May 2022

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - कधीकाळी शहरवासीयांना स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी प्रसिद्ध असलेली श्रीरामपूर नगरपालिका सध्या शहरवासीयांना अस्वच्छ आणि अपुरा पाणीपुरवठा करीत आहे. शिवाय दररोज विविध भागांमध्ये हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभाराने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

शहराच्या विविध भागातील नागरिकांनी पाणीपुरवठा संदर्भात पालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्या. निवेदने दिली. आंदोलने केली. तरी सुद्धा पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांवर याचा कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यांची तातडीने बदली करून सक्षम असा अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त करावा अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

शहराच्या विविध भागात असलेल्या पालिकेचे जलकुंभ भरल्यानंतर अनेक तास पाणी वाया जाते. संजय नगर पाण्याची टाकी, मोरगे वस्ती वरील पाण्याची टाकी, कांदा मार्केट परिसरातील पाण्याची टाकी या भागांमध्ये टाक्या भरल्यानंतर सुद्धा अनेक तास पाणी वाया जाते. तेथे कोणताही वाचमेन किंवा पाणीपुरवठा कर्मचारी नसतो. संजय नगर परिसरातील पाण्याची टाकी तर वरूनच ओव्हर फ्लो होते तर मोरगे वस्ती येथील पाण्याच्या टाकीच्या पाईप लाईन मधून ओव्हर फ्लोचे पाणी तासनतास शेजारी शेतात सोडले जाते.


गोंधवणी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून शहरातील पाण्याच्या टाक्यासाठी जाणार्‍या मेन पाईपलाईन वरील वाल्व नेहरूनगर परिसरामध्ये गेल्या एक वर्षापासून लीक असून तेथे 24 तास मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. तिथे पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष आहे.

वैदुवाडा अहिल्या देवी नगर परिसरामध्ये नागरिकांना मुख्य जलवाहिनीवर नळ कनेक्शन दिल्याने प्रत्येक वेळी तेथे नळांना पाणी येते. दिवसातून पाच वेळा त्या ठिकाणी पाणी येते व पाच वेळा पाणी आल्याने या भागातील नागरिकांच्या नळांना तोट्या नसल्याने तेथे सुद्धा लाखो लिटर पाणी दररोज वाया जाते. शहराला दररोज 40 मिनिटे पाणी पुरवठा केला जातो. शहराच्या सर्व भागातील हे वाया जाणारे पाणी रोखल्यास शहरात एक तास पाणी पुरवठा करता येईल अशी परिस्थिती आहे. परंतु पाणी पुरवठा विभागाचे अक्षम्य हलगर्जीपणामुळे पाण्याची नासाडी होत आहे.

मिल्लत नगर परिसरातील पाण्याबाबत गेले अनेक महिने बोंबाबोंब सुरू आहे. गेल्या महिन्यात या भागातील जलवाहिनी मध्ये मोठा दगड सापडला.त्यामुळे काही भागात पाणीपुरवठा सुरळीत झाला तर काही भागामधला पाणीपुरवठा एक अत्यंत कमी झाला. कांदा मार्केट परिसरातील नागरिकांनी देखील पाण्यासाठी आंदोलन केले आहे. शहराच्या विविध भागांमध्ये पाणी टंचाईचे व पाणी वाया जाण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. पूर्वीच्या काळी नगरपालिकेचा पाणीपुरवठा विभाग अत्यंत सक्षम होता. शहराच्या सर्व भागांमध्ये बारकाईने लक्ष ठेवून पाण्याची नासाडी होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात होते. मात्र सध्या पाणी पुरवठा विभाग ढेपाळला गेला आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाण्याच्या विविध प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत नगरपालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांनी मागील आठवड्यामध्ये झालेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीमध्ये पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे समजते. तरी पण याबाबत कोणतीही सुधारणा झालेली नाही. पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी तातडीने याबाबत दखल घेऊन पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजात सुधारणा करावी अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी- दि.24/05/2020 रोजी जागेच्या वादावरुन फरार महिला आरोपी नामे प्रमिला धोंडीराम इंगळे  व इतर आरोपींनी मिळून मयत नामे गणेश गवळीराम साळवे वय 28 वर्ष रा. लाटे वस्ती निपाणी वडगाव तालुका श्रीरामपूर यांची कुऱ्हाड,कोयता, गावठी कट्टा व इतर शस्त्राच्या सहाय्याने हत्या करण्यात आली होती त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हौशीराम गवळीराम साळवे यांच्या फिर्यादीवरून गु. र. नं. 950/2020 भा.द.वि. कलम 302,326,324,143,147,148,149,504,506 सह  आर्म ॲक्ट 3,7,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.आज दि.30/05/2022 रोजी Dysp संदीप मिटके यांना  गुप्त बातमीदारा मार्फत  खात्रीशीर माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील फरार महिला आरोपी प्रमिला धोंडीराम इंगळे ही  आपले नाव व वेश  बदलून वडाळा महादेव परिसरात  येणार आहे त्यानुसार त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सूचना व मार्गदर्शन करुन आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी वडाळा महादेव परिसरात सापळा लावून महिला आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले आहे व पुढील कार्यवाहीसाठी श्रीरामपूर शहर  पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा.  स्वाती भोर, Dy.s.p  संदीप मिटके , यांचे मार्गदर्शनाखाली म. पो. ना.अश्विनी पवार, पो. ना.नितीन चव्हाण, पो.कॉ. विलास उकिरडे यांनी केली.

अहमदनगर प्रतिनिधी - धनादेश न वटल्याने आरोपीस ६ महिने कारावासाची शिक्षा व फिर्यादीस नुकसान भरपाई पोटी रुपये १ लाख ५० हजार एक महिन्यात देण्याचा आदेश व रक्कम न दिल्यास अतिरिक्त ४ महिन्याचा कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.याबाबत समजलेले माहिती अशी कि, मे २०१८ मध्ये आरोपी सचिन बाबासाहेब नवघने (रा. नवघने स्वॉमील, भवानी पेठ, पुणे) याने त्याचे व्यवसायाकरीता रक्कम १ लाख १५ हजारची हबीब शेख हुसेन (रा. बेलदारगल्ली, अहमदनगर) यांचेकडून उसनवारीने घेऊन आपसात ठरल्याप्रमाणे एक महिन्यात परत दिली नाही, म्हणून रक्कमेची मागणी केली. आरोपीने रोख रक्कम न देता त्याचे खाते बॅक खात्यावरील रक्कम रुपये १ लाखचा चेक देऊन तो निश्चित वटण्याची खात्री व भरवसा दिलेला. फिर्यादीने तो चेक त्यांचे खाते असलेल्या बॅकेत भरला असता तो चेक वटण्याइतपत पुरेशी रक्कम आरोपीचे खात्यात शिल्लक नसल्यामुळे चेक “फंडस इन सफिशिएंट ” असा शेरा मारुन न वटता परत आला. याबाबत आरोपीस कळविले असता, आरोपीने तो चेक पुन्हा तीन महिन्याने भरण्याची विनंती केली असल्याने, तो चेक फिर्यादीने दुसऱ्यांदा बँकेत भरला असता तो पुन्हा आरोपीच्या खात्यावर पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने न वटता परत आला असल्याने आरोपीस वकीलामार्फत नोटीसही देण्यात आली. आरोपीने फिर्यादीची रक्कम परत दिलेली नसल्याने, फिर्यादीने आरोपी विरुध्द अहमदनगर येथील चिफ ज्युडि मॅजि. साहेब अहमदनगर यांचे न्यायालयात एस सी सी केस नं. ५९०९/२०१८ ची दाखल केली. केसमध्ये दोन्ही बाजुचा लेखी व तोंडी पुरावा पाहून, आरोपीने व त्याचे खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नाही, याची माहिती असताना देखील फिर्यादीस न वटणारा चेक देऊन फिर्यादीची घोर फसवणूक केलेली आहे, असे न्यायालयात प्रथमदर्शनी शाबीत झालेले असल्याने, दि. २७ मे २०२२ रोजी अति. मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब श्रीयुत डी. आर. दंडे यांनी आरोपीस दोषी धरुन, आरोपीस ६ महिने कारावासाची शिक्षा व फिर्यादीस नुकसान भरपाई पोटी रुपये १ लाख ५० हजार एक महिन्यात देण्याची शिक्षा सुनावलेली आहे. नुकसान भरपाई न दिल्यास आरोपीस अतिरिक्त ४ महिन्याचा कारावास सोसावा लागणार आहे. प्रकरणामध्ये फिर्यादी तर्फे ॲड सुबोध सुधाकर जाधव (अहमदनगर) यांनी काम पाहिले. त्यांना ॲड शैलेंद्र राजाराम शिंदे, ॲड. सिध्दांत भाऊसाहेब शिंदे यांनी सहाकार्य केले आहे.

नाशिक प्रतिनिधी - गावठी कट्टे बाळगून दरोड्याच्या तयारीत असणारे व पूर्वी अहमदनगर जिल्ह्यातही गुन्हे दाखल असणा-या सराईत तीन चोरट्यांना पकडण्यात आले आहे. ही कारवाई पेट्रोलिंग करताना चोपडा (जि.जळगाव) तालुक्यात परिक्षेत्र नाशिक यांच्या आयजीच्या विशेष पथक व चोपडा ग्रामीण पोलिस अशा दोन्ही पथकांनी संयुक्तपणे शनिवारी (दि.२८) ही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे.गणेश बाबासाहेब केदारे (रा.पाडळी ता.पाथर्डी जि.अहमदनगर ), कालीदास दत्तात्रय टकले (रा.हरताला ता.पाथर्डी,जि.अ.नगर), विकाश आप्पासाहेब गिरी ( रा.पाडळी ता.पाथर्डी,जि.अ.नगर) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे असून, उर्वरित उमर्टी ( मध्यप्रदेश) येथील दोघे फरार झाली आहेत.नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बीजी शेखर पाटील यांच्या

मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार आयजी पथकातील पीआय बापू रोहम, एपीआय सचिन जाधव,एएसआय बशिर तडवी, हेकाॅ रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, शकील शेख, पोना मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मडलीक, नारायण लोहरे आणि चोपडा ग्रामीणचे पीआय कुनगर, पीएसआय अमरसिंग वसावे, हेकाॅ लश्मण शिगाणे, पोना प्रमोद पारधी आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, या कारवाईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले असता, त्याची पोलिसांनी झडती घेतली, या दरम्यान त्याच्याकडे ३ गावठी कट्टे, १४ राउंड, १ वस्तरा व एक स्कॉर्पिओ कार असा एकूण ६ लाख ३४ हजार १०० रु. किंमतीचा मुद्देमाला ताब्यात घेतला. चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात CCTNS गु.र.न. ६१/२०२२ भादवी. कलम ३९९,४०२ सहा आर्म अँक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आयजी पथकाने पुढील कारवाईसाठी तिन्ही आरोपींना चोपडा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

श्रीरामपूर ( शौकतभाई शेख) -   श्रीरामपूर तालुका मेडिकल असोसिएशनचा सन २०२२-२३ नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळ्याचे आयोजन मावळत्या पदाधिकाऱ्यांनी येथील व्ही.आय .पी गेस्ट हाऊस मध्ये गुरुवार दिनांक २६-५-२२ रोजी संध्याकाळी ७-०० वाजता प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय घोगरे, अहमदनगर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अविनाश आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते .. याकार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आय.एम.ए .इलेक्ट महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.रविद्र कुटे यांनी भुषविले तर मावळते अध्यक्ष डॉ. सलीम सिकंदर शेख बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. नवनिर्वाचित उपाअध्यक्ष डॉ.राजेंद्र लोंढे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिल, मावळते सेक्रेटरी डॉ.विवेक बागले यांनी २०२१-२२ मधे केलेल्या कामाचा अहवाल व आढावा सादर केला. अध्यक्ष डॉ .सलीम शेख यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नावे व पदे जाहिर केली त्यात  १) अध्यक्ष  डॉ.दिलीप शेजवळ, २) उपाध्यक्ष डॉ.राजेंद्र लोंढे,३) सेक्रेटरी - डॉ तौसिफ शेख, ४) खजिनदार::- डॉ.संतोष मोरे टाकळीभान यांच्या नावाची घोषणा करण्यात येऊन  या सर्वांचा पदाच्या मेडल्स मावळते अध्यक्ष डॉ.सलीम यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. शेजवळ, उपाध्यक्ष डॉ. लोंढे,

सेक्रेटरी डॉ.तौसिफ शेख व डॉ.विवेक बागले,खजिनदार डॉ.संतोष मोरे यांचा डॉ.मच्छिंद्र त्रिभुवन यांनी शाल,पुष्प देऊन सत्कार केला, या कार्यक्रमात अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, क्षयरोग अधिकारी डॉ.अविनाश आहेर,डॉ. सौ.सारिका देशपांडे, डॉ. रविंद्र कुटे,या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून मावळत्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक करुन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या, तसेच कार्यक्रमात आय.एम.ऐ अध्यक्ष डॉ .संकेत मुंदडा, आय. एम.ऐ सेक्रेटरी डॉ.केतन बधे ,डॉ. के.डी.मुंदडा. डॉ.अजित देशपांडे, डॉ.राजाराम जोंधळे,डॉ.सातपुते , डॉ.प्रशांत चव्हाण,डॉ. खपके, डॉ. योगेश बंड , डॉ, कृष्णा बाविस्कर, डॉ.अजित घोगरे, डॉ.आपासाहेब लबडे,जळगांव येथील डॉ.कपील पाटील ,डॉ.स्वपनिल पुरनाळे , डॉ.विजय चुडीवाल डॉ. बैरागी, डॉ. मयुरेश कुटे व मित्र ,बॅंकेचे अधिकारी अकबरभाई शेख, इक्बाल काकर सर, सामाजिक कार्यकर्ते झाकीरभाई शहा . ई.मान्यवर उपस्थित राहुन मावळत्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या,कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन डॉ‌.मच्छिंद्र त्रिभुवन यांनी केले,नवनिर्वाचित सेक्रेटरी डॉ. तौफिक शेख यांनी आभार मानले..एका उत्कृष्ट कार्यक्रमाचची सांगता आनंदात झाली.

श्रीरामपूर प्रतिनिधी - दौंड पुणे देऊळगाव राजे -सिद्धेश्वर हॉल या ठिकाणी घेण्यात आलेल्या उन्हाळी कराटे शिबिरामध्ये पुणतांबा, चितळी, चांगदेव नगर, जळगाव, श्रीरामपूर, देऊळगांव राजे येथील 18 विद्यार्थ्यांनी मिळवली शो दान ब्लॅक बेल्ट डिग्री.या शिबिराचे आयोजन संघर्ष स्पोर्ट्स असोसिएशन च्या वतीने अधिकृत परीक्षक /

मार्गदर्शक शिहान -मीनानाथजी भोकरे सर तसेच सचिन पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते, या शिबिरामध्ये एकूण 5तालुक्यातील 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता,32 विद्यार्थी ट्रेनिंग साठी बसले होते,या परीक्षेत योगिता सुनिल ननावरे (प्रथम क्रमांक) अस्मि राहुल शिंदे (द्वितीय क्रमांक )पटकवून बाजी मारली, शो दान पदवी मिळविलेले विद्यार्थी -मैथली अमर गोडसे, श्रेया नारायण दिवटे, साक्षी बाबासाहेब शेटे,सायली जालिंदर वैराळ, सायली बाबासाहेब घाडगे, मयुरी साईनाथ बनकर, अयान रफिक शेख, सत्यम बाबासाहेब शेटे, कृष्णा अनिल फोफसे, शिवम संजय घोगरे, पवन किरण साळुंखे, आशिष रविंद्र कडलग, अधिराज यशवंत फोफसे, रुद्र श्रवण उकांडे, साहिल रावसाहेब शिंदे, अच्युत दत्तात्रय थोरात. या शिबाराचे उदघाटन संदीप (शेठ )नय्यर यांच्य हस्तेझाले, तर शिबिराचा निरोप समारोप नारायण गिरमकर सर तसेच शहाजी काका औताडे यांच्या हस्ते पार पडला. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी अमोल माळी सर, सचिन जाधव सर, महेश गराडे सर, सचिन शेडगे, आदित्य माळी, रोहन घोडके, दिपीका पोळ, रेश्मा शिंदे, ऐश्वर्या जोगदंड, श्रावणी शेजूळ, साक्षी बावधाने, साक्षी त्रिभुवन, प्रतिभा गायकवाड, आदिनाथ उकांडे, महेश कुऱ्हाडे, यांनी परिश्रम घेतले. 

अहमदनगर प्रतिनिधी:- सदरील घटनेतील तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असून त्यांनी केलेल्या ग्रामपंचायत चिंचोली गुरव तालुका संगमनेर येथील मुस्लिम स्मशानभुमी चे वॉल कंपाऊंड सुशोभीकरणाचे कामाची पाहणी करून एमबी करून देण्याच्या मोबदल्यात कामाची रक्कम ३ लाख रूपये असुन त्या रक्कमेच्या ५ टक्के प्रमाणे १५०००(पंधरा हजार रूपये)तसेच क्वालिटी कंट्रोलचे ४०००(चार हजार रूपये)असे एकूण १९०००(एकोणावीस हजार रूपये) लाचेची मागणी आरोपी लोकसेवक श्री.संजय गोविंदराव ढवण(वय-५७ वर्ष रा.श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर) यांनी करून सदर लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वतः पंचायत समिती कार्यालय येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कक्षात संगमनेर येथे स्वीकारली म्हणून त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.तसेच फोटोग्राफ घेण्यात आलेले आहे.सदरची कारवाई श्री.सुनील कडासने पोलीस अधीक्षक ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र नाशिक,श्री.एन.एस.न्याहळदे अप्पर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र नाशिक,यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी मीरा आदमाने पोलीस निरीक्षक अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक, पोलीस नाईक प्रवीण महाजन,पोलीस नाईक नितीन कराड,पोलीस नाईक प्रभाकर गवळी,चालक पो.हवालदार संतोष गांगुर्डे यांनी केली.


बेलापूर (वार्ताहर) - श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील शेतकरी कुटूंबातील व पत्रकार देविदास देसाई यांच्या मातोश्री गं.भा.अंजनाबाई अगस्ती देसाई (वय-95) यांचे काल सोमवार दि.23 मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास वृद्धपकाळाने निधन झाले त्यंचेवर आज मंगळवार दि. 24 मे रोजी सकाळी आठ वाजता बेलापूर येथे अंत्यसंस्कार होत आहेत.

त्यांचे पश्चात चार विवाहीत मुलगे, तीन विवाहीत मुली, सुना, जावई, नातवंडे, नातसुना व परतवंडे असा मोठा परीवार आहे. अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक, बेलापूर पत्रकार संघाचे सचीव व प्रगतशिल शेतकरी देविदास देसाई, बेलापूर एज्यूकेशन सोसायटीच्या कमालपूर येथील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षकसेवक भागवत देसाई (सर), एस.टी महामंडळाचे वाहक कैलास उर्फ बाळासाहेब देसाई व गुजरात येथील बी.एस.एफचे सेवा निवृत्त सैनिक मेजर बाबासाहेब देसाई यांच्या त्या मातोश्री होत.

तसेच बीड जिल्हा परीषदेचे लेखा परीक्षक अनिरूद्ध देसाई व नुकतेच मृद व जलसंधारणची एम.पी.एस.सी परीक्षा उत्तीर्ण झालेले बेलापूर येथील अभिषेक देसाई यांच्या त्या आजी होत. त्यांचेवर आज मंगळवार दि.24 मे रोजी सकाळी आठ वाजता बेलापूर शिवारातील सातभाई वस्तीजवळील प्रवरा नदीतीरावर अंत्यसंस्कार होत आहेत. 

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात धक्कादायक घटना घडली आहे. ज्यात कोल्हापूर येथील मोहिनी विद्यापीठात ज्यु शास्त्राचा प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेला. विजय मच्छिंद्र बर्डे हा २ दिवसांपूर्वी,  चितळी येथे, माहेरी आलेली पत्नी शैला बर्डे हिस घेण्यासाठी आला होता. त्यावेळी आप आपसात झालेल्या वादातून, विजय  बर्डे याने, दुपारी दीड वाजेच्या सुमारास, शैला हिच्या डोक्यात फरशी टाकून तिला जखमी करून. विजय बर्डे हा फिर्याद देण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यात आला असता. दुपारी २ ते अडीच वाजे दरम्यान आरोपी विजय बर्डे याने त्याच्या जवळील चाकूने, अचानक पणे अंदाधुंद वार करण्यास सुरुवात केल्याने.तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संतोष रामकीसन बडे यांच्या हाताला व  तालुका पोलीस ठाण्यात चारित्र पडताळणीसाठी आलेल्या,पाथरवाला जिल्हा परिषद शाळा नेवासा,राहणार टाकळीभान येथील शिक्षक किशोर शीवाजी शिंदे यांच्या डोक्याला व पाठीला चाकू लागल्याने हे गंभीर जखमी झाले आहे . जखमींना साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून. सदरच्या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्यात घडलेल्या घटने संदर्भात माहिती मिळताच. डीवायएसपी संदीप मिटके यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात घडलेल्या घटने संदर्भात, सीसीटीव्ही फुटेज पाहून पुढील कारवाई केली जानार आसल्याचे व पोलीस फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

पुणे प्रतिनिधी- बेंगळुरू येथे दिनांक २४ एप्रिल ते ३ मे दरम्यान खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातील १८८ विद्यापीठांमधील ४ हजार ५२९ खेळाडू सहभाग नोंदवला होता.या गेम्स मध्ये २० खेळांचे आयोजन करण्यात आले होते. वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने सांघिक विजेतेपद पटकावले.वेटलिफ्टिंग संघाने या स्पर्धेत २ सुवर्ण,१ रौप्य तर ४ कांस्यपदकाची कमाई केली. वैष्णव ठाकूर व चिराग वाघवले यांनी सुवर्ण,महेश अस्वले रौप्यपदक तर गणेश वायकर धैर्यशील साळुंके,तृप्ती माने व योगिता खेडकर यांनी कांस्यपदकाची कमाई केली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये एकूण ३९ पदके या मध्ये ८ सुवर्ण,१४ रोप्य व १७ कांस्यपदक पटकावून देशात आठवा क्रमांक पटकावला.वेटलिफ्टिंग संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून प्रा श्री सुभाष देशमुख(एस एस जी एम कॉलेज कोपरगाव) व डॉ राहुल भोसले(अगस्ती कॉलेज,अकोले) यांनी काम पाहिले तर संघ मार्गदर्शक म्हणून प्रा श्री विजय देशमुख(बाबूजी आव्हाड महाविद्यालय, पाथर्डी) यांनी काम पाहिले.यशस्वी संघाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर,विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ दीपक माने यांनी खेळाडूंचे व संघाचे अभिनंदन केले.

श्रीरामपूर प्रतिनिधी-एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी बेपत्ता मुलीस शिर्डी पोलिसांच्या सहकार्याने तिच्या नातेवाईकांनी तिला श्रीरामपूर पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी याप्रकरणातील आरोपीस अटक का केली नाही? अशी अरेरावीची भाषा वापरुन तपास सांगण्याची गरज नाही? कायदा शिकऊ नका तुझ्या विरुध्द वरिष्ठ कार्यालयात अर्ज करून आम्ही आत्ता तुझी नोकरीच घालवतो तुला व तुझ्या साहेबांना खोट्या गुन्ह्यात अडकवतो अशी धमकी देऊन पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांच्या अंगावर अचानक धावून जात त्यांना जोरदार मारहाण केली. यावेळी मध्यस्थीस गेलेल्या दोन पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनाही मारहाण करून त्यांनाही जखमी केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशोकनगर येथील अल्पवयीन मुलगी बेपत्ता प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे करत असताना या अल्पवयीन मुलीबाबत खात्रीशीर माहिती समजली की, अपहृत मुलगी ही पुणे येथे आहे. त्यावरुन तात्काळ पोलीस उपनिरीक्षक सुरवाडे हे पोलीस नाईक किरण पवार, पोलीस कॉन्स्टेबल तुषार गायकवाड हे खाजगी वाहनाने दि. 10 मे 2022 रोजी पुणे येथे तपासकामी गेले. या तपासात अपहृत मुलगी पुण्यात होती. परंतु ती चंदननगर पुणे येथून राहते ठिकाण सोडून निघून गेल्याची माहिती मिळाली म्हणून दि. 12 मे 2022 रोजी सकाळी पोलिस पुन्हा श्रीरामपूरला येत असताना माहिती मिळाली की, अपहृत मुलगी ही आरोपीसह शिर्डी येथे आहे.तसेच सदर मुलगी शिर्डी येथे असल्याचे तिच्या पालकांना माहीती मिळाली. सदरची मुलगी तिच्या पालकांच्या संपर्कात आली होती.त्यानुसार शिर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांना सदर मुलीचा शोध लवकर व्हावा म्हणुन अपहृत मुलीचा फोटो पाठविले तसेच मुलीचे नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक त्यांचे व्हाट्सअप वर शेअर करुन त्यांचा एकमेकांचा संपर्क करुन दिला. त्यानंतर सपोनि संभाजी पाटील यांनी सदर अपहृृत मुलीचा शोध शिडी परिसरात समाज मंदिर हॉटेल गोल्डन जवळ, हॉटेल गोडीया आणि नगरपालीका पाकिंग नंबर 02 या ठिकाणी शोध घेतला ती मिळुन आली नाही; परंतु सदर मुलगी साईबाबा मंदिराचे गेट नं 04 जवळ तिचे रावसाहेब यांना मिळून आली तेव्हा तिला शिर्डी येथून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे घेऊन आले. त्यावेळी अपहृत मुलीसोबत आरोपी हा मुलीला शिर्डी शहरात सोडुन पळुन गेला असल्याचे सांगण्यात आले.त्यानंतर रावसाहेब म्हैसमाळे, दिनांक 12 मे 2022 रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे मुलीला घेऊन आले. काल दि. 12 मे 2022 रोजी 12 वाजण्याच्या सुमारास सदर गुन्ह्यातील अपहृत मुलीस पोलीस संगणकावर तिचा जबाब नोदविण्याचा कार्यवाही करित असतांना सोबत आमच्या कक्षात अपहृत मुलीची आत्या देखील बसलेल्या होत्या. अचानक विद्युत पुरवठा बंद झाला त्यावेळी विजय बडी, त्याची पत्नी दीपाली विजय बडी, ओंकार भरत गायकवाड, पवनसिंग केशवसिंग असे आमच्या कार्यालयीन कक्षासमोर आले. तेव्हा विजय बडी हा म्हणाला की, वैद्यकीय तपासणी तुम्ही का करत नाहीत.पोलीस उपनिरतीक्षक समाधान सुरवाडे यांनी सांगितले की वीज गेली असुन वैद्यकीय तपासणी बाबत मेमो प्रिंट काढली की लगेच मेडीकलला पाठवतो, परंतु विजय बडी म्हणाला की, तुम्ही पोलीसांनी आत्तापर्यंत काय झक मारली? तुम्ही आरोपी आत्तापावेतो का पकडला नाही? तुम्हाला समजत नाही का? आत्तादेखिल निष्कारण आमचा वेळ वाया घालवता, तुझ्या विरुध्द वरिष्ठ कार्यालयात तक्रार करुन आम्ही आत्ता तुझी नोकरीच घालवतो. तुला व तुझ्या साहेबांना खोट्या गुन्ह्यात अडकवतो अशी धमकी देत विजय गुलाब बडी, ओकार भरत गायकवाड, पवनसिंग केशवसिंग यांनी अरेरावी करुन, हात बुक्क्यांनी मारहाण करत आमचे सरकारी कामात अडथळा आणला.पोलीस नाईक सोमनाथ गाडेकर, पोलीस शिपाई भारत तमनर, महिला पोलीस शिपाई योगिता निकम महिला पोलीस शिपाई सरग, तसेच पोलीस ठाणे अंमलदार आलम पटेल, पोका पोपट भोईटे, तसेच सुनिल मुथ्था व सुभाष जंगले यांनी आमचे कक्षाचे समोर येऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेताना पोलीस नाईक गाडेकर त्यांना देखील धक्काबुक्की केली त्यामध्ये त्यांचे हातास देखील दुखापत झाली.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान अशोक सुरवाडे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी विजय गुलाब बडी, ओकार भरत गायकवाड, पवनसिंग केशवसिंग यांचेविरुध्द भादंवि कलम 353, 332, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोले प्रतिनिधी-अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांचे चारा कापण्याचे यंत्र चोरी करणार्‍या टोळीला अकोले पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून 1 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.मागील काही दिवसांपासुन अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांच्या मिल्कींग मशीन तसेच चारा कापण्याचे यंत्राचे (कुट्टी मशीन) इंजिन चोरी जाण्याचे प्रकार वाढले होते. चैत्यनपूर परिसरातून एका शेतकर्‍याची 20 हजार रुपये किमंतीचे मिल्कीग मशिन चोरी गेल्याची तक्रार अकोले पोलीस स्टेशनला दाखल झाली.या चोर्‍यांना आळा घालण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस कर्मचार्‍यांसह जावून चोरी गेलेले मिल्कींग मशिन हे तुषार बद्रीनाथ गवांदे, बबन सयाजी मांदळे (दोन्ही राहणार चैतन्यपुर, ता. अकोले) यांचेकडे मिळुन आले. त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.त्यांचे साथीदारा बाबत विचारपुस केली असता त्यांनी मयुर रामदास महाले, दौलत साहेबराव महाले (दोन्ही रा बेलापुर, ता. अकोले) यांचे नावे कळवुन यांचे मदतीने चोरी केल्याची कबुली दिल्याने वरील चारही इसमांना नमुद गुन्ह्यात अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना बुधवार पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांच्याकडून 20,000/- रुपये किमंतीचे स्वंयचलित मिल्कींग मशिन (दुध काढण्याचे मशिन), 24,000/- रुपये किमंतीचे 4 कुट्टी मशीनचे इंजिन तसेच सदर चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या 50,000/- रुपये किमंतीची बजाज प्लॉटिना मोटार सायकल नंबर एम एच 17 सी एस 2836, 45,000 रुपये किमंतीची स्प्लेंडर मोटार सायकल नंबर एम एच 17 सी पी 6343 असा एकुण 1,39,000/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील व अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांचे मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि मिथुन घुगे, पोउपनिरी भुषण हांडोरे,व अकोले पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोना किशोर तळपे, पोना विठ्ठल शेरमाळे, पोकॉ सुहास गोरे, पोकॉ सुयोग भारती, पोकॉ अविनाश गोडगे, पोकॉ आत्माराम पवार, यांनी केली असुन पुढील तपास पो. ना. किशोर तळपे व पो.ना. विठ्ठल शेरमाळे हे करत आहे.


श्रीरामपूर (प्रतिनिधी ) - महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे अशा महामानवांनी समाजात समतेचा विचार रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यानुसारच बौद्ध सेवा संघाचे कार्य देखील समाजासाठी दिशादर्शक आहे. आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये या कार्याची नितांत आवश्यकता आहे असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केले.येथील बौद्ध सेवा संघ या सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या अठरा वा वर्धापन दिन व त्यानिमित्ताने आयोजित समाजरत्न पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर तांबे बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार लहू कानडे होते.

प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने, शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, मुख्याध्यापक संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भागचंद औताडे, जिल्हा बँकेचे माजी व्यवस्थापक नानासाहेब रेवाळे, एडवोकेट रावसाहेब मोहन यांची उपस्थिती होती.आमदार डॉक्टर तांबे पुढे म्हणाले कि आज समाजामध्ये दुही निर्माण करण्याचे प्रयत्न काही घटक करीत आहेत. परंतु पुरोगामी चळवळीतील चांगल्या विचारांची माणसं आजही कार्यरत आहे. बौद्ध सेवा संघाचे अध्यक्ष प्रताप देवरे व त्यांचे सहकारी हे देखील समाजपरिवर्तनाचे मोलाचे कार्य करीत आहेत असे सांगून त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.आमदार लहू कानडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितले कि हा देश एकसंघ रहावा याकरता घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात योग्य अशी तरतूद केलेली आहे. इंग्रजांनी अनेक वर्षे देशावर राज्य केले. पण ते गेल्यावर राज्यघटनेने सर्वांना न्याय देण्याचे काम केले. बौद्ध सेवा संघाच्या कार्याला आपले नेहमी सहकार्य राहील असे ही ते म्हणाले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, सत्कार मूर्ती यांच्या वतीने शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण, रयत बँकेचे माजी चेअरमन गोरक्षनाथ बनकर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.बौद्ध सेवा संघातर्फे याप्रसंगी समाजातील विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण कार्य करणारे मान्यवर सर्वश्री आप्पाजी मोहन, विश्वनाथ बोकफोडे, सलीमखान पठाण, गोरक्षनाथ बनकर, सुगंधराव इंगळे, सुरेश चौदंते,अंकुश कानडे,कार्लस साठे, डॉ. वसंत जमदाडे, बाळासाहेब वैद्य, डॉ. राजेंद्र लोंढे, प्रा.शिवाजी पंडित, शेख अहमद जहागिरदार, महेंद्र त्रिभुवन, सुभाष तोरणे, छगन बनकर, श्रावण भोसले, प्रकाश माने, अशोक दिवे, सरिता सावंत, वैशाली अहिरे, सुरेश देवकर, विजय शेलार, दीपक कदम, दिलीप सोनवणे, श्रीकांत मोरे, विनोद वाघमारे आदींना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बौद्ध सेवा संघाचे दिवंगत सरचिटणीस दादासाहेब साठे यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयांना देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमास तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक, माऊली मुरकुटे, अशोक बागुल, संतोष मोकळ, उद्योगपती जितेंद्र तोरणे ,मिलिंदकुमार साळवे, सुभाष गोरे,के टी निंभोरे,ल बा कोल्हे, शब्बीर शेख, सुभाष गायकवाड, गौरव देवरे, मनिष पंकमुज, पास्टर अमोलिक, अविनाश काळे, बबन जोर्वेकर, सूर्यकांत अग्रवाल, माजी नगरसेविका मंगल तोरणे, प्रतिभा देवरे, विमल मोहन, विजय बोरडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रताप देवरे, सूत्रसंचालन प्रा शशिकांत बनकर तर आभार चंद्रकांत मगरे यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौद्ध सेवा संघाचे संस्थापक प्रताप देवरे, प्रकाश खैरे, चंद्रकांत मगरे, मच्छिंद्र धनसिंग, श्रीराम मोरे, भाऊसाहेब सोनवणे, छायाताई सोनवणे, देविदास पंडित, लक्ष्मण मोहन, सुगंधराव इंगळे, प्रकाश सावंत, दिलीप प्रधान, अशोक दिवे, वसंत साळवे, सुभाष तोरणे यांनी प्रयत्न केले.




श्रीरामपूर प्रतिनिधी-आज दि. 09/05/2022 रोजी  संदिप मिटके Dysp  श्रीरामपूर यांना राहुरी तालुक्यातील गुहा येथील एक महिला आरोपी पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे असे खात्रीशिर बातमी मिळाली. त्याप्रमाणे Dysp संदिप मिटके  यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन गुहा येथे बनावट ग्राहक पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन तीन पिडीत परप्रांतीय महिलांची सुटका केली असून एक महिला आरोपी विरुध्द राहुरी पोलीस स्टेशन गु.र.क्र. 388/2022 अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम कलम 3,4,5,7,8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील विशेष बाब म्हणजे सदर वेश्याव्यवसाय हा गुहा गावातील भर मध्यवस्तीत सुरू होता  व त्याची माहिती गावातील नागरिकांना नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या कारवाईमुळे Dysp संदीप मिटके आणि pi दराडे यांच्या पथकाचे गावातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक  स्वाती भोर,  यांचे मार्गदर्शनाखाली  Dysp संदीप मिटके, PI दराडे, Psi बोकील, Asi  राजेंद्र  आरोळे, HC औटी, HC  जायभाये, लक्ष्मण बोडखे,  PN विकास साळवे, पो. कॉ. नितीन शिरसाठ,  पो. कॉ. आजिनाथ पाखरे, रविंद्र कांबळे, म.पो.कॉ. तृप्ती गुणवंत आदींनी केली.


अहमदनगर प्रतिनिधी-सोलापूर रोडवरील केदारी वस्ती परिसरातून अपहरण झालेल्या आठ वर्षीय मुलाचा 24 तासांत शोध घेऊन त्याला सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी केली. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. नागेश चंद्रभान भिंगारदिवे (वय 35 रा. दरेवाडी, ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचे तपासात समोर आले आहे.अहमदनगर- सोलापूर रोडवरील केदारे वस्ती येथून अश्विन या आठ वर्षीय मुलाचे रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी आश्विनच्या वडिलांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. अहमदनगर शहरातील स्टेट बँक चौकातून अपहरण करणारा संशयित नागेश चंद्रभान भिंगारदिवे याला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मुलाचे अपहरण केल्याची कबुली दिली.तसेच पोलीस कारवाईच्या भीतीने त्याने सदर मुलाला अहमदनगर रेल्वे स्टेशन वरून एका रेल्वेमध्ये बसवून दिल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली. पुणे रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही पुण्याला रवाना झाले. सोमवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे रेल्वे स्थानकावरून अपहरण झालेल्या मुलाला ताब्यात घेतले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या मुलाला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.घरगुती वादातून नातेवाईकानेच हा प्रकार केल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच गुन्ह्यात मदत करणार्‍या आरोपीच्या एका नातेवाईकालाही या गुन्ह्यात वर्ग करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, दिनेश मोरे, संदीप घोडके, देवेेंद्र शेलार, शंकर चौधरी, विशाल दळवी, दीपक शिंदे, रवी सोनटक्के, रोहित येमुल, चंद्रकांत कुसळकर आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.


श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर शहरातील लक्ष्मीनारायणनगर, वॉर्ड नं. 1 या ठिकाणी एका तरुणाने आपल्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापून साजरा केला. याबाबतची माहिती मिळताच वाढदिवस साजरा करणारा तरुण व ज्याची तलवार आहे तो तरुण अशा दोघांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे, पोलीस नाईक किरण पवार, पोलीस कॉन्स्टेबल नरोडे, पोलीस कॉन्स्टेबल दुर्गळे, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र पवार, पोलीस कॉन्स्टेबल रमीजराजा रफीक आत्तार हे शहरात गस्त घालत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बोरसे यांना माहिती मिळाली की, सोशल मीडिया व्हाट्सअप ग्रुपवर एकजण तलवारीने केक कापत असताना दिसत होता. याबाबतची माहिती घेतली असता शहरातील लक्ष्मीनारायणनगर, वॉर्ड नं. 1 येथील ऋषिकेश सुनील गडाख असे नाव असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पोलीस ऋषीकेश गडाख याच्या घरी जावून या व्हीडिओबाबतची विचारपूस केली असता ही तलवार माझ्या वाढदिवसाला माझा मित्र प्रशांत शिवाजी भोसले (रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर) याने आणली होती. त्यानुसार पोलीस ऋषिकेश गडाख याला घेऊन शिरसगाव येथे प्रशांत भोसले याच्या घरी गेले. त्यास व्हीडिओमध्ये वापरलेल्या तलवारीबाबतची विचारपूस केली असता त्याने सदरची तलवार माझ्या घरातच आहे.असे सांगितले व सदरची तलवार घरातून काढून दिली. सदरची तलवार 1 हजार रुपये किंमतीची असून तिची लांबी मुठीसह 2 फूट 9 इंच लोखंडी मुठ, पुढील धारदार टोक अशा वर्णनाची ही तलवार मिळून आली. सदरची तलवार पोलिसांनी जप्त केली आहे.दि. 7 मे 2022 रोजी रात्री 8.15 वा. इंदिरानगर, शिरसगाव हद्द, अशोकनगर भागात प्रशांत शिवाजी भोसले याने विनापरवाना बेकायदेशीररित्या तलवार बाळगतांना आढळून आला व त्याचा मित्र ऋषिकेश सुनील गडाख याने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापला असून या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल रमीजराजा रफीक आत्तार यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. सेकंड 317/2022 प्रमाणे प्रशांत भोसले, ऋषिकेश गडाख यांचेविरुध्द आर्म अ‍ॅक्ट 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरण पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बोरसे हे करत आहेत.


संगमनेर प्रतिनिधी-अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने 10 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.संगमनेर परिसरातील एका अल्पवयीन मुलीला संतोष अशोक वाडेकर (रा. लक्ष्मीनगर, संगमनेर) याने फुस लावून पळवून नेले. याबाबत सदर मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. आर. पाळंदे यांनी केला. यामध्ये सदर आरोपीने मुलीला दमण येथे नेले होते. तिथे तो मानलेल्या बहिणेकडे राहिला. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणाहून दोघांना ताब्यात घेत संगमनेर येथे आणले.सदर पिडीत मुलीचा पोलिसांनी जबाब घेतला. त्यामध्ये आरोपी संतोष वाडेकर याने सदर मुलीला बळजबरीने पळवून नेले. प्रथम ते वणी येथे गेले. तेथे बनावट मंगळसुत्र घेवून पिडीतेच्या गळ्यात घातले. वणी येथून नाशिक येथे घेवून आला व नाशिकहून दमण येथे घेवून गेला. दमण येथे आरोपीने मानलेली बहिण हिचेकडे पिडीत मुलीला 3 ते 4 दिवस तिच्या खोलीत ठेवले. तेथेच आरोपीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.या जबाबावरुन सदर आरोपीविरुद्ध वाढीव कलम 362, 366 (अ), 376 (2) (क) (एन) लावण्यात आले. तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम 5(8) 6, तसेच पिडीता अनुसूचित जाती-जमातीची असल्याने अनुसूचित जाती जमाती प्र. का. क 3(1), (12),3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पाळंदे यांनी केला. गुन्ह्याचे अंतिम दोषारोपपत्र राकेश ओला यांनी दाखल केले.सदर खटला अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. कदम यांच्या पुढे चालला. सदर खटल्यात एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षीदारांची साक्षी पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड संहिता कलम 363 नुसार 5 वर्षे शिक्षा व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 4 महिने साधी कैद, 376 (2) नुसार 10 वर्षे शिक्षा व 4 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद, 376 (2) (एन) नुसार 10 वर्ष शिक्षा व 4 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा कलमानुसार 10 वर्षे शिक्षा व चार हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 9 महिने कैद. या सर्व शिक्षा आरोपीने एकत्रित भोगावयाच्या आहेत, असा निकाल न्यायालयाने दिला.


शिर्डी प्रतिनिधी-शिर्डी शहरात अवैध गुटख्याची चोरून विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून शिर्डी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सुमारे 2 लाख 39 हजार 580 रुपयांच्या मुद्देमालासह एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी दिली.नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना शहरातील एका गोडाऊनमध्ये गुटख्याचा अवैध साठा असल्याची माहिती खबर्‍याकडून मिळाली. तसेच त्या गुटख्याबरोबरच मध्यप्रदेशातून हत्यारे पाठवली जातात आणि त्याची विक्री केली जाते, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक दातरे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी धडक दिली. पथकाला खोलीच्या झडतीत ठिकाणी गुटखा, सुगंधी तंबाखू, पानमसाला मिळून आले.याठिकाणी राहाणार्‍या आयुष सुनील कशीष (वय 19) रा.राजमोहला कॉलनी, इंदोर मध्यप्रदेश यास ताब्यात घेऊन अधिक झडती घेतली असता त्याच्या खोलीतून देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतुस मिळून आले आहे. पोलिसांनी हस्तगत केलेल्या मालात विविध कंपन्यांचे गुटखा व पानमसाल्यासह विना नंबरची पांढर्‍या रंगाची दुचाकी आणि देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुस असा एकूण 2 लाख 39 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गु.र. नं.204/2022 प्रमाणे आयुष सुनिल कशीष, आशिष अशोकलाल खाबिया, (रा.साईसावली निवास, गोवर्धन नगर, शिर्डी), अभय रामेश्वर गुप्ता (रा.इंदोर) यांच्याविरोधात भादंवि कलम 188,272,273,328 सह अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 आणि त्याखाली नियम 2011 चे कलम 26 (2) (4) सह भारतीय हत्यार कायदा 3 (25) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अभय गुप्ता हा पसार झाला असून दोघांना अटक करण्यात आली. पुढील तपास सहा पोलीस निरिक्षक दातरे करत आहे.


श्रीरामपूर प्रतिनिधी - राज्यभरात  चालू असलेले भोंगा प्रकारा मुळे श्रद्धे पोटी देवदर्शना साठी येणाऱ्या भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.या करिता मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदनदेण्यात आले या निवेदनात श्रीक्षेत्र शिर्डी येथील ओराईबाबांची पहाटेची काकडआरती व शेजआरती, तसेच श्रीक्षेत्र पंढरपुर येथील श्रीविठ्ठल मंदिराची दैनंदिन आरती गेल्या दोन दिवसांपासून जनीक्षेपकांवरून करण्याचे बंद करण्यात आलेले आहे श्रीक्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या मोठी आहे. श्रीसाईबाबांवरील श्रद्धेपोटी दूर अंतरावरून पाया भाविकांची गैरसोय होतु नये, तसेच अवघ्या महाराष्ट्राटे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपुर येथील श्रीविठ्ठल चरणी नतमस्तक होणासाठी येणाऱ्या वारकरी व भाविकांचा ओघ लक्षात घेता या दोन्हीही तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी दैनंदिन आरतीचा भक्तजणांना लाभ व्हावा व गैरसोय दुर हावी म्हणून परंपरेनुसार ध्वनीक्षेपकाद्वारे करण्यात येणारी दैनंदिन आरती यापुढेही ध्वनीक्षेपकावरून चालु ठेवण्यारा यावी. हे दोन्हीही तिर्थक्षेत्र लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व प्रेरणास्त्रोत आहेत. तसेच श्रीसाईबाबा व श्रीविठ्ठल-रुमीगी है दोन्हीही दैवत राष्ट्रिय एकात्मतेची प्रतिक मानली जातात. परंपरेनुसार ध्वनीक्षेपकाद्वारे आरती सुरू असतांना असंख्य भाविक मनोमन भक्तीभावाने सहभागी होवून, आहे त्या ठिकाणावरून परनेश्वराप्रती आपली श्रद्धा व्यक्त करीत असतात. भाविक भक्तांचा तो अधिकार ध्वनीक्षेरकांमुळे संपुष्टात येवु नये, यासाठी दोन्हीही तिर्थक्षेत्राचे ठिकाणी परंपरेनुसार होणारी आरती यापुढेही छनी वोपळांवरुनच करण्यात यावी, याबाबत आमच्या भावना लक्षात घेवुन प्रशासनाने योग्य ती दखल घेवुन कार्यवाही करावी अशी मागणी  श्रीरामपूर मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली या वेळी अहमदभाई जहागीरदार,मुक्तारभाई शाह,महेबूबभाई कुरेशी ,कलीम भाई कुरेशी ,रियाजखान पठाण ,यासिनभाई सय्यद ,रमजानशाह हैदरशाह,अहेमद शाह  सिकंदर शाह ,रहिमभाई शेख ,फयाज जब्बार कुरेशी ,रज्जाकभाई पठाण ,ताराचंद रणदिवे ,राहुल काशिनाथ लिहिणार ,शेख बदर बनेसाहब ,शाह अकबर वजीर सह मुस्लिम जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. 


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget