August 2022

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-शासनावर येणारा आर्थिक भार कमी होण्याच्या दृष्टीने तसेच योग्य व गरजु लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ मिळावा या करीता सधन व्यक्तीनी अनुदानातुन बाहेर पडावे असे अवाहन श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे             शासनाने गरजु व्यक्तीना कमी दरात अन्नधान्य उपलब्ध करुन दिले असुन आजही बरेच लाभार्थी शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेपासुन दुर आहे गाव व शहर निहाय ठरवुन दिलेला ईष्टांक पुर्ण झाल्यामुळे गरजुंना लाभ देणे शक्य होत नाही . अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे कालांतराने उत्पन्न वाढले असेल तर त्यांनी या योजनेतुन बाहेर पडावे आपण असे केल्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्याकरीता शासनावर येणारा आर्थिक भार कमी होणार आहे आपण आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे त्या निमित्ताने कुटुंब प्रमुख किंवा कुटुंबातील व्यक्ती शासकीय निमशासकीय स्तरावर नोकरी करत असेल कुणी व्यापारी उद्योजक असाल आपले उत्पन्न वाढलेले असेल आपण सधन असाल तर आपण स्वताःहुन अन्नधान्याचा लाभ सोडावा .आपले आधार कार्ड  सर्व ठिकाणी लिंक करण्यात आलेले आहे त्यामुळे कुणीही आपले उत्पन्न लपविण्याचा प्रयत्न करु नये. सधन व्यक्तीनी स्वेच्छेने अनुदानाचा लाभ सोडावा या करीता असणारा फाँर्म संबधीत स्वस्त धान्य दुकानदार श्रीरामपुर तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग झेराँक्स सेंटर यांच्याकडे उपलब्ध आहेत.  शहरी भागाकरीता 59 हजार रुपये व ग्रामीण भागाकरीता 44 हजार रुपये उत्पन्नाची अट ठेवण्यात आलेली असुन या पेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या सधन व्यक्तींनी  धान्याचा लाभ सोडावा असे अवाहन तहसीलदार पाटील यांनी केले आहे .


औरंगाबाद प्रतिनिधी-माननीय श्री एचआय शेख सर यांची मानवाधिकार परिषदेच्या महाराष्ट्र

प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे व श्री के ए काजी यांची सीनियर

उपाध्यक्ष पदी महाराष्ट्र प्रदेश निवड करण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत गिरी यांनी नियुक्ती पत्र देवून

यांचे अभिनंदन केले. हे सगठन सामान्य माणसाला

न्याय मिळवून देण्यासाठी व अन्याय अत्याचार च्या

विरुद्ध काम करेल असे महाराष्ट्र अध्यक्ष एच. आय. शेख

सर यांनी सांगितले व लवकरच मानव अधिकार परीषद ची महाराष्ट्र कार्यकारणी

जाहीर करण्यात येईल असे शेख सर यांनी सांगितले.

एच. आय. शेख सर

श्री के ए काजी

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )- स्वस्त धान्य दुकानदारांच्या उत्पन्नाचा स्रोत वाढावा म्हणून शासनाने अनेक व्यवसाय धान्य दुकानाच्या माध्यमातून सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असुन त्या करीता सर्व परवाना धाराकांनी आपली दुकाने आयएसओ मानांकनासाठी सज्ज ठेवावी असे अवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी केले                 आयएसओ मानांकन व विविध व्यवसाय प्रशिक्षण संदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी म्हणाल्या की सर्व सामान्य नागरीकांचा स्वस्त धान्य दुकानदारांशी कायमचा संपर्क असतो त्यातच धान्य दुकानदारांना तुटपुंज्या प्रमाणात कमिशन मिळत असल्यामुळे  दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ व्हावी तसेच नागरीकांना चांगली सेवा मिळावी या हेतूने शासनाने सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना काँमन सर्व्हिस सेंटरचा परवाना देण्याचा निर्णय घेतला असुन या माध्यमातून दुकानदारांना अनेक व्यवसाय करण्याची परवानगी मिळणार आहे मात्र त्याकरीता प्रत्येक दुकान हे आयएसओ मानांकन होणे आवश्यक आहे त्यामुळे दुकानदारांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे दुकानाची स्वच्छता रंगरंगोटी करुन घ्यावी दुकानदारांना ठरवुन दिलेले फलक तातडीने दुकानात लावावेत दुकानात सीसीटीव्ही कँमेरे लावणे बंधनकारक आहे या सर्व बाबींची तातडीने पुर्तता करुन दुकाने आयएसओ मानांकनासाठी तयार ठेवावी असे अवाहनही माळी यांनी केले या वेळी स्टेशनरी पासून ते खात्यात पैसे भरणे पैसे काढणे रेशनकार्डात नाव दाखल करणे नाव कमी करणे दुबार रेशनकार्ड काढणे दोन चाकी चार चाकी गाडी बुक करणे आरोग्यविषयक माहीती घेणे  विमा उतरविणे गँस सिलेंडर मिळविणे विविध प्रकारचे दाखले मिळविणे या बाबत प्रात्याक्षीकासह विविध कंपन्यांच्या वतीने माहीती सादर करण्यात आली या वेळी मच्छिंद्र चितळे अशीष विर महेश वाघमारे विवेक कुलकर्णी विनोद अहीरे आदिंनी विविध योजनांची माहीती दिली या वेळी पुरवठा निरीक्षण अधिकारी राजेंद्र राऊत दत्तात्रय भावले कार्यालयीन प्रतिनिधी  मनिष सचदेव अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई सचिव रज्जाक पठाण तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले अनिल मानधना नगर तालुकाध्यक्ष विश्वासराव जाधव नगर शहरचे अध्यक्ष बाळासाहेब दिघे दिलीप गायके अजीज शेख बबलु गवारे एकनाथ थोरात आदिसह तालुका पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम यांनी केले तर पुरवठा निरीक्षण अधिकारी अभिजीत वांडेकर यांनी आभार मानले

श्रीरामपूर प्रतिनिधी- श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशन संघटनेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड शहरातील व्ही.आय.पी.गेस्ट हाऊस येथे पार पडलेल्या बैठकीत अध्यक्ष म्हणून अमितराज आहेर तर उपाध्यक्ष पदी सचिन पतंगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.*

फोटोग्राफर बंधूंच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशन ची स्थापना करण्यात आलेली असल्याने येत्या काळात संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक फोटोग्राफर साठी योग्य ते कार्य करण्याचा प्रयत्न राहीन असा आत्मविश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष अमितराज आहेर यांनी व्यक्त केला.तर गेल्या 2-3 वर्षात फोटोग्राफर तसेच संघटनेची जी हानी झालेली आहे ती भरून काढून नवीन काळात झालेले बदल फोटोग्राफर ला समजावे या साठी विविध कार्यशाळेचे आयोजन देखील मी या काळात घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देखील आहेर यांनी सांगितले. तर उपाध्यक्ष पदी नियुक्त झालेले सचिन पतंगे यांनी अध्यक्ष यांची खांद्याला खांदा लावून संघटना वाढीसाठी मी माझे पूर्ण योगदान देईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.झालेल्या बैठकीत संघटना श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे नियम, काम करण्याची पध्दत, संचालक मंडळ निवड या बाबत ची माहीत संघटनेचे सचिव अतिष देसर्डा यांनी नवीन फोटोग्राफर सदस्यांना दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण जमधडे यांनी केलेयावेळी या बैठकीचे अध्यक्ष जेष्ठ फोटोग्राफर राजू भावसार यांनी उपस्थित फोटोग्राफर मित्रांना मार्गदर्शन केले.प्रसंगी सुशील रांका,तिलक डुंगरवाल,काका गुलाटी,भानुदास बेरड ,गौरव शेटे अभिषेक पंडुरे , सतिष गायकवाड , सचिन गायकवाड ,वैभव पुंगे ,  अक्षय कुमावत,शाहरुख शेख ,विपुल तोरणे , गणेश यादव , संतोष लोखंडे , सुनील बोर गे,वीरेंद्र बागडे , सचिन परदेशी ,अतुल सोनमाळी, लक्ष्मण दाभाडे, हरी शिरसाट, भाऊसाहेब भोसले , प्रवीण जमधडे , ललित गवारे , सागर बावस्कर,आदी*


भारतीय  लहुजी सेना  अहमद नगर जील्हा प्रमुख  रज्जाक  भाई  शेख यांच्या घरी पोळा हा सन साजरा करन्यात आला त्या प्रसंगी लहुजी सेने चे बाळासाहेब बागुल हानीफभाई  पठान  प्रशांत भाऊ सलून वाले अशपाक फीटर शींपी शेठ सुफीयान भाई दीलीप राव प्रकाश गायकवाड़  शेरू भाई आदी मान्यवर उपस्थित होते

श्रीरामपूर : ३ ते ४ दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यां पासून, प्रशासन देखील तैयारीला लागले आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावा या करिता पोलीस, महसूल,महावितरण,नगरपरिषद यासह तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी शहरातील वाहतुक व्यवस्था, अखंडित विद्युप्रवाह,विसर्जन व्यवस्था, मोकाट जनावरे,सुरक्षा दृष्टीने पोलीस बंदोबस्त. यासह अनेक विषयांवर उपस्थित मान्यवरांनी आपले मत मांडले. यावेळी मांडलेल्या विविध विषय व प्रश्ना संदर्भात, सकारत्मक निर्णय घेण्यात येईल असावं असे आश्वासन, प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. प्रशासकीय इमारत याठिकाणी झालेल्या बैठकीस, प्रांताधिकारी अनिल पवार, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, मुख्याधिकारी गणेश शिंदे ,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, आदी अधिका-यांसह, अहमदभाई जहागीरदार, कामगारनेते नागेशभाई सावंत,जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, नाऊरचे सरपंच संदीप शेलार,बेलापूरचे उपसरपंच अभिषेक, खंडागळे,समाजवादी पार्टीचे जोयफ जमादार ,आपचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, माजी नगरसेवक मुक्तार शाह, कुणाल करंडे,कैलास बोर्डे, सतीश सौदागर, रियाज पठाण, पत्रकार अस्लम बिनसाद, पत्रकार देविदास देसाई, आदींसह तालुक्यातुन मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

श्रीरामपूर प्रतिनिधी-Dysp संदीप मिटके यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की नगर ते औरंगाबाद जाणारे रोड वर वडाळा  बहिरोबा शिवारातील हॉटेल साई सबुरीचे पाठीमागे काही इसम हे अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत आहेत त्यानुसार त्यांनी लगेच आपले पथकातील अधिकारी, अंमलदार आणि नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड यांच्या समवेत पुरवठा विभागातील कर्मचारी यांना सोबत घेऊन सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता सदर ठिकाणी खालील वर्णनाचा व किमतीचा अवैध मुद्देमाल मिळून आला. -1) 5,00,000 रू कि चा .   एक अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो क्रमांक MH 16 CC 2488 जु.वा कि.अं.2) 2,08,000 रू.कि च्या भारत गँसच्या  अर्धवट निळ्या रंगाच्या कमर्शिअल मोकळ्या 87 गँस सिलेन्डर 19.5किलो क्षमतेच्या जु.वा .कि.अं3) 12,000रू कि.च्या नोझलला लावलेल्या इंडियन गँसच्या  कमर्शिअल मोकळ्या 5 गँस सिलेन्डर 19.5किलो क्षमतेच्या जु.वा .कि.अं. 4) 2500 रू कि.चा एक HP कंपनीची घरघुती गँस सिलेन्डर 14.5किलो क्षमतेचा अंदाजे 5किलो गँस असलेला जु वा कि.अं.5) 1,32,000रू किमतीचे टेम्पोमध्ये  भरलेल्या भारत गँसच्या  अर्धवट निळ्या रंगाच्या कमर्शिअल भरलेले 30 गँस सिलेन्डर 19.5किलो क्षमतेचे  जु.वा .कि.अं 6)22,000 रू.कि चे टेम्पोमध्ये  भरलेले इंडियन गँसचे अर्धवट निळ्या रंगाचे कमर्शिअल 05गँस सिलेन्डर 19.5किलो क्षमतेचे  जु.वा .कि.अं 7)1200रू कि.चे निळ्या रंगाचा अंदाजे 5 फुट लांबीचा प्लास्टीक पाईप त्याला पांढ-या रंगाचे 06 नळ्या जोडलेल्या असुन प्रत्येक नळीला समोरील तोंडास नोझल जोडलेले जु.वा कि.अं. 8)1000 रू कि.चे एक 2इंच व्यासाचा लोखंडी पाईप त्याला काळ्या रंगाचे अंदाजे अर्धा इंचाचे व 5फुट लांबीचे काळ्या रंगाचे प्लास्टीकचे पाईप जोडलेले असुन त्यांना प्रत्येक पाईपला एक असे  05 नोझल जु.वा कि.अं. 9)2500रू कि.चे काळ्या रंगाचा अंदाजे दिड इंच व्यासाचा अंदाजे 25ते 30 फुट लांबीचा  रबरी पाईप जोडलेला असुन त्याच्या पुढील बाजुस लोखंडी साँकेट जोडलेले असा एकूण सुमारे नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यानुसार आरोपी विरुद्ध पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड यांचे फिर्यादीनुसार शनिशिंगणापूर गु.र.नं -97/2022भादवी कलम 379,285,34 सह जिवनावश्यक वस्तु कायदा 1955 चे कलम 3,7 सह LPG पुरवठा वितरन आणि नियमन आदेश 2000 चे कलम 3,4,5,6,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा स्वाती भोर यांचे मार्गदर्शनाखाली Dysp  संदीप मिटके , नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड, पुरवठा अधिकारी रुपाली मोडसे, Api  रामचंद्र करपे,Asi  राजेंद्र आरोळे,Hc ज्ञानेश्वर माळवे, रमेश लबडे, संतोष वाघ,Pc नितीन शिरसाठ आदींनी केली.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-अधिवेशन संपल्यावर लवकरच जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांच्या व रेशन कार्डधारकांच्या अडचणी समजुन घेवुन त्या सोडविण्याचा प्रयत्न करु असे अश्वासन महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा .यांनी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेला दिले अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेवुन दुकानदारांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या .या वेळी  दुकानदारांच्या विविध अडचणी मांडताना जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी सांगितले की जिल्ह्यात वेळेवर धान्य वहातुक न झाल्यामुळे अनेक दुकानदारांना महीना संपल्यावर धान्य उपलब्ध  होते. महीना बदलल्यामुळे ते धान्य मशिनवर दिसु शकत नाही. त्यामुळे धान्य असुनही कार्डधारकांना त्याचे वाटप करता येत नाही. पर्यायाने कार्डधारकांचे धान्य बुडते. त्यामुळे धान्य वहातुक सुरळीत करण्यात यावे गेल्या काही महीन्यापासून धान्य वाटप करण्याच्या पाँज मशिनला अनेक अडथळे येत असल्यामुळे दुकानदारांना धान्य वाटप करणे मुश्कील झाले आहे धान्य असुनही वाटप करता न आल्यामुळे दुकानदारांना कार्डधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे .माल आल्यानंतर तो वेळेवर मशिनवर टाकला जात नाही दुकानदारांनी मोफत धान्य वाटप केले परंतु त्याचे मार्जिन अद्यापही दुकानदारांना मिळालेले नाही राज्य शासनाने मे 2021मध्ये मोफत धान्य देण्याचे जाहीर केले त्याचे पैसे दुकानदारांनी भरलेले होते ते कमिशनसह परत मिळावे दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी अशा मागण्या दुकानदारांच्या शिष्टमंडळाने  नामदार राधाकृष्ण विखे पा यांच्याकडे केल्या. या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, सचिव रज्जाक पठाण, प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरगे ,श्रीरामपुर धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले, राहाता तालुकाध्यक्ष ज्ञानदेव वहाडणे, गणेश येलम ,श्रीकांत म्हस्के, कृष्णा गागरे, बाळासाहेब धनवटे ,अजीज शेख, किशोर चेचरे आदिंचा समावेश होता

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2 मध्ये अल्पवयीन मुलीस पळवून नेवून धर्मांतर करुन निकाह करत अत्याचार केल्याप्रकरणातील आरोपी मुल्ला कटर व त्याच्या टोळीला पुढे कोणतेही गुन्हे उघडकीस येवू नये म्हणून मदत केल्याप्रकरणी दोषी आढळून आलेले श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी  निलंबीत केले आहे.श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2 मधील अहिल्यादेवीनगर भागात राहणार्‍या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेवून तिचे धर्मांतर करत तिच्याबरोबर निकाह करुन सलग तीन वर्षे तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी मुल्ला कटरसह आणखी तिघा जणांविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते पोलीस कोठडीत असून त्याप्रकरणाचा तपास पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांच्याकडे होता.या प्रकरणाचा तपास करत असताना असेच आणखी काही गुन्हे उघडकीस येत असल्याचे पाहून मुल्ला कटर व त्यांच्या टोळीस पोलीस निरीक्षक संजय सानप हे मदत करत असल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला होता. मात्र त्याची दखल श्रीरामपूरात घेण्यात आली नसल्याने फिर्यादी महिलेने याबाबतची तक्रार जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली. त्यांनी याप्रकरणाची शहनिशा केली असता संजय सानप हे दोषी आढळून आले. त्यात त्यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. याप्रकरणातच दोन दिवसापूर्वी पोलीस नाईक पंकज गोसावी या पोलिसास निलंबित करण्यात आले होते. हे प्रकरण ताजे असतानाच पोलीस निरीक्षक यांच्याविरुध्दची तक्रार पाहून त्यांना निलंबित केल्यामुळे शहरात उलटसुलट चर्चा सुरु आहे.

श्रीरामपूर: सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरातील रस्त्यांवर कमालीचे खड्डे पडले आहेत या खड्डेरहित रस्त्यावर वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते, शिवाय सय्यदबाबा चौकातील रेल्वे भुयारी मार्ग या रस्त्यावर वाहन चालविणे तर सोडाच पादचाऱ्यांना पायी चालणे देखील मोठे मुश्किल झाले होते.अशात या खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे छोटे - मोठे अपघात होणे हे नित्याचेच होऊन बसले होते.याबाबत समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनास संबंधित बाबी अनेकवेळा कळवूनही नगर पालिका प्रशासन कुठलीच दखल घेत नव्हते,नगर पालिकेकडे जर सदरील कामांसाठी निधी उपलब्ध नसेल तर समाजवादी पार्टी भिक मांगो आंदोलनाद्वारे श्रीरामपूर न.पा.ला निधी उपलब्ध करुन देईल या अनुषंगाने जोएफ जमादार यांच्या

मार्गदर्शनाखाली समाजवादी पक्षाने भिक मांगो आंदोलन करत जनसामान्यांसोबत आपली नाराजगी दर्शविली होती,या आंदोलनात आसिफ तांबोळी, अय्यूब पठाण,इमरान शेख, रिजवान बागवान, ज़केरिया सैय्यद,अरबाज़ क़ुरैशी,रवी बोरसे, कलीम वेल्डर,अब्दुल सैय्यद, मतीन शेख, राजू शेख, साद पठाण, मुबस्शिर पठाण, गुड्डु जमादार आदींनी आपला सहभाग नोंदवला होता,या आंदोलनाची येथील उप विभागीय (प्रांत) अधिकारी तथा श्रीरामपूर नगर पालिकेचे कर्तव्यदक्ष प्रशासक मा.श्री. अनिल पवार साहेब आणि मुख्याधिकारी मा.श्री.गणेश शिंदे साहेब यांनी दखल घेत सदरील सय्यदबाबा चौकातील रेल्वे भुयारी मार्ग रस्त्याची कामे चालु केल्याने शहरातील नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेवटी उशीरा का होईना मात्र नगर पालिका प्रशासनाने समाजवादी पार्टीच्या आंदोलनाची दखल घेत सदरील कामे चालु केले असल्याने समाजवादी पार्टी तर्फे श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाचे अभार व्यक्त करण्यात येत आहे.मात्र सदरील विकास कामांनिमित्त काही दिवस सदरील मार्ग हा रहदारीकरीता बंद राहणार आहे म्हणून तृर्त पर्यायी मार्ग म्हणून वॉर्ड क्र.१ मधील सिद्धार्थनगर (मुस्लिम कब्रस्तान जवळील) ते भारत गॅस कंपनी दरम्यानच्या रेल्वे भुयारी मार्गचा वापर करुन नगर पालिका प्रशासनास सहकार्य करावे असेही श्री.जमादार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

श्रीरामपूर वार्ताहर-श्रीरामपूर येथील रेल्वे भुयारी पुलाजवळ टँकरचा अ‍ॅक्सल तुटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. सदरचे वाहन क्र एम एच 43 यु 2296 असुन यावेळी वाहन चालकाने प्रसंगावधान राखत वाहनावरील ताबा सुव्यवस्थीत ठेवला.यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु दुर्घटना अगदी बोगद्याच्या तोंडाजवळ असल्याने वाहतुकीची प्रचंड अशी कोंडी निर्माण झाली होती. यावेळी महाविद्यालयीन शालेय विद्यार्थी तहसील कार्यालय तसेच विविध प्रकारची शासकीय कार्यालय न्यायालय आदी ठिकाणच्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.घटनेची माहिती नागरिकांमधून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी देण्यात आली. यावरून पोलीस निरीक्षक संजय सानप यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शफिक शेख यांनी घटना स्थळी भेट देत वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस नाईक सचिन गायकवाड, सादिक शेख, दत्तात्रेय सातकर, तसेच गृहरक्षक दलाचे महेश थोरात, राहुल जाधव, रेवननाथ पेठे, नारायण चोरमले, हारी कदम, राजेन्द्र देसाई यांनी चोख बंदोबस्त बजावले.यावेळी नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या. मळीचे टँकर वाहतुकीसाठी बाहेरच्या मार्गाने घेऊन जाणे आवश्यक आहे. परंतु शहरांमधूनच मळीची वाहतूक होत असल्याने परिसरातील नागरिकांनी याबाबत संबधित विभागाने लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. साधारण 2 ते 3 तास वाहतुकीची कोंडी झाली असुन पोलीस प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.


बेलापूर वार्ताहर -सोमवार दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून जि प शाळा आहे ऐनतपुर येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या  उत्साहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी निळवंडे धरणाची कार्यकारी अभियंता मा.श्री आदीक निखील बाळासाहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .त्यांनी आपल्या भाषणात पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा बहुमोल सल्ला दिला .

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पत्रकार श्री दिलीप दायमा हे होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची सुंदर भाषणे ,बडबडगीत सादर केली .तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध संस्था तसेच परिसरातील व्यक्तींनी खाऊचे वाटप केले. शालेय गरजू विद्यार्थ्यांना श्रीरामपूर येथील काजल लोंगाणी मॅडम यांनी गणवेश वाटप केले या कार्यक्रमात कुंदन कुताळ,विजय कुताळ,शैलेश अमोलिक,मंगेश नजन,खंडागळे गुरुजी पत्रकार दिलीप दायमा यांनी शुभेच्छापर भाषणे केली.

या प्रसंगी चंद्रकांत नवले पाटील,रविंद्र  कुताळ्,मनोज अमोलिक, दत्तात्रय पटेकर,  श्रीकांत अमोलिक,बाबासाहेब धायकर ,निलेश सोनवणे दत्तात्रय खोसे, नवाब शेख, सागर साळवे, मेघाताई बंगाळ

 निलेशअमोलिक ,नवले व  अमोलीक ताई उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी श्री कल्हापुरे सर यांनी सर्वांचे आभार मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  मुख्याध्यापक श्री कल्हापुरे सर व रावळे सर  यांनी अथक परिश्रम घेतले.

(श्रीरामपुर) : गेल्या आठ वर्षापासून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सय्यद बाबा चौक मित्र मंडळ आपल्या देशाप्रती अस्था व प्रेम व्यक्त करण्यासाठी विविध उपक्रम घेत आहे.

 त्याचाच एक भाग म्हणून या ही वर्षी त्यांनी चौकात अत्यंत आकर्षक सजावट केली होती. राष्ट्रध्वज सेल्फी पॉईंट उभारला होता. या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या शर्टला राष्ट्रध्वज चिकटवून मंडळाचे सदस्य शुभेच्छा देत होते . या लक्ष्यवेधी सजावटीचे शहरातील अनेक शासकीय अधिकारी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

 त्यांच्या या उत्तम कार्याबद्दल त्यांना ॲड.समिन बागवान मित्र परिवाराच्या वतीने संविधान उद्देशिकेची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

 यावेळी बोलताना बागवान म्हणाले की,शहरासह तालुक्यात देश प्रेम वाढविण्यासाठी व सामाजिक एकोपा जपण्यासाठी हा सातत्यपूर्ण उपक्रम कौतकास्पद असून इतरांना ही दिशादर्शक ठरेल.

यातून पुढे शहरासाठी विधायक कामे होतील आशावादही त्यांनी व्यक्त केला.

 त्याचप्रमाणे नेवासा रोड येथील व्यापारी व रहिवासी यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त ऍड.समिन बागवान मित्र मंडळातर्फे मिठाई वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवि त्रिभुवन यांनी केले तर आभार प्रवीण जमधडे यांनी मानले.

यावेळी कॉ. जीवन सुरुडे, इरफान बागवान,महेबुब प्यारे,रवि त्रिभुवन,मुदस्सर शेख, रियाज शेख ,अबूजर पठाण, जावेदभाई पठाण,दिलावर बागवान, ॲड.फिरोज शेख,मोसिन पठाण,नाजीश शाह, ॲड.सोनवणे,अन्वर पठाण, मोहसीन प्यारे ,अकबर सय्यद, शोयब शेख, आमिर खान,अल्ताफ शेख,आय पी डेकोरेशन चे इरफान पठाण व इलियास पठाण यांनी केलेल्या उत्कृष्ट सजावटीसाठी त्यांचा ही सत्कार करण्यात आला तसेच याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रतिनिधी-देशाच्या  अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच  औचित्य साधून  समाजातील प्रत्येक घटकाला सारखं महत्व आणि सारखा सन्मान मिळावा यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न - डॉ.वंदनाताई मुरकुटे भारतीय राज्यघटनेत देशातील सर्व नागरिकांना समान अधिकार देताना कुठेही स्त्री किंवा पुरुष असा उल्लेख केलेला नाही. आम्ही या देशाचे नागरिक असतानाही आम्हाला समाजात मानाचं स्थान दिलं जात नसताना आमच्या हस्ते ध्वजारोहण करून दिलेला सन्मान अविस्मरणीय असल्याचं  तृतीयपंधी  कार्यकर्ती ,कवियत्री व लेखिका दिशा पिंकी शेख यांनी प्राईड अँकेडमी येथे बोलताना व्यक्त केले.

यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार बरकतअली शेख, तृतीयपंथी आशु शेख, शाळेचे शिक्षक, पालक उपस्थित होते.

अध्यक्षपदावरून बोलताना बरकत अली म्हणाले की,माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक  माऊली मुरकुटे यांनी भगीरथ प्रयत्नाने ज्ञान गंगा ग्रामीण भागात स्थापित केली.

डॉ.मुरकुटे ह्या हाडाची शिक्षिका असून पंचक्रोशी दर्जेदार शिक्षण देण्याचा वसा घेतला आहे.


आपल्या समाजाचाच भाग असलेल्या तृतीयपंथीयांना, आज २१ व्या शतकातही उपेक्षेचे, अवहेलनेचेच जगणे जगावे लागत आहे. जमेची बाब म्हणजे कायद्याने तरी त्यांची बाजू उचलून धरायला सुरुवात केली आहे.


कुणाच्या घरी बाळ जन्माला आलं, कोणी नवीन व्यवसाय सुरू केला किंवा कोणाच्या घरी लग्न वा अन्य मोठा सामाजिक समारंभ असेल, तरच आपल्या समाजाला तृतीयपंथीयांची आठवण येते. पण तृतीयपंथी हे समाजाचाच भाग आहेत, याचा कधीच सखोलपणे विचार केला जात नाही. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं आवश्यक आहे. तृतीयपंथीयांना आजही वेगवेगळ्या अनुभवांना सामोरं जावं लागतं. तृतीयपंथीयांच्या क्षमतेवर विश्वास ठेवला जात नाही, त्यांचा कुठल्याच स्तरावर स्वीकार केला जात नाही, माणूस म्हणून मनाप्रमाणे जगू दिलं जात नाही. शिक्षणाच्या हक्कापासूनदेखील ते वंचित आहेत, आपली ओळख सांगताना त्यांना केवळ नाव पुरेसं ठरत नाही तर सोबत जात, धर्म, कुटुंब यांचे दाखले जोडावे लागतात. परंतु कुटुंबानेच बेदखल केल्यानंतर पुरावे आणणार कुठून हा प्रश्न समोर उभा राहतो. ज्यामुळे ते समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होऊ शकत नाहीत. या सर्व परिस्थितीमुळे आजही त्यांच्यासाठी रोजचं जिणं संघर्षमयच आहे.

शहरी आणि ग्रामीण भागातील तृतीयपंथीयांच्या समस्या आणि संघर्ष वेगळा आहे. त्याचा सखोल अभ्यास होण्याची आणि धोरण बनवताना स्वतंत्रपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. असे मत प्राईडच्या संस्थापिका ,सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे यांनी व्यक्त केले. 

याप्रसंगी चिमकुल्या विध्यार्थ्यांनी विविध कलागुण व मनोगते व्यक्त केले.प्राईड स्कुल व कॉलेज प्राचार्या सौ.गोटे यांनी प्रास्ताविक केले.

टाकळीभान प्राईड शाळेचे मुख्याध्यापक प्रा.घोगरे यांनी आभार मानले

🙏

श्रीरामपूर- दि.१४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य लघु वृत्तपत्र पत्रकार संघाची मासीक बैठक संपन्न झाली.

या बैठकीच्या अध्यस्थानी  पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री.बरकत अली शेख हे होते. बैठकीचे सूत्रसंचालन पत्रकार कासम शेख यांनी केले तर प्रास्ताविक पत्रकार सुभाष राव गायकवाड यांनी केले या कार्यक्रमात महाराष्ट्र लघु वृत्तपत्र पत्रकार संघाच्या सदस्यपदी काही नवीन पत्रकारांना सदस्यपदी घेण्यात आले असून त्यांना शेख बरकत अली यांच्या हस्ते नियुक्ती पत्र व ओळखपत्र प्रदान करण्यात आले

या बैठकीत  देवळाली प्रवरा येथील महाराष्ट्र  लघु वृत्तपत्र पत्रकार संघाचे राहुरी तालुका प्रमुख जेष्ट पत्रकार इब्राहीम शेख यांची इंडियन कॉग्रेस ब्रिग्रेड कमेटी (महाराष्ट्र) च्या राहुरी तालुका अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. तसेच श्रीरामपुर येथील युवा पत्रकार इम्रान शेख यांची इंडियन काँग्रेस ब्रिगेड कमिटीच्या श्रीरामपुर शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या दोघांचे निवडीचे पत्र इंडियन कांग्रेस बिग्रेड कमिटीचे महाराष्ट्र राज्य प्रभारी बरकत अली शेख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.


या  प्रसंगी पत्रकार कासम शेख, इब्राहीम शेख,  असलम बीनसाद, सुभाष गायकवाड, गुलाब भाई शेख, एजाज सय्यद, इम्रान शेख ,यांनी उपस्थित पत्रकारां समोर मार्गदर्शनस्पद मनोगत व्यक्त केले व याकार्यक्रमाचे अध्यक्ष बरकत अली शेख यांनी पत्रकारीता कशी करावी या बाबत उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बी. के. सौदागर, उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष राज मोहम्मद शेख, पत्रकार असलम बीनसाद,इब्राहीम शेख, सुभाष गायकवाड, कासम शेख, शफी शेख, शब्बीर कुरेशी मोईन शाह गुलाब भाई शेख, जमीर शेख, भैय्या शेख,  यांनी शेवटी उपस्थितांचेआभार मानले

श्रीरामपूर येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे श्रीरामपूर शहर सचिव इम्रान सरदार शेख यांची महाराष्ट्र राष्ट्रीय अध्यक्ष  नुरेषा तिर्की संस्थापक ठाकूर बिपिन सिंह राजवत राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष राजेश भोसले महाराष्ट्र राज्य प्रभारी बरकत आलि शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या इंडियन काँग्रेस ब्रिगेड कमेटी च्या श्रीरामपूर शहर अध्यक्षपदावर निवड झाल्याबद्दल त्यांचे राजेश जी भोसले, बरकत अली शेख यांच्यासमवेत बि. के. सौदागर, शेख फकीर महंमद, संदीप पवार, हाजी राज मोहम्मद शेख, आमजद भाई शेख, सुभाष राव गायकवाड, रियाज खान पठाण, राज मोहम्मद आर. शेख, शेख सलाउद्दीन, सार्थक साळुंके, रमेश शिरसाट, लक्ष्मण साठे, साईनाथ बनकर, गुलाब भाई वायरमन, जावेद भाई शेख, शफिक शेख, ऐजाज सय्यद, मुसा सय्यद, कासम भाई शेख, मोहम्मद अली सय्यद, सलीम भाई शेख, रसूल सय्यद, मोहम्मद गौरी, अनिस भाई शेख, अकबर भाई शेख, मोहसीन शेख शब्बिर भाई कुरेशी मोईन शाह आदींनी त्यांचे अभिनंदन केले

बेलापुर  (प्रतिनिधी  )-कत्तल करण्याच्या इराद्याने एकाच पिकअप मध्ये अकरा गोवंशीय जनावरे खचाखच भरुन जात असताना बेलापूरच्या मुख्य झेंडा चौकात पिकअप फसला अन टेम्पोतील जनावरे पाहुन नागरीकांनी पोलीसांना पाचारण केले अन अकरा जनावरांना जिवदान मिळाले पोलीसांनी  पिकअपसह  सव्वा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे  .                                   दोन दिवसापूर्वी बेलापूरच्या मुख्य झेंडा चौकात पाईपलाईन फुटल्यामुळे ती दुरुस्त करुन खड्डा बुजविण्यात आला आज सकाळी अकरा वाजता अकरा गो वंश जातीची जनावरे भरुन महेंद्रा पिकअप एमएच ११  टी ५४९९ ही पिकअप गाडी वळण घेत असताना दोन दिवसापूर्वी घेतलेल्या खड्ड्यात फसली त्यावेळी टेम्पो काढण्यासाठी ग्रामस्थ पुढे सरसावले परंतु पिकअप मधील दृश्य पाहुन नागरीकांचा संताप अनावर झाला पिकअप मध्ये अकरा गायी दाटीवाटीने घुसविलेल्या होत्या त्यात एक गाय मूर्छितावस्थेत होती तेथे उपस्थित असलेले तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे शिवप्रतिष्ठाणचे किसन ताक्टे रोहीत शिंदे राहुल माळवदे प्रफुल्ल डावरे स्वप्निल खर्डे सागर लाहोर स्वप्निल खैरे भुषण चेंगेडीया  यांनी काही अघटीत होण्या आगोदरच पोलीसांना ही माहीती कळवीली बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके यांनी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना या बाबत कळविले त्यांनी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यांच्या सूचनेवरुन बेलापूर पोलीस झेंडा चौकात आले व जनावरांनी खचाखच भरलेला टेम्पो ताब्यात घेतला प्रकाश पोळ रा मांजरी हा अमोल विटनोर याच्या सांगण्यावरुन या जनावरांची चारा पाण्याची सोय न करता कत्तल करण्याच्या इराद्याने घेवु जात असल्याची माहीती समजल्यावरुन पोलीसांनी  कारवाई करुन त्याचे ताब्यातील  तीन लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ताब्यात घेतलेली अकरा गायी व वासरे संगमनेर येथील जिवदया गो शाळेत पाठविण्यात आली आहे  बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलीस काँन्स्टेबल निखील तमनर यांच्या तक्रारीवरुन बेलापुर पोलीसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम१९९५ चे सुधारीत कायदा कलम २०१५ चे कलम ५, ५(ब)(क)९ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पो नि संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अतुल लोटके हे करत आहे

बेलापुर  (प्रतिनिधी  )-स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव बेलापूरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला बेलापुर गावातील मुख्य ध्वजारोहण हे सर्व धर्मीय संत महंत व पोलीस तसेच जेष्ठ सेवानिवृत्त  शिक्षक यांच्या शुभहस्ते करुन ग्रामपंचायतीने एक वेगळाच आदर्श घालून दिला.  बेलापुर गावाला आदर्शवत घडविणारे सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक लक्ष्मण डोखे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर समाजाला सतत चांगला उपदेश करणारे सतं महंत महेश व्यास महानुभाव मठाचे कृष्णराज लाड बाबा सेंट पिटर चर्चचे पालक चंद्रकांत ओहोळ बेलापुरातील मुख्य जामा मस्जिदचे मौलाना शकील अहमद शेख आदि धर्मगुरुंच्या हस्ते ध्वजपुजन करण्यात आले .सरपंच महेंद्र साळवी यांच्या हस्ते बेलापुर पोलीस स्टेशनचे तर बेलापुर सहकारी सेवा संस्थेचे प्रकाश पा नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले बेलापुर ग्रामपंचायत कार्यालय येथील ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्या तबसुम बागवान,स्वाती अमोलिक,सौ.शिला पोळ  यांच्या हस्ते तर मराठी मुले व मुलींच्या शाळेचे ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाणी व शाळा व्यवस्थापन समितीचे  अध्यक्ष तोफेल सय्यद यांच्या हस्ते संपन्न झाले. उर्दू शाळेचे ध्वजारोहण शाळेचे माजी विद्यार्थी डाँक्टर आजिम शेख,अँड.अयाज सय्यद, आसायी समीर शेख,इंजिनिअर स्वालिया कदिर सय्यद, रूजदा इकबाल शेख,नईम फकीर आतार यांच्या हस्ते करण्यात आले बेलापुर जे टी एस हायस्कूलचे ध्वजारोहण राजेश खटोड यांच्या हस्ते करण्यात आले.रामगड येथील जिल्हा परिषद उर्दू व मराठी शाळेत दिपक निंबाळकर यांच्या हस्ते 

 ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट गावडे व देविदास देसाई यांनी केले.नवनाथ धनवटे यांच्या संदीप ढोल पार्टी ने डोलीबाजा वाद्याचे वादन करून वातावरण निर्मिती केली.साई इंग्लिश मीडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी झांज पथकाचे सादरीकरण केले.ध्वज स्तंभा भोवती केलेली सजावट उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.यावेळी फटक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली.ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व शाळांना खाऊ चे वाटप करण्यात आले.यावेळी विविध मान्यवर,पत्रकार,सर्व संस्थांचे पदाधिकारी,ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य,शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी,मुख्याध्यापक, शिक्षक, नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महसुल विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रँलीचे बेलापूरात जोरदार स्वागत करण्यात आले उपविभागीय अधिकारी अनिल पवार व पोलीस निरीक्षक संजय सानप,गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस,मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर पोस्ट कार्यालय व ग्रामपंचायत बेलापुर बु!!यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय येथे अपघात विमा शिबीर संपन्न झाले                                    डाक विभागाच्या वतीने रुपये३९९मध्ये नागरीकांचा दहा लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविला जाणार आहे यात अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख रुपये कायमचे अपंगत्व आल्यास दहा लाख रुपये दवाखाना खर्च रुपये ६० हजार दोन मुलांना शिक्षणाचा खर्च अपघाताने पँरालिसीस झाल्यास१० लाख रुपये भरपाई दिली जाणार आहे वय वर्ष १८ते ६५असणाऱ्या नागरीकासाठी एकच हप्ता आसणार आहे यात सर्व प्रकारचे अपघात सर्पदंश विजेचा शाँक फरशीवरुन घसरुन पडणे आदिंचा समावेश असल्याची माहीती डाक विभागाच्या वतीने देण्यात आली बेलापुर  विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संस्थेच्या सर्व सभासदांचा विमा विनामूल्य उतरविला जाणार असुन सभासदांनी आधार कार्ड व मोबाईल सोबत आणावा तसेच सर्व सभासदांनी या योजनेचा लाभ घ्यावाअसे अवाहन संस्थेचे चेअरमन सुधीर नवले व्हा चेअरमन पंडीतराव बोंबले व सर्व संचालकानी केले आहे.  या वेळी डाक विभागाचे जालींदर चव्हाण श्रीमती पुनम ओहोळ राहुल पारधे विलास गायकवाड संदीप वाकडे राजन पवार शिवाजी पोटभरे तसेच मा जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी सदस्य चंद्रकांत नवले विलास मेहेत्रे सुधाकर खंडागळे प्रफुल्ल डावरे पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा सुहास शेलार किशोर कदम मुसा शेख महेश कुऱ्हे  सचिन वाघ राहुल माळवदे मोहसीन सय्यद भाऊसाहेब कुटे मनोज कुटे प्रसाद साळूंके मुस्ताक शेख आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आभार मानले

बेलापुर  (प्रतिनिधी )-स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त व बेलापुर ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त बेलापूरात प्रथमच सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळावरील भोंग्यातून राष्टगीत लावण्यात आले होते                                 हर घर तिरंगा मोहीमेंतर्गत सकाळी साडेआठ वाजता गावातील सर्व नागरीकांनी एकाच वेळेस ध्वज उभारले त्यानंतर सकाळी नऊ वाजता बेलापूरातील मुख्य पेठेतील जामा मस्जिद साईबाबा मंदिर, बिरोबा मंदिर श्री चक्रधर स्वामी मठ गावातील शालोम चर्च,ईनामदार मशिद,शिलोह चर्च आदि प्रार्थनास्थळ तसेच सर्व शाळामधील 

स्पिकरवरुन राष्ट्रगीत लावण्यात आले नागरीकांना अवाहन केल्याप्रमाणे सर्व नागरीक घरातून रस्त्यावर येवुन राष्ट्रगीताकरीता उभे राहीले बेलापूरातील आझाद मैदान येथे सर्व नागरीक जमा झाले त्या ठिकाणी सूचना दिल्याप्रमाणे बरोबर नऊ वाजता सर्वत्र राष्ट्रगीत सुरु झाले प्रत्येक  नागरीक राष्ट्रगीताचा मान ठेवुन जागेवरच उभे राहीले राष्ट्र गीतानंतर वंदे मातरम़् भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला बेलापुर जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेतील मुलींच्या लेझीम पथकाने अनेकांना आचंबित केले त्यानंतर मुलींनी देशभक्तीपर गीत सादर केले. बचत गटाच्या महिलांनी गावातून तिरंगा फेरी काढली. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य,सोसायटी पदाधिकारी व संचालक,विविध राजकीय पक्षांचे नेते व सदस्य,विविध संस्था व पतसंस्था यांचे पदाधिकारी, तरुण मंडळांचे प्रतिनिधी,विविध मान्यवर, नागरिक आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले.प्रास्ताविक सरपंच महेंद्र साळवी यांनी केले तर उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आभार मानले.

बेलापूर(वार्ताहर)बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या वतीने 'हर घर तिरंगा अभियान" अंतर्गत गावातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांची गावातून सवाद्य तिरंगा रॅली काढण्यात काढण्यात आली. त्यास हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असुन बेलापूर व परिसरात एकाच वेळेस ध्वजारोहण व सामूदायीक राष्ट्रगीत घेण्यात येणार आहे देशभरात स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत.यात प्रामुख्याने हर घर तिरंगा अभियानाचा समावेश करण्यात आलेला आहे.या आभियान अंतर्गत बेलापुर  ग्रामपंचायतीच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांची सवाद्य तिरंगा फेरीचे आयोजन करण्यात आले होते.                                                          जे.टी.एस.हायस्कूलच्या प्रांगणात या फेरीचा शुभारंभ झाला.त्यानंतर  गावातून  तिरंगा फेरी काढण्यात आली.यात जे.टी.एस.कनिष्ठ महाविद्यालय,जे.टी,एस.हायस्कूल,जि. प. मराठी मुले तसेच मुलींची शाळा,उर्दू शाळा,अहिल्यादेवी होळकर उर्दू शाळा आदिं शाळांचे विद्यार्थी हातात तिरंगा ध्वज हाती  घेत सहभागी  झाले होते.यावेळी भारत माता की जय,वंदे मातरम,हर घर तिरंगा आदि घोषणांनी वातावरण चैतन्यमय बनले होते.                          सदर प्रसंगी मा.जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे कै ,मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन व विद्यमान सदस्य रविंद्र खटोड जेष्ठ पत्रकार देविदास देसाई ज्ञानेश गवले नवनाथ कुताळ  सुहास शेलार दिलीप दायमा किशोर कदम भाजपाचे प्रफुल्ल डावरे तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे प्रकाश कुऱ्हे महेश कुऱ्हे प्रभात कुऱ्हे  आदिसह गावातील विविध मान्यवर,शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक आदिंसह शाळांचे मुख्यध्यापक तसेच अध्यापक उपस्थित होते.  शनिवार  दि.१३ रोजी सकाळी साडे आठ वाजता गावातील ग्रामस्थांनी आपआपल्या घरी तिरंगा ध्वजारोहण करावे ,तसेच सकाळी नऊ वाजता सामुदायिक राष्ट्रगीत होईल.यावेळी प्रत्येक नागरिकाने आहे तिथे उभे राहून राष्ट्रगीताचा सन्मान करावा असे अवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

बेलापूरः(प्रतिनिधी  )-येथील जे.टी.एस हायस्कूलच्या सन १९९६-९७ च्या बॕचच्या माजी विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा अभियानासाठी दोनशे तिरंगा ध्वज बेलापुर  ग्रामपंयतीस सूपूर्त केले. बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या वतीने हर घर तिरंगा अभियान राबविले जाणार आहे.सदर अभियनासाठी ग्रमपंचायत मार्फत तिरंगा ध्वज वितरण केले जाणार आहे.या अभियानासाठी सदर माजी विद्यार्थ्यांनी दोनशे तिरंगा ध्वज सरपंच महेन्द्रर साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांचेकडे सुपूर्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले,सुधाकर खंडागळे ,पञकार देविदास देसाई,दिलिप दायमा,सुहास शेलार तसेच ग्रुपचे सदस्य राधेश्याम अंबिलवादे,कैलास दळे,विजय पोपळघट,योगेश कोठारी,अजीम सय्यद ,अनिल मुंडलिक,मंगेश गवते,शैलेश अमोलिक उपस्थित होते.

श्रीरामपूर प्रतिनिधी - गेल्या अनेक वर्षांपासून हजरत सैलानी बाबा दरबार श्रीरामपूर या ठिकाणी सवाऱ्याचे विसर्जन होत आहे गेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षानंतर मोहरम ची मिरवणूक काढण्यात आली श्रीरामपूर शहरातील सर्वधर्मीयांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती श्रीरामपूर शहरात कित्येक वर्षांपासून ची परंपरा असलेले हजरत सैलानी बाबा दरबार मौलाअली यांची सवारी आठ मोहरम रोजी श्रीरामपूर शहरातील मेन रोड भागातून हजरत सय्यद शाह कादरी बाबा तसेच काजी बाबा व बारा इमान दर्गा या ठिकाणी भेट देऊन पुन्हा छत्रपती शिवाजी रोड

मार्गे हजरत सैलानी बाबा दरबार या ठिकाणी मिरवणूक काढली जाते. श्रीरामपूर शहरातील अनेक भागांमध्ये सावरींची  स्थापना केली जाते श्रीरामपूर शहरात वर्षानुवर्षांपासून सवारी मिरवणूक व इराणीं धर्मीयांचा मातम हे लोकांचं आकर्षण ठरत आहे शहरातील हजरत सय्यद शाह कादरी बाबा यांच्या दर्गेजवळ भावीक मोठ्या भक्ती भावाने दर्शनासाठी व पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात यावेळी पोलिसांचे बंदोबस्त लावण्यात आले होते 

श्रीरामपूर शहरात अनेक ठिकाणी सावरींची स्थापना केली जाते त्यामध्ये हुसेन नगर हेही प्रसिद्ध आहे तसेच डावखर रोड येथील तृतीयपंथी इमामे कासीम यांची सवारी ही आकर्षण ठरली जाते यामध्ये मिलत नगर,ईदगाह परिसर, सूतगिरणी फाटा, गोंदवणी रोड,बेलापूर रोड वार्ड क्रमांक ७, बेलापूर, अशोक नगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सवारी चे स्थापना केली जाते हे सर्व सवारी मोहरम १०ला शहरातून मुख्य मार्गावरून  विसर्जन मिरवणूक होतात परंपरेप्रमाणे याही वर्षी सावरींची मिरवणूक शहरातून व परिसरातून करण्यात आली,


बेलापूर याठिकाणी मुख्य बाजार पेठेतून सवारी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली यामध्ये भक्ती भावाने सर्व धर्मीयांनी दर्शनासाठी गर्दी केली होती व काही ठिकाणी प्रसाद शरबत याचंही वाटप करण्यात आलं या सर्व सवाऱ्या हजरत सैलानी बाबा दरबार या ठिकाणी येऊन विसर्जन होतात तर काही आपापल्या ठिकाणी विसर्जन केले जाते गेल्या दोन वर्षानंतर आज श्रीरामपूरकरांना याचा लाभ मिळाला यावेळी हजरत सैलानी बाबा दरबार या ठिकाणची सवारी शहरवासीयांना आकर्षण ठरले हजरत सैलानी बाबा दरबार बहुउद्देशीय संस्था श्रीरामपूर यांच्यावतीने दिनांक ११ ऑगस्ट रोजी खिचडा महाप्रसादाचा आयोजनही करण्यात आलेला आहे याकरता सर्व शहरवासीयांना  हजरत सैलानी बाबा दरबार बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने आमंत्रण देण्यात आलेले आहे. या सर्व मोहरम मिरवणुका शहर भर आंनदात आणि जल्लोषात पार पाडण्यासाठी शान-ए-करबला कमेटीचे पदाधिकारी असलम बिनसाद,तमन्ना सुरय्या नायक,कलीम बिनसाद,ऍडव्हकेट अजित डोखे,अजीज अहेमद शेख(बेलापूर )तसेच पोलीस प्रशासन यांनी अधिक परिश्रम घेतले सर्व कार्यक्रम शहर वासियांच्या सहकार्याने वेवस्थित पार पडल्याणे सर्वांना यश मिळाले. 

नाशिक प्रतिनिधी-महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन आणि नाशिक जिल्हा ज्यूदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथे वरिष्ठ गटाच्या 49 व्या महाराष्ट्र राज्य ज्यूदो अजिंक्यपद स्पर्धेला  मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.या स्पर्धेचे उद्घाटन यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या 26 जिल्ह्यांतून 252 खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत पदकप्राप्त खेळाडूंचा समावेश आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई करणारे खेळाडू अजिंक्य वैद्य, श्रद्धा चोपडे, अपूर्वा पाटील, समीक्षा शेलार, आदित्य धोपवकर, प्रदीप गायकवाड, शुभांगी राऊत यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उद्घाटनानंतर विविध वजनी गटाच्या पुरुष आणि महिलांच्या स्पर्धांना सुरुवात झाली.यामध्ये महिलांच्या 63 किलो वजनी गटात पुण्याच्या गौतमी कांचनने अंतिम लढतीत कोल्हापूरच्या रुध्वी श्रुंगारपुरेचा पराभव करून विजेतेपद मिळवले, तर भूमी कोरडे (मुंबई) आणि तन्वी पवार (सिंधुदुर्ग) यांनी संयुक्त तिसरा क्रमांक मिळवला. पुरुषांच्या 73 किलो वजनी गटात नागपूरच्या साईप्रसाद काळेने सुंदर खेळाचे प्रदर्शन करून अंतिम सामन्यात यवतमाळच्या अभिषेक दुधेचा पराभव करून या गटाचे विजेतेपद आपल्या नावे केले. तर मुंबईच्या राहुल बोभडी आणि ठाण्याच्या आदर्श शेट्टीला संयुक्त तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणार्‍या खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड केली जाणार असून 16 ते 20 ऑगस्ट, 2022 दरम्यान लखनौ येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील, अशी माहिती आयोजकांनी दिली. या स्पर्धेचे संचालक म्हणून ठाण्याचे आंतरराष्ट्रीय पंच शैलेश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जिल्ह्यांतील 20 पंच कार्यरत आहेत. तर आंतरराष्ट्रीय पंच स्मिता शेट्टी, शिल्पा शेरिगर या मॅटप्रमुख म्हणून काम बघत आहेत. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पर्धा आयोजन समितीचे योगेश शिंदे, स्वप्नील शिंदे, स्वाती कणसे, सुहास मैंद, माधव भट आदी प्रयत्नशील आहेत.

बेलापुर  (प्रतिनिधी )-नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच बेलापुरात फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले                                                    नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच बेलापूरातील मुख्य चौकात शरदराव मित्र मंडळाच्या वतीने फटाक्याची अतिषबाजी करुन मिठाईचे विटप करण्यात आले बेलापूरातील शरदराव नवले मित्रमंडळाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला या वेळी मा जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे भाजपाचे युवा नेते प्रफुल्ल डावरे पुरुषोत्तम भराटे हाजी ईस्माईल शेख ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख रमेश अमोलीक स्वाती अमोलीक रावसाहेब अमोलीक सागर ढवळे राकेश कुंभकर्ण मोहसीन सय्यद रत्नेश गुलदगड जाकीर हासन शेख प्रभात कुऱ्हे अरुण शिंदे जिना शेख अनवर शेख ज्ञानेश्वर वाबळे अजिज शेख प्रविण बाठीया शफीक आतार रमेश लगे राजेंद्र काळे शफीक बागवान कुमार नावंदर रमेश कुमावत आली शेख अमोल तेलोरे अफजल शेख मयुर खरात कृष्णाजी गाढे सिराज कुरेशीआदिसह ग्रामस्थ उपस्थित होते

करबला युद्ध " जगातील गावा- गावात शहरात युद्धाच्या आठवणी आपोआपच मोहर्रम च्या दहा तारखेला " यौम- ए - आशुरा " च्या दिवशी कितीही कठोरमनाच्या माणसात जाग्या होतात.प्रेषित मुहम्मद स्व. यांनी अल्लाह च्या सत्यधर्म ईस्लामचा प्रसार- प्रचार करण्यासाठी अत्यंत हाल- अपेष्टा - छळछावणीत- उपाशीपोटी- कष्ट सहनशीलतेचे अंत बघून त्याला अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आशिया- युरोप- अफ्रीका खंडातील बहुतेक देशात सुव्यवस्थितपणे परिवर्तन घडवून आणले,जगातील प्रत्येक मानवाच्या कल्याणासाठी,जीव जंतू च्याही रक्षणासाठी, जगात ठिकठिकाणच्या राजेशाही, हुकूमशही, बादशाही,परीवार वाद, जुलमी राजव्यवस्था संपूर्ण लोकशाही पद्धतीने, (तलवारी च्या जोरावर नव्हेतर) आपल्या आचरणाने संपुष्टात आणुन " लोकशाही " व्यवस्था समस्त जगाला दाखवून देवून, अल्लाहच्या पवित्र कुरआन व हादीस नुसार स्वतः पवित्र मदीना शहरात याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जगप्रसिध्द मदीना करार करून जगाला दाखवून दिली. आपल्या अनुयायांना मित्रगण - सहाबा यांना आपल्या हयातीतच माझ्या नंतर समस्त जगात शासन व्यवस्था कशा पद्धतीने  निर्माण करावयास हवेत याचे प्रशिक्षण दिले.यासाठी आपल्या खास विश्वासू मित्र, सहाबा यांना "खलिफा " अल्लाहच्या नायब (डेप्युटी) ला म्हणतात, खलिफा ईस्लामी व्यवस्थेचा प्रशासकीय प्रमुख असतो.त्याला पवित्र कुराण,हादीस व " मजलिस - ए - शुरा" च्या अनुसरून निर्णय घेण्याचा अधिकार असतो. "मजलिस - ए - शुरा" अर्थात" तज्ञ,जाणकार सल्लागार मंडळ स्थापून " शुराई - निजाम"च्या माध्यमातून  लोकप्रशासन करणे यालाच " निजाम - ए -खिलाफत " म्हटले जाते ,याचे वारंवार उदाहरण प्रेषित मुहम्मद पैगंबर स्वतः प्रमुख असून सुध्दा आपले कोणतेही निर्णय आपल्या साथीदार मित्रांशी सल्ला मसलत करुनच घेत होते, प्रमुख गोष्ट म्हणजे त्या मध्ये किती ही छोट्या मित्राला ही सल्ला देण्याचा आधिकार होता. हे सल्ले अल्लाहा प्रत्येकाच्या मस्तिष्कात बुद्धित घालून त्या मार्फतच येत असतात. यालाच लोकशाही म्हणतात.असो.

प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी आपल्या मजलिस -ए - शुरांच्या सल्लागार नुसार असे पुण्यवान (राशिदीन) , अनुभवी (१) ह. अबु-बकर सिद्दीक रजि. (२) ह.उमर फारुख रजि. (३) ह. उस्मान गनी रजि. (४) ह. आली बिन आबु तालीब रजि. या वेगवेगळ्या घराण्यातील  कर्तव्यदक्ष साथीदारांची  क्रमाक्रमाने पुढील चार खलीफांची निवड करून त्याच्यावर सर्व जगभरातील लोकांना" एकनिष्ठता" ची शपथ (बैत) दिली गेली. प्रेषित मुहम्मद स्व. यांच्या महापरिनिर्वाणानंतर वरील चार खलिफांनी खूप चांगल्याप्रकारे ईस्लामी राज व्यवस्था आशिया, युरोप, अफ्रीका खंडातील खूप देशात आपल्या प्रतिनिधी मार्फत चालवली.. त्या चार ही खलिफांच्या राज व्यवस्थापनास " खुलफा - ए - राशिदीन " चे युग " म्हणतात, अर्थात या पुण्यंवान लोकांनी अल्लाह च्या पवित्र कुराण-हादिस च्या शिकवणुकीनुसार राज्य व्यवस्था चालवली. जगात आज ही आजरामर आहे  . 

महात्मा गांधी जी व विविध तज्ञांनी वेळोवेळी त्यांच्या कार्याची दखल घेऊन आपल्या देशात तशी राजकीय व्यवस्था करण्याची गरजही व्यक्त केली आहे ,असो.

चौथ्या खलिफा  हज. अली  रजि. यांच्या महानिर्वाणानंतर त्यावेळच्या 'सल्लागार (मजलिस ए शुरा) मंडळांने काही काळ ह. अलि. रजि.चे ज्येष्ठ पुत्र ह. हसन रजि. यांना खलिफा म्हणून घोषित करण्यात आले. मात्र तीव्र स्वरूपाच्या विरोध, मतभेदांमुळे व निष्पाप जीव धोक्यात घालून, निष्पाप नागरिकांना त्रास व रक्त सांडले जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने ह. हसन बिन अली रजि. यांनी स्वतः हुन पदत्याग केला.

या प्रसंगानंतर प्रेषित मुहम्मद पैगंबरांच्या शिकवलेल्या तत्त्वाला हारताळ फासून त्या काळातील मसजिस ए शुराला ( कायदे मंडळा) डावलून मनमानी करून प्रेषित मुहम्मद स्व यांचेच एक सहकारी ह. आमीर मुआविया रजि. यांनी स्वत:ला स्वयंघोषित खलिफा म्हणून  घोषित केले ,परंतु त्यांनी ईस्लामच्या तत्त्वज्ञान, तत्त्वप्रणाली नुसार न करता " राजेशाही बादशहा पध्दतीनुसार राजेशाही राहणे, वागणूक व एक मोठा राजप्रासाद ची बांधणी करुन राज्य कारभार करण्यात आला. हे इस्लामी संस्कृतीच्या राज्य व्यवस्थानेपला कदापीही मान्य नव्हते. त्यानंतर ह.आमीर मुआविया येथे न थांबता त्यांनी आपल्या हयातीत स्वतःचा अपात्र मुलगा यजिद यांस आपला उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करून वीस वर्षे राजेशाही सारखा राज्य कारभार करुन राजधानी मदीनावरुन कुफा (इराक) वरुन सिरिया येथे हलविण्यात आल्यानंर आपल्या मृत्यू पश्चयात आपला अपात्र मुलगा यजिद यांस राजा करण्यात आले.यजिदच्या राजेपदास व क्रुर शासनपध्दतीस  जनतेचा जागोजागी तीव्र विरोध होत होता. नागरिकांना प्रेषित मुहम्मद स्व. याचे अवडते नातू हजरत इमाम हुसैन रजि. यांची खलिफा म्हणून निवड व्हावी म्हणून संपूर्ण जनमत होते व नागरिक वारंवार पत्रव्यवहार करुन मागणी याचना करून बारा हजारांपेक्षाही जास्त पत्रे लिहीली जावून सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याची ग्वाही देत होते, सर्वांच्याच मागणीची दखल घेऊन ह. इमाम हुसैन रजि. आपल्या खानदानातील मुलांबाळांसह, वडील बंधू ह. हसन यांच्या व लहान सर्व बंधूं च्या सर्व परीवारासह मदीनावरुन कुफा येथे जाण्यासाठी निघाले. ही बातमी ऐकून राजा यजिद घाबरून सर्व कुफा वासीयांना धमकावत,जो ह. इमाम हुसैन यांना साथ,थारा देईल त्या सर्व साथ देणाऱ्यास मृत्यूदंड दिले जाईल अशी धमकी दिली. राजा यजिद कडून कुफा शहरातील त्याच्या मुख्य गव्हर्नर ईबने जियाद यांस आदेश देण्यात आले की, कोणत्याही परिस्थितीत ह. इमाम हुसैन यांना यजिदला राजा करण्यास राजी करावेत. नाहीतर सरळसरळ कैद करून दरबारात हजर करण्यात यावे. 

प्रवासा दरम्यान फुरात नदीच्या काठावर करबला येथील मैदानावर गव्हर्नर ईबने यजिद ने चार हजार सैनिकांसह ह. इमाम हुसैन यांचा घेराव करून यजिदला राजा करण्याच्या सर्व अटी व शर्ती जुलूमशाहीने मान्य करण्यास सांगितले, परंतु जालीम,अत्याचारी,कपटी यजिदला समर्थन देण्यास ह. इमाम हुसैन यांनी स्पष्ट नकार दिला. या नकारानंतर ईबने जियाद ने युद्धाचे स्पष्ट आव्हान केल्यानंतर ह. ईमान हुसैन नी रक्त,जीवितहानी टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत तीन प्रस्ताव मांडले, परंतु क्रुर गव्हर्नर जियाद याने मागेपुढे न पाहता सरळसरळ ह. हुसैन यांच्यावर क्रुरपणे अत्याचार करण्यास सुरुवात करून कुरात नदीचे पाणी ह. हुसैन यांच्या परीवारांस पाणी बंदी केली गेली, तीन दिवस म्हणजे ७२ तास रखरखत्या अरबस्थातील उन्हाळ्यात विना पाण्याची कुंटूंबावर वेळ आली, हालहाल करून, सहा महिन्याचे बाळ अली असगर यांच्यावर त्रिकोणी बान मारुन त्यांची हत्या केली, सात वर्षांच्या कासिम या ह. हसन यांच्या मुलाला घोडयाच्या टाचेखाली चिरडून ठार मारण्यात आले, त्यांच्याबरोबर जे होते त्यांचे देखील हालहाल करून बहात्तर ७२  लहान मोठ्यांना गळे चिरुन ठार करण्यात आले. युध्दात सर्व पुरुष शहीद, हौतात्म्य झाले. हा दिवस १० मुहर्रम हिजरी ६१ प्रमाणे इंग्रजी दिनांक १० ऑक्टोबर ६८० या दिवशी  ७२ हुतात्म्यांनी फक्त ईस्लामच्या पवित्र कुराण - हादीसच्या लोक कल्याणकारी राज्य व्यवस्थेसाठी  शहीद झाले, हौतात्म्य पत्कारले.

करबलाच्या या युद्धातुन जगाला संदेश मिळाला की कोणत्याही अत्याचारी व्यवस्थेपुढे गुडघे टाकायचे नसतात तर बलीदान देण्यास तयार राहिले पाहिजे... 

हजरत इमाम हुसैन यांनी जुलमी यजिदच्या क्रुर, जुलमी, अत्याचारी ,दमनकारी सत्तेपुढे गुडघे टेकले असते तर स्वतः व संपूर्ण परिवार वाचला असता, परंतु प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार अल्लाहच्या सत्यधर्म रक्षणासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबांचे बलीदान दिले,

म्हणुनच शायर म्हणतो की.. " करबला के बाद ईस्लाम जिंदा होता है.... "


लेखक - डॉ. सलीम सिकंदर शेख

बैतुशशिफा हॉस्पिटल,श्रीरामपूर

 मोबा.नं. 9271640014

अहमदनगर प्रतिनिधी-नगर जिल्ह्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील दुचाकीं चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखा व भिंगार कॅम्प पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पकडली. त्यांच्याकडून सहा लाख 85 हजार रूपये किंमतीच्या 17 दुचाकीं हस्तगत करण्यात आल्या आहेत.शेख अकिल शेख खलील (वय 49), शेख मंजुर अनिस अहमद (वय 31), मुकर्रस मुस्तफा सय्यद (तिघे रा. भवानीनगर, औरंगाबाद), आयुब याकुब सय्यद (रा. विळद ता. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शेख अकिल व त्याचा साथीदार चोरीच्या दुचाकी औरंगाबादरोडने नगरकडे घेवून येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलीस अंमलदार मनोहर शेजवळ, संदीप घोडके, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, सखाराम मोटे, ज्ञानेश्वर शिंदे, भिमराज खर्से, शंकर चौधरी, संदीप चव्हाण, लक्ष्मण खोकले, दीपक शिंदे, भानुदास खेडकर, राहुल व्दारके, विनोद मासाळकर, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, महादेव निमसे, संभाजी कोतकर व संजय काळे यांच्या पथकाने नगर औरंगाबाद रोडवरील हॉटेल सनी पॅलेस येथे सापळा लावुन संशयीत शेख अकिल शेख खलील, शेख मंजुर अनिस अहमद यांना ताब्यात घेतले.त्यांच्या ताब्यातील विना नंबर मोपेड ही नगरच्या स्टेट बॅक येथुन दोघांनी मिळुन चोरी केली बाबत माहिती दिली. या दोन्ही दुचाकी चोरट्यांची चौकशी केली असता त्यांनी आपले साथीदार मुकर्रम मुस्तफा सय्यद, आयुव याकुब सय्यद (फिटर) असे असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौघांनी चोरीच्या 17 दुचाकी दिल्या. पोलिसांनी त्या हस्तगत केल्या आहेत. नगर जिल्हा व औरंगाबाद जिल्ह्यातील गुन्ह्यांची माहिती घेतली असता या आरोपींनी दिलेल्या माहिती वरून एकुण नऊ गुन्हे दाखल आहेत. सर्व गुन्हे पकडलेल्या आरोपींनी आणि त्यांच्या साथीदारांनी मिळुन केले असल्याचे निष्पन्न झाले आहेत.

बेलापुर (प्रतिनिधी  )-ग्रंथ समजुन घ्या ग्रंथ समजले तरच संत समजतील अन संत समजले म्हणजे भगवंत समजतील. त्यामुळे ग्रंथाचा भावार्थ समजुन त्या प्रमाणे आचरण करा असे अवाहन पंढरपूर च्या पहिल्या पायी दिंडीचे मानकरी . ह. भ. प.भानुदास महाराज { हिरवे } बेलापूरकर यांनी केले.

-येथील श्री.हरिहर केशव गोविंद भगवान अखंड हरिनाम सप्ताह,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा,व किर्तन महोत्सवाचे  ३ रे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

यावेळी बोलतांना ते पूढे म्हणाले—देव ओळखण्यासाठी गुरु करावा लागतो,गुरु केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही.  देवाचे प्रेम आपणाला सांगता येत नाही.देव कोणालाच दिसत नाही.संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांना देव समोर आले असतांही ते त्यांना समजले नाही.

साधू, संताचे जीवन आपणाला जगता येणार नाही.आचाराने, विचाराने प्रत्येकाने आपले जीवन जगावे यासाठी संताच्या दिंड्या निघतात.परमेश्वराच्या प्राप्तीसाठी संत दुःखावर प्रेम करतात.संताचे चरण घरात आले तिथेच आनंद मिळतो.देव,देश, आणि धर्माची सेवा करा! मी वयाच्या १९ व्या वर्षापासून किर्तन सेवा करतो.माझ्या वडींलाच्या व राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराज बेलापूरकर यांच्या जन्मभूमीत किर्तन करण्याचा " योग" मला आला यांचा आनंद होतो.परमार्थ हा सुखाचा सागर आहे त्याचा अंगीकार करा जिवन आनंदी व सुखमय होईल असेही ते म्हणाले

श्रीरामपूर प्रतिनिधी-येथील स्थानाकवासी जैन संघ अध्यक्ष व विश्वस्तांनी स्थानकाच्या केलेल्या इमारतीच्या प्लॅनला नगरपालिकेकडून गेल्या 15-20 वर्षांत कायदेशीर मंजुरी न घेता बांधकाम केले आहे. नगरपालिकेने प्लॅन मंजूर करावा किंवा विश्वस्तांनी मंजुरीच्या कागदपत्रांची पूर्तता करून बांधकाम नियमित करावे अन्यथा अध्यक्ष व विश्वस्त यांचेविरुध्द फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी समाजिक कार्यकर्ते अमित मुथ्था यांनी काल गुरुवारी सकाळी नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले होते.मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी उपोषणार्थी व जैन समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांना सायंकाळी 5 वा. नगरपालिका कार्यालयामध्ये चर्चेसाठी बोलावून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी समाजातील ज्येष्ठ सदस्य रमेश कोठारी म्हणाले, जैन स्थानकाची होत असलेली वास्तू ही कायदेशीर वास्तू असावी. भविष्यात तरुण पिढीला त्यासंदर्भात काहीही बेकायदेशीरपणासाठी प्रयत्नांची वेळ येऊ नये. आम्ही व अमित मुथ्था यांनी बांधकाम प्लॅन मंजुरीसाठी अनेक वर्षांपासून पत्रव्यवहार करूनही कार्यवाही झाली नाही. स्थानकवासी संघाचे अध्यक्ष जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत.मुख्याधिकारी गणेश शिंदे यावेळी म्हणाले, अमित मुथ्था यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांची मागणी रास्त आहे.स्थानकवासी जैन संघ अध्यक्ष व विश्वस्तांना आम्ही वेळोवेळी पत्र दिले. समक्ष बोलावले परंतु अद्याप त्यांचेकडून पूर्तता झाली नाही. त्यामुळे स्थानक बांधकाम मंजुरीचे प्रकल्प प्रलंबित आहे. आम्ही त्यांना मंजुरीच्या कामासाठी व कागद पत्रासाठी 1 महिन्याची मुदत द्या. 1 महिन्यात ही पूर्तता झाली नाही तर नगरपालिका त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करील, त्यामुळे अमित मुथ्थांनी उपोषण मागे घ्यावे तसे लेखी आश्वासन दिले.आश्वासनानंतर अमित मुथ्था यांचे उपोषण मुख्याधिकारी शिंदे यांनी सरबत देऊन सोडले.यावेळी मुथ्था यांचे समवेत अभय मुथ्था, सतीश चोरडिया, किरण लुणिया, रमेश कोठारी, रमेश गुंदेचा, राजेंद भंडारी, हेमंत खाबिया, मनसुख चोरडिया, प्रकाश समदडिया, दिलीप लोढा, दीपक गांधी, दीपक संघवी, सचिन गुंदेचा, रोहित भंडारी, सुमित गांधी, सचिन समदडीया, गिरीश बाठिया, महेश सोनी,हर्ष चोरडिया, मनोज बोरा आदी उपस्थित होते.

राहुरी प्रतिनिधी-राहुरी शहरातील बारागाव नांदूर रोडलगत असलेल्या गोदामात ड्रग्जसदृश्य अंमली पदार्थ व औषधांचा सुमारे सव्वाकोटी रुपये किंमतीचा मोठा बेकायदा साठा आढळून आला. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस पथकाने बुधवारी (दि.03) रोजी दुपारच्या सुमारास ही कारवाई केली आहे.दरम्यान, घटनास्थळी अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक पथकाने येऊन संबंधित औषधांची तपासणी केली. सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई करण्याचे काम सुरू होते. ही अंमली पदार्थांची तस्करी कोठे कोठे सुरू होती? या तस्करीत कोण कोण सामील आहेत? याचा शोध पोलीस पथकाकडून सुरू आहे. उशिरापर्यंत पोलीस अधिकारी घटनास्थळी ठाण मांडून बसले होते. तर मुद्देमालाची पॅकिंग करून ताब्यात घेण्याचे काम सुरू होते. काल सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी घटनास्थळी जाऊन बेकायदा साठ्याची पाहणी केली.गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यात अंमली पदार्थांची तस्करी सुरू होती.

याची खबर पोलीस पथकाला लागली. काल सकाळी राहुरी येथील चार ते पाचजणांची पोलीस पथकाने धरपकड केली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवून माहिती घेतली. त्यानंतर श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, राहुरी येथील पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, अंमली पदार्थ निरीक्षक ज्ञानेश्वर दरंदले, पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा, महिला पोलीस उप निरीक्षक ज्योती डोके, आदींसह डीवायएसपी पथकातील फौजफाट्याने दुपारी तीन वाजे दरम्यान राहुरी शहरहद्दीतील बारागांव नांदूर रोड परिसरात असलेल्या शिवचिदंबर मंगल कार्यालयाशेजारी असलेल्या एका पत्र्याच्या गाळ्यात धाड टाकली. त्याठिकाणी उत्तेजित करणार्‍या गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या, नशा आणणार्‍या गोळ्या तसेच ड्रग्जसारखा अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांचा हा मुद्देमाल असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

बेलापूर (प्रतिनिधी )-"ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर नाही तर कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे" असे ठणकावून सांगणारे, बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 102 वी जयंती येथील विजय स्तंभ चौकामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 याप्रसंगी रमेश शेलार, सुहास शेलार, तानाजी शेलार, विजय शेलार, भाऊसाहेब राक्षे, बाबासाहेब शेलार, उदय शेलार, बंटी शेलार आदि जेष्ठ समाज बांधवांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बेलापूर येथील अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध राजकीय पक्ष, संस्था-संघटना व ग्रामपंचायतिचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. सायंकाळी अण्णाभाऊंच्या प्रतिमेची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळीआमदार लहूजी कानडे, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरुण नाईक, बेलापूर सोसायटीचे चेअरमन सुधीर नवले, माजी जि प सदस्य शरद नवले, जनता विकास आघाडीचे रवींद्र खटोड, सरपंच महेंद्र साळवी, माजी सरपंच भरत साळुंके, उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक, मुक्तार सय्यद, माजी उपसभापती दत्ता कुऱ्हे, विलास मेहेत्रे, पंडित बोंबले, प्रकाश कुऱ्हे, अनिल पवार, अय्याज सय्यद, पत्रकार विष्णुपंत डावरे, दिलीप दायमा, दीपक क्षत्रिय, किशोर कदम, अतिश देसरडा, भाऊसाहेब तेलोरे, अल्ताफ शेख, शशिकांत कापसे, बाळासाहेब दाणी आदी मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊंना जयंतीनिमित्त अभिवादीत केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहन शेलार, उपाध्यक्ष दिनेश सकट, रोहित शेलार, निखील शेलार, संकेत शेलार, तुषार शेलार, संदेश शेलार, अदित्य शेलार, सचिन खाजेकर, अतिश शेलार, निशिकांत शेलार, रामा उमाप, ऋतिक शेलार यांच्यासह बाळासाहेब शेलार, नंदू शेलार, सुभाष शेलार आदींनी विशेष परिश्रम घेतले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget