बेलापुर (प्रतिनिधी )-गेल्या तीन महीन्यापासुन बेलापुरात सरपंच बदलाचे वारे वाहु लागले होते अविश्वास ठराव, सरपंच बदल अशी चर्चा सुरु असतानाच सरपंच महेंद्र साळवी यांनी अचानक घुमजाव घेत गावकरी मंडळाला रामराम करुन काँग्रेस ,जनता अघाडी युतीत प्रवेश करुन बेलापुरच्या राजकीय गोटात खळबळ उडवुन दिली आहे या बाबत वृत्त असे की बेलापुर ग्रामपंचायतीत मागील झालेल्या निवडणूकीत गावकरी मंडळाला ११ तर काँग्रेस जनता अघाडीला सहा जागा मिळाल्या होत्या गावकरी मंडळाच्या हाती सत्ता येताच १५, १५ महीने सरपंच पद देण्याचे ठरविण्यात आले त्यानुसार पहीला मान महेंद्र साळवी यांनी देण्यात आला त्या नंतर १५ महीने उलटुनही सरपंच महेंद्र साळवी राजीनामा देत नाही व श्रेष्ठी काहीच बोलत नाही या रागातुन गावकरी मंडळातुन निवडुन आलेले रमेश अमोलीक यांनी गावकरी मंडळाला गुडबाय करुन जनता अघाडी व काँग्रेस गटात जाहीर प्रवेश केला त्यानंतर काही चुकीच्या कामकाजावर आवाज उठविण्याचेही काम अमोलीक यांनी केले सरपंच साळवी यांना ३० महीन्यापेक्षा जास्त कार्यकाळ पुर्ण करुनही राजीनामा देत नसल्यामुळे गावकरी मंडळाकडून राजीनामा देण्यासाठी दबाव आणला जावु लागला गेल्या तीन महीन्यापासुन सरपंच महेंद्र साळवी हे गावकरी मंडळाच्या विरोधी गटाच्या संपर्कात होते त्यांच्या वेळोवेळी बैठकाही झाल्या होत्या ,याची कुणकुण गावकरी मंडळाचे नेते शरद नवले यांना लागली होती तरीही त्यांनी शांततेची भुमीका घेतली सरपंच महेंद्र साळवी यांचाही समज पक्का झाला की नेत्याच्या पाठींब्याशिवाय कुणीच अविश्वास आणण्याचे धाडस करु शकत नाही त्यामुळे त्यांनीही बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले जनता अघाडीचे रविंद्र खटोड भरत साळूंके यांच्याशी संधान साधले त्यांनीही शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या राजकीय उक्तीप्रमाणे साळवी यांना जवळ केले जि प सदस्य शरद नवले बाजार समीतीचे उपसभापती व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सरपंच महेंद्र साळवी यांच्या समवेत बैठक घेतली त्या वेळी साळवी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की मी माझा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे साळवी हे रविंद्र खटोड भरत साळूंके सुधीर नवले यांच्या संपर्कात आल्याचे निश्चित झाल्यामुळे शरद नवले यांनी तुम्हाला तुमचा मार्ग मोळका आहे परंतु आम्ही काहीच कमी केले नव्हते असे सांगुन ते निघुन गेले त्यानंतर बरच काही रात्रीत ठरविण्यात आले अन सकाळी सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सरपंच महेंद्र साळवी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले या वेळी सुधीर नवले , रविंद्र खटोड ,भरत साळूंके अशोक राशिनकर अयाजअली सय्यद राजेश खटोड जाकीर शेख प्रकाश जाजु शेषराव पवार चंदु पा नाईक किशोर बोरुडे शफीक आतार जावेद शेख रमेश अमोलीक संजय शेलार ,विलास मेहेत्रे आदिसह असंख्य कार्यकर्ते होते या वेळी फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली गावकरी मंडळाकडे आता ९ काँग्रेस जनता अघाडीकडे ७ जागा असे सध्यातरी संख्याबळ आहे यातील जनता अघाडीचा एक सदस्य यापुर्वीच अपात्र ठरलेला आहे दोनही गटांनी विरोधी गटातील दोन दोन सदस्य संपर्कात असल्याचा दावा केलेला आहे गावकरी मंडळाकडे ९ सदस्य असले तरी त्यातील तीन सदस्य हे मुरकुटे गटाचे आहेत त्यामुळे आणखी काही राजकीय अदलाबदल होते की काय याची कुजबुज गावात सुरु आहे काँग्रेसच्या गोटात आनंदोत्सव बाजार समीतीत विखे गटाला धक्का देवुन काँग्रेसचे सुधीर नवले सभापती झाले गणेश कारखाना निवडणूकीतही विखेंना सत्तेपासुन दुर ठेवण्यात काँग्रेस सफल झाली तर बेलापुरातही विखेंचे निकटवर्ती शरद नवले यांच्याकडून काँग्रेसने सत्ता खेचुन एक प्रकारे विखेंना शहच दिलेला असल्याची चर्चा बेलापूर वा परिसरात सुरु आहे
Post a Comment