January 2021

Dy.s.p.संदिप मिटके यांच्या पथकाची कारवाई,दोन  पिडीत परप्रांतीय( बंगाली) महिलेची सुटका व एक आरोपी ताब्यात

आज दि.  २९/०१/२०२१ रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना हॉटेल नंदादीप चिंचोली फाटा हॉटेल चालक सुनिल रामचंद्र हारदे   हा  पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे असे खात्रीशिर बातमी मिळाली.  त्याप्रमाणे  हॉटेल नंदादीप चिंचोली फाटा  येथे बनावट ग्राहक पाठवुन शासकीय पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत परप्रांतीय (बंगाली) महिलांची सुटका केली असून आरोपी सुनिल रामचंद्र हारदे यांस ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपी विरुध्द  राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956  चे कलम  3,4,5,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे.

*सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, मा. डॉ. दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली Dy.s.p संदीप मिटके , PI गाडे, स.फौ. राजेंद्र आरोळे ,पो.हे.का सुरेश औटी, अण्णासाहेब चव्हाण, राधिका कोहकडे, पो का रवींद मेढे ,सुनील शिंदे ,सचिन ताजणे, सचिन लोंढे यांच्या पथकाने केली.


राहुरी (प्रतिनिधी  )- संक्रापुर तालुका राहुरी येथील शेतकरी देविदास देसाई यांची विज मोटार चोरीस गेली असुन त्यांच्या  तक्रारी वरुन राहुरी पोलीस स्टेशनला भांद वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे         या परिसरात  शेतकर्यांच्या विज मोटारी चोरुन चार - दोन हजारात भंगारात विकणारी मोठी टोळी कार्यरत असुन पोलीसांनी या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे राहुरी तालुक्यातील प्रवरा काठावरील विहीरीतील पाणबुडी तसेच नदी काठावरील पाणबुडी चोरण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत असुन चोरलेली विज मोटार चार - दोन हजारात भंगारात विकली जात असुन विज मोटार चोरीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत चोरीचा तपास लागत नसल्यामुळे शेतकरी आता तक्रर देण्याचेच टाळत आहे नदीवर टाकलेली विज मोटार  व केबल चोरणारी टोळीच या परिसरात वावरत असुन पोलीसांनी विज मोटार चोरणारे व त्या विकत घेणारे या दोघावरही कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे भंगार व्यवसाय करणाराकडे साठा रजिस्टर असणे गरजेचे असताना एकाही भंगार व्यवसायीकाकडे तशी नोंद वही आढळत नसुन अनेक ठिकाणी चोरीचे सामान खरेदी केले जात आहे संक्रापुर येथील अनेकांच्या विज मोटारी अद्याप पर्यत चोरीस गेलेल्या आहेत काहींनी तक्रारी दिल्या परंतु त्याचा पुढे काहीच  तपास न झाल्यामुळे आता शेतकरीही चोरी होवुनही गप्प बसत आहे संक्रापुर येथील शेतकरी देविदास देसाई यांनी राहुरी पोलीसाकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की माझे संक्रापुर येथील शेतातील विहीरीतुन २७जानेवारी ते २८ जानेवारी रात्री १ ते सहा वाजण्याच्या सुमारास कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी विहीरीतील पाच हाँर्स पाँवरची पानबुडी तसेच १२५ फुट केबलची चोरी करुन अंदाजे आठ हजार रुपयाचे नुकसान केले आहे या बाबत राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस निरीक्षक हनुमंत गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगाव पोलीस पुढील तपास करत आहे विज मोटार चोरांचा व चोरीच्या मोटारी विकत घेणार्यांचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली असुन या बाबत लवकरच एक शिष्टमंडळ जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटून निवेदन देणार आहे.

राहुरी( प्रतिनिधी मिनाष पटेकर )राहुरी तालुक्यातील नुकत्याच झालेल्या  ४४ ग्रामपंचायतीच्या व संभावी ३८ ग्रामपंचायतीच्या अशा ८२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत उपविभागिय अधिकारी अनिल पवार यांच्या अध्यक्षेतेखाली काढण्यात आली.राहुरी तालुक्यात नुकत्याच ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुक संपन्न झाल्या यामधे निवडणुक आयोगाना  सरपंच पदाचे आरक्षण गोपनिय ठेवत त्याचे आरक्षण आज दि.२७ जानेवारी रोजी काढण्यात आले.यावेळी तहसिलदार फसियोदिन शेख,नायब तहसिलदार गणेश तळेकर यांनी आरक्षण सोडतीसाठी परिश्रम घेतले.यावेळी गटविकास अधिकारी गोंविद खामकर,कृषी अधिकारी महेश ठोकळे,दत्ता गोसावी,सुनिल हुडे,सयाजी,शंडगे,अभिजित क्षिरसागर,अश्विनी नन्नवरे, सुलोचना वाघमारे,महेश देशमुख,जावेद शेख,अंकुश सोनार अदि अधिकारी व कर्मचारी यांनी काम पाहिले.राहुरी येथे आज बुधवार दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळी११ वाजता केशरंग मंगल कार्यालय येथे सन २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी राहुरी तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडती पार पडल्या.

आरक्षण पुढील प्रमाणे- 

अनुसुचित जाती - ११ जागा पैकी

ताहाराबाद,कुकडवेढे,वांबोरी,चेडगाव,केंदळ खुर्द, चिंचाळे(गडधे आखाडा)या गावात

पुरुष सरपंच राहणार आहे.तर मांजरी,मल्हारवाडी,मुसळवाडी,वळण,खुडसरगाव,

चिंचाळे (गडदे आखाडा)महिल सरपंच असणार आहे.

अनुसुचित जमाती-१० जागा

मालुंजे खुर्द, शिलेगाव, धानोरे,ब्राम्हणगाव भांड,उंबरे,महिला सरपंच राहणार आहे,

तर वरशिंदे(वाबळेवाडी),रामपुर,कात्रड,केंदळ बु,खडांबे खुर्द,येथे पुरुष महिला सरपंच असणार आहे.

नागराकांचा मागस प्रवर्ग-२२जागा पैकी 

सोनगाव,सडे,धामोरी खुर्द, वडनेर, मोमीन आखाडा, चिखलठाण दरडगाव थडी,टाकळीमिया,बाभुळगाव,कानडगाव ,डिग्रस,याजागेवर महिला सरपंच होणार आहेत.तर 

तुळापुर,पिंपळगाव फुनगी,आंबी, चादेगाव,चिंचविहिरे,कनगर बु,वावरथ जांभळी,जांभुळबन,पिप्री वळण,करजगाव,मोरवाडी,गणेगाव, या २० गावात पुरष सरपंच होणार आहे.

तर सात्रळ, निंभेर, तांदुळवाडी ,तांभेंरे, घोरपवाडी, बा.नांदुर ,कोंढवड, वरवंडी, खडांबे बुद्रुक गुंजाळे संक्रापूर दवणगाव केसापूर बोधेगाव लाख पाथरे खुर्द कोपरे तिळापुर हे पुरुष सरपंच होणार आहे.

तर गुहा कुरणवाडी  म्हैसगाव राहुरी खुर्द मानोरी देसवंडी तमनर आखाडा पिंपरी अवघड ब्राह्मणी मोकळ धामोरी, बुद्रुक आरडगाव चिंचोली गंगापूर अमळनेर ,जातप, माहेगाव ,वांजुळपोई ,कोल्हार खुर्द, येथे महिला सरपंच होणार आहे.



बेलापुर  (प्रतिनिधी  )- श्रीरामपुरचे कर्तव्यदक्ष तहसीलदारांच्या कार्य तत्परतेमुळे दिव्यांग व्यक्तीला झटपट रेशन कार्ड मिळाले असुन आधार दिव्यांग संघटनेच्या वतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांना धन्यवाद दिले आहे.   रामकृष्ण नगर शिरसगाव येथील रहीवासी संदिप गोपीनाथ गंभीरे हे रेशनकार्ड मिळविण्यासाठी  तहसील कार्यालयात आले होते पुरवठा विभागात गेल्यानंतर त्यांना आठ दहा दिवसांनी या असे सांगितले त्यामुळे निराश झालेले पायाने अधु असलेले दिव्यांग गंभीरे जड अंतकरणाने तहसील कार्यालयाचा जिना उतरत होता त्याच वेळेस तहसीलदार प्रशांत पाटील कार्यालयात जाण्यासाठी जिना चढत होते एक दिव्यांग व्यक्ती जिना उतरताना त्यांनी पाहीले या दिव्यांग व्यक्तीचे नक्कीच काही तरी महत्वाचे काम असणार आहे अशी शंका त्यांना आली त्यांनी दोन पावले मागे घेत त्या दिव्यांग व्यक्तीची अस्थावाईकपणे चौकशी केली त्या वेळी त्या दिव्यांगाला हे माहीत नव्हते की हेच तहसीलदार आहेत व यांच्या सहीनेच आपल्याला रेशनकार्ड मिळणार आहे तहासीलदार प्रशांत पाटील यांनी चौकशी केल्यानंतर दिव्यांग व्यक्ती संदीप गंभींरे यांनी सांगितले की रेशनकार्ड मिळावे या करीता हेलापाटे मारत आहे त्या वेळी तहसीलदार पाटील यांनी गंभीरे यासं हाताला धरुन मागे फिरविले अन माझ्या बरोबर चल मी तुला रेशनकार्ड देतो असे म्हणाले या वाक्यामुळे गंभीरे यांना नवल वाटले की पुरवठा अधिकार्यांनी नाही म्हटले मग हे कोठुन देणार तहासीलदार पाटील यांनी गंभीरे यांना हाताला धरुन पुरवठा विभागात नेले व तातडीने रेशनकार्ड तयार करण्याचा आदेश दिला अन काही वेळातच गंभीरे यांचे रेशनकार्ड तयार झाले तहसीलदार पाटील यांनी सही करुन ते त्यांच्या हातात दिले त्या वेळी संदिपं  गंभीरे याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता ही आनंदाची बातमी गंभीरे यांनी आधार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण खडके यांना सांगितली त्यांनीही संघटनेच्या वतीने तहसीलदार पाटील यांचे आभार मानले.

श्रीरामपुर (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर पोलीस स्टेशनला नव्यानेच आलेले पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी कामकाजाच्या दुसर्याच दिवशी एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुसासह एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला नव्यानेच हजर झालेले पोलीस निरीक्षक संजय सानप यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की वार्ड नंबर सात पूर्णवाद नगर येथील आरोपी निरज वैद्य हा गावठी कट्टा विक्रीच्या उद्देशाने घेवुन फिरत आहे उपविभागीय अधिकारी संदिपं मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि सानप ऐ पी आय संभाजी पाटील पोलीस नाईक गणेश भिंगारदे  पोलीस काँन्स्टेबल राहुल नरोडे यांनी मिळालेल्या गुप्त माहीतीच्या अधारे शोध घेतला असता निरज वैद्य हा संशयास्पद फिरताना आढळून आला त्याची अंग झडती घेतली असता त्याचा कमरेला एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस आढळून आले असुन संबधीता विरुध्द आर्म आँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी )-श्रीरामपुर येथील एका व्हाँटसअप गृपवर दोन समाजात तेढ निर्माण होईल या उद्देशाने मजकुर टाकल्याबद्दल दोन व्यक्तीवर कारवाई करण्यात आली असुन सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकुर टाकल्यास कडक कारवाई करण्याचा ईशारा पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी दिला आहे.श्रीरामपुर येथील एका गृपवर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट टाकण्यात आली होती ही बाब बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक सानप यांच्या लक्षात आणुन दिली  पोलीस निरीक्षक सानप यांनी तातडीने संबधीत गृप अँडमीनला बोलावुन घेतले व संबधीत आक्षेपार्ह पोस्ट बद्दल विचारणा केली त्यांनी ही पोस्ट  दोन युवकांनी टाकली असुन त्या नंतर गृपचे सेटींग बदलुन ओन्ली अँडमीन असे करण्यात आल्याचेही सांगितले त्यामुळे पोलीस निरीक्षक सानप यांनी त्या दोघांना तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश दिले पोलीस स्टेशनला आणल्या नंतर त्या दोघांनी ती आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचे कबुल केले त्यां नंतर त्यांचेवर दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या हेतूने पोस्ट टाकून समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला त्या दोघांना पोलीस स्टेशनला आणल्या नंतर श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला मोठा जमाव जमा झाला होता पोलीसा निरीक्षक सानप यांनी दोन्ही बाजुच्या लोकांना समजुन सांगीतले व अशा प्रकारे पोस्ट टाकणार्या व्यक्ती विरुध्द कडक कारवाई  केली जाईल सोशल मिडीया हे चांगले प्रसार माध्यम असले तरी त्याचा गैरवापर कुणी करु नये व्हाँटस्अप गृप फेस बुक ट्विटर वर कुणी कुणाचा अपमान मानहानी होईल अशी पोस्ट टाकल्यास वा फाँरवर्ड केल्यास गृप अँडमीनसह पोस्ट फाँरवर्ड करणारावर कडक कारवाई केली जाईल सर्व व्हाँटस्अप गृपवर पोलीसांची नजर आहे समाजात अशांतता निर्माण होईल असे कृत्य कोणी करु नये असे अवाहनही पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी केले आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी- मालेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व राजनीति समाचार चे पत्रकार प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ या संघटनेचे सभासद शेख खलील शेख यासीन राहणार मालेगाव यांची महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या मालेगाव शहर संघटक पदावर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद यांनी दिली खलील शेख हे गेल्या दोन वर्षांपासून प्रेय संपादक व पत्रकार सेवा संघ या संघटनेशी एकनिष्ठ असून सामाजिक चळवळीत त्यांचा नेहमी सिंहाचा वाटा असतो याच बरोबर राजनीती समाचार या वृत्तपत्रातून त्यांनी गोरगरीब सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे त्यांच्या या कार्याचा आढावा घेता पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात झालेल्या पत्रकारांच्या बैठकीत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी त्यांची निवड केली तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष असलम बिनसाद यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यांच्या या निवडीबद्दल पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद प्रदेश उपाध्यक्ष बिके सौदागर प्रदेश उपाध्यक्ष फिरोज भाई पठाण प्रदेश कार्याध्यक्ष आमीर भाई जागीरदार नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान के शेख नाशिक जिल्हा सचिव वहाब खान महेबुबखान नासिक जिल्हा कार्याध्यक्ष मन्सूर पठाण चांदवड तालुका अध्यक्ष सुखदेव केदारे येवला तालुका अध्यक्ष सूर्यकांत गोसावी चांदवड तालुका उपाध्यक्ष रवींद्र केदारे मनमाड शहराध्यक्ष अनिल देवरे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष विलास पठारे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष रियाज खान पठाण पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद शेंडगे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राज मोहम्मद शेख अहमदनगर जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया अध्यक्ष असलम बिनसाद श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाष गायकवाड श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाब भाई शेख श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष जावेद भाई शेख मालेगाव शहर अध्यक्ष इलियास छोटू मिया राहता तालुका अध्यक्ष विजय खरात राहता तालुका उपाध्यक्ष शब्बीर कुरेशी तसेच अकबर भाई शेख ,अमीर बेग मिर्झा, अरुण बागुल, मुरलीधर किंगर ,साईनाथ बनकर ,,लक्ष्मण साठे आदींनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) शहरातील नवीन वसाहत असलेल्या मिल्लत नगर या भागाकडे नगरपालिकेचे लक्ष नसून गेल्या पाच दिवसांपासून या परिसरामध्ये कचऱ्याची गाडी देखील फिरकलेली नाही. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झुडपे व गवत वाढले असून त्यांची साफसफाई देखील होत नाही. त्यामुळे डास मच्छरांचा प्रादुर्भाव नागरिक सहन करीत आहेत. अनेक वेळा तक्रारी करून देखील नगरपालिका या भागाकडे लक्ष देत नसल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले असून नगरपालिकेचे विरोधात आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

 

मिल्लत नगर भागातील दोन्ही नगरसेवक या भागाकडे फिरकत नाहीत. रस्ते, गटारी, पिण्याचे पाण्याची पाईपलाईन या समस्या अनेक दिवसांपासून आहेच. या भागामध्ये जो एक रस्ता तयार केला आहे त्या रस्त्यावर फक्त खडी टाकण्यात आली असून इतर रस्त्यांचे डांबरीकरण झाले त्याचवेळी हा रस्ता केला आहे. मात्र या रस्त्याचे डांबर केले कुठे ? असा प्रश्न या भागातील रहिवासी युसुफ लाखानी यांनी विचारला आहे.  ओपन स्पेस तसेच इतरत्र मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात झाडेझुडपे, गवत वाढले असून यामधून मोठे साप निघतात. नगराध्यक्षांना  प्रत्यक्ष जागेवर आणून सर्व परिसर दाखवण्यात आला. त्यांनी लवकरात लवकर सफाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र दोन महिने होऊन देखील ही सफाई झालेली नाही. या भागांमध्ये काही ठिकाणी अजून रस्ते नाहीत. पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. पाईपलाईन नसल्यामुळे सध्या असलेल्या नळांना  मोटर लावून देखील पाणी येत नाही. त्यामुळे नागरिक मात्र पाणीटंचाईने हैराण झालेले आहेत. पालिकेने तातडीने या भागामध्ये लक्ष द्यावे अन्यथा येत्या नगर पालिका निवडणुकीत प्रत्येकाला त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा सुद्धा नागरिकांनी दिला आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -  शहरातील अस्वच्छता दुर होऊन स्वच्छता निर्माण व्हावी याउद्देशाने श्रीरामपूर नगर परिषदेमार्फत श्रीरामपूर शहरातील भुयारी गटारीचे नियोजन करून शहरात विविध ठिकाणी भुयारी गटारींची कामे करण्यात आली,

मात्र सदरील कामे ही अर्धवट आणि अपूर्ण असल्याचे दिसून येते आहे, यामुळे शहरातील नागरीकांचा त्रास वाचण्याऐवजी वाढला असून याची प्रचंड चिड सध्या शहरातील नागरीकांमध्ये बघावयास मिळत आहे,

कारण या भुयारी गटारींचे अर्धवट झालेल्या कामांचा सर्वसामान्य नागरीकांना काहीही लाभ होत नाही, याउलट जास्तच मनस्ताप आणि त्रास वाढला आहे, सदरील भुयारी गटारीत कोणीही आपापल्या स्वतःच्या घरातील ड्रेनेज /बाथरुम घाण पाण्याचे कनेक्शन जोडून मोकळा होत आहे, व त्याचा त्रास इतरांना होत आहे, तसेच श्रीरामपूर शहरातील अस्तित्वात असलेल्या रस्त्यालगतच्या गटारी देखील नेहमीच तुंबलेल्या दिसून येतात,त्यांची वेळोवेळी नित्य नियमाने योग्य साफसफाई होत नाही, शहरातील बहुतांश रस्त्यावरुन खळखळून हे दुर्गंधीयुक्त गटारीचे घाण पाणी वाहत असते, तथा वेळोवेळी कचरा उचलणारी घंटागाडी देखील येत नसल्यामुळे रस्त्यावर नेहमीच कचऱ्याचे ढीगारे बघावयास मिळतात,त्याचा सर्वच नागरिकांना मोठा त्रास होत होत असून या कमालीच्या अस्वच्छतेमुळे भविष्यकाळात शहरात भयंकर रोगराईची साथ फैलावण्याची शक्यता ही नाकारता येऊच शकत नाही,

कधीतरी महिन्यातून एखादेवेळी  सदरील कचरा घंटागाडी येते, फक्त त्यावेळीच कचरा कुंड्या साफ दिसतात,मात्र दुसर्यादिवशी  पुन्हा त्या कचऱ्याने ओसांडून वाहताना दिसून येतात, याबाबत शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते तथा दक्ष नागरीकांनी अनेकवेळा श्रीरामपूर नगर परिषदेच्या कार्यालयात समक्ष भेटून, तथा तोंडी व लेखी समस्या मांडूनही सदरीलबाबी रस्त्यावरील कचऱ्याची तसेच तुंबलेल्या गटारीची कोणत्याही प्रकारची दखल घेऊन स्वच्छतेबाबत कुठलीही सुधारणा झालेली नसल्याचे दिसून येत आहे,

याकरीता मा.मुख्याधिकारी

 साहेबांनी जे.जे.फाऊंडेशनच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन नागरीकांना त्रासापासून मुक्त करावे  तथा प्रथम भुयारी गटारीच्या नियोजनाचे काय झाले याचा खुलासा करावा आणि याबाबत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी, तसेच शहरातील नागरीकांच्या आरोग्याचा ज्वलंत प्रश्न असल्याने सदरील प्रकरणी नियमितपणे कमीतकमी दिवसांततरी गटारी साफ करण्यात याव्यात,तथा कचरा उचलणारी घंटागाडी ही दैनंदिन पाठविण्यात यावी, याबाबत आपण मा.मुख्याधिकारी साहेबांनी स्वत: जातीने लक्ष घालावे अन्यथा या गंभीर प्रकरणी याविरोधात जे.जे. फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्ते आपल्या मित्र परिवारासह लोकशाही मार्गाने श्रीरामपूर नगर परिषद कार्यालयासमोर घंटानाद आंदोलनासह अमरण उपोषणाचा मार्ग स्विकारणार आहेत तथा यापासून निर्माण झालेल्या बर्या वा वाईट परिणामास संबंधित श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनच जबाबदार राहील असेही शेवटी या निवेदनात नमूद करण्यात आले आहे,सदरील निवेदन हे मा.मुख्यधिकार्यासह मा.नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष,आमदार, खासदार आणि सर्व प्रसारमाध्यमांना पाठविलेल्या या निवेदनावर जे.जे.फाऊंडेशनचे अध्यक्ष जोएफ जमादार,असिफ तंबोली, अय्युब पठान, अल्तमश शेख, दानिश पठान,जकरिया सैय्यद, अरबाज कुरैशी, मुबसशीर पठान, शाहिद शेख, शकील शेख, गुड्डू जमादार, अनवर तंबोली, मोसीन कुरैशी,नईम बागवान, शादाब पठान,फरहान शेख,आदींच्या स्वाक्षर्या आहेत.


 बेलापुर ग्रामपंचायत निवडणूक विश्लेषन

बेलापुर ( देविदास देसाई )- नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत रात्रीतुन झालेली युती अमान्य झाल्यामुळे अनेकांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला त्याचा फटका जनता विकास अघाडीला बसल्यामुळे त्यांना केवळ सहाच जागेवर समाधान मानावे लागले  मात्र गावकरी मंडळाने गाव विकासाचा आराखडा जनते सामोर ठेवुन सत्ताधार्यांनी केलेल्या कामाचे वाभाडे सभामधुन काढले ते जनतेला भावले त्यामुळे गावकरी मंडळाला अकरा जागा मिळाल्या                                             प्रभाग क्रमांक एक हा जनता अघाडीचा अभेद्य प्रभाग होता प्रत्येक निवडणूकीत या प्रभागात जनता अघाडीने कुणालाही उमेदवारी दिली तरी तो विजयी होत होता परंतु या निवडणूकीत जनता अघाडीचे नेते रविंद्र खटोड उभे होते परंतु यांवेळी त्यांचीही दमछाक झाली या प्रभागात सलग दोन पंच वार्षिक सदस्य राहीलेल्या शेख शिरीन जावेद यांना पराभव पत्करावा लागला तो ही केवळ ४५ मतांनी त्यात काहींना कोणते बटन दाबावयाचे हे न समजल्यामुळे नोटा बटन दाबले गेले तसेच जनता अघाडीने नाकारल्यामुळे सय्यद बेगम अबुताहेर यांनी अपक्ष निवडणूक लढविली त्यात त्यांना ९० मते मिळाली अपक्ष उमेदवारांचा फटका हा शिरीन शेख यांना बसला व गावकरी मंडळाचा विजय झाला रंजना बोरुडे या ही केवळ २१ मताच्या फराकाने विजयी झाल्या आहेत प्रभाग क्रमांक दोन मध्ये देखील अपक्ष उमेदवार कैलास चायल मुळे चुरशीची लढाई झाली दोन वेळेस सरपंच राहीलेले भरत साळुंके यांचा केवळ ६८ मतांनी विजय झाला गांवकरी मंडळाचे प्रफुल्ल डावरे यांनी जोरदार लढत दिली त्यांना ५५४ मते मिळाली तर अपक्ष असलेले कैलास चायल यांनी ५४१ मते मिळविली तर याच प्रभागात चुकुन उमेदवारी अर्ज राहीलेल्या पवार नंदा अनिल यांचा फटका जनता अघाडीलाच बसला या ठिकाणी गावकरी मंडळाच्या सविता उत्तम आमोलीक ६१ मताच्या फरकाने विजयी झाल्या तर  नंदा पवार यांनी जाहीरपणे जनता अघाडीला पाठींबा दिलेला असतानाही त्यांना ८६ मते मिळाली प्रभाग क्रमांक तीन हा अरुण पा नाईक यांच गड म्हणून ओळखला जात होता या भागातुन कुठल्याही निवडणूकीत अरुण पा नाईक यांना मताधैक्य असायचे परंतु या वेळी नवखा तरुण तडफदार उमेदवार अभिषेक खंडागळे याने ४४० मताच्या फरकाने विजयी झाला अरुण पा नाईक यांचे बंधु चंद्रकांत नाईक यांना ५७८ मते मिळाली तर अपक्ष असणारे शेख नवाज ईलीयास यांना ४५६ मते मिळाली प्रभाग क्रमांक  पाच मध्ये साळवी महेंद्र जगन्नाथ हे २१६ मताच्या फरकाने विजयी झाले या ठिकाणी अपक्ष उमेदवार अच्छेलाल यादव यांना १०७ मते मिळाली सुविध भोसले यांना ६२ मते मिळाली तर नोटा १७ मते मिळाली प्रभाग क्रमांक पाच मध्ये मिना अरविंद साळवी या ५२ मताच्या फरकाने विजयी झाल्या तेथे कविता झीने यांना ९३ मते मिळाली या ठिकाणीही अपक्षामुळे गडबड झाली प्रभाग क्रमांक सहा मध्ये नवखे उमेदवार चंद्रकांत नवले हे १४७ मताच्या फरकाने विजयी झाले या प्रभागात तीन जण अपक्ष उभे होते  प्रकाश पाटणी यांना ६३ अच्छेलाल यादव यांना ६३  राशिनकर राजेंद्र  यांना ५४ मते मिळाली त्यामुळे अपक्ष उमेदवारांनी सर्व उमेदवारांची बेरीज वजाबाकी बिघडवण्याचे काम केले हे ही तितकेच  सत्य आहे.

श्रीरामपूर :-( प्रतिनिधी)आय.पी. एस. पोलीस प्रशिक्षणार्थी अधिकारी श्री.आयुष नोपाणी यांनी श्रीरामपूर शहरातील तीन महिन्याचा प्रशिक्षणाचा कार्यकाळ उत्कृष्टपणे पूर्ण केला शहरात कायदा व सुव्यवस्था दृढ करण्याकरिता त्यांनी अथक परिश्रम घेऊन सर्वसामान्य जनतेच्या संरक्षणाचे संरक्षणाची काळजी घेतली विशेष म्हणजे त्यांच्या कार्यकाळात शहर व परिसरातील सर्व अवैध धंदे बंद करण्यात आले होते. त्यांच्या या धाडसी कारवाईमुळे शहरातील जनतेत समाधानाचे वातावरण पसरले होते. आज रोजी त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण करून श्रीरामपूर करांचा निरोप घेतला. यावेळी त्यांना निरोप देणे करिता जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मनोज पाटील व श्रीरामपूर विभागाच्या

अप्पर पोलीस अधीक्षक सौ. दिपाली काळे, पोलीस उपअधीक्षक श्री. मिटके, श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. खान साहेब आदींची उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मनोज पाटील यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रशिक्षणार्थी अधिकारी श्री.आयुष नोपाणी यांनी गेल्या तीन महिने उत्कृष्टपणे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे कामकाज पाहिल्याबद्दल त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पत्रकार संघाच्या वतीने त्यांना स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, शेख गुलाब भाई वायरमन इलेक्ट्रॉनिक मीडिया अहमदनगर जिल्हा अध्यक्ष असलम बिनसाद,स्वप्नील सोनार, फकीर मोहंमद शेख, देविदास देसाई, जयेश सावंत, सुभाषराव गायकवाड, अमन शेख, शहबाज पठाण, रुषीकेष पोल.सचीन केदार, रोहित भोसले,युनूस इनामदार, हर हर ,अमोल शिरसाट, अँड.डोके, अकबर भाई शेख, अमीर बेग मिर्झा, राजमोहंमद शेख, कलीम बिनसाद, मोहसीन शेख,आदी मान्यवर पत्रकार उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र लघु उत्त पत्र व पत्रकार संघ च्या वतीने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना विनंती करण्यात आली की श्रीरामपूर शहरासाठी असाच निर्भीड व कर्तव्यदक्ष अधिकारी द्यावा.



बेलापूर(देविदास देसाई )बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी जनता विकास आघाडीला सत्तेतून पायउतार करीत गावकरी मंडळाने ११ जागा जिंकुन सत्ता मिळविली. तर प्रदिर्घ काळ सत्तेत असलेल्या जनता विकास आघाडीला ६ जागांवर समाधान मानावे लागले.

जि. प. अध्यक्ष शरद नवले,अशोक कारखाना संचालक अभिषेक खंडागळे,भाजपचे शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे, व सुनील मुथा यांच्या नेतृत्वाखाली गावकरी मंडळाचे सौ. तबसुम आसिफ बागवान,सविता उत्तमराव अमोलिक, अभिषेक भास्करराव खंडागळे, सौ.प्रियंका प्रभात कु-हे,मुस्ताक उमर शेख,महेंद्र जगन्नाथ साळवी,सौ. मिना अरविंद साळवी, वैभव विलास कु-हे,चंद्रकांत मोहनराव नवले,सौ. उज्वला रविंद्र कुताळ,व रमेश कमलाकर अमोलिक हे विजयी झाले. प्रभाग पाच मधून गावकरी मंडळाचे महेंद्र साळवी व .सौ. मिना साळवी हे दिर भावजयी गावकरी मंडळाकडून विजयी झाले.

तर पं. स. सदस्य अरूण पा. नाईक, बाजार समिती संचालक सुधीर नवले, जनता आघाडी प्रमुख रविंद्र खटोड,माजी सरपंच भरत साळुंके यांच्या नैतृत्वाखालील जनता विकास आघाडीचे रविंद्र मुरलीधर खटोड,भरत अशोकराव साळुंके, सौ. रंजना किशोर बोरुडे, सौ. शिला राम पोळ,सौ. सुनीता राजेंद्र बर्डे व सौ.छाया बाळासाहेब निंबाळकर हे सहा उमेदवार विजयी झाले.


प्रभाग निहाय उमेदवार व त्यांना मिळालेली मते याप्रमाणे-

*प्रभाग-१*    रविंद्र मुरलीधर खटोड   *विजयी* ज वि आ (७४१),संजय बापूराव गोरे-पराभूत गा मं (५६१)राजेंद्र राशीनकर-पराभूत-स्वतंत्र(३३),

सौ. रंजना किशोर बोरुडे-* *विजयी* ज वि आ (६७१),सौ. माधुरी प्रशांत ढवळे पराभूत- गा मं (६५०),सौ. तबसुम असिफ बागवान *विजयी* गा मं (६३०),सौ. शिरीन जावेद शेख-पराभुत ज वि आ (५८५),सौ.सय्यद बेगम आबुताहेर-पराभूत-स्वतंत्र(९०)

*प्रभाग-२* भरत अशोकराव साळुंके   *विजयी* ज वि आ (५८६),प्रफुल्ल हरिहर डावरे-पराभुत गा मं (५५४),कैलास मदनलाल चायल -पराभूत स्वतंत्र(५४१)

कु. सविता उत्तमराव अमोलिक *विजयी* गा मं (८१८),सौ. छाया विलास सोनवणे-पराभुत ज वि आ (७५७),सौ. नंदा अनिल पवार -पराभूत स्वतंत्र(८६)

सौ. शिला राम पोळ *विजयी* ज वि आ (९३६),सौ. सोनाली हेमंत बनभेरू पराभुत-गामं(७२८)

*प्रभाग-३* अभिषेक भास्करराव खंडागळे *विजयी* गा मं ( १०१८ ),चंद्रकांत गुलाबराव नाईक-पराभुत ज वि आ ( ५७८     ),नवाज इलियास शेख-पराभूत स्वतंत्र( ४५६ ),

सौ. प्रियंका प्रभात कु-हे- *विजयी* गा मं  ( ११४५),सौ.गौरी चेतन कु-हे पराभूत ज वि आ (८७० )


*प्रभाग-४* मुश्ताक उमर शेख- *विजयी* गा मं ( ९१०), हरुन महेमुद सय्यद पराभुत -ज वि आ (६९६),सौ. छाया बाळासाहेब निंबाळकर *विजयी* ज वि आ (  ८१६),सौ. कल्याणी रमेश लगे पराभूत गा मं (७९४  ),सौ. सुनीता राजेंद्र बर्डे *विजयी* ज वि आ ( ८५२),सौ. कमल भगवान मोरे पराभुत गा मं( ७४८)


*प्रभाग-५* महेंद्र जगन्नाथ साळवी *विजयी* गा मं ( ७२२    ),विशाल डॅनियल साळवे पराभुत ज वि आ (  ५०६ ), अच्छेलाल यादव पराभुत -स्वतंत्र (१०७),सुविध भोसले पराभुत स्वतंत्र(१७),वैभव विलास कु-हे *विजयी* गा मं ( ७०८),विजय लहू कु-हे  पराभूत ज वि आ (६७३) ,      ,सौ.मिना अरविंद साळवी *विजयी* गा मं  (  ६५९ ),सौ.राणी मिलिंद एडके -पराभुत ज वि आ (  ६०७),कविता झिने पराभुत स्वतंत्र (९३ )

*प्रभाग-६* चंद्रकांत मोहनराव नवले *विजयी* *गा मं (९९७),सुधीर वेणूनाथ नवले पराभूत ज वि आ (८५०),राजेंद्र मोहन राशीनकर पराभुत स्वतंत्र(५४),अच्छेलाल यादव पराभुत स्वतंत्र(६३),निलेश प्रकाश पाटणी पराभुत स्वतंत्र(६३),रमेश कमलाकर अमोलिक* *विजयी* *गा मं (१०५०),भाऊसाहेब वसंत तेलोरे पराभुत ज वि आ (९३२),सौ. उज्वला रविंद्र कुताळ *विजयी* गामं(१०९६),सौ.सिमा विवेक वाबळे पराभुत ज वि आ (८७७)याप्रमाणे मते मिळाली आहेत*.



*या निवडणुकीत अरुण पा. नाईक यांचे बंधु चंद्रकांत नाईक यांचा अभिषेक खंडागळे यांनी मोठया मताधिकक्याने  तर सुधीर नवले यांचा शरद नवले यांचे बंधु चंद्रकांत नवले यांनीही मोठया फरकाने धक्कादायक पराभव केला*.

*तर प्रभाग दोन मध्ये माजी सरपंच भरत साळुंके यांनी लक्षवेधी तिरंगी लढतीत तिसऱ्यांदा बाजी मारली.त्यांनी भाजपचे शहराध्यक्ष* *प्रफुल्ल डावरे व स्वतंत्र उमेदवार कैलास चायल  यांचा पराभव केला .येथे मोठी मत विभागनी झाली.तसेच रविंद्र खटोड यांनी नवखे उमेदवार संजय बापूराव गोरे यांचा मोठया फरकाने पराभव करून तिसऱ्यांदा बाजी मारली .जनता आघाडीच्या सौ. छाया विलास सोनवणे या  सविता अमोलिक यांच्याकडून पराभूत झाल्या आहेत. येथे जनता आघाडीच्या वेळेत अर्ज माघारी घेऊ न शकलेल्या व नंतर जनता आघाडीला पाठिंबा दिलेल्या सौ. नंदा अनिल पवार यांना ८६ मते मिळाली. त्यांची तांत्रिक उमेदवारी राहिल्याचा फटका आघाडीच्या सौ. सोनवणे यांना बसला*.

*मात्र एवढ्या अटीतटीच्या निवडणुकीतही प्रभाग १ आणि २ मध्ये खटोड-साळुंके यांच्या नैतृत्वाखालील जनता आघाडीचे आजही वर्चस्व कायम असल्याचे दाखवुन दिले आहे*.

*माजी उपसरपंच रविंद्र खटोड व भरत साळुंके प्रतिक्रिया देताना म्हणाले की, कर्मयोगी मुरलीधर खटोड यांचा समर्थ वारसा पुढे चालविताना गावाच्या विकासाला बांधील राहुन काम करु.सक्षम सकारात्मक विरोधकांची भूमिका बजावताना सत्ताधाऱ्यांना चांगल्या कामात साथ देऊ.तर सुधीर नवले म्हणाले की, जनतेने दिलेला कौल मान्य आहे.हा जनतेची दिशाभूल, दहशत, दादागिरी व धनशक्तीचा विजय आहे.*


*जि. सदस्य शरद नवले यावेळी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, निवडणूक संपली मतभेद संपले. आता गावाच्या विकास कामांना प्राधान्य देणार आहोत. पिण्याच्या पाण्याची योजना,घनकचरा आदीकामे प्राधान्याने करणार आहोत. विजय सुज्ञ मतदारांना समर्पित करीत आहोत.*विजया नतंर बोलताना अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे म्हणाले की आमचा कारभार पारदर्शी अन  सर्वांना विश्वासात घेवुन होणार आहे ३६५ दिवसात आमच्याकडून योग्य कारभार झाला नाही तर आमचा राजीनामा श्रेष्ठींनी घ्यावा तो देण्यास आम्ही बांधील आहोत.


बेलापुर  (प्रतिनिधी )- श्रीराम मंदिर बांधकामात आपलाही सहभाग असावा या हेतुने बेलापूरातील मुस्लिम बांधवानी ४४ हजार एकशे अकरा रुपयाची देणगी श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष , गोविंद देवगीरीजी महाराज तथा राष्ट्र संतआचार्य किशोरजी व्यास यांच्याकडे सुपुर्त केला                                           श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगीरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास हे बेलापुर  या जन्मगावी येणार असल्याची माहीती मुस्लीम बांधवांना मिळाली जामा मस्जिदचे चिफ ट्रस्टी जाफरभाई आतार बहोद्दीन सय्यद हैदरभाई अकबरभाई टिन मेकरवाले हाजी ईस्माईल रफीक भाई शेख  शफीक बागवान मुनीर बागवान मोहसीन सय्यद गँसुद्दीन शेख आजिज शेख यांनी मुस्लिम बांधवाची ताताडीची बैठक बोलविली वा त्या बैठकीत

राम मंदिराला देणगी देण्याचा विषय घेण्यात आला सर्व मुस्लिम बांधवांनी ताताडीने आपापल्या परीने राम मंदिरासाठी आर्थीक मदत केली आचार्य किशोरजी व्यास यांचे गावात आगमन होण्यापुर्वी मुस्लिम समाजाने ३३ हजार रुपये जमा केले होते आचार्य किशोरजी व्यास यांचे बेलापुर गावातील जामा मस्जिदमध्ये आगमन होताच चिफ ट्रस्टी जाफराभाई आतार व बहोद्दीन सय्यद हाजी ईस्माईल अकबर टिन मेकरवाले यांनी त्यांचे स्वागत केले त्या वेळी आणखी अकरा हजार रुपये जमा झाले अशा प्रकारे मुस्लिम बांधवांच्या वतीने श्रीराम मंदिर बांधाकामासाठी  ४४ हजार रुपयाची देणगी गोविंद देवागिरीजी महाराज यांच्याकडे सुपुर्त करण्यात आली या वेळी बोलताना हाजी ईस्माईल म्हणाले की श्रीराम मंदिराच्या उभारणीत बेलापूरातील मुस्लीम बांधवाचा सहभाग असावा म्हणून आम्ही हा खारीचा विटा उचलण्याचा प्रयत्न केला या वेळी बोलताना अकबर भाई टिन मेकरवाले म्हणाले की एका चांगल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य आम्हा मुस्लिम बांधवांना लाभले गावाच्या वतीने आणखी मोठी मदत करण्याचा प्रयत्न करु असेही ते म्हणाले.

कोरोना प्रादुर्भाव निर्माण झाला तेव्हा पासून ते हे संकट पूर्णपणे नष्ट होई पर्यंतच्या काळात शेतकरी ,छोटे व्यावसायिक , व्यापारी, संघटित असंघटित मोल मजुरी करून हातावर पोट भरणारे कामगार, या सर्वांचे विज बिल माफ करावे या मागणी साठी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र सत्ताधारी व बाकी सर्व विरोधी पक्ष  यांचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा एकदा आम आदमी पार्टीला चड्डी-बनियान आंदोलन हाती घ्यावे लागले 

संपूर्ण देशामध्ये कोरोना सारख्या भयानक विषाणूच्या प्रादुर्भाव निर्माण झाला होता त्यामुळे आजही आर्थिक गडी विस्कटलेली आहे  उद्योग-व्यवसायात  कामगारांची मोठ्या प्रमाणात कपात झाली कमी वेतनात काम करण्याचा फतवा काढला पूर्वीच्या कोरोनाची  लस बाजारात उपलब्ध होत असताना दुसरी कोरोना ची लाट येणार या धास्तीने पूर्वापार सुरू असलेल्या उद्योगांना खीळ बसली

 हजारो नागरिक या मुळे धास्तावले आहे  संपूर्ण महाराष्ट्रात लाँक डाऊन काटेकोरपणे पालन करण्यात आले होते   देशातील संपूर्ण आर्थिक चक्र थांबलेले आहे दळणवळण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे त्यामुळे देवाण-घेवाण ठप्प झाली त्यामुळे शेतकरी व्यापारी संघटित व असंघटित कामगार यांच्यावर आर्थिक संकट उभे राहिले आहे रोजगार नाही शेती मालाला बाजारपेठेत उठावा नाही त्यामुळे  सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे याची काळजी महाराष्ट्र सरकारने घेऊन सर सगट कोरोना काळातील विज बिल माप करावे या मागणीसाठी  आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांच्या नेतृत्वाखाली वीज बिल माफ करा या मागणीसाठी  सरकारचे लक्ष वेधण्यासाठी  चड्डी-बनियान आंदोलन करण्यात आले यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, जिल्हा सचिव राहुल रणपिसे, शहराध्यक्ष किशोर वाडीले, युवा अध्यक्ष अक्षय कुमावत, यशवंत जेठे, वक्ते  प्रवीण जमदाडे, भैरव मोरे, भरत डेंगळे, अक्षय पवार, सागर देवकर,अभिजित राऊत, दीपक परदेशी आदी उपस्थित होते.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- श्रीरामपुर तालुक्यात सर्वात मोठी समजल्या जाणार्या बेलापुर ग्रामपंचायतीच्या सतरा जागेकरीता मतदान शांततेत संपन्न झाले एकुण ७२.५० टक्के मतदान झाले.बेलापुर ग्रामपंचायतीच्या सतरा जागेकरीता मतदान संपन्न झाले बेलापुर गावात एकूण १४१०४ मतदारा पैकी १०२१८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला प्रभाग क्रमांक १ मध्ये एकुण मतदार १८९५ होते पैकी १३४९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावाला प्रभाग क्रमांक दोन मध्ये ऐकुण मतदान २३५० होते पैकी १६९६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला प्रभाग क्रमांक  तीन मधुन ऐकुण मतदार होते २८५४ पैकी २०७६ जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला प्रभाग क्रमांक चार मध्ये ऐकुण २१२३ मतदार होते पैकी १६३७ लोकांनी मतदानाचा हक्क बजावला प्रभाग क्रमांक पाच मध्ये ऐकुण मतदार होते २०३९पैकी १४१४मतदारानी मतदानाचा हक्क बजावला प्रभात क्रमांक सहा मध्ये ऐकूण मतदार होते २८८१पैकी २०४६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला जि प सदस्य
शरद नवले सुनिल मुथा अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे यांचा गावकरी मंडळ तर जनता अघाडीचे

रविंद्र खटोड काँग्रेसचे अरुण पा नाईक व बाजार समितीचे संचालक

सुधीर नवले यांचा जनता विकास अघाडी  यांच्यामध्ये सरळ सरळ लढत होती त्यात प्रभाग क्रमांक एक दोन तीन सहा मध्ये अपक्ष उमेदवार असल्यामुळै सर्वच प्रभागात कमालीची चुरस निर्माण झाली आहे प्रत्येक प्रभागात दोनही पँनल बरोबरच अपक्षांनीही आपला हात सैल सोडल्यामुळे सकाळपासुनच मतदारांनी मतदान केंद्राभोवती रांगा लावल्या होत्या काही अनुचित प्रकार होवु नये म्हणून भापोसे आयुष नोपाणी हे बेलापुरात तळ ठोकुन होते सर्व मतदारांचे भवितव्य आता मशिनमध्ये बंद झाले आहे अपक्षासह दोनही पँनलने विजयाचा दावा केला असला तरी मतदार कुणाला कौल देणार हे सोमवारच्या निकाला नंतरच जाहीर होईल

बेलापुर  (देविदास देसाई  )-बेलापुर खूर्द येथील केशव गोविंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकाने रस्त्यावर सापडलेला नऊ कोटी रुपयाचा धनादेश बँकेला परत केला त्या शिक्षकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

या बाबत सविस्तर माहीती अशी की केशव गोविंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील शिक्षक जालींदर विटनोर हे शाळेच्या कामानिमित्त उच्च माध्यमिक मडंळ पुणे येथे गेले होते शाळेचे


कामकाज आटोपुन रस्त्याने पायी जात असताना त्यांच्या पायाने एक कागद उडाला तो कागद त्यांना चेक साराखा वाटला त्यामुळे त्यांनी तो उचलुन हातात घेतला तर तो खरोखरच चेक होता अन तो ही चक्क नऊ कोटी रुपयाचा १३ जानेवारी २०२१ रोजी दिलेला चेक हा बँक आँफ महाराष्ट्र शाखेतुन एल आय सी कार्यालयासाठी देण्यात आलेला होता त्यांनी ही घटना तातडीने विद्यालयाचे प्राचार्य सोपान मगर व आपले नाशिक येथील नातेवाईक डाँ नवनाथ तमनर यांना कळविली दोघांनीही तो चेक  महाराष्ट्र बँकेच्या शाखेत नेवुन देण्याचा सल्ला दिला तो चेक घेवुन विटनोर हे महाराष्ट्र बँकेच्या शिवाजी नगर येथील शाखेत गेले तेथे गेल्यावर बँकेचे शाखाधिकारी कुलकर्णी यांना या बाबत माहीती देताच त्यांना फार आंनद झाला त्यांनी तातडीने सर्व स्टाफची बैठक बोलविली बैठकीत जालींदर विटनोर यांनी बँकेचे महाप्रबंधक सी एन कुलकर्णी व शाखाधिकारी पी एच पारख यांच्याकडे तो सापडलेला नऊ कोटी रुपयाचा धनादेश सुपूर्त केला सर्वांनी जालींदर विटनोर यांच्या प्रामाणिकपणा बद्दल टाळ्याच्या गजरात कौतुक करुन बँकेच्या वतीने विटनोर यांचा सत्कार करुन त्यांना गिफ्टही देण्यात आले या वेळी बँकेचे महाप्रबंधक सी एन कुलकर्णी म्हणाले की हा धनादेश बँक आँफ महाराष्ट्र एम्प्लाँइज पेंशन ट्रस्टच्या वतीने एल आय सी ला देण्यात आलेला होता पर रस्त्याने जाताना हा चेक गहाळ झाला होता विटनोर सरांनी प्रामाणिकपणे तो चेक आणुन दिला त्या बद्दल शाखेच्या वतीने त्यांचे कौतुक करतो असेही कुलकर्णी म्हणाले*

बेलापुर (प्रतिनिधी  )- सत्तेच्या धुंदीत मद मस्त झालेल्यांना आता घरचा रस्ता दाखवुन गावकरी मंडळाच्या सर्व सतरा सदस्यांना निवडून द्या त्यांच्याकडून दर्जेदार काम करुन घेण्याची जबाबदारी माझी आहे असे अवाहन गावकरी मंडळाचे नेते सुनील मुथा यांनी केले गावकरी मंडळाच्या वतीने आझाद मैदान येथे आयोजित प्रचार सांगता सभेत अध्यक्ष पदावरुन बोलाताना मुथा म्हणाले की एका विकास कामाला दहा वर्षातुन एकदाच निधी येतो त्यामुळे त्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे झाला पाहीजे सत्ताधार्यांनी गटारीची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची केली असुन गटारीतुन सांडपाणी वाहुनच जात नाही केवळ काम उरकायचे अन बिल काढायचे हाच एकमेव धंदा चालू असुन मतदानातुन या महाभागांना जाब विचारा चुकीच्या कामाचा जाब विचारण्याची जबाबदार आपलीच आहे मला त्याचे काय असा विचार जर सर्वांनी केला तर यांचे धंदे जोरात चालतील चुकीच्या कामांना अन चुकीच्या माणसांना पाठीशी घालु नका  हीच वेळ आहे नाही तर पाच वर्ष पश्चात्ताप करण्याची वेळ येईल गावात चाललेल्या चुकीच्या कामाबाबत मीच वेळोवेळी आवाज उठविला असेही मुथा म्हणाले तुमच्या बापाबरोबर मी काम केलेले आहे ते करताना अभिमान वाटायचा आज तुमचे काम पाहुन लाज वाटते पैसा वाटला की निवडून येता येते हा गैरसमज काढुन टाका सत्तेतुन पैसा कमवायचा पैशातुन गुंड गोळा करायचे ते ग्रामसभेत आणायचे अन बोलणाराला दमबाजी करायची ही यांची पध्दत आहे ग्रामपंचायतीकडे लाखो रुपयाचे भंगार पडलेले आहे ते एका व्यक्तीच्या घरात पडलेले आहे गावची ग्रामपंचायत म्हणजे आपली घरची मालमत्ता असल्यागत ही मंडळी वावारत आहे गावात वेगवेगळ्या टोळ्या तयार झालेल्या आहे आता त्यात  कर्मचाऱ्यांची टोळी देखील सामील झाली आहे आपल्या मर्जीने कर्मचारी भरले त्याचा बोजा आपल्यावर पडत आहे त्यामुळे आता जागे होवुन मतदान करा असे अवाहनही मुथा यांनी केले आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )-गावकरी मंडळाने काढलेल्या प्रचार फेरीस नागरीकांनी मोठ्या उत्सहात प्रतिसाद दिला महीला पुरुष मोठ्या संख्येने या प्रचार मोहीमेत सहभागी झाले होते महीलासह सर्वांच्याच डोक्यात टोप्या घातलेल्या होत्या त्या टोप्यावर दोन्ही बाजुने गावाकरी मंडळाची निशाणी ट्रँक्टर रोडरोलर रिक्षाचे चिन्ह छापलेले होते बाजारा पेठेतील हनुमान मंदिरापासुन प्रचार फेरीस सुरुवात झाली प्रत्येक गल्ली गल्लीतुन जात उमेदवारांनी मतदारांना मत देण्याचे अवाहन केले  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन फेरीची सांगता झाली सायंकाळी आझाद मैदान येथे झालेल्या प्रचार साभेतही नागरीकांची मोठी गर्दी पहावयास मिळाली प्रचार फेरीस मिळालेला प्रतिसाद पहाता व सभेची गर्दी पहाता या वेळेस गांवकरी मंडळ विजयी होईल असा दावा मंडळाच्या नेत्यांनी केला आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात बेलापुर परिसरात भरपुर विकास कामे केली असुन राहीलेली कामे पुर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा जनता विकास अघाडीच्या सर्व सतरा उमेदवारांना निवडणूक द्या असे अवाहन जनता विकास अघाडीचे नेते व वार्ड क्रमांक सहाचे उमेदवार सुधीर नवले यांनी केले आहे                  जनता विकास अघाडीच्या प्रचारार्थ रामगड गायकवाड वस्ती येथील आयोजित प्रचार सभेत बोलताना सुधीर नवले पुढे म्हणाले की रामगड येथे रस्ते गटारी मस्जिद व शाळेजवळ पेवींग ब्लाँक आदि कामे केली काही घराकुलाचा प्रश्न प्रलंबित आहे तो येत्या पाच वर्षाच्या काळात सोडविला जाईल रामगडला चोवीस तास वापरासाठी खारे पाणी उपलब्ध करुन दिलेले आहे विरोधक केवळ आमच्या नावाने बोंबा मारण्याचे काम करत आहे जि प चे पद असताना गावात केलेली कामे आगोदर सांगा मग आमच्यावर बोला आपल्या हातुन एकही ठोस असे विकासाचे काम झाले नाही त्यामुळै जनता आपल्याला मत देणार नाही आपला पराभव निश्चित आहे याची जाणीव झाल्याने दुसर्याला पुढे करुन खालच्या पातळीवर भाषा वापरण्याचे उद्योग या महाभागाने सुरु केले आहे शिवराळ भाषा वापरण्याचे बंद करा कायदेशीर सल्ला घेवुन त्या बाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे आम्ही पण त्या भाषेत बोलू शकतो परंतु आमचे ते संस्कार नाही विकास कामावर बोला असेही नवले म्हणाले या वेळी श्रीरामपुर नगरपालीकेचे नगरसेवक हाजी अंजुमभाई यांनी जनता विकास अघाडीच्या सर्व उमेदवारंना निवडून द्या विकासा कामे करवुन घेण्याची जबाबदारी आपली आहे या वेळी शेषराव पवार गोविंद वाबळे जनता अघाडीचे नेते रविंद्र खटोड पंचायत समीती सदस्य अरुण पा नाईक यांचीही भाषणे झाली.


बेलापुर (प्रतिनिधी  )--जिल्हा परिषदेत काम करत असताना जास्तीत जास्त निधी आणून गावाची विकास कामे केली तर विरोधकांनी बोगस कामे करुन शासनाच्या पैशावर डल्ला मारल्याचा आरोप जि प सदस्य शरद नवले यांनी केला आहे*   *सत्ताधारी मंडळींनी 10 वर्षात काय कारभार केला तो आपल्या समोर आहे, आणि मी  15 वर्षापुर्वी सरपंच असताना काय विकासाचे कामे झालीत तेही आपल्यासमोर आहेत. - तुमच्या आशिवार्दाने आणि माजी मंत्री.

आ. राधाकृष्ण विखे पाटील व माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या* *मार्गदर्शनाखाली गेल्या 10 वर्ष जिल्हा परिषदेत काम करत आहे. त्यांनी दिलेल्या संधीचा वापर मी गावाला भरीव विकास निधी मिळवून देण्यासाठी केला.तर सत्ताधां-यांनी मिळालेल्या निधीतून मलिदा खाण्याचे काम केले. दोन्ही उमेदवारांच्या पॅनलची तुलना करण्याची खरी गरज आहे. ' वित्त ' आयोगातून बेलापूर ग्रामपंचायतीला कोट्यावधीचा निधी मिळालेला असताना हा निधी गेला कुठे? मिळालेल्या निधीतून गावामधील कामे झालीत का ? हा निधी सत्ताधाऱ्यांनी लाटला

 असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले यांनी गावकरी मंडळाच्या उमेदवारांच्या कुऱ्हे वस्ती, राजवाडा येथील झालेल्या प्रचार सभेत बोलताना केले. - नवले पुढे म्हणाले की,  ग्रामपंचायत जशी बटाईने चालवण्यास घेतली होती सदस्य नसतानाही तिसरीच व्यक्ती सकाळ पासुन ग्रामपंचायत कार्यालयात ठाण मांडून बसायची.जे साधे सदस्य नाहीत ते जणू ग्रामपंचातीचे मालक बनले होते.ज्याचे केवळ 2 सदस्य निवडून आले होते, त्याने  आमच्याबरोबर  असणार्‍या इतरांना फोडाफोडीचे राजकारण केले. हा ठेकेदार ग्रामपंचायतीत निवडून आलेला नाही, त्यांचा काहिही संबध नाही, त्यांनी दीड ते दोन वर्षात १५ कोटीचा निधी हडप केला असल्याचा आरोप नवले यांनी केला आहे.-कामावर काहीच न बोलता फक्त लोकांची दिशाभूल करण्याची  सत्ताधाऱ्यांची सवय आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर सीसीटीव्ही कॅमेरे, असताना  सामानाची चोरी होते, तेथील चोरटे पकडणे आवश्यकता असताना  लबाडांनी कॅमेरेचे बंद करून ठेवले. जर तुम्ही चोरांच्या हातात चाव्या दिल्यात तर, हे भामटे आश्वासनावर आश्वासने दाखवतील, त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, १० वर्षाच्या कामाचा हिशोब मागा, मगच तुम्हाला कळेल, ' दाल में कुछ काला है '  या - टोळीचा नायनाट करायचा आहे.अश्या लोकांना निवडून देणार आहात,का ? आपल्या सुख : दुःखात मीच आहे, आता दोन अफवा येणार आहे. -प्रचार सभेत बोलताना अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे म्हणाले की,    सत्ताधाऱ्यांनी आपलं अपयश झाकण्यासाठी काय प्रयत्न करणार आहोत, तुम्हीच्या सारख्याच सगळ्यांच्या  आशिवार्दाने सहकाऱ्याने मला वयाच्या २६ व्या वर्षीच अशोक कारखान्यात संचालक म्हणून संधी मिळाली, सत्ताधाऱ्यांनी चुकीचे कामे होत असेल तर, त्यावर आम्ही विरोध दर्शविला अन् सक्षम विरोधाची भूमिका आम्ही बजावली,असल्याचा दावा अभिषेक खंडागळे यांनी केला  दादागिरी, दमबाजी, सत्ता व पैश्याची मस्ती असणार्‍याना या निवडणूकीत , धडा शिकवीला पाहीजे- बेलापूर गावात असणार्‍या शंभर वर्षापूर्वीचे चिंचेचे आणि पिंपळाचे झाड हकनाक तोडले,  गावात ४० फुट आकाराचा रस्ता आहेत का ? तो दाखवा त्यावर तुम्ही बोलण्याला तयार नाही, मग तुम्ही कुत्र्या - मांजरासारखे पळून जाता - इतक्या मोठ्या ग्रामपंचायतीला विकासकामांना निधी मिळत असताना कामे करण्याऐवजी फक्त खिसे भरण्यवयाचे गोरखधंदा सत्ताधाऱ्यांनी चालविला २५ हजार लोकसंख्या असलेल्या गावात विकासकामांचा अभाव असल्याचे पहायला मिळत असून कुठे नेऊन माझं बेलापूरगाव अशी म्हणायची वेळ ग्रामस्थांवर आली.

बेलापुर  (प्रतिनिधी )- आमच्या ताब्यात असलेल्या संस्थांच्या माध्यमातून गावातील समस्या सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणखी काही राहीलेली कामे पुर्ण करण्यासाठी जनता विकास अघाडीच्या सर्व मतदारांना निवडून द्या असे अवाहन जनता अघाडीचे नेते रविंद्र खटोड यांनी केले जनता विकास अघाडीच्या वतीने विविध भागात घेण्यात आलेल्या प्रचार  सभेत ते बोलत होते     आपल्या भाषणात जनता अघाडीचे नेते रविंद्र खटोड म्हणाले की पाच वर्षात गावात रस्ते गटारी स्ट्रिट लाईट स्वच्छता अशी अनेक कामे केली विरोधकांनी एकही काम न करता केवळ आरडा- ओरड अडथळा आणण्याचे काम केले सदस्यावर ग्रामसेवकावर कारवाई करण्यासाठी आपली ताकद पणाला लावली तीच ताकद गावाकरीता मोठा निधी आणण्यासाठी खर्च करा जनता तुम्हांला डोक्यावर घेईल पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तसे निवडणूक आली की यांना जनतेची आठवण येते कोरोना काळात हेच बोंबा मारणारे कुठे दडून बसले होते यांना जनतेच्या नाही आपल्या जिवाची भिती होती म्हणून तर हे घरात दडून बसले होते त्यावेळेस गावातील लोकांच्या मदतीला आम्ही धावुन आहे ते आमचे कर्तव्ये  होते सकाळ पासुन सायंकाळ पर्यत आम्ही गावात ठाण मांडून होतो कुणाला काय लागते कुणाला उपचाराची गरज आहे हे आम्ही कोरोनाला न घाबरता करत होतो हे काम सार्या गावाने पाहीले आहे ते तुम्हाला कसे दिसणार कारण तुम्ही आपल्या कुटुंबा समवेत घरात सुखरुप होता त्यामुळे कोण कामाचा कोण बिन कामाचा हे मतदारांना सांगण्याची    गरज नाही सर्वांच्या सुख दुःखात आम्ही सहभागी होणारी माणसे आहेत आपल्या सारखी खोटे हसणारे तोंडावर गोड बोलणारे नाही आमच्या ताब्यात असणार्या संस्थेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न आम्ही सोडविले आपण काय केले याचे आत्मपरिक्षण करा असा मोलाचा सल्लाही खटोड यांनी दिला

बेलापुर (प्रतिनिधी )-आपल्या पुढील पिढीच्या भवितव्यासाठी गावात जे चुकीचे चालले आहे ते बंद पाडा संस्कृतीक परंपरा लाभलेल्या गावात आपल्या आया- बहीणींची इज्जत सुरक्षित ठेवायची असेल तर गावकरी मंडळाला विजयी करा चुकीच्या कामाबाबत आवाज उठवा नाहीतर भावी पिढी माफ करणार नाही असा खणखणीत इशारा गावकरी मंडळाचे नेते सुनिल मुथा यांनी दिला आहे  ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचारार्थ गावकरी मंडळाच्या गणपती गल्ली केशव गोविंद मंदिर चौक शिवनेरी गल्ली आयोध्या काँलनी रामगड गायकवाड वस्ती येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.आपल्या भाषणात गावकरी मंडळाचे नेते  सुनिल मुथा पुढे म्हणाले की जि प शरद नवले यांनी सत्ताधार्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा बुरखा फाडलाच आहे पंरतु आणखी बरेच काही कारनामे पुराव्यासह माझ्या हाती आले आहे त्यांनी तोंड उघडण्याची भाषा केली मग मी पण आता तोंड उघडाच मग माझ्याकडे असलेली जादुई पोटलीच उघडतो मग त्यातुन कुणाचे काय बाहेर येईल हे सांगता येत नाही ते जर जनते समोर आणले तर जनता तुमचे कपडे.काढल्याशिवाय राहणार नाही आपल्या इज्जतीच पंचनामा होईल म्हणून माझ्याकडे  मध्यस्थ पाठविले त्यामुळे मी पण ते टाळले नाही तर ... गावातील चुकीच्या कामावर बोट ठेवण्याची जबाबदारी आपली आहे ग्रामपंचायत कारभारावर नियंत्रण ठेवले नाही तर हे पुढारी गावही विकतील तेव्हा मतदारांनो जागृक व्हा प्रत्येक कामाची माहीती विचारा सत्ताधार्यावर अंकुश ठेवा हे काम माझ्या एकट्याचे नाही कारभारावर अंकुश नसेल तर सत्ताधारी मन मानेल तसे वागतात पण ते होवु देणार नाही गावकरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जरी चुका केल्या तरी त्यांना देखील जाब विचारण्याची दाणत आपल्यात आहे अनेक ठिकाणी गटारी झाल्या पण केवळ बिले काढुन मोकळे झाले गटारीला ढाळच नसल्यामुळे सांडपाणी जागेवरच तुंबले आहे हे लोक मला सांगतात परंतु ते काम होतानाच आपण संबधीतंना जाब विचारला पाहीजे होता सगळे ठेकेदार एकत्र होवुन सत्ता मिळविण्यासाठी धडपड करत आहे पण या वेळेस जनता मतदार हुशार झालेला आहे तुमच्या काळ्या पिशव्या व आणखी काही घेवूनही मतदार गावकरी मंडळालाच विजयी करतील यात शंकाच नाही ज्यांनी गावची मुख्य बाजारपेठ भकास करण्याचे महापाप केले त्यांना पेठेत फिरकु देवु नका ग्रामपंचायतीचे भंगार विकणारे कोण अन बोंब झाल्यावर परत आणणारे कोण हे आता जनतेला समजले आहे गावात वाढत चाललेले आतिक्रमण हा फार गंभीर प्रश्न आहे पंरतु कार्यकर्ते दुखवायचे नाही म्हणून हे गप्प आहे पेठेतुन पायी चालणेही अवघड झाले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर भिंत बांधली अन एकानेही आवाज उठविला नाही गावकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता द्या मी स्वतः जावुन ती भिंत तोडेल माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल पण गावाच्या हितासाठी मी ते करेल असेही मुथा म्हणाले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget