April 2025

येवला,एसएनडी मैदान – येथील एसएनडी मैदानावर पार पडलेल्या रोमहर्षक सामन्यात नंदुरबारने श्री शारदा संघावर ३ गड्यांनी विजय मिळवला.


कमी धावसंख्येच्या या सामन्यात श्री शारदा संघाला केवळ ७५ धावांत गुंडाळण्यात नंदुरबारच्या शिस्तबद्ध गोलंदाजीने यश मिळवले. जय शिंदे आणि सैराम शेलके हे दोनच फलंदाज दहाच्या पुढे धावा करू शकले, त्यांनी प्रत्येकी १८ धावा केल्या.


नंदुरबारकडून दुर्व तपस्वीने भेदक गोलंदाजी करत ३ महत्त्वाचे बळी घेतले. त्याला हंसराज आणि तनयने प्रत्येकी २ बळी घेऊन उत्तम साथ दिली आणि शारदा संघाचा डाव लवकर संपवला.


७६ धावांचे सोपे लक्ष्य गाठताना नंदुरबारच्या संघाची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी लवकरच गडी गमावले, मात्र संयम राखत त्यांनी फक्त ८ षटकांत ७ गडी गमावून विजय मिळवला.


इशी गावितने नाबाद २५ धावा करत विजयात मोलाची भूमिका बजावली, तर जॉननेही २१ धावांची उपयुक्त खेळी केली. श्री शारदाकडून विहान कसलीवालने जबरदस्त गोलंदाजी करत ४ बळी घेतले, तर विराट घेगडमलनेही ३ बळी घेतले आणि पुनरागमनाची आशा निर्माण केली होती.

बेलापूर( प्रतिनिधी)- बेलापूर व परिसरात विना नंबर प्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या दुचाकी व चार चाकी वाहन तसेच चार चाकी वाहनाच्या काचांना गडद काळा रंगाच्या फिल्म लावून बेकायदेशीर रित्या फिरणाऱ्या वाहनावर कारवाई करुन त्यांच्याकडून जवळपास सात हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की  बेलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये किरकोळ  चोऱ्यांचे प्रमाण  वाढले  होते. तसेच अपघाताचेही प्रमाण वाढले होते या पार्श्वभूमीवर  श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी  परिसरात विना नंबर प्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या दुचाकी व चार चाकी वाहन तसेच चार चाकी वाहनांच्या काचांना गडद काळा रंगाचे फिल्म लावून बेकायदेशीर  फिरणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बेलापूर पोलिसांनी दिवसभर ही मोहीम राबवली. त्यामध्ये अनेक दुचाकी या विना नंबरच्या तसेच फॅन्सी नंबर असलेल्या आढळून आल्या त्या गाड्यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.  त्यात 19  दुचाकी विना नंबर तसेच फॅन्सी नंबरच्या दुचाकी आढळून आल्या एका मोटरसायकलवर तर चक्क नंबर प्लेटच्या जागी नंबर न टाकता सरपंच लिहिलेले होते  या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख याच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव  त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे ,  पोहेकॉ सचिन गायकवाड,पोकॉ संपत बडे, भारत तमनर, नंदकिशोर लोखंडे, रविंद्र अभंग, पंकज सानप ,महेश थोरात आदिंची ही कारवाई केली. पकडलेली गाडी सोडविण्याकरता अनेकांनी आपल्या मित्रांना पुढार्यांना फोन लावले परंतु कारवाई का केली हे सांगताच त्यांनीही फोनवर  तुमच्या पद्धतीने काय असेल ते करा असा सल्ला पोलिसांना दिला.

बेलापूर (प्रतिनिधी)-सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने बेलापूर गावातील शासकीय कार्यालय तसेच मंदिर, मज्जिद, चर्च या ठिकाणी नागरिकांना व भाविकांना बसण्यासाठी म्हणून 20 बाकडे भेट देण्यात आले आहे.बाकडे लोकार्पणाची सुरुवात स्वामी समर्थ केंद्रा पासून करण्यात आली.सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने बेलापूर बुद्रुक बेलापूर खुर्द तलाठी कार्यालय येथे येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था व्हावी याकरिता बाकडे भेट देण्यात आले. त्याचबरोबर बेलापूर गावातील मंदिर ,मज्जिद व चर्च याही ठिकाणी बाकडे भेट देण्यात आले. या वीस बाकड्यांची अंदाजीत किंमत 50 हजाराच्या आसपास असून या बाकड्यांचा लोकार्पण सोहळा काल श्री स्वामी समर्थ मंदिर कुर्हे वस्ती बेलापूर येथे संपन्न झाला. यावेळी श्री स्वामी समर्थ केंद्राचे सेवेकरी विठ्ठल गाडे मामा व अन्य सेवकर्यांच्या  तसेच सत्यमेव जयते ग्रुपच्या सर्व सदस्यांचे उपस्थितीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांना चार बाकडे भेट देण्यात आले. यावेळी बोलताना सेवेकरी विठ्ठल गाडे मामा म्हणाले की सत्यमेव जयते ग्रुपने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात येणाऱ्या वयोवृद्ध भाविकांसाठी बाकड्यांची व्यवस्था केली त्यांनी सर्व धर्म समभाव लक्षात घेऊन मज्जिद असेल चर्च असेल त्याचबरोबर तलाठी कार्यालय याही ठिकाणी बाकड्यांची व्यवस्था केलेली आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे तितके थोडे आहे. यावेळी सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने विष्णुपंत डावरे अभिषेक खंडागळे देविदास देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले.या वेळी सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपचे राधेश्याम अंबिलवादे,सचिन वाघ, बाबासाहेब काळे,दिलीप अमोलीक,दिपकसा क्षत्रिय सचिन कणसे,विलास नागले, विशाल आंबेकर,भगीरथ मुंडलिक, नंदकिशोर दायमा,बाबुलाल पठाण, जाकीर शेख,औदुंबर राऊत,गोपी दाणी, महेश कुऱ्हे, संजय भोंडगे,महेश ओहोळ आदिंसह नागरिक उपस्थित होते.

बेलापूर (प्रतिनिधी )-महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने आळंदी येथे पाच दिवसीय वेदोत्सव 2025 संपन्न झाला या वेदोत्सव परीक्षेत दधीमती वैदिक गुरुकुल गोठमांगलोत गुरुकुलातील व बेलापूर येथील पत्रकार दिलीप दायमा यांचे चिरंजीव बटुक महेश दायमा यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णमुद्रिका पटकाविली.                       दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने आळंदी येथे वेदोत्सव 2025 संपन्न झाला या वेदोत्सवात महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानच्या सर्व 40 विद्यालयांमधून तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता पाच दिवस चालल्येल्या या स्पर्धेमध्ये सूर्यनमस्कार स्पर्धा, निबंध स्पर्धा, विविध गुणदर्शन स्पर्धा, वकृत्व स्पर्धा ,संपूर्ण शुक्ल यजुर्वेद मध्यादिन संहिता या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या सर्व परीक्षेत दधीमती वैदिक गुरुकुल गोठमांगलोत या गुरुकुलातील बटुक महेश दिलीप दायमा यांनी प्रथम क्रमांक मिळविला त्याला त्याबद्दल सुवर्णमुद्रिका तसेच चांदीचे पंचपात्र सेट देऊन त्याचा सन्मान  प्रभू श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष महंत गोविंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.  तसेच दधिमती गुरुकुलचे गुरुजी आचार्य वेदमूर्ती श्री कमलकिशोर जोशी याचाही सन्मान या वेळी करण्यात आला. महेश दायमा हे बेलापूर येथील पत्रकार दिलीप दायमा यांचे चिरंजीव आहेत. यावेळी प्रधानाचार्य कमल किशोर जोशी यांचाही मंहत गोविंद देवगीरीजी महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावर्षीच्या प्रथम क्रमांकाच्या सन्मानाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या महेश दिलीप दायमा यांने  प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णमुद्रिका मिळवली ते महेश दायमा हे बेलापूरचे आहेत तसेच त्यांचा सत्कार करणारे श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष महंत गोविंद देवगिरी जी महाराज यांची जन्मभूमी देखील बेलापूर आहे.महेश दायमा याने राजस्थान येथील दधिमती वैदिक गुरुकुलात वैदिक शिक्षण घेण्याकरता प्रवेश घेतला होता .आज पाच वर्षे झाली त्या संस्थेत वैदिक ,धार्मिक, वेदशास्त्राचे शिक्षण घेत असताना प्रत्येक वर्षी प्रथम येण्याचा मान महेश ने मिळवला आहे . त्याला असलेली आवड व रुची लक्षात घेऊन गुरुकुलाच्या प्रमुखांनी त्याची पुढील शिक्षणासाठी वाराणसी येथे निवड केली होती . महंत गोविंददेव गिरीजी महाराज यांनी महेश दायमा यांचा सन्मान करतांना त्याची आस्थेने चौकशी करून पुढील वाटचालीस भरभरून शुभाशीर्वाद दिलेत .महेश दायमा यास दधिमती वैदिक गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल दायमा ,सचिव हरिनारायण व्यास ,कोषाध्यक्ष जय किशन संचालक समिती अध्यक्ष भालचंद्र व्यास, सहसचिव रूपनारायण असोपा, अध्यापक कमल किशोर जोशी तसेच सुभाष मिश्रा आदींचे मार्गदर्शन लाभले

लखनौ (गौरव डेंगळे):SGFI ने ही पद्धत लागू केली कारण अनेक वेळा खेळाडूंना शाळा संपल्यानंतर किंवा इतर कारणांमुळे खेळात सातत्य ठेवता येत नाही,पण त्यांनी पूर्वी दिलेला परफॉर्मन्स महत्त्वाचा असतो.त्यामुळे मागील दोन वर्षांतील अधिकृत सहभागाचे सर्टिफिकेट खेळाडूच्या पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाते.

स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाने डिजीलॉकर इंटिग्रेशनसह डिजिटल परिवर्तन स्वीकारले आहे.लखनौ क्रीडा प्रशासनातील डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून,भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या निर्देशानुसार, भारतीय स्कूल गेम्स फेडरेशन (SGFI) ने त्यांची सर्व क्रीडा प्रमाणपत्रे डीजीलॉकर सह यशस्वीरित्या एकत्रित केली आहेत.यासह,संपूर्ण भारतातील तरुण खेळाडूंसाठी अखंड आणि सुरक्षित प्रवेश सुनिश्चित करून, डीजी लॉकर द्वारे प्रमाणपत्रांचे पूर्ण-प्रमाणात डिजिटल वितरण कार्यान्वित करणारी SGFI ही पहिली राष्ट्रीय महासंघ बनली आहे.

यावेळी डॉ. मनसुख मांडविया केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, यांनी SGFI च्या उपक्रमाचे कौतुक केले,ते म्हणाल की डिजिलॉकरद्वारे क्रीडा प्रमाणपत्रांचे डिजिटायझेशन हे क्रीडा प्रशासनातील एक क्रांतिकारी पाऊल आहे.यामुळे आमच्या युवा खेळाडूंना सक्षम बनवेल आणि प्रणाली अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होईल."

रक्षा खडसे,युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री, म्हणाल्या की या डिजिटल परिवर्तनाचा भारतातील लाखो तरुण खेळाडूंना फायदा होईल. आमच्या भावी चॅम्पियन्सना समर्थन देणारी आणि त्यांचे पालनपोषण करणारी एक मजबूत डिजिटल स्पोर्ट्स इकोसिस्टम तयार करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

तंत्रज्ञान हे आता केवळ सक्षम करणारे नाही, तर ते विकासाचा आधार आहे. आम्ही एक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली तयार करत आहोत जी प्रामाणिक आणि पारदर्शक आहे.मंत्रालयाद्वारे मान्यताप्राप्त सर्वात मोठ्या राष्ट्रीय क्रीडा महासंघांपैकी एक असलेल्या SGFL ने या डिजिटल परिवर्तनाची अंमलबजावणी करण्यासाठी एक अग्रगण्य पाऊल उचलले आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने,आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की भारतीय शालेय खेळ महासंघाने डिजीलॉकर प्रणालीवर आधीच अपलोड केले आहे.

68 व्या राष्ट्रीय शालेय खेळ (2024-25): 59,637 प्रमाणपत्रे 67 व्या राष्ट्रीय शालेय खेळ (2023-24): 60,385 प्रमाणपत्रे


हे डिजीलॉकर प्लॅटफॉर्मवर प्रकाशित 1,20,000 हून अधिक प्रमाणपत्रे (सहभाग आणि गुणवत्ता) एकत्रित उपलब्ध आहे.आम्हाला विश्वास आहे की दोन पूर्ण वर्षांचा डेटा कव्हर करणारी एवढ्या मोठ्या प्रमाणातील प्रमाणपत्रांचे योगदान देणारे आम्ही पहिले राष्ट्रीय क्रीडा महासंघ असणार आहे असे माहिती माननीय श्री दीपक कुमार (SGFI चे JAS अध्यक्ष) तसेच SGFI च्या सन्माननीय कार्यकारी समिती सदस्यांसह,हा उपक्रम प्रत्यक्षात अमलात आणण्याचा मोलाचा वाटा आहे.

68 व्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप (2024-2025) आणि 67 व्या राष्ट्रीय स्पर्धेतील (2023-24) सर्व प्रमाणपत्रे आता उपलब्ध आहेत.

गौरव डेंगळे/श्रीरामपूर:खेलो इंडिया युथ गेम्सच्या ७ व्या आवृत्तीत कबड्डीमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पढेगावकर वीरेंद्र मुंडलिकची निवड झाली आहे. ४ मे ते १५ मे २०२५ दरम्यान बिहारमध्ये या प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाईल.

पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर झालेल्या राज्य चाचण्यांमध्ये वीरेंद्रने अपवादात्मक कौशल्ये दाखवली,ज्यामुळे त्याला राज्य संघात स्थान मिळाले.त्याला राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक, NSNIS कोच महेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात आले आहे,ज्यांच्या मार्गदर्शनाने वीरेंद्रच्या निवडीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

वीरेंद्र हा यशवंत विद्यालय पढेगावचा विद्यार्थी आहे.

या तरुण खेळाडूचा संघात समावेश केल्याने त्याचे समर्पण आणि प्रतिभा अधोरेखित होते आणि तो आगामी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत जोरदार प्रभाव पाडेल अशी अपेक्षा आहे.राज्य संघात निवड झाल्याबद्दल श्रीरामपूर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष शिरोळे सर, काका चौधरी,नितीन बलराज, संभाजी ढेरे,अजित कदम तसेच तालुक्यातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर प्रतिनिधी श्रीरामपूर तालुक्यातील फत्याबाद येथील बाबासाहेब बाळाजी आठरे राहणार फत्याबाद  यांच्या घरी दिनांक 20 एप्रिल रोजी रात्री दरोड्याचा प्रयत्न झाला यावेळी त्यांची सून हर्षदा हीने आरडाओरडा केल्यामुळे चोरटे पळून गेले परंतु आपल्याला ओळखले असावे असा समज झाल्याने आज सायंकाळी हर्षदा तिच्यावर ऍसिड फेकण्याची घटना घडली असून  या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली आहे.                  याबाबत सविस्तर वृत्त असे की फत्याबाद येथील  बाबासाहेब आठरे हे दिनांक रविवार दिनांक 20 एप्रिल रोजी रात्री जेवण करून झोपले असता पहाटेच्या वेळेस तिन ईसम त्यांच्या घरात घुसले व त्यांनी सर्वांच्या तोंडावर स्प्रे मारला त्यावेळी त्यांची सुनबाई हर्षदा ही बाथरूमला गेलेली होती त्यादरम्यान चोरट्याने सर्व उचका पाचक केली काही दागिन्याचे गाठोडे बांधले व रोख रक्कम सोबत घेतली नेमकी त्याच वेळेस हर्षदा आठरे ही बाथरूम मधून बाहेर आली व घरात उचकापाचक करत असलेले पाहून जोरात आरडाओरड केली त्यावेळी शेजारीच असलेले आठरे यांचे पुतणे गणेश आठरे सुभाष आठरे चेतन आठरे हे धावत आले हे पाहून चोरट्याने सोन्याचे दागिने असलेले गाठोडे वरून खाली फेकले व दुसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्या व नागरिक येत असल्यामुळे ते आपला जीव वाचून पळाले परंतु त्यांना वाटले की या महिलेने आपल्याला ओळखलेले आहे त्यामुळे दोन दिवसापासून या महिलेच्या मार्गावर ते चोरटे होते कालही त्या महिलेला वीट फेकून मारली होती परंतु ती थोडक्यात बचावली आज बाबासाहेब आठरे यांची सून हर्षदा आठरे ही मुलीला घेऊन फत्याबाद येथे दवाखान्यात आली होती सोबत बाबासाहेब आठरे यांची पुतणी ही देखील होती दवाखान्यातून परत जात असताना दोन इसम मोटरसायकलवर आले व त्यांनी स्कुटीवर चाललेल्या या दोन महिलेच्या अंगावर ऍसिड फेकण्याचा प्रयत्न केला त्यात हर्षदा तिची पाठ भाजली व बाबासाहेबांचे पुतणीच्या छातीला भाजलेले आहे त्यांना तातडीने प्रवरणागर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले हा हल्ला केवळ आपल्याला ओळखले आहे या गैरसमजुतीतुन झालेला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे

बेलापूर/(प्रतिनिधी)--तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी पालकमंञी नामदार राधाकृष्ण विखे पा. व माजी खा.डाॕ.सुजय विखे पा.यांचे नेतृत्वाखालील  तसेच जि.परिषद सदस्य शरद नवले व बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखालील गावकरी मंडळाच्या मिनाताई अरविंद साळवी यांची बिनविरोध निवड झाली.                                                                           माजी सरपंच स्वाती अमोलिक यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडणुक अधिकारी व्हि.एस.गवारी (मंडलाधिकारी)यांचे अध्यक्षतेखाली,तलाठी व्हि.एच.खेमनर व ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे यांचे उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांची बैठक संपन्न झाली.सरपंच पदासाठी गावकरी मंडळाच्या मिनाताई साळवी यांचा एकमेव अर्ज आला.विरोधी सुधीर नवले,रविन्द्र खटोड व भरत साळुंके यांचे नेतृत्वाखालील  जनता विकास आघाडीने निवडणुकीतून माघार घेतली.बैठकीस गावकरी मंडळाच्या माजी सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंंच प्रियंका  कु-हे, सदस्य अभिषेक खंडागळे, मुश्ताक शेख,तबसुम बागवान,चंद्रकांत नवले,वैभव कु-हे,उज्वला कुताळ,सुशिलाबाई पवार उपस्थित होते.तर  जनता विकास आघाडीचे सदस्य या बैठकीस अनुपस्थित राहिले.त्यामुळे मिनाताई साळवी यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले.                                                                                  निवडीनंतर झालेल्या आभार सभेत जि.परिषद सदस्य शरद नवले म्हणाले की,गावकरी मंडळाने सरपंच पदाबाबत जो शब्द दिला आहे तो पाळला आहे.यापुढील काळात प्रवरा घाट विकास पर्यटन केन्द्र,गाव अंतर्गत रस्ते,सेंन्द्रिय खत प्रकल्प,बाराशे घरकुलांचे संकुल,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केन्द्र आदी प्रश्न मार्गी लावायचे आहेत.आजच्या बिनविरोध निवडीने विरोधकांचे मनसुबे उधळले गेले आहेत.गावकरी मंडळात फूट पडावी यासाठी देव पाण्यात बुडवून बसलेल्या विरोधकांना गावकरी मंडळाने ऐक्यातून चपराक दिल्याचे श्री.नवले म्हणाले.                                                           बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे म्हणाले की विरोधकांनी बेताल आरोप केले त्याला आम्ही कामातून उत्तर दिले.विरोधकांच्या वीस वर्षात झाली नाहित इतकी विकास कामे गावकरी मंडळाने चार वर्षात करुन दाखविली.१२६ कोटीची ऐतिहासिक पाणीपुरवठा योजना,भुयारी गटारे,साठवण तलाव,घरकुल,क्रिडा संकुल,सर्वधर्मिय स्मशानभुमी,सेंद्रिय खत प्रकल्पासाठी ४३ एकर मोफत जमिन आदि  ठळक कामे झालित. या वाटचालीत पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.माजी खा.डाॕ.सुजय विखे पा.,जि.परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.शालिनीताई विखे पा.यांचे बहुमुल्य सहकार्य लाभल्याबद्दल खंडागळे यांनी धन्यवाद व्यक्त केले.या प्रसंगी गावकरी मंडळाचे मार्गदर्शक, पदाधिकारी,नागरिक बंधू- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीरामपूर - येथील ह्जरत सैलानी बाबा दरबार यांचा ६६ व्या उर्स शरीफ निमित्त संदल मिरवणूक काढण्यात आली. 15 एप्रिल रोजी संपन्न झालेल्या या संदल निमित्त चादरीची मिरवणूक सैलानी बाबा दर्गाह पासून सायंकाळी निघाली. गिरमे चौक, शहीद भगतसिंग चौक, मेन रोड, महात्मा गांधी पुतळा, शिवाजी चौक, शिवाजी रोड मार्गे पुन्हा सैलानी बाबा दर्गा येथे येऊन फातेहा ख्वानी नंतर सुंदरची चादर बाबांच्या मजारीवर अर्पण करण्यात आली.
 १६ तारखेला सकाळी 11 ते पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला हजारो हिंदू मुस्लिम भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
याचवेळी यावर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते.

हजरत सैलानी बाबा बहुद्देशीय संस्था व नित्यसेवा ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर पार पडले. या शिबीराचे उद्घाटन आमदार हेमंत तात्या ओगले तसेच माजी उपनगराध्यक्ष करण दादा ससाणे यांच्या हस्ते करण्यात आले.या रक्तदान शिबिरात हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी कलीम बिनसाद व अबूबकर बिनसाद यांच्यापासून सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अस्लम दिनसाद यांचेसह सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी रक्तदान करून जनतेत सामाजिक कार्याचा एक अनोखा उपक्रम आपल्यापासूनच सुरू करायला हवा असा संदेश दिला. राज्यात अनेक ठिकाणी हिंदू मुस्लिम वाद पाहायला मिळत असतांना या ठिकाणी मात्र हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक हजरत सैलानी बाबा दरबार बहुउद्देशीय संस्था पदाधिकारी सदस्य यांच्या माध्यमातून सर्व धर्मीय लोकांनी रक्तदान करून 
हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून एकतेचा  संदेश दिला.यावेळी सर्व पदाधिकारी,सदस्य व येणाऱ्या भाविक भक्तांनी रक्तदान करून कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): येथील श्री कोरेश्वर गोसंवर्धनस स्पर्श  होलिस्टिक स्पाइन केयर  व  पंचगव्य सेंटर यांच्यावतीने श्री कोरेश्वर गोसंवर्धनचे प्रख्यात नाडी परीक्षण तज्ञ ओमकारदेव अशोकदेव मुळे गुरुजी हे आपल्या श्रीरामपूरच्या शाखेत बुधवार दिनांक १६ एप्रिल रोजी नाडी परीक्षण घेणार आहे.

नाडी परिक्षण करून रक्तदाब कैन्सर, स्त्रियांचे विकार, संधिवात, जुनाट आजार, सनायुचे आजार,लहान बालकांचे आजार,हृदय विकार,युरिन इफेक्शन,पित्त विकार, किडनी विकार,कफ विकार,दमा इत्यादी आजारांवर वर मार्गदर्शन व उपचार करणार आहे. आता पर्यंत हजारो रुग्णना नाडी परीक्षण करून पंच्यागव्य औषधेनि गुरूजीनि हजारो रुग्णना बरे केले आहे.

तरी जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री कोरेश्वर गोसंवर्धनस स्पर्श स्पाइन होलिस्टिक  स्पाइन केयर व पंचगव्य सेंटर यांच्यावतीने करण्यात येत आहे.

शिबिराच्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क साधा - 7003497003

बेलापूर (प्रतिनिधी)- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बेलापूर बु ग्रामपंचायतीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय फर्निचर कामाचा लोकार्पण सोहळा बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल नंदकिशोर लोखंडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. बेलापूर ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोगातून अंदाजे साडेचार लाख रुपये खर्च करून या वाचनालयाच्या फर्निचरचे काम करण्यात आले असून बेलापूर ग्रामपंचायतच्या या वाचनालयात जवळपास १९००० इतके ग्रंथ विविध पुस्तके उपलब्ध आहेत.ही पुस्तकांची मांडणी करण्या करता या आधीच्या काळात व्यवस्था नव्हती.ग्रामस्थांना विशेष करून तरुण पिढीला या वाचनालयाचा फार उपयोग होत आहे हे लक्षात घेऊन गावकरी मंडळाचे नेते शरद नवले व बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंच प्रियंका कुऱ्हे व सर्व सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे यांनी जुन्या व दुर्मिळ पुस्तकाचे जतन व्हावे हा दृष्टिकोन लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या फर्निचर चे नूतनीकरण केले. ग्रंथालयाचे कामकाज ग्रंथापाल सौ.उज्वला साळुंके हे पाहत आहेत.ग्रंथालय कामाचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, उपसभापती अभिषेक खंडागळे, सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंच प्रियंका कुऱ्हे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,तबसूम बागवान,ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे, प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे, भाऊसाहेब कुताळ,हाजी इस्माईल शेख,संजय भोंडगे,अँड. अरविंद साळवी,सुभाष अमोलिक,भास्कर बंगाळ,प्रभात कुऱ्हे,बाबुराव पवार,भास्कर खंडागळे,देविदास देसाई, विष्णुपंत डावरे, दिलीप दायमा, सुहास शेलार,बाबुलाल पठाण,भाऊसाहेब तेलोरे,जाकीर हसन शेख,सागर खरात,गणेश बंगाळ,सुधीर तेलोरे,प्रविण बाठीया,दादासाहेब कुताळ,नवनाथ धनवटे, विशाल आंबेकर,महेश कुऱ्हे,जीना शेख, शशिकांत तेलोरे,विशाल शेलार,बंटी शेलार, पोपट पवार, विनायक जगताप,अमित तेलोरे,दत्तू निकम आदी उपस्थित होते.

तेलंगणा (गौरव डेंगळे) ःपी जे आर स्टेडियम,तेलंगणा येथे झालेल्या पहिल्या 3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन कप स्पर्धेत कर्णधार श्रिया गोठोस्कर नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने यजमान संघाला  सरळ दोन सेटमध्ये हरवून सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर मुलांमध्ये महाराष्ट्र संघाला कांस्यपदक समाधान मानावे लागले.तेलंगणा येथे झालेल्या या स्पर्धेत देशभरातील आठ राज्य पात्र ठरले होते.अंतिम सामन्याच्या सुरुवातीला यजमान तेलंगाना संघाने सामन्यावर वर्चस्व गाजवत पहिल्या सेटमध्ये ४ गुणांची आघाडी घेतली.श्रिया गोठोस्कर,संजना गोठोस्कर, अरमान भावे यांनी आपला खेळ उंचावत महाराष्ट्र संघाला आघाडी मिळवून दिली.पहिला सेट मध्ये महाराष्ट्राने १९- १९ बरोबरी सादत पहिला सेट २१- १९ ने पटकावला. दुसऱ्या सेटमध्ये देखील महाराष्ट्राच्या मुलींनी सुरेख खेळण्याचा प्रदर्शन करत दुसरा सेट २१- १७ ने जिंकत पहिल्या फेडरेशन कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राची कर्णधार श्रिया गोठोस्कर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली.उमा सायगावकर,अरमान भावे,उपन्या कार्ले, संजना गोठोस्कर व अनुष्का बनकर यांनी देखील स्पर्धेमध्ये सुरेख खेळाचे प्रदर्शन केले.प्रशिक्षक नितीन बलराज यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या महाराष्ट्र मुलींचा संघाने स्पर्धेत एकही सेट गमावला नाही.सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्र मुलीच्या संघाचे गोदावरी बायोरिफायनरीचे (साखरवाडी)अध्यक्ष श्री सुहास गाडगे, प्राचार्य श्री के एल वाकचौरे,संत तेरेजा गर्ल्स हायस्कूल हरेगावच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती गजभिव,3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव श्री मारुती हजारे,3A साईड महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष श्री स्वामीराज कुलथे आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.



अंतिम निकाल:

मुली:

सुवर्णपदक: महाराष्ट्र

रोप्यपदक : तेलंगाना

कांस्यपदक: हरियाणा


मुले:

सुवर्णपदक: तेलंगणा 

रोप्यपदक : पंजाब 

कांस्यपदक: महाराष्ट्र



कोट: प्रत्येक खेळामध्ये मुला- मुलींनी चिकाटीने सराव केला तर निश्चितच आगामी काही वर्षांमध्ये भारत विश्व क्रीडा क्षेत्रामध्ये अव्वल असेल. तेलंगणामध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी मोठ्या गटात खेळताना सुरेख खेळ करत विजेतेपद पटकावले.युवा खेळाडूंनी खेळाकडे करिअर म्हणून बघितले पाहिजे.


( श्री गौरव डेंगळे श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव)

चदानगर,तेलंगणा (गौरव डेंगळे) : पीजेआर क्रीडा संकुल चंदानगर तेलंगणा येथे सुरू असलेल्या पहिल्या 3A साईड फेडरेशन कप स्पर्धेमध्ये साखळीतील तिसऱ्या सामन्यात कर्णधार श्रिया गोठोस्कर,उमा सायगावकर,अरमान भावे, उपन्या कार्ले, संजना गोठोस्कर व अनुष्का बनकर यांच्या सांघिक खेळाच्या जोरावर देवधमन संघावर २१- ०७ व २१-१४ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत साखळीतील  सर्वसामान्य जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.महाराष्ट्र महिला संघाचा उपांत्य फेरीचा सामना रंगला तो हरियाणा संघाबरोबर.पहिल्या सेटमध्ये कर्णधार श्रीया, उमा व आरमान यांनी लयबद्ध खेळ करत हरियाणा संघावर पहिल्या सर्विस पासून वर्चस्व प्रस्थापित केले.श्रिया व उमाने उत्कृष्ट अशी अटॅकिंग करत पहिला सेट २१-१२ ने पटकावला.अरमान कडून सुरेख सेटिंग बघायला मिळाली.दुसऱ्या सेट मध्ये देखील संजना व उपन्या यांनी सुरेख सर्विस व अटॅकिंग करत सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. महाराष्ट्राच्या आक्रमक खेळापुढे हरियाणा संघ हतबल झाला व उपांत्य फेरीचा सामना महाराष्ट्राने २१ - १२ व २१ - १२ फरकाने जिंकत अंतिम फेरी प्रवेश केला. महाराष्ट्र मुलींचा अंतिम सामना रंगेल तो यजमान तेलंगाना संघाबरोबर आज सायंकाळी ६:०० वाजता.अंतिम सामन्यात कर्णधार श्रिया गोठोस्कर कडून आक्रमक खेळाची अपेक्षा असून महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देण्यासाठी तिच्यावर भिस्त असणार आहे.




कोट: महाराष्ट्र मुलींचा संघ लयबद्ध खेळ करत असून स्पर्धेतील सर्व ४ सामने जिंकून संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.आम्हाला आशा आहे की अंतिम सामना जिंकून फेडरेशन  कप जिंकू.

( श्री नितीन बलराज,महाराष्ट्र महिला संघ प्रशिक्षक)

चंदानगर,तेलंगणा (गौरव डेंगळे) : पीजेआर क्रीडा संकुल चंदानगर तेलंगणा येथे आजपासून सुरू झालेल्या पहिल्या 3A साईड फेडरेशन कप स्पर्धेमध्ये पहिल्याच सामन्यात कर्णधार श्रिया गोठोस्करच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर महाराष्ट्राचा छत्तीसगडवर २१- ०७ व २१-१९  अशा सरळ सेटमध्ये पराभव करत साखळीतील पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला.

पहिल्या सेटमध्ये कर्णधार श्रीया, उमा व आरमान यांनी लयबद्ध खेळ करत छत्तीसगड संघावर पहिल्या सर्विस पासून वर्चस्व प्रस्थापित केले.श्रिया व उमाने उत्कृष्ट अशी अटॅकिंग करत पहिला सेट २१-०७ ने पटकावला.अरमान कडून सुरेखाची सेटिंग बघायला मिळाली.दुसऱ्या सेटमध्ये चंदीगड संघाकडून अप्रतिम खेळ बघायला मिळाला.१५ गुणांपर्यंत सामना बरोबरीत सुरू होता. त्यानंतर छत्तीसगड संघाने सलग ४ गुण घेऊन ४ गुणांची आघाडी घेतली.१५- १९ ने पिछाडीवर असताना महाराष्ट्राने आपला खेळ उंचावत १९-१९ अशी बरोबरी साधली.कर्णधार श्रिया ने शेवटचे २ गुण मिळवत सामना २१-१९ गुणांनी जिंकला. साखळीतील दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने मध्य प्रदेश संघावर २१-१३ व २३-२१ ने मात करून उपांत्य फेरी प्रवेश केला.साखळीतील शेवटच्या सामन्यात महाराष्ट्राची गाठ पडेल ती दिव दमन या संघाबरोबर.

बेलापूरःमहिलांमध्ये उपजत गुणवत्ता व कौशल्य असते.ते विकसित होण्यासाठी सामाजिक प्रेरणेची गरज आहे.महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन पातळीवरुन विविध योजनांव्दारे प्रयत्न केले जातात.महिलांनी या योजनांचा लाभ घेवून आत्मनिर्भर बनावे.महिला बचत गटाच्या महिलांनी विविध उद्योग व व्यवसाय सुरु करावेत त्यासाठी महिलांना जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाईल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी आध्यक्ष सौ.शालिनीताई पा.विखे यांनी केले.                                   

बेलापूर बुll ग्रामपंचायत आयोजित नविन घरकुल वसाहतीचे राधाकृष्णनगर व सुजयनगर नामकरण,महिला बचत गटांना फुड प्रोसेसिंग युनिट,दिव्यांगांना बॕटरी सायकल तसेच जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना टॕबचे वाटप कार्यक्रमप्रसंगी सौ.विखे पा. बोलत होत्या.अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले होते.                                                                     सौ.विखे म्हणाल्या की,विखे परिवार हा राजकारणी नसून समाजकारणी आहे.मिळालेल्या पदाचा वापर सर्वसामान्यांच्या हितासाठी केला पाहिजे.बेलापूर ग्रामपंचायत नेहमीच महिलांच्या विकासाला प्राधान्य व प्रेरणा देते हे कौतुकास्पद आहे.नाम.राधाकृष्ण विखे यांना मंञी म्हणून जेवढी  खाती मिळाली त्या माध्यमातून त्यांनी जनतेचे प्रश्न सोडविले.महिला बचत गटांना विविध साहित्य वितरित केले जात आहे.त्याचा वापर व्यवसायासाठी करावा.यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण व सहकार्य केले जाईल असे आश्वासन सौ.विखे यांनी दिले.                                                                                     अध्यक्षपदावरुन बोलताना शरद नवले म्हणाले की,नाम.राधाकृष्ण विखे  यांचेसह विखे परिवाराचे बेलापूरच्या विकासात मोठे योगदान आहे.तालुक्यात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे ती विखे परिवाराने भरुन काढावी.नजिकच्या काळातील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत शतप्रतिशत भाजपचे नाम.विखे पा.यांचे स्वप्न पूर्ण करु.नाम.विखे यांनी खंडकरी व आकारी पड शेतक-यांचा प्रश्न मार्गी लावला.वर्ग २च्या जमिनी विनामोबदला वर् १ केल्या.तालुक्यातील १४ गावांना गावठाण,घरकुले यासाठी मोफात जमिनी दिल्या.माजी महसूलमंञी श्री.थोरात यांनी एक गुंठाही जागा दिली नाही.त्यासाठी नाम.विखेंसारखी दानत लागते.भविष्यात नदी संवर्धन योजनेतून घाट विकास,जाॕगिंग ट्रॕक,जलतरण सुविधा विकसित करायची आहे.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे  स्मारक निर्माण करायचे आहे.त्यासाठी निधी उपलब्ध करणेबाबत पालकमंञी नाम.श्री.विखे पा. व सौ.शालिनीताई विखे पा.यांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.                                           बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे म्हणाले की,नाम.राधाकृष्ण विखे पा.यांचे नेतृत्वाखाली गावकरी मंडळाची सत्ता आल्यावर गावाच्या विकासाला गती मिळाली.गावासाठी १२६कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली.साठावण तलाव व १२०० घरकुलांची वसाहत,हिंदू,मुस्लिम,आदिवासी स्मशानभुमी,घनकचरा प्रक्रिया प्रकल्प व क्रिडा संकुलासाठी नाम.विखे पा.यांनी बाजारभावाप्रमाणे सुमारे ९० कोटी मुल्याची ४३ एकर शेती महामंडळाची जमिन ग्रामपंचायतला मोफत दिली.आज जनसेवा फौंडेशनच्या वतीने ३९ महिला बचत गटांना ५० लाख रु.किमतीचे फुड प्रोसेसिंग युनीटस्,दिव्यांगांना बॕटरी सायकलस्,शालेय मुलांना टॕब आदि साहित्याचे वाटप केले जात आहे.यापुढील काळात नाम.श्री.विखे पा.यांचे नेतृत्वाखाली गावाची विकासकामे मार्गी लावू असे श्री.खंडागळे म्हणाले.                                     कार्यक्रमाचे प्रास्तविक सरपंच स्वाती अमोलिक यांनी केले.तर प्रफुल्ल डावरे यांनी मनोगत व्यक्त केले.ग्रामविकास अधिकारी श्री.निलेश लहारे यांनी आभार मानले तर डाॕ.आदिनाथ जोशी यांनी सूञसंचलन केले.यावेळी  उपसरपंच प्रियंका कुऱ्हे, बाळासाहेब तोरणे,भाऊसाहेब बांद्रे, बाबासाहेब शेटे,किशोर बनकर,महेश खरात,मुकुंद लबडे, विराज भोसले,प्रवीण लिप्टे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,चंद्रकांत नवले,तबसुम बागवान, मीना साळवी,सुशीलाबाई पवार,उज्वला कुताळ, वैभव कुऱ्हे,मानवी खंडागळे,प्रतिभा नवले, रणजीत श्रीगोड , पुरुषोत्तम भराटे, जालिंदर कुऱ्हे, कनजीशेठ टाक,  भाऊसाहेब कुताळ, हाजी इस्माईल शेख, सुभाष अमोलिक,सुधाकर खंडागळे, विष्णुपंत डावरे,वृद्धेश्वर कुऱ्हे,सागर खरात, अशोक गवते,अशोक प्रधान,प्रभात कुऱ्हे, अॕड. अरविंद साळवी, बाबुराव पवार,भाऊसाहेब तेलोरे,विशाल आंबेकर,महेश कुऱ्हे,सचिन वाघ,किशोर महापुरे, अभिषेक नवले,गोपी दाणी,भैया शेख,रावसाहेब अमोलिक,प्रवीण बाठिया,मोहसिन सय्यद, वैभव खंडागळे,प्रशांत मुंडलिक, जिना शेख, गफ्फुर शेख, दादासाहेब कुताळ,सुधीर तेलोरे,बंटी शेलार,बबन मेहेत्रे,संजय भोंडगे,बाबूलाल पठाण,सचिन देवरे, अल्ताफ शेख, शहानवाज सय्यद,रवींद्र कुताळ, दस्तगीर शेख, उल्हास कुताळ,राहुल माळवदे, अन्वर सय्यद,समीर सय्यद,राम सोनवणे,शाम सोनवणे, सचिन मेहेत्रे,श्रीकांत अमोलिक, गणेश बंगाळ, राजेंद्र कुताळ, राज गुडे, गोरख कुताळ,सचिन अमोलिक,शाहरुख शेख,जाकीर हसन शेख, दिपक गायकवाड, राजेंद्र काळे, सद्दाम आतार,रफिक शहा, अनिल कुऱ्हे,युनुस शेख यांचे सह कार्यक्रमास महिला व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बेलापूर ग्रामपंचायत कमर्चारी यांनी विशेष प्रयत्न केले.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): 3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन कप साठी महाराष्ट्र संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली होती. दिनांक ११ एप्रिल ते १३ एप्रिल दरम्यान हैदराबाद,तेलंगणा येथे होत असलेल्या फेडरेशन कप स्पर्धेसाठी कोपरगाव येथील श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी कुमारी अनुष्का बनकर हिची महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली आहे तसेच संघाच्या प्रशिक्षकपदी श्रीरामपूरचे नितीन बलराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुरुष संघाचा कर्णधार म्हणून विनित शेट्टी व महिला संघाची कर्णधार म्हणून श्रीया गोठोस्कर यांची निवड करण्यात आली आहे.फेडरेशन कप स्पर्धेसाठी तेलंगणा,महाराष्ट्र,दिव दमन,गुजरात,छत्तीसगड हरियाणा,पंजाब व मध्य प्रदेश या आठ  राज्यांचे संघ सहभागी होणार असल्याची माहिती 3A साईड व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व्ही एस ए राजू व सचिव श्री मारुती हजारे यांनी दिली.स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी म्हणून क्रीडा प्रशिक्षक श्री गौरव डेंगळे काम बघतील. निवड झालेल्या संघाचे गोदावरी बायोरिफायनरीचे (साखरवाडी)अध्यक्ष श्री सुहास गाडगे, प्राचार्य श्री के एल वाकचौरे,उपप्राचार्या शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे,नेथलीन फर्नांडिस,क्रीडा विभाग प्रमुख डॉ धनंजय देवकर तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या..


निवड झालेल्या संघ पुढीलप्रमाणे!

महाराष्ट्र पुरुष संघ : विनित शेट्टी (कर्णधार),मोहम्मद सय्यद,सागर पूजारी,प्रीथमा,रंजित पुजारी,प्रीतम व विशाल यादव 

प्रशिक्षक : योगेश तडवी


महिला महाराष्ट्र संघ:श्रीया गोठोस्कर (कर्णधार),संजना गोठोस्कर,उमा सायगावकर,उपतज्ञ कार्ले,अरमान भावे व अनुष्का बनकर.

मुख्य प्रशिक्षक : नितीन बलराज 

संघ व्यवस्थापक: गीतांजली भावे

श्रीरामपूर :(प्रतिनिधी)-  सितारों की दुनिया या श्रीरामपूरातील नावाजलेल्या कराओके ग्रुप तर्फे २ एप्रिल रोजी आगाशे हॉल, टिळक वाचनालय येथे 'जल्लोष' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीरामपूरातील होतकरु कलाकार, गाण्याची आवड असून सवड न मिळणाऱ्या महिला गायकांना व्यासपीठ उपल्ब्ध करून देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे ग्रुप चे संस्थापक सदस्य  श्रीगित हिरे यांनी सांगितले.


संगीत म्हणजे जीवन, संगीत हे मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. संगीत आपल्याला आनंद आणि समाधान देते, आपल्या भावना व्यक्त करण्याचा मार्ग म्हणजे संगीत, आणि या कारणानेच महिलांसाठी जल्लोष- या आणि गा या अनोख्या शो चे प्रथमच श्रीरामपूरात आयोजन केल्याचे मत संस्थापक सदस्य कैलास सोमाणी यांनी कार्यक्रमाची रुपरेषा मांडताना व्यक्त केले.


कार्यक्रमाचे उद्‌घाटन डॉ .सौ. रिमा गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद व भरभरून उत्साह  दिसल्याचे मत ग्रुप चे संस्थापक सदस्य श्री. दिपकजी बोरसे यांनी मांडले.

         साडेतीन वर्षाच्या भूमी शिंपी,  पाच वर्षाची गार्गी चौधरी,  नवोदित तसेच नावाजलेल्या महिला कलाकारांनी अतिशय उत्तम सादरीकरण केल्याचे ग्रुपचे संस्थापक सदस्य श्री. सुरजी ईसर यांनी सांगितले.

 कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व सुत्रसंचालन ग्रुपचे संस्थापक सदस्य डॉ. दिलीप शेजवळ आणि सौ पुजा मुंदडा यांनी उत्तमरित्या सांभाळले.

            कार्यक्रम यशस्वीतेसाठी  सोमनाथ साळुंके,रवि बोर्डे, अशोक शिंदे, भिमगिरी कांबळे,  भाऊसाहेब दळवी, फत्तुभाई, अशोकजी गायकवाड, सौ. त्रिवेणी साळुंके, वढणे मॅडम, सौ. राखी लोढा यांनी अथक परिश्रम घेतले.


सामाजिक हेतूने सांस्कृतिक वारसा जपत श्रीरामपूरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याच्या उद्दे‌शाने 'सितारों की दुनिया' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे मत कराओके ग्रुपचे कैलास सोमाणी यांनी व्यक्त केले.

बेलापूर (प्रतिनिधी )- बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे कडक उन्हापासून संरक्षण व्हावे या करिता बेलापूर बु ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने नगर बायपास रोडला मंडप (शेड )टाकून निवाऱ्याची सोय केल्याबद्दल बेलापूर ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपच्या सर्व सदस्यांना प्रवाशांनी मनापासून धन्यवाद दिले आहे.                .  बेलापूर बायपासला ओढ्यावर फुलाचे काम चालू आहे. हे काम गेल्या दीड दोन महिन्यापासून सुरू आहे त्यामुळे श्रीरामपूर हुन नगर कडे जाणाऱ्या व नगरहून श्रीरामपूर कडे येणाऱ्या बसेस या बेलापूर बस स्टॅन्डवर न येता बाहेरुन जातात.  बसने प्रवास करणारे सर्व प्रवासी हे बायपासलाच जाऊन थांबतात. ज्या ठिकाणी प्रवासी उभे राहतात तिथे कुठलीही सावली नव्हती. प्रवाशांना बसची वाट पाहत उन्हातच उभे रहावे लागत होते ही बाब जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व सत्यमेव जयते ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य देविदास देसाई यांच्या लक्षात आली व सामाजिक दायित्व म्हणून या ठिकाणी तात्पुरते शेड किंवा मंडप उभा करून देण्याची अत्यंत आवश्यकता असल्याची बाब  ग्रामपंचायत पदाधिकारी व सत्यमेव जयते ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या लक्षात आणून दिली. ग्रुपचे सदस्य व बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी तातडीने या ठिकाणी प्रवासांच्या सोयीकरिता शेडचा मंडप टाकून दिला .त्यामुळे आता प्रवाशांना बसची वाट पाहत सावलीत थाबंता येते.ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने बायपासला तात्पुरता बस स्टॅन्ड  निवारा म्हणून शेड उभे करण्यात आले आणि त्या शेडचा लाभ खरोखर आता अनेक प्रवासी घेत आहेत.ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने उभारलेल्या या तात्पुरत्या बस थांबा निवाऱ्यामुळे प्रवाशांना उन्हापासून थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे.

बेलापूर ( प्रतिनिधी )-आज समाजाचे आरोग्यच धोक्यात आलेले आहे ते दुरुस्त करायचे असेल तर आपल्या सर्वांनाच पुढाकार घ्यावा लागेल .वैद्यकीय व्यवसाय हा सेवाभाव म्हणून केला तर त्यातून मिळणारे समाधान हे फार मोठे असल्याचे मत माजी जि प सदस्य शरद नवले यांनी व्यक्त केले.           बेलापुरातील ऋषभ शांतीलाल हिरण व प्रणव रमेश राव पवार यांनी एमबीबीएस ही पदवी मिळवली तसेच कुमारी प्राची सतीश चायल हिने बीडीएस ही पदवी मिळवीली त्याबद्दल गावकरी मंडळ व बेलापूर ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांच्या सत्कारचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी शरद नवले बोलत होते यावेळी बोलताना बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे म्हणाले की पूर्वी बेलापूर गाव हे सीएंच गाव म्हणून ओळखलं जात होतं आता हिरण,पवार, चायल यांनी मिळविलेल्या यशामुळे आता हे गाव वैद्यकीय पंढरी म्हणून ओळखले जाणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करताना आपण सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून काम केले तर भविष्यात आपल्याला कुठलीच अडचण येणार नाही. यावेळी जनसेवा पतसंस्थेचे संस्थापक सुवालालजी लुक्कड, पत्रकार देविदास देसाई, वृषभ हिरण, प्रणव पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शांतीलाल हिरण प्रशांत शेठ लड्डा,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,बाळासाहेब वाबळे, बाबूलाल पठाण, प्रकाश कटारिया, रावसाहेब गाढे, भाऊसाहेब तेलोरे, बाबुराव पवार, बंटी शेलार, शफिक आतार, सोमनाथ जावरे, प्रवीण शेठ बाठीया आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते

श्रीरामपूर/( प्रतिनिधी)-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने प्रथम वर्ग   न्यायदंडाधिकार या पदाकरता घेण्यात आलेल्या परीक्षेत श्रीरामपूर बार असोसिएशनच्या ॲडव्होकेट कोमल फकीरचंद चौधरी याचीं न्यायाधीश पदी नियुक्ती झाली आहे.                              महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने सन 2024-25 या कालावधीमध्ये प्रथम वर्ग  न्याय दंडाधिकारी या पदाकरीता परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेत एडवोकेट कोमल चौधरी यांनी घवघवीत यश मिळविले असून पहिल्याच प्रयत्नात तिने प्रथम दंड न्याय अधिकारी या पदाला गवसणी घातले आहे .      अतिशय हलकीच्या परिस्थिती मधून शिक्षण घेऊन तसेच कुठलेही क्लास न लावता स्वतः घरच्या घरी अभ्यास करून हे यश संपादन केले आहे . खानापूर सारख्या ग्रामीण भागातून अभ्यास करून तिने हे यश मिळवले आहे .अर्बन बँक शाखा बेलापूरचे माजी मॅनेजर फकीरचंद गणपतराव चौधरी व पद्मा चौधरी यांची ती कन्या असून ॲडव्होकेट दिलीप औताडे यांची भाची आहे तिने मिळविलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget