कर्तव्याचे पालन न केल्याचा ठपका ठेवुन बेलापूरचे तत्कालीन ग्रामसेवक निलंबित! निलंबित होणारा दुसरा ग्रामसेवक.

बेलापूर : (प्रतिनिधी  )-बेलापूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संग्राम चांडे  यांनी आपल्या कर्तव्याचे पालन न केल्याने  कामात हलगर्जीपणा केल्याच्या गंभीर कारणावरुन निलंबित करण्यात आल्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी काढले असुन या प्रकरणी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तक्रार करुन कारवाई साठी पाठपुरावा केला होता                                        गटविकास अधिकारी  पंचायत समिती श्रीरामपूर  यांनी  ग्रामविकास अधिकारी संग्राम चांडे यांना दिनांक २७ जुलै १४ आँगस्ट  व २ सप्टेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती संग्राम चांडे ग्रामसेवक ग्रामपंचायत बेलापूर बु!! तालुका श्रीरामपूर 
यांनी केलेल्या आर्थिक अनियमितता व हलगर्जीपणा बाबत त्यांना सेवा निलंबित का कराणेत येवु नये या बाबतचा खूलासा मागविलेला होता संदर्भ  क्रमांक २ चे पत्रासोबत चांडे यांना सदरची नोटीस दिनांक  ७आँगस्ट रोजी बजावलेली पोहोच सादर केलेली आहे संदर्भ क्रमांक ३ चे पत्रान्वये चांडे यांनी अद्याप खूलासा सादर केला नसल्याचे या कार्यालयास कळविले असुन अपण जिल्हा परिषद कर्मचारी असुन सदैव निस्पृह सचोटीने वागणे व कर्तव्य परायण असणे आवश्यक आहे तथापी आपण कर्तव्याचे पालन न केल्याने आपण महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक ) नियम १९६७ चा नियम ३ चा भंग केलेला आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील )नियम १९६४ मधील नियम ३(१) अ मध्ये दिलेल्या तरतुदीस अधीन राहुन मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन या आदेशाद्वारे चांडे यांना आदेश बजावल्याच्या दिनांकापासुन जि प सेवेतुन निलंबीत करण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे  बेलापूर येथील एका व्यक्तीच्या नावे एक लाख ८७ हजार रुपयाचा बेअरर चेक काढण्यात आला  ग्रामपंचायतीत असे अनेक व्यवहार हे रोखीने केल्याचे उघड झाले ईलेक्ट्रीक सामान खरेदी देखभाल दुरुस्ती या करीता तीन लाख २५ हजार रुपये खर्च दाखविण्यात आला  पाणी पुरवठा सामान खरेदी देखभाल दुरुस्ती या करीता पाच लाख ७५ हजार रुपये खर्च दाखविण्यात आला हा सर्व व्यवहार चेक स्वरुपात होणे आवश्यक होते परंतु रकमा रोख स्वरुपात काढण्यात आल्या तसेच खरेदी केलेल्या वस्तूची ग्रामपंचायतीच्या साठा रजिस्टरमध्ये कुठल्याही प्रकारची   नोंद आढळली नाही
 निधी वाटप करताना अपंगांचे प्रमाणपत्र नसताना धनादेश काढले, मागासवर्गीयांचे वैैयक्तिक लाभाचे धनादेश मयत व्यक्तीच्या नावे देणे, ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेरे खरेदीचे बील एकाच खरेदीवर दोनवेळा काढण्यात आले  कॅमेर्यांची खरेदी ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असताना वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली नाही, पथ दिव्यांच्या खर्चामध्ये आर्थिक अनियमितता केली, , अंगणवाडीची तीन लाख रुपयांची खेळणी ई खरेदी ऐवजी केवळ कोटेशनवर केली, इलेक्ट्रिकल साहित्याची खरेदी व पाणीपुरवठ्यातील पाईपलाईनच्या खरेदी आदींबाबत जि प सदस्य शरद नवले यांनी तक्रारी केल्या होत्या. तसेच चुकीचे काम करणार्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी प सदस्य नवले यांनी केली होती
या तक्रारींची दखल घेत तत्कालीन सीईओ शिवराज पाटील यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांना नियुक्त करण्यात आले. आभाळे यांनी  विस्तार अधिकारी व्ही एन चर्हाटे आर डी अभंग तसेच कृषी अधिकार्यांच्या देखरेखीखाली दप्तर तपासणी केली. कामांची बिले व अदा केलेले धनादेश यांचीही माहिती घेतली. चौकशीत नियमांची पायमल्ली केल्याचे व आर्थिक अनियमितता केल्याचे नमूद करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी या अहवालाच्या आधारे  कर्तव्यात कसुर करुन हलगर्जीपणा केल्याचा गंभीर ठपका ग्रामसेवक संग्राम चांडे यांचेवर ठेवुन त्यांना निलंबन केले.  या सर्व अनियमितता व चुकीच्या खरेदी प्रकरणी चांडे यांना जि प सदस्य शरद नवले यांनी   वेळोवेळी सावध केले होते  राजकीयदृष्ट्या तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीतील  कारवाईकडे तालुक्याचे लक्ष होते.या कारवाई नंतर आता आणखी कुणावर कारवाई  होते याची चर्चा गावात सुरु असुन काँग्रेस सोबत जनता अघाडी यांच्या ताब्यात ग्रामपंचायतीचा कारभार आसताना  ईतका सावळा गोंधळ चालू असताना जनता अघाडीचे नेते गप्प का होते असाही सवाल विचारला जात आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget