१२२ विद्यार्थी ' क ' श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.इंटरमिजिएट परीक्षेत घवघवीत यश संपादन करून दैदिप्यमान निकालाची परंपरा कायम राखली.परीक्षेस प्रविष्ट सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे कला शिक्षक श्री मंगेश गायकवाड यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले होते.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री.के.एल.वाकचौरे, उपमुख्याधिका सौ.अमृतकर, पर्यवेक्षिका सौ.पहाडे,सौ. ससाणे,के.जी.प्रमुख सौ. फर्नांडिस,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
पक्षाचे आपल्यावर टाकलेला विश्वास आणी जबाबदारी यास पुर्णपणे सार्थ करण्याचा प्रयत्न करणार असुन पक्ष वाढीसाठी आहोरात परिश्रम घेवून कार्यकर्त्यांची मोठी फळी जिल्ह्यात उभी करुन जनसामान्यांचे ज्वलंत प्रश्न आणी त्यांच्या न्याय हक्कासाठींचा लढा हा अधिक जोमाने पुढे नेणार आहे सोबतच येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका, महानगर पालिका, ग्रामपंचायत अशा सर्वच निवडणुकीत समाजवादी पक्ष पुर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरणार असल्याचे यावेळी जोएफ जमादार यांनी सांगितले.
आजवरच्या इतिहासात संस्थेला उच्चांकी उत्पन्न व नफा
बेलापुर (प्रतिनिधी) श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी १२ कोटी २४ लाख ५१ हजार ६८१ चा मुळ अर्थसंकल्प पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सादर केला असुन संस्थेला आजवरच्या वाटचालीत विक्रमी उत्पन्न व नफा मिळाला असल्याची माहिती सभापती सुधीर पा. नवले व प्रभारी सचिव साहेबराव वाबळे पा .यांनी दिली आहे
श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या कामकाजा विषयी माहीती देताना सभापती सुधीर नवले व प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी पुढे सांगितले की, संस्थेची दि.३० एप्रिल २०२३ रोजी निवडणूक होऊन दि.१३ मे २०२३ मा.आ.भानुदास मुरकुटे व युवा नेते करण दादा ससाणे यांच्या नेतृत्वाखाली नवीन संचालक मंडळ कार्यरत झाले आहे. संस्थेला डिसेंबर २०२३ अखेर २ कोटी ४३ लाख ७२ हजार ६६० रुपयांचे उत्पन्न मिळाले असुन ७१ लाख ७० हजार ५८२ रुपयांचा नफा झाला आहे.
या बजेटमध्ये मुख्य बाजार आवारात ८ कोटी १३ लाख व बेलापूर व टाकळीभान उपबाजार आवारातील १ कोटी ९५ लाखांची नियोजित बांधकामे समाविष्ट आहेत. तसेच संस्थेमार्फत एक नवीन उपबाजार, टाकळीभान येथे पेट्रोल पंप उभारणे, जनावरांच्या बाजार वाढीसाठी आवश्यक ते प्रयत्न करणे, फळे व भाजीपाला विभागात शितगृह उभारणी, नवीन डाळिंब मार्केट सुरु करणे आदी कामे करण्याचा मानस आहे. संस्थेला आजपर्यंत झालेल्या अर्थसंकल्पीय बजेटपुर्वीच्या डिसेंबर २०२३ अखेर २ कोटी ४३ लाख ७२ हजारांचे विक्रमी उत्पन्न मिळाले असुन ७१ लाख ७० हजारांचा नफा मिळाला आहे, आजवरच्या वाटचालीत हे उत्पन्न आणि नफा उच्चांकी असल्याचे सभापती नवले यांनी सांगितले. संस्थेचा कारभार अतिशय पारदर्शक व काटकसरी पद्धतीने सुरु असल्याची माहिती प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली.
तसेच संस्थेच्या बँकेत तीन कोटी आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी एक कोटी अशा एकुण चार कोटींच्या मुदत ठेवी आहेत. पणन संचालक यांच्याकडे चार कोटींची कामे मंजुरीसाठी प्रलंबित असल्याचेही सभापती नवले व प्रभारी सचिव वाबळे यांनी सांगितले.
तिलक डुंगरवाल, विकास डेगळे, राहुल रणपिसे, भरत डेगळे, श्रीधर कराळे पाटील, प्रशांत बागुल ,प्रवीण लगडे, सलीम शेख, अमोल नवघरे, ,डाॅ प्रवीण राठोड,,डाॅ सचिन थोरात, राज डेंगळे, भागवत बोंबले, देवराज मुळे ,मनोज बोंबले, मोहन तेलोरे , महेश कवठाळे, प्रवीण काळे ,गणेश भडांगे, शिवा मोरे, संदीप शिरसाट, मुबारक शेख, महबूब प्यारे, युवराज घोरपडे ,निलेश घोरपडे, सतीश सुलताने, अभिजीत राऊत, प्रसाद कटके, अलीम भाई शेख, विशाल शिरसाट, भागवत घुगे ,सुभाष भडांगे, शिवशंकर मोरे, नितीन मोरे ,गणेश पवार, प्रदीप ऊडे, राहुल राऊत, शुभम मालकर, गोकुळ जाधव, जयेश खर्डे, गणेश गवारे, विजय भवार, आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते
बेलापुर (प्रतिनिधी )- अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी प्रभु श्रीरामचंद्राच्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सर्व मांसाहारी पदार्थ ( चिकन मटन मासे )विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा ऐतिहासीक निर्णय बेलापुरातील मांस व मासे विक्री करणाऱ्या व्यवसायीकांनी घेतला असुन या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे . बेलापुर जन्मभूमी असलेले गोविंददेवागिरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास यांची प्रभु श्रीराम मंदिराच्या खजिनदार पदी नियुक्ती झाल्यानंतर ते प्रथमच बेलापुरात आले असता मुस्लिम समाजाने त्यांना मस्जिदमध्ये नेवुन राम मंदिर उभारणीसाठी ५१ हजार रुपयांची देणगी दिली होती तसेच आषाढी एकादशी व बकरी ईद हे सण एकाच दिवशी येत असल्यामुळे हिंदु बांधवच्या उपवासाचे महत्व लक्षात घेवुन दोन दिवस कुर्बानी न देण्याचा निर्णयही बेलापुरातील मुस्लिम बांधवांनी घेतला होता . त्याच धर्तीवर बेलापुर ग्रामपंचायतीच्या वातीने
बेलापूर बु ग्रामपंचायत कार्यालय येथे चिकन,मटन, मासे विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली.या बैठकीत अयोध्या येथे दिनांक २२ जानेवारी रोजी प्रभु श्रीराम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असल्याने या दिवशी चिकन, मटण, मासे आदी विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात यावी अशी विनंती उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, चंद्रकांत नवले यांनी सर्व विक्रेत्यांना केली या विनंतीला मान देत सर्व व्यवसायीकांनी दिनांक २२ जानेवारी रोजी आपली दुकाने बंद ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. यावेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,चंद्रकांत नवले,ग्राम विकास अधिकारी मेघशाम गायकवाड, बाबुराव पवार,मारुती गायकवाड, फरहान कुरेशी, शाहरुख शेख, मुस्तकिम सय्यद, फिरोज सय्यद, श्रीलाल गुडे, जुबेर कुरेशी, अबीद पठाण,रामू गुडे रज्जाक पटेल, मुझफर कुरेशी,कय्युम कुरेशी, उबेद कुरेशी, गोलू आतार आदी उपस्थित होते.खेळाडूंच्या पालकांच्या हस्ते श्रीफळ फोडून झाली स्पर्धेला सुरुवात
येथील महाले पोदार क्रीडा संकुलच्या व्हॉलिबॉल मैदानावर चौदा वर्षाखालील मुला-मुलींच्या पुणे विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेची आज निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या निवड चाचणीसाठी पुणे जिल्हा,अहमदनगर जिल्हा व सोलापूर जिल्ह्यातून सुमारे १५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन प्रा सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाले प्रतिष्ठानचे श्री ओम महाले, दैनिक स्नेहप्रकाश कार्यकारणी संपादक श्री स्वामीराज कुलथे,श्री सनी हिरन,श्री पार्थ दोशी, कुलदीप कोंडे,श्री पापा शेख, नितीन बलराज,श्री शैलेंद्र त्रिपाठी,श्री शंभूराजे मनुर,सर्वेश राठी,धनंजय माळी, नितीन फुलपगार सह आदी मान्यवर उपस्थित होते .प्रा देशमुख यांनी निवड चाचणी स्पर्धेपूर्वी सर्व खेळाडूं तंदुरुस्त राहण्यासाठी काही व्यायामाचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी या सर्व व्यायाम प्रकाराचा खेळाडूंबरोबर पालकांनी देखील आनंद घेतला.
या निवडचाचणीतून संभाव्य १६ मुले व १६ मुलीच्या पुणे विभाग संघाची घोषणा करण्यात आली आहे. स्पर्धेपूर्वी होणाऱ्या शिबिरातून अंतिम १२ मुले व १२ मुलीच्या संघाची घोषणा करण्यात येईल अशी माहिती श्री नितीन बलराज यांनी दिली. दिनांक २४ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान मिरज येथे राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित होणार आहे.
ज्येष्ठ संपादक शौकत शेख व त्यांचे चिरंजीव मोहसीन शेख यांनी पत्रकारदिनी सुरू केलेल्या "मोहसिन-ए-मिल्लत" या मासिकाच्या प्रकाशनप्रसंगी येथील समता कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट समोरील संत मदर तेरेसा सर्कल प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हाजी इलाहिबक्ष कुरेशी हे होते.
मासिकाचे संपादक मोहसिन शेख यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ संपादक शौकत शेख,
माजी नगरसेवक नजीर मुलाणी, महेबुब कुरेशी, तौफिक शेख, असिफ तांबोळी, जाफर शहा, सलाऊद्दीन शेख, मुखतार मनियार,असलम बिनसाद, हाजी लतीफ सय्यद, रियाजखान पठाण, स्वामीराज कुलथे, विजय खाजेकर, डी.एल.भोंगळे, आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मिलिंदकुमार साळवे म्हणाले, महाराष्ट्रातील झोपडपट्टी पासून ते महालापर्यंत राहणाऱ्या सर्व आर्थिक व सामाजिक घटकातील वर्गाला ५ लाख रूपयांच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करणाऱ्या या मोफत आरोग्य विम्याचा गोरगरीब जनतेस मोठा लाभ होणार आहे.
२८ जुलै २०२३ रोजी या अतिशय महत्त्वाच्या योजनेचा शासन निर्णय जारी झाला आहे. त्यानुसार महाराष्ट्र सरकारची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व केंद्र सरकारची आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. महाराष्ट्रात २ जुलै २०१२ पासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्यापेक्षा कमी अशा कुटुंबांचा म्हणजेच दारिद्र्यरेषेखालील पिवळे शिधापत्रिकाधारक, अंत्योदय, अन्नपूर्णा व दारिद्र्यरेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक यांचा या योजनेत समावेश होता. पात्र कुटुंबाला मोफत आरोग्य विमा संरक्षण देण्यात आले होते. यासाठीचा विमा हप्ता महाराष्ट्र सरकार भरत होते. त्यामुळे रुग्णाला मान्यताप्राप्त रुग्णालयात कोणतीही रक्कम द्यावी लागत नव्हती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर २०१४ मध्ये या योजनेचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे नामकरण करून यासाठी मंत्रालयात विशेष कक्षही सुरू करण्यात आला. दरम्यान २३ सप्टेंबर २०१८ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात केंद्र सरकारची आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना २३ सप्टेंबर २०१८ पासून लागू केली. १ एप्रिल २०२० च्या शासन निर्णयानुसार केंद्र व राज्याच्या दोन्ही योजनांची एकत्रित अंमलबजावणी सुरू झाली. केंद्राच्या योजनेत ५ लाखांचा, तर राज्याच्या योजनेत दीड लाख रुपये प्रति कुटुंब, प्रतिवर्ष आरोग्य विमा संरक्षण लाभ देय करण्यात आला.
२८ जुलै २०२३ ला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयानुसार केंद्र व राज्य अशा दोन्ही योजनांची एकत्रित सांगड घालून महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या सर्व १२ कोटी जनतेला सरसकट ५ लाख रूपयांचे आरोग्य विमा संरक्षण लागू करण्यात आले. राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबे व महाराष्ट्राचे रहिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांना सुधारित महात्मा फुले ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना लागू केली आहे. विम्याचे पैसे महाराष्ट्र सरकार संबंधित विमा कंपनीस देणार असल्याने १२ कोटी महाराष्ट्रवासियांना योजनेच्या यादीतील रूग्णालयांमधून ५ लाख रूपये खर्चापर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत, असेही साळवे यांनी सांगितले.
----------------------------
*सध्या यांना मिळते केंद्राचे कार्ड*
सध्या २०११ च्या सामाजिक, आर्थिक, जातनिहाय सर्वेक्षणाच्या यादीत नाव असणारांनाच केंद्र सरकारच्या योजनेचे कार्ड ऑनलाईन मिळत आहे. त्यासाठीही शिधापत्रिकेचा बारा अंकी क्रमांक व आधार क्रमांक गरजेचा आहे. अनेकांकडे शिधापत्रिकेचा बारा अंकी ऑनलाईन क्रमांक नसल्याने त्यांना हे कार्ड मिळत नाही. त्यामुळे शिधापत्रिकेऐवजी थेट आधार क्रमांक व मतदार ओळखपत्राद्वारे रहिवासी असल्याची खात्री करून नव्या योजनेचे कार्ड तातडीने वाटप करण्याची मागणी मिलिंदकुमार साळवे यांनी केली आहे.
-------------------------------
*यामुळे रखडली योजना*
अंमलबजावणी सहाय्य संस्था व अंगीकृत रूग्णालयात आरोग्य मित्रांची नियुक्ती, योजनेच्या आज्ञावलीत बदल, राज्य आरोग्य हमी सोसायटी स्तरावर मनुष्यबळ नियुक्ती, एकत्रित योजनेच्या अंमलबजावणीसाठी नव्या विमा कंपनीची निवड अशी कार्यवाही न झाल्याने योजना मंत्रालयात रखडली आहे.
--------------------------------
*जनतेतून साकारली योजना*
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी जनतेकडून सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार मी विदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी किमान ५ लाख रूपयांचा आरोग्य विमा (मेडिक्लेम) योजना लागू करण्याची सूचना केली होती. तिची दखल घेऊन ही योजना साकारली, याचा आनंद आहे. शासन जनतेचा आवाज ऐकते,याचा प्रत्यय यातून आला. मंत्रालयातील कार्यवाही जलदगतीने पूर्ण करून तातडीने योजनेची अंमलबजावणी झाली पाहिजे.
*--मिलिंदकुमार साळवे,* मिशन वात्सल्य शासकीय समिती, महाराष्ट्र साऊ एकल महिला पुनर्वसन समिती.
----------------------------------------
👇 *बॉक्स मध्ये घेणे* 👇
*प्रत्येक समाजातील महिलांनी पुढे येवून प्रत्येक कार्यक्रमात सहभाग नोंदवणे गरजेचे - दिपालीताई ससाणे*
*पत्रकार दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या मोहसिन ए मिल्लत या* *वर्तमानपत्र प्रकाशन सोहळ्यात महिलांचा मोठा सहभाग लाभला*
*या कार्यक्रमास महिलांसाठी खास स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली होती. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव दिपालीताई ससाणे यांच्या हस्ते यावेळी मोहसिन शेख संपादित मोहसिन ए मिल्लत या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.*
*या प्रसंगी मोहसिन ए मिल्लत या वृतपत्रास शुभेच्छा व्यक्त करताना आपल्या शुभेच्छापर भाषणात सौ.ससाणे म्हणाल्या की, महिलांनी चुल आणि मुल यापर्यंतच मर्यादित न राहता प्रत्येक समाजातील महिलांनी प्रत्येक कार्यक्रमात पुढे येवून कामे केली पाहिजेत असे प्रोत्साहनही यावेळी त्यांनी महिलांना दिले. तसेच या कार्यक्रमात महिला भगीनींची मोठी उपस्थिती पाहून तथा मोहसिन ए मिल्लत या वृतपत्राच्या अनावरण सोहळ्यास उपस्थित राहुन मनाला मोठे समाधान मिळाले असल्याचे ते म्हणाल्या.*
----------------------------------------
यावेळी महेबुब कुरेशी, हाजी लतीफभाई सय्यद,नजीर मुलाणी, रियाजखान पठाण, जोएफ जमादार, हाजी इलाहिबक्ष कुरेशी, मुखतार मनियार, आसिफ मनियार, असलम बिनसाद, विजयराव खाजेकर , शौकत शेख, ॲड. मुमताज बागवान, सलवा शेख, फरजाना शेख आदींची शुभेच्छापर भाषणे झाली.
यावेळी बोलताना शौकत शेख म्हणाले की ज्येष्ठ पत्रकार मिलिंद कुमार साळवे यांनी शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती ही खुपच सविस्तरपणे याप्रसंगी दिली आहे,
मोहसिन ए मिल्लत या वर्तमानपत्राच्या माध्यमातून देखील घराघरात शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्याची कामे केली जाणार असुन त्या अनुषंगाने अभा कार्ड/ आयुष्यमान भारत कार्ड कार्ड/ ई- श्रम कार्ड/ पेन्शन कार्ड याची सविस्तर माहिती सदरील अंकात सविस्तरपणे प्रकाशित करण्यात आलेली आहे, याप्रमाणेच शासनाच्या आणखी ज्या काही विविध जनकल्याणकारी योजना आहेत त्याची माहिती देखील प्रत्येक अंकात सविस्तरपणे दिली जाणार आहे, आमच्या मोहसिन ए मिल्लत कमेटी चा उद्देश केवळ हाच आहे की शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती ही तळागळातील जनसामान्यांपर्येंत पोहोचावी आणी त्यात त्यांचा फायदा व्हावा,शासनाने त्यांच्यासाठी निर्माण केलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांची त्यांना घरबसल्या माहीती मिळावी,यासाठी खास करुन सदरील कामी कार्यरत असलेल्या विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या मुलाखती देखील क्रमाक्रमाने या अंकात सविस्तरपणे प्रकाशित केल्या जाणार असल्याचेही ते म्हणाले.
या कार्यक्रमास माजी नगरसेवक नजीर मुलाणी, रियाजखान पठाण, हाजी लतीफभाई, महेबुब कुरेशी, जाफर शाह, शेख नजीर गफूर (मामु), जोएफ जमादार, तौफिक शेख (एकता), शेख शब्बीर (सर), अजहर शेख (एबीएस), असिफ तांबोळी, फिरोज शेख, रज्जाक पठाण, शेख जाकीर (सर), मास्टर सरवरअली सय्यद, सलाऊद्दीन शेख, इब्राहिम शेख, असलम बिनसाद, इम्रान एस. शेख, विजयराव खाजेकर, दशरथ भोंगळे, प्रविण साळवे, डॉ. पंडितराव पगारे, रमाताई भालेराव, परवीनभाभी शाह, विजय पाठक, दिलीप शेंडे (सर), ॲड.मुमताज बागवान, हाजी साजीद मिर्जा, शकील बागवान (सर), जलील कुरेशी (सर), समीर बागवान, लकी सेठी, जावेद पिंजारी, अजिज अत्तार, असिफ मंडपवाले, पत्रकार बाबासाहेब चेडे, राजेश भवार, नंदकुमार बगाडे, सचिन भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोहसिन ए मिल्लत कमेटी चे शौकतभाई शेख, मोहसिन शेख, हाजी इलाहिबक्ष कुरेशी, ॲड. हारुन बागवान, नदीमताज गुलाम, शब्बीर (राजु) कुरेशी , सरताज शेख, आरिफ कुरेशी, इब्राहिम बागवान (सर), मो.शफी अन्सारी, अफजल मेमन, मोहसिन बागवान, शब्बीर शेख, जावेद शेख, युनूस कुरेशी, हाजी फयाज बागवान, मुखतार मनियार, कलीम शेख, जाकीर शाह, समदानी शाह,जुबेर पटेल, वाजीद शेख तसेच सलवा शेख, फरजाना शेख,जेबा शाह, हिना मुलाणी, आस्मा सय्यद, जबीन पटेल, निलोफर बागवान, आर्शिया नदीम गुलाम, पूजा सकट, अनम खान आदिंनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी मोहसिन ए कमेटीचे कार्याध्यक्ष हाजी इलाहिबक्ष कुरेशी यांनी आभार मानले.
पिंच्याक सिलाट हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्टचा प्रकार असून १) स्टॅंडिंग २) तुंगल ( सिंगल काता) ३) रेगु ( ग्रुप काता ) ४) गंडा ( डेमो फाईट ) ५) सोलो ( क्रिएटिव्हिटी ) या पाच प्रकारात खेळला जातो.हा खेळ भारतीय क्रीडा मंत्रालय, 5% नोकरी आरक्षण , युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार, भारतीय विश्वविद्यालय संघ, अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड , ऑलम्पिक कौन्सिल ऑफ एशिया , एशियन गेम , एशियन मार्शल आर्ट गेम , एशियन युथ गेम व एशियन बीच गेम , राष्ट्रकुल स्पर्धा अशा ऑफिसियल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळला जातो . या स्पर्धेचे मुख्य अतिथी व आयोजक नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री गणेश शिंदे यांनी खेळाडूंना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देऊन खेळातून खेळाडूंचे नक्कीच उज्वल भविष्य निर्माण होऊ शकते , व खेळाडूंचे मानसिक व शारीरिक आरोग्य राखण्यास मदत मिळू शकते असे मोलाचे मार्गदर्शन केले. स्प
र्धा संपन्न करण्यासाठी संस्कार स्पोर्ट्स क्लबचे मुख्य प्रशिक्षक तसेच अहमदनगर असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रवीण कुदळे, राष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक नरेंद्र कुदळे, राष्ट्रीय खेळाडू राधिका खरात, कल्याणी भोसले, नारायण झांबरे, प्रशिक्षक श्री चेतन खावडिया संस्कार स्पोर्ट्स क्लबचे सर्वच खेळाडू, नगरपालिकेच्या ग्रंथपाल कुमारी स्वाती पुरे , स्वप्नील चव्हाण, इत्यादींनी यांनी परिश्रम घेतले.
सर्व यशस्वी खेळाडूंना राजकीय सामाजिक क्रीडा व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
सुमारे सव्वा लाख रुपये खर्चाच्या या गोमाता स्थापनेच्या उपक्रमासाठी सर्वश्री सोमनाथ पलोड , प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र लखोटिया आणि विश्वस्त दिपक सिकची यांनी प्रत्येकी एक्केचाळीस हजारांची देणगी दिली.
या कार्यक्रमास सर्वश्री आ. लहू कानडे, अशोक कानडे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा.नाईक, उद्योजक सुवालाल लूंकड, सचिन गुजर, शरद नवले,विराज भोसले, विलास थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे, अशोक भोसले, राजेंद्र ओहोळ, भरत साळुंके, प्रमोद कर्डीले, आनंदराम उपाध्ये, प्रा .माधव पगारे,नारायण शेडगे, सुभाष पा.नाईक,झांजरी,श्रीमती सरस्वती चायल, विश्वस्त सौ. सुरेखा चायल, सुजाता मालपाठक, सौ. पलोड, सौ.संगीता लखोटिया, आरती बिहाणी, संजना चायल, आरती सिकची,आरती झंवर,आदी उपस्थित होते. यावेळी अशोक कानडे यांना वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी सन्मानित केले.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कैलास चायल यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत करुन शेवटी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी साई पावन प्रतिष्ठान व साई सेवा समितीच्या सर्वश्री कैलास चायल, राजेंद्र लखोटीया, संजय लड्डा, रामबिलास झवर, दत्तात्रय दाभाडे, प्रशांत बिहाणी, प्रमोद कर्डीले, दिपक सिकची, रमेश पवार, शशिकांत कापसे, गोपाल चायल, आदींनी परिश्रम घेतले.
या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की राज्य शासनाने सर्व शेतकऱ्यांचे बांधावर जाऊन सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा असे आदेश असताना देखील श्रीरामपूर तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत श्रीरामपूर तालुक्यातील अनेक शेतकर्यांच्या बांधावर जाऊन आपले महसुलचे सर्कल अधिकारी, तलाठी हे व्यवस्थित रित्या पंचनामा करुन आपल्याकडे व शासनाकडे शेतकर्यांचे नाव,गाव, पत्ता बँकेचे अकौंट नंबर, पासबुक झेरॉक्स व्यवस्थित न दिल्याने अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. तसेच अनेक शेतकर्यांच्या बांधावर जाऊन शेतजमीनीचे सर्कल व तलाठ्याने पंचनामे न करता शेतकर्यांकडूनच फोटो व माहिती मागून घेऊन अर्धवट माहिती आपल्या महसुल अधिकार्यांनी शासनाकडे पाठविली. आपल्या महसुल अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळेच अनेक शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.अनेक शेतकर्यांनी आमच्याकडे तक्रार केले आहे. आपण स्वत: पुढाकार घेऊन सर्व शेतकर्यांशी संवाद साधून खरच महसुल अधिकारी शेतकर्यांच्या बांधवर जाऊन पंचनामा केला की नाही याची खातरजमा करुन दोषी आढळणार्या अधिकार्यांवर कर्तव्यात कसुरु केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात यावी. जेणे करुन यापुढे कामात कामचुकारपना होणार नाही व आपला अन्नदाता शेतकर्यांवर कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही अशी काळजी यापुढे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी घ्यावी असेही मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे . आमच्या निवेदनाची दखल घेऊन श्रीरामपूर तालुक्यातील सर्व शेतकर्यांना त्वरीत अनुदान (मदत) देण्यात यावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी दिला आहे , याप्रसंगी बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष,विलास पाटणी,मनसे उपजिल्हाध्यक्ष,
गणेश दिवसे मनसे तालुकाध्यक्ष,
सतिश कुदळे मनसे शहराध्यक्ष, संतोष धुमाळ प्रसिद्धीप्रमुख डॉक्टर संजय नवथर, भास्कर सरोदे,नितीन जाधव, ऋषभ बर्वे प्रसाद परे, अमोल साबणे, संदीप विशमबर सुरेश शिंदे, दीपक सोनवणे,राजू जगताप, सुरेश शिंदे, विकी परदेसी, नितीन खरे, मारुती शिंदे, आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.