June 2023

दिनांक 28 जून 2023 रोजी भीम आर्मी चीफ तथा आजाद समाज पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष संविधान रक्षक,संघर्षयोद्धा अँड.भाई चंद्रशेखर आजाद हे कार्यक्रम आटोपून घरी जात असताना देवबंद सहारणपूर उत्तर प्रदेश या ठिकाणी सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांकडून चार राउंड फायरिंग करण्यात आली.या घटनेमध्ये भाई चंद्रशेखर आजाद कमरेला गोळी घासून गेली.ते जखमी असल्यामुळे तेथील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते. आता त्यांची तब्येत आता ठीक आहे.दरम्यान देशभर ठिकठिकाणी या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे.अहमदनगर जिल्ह्यात संचारबंदी असल्यामुळे, प्रशासनाच्या अटी आणि शर्टीं सह मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलनास परवानगी मिळाली. म्हणून आज भीम आर्मी भारत एकता मिशन चे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख संघटक दीपकजी भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली व आजाद समाज पार्टी युवा मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पँथर ऋषी पोळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास "एक पेन,एक वही ची मानवानंदन देऊन " निषेध आंदोलन करण्यात आले.या वेळी जोरदार घोषणाबाजी करत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,जिल्हा अहमदनगर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेश प्रमुख संघटक दीपकजी भालेराव, आजाद समाज पार्टी युवा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पँथर ऋषी पोळ,जिल्हा सचिव साजिद भाई शेख,जिल्हा कार्याध्यक्ष तथा राहाता तालुकाध्यक्ष शब्बीर भाई कुरेशी,कविताताई पोळ, यशवंत पोळ,ममदापुर अध्यक्ष साजिद सय्यद,प्रवक्ते प्रतिनिधी गौरव भालेराव,जिल्हा सोशल मीडिया प्रमुख प्रेम शेलार,भीम आर्मी च्या मुन्नाताई चावरे, अनिताताई म्हस्के,सुनीता म्हस्के,शिवाजी मुसमाडे,आकाश गायकवाड,समाधान पगारे,सनी वाघमारे व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर गावचे ग्रामदैवत भगवान श्री हरिहर केशव गोविंद यांच्या मंदिर रंग कामासाठी बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने ५१ हजार रुपयांचा धनादेश सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुंक्कड यांच्याकडे सुपुर्त करण्यात आला .                         गावातील सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुक्कड यांनी गावात अनेक सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविले त्यात स्मशानभुमी तसेच दशक्रिया विधी घाट सुशोभिकरण यांचा समावेश आहे तसेच गावातील पुरातन  महादेव मंदिराचाही जिर्णोद्धार त्यांनी केला आता केशव गोविंद भगवान मंदिराचीही देखभाल सुरु केलेली आहे त्यांच्या या योगदानात आपलाही खारीचा वाटा हवा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवुन  संचालक मंडळाच्या बैठकीत श्री केशव गोविंद भगवान मंदिराच्या रंगकामाकरीता ५१ हजार रुपये देण्याची सुचना बाजार समीतीचे सभापती व बेलापुर सोसायटीचे चेअरमन सुधीर नवले यांनी मांडली त्यास सर्व संचालकांनी मान्यता दिली त्यानुसार सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुक्कड यांच्याकडे रुपये ५१ हजारचा धनादेश सुपूर्त करण्यात आला या वेळी बाजारा समीतीचे सभापती व बेलापुर सोसायटीचे चेअरमन सुधीर नवले व्हा चेअरमन पंडीतराव बोंबले संचालाक शेषराव पवार ,शिवाजी पाटील वाबळे राजेंद्र सातभाई ,नंदकिशोर नवले ,कनजी टाक ,ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक ,पत्रकार देविदास देसाई, कलेश सातभाई ,बंटी शेलार ,गोरक्षनाथ कुऱ्हे , संजय रासकर ,संजय शेलार सचिव विजय खंडागळे मँनेजर दायमा आदि उपस्थित होते.

प्रेषीत हज. इब्राहिम अलै.ना अल्लाह ने स्वप्नात  आज्ञा झाली तुझा सर्वात जास्त प्रिय असेल ते कुरबान कर. हज.इब्राहिमांच्यां   डोळ्यांसमोर विज कपकपावीगत झालं. हज. इस्माईल अलै.डोळ्यासमोर दिसत होते.  उतारवयात, म्हातारपणी ( ८०) आंनशीव्या वर्षात जन्म झालेला एकुलता  हज. ईस्माईल अलै. मुलगा , अल्लाहाला कित्येकदा दुआ मागुण झालेल्या मुलाला अल्लाहा त्याची कुरबानी  मागतात .आपल्या अंगावर काटा शहारै आणणारी गोष्टं. अल्लाहा आग्नि परीक्षाच घेऊ पाहत राहिले.क्षणाचाही विचार न येता प्रेषित इब्राहिम अलै.नीं हा संदेश  पत्नी हज.सारा अलै. व कोवळ्या मुलाला इस्माईल अलै .नां अल्लाहा (ईश्रवर)ची ईच्छा सांगतात .लागलिचच   आज्ञाधारक मुलगा हज.इस्माईल अलै. वडिलांच्या आज्ञेला  यत्किंचितही विचार न करता अल्लाहा(ईश्रवरा)चीच ईच्छाच असेल तर , तात्काळ होकार देतात. 

तारीख जिलहिजजा(अरबी) १०दहा असते . मिना(मकका  च्या ७ किलोमीटर दक्षिण- पुर्वेला ) नावाने प्रसिद्ध असलेल्या डोंगर व ओसाड भयंकर वाळवंट  मैदानात, पवित्र हाज करण्यासाठी जाणारे हाजी आपला अधिक काळ जिल-हिजजा चे ८.१०.११.१२.तारीखेचे चार दिवस याच ठिकाणी व्यतीत करतात.,( आज लाखोंच्या संख्येने वातानुकुलित टेंट ची गिनीज बुक्स मधे नोंद आढळते)वयोवृद्ध वडील उतारवयातील काठी ज्याला म्हणतात अशा आपल्या काळजाच्या तुकड्यांला घेवून कुरबानी साठी सजवून तयार करून नेतात. मन, डोकं स्तब्ध, सुन्न करणारी वेळ..काळीज लट-लट  करणारी घटना.हा विचार करून. म्हतारी आई-बाबांची कसोटी पहाणारा प्रसंग. तरीसुद्दा

अल्लाहाच्या परीक्षा साठी

प्रेषित इब्राहिम पुत्र प्रेमापोटी डोळ्याला पट्टी बांधून कुरबानी साठी  मुलांवर धारदार शस्त्र चालवतात तर त्या क्षणार्धात अल्लाहानेच  डोळ्यांची पापणीलवण्या आधीच चमत्कारिक घटना घडवून तेथे विशेष ईशदुत जिब्राईल अलै.द्वारे  दुमंबा (,मेंढा) पाठवून दुमंब्याची कुरबानी (बळी)दिली. प्रेषित इब्राहिमांना वाटले की मी अल्लाहाच्या ईच्छेखातर आपल्या सर्वांत प्रिय अशा पुत्राला कुर्बान केले.परंतु डोळ्याचीपट्टी काढून बघतात तर आश्चर्यचकीत होतात,?? हे काय आश्चर्य??? हे सर्व लिला बघून प्रेषित इब्राहिम  अल्लाहची कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतात .

अल्लाहाने प्रेषित इब्राहिम अलै.व हज. इस्माईल अलै यांची सत्व परीक्षा बघून .. समस्त मानवजातीसाठी धडाच  दिला.

परमेश्वर, ईश्वर, अल्लाहला कोणत्याही प्रकारची नरबळी ची अपेक्षित नव्हते च मुळात.. ज्या ठिकाणी " अल्लाह मानवाला सत्तर आई पेक्षा ही जास्त पट अधिक प्रेम, करुणा, ममता करतात " त्या ठिकाणी थोडे ते मुलाचा बळी घेऊ शकतील.. थोडे विचार करण्या सारखी गोष्ट आहे.

  तदनंतर हाजारोंवर्षांपासून  त्याचे प्रतिक म्हणुन जगात अनुयायीं  ऐपतीप्रमाणे कुरबानी करतात.

    धनिक वर्ग ज्यांची पवित्र- हज यात्रा करण्यासाठी ऐपत असणाऱ्या व्यक्ती पवित्र- मक्का येथे हाजला जाउन, हाजची एक महत्त्वाचे कार्य (फर्ज)कुर्बानी करण्यात येते. 

  ऊर्द महिन्याचा शेवटीचा १२वा महिना "जिल-हिजजा " ला हाजी. लोकं  ता. ८ जिलहिजला मक्का च्या काबागृहामध्ये अंगावर पांढराशुभ्र- कपडा लपेटून पुरुष अडीच- तीन मीटर लांब कपडाअंगास गुंडाळून व स्त्रिया पांढराशुभ्र ड्रेस, कपडा परिधान करतात त्यांस "ऐहराम " संबोधतात. 

      असे ऐहराम पांघरूण लाखोंच्या संख्येने हाजी लोकं मक्का येथील पवित्र  पवित्र खान -ए -काबा च्या प्रदक्षिणा करतात त्या दरम्यान व हाजमय वातावरणांत चालता- चालता

 "  आल्लाहा मी हजर आहे  ", "आल्लाहा मी हजर आहे ", "आल्लाहा  मी हजर आहे  "...आशा मंजुळ स्वरांचा गजर निनाद  दुमदुमत रात्रंदिवस  मक्केच्या हाजमय वातावरणात  व तेथुनच मीना नावाच्या दक्षिण-पुर्वेस सात किलोमीटर अंतरावर असलेल्या"  आराफात  " च्या पवित्र ऐतिहासिक मैदानात पोहोचतात .९ नऊ जिलहिज हे  हाज  चा प्रमुख मुख्य दिवस असतो .आपल्या पापांची क्षमा ,करुणा ,मागतात ,मुला-बाळांसंबंधी, जवळीलनातेवाईकासंबंधी, आपल्या देशासंबंधी त्या पवित्र ठिकाणी दुआ, याचना करतात . 

जगात एकमेव पवित्र स्थळ असेल की जगाच्या पाठीवर एकही देश असा नसेल की  त्या ठिकाणचा माणुष्य नसेल.  जगातील ३५६४ बोलीभाषा  बोलल्या जातात , जगाच्या  कित्येक ठिकाणाहून आलेले हाजी  एकाच आराफात च्या पवित्र मैदानामध्ये एकत्र जमून  कोणीही उच्च निच नाही,कोणी काळा -गोरा नाही ,सर्व लेकरे आल्लाहाची  सारखीच  ५०-६० लाखोंच्या संख्येने लोक एकाच रांगेत- छताखाली बसून अल्लाहच्या आदेशाचे पालन करतात, एकाच अरबी भाषेच्या दिव्य कुरआन मजीदने सांगितलेल्या आदेशाचे पालन करतात. रडून- व्याकुळ होऊन,ऊर बडवून अल्लाहा जवळ स्वत: केलेल्या कळत-नकळत पापांची माफी मागतात . पाप मुक्तीची प्रार्थना करतात. 

        याच पवित्र "आराफात " मैदानावर  दिनांक 3 मार्च  ६३२ या दिवशी अल्लाहचे प्रेषित मुहम्मद सल्ल.नी मक्का विजयानंतर ," जीवनाच्या अंतिम हाज "-यात्रेला लाखोंच्या अनुयायी ,लाखों लोकां समोर -" जगातील संपूर्ण सृष्टी व मानवी कल्याणासाठीच "  जगप्रसिध्द ऐतिहासिक अशी नोंद आहे असे  " अतिंम प्रबोधन, प्रवचन, भाषण, खुतबा " - दिले  होते. असो. 

येथुनच हाज यात्रेकरू जे प्रेषित इब्राहिम अलै.यांना कुरबानी पासून वारंवार मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्याऱ्या अशा तीनही सैतानाच्या प्रतिकृतीला दगडी, कंकरी फेकून मारतात. 

 परतीत पवित्र खाना -ए- काबाला परिक्रमा करुन कुर्बानी विधी ,डोक्यावरील केसांची टक्कल करुन हज चा विधीपूर्ण करण्यासाठी जातात. 

  फक्त कुरबानी करण्याचा उददे्शच  प्रत्येक धर्माच्या दारिद्र्य रेषेखालील वंचित ,गरीबांच्या घरापर्यंत मदत पोहचवली जाईल येवढी काळजी घेण्याचे . ईदच्या निमित्ताने का होईना त्यांची मुलं खातिल व ईदचा आनंद घेतील. सर्व समाजातील गोरगरीब जनतेला ईद व सण हे उत्सव असतात..

खरोखरच हेच अंतिम सत्य असतं..

यंदाच्या वर्षी पंढरपूरची आषाढी एकादशी व ईदुल अजहा हा योगायोग जुळून अल्लाह परमेश्वर ईश्वराने एकत्र आणून समभाव एकतेचा प्रतिक होउन सर्व जगाला प्रेम अर्पावे....

ईद साजरी करण्याचा उद्देश हाच असतो सर्व जग निरोगी व  शांत राहणं ..... सर्व धर्मांच्या लोकांना समजून घ्यावे...हिच माणुसकीचा धर्म....




शब्दांकन:- डॉ सलीम सिकंदर शेख

बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर

९२७१६४०००१४...

🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापूर ग्रामपंचायत सत्तांतर नाट्याबाबत स्वाती आमोलिक यांनी केलेले आरोप अत्यंत चुकीचे व बालिशपणाचे असल्याचा खुलासा ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांनी केला आहे                                       बेलापूर ग्रामपंचायत मधील मागील आठवड्यात सरपंच महेंद्र साळवी यांनी गावकरी  मंडळातून काँग्रेस   जनता विकास आघाडीत जो प्रवेश केला होता त्याबाबत चर्चा होत आहे त्यामुळे हा खुलासा देणे गरजेचे आहे मी स्वतः गावकरी मंडळातून निवडून आलो होतो . ठरल्याप्रमाणे पंधरा,पंधरा,महिने प्रत्येकी 4 सरपंच देण्याचे ठरले होते  पण दोन वर्ष होऊनही काहीच हालचाली झाल्या नाही सर्व गावकरी नेत्यांना भेटुनही उत्तर मिळायचे जिल्हा परिषद निवडणूक झाल्यावर सरपंच बदल करू असे मला सांगण्यात आले होते राजकीय पोळी भाजण्यासाठी जि प. निवडणूक व ठेकेदारी करण्यासाठी कोणी राजीनामा घेतला नाही हे सर्वांना माहिती आहे म्हणून मी एक वर्षांपूर्वी  गावकरी मंडळातून बाहेर पडलो सरपंचाच्या दावेदार स्वाती अमोलिक  यांचे वं कुटुंबियांचे गेल्या 3ते 4 महिन्या पासून गावकरी मंडळाच्या नेत्यांच्या मागे राजीनीमा घेण्यासाठी दबाव वाढत होता  परंतु काही होत नाही म्हणून कोणा मार्फत हा राजीनामा घ्यावा हा प्रश्न गावकरीच्या नेत्यांना पडला होता गावकरी मंडळाचे नेते सुनील मुथा यांच्या  मध्यस्थीने जनता विकास आघाडी चे नेते सुधीर नवले, भरत साळुंके, रवींद्र खटोड, यांना बरोबर घेऊन,सरपंच महेंद्र साळवी यांच्यावर  अविश्वास ठराव आणण्यासाठी कोणाच्या सांगण्या वरून महिना भर विनवण्या करत होते.  मागील आठवड्यात 11 सदस्यांच्या सह्या घेऊन महेंद्र साळवी यांच्यावर अविश्वास आणण्यासाठी तयारी झाल्याचे सरपंच यांना कळाले त्यामुळे सरपंच साळवी यांनी सभापती सुधीर नवले, व रवींद्र खटोड, भरत साळुंके,यांना भेटले मी कुठल्याही प्रकारचे चुकीचे काम केलेले नाही परंतु माझ्याकडून नेते मंडळींनी बरीचशी कामे चुकीचे करून घेतलेली आहे. त्याचे पुरावे त्यांचे कडे आहे त्यामुळे माझ्यावर मी एक दलित समाजाचा कार्यकर्ता असल्याने मला यातून आपणच मार्ग काढू शकता अशी विनवणी केली होती  मी आपल्याबरोबर काम करण्यास तयार आहे म्हणून सरपंच महेंद्र साळवी यांनी अघाडीत येण्याचा निर्णय घेतला होता साळवी यांनाही आमच्या नेत्यांनी विश्वास दिला कि आमच्या सहा सदस्यांचा पाठिंबा आम्ही आपणास देऊ आपण तीन सदस्य आणा व कारभार तुम्हीच पहा असे ठरले होते  आमच्या नेत्यांना वं मला स्वतः कोणत्याही पदाची अपेक्षा नव्हती  ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अनिमित्तता झालेली आहे  हे पाप वं केलेली खटाटोप झाकण्यासाठी शरद नवले अभिषेक खंडागळे यांनी गटविकास अधिकार्यकडून एक पत्र आणून त्यात 12 मुद्दे भ्रष्टाचाराचे टाकून तुम्हाला 8 दिवसाच्या आत सरपंच पद काढून घेऊ  व कामाला लावू असे दबावतंत्र सरपंचांवर राबविण्यात  आले

नामदार विखे साहेब यांची दिशाभूल करून  सरपंचवर दबाव आणुन माघार घ्यावयास  भाग पाडले आहे

राहिली समाजाची बदनामची महेद्र साळवी सुशिक्षित सरपंच असून त्यांचे वर अविश्वास आणताना समाजाची बदनामी झाली नाही का ?त्यावेळेस आपण  व आपले कुटुंब त्यात सर्वात पुढे होते हे विसरले का दुसऱ्याने लिहुन दिलेल्या कागदावर सह्या करून व्हाट्सअप वर बदनामी करण्यात आली हे कटकारस्थान थांबवावेत अन्यथा आपल्या मंडळाच्या नेत्यांची महिंद्र साळवी यांच्या बाबतची मोबाईल रेकॉर्डिंग आमच्याकडे असून ती व्हायरल करू मग कोण किती खरं आणि किती खोटं हे जनतेला समजेल असेही शेवटी रमेश अमोलीक यांनी म्हटले आहे


बेलापूरः(प्रतिनिधी )-गेले अडीच वर्षे गावकरी मंडळाने विकासाभिमुख कारभार केला असे असताना नवले व साळुंके यांनी सरपंच महेंद्र साळवी यांची दिशाभूल करुन ग्रामपंचायतचा कारभार अस्थिर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.तसेच समाजाचीही बदनामी केली.तथापी साळवी यांनी हा कावा वेळीच ओळखून गावकरी मंडळात परतण्याचा योग्य निर्णय घेवून कावेबाजांना तोंडघशी पाडल्याची प्रतिक्रिया गावकरी मंडळाच्या ग्रामपंचायत सदस्या स्वाती अमोलिक यांनी दिली आहे .                            बेलापूर ग्रामपंचायतीतील नुकत्याच झालेल्या राजकीय नाट्याबाबत बोलताना अमोलिक म्हणाल्या की,ग्रामस्थांनी विरोधकांना डावलून गावकरी मंडळाला बहुमत दिले.गावकरी मंडळानेही जि.परिषद सदस्य शरद नवले तसेच बाजार समितीचे उपसभापती तथा उपसरपंच अभिषेक खंडागळे, सरपंच महेंद्र साळवी यांचे नेतृत्वाखाली जनहिताचा व विकासाभिमुख कारभार केला.पण सत्तेविना तडफडणा-यांना हे देखवले नाही.त्यांनी सरपंच महेन्द्र साळवी यांची दिशाभूल करुन अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.यात प्रामुख्याने कुणाचा सहभाग होता.हे जगजाहीर झालेले आहे .हे करत असतानाच विरोधकांनी जातीयतेचा घाणेरडा आधारही घेतला.यामुळे मागासवर्गिय समाजाची बदनामी झाल्याचा आरोप अमोलिक यांनी केला.राज्याचे महसूलमंञी नामदार राधाकृष्ण विखे पा.यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घातले आणि सरपंच साळवी यांच्या  वस्तुस्थिती  लक्षात आणून दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साळवी यांनी स्वगृही गावकरी मंडळात परतण्याचा निर्णय घेतला.यामुळे कावेबाज व कट कारस्थान करणाऱ्याचा  डाव उधळला गेला.टाकलेला डाव त्यांच्याच अंगलट आला.ग्रामस्थांनी गावकरी मंडळाला बहुमत दिले आहे.तेव्हा विरोधकांनी जनमताचा सन्मान राखावा.स्वार्थासाठी कुटील कारस्थान करुन अस्थिरता आणून गावच्या विकासाला खिळ घालू नये अन्यथा जनमताचा अनादर केल्यास ग्रामस्थ विरोधकांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहित असा इशारा अमोलिक यांनी दिला आहे.


बेलापुरा (प्रतिनिधी  )-कुरणपुर तालुका श्रीरामपुर येथील प्रवरा नदीपात्रातील अनेक शेतकऱ्यांच्या वीज मोटारीच्या केबल एका रात्रीत चोरीला गेल्या असुन दिड महीन्यापूर्वीही अशाच प्रकारे केबल व मोटारी चोरीस गेलेल्या होत्या या बाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी लोणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे                                              कुरणपुर येथील शेतकऱ्यांनी शेतीला पाणी देण्यासाठी प्रवरा नदी पात्रात वीज मोटारी टाकून शेतीला पाण्याची व्यवस्था केली होती. परवा रात्रीच्या वेळेस अनेक शेतकऱ्यांच्या वीज मोटारीच्या केबल चोरीस गेलेल्या आहे. यात दत्तात्रय लक्ष्मण महानोर यांची साधारण तीनशे फुट काँपर केबल अंदाजे किंमत ९००० रुपये लक्ष्मण  रामजी चिंधे यांची साधारण ९००० हजार रुपये किमतीची तीनशे फुट काँपर केबल पंकज ज्ञानदेव हळनोर यांची रुपये ९००० किमतीची साधारण तीनशे फुट काँपर केबल नामदेव सहादु थोरात यांची रुपये ७००० किमतीची वीज मोटारीची काँपर केबल विठ्ठल सोपान व्यवहारे यांची तीनशे फुट काँपर केबल राजेंद्र सुखदेव हळनोर यांची तीनशे फुट काँपर केबल आण्णासाहेब सोन्याबपु जाटे यांची तीनशे फुट केबल विठ्ठल भागवत देठे यांची तीनशे फुट केबल दत्तात्रय भानुदास राऊत यांची तीनशे फुट केबल जयवंत नारायण देठे यांची तीनशे फुट केबल सतीश चंद्रभान हळनोर यांची वीज मोटारीवरील केबल आबासाहेब आण्णासाहेब पारखे यांची वीज मोटारीवरील तीनशे फुट केबल अशा एकुण बारा शेतकऱ्यांच्या वीज मोटारीच्या केबल अंदाजीत किंमत एक लाख रुपये किमतीच्या चोरीस गेल्या असुन एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी होण्याची ही दुसरी घटना आहे यापूर्वीही अशाच प्रकारे अनेक शेतकऱ्यांच्या वीज मोटारीच्या केबल व तीन शेतकऱ्यांच्या विज मोटारी चोरीस गेलेल्या होत्या त्या चोरीचा तपास लागला नाही केबल चोरीसा गेलेल्या शेतकऱ्यांनी नविन केबल खरेदी करुन शेती वीज पंप सुरु केले होते पुन्हा तसाच प्रकार घडला असुन या बाबत सर्व शेतकऱ्यांनी लोणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असुन या चोरांचा तातडीने छडा लावावा व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे


श्रीरामपूर-शितल ही सकाळी 11/00 वा.चे सुमारास  लोणी PMT दवाखान्यामध्ये जात असुन सायंकाळी 04/00 ते 05/00 वा.चे सुमारास घरी येईल असे सांगुन मुलगा अशिष वय 05 वर्षे यास घेवुन गेली आहे. तरी ती संध्याकाळ पर्यत घरी आली नाही
 तीचे वर्णन पुढील प्रमाणे
नाव शितल फ्रान्सीस श्री सुंदर वय 23 वर्षे रा. गोंधवणी वार्ड न 01 श्रीरामपुर उंची 5 फुट 5 इंच, रंग -सावळा,बांधा- सडपातळ, चेहरा- गोल, केस काळे लांब, नेसणीस - गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात चप्पल तसेच मुलगा नामे आशिष वय 5 वर्षे उंची 3 फुट, रंग- गोरा, बांधा मजबुत पायात चप्पल, नेसणीस जीन्स पॅन्ट व रंगीत शर्ट
तरी दि05/06/2023 रोजी सकाळी 11/00 वा.चे सुमारास माझी पत्नी शितल फ्रान्सीस श्रीसुंदर व मुलगा आशीष फ्रान्सीस श्रीसुंदर हे लोणी PMT दवाखान्यामध्ये जात आहे असे शेजारी राहणारे ताई हीस सांगुन निघुन गेली आहे तीचा शोध लागल्यास विनंती.
संपर्क करा
अंमलदार
श्रीरामपूर शहर पो.स्टे. 02422-222666
पती फ्रान्सीस राँबेल श्रीसुंदर  - 84598 99182


बेलापुर  (प्रतिनिधी  )-गैरसमज झाल्यामुळे आज माजी महसुल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस  प्रवेश करण्याचे निश्चित झालेले बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी यांनी पुन्हा घुमजाव करत गावकरी मंडळात प्रवेश केला असुन महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा .यांनी आपला गैरसमज दुर केला असुन आता आपण गावाकरी मंडळाबरोबरच कायम स्वरुपी राहणार असल्याची प्रतिक्रिया सरपंच महेंद्र साळवी यांनी दिली आहे .                      आपल्याला दबावाखाली काम करावे लागत असल्याचे कारण सांगून सरपंच महेंद्र साळवी यांनी काँग्रेस पक्षात जाहीरपणे प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता .त्या निर्णयाचे काँग्रेस गोटातुन जोरदार स्वागत केले . त्या वेळी फटाक्याची मोठी अतिषबाजीही करण्यात आली होती काहींनी पेढेही वाटले होते परंतु त्यांचा आनंद दिर्घकाळ टिकला नाही तिसऱ्याच दिवशी सरपंच महेंद्र साळवी यांनी पत्रकारासमक्ष गावकरी मंडळात पुन्हा प्रवेश करत असल्याचे जाहीर केले भरत साळूंके व सुधीर नवले यांनी आपला बुद्धीभेद केला. तुमच्यावर अविश्वास आणण्याची तयारी पूर्ण झाली आहे. असे भासविले त्यामुळे गैरसमजातुन आपण काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु खरी वस्तूस्थिती समजल्यावर झालेली चुक लक्षात आली त्यामुळे लगेच ती चुक सुधारण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरपंच महेंद्र साळवी यांनी सांगितले या वेळी जि प सदस्य शरद नवले यांनी सरपंच महेंद्र साळवी यांचेशी महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचेशी बोलणे करुन दिले .गावाचा विकास करण्यासाठी आपल्याला सर्वाना बरोबर घेवुन जायचे आहे .बेलापुरच्या विकासासाठी मी आपल्या बरोबर आहे असे नामदार विखे यांनी सांगताच सरपंच महेंद्र साळवी यांनी आपला निर्णय  बदलला व गावाच्या विकासासाठी मी गावकरी मंडळाबरोबरच असल्याचे जाहीर केले    त्यामुळे तीन दिवसापासुन गावात चाललेल्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे .या वेळी बोलताना गावकरी मंडळाचे नेते शरद नवले म्हणाले की काहींनी सरपंच महेंद्र साळवी यांना चुकीची माहीती देवुन आपल्या जाळ्यात ओढले परंतु खरी वस्तुस्थिती लक्षात आल्यावर सरपंच स्वगृही परतले सरपंचाना आपल्या पार्टीत घेण्याचे असुरी स्वप्न पहाणारांची आता झोपच उडाली आहे  त्यांनी फोडलेले फटाके फुसकेच निघाले गावाच्या विकासाचे काय होईल अशी दोन दिवस गावात चर्चा सुरु होती पण भगवान श्री हरिहर केशव गोविंदिंना देखील ते मान्य नव्हते महसुल मंत्री  नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरपंच  साळवी यांचा गैरसमज दुर केला त्यामुळे ते गावकरी मंडळातही आले तसेच सरपंच  पदाचा राजीनामाही दिला आहे.राजकारणात लोकांनी नाकारलेल्यांनी खेळलेला कुटील डाव फसला असल्याचेही नवले म्हणाले         *माजी महसुल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सरपंच महेंद्र साळवी यांचा काँग्रेस प्रवेश करण्याचे निश्चित झाले होते आमदार बाळासाहेब थोरात त्या करीता ग्रामपंचायत कार्यालयातही आले परंतु कार्यालयात सरपंच नव्हते ते नाँट रिचेबलश आल्यामुळे  तो कार्यक्रम स्थगीत झाला*


श्रीरामपूर (प्रतिनिधी) - मुस्लिम बांधवांचा मोठा सण असलेली बकरी ईद व हिंदू धर्मीय बांधवांची आषाढी एकादशी एकाच दिवशी येत असल्याने एकमेकांच्या धार्मिक भावनांचा आदर करीत आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद मधील महत्त्वपूर्ण असलेला कुर्बानीचा विधी त्या दिवशी न करण्याचा निर्णय श्रीरामपूर येथील मुस्लिम समाजाने घेतला आहे.या निर्णयाचे सर्वत्र व्यापक प्रमाणात स्वागत करण्यात येत आहे.

येथील जामा मशिदीच्या हॉलमध्ये शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व त्यांचे सहकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुस्लिम समाजातील धार्मिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली जमा मशिदीचे प्रमुख धर्मगुरू मौलाना अल्हाज मोहम्मद ईमदाद अली,माजी उपनगराध्यक्ष हाजी मुजफ्फर शेख, नगरसेवक मुख्तार शाह, अदमदभाई जहागिरदार, मुन्ना पठाण,साजिद मिर्झा आदींसह विविध मशिदींचे मौलाना तसेच अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीसाठी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मुस्लिम समाजाचे प्रमुख कार्यकर्ते व शेतकरी संघटनेचे नेते अहमदभाई जहागीरदार यांनी आपल्या मनोगतातून श्रीरामपूर शहर हे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी सुप्रसिद्ध आहे. दोन्ही समाजाचे संबंध खूप चांगले आहेत. श्रीरामपूरच्या शांततेला गालबोट लावण्याचे अनेक प्रयत्न आत्तापर्यंत झाले. मात्र दोन्ही समाजातील समंजस कार्यकर्त्यांमुळे इथली शांतता टिकून आहे.भविष्यात देखील हेच वातावरण कायम राहण्यासाठी एकमेकांच्या भावनांचा आदर राखून वागण्याची गरज आहे असे सांगून आषाढी एकादशीचे असलेले महत्त्व लक्षात घेता श्रीरामपूरच्या मुस्लिम समाजाने त्या दिवशी ईद उल अज्हा निमित्त होणारे कुर्बानीचे विधि न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे उपस्थित सर्व समाज बांधवांच्या वतीने जाहीर केले. या निर्णयाचे उपस्थितांनी स्वागत केले.

पोलीस निरीक्षक गवळी यांनी श्रीरामपूरच्या मुस्लिम समाजाने नेहमी पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे असे सांगून शासनाच्या निर्देशाप्रमाणे ईद आणि आषाढी एकादशी एकत्र येत असल्याने कुठेही शांतता भंग होऊ नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले. आपण घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून श्रीरामपूरची एकात्मता राज्यामध्ये प्रसिद्ध आहे.ती अबाधित ठेवण्याचे कार्य आपण सर्वांनी मिळून करू या असे आवाहन केले.

याप्रसंगी जामा मशिदीचे मौलाना मोहम्मद ईमदाद अली यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि आमच्या पैगंबरांनी शांतता, बंधुभाव आणि एकतेचा संदेश दिला आहे.श्रीरामपूरात सर्व हिंदू ,मुस्लिम, शीख, इसाई एकोप्याने राहतात. हीच श्रीरामपूरची ओळख आहे. ती ओळख कायम ठेवण्याचे काम आपण सर्वांना करावयाचे आहे.मुस्लिम समाजाने नेहमी शांततेचा पुरस्कार केला आहे. यावेळी सुद्धा ईद आणि आषाढी शांततेत साजरी होईल अशी मला आशा आहे.

याप्रसंगी अलहाज मौलाना इमदाद अली,हाफिज जोहर अली,अहमदभाई जहागीरदार, हाजी मुजफ्फर  शेख, रईस जहागीरदार साजीद मिर्ज़ा, मुख्तार शाह, मुन्ना पठान,नज़ीरभाई मुलानी, हाजी एजाज़ बारूदवाला,फिरोज खान,सलीम जहागीरदार, तौफिक शेख,अकील कुरेशी,

इलाहीबक्श कुरेशी, जोएफ जमादार,आरिफ बागवान,वजीरभाई शाह,अहमद शाह,

आमीन शाह,रशीद कुरेशी,अबुल मन्यार , रज़ा शकूर शेख,हाजी जलालुद्दीन पीरजादे, हाजी इब्राहीम कुरेशी,

अकबर खान,गफ्फार पोपटिया,रियाज़ पठान, रज्जाक पठान, इफ्तिखार शेख, सरवर अली मास्टर,नदीम तंबोली,जावेद तंबोली, कलीम कुरेशी,मोहम्मद तनवीर रजा,मौलाना नुरुल हसन,काझी हसन रजा, मौलाना कैसर,मौलाना अब्दुल लतीफ, मौलाना तौकीर रजा, सलीम रिज्वी,

याकूब शाह, हाजी अब्दूल रहेमान, इम्तियाज हसन खान, अजीम शेख आदिसह शहरातील सर्व मशिदींचे मौलाना मशीदींचे विश्वस्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी हाजी साजिद मिर्झा यांनी आभार मानले.


बेलापुर (प्रतिनिधी  )-सत्तेच्या लालसेपोटी या गटातुन त्या गटात कोलांट उड्या मारणाऱ्या  तसेच एका मागासवर्गीय सरपंचाला कारभार पाहु न देणाऱ्या बिनपदाच्या पदाधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराला कंटाळून मी काँग्रेस व जनता विकासअघाडीत जाहीर प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया सरपच महेंद्र साळवी यांनी दिली आहे             या बाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात सरपंच महेंद्र साळवी यांनी पुढे म्हटले आहे की पाच वर्षाच्या कार्यकाळात ठेकेदारी मलाच मिळाली पाहीजे या भावनेतुन काम करणाऱ्या जि प सदस्यांनी सर्व सदस्यांना बाजुला ठेवुन केवळ पैसे मिळवीणे हाच उद्देश समोर ठेवुन दादागीरी व दहशत सुरु केली जि प सदस्य मलाच मिळावे या करीता सारा खटाटोप चालला असुन काय चालले हे पक्ष श्रेष्ठीसह एकाही सदस्याला माहीत नाही याच सदस्याने २००७ला मुरकुटे व जनता अघाडी अशी युती करुन सरपंच झाले  सन२००८ ला अशोक सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक निमित्त पुढे करुन राजीनामा न देता ससाणे गटाबरोबर युती केली व एकट्यानेच प्रवेश करुन पुन्हा वीस महीने सत्ता बळकावीली व आशोक गवते यांना सरपंचपदापासुन दुर ठेवले याचा आपणास विसर पडला का ?  तसेच २०१० मध्ये कै ससाणे साहेबांचा विश्वासघात करुन ग्रामपंचायतला स्वतंत्र पँनल करुन पराभव झाला. परत २०१२ ला जि प निवडणूकीत पुन्हा मुरकुटे बरोबर युती करुन जी प सदस्यपद मिळवीले त्यानतर २०१४ ला सभापतीपदही मिळवीले २०१७ ला महाविकास अघाडीकडून मुरकुटे व राम शिंदे यांच्या गटाकडून निवडून आले अन त्याच वेळी आमदार राम शिंदे व मुरकुटे यांना टाळून विखेंशी हातमिळवणी केली अन या वेळेस गावकरी मंडळाच्या नेत्यांचाही विश्वासघात केला तसेच मिस्टर शेलार व कै जबाजी अमोलीक यांचाही विश्वासघात कुणी केला हे आठवा  अशा कोलांटउड्या मारणारांनी दुसऱ्याला तत्वज्ञान पाजाळू नये मला सत्तेची लालसा नव्हती म्हणून मीच तीन बैठका घेतल्या त्या वेळी सदस्यांचा कल उपसरपंच पदाच्या बदलाकडे  असल्याचे जाणवले त्यावरुन उपसरपंच खंडागळे याना मी त्यांच्या विरोधात काम करतो असे वाटले १५ १५ महीने असा कार्यकाल ठरला आसताना माझे काम यांच्या सांगण्यानुसार होत होते तो पर्यत यांना माझी कुठलीही आडचण झाली नाही श्रेष्ठींनीही माझा राजीनामा मगीतला नाही पण मी माझ्या कार्यकर्त्याला दोन कामे दिली तर यांच्या पोटात गोळा उठु लागला अन तेथुनच खरी सुरुवात झाली .काही ठिकाणी मी सह्या करण्याचे नाकारलै त्यामुळे तर त्यांचा माथा आणखीनच भडकला आडीच वर्ष तुमच्या मनाप्रमाणे वागलो ते चालले अन आता लगेच अविश्वास ठराव सरपंच बदलाचे वारे का वाहु लागले हे गावालाही समजले पाहीजे अजुन बरेच काही आहे वेळ आली तर  तुम्हाला सर्वासमोर उघडे करण्याचे काम मी  करेल मला संपविण्यासाठी यांनी विरोधकांशी हात मिळवणी केली तर चालते यांनी पुढील जी प व प स निवडणुकीत नवले व खंडागळे यांना सोडून गावकरी मंडळाच्या सदस्यांना उमेदवारी देवुन दाखवावी मी लगेच राजीनामा देतो मला सत्तेची लालसा नव्हती व नाही .श्रेष्ठींनी सांगावे मी कुठे चुकलो  उपसरपंच खंडागळे यांनाही सर्व पदेही मलाच पाहीजे नवले व खंडागळे यांनाच सर्व पदे हवीत श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीत सुधीर नवले सभापती झाले ते ही काहींच्या पचनी पडले नाही त्यांना सह्याचे अधीकार मिळू नये यासाठी जीवाचा आटापीटा कोणी केला हे ही तालुक्याला माहीत आहे गावाला पद मिळाले या पेक्षा सुधीर नवलेंना मिळाले यांचे दुःख झाले होते  माझी भावजयी निरक्षर आहे तसेच अमोलीक ताई नोकरी करते त्यामुळे त्यांना नामधारी पदे देवुन आपली पोळी भाजण्याचे षडयंत्र फिसकटले म्हणून यांचा तिळपापड झाला असल्याचेही सरपंच साळवी यांनी शेवटी म्हटले आहे


बेलापुर  (प्रतिनिधी  )-गेल्या काही दिवसापासून साई मंदिर बेलापुर येथे बिबट्याचे वास्तव्य असुन अनेकांना त्याचे दर्शन झालेले आहे .त्यामुळे अनुचित घटना घडण्याआगोदर वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी बेलापुर ग्रामस्थांनी केली आहे .                                 रात्रीच्या वेळेस हा बिबट्या साई मंदिराकडून रस्ता ओलांडून नाईक पाटील यांच्या शेताकडे जाताना अनेकांनी पाहीला आहे हा रस्ता सतत रहदारीचा असुन पहाटे व सायंकाळी अनेक नागरीक फिरण्यासाठी जात असतात ज्यांना बिबट्याचे दर्शन झाले त्यांनी तातडीने उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना कळवीले उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी तातडीने या बाबत वन परिक्षेत्र अधीकारी कोपरगाव यांना कळविले त्यांनी लेखी अर्ज करणे बाबत सांगितले  यापूर्वी मगणी करताच पिंजरा लावला जात असताना आता अर्ज देण्याचा नियम केव्हापासून झाला यांची विचारणा खंडागळे यांनी उपवन संरक्षक अधीकारी सुवर्णा माने यांच्याशीही चर्चा केली त्यांनी देखील अर्ज द्या शहापुर येथे घडलेल्या घटनेपासुन आम्ही अर्ज घेतल्याशिवाय पिंजरा लावत नाही असे सांगून अर्ज करा लगेच पिंजरा लावला जाईल असेही श्रीमती माने यांनी सांगितले आता पिंजरा केव्हा लागतो याची बेलापुरकरांना प्रतिक्षा आहे मात्र पिंजरा लावाण्याआगोदर काही घटना घडली बिबट्याने कुणावर हल्ला केला तर जबाबदार कोण राहील असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत


बेलापुर  (प्रतिनिधी  )-मुस्लिम धर्मियांचा बकरीईद सण व हिंदु धर्मियांची आषाढी एकादशी हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असुन मुस्लिम बांधवांनी हिंदु बांधवांच्या भावनांचा सन्मान करत बकरीईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा ऐतिहासीक निर्णय घेतला आहे. बेलापुर येथे नुकतीच शांतता कमीटीची बैठक संपन्न झाली. त्यात सर्व मुस्लीम बांधवांनी हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले असुन त्यांच्या निर्णयाचे हिंदु बांधवांनी तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे .                            बेलापुर  येथे नुकतीच शांतता कमीटीची बैठक श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मुस्लीम बांधवाचा सण बकरीईद तसेच हिंदू बांधवांचा पवित्र आषाढी एकादशी हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असुन त्या दिवशी काही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता कमीटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. पोलीस प्रशासनाच्या वतीने काही सुचना करण्याच्या आगोदरच मुस्लीम बांधवांनी जाहीरपणे सांगितले की आम्ही सर्व जण कायमच एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत आहोत. आषाढी एकादशी हा हिंदु बांधवांचा मोठा व पवित्र सण आहे. या दिवशी सर्व हिंदु बांधव पुजाअर्चा करुन उपवास करतात. याच दिवशी मुस्लीम बांधवांचा कुर्बानी देण्याचा सण बकरीईद येत आहे. त्यामुळे हिंदु बांधवांच्या भावनांचा आदर करुन  दोन दिवस कुर्बानी न देण्याचा निर्णय आम्ही सर्व मुस्लीम बांधवांनी सर्वानुमते घेतला असल्याचे हाजी ईस्माईल शेख, मोहसीन सय्यद, बाबुलाल शेख, अयाजअली सय्यद, जाकीर शेख ,अजीज शेख यांनी सांगितले. मुस्लीम बांधवांनी हा ऐतिहासीक निर्णय घेतला असुन या निर्णयांचे हिंदु बांधवाच्या तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. बेलापुर गावाने नेहमीच समाजापुढे आदर्श ठेवण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे. सर्वात प्रथम विना पोलीस बंदोबस्ताशिवाय गणेश विसर्जन मिरवणूक पार पाडण्याचा यशस्वी निर्णय घेतला. त्यानंतर गाव सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याचा धाडसी निर्णय गावाने घेतला होता. गावाने दिपावली निमित्त आपली खरेदी आपल्या गावातच हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला  तसेच राम मंदिराचे कोषाध्यक्ष बेलापूर गावचे वैभव आचार्य गोविंददेवगीरीजी महाराज यांच्याकडे राम मंदिर उभारणीसाठी ७५ हजार रुपये  देण्याचा देशातील पहीला मान बेलापुरच्या मुस्लीम बांधवांनी मिळवीला तसेच संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे मुस्लीम बांधवांनी जागोजागी स्वागत केले आता आषाढी एकादशी व द्वादशी या दोन दिवस कुर्बानी न देण्याचा धाडसी निर्णय बेलापुरच्या मुस्लीम बांधवांनी घेतला आहे.  राज्यात नव्हे देशात असा निर्णय घेणारे बेलापुर हे पहीले गाव ठरले आहे. या वेळी जि प सदस्य शरद नवले ,उपसरपंच अभिषेक खंडागळे ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक ,मोहसीन सय्यद, प्रफुल्ल डावरे, हाजी ईस्माईल शेख, पास्टर अलिशा जोगदंड, एकनाथ नागले, देविदास देसाई, शिवसेनेचे अशोक पवार, विष्णूपंत डावरे आदिंनी मनोगत व्यक्त केले समाजापुढे आदर्श ठेवण्याचे काम नेहमीच या गावाने केले असुन सण उत्सव शांततेत पार पाडा या करीता घेण्यात आलेल्या शांतता समीतीच्या बैठकीत मुस्लीम बांधवांनी एक वेगळाच आदर्श घालुन दिला असल्याचे मत पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी व्यक्त केले या वेळी बेलापुरात नुकत्याच झालेल्या राजकीय भूकंपावरुन शरद नवले अरुण पा नाईक अभिषेक खंडागळे यांनी भाषणात केलेल्या शेरेबाजीमुळे उपस्थितामध्ये हशा पिकला ग्रामपंचायत सदर रविंद्र खटोड, अशोक गवते, मुस्ताक शेख,रमेश आमोलीक ,मिस्टर शेलार ,जिना शेख दादा कुताळ, जाफरभाई आतार, जब्बार आतार, गोपी दाणी रफीक शेख, प्रदीप शेलार, अकीला पटेल, ईस्माईल आतार, सागर ढवळे ,किशोर महापुरे, फतेमोहंमद ईनामदार, हाफीज शेख, कासम शेख सहाय्यक फौजदार सुधीर हापसे ,हवालदार सोमनाथ गाडेकर ,हवालदार शफीक शेख पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ,नंदकिशोर लोखंडे आदिसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक देविदास देसाई यांनी केले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे यांनी आभार मानले.                  *आमच्या शेजारीच हिंदु बांधव राहतात आषाढी एकादशीला ते धार्मिक विधी पुजाअर्चा करुन उपवास करतात.त्याच दिवशी बकरीईद आली असुन त्यांच्या धर्माचा धार्मिक भावनांचा आदर करुन त्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे* शफीक आतार                         *या गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असुन येथील मंदिर व मस्जिदची एकच भिंत आहे. मुस्लीम बांधवांनी आषाढी एकदशीच्या दिवशीच येणाऱ्या बकरीईदला कुर्बानी न देण्याचा धाडसी निर्णय घेतला असुन दोन समाजात सामंजस्य, प्रेम, सदभावना वाढविण्याच्या दृष्टीने टाकलेले हे महत्वाचे पाऊल आहे*.*आणखी एक विनंती आहे की* *कुर्बानी देताना गाय किंवा गोवं जनावरांची* *कुर्बानी देवु* *नये* पंडीत महेश व्यास


श्रीरामपूर (गौरव डेंगळे)२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो.त्याचेच औचित्य साधत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये पतंजली ध्यानपीठ साधक श्री नितीन चित्ते,आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योग शिक्षिका सौ सुजाता शेडगे,
सौ सुरेखा जगदाळे,सुनीता मांडण,रुपाली जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली ५५० विध्यार्थीनी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्सवात साजरा करण्यात आला.योग ही आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे.हीच प्राचीन परंपरा नविन पिढीला निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरेल. म्हणून जगभरात २१ जुन  आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो.करोगे योग तो राहोगे निरोग हे ब्रीद वाक्याने जगभरात योग दिन साजरा करण्यात आला आहे.यावेळी शाळेचे प्राचार्य डॉ.योगेश पुंड तसेच शाळेतील शिक्षक वृंदानी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा आनंद घेतला.योग दिन यशस्वी करण्याकरीता क्रीडा प्रशिक्षक श्री गौरव डेंगळे व श्री नितीन गायधने यांनी अथक परिश्रम घेतले.


बेलापूरःबेलापूरात सत्तांतर झाले नसून फक्त सरपंच हस्तांतरण झाले आहे.बहुमत आजही गावकरी मंडळाकडे असून गावकरी मंडळ अभेद्य आहे.काही झारीतल्या शुक्राचा-यांनी स्वार्थासाठी षडयंञ केले असले तरी ग्रामस्थांचा आम्हालाच पाठींबा आहे.सरपंच महेन्द्र साळवी हे खुल्या प्रवर्गातून निवडून आले तरी त्यांना आम्ही अनुसुचित जागेचे आरक्षण असताना सरपंचपद दिले.त्यांनी आमच्यावर मी मागासवर्गिय असल्याने मला ञास दिला असा आरोप करणे निराधार आहे .आम्ही अडीच वर्षात एकदिलाने भरीव विकासकामे केली. गाव विकासाच्या वाटेवर असताना विरोधकांनी केवळ सत्तालालसेपायी कुटील डाव खेळून विकासाला खिळ घातली असल्याने ग्रामस्थच विरोधकांचा हिशोब चुकता करतील असा दावा  जि.परिषद सदस्य शरद नवले,उपसरपंच तथा बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे तसेच गावकरी मंडळाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी संयुक्तपणे प्रसिध्दीस दिलेल्या पञकाव्दारे केला आहे.                             बेलापूरचे सरपंच महेन्द्र साळवी यांनी विरोधी गटात प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर जि.परिषद सदस्य श्री.शरद नवले,उपसरपंच अभिषेक खंडागळे ,गावकरी मंडळाचे ग्रामपंचायत सदस्य सौ.तबसुम बागवान,कु.सविता अमोलिक,सौ.प्रियंका कु-हे ,सौ.मिना साळवी,सौ.उज्वला कुताळ,मुश्ताक शेख,चंद्रकांत नवले,वैभव कु-हे  यांनी संयुक्तपणे प्रसिध्दीस दिलेल्या पञकात नमूद केले की, गावकरी मंडळ निवडून आले तेंव्हा चार सदस्य अनूसुचित जातीचे असल्याने सर्वांना संधी देण्यासाठी प्रत्येकी  पंधरा महिने सरपंचपद असे सर्वानुमते ठरले होते.पण श्री.साळवी यांनी तिस महिने उलटून गेले तरी शब्द पाळला नाही. त्यांकडे वारंवार राजीनाम्याची मागणी केली पण त्यास प्रतिसाद न देता त्यांनी पदालालसेपोटी व आर्थिक तडजोडी करून विरोधकांशी हातमिळवणी केली.आता ते माझ्यावर दबाव असायचा,मला ञास दिला जायचा असे बिनबुडाचे आरोप करुन सारवासारव करीत आहेत.                         गावकरी मंडळाने गेल्या अडीच वर्षात सातत्याने पाठपुरावा करुन १२६ कोटीची पाणी पुरवठा योजना तसेच साठवण तलावासाठी विनामुल्य साडे आठ एकर जमिन मिळविली.यात महसूलमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांनी मोलाचे सहकार्य केले.विरोधकांकडे वीस वर्षे सत्ता होती.राज्यातही काँग्रेसची सत्ता व हे ज्यांना नेते मानतात ते महसूलमंञी होते मग कां पाणी पुरवठा योजना व  साठवण तलावाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला नाही.विरोधकांनी त्यांचेकडे सत्ता असताना कोणते भरीव काम केले हे सांगावे.आम्ही विधायक कामाला सहकार्य करु पण चुकीच्या कामाचा माञ विरोध करु.विरोधकांचे समाधान हे अल्पकाळासाठी आहे.लवकरच पुन्हा गावकरी मंडळाचीच सत्ता येईल असा आम्हाला विश्वास आहे.                            गेल्या अडीच वर्षात गावकरी मंडळाने पाणीपुरवठा योजना व साठवण तलावाचे ऐतिहासिक काम मार्गी लावले.भुयारी गटारांची कामे केली.कारभार करताना एजंट निर्माण होवू दिले नाही.स्वच्छ व जनहिताचा कारभार केला.तीस महिने सरपंचपद भोगल्यावर सरपंच म्हणतात माझ्यावर दबाव होता.असा दबाव होता  तर त्याची यापूर्वी वाच्यता कां झाली नाही.संघटनेने राजीनामा मागीतल्यावरच  दबाव कसा आला. आम्ही गावाशी बांधिलकी राखून अहोराञ कामाला वाहून घेतले.जनतेला हे सर्व माहित आहे.त्यामुळे आता जे घडले ते जनतेला मान्य नाही.हा आमचा नाही तर जनमताचा  विश्वासघात आहे.जनतेची गावकरी मंडळाला सहानुभूती आहे.तेव्हा जनताच विरोधकांना धडा शिकवेल. ज्यांनी फोडाफोडीचे गलिच्छ राजकारण केले त्यांनी आता गाव विकासाची जबाबदारी घ्यावी असे सदर पञकात नमूद केले आहे.


श्रीरामपूर- श्रीरामपूरातील टिळकनगर येथील रांजनखोल चौकात रविवारी दुपारच्या सुमारास दुचाकी आडवुन चाकुचा धाक दाखवुन एका व्यापाऱ्यास लुटणारे सराईत आरोपी जेरबंद करण्यात येथील शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची रईस शेरखान पठाण (वय २८, रा. टिळकनगर), रोहित सोपान रामटेके (वय ३१, रां. रांजणखोल) अशी नावे असून त्यांनी आणखी एका अनोळखी साथीदारसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १२ ग्रॅम वजनाची ७० हजाराची सोन्याची साखळी, २० हजार रुपये रोख रक्कम, १० हजाराचा विवो कंपनीचा मोबाईल, असा एकुण १ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


 याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी बाळकृष्ण गोविंद खोसे (वय ६४, रा. खोसे वस्ती, बेलापूर चौक, कोल्हार रोड) यांनी रविवारी (दि.१८) सकाळी ११ वाजता दुकानात लागणारे मटेरियल घेण्यासाठी २० हजार रुपये खिशात घेतले. त्यानंतर त्यांचा जुना ग्राहक प्रशांत डांगे (रा. राहाता) यांच्याकडुन उधारीचे पैसे आणण्यासाठी मोटारसायकलवर राहाता येथे गेले होते.

राहाता येथे प्रशांत डांगे हे भेटले नाही, म्हणुन ते पुन्हा राहाता येथुन गणेशनगर, वाकडी मार्गे दत्तनगर येथे आले व नेहमी प्रमाणे टिळकनगर कारखान्याचे पाठीमागुन एकलहरे मार्गे बेलापूरकडे जाण्यास निघाले. तेव्हा टिळकनगर येथील रांजनखोल चौकात दुपारी २ वाजेच्या सुमारास आले व चौकातुन पुढे थोड्या अंतरावर गेल्यावर अचानक दोन इसम त्याच्या मोटारसायकला आडवे होवुन त्यांना थांबवले. त्यातील एका इसमाने त्याच्या हातातील चाकु दाखवुन त्यांना धमकावुन त्यांना एकलहरेकडे जाणारे रोडने घेवुन रांजनखोल शिवारात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास साळुंखे वस्ती समोर मोटारसायकल बाजुला थांबायला सांगितली.

मोटारसायकल थांबवताच त्यांनी चाकुचा धाक दाखवुन पॅन्टच्या खिशातील २० हजार रुपये तसेच गळ्यातील सोन्याची साखळी व एक विवो कंपनीचा मोबाईल काढुन घेतला. त्यानंतर आणखी पैसे पाहिजे म्हणुन मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी यांनी आराओरडा केल्याने ते तिघे आरोपी मोटारसायकलवर पळुन गेले.

   याबाबत खोसे यांच्या फिर्यादी वरुन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपास पथकाने गुप्त बातमीदार व सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे चोरटयांचा शोध घेतला असता संशयित इसम रईस शेरखान पठाण, रोहित सोपान रामटेके व त्याचा एक अनोळखी साथिदार यांनी सदरचा गुन्हा केल्याची व सध्या ते टिळकनगर परिसरात लपले असल्याची माहिती मिळाल्याने सदर परिसरात सापळा लावुन, शिताफिने पाठलाग करुन दोन्ही आरोपींना पकडले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हाची कबुली दिली. त्याच्याकडुन चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

   ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या तपास पथकातील सहायक पोलीस निरिक्षक विठ्ठल पाटील, सहायक पोलीस निरिक्षक जिवन बोरसे, पो.ना. रघुनाथ कारखेले, पो.ना. रामेश्वर ढोकणे, पो.कॉ. राहुल नरवडे, पो. कॉ. गौतम लगड, पो. कॉ. रमिझराजा अत्तार, पो. कॉ. गणेश गावडे, पो.कॉ. मच्छिद्र कातखडे, पो.कॉ. संभाजी खरात तसेच पो.ना. सचिन धनाड, पो. कॉ. प्रमोद जाधव व पो.कॉ. आकाश भैरट यांनी केली आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरिक्षक देवरे करीत आहेत


बेलापुर (प्रतिनिधी  )-गेल्या तीन महीन्यापासुन बेलापुरात सरपंच बदलाचे वारे वाहु लागले होते अविश्वास ठराव, सरपंच बदल अशी चर्चा सुरु असतानाच सरपंच महेंद्र साळवी यांनी अचानक घुमजाव घेत गावकरी मंडळाला रामराम करुन काँग्रेस ,जनता अघाडी युतीत प्रवेश करुन बेलापुरच्या राजकीय गोटात खळबळ उडवुन दिली आहे                                 या बाबत वृत्त असे की बेलापुर ग्रामपंचायतीत मागील झालेल्या निवडणूकीत गावकरी मंडळाला ११ तर काँग्रेस जनता अघाडीला सहा जागा मिळाल्या होत्या गावकरी मंडळाच्या हाती सत्ता येताच १५, १५ महीने सरपंच पद देण्याचे ठरविण्यात आले त्यानुसार पहीला मान महेंद्र साळवी यांनी देण्यात आला त्या नंतर १५ महीने उलटुनही सरपंच महेंद्र साळवी राजीनामा देत नाही व श्रेष्ठी काहीच बोलत नाही या रागातुन गावकरी मंडळातुन निवडुन आलेले रमेश अमोलीक यांनी गावकरी मंडळाला गुडबाय करुन जनता अघाडी व काँग्रेस गटात जाहीर प्रवेश केला त्यानंतर काही चुकीच्या कामकाजावर आवाज उठविण्याचेही काम अमोलीक यांनी केले सरपंच साळवी यांना ३० महीन्यापेक्षा जास्त कार्यकाळ पुर्ण करुनही राजीनामा देत नसल्यामुळे गावकरी मंडळाकडून राजीनामा देण्यासाठी दबाव आणला जावु लागला गेल्या तीन महीन्यापासुन सरपंच महेंद्र साळवी हे गावकरी मंडळाच्या विरोधी गटाच्या संपर्कात होते त्यांच्या वेळोवेळी बैठकाही झाल्या होत्या ,याची कुणकुण गावकरी मंडळाचे नेते शरद नवले यांना लागली होती तरीही त्यांनी शांततेची भुमीका घेतली सरपंच महेंद्र साळवी यांचाही समज पक्का झाला की नेत्याच्या पाठींब्याशिवाय कुणीच अविश्वास आणण्याचे धाडस करु शकत नाही त्यामुळे त्यांनीही बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले जनता अघाडीचे रविंद्र खटोड भरत साळूंके यांच्याशी संधान साधले त्यांनीही शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या राजकीय उक्तीप्रमाणे साळवी यांना जवळ केले जि प सदस्य शरद नवले बाजार समीतीचे उपसभापती व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सरपंच महेंद्र साळवी यांच्या समवेत बैठक घेतली त्या वेळी साळवी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की मी माझा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे साळवी हे रविंद्र खटोड भरत साळूंके सुधीर नवले यांच्या संपर्कात आल्याचे निश्चित झाल्यामुळे शरद नवले यांनी तुम्हाला तुमचा मार्ग मोळका आहे परंतु आम्ही काहीच कमी केले नव्हते असे सांगुन ते निघुन गेले त्यानंतर बरच काही रात्रीत ठरविण्यात आले अन सकाळी  सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सरपंच महेंद्र साळवी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले या वेळी सुधीर नवले , रविंद्र खटोड ,भरत साळूंके अशोक राशिनकर अयाजअली सय्यद राजेश खटोड जाकीर शेख प्रकाश जाजु शेषराव पवार चंदु पा नाईक किशोर बोरुडे शफीक आतार जावेद शेख रमेश अमोलीक संजय शेलार ,विलास मेहेत्रे आदिसह असंख्य कार्यकर्ते होते या वेळी फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली गावकरी मंडळाकडे आता ९ काँग्रेस जनता अघाडीकडे ७ जागा असे सध्यातरी संख्याबळ आहे यातील जनता अघाडीचा एक सदस्य यापुर्वीच अपात्र ठरलेला आहे दोनही गटांनी विरोधी गटातील दोन दोन सदस्य संपर्कात असल्याचा दावा केलेला आहे गावकरी मंडळाकडे ९ सदस्य असले तरी त्यातील तीन सदस्य हे मुरकुटे गटाचे आहेत त्यामुळे आणखी काही राजकीय अदलाबदल होते की काय याची कुजबुज गावात सुरु आहे       काँग्रेसच्या गोटात आनंदोत्सव            बाजार समीतीत विखे गटाला धक्का देवुन काँग्रेसचे सुधीर नवले सभापती झाले गणेश कारखाना निवडणूकीतही विखेंना सत्तेपासुन दुर ठेवण्यात काँग्रेस सफल झाली तर बेलापुरातही विखेंचे निकटवर्ती शरद नवले यांच्याकडून काँग्रेसने सत्ता खेचुन एक प्रकारे विखेंना शहच दिलेला असल्याची चर्चा बेलापूर वा परिसरात सुरु आहे

दिनांक 9 जून रोजी 10 ते 5 वा.चे दरम्यान फिर्यादी यांचे राहते घरातुन फिर्यादीची अल्पवयीन मुलगी हिला कशाचेतरी आमिष दाखवुन फिर्यादीचे संमतीशिवाय पळवुन घेवुन गेला म्हणुन फिर्यादीचे तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशने येथे गुरनं. 552/2023 भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक श्री हर्षवर्धन गवळी यांनी सदर आरोपीचा शोध घेणे कामी तपास पथकास आदेश दिले, त्यानुसार तपास पथकाने तात्काळ आरोपीचा व अल्पवयीन मुलीचा शोध चालु केला, मोबाईल ट्रॅकीग, सी. डी. आर. / एस. डी. आर. रिपोर्ट तसेच फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया अकाउंट च्या माध्यमातुन शोध चालु केला. पोलीस आपल्या मागावर आहेत यांची भनक आरोपीस लागल्याने सदर अल्पवयीन मुलीस दिनांक 10/06/2023 रोजी सांयकाळी 06/00 वा. सुमा. राहुरी फॅक्ट्ररी येथे सोडुन निघुन गेला होता. सदर अल्पवयीन मुलीस विश्वासात घेवुन विचारपुर केली असता तिच्या शाळेचा बस चालक आरोपी नामे विजय गोविंद गोडसे, रा. देवळाली ता. राहुरी जि. अहमदनगर यांने माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे, तुझे आई वडील तुला नेहमी त्रास देतात, ते मला पाहवत नाही, आपण त्याच्यापासुन लांब कुठेतरी निघुन जावु, असे बोलुन मला माझे राहते घरुन घेवुन गेला व मी अल्पवयीन असल्याचे माहित असताना सुध्दा त्याने माझ्यावर लैगिक अत्याचार केला असा जबाब मुलीने दिल्याने सदर दाखल गुन्हयात भांदवि कलम 366, 366 (अ), 376 पोक्सो कलम 4, 5 (फ), 6, 11, 12 प्रमाणे वाढ करुन आरोपीचा शोधाकरीता दोन वेगवेगळया टिम करुन शोध चालु केला.दिनांक 16/06/2023 रोजी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी साो. यांना सदर गुन्हयातील आरोपी हा रात्री 09/00 वा. सुमारास राहुरी फॅक्ट्ररी परीसरात येणार असल्याची गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने पोनि. गवळी साो. यांचे आदेशाने सदर परिसरात तपास पथकाने सापळा रचुन शिताफीने सदर आरोपीस ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.श्रीरामपूर शहर पोलीसांकडुन पोक्सो कायदयाबाबत जनजागृतीसाठी सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, 18 वर्षे पेक्षा कमी असलेल्या कोणत्याही व्यक्तीस, प्रत्यक्ष वा सोशल मिडीयावरुन पाठलाग केल्यास प्रेमाच्या जाळयात ओढल्यास, पळवून नेल्यास असे कृत्य करणाऱ्या व्यक्ती व त्यांना असे कृत्य करण्यास मदत करणाऱ्या व्यक्ती विरुध्द तात्काळ पोक्सो कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करुन पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येते.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, राकेश ओला साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, स्वाती भोर, तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर उपविभाग, संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, हर्षवर्धन गवळी यांचेकडील तपास पथकातील सपोनि जिवन बोरसे, स.फौ. सुधिर हापसे, पोना / रघुवीर कारखेले, पोकॉ/ गौतम लगड, पोकॉ/ राहुल नरवडे, पोकॉ/ रमिझराजा अत्तार, पोकॉ/ गणेश गावडे, पोकॉ/मच्छिंद्र कातखडे, पोकॉ/ संभाजी खरात, पोकॉ/ भारत तमनर तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील पोना. सचिन धनाड, पोकॉ. / प्रमोद जाधव व पोकॉ. आकाश भैरट यांनी केली असुन सदर गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी साो. यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि जिवन बोरसे हे करीत आहेत.


बेलापुर (प्रतिनिधी  )-भारतीयांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.असे असले तरी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे पऱ्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा अन ती जगवा असा संदेश श्रीरामपूरचे वरिष्ठ वनपरिमंडळ अधिकारी एम डी कोळी यांनी केले. श्रीरामपुर  तालुक्यातील उक्कलगाव येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .त्या वेळी कोळी यांनी हे अवाहन केले   या वेळी प्रवरा नदीकाठी दशक्रियविधी ओठयाजवळ कांचन वड करंजी लिंब शिवण 

आदी प्रकारच्या अकरा झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.उक्कलगाव गळनिंब रस्त्यावर वनविभागाच्या वतीने झाडे लावण्यात आली. सामाजिक वनिकरण विभागाचे दिपक निर्वाण ग्रामरोजगार सेवक शाम नागरे यांनी  त्या झाडांची योग्य निगा व काळजी घेतल्यामुळे आज रस्त्याच्या दुतर्फा चांगल्या प्रकारे झाडांची वाढ झालेली दिसत असल्याचे पत्रकार देविदास देसाई यांनी सांगुन दोघांचेही अभिनंदन केले  यावेळी श्रीरामपूर वनपरिमंडळ अधिकारी संगिता चौरे सामजिक वनीकरण अधिकारी  दिपक निर्वाण वनीकरण कर्मचारी बाळासाहेब कांबळे विशाल कानडे बाळासाहेब आहेर प्रशासक दिपक मेहेरे ग्रामविकास अधिकारी रमेश निबे ग्रामरोजगार सेवक शाम नागरे अनिल थोरात सोमनाथ मोरे पोलिस पाटील हिराबाई मोरे विकास थोरात दिगबर मोरे नानासाहेब थोरात वनमजूर संजय गायकवाड बबन पिसाळ रामभाऊ मोरे किशोर थोरात रविंद्र मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

......

बेलापूरः (प्रतिनिधी  )-छ.शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करुन रयतेचे राज्य साकारले.सामान्य माणूस व स्वराज्यातील गाव हे केन्द्रस्थानी माणून त्यांनी राज्यकारभार केला.शिवराय हे ख-या अर्थाने ग्रामविकासाचे प्रवर्तक होते असे प्रतिपादन जि.परिषद सदस्य शरद नवले यांनी केले.                                                            बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 'शिवस्वराज्य दिन' साजरा करण्यात आला.याप्रसंगी श्री.नवले यांनी मनोगत व्यक्त केले.                        प्रारंभी शिवरायांच्या प्रतिमेस वंदन करण्यात आले.यावेळी सरपंच महेन्द्र साळवी तसेच उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव केला.याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य मुश्ताक शेख,चंद्रकांत नवले,ग्रामविकास अधिकारी श्री.गायकवाड  यांचेसह  भास्कर बंगाळ,प्रकाश कु-हे ,प्रभात कु-हे ,महेश कु-हे ,दादासाहेब कुताळ,पञकार सुहास शेलार,प्रविण बाठीया,जनार्दन ओहोळ,प्रभाकर ताके,सुभाष  राशिनकर,अली शेख,बाबुराव पवार,सचिन साळुंके,विजय खरोटे आदी उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-जिद्द चिकाटी व  कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते हेच अभिषेक दुधाळ याने दाखवुन दिले असुन आजच्या तरुणासमोर अभिषेक एक आदर्श असल्याचे मत उपविभागीय अधिकारी किरण सांवत पाटील यांनी व्यक्त केले बेलापुर येथील अभिषेक दुधाळ याने युपीएससी परिक्षेत सलग तिन वेळेस घवघवीत यश मिळवीले नुकत्याच झालेल्या परिक्षेत त्याने देशात२७८ वी रँक मिळवीली त्याबद्दल श्रीरामपुर महसुल विभागाच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते उपविभागीय अधीकारी किरण सावंत पुढे म्हणाले की तरुणांनी आगोदर आपले ध्येय निश्चित करावे व ते ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी अनेक जण प्रयत्न न करता नशिबाला दोष देतात परंतु प्रयत्नवादी रहा यश तुमच्या पायाशी लोटांगण घेईल याचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिषेक दुधाळ असल्याचेही सावंत पाटील म्हणाले या वेळी प्रभारी तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांनीही अभिषेक दुधाळ याचे अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या वेळी बोलताना अभिषेक दुधाळ याने मी घेतलेले कष्ट व त्याला मिळालेले आई वडील गुरुजन वर्ग मित्र परिवार या सर्वांचे आशिर्वाद व प्रेम  यामुळेच हे शक्य झाले असल्याचे मत व्यक्त केले या वेळी योगेश भालेकर रामेश्वर शेले सावळे भाऊसाहेब सय्यद भाऊसाहेब धनवटे भाऊसाहेब अभया राजळव शारदा वाघ मिलींद दुधाळ पत्रकार देविदास देसाई आदि  मान्यवर उपस्थित होते

श्रीरामपूर :-येथील श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजने आपली १००% टक्के निकालाची परंपरा यंदा सलग १८ व्या वर्षीही कायम राखली.यावर्षी शाळेतून एकूण ६३ विद्यार्थी बसले होते ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले.धनश्री चौधरी ही विद्यार्थिनी ९०.४०%  टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम आली. विभूती गुप्ता व मल्हार पवार दोघांनीही ९०.२०% टक्के गुण मिळवून द्वितीय तर ऋषिता सोनत्तके ८९.८० % गुण मिळून तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री राम टेकावडे, खजिनदार जन्मजय टेकावडे, सदस्य सुरेश ओझा, विधीज्ञ दादासाहेब औताडे, प्राचार्य डॉ योगेश पुंड, शाळेचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा.

बेलापूरःबेलापूरबु-ऐनतपूर गावच्या जलजीवन मिशन अंतर्गतच्या १२६ कोटी खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावासाठी शेती महामंडळाची साडे आठ एकर जमिन विनामुल्य देण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत झाला.सदरची जमिन विनामुल्य मिळवून दिल्याबद्दल राज्याचे महसूलमंञी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा बेलापूर बु-ऐनतपूर ग्रामस्थांचे वतीने सत्कार करण्यात आला.                            बेलापूर-ऐनतपूरच्या पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावासाठी मंञीमंडळाच्या बैठकीत शेती महामंडळाची साडे आठ एकर जमिन देण्याचा निर्णय झाला होता.यासाठी जमिनीच्या  किमतीच्या दहा टक्के म्हणजे ३० लाख रुपये इतके जमिनीचे मुल्यांकन ठारविण्यात आले होते.तथापि महसूल मंञी नामदार राधाकृष्ण विखे पा.यांनी सदरची जमीन गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी द्यायची असून लोकहिताच्या कामासाठी देणार असल्याने  सदरची जमिन विनामुल्य देणेबाबत आग्रही मागणी मुख्यमंञी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिमंडळ बैठकीत केली.सदरची विनंती मान्य करुन सदर जमिन विनामुल्य देण्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.यामुळे ग्रापंचायतीला भरावे लागणारे ३० लाख रुपये वाचले आहेत.                   सदर जमिन विनामुल्य मिळवून दिल्याबद्दल महसूल मंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांचा ग्रामस्थांचे वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, अशोक कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन जालिंदर कुऱ्हे,सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,भाजपा  सरचिटणीस प्रफुल्ल डावरे, हाजी इस्माईल शेख,तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरषोत्तम भराटे,तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ उर्फ लहानू नागले,अँड.अरविंद साळवी,पत्रकार दिलीप दायमा,प्रभात कुऱ्हे,शफिक बागवान,मोहसीन सय्यद,भाऊसाहेब तेलोरे,महेश कुऱ्हे,प्रशांत मुंडलिक,बाबुलाल पठाण,गोपी दाणी,दादासाहेब कुताळ,शशिकांत तेलोरे,सुनिल शहाणे,मास्तर हुडे,टिंकू राकेचा,राम कुऱ्हे,प्रभाकर लोखंडे आदी उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget