August 2023

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने हरेगाव उंदीरगाव परिसरातील राहणाऱ्या तरुणांना मारहाण करण्यात आली होती या तरुणांना भेटून घटनेची संपूर्ण माहिती घेऊन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की हरेगांव उंदीरगाव येथे गावातील पाच अल्पवयीन गरीब मुले नावे पुढील प्रमाणे कुणाल मगर, शुभम माघाडे, ओम गायकवाड, प्रणयी खंडागळे यांना सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत हातपाय बांधून झाडाला उलटे टांगून जबर मारहाण करुन त्यांच्या तोंडावर लघवी करुन बुटावर थुंकून त्यांना चाटायला लावले. अमानवीय निर्दयीपणे मारहाण करणारे जातीवादी प्रवृत्तीचे गावगुंड  आरोपी युवराज गलांडे, मनोज बोडखे, आरोपी दुर्गेश वैद्य, राजेंद्र पारखे, दिपक गायकवाड या गावगुंडणी मारहाण करून गंभीर दुखापत केले आहे या गावगुंडांना यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करुन मोका अंतर्गत कारवाई करून फास्ट ट्रॅक  कोर्टात केस चालवावे तसेच या या गुन्हेगारांचे जामीन न होऊन देता यांची केस अंडरट्रायल चालविण्यात यावे. तसेच आरोपींना प्रोत्साहन देणारा खरा मास्टर माईंड फरार नाना गलांडे ह्याला त्वरीत अटक करण्यात यावे व नाना गलांडे व मुलावर पूर्वी असलेले सर्व  गुन्हयांचा तपास करुन सर्व गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षा होईल या दिशाने पोलिसांनी पाठपुरावा करावा. तसेच यांचे सावकारकी करुन गोरगरीबांकडून लुबाडण्यात आलेल्या जमीनीच्या चौकशी करुन यांच्या विरोधात सावकारकी करून नागरिकांना लुगडून बेइमानी करून मालमत्ता कमवलेली आहे या सर्व बेमानी संपत्तीची चौकशी करुन त्यांचेवर कठोर कारवाई करावी सावकारीच्या धंद्या मार्फत बळजबरीने दमदाटी करून जादा पैशाची आम्हीच दाखवून व दिशाभूल करून अनेक लोकांचे सह्या घेऊन शेतजमीन, जमीन,घरे, दुकाने  लोकांकडून बळजबरीने कब्जे घेऊन स्वत:च्या नावावर केले आहे. त्याची चौकशी होऊन मुळ मालकाला जमीन, प्लॉट, शेती, फ्लॅट, दुकाने देण्यात यावे. अशा गंभीर गुन्हे करणार्‍या नाना गलांडे व त्यांचा मुलगा व त्याचे साथिदार या सर्वांवर फॉस्टट्रॅक कोर्टात केस चालवावे व अंडरट्रायल  केस चालवुन त्यांना कठोर शिक्षा होईल असे पोलिस प्रशासनाने प्रयत्न करुन समस्याग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून द्यावा असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे निवेदन देतेवेळी म्हणाले 

याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपजिल्हाध्यक्ष महेश सोनी,तालुका अध्यक्ष डॉ संजय नवथर, शहराध्यक्ष सतिश कुदळे, विद्यार्थी सेना जिल्हा सचिव गणेश दिवसे,विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष  संकेत शेलार,विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष कुणाल सुर्यवंशी, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष यश जराड, मनसे तालुका संघटक विलास पाटणी, तालुका सचिव भास्कर सरोदे,तालुक सरचिटणीस अंबादास कोकाटे,शहर संघटक निलेश सोनावणे, शहर सचिव प्रतीक सोनावणे,शहर सरचिटणीस,दर्शन शर्मा, शहर उपअध्यक्ष विशाल लोंढे, सचिन कदम, मनोहर बागुल,संजय शिंदे,राजू जगताप, नितीन जाधव, मनसे तालुका उपाध्यक्ष अमोल साबणे, सुनील करपे, अरमान शेख, विशाल गायकवाड, विद्यार्थी सेना तालुका संघटक नंदू चाबुकस्वार, तालुका सचिव अतुल खरात,तालुका उपाध्यक्ष विशाल जाधव, शहर विभाग अध्यक्ष मारुती शिंदे,लखन कुरे,नितीन खरे, लखन कडवे,सुरेश शिंदे, अक्षय काळे,राहुल शिंदे, विकी परदेसी,  संतोष आवटी, करण नांगल किरण, ज्ञानेश्वर काळे, सोनू बोरुडे,आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

बेलापुर (प्रतिनिधी  )-गायकवाड वस्ती गोल्डन चारीयट जवळून सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान एका महीलेने लहान मुलाला पळवुन नेल्याची घटना घडली असुन बेलापुर पोलीसांनी तातडीने सदर महीलेला मुलासह ताब्यात घेतले असुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते          बेलापुर श्रीरामपुर रोडवर असणाऱ्या गायकवाड वस्ती येथुन सायंकाळच्या सुमारास शाबीरा इब्राहीम शेख यांचा दोन वर्ष वयाचा नातु परवेज सलीम शेख यास पळवून नेण्यात आले होते सदर महीलेचा फोटोही सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सदर महीलेचा तातडीने शोध घेण्याच्या सुचना बेलापुर पोलीसांना दिल्या होत्या त्यानुसार सहाय्यक पोलीसा निरीक्षक जिवन बोरसे बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुहास हापसे पोलीस काँन्स्टेबल हरीष पानसंबळ संपत बडे भारत तमनर आदिंनी परिसरात शोध घेतला   दोन वर्ष वयाच्या मुलाला पळवुन घेवुन जात असताना देवळाली प्रवरा येथील काही नागरीकांनी त्या महीलेला पाहीले त्यांनी तातडीने बेलापुर पोलीसांना घटनेची माहीती दिली बेलापुर पोलीस स्टेशनचे काँन्स्टेबल संपत बडे व भारत तमनर तातडीने देवळाली प्रवरा येथे गेले तेथुन मुलासह पळवून नेणाऱ्या महीलेस ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला  आणले सबंधीत मुलगा परवेज यास आजीच्या ताब्यात देण्यात आले आहे दोन वर्ष वयाच्या परवेज शेख यास पळवुन नेणारी महीला खैरुनिसा अकबर शेख ही नाशिक येथील रहीवासी असुन काही वर्षापूर्वी ती गायकवाड वस्ती येथे रहात होती नाशिक येथे तीने विवाह केला होता दहा बारा वर्षानंतर तीने पतीला सोडून दिले गायकवाड वस्ती येथे तीची पहील्या नवऱ्याची मुलगी रहात आहे ती लहान असतानाच ती त्या लहान मुलीला सोडून गेली होती आज ती मुलगी सज्ञान झालेली आहे तिला नेण्यासाठी खैरुनिसा ही गायकवाड वस्ती येथे आली होती परंतु मुलीने येण्यास नकार दिल्यामुळे तिने हे दोन वर्षाचे मुल घेवुन पळ काढला होता परंतु पोलीसांनी ती गायब होण्याच्या आतच मुलासह तीला ताब्यात घेतले

बेलापुर  (प्रतिनिधी  )- शासकीय जागेत अतिक्रमण केल्यामुळे राहुरी तालुक्यातील केसापुर ग्रामपंचायतीचे सदस्य गुलाब डोखे यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा जिल्हाधिकारी यांचा आदेश   अपर आयुक्त नाशिक यांनी रद्द केला असुन या निर्णयामुळे डोखे यांना दिलासा मिळाला आहे .या बाबत सविस्तर माहीती अशी की राहुरी तालुक्यातील केसापुर ग्रामपंचायतीचे सदस्य गुलाब आण्णासाहेब डोखे यांनी  शासकीय जागेत अतिक्रमण केल्याची तक्रार अनिल भगत यांनी  जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे केली होती त्यावर जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी राहुरी पंचायत समीतीचे गटविकास अधीकारी यांचे मार्फत चौकशी अहवाल मागवीला होता गटविकास अधीकाऱ्यांनी समक्ष पहाणी करुन ग्रामपंचायत सदस्य गुलाब डोखे यांनी ग्रामपंचायत मालकीच्या पूर्व पश्चिम रस्त्यावर अतिक्रमण केल्याचा आहवाल दिला होता त्या अहवालावरुन तत्कालीन  जिल्हाधिकारी डाँक्टर भोसले यांनी ग्रामपंचायत अधिनियम कलम १९५८ चे कलम १४ ( १ ) ( ज -३ )मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायत सदस्य अपात्र असलेबाबत निर्णय दिला होता  आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ डोखे यांनी विभागीय आयुक्त नाशिक यांचेकडे अपील दाखल केले त्या वेळी युक्तीवाद करताना डोखे यांचे वकील अँड प्रशांत जाधव  यांनी असे म्हणणे मांडले की गटविकास अधीकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात वादग्रस्त जागेचे क्षेत्रफळ नमुद नाही .केसापुर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी प्रत्यक्ष मोजणी करुन पुर्वीच्या नोंदीत अचूक क्षेत्रफळ नमुद नसल्याने दुरुस्ती केल्याचे स्पष्ट दिसुन येत असल्यामुळे डोखे यांनी ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण केले हे सिध्द होत नसल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ ( १ ) (ज -३ )मधील तरतुदी विचारात घेवुन अपर आयुक्त निलेश सागर यांनी अपीलार्थी यांचे अपील मान्य करुन जिल्हाधिकारी अहमदनगर यानी दिलेला आदेश रद्द केला त्यामुळे डोखे याचे ग्रामपंचायत सदस्यत्व अबाधीत राहीले आहे .हा निकाल गावात समजताच अनेकांनी फटाके फोडुन आपला आनंद साजरा केला                 वरीष्ठ न्यायालयाने सर्व बाजुंची खातरजमा करुन व पुराव्याचे अवलोकन करुन सत्याला न्याय मिळवून दिला माझ्या ३५ वर्षाच्या राजकीय सामाजिक कारकीर्द संपवून मला बदनाम करण्याचा कुटील डाव विरोधकांनी रचला होता पण अखेर सत्याचाच विजय झाला -गुलाब डोखे सदस्य केसापुर ग्रामपंचायत

बेलापुर  (प्रतिनिधी  )-- श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी आत्तापर्यंत जवळपास ९०० कोटी रुपयांचा निधी आपण आणला असुन त्यात बेलापुर गावाला १६० कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. या निधीतून होणारी विकासकामे ही दर्जेदार होण्यासाठी नागरीकांनी दक्ष रहावे, असे अवाहन आमदार लहु कानडे यांनी केले. 

बेलापूर येथील इंद्रबिल्वेश्वर मंदीरात लोकसंवाद कार्यक्रमात आ. कानडे बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुक्कड अध्यक्षस्थानी होते. यावेळी जि. प. सदस्य शरद नवले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक, उपसरपंच अभिषेक खंडागळे, रणजीत श्रीगोड, रविंद्र खटोड, कनजी टाक, प्रवीण काळे, गोविंदराम दायमा, कांतीलाल मुथा व्यासपीठावर उपस्थित होते.

आ. कानडे पुढे म्हणाले की विकास कामांना निधी हा एकदाच मिळतो. त्यामुळे होणारी कामे ही दर्जेदारच झाली पाहीजे. त्याकरीता सर्वानीच जागृत असले पाहीजे. या तालुक्यात काहींची मक्तेदारी होती. काही ठेकेदारांची, दलालांची मनमर्जी चालत होती. रस्त्याच्या कामात तीन थर असतात हे श्रीरामपुरकरांना समजले आहे. श्रीरामपूर-बेलापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असुन या रस्त्यावर रात्रीही लख्ख प्रकाश असेल, अशी व्यवस्था आमदार निधीतून केलेली आहे. तालुक्यातील एक हजार नागरीकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ मिळवुन दिला. बेलापुरला मोठी पाणी पुरवठा योजना होत आहे. सर्व शासकीय योजना पुढारी व ठेकेदार यांच्याकरीता न रहाता सर्वसामान्यांना त्याचा लाभ मिळाला पाहीजे., असे ते म्हणाले.

तालुक्यात विकासकामे जोरात सुरु होती. सरकार बदलल्याने काही अडचणी आल्या. असे असले तरी जनतेने मला विकास कामे करण्यासाठी निवडून दिले, याचा विसर पडू देणार नाही. आज तालुक्यातील ९५ % प्रमुख रस्त्याची कामे झाली आहेत. गावोगाव व्यायामशाळा दिल्या. सर्व शाळा डिजीटल केल्या. शाळांना संगणक दिले. भविष्यात या भागातील पाणी प्रश्नदेखील गंभीर होणार आहे. त्याकरीता स्वतंत्र लढा उभारावा लागणार आहे. जनतेच्या कल्याणाच्या नावाखाली स्वतःचे कल्याण करणारी पिढी तयार होत आहे. याकरीता नागरीकांनी सावध व्हावे, असेही आ. कानडे म्हणाले. 

प्रारंभी इंद्रबिल्वेश्वर मंदीराच्या वीस लाख रुपये खर्चाच्या सभामंडपाचे भूमीपुजन आ. कानडे यांच्या हस्ते झाले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक. रणजीत श्रीगोड आदिंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राजेश खटोड, कैलास चायल, विजय कटारीया, अनिल नाईक, प्रकाश कुर्हे, रफीक शेख, सुभाष बोरा, रमेश अमोलीक, अक्षय नाईक, किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल हिरण, राजेंद्र लखोटिया, मुश्ताक शेख, रमेश अमोलिक, शिवाजी पा. वाबळे, वसंतराव शिंदे,  भास्करराव कोळसे, सुरेश अमोलिक, केदार दायमा, सुरेश जाधव, दीपक सिकची, दत्तात्रय कुमावत, सूर्यभान नागले, संजय रासकर, गौरव सिकची, मधुकर ठोंबरे, किशोर खरोटे, चंद्रकांत नाईक, रमेश कुमावत, वसंतराव म्हसे, महेश खंडागळे, दीपक निंबाळकर, सुधाकर खंडागळे, केदारनाथ मंत्री, राजेश राठी, पत्रकार देविदास देसाई, ज्ञानेश गवले, सुहास शेलार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवि कोळपकर यांनी केले. अँड. विजयराव सांळूंके यांनी सूत्रसंचलन केले.

...............

कोपरगाव (गौरव डेंगळे):सोमैया विद्या विहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरीय हिंदी  वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.शालेय विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट वक्तृत्वाचे गुण वाढीस लागावे म्हणून राष्ट्रभाषा हिंदी दिनाचे औचित्य साधून दरवर्षी दिनांक - १३ व १४ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय भव्य हिंदी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते.या ही वर्षी या स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे. 

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम ७०००/स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र,द्वितीय पारितोषिक रोख रक्कम ५००० /स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,तृतीय पारितोषिक रोख रक्कम ३००० /स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र,तसेच उत्तेजनार्थ प्रत्येकी १०००/रुपयाचे दोन पारितोषिक प्रदान करण्यात येतील.ही स्पर्धा फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी असून इयत्ता आठवी ते दहावीच्या दोन विद्यार्थ्यांचा गट या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो.तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेचे विषय व अधिक माहितीसाठी आपल्या शाळेमार्फत खाली दिलेल्या नंबर वर लवकरात लवकर संपर्क साधावा.सदर स्पर्धेसाठी शाळेमार्फत केलेली नाव नोंदणीच ग्राह्य धरली जाईल. अधिक माहितीसाठी श्री तुरकणे,श्री नन्नवरे,सौ.होन,सौ.जोरी यांच्याशी संपर्क साधवा.

भीमशक्ती सामाजिक संघटनेचे मा, मंत्री भीमशक्तीचे संस्थापक तसेच काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांच्या आदेशानुसार आज भीमशक्ती सामाजिक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर येथे आयोजित केली होती या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्तेना व महिलांना संघटनेचे पद देण्यात आले त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भीमशक्ती  महाराष्ट्र सरचिटणीस भाऊसाहेब साठे सर उपजिल्हाध्यक्ष अनिल गायकवाड महिला अध्यक्ष शोभा पातोरे भीमशक्तीचे नेते सिमोन जगताप भीमशक्ती जिल्हा संघटक सुनील संसारे भीमशक्ती पत्रकार सुदाम सरोदे भीमशक्ती तालुकाध्यक्ष संदीप अमोलिक नेवासा अध्यक्ष पप्पू कांबळे  तसेच महिला तालुकाध्यक्ष कल्पना तेलोरे शहराध्यक्ष अंबादास निकाळजे उपशहर अध्यक्ष अरुण खंडीझोड भीमशक्ती सरचिटणीस प्रशांत भोसले रिक्षा युनियन अध्यक्ष कामरान शेख  अनेक कार्यकर्ते उपस्थित होते व या कार्यक्रमाला आवर्जून लोकसभेचे भावी खासदार उत्कर्षताई रुपवते या उपस्थित होत्या व त्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.लवकरच श्रीरामपूर मध्ये हंडोरे साहेबांचे नेतृत्वाखाली भव्य मेळावा घेणार आहोत सुत्र संचालन शहराध्यक्ष अंबादास निकाळजे यांनी केले व आभार प्रशांत भोसले यांनी मानले.

श्रीरामपुर-हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरून तमाम हिंदूंचे मन दुखवणाऱ्या जिहादी लोकांवर देशद्रोहाचे कलम लावून लोकांतर्गत कारवाई करावी असे निवेदन श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे मनाली की गेल्या अनेक दिवसापासून देशात काही मुसलमानातील काही मुले आतंकवादी संघटनांच्या संपर्कात येऊन कट्टर जिहादी बनून संपूर्ण हिंदुस्तानामध्ये हिंदू देवी देवतांच्या सण उत्सवाच्या वेळेस दगडफेक करून व  महापुरुषांबद्दल काही अपशब्द बोलून अपमान करणे व इतर स्वरूपाचे कट कारस्थान करून हिंदूंना टार्गेट करत आहे हिंदू समाजाला त्रास देऊन व तसेच  हिंदुस्थानाला मुस्लिम राष्ट्र बनविण्यासाठीच जातीय तेढ जाणून बुजून निर्माण करत आहे असेच नगर जिल्ह्यात देखील हिंदूंच्या भावना दुखून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथी एका मुसलमान मुलाने हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र यांना तर नगर शहरातील एका मुसलमानाच्या मुलाने छत्रपती शिवाजी महाराज यांना गलिच्छ भाषेचा वापर करून या महापुरुषांची बदनामी केल्याने तमाम हिंदूंचे मन दुखवले गेले आहे यामुळे या देशद्रोही जियादी लोकांवर त्वरित देशद्रोह चे कलम लावून मोकांतर्गत कारवाई करण्यात यावी व हे लोक कोणत्या आतंकवादी संघटनेच्या सांगण्यावरून असे कृत्य करत आहे  याची देखील सखोल चौकशी करून यांच्या मागचा खरा मास्टर माईंड कोण आहे याचा शोध घ्यावा तसेच त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई न झाल्यास संपूर्ण हिंदू समाज या देशद्रोह्यांनायांना धडा शिकविण्यासाठी हिंदू समाज रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देईल जेणेकरून यापुढे हिंदूंच्या देवी-देवतांबद्दल व महापुरुषन बद्दल बोलताना ते हजार वेळेस विचार करतील आणि यापुढे जर कोणी नगर जिल्ह्यात हिंदू देवी देवतांचा व महापुरुषांचा अपमान केला तर मनसे पक्षाच्या वतीने त्यांचा बंदोबस्त करण्यात येईल याचा सर्व जातीवादी देशद्रोही लोकांनी नोंद घ्यावी असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले या प्रसंगी

मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे,जिल्हा सचिव डॉ.संजय नवथर,उपजिल्हाध्यक्ष महेश सोनी, तालुकाध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष सतिश कुदळे, विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष  संकेत शेलार,विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष कुणाल सुर्यवंशी, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल लोंढे, तालुका संघटक विलास पाटणी, तालुका सचिव भास्कर सरोदे,तालुक सरचिटणीस विकी राऊत,तालुका चिटणीस अंबादास कोकाटे,शहर संघटक निलेश सोनावणे, शहर सचिव प्रतीक सोनावणे,शहर सरचिटणीस,दर्शन शर्मा,तालुका उपाध्यक्ष अमोल साबणे,प्रवीण कारले, सुनील करपे, अरमान शेख,सचिन कदम, राजू शिंदे मनोहर बागुल,संदीप विशंभर,करण कापसे, मारुती शिंदे, संजय शिंदे, लखन कुरे,नितीन खरे,ताया शिंदे, संजय शिंदे, विशाल जाधव, सुरेश शिंदे, राहुल शिंदे, विकी परदेसी, राजू जगताप, अक्षय काळे संतोष आवटी करण नांगल नंदू चाबुकस्वार, किरण वानखेडे ज्ञानेश्वर काळे रतन वर्मा सोनू बोरुडे मच्छिंद्र हिंगमिरे,आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

बेलापूरःश्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बेलापूर उपबाजार येथील नव्याने बांधण्यात आलेल्या दुमजली व्यापारी संकुलास पदमभूषण माजी.खा.स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद नवले व कृषी उत्पन्न  बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी केली आहे.                             श्री.नवले व श्री.खंडागळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मागील काळात विखे पाटील गटाच्या सौ. संगिता नानासाहेब शिंदे या सभापती असताना बेलापूर येथील उपबाजार येथे दुमजली व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. नुकतेच त्याचे बांधकाम पूर्ण झाले असून सदरच्या व्यापारी संकुलास माजी खा.स्व.बाळासाहेब विखे पा. नाव देणे गरजेचे आहे. स्वर्गीय खा.विखे यांचे बेलापूर शी जुने ऋणानुबंध होते तसेच गावाच्या वाटचालीत त्यांचे मोलाचे योगदान आहे.त्याच प्रमाणे बाजार समितीच्या वाटचालीत देखील त्यांचा मोलाचा वाटा आहे.नव्याने बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलाचे कामास विखे पाटील गटाच्या सौ. संगिता नानासाहेब शिंदे या सभापती असताना मंजूर होऊन सुरु करण्यात आले होते.संकुलाचे काम पूर्ण होण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सहकार्य झालेले आहे त्यामुळेच सदरचे  दुमजली व्यापारी संकुल दिमाखात उभे ठाकले आहे. या योगदानाबद्दल सदरच्या व्यापारी संकुलास पद्मभूषण  स्व.खा.बाळासाहेब विखे पा.यांचे नाव देवून उतराई व्हावे असे आवाहन श्री.नवले व श्री.खंडागळे यांनी केले आहे.लवकरच बाजार समितीच्या विखे पाटील गटाच्या संचालकासह बाजार समितीस या  मागणीचे निवेदन देण्यात येणार असल्याचे श्री. नवले व श्री. खंडागळे यांनी म्हंटले आहे.

बेलापुर ( प्रतिनिधी )-स्वातंत्रदिनानिमित्त बेलापुर व परिसरात विविध ठिकाणी मोठ्या उत्सहात ध्वजारोहण संपन्न झाले बेलापुरच्या मुख्य चौकातील ध्वजारोहण सरपंच महेंद्र साळवी व ग्रामविकास अधिकारी मेघशाम गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले बेलापुर पोलीस स्टेशन येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर बेलापुर ग्रामपंचायत येथे सरपंच महेंद्र साळवी यांच्या हस्ते तर बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेचे मेजर निलेश अमोलिक यांच्या हस्ते करण्यात आले बेलापुर मराठी मुलांची शाळा व मराठी मुलींची शाळा येथील ध्वजारोहण माजी सैनिक शरद देशपांडे व ईस्माईल शेख यांच्या शुभहस्ते तर जिल्हा परिषद उर्दू शाळेचे ध्वजारोहण विविध क्षेत्रात उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थीनी अलिया सर्फराज सय्यद झिनत शफीक आतार जवेरीया सर्फराज सय्यद अदिबा एजाज आतार  व फातीमा अझरुद्दीन सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले जे टी एस हायस्कूल येथील ध्वजारोहण नंदु खटोड व मुख्याध्यापक दत्तात्रय पुजारी यांच्या शुभहस्ते बेलापुर सिनियर महाविद्यालयाचे ध्वजारोहण शेखर डावरे व राजेश खटोड याच्या हस्ते करण्यात आले कृषी उत्पन्न बाजार समीती बेलापुर येथील ध्वजारोहण खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड यांच्या हस्ते नगर अर्बन बँकेचे ध्वजारोहण जेष्ठ नागरीक कनजी टाक यांच्या हस्ते तर श्री साई ईंग्लिश मिडीयम स्कूलचे ध्वजारोहण मेजर संतोष निकम यांच्या हस्ते तर ऐनतपुर येथील मराठी शाळा अमोलीक वस्ती येथील ध्वजारोहण मेजर सुजित शेलार यांच्या शुभहस्ते करण्यात आले तसेच विविध पतसंस्था अंगणवाडी बँका प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणीही ध्वजारोहण संपन्न झाले मुख्य झेंडा चौकातील ध्वजारोहण करण्यापूर्वी उर्दू शाळेतील  मदिहा ईकबाल शेख हीने  ऐ मेरे वतन के लोगो हे गीत म्हटले बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने सैनिक माजी सैनिक  स्वातंत्र्य सैनिकांचा परिवार यांचा सन्मान करण्यात आला या वेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  ) प्रवरा नदीच्या पुलाजवळ असलेल्या दशक्रिया विधी घाटाजवळ सापडलेले लहान बाळ पोलीस, पत्रकार व संदेश वहन यंत्रणेमुळे काही तासातच आजी आजोबांच्या स्वाधीन करण्यात यश मिळाले बेलापुर येथील दशक्रिया विधीच्या घाटावर असणाऱ्या बाकावर एक लहान बाळ झोपलेले होते एका महीलेने त्या मुलाला तेथे ठेवल्याचे तेथे राहाणाऱ्या लिलाबई सकट ,कावेरी सचिन पुजारी ,लता नंदु पुजारी यांनी पाहीले. ती महीला परत येईल असे त्यांना वाटले. बराच वेळ झाला परंतु ती महीला परत आली नाही.  लिला़बाई सकट ,कावेरी सचिन पुजारी लता नंदु पुजारी यांनी त्या बाळावर लक्ष ठेवले झोपलेले बाळ जागी झाले व ते हालचाल करु लागले. ते बाकड्यावरुन खाली पडेल हे लक्षात येताच या तीघीही त्या बाकड्याकडे पळाल्या व बाकड्यावरुन पडणाऱ्या बालकास अलगद पकडले, मुलाची आई बराच वेळ झाला तरी येत नाही हे पाहुन कावेरी पुजारी यांनी पती सचिन पुजारी यांना फोन करुन सदर घटना सांगितले त्यांनी तातडीने बेलापुर पोलीसांशी संपर्क साधला.दिनेश सकट ,संतोष सकट व पोलीस काँन्स्टेबल नंदु लोखंडे तातडीने दशक्रिया विधीच्या ठिकाणी गेले ,त्या मुलाला ताब्यात घेवुन त्यांनी पत्रकार देविदास देसाई यांनी फोन करुन माहीती दिली देसाई यांनी सर्व व्हाँट्सअप गृपवर बाळाचे फोटोव माहीती टाकली तसेच बेलापुरचे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी तातडीच्या संदेश वहन यंत्रणेद्वारे संदेश प्रसारीत केला अन काही वेळातच बाळाचे आजोबा त्या ठिकाणी आले आजोबाला पहाताच बाळ त्यांच्या दिशेने झेपावले, बाळाचे आजी आजोबा काही वेळातच मिळाल्यामुळे पोलीसांनाही हायसे वाटले ते बाळ आजोबा मच्छिंद्र कारभारी बडधे ,आजी तुळसाबाई बडधे आई ऋषाली शरद बडधे यांच्या ताब्यात देण्यात आले,व्हाँट्सअप गृप व तातडीच्या संदेश वहन यंत्रणेमुळे काही तासातच बाळ सुखरुप घरी पोहोचले.

बेलापुर (प्रतिनिधी  )- पाच ते सहा जणांच्या टोळक्याने बेलापुरातील खटकाळी गावठाण पाहुणेनगर येथील शेख यांच्या घरावर लाकडी दांडके कुऱ्हाड धारदार हत्याराने हल्ला चढविला घराच्या काचा दरवाजे तोडून घरासमोर लावलेल्या दुचाकीही पेटवुन दिल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली असुन पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होवुन दोन जणाना ताब्यात घेतले आहे .           पाहुणेनगर खटकाळी गावठाण येथे रुखसाना ईक्बाल शेख या राहात असुन त्यांनी बचत गटामार्फत कर्जे घेतले होते त्यातील काही महीलांनी कर्ज वेळेवर भरले नाही म्हणून रुखसाना यांनी कर्जाचे हप्ते वेळेवर भरण्याबाबत त्याच परिसरात राहणारे चव्हाण यांना सांगितले त्याचा राग आल्यामुळे या दोन कुटुंबात वाद झाले होते त्यावेळी मोठा जमाव बेलापुर पोलीस स्टेशनला जमा झाला होता त्या वेळी तक्रार देण्यास कुणीही पुढे आले  नाही याच गोष्टीचा राग मनात धरुन राजेंद्र उर्फ पप्पू भिमा चव्हाण  याने आपल्या चार ते पाच साथीदारा समवेत लाकडी दांडके धारदार हत्यारे कुऱ्हाड घेवुन पहाटे तीनच्या सुमारास रुकसाना शेख यांच्या घरावर हल्ला चढविला घरातील खीडकीच्या काचा फोडण्यात आल्या घराच्या पाठीमागील गेटचा दरवाजा तोडून मागील खीडकीच्या काचाही फोडण्यात आल्या बाथरुमचाही दरवाजा तोडण्यात आला शिलाई मशिन फोडण्याचा प्रयत्न केला तसेच घरासमोर दोन मोटार सायकली लावालेल्या होत्या त्यावर पेट्रोल टाकुन त्या पेटविण्यात आल्या त्यात ज्यूपिटर गाडी नंबर एम एच १७ ९१८३ ही जळून खाक झाली त्या शेजारी उभी असलेल्या स्प्लेंडर मोटार सायकलची मोडतोड करुन ती ही पेटवीण्यात आली होती पोलीसांनी तातडीने ती आग विझवली व दोन्ही वहाने पोलीस स्टेशनला आणली  हा प्रकार चालु असतानाच रुक्साना शेख यांचे समोर राहणारे नातेवाईक सुलताना युसुफ पठाण या मदतीकरीता धावल्या असता त्यांच्यावर धारदार शस्राने वार केला त्यामुळे त्या जखमी झाल्या तेथेच राहणारे फिरोज पठाण याने बेलापुर  पोलीस स्टेशनला फोन केला अगदी काही वेळेतच बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुधीर हाफसे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे, संपत बढे,हरिष पानसंबळ ,भारत तमनर ,नंदु लोखंडे हे घटनास्थळी पोहोचले पोलीसांना पहाताच पप्पू चव्हाण शहारुख शेख व त्यांच्या साथीदारांनी पळ काढला पोलीसानी तातडीने शहारुख सांडू शेख व पप्पू उर्फ राजेंद्र भिमा  चव्हाण या दोघांना ताब्यात घेतले ,पोलीसांनी सुलताना युसुफ पठाण यांच्या फिर्यादीवरुन शहारुख सांडू शेख पप्पू उर्फ राजेंद्र भिमा चव्हाण व इतर आरोपी विरोधात भादवि कलम  १४३ ,१४७ ,.१४८ ,१४९ ,३२४,४२७,४३५ ,504,506,3/25 आर्म अँक्ट प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास ऐ पी आय जिवन बोरसे हे करत आहेत                           गावात सर्व धर्मिय गुण्या गोविंदाने राहत असुन काही गुंड बाहेर गावातुन येवुन दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत असतील तर ते खपवुन घेणार नाही गावाची शांतता बिघडविणाऱ्या व्यक्तीचा सर्व ग्रामस्थ मीळून बंदोबस्त करु *जि प सदस्य शरद नवले*

वार्ताहर- स्वर्गीय पद्मश्री, श्री.बी.जी शिर्के यांच्या जयंतीनिमित्ताने दि.१९,०७,२०२३ रोजी मध्यरात्री पनवेल पासून जवळ असलेल्या रायगड जिल्ह्यामधील इशाळवाडी या ठिकाणी दरड कोसळून दुर्घटना झाली अतिशय वाईट घटना घडली ही घटनाच स्वरूप पाहून श्री आर बी सूर्यवंशी (सीनियर सी इ), श्री एन व्ही कुदळे सी .इ.व.पी.एम.सी, पीसी., एमसी पुणे विभाग वरील अधिकारी श्री एन एम कदम,श्री के बी लावंड ,श्री पी एम पवार, श्री वि वाय बादल ,यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप व कर्मचारी यांनी स्वतः यांच्या पगारातून रक्कम जमा केली आणि तीच छोटीशी मदत म्हणून शिर्के ग्रुप कडून इशाळ वाडीच्या पुनर्वससाठी रू २५००० धनादेश देऊन मदत केली खालापूर रायगड जिल्हा, येथील नायब तहसीलदार श्री सुधाकर राठोड यांच्याकडे जमा केलेली रक्कम  दिली यावेळी बी.जी शिर्के कंपनी पी.एम.सी ,पीसीएमसी पुणे विभाग मधील मारुती गाढवे, महादेव कदम, मारुती अडलिंगे ,राम पाखरे, देवेंद्र सोनार, अतुल राऊत, नवी मुंबई विभागाचे निवास मेटे ,प्रशांत काळे ,अनिकेत काळे, किरण कुमार मोरे, अशोक जगदेव, विशाल सोनवणे हे सर्व उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नवी मुंबई तळोजा विभाग हेड ऑफिस व्हिजिलन्स.विभागाचे,श्री प्रवीण दिनकर शिर्के यांनी सर्वांचे आभार मानले

बेलापुर (प्रतिनिधी  )-येथील सामाजिक कार्यकर्ते, बिनधास न्यूजचे कार्यकारी संपादक देविदास देसाई यांचा सपत्नीक सन्मान राज्याचे महसुल , पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला        त्या सत्काराचे निमित्तही तसेच होते सामाजिक कार्य करताना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते परंतु बेलापुरात सतत सामाजिक कार्यात तसेच पत्रकारीता क्षेत्रात आघाडीवर राहुनही देविदास देसाई यांनी आपल्या कुटुंबाकडेही तितकेच लक्ष दिले त्यामुळेच त्यांची दोन्ही मुले एमपीएससी परिक्षेच्या माध्यमातून आज शासकीय अधिकारी म्हणून सेवा देत आहे त्यांचा मोठा मुलगा अनिरुद्ध देसाई हा बिड येथे सहाय्यक लेखाधिकारी म्हणून कार्यरत आहे तर दुसरा मुलगा अभिषेक देसाई हा जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता म्हणून सोलापुर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात कार्यरत आहे तिनही मुलांना उच्चशिक्षित करुन दोन मुले एमपीएससी परिक्षेच्या माध्यमातून आज शासकीय सेवेत आहेत त्यामुळेच दोन शासकीय अधिकाऱ्याचे माता- पिता होण्याचा बहुमान मिळविणाऱ्या या अवलीयांचा सन्मान राज्याचे महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झालेला आहे देविदास देसाई यांनी जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे कामही बऱ्याच वर्ष केलेले होते जिल्ह्यात अंनिसची चळवळ सुरु करण्यात त्याचा मोलाचा वाटा होता त्यांनी अनेक बुवाबाजी करणाऱ्या बुवांचा भांडाफोड केलेला होता. अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते काम पहात आहे सीमा सुरक्षा दल BSF बाँर्डर सिक्युरीटी फोर्स मध्येही त्यांनी पाच वर्ष देशसेवा केलेली आहे . तसेच बेलापुर व परिसरातील घडणाऱ्या  सर्व घटनां वृत्तपत्र तसेच घडामोडी गृपवर तातडीने पाठविण्याचे  काम ते जागृक पत्रकार म्हणून ते सतत करत असतात.बेलापुर गावातही ते सामाजिक कार्यात नेहमी अघाडीवर असतात. गावात सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे म्हणून त्यांची ओळख आहे .बेलापुर गावाला १२६ कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजुर झाली त्या योजनेच्या उद़्घाटन कार्यक्रमात संयोजकांनी देसाई दांम्पत्यांचा सन्मान घडवून आणला .चांगल्या उपक्रमात चांगल्या व्यक्तीचा सन्मान चांगल्या व्यक्ती  नामदार विखे पाटील यांच्या शुभहस्ते केल्याबद्दल संयोजकांनाही बिनधास न्युजच्या वतीने धन्यवाद.

श्रीरामपूर : वैयक्तिक वादांना धार्मिक स्वरूप देऊन सामाजिक सलोखा नष्ट करण्याच्या प्रयत्नांना प्रतिबंध घालण्या यावेत अशी मागणी समाजहित जोपासणाऱ्या जागरुक नागरिकांनी मा. तहसिलदार साहेब यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात असे कळविले आहे की, महाराष्ट्राच्या मातीत वर्षानुवर्षे अत्यंत सलोख्याने राहणारे विविध जाती धर्माचे लोक आपआपसातील ऋणानुबंध टिकवून आहेत, गुण्यागोविंदाने एकमेकांचा आदर करुन रहात आहेत. परंतू अलीकडच्या कालावधीत काही राजाश्रय प्राप्त संघटनांकडून हिंदु-मुस्लिम एकोपा बिघडवून त्यांच्यात वाद निर्माण करण्याचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.

प्रेम ही प्रत्येकाची वैयक्तिक खाजगी बाब आहे. १८ वर्षे वय पूर्ण केलेल्या व्यक्तीने कुणावर करावे हा त्याचा / तिचा वैयक्तिक अधिकार आहे. यात कधी मुलगी हिंदु व मुलगा मुस्लिम राहु शकतो. तर कधी मुलगी मुस्लिम व मुलगा हिंदु असू शकतो. अशा प्रकरणांना धामिक रंग देऊन एकाच धर्माच्या लोकांवर दोष मढण्याचे षडयंत्र सुरु आहे. विशेषतः प्रेमप्रकरणात मुलगा मुस्लिम असेल तर अस्तित्वात नसलेल्या 'लव जिहाद' वगैरे काल्पनिक नाव देऊन संपूर्ण मुस्लिम समाजाला उघड उघड शिव्याशाप, दुषणे देण्याचे काम सुरु आहे. समाजातील तरुणांची माथी भडकावून त्यांना संपूर्ण मुस्लिम समाजा विरोधात भूमिका घेण्यास भाग पाडले जात आहे. यामुळे अनेक ठिकाणी मुस्लिमां विरुध्द हिंसाचार करणे, त्यांच्या धार्मिकस्थळांचे नुकसान करणे, त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकणे अशी कृत्ये केली जात आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना भुषणावह नक्कीच नाहीत. सामाजिक सलोखा, सामाजिक सौहार्द टिकणे आणि त्यात वाढ होणे हाच त्यावरील उपाय आहे. वैयक्तिक प्रेमप्रकरणाचे राजकारण करुन विष पेरणाऱ्या लोकांना प्रतिबंध करावा हे ही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

घटना घडलेल्या ठिकाणी दोन्हीकडील लोकांना विश्वासात घेऊन, गुन्हेगारांवर योग्य कार्यवाही करुन सामाजिक एकोपा अबाधित ठेवण्याकामी प्रयत्न व्हावेत. दोषी व्यक्तींवर योग्य ती कारवाई होत असतानाच ज्यांचा काही संबंध नाही अशा संपूर्ण अल्पसंख्य समाजाला वेठीस धरण्याचे हेतुपुरस्सर होणारे प्रयत्न हाणून पाडण्यात यावेत या संदर्भात शासनाकडून प्रयत्न व्हावेत असे मा. तहसिलदार साहेबांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.

निवेदनावर सर्वश्री नजीरभाई शेख, हाजी रफिक पोपटिया, जैनुद्दीन जहागिरदार, तन्वीर गुलाम हुसेन, अन्वरभाई फिटर, वासुदेव सैंदाणे, चाँदखान पठाण, बुऱ्हान जमादार, खलीलभाई मोमीन, समीर शेख, फहिमखान, डॉ. जब्बार पटेल, डॉ. इशान शेख, अश्पाकभाई आदिंच्या सह्या आहेत.


बेलापूर प्रतिनिधी-पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नाही तर कष्टकऱ्यांच्या तळ हातावर तरली आहे‌‍ असे ठणकावून सांगणारे, कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे, बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती बेलापूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. समता स्पोर्ट क्लब, आर एस ग्रुप, ग्रामपंचायत व बेलापुर सेवा संस्था यांच्या वतीने येथील विजयस्तंभ चौकामध्ये ‌‌‍सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संध्याकाळी जयंती कृती समिती व आर एस ग्रुपच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी सर्व समाज बांधवांनी जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, जि प सदस्य शरद नवले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक, भारतीय जनता पार्टीचे नेते सुनील मुथा, बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, जनता विकास आघाडीचे अध्यक्ष रवींद्र खटोड, माजी सरपंच भरत साळुंके, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, पत्रकार ज्ञानेश गवले, विष्णुपंत डावरे, दिलीप दायमा, सुहास शेलार, पो कॉ संपत बडे, पो कॉ भारत तमनर, ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक, मुस्तक शेख, मेजर सुजीत शेलार, प्रकाश कुऱ्हे, भास्कर बंगाळ, संजय शेलार, बंटी शेलार, रमेश शेलार, विजय शेलार, तानाजी शेलार, बाबासाहेब शेलार, अक्षय शेलार, रोहित शेलार, डॅनियल शेलार, बाळासाहेब शेलार, निलेश शेलार, राहूल शेलार, अशोक अंबिलवादे, भाऊसाहेब राक्षे, बाबुलाल पठाण,अल्ताफ शेख, संकेत शेलार यांचे सह अनेक नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समता स्पोर्ट क्लब व आर एस ग्रुपच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने सर्व वेगवेगळ्या पक्षाची नेतेमंडळी तसेच सर्व कार्यकर्ते गट तट सोडून एकाच व्यासपिठावर आले होते अशाच प्रकारे सर्व जण एकत्र येवुन सण उत्सव साजरे करुन गावाचा सन्मान वाढवावा अशी अपेक्षा अनेक जेष्ठांनी व्यक्त केली आहे

बेलापुर (प्रतिनिधी  )-समींद्रा फौंडेशनच्या वतीने अनेक गरजु वंचित लाभार्थ्यांना जिवनावश्यक वस्तू तसेच साहित्याचे वाटप करण्यात आले असुन जवळपास १२ शाळेतील ५०० विद्यार्थ्यांना मोफत शालेय किट देण्यात आले असल्याची माहीती फौंडेशनचे अध्यक्ष सदाशिव पा .थोरात यांनी दिली                                श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना शालेय किटच्या साहित्याचे वाटप प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर आहेर यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार देविदास देसाई हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मेजर ज्ञानदेव निबे संस्थेच्या सचिव सविता थोरात राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक बबनराव तागड ,मनिषा कोल्हे, उमेश थोरात उपस्थित होते. या वेळी बोलताना समिंद्रा फौंडेशनचे अध्यक्ष सदाशिव थोरात म्हणाले की या फौंडेशनच्या माध्यमातून ऊस तोड कामगार ,घिसाडी समाज तसेच समाजातील वंचित घटकांना विविध वस्तू, कपडे आदि साहित्य वाटप करण्यात आले तर अनाथ आश्रम, वृद्धाश्रम येथेही मदत देण्यात आलेली आहे कुठलाही विद्यार्थी शैक्षणिक सोयी सुविधेमुळे शिक्षंणापासून वंचित राहु नये ही आपली भुमीका असल्याचे मत थोरात यांनी मांडले या वेळी प्राथमिक शाळा उक्कलगाव ,प्राथमिक शाळा पटेलवाडी ,प्राथमिक शाळा आटवाडी ,प्राथमिक शाळा वाकणवस्ती येथील  विद्यार्थ्यांना बँग ,कंपास ड्राईंग बुक वह्या कलर पेटी टुथ ब्रश व ईतर साहित्य भेट देण्यात आले या वेळी सुधीर आहेर, पत्रकार देविदास देसाई ,मनिषा कोल्हे, मेजर ज्ञानदेव निबे, बबनराव तागड तसेच शालेय विद्यार्थीनी सायली मोरे आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी उक्कलगाव शाळेच्या मुख्याध्यापिका कविता गायकवाड, मनिषा साठे ,ज्योती तोरणे ,ज्ञानेश्वर चौधरी पटेलवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका तिलोत्तमा भागवत, रविंद्र वाघ मारुती वाघ रामनाथ पिलगर मुराद सय्यद मनिषा टाके विनीत चांदेकर प्रितम मेहेरखांब प्रिया माहुरे नंदा चेमटे शंकर बर्डे रमेश रजपुत संजय मोरे ज्योतिबा श्रीराम विजया थोरात पाटील दिपक गोसावी आशिष निकम आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविक उक्कलगाव शाळेच्या कविता  गायकवाड यांनी केले तर रविंद्र वाघ यांनी आभार मानले मारुती वाघ यांनी सूत्रसंचलन केले.

बेलापुर (प्रतिनिधी  )-जीवन सुखी व समाधानी जगायचे असेल तर भक्ती मार्गाचा अवलंब करा. मुलांना सुसंस्कारीत करा आचरण शुद्ध ठेवा कुणाशी कपटनिती ठेवुन वागु नका.खोटे बोलु नका असा उपदेश सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगीरी महाराज यांनी दिला .             आदिक मास निमित्त माहेश्वरी समाजाच्या वतीने बालाजी मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात भाविकांना उपदेश करताना महंत रामगीरी महाराज पुढे म्हणाले की  मुलावर चांगले संस्कार करा तीच आपली संपत्ती आहे पैशाच्या मोहापायी जिवनातील आनंद गमावुन बसु नका मनुष्य जन्म हा एकदाच आहे याची जाणीव ठेवा प्राणीमात्रावर दया करा हिंसा करु नका भक्ती हे जीवनाचे सार आहे.ज्याच्याकडे समाधान आहे तो सर्वात सुखी माणूस आहे त्यामुळे समाधानी रहा सुख आपोआप प्राप्त होईल .कोरोना काळ सर्वांनी अनुभवला आहे आपल्या गरजा किती  आहे ते कोरोनाने आपल्याला शिकविले आहे घरात बसुन देखील आपण आनंदात जीवन जगत होतो त्यामुळे भौतिक सुखाच्या मागे धावताना दुःख पदरात घेवु नका जीवानाचा खरा आनंद कशात आहे हे जाणून घ्या सर्व संपत्ती येथेच सोडून आपल्याला जायचे आहे आपल्या बरोबर केवळ आपले कर्मच येणार आहे त्यामुळे सत्कर्म करा आसा उपदेशही महंत रामगीरी महाराज यांनी दिला या वेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा ,राजेश खटोड , रामविलास झंवर ,संजय राठी ,दिपक सिकची ,रामप्रसाद झंवर किराणा मर्चंडचे अध्यक्ष शांतीलाल हिरण ,भरत सोमाणी ,गोविंदराम दायमा ,विशाल वर्मा ,पत्रकार देविदास देसाई ,वकील संघटनेचे अध्यक्ष अँड विजयराव सांळूके ,सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज , विशाल आंबेकर ,प्रशांत खटोड ,गोपाल राठी ,अक्षय लढ्ढा ,मुकुंद चिंतामणी ,प्रमोद पोपळघट ,करण गोसावी ,आदिसह महीला भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-राज्यातील सर्व दुकानदारांच्या मागण्या एकच असुन अधिवेशन संपल्यानंतर राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेवुन दुकानदारांच्या उचित मागण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे अश्वासन राज्याचे पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांनी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदारांच्या शिष्टमंडळास दिले          राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्या संदर्भात अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे पुरवठा मंत्री नामदार छागन भुजबळ यांना निवेदन देण्यात आले संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की दुकानदारांना दिली जाणारे कमिशन हे तुटपुंजे असुन कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी दुकानदारांनी मोफत वितरीत केलेल्या धान्याचे कमिशन दर महा दुकानदारांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे प्रति क्विंटल एक किलो प्रमाणे घट मंजुर करण्यात यावी धान्याप्रमाणेच साखरेलाही १५० रुपये मार्जिन देण्यात यावी तसेच मागील साखरेच्या मार्जिनचा फरकही देण्यात यावा कोरोना काळात वितरीत केलेल्या कँरी फाँरवर्ड धान्याचे मार्जिन त्वरीत मिळावे माहे नोव्हेंबर डिसेंबर २०२२ महीन्यात धान्याचे पैसे भरले परंतु ते धान्य जानेवारी महीन्यात प्राप्त झाले असुन त्याचे वितरण मोफत करण्यात आले त्यामुळे चलनाने भरलेलै पैसे त्वरीत मिळावे पाँज मशिन जुन्या झाल्यामुळे बिल करताना वारवार अडथळे येतात त्यामुळे हाय स्पिडचे नविन पाँज मशिन देण्यात यावे दुकानदारांना धान्य मोजुनच दिले जावे सहकारी संस्थांच्या सेल्समन यांनाही वाटप केलेल्या कमिशनचा लाभ मिळावा अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या या वेळी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई जिल्हा सचिव रज्जाक पठाण जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरगे अनिल मानधने दिलीप गायके संगमने तालुध्यक्ष काशिनाथ आरगडे नानासाहेब चौधरी नितीन गोरे सुखदेव खताळ सुर्यभान दिघे अशोक कानवडे आदिचा शिष्टमंडळात समावेश होता

श्रीरामपूर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत गेल्या दोन वर्षापासून मोठ्या स्वरूपात रस्त्यांची व शासकीय इमारतींची कामे युद्धपातळीवर सुरू असून सर्व कामे उत्कृष्ट स्वरूपात होत असल्याने नागरिकात समाधानाचे वातावरण पसरले आहे सदरील कामे उत्कृष्ट व नियमात करून घेणे करिता येथील उप अभियंता व शाखा अभियंता यांना कामाच्या ठिकाणी जाऊन गुणवत्तेत कामे करून घेणे आवश्यक असताना दुर्दैवाने शासनाचे या उपविभागाकडे विशेषता अधिकाऱ्यांच्या सुविधेकडे दुर्लक्ष झाल्याने गेल्या चार महिन्यापासून या उपविभागाकडे कामाची तपासणी व जाणे येणे करिता शासकीय वाहन नसल्याने अधिकाऱ्यांची मोठी कोंडी झाली असून येथील अधिकारी साईडवर जाणे येणे करिता स्वतःच्या खाजगी वाहनाचा वापर करीत असून वाहन चालविणे करिता त्यांना स्वतंत्र ड्रायव्हर ठेवावा लागत आहे

वास्तविक पाहता तालुक्यातील ठिकठिकाणी चालू असलेल्या कामाचे अंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्या करिता व दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणे व येणे करिता किमान 40 किलोमीटरचे दररोजचे अंतर प्रति दिन 50 किलोमीटरचे अंतर होत असून यासाठी लागणारे पेट्रोल व ड्रायव्हर खर्च पाहता या अधिकाऱ्यांना न परवडणारे आहे कारण हा खर्च त्यांना आपल्या पगारातूनच करावा लागत असल्याने त्यांना मोठी झळ बसत आहे

साठ हजार ते एक लाखापर्यंत या अधिकाऱ्यांचा मासिक वेतन असून महिन्याला अंदाजे पंचवीस ते तीस हजार रुपये त्यांचा इंधन खर्च व ड्रायव्हर खर्च होत असून मुला मुलींचे शैक्षणिक खर्च घर खर्च व इतर खर्च एक ते दीड लाख रुपये होत असल्याने या अधिकाऱ्यांच्या दूरदशे कडे  शासनाने लक्ष केंद्रित करून त्यांच्या गेल्या 4 महिन्यात झालेल्या वाहतूक खर्च या अभियंत्यांना परतफेड करावी व शासकीय कामाकरिता या श्रीरामपुर सार्वजनिक बांधकाम विभागास चांगल्या दर्ज्याचे वाहन लवकरात लवकर देऊन अडचणी दूर करावे याकरिता पत्रकार संघाच्या इलेक्टॉनिक मीडिया सेलचे जिल्हाअध्यक्ष अस्लम बिनसाद यांनी सर्व पत्रकार व सर्व श्रीरामपूर शहर हितचिंतकांना या कर्तव्य दक्ष अभियंत्यांना त्यांच्या हक्काच्या लढ्यात सोबत राहून श्रीरामपुरातील विकास कामे उत्कुष्ट व दर्जेदार करून घेण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे आपण पत्रकार संघाच्या वतीने वरिष्ठ लेव्हलवर मंत्रिमंडळात पत्रव्यवहार केला आसून लवकरच रास्ता रोको देखील करणार असल्याचे अस्लम बिनसाद यांनी सांगितले या आंदोलनात शहरातील सामाजिक संघटना व सूदान नागरिकांनी जाहीर पाठिंबा दिला आहे 

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget