January 2025


श्रीरामपूर (प्रतिनिधी ) माजी आ. भानुदास मुरकुटे व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या अधीपत्याखालील श्रीरामपूर तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीने पुढील आर्थिक वर्ष 2025- 26 या आर्थिक वर्षासाठी 16 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे, अशी माहिती सभापती सुधिर नवले पा. यांनी दिली आहे.


यंदाच्या अर्थसंकल्पाप्रमाणे 5 कोटींचे एकुण उत्पन्न अपेक्षित आहे. त्यानुसार 1 कोटी 38 लाखांचा वाढावा होणार आहे.यंदाच्या अर्थसंकल्पात 8 कोटी 70 लाख रुपयांची विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत.त्यात श्रीरामपूर नगर परिषद रोडलगत 5 कोटी खर्चाच्या भव्य शेतकरी मॉलमध्ये शॉपिंग सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे.शेती महामंडळाची जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे.


श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालय समोरील मुख्य रस्ता तसेच बेलापूर व टाकळीभान येथील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, टाकळीभान येथे नवीन पेट्रोल पंपाची उभारणी, श्रीरामपूर येथील मुख्य बाजाराच्या आवारात साठवण टाकी अंतर्गत पाईपलाईन करणे व नियोजित डाळिंब मार्केट आदी कामे हाती घेतली आहेत, असेही नवले यांनी सांगितले.


त्यांनी पुढे सांगितले की, सध्या श्रीरामपूर येथील मुख्यालयाच्या आवारात कांदा मार्केटमध्ये 2 कोटी खर्चाच्या रस्त्याचे काँक्रिटिकरण,दिड कोटी रुपये खर्चाच्या 15 गाळ्यांचे पूर्णत्वाकडे आहेत.बेलापूर उपबाजारात 60 लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे काँक्रिटिकरण व 12 लाख खर्चाच्या दुकान गाळ्यांची दुरुस्ती तसेच टाकळीभान येथील उपबाजारात साडेनऊ लाख खर्चाच्या दुकान गाळयांच्या दुरुस्तीचे काम सुरु सुरु आहे.


बाजार समितीची सर्व विकास कामे शेतकरी केंद्रास्थानी ठेऊन सुरु आहेत.प्रस्तावित कामांमबरोबरच श्रीरामपूर येथील पेट्रोल पंप आवारात सीएनजी गॅस केंद्र सुरु करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे.संस्थेची 30 एप्रिल 2023 रोजी निवडणूक होऊन आपण 13 मे 2023 पासुन कारभार हाती घेतला असुन संस्थेचा कारभार काटकसरीने आणि पारदर्शी पद्धतीने सुरु असल्याचे सभापती सुधिर नवले आणि सचिव साहेबराव वाबळे यांनी सांगितले.

 


बेलापूर(प्रतिनिधी)-- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली. या पुरस्कारात उत्कृष्ट अध्यापक पुरस्कारार्थी म्हणून उक्कलगाव तालुका श्रीरामपूर येथील रहिवाशी प्राध्यापक डॉक्टर अतिश श्रीकिसन मुंदडा यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.                                            सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वर्धापन दिन 10 फेब्रुवारी रोजी होत असतो आणि या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राध्यापकांना सन्मानित करण्यात येते.  शैक्षणिक वर्ष 2024-25 चा व्यावसायिक महाविद्यालय (ग्रामीण विभाग) उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार उक्कलगाव येथील रहिवासी श्रीकिसन मोतीलाल मुंदडा यांचे चिरंजीव प्राध्यापक डॉक्टर अतिश मुंदडा यांना दिला जाणार आहे. डॉक्टर अतिश मुंदडा हे सध्या चांदवड फार्मसी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत आहे. डॉक्टर आतिश मुंदडा यांचे शालेय शिक्षण उक्कलगाव येथे झाले असून महाविद्यालयीन शिक्षण अमरावती व नागपूर येथे झाले. ते चांदवड महाविद्यालयात सन 2008 पासून कार्यरत आहे आणि या कालावधीत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले तसेच वेगवेगळे संशोधन प्रकल्प सादर केले तसेच त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची दखल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतली असून पुणे विद्यापीठ ग्रामीण विभागातील विविध व्यावसायिक महाविद्यालयाच्या प्राध्यापकांमध्ये प्राध्यापक अतिश मुंदडा यांचे काम सरस ठरल्यामुळे त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण 10 फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या प्रांगणात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. प्राध्यापक डॉक्टर आतिश मुंदडा यांनी एका ग्रामीण भागातून खडतर मेहनत घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले व या मानाच्या पुरस्काराला गवसणी घातली म्हणून त्यांचे विशेष कौतुक होत आहे. या पुरस्काराच्या घोषणेची माहिती चांदवड फार्मसी महाविद्यालयात समजतात महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला तसेच संस्थेचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बेबीलालजी संचेती यांच्या हस्ते व आमदार डॉक्टर राहुल आहेर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनी त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या यशात त्यांचे माता पिता सौ लीलाबाई मुंदडा श्री किसन मुंदडा सौ विमल राठी शरद चांडक यांचा मोलाचा सहभाग आहे या यशाबद्दल उक्कलगावचे उपसरपंच नितीन थोरात ग्रामपंचायत सदस्य दिले थोरात शामराव नागरे संजय थोरात पत्रकार देविदास देसाई गोविंद श्रीगोड तसेच बेलापूर पंचक्रोशीतील त्याच्या मित्र परिवाराने आणि नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले.


श्रीरामपूर - नगरपालिकेने सात दिवसापूर्वी दिलेल्या नोटिसीची मुदत संपल्यानंतर आज सकाळी साडेदहा वाजता नगरपालिकेचे अतिक्रमणविरोधी विभागाने मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, अतिक्रमण अधिकारी संजय शेळके, नगर अभियंता सूर्यकांत गवळी आदींच्या फौज फाट्यासह बेलापूर रोड पासून रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली.मोठ्या प्रमाणात लोकांच्या मालमत्तेची नासधूस झाल्याचे दिसून आले.

सदर मोहीम राबविताना पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपुजे व शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विशेष कृती दलाच्या तुकडीसह महिला पोलीसही यामध्ये सहभागी झाले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने कोणीही फारसा प्रतिकार केला नाही. दोन जेसीबी, फायर फायटरची गाडी आणि इतर नगरपालिकेचा स्टाफ यांच्या सहकार्याने सदरची अतिक्रमण मोहीम राबविली जात आहे. यावेळी रस्त्यावर बघ्यांची खूप मोठी गर्दी झालेली आहे .

बेलापूर रोडला पश्चिम बाजूने ही मोहीम सुरू झाल्यानंतर पूर्वेकडील लोकांनी स्वयंस्फूर्तीने आपली अतिक्रमणे काढायला सुरुवात केली आहे. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पत्र्याचे शेड, दुकाने पुढे आल्याचे दिसून आले. अनेकांनी आपले सामान हलवण्यासाठी पूर्ण कुटुंब रस्त्यावर उतरवल्याचे ही दिसत आहे.

सदरची अतिक्रमण मोहीम थांबवावी किंवा दुकानदारांचा सहानुभूतीने विचार करावा याबाबत शहरातील राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन साकडे घातले.आमदार हेमंत ओगले, माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाने आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून याबाबत विनंती केली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी शासन नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिल्याने पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ही मोहीम राबविली जात आहे.

सदरची मोहीम सुरू राहणार असून नागरिकांनी आपापली अतिक्रमणे काढून घेऊन आपले नुकसान टाळावे व नगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केली आहे.

बेलापूर (प्रतिनिधी)- येथील सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने वार्तालाप,हळदी कुंकू व स्नेहभोजन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचा महिलांनी व सत्यमेव जयते ग्रुपच्या सदस्यांनी तसेच बाळ गोपाळानी मन मुराद आनंद लुटला.  सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने नुकताच अनमोल रसवंती गृह याठिकाणी सहकुटुंब हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या उपक्रमाचा उद्देश सांगताना सत्यमेव जयते ग्रुपचे देविदास देसाई व अभिषेक खंडागळे यांनी सांगितले की महिलांना दररोजच्या कामातून थोडीशी मोकळीक मिळावी किचन, टीव्ही आणि मोबाईल या विळख्यातून महिलांना बाहेर काढण्याकरिता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात अनेकांनी आपली कला सादर केली इरफान जागीरदार यांनी दाताने नारळ सोलून दाखविला अनेकांनी सुंदर असे उखाणे घेऊन या कार्यक्रमाचे रंगत वाढवली काहींनी आपल्या आयुष्यात आलेले अनुभव तसेच चुटकुले विनोद सांगितले कार्यक्रमाची सुरुवात किरण गागरे यांच्या अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान या भजनाने झाली अनेक महिलांनीही या मनमुराद गप्पागोष्टी मध्ये सहभाग नोंदविला व आपल्या विचारांना वाट मोकळी करून दिली यावेळी सौ प्रतिभा देसाई रत्नमाला डावरे मानवी खंडागळे राजश्री गुंजन आरती अंबिलवादे नयना बोरा जयश्री अमोलिक कावेरी गागरे मयुरी आंबेकर योगिता काळे तुझ्या दाणी सोनाली देवरे सुवर्णा सोनवणे संगीता घोंडगे संजीवनी सूर्यवंशी यांच्यासह अभिषेक खंडागळे देविदास देसाई, विष्णुपंत डावरे,संजय भोंडगे, दिपक क्षत्रिय, संपत बोरा, किरण गागरे, विशाल आंबेकर, महेश ओहोळ, बाबासाहेब काळे, बाबुलाल पठाण, इरफान शेख,संदिप सोनवणे,दिलीप अमोलिक, बाबासाहेब काळे,गोपी दाणी,सुरेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते

इंटरनेटच्या अतिवापरामुळे वाचन संस्कृती राहिली नाहीपोलिस उपनिरीक्षक चौधरी

बेलापूर (प्रतिनिधी) वाचाल तर वाचाल, वाचाल तर शिकाल, वाचाल तर टिकाल आणि वाचनासाठी गरज आहे ती पुस्तकाची. वाचनाने वक्ता, श्रोता, नेता तयार होतो त्याचबरोबर उत्तम श्रवण कौशल्य जीवनात योग्य मार्ग दाखवित असल्याचे मत सात्रळ  कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक नवनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.                   


श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे सिद्धेश्वर ग्रामीण ग्रंथालय व वाचनालय आयोजित वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाच्या सांगता समारोहप्रसंगी तसेच संस्थेने घेतलेल्या वकृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष आदिनाथ वडीतके हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, प्राध्यापक डॉक्टर एकनाथ ढोणे, वनपाल अक्षय बडे ह. भ. प. बापूसाहेब चिंधे,प्रशांत विटनोर,सोसायटीचे चेअरमन सोन्याबापु जाटे आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात प्राध्यापक शिंदे म्हणाले की आज समाजात समाजासाठी धडपड करणाऱ्या माणसाची उणीव भासत आहे प्रत्येक जण स्वतःच हित पाहून कार्य करत आहे. आपल्या पूर्वजांनी बलिदान दिले नसते आज समाजासाठी धडपडणारे माणसं खूप कमी आहे पुस्तक हे माणसाचं मन निर्मळ करणारी साबण आहे. असेही  प्राध्यापक शिंदे म्हणाले.

 

     यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी म्हणाले की इंटरनेटच्या अतिवापरामुळे वाचन संस्कृती लोक पावत चालली आहे. तरुणांमध्ये संयम राहिलेला नाही रागाच्या भरात तरुणांकडून अनेक अपराध घडत आहेत. शासनाने राबविलेले वाचन संकल्प हा महाराष्ट्राचा अभिनव उपक्रम केवळ विद्यार्थ्यांसाठी नसून तो सर्वांसाठी आहे. असेही पोलीस उपनिरीक्षक चौधरी म्हणाले.

सचिव सुनील शिंदे यांनी प्रस्तविक केले वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवड्याच्या सांगता समारोह कार्यक्रम प्रसंगी ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथालय परिसराची सामूहिक स्वच्छता, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ वाचन आदी उपक्रम राबविण्यात आले आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १ जानेवारीपासून सुरू झालेला हा उपक्रम १५ जानेवारीपर्यंत राबविला आहे. आज आपल्या ग्रंथालयामध्ये १३४६५ ग्रंथ उपलब्ध असून नियमित वचकांसाठी १३ वृत्तपत्र व मासिकही उपलब्ध आहे.असे  सचिव शिंदे यांनी सांगितले.

     यावेळी प्राध्यापक डॉक्टर एकनाथ ढोणे, विद्यार्थिनी प्रिया वडीतके यांची भाषणे झाली.

      यावेळी वनपाल अक्षय बडे, 

ह.भ.प. बापूसाहेब चिंधे सर, सोसायटीचे चेअरमन सोन्याबापु जाटे,मुख्याध्यापक म्हसे सर, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक चित्ते मॅडम, संस्थेचे संचालक चंद्रकांत वडीतके,शिंदे सर , तुपे सर, दळवी सर,, काटकर सर, रवींद्र काळे सर, दळवी सर, सौ.शिंदे,सौ.बेलकर,पंढरीनाथ भोसले, संजय विश्वासे, वृक्षसंवर्धक अजित देठे, ग्रंथपाल सुभाष भोसले, शिवाजी कोऱ्हाळे, संदीप शेरमाळे, रमेश भोसले, इंद्रभान तुपे,आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रस्ताविक संस्थेचे सचिव सुनील शिंदे यांनी तर आभार सौ वाघ मॅडम यांनी मांडले.

गौरव डेंगळे/नवी दिल्ली/१७/१/२०२५ भारतीय महिला खो खो संघाने उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशचा धुव्वा उडवला.यासह भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.भारताचं वर्ल्डकप जेतेपद फक्त दोन विजय दूर आहे. भारताने चौथ्या सामन्यात १०० गुणांचा आकडा पार केला आहे. भारताचा उपांत्य फेरीत सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे.भारतीय महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत जबरदस्त खेळी केली. भारतीय कर्णधार प्रियांका इंगळे हीने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम अटॅक करण्याचा निर्णय केला.पहिल्या डावात भारताने एकही ड्रीम रन दिला नाही.त्यामुळे पहिल्या डावात भारताने ५०-० अशी आघाडी मिळवली होती.ही आघाडी कमी करण्याचं मोठं आव्हान बांगलादेशपुढे होतं.पण बांगलादेशने हा फरक कमी करण्याऐवजी ६ ड्रिम पॉईंट्स दिले.तर अटॅक करताना फक्त ८ गुण मिळवले.म्हणजेच दुसऱ्या डावात बांगलादेशकडे फक्त २ गुण होते.तर भारताकडे ४८ गुणांची आघाडी होती.तिसऱ्या डावात अटॅक करताना भारताने आक्रमक अटॅक केला.एका पाठोपाठ एक बॅच तंबूत पाठवत होते.त्यामुळे भारताच्या पारड्यात एका पाठोपाठ एक गुण मिळत होते. तिसऱ्या डावात भारताकडे १०६ गुण होते. त्यामुळे तिसऱ्या डावातच भारताचा विजय पक्का झाला होता. कारण ९८ धावांची आघाडी भारताकडे होती. त्यामुळे चौथ्या डावात अटॅक करून ९८ धावांचा फरक कमी करणं कठीण होतं.त्यात भारताने चौथ्या डावातही ड्रीम रनही मिळवला.भारताने हा सामना १०९-१६ गुणांनी जिंकला.


उपांत्यपूर्व फेरीचे निकाल:

पहिला उपांत्यपूर्व सामना: युगांडाचा न्यूझीलंडवर ७१-२६ ने विजय. 

दुसरा उपांत्यपूर्व सामना: दक्षिण आफ्रिकेचा केनियावर ५१-४६ ने विजय. 

तिसरा उपांत्यपूर्व सामना: नेपाळचा इराणवर १०३-०८ ने विजय. 

चौथा उपांत्यपूर्व सामना: भारताचा बांगलादेशवर १०९-१६ ने विजय.

बेलापूरःबेलापूर बु ग्रामंचायतीच्या उपसरपंच पदावर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील तसेच जि.प.सदस्य शरद नवले व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या नेतृत्वाखालील गावकरी मंडळाच्या सौ.प्रियंका प्रभात(केशव) कु-हे यांची बिनविरोध निवड झाली.                                  उपसरपंच पदासाठी सरपंच स्वाती अमोलिक यांचे अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक संपन्न झाली.बैठकीस मावळत्या उपसरपंच तबसुम बागवान ,अभिषेक खंडागळे,मुश्ताक शेख,चंद्रकांत नवले,उज्वला कुताळ,सुशिलाबाई पवार, मीना साळवी, शिलाताई पोळ,वैभव कु-हे,भरत साळुंके,रमेश अमोलिक आदी सदस्य उपस्थित होते.निर्धारित वेळेत सौ.प्रियका कु-हे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची उपसरपंच पदावर बिनविरोध निवड झाल्याचे ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे यांनी जाहीर केले.    निवडीनंतर आभाराच्या सभेत शरद नवले,अभिषेक खंडागळे,जालिंदर कुऱ्हे,भास्करराव खंडागळे,विष्णुपंत डावरे, भाऊसाहेब कुताळ आदिंची भाषणे झाली.याप्रसंगी जालिंदर कु-हे,भाऊसाहेब कुताळ,प्रफुल्ल डावरे,बाळासाहेब दाणी,सुरेश बाबुराव कुऱ्हे,रावसाहेब अमोलिक,सचिन वाघ, रमेश काळे,भाऊसाहेब तेलोरे,अजिज शेख, जब्बार पठाण,अशोक कुऱ्हे,विष्णूपंत कुऱ्हे,शफिक बागवान,बाबुलाल पठाण,प्रशांत मुंडलिक, मास्तर हुडे, हेमंत मुथा,योगेश राकेचा,बाबुराव पवार,महेश कु-हे,विशाल आंबेकर,दादासाहेब कुताळ,रफिक शेख,शशिकांत तेलोरे, सुभाष शेलार,अशोक आंबिलवादे,बाळासाहेब शेलार,पञकार देविदास देसाई,दिलिप दायमा,सोमनाथ शिरसाठ,अभिषेक निर्मळ, नितीन खोसे, प्रकाश साळुंके, राम कुऱ्हे,कान्हा लगे,ग्रामस्थ तसेच यांचेसह गावकरी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बेलापूरःगावाच्या विकासासाठी मतभेद विसरुन सर्वांनी एकञ यावे.विरोधासाठी विरोध न करता विधायक कामाला पाठींबा तर चुकीची कामे होत असतील तर त्याला विरोध केला गेला पाहिजे असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांनी व्यक्त केले.                              ---बेलापूर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने बेलापूर प्रेस क्लबच्या सदस्यांसह अन्य पञकारांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी श्री.नवले बोलत होते.यावेळी राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार मिळाल्याबद्दल नवनाथ कुताळ तसेच भास्कर खंडागळे ,रणजीत श्रीगोड,मारुतराव राशिनकर,सुनिल मुथा,विष्णुपंत डावरे,ज्ञानेश गव्हले,देविदास देसाई,सुनिल नवले,दिलिप दायमा,सुहास शेलार,शरद पुजारी,रुपेश सिकची,आतिष देसर्डा यांचेसह अभिजीत राका,गणेश साळुंके आदिंचा सत्कार करण्यात आला.                            ---याप्रसंगी पं.समितीचे माजी सभापती दत्ता कु-हे,भास्कर खंडागळे,सुनील मुथा,नवनाथ कुताळ,मारुतराव राशिनकर,ज्ञानेश्वर गव्हले,लहानुभाऊ नागले यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास पंडीतराव बोंबले,प्रकाश पा.नाईक,विश्वनाथ गवते,चंद्रकांत नाईक,तुकाराम मेहेञे, बाळासाहेब दुधाळ,कलेश सातभाई,सुधाकर खंडागळे,प्रकाश कु-हे ,बाळासाहेब लगे,बंटी शेलार,सुरेश कु-हे,शफिक आतार,संजय शेलार,रमेश अमोलिक ,अशोक प्रधान,अन्तोन अमोलिक,रमेश शेलार, आयजुभाई शेख,  आदि उपस्थित होते.

गौरव डेंगळे (नवी दिल्ली) १३/१/२०२५ खो खो विश्वचषक २०२५ मध्ये उद्घाटन सामना भारत विरुद्ध नेपाळ सामना नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर पार पडला.खो खो वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने विजयी सलामी दिली.भारताचा पहिलाच सामना नेपाळशी रंगला होता.या सामन्यात भारताने पहिल्या डावातच मोठी आघाडी घेतली होती.भारताला अटॅक करण्याची संधी मिळाली होती.भारताने पहिल्या डावात २४ गुण मिळवले.त्यानंतर दुसऱ्या डावात जेव्हा नेपाळ संघ अटॅक करण्यासाठी आला. तेव्हा भारताने जबरदस्त पद्धतीने झुंजवलं. नेपाळने आपल्या डावात २० जणांना बाद करण्यात यश मिळवलं. पण भारताने ४ गुणांची आघाडी घेतली होती. मात्र तिसऱ्या डावात बचावत्मक पवित्र्यात असलेल्या नेपाळने कमबॅक केलं. टीम इंडियाला फक्त १८ जणांना बाद करता आलं.तर नेपाळला चांगल्या डिफेंससाठी एक गुण मिळाला. तिसऱ्या डावानंतर भारताकडे २१ गुण होते. नेपाळला हा सामना जिंकायचा तर २२ जणांना बाद करणं आवश्यक होतं. पण चौथ्या डावात टीम इंडियाचे खेळाडू भारी पडले. दुसऱ्या बॅचने नेपाळला चांगलंच झुंजवलं. त्यामुळे एकीकडे वेळ कापरासारखा उडत होता. दुसरीकडे नेपाळचे खेळाडू एक एक खेळाडू बाद करण्यासाठी प्रयत्न करत होता. अखेर नेपाळला फक्त १६ गुण मिळता आले. एकूण भारताचे ४२ आणि नेपाळचे ३७ गुण होते.भारताने हा सामना पाच गुणांनी जिंकला.भारताच्या शिव पोथीर रेड्डी याला बेस्ट अटॅकिंगसाठी पुरस्कार देण्यात आला. तर नेपाळच्या रोहितकुमार वर्माला सर्वोत्तम डिफेंसाठी सामन्यानंतर गौरविण्यात आलं आहे. या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला आदित्य गणपुले याने.. त्याला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार होता. पण व्हिसाच्या समस्येमुळे पाकिस्तान संघ भारतात पोहोचू शकला नाही. त्यामुळे भारताचा सामना नेपाळसोबत आयोजित केला गेला. अ गटात नेपाळ, पेरू, ब्राझील आणि भूतान भारतासोबत असून प्रत्येकी एक सामना खेळतील. उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी अव्वल दोन स्थान मिळवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

कोपरगाव(गौरव डेंगळे)१३/१:सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल येथे "पद्मभूषण श्री करमसीभाई सोमैया" राज्यस्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे सहाव्या पर्वाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.प्रखर देशभक्त स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमैया विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल,कोपरगाव येथे दि ११ जानेवारी २०२५ रोजी राज्यस्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.विद्यार्थ्यांमध्ये निपून वक्तृत्वाचे गुण वाढीस लागावे त्यांच्यातील श्रवण क्षमतेचा विकास व्हावा,त्यांना आपले विचार मुद्देसूदपणे मांडण्याची कला अवगत व्हावी,त्यांच्यातील भाषण कौशल्य विकसित व्हावे व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.राज्यातील अहिल्यानगर,मालेगाव, संभाजीनगर,कोपरगाव,वैजापूर, श्रीरामपूर,राहता,लोणी,शिर्डी येथून २२ शाळेतील ४४ उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी आपले वकृत्व सादर करून स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला.या इंग्रजी वकृत्व स्पर्धेचा प्रथम क्रमांक श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलने पटकावला.दानिश शेख व कनिका सावंत यांनी वकृत्व स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण केले.स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण माननीय सुहास गोडगे(अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती व गोदावरी बायोरिफायनरीज, साखरवाडी),कल्याणी व्यास,शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे, उपप्राचार्या सौ शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे,सौ पल्लवी ससाणे,सौ नाथलीन फर्नांडिस आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून गणेश डांगे,नानासाहेब वाघ व नेहा पहाडे यांनी काम पाहिले.सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.तसेच पारितोषिक प्राप्त शाळेंना मानचिन्ह व बक्षीस रक्कम प्रदान करण्यात आली.यशस्वी विद्यार्थ्यांना इंग्रजी विभागाचे शिक्षक यास्मिन पठाण,मोनिका भांडगे,शिल्पा खांडेकर,तरणुम शेख,स्मिता परिमल,हेमा कडू,स्मिता लोखंडे, वैजंती कुटे,स्वप्निल पाटील,साईनाथ चाबुकस्वार,गणेश मलिक, विशाल आल्हाट व महेश मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.




👉 स्पर्धेचा अंतिम निकाल!

👉 *प्रथम क्रमांक* 

श्री.शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल कोपरगाव ₹ १०,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *द्वितीय क्रमांक*

ऑक्झोलिअम कॉन्व्हेंट स्कूल अहिल्यानगर ₹ ७०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *तृतीय क्रमांक* 

प्रवरा गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज लोणी ₹ ५,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक*

संत विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल ₹ ३०००/-  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक*

संजीवनी सैनिकी स्कूल, कोपरगाव ₹ २,०००/-  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ तृतीय पारितोषिक*

 न्यू एरा इंग्लिश मीडियम स्कूल, मालेगाव.

₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ चतुर्थ पारितोषिक*

अशोक आयडियल स्कूल श्रीरामपूर.

₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ पाचवे पारितोषिक*

श्री गणेश इंटरनॅशनल स्कूल, कोराळे ₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ सहावे पारितोषिक*

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज,श्रीरामपूर ₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र. 

👉 *उत्तेजनार्थ सातवे पारितोषिक*

न्याती समता इंटरनॅशनल स्कूल, श्रीरामपूर ₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

खंडाळा (गौरव डेंगळे): अहिल्यानगर येथील रेसिडेन्शिअल हायस्कूल येथे जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्यावतीने जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा आयोजन करण्यात आले होते.१४ तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविलेल्या १४ शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. खंडाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने समूह गीत गायन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला व श्रीरामपूर तालुक्यातून एकमेव शाळेने बक्षीस पटकावण्याचा मान मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांना रवींद्र पाटोळे,सुनील सिनारे,सुनील खरात,सुनील बिराडे तसेच शिक्षक वृंदांचे मार्गदर्शन लाभले.स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे

प्रवासाचे सहकार्य राधाकिसन बोरकर यांनी केले.तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक रमेश शिंदे,शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामपंचायत खंडाळा,तंटामुक्ती समिती तसेच सर्व पालक वृंदांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - नगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असून ती एका कुटुंबासारखी आहे. कुटुंबप्रमुखाचे काम सतत सुरू असते. माझ्याकडे काही जादूची कांडी नाही,तरी पण जेवढे मला चांगलं करता येईल तेवढे चांगले करण्याचा मी प्रयत्न करीन.समस्या या न संपणाऱ्या असतात. त्या निर्माण होणारच आहेत,त्यात जेवढया मला सोडवता येतील तेवढे करण्याचा माझा प्रयत्न राहील.सर्व पत्रकारांनी या कामी आम्हाला सहकार्य करावे.पत्रकारांसाठी पत्रकार दिन हा फक्त कार्यक्रमाचे स्वरूप न राहता या निमित्ताने सर्व पत्रकारांचे संपूर्ण बॉडी चेकअप करून शुगर, बीपी, किडनी, कोलेस्ट्रॉल व इतर लिपींग प्रोफाइलची प्रत्येकाची तपासणी नगरपालिकेमार्फत आज आणि उद्या केली जाणार आहे. हा एक वेगळा प्रयत्न आहे. सर्वांशी सल्लामसलत करून भविष्यात आपल्या सहकार्याने नगरपालिकेचा कारभार करू. कामाच्या गडबडीत स्वतःच्या प्रकृतीकडे आपण दुर्लक्ष करतो पण आपण आपलाही विचार करावा असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केले.

येथील आगाशे सभागृहात काल नगर परिषदेतर्फे पत्रकार दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी प्रास्ताविकपर भाषण करताना मुख्याधिकारी घोलप बोलत होते.

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार रमण मुथा हे होते.व्यासपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर,मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश रक्ताटे,संपादक करण नवले,ज्येष्ठ पत्रकार पद्माकर शिंपी यांची उपस्थिती होती.


प्रारंभ स्वीप कार्यक्रमांतर्गत नगरपालिकेने घेतलेल्या विविध स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभ उपस्थित पत्रकारांच्या हस्ते पार पडला.यामध्ये रांगोळी, चित्रकला व इतर स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली.

याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ पत्रकार रमण मुथा यांनी नगरपालिकेचे वसुली विभागाचे काम तत्पर असावे,त्यांचे खाते प्रमुख मागे कोपऱ्यात बसतात त्यामुळे पुढे काय चाललंय हे त्यांना कळत नाही.त्यांना पुढे बसवावे. पैसे स्विकारण्यासाठी खिडक्या वाढवाव्यात अशी सूचना केली.

संपादक करण नवले यांनी सण उत्सव काळात रस्त्यांचे सुयोग्य नियोजन करावे. अतिक्रमण विभागाला सूचना द्याव्यात. पालिकेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांना आम्ही प्रसार माध्यमे म्हणून योग्य ती प्रसिद्धी देऊ असे सांगितले. 

पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सलीमखान पठाण यांनी नगरपालिकेच्या बांधकाम आणि आरोग्य विभागाला वारंवार सूचना कराव्या लागतात हे बरोबर नाही.या खात्याच्या कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने आपली कर्तव्य पार पाडावी असे सांगून शहराचा विस्तार वाढत असल्याने शहराच्या वेगवेगळ्या भागात तीन ते चार अभ्यासिका असाव्यात. त्यामधून गोरगरिबांची मुले अभ्यास करून यशस्वी होतील.या बाबीकडे नगरपालिकेने लक्ष द्यावे असे आवाहन केले.

जयेश सावंत यांनी पत्रकार भवनाचे काम पूर्ण करून ते ताब्यात मिळावे तसेच वसंतरावजी देशमुख यांच्या नावाची व्याख्यानमाला व पुरस्कार पुन्हा सुरू करावेअसे सांगितले. याप्रसंगी पत्रकार अनिल पांडे,रवी भागवत,महेश माळवे,नवनाथ कुताळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

उपस्थित सर्व पत्रकारांचा पालिकेतर्फे मुख्याधिकारी घोलप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमानंतर सर्व पत्रकारांची बीपी,शुगर टेस्ट करण्यात आली. इतर तपासण्या आज पालिकेच्या सरकारी दवाखान्यात करण्यात येणार आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकमान्य टिळक वाचनालयाच्या ग्रंथपाल स्वाती पुरे तसेच डॉ.सांगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

मुख्याधिकारी घोलप यांनी पुढाकार घेऊन पत्रकार दिन साजरा करण्याची खंडित झालेली परंपरा पूर्ववत सुरू केल्याबद्दल दोन्ही पत्रकार संघाचे वतीने त्यांना धन्यवाद देण्यात आले.

कोपरगाव (गौरव डेंगळे)दि ६ ते ८ जानेवारी २०२५ दरम्यान न्यू इंग्लिश स्कूल,संवत्सर येथे ५२ वे कोपरगाव तालुकास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

या तालुक्यास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनामध्ये कोपरगाव तालुक्यातून ३०० ते ३५० शाळांनी सहभाग नोंदवला होता. गणित व विज्ञान मिळून सुमारे ६०० च्या वर प्रयोग प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांने तयार केले होते. या प्रदर्शनामध्ये सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थिनी कु निकम स्वरा रवींद्र हिने गणित विषयात लहान गटात 

दुसरा क्रमांक पटकावला तर विज्ञान विषयात मोठ्या गटात (इयत्ता नववी ते बारावी) शेटे अनुराग संतोष याने तृतीय क्रमांक पटकावला.या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य श्री के एल वाकचौरे, उपप्राचार्या शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे,सौ पल्लवी ससाणे, सौ नैथलीन फर्नांडिस व सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.यशस्वी विद्यार्थ्यांना गणित विषयाचे शिक्षक अर्चना गायकवाड,रुपाली चांदोरे,रणजित खळे, सुनंदा कदम,प्रसाद भास्कर,वैशाली शिंदे,शितल मलिक,झेबा शेख तसेच विज्ञान विषयाचे नारायण गाडेकर, स्वरूपा वडांगळे,वंदना जगझाप,पल्लवी ससाणे,माधुरी भस्मे,सायली डोखे आदींचे मार्गदर्शन लाभले.

बेलापूर (प्रतिनिधी)-बेलापूर खुर्द येथील सहयोग सामाजिक मंचच्या वतीने मारुती मंदिर बेलापूर खुर्द येथे भाविकांना बसण्यासाठी दोन बाक त्याचबरोबर बेलापूर खुर्द येथील स्मशानभूमीकरिता दोन बाक व  एक तिरडी तसेच शिकळी प्रदान करण्यात आली.               बेलापूर खुर्द येथील सहयोग सामाजिक  मंच नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते गावात होणारे निधन व त्यानंतर नातेवाईकांची होणारे धावपळ हे लक्षात घेऊन सहयोग सामाजिक मंचने बेलापूर खुर्द येथील ग्रामपंचायतीला एक तिरडी व शीकळी प्रदान केली तसेच बेलापूर खुर्द येथील मारूती  मंदिरात दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांसाठी बसण्याकरता दोन बाक व बेलापूर खुर्द येथील स्मशानभूमीसाठी दोन बाक भेट देण्यात आले. यावेळी सहयोग सामाजिक मंचचे ज्येष्ठ सदस्य पंढरीनाथ बोर्डे ज्ञानदेव महाडिक बाबुराव फुंदे भाऊसाहेब म्हसे जगन्नाथ महाडिक पुंजाहरी सुपेकर गुरुजी नंदकुमार कुर्हे अशोक सुळ अशोक क्षीरसागर सहयोग पुरुष बचत गटाचे अध्यक्ष प्रशांत बडदे उपसरपंच दीपक बारहाते ग्रामपंचायत सदस्य नयनाताई बडदे राणीताई पुजारी ग्राम विकास अधिकारी तुकाराम जाधव निलेश बडदे जगन्नाथ बडदे विलास भालेराव अर्जुन गोरे सुनील बाराते जगन्नाथ बडदे आधीच ग्रामस्थ उपस्थित होते. सहाय्यक सामाजिक सहयोग मंचावतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले

रयत शिक्षण संस्था, साताराच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय, कोल्हार बुद्रुक येथील तांत्रिक विभागाचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी समर्थ धनंजय शिरसाठ याने तयार केलेला डायनॅमिक सायकलचा प्रोजेक्ट अहिल्यानगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनामध्ये तृतीय क्रमांक मिळाला. या विद्यार्थ्याला तांत्रिक विभागाचे शिक्षक शुभम पवार, ऋषिकेश जाधव, राजेंद्र चव्हाणके, मुख्याध्यापिका संजीवनी आंधळे, प्र. पर्यवेक्षक शब्बीर शेख यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाच्या प्र. मुख्याध्यापिका संजीवनी आंधळे, प्र. पर्यवेक्षक शब्बीर शेख, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव बी. एन. पवार, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष ॲड. सुरेंद्र खडे पाटील, जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के, स्थानिक स्कूल सदस्य बी. के. खर्डे, अजीत मोरे, अशोक आसावा, रविंद्र देवकर, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी नाईकवाडी, श्री. तोरणे यांसह सर्व शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

बेलापूर (वार्ताहर)श्रीरामपूर तालुका सहकारी फेडरेशनच्या वतीने  पहिल्या गटात गावकरी सहकारी पतसंस्थेला श्रीरामपूर  तालुक्यातील सर्वोत्तम कार्यक्षम पतसंस्था म्हणून प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.यावेळी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक व तालुका फेडरेशनचे अध्यक्ष वासुदेव काळे , अनिरुद्ध महाले, याकुबभाई बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथील गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्षा सौ.राजश्री पाटील आणि श्रीमंत थोरले बाजीराव पतसंस्थेचे चेअरमन नारायण वाझे यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक चेअरमन साहेबराव वाबळे यांच्यासह संचालक मंडळाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.कार्यक्रमास सर्वश्री संचालक व्हा.चेअरमन रामेश्वर सोमाणी,जालिंदर पा. कु-हे, शशिकांत उंडे, जनार्दन ओहोळ, रावसाहेब अमोलीक,अजीज शेख, कुलकर्णी यांच्यासह व्यवस्थापक व सेवकवृंद उपस्थीत होते. या सुयशाबद्दल सभासद, खातेदार आणि ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळीभान या ठिकाणी भेट दिली आसता त्या ठिकाणी वृत्तपत्रात प्रसिध्द झालेली  प्रसूती महिलेची झालेले हेडसांड या आशयाच्या बातमीच्या अनुषंगाने भेट दिली असता दोन्ही वैद्यकीय अधिकारी आपल्या कर्तव्यावर  हजर नसल्याचे आढळून आले प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केवळ तीनच कर्मचारी हजर होते परंतु बातमीदार आल्याचे समजतात हळूहळू एक एक जण गोळा होऊ लागले मागील महिन्यात परिसरातील रात्री प्रसुती रुग्ण महिला बेलपिंपळगाव तालुका नेवासा येथून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसूतीसाठी रात्री साडेनऊ वाजता आल्याचे समजले त्यावेळी त्यांना निवासी सिस्टर यांनी तपासले होते त्यानंतर तिला प्रसूतीला वेळ लागेल व पोटात दुखत असल्यामुळे तिला ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर या ठिकाणी संदर्भित केले सदर रुग्णाला घेऊन जाण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ॲम्बुलन्स त्यांनी मागणी केली त्यावेळी त्या ठिकाणी ड्रायव्हर उपस्थित होते त्यांनी गाडीची चावी यापूर्वी त्या ठिकाणी काम करत असणाऱ्या स्थानिकप्राथमिक आरोग्य केंद्रात राहणाऱ्या सिस्टर यांच्याकडे स्थानिक वैद्यकीय अधिकारी यांच्या आदेशाने जमा केली असल्याची माहिती मिळाली 


या संदर्भात महिला पेशंटच्या नातेवाईकांनी त्यांना विनंती करून देखील त्यांनी अंबुलन्स दिली नसल्याची माहिती वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती त्या ठिकाणी कंत्राटी बेसवरील कर्मचारी ड्रायव्हर यांची ऑर्डर संपलेली होती त्यामुळे त्यांनी रुग्णास ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन जाण्यास नकार दिला त्यामुळे रुग्ण हे गावातील एका व्यक्तीच्या वाहनाने ग्रामीण रुग्णालय पोहोचले त्या ठिकाणी सदर रुग्नेची लगेच प्रसूती झाली नाही तिची प्रसूती ही चवथ्या पाचव्या दिवशी संध्याकाळी झाली असल्याची माहिती पंचायत समिती तालुका आरोग्य अधिकारी डॉकटर मोहन शिंदे यांच्याकडे संपर्क साधला असता मिळाली या वेळी बातमीत सत्यता नसून बातम्या कुठल्याही प्रकारची शहानिशा झाली नाही

असे डॉक्टर शिंदे यांनी सांगितले तसेच या टाकळीभान प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर अनेक वेळा गैर हजर राहतात याविषयी माहिती विचारली आसता या संदर्भात आपण वरिष्ठांना पत्रव्यवहार पूर्वीही वेळोवेळी केल्याचे त्यांनी सांगितले


बेलापूरःआज माणूस भौतिक  सुखाच्या मोहजालात अडकल्याने त्याचे जिवन कष्टमय बनले आहे.यातून बाहेर पडून जगणे सकारात्मक करणे हाच जिवन आनंदी  करण्याचा मंञ असल्याचे प्रतिपादन बेलापूर पञकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे यांनी केले.                               साविञीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आर.बी.एन.बी काॕलेज व स्वामी सहजानंद भारती काॕलेज आॕफ एज्युकेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित शिबिरात "जिवन जगण्याची कला"या विषयावर श्री.खंडागळे प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.यावेळी प्रा.डाॕबाबासाहेब तोंडे,प्रा.डाॕ.भागवत शिंदे,प्रा.डाॕ जलाल पटेल,प्रा.डाॕ.किरण थोरात,प्र.किर्ती अमोलिक ,प्रा.वैशाली वाघ,प्रा.डाॕ.मेघराज औटी उपस्थित होते.                                                                  श्री.खंडागळे म्हणाले की,आधुनिक भौतिक साधनांनी मानवी जिवन बदलून टाकले आहे.या साधनांनी मानवी भौतिक सुखी झाला असला तरी तो मानसिक सुखाला पारखा झाला आहे.माणसातील संवाद हरपला असून जगण्यात कृञिमपणा आला आहे.आज पैशाला नको इतके महत्त्व प्राप्त झाल्याने पैशासाठी जिवघेणी स्पर्धा सुरु झाली आहे.या स्पर्धेत ख-या जगण्याची घुसमट होत आहे.                                                                                      जिवन हे अतिशय सुंदर आहे आणि ते आनंदाने कसे जगावे हे आपल्या हाती आहे.आजकाल माणसे चिंता विकत घेतात घेतात.यामुळे तो दुःखी होतो.जगण्यातला विनोदही हरवत चालला आहे.खरे तर विनोद हे अत्यंत चांगले औषध असून विनोदामुळे जगणे सुसह्य होते.विनादामुळे व हसत खेळत राहिल्याने नकारात्मक विचारांना तिलांजली मिळते.कोणतीही हाव न धरता आणि भौतिक साधनांच्या मागे न पळता सकारात्मकतेने जगणे हा आनंदी जीवनाचा मंञ आहे असे श्री.खंडागळे यांनी अनेक मजेदार किस्से सांगून विशद केले त्यास विद्यार्थ्यांनी मनमुराद दाद दिली.                                                                                       प्रा.डाॕ.भागवत शिंदे यांनी अतिथी परिचय करुन दिला , देविदास गावित याने सूञसंचलन केले तर प्रा.डाॕ.किरण थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी अध्यापकांसह विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी आदी उपस्थित होते.आज गुरुवार (ता.९)रोजी सकाळी १० वा.शिबिराचा मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - समाजाची कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस करीत असतात हे काम करीत असताना त्यांच्याकडून चुका देखील होऊ शकतात त्यावर अंकुश ठेवून योग्य पद्धतीने कामकाज होण्यासाठी पत्रकारांचे मोलाचे सहकार्य पोलिसांना मिळत असते.कायदा व सुव्यवस्था राखण्यामध्ये पत्रकारांचे देखील मोलाचे योगदान आहे.काही प्रकरणांमध्ये कोकणीचा बाळगणे आवश्यक असल्याने पत्रकारांना विनंती केल्यानंतर ते सहकार्य करतात त्यामुळे आम्हाला देखील काम करताना पत्रकारांची साथ महत्त्वाची असते असे प्रतिपादन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी केले.

पत्रकार दिनानिमित्ताने शहर पोलीस स्टेशनमध्ये आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी संपादक बाळासाहेब आगे होते. या वेळी पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब मगरे व पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके जेष्ठ पत्रकार प्रमाण मुद्दा संपादक करण नवले सुभाष नन्नवरे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

श्री देशमुख पुढे म्हणाले की शहरात कायदा सुव्यवस्था राखताना पत्रकारांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केले आहे आणि गोष्टींकडे ते आमचे लक्ष वेधत असतात काही बाबी आमच्या लक्षात आणून देतात चुकीचा असेल तर त्यावर टीका देखील करतात परंतु सुदृढ प्रशासनासाठी या बाबी आवश्यक आहेत श्रीरामपूरचे पत्रकारांचे पोलीस खात्याला नेहमी सहकार्य आहे ते पुढे मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार रमण मुथा यांनी सध्या शहरांमध्ये अनेक प्रश्न आहेत त्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे पूर्वीच्या काळी असणारी कामकाजाची पद्धत आता बदलली आहे त्यामुळे पत्रकार आणि पोलीस यांनी एकमेकाला सहकार्य करणे आवश्यक आहे असे सांगितले.

मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सलीमखान पठाण यांनी शहरातील कायद्यावर सुव्यवस्थेकडे लक्ष वेधताना गेल्या वर्षभरामध्ये शहरामध्ये अनेक स्फोटक प्रसंग आले मात्र पोलीस निरीक्षक देशमुख व त्यांच्या सर्व टीमने अतिशय कुशलतेने परिस्थिती हाताळली त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले सन आणि उत्सवाच्या प्रसंगी झेंडे लावणे गैर नाही मात्र त्याला काल मर्यादा असावी शिवाजी चौक सय्यद बाबा चौक आणि मौलाना आझाद चौकामध्ये लावलेले झेंडे काढून घेणे आवश्यक आहे अन्यथा या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे अशी सूचना केली.

संपादक करण नवले यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात आता सायबर सेलची आवश्यकता भासत आहे कारण सायबर क्राईम मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे या संदर्भात नवीन तंत्रज्ञान व पोलीस तपासासाठी पत्रकार व पोलिसांची एखादी कार्यशाळा आयोजित करावी अशी सूचना केली.

जय सावंत यांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि पोलिसांचे सलोख्याचे संबंध आहेत आम्हाला पोलिसांचे सहकार्य मिळते तसेच आमच्या सूचना देखील विचारात घेतल्या जातात फक्त एक दिवस कौतुक न करता वर्षभर असे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

अध्यक्षस्थानावरून बोलताना बाळासाहेब आगे यांनी श्रीरामपूरची परिस्थिती आता बदलली आहे राखीव मतदार संघ असल्याने पूर्वीसारख्या संघर्ष येथे नसला तरी मागील काही काळामध्ये शहराच्या कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत परंतु पोलिसांनी योग्य रीतीने परिस्थिती हाताळल्याने शहर शांत राहिले आगामी काळात नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्या दृष्टीने पोलिसांनी प्रत्येक भागामध्ये शांतता कशी राहील याकडे लक्ष द्यावे अशी सूचना केली.

याप्रसंगी उपस्थित पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोकराव गाडेकर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश रक्ताटे जेष्ठ पत्रकार रमण मुथा करण नवले प्रदीप आहेर सलीमखान पठाण महेश माळवे अनिल पांडे मधुकर माळवे गौरव साळुंके सचिन उघडे राजेंद्र बोरसे मामा विशाल वर्धावे स्वप्निल सोनार स्वामीराज कुलथे   जयेश सावंत असलम दिवसात शफिक पठाण विजया बारसे व इतर उपस्थित पत्रकाराचा पोलीस निरीक्षक देशमुख उपनिरीक्षक मगरे सोळुंके आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांनी मानले.

बेलापूर*(प्रतिनिधी)-वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे कार्यरत असणारे राजेंद्र सखाराम कासोदे यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली असून त्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे राजेंद्र कासोदे  हे मूळचे आगर वाडगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथील रहिवासी असून सन 1990 मध्ये ते छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस भरती झाले होते सन 1990 ते 1993 त्यांनी पोलीस मुख्यालय येथे सेवा केली त्यानंतर सन 1993 ला एस आय डी मुंबई यांचे मार्फत बॉम्बशोधक पथकात काम केले 1997 ला महामार्ग रस्ता सुरक्षा पथक ट्रॅफिक मध्ये सेवा केली 2000 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा कार्यालयामध्ये सेवा केली 2004 ते 2009 ग्रामीण ट्रॅफिक पोलीस म्हणून सेवा केली 2009 ते 2014 छत्रपती संभाजीनगर येथे बॉम्बशोधक पथकात सेवा केली 2014 ते 2021पोलीस स्टेशन विरगाव येथे सेवा केली 2021 ते 2024 त्यांनी पोलीस स्टेशन वैजापूर येथे काम केले त्यांना  नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली असून आपल्या समाजाच्या दृष्टीने ही एक आनंदाची बाब आहे त्यांच्या हातून अशी सेवा घडो सदिच्छा अनेक नियुक्ती केली कासोदे यांना मिळालेल्या बढतीबद्दल अनेकांनी त्यांच्या अभिनंदन केले आहे

बेलापूर (प्रतिनिधी)-शासनाने हॉटेलमधून प्लॅस्टिकच्या कपामध्ये चहा देण्यावर बंदी घातलेली असताना बेलापूर गाव व परिसरात सर्व हॉटेलमध्ये सर्रासपणे नियमाचे उल्लंघन करून प्लास्टिक कप मध्ये चहा दिला असून हा प्रकार म्हणजे ग्राहकांच्या आरोग्याची खेळण्याचाच प्रकार असून बेलापूर ग्रामपंचायत ने याबाबत तातडीने दखल घ्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे    बेलापूर गाव व परिसरात अनेक हॉटेल्स असून या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या नावाने दर्जेदार चहाची विक्री केली जात आहे बेलापूर गावात चहा पिणारे अनेक शौकीन देखील आहेत या चहा शौकिनांची हाऊस पुरवण्याकरता चहा विक्रेत्यांनी वेगवेगळ्या नावाने इतरांपेक्षा आपण कसा दर्जेदार चहा ग्राहकांना देऊ या करता प्रत्येक जण प्रयत्नशील आहे परंतु ही विक्री करताना चहा पिण्यासाठी वापरण्यात येणारे कपबशी, काचेचे ग्लास हे धुण्याचा त्रास होऊ नये म्हणून वापरा आणि फेका अशा प्रकारचे प्लास्टिकचे कप वापरले जात होते परंतु हे कप चहा पिणाराच्या आरोग्यास घातक असल्यामुळे शासनाने या प्लास्टिक कप वर बंदी आणलेली आहे असे असतानाही बेलापुरातील सर्व हॉटेल्स वर ग्राहकांना या प्लॅस्टिकच्या कप मधूनच चहा दिला जात असून प्रशासनाने याबाबत दखल घ्यावी व हॉटेल व्यवसायिकांना प्लॅस्टिकचे कप वापरण्यावर बंदी घालावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे

बेलापूर प्रतिनिधी: अंधश्रद्धेमुळे समाजाचे शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान होत असल्यामुळे सर्वांनी अंधश्रद्धेपासून दूर राहावे, श्रद्धा ठेवा, परंतु अंधश्रद्धा, अंधविश्वास ठेवू नका असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते देविदास देसाई यांनी केले.              

बेलापूर खुर्द येथील श्री हरिहर केशव गोविंद भगवान बन येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व रयत शिक्षण संस्थेचे रावबहादूर नारायणराव बोरावके कॉलेज ,श्रीरामपूर आणि स्वामी सहजानंद भारती कॉलेज ऑफ एज्युकेशन श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष संस्कार शिबिर सन 2024- 25 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबिरार्थी समोर मार्गदर्शन करताना ते  प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 

शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना देविदास देसाई पुढे म्हणाले की श्रद्धा असावी‌. पण ती डोळस असावी. आज समाजात देवाधर्माच्या नावाखाली खुलेआम फसवणूक केली जात आहे. अंगात येणे हा एक मानसिक आजार असून अशा आजारी व्यक्तींना त्वरित मानसोपचार तज्ञाकडे नेणे आवश्यक आहे. भूत, भानामती, करणी करण्याच्या नावाखाली आज मोठ्या प्रमाणात आर्थिक  फसवणूक केली जात आहे. यातून समाजाची फार मोठी हानी होते. कुणालाही जादूटोणा तंत्र मंत्र करता येत नाही. असे जर  असते तर आपण आपल्या देशाच्या सीमेवरील सैन्य हटवून हे तंत्र मंत्र करणारे बुवा बाबा यांनाच सीमेवर बसवून मंत्र मारून समोरील शत्रूसैनिक मारण्यास सांगितले असते. परंतु तसे काही होत नाही. त्यामुळे कुणीही तंत्र मंत्र विद्या वशीकरण यास घाबरून जाऊ नये. आपल्या साधूसंतांनी देखील अंधश्रद्धेवर कडाडून टीका केलेली आहे. सोळाव्या शतकात संत तुकाराम महाराजांनी नवसे करणे कन्यारत्न होती, तरी का करणे लागे पती असे सांगितलेले असतानाही आजही मुलं होण्याकरता नवस केले जातात हे दुर्दैव आहे. आज गुप्तधनाच्या लालसेपोटी नरबळी दिल्याच्याही घटना घडत आहेत. माणूस  मंगळ ग्रहावर वस्ती करण्याच्या प्रयत्नात असतानाच गुप्तधनाच्या लालसे पोटी लहान बालकांचे बळी दिले जात आहेत हे दुर्दैवच म्हणावे लागेल. माता पित्याची जिवंतपणीच सेवा करा. भविष्य हे थोतांड असून त्यावर विश्वास ठेवू नका. आपल्या मनगटावर विश्वास ठेवून काम करा यश आपोआपच मिळेल. भविष्य म्हणजे ठराविक ठोकताळे  असतात असे ते म्हणाले. त्यावेळी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत असताना पकडलेल्या भोंदू बाबाचे अनेक किस्से विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांनीही त्यास टाळ्याच्या गजरात भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. जलाल पटेल  यांनी करून दिला. अध्यक्षिय मनोगत डॉ. योगिता रांधवणे यांनी व्यक्त केले. त्यातून त्यांनी अंधश्रद्धेच्या विचारापासून सर्वांना दूर राहण्याचे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाधिकारी डॉ. बाबासाहेब तोंडे, प्रा. डॉ. किरण थोरात, प्रा. कीर्ती अमोलिक, डॉ. चेतना जाधव, प्रा. वैशाली वाघ, प्रा. समीना शेख, प्रा. प्रतिभा गाडे आदीसह विद्यार्थी विद्यार्थिनी व नागरिक उपस्थित होते. शेवटी प्राध्यापक डॉक्टर भागवत शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले

खंडाळा (गौरव डेंगळे) : खंडाळा येथील चित्तरंजन येथे गट नंबर ५३,५४,५५  शॉर्टसर्किटमुळे रविवार (दि.५ जानेवारी) लागलेल्या आगीत ८ ते १० एकर ऊस खाक झाल्याने शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.या शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.

खंडाळा येथे रविवारी दुपारी १:०० वाजेच्या सुमारास विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे ऊस पिकाला आग लागली. यामध्ये शेतकरी नवनाथ गंगाधर ढोकचौळे, रावसाहेब रंगनाथ ढोकचौळे, बबन किसन ढोकचौळे, सागर शंकर सदाफळ या शेतकर्‍यांच्या शेतातील ऊस व ठिबक सिंचन जळून गेला.या सर्वांची शेती एकमेकाला लागून असून,या सर्वच ८ ते १० एकरामधील क्षेत्रावर उसाचे पीक होते. या ठिकाणी अचानक वीजवाहक तारांमध्ये घर्षण होत उसाला आग लागली. यावेळी प्रवारा कारखान्याचा अग्निशमन बंब बोलावला गेला होता. पण आटोक्यात काय आग आली नाही.गावातील १०० ते २०० युवकांनी देखील आज आग विजवायचा प्रयत्न केला. यावेळी कामगार तलाठी पवार भाऊसाहेब व त्यांचे सहकारी दिलीप रंधे यांनी घटनास्थळी येऊन जळीताचा पंचनामा केला.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): नुकत्याच सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने ५० वी कुमार व कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये आझाद क्रीडा मंडळचा खेळाडू जयंत बाळासाहेब काळे याची महाराष्ट्र राज्याच्या संघामध्ये निवड झाली आहे.

उत्तराखंड येथे होणार अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने उत्तराखंड कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने

५० वी कुमार-कुमारी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जयंत काळे महाराष्ट्र संघामध्ये आपल्या खेळाची चमक दाखवणार आहे.सांगली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. गेली २ ते ३ वर्षापासून तो टाकळीभान येथील आझाद क्रीडा मंडळ या ठिकाणी कबड्डीचा सराव करत आहे. जयंत हा वाकडी येथील प्रगतशील शेतकरी श्री हरिभाऊ विठ्ठल काळे यांचा नातू व बाळासाहेब हरिभाऊ काळे यांचा चिरंजीव आहे.कबड्डी खेळाचे तज्ञ प्रशिक्षक रवींद्र गाढे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.निवड झाल्याबद्दल त्याचे व्यवस्थापक अक्षय थोरात व सर्व आझाद क्रीडा मंडळाचे खेळाडू, क्रीडाप्रेमी व टाकळीभान येथील पदाधिकारी त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.

गौरव डेंगळे/दिल्ली ५/१/२०२५: सोमवार दि १३ जानेवारी २०२५ पासून भारताची राजधानी दिल्ली येथे पहिली खो-खो विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे.यामध्ये एकूण २४ संघांनी सहभाग नोंदवला असून यजमान भारतासह अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, ब्राझील, इंग्लड, जर्मनी, घाना, इंडोनेशिया, इराण, केनिया, मलेशिया, नेपाळ, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, पेरू, पोलंड, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, श्रीलंका, युगांडा आणि अमेरिका एवढे देश सहभागी होत आहेत. 

भारताच्या ग्रामीण भागासह शहरी भागात देखील खो-खो खेळ प्रसिद्ध असून या खेळाचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. आता हा खेळ जागतिक पातळीवर खेळला जाणार असल्याने खो-खो प्रेमींसाठी ही एक पर्वणी असणार आहे. भारताचे पारडे या विश्वकरंडक स्पर्धेत जड वाटत असले तरी शेजारील आशियाई देशांकडून देखील चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. #TheWorldGoesKho हा हॅशटॅग या स्पर्धेसाठी वापरण्यात येत असून नुकतेच शुंभकर म्हणून तेजस आणि तारा यांचे देखील अनावरण झाले आहे.पुरुष आणि महिला यांची एकत्रितपणे होणारी ही स्पर्धा खो-खो खेळाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरेल यात काही शंका नाही. खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख सुधांशू मित्तल यांनी खो-खो हा खेळ ऑलम्पिक पर्यंत घेऊन जाण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.त्यामुळे या खेळाकडे शाळकरी मुलांसह तरुण वर्ग अजून आकर्षित होईल. भारताचा स्वतःचा असणारा हा खेळ जागतिक स्तरावर खेळला जात असल्याचा आनंद खो-खो प्रेमींमध्ये दिसून येत आहे.

कोपरगांव (गौरव डेंगळे): एकीकडे,तंत्रज्ञानाच्या मॉडेलचे प्रात्यक्षिक जे गणित आणि विज्ञानाच्या ज्ञानावर आधारित जीवन सोपे आणि सुरक्षित बनवते.विज्ञान मॉडेल्स वायू प्रदूषण,वाहतूक समस्या, पावसाचा अभाव,पर्यावरण संरक्षण,इत्यादी समस्यांवर उपायांची आशा निर्माण करत होते.मुली आणि शिक्षकांनी गणित आणि विज्ञान शिकवण्याच्या सोप्या पद्धती, खेळातून शिकणे,सेंद्रिय शेती आणि खते,हिंदी-इंग्रजी व्याकरण डझनभर मॉडेल्सवर चर्चा केली आणि मेळ्यात कारखान्यांमधून निघणारा धूर आणि चौकाचौकांवरील

वाहनांमधून निघणारा धूर कार्बनमुक्त करण्यासाठी,अंमली पदार्थांचे व्यसन आणि डोळ्यांच्या आजारांच्या समस्येला तोंड देण्यासाठी तक्ते तयार करून प्रदर्शित करण्यात आले.सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल,कोपरगाव येथे शालेय स्तरावर गणित-विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये ३०० पेक्षा अधिक उपक्रम विद्यार्थ्यांनी तयार केले होते.इयत्ता १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी गणित-विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा संदीप जगझाप व प्रा शेख हे होते. यावेळी शाळेचे प्राचार्य श्री के एल वाकचौरे,उपप्राचार्या सौ शुभांगी अमृतकर, पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे,सौ पल्लवी

ससाणे,सौ नैथलिन फर्नांडिस यांच्यासह गणित व विज्ञान विषयाचे सर्व शिक्षक तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.प्रा जगझाप म्हणाले की, आत्मविश्वास आणि प्रबळ इच्छाशक्ती हा यशाचा मूळ मंत्र आहे.एखाद्या व्यक्तीला अपयशातून यशाचे चांगले मार्ग सापडतात.प्रा शेख यांनी प्रदर्शनात मुलांनी बनवलेल्या विविध प्रकल्पांचे कौतुक केले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget