मनमानी कारभाराला कंटाळून काँग्रेस जनता विकास अघाडीत प्रवेश -साळवी


बेलापुर (प्रतिनिधी  )-सत्तेच्या लालसेपोटी या गटातुन त्या गटात कोलांट उड्या मारणाऱ्या  तसेच एका मागासवर्गीय सरपंचाला कारभार पाहु न देणाऱ्या बिनपदाच्या पदाधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराला कंटाळून मी काँग्रेस व जनता विकासअघाडीत जाहीर प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया सरपच महेंद्र साळवी यांनी दिली आहे             या बाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात सरपंच महेंद्र साळवी यांनी पुढे म्हटले आहे की पाच वर्षाच्या कार्यकाळात ठेकेदारी मलाच मिळाली पाहीजे या भावनेतुन काम करणाऱ्या जि प सदस्यांनी सर्व सदस्यांना बाजुला ठेवुन केवळ पैसे मिळवीणे हाच उद्देश समोर ठेवुन दादागीरी व दहशत सुरु केली जि प सदस्य मलाच मिळावे या करीता सारा खटाटोप चालला असुन काय चालले हे पक्ष श्रेष्ठीसह एकाही सदस्याला माहीत नाही याच सदस्याने २००७ला मुरकुटे व जनता अघाडी अशी युती करुन सरपंच झाले  सन२००८ ला अशोक सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक निमित्त पुढे करुन राजीनामा न देता ससाणे गटाबरोबर युती केली व एकट्यानेच प्रवेश करुन पुन्हा वीस महीने सत्ता बळकावीली व आशोक गवते यांना सरपंचपदापासुन दुर ठेवले याचा आपणास विसर पडला का ?  तसेच २०१० मध्ये कै ससाणे साहेबांचा विश्वासघात करुन ग्रामपंचायतला स्वतंत्र पँनल करुन पराभव झाला. परत २०१२ ला जि प निवडणूकीत पुन्हा मुरकुटे बरोबर युती करुन जी प सदस्यपद मिळवीले त्यानतर २०१४ ला सभापतीपदही मिळवीले २०१७ ला महाविकास अघाडीकडून मुरकुटे व राम शिंदे यांच्या गटाकडून निवडून आले अन त्याच वेळी आमदार राम शिंदे व मुरकुटे यांना टाळून विखेंशी हातमिळवणी केली अन या वेळेस गावकरी मंडळाच्या नेत्यांचाही विश्वासघात केला तसेच मिस्टर शेलार व कै जबाजी अमोलीक यांचाही विश्वासघात कुणी केला हे आठवा  अशा कोलांटउड्या मारणारांनी दुसऱ्याला तत्वज्ञान पाजाळू नये मला सत्तेची लालसा नव्हती म्हणून मीच तीन बैठका घेतल्या त्या वेळी सदस्यांचा कल उपसरपंच पदाच्या बदलाकडे  असल्याचे जाणवले त्यावरुन उपसरपंच खंडागळे याना मी त्यांच्या विरोधात काम करतो असे वाटले १५ १५ महीने असा कार्यकाल ठरला आसताना माझे काम यांच्या सांगण्यानुसार होत होते तो पर्यत यांना माझी कुठलीही आडचण झाली नाही श्रेष्ठींनीही माझा राजीनामा मगीतला नाही पण मी माझ्या कार्यकर्त्याला दोन कामे दिली तर यांच्या पोटात गोळा उठु लागला अन तेथुनच खरी सुरुवात झाली .काही ठिकाणी मी सह्या करण्याचे नाकारलै त्यामुळे तर त्यांचा माथा आणखीनच भडकला आडीच वर्ष तुमच्या मनाप्रमाणे वागलो ते चालले अन आता लगेच अविश्वास ठराव सरपंच बदलाचे वारे का वाहु लागले हे गावालाही समजले पाहीजे अजुन बरेच काही आहे वेळ आली तर  तुम्हाला सर्वासमोर उघडे करण्याचे काम मी  करेल मला संपविण्यासाठी यांनी विरोधकांशी हात मिळवणी केली तर चालते यांनी पुढील जी प व प स निवडणुकीत नवले व खंडागळे यांना सोडून गावकरी मंडळाच्या सदस्यांना उमेदवारी देवुन दाखवावी मी लगेच राजीनामा देतो मला सत्तेची लालसा नव्हती व नाही .श्रेष्ठींनी सांगावे मी कुठे चुकलो  उपसरपंच खंडागळे यांनाही सर्व पदेही मलाच पाहीजे नवले व खंडागळे यांनाच सर्व पदे हवीत श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीत सुधीर नवले सभापती झाले ते ही काहींच्या पचनी पडले नाही त्यांना सह्याचे अधीकार मिळू नये यासाठी जीवाचा आटापीटा कोणी केला हे ही तालुक्याला माहीत आहे गावाला पद मिळाले या पेक्षा सुधीर नवलेंना मिळाले यांचे दुःख झाले होते  माझी भावजयी निरक्षर आहे तसेच अमोलीक ताई नोकरी करते त्यामुळे त्यांना नामधारी पदे देवुन आपली पोळी भाजण्याचे षडयंत्र फिसकटले म्हणून यांचा तिळपापड झाला असल्याचेही सरपंच साळवी यांनी शेवटी म्हटले आहे

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget