April 2020

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) कोरोना च्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये शहर पोलिस व नगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या हितासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची कठोर अंमलबजावणी सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून मास्क न लावता गाडी चालवणारे आमदार लहू कानडे यांच्या ड्रायव्हरला सुद्धा दंड आकारून त्याच्याकडून पाचशे रुपयाची वसुली नगरपालिका कर्मचाऱ्यांनी केली .
 पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन संयुक्तपणे शहरांमध्ये जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आहेत . दररोज सकाळी शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या मास्क न लावणाऱ्या व रस्त्यावर थुंकणाऱ्या गावकऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे . यासाठी नगरपालिकेने चार टीम तयार केल्या आहेत . सकाळच्या सत्रात सध्या हे काम सुरू असून दिवसभर हे काम करण्यात यावे अशी मागणी जनतेतून केली जात आहे .
 शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यअधिकारी प्रकाश जाधव, आरोग्य अधिकारी आरणे,पालिकेचे कर्मचारी व पोलिस अशा दोन्ही यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करीत आहेत . राज्यांमध्ये सर्वत्र कोरोनाचे थैमान सुरू असताना स्थानिक अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन करून शहरांमध्ये कुठेही पेशंट आढळणार नाही यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहे . सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन मध्ये शितिलथा देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असून त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही यासाठी पोलीस व पालिका प्रशासनाने शहरांमध्ये येणाऱ्या लोकांची नाकेबंदी करावी . नवीन लोकांना शहरात येऊ देऊ नये . सबळ कारण असल्याशिवाय कोणालाही जाण्या-येण्याची परवानगी देऊ नये . अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.
शहरांमध्ये सध्या रमजान महिना सुरू असून वार्ड नंबर 2 मध्ये संध्याकाळी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर दिसून येतात . काल सायंकाळी पोलिसांनी वॉर्ड नंबर दोन, मिल्लत नगर या भागामध्ये गस्त घालून बाहेर फिरणाऱ्या लोकांना घरात जाण्याचे आवाहन केले . मात्र पोलिस पुढे गेल्यानंतर मागे लोक बाहेर येतात . त्यासाठी शहर पोलिसांनी वार्ड नंबर दोनमध्ये चौका चौकांमध्ये पॉइंट तयार करून रमजान ईद होईपर्यंत तेथे लक्ष द्यावे तसेच लोकांनी बाहेर न येण्याची काळजी घ्यावी व आपले रक्षण आपणच करावे असे आवाहनही ज्येष्ठ लोकांनी केले आहे . शहर पोलीस रात्रंदिवस एक करून शहरांमध्ये गस्त घालत असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवीत आहेत. त्याबद्दल शहर पोलिसांच्या कामगिरीचे सुद्धा समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 शिर्डी  (जय शर्मा)
 कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन सुरू असून शिर्डीतही सर्व बंद आहे ,अत्यावश्यक सेवा जरी सुरू असल्या तरी लॉकडाऊनचे नियम पाळणे बंधनकारक असताना शिर्डीत मात्र भाजीपाला दुकानांमध्ये सोशल डिस्टंन्सचा फज्जा उडतआहे, सर्व नियम पायदळी तुडवली जात आहेत, मात्र नगरपंचायत याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे,
शिर्डीत इतर सर्व दुकाने बंद आहेत, अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाल्याचे दुकाने, मेडिकल, किराणा दुकाने  मसाल्याची दुकाने सुरू आहेत,
मात्र येथे मसाला दळण्यासाठी सध्या महिलांची गर्दी होत असून येथे सोशल डिस्टंन्स पाळला जात नाही ,पिठाच्या गिरणी वर दळण्यासाठी जाणाऱ्या महिला सोशल डिस्टंन्स पाळत नाहीत मात्र याकडे कोणाचे लक्ष नाही, भाजीपाला घेण्यासाठी गर्दी होते ,सामाजिक दुरीचे भान ठेवलं जात नाही, शिर्डीतील श्रीरामनगर येथील महाराणा प्रताप चौकात अनेक भाजीपाला विक्रेते व ग्राहक यांच्या तोंडाला मास्क नसते , सर्व नियम पायदळी तुडवून लोक भाजीपाला घेण्यासाठी गर्दी करतात, शिर्डीत श्रीसाई कृपेने व परिसरात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण नाही, मात्र अशी परिस्थिती राहिली तर दुर्दैवाने कोरोनाचा संसर्ग होण्यास वेळ लागणार नाही, असे होऊ नये म्हणून नगरपंचायतीने अशा लॉकडाऊन चे नियम मोडणाऱ्या भाजीपाला विक्रेते व ग्राहकांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे, मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यावर कारवाई होते ,शहरात फिरणाऱ्यांवर कारवाई होते, मग भाजीपाला तसेच किराणा दुकानदार व मसाला व पिठाच्या दळणाच्या गिरणीवर  नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावंर कारवाई होण्याची गरज आहे, मात्र तसे होताना दिसत नाही, त्यामुळे शिर्डी नगरपंचायत ,पोलीस यांनी याकडे विशेष लक्ष देऊन अशा ठिकाणी विशेष पथकाच्या साहाय्याने कारवाई करणे गरजेचे आहे असे  शिर्डीकर बोलत आहेत.

शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र गडकरी )  श्री साईबाबामुळे अांतरराष्ट्रीय क्षेत्र असणाऱ्या व देशात स्वच्छ सुंदर शहराचा दुसरे बक्षीस मिळवून मान मिळवणाऱ्या शिर्डीतील उपनगरात नगरपंचायतीने लावलेल्या रस्त्याच्या दुभाजकातील झाडे पाण्याअभावी जळून जात असून नगरपालिकेचे पाणी नेमकी कुठे मुरते। असा प्रश्न शिर्डीकर करत आहेत, शिर्डी नगरपंचायतला करापोटी दर वर्षाला मोठी रक्कम जमा होत असते, या रकमेतून शिर्डीला स्वच्छ व  सुंदर  करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत, त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत, याच खर्चातून शिर्डी शहरातील उपनगरात रस्त्याच्या दुभाजकाला विविध वृक्षे लावण्यात आले आहेत नगर-मनमाड महामार्गच्या दुभाजकात वृक्षांना नगरपंचायत टँकरने पाणी देते तसेच सध्या लॉक डाऊन मुळे प्रदूषण नसल्याने ही वृक्षे हिरवीगार दिसत आहेत, मात्र उपनगरातील वृक्षांना पाणी नसल्यामुळे ते वाळून गेलेले आहेत, नगरपालिका फक्त नगर-मनमाड रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या वृक्षांना पाणी देते व नागरिकांना नगरपंचायत खूप मोठे काम करत आहे असे भासवते, मात्र उपनगरातील झाडे पाण्याअभावी जळून जात आहेत तिकडे कोणाचे लक्ष नाही,  लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे,पाण्याच्या टँकरची फक्त बिले काढले जात असल्याचा आरोप करताना शिर्डीचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटणी  आरोप केले आहे

शिर्डी राजेंद्र गडकरी -देशात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे, अशा परिस्थितीत सर्वत्र बंद असून संचारबंदी जारी आहे ,अशा काळात महाराष्ट्र दिऩ आला असून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी  राहाता तालुक्यात कुठेही शासकीय-निमशासकीय शाळा ,महाविद्यालये याठिकाणी 1मे महाराष्ट्रदिनानिमित्त होणारा ध्वजारोहण कार्यक्रम करण्‍यात येणार नाही,,साध्या पद्धतीने यावर्षी महाराष्ट्र दिन साजरा होणार असल्याची माहिती राहता तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली,
सध्या कोरोनामुळे सर्वत्र बंद आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे ,अशा परिस्थितीत एक मे हा महाराष्ट्र दिन आला असून शासकीय आदेशानुसार सर्वत्र हा दिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे, राहता तालुक्यातही 1मे महाराष्ट्र दिनी सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालये, या ठिकाणी ध्वजारोहण होणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी व कुठेही लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करू नये, विनाकारण फिरू नये, गर्दी करू नये, मास्क व सोशल डिस्टंन्स पाळावे, आपल्या घरातच राहावे, असे आवाहन तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे ,त्याच प्रमाणे राहता तालुक्यातील प्रत्येक गावात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली गाव पातळीवर कोरोना ग्रामसुरक्षा कमिटी बनवण्यात येणार असून त्यामध्ये कामगार तलाठी, ग्रामसेवक, सदस्य राहणार असून पोलीस पाटील सदस्य सचिव राहणार आहेत, आपल्या गावात बाहेरील गावातून येणारे विद्यार्थी, कामगार पर्यटक,भाविक ,पाहुणे नातेवाईक, कोणीही असो त्यांची नोंद या समितीने ठेवणे महत्त्वाचे आहे, बाहेरून आलेल्या पण परवानगी नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला गावात प्रवेश देऊ नये, जर एखादी बाहेरील जिल्ह्यातील किंवा राज्यातील किंवा गावातील व्यक्ती आपल्या गावात येऊन राहत असेल तर त्या व्यक्तीची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करावी तसेच बाहेरील गावातून आलेल्या व्यक्तीचे चौदा दिवस विलगीकरण करणे महत्त्वाचे आहे, या सर्वांची नोंद कोरोना ग्राम सुरक्षा समितीने ठेवणे महत्त्वाचे आहे,प्रत्येक गावात अशा समित्या शासकीय परिपत्रकान्वे करणे आवश्यक आहे ,तरी सर्वांनी आपल्या गावात त्वरित कोरोना ग्रामसुरक्षा समिती स्थापन कराव्यात, असेही राहताचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी म्हटले आहे,

 (शिर्डी प्रतिनिधि  राजेंद्र गडकरी)
 सर्वत्र लॉकडाऊन सुरू असल्याने सर्वत्र मद्य विक्रीचे दुकाने बंद आहेत ,तरीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैधरित्या मद्य साठा, वाहतूक सुरू असल्याने राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून एकूण 154 गुन्हे दाखल नोंद करून 52 लाख चार हजार 514 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे 59 आरोपींना अटक केली असून अकरा वाहने जप्त करण्यात आली आहेत, तसेच जिल्ह्यातील नऊ मद्यविक्री दुकाने निलंबीत केली असून शिर्डीच्या आनंदबियर शॉपीवरही परवाना निलंबनाची कारवाई झाली आहे ,
 त्यामुळे शिर्डीत खळबळ उडाली आहे,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू असताना व सर्व बंद असताना तसेच जिल्ह्यात मध्य निर्मिती, वाहतूक व विक्री या कालावधीत बंद असताना, जिल्ह्यातील काही ठिकाणी, काही मद्यविक्री दुकानातून अवैधरित्या साठा करून मद्य विक्री केली जात होती ,अशा तक्रारी जिल्हा दारू उत्पादन शुल्क अधिकार्‍यांकडे आल्याने राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पराग नवलकर यांच्या नेतृत्वाखाली 24 मार्च ते 28 एप्रिल 20 20 या काळात या विभागाच्या अ विभाग व  ब विभाग तसेच श्रीरामपूर विभाग ,कोपरगाव विभाग, संगमनेर विभाग, अशा पाच विभागांमार्फत व दोन भरारी पथकामार्फत जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले, तसेच तक्रारी आलेल्या काही मद्यविक्री
दुकाने उघडून मद्यसाठा तपासण्यात आला, यावेळी अधिकाऱ्यांना मद्यसाठ्यात मोठी तफावत आढळली, त्यामुळे अशा हॉटेलंटवर कारवाई करण्यात आली, याविक्री दुकानांवर कारवाई करण्यात आली, त्यामध्ये श्रीरामपूर बेलापूर येथील हॉटेल गोल्डन चरीटर, हॉटेल गोविंदा गार्डन निमगाव जाळी, हॉटेल नेचर वडगाव पान, होटेल धनलक्ष्मी, देवळाली प्रवरा, हॉटेल उत्कर्ष सोनगाव सात्रळ, हॉटेल ईश्वर वडझिरे ,तालुका पारनेर, हॉटेल मंथन निघोज, पारनेर, याच बरोबर संगमनेरचे किरकोळ देशी दारू दुकान आणि शिर्डी जवळील निमगाव कोर्‍हाळे ययेथिल आनंद बिअर शॉपी याठिकाणी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून या सर्व नऊ मद्यविक्रीचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, शिर्डी येथील आनंद बिअर शॉपी च्यापाठीमागे बिअरचा सुमारे चोवीस लाख रुपये किमतीचा अवैध साठा सापडला होता, त्यामुळे या बिअरशॉपीवरहीपरवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे, तसेच या सर्व मद्यविक्री  दुकानाकडून 154 गुन्हे नोंद करत 52 लाख 4 हजार 514 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, एकूण 59 आरोपींना अटक केली असून 11 वाहने जप्त करण्यात आली आहेत, यापुढेही शासनाच्या अटी व नियमांचे पालन न करणाऱ्या मद्यविक्री केंद्रांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अहमदनगर अधीक्षक पराग नवलकर यांनी दिला आहे.

मालेगाव | प्रतिनिधी -मालेगावमध्ये करोनाचा कहर सुरूच आहे. सायंकाळी आलेल्या अहवालात एकूण ११ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर चिंता व्यक्त केली जात असतानाच मध्यरात्री प्राप्त झालेल्या दोन अहवालात जवळपास ४४ रुग्ण वाढल्यामुळे मालेगावची करोनाबाधित रुग्णांची संख्या २२७ वर पोहोचली होती. त्यानंतर पुन्हा २७ रुग्ण मालेगावात वाढले असून मालेगावी करोना बाधित रुग्णांचा आकडा आता २५३ वर पोहोचला आहे.मध्यरात्री मिळालेल्या अहवालात सहा पोलीस आढळून आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा २७६  वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत अकरा रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.


बेलापूर ( प्रतिनिधी  )- कोरोनाच्या भितीपोटी घरातच बसा सुरक्षित रहा हा शासनाचा आदेश मानुन घरात बसलेल्या गोरगरीब परिवारासाठी लुक्कड परिवारा बरोबरच माहेश्वरी समाज तसेचअकबर टिन मेकरवाले  देखील पुढे सरसावले असुन  अडचणीत सापडलेल्या गोरगरीब जनतेसाठी हे देवदुतच ठरत आहे कोरोनामुळे लाँक डाऊन घोषित करण्यात आले या लाँक डाऊनमुळे दररोज कमाई करुन आपला चरितार्थ चालविणार्यांची दररोजच्या खाण्या पिण्याची पंचायत झाली हे लक्षात घेवुन सामाजिक कार्यात सतत अघाडीवर असणारे सुवालाल लुक्कड व लुक्कड परिवाराने अन्नछत्र चालु करण्याचा मनोदय व्यक्त केला बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांनी तातडीने तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क  साधला त्यांनी देखील  परिस्थीती लक्षात घेता नियमांचे काटेकोर पालन करुन
अन्नछत्र सुरु करण्यास अनुमती दिली अन बेलापूर गावात गोरगरीबासाठी सुरु झाले मोफत अन्नछत्र . लुक्कड परिवाराने स्वः खर्चातुन सुरु केलेल्या मोफत अन्न छत्रास मदत करण्यास अनेक हात पुढे सरसावले . काहींनी वस्तू स्वरुपात तर काहींनी रोख स्वरुपात मदत केली . काही कार्यकर्त्यांनी सामाजिक वारसा जपत या कार्यात स्वतःला वाहुन घेतले . अन अनेक गोरगरीबांना मोठा आधार झाला . एक वेळच्या अन्नाची चिंता मिटली लाँक डाऊन मुळे पुशु पक्षाचेही हाल होत असल्याचे काही कार्यकर्त्यांनी सुवालाल लुंक्कड यांच्या निदर्शनास आणुन दिले मग काय पक्षासाठीही अन्नाची व्यवस्था करण्यात आली.लुक्कड परिवाराने सुरु केलेले अन्नछत्र केवळ सकाळीच सुरु असते . त्यामुळे अनेक जण सायंकाळचे देखील पार्सल घरी नेत होते . या नागरीकांची सायंकाळची सोय होणे गरजेचे आहे हे लक्षात घेवुन माहेश्वरी समाज देखील पुढे सरसावला . त्यांनी संध्याकाळच्या भोजनाची व्यवस्था केली . गरम पोळ्या भाजी पिशवीत पँक करुन त्याचे वाटप सुरु करण्यात आले . या अन्नछत्रास देखील  मदत करण्यास अनेक हात पुढे सरसावत आहे .  मदत देणारे आपापल्या परीने गहु , भाजीपाला व रोख रकमेच्या स्वरुपात मदत करत आहे . यात मुस्लीम समाजही मागे राहीलेला नाही , मुस्लीम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते अकबर टिन मेकरवाले यांनी आपल्या घरीच जेवण तयार करुन घर पोहोच करण्याचा निर्णय घेतला . अकबर व त्यांचे कुटुंबीय ,
मित्र परिवार दिवसा गरीब कुटुंबाच्या घरी जावुन घरी किती माणसे आहेत याची आस्थेने विचारापुस करुन सांयकाळचे आपले सर्वांचे जेवण आम्ही पोहोच करतो असे सांगुन सायंकाळी त्या कुटुंबांना न चुकता जेवण पोहोच करतात कोरोनाच्या धास्तीने सर्व प्रार्थनास्थळाचे दरवाजे बंद आहेत . परंतु अन्नछत्र ते ही मोफत चालविणार्या या देवदुतामुळे अनेकांना आपल्या मदतीला देवच धावुन आल्याची अनुभती होत आहे.

अहमदनगर दि.२९- शहरातील सिव्हिल हाँस्पिटल परिसरात छापा टाकून दारु असणाऱ्या मारुती व्हँन अँब्युलन्स, एक दुचाकी आणि दारु असा २ लाख ७० हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन तिघांना पकडण्याची धडकेबाज कारवाई तोफखाना ठाणे हद्दीत पोलिसांनी केली.याबाबत समजलेली माहिती अशी की, जिल्हा पोलीस उपअधीक्षक सागर पाटील यांना नगर शहरातील सिव्हिल हाँस्पिटल परिसरातील सिव्हिल काँर्टर येथे पाण्याच्या टाकीजवळ सुझुकी अँक्सेसवरून विदेशी दारुची वाहतूक केली जात आहे, अशी माहिती मिळाली. या घटनेबाबत पाटील यांनी नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना याची माहिती देऊन कारवाईचे आदेश दिले. मिटके यांनी तोफखाना पोलीसांच्या पथकासह सिव्हिल परिसरात जाऊन सापळा लावला. या दरम्यान रस्त्याने येणारी सुझुकी अँक्सेस मोपेड (एमएच १६, सीजे ४४९६) वरील वीरु प्रकाश गोहेर (रा.सिव्हिल काँर्टर रुम नं.२७,अहमदनगर), राँबीन जाँर्ज कोरेरा (रा.सिव्हिल काँर्टर, रुम नं.७) यांना थांबवून पंचासमक्ष झडती घेतली. यावेळी त्याच्या ताब्यातून मास्टर ब्लेड कंपनीच्या विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी या दारु बाटल्या संजय हुंकारे याच्याकडून घेतल्या असून, हा त्याच्या अँब्युलन्समधून आम्हाला दारु माल काढून दिला आहे. त्याच्याकडे अजुन एक दारु बाँक्स आहे, अशी माहिती दिली. यावेळी तात्काळ पंचासमक्ष सिव्हिल परिसरात जाऊन संजय गंगाराम हुंकारे याला ताब्यात घेतले. त्याच्या अँब्युलन्स (एमएच १४, ईवाय १३६५) ची झडती घेतली, व्हँनमध्ये मास्टर ब्लेड कंपनीच्या विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. अँब्युलन्स (एमएच १४, ईवाय १३६५), सुझुकी अँक्सेस मोपेड (एमएच १६, सीजे ४४९६) व दारू जप्त करून वीरु प्रकाश गोहेर, राँबीन जाँर्ज कोरेरा, संजय गंगाराम हुंकारे यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि किरण सुरसे, पोसई कष्णा घायवट, समाधान सोळंके, तोफखाना पोलीस ठाणे, तोफखाना डिबी पोलीस पथकातील कर्मचारी यांनी ही कारवाई केली.

शिर्डी प्रतिनिधि राजेंद्र गडकरी /जय शर्मा ) सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्व ते प्रयत्न करीत आहे ,सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे, सर्व बंद आहे, असे असतानाही मात्र शिर्डी जवळील सावळीविहिर फाटा येथील हॉटेल वेलकम येथे अय्याशी करण्यासाठी आलेल्या एका जोडप्याला पोलिसांनी रंगेहात पकडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे , लॉक डाऊन च्या काळात असे प्रकार घडत असल्याने शिर्डी व परिसरातील नागरिक मोठे आश्चर्य व्यक्त करीत आहेत,   यासंदर्भात शिर्डी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शिर्डी जवळील सावळीविहीर फाटा येथील नाशिक रोडला हॉटेल वेलकम तसेच एस्सार रिसॉर्ट हॉटेल के,के,मिल्कलगत असून या हॉटेलमध्ये आज दिनांक 29 रोजी दुपारी काही मुले व मुली आल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली असता, त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अौताडे व सपोनि घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलिसांचे पथक त्वरित सावळीविहीरफाटा येथील तेथे क्,के मिल्क जवळील हॉटेल वेलकम मध्ये पाठवले, या पोलीस पथकाने या हॉटेलची, तेथील रूमची झाडाझडती घेतली असता तेथे एका रूम मध्ये एक पुरुष, एक महिला आढळून आली, मोसिन मोहम्मद सय्यद वय 29 रा,गांधीनगर ,कोपरगाव हा मोटरसायकलवरून विनापरवाना कोपरगावहून सावळीविहीरफाटा येथे येऊन त्यांनी हॉटेल वेलकम येथे लॉजवर रूम घेतली होती व या रूममध्ये एक महिला सोबत होती, या लॉकडाऊनच्याच्या काळात सर्व हॉटेल बंद असताना हॉटेल वेलकम हॉटेल रिसॉर्ट चे मॅनेजर रामहरी जानराव काळे वय 29 हल्ली रा,के,के,मिल जवळ सावळीविहिर खुर्द ।ता,राहता याने आरोपींना  कोणतेही ओळखपत्र न पाहता रूम दिली तसेच त्यांची नोंद ठेवली नाही, नोंद रजिस्टर ही नव्हते, त्यामुळे रामहरी जानराव काळे यांच्यावर तसेच मोहम्मद सय्यद यांच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात भादवि कलम 188( 2) 269, 271 व साथरोग प्रतिबंधात्मक कायदा ,1897 कलम 234 प्रमाणे व आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिस करीत आहेत, सध्या केरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन सुरू आहे ,सर्वजण आपापल्या घरात असताना शिर्डी व परिसरातील हॉटेल बंद असताना, लॉज बंद असताना तरीही अय्याशी करण्यासाठी काही जोडपे, तरुण मुले मुली शिर्डी व परिसरात येऊन लॉजवर रूमघेवून राहतात, असे शिर्डी सावळीवीर निमगाव निघोज परिसरातही अनेक लोक आहेत तिथे वरून बंद मात्र आतून चालू अशी परिस्थिती आहे, त्यांना येथील लॉजवाले अधिक पैशाच्या मोहापायी बिनधास्तपणे रूम देतात, कोणतेही ओळखपत्र किंवा नोंद ठेवली जात नाही, रजिस्टर ही नसते, यामुळे कोरोणा सारखा संसर्गाचा आजार मोठ्या प्रमाणात पसरू शकतो , सर्वजण आपापल्या घरात आहेत, मात्र काही जण मौजमजा करण्यासाठी कोणताही विचार न करता पैशाच्या जीवावर फिरत असतात, लॉज वाले सुद्धा पैशासाठी काहीही करायला तयार होतात असे अनेक लॉज सध्या आहेत,याकडे पोलीस यंत्रणा अधिक लक्ष देईल काय ।।असा सवाल शिर्डी व परिसरातून आता होऊ लागला आहे,


शिर्डी राजेंद्र गडकरी -कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचाही कोरोनापासून बचाव व्हावा व कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी आमदार आशुतोषदादा काळे यांनी सदर संरक्षक साहित्य या शासकीय कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे. व या साहित्याचे आमदार काळे यांनी स्वतः लॉकडाऊनचे नियम पाळत सामाजिक दुरी ठेवत वाटप केले आहे , सध्या कोरोना मुळे सर्व शासकीय यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे अशा कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना ही दुर्दैवाने कोरोणाचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांची विशेष काळजी घेऊन त्यांनाही साहित्य वाटण्यात आले आहे,  कोपरगाव येथे पंचायत समिती कार्यालयात आ, आशुतोषदादा काळे यांनी आज पंचायत समिती कर्मचारी,
तालुका आरोग्य कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे यांचे कर्मचारी, डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम आरोग्य केंद्र कर्मचारी, तालुक्यातील सर्व आशा सेविका, आंगणवाडी सेविका, मदतनीस, पोलीस कर्मचारी, महसूल कर्मचारी, कोपरगाव नगरपरिषद स्वछता कर्मचारी, सर्वेक्षण कर्मचारी व पत्रकार यांना ५०० पीपीई किट, ४२ इन्फ्रारेड थर्मामीटर, ३००० सॅनिटायझर,  ३००० एन ९५ मास्क, १०० फेस शिल्ड मास्क व ३००० ट्रिपल लेयर मास्कचे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून वाटप केले, यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुन काळे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, कोपरगाव ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, कोपरगाव शहराचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, कोपरगाव ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे, सर्व आपत्कालीन व्यवस्थेतील कर्मचारी, पत्रकार आदी उपस्थित होते.

शिर्डी राजेंद्र गाड़करी ) -नुकत्याच फेब्रुवारी 20 20 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत श्रीदिप संदीप आडागळे याने घवघवीत यश प्राप्त केले आहे, श्रीदीप आड़ागळेचा जिल्ह्यात 26 वा नंबर आला आहे, राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षा फेब्रुवारी मध्ये घेण्यात आली होती ,या परीक्षेत दादा वामन जोशी नवीन मराठी शाळेतील इयत्ता चौथी मध्ये शिकणारा श्रीदीप संदीप आडागळे हा या परीक्षेला बसला होता ,या परीक्षेत त्याला 300 पैकी 246 गुण मिळाले असून त्याचा राज्यात 28 व नंबर आला आहे, तसेच जिल्ह्यात तो 26 वा आला आहे ,
श्रीरामपूर तालुक्यात त्याचा 9वा नंबरआला आहे, ही परीक्षा राज्यस्तरीय होत असते, हजारोंच्या संख्येने विद्यार्थी या परीक्षेला बसतात ,अशा या परीक्षेत श्रीदिप आडागळे याने जिल्ह्यात 26 वा येऊन मोठे यश प्राप्त केले आहे, त्याला वर्गशिक्षक भाग्येश ठाणगे, मुख्याध्यापक बी एस कांबळे, यांचे व इतर शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले ,या यशाबद्दल हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, या स्कूल कमिटीचे चेअरमन राजेंद्र जोशी व पदाधिकारी शिक्षक व सर्व जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी व नागरिकांकडून या छोट्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.


बुलडाणा - 28 एप्रिल बुलडाणा वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या वरवंड गावापासून 3 कि.मी. अंतरावर असल्यालेल्या एका शेतात अस्वलाच्या हल्ल्यात 45 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज 29 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता उघडकीस आली.
          जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य हा अस्वलासाठी प्रसिध्द आहे. या आरक्षीत जंगलात मोठ्या प्रमाणात अस्वलांचा अधिवास आहे. आपल्या अधिवास क्षेत्रासाठी अनेकवेळा अस्वलामध्ये झुंज होत असतात. या झुंजी व अनेकवेळा पाण्याच्या शोधात सुध्दा हे अस्वल अभयारण्य सोडून बाहेर येतात. मागील तिन वर्षा अगोदर ज्ञानगंगा अभयारण्याच्या लगतचे गाव वरवंड, डोंगरखंडाळा, डोंगरशेवली, श्रीकृष्ण नगर या भागात अस्वल व मानवी संघार्षामुळे अनेक शेतकरी व शेतमजुर जखमी झाले तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. अस्वलांचे हे वाढत्या हल्ले पाहून तज्ञांची पथक बोलावून त्यांच्या या आक्रम भुमिकेचा अभ्यास करण्यात आला होता. तज्ञ समितीने काही उपाय सुचविले होते. त्यानुसार ज्ञानगंगा अभयाण्यात अस्वलांची आवड असलेल्या खाद्यांचे रोपण करण्यात आले होते. तसेच मोठ्या प्रमाणात पाणवठे तयार करण्यात आले. जेणेकरुन अस्वल अभयारण्य सोडून बाहेर जावू नये यासाठी काळजीही घेण्यात आली.
मागील काही महिन्यांपासून अस्वल व मानवी संघर्षांमध्ये घट झालेली आहे. त्या मानाने अस्वलाचे मानवावर हल्ले करणेही कमी झाले आहे. अशातच आज 29 एप्रिल रोजी अस्वलाच्या हल्ल्यात एक इसम ठार झाल्याची घटना समोर आली याबाबत प्राप्त माहितीनुसार बुलडाणा तालुक्यातील वरवंड या गावातील मोलमजुरी करणारे किसन त्रंबक सुरु शे वय 45 यांची गाय हरपल्याने काल  28 एप्रिल रोजी सायंकाळी शोधण्यासाठी ते गावापासून 3 कि.मी. अंतरावर असलेल्या जंगलात असलेल्या परिसरात गेले असता विजय जाधव यांच्या शेतात दबा धरुन असेल्या अस्वलाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. परंतु ते कोठेही दिसून आले नाही. आज 29 एप्रिल रोजी त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या अवस्थेत दिसून आल्याने गावात एकच खळबळ उडाली.  या घटनेची माहिती वनविभाग व पोलिसांना देण्यात आली. पंचनामा करण्यासाठी बुलडाणा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश टेकाळे, वर्तुळ अधिकारी राहुल चव्हाण, वनरक्षक मोरे, कलीम बिबन शेख, वन्यजीव विभागाचे गिते व इतर घटनास्थळी हजर होते. त्यांचा मृतदेहवर बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात येणार आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- सोशल मिडियाचा काही कडून वापर, गैरवापर होत असतो यामध्ये प्रामुख्याने व्हाँटसअप गृप हा सर्वच क्षेत्रातील माहिती अदान - प्रदान करण्याकरीता जास्त वापरला जात असतो मात्र कोरोनाच्या गंभीर संकटामुळे " गणगोत " या व्हाटस अप ग्रुपच्या माध्यमातुन ग्रूप अॅडमीन राहुल क्षिरसागर यांनी जेष्ठ पत्रकार देवीदास देसाई यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे आवाहन करण्यात आले आणि काही अवधीतच तब्बल अठरा हजार रुपयांचा मदत निधी जमा झाला. कोरोनाचे संकट आपल्या राज्यावर आले  राज्याच्या मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले नाशिक स्थित राहुल क्षिरसागर यांनी "गणगोत " या गृपवर असणार्या प्रत्येक सदस्याला रुपये दोनशे मदत करण्याचे आवाहन केले होते, या आवाहनास वरळी पासुन ते परळी पर्यत मुंबई पुणे ते मराठवाडा बिड गेवराई अहमदनगर येथील सदस्यांनी उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला.बेलापूर येथील पत्रकार देविदास देसाई यांच्या खात्यावर सर्व सदस्यांनी दोनशे रुपये जमा केली    काहींनी पाचशे काही सदस्यांनी एक हजार असे एकुण १७९७२ रुपये जमा झाले ही रक्कम महावितरणचे बेलापूर विभागाचे अधिकारी चेतन जाधव यांनी आँन लाईनने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाठविली आज प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये अनेक व्हाँटसअप गृप आहेत प्रत्येक गृप अँडमिनने अशा प्रकारे आवाहन करुन निधी जमविला तर थोडा थोडा मिळून फार मोठा निधी जमा होवु शकतो कोरोनाचा लढा जिंकण्यासाठी या उपक्रमाचा इतरांनीही आदर्श घेवुन आपले नाव मदत मागणाऱ्यांच्या यादीत नव्हे तर मदत करणाऱ्यांचा यादीत यावे या करीता प्रयत्न केले तर निश्चितच देशसेवा केल्याचा आनंद होईल.
  सोशल मिडियातुन सोशल वर्क    संपूर्ण भारतभरामध्ये व्हॉटस अॅपचे मोठे जाळे असुन तरुणांपासुन अबालवृद्धापर्यंत प्रत्येक घरात व्हॉटस अॅपचा वापर होतो,  कोरोना या गंभीर आजारामुळे देशासह राज्याची अवस्था बिकट होणार असुन प्रत्येक ग्रुप अॅडमीनने अशी संकल्पना हाती घेतली तर देशभर आपला आदर्श उभा राहु शकतो.

नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे-ना.बाळासाहेब थोरात
 शिर्डी,प्रतिनिधि जय शर्मा )राज्यामध्ये  लॉकडाऊन लागू केल्यानंतरही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. काही ठिकाणी अनावश्यक गर्दी होत आहे. हे अतिशय चिंताजनक आहे. कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संगमनेर येथील उपाययोजनांबाबत आढावा घेताना केले.
            नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष निलेश जाजू, प्रकाश कलंत्री, प्रांताधिकारी शशिकांत मंगळूरे, तहसीलदार अमोल निकम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर  यांच्यासह विविध नगरसेवक व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.
            महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मागील काही दिवसात संगमनेर शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाने हॉटस्पॉट जाहिर केलेल्या ठिकाणी केलेली प्रतिबंधात्मक कारवाई त्याचप्रमाणे तालुक्यात व शहरामध्ये अधिकाधिकपणे प्रभावी ठरणाऱ्या उपाययोजनांसदर्भात मार्गदर्शन करुन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. कोरोनाचे संकट आपल्या घरापर्यंत पोहोचले आहे. त्याचा प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडण्याचे कटाक्षाने टाळावे, नागरिकांनी घरातच राहून स्वत:ला आणि स्वत:च्या कुटुंबीयांनाही सुरक्षित ठेवावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी संगमनेर तालुक्यातील व शहरातील मजूरांसाठी करण्यात आलेली व्यवस्था त्याचप्रमाणे होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांची माहिती मंत्रीमहोदयांनी घेतली.

शिर्डी,प्रतिनिधि जय शर्मा )कोपरगाव तालुक्‍यात नोव्‍हेल कोरोना विषाणू प्रार्दूर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवीर राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्‍ट होऊ न शकलेल्‍या एपीएल (केशरी शिधापत्रिकाधारक) धारकांना मे,2020 व जून,2020 या दोन महिन्‍यांच्‍या कालावधीत सवलतीच्‍या दराने अन्‍नधान्‍याचा लाभ देण्‍यात येणार आहे. कोपरगाव तालुक्‍यात 16 हजार 777 शिधापत्रिकाधारक असून एकूण  65 हजार 146 लाभार्थी  आहेत. त्‍यांना 3 हजार 6 क्विंटल गहू व 2 हजार 3 क्विंटल तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. गहू 8 रुपये प्रतिकिलो या दराने प्रतिमाह प्रतिव्यक्ती 3 किलो व तांदूळ 12 रुपये प्रतिकिलो  या दराने प्रतिमाह 2 किलो असे  एकूण पाच किलो अन्नधान्य वितरीत करण्‍यात येणार आहे.
           शिधापत्रिकाधारकांच्‍या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्‍या नसतील अथवा शिधापत्रिकांचे आधार सिडींग झाले नसेल, तरी त्‍या शिधापत्रिकाधारकांना विहीत केलेल्‍या दराने व परिमाणात धान्‍य देण्‍यात येणार आहे. तसेच ज्‍या शिधापत्रिकाधारकांच्‍या शिधापत्रिकेवर बारा अंकी नोंदणी क्रमांक नाही त्‍या शिधापत्रिकाधारकांनाही  या योजनेचा लाभ घेता येईल. अन्‍नधान्‍य वितरणाची प्रक्रिया सुरु  करण्‍यात आली असून लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. कोणताही लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही, तसेच लाभार्थ्यांच्या तक्रारींचे तेथेच निराकरण होईल याची दक्षता सर्व संबधितांनी घ्यावी. असे आवाहन तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार, कोपरगांव योगेश चंद्रे यांनी केले आहे.

(शिर्डी प्रतिनिधि राजेंद्र गडकरी ) -कोरोणामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे, शिर्डीतही त्यामुळे सर्व काही बंद आहे, त्यामुळे बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन ,विमानतळ हे सुद्धा शांत शांत आहे, निर्मनुष्य झालेल्या या सार्वजनिक ठिकाणी आणि आता मोकाट कुत्री ,जनावरे यांनी माणसांची जागा घेतली की काय। असे दिसून येत आहे, वर्दळ नसल्यामुळे प्राणी आता मनुष्यवस्तीत येऊ लागले आहेत, असे चित्र या काळात  दिसत आहेत, गावे ,शहरे बंद असल्याने व सर्व जण आपापल्या घरात असल्याने , वन्य प्राणी ,पाळीव प्राणी ,मोकाट जनावरे  आता सार्वजनिक ठिकाणी दिसू लागले आहेत ,दररोज ग्रामीण भागात दर्शनासाठी गर्दीने भरलेले मंदिरे आता उन्हामुळे व वर्दळ नसल्याने तेथे मोकाट जनावरे आश्रय घेत आहेत, शिर्डीचे नेहमी गजबजलेले साईनगर शिर्डी रेल्वे स्थानक निर्मनुष्य झाले असून 
तेथे ते मोकाट कुत्री आता फिरताना दिसतात,तसेच ग्रामीण भागात तर उन्हाळ्याच्या चटक्यामुळे म्हणा की लॉकडाऊनच्या शांत शांत वातावरणामुळे म्हणा हरीण, कोल्हे ,वानर आदी वन्य प्राणी गावाच्या आसपास येऊ लागले आहेत, एवढेच नाही तर शांत वातावरण व कडक उन्हाळा यामुळे बिळातले साप  बाहेर येऊन रस्त्यावर, मनुष्यवस्तीत दिसू लागले आहेत, कोळपेवाडी येथे नुकतीच एक  धामीन सर्पमित्रांनी पकडली, तसेचअश्वी परिसरातही मुंगूस आणि सापाची लढाईत नुकतेच एका सापाला जीवदान सर्पमित्राने दिले ,सध्या मनुष्यासाठी संचारबंदी आहे, वन्य प्राणी, पाळीव प्राणी, मोकाट जनावरे यांना मात्र यावरून  ग्रामीण भागात सध्या मुक्त संचार असल्याचे दिसून येत आहे. 


 श्रीरामपूर  ( प्रतिनिधी  )- सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असताना श्रीरामपूर तालुक्यात एक रुग्ण वगळता दक्ष पोलीस अधिकारी कार्य तत्पर  महसुल अधिकारी यांच्या ठोस निर्णयामुळे कोरोनावर श्रीरामपूरकरांंनी विजयच मिळविला असेच म्हणावे लागेल लाँक डाऊनची घोषणा होताच अप्पर पोलीस अधिक्षक डाँ दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने उपविभागीय अधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत पाटील श्रीरामपूर शहर पोलीस  स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मसुद खान यांनी अतिशय नियोजनबध्द कार्यक्रम तयार केला जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर व तालुक्यात चोख बंदोबस्त ठेवुन नागरिकांना घरातच बसण्याचे अवाहन केले ज्यांनी महसुल अधिकारी व पोलीस प्रशासन यांच्या आदेशाला जुमानले नाही त्यांना दांडुक्यांचा प्रसादही मिळाला काही चांगले निर्णय घेण्याकरीता काही कठोर नियमांचे पालन करावेच लागते हे या अधिकार्यांनी कृतीतुन दाखवुन दिले उपविभागीय अधिकारी अनिल पवार उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  मसुद खान यांनी वैयक्तिक लक्ष देवुन नागरीकाना घरातच बसण्याचे वारवार अवाहन
केले ज्यांनी या अवाहनाला जुमानले नाही त्याच्यावर कायदेशीर कारवाई देखील करण्यात आली काही ठिकाणी  पोलीसांनी कडक भूमिका घेतली त्यावेळी काहींनी नाराजीचा सुर आवळला परंतु आज आपल्या तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण  सापडला नाही नव्हे महसुल अधिकारी व पोलीस खात्याने आपल्या तालुक्यात कोरोनाला डोके वर काढुच दिले नाही त्या करीता कठोरात कठोर निर्णय घेण्याची वेळ आली तरी अधिकारी मागे हटले नाही त्यानां श्रीरामपूर नगरपालीका तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतीनी देखील सहकार्य केले उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने उपविभागीय अधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत पाटील पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट हे दररोज सकाळपासुनच शहरात पायी गस्त घालत होते त्याचा परिणाम असा झाला की फार गरज असेल तरच श्रीरामपूरचा नागरीक बाहेर पडत होता तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मसुद खान यांनी देखील तालुक्यात चोख बंदोबस्त ठेवला या कालावधीत गरजवंताना मदत करण्यास देखील  श्रीरामपूरकर मागे हाटले नाही अनेक सेवा भावी संस्था नागरीक मदतीसाठी पुढे आहे कोरोनाच्या या सांकटकाळात माणूसकी जिवत असल्याचेही पहावयास मिळाले. 

शिर्डी/प्रतिनिधि जय शर्मा  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष या नात्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 अन्वये विविध उपाययोजनांचे आदेश पारित केले असून त्याची जिल्हयात अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासोबतच जिल्हयामध्ये लॉकडाऊन आणि संचारबंदीचे निर्बंध लागू करण्यात आले असून इतर जिल्हयातून अहमदनगर जिल्हयात पर्यायाने तालुक्यात नागरिकांच्या  विनापरवाना ये-जा करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभममीवर काही नागरिक अथवा स्थानिकांचे नातेवाईक, पाहुणे बेकायदेशीरपणे राहाता तालुक्यात प्रवेश करत असल्याचे तालुका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. ही कृती आक्षेपार्ह असून शासकीय आदेशांचे उल्लंघन करणारी आहे.
              राहाता तालुका अथवा परिसरात नवीन व्यक्ती, बाहेरगावचे पाहूणे आल्यास स्थानिकांनी यासंबधीची माहिती तात्काळ तालुका प्रशासनास अथवा नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवावी, जेणेकरून संबंधीताची चौकशी करून योग्य ती वैद्यकीय कार्यवाही करता येईल व संभाव्य धोका टाळता येईल. बाहेरगावाहून आलेल्यांची माहीती लपवून ठेवल्यास संबधितांविरुध्द फौजदारी कारवाई करण्यात येईल. मदतीसाठी तालुका नियंत्रण कक्ष येथे दूरध्वनी क्रमांक क्र.02423-242853 वर संपर्क साधावा. नागरिकांनी घरातच राहून स्वत:ची काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन, राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.
            प्रशासनातील सर्व  यंत्रणा नागरिकांच्या सोईसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, ते नागरिकांच्या हितासाठीच आहेत, त्यामुळे सर्वांनी त्याचे पालन करावे असे आवाहन प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांनी केले आहे.

अहमदनगर दि.२८- नगर-मनमाड महामार्गावरील गुहा गावाच्या शिवारात ट्रक चालकाला मारहाण करून लुटणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेला पकडण्यात यश आले आहे. संतोष राजेंद्र विधाते (वय २४), सागर सिताराम विधाते (वय ३०), आप्पासाहेब केशव वाडकर (वय ३० सर्व रा.वरशिंदे, ता.राहुरी) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२१ एप्रिलला पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास साताराला जात असताना ट्रक पंक्चर झाल्याने पंक्चर काढण्यासाठी नगर-मनमाड मार्गावरील गुहा गावाच्या शिवारात साई गंगा हाँटेलजवळ ट्रक थांबवली. या दरम्यान, मोटारसायकलवर आलेल्या तीन अज्ञातांनी दमदाटी करून जवळील रोख रक्कम, मोबाईल असा एकूण १५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेल्याची फिर्याद राहुरी पोलिस ठाण्यात ट्रकचालक विशाल श्रीराम वाडेकर ( रा.मोहाडी पिंपळादेवी, जि.धुळे) यांनी दिली होती. या गुन्हाता तपास सुरू असताना, हा गुन्हा संतोष विधाते याने व त्यांच्या साथीदारांनी मिळून केला आहे, अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार राहुरी येथे जाऊन शोध घेऊन आरोपी संतोष विधाते याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी पकडले. संतोष याला विचारणा केली असता,त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिस खाक्या दाखविताच, सदरचा गुन्हा हा साथीदार सागर विधाते व आप्पासाहेब वाडकर सर्वांनी सागर यांच्या स्पलेंडर मोटारसायकलवर जाऊन केलीची कबुली दिली. यानंतर उर्वरित सागर सिताराम विधाते (वय ३०), आप्पासाहेब केशव वाडकर (वय ३० दोघे रा.वरशिंदे, ता.राहुरी) याचा शोध घेऊन पकडण्यात आले.यावेळी चोरलेली रक्कम खर्च केल्याचे आरोपींनी सांगितले, ५ हजार रुपयाचा एम आयचा मोबाईल, स्पलेंडर गाडी (एमएच १७, एआर ३३३४) असा एकूण ३५ हजार रु. मुद्देमाल हस्तगत केला. पकडण्यात आलेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुढील तपासासाठी राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे-कांबळे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोहेकाँ मनोहर गोसावी, पोना रविंद्र कर्डीले, ज्ञानेश्वर शिंदे, राहुल सोळुंके, सागर ससाणे, मयुर गायकवाड, रवि सोनटक्के, चालक पोहेकाँ संभाजी कोतकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

शिर्डी राजेंद्र गडकरी - सध्या कोरोणामुळे सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे, या लॉक डाऊनमुळे सर्वजण घरात आहेत, गावात, शहरात सर्वत्र कर्फ्यू लागू आहे, सर्व बंद आहे ,त्यामुळे पशुपक्षी, प्राणी, वन्य प्राणी आता गावात, शहरात मन मोकळे बिनधास्त फिरताना ,संचार करताना दिसून येत आहे, माणसांना संचारबंदी आहे ,परंतु प्राणि मात्र मुक्त संचार करताना अनेक ठिकाणी दिसून येत आहे.सध्या देशात कोरोणामुळे लॉकडाऊन सुरू आहे ,त्यामुळे अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद आहे ,रस्ते ओस पडले आहे, गावे ,शहरे शांत आहेत, सर्वजण आपापल्या घरात आहेत त्यामुळे गावात, शहरात, गल्लोगल्ली, चौकात, मंदिरात, सार्वजनिक ठिकाणी, आता नेहमी प्रेमाणे गजबजलेले ,गर्दीने फुलले वातावरण  दिसून येत नाही ,अशा गर्दी नसलेल्या सार्वजनिक ठिकाणी वानर, हरिण,मोर, अशा प्रकारचे वन्य प्राणी तसेच विविध प्रकारचे पशु पक्षी गावात शहरात मनमोकळेपणे फिरताना दिसून येत आहे, उन्हाची तीव्रता वाढू लागली असल्याने व रस्ते, सार्वजनिक ठिकाणे ओस पडल्याने प्राणी बिनधास्त  अशा ठिकाणी अधून मधून  दिसून येत आहेत मग , बस स्टॅन्ड असो की, रेल्वे स्थानक असो  मंदिरे असो की बाजारतळअसो, अशा ठिकाणी आता ह्या प्राण्यांनी मनुष्याची जागा घेतल्याचे दिसून येत आहे, शिर्डीच्या गजबजलेल्या साईनगर रेल्वे स्टेशन मध्ये सर्व सामसूम आहे अशा निर्मनुष्य साईनगर रेल्वे स्टेशनमध्ये मात्र उन्हाळ्यात उष्णतेपासून  बचाव करण्यासाठी कुत्रेही रेल्वे स्टेशनमध्ये मनसोक्त आनंद घेत आहेत तर ग्रामीण भागात सुद्धा लॉकडाऊन मुळे मंदिरे बंद आहेत, अशा मंदिरांच्या सभामंडपात गावातील भटके कुत्रे ,शेळ्या ,गाया दुपारच्या वेळी मस्त आराम करताना दिसून येत आहेत, मानवाची जागा या  काळात हे प्राणी आता भरून काढता की काय असे वाटत आहे। अनेक वांनरे ,माकडे, जंगलातून गावात शहरात येत आहे,व दिसू लागले आहेत, उन्हाळ्यातील पाण्याच्या आशेने म्हणा किंवा शांत शांत वातावरण मनात पण असे प्राणी गावात आता दिसत आहेत, त्यात सध्या उन्हाळा सुरू झाला आहे, या उकाड्यामुळे बिळातले सर्प आता हळूहळू बाहेर येऊ लागले असून त्यांचाही संचार सार्वजनिक ठिकाणी वाढल्याचे दिसून येत आहे, आजच  आश्वी येथे मुंगसाच्या तावडीतून एका सापाला  सर्पमित्राने वाचवले,  तर कोळपेवाडी कारखान्यावर  कोब्रा नागासारखी दिसणारी लांबलचक धामीण  दुसऱ्या एका सर्पमित्राने  पकडली , यावरून हे साप आता बीळा  बाहेर    व सार्वजनिक परिसरात  वावरू लागले आहेत , हे दिसून येते ,सध्या  कडक उन्हाळ्यामुळे   पशु, पक्षी वन्यप्राणी  पिण्याच्या पाण्यासाठी मोठे कासावीस करू लागली  आहे , त्यामुळे असे हे प्राणी  पाण्याच्या ओढीने  गावाकडे येऊ लागले आहेत , कोल्हे, मोर तर परिसरातील काही ठिकाणी  वाड्या-वस्त्यांवर लांडगे हे आता दिसू लागले आहेत ,त्यात  लॉकडाऊनमुळे संचारबंदी असल्याने  गजबजलेले  गावे शहरे दिसत नाही,  त्यामुळे  असे वन्यप्राणी बिनधास्त संचार करताना दिसू लागले आहेत,  गावातील, शहरातील मोकाट असणारे पाळीव प्राणी, कुत्रे ,डुकरे , बैल,  गाढवे यांनाही सध्या उदर निर्वाहासाठी मोठी धावपळ करावी लागत दिसत आहे, राहाता तालुक्यातील शिंगवे रुई  भागात मोठ्या प्रमाणात हरणांचे कळप आहे, हा कडक उन्हाळा जाणवायला लागल्यापासून ही हरणे आता संचारबंदीचा फायदा घेत गावाच्या जवळ संचार करताना दिसू लागले आहेत, या बंद काळात पाळीव जनावरे यांच्या चाराचाही मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

शिर्डी राजेंद्र गडकरी - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन सुरू  असून सर्व बंद आहे ,तरीही काही व्यक्ती विनाकारण व परवानगी न घेता या गावातून दुसऱ्या गावात जात असतात ,अशाच संगमनेर येथुन  ५ व्यक्तींना विनापरवाना,विनाकारण व मास्क न लावता। सावळीविहीरवाडीला आल्यानंतर व त्यांची माहिती पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी या व्यक्तींचा शोध लावून त्यांच्यावर  शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सावळीविहीर वाडी येथे ५व्यक्ती संगमनेर येथुनआल्यामुळे व त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे शिर्डी व सावळीविहिर परिसरात नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे,
  । कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे , राज्यात साथ निवारण कायदा लागू करण्यात आलेला आहे, शासकीय कर्मचारी, डॉक्टर पोलीस सर्वजण अहोरात्र प्रयत्न करीत आहेत ,मात्र या काळात घरात राहणे उचित असताना काही व्यक्ती विनाकारण व विनापरवाना या गावातून दुसऱ्या गावात फिरत असतात, त्यामुळे कोरोना चा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असते, हा धोका असूनही दिनांक 27 रोजी संगमनेर येथील मदिनानगर येथून ५ व्यक्ती  विनाकारण व विनापरवाना, गुपचुपपणे राहता तालुक्यातील सावळीविहीर वाडी येथे आल्या होत्या , शिर्डी पोलीसांनि  त्वरित सावळीविहीरवाडी गाठली व येथे येऊन अधिक तपास केल्यानंतर येथे मदिनानगर संगमनेर येथुन आलेल्या जब्बार अब्दुल पठाण वय 37 , सादीका जब्बार पठाण वय 31, निसार नूरमंहम्मद अन्सारी वय55, शबाना निसार अन्सारी वय 50, सुफिया निसार अन्सारी 24 अशा एकूण पाच व्यक्तीच्या तोंडाला मास्क न लावता, विनाकारण, विनापरवाना सावळीविहीरवाडी येथे आल्याचे स्पष्ट झाले ,त्यामुळे या  व्यक्तींची पोलिसांनी चौकशी केली असता ते कोणाला न सांगता संगमनेरहून सावळीविहीरवाडी येथे आले होते, त्यांच्या तोंडाला मास्क नसल्यामुळे,व लॉकडाऊन चे नियम तोडल्यामुळे,, संचारबंदी जारी असतानाही विनाकारण फिरणे, या सर्व आरोपांमुळे शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये या ५ व्यक्तींवरभा,द,वि,कलम१८८(२),२६९,२७१व सात रोग निवारण कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामध्ये तीन महिला आहेत, यामुळे मात्र शिर्डी सावळीवीहिर परिसरात नागरिकांमध्ये विविध चर्चा होत होत्या,
राहाता तालुक्यात असा प्रथमच गुन्हा दाखल होत असल्याची माहिती समजते, सध्या कोरोणामुळे लॉकडाऊन सुरू असताना, सर्व घरा-घरात असताना काही लोक जाणीवपूर्वक आपल्या गावातून दुसऱ्या गावाला जात असतात, असे कोणी नवीन लोक आपल्या गावात आल्याचे समजताच किंवा अनोळखी नवीन लोक येऊन राहत असेल तर त्यांची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनला द्यावी ,असे आवाहनही  शिर्डी पोलिसांनी केले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget