उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय इमारतीत शांतता कमिटीची बैठक.

श्रीरामपूर : ३ ते ४ दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यां पासून, प्रशासन देखील तैयारीला लागले आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावा या करिता पोलीस, महसूल,महावितरण,नगरपरिषद यासह तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी शहरातील वाहतुक व्यवस्था, अखंडित विद्युप्रवाह,विसर्जन व्यवस्था, मोकाट जनावरे,सुरक्षा दृष्टीने पोलीस बंदोबस्त. यासह अनेक विषयांवर उपस्थित मान्यवरांनी आपले मत मांडले. यावेळी मांडलेल्या विविध विषय व प्रश्ना संदर्भात, सकारत्मक निर्णय घेण्यात येईल असावं असे आश्वासन, प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. प्रशासकीय इमारत याठिकाणी झालेल्या बैठकीस, प्रांताधिकारी अनिल पवार, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, मुख्याधिकारी गणेश शिंदे ,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, आदी अधिका-यांसह, अहमदभाई जहागीरदार, कामगारनेते नागेशभाई सावंत,जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, नाऊरचे सरपंच संदीप शेलार,बेलापूरचे उपसरपंच अभिषेक, खंडागळे,समाजवादी पार्टीचे जोयफ जमादार ,आपचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, माजी नगरसेवक मुक्तार शाह, कुणाल करंडे,कैलास बोर्डे, सतीश सौदागर, रियाज पठाण, पत्रकार अस्लम बिनसाद, पत्रकार देविदास देसाई, आदींसह तालुक्यातुन मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget