September 2020

अहमदनगर: नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याचा तत्कालीन निरीक्षक व सध्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला वादग्रस्त पोलीस अधिकारी विकास वाघ याच्याविरोधात अखेर मंगळवारी (दि.29) तरुणीचा छळ करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी नगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक विकास वाघ याच्या शोधासाठी दोन पोलीस पथके रवाना केली असल्याचे कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी सांगितले. 2019 मध्ये तक्रार देण्याच्या निमित्ताने कोतवाली पोलीस ठाण्यात आलेल्या 26 वर्षीय तरुणीशी वाघ याने ओळख वाढविली. काही दिवसानंतर वाघ हा पीडित तरुणीच्या घरी गेला. तेथे तिच्या असाह्यतेचा फायदा घेऊन रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून वाघ याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. यावेळी तरुणीने प्रतिकार केला तेव्हा वाघ याने तिला कंबरपट्ट्याने जबर मारहाण केली. तसेच ही बाब कुणाला सांगितली तर तुझे कुटुंब संपवून टाकील  अशी धमकी दिली. त्यानंतर वाघ याने पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केला. पीडित तरुणी गरोदर राहिल्याची बाब वाघ याला समजल्यानंतर त्याने 26 सप्टेंबर 2019 रोजी तिला तो राहत असलेल्या बंगल्यावर नेऊन मारहाण करत जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या. या त्रासाला कंटाळून पीडितेने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला. ही बाब वाघ याला समजल्यानंतर त्याने पीडितेला एमआयडीसी परिसरात नेऊन धमकी दिली तसेच तिच्या कोऱ्या स्टॅम्प पेपरवर स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यानंतर 11 सप्टेंबर 2020 रोजी वाघ याने पीडितेला जबरदस्तीने नगर तालुक्यातील मिरावली पाडावर नेऊन तेथेही तिच्यावर अत्याचार करीत जिवे मारण्याची धमकी दिली. असे याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत पिडीत तरुणीने म्हटले आहे. तरुणीच्या फिर्यादीवरून वाघ याच्याविरोधात बलात्कार, मारहाण, जबरदस्तीने गर्भपात आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ज्या ठाण्यात निरीक्षक तेथेच दाखल झाला गुन्हाविकास वाघ कोतवाली पोलीस ठाण्यात निरीक्षक असताना विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरला होता. त्याचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आणि नगर येथील नाजूक प्रकरण गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरले होते.

श्रीरामपूर :-(प्रतिनिधी) असोसिएशन च्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी बरकत अली शेख यांची निवड असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. चंद्रजीत यादव (यु. पी.) व राष्ट्रीय महासचिव उबेद शेख (दिल्ली) व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमीर खान (मुंबई) यांच्या नेतृत्वाखाली भारत भर गरुड झेप घेत असलेल्या भारतातील प्रत्येक राज्यातील प्राइवेट कर्मचारी यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहणाऱ्याअखिल भारतीय प्राइवेट कर्मचारी कल्याण असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदावर सा. राजनीती समाचार चे संपादक व महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.बरकत अली शेख यांची निवड झाली असून राष्ट्रीय महासचिव उबेद शेख (दिल्ली )व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमीर खान (मुंबई) यांनी या बाबतचे नियुक्ती पत्र प्रदान केले.

        शेख यांच्या निवडीबद्दल अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यातून ॲड.हाजी मन्सूर भाई जागीरदार, ॲड.दारूवाला,

ॲड.शफीक शेख, ॲड.मुजीब शेख, ॲड. आरिफ शेख,

डॉ. मुकुंद शिंदे, डॉ.रवींद्र पांडे, डॉ.मुस्ताक निजामी, विलासराव पठारे, किशोर गाढे,बी. के. सौदागर, शेख फकीर मोहम्मद, अमीरभाई जागीरदार,सुभाषराव गायकवाड, उस्मानभाई शेख, मन्सूर पठाण, वाहाब खान, अनिल देवरे, सूर्यकांत गोसावी, सुखदेव केदारे, राजमोहम्मद शेख, कॉ. सुरेश पानसरे,अन्वर पठाण, रवींद्र केदारे,जावेद भाई शेख,शब्बीर कुरेशी,अक्रम कुरेशी,

कोपरे पाटील, गुलाब वायरमन, शकील शेख,जैनुद्दीन सय्यद, रमेश शिरसाठ,हाजी शकीलभाई शेख, इब्राहिम भाई शेख, राहुल गायकवाड, सदाभाऊ मोरे, लक्ष्मण साठे, अमजद शेख, नसीर शेख, जफर पठाण,हनीफ शेख, दस्तगीर शाह,सज्जाद पठाण, आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

श्रीरामपूर -(प्रतिनिधी) क्रांतिवीर शहीद भगतसिंग यांच्या जयंती निमित्त विद्रोही सांस्कृतिक चळवळ यांच्या वतीने शहरातील बाजारतळ येथील बजरंग ग्रुप येथे शहीद भगतसिंग यांना अभिवादन करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी क्रांतिवीर भगतसिंग ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड श्रीकृष्ण बडाख,  वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रकाश सावंत, विद्रोही विद्यार्थी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल सोनवणे, भानुदास धनवटे, भाऊसाहेब धोत्रे,  संतोष त्रिभुवन यांनी क्रांतिवीर भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून क्रांतिकारी अभिवादन केले.  यावेळी परिसरातील विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. 

अभिवादन सभेला संबोधताना कॉ. श्रीकृष्ण बडाख म्हणाले की, पारतंत्र्यात असताना मार्क्स च्या विचारांवर निष्ठा असलेला नवजवान क्रांतिवीर देशप्रेमी युवक भगतसिंग यांनी देश स्वातंत्र्य साठी इंग्रजांनी इथून चालते व्हावे म्हणून सशस्त्र संघर्ष केला. भगतसिंगचा लढा साम्राज्यशाही विरोधात तर होताच शिवाय तो देशातील सरंजामदारी, जातियवादाच्या विरोधात देखील  हो. तो  भारतीयांच्या समतेसाठी, भयमुक्त व सन्मानपुर्ण जीवनाच्या निर्मीतीसाठी होतायाचं कारण भगतसिंगाचा व्यापक दृष्टीकोन आहे,  त्यांनी सशस्त्र क्रांती केली. एक वैज्ञानिक विचारधारा असलेले भगतसिंग यांच्या विचारातील स्वातंत्र्य आजही मिळालेलं नाही.  शहीद भगतसिंग यांना अभिप्रेत असलेले स्वतंत्र श्रमिक, कामगार, शेतकरी यांना मिळालेले नाही. सत्तेच्या माध्यमातून भांडवलशाही राजवट आलेली आहे. यात बदल घडवून आणण्यासाठी वंचितानी शिक्षित होवून कलमक्रांती घडवून आणण्याची आज गरज आहे. हीच खरी शहीद भगतसिंग यांना आदरांजली ठरेल.  यावेळी अमोल सोनावणे यांनी क्रांतिकारी गीते सदर केली. तर आभार भानुदास धनवटे यांनी मानले. 



श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )- अनेक जण आपला वाढदिवस पार्टी देवुन मोठ मोठ्या हाँटेलमध्ये साजरा करतात पण श्रीरामपुरातील एका अवलीयाने आपला वाढदिवस चक्क वृध्दाश्रमात जावुन साजरा केला या अवलीयाचे नाव आहे तहसीलदार प्रशांत पाटील श्रीरामपुरचे तहासीलदार प्रशांत पाटील यांचा वाढदिवस मोठ्या डामडौलात मोठ्या हाँटेलात साजरा होईल असे कुणालाही  वाटणे सहाजिकच आहे पण सामाजिक कार्याची जाण असणारे प्रशांत पाटील  यांनी आपला वाढदिवस चक्क श्रीरामपुर येथील माऊली वृध्दाश्रमात जावुन  वृध्दांना मिठाई देवुन तसेच वृध्दाश्रमाला आर्थिक मदत देवुन तेथील वृध्दांचे आशिर्वाद घेवुन साजरा केला.श्रीरामपुर येथील सुभाष दशरथ वाघुंडे हे स्वखर्चाने माऊली वृध्दाश्रम या नावाने वृध्दाश्रम चालवतात या वृध्दाश्रमात पाच आजोबा सहा आजीबाई एक किशोरवयीन

अनाथ मुलगा तीन पगारी सेवेकरी असे पंधरा जण राहतात सुभाष वाघुंडे यांनी वैयक्तिक सात लाख रुपये कर्ज काढुन  आपल्या छोटेखानी जागेत हा उपक्रम सुरु केलेला आहे  आपला आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यासाठी तहसीलदार प्रंशात पाटील वृध्दाश्रमात दाखल झाले तेथील वृध्दाश्रमाचे सुभाष वाघुंडे यांच्याकडून वृध्दाश्रमाची सविस्तर माहीती घेतली कोरोनामुळे सर्व नियमांचे पालन करुन वृध्दांना मिठाईचे वाटप केले अन वृध्दाश्रमास आर्थिक मदतही केली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  पत्रकार देविदास देसाई हे होते  या वेळी आजचा वाढदिवस आयुष्यातील अविस्मरणीय असुन आपले वरिष्ठ उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळेच कोरोना सारख्या कठीण परिस्थितीतही चांगले  काम करण्यासाठी  उर्जा मिळाली  असेही पाटील  म्हणाले या वेळी गोदामपाल शिवाजी वायदंडे किशोर छतवाणी विकी काळे भाऊसाहेब वाघमारे आण्णासाहेब पारखे सुनिल पारखे योगेश नागले अजिज शेख अरुण खंडागळे आदि उपस्थित होते    कार्यक्रमाचे प्रास्तविक चंद्रकांत झुरंगे यांनी केले तर माणिक जाधव यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रज्जाक पठाण यांनी केले.


प्रधानमंत्री १५ सूत्री कार्यक्रम नुसार केंद्र सरकार कडून अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रिक, प्री मेट्रिक शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती साठी आॅनलाईन अर्ज मागवणे सुरु आहे. अल्पसंख्यांक समाजातील  विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती चा लाभ घ्यावा असा अाहवान

श्रीरामपूर शहर व तालुका मुस्लीम आरक्षण अधिकार कृती समिती व 

मुस्लीम विकास ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक फहीम शेख यांनी केला आहे.

  मुस्लिम,बौद्ध,शीख,पारशी,जैन व इसाई या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून शिष्यवृत्ती दिली जाते. इ. पहिली ते दहावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना “पोस्ट मेट्रिक शिष्यवृत्ती” दिली जाते. या शिष्यवृत्ती अंतगर्त पहिली ते पाचवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक १००० रुपये तसेच इ. सहावी ते दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ५००० रुपये ची आर्थिक मदत दिली जाते. तसेच इ. अकरावी ते बारावी सहित ITI ,डिप्लोमा,पदवी व पदवीधर अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ६००० ये १२००० रुपये ची आर्थिक मदत “पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती”च्या स्वरूपात दिली जाते. याच बरोबर प्रोफेशनल व टेक्निकल अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २५००० ते ३०००० हजार रुपये ची आर्थिक मदत “मेरिट कम मीन्स शिष्यवृत्ती” स्वरूपात दिली जाते.

वरील सर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज मागवणे सुरु आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख “३१ ऑक्टोबर २०२०” आहे. अर्ज दाखल करण्यासाठी https://scholarships.gov.in/ या संकेतस्थळावर भेट द्या किंवा आपल्या शाळा/ महाविद्यालया च्या मुख्याधिपक किंवा प्राचार्य यांच्याशी संपर्क साधा.  अल्पसंख्यांक समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा असा आहवान श्रीरामपूर शहर व तालुका मुस्लीम आरक्षण अधिकार कृती समिती व 

मुस्लीम विकास ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष व

समाजसेवक फहीम शेख आणि सर्व सदस्य यांनी केला आहे


श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-शेतकर्याच्या अंगावर आलेले संकट घरासामोर बांधलेल्या गायीने शिंगावर घेतले त्यामुळेच ते शेतकरी कुटुंब बिबट्याच्या हल्ल्यातुन बालबाल बचावले आले अंगावर घेतले शिंगावर याचा प्रत्यय खानापुर येथील आदिक परिवाराला आला.खानापुर तालुका श्रीरामपुर येथील नविन गावठाण येथे हरिश्चंद्र भानुदास आदिक हे शेतकरी कुटुंब राहात आहे काल पहाटे एक ते दिड वाजण्याच्या सुमारास त्यांना बिबट्याच्या मोठमोठ्या  डरकाळ्या ऐकु येवु लागल्या आदिक कुटुंब  झोपेतुन खडबडून जागे झाले अन पहातात तर काय समोर चक्क दोन बिबटे आपापसात भांडत होते आदिक यांनी बँटरीचा उजेड करताच एक बिबट्या मागे सरकला परंतु दुसरा बिबट्या जागेवरच गुरगुरग होता एक बिबट्या निघुन गेल्यानंतर हरिश्चंद्र आदिक यांनी त्या बिबट्याला पहाण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांच्यावरच हल्ला केला योगायोगाने त्यांची गाय मधेच बांधलेली होती त्या गायीने बिबट्याला शिंगावर घेण्याचा प्रयत्न केला आमचा व गायीचा  हल्ला पाहुन बिबट्या मागे सरकला दोन बिबट्याच्या हल्ल्यात हा बिबट्या घायाळ झाला होता गाय व आदिक परिवाराने घेतलेल्या पावित्यामुळे घायाळ बिबट्या माघारी सरकला त्याच वेळी जोरदार पाऊस सुरु झाला दोन बिबटे पाहील्यामुळे आदिक कुंटुंब पुर्णपणे घाबरले होते त्यां

नी तातडीने आजुबाजुच्या नागरीकांना फोन केले आसपासचे नागरीक भर पावसातही मदतीला धावुन आले  तो पर्यंत जखमी झालेला बिबट्या पुर्णपणे घायाळ झालेला होता शरद रावसाहेब आसने यांनी धाडस करुनदोर बिबट्याच्या अंगावर टाकला काठीच्या सहाय्याने बिबट्याला ढकलले अन त्या दोराच्य सहाय्याने बिबट्याला जनावरा प्रमाणे खिडकीला बांधुन टाकले सकाळी वन अधिकारी आल्यानंतर त्यांनी जखमी बिबट्याला ताब्यात घेवुन त्याचेवर उपचार सुरु केले आहे हरिश्चंद्र भानुदास आदिक यांनु सांगितले की  आमच्याकडे एक गाय आहे चार वार्षापासुन ती दुधच देत नव्हती काहींनी तिला विकुन टाकण्याचा सल्ला दिला होता परंतु गाय कसायाला विकायची नाही असे आम्ही ठरविले अन आत्तापर्यत चार वर्ष त्या गायीचा सांभाळ केला अन त्याच गाईचे आमचा जिव वाचविला आमच्यावर आलेले संकट गाईने शिंगावर घेतले त्या गाईमुळेच आमचे कुटुंब सुरक्षित राहीले असल्याची प्रतिक्रिया आदिक यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.


बेलापुर (प्रतिनिधी  )- सर्व श्रेष्ठ दान म्हणजे देहदान नेत्रदान रक्तदान व कन्यादान आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन निश्चितच अनेकांना प्रेरणादायी ठरेल असे उदगार अध्यात्मिक समन्वय अघाडीचे जिल्हाध्यक्ष बबनराव मुठे   यांनी काढले  भारतीय  जनता पक्षाच्या श्रीरामपुर तालुका शाखेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्ताने बेलापुरातील जैन मंदिर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी मुठे बोलत होते  जेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन रक्तदान शिबीरास सुरुवात करण्यात आली या वेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे सुनिल मुथा जि प सदस्य शरद नवले अशोक कारखान्याचे संचालक  अभिषेक खंडागळे हे मान्यवर उपस्थित होते   या वेळी ३५   रक्तदात्यांनी रक्तदान केले विशेष म्हणजे भाग्यश्री व योगेश शिंदे या उभयंतानी रक्तदान केले पत्रकार विष्णूपंत डावरे यांच्या वतीने उपस्थितांना मास्कचे वाटप करण्यात आले या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनिल वाणी माजी तालुकाध्यक्ष अनिल भनगडे माजि शहराध्यक्ष मारुती बिंगले युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल यादव युवा मोर्चा चिटणीस विशाल अंभोरे  प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड दिलीप काळे  मारुती राशिनकर राम पौळ रविंद्र खटोड रविंद्र कोळपकर अरविंद शहाणे दिलीप दायमा किशोर खरोटे अरुण धर्माधिकारी  प्रसाद लढ्ढा  मुकुंद लबडे महेश खरात पप्पू कुलथे अक्षय कावरे विशाल गायधने  आदि उपस्थित होते जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने डाँ.दिलीप दाणे डाँ.विलास मढीकर श्रीमती धामणगावाकर त्रिवेणी माहुरे के पी यादव बाळासाहेब खरपुडे यांनी रक्तदानाचे काम चोख पार पाडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजपाचे शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे पुरुषोत्तम भराटे पप्पु पौळ सुरेश बढे ओमप्रकाश व्यास राकेश कुंभकर्ण सागर ढवळे महेश खरात रमेश अमोलीक आदिंनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पुरुषोत्तम भराटे यांनी केले तर प्रफुल्ल डावरे यांनी आभार व्यक्त केले.


बेलापूर : - ( प्रतिनिधी ) राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत देशभर महिला बाल विकास विभाग , आदिवासी विकास विभाग व आरोग्य विभागाच्या समन्वयातून पोषण माह साजरा करण्यात येत आहे. या अभियानास 7 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून 30 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व गावामध्ये पोषण आहार जनजागृती केली जाणार आहे.

       या मोहिमेअंतर्गत बेलापूर येथील अंगणवाडीसेविका उज्वला ढवळे यांनी त्यांच्या विभागातील मनिषा किशोर कदम या गरोदर मातेस मार्गदर्शन केले. यावेळी गरोदर मातेचा आहार घरचा ताजा सकस व पोषक असावा ,  मोसमी ताजी फळे , दूध , तूप , दही , पालेभाज्या , मोड आलेली कडधान्ये आदी पदार्थ  आहारात असावे. वेळेवर लसिकरण करून गोळ्याऔषधी वेळच्यावेळी घ्यावीत त्याचप्रमाणे गरोदर मातेची काळजी कशी घ्यावी आदी मार्गदर्शन केले. 

          हे अभियान गावातील प्रत्येक अंगणवाडीत अंगणवाडीसेविका , आशा वर्कर , आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी , कर्मचारी , सामाजिक कार्यकर्ते आदिंच्या समन्वयातून राबविण्यात येत आहे. यावेळी अंगणवाडीसेविका उज्वला ढवळे यांचेसह आरोग्य कर्मचारी ए.एन.एम.वंदना खरात , आशा वर्कर मीरा अमोलिक ,  मदतनीस श्रीमती शेलार आदी कर्मचारी उपस्थित होत्या.


श्रीरामपूर (प्रतिनिधी) नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेश आता पूर्ण होत आले असून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जासोबत बँक खाते व आधार कार्ड आवश्यक आहे. मात्र शहरांमध्ये पोस्ट ऑफिस वगळता इतरत्र कोठेही नवीन आधार कार्ड बनविण्याची सुविधा उपलब्ध नाही.त्यामुळे पालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, बँक कर्मचारी हे सर्वजण आधार कार्डच्या अपूर्ततेमुळे हवालदिल झाले आहेत. मात्र जनतेच्या या महत्त्वाच्या प्रश्नाकडे शासकीय प्रशासन किंवा लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांचे लक्ष नसल्याने पालक वर्गामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. पोस्ट ऑफिस मध्ये दररोज फक्त 20 जणांचे आधार तयार करण्याचे किंवा दुरुस्त करण्याचे काम केले जाते. त्यासाठी पहाटे पाच वाजल्यापासून नंबर लावून टोकन घ्यावा लागतो. तेथे एकच मशीन असल्याने जादा लोक घेतले जात नाही . त्यामुळे पोस्टामध्ये सुद्धा सर्वांचे समाधान होऊ शकत नाही . शासन पातळीवर आधार'ची सुविधा इतरत्र कोठेही उपलब्ध नाही . शिष्यवृत्तीचे फॉर्म भरण्यासाठी कालमर्यादा असल्याने जोपर्यंत पालक आधार नंबर आणि बँक खाते नंबर आणून देत नाही तोपर्यंत शिक्षकांना विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे फॉर्म भरता येत नाही . विद्यार्थ्यांचे बँकेत खाते उघडण्यासाठी देखील बँकांची टाळाटाळ सुरू आहे . त्यातच महत्त्वाचा आधार कार्डचा प्रश्न सुटल्याशिवाय पुढील बाबी शक्य नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यास शासनाने आता मुदतवाढ देण्याची मागणी पालक वर्गाने केली आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी, शहराच्या नगराध्यक्षा, नगरसेवक व इतर पक्षांचे पेपर छाप पुढारी या प्रश्नावर मात्र कोणीही बोलायला तयार नाहीत . त्यामुळे देखील जनतेमध्ये नाराजीची भावना पसरली आहे.तहसिलदारांनी आधार कार्ड केंद्रा बाबत लवकरात लवकर पावले उचलून शहरांमध्ये प्रत्येक वार्डामध्ये आधार केंद्र सुरू करावे अशी मागणीपालक वर्गाने केली आहे .

आधार कार्ड शिवाय मुलांचे शिष्यवृत्ती फॉर्म तसेच बँक खाते सुरु करणे शक्य नसल्याने आधार कार्ड काढण्याची सुविधा तातडीने उपलब्ध झाली पाहिजे. पालक वर्ग या कागदपत्रांची पूर्तता करीत नसल्याने विविध शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत .सलीमखान पठाण ,मुख्याध्यापक  नगर पालिका शाळा क्रमांक पाच.



शिर्डी (प्रतिनिधी) जय शर्मा / प्रशांत अग्रवाल. शिर्डी हे श्री साईबाबा मुळे आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असून येथे श्री साईबाबांवर श्रद्धा ठेवून श्री साईबाबा हॉस्पिटल मध्ये राज्यातून रुग्ण येत असतात ,येथे श्री साईबाबा नंतर डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप समजले जाते, मात्र अशा काही डॉक्टरांमध्ये एखादा रावणनही असू शकतो हे नुसतेच सिद्ध झाले असून शिर्डीतील साईबाबा सुपर हॉस्पिटल मधील डॉक्टर वैभव बबन तांबे ह्या डॉक्टराने एका अल्पवयीन मुलीवर तपासणीच्या नावाखाली विनयभंग केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे, या संदर्भात शिर्डी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे, या प्रकारामुळे शिर्डी व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे 

      शिर्डीत श्री साईबाबा हयात असताना श्री साईबाबांनी रुग्णसेवा केली, तसेच उदी प्रसाद देऊन अनेकांचे रोग बरे केले, तोच वारसा घेऊन शिर्डीत श्री साईसंस्थानने रुग्णालय थाटले आहेत, या रुग्णालयात साईबाबांवर श्रद्धा ठेवून शिर्डी व परिसराप्रमाणे जिल्ह्यातील व राज्यातील परराज्यातील रुग्ण उपचारासाठी येत असतात ,कारण हे श्री साईबाबांचे हॉस्पिटल आहे ,अशी सर्वांची श्रद्धा भावना आहे,येथिल हॉस्पिटलमधील डॉक्टरही ही एक देवाचे अवतार समजले जातात, मात्र  एका डॉक्टरने त्यास काळीमा फासण्याचा प्रयत्न केला आहे, डॉक्टर वैभव बबन तांबे  या डॉक्टराने येथे एक तरुणी उपचारासाठी आली असता तिला तपासणीच्या नावाखाली तिचा विनयभंग दिनांक 19/ 9 /2020  रोजी स,  3. 30 ते सांय 7.30 दरम्यान केला आहे व तशी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि,नं,1 627/2020 प्रमाणे भा,द,वि,

कलम 354 अ,ब,आणि बालकांचे लैंगिक शोषणाचे कलम  8/ 10 प्रमाणे गुन्हाही दाखल झाला आहे , घटनास्थळी  शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे तसेच सपोनि मिथुन घुगे  व सपोनि दातरे यांनीही भेट दिली आहे, या संदर्भात पोलीस अधिक चौकशी करत आहेत, दरम्यान या घटनेची चर्चा शिर्डी व परिसरात होताच मोठी खळबळ उडाली आहे, शिर्डी व परिसरातून या घटनेचा मोठ्या स्वरुपात निषेध करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे याच हॉस्पिटलमध्ये इतर रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी या घटनेचा निषेध केला आहे, शिर्डीतील हॉस्पिटल हे श्री साईबाबांचे हॉस्पिटल समजले जात असताना येथे मात्र अनागोंदी कारभार सुरू असलेला यावरुन दिसून येत आहे, कोरोणाच्या काळात राज्यातच नव्हे तर देशात ,जगात सर्व डॉक्टरांना देव दूत म्हटले जाते आहे,मात्र येथील एक डॉक्टर असे कृत्य करू शकतो, याचा कोणाला विश्वास बसणार नाही, मात्र असे आज रविवारी घडले आहे, शिर्डी संस्थानच्या हॉस्पिटलमध्ये असे काही डॉक्टर आहेत की त्यांची पदवी नसतानाही येथे या हॉस्पिटलमध्ये उच्च पदावर ते वशिल्याने जाऊन बसले आहेत , व त्यांच्या हाताखाली काम करणारे डॉक्टरही त्यांनाही हे माहीत असल्यामुळे तेही  असे प्रकार करत आहेत, येथे कोणालाही कोणाचा धाक राहिलेला नाही, या संदर्भात नागरिक तीव्र निषेध करत असून ही  विनयभंगाची घटना येथे मोठी दुर्दैवाची झाली आहे ,त्यामुळे एका डॉक्टरांनी केलेली ही चूक संपूर्ण हॉस्पिटल व श्री साईबाबा संस्थान कडेही बोट दाखवण्यासारखे होत आहे, त्यामुळे श्री साईबाबा संस्थान प्रशासनाने, व्यवस्थापनाने त्वरित या घटनेकडे लक्ष द्यावे व यापुढे असे प्रकार श्री साईबाबाच्या, संस्थांनच्या हॉस्पिटलमध्ये तरी घडू नये किंवा संस्थांनच्या कोणत्याही विभागात असा प्रकार होऊ नये, यासाठी अधिक काळजी व दक्षता यापुढे घेणे महत्त्वाचे ठरणार आहे, श्री साईबाबांची महती देश-विदेशात आहे ,शिर्डी चे नाव सर्व जगात, विश्वात पसरलेले आहे, त्यामुळे अशी घटना घडली गेली तर तिची चर्चा देशात, विदेशात होत असते,त्यामुळे  बदनामी होत असते,  यापुढे अशा घटना होऊ नये, म्हणून साईबाबा संस्थान व्यवस्थापनाने अतिदक्षता घेऊन प्रयत्न करणे  महत्त्वाचे आहे, असे शिर्डीकर व साईभक्त बोलत आहेत.


श्रीरामपूर (प्रतिनिधी ) कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येथील सहायता एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी तर्फे कोरोना जागरूकता अभियान व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिरात मालेगाव येथील तज्ञ डॉक्टरांचे पथक नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहे . तरी श्रीरामपूर शहर व तालुक्यातील जनतेने या  आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मुफ्ती रिजवानुल हसन यांनी केले आहे .

रविवार ते मंगळवार 20 ते 22 सप्टेंबर दरम्यान दररोज सकाळी अकरा ते पाच या वेळेमध्ये सदरचे आरोग्य तपासणी शिबिर संजय नगर जवळील ईदगाह मैदान शेजारी आयोजित करण्यात आले आहे . या शिबिरामध्ये ताप,सर्दी, खोकला, डोकेदुखी इत्यादी आजारांबाबत तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.गरजू रुग्णांना औषधे सुद्धा दिली जाणार आहेत.कोरोनाच्या काळामध्ये मालेगाव पॅटर्न कमालीचा यशस्वी झाला असून मालेगाव पॅटर्न मध्ये काम करणारे तज्ञ डॉक्टर्स हे आपल्या शहरात येऊन मार्ग दर्शन करणार आहेत. तरी या शिबीराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुफ्ती रिजवानुल हसन, हाजी जलील काझी, सलीमखान पठाण,साजीद मिर्झा, सोहेल बारूद वाला,डॉ. तौफीक शेख, डॉ. नाजीम शेख, डॉ. मतीन शेख, आदिल मखदुमी, महेबूब कुरेशी, फिरोज पठाण तसेच संविधान बचाव समिती, लब्बैक ग्रुप, गरीबनवाज फौंडेशन, उर्दू साहित्य परिषद,मिल्लत ए इब्राहिम ग्रुप, सुलतान नगर ग्रुप आदि संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


श्रीरामपुर (प्रतिनिधी  )- अधिकारी देखील माणूसच असतो अन त्या अधिकार्यातही माणूसकी दडलेली असते याचा प्रत्यय श्रीरामपुर तहसील कार्यालयात आलेल्या एका वृध्द महीलेला आहे                                  त्याचे झाले असे की वृध्द महीला पुरुषांना शासनाच्या विविध योजनेचे मानधन मिळत असते मात्र अनुदान सुरळीत सुरु ठेवण्यासाठी वेळोवेळी हयातीचे व इतर कागदपत्रे तहसील कार्यालयात जमा करावी लागतात संजय निराधार योजनेचा लाभ मिळत असलेली एक वयोवृध्द महीला तहसील कार्यालयात तळमजल्यावर बसलेली होती सकाळी नेहमी प्रमाणे तहसीलदार प्रशांत पाटील हे कार्यालयात आले जिन्याच्या पायर्या चढत असाताना त्यांची नजर त्या वृध्द महीलेवर गेली ही  महीला येथे आली म्हणजे हिचे नक्कीच तहसील कार्यालयात रेशन र्काडाचे काम असावे अशी शंका आली जिना उतरुन ते त्या आजीबाई जवळ आले अतिशय वयोवृध्द झालेल्या त्या महीलेस

तहसीलदार पाटील यांनी विचारले की आजी काय काम आहे त्यावर त्या आजीबाईंनी मला डोल मिळत आहे परंतु काही कागदपत्रे जमा नाही केली तर तो बंद होईल असा निरोप आल्यामुळे गावातुन आले  तहसीलदार पाटील यांनी तातडीने संजय गांधी निराधार योजनेचे काम पहात असलेल्या अधिकाऱ्यांस खाली बोलविले अन सर्व कागदपत्रांची पूर्तता बघुन घेण्यास सांगितले तो पर्यत पाटील हे तिथेच उभे राहीले त्या आजी बाईचे काम झाल्यावर तहसीलदार पाटील हे कार्यालयात जाण्यासाठी जिना चढु लागले तोच त्या आजी बाईंनी पुन्हा हाक मारली तहसीलदार पाटील यांना वाटले आणखी काही काम बाकी असेल म्हणून हाक मारली असेल ते पुन्हा त्या आजी बाई जवळ गेले व आस्थेने विचारले की तुमचे काम झाले का अजुन बाकी आहे आजी बाई म्हणाल्या काम तर झाले पण दोन चार रुपये दिले असते तर फार बरे झाले असते गावाकड जायला तहसीलदार पाटील यांनी आपल्या खिशातून पाचशे रुपयाची नोट काढुन त्या आजी बाईला दिली अन क्षणाचाही विचार न करता कार्यालयात गेले हे सर्व तिथे उभे असलेले नागरीक पहात होते एकाने त्या आजीबाई जवळ जावुन विचारले आजी तो माणूस कोण होता माहीती आहे का त्यावर आजी म्हणाली नाही कोण होता त्या व्यक्तीने सांगितले ते तालुक्याचे तहसीलदार प्रशांत पाटील आहे अन मग आजीबाईच्या डोळ्यात खळकन पाणी आले अन आजीबाई इतकच म्हणाल्या त्यांच्या रुपात माझा देवच आला होता मला मदत कराया.


 बेलापूर (प्रतिनिधी  )-  टी बस आता माल वहातुक सेवेतही दाखल झाली असुन एफ सी आय गोदामातुन शासकीय धान्याची पोती भरुन आता लाल परी जिल्ह्यातील शासकीय गोदामात धान्य घेवुन जाणार आहे         लाँक डाऊन काळात प्रवासी वहातुक बंद असल्यामुळे एस टी महामंडळ तोट्यात आले बस स्थानक ओस पडले  मग एस टी महामंडळाने वहातुक सेवा एस टी  महामंडळा मार्फत सुरु करण्याचा निर्णय घेतला अहमदनगर जिल्ह्यातही एस टी बसने माल वहातुक सुरु करण्यात आली आता शासकीय गोदामातही लालपरी धावणार आहे बसचा वरील टप कापुन त्यावर ताडपत्री टाकण्यात आली असुन आतील भाग बाकडे काढुन मोकळा करण्यात आला आहे आता एफ सी आय गोदामात लाल परीत शासकीय गहु तांदूळ भरला जात आहे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील गोदामात आता बसमधुन वहातुक केली जाणार आहे बसमधुन शासकीय  मालाची वहातुक सुरु झाल्यामुळे होणाऱ्या गैरप्रकाराला निश्चितच आळा बसेल यात शंकाच नाही.


मधुकर वक्ते कोपरगाव प्रतिनिधी.  कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावचे भुमिपुत्र तसेच जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कुल,डाऊच खर्द या स्कुल चे संस्थापक सचिव मा श्री सुनिल भास्करराव होन यांचा आज वाढदिवस, त्या निमित्ताने हा त्यांचा कार्याचा घेतलेला आढावा.ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरी माते मुळे पावन झालेल्या चांदेकसारे गावात एका सधन शेतकरी कुटुंबात सुनिल होन यांचा जन्म दि १८ सप्टेंबर रोजी झाला,प्राथमिक शिक्षण शिर्डी व पुढील शिक्षण चांदेकसारे व कोपरगाव येथुन पुर्ण केले.कुटुंबात समाजसेवेचा वारसा त्यांचे चुलते कै किसनराव नबाजी पा होन यांच्या कडुन मिळाला.शेतकर्याची व मोलमजुरी करणाऱ्या ची मुल शाळा,कॉलेज दुर असल्याने शिक्षणापासुन वंचित राहत होते . हिच गरज आेळखुन सुनिल भाऊ व त्यांच्या सहकार्यानी मिळुन २०१६ साली एक शैक्षणिक संस्था सुरु केली.आज या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातुन जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कुल , डाऊच खुर्द या ठिकाणी सुरु आहे.कोपरगाव चे आमदार श्री अशुतोष दादा काळे साहेब यांचे अत्यंत विश्वासु व निष्टावान  सहकारी आहेत.स्कुल च्या माध्यमातुन चांदेकसारे गावात आई तुळजा भवानी माता मंदिर येथे भाविकांना बसण्यासाठी बाकडे,तसेच भैरवनाथ जोगेश्वरी माता मंदिर येथे सी सी टिव्ही कॅमेरे तसेच ख्वाजापिर दर्गाचे तार कंपाउंड,इ कामे स्वखर्चाने केलेले आहे.सुनिल भाऊंच्या मार्गदर्शना खाली जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कुल च्या सर्व मुलांचा न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातुन मोफत विमा उतरविला आहे.असा विमा उतरवनारी जोगेश्वरी राज्यात पहिलीच स्कुल आहे.प्रत्येक राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक कार्यक्रमात सुनिल भाऊ चा प्रमुख सहभाग असतो.गरीब घरातील जर कोणी मयत झाले तर दशक्रिया विधी साठी ५० किलो साखर मोफत दिली जाते.कोरोना च्या पार्श्वभूमीवर सुनिल भाऊ च्या माध्यमातुन चांदेकसारे गावातील सर्व वैद्यकिय सेवा देणारे डॉक्टर,नर्स,अंगनवाडी सेविका यांना पी.पी.ई किट चे वाटप करण्यात आले.भैरवनाथ जोगेश्वरी उत्सव,उरुस,व सर्व जाती धर्माच्या कार्यक्रमाला सुनिल भाऊंचा सहभाग असतो.सगळयांना जोडुन ठेवायच्या स्वभावामुळे आज सुनिल होन यांच्या बरोबर असंख्य तरुण सहकारी जोडले गेलेले आहे.एका शेतकरी कुटुंबातुन येवुन जनमानसात आपली वेगळी ओळख खुपच कमी लोकांना बनवता येते.सुनिल होन यांनी आपले स्थान व दर्जा मागील बर्याच वर्षांच्या कामातुन अधोरेखित केले आहे.अशा या तरुन,तडफदार,युवा सेवकाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.



श्रीरामपूर - (प्रतिनिधी  )-केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय त्वरीत रद्द करुन शेतकर्‍यांच्या हिताचा निर्णय घेणे गरजेचे आहे. अन्यथा कांदा निर्यातबंदी झाल्यास शेतकर्‍यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. सध्या कोरोना महामारीमुळे शेतकरी वर्ग संकटात असतांना कांदा पिकातून मिळणारी थोडीशी आर्थिक ताकदही या निर्यातबंदीमुळे कमी होणार आहे. त्यामुळे कांदा निर्यातबंदीचा निर्णय रद्द करुन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.केंद्र शासनाने कांदा निर्यात सुरु ठेवावी, अशा मागणीचे निवेदन श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने प्रांताधिकारी अनिल पवार यांना देण्यात आले. यावेळी अ‍ॅड्.उमेश लटमाळे, अशोक बँकेचे संचालक नाना पाटील, पक्षाचे प्रतोद अभिषेक खंडागळे, ‘अशोक’ चे संचालक आदिनाथ झुराळे, व्यापारी असोसिएशनचे संचालक अमोल कोलते, प्रमोद करंडे आदी उपस्थित होते.केंद्र शासनाने घेतलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णय शेतकर्‍यांच्या हिताचा नसून शेतकरी वर्ग आर्थिक संकटात असतांना त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आगोदरच कोरोना महामारीमुळे शेतकरी वर्ग संकटात सापडलेला आहे. शेत मालालाभाव नसल्यामुळे  शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.कांदा पिक हे शेतकऱ्यांना दिलासा देणारे पिक आहे अनेक शेतकऱ्यांनी कांदा खराब होवु लागल्यामुळे आगोदरच विकलेला आहे थोड्या फार शेतकऱ्याकडे कांदा शिल्लक आहे भविष्यात भाव मिळेल या आशेने त्यांनी खराब कांदा काढुन पुन्हा चांगला कांदा चाळीत भरला आहे  कांदा निर्यातीमुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांना चांगल्या प्रकारे भाव मिळेल या आशेवर शेतकरी वर्ग असतांना केंद्र शासनाने अचानक कांदा निर्यातबंदी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाने तात्काळ कांदा निर्यातबंदीचा निर्णय रद्द करावा, असे निवेदनात म्हटले आहे.

🔹दोघांनी केली होती रानडुकराची शिकार
बुलडाणा - 16 सेप्टेंबर
बुलडाणा वनपरिक्षेत्रात रानडुकराची शिकार करणाऱ्या 2 तसेच शिकार करण्याच्या उद्देशाने जंगलात फिरणाऱ्या 2 असे 4 आरोपींना आज वन विभागाने अटक त्यांना कोर्टासमोर हजर केले असता त्यांची जामीन मंजूर केली आहे.
    लॉकडाउन च्या काळात बुलडाणा वन विभागाला माहिती मिळाली की बुलडाणा तालुक्यातील कोलवड गावात अवैधरित्या रानडुकराची शिकार करून त्याचा मांस विक्री केला जात आहे.26 मेला बुलडाणा वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश टेकाळे यांच्या नेतृत्वात वनपाल राहुल चौहान,दिपक घोरपडे, सुरेश भालेराव,विष्णु काकड,शिला खरात, विलास मेरत, संदीप मडावी,प्रवीण सोनुने,दिपक गायकवाड यांनी कोलवड गावात एका घरात छापा टाकून शिकार केलेल्या रानडुकराचा अंदाजे 60 किलो मांस व इतर साहित्य सह आरोपी अनिल उर्फ नारायण शिंदे रा.शिरपुर व राजेश शिंदे रा.नान्द्रकोळी यांना ताब्यात घेतले होते.तर दूसरी कार्रवाई गिरडा - 1 बिट मध्ये 3 अप्रैल रोजी करण्यात आली होती.या ठीकाणी जंगलात वन्य प्राणयांचा शिकार करण्याच्या उद्देशाने फिरणारे 2 जन 3 जाळे सह मिळून आले होते.आरोपी सुपडा चौहान व प्रभाकर सोनोने दोघे रा.हनवतखेड ता. मोताळा यांना वनरक्षक कैलाश तराळ व प्रशांत नारखेडे यांनी ताब्यात घेतले होते.दोन्ही प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले होते मात्र लॉकडाउन असल्यामुळे आरोपींना समज पत्र देण्यात आले होते.आज दोन्ही प्रकारणातील चार ही आरोपींना अटक करून कोर्टा समक्ष उभे केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.पुढील तपास आरएफओ गणेश टेकाळे यांच्या मार्गदर्शनात वनपाल राहुल चौहान करीत आहे.

🔹2 छोटे वाहनात क्रोसिंग केले जात होते दारुचे बॉक्स
🔸बुलडाणा व मोताळा येथील ते दारू दुकानदार कोण?
बुलडाणा - (कासिम शेख)16 सेप्टेंबर)
नियम मोडत आपला निर्धारित मार्ग बदलून इतर दोन वाहनात दारूचे बॉक्स पलटी मारताना बुलडाणा एलसीबीच्या पथकाने आज 16 सप्टेंबर रोजी भादोला गावाजवळ तीन वाहने पकडले असून तीन्ही वाहन बुलडाणा ग्रामीण ठाण्यात लावण्यात आले आहे.ज्या दोन छोटे वाहनात दारूचे बॉक्स टाकले जात होते ते दारू विक्रेते कोण?बिल्टी औरंगाबाद च्या नावाने होती तर भादोला जवळ ही क्रोसिंग का केली जात होती,असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
        पोलिसांनी दिलेली माहिती अशी की देशी दारू संत्राचे 800 बॉक्स घेऊन आयशर वाहन नागपूर हुन औरंगाबाद कडे निघाला होता.सदर दारु मे.निर्मल ट्रेडर्स,सर्वे नं.211,शॉप नं.5,हरसुल सांवगी, औरंगाबाद यांच्या नावाने होता. सदर वाहनाचा निर्धारित रुट नागपुर अमरावती अकोला खामगाव चिखली जालना व औरंगाबाद असा होता मात्र खामगाव नंतर चिखली कडे ना जाता सदर वाहन बुलढाण्याच्या दिशेने निघाला व बुलढाणा ग्रामीण ठाणे हद्दीतील ग्राम भादोला जवळ सदर मोठ्या वाहनातून दोन मिनी मालवाहू वाहनात माळ पलटी मारल्या जात असताना त्या ठीकाणी बुलढाणा एलसीबीचे पीएसआय मुकुंद देशमुख, अनिल भुसारी, भरत जंगले, विजय दराडे व श्रीकांत चिंचोले पोहोचले व त्यांनी वाहनाची बिल्टी चेक केली असता त्यांच्या लक्षात आले की वाहनचालकाने आपला निर्धारित मार्ग बदललेला आहे.त्यामुळे सदर तिन्ही वाहन ताब्यात घेऊन त्यांना बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहे.पलटी मारलेली दारू बुलडाणा येथील 2 व मोताळा येथील एक देशी दारू दुकानावार जात असल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेचा पंचनामा करून आता पुढील कारवाईसाठी अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती बुलडाणा एलसीबीचे पीआय महेंद्र देशमुख यांनी दिली आहे.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- शासनाने ग्राहकांच्या हिताचा विचार करुन वन नेशन वन रेशन सुरु केलेल्या योजनेचे ग्राहक पंचायतीच्या वतीने स्वागत करण्यात आले असुन या उपक्रमामुळे ग्राहकांची गैरसोय दुर होणार असल्याचे मत नाशिक विभाग ग्राहक पंचायतीचे  उपाध्यक्ष रणजीत श्रीगोड यांनी व्यक्त केले  आहे . ग्राहक पंचायतीच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात श्रीगोड यांनी पुढे म्हटले आहे की आज पर्यत कार्डधारकाला ज्या स्वस्त धान्य दुकानाचे रेशन कार्ड असेल त्याच दुकानातून धान्य घेण्याची मूभा होता रोजगाराच्या शोधार्थ अनेक कुटुंब दुसर्या जिल्ह्यात दुसऱ्या राज्यात जात असतात त्या ठिकाणी मोल मजुरी करत असताना त्यांना रेशनकार्ड असुन देखील जादा भावाने धान्य खरेदी करावे लागत होते तीच अवस्था ऊस तोडणी कामगारांची होती ऊस तोडणी करीता हे लोक आपल गाव सोडून दुसर्या जिल्ह्यात चार पाच महीने जातात त्या वेळी त्यांना आपले हाक्काचे राशन खरेदी करता येत नव्हते  या बाबीचा शासनाने गांभिर्याने विचार करुन वन नेशन वन रेशन ही योजना सुरु केली शासनाच्या या उपक्रमामुळे आता ग्राहाकाला आपल्या पध्दतीने कुठल्याही दुकानातुन आपले हक्काचे राशन घेता येणार आहे केवळ राशन घेण्याकरीता ग्राहकाला आपल्या गावी जाण्याची गरजच भासणार नाही ग्राहकाचे हित लक्षात घेवुन शासनाने घेतलेल्या निर्णयाचे ग्राहक पंचायतीचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष रणजीत श्रीगोड श्रीरामपूर तालुकाध्यक्ष गोरख बारहाते संदिप अग्रवाल रमेश चंदन अनिता आहेर सुजाता मालपाठक आदिनी स्वागत केले आहे.

बेलापूर : (प्रतिनिधी  )-बेलापूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संग्राम चांडे  यांनी आपल्या कर्तव्याचे पालन न केल्याने  कामात हलगर्जीपणा केल्याच्या गंभीर कारणावरुन निलंबित करण्यात आल्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी काढले असुन या प्रकरणी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तक्रार करुन कारवाई साठी पाठपुरावा केला होता                                        गटविकास अधिकारी  पंचायत समिती श्रीरामपूर  यांनी  ग्रामविकास अधिकारी संग्राम चांडे यांना दिनांक २७ जुलै १४ आँगस्ट  व २ सप्टेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती संग्राम चांडे ग्रामसेवक ग्रामपंचायत बेलापूर बु!! तालुका श्रीरामपूर 
यांनी केलेल्या आर्थिक अनियमितता व हलगर्जीपणा बाबत त्यांना सेवा निलंबित का कराणेत येवु नये या बाबतचा खूलासा मागविलेला होता संदर्भ  क्रमांक २ चे पत्रासोबत चांडे यांना सदरची नोटीस दिनांक  ७आँगस्ट रोजी बजावलेली पोहोच सादर केलेली आहे संदर्भ क्रमांक ३ चे पत्रान्वये चांडे यांनी अद्याप खूलासा सादर केला नसल्याचे या कार्यालयास कळविले असुन अपण जिल्हा परिषद कर्मचारी असुन सदैव निस्पृह सचोटीने वागणे व कर्तव्य परायण असणे आवश्यक आहे तथापी आपण कर्तव्याचे पालन न केल्याने आपण महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक ) नियम १९६७ चा नियम ३ चा भंग केलेला आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील )नियम १९६४ मधील नियम ३(१) अ मध्ये दिलेल्या तरतुदीस अधीन राहुन मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन या आदेशाद्वारे चांडे यांना आदेश बजावल्याच्या दिनांकापासुन जि प सेवेतुन निलंबीत करण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे  बेलापूर येथील एका व्यक्तीच्या नावे एक लाख ८७ हजार रुपयाचा बेअरर चेक काढण्यात आला  ग्रामपंचायतीत असे अनेक व्यवहार हे रोखीने केल्याचे उघड झाले ईलेक्ट्रीक सामान खरेदी देखभाल दुरुस्ती या करीता तीन लाख २५ हजार रुपये खर्च दाखविण्यात आला  पाणी पुरवठा सामान खरेदी देखभाल दुरुस्ती या करीता पाच लाख ७५ हजार रुपये खर्च दाखविण्यात आला हा सर्व व्यवहार चेक स्वरुपात होणे आवश्यक होते परंतु रकमा रोख स्वरुपात काढण्यात आल्या तसेच खरेदी केलेल्या वस्तूची ग्रामपंचायतीच्या साठा रजिस्टरमध्ये कुठल्याही प्रकारची   नोंद आढळली नाही
 निधी वाटप करताना अपंगांचे प्रमाणपत्र नसताना धनादेश काढले, मागासवर्गीयांचे वैैयक्तिक लाभाचे धनादेश मयत व्यक्तीच्या नावे देणे, ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेरे खरेदीचे बील एकाच खरेदीवर दोनवेळा काढण्यात आले  कॅमेर्यांची खरेदी ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असताना वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली नाही, पथ दिव्यांच्या खर्चामध्ये आर्थिक अनियमितता केली, , अंगणवाडीची तीन लाख रुपयांची खेळणी ई खरेदी ऐवजी केवळ कोटेशनवर केली, इलेक्ट्रिकल साहित्याची खरेदी व पाणीपुरवठ्यातील पाईपलाईनच्या खरेदी आदींबाबत जि प सदस्य शरद नवले यांनी तक्रारी केल्या होत्या. तसेच चुकीचे काम करणार्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी प सदस्य नवले यांनी केली होती
या तक्रारींची दखल घेत तत्कालीन सीईओ शिवराज पाटील यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांना नियुक्त करण्यात आले. आभाळे यांनी  विस्तार अधिकारी व्ही एन चर्हाटे आर डी अभंग तसेच कृषी अधिकार्यांच्या देखरेखीखाली दप्तर तपासणी केली. कामांची बिले व अदा केलेले धनादेश यांचीही माहिती घेतली. चौकशीत नियमांची पायमल्ली केल्याचे व आर्थिक अनियमितता केल्याचे नमूद करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी या अहवालाच्या आधारे  कर्तव्यात कसुर करुन हलगर्जीपणा केल्याचा गंभीर ठपका ग्रामसेवक संग्राम चांडे यांचेवर ठेवुन त्यांना निलंबन केले.  या सर्व अनियमितता व चुकीच्या खरेदी प्रकरणी चांडे यांना जि प सदस्य शरद नवले यांनी   वेळोवेळी सावध केले होते  राजकीयदृष्ट्या तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीतील  कारवाईकडे तालुक्याचे लक्ष होते.या कारवाई नंतर आता आणखी कुणावर कारवाई  होते याची चर्चा गावात सुरु असुन काँग्रेस सोबत जनता अघाडी यांच्या ताब्यात ग्रामपंचायतीचा कारभार आसताना  ईतका सावळा गोंधळ चालू असताना जनता अघाडीचे नेते गप्प का होते असाही सवाल विचारला जात आहे.

श्रीरामपूर ( प्रतिनिधी  )-अहमदनगर गुन्हा अन्वेषन विभागाने लोणी पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या जुगार अड्डयावर छापा टाकुन 
रोख रक्कम , मोबाईल , दुचाकी व चार चाकी वाहनासह एकूण ४४,लाख  -रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन या कारवाई मुळे जुगारअड्डा चालकाचे धाबे दणाणले आहे 
राहता तालुक्यातील विविध गावांमध्ये जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे अहमदनगरच्या गुन्हे अन्वेषण विभागाला समजल्यानंतर राहता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथे लोणी ते कोल्हार रोड लगत असणाऱ्या एका इमारतीच्या टेरेस वर चालू असलेल्या जुगार अड्ड्यांवर नगरच्या गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच धाड टाकून पोलिसांनी 44 लाख 17 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ,तसेच कोल्हार येथील या जुगार अड्ड्यावर सुमारे 41 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यामध्ये मोठे प्रतिष्ठित व्यक्ती असल्याचे बोलले जात आहे,  पोलिसांच्या या  धाडीमुळे जिल्ह्यातील जुगार अड्ड्यावाल्यांना मोठी जरब बसली आहे,
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, अहमदनगरच्या गुन्हे अन्वेषण विभागाला, या विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना रविवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली होती की, कोल्हार परिसरात मुदस्सर शकील शेख रा,कोल्हार बुद्रुक हा कयूम करीम शेख याच्या इमारतीच्या टेरेसवर पंचवीस ते तीस लोकांना घेऊन तिरट नावाचा जुगार खेळत आहे, त्यानंतर पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी एक टीम तयार करून संबंधित इमारतीला घेतले तर काही कर्मचाऱ्यांनी येथे टेरेस गाठले ,त्यावेळी तेथे एक दोन नव्हे तर चार डाव सुरू होते, त्यामुळे हा एक टाईमपास गेम नव्हे तर हा जुगार असल्याचे पोलिसांना समजून आले, पोलिसांनी या ठिकाणी त्वरित छापा टाकून संबंधित जुगार खेळणारे आरोपींना ताब्यात घेतले, काही पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र या ठिकाणाहून पोलिसांनी एकूण 44 लाख सतरा हजार 790 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ,तसेच 41 व्यक्तींवर या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, या जुगार अड्यावरून दुचाकी, मोबाईल, जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, अन्य मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे, यातील बहुतांशी लोकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत , जुगार खेळणाऱ्या मध्ये शिर्डी, रुई, राहता, लोणी ,अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, श्रीगोंदा ,मनमाड, येवला,येथील जुगार्यांचा सामावेश आहे   विविध तालुक्यातून हे जुगार खेळणारे जुगारी प्रतिष्ठित असणारे लोक येथे येत होते, कोल्हार येथील जुगार अड्ड्यांवर झालेल्या कारवाईत चेतन विजय वाघमारे,( पिंपळस). मुद्दत शकील शेख.(कोल्हार बुद्रुक. )सागर बेदाडे, व अशपाक जमीर शेख (,मनमाड) ,दिलावर मन्सूर शेख ,(कोल्हार बुद्रुक,)
आरबाज राजू पठाण (,राहता) माहिद कयूम शेख, (कोल्हार बुद्रुक) बुबेरखान निसारखान पठाण संगमनेर ,आसिफ तसलीम शेख (कोल्हार बुद्रुक,) अरशद रशीद मोमीन( येवला), वसंतलक्ष्मणबडे( येवला ,)अमित गाडेकर (राहता ,)लालू मारुती चौधरी (अकोले), कयूम गुलाब पठाण( विसापूर, तालुका श्रीगोंदा,) नवाब हुसेन शेख लोणी, जाहीद दिलावर सय्यद (कोल्हार, )सय्यद अली मोहम्मद, जयहिंद गोविंद माळी( राहुरी,) विलास दत्तात्रय चोथे (वांबोरी ,)सागर मदनलाल वर्मा, (बेलापूर ,तालुका श्रीरामपूर,) गणेश विठ्ठल जेजुरकर( ,शिर्डी,) इम्राण याकुब मोमिन( मनमाड,) शकील सलीम शेख (कोल्हार,) नजीर अजीज शेख (राहुरी).
संतोष बाबुराव चौधरी (अकोले ,)शकील जबर शेख (कोल्हार बुद्रुक),
संजय कांतीलाल पटेल ,(कोल्हार,) नुमान सत्तार शेख (कोल्हार, )भाऊसाहेब रामराव चौधरी (रुई,तालुका राहता )
सचिन बाळाराम पवार (,कोल्हार ),अमोल भास्करराव वाघमारे. (विसापूर तालुका श्रीगोंदा,) गणेश रंगनाथ सोमासे .(येवला ),महेश अण्णा बरकल (,मनमाड.)आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास अहमदनगरचे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत. या मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकल्यामुळे जिल्ह्यातील इतर जुगार अड्डे ही व त्यांच्या मालकांवर आणि जुगार खेळणाऱ्यांवर मोठी जरब,भिती निर्माण झाली आहे,

श्रीरामपूर  (प्रतिनिधी  )-केंद्र शासनाने सुरु केलेल्या "एक देश एक रेशनकार्ड " या योजनेचा प्रचार व प्रसार व्हावा या करीता  श्रीरामपूर तहसील कार्यालय तसेच स्वस्त धान्य दुकान या ठिकाणी विशेष मोहीम राबविण्यात आली.शासनाच्या "वन नेशन वन रेशन " या योजनेंतर्गत आता रेशन कार्डधारकाला सोयी नुसार कुठल्याही धान्य दुकानात आपल्या हक्काचे धान्य खरेदी करता येणार आहे .या पूर्वी ज्या स्वस्त धान्य दुकानात संबंधित कार्डधारकाचे रेशनकार्ड होते त्याच स्वस्त धान्य दुकानातुन माल खरेदी करावा लागत होता. काही कारणास्तव कार्डधारक बाहेरगावी गेला तर पाँज मशिनवर अंगठा न देता आल्यामुळे संबधीत कार्डधारकाला अन्न धान्यापासुन वंचित रहावे लागत होते . अनेक नागरीक रोजगाराच्या शोधार्थ एका राज्यातून दुसर्या राज्यात एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात जात असत . त्या ठिकाणी रोंजदारीची कामे करत असताना त्या कुटुंबाचे रेशनकार्ड असुन देखील त्यांना चढ्या भावाने धान्य खरेदी करावे लागत होते . या बाबीचा शासनाने गांभीर्याने विचार करुन संपूर्ण भारत देशात "एक देश एक रेशनकार्ड "ही योजना सुरु करण्याची  संकल्पना सुरु केली . सुरुवातीला काही राज्यात प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरु केली . या योजनेला मिळालेला प्रतिसाद पहाता आता सर्वत्र ही योजना सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला . त्या करीता जिल्हा व तालुका पातळीवर या योजनेचा प्रचार व प्रसार करण्याच्या सुचना जिल्हा पुरवठा अधिकारी यांना देण्यात आल्या . अहमदनगरच्या जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी तातडीने सर्व उपविभागीय अधिकारी ,तहसीलदार यांना या योजनेची नागरीकांना माहीती देण्याच्या सूचना केल्या . त्यांच्या सुचनेनुसार श्रीरामपूर तहसील कार्यालय , तालुक्यातील धान्य दुकाने यां ठिकाणी फलकाव्दारे जनजागृती करण्यात आली उपविभागीय आधिकारी अनिल पवार, तहसीदार प्रशांत पाटील यांच्या सूचनेनुसार पुरवठा अव्वल कारकून चारुशिला मगरे , गोदामपाल शिवाजी वायदंडे , पुरवठा निरीक्षक अतुल भांगे , पुरवठा विभागाचे  शिवशंकर श्रीनाथ , धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई , लाला गदिया , नरेंद्र खरात  , माणिक जाधव, किशोर छतवाणी , दक्षता समितीचे संदीप वाघमारे यांच्या उपस्थितीत फलकाद्वारे या योजनेची माहीती लाभधारकांना देण्यात आली.

मुस्लिम समाजाला 10% आरक्षण संपूर्ण महाराष्ट्रात लागू करावे या मागणीसाठी श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथे
श्रीरामपूर शहर व तालूका मुस्लिम आरक्षण अधिकार कृती समिती यांनी आज ७ सप्टेंबर रोजी तहसीलदार श्रीरामपूर यांच्याद्वारे  मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, अल्पसंख्याक मंत्री महाराष्ट्र राज्य,सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री अहमदनगर याना निवेदन देण्यात आले.
श्रीरामपूर शहर व तालूका मुस्लिम आरक्षण अधिकार कृती समिती संस्थापक सदस्य,फहीम शेख,फय्याज इनामदार,नाजीम शेख,आसीफ शेख,मार्गदर्शक व मा,संचालक महाराष्ट्र राज्य ऊर्दु महामंडळ हाजीआरीफभाई बागवान,माजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक इब्राहीमभाई शेख,अर्शद.                     इनामदार,आबुजर खान,इकबाल शेख,अफजल मन्सुरी,राजु मलंग,जफर शेख,साजीद मिझा,अन्वर पठाण,अकील शेख,सादीक शेख,अकबर पठाण,जुल्फेकार बागवान,आसिफ बागवान व  श्रीरामपूर शहर व तालूका मुस्लिम आरक्षण अधिकार कृती समिती सदस्य हजर व त्यांच्या सह्या होत्या.

पुणे सुप्रसिद्ध अंध कवयित्री व अंध जनांसाठी भरीव असे सामाजिक कार्य करणाऱ्या डॉ. प्रतिभा मोरेश्वर भोळे यांचे 1 सप्टेंबर रोजी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे अल्पशा आजाराने निधन झाले. कोरोना  कालावधीमध्ये त्यांची अंत्यसंस्कार करणेदेखील दुरापास्त झाले होते. अशा वेळेला माणुसकीच्या दृष्टिकोनातून कोरोना कालावधी मध्ये काम करणाऱ्या मूलनिवासी मुस्लिम मंच या संस्थेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारून हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे डॉ. प्रतिभा भोळे यांचा अंत्यसंस्कार पुणे वैकुंठ स्मशानभूमी येथे करून जाती-धर्माच्या भिंतींना पुण्यामध्ये थारा राहणार नाही असे उदाहरण दाखवून दिले.मराठी सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत मानाचे स्थान असणाऱ्या ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांच्या नात असणाऱ्या प्रतिभा हे अंध असल्यामुळे साहित्य क्षेत्रात मोठा संघर्ष करावा लागला होता तरी देखील आपल्या प्रतिभा आणि सातत्याच्या जोरावर त्यांनीही कवयित्री म्हणून तसेच अंध व अपंग जनांसाठी काम करणारी  स्वयंसेविका म्हणून मोठे नाव कमावले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत शासकीय व खाजगी संस्थांमार्फत विविध स्वरुपाचे पुरस्कार मिळालेले आहेत.अत्यंत मोठा मित्र परिवार व नातेसंबंधातील गोतावळा असतानाही अखेरच्या क्षणी मात्र त्यांच्या पतीशिवाय कोणी सोबत राहिले नाही. पत्नी मेल्याचे दुःख असताना अंतिम संस्कार करण्यासाठी जवळचे मित्र व नातेवाईक कोणीही उपलब्ध नसल्यामुळे भोळे यांचे पती सुनील परमार यांनी मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधाला यावेळी मूलनिवासी मुस्लिम मंचाने देखील  अवघ्या 20 मिनिटांमध्ये डॉक्टर भोळे यांच्या मदतीला पोहोचले सर्व आवश्यक ते सोपस्कार पूर्ण करून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथून डेड बॉडी घेऊन पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले. मूलनिवासी मुस्लिम मंचं यांनी आतापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या चारशे पेक्षा अधिक लोकांचे अंतिम संस्कार केलेले आहेत. यात मुस्लिम समाजा सोबतच हिंदू, ख्रिश्चन,लिंगायत,बौद्ध आदी सर्व धर्मीय लोकांचे अंतिम संस्कार केलेले आहे.जात-पात न पाहता मदत करणे हेच पुणेकरांचे वैशिष्ट्य असून सर्व मानवतावादी महापुरुषांची परंपरा पुढे चालवत आम्हीदेखील जात-धर्म विरहित काम करण्याचा कसोशीने प्रयत्न करत असल्याने आम्हाला सर्व लोकांचे सहकार्य मिळत आहे.सुप्रसिद्ध कवयित्री डॉक्टर प्रतिभा भोळे यांचा अंत्यसंस्कार आमच्या हातून होणे हे आमच्यासाठी भाग्याचे लक्षण आहे.असे आम्ही मानतो अशी भूमिका मनोगत मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार व त्यांचे सहकारी साबीर शेख तोपखाना, झमीर मोमिन, मोलाना शकिल शेख,साबीर सय्यद,दानिश खान,अमजद शेख व्यक्त केली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget