श्रीरामपूर : शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरीकांना, मागील निवडणूकिवेळी विकासाच्या नावाखाली दिलेले आश्वासने फौल ठरल्याने. आता नागरिक मूलभूत सुविधांसाठी आवाज उठविण्यास सुरवात झाली आहे. अशाच प्रकारे शहरातील वार्ड नंबर २, प्रभाग क्रमांक १० मधील बिफ मार्केट व नवीन घरकुलाच्या मागील परिसरातील नागरिकांना, चिखलाने बरबटलेले आणि खड्डेयुक्त रस्ते, भागातील नाल्यांवरील चैंबरचे फुटलेल्या ढाप्यांमुळे, परिसरातील नागरिकांच्या घरात सांडपाणी शिरत आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. प्रभागातील या परिस्थितीमुळे लहानांपासून, वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांनाच मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने. जरीया फाऊंडेशनच्या वतीने मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जावेद अहमद शेख, इम्रान अजिज शेख, सद्दाम ईस्माईल कुरेशी ,इम्रान भिकन पठाण,जावेद खालीद मलिक,गणेश प्रकाश शेवाळे, शाहरूख शफिक शेख,इम्रान ईस्माईल कुरेशी आदींसह जरीया फाऊंडेशनचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थितीत होते.

Post a Comment