हरेगाव येथे झाडाला उलटे टांगून जिवे मारण्याचे प्रयत्न करणार्‍या गलांडे व त्यांचे सर्व साथीदारांवर कठोर कारवाई करून अंडरट्रायल केस चालविण्यात यावे मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांची मागणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने हरेगाव उंदीरगाव परिसरातील राहणाऱ्या तरुणांना मारहाण करण्यात आली होती या तरुणांना भेटून घटनेची संपूर्ण माहिती घेऊन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की हरेगांव उंदीरगाव येथे गावातील पाच अल्पवयीन गरीब मुले नावे पुढील प्रमाणे कुणाल मगर, शुभम माघाडे, ओम गायकवाड, प्रणयी खंडागळे यांना सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत हातपाय बांधून झाडाला उलटे टांगून जबर मारहाण करुन त्यांच्या तोंडावर लघवी करुन बुटावर थुंकून त्यांना चाटायला लावले. अमानवीय निर्दयीपणे मारहाण करणारे जातीवादी प्रवृत्तीचे गावगुंड  आरोपी युवराज गलांडे, मनोज बोडखे, आरोपी दुर्गेश वैद्य, राजेंद्र पारखे, दिपक गायकवाड या गावगुंडणी मारहाण करून गंभीर दुखापत केले आहे या गावगुंडांना यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करुन मोका अंतर्गत कारवाई करून फास्ट ट्रॅक  कोर्टात केस चालवावे तसेच या या गुन्हेगारांचे जामीन न होऊन देता यांची केस अंडरट्रायल चालविण्यात यावे. तसेच आरोपींना प्रोत्साहन देणारा खरा मास्टर माईंड फरार नाना गलांडे ह्याला त्वरीत अटक करण्यात यावे व नाना गलांडे व मुलावर पूर्वी असलेले सर्व  गुन्हयांचा तपास करुन सर्व गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षा होईल या दिशाने पोलिसांनी पाठपुरावा करावा. तसेच यांचे सावकारकी करुन गोरगरीबांकडून लुबाडण्यात आलेल्या जमीनीच्या चौकशी करुन यांच्या विरोधात सावकारकी करून नागरिकांना लुगडून बेइमानी करून मालमत्ता कमवलेली आहे या सर्व बेमानी संपत्तीची चौकशी करुन त्यांचेवर कठोर कारवाई करावी सावकारीच्या धंद्या मार्फत बळजबरीने दमदाटी करून जादा पैशाची आम्हीच दाखवून व दिशाभूल करून अनेक लोकांचे सह्या घेऊन शेतजमीन, जमीन,घरे, दुकाने  लोकांकडून बळजबरीने कब्जे घेऊन स्वत:च्या नावावर केले आहे. त्याची चौकशी होऊन मुळ मालकाला जमीन, प्लॉट, शेती, फ्लॅट, दुकाने देण्यात यावे. अशा गंभीर गुन्हे करणार्‍या नाना गलांडे व त्यांचा मुलगा व त्याचे साथिदार या सर्वांवर फॉस्टट्रॅक कोर्टात केस चालवावे व अंडरट्रायल  केस चालवुन त्यांना कठोर शिक्षा होईल असे पोलिस प्रशासनाने प्रयत्न करुन समस्याग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून द्यावा असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे निवेदन देतेवेळी म्हणाले 

याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपजिल्हाध्यक्ष महेश सोनी,तालुका अध्यक्ष डॉ संजय नवथर, शहराध्यक्ष सतिश कुदळे, विद्यार्थी सेना जिल्हा सचिव गणेश दिवसे,विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष  संकेत शेलार,विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष कुणाल सुर्यवंशी, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष यश जराड, मनसे तालुका संघटक विलास पाटणी, तालुका सचिव भास्कर सरोदे,तालुक सरचिटणीस अंबादास कोकाटे,शहर संघटक निलेश सोनावणे, शहर सचिव प्रतीक सोनावणे,शहर सरचिटणीस,दर्शन शर्मा, शहर उपअध्यक्ष विशाल लोंढे, सचिन कदम, मनोहर बागुल,संजय शिंदे,राजू जगताप, नितीन जाधव, मनसे तालुका उपाध्यक्ष अमोल साबणे, सुनील करपे, अरमान शेख, विशाल गायकवाड, विद्यार्थी सेना तालुका संघटक नंदू चाबुकस्वार, तालुका सचिव अतुल खरात,तालुका उपाध्यक्ष विशाल जाधव, शहर विभाग अध्यक्ष मारुती शिंदे,लखन कुरे,नितीन खरे, लखन कडवे,सुरेश शिंदे, अक्षय काळे,राहुल शिंदे, विकी परदेसी,  संतोष आवटी, करण नांगल किरण, ज्ञानेश्वर काळे, सोनू बोरुडे,आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget