पऱ्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी झाडे लावा अन ती जगवा -वनपरिमंडळ अधिकारी कोळी

बेलापुर (प्रतिनिधी  )-भारतीयांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.असे असले तरी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे पऱ्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा अन ती जगवा असा संदेश श्रीरामपूरचे वरिष्ठ वनपरिमंडळ अधिकारी एम डी कोळी यांनी केले. श्रीरामपुर  तालुक्यातील उक्कलगाव येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .त्या वेळी कोळी यांनी हे अवाहन केले   या वेळी प्रवरा नदीकाठी दशक्रियविधी ओठयाजवळ कांचन वड करंजी लिंब शिवण 

आदी प्रकारच्या अकरा झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.उक्कलगाव गळनिंब रस्त्यावर वनविभागाच्या वतीने झाडे लावण्यात आली. सामाजिक वनिकरण विभागाचे दिपक निर्वाण ग्रामरोजगार सेवक शाम नागरे यांनी  त्या झाडांची योग्य निगा व काळजी घेतल्यामुळे आज रस्त्याच्या दुतर्फा चांगल्या प्रकारे झाडांची वाढ झालेली दिसत असल्याचे पत्रकार देविदास देसाई यांनी सांगुन दोघांचेही अभिनंदन केले  यावेळी श्रीरामपूर वनपरिमंडळ अधिकारी संगिता चौरे सामजिक वनीकरण अधिकारी  दिपक निर्वाण वनीकरण कर्मचारी बाळासाहेब कांबळे विशाल कानडे बाळासाहेब आहेर प्रशासक दिपक मेहेरे ग्रामविकास अधिकारी रमेश निबे ग्रामरोजगार सेवक शाम नागरे अनिल थोरात सोमनाथ मोरे पोलिस पाटील हिराबाई मोरे विकास थोरात दिगबर मोरे नानासाहेब थोरात वनमजूर संजय गायकवाड बबन पिसाळ रामभाऊ मोरे किशोर थोरात रविंद्र मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

......

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget