January 2022

श्रीरामपुर  /( खास प्रतिनिधी )-अवैध धंदेवाल्याकडून हप्तेवसुली संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना तातडीने पोलीस नियंत्रण  कक्षअहमदनगर येथे नेमणूक करण्यात आली असुन दोघा पोलिसांना निलांबीत करण्यात आले आहे.                                          अवैध धंद्यावाल्याकडून वसुली बाबत पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व पोलीस वैरागर तसेच राऊत यांच्या संभाषणाची आँडीओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती त्याची दखल घेवुन जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी हे आदेश काढले आहेत.त्या संभाषणात पोलीस निरीक्षक मधुकर साळवे हे राऊत यास वसुलीचे काम वैरागर याच्याकडे देण्यात आले असुन तु वसुली करु नको कुणाकडे जावु नको असे सांगत आहेत या सर्व गंभीर प्रकरणाची पोलीसा अधिक्षक मनोज पाटील यांनी गंभीर दखल घेत ताताडीने पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची नगर मुख्यालयात नियत्रंण कक्षात बदली केली आहे  तर पोलीस शिपाई लक्ष्मण दशरथ वैरागर, कॉन्स्टेबल योगेश शिवाजी राऊत यांना निलंबीत केले आहे  हे दोघेही श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत होते.

व्हायरल झालेल्या क्लिप मध्ये अधिकारी वसुली संदर्भात सल्ला देत असल्याचे ऐकु येते. वसुलीचे काम दुसऱ्याचे असल्याचे या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याला म्हटल्याचे क्लिप मध्ये स्पष्ट होते. यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याची धमकी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत एस पी मनोज पाटील यांनी पोलीस निरीक्षक साळवे यांची बदली तर दोघांच्या निलंबनाचे आदेश काढत चौकशी सुरू केली आहे.तर श्रीरामपूर पोलिसांतून आणखी दोन संशयाच्या भवर्यात. 


श्रीरामपूर प्रतिनिधी - 
भीम आर्मी भारत एकता मिशन चे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे साहेब, महाराष्ट्र प्रभारी दत्तू मेढे साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सीताराम गंगावणे साहेब, महाराष्ट्र राज्य प्रमुख संघटक दिपकजी भालेराव साहेब यांच्या आदेशानुसार भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन, महाराष्ट्र प्रदेश समन्वयक मा. पँथर ऋषी पोळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत.भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष साजिद भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचा विषय असा होता कि, _रोहन माळवदकर_ या मनुवादी लेखकाने "वास्तव" या पुस्तकात _भिमाकोरेगाव चा खोटा इतिहास लिहिला आहे. तसेच ब्राम्हण महासंघाने हि पुस्तके फुकट वाटू अशी बुरसटलेल्या विचारसरणीची मानसिकता दाखवली._  त्यांचे हे वक्तव्य महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाचे असल्यामुळे सदरच्या घटनेचा निषेध म्हणून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून काळी फीत लावून दिनांक 30/01/2022 रोजी सकाळी 11 वाजता  निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले. कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार तसेच श्रीरामपूर पोलीस प्रशासनाच्या अटीनुसार मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदरचे आंदोलन करण्यात आले.यावेळी भीम आर्मी महाराष्ट्र राज्य प्रमुख संघटक दीपकजी भालेराव साहेब, स्टुडंट्स फेडरेशन महाराष्ट्र प्रदेश समन्वयक पँथर ऋषी पोळ साहेब, महाराष्ट्र सदस्य गौरव भालेराव, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष साजिद भाई शेख, राहाता तालुकाध्यक्ष सुनील भाऊ मोकळ, राहाता तालुका संघटक शब्बीर भाई कुरेशी, स्टुडंट्स फेडरेशन राहाता तालुका संघटक साहिल गायकवाड,विश्वदीप सोनवणे आदी. पदाधिकारी उपस्थित होते.




इच्छा होती मात्र वेळ नव्हता, ध्वजारोहन करणे हे कर्तव्य.
श्रीरामपूर प्रतिनिधी - पालिकेच्या ध्वजारोहणास उपस्थित राहण्याचा अट्टहास का?राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्य भरातील नगरपालिकासह याही नगरपालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. ज्या ज्या ठिकाणच्या  नगरपालिकेच्या नगराध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. अशा नगरपालिकांची सूत्रे प्रशासकांनी हाती घेतले आहेत. २६ जानेवारी २०२२ रोजी आपल्या हस्ते शहर आणि तालुक्यात ठीकठिकाणी ध्वजारोहणासह इतरही अनेक कार्यक्रम पूर्वनियोजित अशी होती. पालिकेतील ध्वजारोहणाचे आपणास कोणत्याही प्रकारचे मुख्य अधिकाऱ्यांकडून उपस्थित राहण्या संदर्भातले निमंत्रण नव्हते. असे असले तरी नगरपालिका ध्वजारोहणास उपस्थित राहण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला . मात्र शहरातील संत लूक हॉस्पिटल मधील ध्वजारोहन हे आपल्या हस्ते पूर्वनियोजित असे होते. ते टाळणे अपरिहार्य असे होते. आणि पालिकेच्या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहिले पाहिजे असा काही नियम नाही,त्यामुळे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा अट्टहास का?असा सवाल करून नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक म्हणाल्या,

खरेतर प्रजासत्ताक दिन हा सर्व स्तरातील सर्वांचाच असतो आणि एकाच वेळी सर्व त्याठिकाणी ध्वजारोहणास जाता येणे शक्य नाही. जो तो आपापल्या मर्जीनुसार आणि निमंत्रनानुसार प्रजासत्ताक दिन साजरा करीत असतो. त्याचा सन्मान करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे.  शासकीय ध्वजारोहनासह काँग्रेस भवन आणि संत लूक हॉस्पिटल या ठिकाणचे ध्वजारोहण करण्यास संदर्भातले निमंत्रण मला असल्या कारणाने अगोदर या ठिकाणी मी ध्वजारोहण केले आहे. इच्छा असूनही आपण मात्र  नगरपालिकेच्या ध्वजारोहणास उपस्थित राहू शकलो नाही. वेळेचे बंधन असल्याकारणाने  सर्व ठिकाणचे ध्वजारोहण करण्यासाठी एकाच वेळी उपस्थित राहता येत नाही. असे श्रीरामपूर नगरपालिकेच्या लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष महाराष्ट्र कृषक समाजाच्या अध्यक्षा आणि साईबाबा संस्थांनच्या विद्यमान विश्वस्त अनुराधा ताई आदिक यांनी म्हटले आहे. 



श्रीरामपूर : २६ जानेवारीला डॉ बाबसाहेबांनी लिहलेल्या संविधानाच्या माध्यमातून, सर्व देशवासियांना विचार स्वातंत्र्य आणि लिखाण स्वातंत्र्य मिळाले. मात्र ज्या संविधनामुळे जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली,अशा श्रीरामपूर पालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा गोविंदराव आदिक यांना, पालिकेत प्रशासक येताच, शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास पाठ फिरवल्याचे लक्षात आलेने, माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा यांना पालिकेच्या ध्वजारोहण कार्यक्रमाचा विसर पडल्या संदर्भात बातमी लावल्याचा राग अनावर झाल्याने, एका वृत्तपत्राचे संपादक असलेल्या स्वर्गीय खासदार गोविंदरावजी आदिक यांच्या कन्येने, तुम्ही पत्रकार आमच्या विरोधात पैसे घेऊन खोट्या बातम्या लावतात ? आम्हाला इतर कामे नाहीत का ,पालिकेच्या ध्वजारोहणास जायला आम्ही रिकामी टेकडे आहे का ? अशा शब्दांचा वापर करून, जवळपास १५० ते  २०० लोकांच्या जमवा समोर आरेरावीची भाषेत एस न्यूज मराठी ,चौफेर कानोसा या प्रसार माध्यमांमध्ये, व्यवस्थापकीय संपादक पदावर काम करत असलेल्या पत्रकारा समोर, सर्व पत्रकारांचा अपमान केल्याची निंदनीय घटना घडली. या घटनेच्या निषेध नोंदवित ग्रामीण पत्रकार महासंघाच्या वतीने, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर व उपविभागीय प्रांताधिकारी अनिल पवार ,तहसीलदार प्रशांत पाटील श्रीरामपूर यांना निवेदन देऊन,भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांचा अपमान करत, पत्रकारांशी अरेरावी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यायावी अशी मागणी केली असून. जर तत्कालीन राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल न झाल्यास संघटनेच्या वतीने विविध स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा,ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र उंडे यांनी दिला असून, त्यामुळे निर्माण होणारी संभाव्य परिणाम व परिस्थितीस , राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा गोविंदराव आदिक या वैयक्तिक व संयुक्तिक रित्या जबाबदार राहातील असेही जाहीर केलं आहे. या आंदोलना वेळी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख किरण शिंदे, साईकिरण टाइम्सचे राजेश बोरुडे, तिरंगा न्यूजचे अस्लम बिनसाद, एस ९ न्यूजचे युनूस इनामदार, स्वप्नील सोनार, लोकमतचे भरत थोरात, व्हिजन प्लसच्या सायरा सय्यद, एस न्यूज च्या मनीषा थोरात, अविनाश लिहणार, पत्रकार विठ्ठल गोरणे, आदी उपस्थित होते.

अहमदनगर प्रतिनिधी-जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस कर्मचारी हरिभाऊ मांडगे (वय 40, रा. पिंपरी गवळी, ता. पारनेर) यांनी शनिवारी (दि. 29) सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी दिली.हरिभाऊ मांडगे यांच्यावर कौटुंबिक वादातून 2018 आणि 2022 मध्ये दोन गुन्हे सुपा (ता. पारनेर) पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

श्रीरामपूर प्रतिनिधी-अहमदनगर  जिल्ह्यात मालमत्ता विषयक   गुन्ह्याकरिता कुख्यात असलेल्या सागर भांड टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.  राहुरी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी मयूर दिलीप देवकर यांनी  राहुरी 711/21 IPC 395, 397,341,506 आर्म ॲक्ट  4/25 प्रमाणे नुसार गुन्हा दाखल केला होता, सदर गुन्हा कुप्रसिद्ध सागर भांड टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सागर भांड सह टोळीतील अन्य पाच सदस्यांना अटक करण्यात आली होती. सागर भांड टोळी ही कोणताही कामधंदा न करता संघटीत पणे बेकायदेशररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता हिंसाचाराचा वापर करून , हिंसाचार करण्याची धमकी देऊन तसेच धाक दपटशहा  दाखवून जबरदस्तीने जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती. या गुन्ह्यातील विशेष बाब म्हणजे टोळीप्रमुख सागर भांड चे वडील पुणे पोलीस दलामध्ये कार्यरत होते .तरी देखील सदरक्षणाय खलनिग्रहणाय या या उक्तीप्रमाणे गुन्हेगारास कुठल्याही प्रकारची सहानुभूती न दाखवता जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न अहमदनगर पोलीस यांचेकडून करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन अहमदनगर पोलिसांनी  सदर गुन्ह्यास मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना सादर केला होता. सदर प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली असून तपास Dy.s.p. संदीप मिटके यांच्या कडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास करतअसताना हा गुन्हा फौजदारी कट रचून करण्यात आल्याचे  निष्पन्न झाल्याने भारतीय दंड संहिता कलम 120( ब) आणि गुन्हा करून पुरावे नष्ट केल्याचे निष्पन्न झाल्यावरून भारतीय दंड संहिता कलम 201 कलमाप्रमाने वाढीव कलमे  लावण्यात आली.आज रोजी Dy.s.p  संदीप मिटके यांनी खालील आरोपीताना विशेष मोक्का न्यायालय अहमदनगर येथे हजर केले असता विशेष मोक्का न्यायालय अहमदनगर यांनी तीन दिवसांची  वाढीव पोलीस कोठडी सुनावली.1) सागर भांड (टोळी प्रमुख),2) निलेश संजय शिंदे (टोळी सदस्य)3) गणेश रोहिदास माळी  (टोळी सदस्य) 4) रमेश संजय शिंदे (टोळी सदस्य)या गुन्ह्यातील आरोपींनी राहुरी येथील दुय्यम कारागृह चे गज कापून पलायन केल्यामुळे PI इंगळे सह अन्य सहा पोलीस निलंबित करण्यात आलेले आहेत. पोलिस त्या दोन आरोपींचा शोध घेत आहेत.सरकारी पक्षातर्फे   ॲड.  दिवाने व Dy.s.p  संदीप मिटके यांनी जोरदार युक्तिवाद  केला मा. न्यायालयाने सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून  आरोपीस तीन दिवसाची  वाढीव पोलीस कोठडी दिली.आरोपीच्या बाजूने ॲड. बाफना  व ॲड. सरिता साबळे यांनी काम पाहिले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-शासनाने वाईन विक्रीला खूलेआम परवानगी दिली असुन यात फार मोठा भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे. हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी आमदार राधाकृष्ण विखे पा यांनी केली आहे    आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे बेलापुर  कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बांधण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाच्या उद़्घाटनासाठी आले असता पत्रकारांनी वाईनला परवानगी या विषयावर छेडले असता आमदार राधाकृष्ण  विखे पा. म्हणाले की वाईन व दारु ही शारिरीक दृष्ट्या योग्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगणे या सारखे दुर्दैव कोणते आहे .दारु असो की वाईन  शेवटी ती शरिराला घातकच आहे तरी देखील या शासनाने किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यामागे काहीतरी गौडबंगाल असण्याची दाट शक्यता आहे या शासनाने लोकांच्या भावनेशी खेळण्याचा उद्योग सुरु केलेला आहे लोकांची श्रद्धास्थाने असणारी मंदीरे बंद करुन मदीरालये सुरु करण्याचा निर्णय घेतला असुन या सारखे दुर्दैव ते कोणते ?असा सवाल करुन आमदार विखे पा .म्हणाले की या अघाडी सरकारने कुणालाच न्याय दिलेला नाही .शेतकरी उद्योजक व्यवसायीक कोवीडमुळे बेरोजगार झालेले नागरीक यातील कुणालाच दिलासा देवू शकलेले नाही आता किराणा दुकानात वाईनला परवानगी देवुन काय साध्य केले केवळ संबधीतांशी हातमिळवणी करुन यात मोठा भ्रष्टाचार झाला असावा त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा अशी भाजपाची मागणी असल्याचेही आमदार राधाकृष्ण विखे पा .यांनी सांगितले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-राजुरी जवळ विजेच्या तारा तुटल्यामुळे खंडीत झालेला विज पुरवठा सुरळीत करत असताना दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले असुन दैव बलवत्त म्हणून दोघेही कर्मचारी थोडक्यात वाचले. बेलापुरला विज पुरवठा करणाऱ्या विजेच्या तारा राजुरी ममदापुर येथे तुटल्यामुळे बेलापुरगाव व परिसराचा विज पुरवठा खंडीत झाला होता बेलापुर महावितरणचे उपअभियंता मिलींद दुधे महावितरणचे चेतन जाधवा मधुकर औचिते स्वप्निल पाटील रविंद्र रौंदळ संदीप वायदंडे गणेश थोरात भोकरे पवार मनवर हे सर्व जण राजुरी येथे शेतात तुटलेल्या तारा ओढण्याचे काम करत होते चेतन जाधवा व अनिल दौंड हे अकरा मिटर उंच असलेल्या पोलवर बसुन तारा जोडण्याचे काम करत असतानाच त्यातील एक क्रॉस आर्म तुटल्याने शेजारी चेतन जाधव व अनिल दौंड यांनी प्रसंगावधान राखल्याने किरकोळ जखमी झाले. चेतन जाधव यांच्या बोटाला जखम झालेली आहे तर अनिल दौंड यांच्या तोंडाला जखम झालेली आहे उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने खाली उतरविले व प्राथमिक उपचार केले .या ही परिस्थितीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काम करुन रात्री दोन वाजता विज पुरवठा सुरळीत केला .आपला जिव धोक्यात घालुन हे कर्मचारी आपल्याला विज देण्याचे काम करत असतात ते उंच पोलवर चढुन विज पुरवठा सुरळीत करण्याचे काम करत असताना आपण वेळोवेळी लाईट केव्हा येईल हे विचारण्यासाठी केलेल्या फोनमुळे त्यांच्या कामात किती व्यत्यय येत असेल याची कल्पनाच केलेली बरी असाच अनुभव काल महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आला.

श्रीरामपुर प्रतिनिधी - नेवाशातील एका पोलीसाच्या आँडीओ क्लिपमुळे एक वरीष्ठ अधिकारी अडचणीत आला होता त्यामुळे जिल्ह्यात पोलीस वर्तूळात चांगलीच खळबळ उडाली होती. त्यानंतर पुण्यातील एका पोलीस अधिकाऱ्यांच्या आँडीओ क्लिपमुळे नागरीकात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या होत्या त्या चर्चांना पुर्णविराम मिळत नाही तोच श्रीरामपुरातील शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी सहा सात महिन्यात चार पोलिसांनवर अँटीकरप्शनचा ट्रॅप झाला आहे कालच दोन कॉन्स्टेबल ट्रॅप झाले होते तर आज हि पोलीसांचीही अवैध धंद्यावाल्याकडून वसुली बाबत झालेली हमरा तुमरी शिवीगाळ तसेच त्या प्रकरणात संबधीत अधिकाऱ्यांने वसुली बाबत दिलेला सल्ला काय आहे हे बिनधास्त न्युजच्या हाती लागले असुन बिनधास्त न्यूजच्या चाहत्यासाठी ते आहे तसेच प्रसारीत करत आहोत आणखीही बरीच वसुली प्रकरणे बिनधास्त न्यूजच्या हाती लागली आहे त्या बाबत वेळोवेळी खूलासा केला जाईल.


बेलापुर (प्रतिनिधी  )- अशोक सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी कारखान्याचे सूञधार माजी आ.भानुदास मुरकुटे यांची तर श्री.भाऊसाहेब उंडे यांची व्हा.चेअरमन पदावर एकमताने निवड झाली. अशोक कारखान्याचे चेअरमन व व्हा.चेअरमन पदाच्या निवडीसाठी निवडणूक अधिकारी श्री.गणेश पुरी यांचे अध्यक्षतेखाली व सहाय्यक निवडणुक अधिकारी श्री.एस.पी.कांदळकर यांचे उपस्थितीत नव निर्वाचित संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात  कारखान्याचे सूञधार माजी आ.भानुदास मुरकुटे यांची पाच वर्षासाठी चेअरमन पदावर तर श्री.भाऊसाहेब उंडे

यांची एक वर्षासाठी व्हा.चेअरमन पदासाठी एकमताने निवड झाली. श्री.मुरकुटे यांनी यापूर्वी दोन वेळा दहा वर्षे चेअरमनपदाची धुरा सांभाळलेली आहे. आता त्यांची तिस-यांदा चेअरमन पदासाठी निवड झाली आहे. बैठकीस संचालक मंडळाचे सदस्य रावसाहेब थोरात, कोंडीराम उंडे, सोपानराव राऊत, हिम्मतराव धुमाळ, बाबासाहेब आदिक, आदिनाथ झुराळे, पुंजाहरी शिंदे, ज्ञानदेव पटारे, विरेश गलांडे, शितल गवारे, हिराबाई साळुंके, ज्ञानेश्वर काळे, प्रफुल्ल दांगट, यशवंत बनकर, रामभाऊ कसार, यशवंत रणनवरे, अमोल कोकणे, योगेश विटनोर, ज्ञानेश्वर शिंदे उपस्थित होते.            सदर प्रसंगी माजी आ.भाऊसाहेब कांबळे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, साई संस्थानचे विश्वस्त  सचिन गुजर, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, दिलिप नागरे, बाबासाहेब दिघे, सुरेश गलांडे, संजय छल्लारे, सुभाष पटारे, शिवसेनेचे सचिन बडधे, लाल पटेल, मुजफ्फर शेख, मुन्नाभाई पठाण, ज्ञानदेव साळुके, अच्युतराव बनकर, बाबासाहेब ढोकचौळे, एकनाथ लेलकर, अंबादास आदिक, भाऊसाहेब कहांडळ, दिगंबर शिंदे, दिगंबर तुवर, दत्ताञय नाईक, अ‍ॅड्.डी.आर.पटारे, माजी नगरसेविका सौ.मंजुश्री मुरकुटे, प्रा.सौ.सुनिताताई गायकवाड, सौ.शालिनी कोलते, शिवाजी पवार, गोकुळ औताडे, दिगंबर नांदे, दशरथ पिसे, रणजीत बनकर, भागवतराव पटारे, हनुमंतराव वाकचौरे, भागवतराव पवार, भास्करराव मुरकुटे, कचरु औताडे, सखाराम कांगुणे, दिगंबर बारस्कर, अण्णासाहेब चौधरी, कचरु वाकचौरे, मच्छिंद्र भवार, रामदास पटारे, रामदास विधाटे, आबासाहेब गवारे, सुमन नाईक, चंदा जाधव, स्वाती गवारे, संगीता गवारे, संगीता खंडीझोड, अर्चना रणनवरे, सुनंदा जाधव, अर्चना पवार, अश्विनी यादव, प्रियंका गवारे, नीरज मुरकुटे, चंद्रभान पवार आदींसह कार्यकारी संचालक संतोष देवकर, कार्यालयीन अधिक्षक आप्पासाहेब दुशिंग उपस्थित होते. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष केला.

अहमदनगर प्रतिनिधीअहमदनगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी  मोटरसायकली चोरणार्या एका टोळीला अहमदनगर जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने शोधण्यास यश मिळवले असून या टोळीतील दोन आरोपींना ताब्यात घेऊन पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेललले आहे.

या दोन आरोपींकडून आतापर्यंत नगर आणि पुणे जिल्ह्यात चोरलेल्या दहा मोटरसायकली जप्त केलेले असून या जप्त केलेल्या मोटर सायकलची किंमत सात लाख 87 हजार इतकी आहे.याबाबत अधिक हकीकत अशी की पाथर्डी येथील रहिवासी अशोक जाधव यांची मोटरसायकल 23 जानेवारी रोजी घरासमोरून चोरीस गेली होती. याबाबत त्यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती.एकंदरीतच नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोटर सायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी एक स्वतंत्र पथक नेमून पाथर्डीतील मोटरसायकल चोरी तसेच जिल्ह्यात होत असलेल्या मोटरसायकल चोरीबाबत तपास करण्याचे आदेश दिले होते. या पथकाने याबाबत तपास सुरू केलेला असतानाच पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पथकाने नगर तालुक्यातील बहिरवाडी, जेऊर येथील सागर सुदाम जाधव याला ताब्यात घेतले सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्याला विश्वासात घेतल्यानंतर त्याने पाथर्डी येथील मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली. या गुन्ह्यामध्ये अजून त्याच्या सोबत कोण आहे याची माहिती त्याकडून मिळाली असता या टोळीमध्ये महेश उर्फ सुनील बाबासाहेब दारकुंडे, राहणार बहिरवाडी जेऊर तालुका नगर आणि गौतम पाटील अशी नावे सांगितली. यातील महेश उर्फ सुनील बाबासाहेब दारकुंडे याला ताब्यात घेण्यात आले मात्र तिसरा आरोपी हा फरार आहे.

यातील ताब्यात असलेल्या दोन्ही आरोपींना गुन्हे अन्वेषण शाखेने पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास पाथर्डी पोलिस करत आहे. या टोळीतील तीनही आरोपींवर नगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर, शिरूर, रांजणगाव या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. ही टोळी सराईत असून मोटरसायकल चोरी प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.या गुन्ह्याची उकल करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ आगरवाल, पोलिस उपाधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे कर्मचारी सपोनि सोमनाथ दिवटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पवार, सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, मनोज गोसावी, संतोष लोंढे, शंकर चौधरी, रवीकिरण सोनटक्के, देवेंद्र शेलार, लक्ष्मण खोकले, योगेश सातपुते, सागर ससाणे, विनोद मासाळकर, मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे यांनी यशस्वी कामगिरी केली.



नाशिक प्रतिनिधी - नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज (दि २६) सुरगाणा तालुक्यातील बोरगाव ते सुरगाणा रस्त्यावर चीराई स्टॉप  त्रिफुलीजवळच्या नागशिवडी शिवारात छापा टाकला. यादरम्यान, अवैधरित्या घातक अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयितांना ताब्यात घेतले.या कारवाईत अंकेश सुरेश एखंडे, वय-२९ वर्षे, रा-गोडंब, सुरगाणा, श्यामराव नामदेव पवार, वय-२४ वर्षे, रा-वांजुरपाडा, सुरगाणा, आकाश सुनिल भगरे, वय २२ वर्षे, रा. सुरगाणा यांच्या ताब्यातून ०३ देशी बनावटीचे पिस्टल (गावठी कट्टे) व ०३ जिवंत काडतुसे तसेच ०१ एअर गण, ०१ चॉपर, ०१ कोयता, ०६ मोबाईल व ०१ टोयाटो कोरोला वाहन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनि रामेश्वर मोताळे, सहापोउपनि नाना शिरोळे, पोहवा गोरक्षनाथ सवंत्सकर, पोहवा किशोर खराटे, पोहवा प्रविण सानप, पोना विश्वनाथ काकड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

श्रीरामपूर प्रतिनिधी - श्रीरामपूर नगरपालिकेत वारसा हक्काने माझ्या मुलास नोकरी मिळावी, या मागणीसाठी तारा रमेश बागडे या महिलेने नगरपालिका कार्यालयासमोर सोमवार दि. 24 जानेवारी 2022 पासून अमरण उपोषण सुरु केले असून काल दुसर्‍या दिवशीही कडाक्याच्या थंडीत महिलेचे उपोषण सुरुच होते.नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना बागडे यांनी यापुर्वीच निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, वारसा हक्काने माझ्या मुलास सेवेत रुजू करुन घेणेकामी आपण नगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी अर्ज सादर केलेले आहेत. सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून तुमचा विचार करता येत नाही, असे नगरपालिका प्रशासन नेहमी व वारंवार एकच उत्तर देत आहे. सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आपण या अगोदर नगरपालिकेमध्ये अनेक लोक अवॉर्डमधील वारसाहक्काने घेतलेले आहेत. त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे का? त्यांच्यासाठी सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट नाही का? याचा खुलासा करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.उपोषणाचा कालचा दुसरा दिवस होता. काल सायंकाळपर्यंत प्रशासनातील कोणीच उपोषणस्थळी भेट न दिल्याने आपल्या न्याय्य हक्कासाठी सुरु केलेले उपोषण यापुढेही सुरुच ठेवणार असल्याचे तारा बागडे यांनी म्हटले आहे.

कोपरगाव प्रतिनिधी - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रायलय दरवर्षी पोलिसांच्या शौर्यासाठी 'पोलीस पदक' जाहीर करते. यामध्ये यंदा जिल्ह्यातील तिघांना 'पोलीस पदक' जाहीर झाले आहेत.कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक भरत चितांमण नागरे यांना 'पोलीस शौर्य पदक' तर नागरी हक्क संरक्षण विभाग (पीसीआर), अहमदनगर येथे कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय एकनाथ तिजोरे व अल्ताफ मोहिउद्दीन शेख यांना 'पोलीस पदक' जाहीर झाले आहे.पोलीस पदकाची मंगळवारी घोषणा झाली. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील ५१ पोलिसांना हे पदक जाहीर झाले आहे. जिल्ह्यातील तिघांचा यामध्ये समावेश आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक तिजोरे यांनी ३३ वर्षे सेवा केली आहे. राज्यभर गाजलेल्या कोठेवाडी (ता. पाथर्डी) दरोडा प्रकरणाविषयी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित झाला होता. याचे उत्तरे तिजोरे यांनी व्यवस्थीत पाठविली. त्यांनी लाचलुचपत विभागात काम करताना अनेक केसेस हाताळल्या. खर्डा (ता. जामखेड) हत्याकांड प्रकरणात वरिष्ठांना वेळेवर अहवाल सादर करण्याबरोबरच अहमदनगर शहरातील मोहरम, गणपती बंदोबस्ताच्या नियोजनात तिजोरे यांनी महत्वाची भूमिका बजावली.सहायक पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख यांनी प्रकाश कांडेकर खून प्रकरणी आरोपी पकडणे, तपासात मदत करणे, सराईत गुन्हेगार पाप्या शेख याच्यावरील मोक्का प्रस्ताव तयार करणे, पोलीस अधीक्षक कृष्णा प्रकाश यांच्या कार्यकाळात १२ टोळ्यातील ६२ गुन्हेगार हद्दपार करण्यास मदत करणे याशिवाय गावठी कट्टे, काडतुसे, आरोपी अटक, मुद्देमाल हस्तगत करणे आदी प्रकरणात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. पोलिस उपनिरीक्षक भरत नागरे हे पोलिस मदत केंद्र, कोटमे, ता. येतापल्ली, जि. गडचिरोली. येथे प्रभारी अधिकारी असताना वरीष्ठाची परवानगीने त्यांनी २५ मार्च २०१८ रोजी नक्षली अभियान राबविले. यावेळी नक्षलीसोबत चकमक झाली. नक्षल्यांनी जोरदार फारींग केली.ऑपरेशनदरम्यान नागरे यांच्या टिमने नक्षलवाद्यानी लावलेले पाच क्लेमर बॉम्ब डिसपॉज केले. एक महिला नक्षलवाद्याची डेडबॉडी हस्तगत केली. या अभियानादरम्यान ब्लास्टिंगचे साहित्य, जिवंत क्लेमर बॉम्ब, थ्री बाय थ्री वेपन आदीसह मोठा शस्त्र साठा जप्त करण्यात आला होता. विषेश म्हणजे या ऑपरेशनदरम्यान पोलिस पथकातील एकही कर्मचारी जखमी झाला नव्हता. या कामगिरीची दखल घेत पोलिस उपनिरीक्षक भारत नागरे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. गडचिरोली येथे नक्षल्यासोबत झालेल्या चकमकीत नागरे यांनी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल त्यांना हे पदक जाहीर झाले असून त्यांचे अहमदनगर जिल्हा पोलिस दलाकडून अभिनंदन होत आहे.


श्रीरामपूर प्रतिनिधी :- श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना आज रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक मनोज पाटील  यांचे हस्ते "सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार" प्रदान करण्यात आला आहे.Dysp संदीप मिटके यांनी तोफखाना पोलीस ठाणे अंतर्गत गु.र.न.456/2018 भा द वि कलम 376( अ),( ब),354,323,506,34,   पोक्सो अधिनियम.कलम 5( एम), 6, व 17 या गुन्ह्याचा सर्वोत्कृष्ट तपास केला होता या गुन्ह्याची महाराष्ट्र राज्यात जानेवारी 2021 महिन्यासाठी च्या सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती या कामगिरी करता त्यांना पोलीस महासंचालक यांचे प्रशस्तिपत्र व 25 हजार रुपये रोख अशा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अहमदनगर पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.       

            तोफखाना पोलीस स्टेशन येथे  दाखल गुन्ह्याचा  प्राथमिक तपास PSI विशाल सनस यांच्याकडे होता, सदर गुन्ह्याचे  गांभीर्य व संवेदनशीलता ओळखून पुढील तपास Dy.s.p संदीप मिटके  यांचेकडे वर्ग करण्यात आला. त्यांनी सदर गुन्ह्याचा कायदेशीर तपास पूर्ण  करूनआरोपी विरुद्ध मा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सदर प्रकरणात मा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी  आरोपी क्र. 1 अफसर लतिफ सय्यद यास भादवि का कलम ३७६( ए) ( बी),३५४ बी,३२३ बालकांचे लैंगिक अत्याचाराचे  संरक्षण कायदा ( पॉक्सो)२०१२ चे कलम (एम),६,८ व१० प्रमाणे दोषी धरले आणि *20 वर्षे सक्तमजुरी व ५००००रु दंड* दंड न भरल्यास 1वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली सदर दंडाची रक्कम पीडित मुलीस नुकसान भरपाईपोटी देण्याचे आदेश पारित केले तसेच आरोपी क्रमांक 2) मुन्नी उर्फ शमीना सय्यद वय 52 वर्ष रा.भराड गल्ली मीरा वली बाबा दर्गाजवल तोफखाना जि.अहमदनगर बालकांचे लैंगिक अत्याचारापहोती. संरक्षण कायदा (पोस्को 2012 चे   17 व 21 प्रमाणे दोषी धरुन एक महिना  साधी कैद (प्रत्येकी) 500/-दंड व दंड न भरल्यास 10 दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. 

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज रोजी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते Dyspसंदीप मिटके ,API शिशिर देशमुख ( परभणी येथील तपासा बद्दल), ASI राजू भालसिंग, PC याकूब पठाण इत्यादींना सन्मानित करण्यात आले.


बेलापुर--(वार्ताहर) येथील जि.प. प्राथ. उर्दू शाळा मध्ये इ.१ ली ते ७ वी पर्यंतच्या सर्व मुली व दारिद्रय रेषखालील मुलांना सर्व शिक्षा अभियान योजने अंतर्गत गणवेश वाटप कार्यक्रम श्री. शरद नवले सदस्य जि. प. अहमदनगर यांचे अध्यक्षते खाली व महेंद्रजी साळवी सरपंच तसेच अभिषेक खंडागळे उपसरपंच यांचे उपस्थितीत पार पडले.या वेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात शरद नवले यांनी उर्दू शाळेला चार वर्ग खोल्या मंजूर झाल्याचे सांगीतले व भविष्यात शाळेची एक आदर्श इमारत करण्याचे आश्वासन दिले, तसेच ग्रामपंचायत तर्फे शाळेला सर्व काही मदत करण्याचे आश्वासन सरपंच व उपसरपंच यांनी दिले. तसेच आसिफभाई बागवान सदस्य शाव्य स यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी साठी शाळेला वाटर फिल्टर देण्याचे वचन दिले. तसेच अकबरभाई सय्यद अध्यक्ष शा.व्य.स. यांनी शाळेच्या अडी अडचणी मांडल्या , त्या वेळी शेख अकील, समीरशेख, आसिफ बागवान, शौकतकुरेशी, मुश्ताक अत्तार फिराज सय्यद, निसार शाह, अस्लम शेख, अस्लम अत्तार, मुनाफ पिंजारी आयशा बागवान, रूबीना बागवान सर्व सदस्य शा. व्य. स. उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेतील शिक्षक अनिस शेख यांनी केले तर प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापक जलील शेख यांनी केले तर अध्यक्ष निवड  श्रीम जबीन बागवान यांनी केले तर उपस्थितांचे श्रीम.  तरन्नुम खान यांनी आभार मानले कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी श्रीम. यास्मिन शेख, श्रीम. नसिबा बागवान, श्रीम महेरून्निसा खान, व अजरा शेख यांनी प्रयत्न केले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-मतदानाच्या रुपाने अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी लोकसेवा विकास अघाडीच्या सर्वच्या सर्व संचालकांना निवडून दिले व आमच्यावर विश्वास दाखविला त्या विश्वासाला कधीच तडा जावू दिला जाणार नाही असा विश्वास माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी बेलापुर येथील आभार सभेत व्यक्त केला . लोकसेवा विकास अघाडीच्या आभार दौऱ्यानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश पा. नाईक हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे सुभाष पटारे जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले द्वारकनाथ बडधे सुवालाल लुक्कड ,रविंद्र खटोड सेवा संस्थेचे चेअरमन अनिल पा .नाईक,जालींदर कुऱ्हे,भास्करराव खंडागळे,विलास मेहेत्रे,उपसरपंच अभिषेक खंडागळे,दत्ता कु-हे,भास्कर बंगाळ, भाऊसाहेब कुताळ,शेषराव पवार,प्रकाश नवले,प्रभाकर कु-हे,सुरेश कु-हे,गावकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे उपस्थित होते .या वेळी बोलताना माजी आमदार भानुदास मुरकुटे म्हणाले की आसपासच्या तालुक्यातील कारखान्याची काय अवस्था आहे हे सुज्ञ मतदारांना ज्ञात असल्यामुळे त्यांनी लोकसेवा मंडळाच्या पुर्ण २१संचालकांना भरघोस मतांनी निवडून दिले .अशोक कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेर मोठ्या प्रमाणावर ऊस असुन आपण आजपर्यंत सभासदाप्रमाणेच त्यांच्याही ऊसाला भाव दिलेला आहे .केंद्र शासनाचे इथेनाँल निर्मितीला प्रोत्साहन असल्यामुळेअशोकच्या इथेनाँल प्रकल्पाची क्षमता वाढविण्याचा विचार असुन अधुनिक तंत्रज्ञानासह पाच हजार टन क्षमतेचा नविन प्रकल्प उभारण्याचा मानस आहे .तसेच विजनिर्मितीतही वाढ करण्याचे नियोजन आहे कारखाना प्रदुषणमूक्त करण्याचा आपला मानस आहे बेलापूरच्या जनतेने मला भरभरुन प्रेम दिले आहे त्यामुळे या परिसरात अशोक बंधाऱ्याची मालीका उभारली .भविष्यात आपल्या परिसराचा पाणी प्रश्न जटील होणार आहै त्या करीता कारखान्याच्या माध्यमातून उपाय योजना कराव्या लागतील .असेही ते म्हणाले. यावेळी जालिंदर कु-हे,बाळासाहेब वाबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. या वेळी कलेश सातभाई, वसंतराव कुताळ,सुधाकर खंडागळे,विश्वनाथ गवते,शिवाजी वाबळे,आण्णा गारडे ,प्रकाश कुऱ्हे ,भरत सोमाणी,शरद देशपांडे ,प्रभाकर कुऱ्हे सुरेश कुऱ्हे,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले,मुश्ताक शेख,राजेंद्र सातभाई,वृद्धेश्वर कु-हे,प्रभात कु-हे, सुभाष अमोलीक,शफीक बागवान,मोहसीन सय्यद,प्रसाद कु-हे,वैभव कु-हे,गोरक्षनाथ कु-हे, पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा,जिना शेख,रावसाहेब गाढे,सुरेश केशव कु-हे,राजेंद्र ओहोळ ,राजेंद्र कुताळ, गणेशबंगाळ,दादासाहेब कुताळ,सुधीर कोळसे,सुभाष खंडागळे, हेमंत कोळसे मोहसीन सय्यद,शफीक बागवान, विश्वनाथ गवते बाळकृष्ण खोसे,महेश कुऱ्हे,अजिज शेख जाकीर शेख,गोरख कुताळ, रावसाहेब अमोलिक, प्रभाकर ताके,उपस्थित  होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले. सूत्रसंचलन महेश कु-हे  यांनी केले तर अनिल नाईक यांनी आभार मानले.

अहमदनगर प्रतिनिधी-पैशाच्या वादातून मजुराचा खून करणारा आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शेंडी (ता. नगर) शिवारात अटक केली. बबन श्रीधर वारूळे (रा. पिंप्री घुमरी ता. आष्टी, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यास पुढील कार्यवाहीसाठी आष्टी पोलिसांच्या  ताब्यात देण्यात आले आहे.संजय पांडु पवार (वय 40) हे कुटुंबीयासह पिंप्री घुमरी (ता. आष्टी) येथे राहतात. त्यांचे वडील पांडू हे बाभळीची लाकडे तोडून त्यापासून कोळसा तयार करण्याचे काम करत होते. त्यांचे गावातील बबन वारूळे याचे बरोबर बाभळीची झाडे तोडण्याचे मजुरीवरून वाद झाला होता. त्यावेळेस संजय यांनी बबन वारूळे यांना आतापर्यंत झालेल्या कामाचे पैसे द्या. मी उद्या सकाळी राहिलेले काम करून देईल, असे म्हणून वाद मिटवला होता. परंतु, 21 जानेवारी 2022 रोजी पिंप्री ते घुमरी रस्त्याच्याकडेला सखाराम महादेव साबळे यांच्या घरापाठीमागे पांडू चंदर पवार (वय 60) हे जखमी अवस्थेत पडलेले आहेत, अशी माहिती मिळाली. संजय यांनी खात्री केली असता, पांडू पवार यांचा खून झालेला होता. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात आरोपी बबन श्रीधर वारूळे (रा. पिंप्री घुमरी) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तो गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. आष्टी पोलिसांनी आरोपी बबन हा अहमदनगर जिल्ह्यात पळून आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी बबन यास शेंडी शिवारात सापळा लावून पकडले.सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस हवालदार संदीप पवार, मनोज गोसावी, रविकिरण सोनटक्के, देवेंद्र शेलार, लक्ष्मण खोकले, सागर ससाणे, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, कमलेश पाथरुट, उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीस पुढील कार्यवाहीसाठी आष्टी पोलिसांकडे सोपविण्यात आले.


शिर्डी ( प्रतिनिधी)शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानने लाडू प्रसादासाठी हरिद्वार येथील मे.हर्ष फ्रेश डेअरी कडून शुद्ध गाईचे तूप घेतले होते. त्यापैकी 214 क्विंटल शुद्ध गाईचे तूप एक्सपायर झाल्यानंतरही त्याचा ईलिलाव काढून साई संस्थानने  ते विक्री केले. मात्र अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 27 (तीन) अंतर्गत हा गुन्हा ठरतो. त्यामुळे साई संस्थांनच्या एक्सपायर तूप विक्री करणाऱ्या जबाबदार मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा या संदर्भात आदेश द्यावेत .अशी  मागणी एका पत्राद्वारे दैनिक साईदर्शनचे संपादक जितेश लोकचंदाणी यांनी भारताचे‌ पंतप्रधान नरेंद्र मोदी व संबंधित सर्व मंत्री व विभागाकडे केले आहे.या पत्रकात पुढे म्हटले आहे की,‌शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालयात लाडू प्रसाद बनविण्यासाठी खरेदी करण्यात आलेले 214 क्विंटल गाईचे शुद्ध  तूप एक्सपायर झालेले असताना साईबाबा संस्थान ने इ लिलाव काढून ते विक्री करण्यात आले व यासंदर्भात साईसंस्थांनवर आरोप झाल्यानंतर अखाद्य म्हणून साई संस्थानने हे एक्सपायर तुप विक्री केल्याचे नंतर

जाहीर केले. मात्र  माहिती अधिकारात   अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाकडून या संदर्भात माहिती मागितली असता त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये असे एक्सपायर झालेले अन्न हे अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 27 (3) अंतर्गत विक्री केल्यास गुन्हा ठरतो .असे असताना साई संस्थांनने हे एक्सपायर तुप  इ लिलावाद्वारे विक्री कसे केले? असे एक्सपायर तूप विक्री  केल्यामुळे साई संस्थांनच्या संबंधित अधिकाऱ्यांनी एक प्रकारे हा गुन्हाच केला आहे. त्यामुळे साई संस्थानच्या जबाबदार असणाऱ्या या एक्सपायर‌ तुप विक्रीप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर संबंधितांवर अन्नसुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 27 (3)अंतर्गत  गुन्हा दाखल व्हावा. व त्यासाठी आपण या प्रकरणी विशेष लक्ष घालून संबंधित खात्याला तसे आदेश द्यावेत.अशी मागणी या पत्राद्वारे जितेश लोकचंदानी यांनी केली आहे.


श्रीरामपूर (प्रतिनिधी) - येथील सामाजिक कार्यकर्त्या सुल्तानाबानो शाह यांची समाजवादी पार्टीच्या श्रीरामपुर शहर महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली,त्यांची सामाजिक कार्याच्याप्रती असलेली आवड तथा विविध सामाजातील उपेक्षित घटकांसाठी असलेली तळमळ पाहता समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार,श्रीरामपुर तालुकाध्यक्ष आसिफ तांबोळी, शहराध्यक्ष अय्यूब पठाण यांनी सुल्तानाबानो शाह यांच्यावर समाजवादी पार्टीच्या श्रीरामपूर महिला शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवत त्यांना नियुक्तीपत्र बहाल केले,यामुळे त्यांच्या कार्याना अधिक गती प्राप्त होऊन उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अधिक बळ प्राप्त झाले आहे . समाजवादी पार्टी हा  राजकिय पक्ष आपल्या भारत देशात मोठे योगदान देणारा पक्ष असुन या पक्षाची महाराष्ट्र राज्याची धुरा प्रदेशाध्यक्ष माननिय आमदार आबु असिम आझमी संभाळत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर समाजवादी पार्टीची मोठी पक्षबांधणी सध्या सुरु आहे, तमाम बहुजन तथा वंचीत सामाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पक्षातर्फे कसोसीचे प्रयत्न केले जात आहे. शाह यांच्या निवडीबद्दल फातेमा शाह,हाजरा शाह,शाहीन पठाण,सईदा शेख,सोफिया शेख, इकरा पठाण,इमरान शेख, कलीम वेल्डर, अल्तमश शेख, अनवर तांबोळी, गुड्डू जमादार, समीउल्लाह शेख,आरिफ शाह, अज्जु शेख,सलीम शेख, अली पठाण,आदींनी त्यांच्या भावी उज्वल कारकिर्द आणि बाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


श्रीरामपूर प्रतिनिधी- आज दि.  23/01/2022 रोजी Dysp  संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत  श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव आऊटसाईड  व  श्रीरामपुर शहरातील सूतगिरणी येथे गावठी हातभट्टी दारू  अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी  हरेगाव आऊट साईड परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू  अड्ड्यावर छापा टाकून  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू  यांचा नाश करण्यात आला 

आरोपी. क्र.1) रणजीत लक्ष्मण गायकवाड

45,500/-  रु. कि.चे 650 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

1500/- रू किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.2) सुधीर काशिनाथ गायकवाड 

42,000/-  रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

1000/- रू  किमतीची 10 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं.  अं.)

आरोपी. क्र. 3)  मिनाबाई श्याम पवार

42,000/-  रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.)

2000/- रू  किमतीची 20 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू ( आंबट उग्र वासाची किं. अं.)

 एकूण 1,34,000/-/-  रुपये

 वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर तालुका  व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड )  (ई)  प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

भल्या पहाटे अचानक झालेल्या व लागोपाठ सुरू असलेल्या कारवाईमुळे हरेगाव आऊटसाईड परिसरातील अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे हरेगाव  व श्रीरामपूर शहर परिसरातील महिलांनी  Dy.s.p. संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक  करून आभार व्यक्त केले.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा.  स्वाती भोर,  यांचे मार्गदर्शनाखाली  Dysp संदीप मिटके, ASI राजेंद्र आरोळे, HC सुरेश  औटी, पो. कॉ. नितीन शिरसाठ  आदींनी केली.


अहमदनगर प्रतिनिधी -अहमदनगर  जिल्ह्यात मालमत्ता विषयक   गुन्ह्याकरिता कुख्यात असलेल्या सागर भांड टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.  राहुरी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी मयूर दिलीप देवकर यांनी  राहुरी 711/21 IPC 395, 397,341,506 आर्म ॲक्ट  4/25 प्रमाणे नुसार गुन्हा दाखल केला होता, सदर गुन्हा कुप्रसिद्ध सागर भांड टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सागर भांड सह टोळीतील अन्य पाच सदस्यांना अटक करण्यात आली होती. सागर भांड टोळी ही कोणताही कामधंदा न करता संघटीत पणे बेकायदेशररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता हिंसाचाराचा वापर करून , हिंसाचार करण्याची धमकी देऊन तसेच धाक दपटशहा  दाखवून जबरदस्तीने जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती. या गुन्ह्यातील विशेष बाब म्हणजे टोळीप्रमुख सागर भांड चे वडील पुणे पोलीस दलामध्ये कार्यरत होते .तरी देखील सदरक्षणाय खलनिग्रहणाय या या उक्तीप्रमाणे गुन्हेगारास कुठल्याही प्रकारची सहानुभूती न दाखवता जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न अहमदनगर पोलीस यांचेकडून करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन अहमदनगर पोलिसांनी  सदर गुन्ह्यास मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना सादर केला होता. सदर प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली असून तपास Dy.s.p. संदीप मिटके यांच्या कडे वर्ग करण्यात आला आहे. आज रोजी Dy.s.p  संदीप मिटके यांनी खालील आरोपीताना विशेष मोक्का न्यायालय अहमदनगर येथे हजर केले असता विशेष मोक्का न्यायालय अहमदनगर यांनी आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.1) सागर भांड (टोळी प्रमुख) 2) निलेश संजय शिंदे(टोळी सदस्य) 3)  गणेश रोहिदास माळी  (टोळी सदस्य) 4) रमेश संजय शिंदे (टोळी सदस्य) या गुन्ह्यातील आरोपींनी राहुरी येथील दुय्यम कारागृह चे गज कापून पलायन केल्यामुळे PI इंगळे सह अन्य सहा पोलीस निलंबित करण्यात आलेले आहेत. पोलिस त्या दोन आरोपींचा शोध घेत आहेत.

सरकारी पक्षातर्फे   ॲड.  दिवाने व Dy.s.p  संदीप मिटके यांनी जोरदार युक्तिवाद  केला मा. न्यायालयाने सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून  आरोपीस आठ दिवसाची पोलीस कोठडी दिली. आरोपीच्या बाजूने ॲड. बाफना  व ॲड. सरिता साबळे यांनी काम पाहिले.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget