महसुल मंत्री नामदार विखेंच्या शिष्टाईनंतर सरपंच महेंद्र साळवी यांची पुन्हा घरवापसी


बेलापुर  (प्रतिनिधी  )-गैरसमज झाल्यामुळे आज माजी महसुल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस  प्रवेश करण्याचे निश्चित झालेले बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी यांनी पुन्हा घुमजाव करत गावकरी मंडळात प्रवेश केला असुन महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा .यांनी आपला गैरसमज दुर केला असुन आता आपण गावाकरी मंडळाबरोबरच कायम स्वरुपी राहणार असल्याची प्रतिक्रिया सरपंच महेंद्र साळवी यांनी दिली आहे .                      आपल्याला दबावाखाली काम करावे लागत असल्याचे कारण सांगून सरपंच महेंद्र साळवी यांनी काँग्रेस पक्षात जाहीरपणे प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता .त्या निर्णयाचे काँग्रेस गोटातुन जोरदार स्वागत केले . त्या वेळी फटाक्याची मोठी अतिषबाजीही करण्यात आली होती काहींनी पेढेही वाटले होते परंतु त्यांचा आनंद दिर्घकाळ टिकला नाही तिसऱ्याच दिवशी सरपंच महेंद्र साळवी यांनी पत्रकारासमक्ष गावकरी मंडळात पुन्हा प्रवेश करत असल्याचे जाहीर केले भरत साळूंके व सुधीर नवले यांनी आपला बुद्धीभेद केला. तुमच्यावर अविश्वास आणण्याची तयारी पूर्ण झाली आहे. असे भासविले त्यामुळे गैरसमजातुन आपण काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु खरी वस्तूस्थिती समजल्यावर झालेली चुक लक्षात आली त्यामुळे लगेच ती चुक सुधारण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरपंच महेंद्र साळवी यांनी सांगितले या वेळी जि प सदस्य शरद नवले यांनी सरपंच महेंद्र साळवी यांचेशी महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचेशी बोलणे करुन दिले .गावाचा विकास करण्यासाठी आपल्याला सर्वाना बरोबर घेवुन जायचे आहे .बेलापुरच्या विकासासाठी मी आपल्या बरोबर आहे असे नामदार विखे यांनी सांगताच सरपंच महेंद्र साळवी यांनी आपला निर्णय  बदलला व गावाच्या विकासासाठी मी गावकरी मंडळाबरोबरच असल्याचे जाहीर केले    त्यामुळे तीन दिवसापासुन गावात चाललेल्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे .या वेळी बोलताना गावकरी मंडळाचे नेते शरद नवले म्हणाले की काहींनी सरपंच महेंद्र साळवी यांना चुकीची माहीती देवुन आपल्या जाळ्यात ओढले परंतु खरी वस्तुस्थिती लक्षात आल्यावर सरपंच स्वगृही परतले सरपंचाना आपल्या पार्टीत घेण्याचे असुरी स्वप्न पहाणारांची आता झोपच उडाली आहे  त्यांनी फोडलेले फटाके फुसकेच निघाले गावाच्या विकासाचे काय होईल अशी दोन दिवस गावात चर्चा सुरु होती पण भगवान श्री हरिहर केशव गोविंदिंना देखील ते मान्य नव्हते महसुल मंत्री  नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरपंच  साळवी यांचा गैरसमज दुर केला त्यामुळे ते गावकरी मंडळातही आले तसेच सरपंच  पदाचा राजीनामाही दिला आहे.राजकारणात लोकांनी नाकारलेल्यांनी खेळलेला कुटील डाव फसला असल्याचेही नवले म्हणाले         *माजी महसुल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सरपंच महेंद्र साळवी यांचा काँग्रेस प्रवेश करण्याचे निश्चित झाले होते आमदार बाळासाहेब थोरात त्या करीता ग्रामपंचायत कार्यालयातही आले परंतु कार्यालयात सरपंच नव्हते ते नाँट रिचेबलश आल्यामुळे  तो कार्यक्रम स्थगीत झाला*

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget