांचे आभार एडवोकेट अजित डोके यांनी मानले.

श्रीरामपूर प्रतिनिधी - आज दि. 13/02/2022 रोजी Dysp संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत श्रीरामपुर तालुक्यातील टाकळीभान येथे गावठी हातभट्टी दारू  अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अंमलदार यांना सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी टाकळीभान परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू  अड्ड्यावर छापा टाकून  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू  यांचा नाश करण्यात आला. आरोपी. क्र.)1)   बाळू शहादु मोरे रा टाकळीभान तालुका श्रीरामपूर 42,000/-  रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.) 2000/- रू किमतीची 20 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)आरोपी. क्र.) 2.  संगीता मच्छिंद्र डुकरे रा. माळेवाडी टाकळीभान तालुका श्रीरामपूर 38,500/-  रु. कि.चे 550 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)1500/- रू  किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं.  अं.)एकूण 84,000/-/-  रुपये वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ यांचे फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड )  (ई)  प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे.अचानक झालेल्या या कारवाईमुळे   टाकळीभान परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे टाकळीभान येथील महिलांनी  Dysp संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक  करून आभार व्यक्त केले.सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा.  स्वाती भोर  यांचे मार्गदर्शनाखाली  Dysp  संदीप मिटके, ASI राजेंद्र आरोळे,HC सुरेश  औटी,PC नितीन शिरसाठ आदींनी केली.

श्रीरामपूर (शौकतभाई शेख) -येथील हरेगांव फाटा पोलिस चौकीतील कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी नाईक,किरण पवार, राजेंद्र देसाई,गणेश गायकवाड इ.कर्तव्यतत्पर आणि कर्तव्यदक्ष पोलिसांच्या उत्कृष्ट कामगीरीने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे,जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम, उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके,शहर पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन अंतर्गत हरेगांव फाटा पोलिस चौकीतील कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्यांनी २,३ अपहरण प्रकरण तसेच मोबाईल गहाळ प्रकरणी मोठी कसरत आणि मेहनत करत सदरील प्रकरणी गुन्ह्याचा २४ तासाच्या आत छडा लाऊन उत्कृष्ट कामगीरी बजावली असल्याबद्दल येथील आझाद फाऊंडेशनच्यावतीने शहर पोलिस निरीक्षक संजय सानप आणि हरेगांव फाटा पोलिस चौकीच्या कर्तव्यदक्ष पोलिसांचा सत्कार करुन सन्मान करण्यात आला.यावेळी शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय सानप, पोउनि.समाधान सुरवाडे,गोपनीय शाखेचे पोकॉ.गुंजाळ,संतोष परदेशी,संतोष दरेकर, तुषार गायकवाड,महेश पवार,हरेगांव फाटा पोलिस चौकीचे पोलिस नाईक किरण पवार, राजेंद्र देसाई,गणेश गायकवाड समवेत आझाद फाऊंडेशनचेअध्यक्ष साजिद शेख,राज खान ,फारुक शेख,परवेज शेख,असलम शेख,समता फाऊंडेशनचे अॅड. मोहसीन शेख, जिशान सय्यद, सचिन धनवटे,नजीम शेख,राहुलभोसले,मतीन शेख,नदीम सय्यद, तबरेज कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget