July 2022

 " ईस्लाम समजून घेताना " लेखक डॉ सलीम सिकंदर शेख-"🌹🌹  इस्लामी हिजरी नये १४४४ साल (वर्ष) मुबारक हो '"🌹🌹

 ईस्लामी कालगणना नुसार " मोहररम " हा पहिला महीना, "हिजरी "  कालगणने, कॅलेंडर नुसार .अल्लाह च्या( सत्यधर्माचा)ईसलाम चा प्रचार प्रसार मकके मध्ये करीत असताना तेथील स्वधर्मियांनी आतोंनात छळ यातना प्रेषित मुहम्मद स्व. व त्यांच्या अनुयायींना देत होते,खुपदा  संघर्षाची थिंनगी विरोधी करत , तीन वर्ष सामुदायिक बहिष्कृत- बहिष्कार घातला गेला, छळ कपटाला आकरा वर्ष तोंड देत देत शेवटी हजरत प्रेषित मुहम्मद स्व  यांनी स्वदेश सोडून दुसऱ्या देशात राहुन सर्व जगात अल्लाह च्या सत्यधर्माचा प्रचार प्रसार करण्याचा निश्चिय करून मक्का पासून चारशे किलोमीटरहून जास्त असलेले तेव्हाचे " यसरब " व आजचे " पवित्र मदीना " शहर निवडून तेथे " स्थलांतरित " होण्याचे ठरविले . प्रेषित मुहम्मद स्व. हे १६ जुलै ६२२ रोजी पवीत्र मक्का हुन पवित्र मदीना साठी स्थलांतर करण्यात आलेल्या प्रवासाला - प्रयाणाला आरबी भाषेत " हिजरत '" म्हणतात . त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण म्हणून त्यांच्या खास जवळील मित्र इस्लामिक एतिहासातील पहीले खलिफा हजरत अबु-बकर सिददीक रजि. दुसरे खलिफा हजरत उमर व असंख्य मित्रमंडळी ( सहाबा) च्या सल्लागार मंडंळीच्या एकत्र सल्ला मसलतीने  त्या वर्षी हिजरी साल म्हणुन मान्यता दिली गेली त्याला आज १४४३ वर्ष पुर्ण झालीत.यालाच " हिजरी " हिजरा Hirahसाल ही म्हणतात.

प्रत्येक वर्षी च्या संख्येच्या शेवटी ' H ' म्हणजे हिजरा Hijrah " ला संक्षिप्त स्वरूपात, भाषेत इंग्रजी   एच'   H '  लावले जाते. 

  " AH  " लॅटिन वर्णमालेमधील, भाषेत ANNO HIJRI" अन्नो हिजरा" लिहिले जाते. 

परंतु प्रेषित मुहम्मद स्व. यांच्या प्रवासाच्या, स्थलांतर च्या अगोदर  "  BH ' '' before Hijarat ' हा शब्द, प्रयोग वापरला जातो. म्हणजेच प्रेषित मुहम्मद स्व. यांच्या जन्म तारखेला 53 BH   असा लिहिले जाते.. अर्थात सध्याच्या घडीला ला हिजरी 1443 वर्ष पूर्ण होउन.. 1444 वर्षात पदार्पण झालेले आहेत. 

                  हिजरी इस्लामी कालगणना चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील परस्परसंबंधावर आधारित आहे.चांद्रमासाचा कालावधी सुमारे २९.५३ दिवसांचा असुन त्यानुसारच आपण १२ महिन्यात गुणल्यास वर्षांचे ३५४ दिवस होतात . 

         परंतु हिंदू कालगणना ही सौर म्हणजे सुर्य पृथ्वीच्या परस्परसंबंधावर असल्याने त्यांचे ३६५ दिवस  व १ जानेवारी ही जगातील सर्व देशांनी मान्य केलेली ग्रेगोरियन कॅलेंडर लॅटिन ANNO Domino ग्रेगोरियन कॅलेंडर ,हे येशू ख्रिस्ताच्या जन्मावर्षीपासून करतात .त्यांचे ही ३६५-६६ होतात .

        तर सौर व चंद्र वर्ष यांच्यामधे १०-११ दिवसांचा फरक होत असतो ,तर हिंदू मधील सौर कालगणनेतील १०-११ दिवसांच्या फरक , तफावत भरून काढण्यासाठी भारतीय पंचांग करत्यांनी त्यामधे " आधीकमासा' ची ' क्ष' चापास ची योजना केली आहे .

    ""  गुढीपाडवा " हिंदू नववर्ष आरंभ म्हणजे " चैत्र " महीना पहिला.. हिंदू कालगणना ही सातवाहन राजा शालिवाहन राजाने त्यांच्या जन्मप्रारंभापासून " शालिवाहन शक किंवा शालिवाहन संवत्सर" सुरू केले . सध्या शालिवाहन शके १९४४ चालू आहे. 


ईस्लाम कालगणना नुसार  मोहररम हा इस्लामी पहिला महीना व प्रत्येक महीन्याच्या सुरुवात ही चांदरात  ने होत असते . त्यामुळे प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात की, " मुहररम हा अल्लाह चा महीना आहे.."'( सहीह मुस्लिम शरीफ हा. न. ११६३) 

  प्रेषित मुहम्मद पैगंबरांनी सांगितले की, " तुम्ही अल्लाह जवळ जे शुभ शुभ चिंतन, करुणा, दया,शांती मगफीरत,जन्नत ,माफी ,चांगले आरोग्य, हलाल रोजी,चांगले जे मागता येईल ,ज्या ईच्छा असतील,त्या सर्व गोष्टींची याचना करा.तो अल्लाह, ईश्वर, परमेश्वर आहे त्यांच्या खजिन्यात काहीही कमी नाही तो कायम देणाराच आहे "'

सर्वांना हिजरी नवीन १४४४ वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. अल्लाह यावर्षी सर्वांच्या अकाक्षा,ईच्छा पुर्ण करो... आमीन.... 


  🌷डॉ सलीम सिकंदरशेख .

  🌷बैतुशशिफा हॉस्पिटल 

  🌷श्रीरामपूर ९२७१६४००१४ 

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌷🌷

राजूर वार्ताहर-कोल्हार-घोटी रोडने एक इसम चारचाकी वाहनातून दारुचे बॉक्स घेवून जात असतांना हे वाहन पोलिसांनी पकडले. यामध्ये 16 हजार रुपयांची दारु व चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.पोलिसांनी कोल्हार-घोटी रोड वर केळुगंण फाटा येथे नाकाबंदी केली होती. दरम्यान एक व्यक्ती मारुती कंपनीची अल्टो गाडी क्रमांक एम. एच. 04 -सीएम. 8666 घेवून समोरुन आला. सदर गाडी थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये 16,800 रुपये किमतीच्या बॉबी संत्रा कंपनीच्या देशी दारुच्या 240 सिलबंद बाटल्या प्रत्येकी 180 मिली, व 1,50,000 रुपये किमतीच्या मारुती कंपनीची अल्टो गाडी असा एकुण 1 लाख 66 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.दारुची वाहतूक करणारा किसन सोना बांडे (वय 45 वर्ष, रा. खडकी खुर्द, ता. अकोले) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाढे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 162/2022 मुंबई पोलीस अ‍ॅक्ट कलम 65 (अ), 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक वाडेकर करत आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ प्रकाश भैलुमे, पो. हवालदार विजय मुंढे, पो. कॉ. अशोक गाढे, पो. कॉ. अशोक काळे, पो. कॉ. आकाश पवार, राकेश मुलाने यांनी ही कारवाई केली.

श्रीरामपूर : शहरातील अहमदनगर डिस्ट्रीक्ट सेंट्रल बँकेच्या आवारात, आज दुपारी १२:४५ वाजेच्या सुमारास.अशोक सहकारी साखर कारखाना चे अधिकारी, सुरक्षा रक्षकासह कॅश काढण्यासाठी आले होते. दरम्यान सुरक्षा रक्षक, दशरथ कारभारी पुजारी हे, बँके बाहेरील एटीएम समोर बसलेले असतांना. अचानक पणे त्यांच्या जवळील रायफल मधील गोळी सुटल्याने, बॅंकेत कामासाठी आलेल्या. ४२ वर्षीय अजित विजय जोशी या इसमास सुटलेली गोळी लागल्याने दुर्दैवी मुत्यु झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल

झाले असून. सदरची दुर्घटना कशी झाली याबाबत त्यांनी कसून चौकशी सुरू केली आहे. सदरची घटना शहर मध्यवर्ती ठिकाणी झाल्याने, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. या घटने नंतर पोलिसांनी सुरक्षा रक्षकास विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले असून. मयत अजित जोशी हे प्रगत शेतकरी असून, ते वार्ड नंबर ७ मधील सार्वमत रोड परिसरातील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे.

अहमदनगर प्रतिनिधी - संत तुकाराम साखर कारखाना, मुळशी, जिल्हा पुणे येथुन ऊस तोड मुकादम मजुरीची रोख रक्कम मोटार सायकलवर घरी घेवुन जात असतांना रात्रीचे वेळी करंजीघाटात वाहन आडवुन, मारहाण करुन जबरी चोरी करणारी टोळी ५,००,०००/- रु. रोख रक्कम व इतर मुद्देमालासह जेरबंद केली आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हेशाखेने केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २८/०६/२०२२ रोजी फिर्यादी संतोष शहादेव बर्डे वय ३६, धंदा ऊसतोड मुकादम व शेती, रा. भिलवडे, ता. पाथर्डी, जिल्हा नगर हे त्यांचे भाऊ साक्षीदार बबन असे संत तुकाराम साखर कारखाना, मुळशी, जिल्हा पुणे येथुन त्यांचे कामकाजाचे ५,७०,०००/- रु. रोख व अजिनाथ कारभारी मिसाळ यांचे कामकाजाचे २,००,०००/- रु. रोख असे एकुण ७,७०,०००/- रु. रोख रक्कम मोटार सायकलवर घेवुन घरी येत असतांना करंजीघाट, ता. पाथर्डी येथे दर्ग्याजवळ त्यांचे पाठीमागुन एक स्कॉर्पीओ गाडी येवुन मोटार सायकलला कट मारुन स्कॉर्पीओ आडवी लावुन गाडीतील अज्ञात तीन इसमांनी मारहाण करुन, धाक दाखवुन मोटार सायकलचे डिकीमध्ये ठेवलेली वरील रोख रक्कम बळजबरीने चोरुन नेली आहे. सदर घटने बाबत पाथर्डी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन गु.र.नं. ६५३ / २२ भादविक ३९४, ३४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. डॉ. बी. जी. शेखर पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी व मा. मनोज पाटील, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन आरोपींचा तात्काळ शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत पोनि. अनिल कटके यांना सुचना व मार्गदर्शन केले.सुचनेप्रमाणे अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थागुशाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा समांतर तपासा बाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे पथकाने मोटार सायकल आडवुन, मारहाण करुन जबरी चोरी करणा-या आरोपीतांची माहिती घेत असतांना पोनि/कटके यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा पप्पु दराडे याने केला असुन, तो आता पागोरी पिंपळगांव, ता. पाथर्डी येथे त्याचे राहते घरी आलेला आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थागुशा पथकातील पोसई/सोपान गोरे, सफौ/ मनोहर शेजवळ, पोहेकॉ संदीप पवार, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना/संतोष लोढे, शंकर चौधरी, संदीप चव्हाण, दिपक शिंदे, विश्वास बेरड, पोकॉ/ योगेश सातपुते, सागर ससाणे व चापोहेकॉ/संभाजी कोतकर अशांनी मिळुन पागोरी पिंपळगांव, ता. पाथर्डी येथे जावून मिळालेल्या माहिती वरुन आरोपीचे घरा जवळ सापळा लावुन थांबलेले असतांना एक संशयीत इसम येतांना दिसला त्यास शिताफीने ताब्यात घेवुन नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव १) प्रविण ऊर्फ पप्पु दिलीप दराडे, वय ३२, रा. पागोरी पिंपळगांव, ता. पाथर्डी असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वरील नमुद गुन्हयाबाबत चौकशी केली असता तो सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, त्यास अधिक विश्वासात घेवून कसून चौकशी केली असता त्याने नमुद गुन्हा हा त्याचा साथीदार आंबादास नागरे, तात्याबा दहिफळे व दत्तु सातपुते असे सोबत मिळुन केल्याची कबुली दिली. पथकाने नमुद आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी जावुन ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव २) आंबादास नारायण नागरे, वय ३१, रा. पागोरी पिंपळगांव, ता. पाथर्डी, ३) तात्याबा पोपट दहिफळे वय ३३, रा. महिंदा, ता. आष्टी, जिल्हा बीड व ४) दत्तु बाबादेव सातपुते वय ३४, रा. निपाणी जळगांव, ता. पाथर्डी असे सांगितले. त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देवुन गुन्ह्यात चोरीस गेलेली ५,००,०००/- रु. रोख तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली १२,००,०००/- रु. किंची महिंद्र स्कॉर्पीओ व ४०,०००/-रु. किं.चे चार मोबाईल फोन असा एकुण १७,४०,०००/- रु. किंचा मुद्देमाल काढुन दिल्याने तो जप्त करुन आरोपींना मुद्देमालासह पाथर्डी पो.स्टे.ला हजर करण्यात आले असून पुढील कार्यवाही पाथर्डी पो.स्टे. करीत आहेत.सदरची कारवाई मा. मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व सुदर्शन मुंढे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थागुशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

श्रीरामपूर : शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरीकांना, मागील निवडणूकिवेळी विकासाच्या नावाखाली दिलेले आश्वासने फौल ठरल्याने. आता नागरिक मूलभूत सुविधांसाठी आवाज उठविण्यास सुरवात झाली आहे. अशाच प्रकारे शहरातील वार्ड नंबर २, प्रभाग क्रमांक १० मधील बिफ मार्केट व नवीन घरकुलाच्या मागील परिसरातील नागरिकांना, चिखलाने बरबटलेले आणि खड्डेयुक्त रस्ते, भागातील नाल्यांवरील चैंबरचे फुटलेल्या ढाप्यांमुळे, परिसरातील नागरिकांच्या घरात सांडपाणी शिरत आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. प्रभागातील या परिस्थितीमुळे लहानांपासून, वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांनाच मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने. जरीया फाऊंडेशनच्या वतीने मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जावेद अहमद शेख, इम्रान अजिज शेख, सद्दाम ईस्माईल कुरेशी ,इम्रान भिकन पठाण,जावेद खालीद मलिक,गणेश प्रकाश शेवाळे, शाहरूख शफिक शेख,इम्रान ईस्माईल कुरेशी आदींसह जरीया फाऊंडेशनचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थितीत होते.

अहमदनगर प्रतिनिघी -पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेशन कंपनीची इलेक्ट्रीक टॉवरची ॲल्युमिनिअम तार चोरी करणारी टोळी पकडली. चोरट्यांकडून १ लाख ३ हजार ३९० रु. कि.चे मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई नगर स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. श्रीकांत ऊर्फ शिरक्या फकिरा मनतोडे (वय २०, रा. आश्वी खु, ता. संगमनेर), फारुख युसूफ सय्यद ( वय २८, रा. जुने जोर्वे रोड, ता. संगमनेर ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दि. २२ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेशन कंपनीचे कल्पतरु टॉवर्स पॉवर ट्रान्समिशन लि. कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून नोकरीस आहे. दि. १९ जुलै २२ रोजी सहकारी सुमो वाहनातून पेट्रोलिंग करत असतांना वासुंदे, ता. पारनेर जवळील टॉवर नं. १७६-१७७, १७८.१७९ या टॉवरमधील AAAC 6405q mm conductor मध्ये असलेली २६९० मीटर २,००,०००/- रू किं.ची इलेक्ट्रीक तार अज्ञात इसमांनी चोरून नेली होती. या विभाष कुमार भोलाप्रसाद महतो ( रा. ओमसाई कॉम्प्लेक्स, लक्ष्मी चौक, नारायणगांव, ता. जुन्नर, जिल्हा-पुणे) यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५८२ / २०२२ भादविक ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोनि श्री. अनिल कटके यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमणूक करुन कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले. आदेशाप्रमाणे स्थागुशाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अशा प्रकारचे गुन्हे करणा-या आरोपीची माहिती घेऊन शोध घेत असतांना पोनि श्री कटके यांना माहिती मिळाली की, गुन्हा हा श्रीकांत मनतोडे (रा. आश्वी, ता. संगमनेर) याने केला आहे. तो आता त्याचे राहते घरी आलेला आहे. आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थागुशा पथकाने आश्वी (ता. संगमनेर) येथे जाऊन आरोपी श्रीकांत मनतोडे हा त्याचे साथीदारा सोबत घरी झोपलेला आहे, अशी माहिती मिळाल्याने पथकाने पहाटे ४ वाचे सुमारास आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकला असता आरोपीस पोलीस पथकाची चाहुल लागताच अंधाराचा फायदा घेऊन ऊस शेतामधून पळून जाऊ लागले. पथकाने आरोपींचा पाठलाग करुन एकास ताब्यात घेतले. व इतर दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन ऊसाचे शेतामध्ये पळून गेले. त्यांचा ऊसाचे शेतामध्ये जाऊन शोध घेतला असता ते पोलिसांना मिळून आले नाहीत. ताब्यात घेतलेल्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव श्रीकांत ऊर्फ शिरक्या फकिरा मनतोडे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे गुन्हयाबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यास अधिक विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा त्याच्या पळून गेलेले साथीदार शरद ऊर्फ गोट्या हरीभाऊ पर्वत (रा. दाढ, ता. राहाता) व नरेंद्र ऊर्फ न-या पंढरीनाथ इंगळे (रा. आश्वी, ता. संगमनेर) यांच्यासोबत मिळून केल्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यात चोरी केलेली टॉवरची इलेक्ट्रीक तार बाबत विचारपूस करता त्याने ती अकोले नाका (संगमनेर) येथील फारुख सय्यद भंगार दुकानदार यास विक्री केली आहे, अशी माहिती दिली. माहितीचे अनुषंगाने पथकाने आरोपी श्रीकांत मनमोडे यास सोबत घेऊन संगमनेर येथील भंगाराचे दुकानामध्ये जाऊन दुकानात असलेल्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्यांचे नाव फारुख युसूफ सय्यद (वय २८, धंदा भंगार दुकान, रा. जुने जोर्वे रोड, ता. संगमनेर) असे असल्याचे सांगितले. पथकाने त्यास विश्वासात घेऊन गुन्ह्यातील चोरीस गेलेली टॉवरची इलेक्ट्रीक तार बाबत विचारपूस केली असता त्याने ४९० किलो वजनाची टॉवरची इलेक्ट्रीक तार आरोपीकडून भंगारामध्ये घेतल्याची कबुली दिली. इलेक्ट्रीक तार पथकासमक्ष काढून दिल्याने पोलिसांनी १ लाख ३ हजार ३९० रु. किंचे मुद्देमालासह दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पारनेर पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील कारवाई पारनेर पोलीस करीत आहे.आरोपी श्रीकांत ऊर्फ शिरक्या फकिरा मनतोडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुध्द आश्वी पोलीस ठाण्यात दरोडा तयारी, जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे चार गुन्हे दाखल आहेत. दि. १२ नोव्हेंबर २९ पासून १८ महिन्याकरीता अहमदनगर, पुणे व नाशिक अशा तीन जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे.<br>आरोपी फारुख युसूफ सय्यद हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर संगमनेर शहर व आश्वी पोलिस ठाण्यात जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे पाच गुन्हे दाखल आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल व संगमनर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा पोनि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि गणेश इंगळे, सफौ बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ मनोज गोसावी, देवेंद्र शेलार, सखाराम मोटे, पोना शंकर चौधरी, विजय ठोंबरे, सुरेश माळी, सचिन आडबल, रवि सोनटक्के, पोका रोहित येमुल व चापोहेकॉ उमाकांत गावडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

अहमदनगर प्रतिनिधी-पुण्यात  रिक्षा चोरून नगर शहरात  विक्रीसाठी आणलेल्या दोन रिक्षा कोतवाली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सोन्या ऊर्फ सुरज शिवाजी शिंदे (वय 28, रा. बुरूडगाव रस्ता, नगर) याला अटक करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांना खबर्‍याकडून माहिती मिळाली की, नालेगावातील  अमरधाम मागील बाजूस एकजण दोन चोरीच्या रिक्षा विक्री करण्याकरिता घेऊन आलेला आहे. कोतवाली पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे शुक्रवारी (ता. 23) सकाळी 8 वाजता छापा  टाकला. या ठिकाणी सोन्या ऊर्फ सुरज शिवाजी शिंदे हा दोन रिक्षासह मिळून आल्या. त्याच्याकडे रिक्षाचे कागदत्रविषयी विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने रिक्षावर असलेले क्रमांक खोटे असल्याबाबत खात्री झाली. रिक्षाचे चेसी नंबर व इंजिन नंबर यावरुन माहिती घेतली असता, पुणे जिल्ह्यातील  एमआयडीसी भोसरी पोलिस ठाणे  (पिंपरी चिंचवड) व चिखली पोलिस ठाणे हद्दीतून रिक्षा चोरीला गेल्या होत्या. साडे चार लाख रूपये किंमतीच्या दोन्ही रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी सुरज शिंदे यास पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हे शोध पथकातील शरद गायकवाड, योगेश भिंगारदिवे, दीपक रोहकले, अमोल गाडे, सुजय हिवाळे, सोमनाथ राउत, तान्हाजी पवार, हेमंत थोरात, अभय कदम, अतुल काजळे, सतीश भांड, प्रशांत बोरुडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

श्रीरामपूर प्रतिनिधी-भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा झेंडा’ उपक्रमाअंतर्गत शहरात सुमारे 20 हजार तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचे नियोजन करण्यासाठी सोमवार दि.25 जुलै 2022 रोजी सायंकाळी 5 वा. नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात तसेच देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी, या उद्देशाने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार दि.11 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये हर घर झेंडा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानात श्रीरामपूर शहरातील नागरिक, दुकानदार यांनी आपल्या घरावर, इमारतीवर, खाजगी आस्थापनेवर किंवा आपल्या संस्थेवर स्वखर्चाने भारतीय राष्ट्रध्वज उभारणे अपेक्षित आहे. या अभियानात श्रीरामपूर नगरपालिका क्षेत्रात नागरिक, दुकानदार, शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था आदींच्या सहभागातून अंदाजे 20 हजार तिरंगा ध्वज लावण्यात येणार आहेत. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर झेंडा’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सोमवार दि.25 जुलै 2022 रोजी सायंकाळी 5 वा. नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजित बैठकीस नागरिक, व्यापारी, सामाजिक व सेवाभावी संस्था पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासक तथा प्रांताधिकारी अनिल पवार, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-दोन मोटारसायकल व एक टँकरच्या विचित्र अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असुन पोलीसांनी टँकर ताब्यात घेतला आहे मयत हे नायगाव नाऊर येथील असुन नायगाव येथे शोकाकुल वातावरणात त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले   या बाबत मिळालेली माहीती अशी की नायगाव येथील बाळासाहेब जगन्नाथ गायकवाड  वय ४५वर्ष त्यांचा मुलगा अजीत बाळासाहेब गायकवाड वय २० वर्ष त्यांची मुलगी वय वर्ष १८ हे तिघे एम एच १७ ७१३१या बजाज सीटी १०० या मोटार सायकलवर बेलापुरकडे चालले होते .ते गायकवाड वस्ती नजीक असताना श्रीरामपुर कडे जाणाऱ्या एका मोटारसायकलचा डँश त्यांना लागला तसे ते तीघेही रस्त्यावर पडले अन दुर्दैवाने श्रीरामपुर हुन बेलापुरकडे मळीचा टँकर एमएच ४३यू ३३३६ हा भरधाव वेगाने चालला होता मोटारसायकलचा डँश लागल्यामुळे हे तिघेही रस्त्यावर फेकले गेले अन एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे भरधाव टँकरने तिघांनाही चिरडले दिपाली बाळासाहेब गायकवाड हीचा जागेवरच मृत्यू झाला तर बाळासाहेब गायकवाड यांच्या पोटावरुन टँकरचे चाक गेले होते त्यांना साखर कामगार दवाखान्यात हलविण्यात आले होते परंतु उपचारा पूर्वीच त्यांचा  मृत्यू झाला अजित  गायकवाड अत्यवस्थ असताना पुढील उपचारासाठी नगरला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला घटना घडली त्याच वेळेस बेलापुरचे पोलीस हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे हे तेथुन चालले होते त्यांनी तातडीने जखमींना दवाखान्यात हलविले या वेळी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती ती गर्दी हटविताना पोलीसांना मोठी कसरत करावी लागली अनेकानी अपघातात मदत करण्याऐवजी मोबाईल मध्ये फोटो काढण्यात धन्यता मानली  घटनेची माहीती नायगाव नाऊर परिसरात समजताच नायगाव परिसरावर शोककळा पसरली शोकाकुल वातावरणात तिघावरही अंत्यसंस्कार करण्यात आले या बाबत पोलीसांनी टँकर ताब्यात घेतला असुन एका मोटारसायकलचा पोलीस शोध घेत आहे

येवला {प्रतिनिधी} येवला येथील मिल्लत नगर भागातील रहिवाशी राजनीति समाचार वृत्तपत्र व न्यूज पोर्टल चे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते अबुजर उस्मान शेख यांची महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या येवला शहर संघटक पदी निवड करण्यात आली असून याबाबतचे नियुक्तीपत्र व ओळखपत्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी प्रदान केल्याची माहिती नाशिक जिल्हा अध्यक्ष उस्मान के. शेख यांनी दिली

या निवडीबद्दल अबुजर शेख यांचे पत्रकार संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, महासचिव शेख फकीर महंमद, प्रदेश उपाध्यक्ष  बी. के. सौदागर, युवा प्रदेश कार्याध्यक्ष संदीप पवार, प्रदेश उपाध्यक्ष नासिर खान( नाशिक), प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण (चांदवड), नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान भाई शेख, नाशिक जिल्हा सचिव वहाब खान, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव केदारे, येवला तालुका अध्यक्ष श्रीकांत गोसावी, चांदवड तालुका सचिव रवींद्र केदारे, चांदवड तालुका उपाध्यक्ष राहुल गायकवाड, पाटोदा सचिव दादा भाऊ मोरे, पाटोदा उपाध्यक्ष मुजम्मिल शेख, येवला शहराध्यक्ष हाजी शकील भाई शेख, येवला शहर सचिव कालिदास अनावडे, पत्रकार प्रकाश मालवकर, पत्रकार माधव सोळशे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विजय खरात, इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष अस्लम बिनसाद, अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष राज मोहम्मद शेख, उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष कासम भाई शेख, उत्तर जिल्हा उपाध्यक्ष एजाज भाई सय्यद, अहमदनगर जिल्हा महिला अध्यक्ष सौ. समीना रफिक शेख, महिला जिल्हा सदस्य सौ. कल्पना काळे, आदींनी त्यांचे अभिनंदन केले

श्रीरामपूर : शहरातील वार्ड नंबर २ परिसरात राहत असलेल्या. एका अल्पवयीन दलित मुलीचे ३ वर्षांपूर्वी शाळेत जातांना अपहरण करून. तिला धर्मांतरासाठी अल्पवयीन मुलीच्या इच्छे विरोधात शारिरीक मानसिक छळ करून, बळजबरीने तिच्याशी निकाह केला. यासंदर्भात १९ जुलै रोजी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या, इरफान कुरेशी उर्फ मुल्ला याच्या विरुद्ध. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शहरातील अहिल्यादेवी नगर परिसरात मुल्ला व त्याच्या गुन्हेगारी टोळीची प्रचंड दहशत असून. सदरचा गुन्हा दाखल झाल्या नंतर, पीडित अल्पवयीन मुलगी त्याच परिसरात राहत असल्याने. दाखल गुन्ह्यातील तडजोडसाठी, पीडित कुटुंबावर दाबाव आणण्याचा प्रयत्न मुल्ला टोळीकडून केला जात असल्याने. त्या मुलीला त्वरीत,अहिल्यादेवीनगर परिसरातून काढून बालसुधार गृहात पाठविण्यात यावे,पीडीत मुलीचे बळजबरीने धर्मांतरण करून. तिचे मुल्लापाजीशी लग्न लावणा-या मोलानाला दाखल गुन्ह्यात आरोपी करण्यात यावे. पीडीत अल्पवयीन  मुलगी गरोदर असून, तीची डिलेव्हरी पुर्व डि.एन.ए. चाचणी करण्यात यावी. या गुन्ह्यात मुल्लाला मदत करणा-या त्याच्या टोळीतील गुन्हेगार सदस्यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात यावे. या गुन्हेगारांचा कायम स्वरूपी बंदोबस्त होण्यासाठी, मुल्ला व त्याच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी. या करिता हिंदू रक्षा कृती समितीच्या वतीने, शहर पोलीस ठाण्यात शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून निवेदन दिले. सदरचे आंदोलन भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते,मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे,माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,,विश्व हिंदू परिषदेचे डॉक्टर दिलीप शिरसाठ, शशिकांत कडूसकर, शिवप्रतिष्ठानचे किसन ताकटे,श्रीराम सेवा संघाचे कुणाल करंडे ,अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीचे प्रवीण फरगडे,देविदास चव्हाण,संजय यादव सोमनाथ कदम , विजय लांडे, सिद्धार्थ साळवे,महेश विश्वकर्मा आदींसह हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

बेलापुर  (प्रतिनिधी) - लाभार्थी रेशनकार्ड धारकांना लाभाबरोबरच कामाची गुणवत्ता देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली आयएसओ मानांकनासाठी सर्वांनी सहकार्य करावे. यातून आपल्या कामाच्या गुणवत्तेत सुधार होवून लाभार्थींना ही याचा लाभ होणार आहे. शासनाच्या प्राधान्य सुची कार्यक्रमवरील हा एक प्रमुख कार्यक्रम असल्याने लवकरच सर्व स्वस्त धान्य दुकानरांकडून होत असलेल्या सहकार्यातून जिल्ह्याची सार्वजनीक वितरण व्यावस्था आयएसओ मानांकनास पात्र ठरणार असल्याचा विश्वास जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी व्यक्त केला.

अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडीत जवाहरलाल नेहरू सभागृह येथे जिल्ह्यातील नायब तहसीलदार पुरवठा निरीक्षक गोदामपाल धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी तालुकाध्यक्ष यांची आयएसओ मानांकन बाबतच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम, जिल्हा पुरवठा निरीक्षण अधिकारी अभिजीत वांढेकर, राजेंद्र राऊत, दत्तात्रय भावले, दिपाली तांबे  व कार्यालयीन सहकारी मनिषा सचदेव आदि व्यासपिठावर उपस्थीत होते. 

सार्वजनिक वितरण प्रणालीस आयएसओ मानांकनाचे काम तीन स्तरावर होत आहे, तालुकास्तरीय पुरवठा विभाग, तालुकास्तरीय गोदाम व स्वस्त धान्य दुकान अशा तीन स्तरावर काम सुरू आहे. दुकानाची इमारत पक्के बांधकाम असणे आवश्यक आहे. या माध्यमातून जिल्ह्यात सारखेपणा व आकर्षकपणा यावा या करीता जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांना एकच रंग असणार आहे, सर्वत्र एक सारख्या रंगाचे व आकाराचे फलक,तसेच  सर्व धान्य दुकानदारांना ड्रेस कोड, तसेच ओळखपत्र असणार आहे, अद्यावत नोंद वह्या व विविध प्रकारचे रजीष्टर, पारदर्शक नमुना बरणी, परीसर व दुुकानातील स्वच्छता, वृक्षलागवड किंवा कुंड्यातील झाडे लावून परीसर सुशोभिकरण, लाभार्थींसाठी बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, उंदीर व घुशींसाठी पिंजरा किंवा इतर साधन व पेस्ट कंट्रोल करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर आग प्रतिबंधक यंत्र, स्मोक प्रतिबंधक यंत्र आदि सुविधा उपलब्ध करायच्या आहेत.

या आयएसओ मानांकरनाकरीता तालुकास्तरावर महसुल नायब तहसिलदार यांचे मार्गदर्शनाखाली अव्वल कारकुन काम करणार आहे त्यासाठी तालुकास्तरावर धान्य दुकानदारांतून मंडल निहाय समन्वयक नेमुन कामाच्या प्रगतीचा अहवाल जिल्हा पुरवठा कार्यालयास सादर करण्याबरोबरच कामाची पुर्तता करून घ्यायची आहेे. यासाठी दुकानदारांनी अज आपल्या दुकानच्या अवस्थेचा फोटो काढून ठेवायचा आहे व सुचनेनुसार केलेल्या बदलाचा फोटो काढायचा आहे.  

या बरोबरच लाभार्थींना डीजीटल सेवा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. त्यासाठी रोखीच्या व्यावहाराऐवजी स्कॅनर व स्वायप मशीनची सुविधा उपलब्ध करायची आहे. विविध प्रकारचे फलक लावताना त्यावर शिल्लकसाठी, प्रमाण, दर, पात्रलाभार्थींची संख्या, दक्षता कमीटीसदस्यांच्या नावाचा फलक, लाचलुुचपत कार्यालयाचा संपर्क क्रमांक, तपासणी अधिकारी यांचे नाव संपर्क क्रमांक, आरोग्य तपासणी प्रमाणपत्र, अन्न व औषध परवाना वजनमापांचे प्रमाणपत्र, शॉपअ‍ॅक्ट प्रमाणपत्र आदिं अद्यावत करावयाचे आहेत.शेवटच्या टप्प्यात सि सि टी व्ही स्मोक डिटेक्टर अग्निशामक यंत्रणा ही कामे करावयाची आहेत

जिल्ह्यातील 1884 दुकानात एक सारखे पण येण्यासाठी जिल्ह्यातील सर्व दुकांनाना एकच रंग असावा, एक सारखे फलक, एकाच साईजचे व एकाच रंगाचे फलक व एक सारखा ड्रेसकोड यात एक सारखेपणा असल्यास राज्यात आपल्या जिल्ह्याची स्वतंत्र ओळख निर्माण होईल अशी सुचना जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी केली. त्यास जिल्ह्यातील सर्व दुकानदार प्रतिनिधींनी दुजोरा दिला. 

या बैठकीस स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, जिल्हा सचीव रज्जाक पठाण, जिल्हा उपाध्यक्ष बजरंग दरंदले, चंद्रकांत झुरंगे, सुरेश उभेदळ, शिवाजीराव मोहीते, कैलास बोरावके, बाबा कराड, सुखदेव खताळ, प्रकाश भोसले, बाळासाहेब दिघे, विश्वासराव जाधव, सतिष हिरडे, गोवर्धन वाघस्कर, आत्माराम कुंडकर, श्रीकांत म्हस्के, गुलाबराव पवार, राजेंद्र शेळके, श्री.आरगडे आदिंसह जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनांचे पदाधिकारी, सदस्य व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थीत होते. 

या बैठकीदरम्यान जिल्ह्यातील बहुतांशी दुकानांना जुन महिण्यात उशीरानेे मोफतचे धान्य उपलब्ध झाले परंतू दि.2जुलैपासून ते धान्य पॉझ मशीनवर दिसत नसल्याने सर्वच दुकानात धान्यसाठा दुकानात पडून आहे, कार्डधारक दुकानात चकरा मारत आहेत, जिल्ह्यातील वितरण बंद आहे. काही दुकानात काही टक्केवारीत वितरण झाले परंतू उर्वरीत वितरण थांबल्याने त्यास मुदतवाढ मिळण्याची आवश्यकता असल्याची मागणी जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी केली.

आपली मागणी रास्त आहे परंतू पहील्या व दुसर्‍या टप्प्यातील धान्य वाहतुकीत विस्कळीतपणा आल्यामुळे या अडचणी येत आहेत. आम्ही मुदत वाढीची मागणी केली आहे परंतू या वितरणास मुदतवाढ येण्याची शक्यता कमी असल्याने दुकानदारांनी आपल्या दुकानात जो धान्यसाठा शिल्लक आहे त्यातून  वितरण सुरु करावे, मागील वितरणास मुदत वाढ आल्यानंतर ते ही वितरण करता येईल परंतू सध्या आहे ते वितरण सुरू करा, दुकाने बंद ठेवू नका अशी सुचना यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिल्या.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- मा .जि प सदस्य शरद नवले यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा परिषद निधीतुन  खडीकरण केलेल्या दिघी रोड रस्त्याचा लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला .                                   बेलापुर बुा येथील दिघी रस्स्त्याच्या कामाबाबत परिसरातील नागरीकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारीची दखल घेवुन मा.जि प सदस्य शरद नवले यांनी या रस्त्याच्या खडीकरणासाठी तीन लाख रुपयांचा निधी मंजुर करुन त्या रस्त्याच्या खडीकरणाचे काम पुर्ण केले आज त्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला त्या वेळी माजी जि प सदस्य माजी  जिल्हा नियोजन समीती सदस्य  शरद नवले,सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक पा. खंडागळे, अशोक कारखान्याचे माजी व्हा चेअरमन जालींदर कुऱ्हे,  ग्रा.प सदस्य मुश्ताक शेख,रमेश आमोलिक,वैभव कुर्‍हे,एम पी सोसा संचालक प्रभाकर कुर्‍हे,प्रकाश मेहेत्रे ,दत्तात्रय सोनवणे ,वृध्देश्वर कुर्‍हे ,अर्जुन कुर्‍हे,   मच्छिंद्र कुर्‍हे,शांतवन आमोलिक ,नामदेव मेहेत्रे ,सोहम लगे ,बाळासाहेब कुर्‍हे ,  विशाल पवार, अन्तोन आमोलिक, शाम सोनवणे ,अनिल कुर्‍हे ,

आहेर पाव्हणे ,मनोज मेहेत्रे  ,मल्हारी कुर्‍हे,  गणेश कुर्‍हे ,शुभम कुर्‍हे ,साहिल कुर्‍हे ,आदिसह  परिसरातील नागरीक उपस्थित होते.

श्रीरामपूर प्रतिनिधी-आज दि. १५/७/२०२२ रोजी सकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहिती नुसार विभागाने गणेशनगर व नांदूर शिवार ता. राहाता जि.अहमदनगर येथे संयुक्त मोहीम राबवून हातभट्टी गावठी दारू बनवण्याची चार अड्डे उद्धवस्त कारवाईत एकूण ०४ गुन्हे नोंदविण्यात आले असून हातभट्टी तयार करण्याचे ६२५५ लिटर कच्चे रसायन नाश केले तयार हातभट्टी गावठी दारू ९० लिटर व इतर भट्टीचे साहित्त्य असा एकूण १,६५,५००/- किंमतीचा मुद्देमाल नाश करण्यात आला आहे. सदर कारवाई मध्ये अज्ञात इसमां विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हे नोंद करून कारवाई करण्यात आली आहे.

सदरील कारवाई श्री गणेश पाटील अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर,यांचे मार्गदर्शनाखाली श्री गोपाल चांदेकर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र २ श्रीरामपूर,व श्री. संजय कोल्हे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कोपरगाव विभाग यांनी केली. सदर कारवाईत दुय्यम निरीक्षक श्री. व्ही. एम. आभाळे, श्री. धवल गोलेकर सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री.के.के.शेख, श्री. दिगंबर ठुबे महिला जवान श्रीमती. स्वाती फटांगरे, श्रीमती. वर्षा जाधव वाहन चालक श्री.एन.एम. शेख दफेदार श्री. विजु पाटोळे इत्यादी सहभागी झाले होते .

बेलापूर प्रतिनिधी- आपले कोण परके कोण यात तफावत न करता प्रामाणिक पणे न्यायाची बाजू मांडणाऱ्या महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघ गेल्या तीस वर्षापासून कार्य करीत असून पत्रकार संघाचे अध्यक्ष बरकत अली यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रभर पत्रकार संघाचा विस्तार झाला असून जनतेत पत्रकार संघाची चांगली छबी निर्माण झाली आहे असे प्रतिपादन बेलापूर येथील जि. प. सदस्य शरद राव नवले पाटील यांनी केले

महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या बेलापूर शाखेचे वर्धापन दिन व कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दिनांक 14/7/2022 रोजी दुपारी तीन वाजता बेलापूर येथील नगर रोड लगत आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य शरद राव नवले पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली पत्रकार संघाचे प्रदेश सचिव अभयजी बाफना, बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते मोहसिन सय्यद, पत्रकार दायमा, पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद, इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, युवा प्रदेश कार्याध्यक्ष संदीप पवार, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राज मोहम्मद शेख, उत्तर नगर जिल्हा कार्याध्यक्ष कासम भाई शेख, उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष एजाज सय्यद, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुभाष राव गायकवाड, चांदवड तालुकाध्यक्ष सुखदेव केदारे, येवला तालुका अध्यक्ष सूर्यकांत गोसावी, सिन्नर तालुका अध्यक्ष मधुकर मुठाळ, राहता तालुका अध्यक्ष विजय खरात, राहता तालुका सचिव राहुल कोळगे, पाटोदा कार्याध्यक्ष दादा भाऊ मोरे, पाटोदा उपाध्यक्ष मुजम्मिल शेख, पुणतांबा शहराध्यक्ष मयूर मलठणकर, श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाब भाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक पत्रकार कासम शेख यांनी केले यावेळी बेलापूर शाखा कार्यालयाची फित कापून शरद नवले पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमात आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा पुष्पहार देऊन बेलापूर शाखा पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला 


आपल्या अध्यक्षीय भाषणात शरद  नवले पाटील पुढे म्हणाले की एक वर्षापूर्वी बेलापूर गावात पत्रकार संघाची स्थापना करण्यात आलि असून येथील नवोदित पत्रकारांच्या खांद्यावर कामाची जबाबदारी सोपविण्यात आली होती त्यानुसार या शाखेच्या पत्रकारांनी वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करून पत्रकार संघाचे नावलौकिक वाढविले आहे त्यांनी गावातील बातम्यांचा पाठपुरावा करूनच बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत याच बरोबर कोरोना रुग्णांना मदत करणाऱ्या गावातील नेते, वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन व सामाजिक कार्यकर्त्यांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित केले आहे, पोलिस प्रशासनाच्या उत्कृष्ट कार्यप्रणाली बद्दल येथील अधिकारी व पोलिसांचा सत्कार केला, दिवाळीच्या काळात जाती एकता दृढ होण्याच्या उद्देशाने राम गड येथे फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते अशा विविध क्षेत्रामध्ये पत्रकारांनी उत्कृष्ट असे काम केले आहे त्यांच्या कामाचे व विशेष म्हणजे पत्रकार संघाचे आपण जि. प. सदस्य या नात्याने कौतुक करीत आहोत असे ते म्हणाले


आपल्या प्रमुख भाषणात पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली म्हणाले की आपण गेल्या तीस वर्षापासून पत्रकार संघाच्या माध्यमातून नवोदित पत्रकार घडविण्याचे व त्यांना पत्रकारितेचे प्रशिक्षण देण्याचे कार्य केले असून याच उद्देशाने बेलापूर येथील पत्रकारांना पत्रकार संघ बरोबर काम करण्याची संधी प्राप्त करून दिली ती उपयोगी ठरली असून आज या ठिकाणी बेलापूर शाखेचे वर्धापन दिन व शाखा कार्यालयाचे उद्घाटन करताना आपल्याला स्वाभिमान वाटत आहे पत्रकारांनी कोणतीही बातमी प्रसिद्ध करण्याअगोदर बातमीची सत्यता पडताळून पहावी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर पत्रकारावर येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे काम पत्रकार संघाने आजवर केले आहे यापुढेही करणार आहे त्यामुळे पत्रकारांनी निर्भीडपणे व प्रामाणिकपणे काम करीत राहावे असे शेख यांनी सांगितले पत्रकार संघाचा तीस वर्षाचा प्रवास पूर्ण झाला असल्याने येत्या ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात आपण पत्रकार संघाचा रौप्य महोत्सव साजरा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले


यावेळी अभयजी बाफना, सुखदेव केदारे, मधुकर मुठाळ, गुलाब भाई शेख, एजाज सय्यद, मुसा भाई सय्यद, सुभाष राव गायकवाड आदींनी शुभेच्छा पर भाषणे केली कार्यक्रमास  राहुरी येथील पत्रकार गणेश पवार, बेलापूर शाखा उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद, सार्थक साळुंके, इमरान शेख, अकबर भाई शेख यांच्यासमवेत इतर पत्रकार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे आभार एजाज सय्यद यांनी मानले

बेलापुर (प्रतिनिधी ) - वडीलांचे अंत्यसंस्कार मुलानेच करण्याची परंपरा समाजात प्रचलीत आहे मुलगा नसेल तर पुतण्या सर्व विधी करतो परंतु श्रीरामपुरात एका मुलीने सर्व रुढी परंपराचे जोखड बाजुला सारुन आपल्या वडीलाच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी पार पाडले                  याबाबतचे वृत्त असे की, श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावालगत असलेल्या नेहरूवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार सुभाष साळूंके हे गेल्या काही वर्षापासून श्रीरामपूर शहरातील वार्ड नं.7 मधील रामचंद्रनगर येथे राहतात. त्यांना एक मुलगी आहे. , तीने उच्च शिक्षण घेतले तसे उच्च विचारही अंगीकारले तिचे वडील सुभाष साळूंके यांचे अचानक निधन झाले त्यांना एकच अपत्य ते ही मुलगी असल्यामुळे सर्व विधी कोण करणार? हा प्रश्न उभा राहीला अन वडीलांच्या अचानक जाण्याचे अपरिमीत दुःख असतानाही तिने सर्व विधी करण्याचा धाडसी निर्णय घेतला  माझ्या पित्याचे अग्निदहन , शिकाळी मीच धरणार, पाणी मीच पाजणार सर्व विधी मलाच करु द्या मीच त्यांची मुलगी अन मीच त्यांचा मुलगा असे सर्वांना सांगितले अन सर्व विधी स्वतःच केले आजही समाजात  मुलगा व मुलगी असा भेदभाव केला जातो अशा लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचा प्रयत्न रुपाली हीने केला

शिर्डी ( प्रतिनिधी)सर्वच न्यायालयात दाखल होणाऱ्या प्रकरणांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे न्यायदानास विलंब होत आहे.अशा परिस्थितीत, लोक न्यायालयामध्ये वादपूर्व , प्रलंबित खटले निकाली काढणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळेनागरिकांचा वेळ, पैसा, श्रम या तिन्ही बाबींची बचत होत असते. न्यायालयीन खटला लढवण्यासाठी लागणारा पैसाव श्रम या दोघांचाही वापर विधायक कार्यासाठी करण्याची संधी पक्षकारांना मिळते. म्हणूनचजिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. सुधाकर यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली व अहमदनगर जिल्हा न्यायालयातील दोन्हीवकील संघाच्या सहकार्याने आणि अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने मागील तीन लोक अदालतमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावलेला आहे.त्यामुळे, अहमदनगर या ठिकाणी झालेल्या लोक अदालतीपैकी मागीलतीन लोक अदालत ह्या संस्मरणीयठरलेल्या आहेत. या यशाचे शिल्पकारहे माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सुधाकर व्ही.यार्लगड्डाहे असून अहमदनगर जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, विधीज्ञ ,पक्षकार व कर्मचाऱ्यांचे ह्या यशामध्ये मोठे योगदान आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हा न्यायालय अहमदनगर व सर्व तालुका न्यायालयामध्ये लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या लोक अदालतीमध्ये तडजोड योग्य प्रकरणे, अर्थात चोरीची प्रकरणे, किरकोळ मारहाणीची प्रकरणे, बँकेची व वित्तीयसंस्थेशी संलग्न प्रकरणे, धनादेशाचीम्हणजे चेकची प्रकरणे, यांचा समावेशहोतो. महानगरपालिका, नगरपंचायत ग्रामपंचायत यांच्याकडील मालमत्ता कर,पाणीपट्टी, घरपट्टी आणि महावितरण यांचे कडील प्रलंबित विज देयके, अशा स्वरूपाची प्रकरणे, लोक अदालतमध्ये तडजोडीने निकाली काढण्याची संधी उपलब्ध होणार आहे.. बँकेकडील व पतसंस्थेकडील प्रकरणांमध्ये व्याजदरात सूट अथवा व्याजदरात माफी मिळून काही प्रमाणात फायदा होतो. पर्यायाने प्रलंबित व वाद पूर्व खटल्यांची संख्याकमी होऊन न्यायव्यवस्थेवरील ताण कमी होतो. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून दिनांक १३ ऑगस्ट २२रोजी होणाऱ्या लोक अदालत मध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून फायदा

घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सुधाकर यार्लगड्डा व जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या नवनियुक्त सचिव

भाग्यश्री पाटील यांनी केलेले आहे.चौकशीसाठी जिल्हा विधी सेवाप्राधिकरण या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

श्रीरामपूर : राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय जाहीर केला आहे.भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ के व २४३ झेड ए अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पर्यवेक्षण, संचालन व नियंत्रण याची सर्व जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची असल्याने. राज्यातील ९२ नगर परिषदा व ४ नगरपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुकांचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम -२०२२ जाहीर केलाय. यामध्ये  पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती व बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून. ज्यात श्रीरामपूर नगरपालिकाच्या ३४ जागेंकरिता  गुरुवार दिनांक १८ ऑगस्ट २०२२ रोजी मतदान होणार असून.  १९ ऑगस्ट २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. अचानकपणे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या जाहीर केल्याने, इच्छूक उमेदवारांना तैयारी करिता ३८ दिवस मिळणार असल्याने, सर्वच इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तैयारीला लागले असून. प्रत्येक चौका चौकात चर्चेला उधाण आले आहे. या निवडणुकी संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने अहमदनगर सह सर्व १६ जिल्हाधिका-यांना याबाबत लेखी सूचना दिल्या आहेत.

अहमदनगर प्रतिनिधी-जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार, संघटीत गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडित काढण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून प्रयत्न केले जात आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून गेल्या दीड वर्षात सुमारे 120 सराईत गुन्हेगारांना हद्दपार केले आहे. संघटीत गुन्हे करणार्‍या टोळ्यांतील गुन्हेगार, वैयक्तीक गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार. तसेच गुन्ह्यात शिक्षा भोगून आल्यानंतर गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले असल्याचे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.सप्टेंबर 2020 मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून मनोज पाटील यांनी पदभार हाती घेतल्या. यानंतर ऑक्टोबरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्वीकारला. अधीक्षक पाटील व निरीक्षक कटके यांनी गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यातील गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सराईत गुन्हेगारांची पोलीस

दप्तरी नोंद असावी यासाठी मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे. यामध्ये सराईत गुन्हेगारांची माहिती भरलेली असते.मालाविरोधी व शरिराविरोधी दोन पेक्षा जास्त गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांसाठी ‘टू-प्लस’ योजना अधीक्षक पाटील यांनी आणली. दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या आरोपींचा यामध्ये समावेश केला जातो. खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, वाळूतस्करी, चोरी, विनयभंग, शिवीगाळ, मारहाण असे गंभीर गुन्हे संघटीतपणे करणार्‍या सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात सक्रीय आहेत. या टोळ्यांविरोधात हद्दपार, मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा धडाका जिल्हा पोलिसांनी लावला आहे.गेल्या दीड वर्षामध्ये अधीक्षक पाटील, निरीक्षक कटके यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये 16 टोळ्यांतील 79 सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा 56 अन्वये 39 सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. कोणत्याही गुन्ह्यामध्ये दोन वर्ष शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा गुन्हे केल्यास त्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा 57 अन्वये हद्दपार करण्यात येते.गेल्या दीड वर्षामध्ये जिल्ह्यातील अशा दोन गुन्हेगारांना हद्दपार केले आहे. वारंवार गुन्हे करून त्या परिसरात आपली दहशत निर्माण करू पाहणार्‍या सराईत गुन्हेगार, टोळ्यांना पोलीस अधीक्षक पाटील यांनी वठणीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

श्रीरामपूर प्रतिनिधी-लोणी येथून गायी विकून त्याचे पैसे सोबत घेऊन जात असलेल्या एका जणास रस्त्यात अडवून त्यास मारहाण करून त्याच्याकडून रोख रक्कम 70 हजार रुपये व मोबाईल हिसकावून घेऊन जाणार्‍या पाच जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीस काल श्रीरामपूर शहर पोलीस पथकाने जेरबंद केले. आरोपींकडून मोबाईल, दोन मोटारसायकल, एक चाकू व कंबरेचा बेल्ट असा एकुण 63,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील बालम हसन पठाण यांनी लोणी येथील जनावरांच्या बाजारात गायी विकल्या. त्यातून मिळालेले पैसे सोबत घेऊन ते बाभळेश्वर, श्रीरामपूर, अशोकनगर मार्गे कारेगाव येथे जात असताना श्रीरामपूर-नेवासा रोडवरील ओव्हर ब्रिजच्या दक्षिणेकडील महामंडळाचे मोकळ्या शेतातून जाणारे कच्च्या रोडवरून जात असताना फिर्यादी यांच्या मागून अचानक दोन मोटारसायकल वरील इसमांनी येऊन फिर्यादी तसेच त्याच्यासोबत असलेले दोघेजण यांना अडवून आमच्या गाडीला कट का मारला असे म्हणून कंबरेच्या बेल्टने मारहाण केली व त्यांच्या अंगावर मिरची पावडर टाकून शिवीगाळ करून फिर्यादी यांच्या खिशातील 70 हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल बळजबरीने चोरून नेला.या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नं. 468/2022 प्रमाणे भादंवि कलम 395,394,34 प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यासंदर्भात पोलीस निरीक्षक संजय सानप यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सापळा रचून संदेश नवनाथ मिरपगार (वय 22) रा. लोहगाव, प्रवरानगर ता. राहाता, आवेज फिरोज शेख (वय 21) रा. बर्तनगल्ली, म्हसोबा नगर, बाभळेश्वर, ता. राहाता, मनोज ज्ञानदेव भालेराव (वय 22), अफजल अब्दुल मुलानी (वय 25), असिफ अनिस सय्यद (वय 21), या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सदर आरोपीकडून फिर्यादी यांचा बळजबरीने काढून घेतलेला विवो कंपनीचा मोबाईल, दोन मोटारसायकल, एक चाकू व कंबरेचा बेल्ट असा एकूण 63,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अहमदनगर मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर स्वाती भोर, व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक संजय सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक सुरेखा देवरे, पोलीस नाईक, रघुवीर कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस कॉन्स्टेबल पंकज गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल रमीज आत्तार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश गावडे, पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे, पोलीस कॉन्स्टेबल कातखडे, पोलीस कॉन्स्टेबल अंबादास आंधळे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल गौरव दुर्गुळे, पोलीस नाईक फुरकान शेख यांचे पथकाने केली आहे.

शेवगाव प्रतिनिधी-जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाने कोयत्याने वार करत दुसर्‍या गटातील चौघांना गंभीर जखमी केले. तर या घटनेतील आरोपीला पोलीस पकडून घेऊन जात असताना पहिल्या गटातील एकाने हल्ला करत कोयत्याचा वार केल्याने पोलीस कर्मचार्‍याचे बोट तुटल्याची घटना कोळगाव (ता. शेवगाव) येथे घडली. पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेऊन खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे गावामध्ये तणावाचे वातावरण तयार झाले आहे.हा प्रकार रविवार (दि.3) रात्री उशीरा घडली. याप्रकरणी अण्णा तुकाराम खंडागळे (वय 55, रा. कोळगाव) याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिसाचे बोट छाटून जखमी केल्याप्रकरणी अर्जुन विठ्ठल खंडागळे (वय 48) व ज्ञानेश्वर रामा खंडागळे (वय 20) दोघेही रा. कोळगाव यांच्या विरोधात जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून जबर जखमी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. जखमी हवालदार संदीप उबाळे यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादला तर इतरांना नगर येथे हलविण्यात आले आहे.याबाबत लक्ष्मी थोरात यांच्या फिर्यादीत म्हटले आहे, जुन्या भांडणाच्या कारणावरून अण्णा खंडागळे याने वडील भगवान खंडागळे, आई पार्वती खंडागळे यांना तसेच नातेवाईक सुनील हिवाळे, मारिया हिवाळे व फिर्यादीस शिवीगाळ करून हातात कोयता घेऊन येऊन जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून चौघांना गंभीर जखमी केले. या अगोदरही अण्णा खंडागळे याने अनेकवेळा आई वडिलांना मारहाण करून दहशत असल्याचे म्हटले आहे. थोरात यांच्या फिर्यादीवरून अण्णा खंडागळे याच्या विरुध्द खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा करीत आहेत. जखमींना उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.तर हवालदार परशुराम नाकाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, कोळगाव येथे दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना मिळाली. त्यांनी त्वरीत सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. मी व सहकारी संदिप उबाळे दोघे जण आरोपी अण्णा खंडागळे यास पकडून गाडीकडे घेवून जात होतो. त्याच वेळेस अर्जुन विठ्ठल खंडागळे याने त्याला सोडा मी त्याला जीवे ठार मारणार आहे, असे म्हणत कोयत्याने केलेला. हा वार हवालदार उबाळे यांच्या हाताच्या बोटावर झाला. यामध्ये त्यांचे एक बोट तुटले असून ते गंभीर जखमी झाले.पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी आरोपी अर्जुन खंडागळे, ज्ञानेश्वर खंडागळे (वय-20) व अण्णा खंडागळे यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. नाकाडे यांच्या फिर्यादीवरुन अर्जुन खंडागळे व ज्ञानेश्वर खंडागळे यांच्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून जबर जखमी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके हे करीत आहेत.

श्रीरामपूर प्रतिनिधी-गाडीचा कट मारल्याच्या कारणावरून चौघा तरूणांवर धारदार चॉपरने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. शहरातील म्हाडा कॉलनी येथे रात्री 9.40 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.या घटनेत जखमी झालेल्या अली जाकीर पठाण (वय 17, धंदा कार डेंटींग-पेन्टींग, रा. संजयनगर, वार्ड. नं. 2, श्रीरामपूर) या तरुणाने शहर पोलिसात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की, मी व मित्र अदनान शेख व जावेद शाह असे एका गाडीवरून कामावरून घराकडे जात असताना म्हाडा कॉलनी येथे सुरज यादव याने गाडीला कट मारला तेव्हा मी म्हणालो की, गाडी दिसत नाही का? याचा राग आल्याने त्याने मला व मित्रांना शिवीगाळ करत आरोपींनी धारदार चॉपरने वार केले.डोक्यावरचा वार हुकवला तेव्हा डाव्या खांद्याला वार लागला. जावेद शाह, अदनान शेख यांनाही चॉपरने वार करून जखमी केले. यावेळी इतरांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लोखंडी रॉड, बेल्टने मारहाण केली. यावेळी लोक जमले असता आरोपींनी चॉपरने पाठीवर वार करत तन्वीर शेख यालाही मारहाण केली व दुचाकी गाड्यांची तोडफोड करून नुकसान केले.या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांत सुरज यादव, गणेश गिते, सुजीत काळे, सनी काळे, शुभम यादव व इतर 8 जणांविरूद्ध भादंवि कलम 307, 143, 147, 148, 149, 324, 504, 506, 427, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम 7 प्रमाणे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील एका आरोपीस पोलिसांनी अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक़ विठ्ठल पाटील हे इतर आरोपींचा शोध घेत आहेत. पोलीस उपअधीक्षक़ संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी भेट दिली.

नगर प्रतिनिधी-अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दि.०४/०७/२०२२ रोजी यशस्वी झाला आहे.भूसंपादन कार्यालयातील मंगेश ढुमणे (लोकसेवक) या कर्मचाऱ्याला चार हजारांची  लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.तक्रारदाराने आईच्या नावे घेतलेल्या जमिनीच्या अकृषिक परवानगी करता ना हरकत प्रमाणपत्रासाठी भुसंपादन विभागात प्रकरण दाखल केले होते.सदरचे ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर आरोपी लोकसेवक मंगेश ढुमणे याने तीन हजारांची मागणी केली होती याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.दि.१/०७/२०२२ रोजी केलेल्या लाच मागणीच्या पडताळणी दरम्यान आरोपी  ढुमणे याने पंचासमक्ष दोन्ही कामांचे एकत्रित चार हजार मागितले होते.सोमवार दि.०४/०७/२०२२ रोजी चार हजार रुपये घेताना आरोपी ढुमणेला रंगेहात पकडण्यात आले.सदरची कारवाई लाचलुुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर,पोलिस निरीक्षक श्री.शरद गोर्डे,गहिनीनाथ गमे,पोना/रमेश चौधरी,विजय गंगुल,पोलिस अंमलदार/ रविंद्र निमसे,मपोना/राधा खेमनर,संध्या म्हस्के,चालक पोलिस हवालदार/हरून शेख,राहुल डोळसे यांनी केली

श्रीरामपूर प्रतिनिधी-शहरातील सरस्वती कॉलनी परिसरात एका मालवाहू टेम्पोत 42 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सचिन विश्वास सराफ (वय 42) असे या तरुणाचे नाव आहे. शहरातील वार्ड नं. 7 मधील दळवीवस्ती परिसरात मालवाहू टेम्पोच्या केबीनमध्ये सचिन मृतावस्थेत आढळून आला.नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी साखर कामगार रूग्णालयात नेले असता उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांनी शहर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यावरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक़ संजय सानप, पोलीस नाईक अडांगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. सचिन सराफ यानचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत पोलीस नाईक अडांगळे अधिक तपास करीत आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, तीन मुली असा परिवार आहे.

अहमदनगर प्रतिनिधी - प्रस्तुत बातमीची हकीकत अशि की दि.०१/०७/२०२२ रोजी स्थानीक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे चैन स्नैकिंग गुन्हयातील आरोपीकडे तपास करत असताना पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की नगर औरंगाबाद रोडवरील जेऊर टोल नाका येथे दोन इसम हस्तीदंत विक्री करणेसाठी येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके यांनी सदर माहिती श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक आमदनगर यांना कळवली.मा.श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक यांनी पोलीस निरीक्षक श्री. अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले. नमूद आदेशान्वये पोनि/अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/गणेश इंगळे,पोसई/सोपान गोरे,सफौ/राजेंद्र वाघ,पोहेकाॅ/बापूसाहेब फोलाणे,देवेंद्र शेलार,पोना/ भीमराज खर्से,सुरेश माळी,पोना/शंकर चौधरी,रवि सोनटक्के,पोकॉ/सागर ससाणे व मच्छिंद्र बर्डे लागलीच असे पथक तयार करून कारवाई करणे बाबत सूचना व मार्गदर्शन करून रवाना केले.सदर सूचनाप्रमाणे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे खाजगी वाहनाने नगर औरंगाबाद रोडवरील जेऊर टोल नाका येथे वेशांतर करून सापळा लावून थांबले असताना थोड्याच वेळात दोन इसम टोल नाका परिसरात संशयितरित्या फिरताना दिसून आले त्यापैकी एकाच्या पाठीवर मिल्ट्री रंगाची सॅक होती.सॅक मधून काहीतरी भाग वर आलेला व त्यास रुमाल बांधलेला होता थोडा वेळ थांबल्यानंतर संशयित इसमा जवळ एक ग्रे रंगाची आय-२० कार येऊन थांबली व कार मधून चार इसम खाली उतरले संशयित दोन्ही इसम कार मधून आलेल्या इसमांना सॅक मधून एक मोठा हस्तिदंत सारखी वस्तू दाखवून बोलत असताना हस्तिदंत विक्री करण्यासाठी आलेले इसम हेच आहेत अशी पोलीस पथकाची खात्री झाल्याने त्यांनी संशयित इसमांवर झडप घालून शिताफीने ताब्यात घेतले.त्यांची अंग झडती घेतली असता त्यांचे ताब्यात हस्थिदंत सारखी वस्तू मिळून आली.संशयित इसमांना त्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी हस्तिदंत खरे असून ते विक्री करण्यासाठी आलो अशी कबुली दिल्याने त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) व्यंकटेश दुराईस्वामी वय ४० वर्ष रा.हल्ली, वाकडी फाटा दरेवाडी तालुका जिल्हा अहमदनगर २) महेश बाळासाहेब काटे वय ३० रा. आखेगाव तालुका शेवगाव असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे हस्तिदंत बाबत विचारपूस करता त्यांनी शेवगाव येथील महेश मरकड व त्याचे इतर साथीदारांना काळया बाजारात हस्थिदंत विक्री करण्यासाठी आलो असे सांगितले.हस्थिदंत कुठून आणले आहेत याबाबत तपास चालू आहे.सदर आय-२० कार मधून आलेल्या व ताब्यात घेतलेले इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) महेश भगवान मरकड वय २६ वर्ष रा. गहिलेवस्ती शेवगाव २) सचिन रमेश पन्हाळे वय ३३ वर्ष राहणार आखेगाव तालुका शेवगाव ३) निशांत उमेश पन्हाळे वय २५ वर्ष रा. भगतसिंग चौक शेवगाव ४) संकेत परशुराम नजन वय २३ वर्ष रा.पवार वस्ती शेवगाव असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी व्यंकटेश दुराईस्वामी व महेश काटे यांच्याकडून हस्तिदंत खरेदी करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले, उपवन संरक्षण अधिकारी अहमदनगर यांनी हस्तीदंत हे प्राथमिक तपासणीमध्ये अस्सल खरे असल्याचे स्पष्ट झाले आहे.बहुमूल्य शोभेच्या वस्तू व औषधी आदि करिता हस्तिदंतांचा वापर होत असल्याने हत्तीचे दातांना आंतरराष्ट्रीय बाजारात विशेष महत्त्व आहे मात्र दातांची किंमत जाहीर केल्यास हस्तीचे दातांच्या तस्करीसाठी हत्तीची हत्या करण्याचे प्रमाण वाढू शकते त्यामुळे वनविभागाने या दातांची किंमत जाहीर करण्यात बंदी घातलेली आहे.सदरील घटनेबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे सदर इसमाविरुद्ध भादविक ४२९ सह वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २(१६),९,३९,४४,(ब),५० व ५१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर

श्री.सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक,श्री. अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.

कोपरगाव प्रतिनिधी-दारू विक्री चालू ठेवण्यासाठी 55 हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोड अंती 35 हजारांची लाच स्विकारताना, नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक नंदू चिंधू परते व सहा दुय्यम निरिक्षक राजेंद्र भास्कर कदम या दोन अधिकार्‍यांना रंगेहाथ पकडले आहे.मंगळवारी रात्री कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईने लाचखोर अधिकार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.तक्रारदार यांचा दारू विक्री व्यवसाय असून दारू वाहतूक व विक्री चालू ठेवण्यासाठी दिनाक 27 जून रोजी आरोपी राजेंद्र भास्कर कदम यानी मागील 11 महिन्यांचे बाकी हप्त्याचे 55 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 30 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले तसेच आरोपी नंदू चिंधु परते यांनी त्यांच्यासाठी दरमहा 5 हजार रुपये लाचेची मागणी करून दिनांक 29 जुन रोजी आरोपी राजेंद्र भास्कर कदम याने 35 हजार रुपये लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांच्यासमक्ष स्विकारतांना पकडण्यात आले.ही कारवाई पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक, नारायण न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, पोलिस निरिक्षक संदीप साळुंखे, पो.ना. डोंगरे, पो.ना. इंगळे, पो. ना नितीन कराड, चालक विनोद पवार यांच्या पथकाने केली.

श्रीरामपूर प्रतिनिधी-येथील आरटीओ कार्यालयात काल सायंकाळच्या दरम्यान एका एजंटने काही लोकांना जमवून अधिकारी व कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत त्यांच्या बरोबर झटापट केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.येथील आरटीओ कार्यालयात काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एक एजंट व कर्मचारी त्यांच्यामध्ये काही कागदपत्र घेण्यावरून बाचाबाची होऊन शिवीगाळ झाली. त्या एजंटने बाहेरून काही लोकांना जमवून आणले. त्या ठिकाणी दोघांमध्ये वाद होत असल्याचे पाहून काही अधिकारी, कर्मचारी व एजंटसह गर्दी जमली. त्या एजंट्स व त्याने जमवलेल्या लोकांनी कर्मचारी अधिकार्‍यांना शिवीगाळ करत त्यांच्या बरोबर झटापट केली. हा प्रकार पाहण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.या घटनेची माहिती कळताच पोलीस त्या ठिकाणी आले. या प्रकरणाची पोलिसांनी सर्व माहिती घेतली. त्या एजंटला शोधण्यासाठी पोलिसांनी त्याचे घर गाठले मात्र तो मिळून आला नाही. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद करण्यात आली नव्हती .

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget